श्रीशैल चौगुले
कवितेचा उत्सव
☆ प्रेमसमाधी… ☆ श्रीशैल चौगुले ☆
आणखी किती जगावे
हे युगही पुरणार नाही
जगलो प्रेमाने जितुके
तु ही अन् मी ही उरणार नाही.
डोळ्यात हरवले विश्व
दोन हृदय कसे एक झाले
मना मनातले शब्द हे
व्यक्त होताना भाव नेक झाले.
कवितेत तरी अर्थ कुठे सध्या
गत् जन्माच्या चल गप्पा मारु
त्या कृष्ण-राधेचे गोकुळ
अपुल्या प्रेमसमाधीवर कोरु.
(कृपया प्रेम हा विषय कवी कालिदास यांचेपासूनचा प्रेमभाव अभिव्यक्ती व हळवे मन, विरह अशा वास्तवातून सत्य कल्पनेचा अभ्यासात्मकसुध्दा विषय आहे तरुण मनाला शाब्दिक ताकदीने तत्वांचा प्रबंध लिहायला लावणारा. त्यामुळे या कवितेकडे मी कवी म्हणूनच वाचकांनी दृष्टीकोन ठेवावा.)
© श्रीशैल चौगुले
मो. ९६७३०१२०९०.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈