हिन्दी साहित्य – आलेख ☆ अभी अभी # 589 ⇒ तलब ☆ श्री प्रदीप शर्मा ☆

श्री प्रदीप शर्मा

(वरिष्ठ साहित्यकार श्री प्रदीप शर्मा जी द्वारा हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए साप्ताहिक स्तम्भ “अभी अभी” के लिए आभार।आप प्रतिदिन इस स्तम्भ के अंतर्गत श्री प्रदीप शर्मा जी के चर्चित आलेख पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है आपका आलेख – “तलब।)

?अभी अभी # 589 ⇒ तलब ? श्री प्रदीप शर्मा  ?

न अब, न तब, तो कब, किसे नहीं लगी तलब ! तलब केवल लब तक ही सीमित नहीं रहती, यह पूरे जिस्म में उतर जाती है। किसी ने भले ही इसका हॉर्स-पावर नहीं जाना हो, लेकिन तलब में बहुत बल है।

आखिर यह तलब है क्या ?

क्या यह कोई बुरी लत है, आदत है, चस्का है, या फिर एक तरह का सेल्फ कंडीशनिंग है। शराब की लत बुरी है, यह तो सुना है, लेकिन तलब को बड़ी मासूमियत से स्वीकारा गया है।।

दावत में छककर खाया ! मानो तालाब लबालब। फिर भी न जाने कहाँ से तलब उठी ! एक मीठा पत्ता पान और हो जाता, तो मज़ा आ जाता। जहाँ ज़ुबाँ चुप रहती है, लब कमाल बता जाते हैं। ये तलब ऐसी ही होती है जी।

आत्मा शरीर में होती है, दिखाई कहाँ देती है। तलब भी दिखाई नहीं देती, पर महसूस होती है। आत्मा को नित्य, शुध्द माना गया है, वह सुखी दुखी नहीं होती। लेकिन किसी को दुखी देख, संत-महात्माओं की आत्मा को कष्ट ज़रूर होता है। तलब का भी कहीं अंदर से आत्मा से संबंध ज़रूर होता है।

अब आप चाय को ही ले लीजिए ! चाय में ऐसा क्या है कि इसकी तलब उठती है। सुबह हाथ-पाँव टूटते हैं, आँखें नहीं खुलती, अलसाये बदन की एक ही माँग होती है, एक प्याला गर्मा-गर्म, भाप निकलता हुआ, चाय का प्याला। लबों को छूती एक-एक चुस्की, नासिका में चाय की खुशबू, फूँक मार-मारकर हलक से नीचे उतरती चाय संजीवनी बूटी का काम करती है। यह तलब कहीं न कहीं, आत्मिक संतुष्टि से जुड़ी प्रतीत होती है। कहीं तलब का आत्मा से कोई संबंध तो नहीं।।

चाय तो महज एक उदाहरण है तलब का। अगर आपने अशोककुमार की फ़िल्म मेहरबान देखी हो तो, सिगरेट छोड़ने से पहले, सिगरेट का आखरी कश लेने का उनका अभिनय इतना ग़ज़ब का था, मानो सिगरेट नहीं, उनसे उनकी साँसें जुदा हो रही हों। जिस बेसब्री से बीड़ी सिगरेट सुलगाई जाती है, और उसका कश लिया जाता है, वह तलब नहीं तो और क्या है।

लत, शौक और आदत बहुत कमज़ोर शब्द प्रतीत होते हैं, तलब के आगे। तलब का कोई सबब नहीं, कोई तोड़ नहीं, कोई विकल्प नहीं। बरसात में मूँग के भजियों अर्थात मुंगौड़ों को देख, किसका मन नहीं मचलता। लेकिन जब तलब लग जाती है, तो आसमान सर पर उठा लिया जाता है। धनिया, अदरक, हरी मिर्ची, प्याज सबकी व्यवस्था हो जाती है, एक अदद तलब को मिटाने के लिए। अवचेतन में मानो कोई कह रहा हो, आज नहीं तो फिर कब ?

तलब का भूख-प्यास से कोई संबंध नहीं ! कड़कती भूख में ठंडी रोटी-अचार और लोटा भर पानी ही छप्पन भोग नज़र आते हैं, लेकिन तलब तो आत्मा की आवाज़ है, एक बच्चे की ज़िद है, चइये मने चइये। तलब किया जाए। इसी बात पर सुबह सुबह एक कप चाय हो जाए।।

♥ ♥ ♥ ♥ ♥

© श्री प्रदीप शर्मा

संपर्क – १०१, साहिल रिजेंसी, रोबोट स्क्वायर, MR 9, इंदौर

मो 8319180002

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आरसा… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

आरसा ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

करता उगी कशाला बदनाम आरश्याला

बघण्यास रूप तुमचे त्याचा गुलाम झाला

 *

पाहून आरश्याला हुरळू नका गड्यांनो

तुमचेच रूप असली तो दावतो तुम्हाला

 *

माणूस माणसाला अंदाज देत नाही

होतो तयार नकली नात्यात बांधण्याला

 *

सत्यास शोधण्याची आहेत कारणे ही

बाजार माणसांचा विकतोय माणसाला

 *

आनंद वाटताना नव्हता विचार केला

फिरले नशीब उलटे भलताच काळ आला

 *

निरखून पाहताना मी आरश्यात थोडे

आत्मा कुठे दिसेना मुखडा मलूल झाला

 *

आभार मानताना तो आरसा म्हणाला

तुमच्याच वास्तवाला लपवू उगा कशाला

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 200 ☆ भारत मातेचा जयघोष…  ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 200 ? 

☆ भारत मातेचा जयघोष … ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

(मुक्त कविता…)

 देशाचा सण साजरा होतो आहे

स्मरणीय गणतंत्र दिन आज आहे.!!

 *

स्वातंत्र्य ज्योत हृदयात प्रज्वलित आहे

ध्वजाच्या रंगांनी देश उजळतो आहे.!!

 *

शूर वीरांचे बलिदान आम्ही जपतो आहे

त्यांच्या त्यागाने हा देश घडतो आहे.!!

 *

संविधानाचा मंत्र आम्हाला सांगत आहे,

लोकशाहीचा अधिकार सर्वांचाच आहे.!!

 *

गर्वाने पुन्हा कविराज म्हणतो आहे.

भारत मातेचा जयघोष आज आहे.!!

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आनंदे भरीन तिन्ही लोक… ☆ सौ. वृंदा गंभीर ☆

सौ. वृंदा गंभीर

🌸 विविधा 🌸

☆ आनंदे भरीन तिन्ही लोक… ☆ सौ. वृंदा गंभीर

अवघाचि संसार सुखाचा करिन

आनंदे भरीन तिन्ही लोक || १ ||

*

जाईन गे माये तया पंढरपुरा |

भेटण माहेरा आपुलिया || २ ||

*

सर्व सुकृताचे फळ मी लाहिन |

क्षेम मी देईन पांडुरंगा || ३ ||

*

बापरखुमादेवी वरु विठ्ठलाची भेटी |

आपुल्या सवंसाठी करुनि ठेला || ४ ||

अवघाची संसार सुखाचा करिन

आनंदे भरीन तिन्ही लोक ||1||

अवघाची संसार म्हणजे सगळा संसार सुखाचा करिन संसार खूप अवघड आहे तो सोपा नाही वादळ वारे संकट झेलत सावरत संसार करावा लागतो,,,,,,,,

कुटुंबाची मर्यादा पाळत सगळ्यांची मनं सांभाळून हातोटीने संसार करावा लागतो नव्हे नव्हे करावाच लागतो.

 “आनंदे भरीन तिन्ही लोक “

आनंदाने, समाधाने राहून तिन्ही लोकांना आनंद देईल,,,,

तिन्ही लोक,,, स्वर्ग, पाताळ, पृथ्वी या तिन्ही लोकांत आनंद परमेश्वराच्या नामस्मरणाने देणार आहे.

परमार्थ करून प्रपंच करणं म्हणजे संसार सुखाचा होणं आहे.

संसार अवघड आहे तितकाच परमार्थ सोपा आहे पण, आपण सांसाराच्या मागे धावत परमार्थ अवघड करून ठेवतो.

वय झाल्यावर देवाची आठवण येते तेंव्हा लक्षात येत आपण आयुष्यभर विनाकारण पळालो ज्याने आपल्याला या जगात आणलं त्यालाच विसरलो.

तेंव्हा जाणीव होते आणि देवाचा धावा सुरु होतो. भक्ती कशी निस्वार्थी हवी. देव “दिनाचा दयाळू, मनाचा मवाळू ” आहे आपल्या भक्तीचं फळ तो लगेच देतो.

संसार करत आनंद देण्याचा प्रयत्न करावा आनंद वाटत राहावा.

जाईन गे माये तया पंढरपूरा* भेटेन माहेरा आपुलिया

संसार करत परमार्थ करायचा आहे पांडुरंगा चरणी लिन व्हायचं आहे..

पंढरपूर माहेर आहे तिथे विठ्ठल रुख्मिणी माय बाप कर कटावर ठेऊन उभे आहेत…..

पंढरपूला माझ्या माहेरी जाऊन भेटून येणार आहे माझ्या माय माऊली, माझ्या मात्या पित्याला डोळेभरून बघणार आहे त्याचं ते सकुमार रूप डोळ्यात साठवणार आहे.

“सावळा तो श्रीहरी, सावळा तो विठ्ठल

रूप त्याचे मनोहर, पाहुनी होई मन समाधान “

सुंदर असे रूप पाहून देहभान हरपून जाते,,,,,

“पिवळा पितांबर, गळ्यात तुळशीमाळा

भाळी चंदनाचा टिळा, कटेवरी हात उभा वेटेवर”

असा तो पांडुरंग डोळ्यात साठवून मनाला शांती मिळते म्हणून माझ्या माहेरी मला जायचं भेटून यायचं आहे.

सर्व सुकृताचे फळ मी लाहीन

क्षेम मी देईन पांडुरंगा

जे मी सत्कर्म केल जे पुण्य मी मिळवलं त्याचं फळ मला मिळेल किंवा मी ते घेऊन येईल मी पांडुरंगाची क्षमा मागेल,,,,,,

रोजचे कर्म करत असताना चूक होतेच अशी काही चूक झाली तर पांडुरंगाची क्षमा मागून प्रायश्चित घेईल,,,,,,

मी विठुराया चरणी नतमस्तक होईल,,,, विठुरायाला अलिंगन देऊन त्याच्या चरणी जागा दे ही विनवानी करेल त्याची दासी होऊन राहीन.

बापरखुमादेवी वरू विठ्ठलाच्या भेटी

आपुल्या संवसाठी करुनी ठेला

 विठ्ठल रुख्मिणी आई वडील आहेत.

माता पित्याची भेट हे विठ्ठलाच दर्शन म्हणजे एक वरदान आहे…..

आपल्या साठी तो विटेवर उभा आहे.

आपल्या रक्षणासाठी उभा आहे.

एक आषाढीची वारी निमित्य आहे आई बापाच्या भेटीचं संतांचा मेळा भरतो. संत संगत मिळते आणि आयुष्य बदलून जातं.

” दुमदूमली पंढरी, गजर कीर्तनाचा “

” मुखी नाम विठुरायाचे, सोहळा हरीनामाचा “

जय हरी माऊली 🙏🙏

© सौ. वृंदा पंकज गंभीर (दत्तकन्या)

न-हे, पुणे. – मो न. 8799843148

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “कृष्णा…” ☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला ☆

? जीवनरंग ?

☆ “कृष्णा…” ☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला

पहिली नोकरी लागली, ती पुण्यात. सरकारी नोकरी. नवा गाव. रहायची जागा नव्हती.

बाबांचे एक मित्र होते… आप्पा कुळकर्णी. नारायण पेठेत, त्यांचा भलामोठा वाडा होता.

बाबांनी चिठ्ठी दिली. मी बॅग घेवून आप्पांच्या घरी. शब्दाला किंमत असायची तेव्हा.

आप्पांनी चिठ्ठी वाचली. प्रसन्न हसले.

“वेळेवर आलास. कालच डोईफोड्यांची जागा रिकामी झालीय. तीन खोल्या आहेत ऐसपैस.

रहा निवांत. बापुसास सांग तुझ्या, आप्पाने आठवण काढलीय म्हणोन. “

जगी सर्व सुखी.. मीच होतो. सहज जागा मिळाली. सोन्यासारखी जागा. सोन्यासारखी माणसं.

भरपूर जागा. वाड्यात सहज रूळलो. प्रत्येक घराची दारे उघडी. साधी माणसं… आपली माणसं.

मनात घर करून राहणारी… 

वाड्यात तीन चार बिऱ्हाडं होती. आणि मालक… मालक, मालकांसारखे वागलेच नाहीत कधी.

सगळं एक कुटुंब. वाड्याला भला मोठ्ठा दरवाजा. डाव्या बाजूला तीन बिऱ्हाडं… उजव्या बाजूला मालक आणि आणखीन एक. दरवाज्यासमोर एक छोटंसं मंदिर. राधाकृष्णाचं. दरवाजातून थेट दिसायचं.

मंदिराशेजारी प्राजक्त आणि सोनचाफा… मध्यभागी भलं मोठ्ठं आंगण.

माझा नोकरीचा पहिला दिवस. आप्पांच्या पाया पडलो.

राधाकृष्णाच्या मंदिरात. ‘ परमेश्वरा, अशीच कृपा राहू देत. ‘

मंद उदबत्तीचा वास. मूर्तीला प्राजक्त आणि सोनचाफ्याचा हार घातलेला… समईची स्थिर ज्योत.

मंद उजेडात देवाकडे बघितलं… मनोभावे हात जोडले.

आणि..

देव हसला. खरंच. मला तरी तसंच वाटलं. वाटलं, देव पाठीशी आहे. सगळं व्यवस्थित होणार.

मी निघालो.

“अहो देवा… प्रसाद तरी घेवून जावा. अंगारा लावा कपाळी. “

कृष्णाशी माझी पहिली भेट.

…. वाड्यातल्या मूळ पुरूषानं स्थापिलेला हा देव. कृष्णा या मंदिराचा पुजारी.

मूळ कोकणातला. मालकांनी येथे आणलेला. साधारण माझ्याच वयाचा. मंदिराशेजारीच दोन खोल्यांची जागा दिलेली त्याला. लहान वयात सरकारी नोकरी लागली, म्हणून वाड्याला माझं फार कौतुक. कृष्णालाही तितकंच..

कृष्णा पळतपळत मंदिराबाहेर आला. प्रसाद दिला. कपाळी अंगारा लावला. मनापासून आशीर्वाद दिला.

खूप छान वाटलं….. पहिला दिवस आनंदात गेला.

हळूहळू नोकरीत रमलो. ऑफीसमधून घरी आलो की, फारसं काम नसायचं. वाड्यातल्या पोरांना गोळा करायचो. मंदिराच्या छोट्या गाभाऱ्यात बसायचो. अभ्यास घ्यायचो. अगदी स्कॉलरशीपचाही. कविता पाठ करून घ्यायचो. इंग्लिश पेपर वाचून घ्यायचो. कृष्णाबरोबर शुभंकरोती… शेजारती… प्रसाद.

खरं तर खाणावळ लावलेली. सकाळी तिथंच जेवून, ऑफीसला जायचो. रात्री तिथं जेवायचा कंटाळा यायचा. तशी वेळही फार यायची नाही. कुठल्या तरी बिऱ्हाडातनं बोलावणं यायचंच.

“आज रात्री, आमच्याकडे जेवायला यायचं बरं का !”.

मला तेच हवं असायचं. वार लावल्यासारखा, वाड्यात प्रत्येक बिऱ्हाडी जेवायचो.

कधी कधी कृष्णाकडेही. कृष्णाकडचा मेनू एकच… मु. डा. खि… लोणचं, पापड आणि ताक.

पण अमृताची चव. जोडीला कृष्णाच्या गप्पा. मन आणि पोट भरून जायचं.

कृष्णाला माझं फार कौतुक वाटायचं. माझं ‘कौस्तुभ’ नाव त्याला जड वाटायचं. तो मला कौतुक म्हणायचा.

सगळ्या पोरांचा मी कौतुकदादा झालेलो. मला आवडायचं.

हळू हळू कृष्णाविषयी समजत गेलं. लहानपणी आई गेलेली. भिक्षुकाचं घराणं… पंधराव्या वर्षी वडिलही गेले… तोवर पोटापुरती पूजा सांगता यायची. पंचांग पहाता यायचं. मूहूर्त काढून देता यायचा. मालकांच्या नात्यातला. मालकांनी येथे आणला. मंदिराला पुजारी मिळाला. रहायला जागा. पुरेसा पगार.

कृष्णा सुखात होता. सुखातच राहिला… पुढे मागे कोणी नाही. तरीही सगळ्या वाड्यासाठी, कृष्णा देवाईतकाच मोठा होता. देवाकडे जायचा रस्ता व्हाया कृष्णा जायचा.

मला बढती मिळाली. कृष्णाकरवी देवाला अभिषेक करविला. कृष्णा मनापासून खूष.

जांभळ्या रंगाचे कद… खांद्यावर उपरणे… गळ्यात जानवं… कानात भिकबाळी. पाठ आणि पोट एकत्र आलेले. तरीही काटक… तोंडी हरिनाम….. कृष्णा देव आणि आमच्यामधला दुवा वाटायचा.

परीक्षेचा सीझन… कृष्णाची विशेष पूजा. सगळ्या पोरांना धो धो मार्क. पोरं अभ्यासू खरी.

पण कृपा, आशीर्वादाचं डिपार्टमेंट, कृष्णा सांभाळायचा.

मालकांचा तन्मय… त्याला झालेला ऍक्सीडेन्ट. तो सिरीयस.. आय. सी. यू. मध्ये.

कृष्णाच्या डोळ्याला डोळा नाही. दोन दिवस मंदिरात कोंडून घेतलं स्वतःला. तो शुद्धीवर आला.

मालक धावत धावत मंदिरात आले. कृष्णाला मिठी मारली. कृष्णा अश्रूंच्या घनडोहात बुडाला.

मला बढत्या मिळत गेल्या. क्वार्टर्स मिळाले. वाडा सोडणार होतो. सगळ्यांना भेटलो. कृष्णाच्या डोळ्यात पाणी. निरोप घेताना गलबललो. तरीही वाड्यात चक्कर व्हायची.

माझ्या लग्नाचा मुहूर्त, कृष्णानेच काढून दिला. पत्रिका त्यानेच बघितल्या… हिची आणि माझीही.

आमचं छान चाललंय. कृष्णाची कृपा.. राधेकृष्णाचीही.

नुकताच रिटायर्ड झालो. मुलगाही नोकरीत आहे. मोठ्ठा बंगला बांधलाय सहकारनगरात.

एकदम कृष्णाची आठवण झाली. तडक वाड्यात गेलो. कृष्णा आता थकत चाललाय. मंदिरात जाताना सुद्धा पाय थरथरतात. मंदिरात गेलो. कृष्णा बाहेर आला. गाभाऱ्यात बसलो.

कृष्णाशी गप्पा झाल्या… निवांत … खूप दिवसांनी.

कृष्णाला म्हणलं. “बास झालं. आता रिटायर्ड हो. कुणीतरी नवीन पोरगा आणू. तुझ्याच्यानं होत नाही आता. “

कृष्णाचा चेहरा एकदम उतरला. काय बोलावं कळेना. डोळे भरून आले त्याचे. मला कसंसंच झालं.

“तू आता तिथं राहू नकोस. नव्या पोराला लागेल ती जागा. तू माझ्याकडे ये. नातू लहान आहे माझा.

त्याला अथर्वशीर्ष शिकवायचंय. तुलाच शिकवावं लागेल. “

कृष्णा गळ्यात पडून रडायलाच लागला. “नक्की शिकवेन. थकलो की नक्की तुझ्याकडेच येईन.

माझी वाट बघणारं कुणीतरी आहे, हे ऐकलं… नवं बळ मिळालं जगायला. आता हातपाय थरथरणार नाहीत माझे. “

कृष्णाने एकदम मिठी मारली

आणि मी…

माझा..

माझा एकदम सुदामा झाला.

© कौस्तुभ केळकर नगरवाला

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “नावांची गंमत…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “नावांची गंमत…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

पूर्वी घरातल्या मुलाचं किंवा मुलीचं नाव आत्यानी काहीही ठेवलं असलं तरी त्या नावाने मुलाला हाक मारली जायची नाही. प्रत्येकाला वेगळंच एखादं टोपण नाव असायचं.

तेव्हा घरात चार-पाच मुलं असायची. पहिल्या मुलाचे नाव सहसा जे कुलदैवत असेल त्याचं ठेवलं जायचं. मला वाटते की त्यानिमित्ताने देवाचं नाव घेतलं जावं असा हेतु होता.

दत्तात्रय,पांडुरंग,खंडोबा वगैरे नावं ठेवली जायची. पण त्याचे अपभ्रंश होऊन दत्या, पांड्या, खंड्या अशीच हाक मारली जायची.

माझ्या मामाचे नाव ज्ञानेश्वर होते. त्याला ज्ञाना किंवा माऊली म्हटले जायचे. ते मात्र कानाला फार गोड वाटायचे.

माझ्या मोठ्या दिरांचे नाव नरसिंह आहे. उभ्या आयुष्यात त्यांना त्या नावाने कोणीही हाक मारली नाही. त्यांना बंडू हे टोपण नाव पडले होते. तेच सगळीकडे वापरले जायचे.

बाळू हे नाव पण त्या काळी फार प्रचलित होते. नंतर बाळू नाव फार पुढे गेले नाही. कारण नंतर बाळू हा शब्द.. “जरा यडाच आहे.. ” अशा अर्थाने वापरला जायला लागला.

यांच्या एका मित्राचे नाव तर बाळ असे आहे. अगदी एक्याऐंशीव्या वर्षी सुद्धा ते बाळच आहेत… आहे की नाही गंमत..

घरात धाकटं भावंड जन्माला आलं की ते मोठ्या भावाला दादा म्हणायचं. लाडाने त्याला दाद्या.. सुद्धा म्हटलं जायचे…. अजून मुलं झाली की त्यांना तात्या, आप्पा, अण्णा,भाऊ अशा नावाने बोलवले जायचे. ते इतके सार्वजनिक व्हायचे की सगळेजण त्याच नावाने त्यांना हाक मारायचे आणि तेच नाव त्यांना आयुष्यभर लागायचे.

यांच्या एका बहिणीला पोपट असे म्हणायचे.. का ते माहित नाही… गंमत म्हणजे ते नाव त्यांच्या इतकं अंगवळणी पडलं होतं की त्यांना त्याचं काही वाटायचं नाही.

एखादी मैना पण असायची..

” काय ग चिमणे ” असं माझ्या मैत्रिणीला कधीतरी लहानपणी म्हणे तिचे आजोबा म्हणाले होते..

आता साठीतही ती चिमणीच आहे.

एखादा बोका आणि माऊ पण असायची…

सोनुल्या,छकुल्या मोठेपणी सोनाबाई छकुताई होतात..

गोडुल्या मात्र गोडुल्याच राहतात.

ठकू,ठकी तसंच राजू आणि पप्पू पण असायचे…

राजा आणि राणी ही नावं पण बरीच वर्ष राज्य करत होती.

बंटी बबली पण त्यावेळेस जोरात होते.

यात सगळ्यात मोठा भाव खाल्ला ” बेबी “या नावाने … हे इतकं प्रसिद्ध झालं होत की प्रत्येक घरी एक तरी बेबी असायचीच.. म्हाताऱ्या झाल्या तरी त्यांना त्याच नावाने हाक मारायचे..

परवाच मी बहिणीला फोन केला तेव्हा म्हटलं,

“अगं तो बेबीचा नातू आहे.. “

त्याच्यानंतर माझी नात मला विचारत होती,

“आजी बेबीला नातु कसा काय झाला? “

मी हसायला लागले. म्हटलं, “अग बेबी सत्तर वर्षाची आहे”

तिला खूप वेळ हसू येत होत.

एका मागोमाग एक मुली झाल्या तर त्यांना आक्का, ताई असं म्हटले जायचे. मग अजून मुली झाल्या की ताईची मोठी ताई व्हायची आणि दूसरी छोटी ताई व्हायची.

नंतर इतकं मोठं म्हणायला नको म्हणून तिला सुटसुटीत छोटीच म्हणायला सुरुवात व्हायची.

परवाच आम्ही आमच्या नात्यातल्या छोटीच्या पंच्याहत्तरीला गेलो होतो.

काही वेळेस हौसेनी,कौतुकाने मोठी नावं ठेवली जायची. पण इतकं मोठं नाव कोण घेणार? 

मग सरस्वतीची सरू, निलांबरीची निला,गोदावरीची गोदा,कलावतीची कला आणि कुमुदिनीची कुमुद होऊन जायची.

अगदी तीन अक्षरी नाव असेल तर तेही पूर्ण उच्चारले जायचं नाही. मालतीचं मालु, शैलजाचं शैला, सुशीलाचं सुशी, नंदिनीचे नंदा,मिलिंदचे मिल्या, मंगेशचे मंग्या होऊन जायचं…

तसंच सुनेत्रा,सुमेधा,सुरेखा,या नावातला सु काढून टाकला जायचा.

त्यामुळेच मला वाटते नंतर हेमा, शांता, सुधा,लता, नंदा,नीता अशी सुटसुटीत नावं ठेवली गेली असावीत.

अर्थातच सीमा, मीना,गंगा, चंद्रा यांना हाक मारताना जर कोणी त्यांच्यावर रागवले असेल तर सीमे,मीने, गंगे,चंद्रे होऊन जात असे.

प्राणचा खलनायक इतका गाजला की कोणी कधी आपल्या मुलाचं नाव ” प्राण “ठेवलंच नाही.

रामायणातली “कैकयी” पण एकमेवच…

आमच्या नात्यात एकांना ओळीने पाच मुली झाल्या. मग त्यांनी म्हणे नवस केला की मुलगा झाला तर त्याचे नाव ” दगडू “ठेऊ..

नेमका मुलगा झाला. तो दगडूच राहिला… परत त्याचं काही वेगळंपण वगैरे कोणाला वाटायचं नाही. त्याला प्रेमाने सगळे दगडू म्हणायचे.

माझ्या एका मैत्रिणीचे नाव ” मनकर्णिका ” असे होते. ती या नावाला फार वैतागत असे. कारण या नावाने तिला कोणी कधीही हाक मारली नाही. तिचे मनू हेच नाव प्रचलित झाले.

लहानपणी लाडानी ” गुंड्या चांगलाच खोडकर आहे ” असं कोणी म्हटलं की त्याचं नाव “गुंड्याच” पडायचं.

काही वर्षांनी कानाला ते बरं वाटतं नसावं, मग त्याचा गुंड्याभाऊ झाला असावा…

चिंटू मात्र चिंटूच राहिला.

गंमत म्हणजे लाडाने ठेवलेल्या या टोपण नावात प्रेम, माया,आपुलकी असायची. त्यामुळे त्याचा राग कधी यायचा नाही. उलट त्यात आपलेपणा वाटायचा. म्हणूनच साठीला आलेला माझा पुतण्या प्रशांत म्हणाला की, ” अजूनही मला कोणी पशा म्हटलं की मला फार आवडतं.. लहानपण आठवतं. आता असं म्हणणारे पण खूप कमी झाले आहेत… “……

वय कितीही वाढलं तरी मनाला बालपणाची ओढ असतेच…

त्या नावातला स्नेह हवाहवासा वाटतो….

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

पुणे

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “एक बातमी आणि मी…”   ☆ श्री सुनील देशपांडे ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ “एक बातमी आणि मी…”   ☆ श्री सुनील देशपांडे

गुरुवार दिनांक नऊ जानेवारी २०२५ रोजी इस्रो म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्था, यांनी एक अभूतपूर्व यशस्वी प्रयोग घडवून आणला. …. अंतराळात दोन उपग्रह एकमेकांना जोडण्याचा आणि पुन्हा एकमेकांपासून विभक्त करण्याचा हा तो प्रयोग म्हणजे ‘स्पॅडेक्स’.

अशा तऱ्हेने अंतराळात उपग्रह एकमेकांना जोडणारा भारत हा जगातील चौथा देश ठरला आहे. त्याचप्रमाणे अंतराळामध्ये चवळीचे बी रूजवून त्यांना मोड आणि पाने फुटल्याचा सुद्धा एक यशस्वी प्रयोग याआधी संस्थेने घडवून आणला आहे.

खरं म्हणजे इस्रो या संस्थेची सुरुवातीपासून आतापर्यंतची यशस्वी घोडदौड हा सर्व माध्यमांचा सर्वात जास्त आकर्षणाचा विषय असला पाहिजे. एखादी कादंबरी अथवा सिनेमाची कथा किंवा एखादी फॅन्टसी म्हणजेच अद्भुतकथा म्हणून सुद्धा ती खूप आकर्षक आहे. असे असताना एवढी महत्त्वाची मोठी बातमी लोकांना आकर्षक आणि सोप्या पद्धतीने समजावून सांगण्याचा एखादा कार्यक्रम म्हणजे एखाद्या अद्भुत कथेच्या कथाकथनाचा कार्यक्रम होऊ शकेल.

देशात बनलेला पहिला उपग्रह आर्यभट्ट, देशामध्ये बनलेले पहिले रॉकेट पीएसएलव्ही, मंगळयान, चांद्रयान आणि आत्ताचा हा स्पॅडेक्स हे प्रकल्प म्हणजे आपल्या आगामी चांद्र मोहिमेची यशस्वी पूर्वतयारीही नक्कीच म्हणता येईल. तसेच हे सर्व प्रयोग म्हणजे भारताकडे आता अंतराळातील प्रयोगशाळा उभारण्याची संपूर्ण क्षमता आली आहे याची खातरजमा आहे.

एच जी वेल्सच्या कल्पनेपेक्षाही सुरस अशा या कथा. कथा कसल्या? प्रत्यक्ष घटनाच. आपल्या देशातील तरुणांना केवढी मोठी प्रेरणा देऊ शकतील याची कुणाला जाणीव का होत नाही? 

दुसरा एक विचार मनात येतो आपल्या देशात सर्व सरकारी यंत्रणा अनेक वेळा अनेक अनैतिक चक्रात सापडलेल्या, प्रचंड नुकसानीत सापडलेल्या किंवा बंद पडलेल्या दिसून येतात. पण ही संस्था अशी नासली नाही, दुराचाराने ग्रासली नाही. हे सुद्धा आपल्या शास्त्रज्ञांचे फार मोठे यश म्हणता येणार नाही काय?

खरं म्हणजे माझ्या दृष्टीने गुरुवारची स्पॅडेक्स संबंधीची बातमी सगळ्यात मोठी आणि सगळ्यात महत्त्वाची बातमी. निदान भारतीय माध्यमांनी तरी या बातमीची मोठ्या प्रमाणावर दखल घ्यायला हवी होती. माझ्या दृष्टीने सगळ्या वर्तमानपत्रांची मथळ्याची बातमी (हेड लाईन) ही असायला हवी होती. सगळ्या वाहिन्यांवर दिवसभर ही बातमी प्रामुख्याने झळकायला हवी होती. त्यावर सतत चर्चा किंवा चर्चासत्रे आणि व्याख्याने यांचे आयोजन केले जायला हवे होते. ज्या काही बातम्या आपल्या सर्व वाहिन्यांवर झळकत आहेत त्यापेक्षा कितीतरी महत्त्वाची आणि अभिमानाची ही बातमी सर्वांच्या दृष्टीनेच असायला हवी होती. वृत्तपत्रांनी कुठेतरी कोपऱ्यात किंवा ई-आवृत्तीमध्ये चार ओळीत या बातमीची वासलात लावली. मराठी वाहिन्यांवर तर मला कुठेच ही बातमी आढळली नाही. अर्थात कुणीतरी कुठेतरी एक दोन वाक्यात ती गुंडाळली असण्याची शक्यता आहे. पण ती दिवसभर सतत दाखवण्यासारखी महत्त्वाची बातमी नक्कीच होती. त्या प्रयोगाचे काय झाले हे जाणून घ्यायला मी इच्छुक होतो. म्हणून अनेक वाहिन्यांवर फिरलो. परंतु गुरुवारी काही मला ती बातमी समजू शकली नाही. शुक्रवारी व्हाट्सअप वर किंवा गुगल वर ही बातमी शोधून सापडली. अशी बातमी शोधावी लागते हे आपले आणि आपल्या देशाचे दुर्दैव आणि माध्यमांचा नाकर्तेपणा समजावा काय?

खरे म्हणजे सगळ्या मराठी वाहिन्यांनी त्यांचा वार्ताहर स्वतंत्रपणे बेंगलोरला पाठवून इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या मुलाखती घेणे, ही माहिती मिळवून प्रस्तुत करणे, अशा प्रकारे खूप काही करणे आवश्यक होते. आपल्या देशाच्या दृष्टीने आणि संपूर्ण जगाच्या दृष्टीने सुद्धा या बातम्यांना मोठे महत्त्व आहे हे आपल्या स्वकीयांना समजेल तो सुदिन.

आदरणीय पूर्व राष्ट्रपती श्री अब्दुल कलाम यांनी इस्रायलच्या भेटीतील त्यांची एक आठवण सांगितली होती. इस्रायलमध्ये ते गेले असताना त्यावेळी इस्राईलचे युद्ध चालू होते. परंतु जेव्हा त्यांनी सकाळी तेथील वर्तमानपत्र पाहिले, तेव्हा वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर मथळ्याच्या बातमीवर (हेडलाईन वर) त्या देशामध्ये एका शेतकऱ्याने शेतीचा एक यशस्वी प्रयोग करून दाखवला त्याबद्दलची माहिती व फोटो संपूर्ण पहिले पान त्या प्रयोगावर आधारले होते. युद्धाच्या बातम्या आतील पानांवर होत्या. कोणत्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचे हे जेव्हा आपल्या माध्यमांनाही समजेल तो सुदिन.

सध्या आपण आपल्या देशाच्या भावी पिढ्यांच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून भविष्याकडे नजर लावून आशावाद जपायला हरकत असू नये असे वाटते. आपण आपल्या आयुष्यात या राष्ट्रासाठी फारसे काही करू शकलो नाही असे वाटणाऱ्या माझ्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांनी जाता जाता निदान या आशेचा सुगंध वातावरणात पसरून जावे एवढी तरी इच्छा धरू या !

© श्री सुनील देशपांडे 

मो – 9657709640

email : sunil68deshpande@outlook.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आपल्या मनासारखे वागावे का दुसऱ्याच्या मनासारखे ? – लेखक – अज्ञात ☆ श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

📖 वाचताना वेचलेले  📖

आपल्या मनासारखे वागावे का दुसऱ्याच्या मनासारखे ? – लेखक – अज्ञात ☆ श्री अनिल वामोरकर ☆

आपल्या मनासारखे वागावे का दुसऱ्याच्या मनासारखे ?

बायकोनं घरात मांजर पाळलेलं. तिचं ते खूप लाडकं. ती जेवायला बसली की तिलाही घेवून बसायची. एका वाटीत दूध भाकर कुस्करुन द्यायची.

पण नवऱ्याला ते मांजर अजिबात आवडायचं नाही. उघडं दिसेल त्या भांड्यात तोंड घालायची त्याला सवय. त्याचा त्याला प्रचंड राग यायचा…

एकदा नवरा जेवायला बसलेला, आणि नेमकं मांजराने त्याच्या ताटात तोंड घातलं. नवरा चिडला आणि रागारागाने शेजारी असलेला पाटा त्याच्या डोक्यात घातला.

घाव वर्मी बसल्याने मांजर बराच वेळ निपचित पडून राहीलं. ‘मेलं की काय’ अशी शंका येत असतांनाच ते अंग झटकून उठून बसलं.

त्याने हळूच नवऱ्याकडे हसून बघीतलं, आणि चक्क ‘शॉरी यार, मी मघाशी तुझ्या ताटात तोंड घातलं. क्या करे आदत से मजबूर हूँ, पुन्हा नाही असं करणार.. ‘ असं माणसासारखं बोललं. नवरा वेडा व्हायचाच बाकी.. !

त्यानंतर मांजर नम्र आणि आज्ञाधारक झालं. ताटात तोंड घालणे तर सोडाच, दारातला पेपर आणून दे, टी पॉय वरचा चष्मा आणून दे… अशी बारीकसारीक कामं ते करू लागलं.

मग काय, नवऱ्याची आणि त्याची छान गट्टी जमली. ऑफिसमधून येताच मांजर दिसलं नाही की तो अस्वस्थ व्हायचा. ‘अग मन्या दिसत नाही गं कुठं ?’ बायकोला सतत विचारत राहायचा.

असेच काही दिवस गेल्यावर एकेदिवशी सोसायटीच्या गेटसमोर बेवारस कुत्री आणि मांजरं पकडून नेणारी महापालिकेची व्हॅन येऊन थांबली.

मन्याने खिडकीतून ती व्हॅन बघितली. त्याच्या मनात काय आलं कोण जाणे, पण धावत जावून तो व्हॅन मधे बसला.

नवऱ्याने हे बघितले. हातातला पेपर पटकन बाजूला टाकून तो मन्यामागे धावला. मन्या व्हॅनमध्ये निवांत बसलेला.

नवरा म्हणाला, “मन्या, अरे इथं गाडीत का बसलायस? ही गाडी बेवारस मांजरासाठी आहे. तुझ्यासाठी नाही. “

“मला माहितेय.. ! पण मला जायचंय आता. ” मन्या शांतपणे बोलला.

“मन्या, अरे असं काय करतोस? तू किती लाडका आहेस आम्हा दोघांचाही. माझं तर पानही हालत नाही तुझ्याशिवाय. तू क्षणभर नजरेआड गेलास तरी मला करमत नाही. मी इतकं प्रेम करतो तुझ्यावर आणि तू खुशाल मला सोडून निघालास ? ए प्लिज, प्लिज उतर रे आता. ” काकुळतीला येवून नवरा बोलला.

मन्या गोड हसला, आणि बोलला, “तू माझ्यावर प्रेम करतोस? माझ्यावर?”

“म्हणजे काय शंकाय का तुला?”

“मित्रा, अरे मी जेंव्हा माझ्या मनासारखं वागत होतो, हवं तिथं हवं तेंव्हा तोंड घालत होतो, तेंव्हा मी तुझा नावडता होतो. सतत रागवायचास माझ्यावर. अगदी माझ्या जीवावर उठला होतास तू एकदा

पण जेंव्हा मी तुझ्या मनासारखं वागू लागलो, तुला हवं तसं करू लागलो…. तेंव्हा तुला आवडू लागलो. तू माझ्यावर प्रेम करू लागलास, यात नवल ते काय?”

नॉट सो स्ट्रेंज यार… !!

वपुंची ही कथा खूप काही सांगून जाते……

जेंव्हा आपण एखाद्यावर प्रेम करतो, तेंव्हा ते खरंच त्याला बरं वाटावं म्हणून, की स्वतःला बरं वाटावं म्हणून करतो ?

समोरचा जो पर्यंत आपल्या मनासारखं वागत असतो, तोपर्यंत त्याच्यावर आपलं प्रचंड प्रेम असतं. कारण त्याचं वागणं आपल्याला सुखावणारं असतं.

पण जेंव्हा तो आपलं ऐकत नाही, आपल्याला हवं तसं वागत नाही, तेंव्हा त्याचं आपल्या सोबत असणंही आता नकोसं वाटतं. त्याला टाळत राहतो.

भेटलाच कधी तर त्याच्यावर चिडतो, रागावतो. त्यानं नाहीच ऐकलं की मग वर्मी घाव घालून नातंच संपवून टाकतो. ज्याच्यावर जीवापाड प्रेम असतं, त्याला क्षणात परकं करून टाकतो.

आश्चर्य आहे ? का वागतो असं आपण ? त्याच्यावर खरंच आपलं प्रेम असतं की निव्वळ time pass म्हणून केलेली खोटी भावनिक गुंतवणूक?

आपल्या मनासारखं वागणाऱ्या माणसावर कुणीही प्रेम करतं.

अवघड असतं त्याच्यावर प्रेम करणं, त्याला समजून घेणं, जेंव्हा तो आपल्या मनासारखं वागत नसतो..

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “नेक्सस” – लेखक : युवाल नोआ हरारी — अनुवाद : श्री प्रणव सखदेव – परिचय : डॉ. सतीश श्रीवास्तव ☆ प्रस्तुती – श्री हर्षल भानुशाली ☆

श्री हर्षल भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “नेक्सस” – लेखक : युवाल नोआ हरारी — अनुवाद : श्री प्रणव सखदेव – परिचय : डॉ. सतीश श्रीवास्तव ☆ प्रस्तुती – श्री हर्षल भानुशाली ☆ 

पुस्तक : नेक्सस

(‘नेक्सस: अश्मयुगापासून आर्टिफिशियल इंटेलिजन्सपर्यंत… माहितीच्या जाळ्यांचा संक्षिप्त इतिहास ‘) 

लेखक : युवाल नोआ हरारी

अनुवाद: श्री प्रणव सखदेव 

पृष्ठे : ४६४

मूल्य : ५००₹ 

‘होमो सेपियन’ आणि ‘होमो डियस’ या जगप्रसिद्ध पुस्तकांचे लेखक आणि इतिहासकार युवाल नोआह हरारी यांचे ‘नेक्सस: ए ब्रीफ हिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन नेटवर्क फ्रॉम द स्टोन एज टू एआय’ हे पुस्तक सध्या गाजते आहे. या निमित्ताने कृत्रिम बुद्धिमत्तेने (एआय) मानव जातीसमोर उभ्या केलेल्या धोक्याची चर्चा जगभर सुरू झाली आहे. हा धोका कशा स्वरूपाचा आणि किती व्यापक आहे याची तपशीलवार चिकित्सा ‘नेक्सस’ मध्ये हरारी यांनी केली आहे. इतिहासातील आणि आधुनिक काळातील असंख्य उदाहरणे, संदर्भ आणि पुरावे देत मानवी अस्तित्वाचा भविष्यातील धोका ओळखणारे ‘नेक्सस’ हे पुस्तक आहे. ‘एआय’मुळे मानवी अस्तित्वाच्या खुणा पुसल्या जाऊ शकतात, हा केवळ कल्पनाविलास नव्हे. मानवी जीवनाला कशा प्रकारे धोका पोहोचू शकतो यासंबंधीची ही विज्ञानावर आधारित मीमांसा आहे. २०२३ मध्ये अमेरिका, ब्रिटन, चीनसह ३० देशांच्या सरकारांनी ब्लेकली घोषणापत्रात ‘एआय’ मुळे जाणता अजाणता महाभयंकर धोका उद्भवू शकतो हे मान्य केले आहे. हरारी यांच्या मते सोव्हिएत रशिया आणि त्याची अंकित राष्ट्रे व अमेरिका आणि इतर युरोपियन राष्ट्रे यांच्यामध्ये शीतयुद्धाच्या काळात ज्याप्रमाणे पोलादी पडदा (आयर्न कर्टन) होता त्याचप्रमाणे जगातील राष्ट्रांमध्ये नजीकच्या भविष्यकाळात सिलिकॉन पडदा (सिलिकॉन कर्टन) निर्माण होऊ शकतो. ‘एआय’च्या संशोधनातून अशी स्वयंचलित डिजिटल शस्त्रे निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे जगाचा विध्वंस होऊ शकतो.

मानवी इतिहासात प्रथमच माणसाकडे असणारी सत्ता ‘एआय’ कडे हस्तांतरित झालेली आहे. कारण ‘एआय’आधारित स्वयंप्रज्ञा स्वत:च निर्णय घेऊ शकते. कॉम्प्युटर अल्गोरिदम जर माणसांसाठी निर्णय घेत असेल तर ती निश्चितच धोकादायक गोष्ट आहे असे हरारी म्हणतात. त्यातच, अनेक देशांमध्ये लोकानुरंजन करणाऱ्या नेत्यांचा उदय झालेला आहे. अशा नेत्यांच्या बाबतीत वस्तुनिष्ठ तथ्य किंवा सत्य असे काही नसते, तर ते जे सांगतील तेच सत्य असते. त्यांच्या दृष्टीने सत्ता हेच सत्य (पॉवर इज रिअॅलिटी) असते. लोकशाहीतील मूलभूत तत्त्वांचे पालन करण्याऐवजी लोकानुरंजनातून सर्वशक्तिमान होण्याच्या प्रयत्नात वाढ झालेली आहे असे हरारी नमूद करतात. सत्ता मिळविण्यासाठी जेव्हा माहितीचा उपयोग केला जातो तेव्हा सत्य किंवा तथ्य भ्रमित करणारे असते. ‘सत्य’ म्हणवला जाणारा मजकूर हे ‘नेमके कुणाच्या बाजूचे सत्य’ आहे असा प्रश्न यातून निर्माण होतो हे स्पष्ट करून हरारी असा निष्कर्ष काढतात की दोन विचारधारांमधील संघर्ष हा प्रामुख्याने दोन माहितीजालांचा संघर्ष असतो. ‘होमो सेपियन’ याचा अर्थ ‘शहाणा माणूस’ असा होतो. परंतु या अभिधानास माणूस खरोखरच पात्र आहे काय असा सवाल हरारी विचारतात. गेल्या एक लाख वर्षाच्या इतिहासात माणसाने अनेक शोध लावले आणि इतर कुठल्याही प्रजातीपेक्षा श्रेष्ठ अशी ज्ञानात्मक सत्ता प्राप्त केली. स्पर्धा, युद्धे आंतरराष्ट्रीय तणाव, पर्यावरणाची हानी, सत्तालालसेतून निर्माण होणारी एकाधिकारशाही, मानवी अस्तित्वापुढे प्रश्न निर्माण करणारे तंत्रज्ञान असे अनेक प्रश्न जर निर्माण होत असतील तर माणूस शहाणा आणि ज्ञानी कसा म्हणता येईल. ‘नाझीवाद’ आणि ‘स्टॅलिनवाद’ अशी अलीकडची मानवी मूर्खपणाची उदाहरणे हरारी नमूद करतात. ग्रीक व रोमन साम्राज्यापासून अलीकडच्या काळातील निरंकुश सत्तेची अनेक उदाहरणे व दाखले देत हरारी हे स्पष्ट करतात की सत्ताकांक्षा असणारे लोक तंत्रज्ञानाला गुलाम बनून सर्वंकष सत्ता निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. स्वाभाविकच यात मानवी मूल्यांची (स्वातंत्र्य, समता, बंधुता यांची) आहुती पडते. वस्तूचा ब्रँड ज्याप्रमाणे तयार केला जातो त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीचाही ब्रँड माहिती तंत्रज्ञानातील तज्ज्ञांकडून तयार केला जातो. समाजमाध्यमातील त्या व्यक्तीचे किंवा ब्रँडचे अनुयायी त्या ब्रँडच्या इमेजशी स्वत:ला जोडतात. माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग दोन प्रकारे केला जातो हे हरारी स्पष्ट करतात. एक म्हणजे माहितीचा उपयोग करून सत्य जाणून घेणे. उदाहरणार्थ आरोग्य, औषधे, हवामान, अणु, रेणू इत्यादींची माहिती मिळविण्यासाठी आणि दुसरे म्हणजे लोकांवर नियंत्रण निर्माण करण्यासाठी खोटी कथानके (फेक नॅरेटिव्ह) गोष्टी निर्माण करण्यासाठी!

‘नेक्सस’ च्या पाचव्या प्रकरणात लोकशाही आणि एकतंत्री राजवट याचे मूलगामी विवेचन करताना, दोन्ही राज्यपद्धतीमध्ये माहितीची वाहतूक कशी परस्परविरोधी असते याचा मागोवा हरारी घेतात. सत्ताधाऱ्यांकडची माहितीच निरंकुश आणि सर्वश्रेष्ठ अशी धारणा हुकूमशाहीत असल्याने, दुरुस्त करण्याची यंत्रणा हुकूमशाहीत नसते. याउलट लोकशाहीमध्ये माहितीचे वितरण करणारी आणि ती दुरुस्त करणारी यंत्रणा आपसूकच कार्यरत असते; कारण सरकारांशिवाय माहितीचे इतर अनेक स्राोत उपलब्ध असतात उदाहरणार्थ संसद किंवा सिनेटसारखी प्रतिनिधी गृहे, राजकीय पक्ष, न्यायालय, वृत्तपत्रे, सेवाभावी संस्था, दबावगट इत्यादी. त्यामुळे लोकशाहीत लोक स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकतात. ही स्वायत्तता हे लोकशाहीचे मूल्य आहे. त्यात हस्तक्षेप केल्यास लोकशाहीचा आत्माच हरवतो आणि असे झाल्यास अनियंत्रित सत्ता अस्तित्वात येण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे ‘माहितीचे नियंत्रण करणारी आणि आपसूक दुरुस्तीची यंत्रणा नसणारी राज्य पद्धती म्हणजे हुकूमशाही’ अशी हुकूमशाहीची हरारी व्याख्या करतात. निवडणुका हा लोकशाहीचा एकमेव निकष नव्हे. जगातील अनेक हुकूमशहा लोकशाहीच्या मार्गाने सत्तेत येतात, याची आठवण देऊन तुर्कीचे अध्यक्ष एर्दोगान यांचे एक वाक्य हरारी उद्धृत करतात- ‘‘लोकशाही ही एखाद्या ट्रामसारखी आहे. तुमचं इच्छित स्थळ आल्यावर त्यातून तुम्हाला उतरायचं असतं. ’’

अश्मयुगात मानवांच्या टोळ्यांमध्ये माहितीचे चलनवलन सहज शक्य होते. शंभर ते हजारपर्यंत या टोळीमध्ये लोक असत. पंधराव्या शतकात छपाई तंत्रज्ञान आले आणि सोळाव्या शतकात वृत्तपत्रे प्रसिद्ध होऊ लागली. युरोप व अमेरिकेत लोकांची मते, इच्छा, अपेक्षा, विरोध निर्माण करण्याचे माध्यम निर्माण झाले. अर्थात तुलनेने वृत्तपत्र वाचणाऱ्यांचे प्रमाण त्या काळात कमी होते. मध्ययुगीन कालखंडात राजांच्या हाती निरंकुश सत्ता असली तरी लोकांवर नियंत्रण ठेवण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध नव्हते. राजाचे प्रशासन ही कालापव्यय करणारी बाब होती. तसेच लोकांच्या प्रतिक्रिया राजापर्यंत पोहोचण्यासही बराच कालावधी लागत असे. प्रशासन करणे हे कठीण काम होते, यामुळे कर आणि सैन्य यावर त्या काळात अधिक लक्ष केंद्रित केले जात असे.

माहिती तंत्रज्ञानाची प्रेरक शक्ती संगणक आहे. मात्र संगणकीय प्रगतीच्या ‘एआय’ टप्प्यावर, स्वत: निर्णय घेतो आणि नवीन संकल्पनांची निर्मिती करणे या दोन महत्त्वाच्या मानवी शक्ती माणसाकडून ‘एआय’कडे गेल्या आहेत. गैरसमज पसरविणारे अल्गोरिदम यातून निर्माण झाले. यासाठी ते म्यानमार मधील फेसबुकवरील खोट्या बातम्यांचा दाखला देतात. सर्वाधिक चर्चा असणारी आणि बघितली जाणारी बातमी अल्गोरिदममुळे वारंवार बघण्यासाठी सुचविली जाते. यूट्यूब आणि गूगलचा वापर करताना हे नेहमी अनुभवास येते. म्हणजे काय बघायचे हे लोक नव्हे तर अल्गोरिदम ठरवते. समाजमाध्यमाचा वापरकर्त्यांनी अधिकाधिक काळ वापर केल्यास त्यांच्याबाबत अधिक माहिती गोळा करता येणे शक्य होते. या दृष्टीने लोकांना अधिकाधिक गुंतवून ठेवणारे अल्गोरिदम तयार केले जातात..

सर्व वित्तीय व्यवहारांचे अलीकडच्या काळात संगणकीकरण झालेले आहे. सर्व वित्तीय साधने डिजिटल झालेली आहेत. करांचे रिटर्न्स भरणे, तपासणे, कर भरणा हे सर्व संगणकाद्वारे होत आहे. त्रुटी असल्यास संगणकच निर्णय घेतो, म्हणजेच माणसांकडून माणसांकडे माहितीचे प्रसारण न होता ते संगणक ते संगणक असे होत आहे. माणसांच्या साखळीत २४ तास काम करणारा संगणक आता जोडला गेल्याने, माणसाच्या प्रत्येक व्यवहारावर आणि हालचालीवर लक्ष ठेवून माहिती गोळा करणेही संगणकाला शक्य झालेले आहे. माणसांवर नियंत्रण ठेवण्याचे अमर्याद अधिकार माणसाच्या नकळत संगणकाकडे जात आहेत.

महत्त्वाच्या सर्व विषयांवर मुक्त सार्वजनिक संवाद आणि त्यातून सहमती ही लोकतांत्रिक व्यवस्था आहे. परंतु सार्वजनिक हिताच्या चर्चेत आता मानवी नसलेल्या संसाधनाचा प्रवेश झालेला आहे. समाजमाध्यमांत ‘चॅट जीपीटी’चा कोलाहल वाढला आहे. २०१६ च्या अमेरिकेतील निवडणुकीत वीस दशलक्ष ट्विटस चॅट बॉटने निर्माण केलेले होते. अध्यक्षपदी कोणाची निवड व्हावी अशी चर्चा होत असताना बहुसंख्य मते जर संगणकाद्वारे तयार होत असतील तर याचा परिणाम किती घातक होऊ शकतो याची कल्पना केलेली बरी. माणसा-माणसांच्या संवादाशिवाय आता ‘एआय’ संचलित यंत्राचाही सार्वजनिक क्षेत्रात आवाज असेल. ट्विटरवरील ‘बॉट’निर्मित रेडिमेड भाष्ये हे त्याचे उदाहरण आहे. यातून डिजिटल अराजक (डिजिटल अॅनार्की) निर्माण होऊ शकते. व्यक्तीची मते ‘एआय’बदलू शकतो. भरकटवणारी माहिती, खोट्या बातम्या यातून लोकशाही पद्धती धोकादायक वळणावर उभी आहे असे हरारींना वाटते. तर्क, विवेक, न्याय दूर सारून जर विद्वेष, खोटी माहिती पसरत असेल तर लोकशाहीच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होते. यातून हरारी असा निष्कर्ष काढतात की जर लोकशाहीचा पराभव झाल्यास त्यास तंत्रज्ञान नव्हे, तर तंत्रज्ञान वापरणारा माणूस जबाबदार असेल.

‘एआय’च्या अमर्याद शक्यतांमुळेच ‘एआय’-संशोधनात जागतिक स्पर्धा सुरू आहे. जगावर अधिराज्य गाजवण्याच्या या स्पर्धेत अनेक राष्ट्रे सामील झालेली आहेत. अल्गोरिदम म्हणजे संगणकाकडून केल्या जाणाऱ्या कार्यासाठी वापरण्यात येणारे क्रमबद्ध सूचनाक्रम. यासाठी विदा प्रचंड प्रमाणात लागते. ज्याच्याजवळ सर्वाधिक विदासाठा ते राष्ट्र जगावर प्रभुत्व गाजविणारे राहील, हे बहुतेक सर्व राष्ट्रांच्या लक्षात आलेले आहे. त्यामुळे विदा वसाहतवादाला (डेटा कलोनिअॅलिझम) सुरुवात होऊ शकते. ‘एआय’वर आधारित अॅप्स तयार करण्यासाठी प्रचंड प्रमाणात विदा आवश्यक असते. यामुळे विदा ‘चोरणाऱ्या’ समाजमाध्यमांवर अनेक देशांत बंदी घालण्यात आली आहे.

माणसांशी संबंधित प्रचंड विदा कॉम्प्युटर गोळा करेल. माणसाच्या वृत्ती प्रवृत्तीचा कलही स्पष्ट करेल. परंतु तरीही कॉम्प्युटरला जग अचूकपणे कळेलच असे नाही. कारण माहिती म्हणजे सत्य नव्हे. (इन्फॉर्मेशन इज नॉट ट्रुथ) जी माहिती जमा होईल त्यातून एका नव्या जगाची निर्मिती होईल. आणि हे आभासी जगच माणसांवर लादण्याचा प्रयत्न होत राहील, ही हरारी यांची खरी चिंता आहे.

डिजिटलवर आधारित नोकरशाही (डिजिटल ब्यूरोक्रसी) ही आत्तापर्यंतची सर्वात शक्तिशाली आणि निर्दय नोकरशाही असेल, असे हरारी मानतात. माहिती तंत्रज्ञानातील प्रगती ही शहाणपणाकडे कमी आणि मूर्खपणाकडे अधिक जात असल्याची असंख्य उदाहरणे हरारी देतात. दोष माणसांचा नसून माहिती तंत्रज्ञानाचा आहे. दुष्काळ, साथीचे रोग, भूकंप यासारख्या आपत्तीच्या वेळी सत्तेचे केंद्रीकरण एक वेळ समजू शकते. परंतु माहितीच्या सत्तेचे केंद्रीकरण झाल्यास माणसाने स्वत: निर्माण केलेले हे मायाजाल माणसालाच भस्म करू शकते, याचा धोका जगाने आत्ताच ओळखला पाहिजे, असे हरारी कळकळीने सांगतात.

लोकप्रियता आणि चमत्कृतीजन्य कल्पनाविलास यांच्या पलीकडे जाऊन ‘एआय’चे नियंत्रण करण्याचे संघटित प्रयत्न जगातील सर्व देशांनी करणे आवश्यक आहे, हाच हे पुस्तक लिहिण्याचा प्रधान हेतू आहे असे प्रतिपादन हरारी करतात.

इतिहासात केवळ भूतकाळातील घटनांचा अभ्यास नसतो, तर या घटकांच्या बदलांचाही अभ्यास असतो. अश्मयुग ते आजचे कृत्रिम बुद्धिमत्तेचे युग असा हरारी यांच्या अभ्यासाचा व संशोधनाचा विस्तृत पैस आहे. विकासाच्या बदलांचे परिणाम मानवी समाजावर कसे झाले आणि त्यातून प्रगतीचे क्षेत्र मानवाने कसे पादाक्रांत केले याचा तपशीलवार आढावा संशोधनात्मक पद्धतीने हरारी यांनी घेतलेला आहे. ज्या कबुतराच्या संदेशामुळे पहिल्या महायुद्धात सैनिकांचे प्राण वाचले होते त्या शेर अॅमी या कबुतराचे प्रतीकात्मक चित्र पुस्तकाच्या मुखपृष्ठावर आहे. हरारी यांची भाषा अतिशय प्रभावी, ओघवती व पकड घेणारी आहे, हादेखील या पुस्तकाचा विशेष आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा ‘न भूतो न भविष्यति’ असा धोका जेव्हा हरारी अधोरेखित करतात तेव्हा जगातील सबंध मानवी जातीच्या शहाणपणाची कसोटी पाहणारा हा काळ आहे असे हे पुस्तक वाचताना सतत जाणवत राहते.

परिचय : डॉ. सतीश श्रीवास्तव

प्रस्तुती : श्री हर्षल भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ परिहार जी का साहित्यिक संसार # 274 ☆ व्यंग्य – परमलाल की पाप-मुक्ति ☆ डॉ कुंदन सिंह परिहार ☆

डॉ कुंदन सिंह परिहार

(वरिष्ठतम साहित्यकार आदरणीय  डॉ  कुन्दन सिंह परिहार जी  का साहित्य विशेषकर व्यंग्य  एवं  लघुकथाएं  ई-अभिव्यक्ति  के माध्यम से काफी  पढ़ी  एवं  सराही जाती रही हैं।   हम  प्रति रविवार  उनके साप्ताहिक स्तम्भ – “परिहार जी का साहित्यिक संसार” शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते  रहते हैं।  डॉ कुंदन सिंह परिहार जी  की रचनाओं के पात्र  हमें हमारे आसपास ही दिख जाते हैं। कुछ पात्र तो अक्सर हमारे आसपास या गली मोहल्ले में ही नज़र आ जाते हैं।  उन पात्रों की वाक्पटुता और उनके हावभाव को डॉ परिहार जी उन्हीं की बोलचाल  की भाषा का प्रयोग करते हुए अपना साहित्यिक संसार रच डालते हैं।आज प्रस्तुत है आपका एक अप्रतिम व्यंग्य – ‘परमलाल की पाप-मुक्ति ‘। इस अतिसुन्दर रचना के लिए डॉ परिहार जी की लेखनी को सादर नमन।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – परिहार जी का साहित्यिक संसार  # 274 ☆

☆ व्यंग्य ☆ परमलाल की पाप-मुक्ति

परमलाल की ज़िन्दगी घोर गरीबी में गुज़री। छोटे-मोटे अपराध करके ज़िन्दगी को ढकेलना नियति बना रहा। पढ़ने-लिखने का कोई वातावरण नहीं रहा। नतीजतन कल की समस्या हमेशा सामने खड़ी रही।

बड़ा होने पर बड़े अपराधियों का संग मिला। आसानी से बड़ी कमाई करने का वही ज़रिया दिखा। चोरी, सेंधमारी, सड़क पर छीन-झपट करने लगा। किस्मत अच्छी थी कि कभी पकड़ा नहीं गया।

हिम्मत बढ़ी तो एक दिन दो साथियों के साथ एक एटीएम मशीन तोड़ने में लग गया। तभी किसी ने पुलिस को सूचित कर दिया और तीनों धर लिये गये। तीन महीने बाद तीनों ज़मानत पर छूटे, लेकिन तब से पुलिस की नज़र उनकी गतिविधियों पर रहती है। हर हफ्ते थाने में हाज़िरी देनी पड़ती है। ज़िन्दगी मुश्किल हो गयी है।

इसी बीच महाकुंभ का हल्ला मचा। टीवी पर कुंभ में इकट्ठे जनसमूह की तस्वीरें दिन रात चलने लगीं। परमलाल के घर में छोटा टीवी था। उसी में वे रंग बिरंगे चित्र चलते रहते। परमलाल आंखें फाड़े उन दृश्यों को देखता रहता।

फिर एक दिन एक धर्माचार्य आये। उन्होंने बताया कि कुंभ में गंगा-स्नान से अनेकों जन्म के पाप धुल जाते हैं। परमलाल चमत्कृत हुआ। तुरन्त तैयारी करके प्रयागराज पहुंच गया। रात को एक चाय वाले की खुशामद करके उसकी दूकान में सोया। सवेरे स्नान किया। प्रमाण के तौर पर वहां उपस्थित लोगों की मदद से रील भी बना ली। और भी प्रमाण संभाल कर रख लिये। फिर खुश खुश घर लौटा।

कुंभ से लौटकर सीधा अपने वकील के पास पहुंचा। बोला, ‘वकील साहब, मैं कुंभ स्नान कर आया। ये सारे सबूत हैं। अब मेरे सारे पाप धुल गये। अब आप अदालत में अर्जी लगा दें कि मेरा केस खारिज करके मुझे बरी कर दिया जाए। अब आगे कोई पाप नहीं करूंगा।’

तब से वह वकील साहब के चक्कर काट रहा है और वकील साहब उससे पीछा छुड़ाते फिर रहे हैं।

© डॉ कुंदन सिंह परिहार

जबलपुर, मध्य प्रदेश

 संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares