☆ कवितेचा उत्सव ☆ भय संपावे इथले ☆ श्री शरद कुलकर्णी ☆ 

 

युद्ध म्हणावे का

हा शुद्ध गनिमी कावा.

थैमान भयावह होता,

संहार कसा थांबावा?

अद्भुत कसा हा वैरी,

अदृश्य नी मायावी.

आगळीच शस्त्रे ज्याची ,

लक्षवेधी आणि प्रभावी.

फाटता आकाश अवघे,

ठिगळ कसे लावावे.

काळीज विदीर्ण होता,

कसे किती सावरावे.

एवढीच प्रार्थना माझी,

अवघा भोग सरावा.

भय संपावे इथले आणिक,

थोडा संयमही वाढावा.

 

©  श्री शरद कुलकर्णी

२० .४ .२०२०

 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
4 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

2 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Shekhhar Palakhe

खुपच छान!!!

सुहास रघुनाथ पंडित सांगली

अतिशय सुंदर काव्य.