श्री शरद कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ एवढे तरी… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

कधी मी आयुष्याला,

कधी आयुष्याने मला शोधलं .

पाठशिवणीचा निरर्थक खेळ.

दुःखाच्या उन्हांनी कधी ,

सुखाच्या सावलीला शोधण्यात-

व्यर्थ दवडला वेळ.

वाट पाहता पावसाची,

थकून गेले डोळे.

किती आले किती गेले,

पाण्याविना पावसाळे.

आता प्रयोजन जगण्याचे,

आयुष्यालाच विचारावे.

प्रत्येक ऋतू समजून घेत-

समजुतदार व्हावे.

कधीकधी चष्मा काढून ,

थोडेफार डोळेही पुसावे .

तुका म्हणे उगी रहावे.

एवढे तरी अध्यात्म  जमावे.

© श्री शरद  कुलकर्णी

मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments