सौ विजया कैलास हिरेमठ
कवितेचा उत्सव
☆ “आयुष्याची बाग” ☆ सौ विजया कैलास हिरेमठ ☆
यशाच्या शिखरावर जावून
दुःखाच्या खाईत आपण डोकावतो
सुख क्षणभरात सरतं
दुःख मात्र पुरून उरतं…
सुखाच्या आभाळाला
दुःखाचे गालबोट लागते
सुख बरसून मोकळे
दुःख मात्र साचून राहते…
सुख दुःखाचे चक्र
आयुष्यभर फिरतच राहते
दुःख अनुभवल्यावरच
सुखाची खरी किंमत कळते…
जो येईल जसा येईल
प्रत्येक क्षण निघून जाईल
सुख दुःखाच्या ऊन पावसात
आयुष्याची बाग फुलत राहील …
💞शब्दकळी विजया💞
© सौ विजया कैलास हिरेमठ
पत्ता – संवादिनी ,सांगली
मोबा. – 95117 62351
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈