सौ राधिका भांडारकर

? कवितेचा उत्सव ?

☆ “विनाश (भुजंगप्रयात)” ☆ सौ राधिका भांडारकर 

उभा तो जिथे स्फोट झाला कुकर्मे

किती ही घरे हो जळाली कुणाची

कसे माणसा क्लेश झाले विनाशी

रिकामी स्मशाने हवेली भुतांची॥१॥

*

उरे तो कसा एकटा जीव त्याचा

कुटुंबीय त्याचे नुरे ना बिचारा

असा शोक त्याचा कसा कोण ऐके

भुकेल्या मुला कोण देईल थारा॥२॥

*

कशाला लढाया हव्या मानवाला

किती जीव ते मारले या भ्रमाने

कसे या मुलाने जगावे अनाथी

कसा मोकळा श्वास घ्यावा तयाने॥३॥

*

गुन्हा काय त्याचा मनाला विचारा

विनाकारणे तो जगी पारखा रे

सुखाचा तयाने कसा ध्यास घ्यावा

मिळावी कशी शस्त्र शांती खरी रे॥४॥

*

नको स्वार्थ सत्तांधता ही बळीची

हवी प्रेम माया मनीची जगाला

जपावी धरा ही असावी फुलांची

नको रक्तधारा तिच्या काळजाला॥५॥

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
4 1 vote
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments