श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ स्पर्धा ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆ 

असतो खुळा जमाना म्हटले कधीच नाही

माणूस माणसाने जपले कधीच नाही

 

सौदे हजार ज्यांचे माणूस जोडण्याचे

त्यांनी स्वत:स कोणा विकले कधीच नाही

 

झाकून ठेवलेल्या गंधाळ चंदनाला

लपवून गंध जगणे जमले कधीच नाही

 

दडपून टाकलेले उरते खरेच मागे

खोट्या समोर असली झुकले कधीच नाही

 

आभाळ चांदण्यांचे चंद्रास मिरवणारे

सूर्यास तळपणा-या दिसले कधीच नाही

 

धरती निसर्ग पाणी आधार जीवनाचे

सेवेत व्यस्त असता रुसले कधीच नाही

 

प्रेमा मुळेच अंती माणूस जगत जातो

प्रेमास शांत बसणे सुचले कधीच नाही

 

आल्या बलामतीला जा ठोकरून पुढती

अग्नीस शुद्ध सोने डरले कधीच नाही

 

देवात माणसाने या लावल्यात स्पर्धा

त्यानेच देवतांचे पटले कधीच नाही

 

© श्री तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments