मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ।। अरब आणि उंट ।। — भाग 2 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

?जीवनरंग ?

☆ ।। अरब आणि उंट ।। — भाग 2 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

( तिकडे काहीच पैसे  सेव्ह नाही झाले.मला दुसरा फ्लॅट घेणं शक्य नाही. आणि औंधचा माझा फ्लॅट किती लहान आहे. मी कसला तिथे रहातोय. आजींचा केवढा प्रशस्त आहे ग !” रमाला हे ऐकून भयंकर संताप आला.) इथून पुढे —

तिला हे ऐकू गेलंय, हे सुदैवाने अखिलला समजले नव्हते. रमा उठून संध्याकाळी वीणाकडे गेली. वीणाला हे सगळे सांगितलं तिने. म्हणाली, “ वीणा मी आत्तापर्यंत तुला काही सांगितलं नाही ग. आपलेच दात आणि आपलेच ओठ ! माझ्याच मुलीचा मुलगा ग हा … पण काय वागते त्याची ती बायको ! आणि कसली  ती   मॉंटेसरीतली नोकरी आणि काय तो रुबाब..  वीणा, हे लोक आल्यापासून माझं स्वातंत्र्य आणि स्वास्थ्य हरवून गेलंय. तुला सांगितलं नाही मी, पण अखिलने घरात एक पैसाही दिला नाही, की किराणा, दूध किती लागतं तेही विचारलं नाहीये. मला कशालाच कमी नाहीये ग, पण हा युरोमध्ये पैसे मिळवून, परदेशी राहून आलेला मुलगा ना ? इतकी स्वार्थी असतात का ग आपली मुलं?” .. रमाच्या डोळ्यात पाणी आलं. वीणाने सगळं शांतपणे ऐकून घेतलं. “ रमा, तू का रडतेस? हे बघ! कित्ती शहाणपणा केलाय आपण, की पूर्वीच मृत्युपत्र करून ठेवलं. तेही रजिस्टर केलं, म्हणजे कोणतीही कायदेशीर त्रुटी नको. त्यात तू स्पष्ट लिहिलं आहेस ना, की हा तुझा फ्लॅट, तुझ्या पश्चात मुलगा आणि मुलीला जावा ! मग आता या नातवाचा संबंधच येतो कुठं? मुळीच देऊ नकोस. हा तुला घराबाहेर काढायलाही कमी करणार नाही रमा.  त्यातून तुझ्याच मूर्ख लेकीची फूस आहेच त्याला. तू आता शांतच बस. नुसती गम्मत बघ आता, काय काय होते ते. मग बघू या त्याची चाल. मी आहे ना तुझ्यासाठी ? कशी ग ही आपलीच म्हणायची माणसं … अजिबात खचून जाऊ  नकोस तू. घर आपलं, पैसा आपला … का म्हणून भ्यायचं ग यांना. जा निवांत घरी ! काहीही समजलंय असं दाखवूच नकोस. येऊ दे त्यांच्याचकडून पहिली खेळी.” …. वीणाकडून रमा मानसिक बळ घेऊनच आली.

 महिना काही न होता गेला आणि एक दिवस अखिल म्हणाला, “आजी, तू अशी एकटी किती दिवस राहू शकणार? आता सत्तरी उलटली की तुझी ! मी काय म्हणतो, आता गेले वर्षभर आपण एकत्र राहतोय, तसं कायम राहायला काय हरकत आहे? मामाच्या मुलाला या घरात इंटरेस्ट नाही. तो परदेशातून काही परत येत नाही बघ. मग राहिलो मीच ! मी कायम राहीन तुझ्याजवळ !” .. रमा धूर्तपणे म्हणाली,” हो रे अखिल, किती छान होईल तू शेवटपर्यंत माझ्याजवळ राहिलास तर ! मलाही नातवाचा आधार होईल.”  

— अखिल आणि रेणूची नेत्रपल्लवी रमाच्या लक्षात आलीच.

अखिल म्हणाला, “आजी, मग  तू हा फ्लॅट माझ्या नावावर कर ना ! म्हणजे मलाही कायदेशीर हक्क राहील ग …  तुला खात्री आहे ना, आम्ही तुला कधीच अंतर देणार नाही याची ? तुझं दुखलं खुपलं, म्हातारपण नीट बघू?” …. “ होय रे अखिल. मला तू आणि शिरीषमामाची दोन, अशी तिघेच तर आहात तुम्ही. ” 

अखिलच्या  कपाळावर  आठी उमटली. “ मामाची मुलं? अमोल आणि अपूर्व? छेछे.. ती काय करणार तुझं ? इथंआली तर करतील ना ! कायम एक दुबईला दुसरा  फ्रान्स ला! काय कमी आहे त्यांना? आणि इथं कशाला येतील ती दोघे? अग आजी, मीच  बघणार तुझं सगळं ! तू माझ्या नावावर करून दे फ्लॅट. मी फुलासारखा जपेन तुला ! “  रमा तिथून निघून गेली, काहीही न बोलता ! 

एक महिना तसाच गेला. रमा सगळे अपडेट्स वीणाला देत होतीच. एक दिवस अखिल म्हणाला, “आजी, उद्या आई येतेय. कित्ती दिवसात आलीच नव्हती. मध्यंतरी  आम्हीच आईबाबांना भेटून आलो, त्यानंतर ती कुठे आलीय ना पुण्याला? आता खास आपल्या सगळ्यांना  भेटायला येतेय आई.” … ‘ आता ही कोणती नवी चाल ‘  असं मनात आलंच रमाच्या ! ठरल्यादिवशी  माया बंगलोरहून आली. आल्याआल्या आईच्या गळ्यात पडली !  ‘ किती ग आई तू करतेस, किती पडतं तुला सगळं ‘ , असं म्हणून झालं. चार दिवस लेक सून नात यांच्याबरोबर फिरण्यात गेले.

जायच्या चार दिवस आधी म्हणाली, “आई, किती म्हातारी होत चाललीस ग तू. बरं झालं ना देवानेच अखिल ला पाठवलं,तुझ्यासाठी ! तू आता असं कर..  हा फ्लॅट अखिलच्या नावाने करून  टाक. ती शिरीषची पोरं कशाला येतात इकडं आई? आपला अखिलच तुला सांभाळेल बरं! कधी करूया ट्रान्सफर मग डॉक्युमेंट्स? म्हणजे हे पण येतील बंगलोर हून. “

रमा हे ऐकून थक्क झाली. स्वतःच्या पोटची मुलगी इतकी स्वार्थी होऊ शकते? हा अखिल आणि त्याची ती आळशी उनाड  बायको काय सांभाळणार मला? देवा ! मी हे जर प्रत्यक्ष माझ्या कानांनी ऐकलं नसतं  तर माझाही विश्वास बसला नसता यांच्या मनातल्या स्वार्थी हेतूवर. रमा म्हणाली, “ माया उद्या बोलूया आपण हं.”  

दुसऱ्या दिवशी सगळी मंडळी हॉलमध्ये जमली. रमाची अशी सुटका होणार नव्हती. 

रमा म्हणाली, ” कालपर्यंत तुम्ही सगळे बोलत होतात आणि मी ऐकत गेले, पण आता माझं  नीट ऐका. अखिल,आज दीड वर्ष झालं, तू तुझी बायको, मुलगी इथं रहाताय. किती खर्च केलात घरात? परदेशी राहून आलेले लोक ना तुम्ही? साधं  दुधाचं बिल, सुलूबाईंचा तुमच्यासाठी वाढवलेला पगार, किराणा, भाजी, याची तरी कधी चौकशी केलीत का? नशीब मला भरपूर पेन्शन आहे. नाहीतर मी कुठून केला असता हा डोईजड खर्च रे?  तू खुशाल म्हणतोस, मामाच्या मुलांना गरज नाहीये या फ्लॅटची. हे तू कोण ठरवणार रे? जसा मला तू नातू, तसेच तेही नातूच. कधी पाच वर्षात म्हणालास का, ‘आजी लंडनचा काही फार मोठा प्रवास नाही, ये ना माझा संसार बघायला.’  मी सहज येऊ शकले असते रे,,स्वतः  तिकीट काढून ! तू तरी म्हणालीस का ग माया? उलट अपूर्वने मला दुबईला स्वतः बरोबर नेऊन आणले. सगळी दुबई दाखवली. मी फ्रान्सलाही गेलेली आठवतेय का रे? अमोलकडे? काडीची तोशीस पडू दिली नाही मला पोरांनी. आणि किती गोड त्यांच्या बायका… खरोखर सांगते, मला इकडची काडी नाही तिकडे करू दिली त्या मुलींनी ! दुबईची सून तितकीच गोड आणि फ्रान्सची पण अशीच लाघवी. यात तुझी सून कुठेतरी बसते का माया? तूच बघ ना. मारे लंडनहून आजीकडे हक्काने आलात, काय आणलेत आजीला? हे बघ.. मला तुमच्याकडून खरंच काहीही नकोय. इथे सगळं मिळतं. पण तुमची नियत समजली मला ! अनेकवेळा हॉटेलमध्ये जाऊन जेवून येता तुम्ही, कधीही वाटलं नाही का, आजीलाही न्यावं ? मस्त आहे अजून मी तब्बेतीने ! विचारलंत का कधी एकदा तरी?— मी तुमचे दोष उगाळायला इथं बसली नाहीये. खूप दुनिया बघितलीय बरं मी ! म्हणूनच तुमच्या धोरणी आजोबांनी हा फ्लॅट फक्त माझ्याच नावावर केला. मी भाबडी आहे, व्यवहारी नाही, हे त्यांना माहीत होते. किती उपकार फेडू त्यांचे मी? “—- रमाने डोळे पुसले…. “ तर बरं का मंडळी, आहे हे असं आहे. स्वतःचा औंधचा तो तीन खोल्यांचा फ्लॅट भाड्याने दिला आहेस ना, तो लगेचच रिकामा करायला सांग. मला काही माहीत नाही असं वाटलं का? आजीने सुद्धा बँकेत 30 वर्ष नोकरी केलीय आणि ती  एम.कॉम. पण होती, हे विसरू नका. जवळजवळ दोन वर्षे आजीकडे अलिशान  चार बेडरूमच्या फ्लॅटमध्ये राहिलात. आता चार महिने मुदत देतेय. लवकरात लवकर तिकडे शिफ्ट व्हा. नाहीतर मग कुठं जायचं हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे. माया, तुझ्या ह्यांना इथे यायची काहीही गरज नाहीये. मुळीच नको बोलावू त्यांना. मी आत्ता हा फ्लॅट तुझ्याच काय, कोणाच्याच नावावर करणार नाही. माझ्या नंतरच तुम्हाला समजेल, त्याचे काय करायचे ते. सहा वर्षाची ही तन्वी मला विचारते — ‘ आजी तू इथे का राहतेस? दुसरीकडे का नाही जात?’  हिचा बोलविता धनी कोण आहे, हे समजायला कोणा ज्योतिषाची गरज नाही. माझं बोलून  संपलं आहे. चार महिन्यात  गाशा गुंडाळायचं बघा. माझ्या म्हातारपणाची नका बरं काळजी करू! तीही व्यवस्था केलीय मी.” 

— रमा स्वतःच्या बेडरूममध्ये निघून गेली आणि  सगळे अचंबित होऊन एकमेकांची तोंडे बघत बसले.

— समाप्त —  

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पालवी… ☆ श्री संजय आवटे ☆

? मनमंजुषेतून ?

☆  पालवी… ☆ श्री संजय आवटे ☆

वसंताचा सांगावा घेऊन येणा-या चैत्राच्या पालवीचा धर्म कोणता? रणरणत्या वणव्यात बहरणा-या झाडांचा धर्म कोणता? ‘उन्हाच्या कटाविरुद्ध’ त्वेषाने फुलून येणा-या गुलमोहराचा धर्म कोणता?  

तरीही नववर्षाला धर्माशी जोडणारे जोडोत बापडे, आपला धर्म मात्र पालवीचा. आपला धर्म बहरण्याचा. आपला धर्म फुलून येण्याचा. हा धर्म ज्याला कळतो, त्यालाच झाडांची हिरवाई खुणावते, त्यालाच निळं आकाश समजतं. आणि, 

“चंद्रोदय नव्हता झाला, आकाश केशरी होते”, हा केशरी रंगही त्यालाच मोह घालतो ! 

परवा असंच तळेगावला जायचं होतं. ड्रायव्हर म्हणाला, ” सर, मामुर्डीचं जे चर्च आहे ना, तिथून पुढं गेलं की बुद्ध विहार आहे. तिथून सरळ पुढं जाऊ. तसे आलो, तर आयोजकांचा फोन आला- तळेगाव स्टेशनच्या जैन मंदिराकडं या. मग आपण पुढं जाऊ. आयोजक तिथं भेटले. गेलो, तर प्रत्यक्ष कार्यक्रम गणपती मंदिरात. तिथं शेजारीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा टुमदार बंगला. बौद्ध धर्माची दीक्षा घेण्याचा त्यांचा विचार इथंच अंतिम झाला, असं म्हणतात. अवघ्या दहा किलोमीटरच्या प्रवासात कुठं कुठं जाऊन आलो!  

हा भारत आहे. 

उद्यापासून रमजान सुरू होईल. 

पुण्याजवळच्या खेड शिवापूरला दर्गा आहे. हजरत कमर अली दुर्वेश रह दर्गा. रमजान आला की या गावातले सगळे कोंडे-देशमुख रोझे ठेवतात. एवढेच नाही, रमजानमध्ये, तिथल्या उरूसात देशमुखांचा मान असतो.

अशी कैक उदाहरणं देता येतील. 

भारताची ही गंमत आहे. 

हिंदुत्वाचं राजकारण करून थकलेल्या नेत्याला अखेर जावेद अख्तरांचा आदर्श जाहीरपणे सांगून नववर्ष साजरं करावं लागतं, ही खरी मजा आहे. जावेद यांनी पाकिस्तानात जाऊन बरंच सुनावलं, हे भारी आहेच. पण, भारतात राहून ते रोज काही सुनावत असतात. तेही ऐकावं लागेल मग ! कारण काहीही असो, पण हिंदू मतपेटीचं राजकारण करणा-यांना जावेद अख्तर सांगायला लागणं, असा ‘क्लायमॅक्स’ सलीम-जावेद जोडीला सुद्धा कधी सुचला नसता. 

पण, तीच भारताची पटकथा आहे ! 

साळुंब्र्याच्या प्राथमिक शाळेपर्यंत चालत चालत आलो. तर, पोरं ‘ खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे ‘, ही साने गुरूजींची प्रार्थना म्हणत होती. 

वाटलं, हे वेगळं सांगण्याची गरजही भासू नये, इतकं भिनलेलं आहे ते आपल्या मनामनात. इतकं नैसर्गिक आहे हे. अर्थात, उगाच नाही उगवलेलं हे. त्यासाठी मशागत केलीय आमच्या देहूच्या तुकारामानं. आळंदीच्या ज्ञानेश्वरानं. कबीरानं. त्याहीपूर्वी बुद्धानं. म्हणून तो वारसा सांगत आज ही पोरं प्रेमाचा धर्म सांगू शकताहेत. 

या प्रेमाच्या धर्मावर आक्रमण करणारे मूठभर प्रत्येक काळात असतात. त्यांचा विजय झाला, असं काही काळ वाटतंही. पण, युद्ध संपतं. बुद्ध मात्र उरतो. मंबाजी संपतो, तुकोबा उरतो. शेणगोळे विरतात, सावित्री-ज्योतिबा उरतात. 

विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म। 

भेदाभेद-भ्रम अमंगळ॥ 

हाच धर्म अखेरीस जगज्जेता ठरतो. 

आपण चालत राहायला हवं, या पोपटी पालवीकडं पाहात. जोवर ही पालवी येते आहे, तोवर निसर्गानं आशा अद्याप सोडलेली नाही, हे नक्की आहे ! 

तुम्ही का सोडता? 

© श्री संजय आवटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सत्राणे उड्डाणे… ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ सत्राणे उड्डाणे… ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆ 

समर्थ रामदासजींनी दासबोध, आत्माराम, मनोबोध इत्यादी ग्रंथ रचले आहेत, तसेच शेकडो ‘अभंग’ही लिहिलेले आहेत. यासोबतच समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेल्या ९० पेक्षा अधिक आरत्या महाराष्ट्रातील घरा- घरात म्हटल्या जातात.

समर्थांचा गायनीकलेचा अभ्यास होता. ‘धन्य ते गायनी कला’ असे म्हणून समर्थांनी गायनीकलेचा गौरव केला आहे. त्यामुळे त्यांच्या रचनेत लयीचा गोडवा अनुभवता येतो. पारमार्थिक विचार असो, आत्मनिष्ठ, अभ्यासपूर्ण चिंतन असो, ते लयीत मांडण्याची खुबी रामदास स्वामींजवळ आहे. याचा प्रत्यय त्यांनी रचलेल्या आरत्यांतून घेता येतो. 

गणपती उत्सवात रामदासांनी रचलेल्या आरत्या म्हटल्या जातात. त्या आबालवृद्धांच्या तोंडी सहजपणे येतात. त्या आरत्यांची लोकप्रियताही वर्षानुवर्षे टिकून राहिली आहे. याला कारण म्हणजे त्या आरत्यांतील गेयता, चपखल शब्दरचना, लयबद्धता, शब्दांचे माधुर्य, आघात, भाषेतील ठसका..!

वीररसाने युक्त अश्या हनुमंताची ‘सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी’ ही आरती समर्थ रामदासस्वामी यांनी रचलेली असल्याने तिच्यामध्ये मुळातच चैतन्य ओतप्रोत भरलेले आहे. ‘सनातन’चा भाव असलेल्या, म्हणजे ईश्वराच्या अस्तित्वाविषयी दृढ जाणीव असलेल्या साधकांनी ही आरती म्हटलेली असून तिच्यात वाद्यांचा न्यूनतम उपयोग केला असल्याने ती अधिक भावपूर्ण झाली आहे. 

आरतीमधील शब्दांचा उच्चार कसा करायचा, शब्द म्हणण्याची गती कशी असावी, कोणते शब्द जोडून म्हणावेत किंवा वेगवेगळे म्हणावेत, हेही यातून कळेल. ही आरती ऐकण्याने अन् तशा पद्धतीने म्हणण्याने आपल्यातही जलद भावजागृती होण्यास साहाय्य होईल.

हनुमंताच्या ‘सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी’ या आरतीतील शब्दरचना मारुतीची प्रचंड शक्ती, अद्भुत कार्य नजरेसमोर उभे करतात. त्यातील शब्द हृदयावर आघात करीत आपले बल वाढवतात. समर्थ भाषाप्रभू होते. गेयता, लय, उचित शब्दयोजना त्यांच्यासमोर हात जोडून उभे राहतात.

हनुमंताचे कार्य जेवढे अफाट, तेवढेच त्याचे कार्य शब्दबद्ध करणारे समर्थ रामदास स्वामी यांचे शब्दही अफाट. म्हणूनच हनुमंताची आरती म्हणताना अनेकदा बोबडी वळते आणि नुसते जयदेव जयदेव म्हणत आरती पूर्ण केली जाते. परंतू , या आरतीतील अवघ्या दोन कडव्यांचा भावार्थ नीट समजून घेतला, तर ती पाठ होणे अवघड नाही.  

समर्थ रामदास रचित, म्हणायला अवघड परंतू आशयघन अशी हनुमंताची आरती आणि भावार्थ —- 

सत्राणे उड्डाणे हुंकार वदनीं । करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनीं ।

कडाडिलें ब्रह्मांड धोका त्रिभुवनीं । सुरवर, नर, निशाचर, त्या झाल्या पळणी ।। १ ।।

(आरतीमधील कठीण शब्दांचा अर्थ समजून घेऊ या. ‘सत्राणे उड्डाणे हुंकार वदनीं ।’ यामधील ‘सत्राणे’ म्हणजे आवेशाने.)

भावार्थ :-समर्थ रामदास वर्णन करतात- मारुती स्वत:च्या सामर्थ्यानिशी लोकांचे रक्षण करण्यासाठी झेप घेत असताना त्याच्या तोंडातून हुंकार बाहेर पडला. त्यामुळे संपूर्ण पृथ्वी दोलायमान झाली. सागराच्या पाण्यावर उत्तुंग लाटा उसळल्या आणि त्या आकाशापर्यंत पोचून तिथेही खळबळ माजली. संपूर्ण ब्रह्मांड थरथरू लागले आणि तीनही लोकांमध्ये भीती उत्पन्न झाली. पंचमहाभूतांमध्ये खळबळ उडाली. देव, मानव, राक्षस या सर्वांना पळता भुई थोडी झाली. ।।१।।

जयदेव जयदेव जय श्रीहनुमंता, 

तुमचेनि प्रसादे न भिये कृतांता।। धृ।।

(कठीण शब्दांचा अर्थ:- ‘तुमचेनि प्रतापे न भिये कृतान्ता’ यामधील ‘कृतान्त’ याचा अर्थ मृत्यू.)

भावार्थ :- अशा भीमकाय हनुमंता तुझा जयजयकार असो. तुझी कृपा असली, की कोणीही यमाला सुद्धा घाबरणार नाही. ।।धृ।।

 दुमदुमिले पाताळ उठला पडशब्द । धगधगिला धरणीधर मानिला खेद ।

कडाडिले पर्वत उडुगण उच्छेद । रामीं रामदासा शक्तीचा शोध ।। २ ।।

(कठीण शब्दांचा अर्थ –  ‘धगधगिला धरणीधर मानिला खेद’ याचा अर्थ हनुमानाचे सामर्थ्य पाहून शेषनागही मनात चरफडला आणि खेद पावला. ‘कडाडिले पर्वत उडुगण उच्छेद ।’ या ओळीतील ‘उडुगण’ म्हणजे नक्षत्रलोक. ‘रामीं रामदासा शक्तीचा शोध ।’ याचा अर्थ रामाशी एकरूप झालेल्या, अशा मारुतीच्या ठिकाणी समर्थ रामदासस्वामींना शक्तीचा स्रोत सापडला.)

भावार्थ :– सप्त पाताळांमध्ये प्रचंड आवाज झाला. त्याचा प्रतिध्वनी इथे भूमीवर पोहोचला. त्याचा त्रास होऊन पर्वताचा सुद्धा थरकाप झाला. पर्वत कोलमडू लागले आणि सर्व प्राणीमात्रांवर मोठी आपत्ती आली. पक्ष्यांचा विनाशकाळ आला की काय अशी स्थिती उत्पन्न झाली. तुझ्याठायी असलेल्या अफाट शक्तीचे सर्व चराचराला आकलन झाले. परंतू, या शक्तीचा तू गैरवापर केला नाहीस हे महत्त्वाचे ! ती सर्व शक्ती रामचरणी अर्पण केलीस आणि रामकार्यार्थ वापरलीस, यातच तुझ्या भक्ती आणि शक्तीचा गौरव आहे. 

— ‘दुमदुमले पाताळ’ किंवा ‘थरथरला धरणीधर’, ‘कडकडिले पर्वत’ या शब्दांतून वीररसाचा आविर्भाव होतो. हा वीरमारुती होय.

— ‘अशा पद्धतीने आपणासही भावपूर्ण आरती म्हणता येवो अन् भावजागृतीचा आनंद मिळो’, अशी श्रीरामचरणी प्रार्थना.

संग्राहक : श्री अनंत केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “एक वेगळं ज्ञान” ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “एक वेगळं ज्ञान ” ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

कामानिमित्त लोहाराकडे गेलो असता,

काम झालं, आणि त्याला सहज विचारलं की 

“बाबा, ऐरण व हातोडी ही तुमची साधने ! तर किती वर्ष झाली हातोडी व ऐरणीला?”

*

लोहार म्हणाला, “हातोड्या अनेक तुटल्या पण ऐरण कायम टिकून आहे”

मी विचारलं, “असं का ?”

त्यावर लोहाराने जे उत्तर दिले ते जणू मला जगण्याचा अर्थच सांगून गेले. 

लोहार म्हणाला—  

“जे घाव घालतात ते त्यांच्या कर्मामुळे तुटतात, पण जे घाव सहन करतात ते कायम अभंग राहतात !”

*

मनोमन त्याला राम राम करून निघालो — 

— एक वेगळं ज्ञान घेऊन !

संग्राहिका : सौ उज्ज्वला केळकर 

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ लेखनी सुमित्र की # 133 – प्रार्थना के स्वर… ☆ डॉ. राजकुमार तिवारी “सुमित्र” ☆

डॉ राजकुमार तिवारी ‘सुमित्र’

(संस्कारधानी  जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर डॉ. राजकुमार “सुमित्र” जी  को सादर चरण स्पर्श । वे आज भी  हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया।  वे निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणा स्त्रोत हैं। आज प्रस्तुत हैं  आपकी एक भावप्रवण रचना– प्रार्थना के स्वर…।)

✍  साप्ताहिक स्तम्भ – लेखनी सुमित्र की # 133 – प्रार्थना के स्वर …  ✍

भाव संपदा हो घनी, हो चरणों की चाह।

शब्द ब्रह्म आराधना, घटे नहीं उत्साह।

करुण, वीर ,वात्सल्य रस ,श्रंगारिक रसराज।

रस की हो परिपूर्णता, माने रसिक समाज।।

सत शिव -सुंदर काव्य ही,मौलिक रचे रचाव।

नयन प्रतीक्षा में निरत ,हार्दिक रहे प्रभाव।।

रस ही जीवन प्राण है, सृष्टि नहीं रसहीन ।

पृथ्वी का मतलब रसा, सृष्टि स्वयं रसलीन ।।

प्रथम वर्ण उपचार से, रचता रंग विधान।

प्रेम रंग में जो रंगी, उसको खोजे प्राण।।

© डॉ राजकुमार “सुमित्र”

112 सर्राफा वार्ड, सिटी कोतवाली के पीछे चुन्नीलाल का बाड़ा, जबलपुर, मध्य प्रदेश

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ अभिनव गीत # 132 – “सहन नही कर पायी ऑंसू…” ☆ श्री राघवेंद्र तिवारी ☆

श्री राघवेंद्र तिवारी

(प्रतिष्ठित कवि, रेखाचित्रकार, लेखक, सम्पादक श्रद्धेय श्री राघवेंद्र तिवारी जी  हिन्दी, दूर शिक्षा, पत्रकारिता व जनसंचार,  मानवाधिकार तथा बौद्धिक सम्पदा अधिकार एवं शोध जैसे विषयों में शिक्षित एवं दीक्षित। 1970 से सतत लेखन। आपके द्वारा सृजित ‘शिक्षा का नया विकल्प : दूर शिक्षा’ (1997), ‘भारत में जनसंचार और सम्प्रेषण के मूल सिद्धांत’ (2009), ‘स्थापित होता है शब्द हर बार’ (कविता संग्रह, 2011), ‘​जहाँ दरक कर गिरा समय भी​’​ ( 2014​)​ कृतियाँ प्रकाशित एवं चर्चित हो चुकी हैं। ​आपके द्वारा स्नातकोत्तर पाठ्यक्रम के लिए ‘कविता की अनुभूतिपरक जटिलता’ शीर्षक से एक श्रव्य कैसेट भी तैयार कराया जा चुका है।  आज प्रस्तुत है  आपका एक अभिनव गीत  सहन नही कर पायी ऑंसू)

☆ साप्ताहिक स्तम्भ # 132 ☆।। अभिनव गीत ।। ☆

सहन नही कर पायी ऑंसू… ☆

मरे जिस समय, संस्कार को

ढोते हुये पिता

पर मुखाग्नि न दे पाये बेटे,

थी सजी चिता

 

बेटी जो थी व्याही अपने

मैके के ही पास

रोती आई मन में ले अंतिम

दर्शन की आस

 

वही पिता को दे मुखाग्नि

पंचो ने नियत किया

पता चला कितनी क्या पुत्री

होती समर्पिता

 

और बाप के अस्थिकलश को

ले पहुंचीं गंगा

इस समाज के दीन धरम को

करके अधनंगा

 

जार जार रोती थी पुत्री

अपने बापू को

सहन नही कर पायी ऑंसू

सुरसरि की सिकता

 

जब त्रियोदशी भी करली

तब नालायक बेटे

पहुंचें गाँव स्वांग को भरते

किस्मत के हेटे

 

इधर एक हरकारा मरघट से

आकर बोला –

“उन लकड़ी के पैसे दे दो ,

जिन से जली चिता “

 

©  श्री राघवेन्द्र तिवारी

29-03-2023

संपर्क​ ​: ई.एम. – 33, इंडस टाउन, राष्ट्रीय राजमार्ग-12, भोपाल- 462047​, ​मोब : 09424482812​

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – वाचाल ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )

? संजय दृष्टि – वाचाल ??

दोनों बनाते-बढ़ाते रहे

साउंडप्रूफ दीवारें अपने बीच,

नटखट बालक-सा वाचाल मौन;

कूदता-फांदता रहा;

शोर मचाता रहा,

दीवार के दोनों ओर;

उन दोनों के बीच..!

© संजय भारद्वाज 

11.28 बजे, 19.1.2020

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

💥 आपदां अपहर्तारं साधना श्रीरामनवमी अर्थात 30 मार्च को संपन्न हुई। अगली साधना की जानकारी शीघ्र सूचित की जावेगी ।💥

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

English Literature – Poetry ☆ ‘अपने वरक्स’… श्री संजय भारद्वाज (भावानुवाद) – ‘Trial…’ ☆ Captain Pravin Raghuvanshi, NM ☆

Captain Pravin Raghuvanshi, NM

(Captain Pravin Raghuvanshi —an ex Naval Officer, possesses a multifaceted personality. He served as a Senior Advisor in prestigious Supercomputer organisation C-DAC, Pune. He was involved in various Artificial Intelligence and High-Performance Computing projects of national and international repute. He has got a long experience in the field of ‘Natural Language Processing’, especially, in the domain of Machine Translation. He has taken the mantle of translating the timeless beauties of Indian literature upon himself so that it reaches across the globe. He has also undertaken translation work for Shri Narendra Modi, the Hon’ble Prime Minister of India, which was highly appreciated by him. He is also a member of ‘Bombay Film Writer Association’.

We present an English Version of Shri Sanjay Bhardwaj’s Hindi poem “~ अपने वरक्स ~.  We extend our heartiest thanks to the learned author Captain Pravin Raghuvanshi Ji (who is very well conversant with Hindi, Sanskrit, English and Urdu languages) for this beautiful translation and his artwork.)

श्री संजय भारद्वाज जी की मूल रचना

? संजय दृष्टि – अपने वरक्स – ??

फिर खड़ा होअपने वरक्सता हूँ

अपने कठघरे में,

अपने अक्स के आगे

अपना ही मुकदमा लड़ने,

अक्स की आँख में

पिघलता है मेरा मुखौटा,

उभरने लगता है

असली चेहरा..,

सामना नहीं कर पाता,

आँखें झुका लेता हूँ

और अपने अक्स के वरक्स

हार जाता हूँ अपना मुकदमा

हर रोज़ की तरह…!

संजय भारद्वाज🙏

9890122603
[email protected]

( कविता संग्रह ‘मैं नहीं लिखता कविता’ से।)

© संजय भारद्वाज 

मोबाइल– 9890122603, संजयउवाच@डाटामेल.भारत, [email protected]

☆☆☆☆☆

English Version by – Captain Pravin Raghuvanshi

? ~ Trial ~ ??

I stand up again

in my testimony box,

before my own image

to fight my own case…

In the eyes of image

melts my mask…

There begins to emerge

my real face…

Unable to cope up

I lowered down my

eyes shamefully

And, before my

own reflection,

yet again, I lose my case

like everyday…!

~Pravin

© Captain Pravin Raghuvanshi, NM

Pune

≈ Editor – Shri Hemant Bawankar/Editor (English) – Captain Pravin Raghuvanshi, NM ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ व्यंग्य # 181 ☆ “वो बेचैन सा क्यूं है…?” ☆ श्री जय प्रकाश पाण्डेय ☆

श्री जय प्रकाश पाण्डेय

(श्री जयप्रकाश पाण्डेय जी की पहचान भारतीय स्टेट बैंक से सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी के अतिरिक्त एक वरिष्ठ साहित्यकार की है। वे साहित्य की विभिन्न विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। उनके  व्यंग्य रचनाओं पर स्व. हरीशंकर परसाईं जी के साहित्य का असर देखने को मिलता है। परसाईं जी का सानिध्य उनके जीवन के अविस्मरणीय अनमोल क्षणों में से हैं, जिन्हें उन्होने अपने हृदय एवं साहित्य में  सँजो रखा है। आज प्रस्तुत है आपका एक व्यंग्य – वो बेचैन सा क्यूं है…?”।)

☆ माइक्रो व्यंग्य # 181 ☆ “वो बेचैन सा क्यूं है…?” ☆ श्री जय प्रकाश पाण्डेय ☆

वो अक्सर व्याकुल बेचैन सा नजर आता है। उसकी इस बेचैनी को देखकर चिंता भी होती है। चिकित्सक कहते हैं कि अति आतुर या व्याकुल होना भी एक रोग ही है। इसका मतलब वो जरूर इस रोग से पीड़ित है।  दैनिक जीवन में प्रतिदिन वो व्याकुल सा परेशान रहता है। उससे जब पूछो कि- वो इतना आतुर क्यों दिखता है? तो झट से उसका जबाब होता है कि- लेखक भी तो लिख देते हैं कि उनके अंदर बेचैन आत्मा रहती है, और यह बेचैन आत्मा उनसे शानदार रचनाएं लिखवा देती है। 

पहले ऐसा कहा जाता था कि वृद्ध होने पर ही इंसान आतुर जैसा हो जाता हैं, पर ऐसा लगता है कि वर्तमान में बच्चे और युवा सभी इस रोग से पीड़ित हैं। सभी को शीघ्रता है। आज कल सभी हाथ मोबाइल लिए हुए  हैं। वो भी तीन चार मोबाइल साथ रखता है,  उसकी हर दम आदर के साथ झुकी हुई गर्दन, आंखे मोबाइल के स्क्रीन में अंदर तक घुसी हुई, मन बेचैन व्याकुल सा किसी नए मेसेज की प्रतीक्षा में ही रहता है। अल सुबह वो सर्वप्रथम मोबाइल को प्रणाम कर दिन का शुभारंभ करता है। जब शुरुआत ही बेचैनी से होगी तो पूरा दिन भी उसी प्रकार का होगा। 

क्या अतुरता बेचैनी ये सब हम सब के स्वभाव का हिस्सा तो नहीं बन गया है? उसको देखकर ऐसा लगता है, साधु संत तो कहते हैं कि संयम और धैर्य से काम लो फिर वो इतना व्याकुल और बेचैन क्यों रहता है। अभी उस दिन की बात है बैंक की लंबी लाइन में वो नियम विरुद्ध किनारे से आकर पूछता है, सिर्फ खाते में बैलेंस की जानकारी लेनी हैं। ये बात अलग है, कि वो बैलेंस के नाम से अपनी बैलेंस शीट में लगने वाली बैंक की पूरी जानकारी प्राप्त कर लेता है। लाइन में इंतजार कर रहे अन्य व्यक्तियों के समय हानि को दरकिनार कर अपना उल्लू सीधा करने में उसकी व्याकुलता और बेचैनी काम आती है। वो हर समय जल्दी में रहता है पर रोज खूब देर से सोकर भी उठता है।      

आज फिर जब मैं पपलू दवा की दुकान से अपने जीवित रहने की दवा खरीदने के लिए डॉक्टर का पर्चा वहां कार्यरत व्यक्ति को दे रहा था, तभी वो दूर खड़ी कार की खिड़की से कूकर के समान अपनी थूथनी बाहर निकाल कर डाक्टर पर्ची को उल्ट पलट कर दवा का नाम लेकर उसकी उपलब्धता, भाव,एक्सपायरी की तारीख, दो हज़ार के छूट आदि की पूरी जानकारी लेने लगा। उसके पास कार से बाहर आकर बातचीत करने का समय नहीं था। वो वहीं से बेचैनी से चिल्लाकर कहने लगा उसका टाइम खराब हो रहा है। उसको टीवी पर शाम को होने वाली कुत्तों की तरह होने वाली बहस देखना जरूरी है। उस हालात में उसकी बेचैनी और व्याकुलता देखने लायक थी। कहते हैं कि विश्व में सबसे ज्यादा युवा शक्ति भारत में है पर  जुकुरू बाबा ने फेसबुक, वाट्सएप, इंस्टाग्राम और तरह तरह के आनलाइन गेम में फंसाकर पूरी युवा शक्ति में बेचैनी और व्याकुलता भर दी है और डाक्टर लोग कह रहे हैं इस रोग का कोई इलाज नहीं है।

© जय प्रकाश पाण्डेय

416 – एच, जय नगर, आई बी एम आफिस के पास जबलपुर – 482002  मोबाइल 9977318765

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ क्या बात है श्याम जी # 123 ☆ # सत्यमेव जयते… # ☆ श्री श्याम खापर्डे ☆

श्री श्याम खापर्डे

(श्री श्याम खापर्डे जी भारतीय स्टेट बैंक से सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी हैं। आप प्रत्येक सोमवार पढ़ सकते हैं साप्ताहिक स्तम्भ – क्या बात है श्याम जी । आज प्रस्तुत है आपकी एक भावप्रवण कविता “# सत्यमेव जयते… #”

☆ साप्ताहिक स्तम्भ ☆ क्या बात है श्याम जी # 123 ☆

☆ # सत्यमेव जयते… # ☆ 

मै एक पहाड़ी के चोटी पर खड़ा हूँ 

हाथ जोड़कर आंखें मूंदा पड़ा हूँ

चारों तरफ घंटियां बज रहीं हैं

आरतियां प्रार्थना की सज रही है

रंग बिरंगे परिधानों में

धरती और आसमानों में

रून-झुन पांव चल रहे हैं

संग संग गांव चल रहे हैं

आंखों में एक आस है

मन में कुछ पानें की प्यास है

भीनी भीनी सुगंध है

पवन चल रही मंद मंद है

थाल रखा जब मूर्ति के आगे

उसको लगा भाग है जागें

भक्ति मे लीन वो अनंत में खो गई

अपनें आराध्य के हृदय में सो गई

तंद्रा टूटी और वो जागी

अकेली खड़ी थी वो अभागी

वो सीढ़ियां चढ़ कर पहाड़ी पर आई

मुझको प्रसाद देकर मुस्कुराई

मुझसे पूछा –

क्या मांगा आपने?

क्या चाहा आपने?

मैं बोला –

मांगने तो तुम गई थी

अपने मन की बात तुमने कही थी

मै तो निसर्ग के सौंदर्य में मगन था

फैली सुंदरता का  मन में लगन था

वो बोली –

मैंने तो अपने लिए मांगा सब कुछ

मेरे जीवन में ना आए कोई दुःख

और तुमने –

मैंने कहा –

प्रेम ही जीवन है

जीवन में प्रेम की लगन हो

धीमे धीमे तपिश दे

ऐसी मधुर अगन हो

बस प्रभु –

झूठ  कभी ना सर चढ़ पाए 

असत्य कभी सत्य से ना लढ़  पाए 

झूठ, पाखंड, मक्कारी के युग में

असत्य कोई इतिहास ना गढ़ पाए 

आखरी सांस के रहते तक

हम सब कहे,

सत्यमेव जयते, सत्यमेव जयते/

© श्याम खापर्डे

फ्लेट न – 402, मैत्री अपार्टमेंट, फेज – बी, रिसाली, दुर्ग ( छत्तीसगढ़) मो  9425592588

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares