सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? कवितेचा उत्सव ?

☆ “सांज-सकाळ…” ☆  सुश्री मंजुषा सुनीत मुळे  ☆

चालला तो चालला.. रवी गगन सोडुनी चालला

त्याला निरोप नि द्यायला.. या थांबल्या जणू सावल्या

*

 जाणार तो तरीही इथे ती खंत कोणा ना मुळी

 संताप करी त्या लाल परि.. तो राग आपुल्या मनी गिळी…

*

सततचि तो तप्त त्याला सारखे मी किती पुसावे

म्हणतची ती पत्नी अवनी अन् मनोमनी शांतवे…

*

 दिनभरी त्याचीच सेवा करूनी अवनी श्रांतली

 आत्ताच सुटका काहीशी म्हणुनी जराशी विसावली…

*

घाबरे आपुल्या पित्याला.. म्हणुनी दडुनी बैसला

तो पुत्र-चंद्रही येऊनी मातेस आता भेटला…

*

 ती भेट बघुनी रजनीही गेली मनी आनंदुनी

 आनंद उधळे चहुकडे.. त्या चांदण्यांना घेऊनी…

*

 मग फिरुनी का दचके धरा.. चाहूल फिरुनी लागली

लेवूनी फिरुनी गाली लाली.. स्वागताला सज्ज झाली…

©  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments