सौ.अश्विनी कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

निसटलेली वाळू… ☆ सौ.अश्विनी कुलकर्णी

दिवसभर तापलेल्या वाळूला

संध्याकाळी आवेशात येणाऱ्या,

समुद्राच्या सहस्त्र लाटांच्या बाहुत,

सामावून जायचं असत….

 

तो येतो,

घेतो तिला आपल्या बळकट बाहुंनी,

घट्ट  कवेत…कितीतरी वेळ

शांत करतो तिला…

दोघेही निःशब्द असतात

 

त्याचे डोळे लागतात,

परतीच्या वाटेकडे…

त्याला पार पाडायची असतात,

अनेक कर्तव्य…

तेव्हा तिला वाटत,

आपल्याला अस एकट सोडून,

त्याने जाऊ नये…

मग त्या अथांगाच्या नकळत,

त्याला आपल्या कायेवर घेऊन,

ती जाऊ लागते,

खोल खोल त्याच्यासोबत…

त्याला बघत बघत…

 

पण आपल्या पायाखालून,

कधी निसटून जाते वाळू,

कळतच नाही…

© सौ अश्विनी कुलकर्णी

मानसतज्ञ, सांगली  (महाराष्ट्र)

मो – 9421225491 Email – [email protected] 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments