हिन्दी साहित्य – कविता ☆ – बूंद की कथा… ☆ श्री राजेन्द्र तिवारी ☆

श्री राजेन्द्र तिवारी

(ई-अभिव्यक्ति में संस्कारधानी जबलपुर से श्री राजेंद्र तिवारी जी का स्वागत। इंडियन एयरफोर्स में अपनी सेवाएं देने के पश्चात मध्य प्रदेश पुलिस में विभिन्न स्थानों पर थाना प्रभारी के पद पर रहते हुए समाज कल्याण तथा देशभक्ति जनसेवा के कार्य को चरितार्थ किया। कादम्बरी साहित्य सम्मान सहित कई विशेष सम्मान एवं विभिन्न संस्थाओं द्वारा सम्मानित, आकाशवाणी और दूरदर्शन द्वारा वार्ताएं प्रसारित। हॉकी में स्पेन के विरुद्ध भारत का प्रतिनिधित्व तथा कई सम्मानित टूर्नामेंट में भाग लिया। सांस्कृतिक और साहित्यिक क्षेत्र में भी लगातार सक्रिय रहा। हम आपकी रचनाएँ समय समय पर अपने पाठकों के साथ साझा करते रहेंगे। आज प्रस्तुत है आपका एक भावप्रवण कविता बूंद की कथा…।)

☆ कविता – बूंद की कथा… ☆ श्री राजेन्द्र तिवारी ☆

********

एक नन्ही सी बूंद जल की,

आशा की किरण लिए मन में,

कितने अरमान संजोये थे,

जब छुपी मेघ के अंचल में,

नन्हे दिल में बड़े प्रेम से,

साहस का अंकुर बोया,

कीर्ति रहे इस जग में,

यह अरमान संजोया,

आखिर वह दिन भी आया,

  स्वजनों से जब किया किनारा,

रोया दिल भीगे नैनों से,

बहने लगी अश्रु की धारा,

यादें धूमिल हो गई,

सामने भविष्य था

आस निराशा के घेरे में,

अनंत का रहस्य था,

वायु के उज्जवल रथ पर,

अश्व जुते जिसमें सपनों के,

पल पल थी वह सोच रही,

क्यों दामन छूटे अपनों के,

सोचा किसी सीप में गिर,

मैं मोती बन जाऊंगी,

किसी हार में लगा कर फिर,

  दुल्हन के गले लग जाऊंगी,

रूप सौंदर्य की वृद्धि करके,

जीवन सफल बनाऊंगी,

प्यार करूंगी हर पल से,

हर पल को सुखद बनाऊंगी,         

  किसी नवेली दुल्हन की,

 मांग में जा छुप जाऊंगी,

कृतार्थ करूंगी अपने को,

मांग का मान बढ़ाऊंगी,

दुखद बिदा की बेला में,

नैनो के आंसू बन जाऊंगी,

स्वजनों की आंखों में भरकर,       

 डोली का मान बढ़ाऊंगी,

या फिर मंदिर में जाकर,

ईश को शीश झुकाऊंगी,

ईश के चरणों में गिरकर,

चरणामृत कहलाऊंगी,

भक्त जनों की अंजलि में जा,

प्रेम की प्यास बुझाऊंगी,

शांति मिले मन को ऐसी,

भक्ति भाव बढ़ाऊंगी,

फिर सोचा कि जब मजदूर,

कार्य से बोझिल थक कर चूर,

अपने घर जब वापस आता,

जल पीने को जी ललचाता,

इतने में गृह लक्ष्मी भी,

जल लुटिया ले बाहर आती,

बूंद सोच में पड़ी कि वह भी,        

 लुटिया के जल में मिल जाती,     

  प्यासे श्रमिक की प्यास बुझा,   

  यह जीवन सफल बना जाती,    

  फिर बदला नन्हा सा दिल,

सुन,पपीहे की पुकार उदास,

गिर जाऊं इसके मुंह में तो,

बुझ जाए इसकी भी प्यास,

क्रूर काल का खेल ये कैसा,

हाय विधाता की माया,

नन्हा सा दिल टूट गया,

स्वप्न न पूरा हो पाया,

कालचक्र फिर जर्जर सा,

मंद गति से चला

रोम रोम भी कांप उठा,

आशंका से दिल दहला,

आस ना पूरी हो पाई,

राज,आ गई कैसी घड़ी,

अंतिम सांसें ले रही,

बूंद कीचड़ में पड़ी,

कली पुष्प ना बन पाई,

निशि की छाया आ गई,

जीवन भी ना मिल पाया,

मृत्यु कहीं से आ गई… 

© श्री राजेन्द्र तिवारी  

संपर्क – 70, रामेश्वरम कॉलोनी, विजय नगर, जबलपुर

मो  9425391435

 संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ समाधीस्थ ज्ञानदेव… ☆ सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ समाधीस्थ ज्ञानदेव… ☆ सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

आळंदी सोडून चालली ती,

चार सान गोजिरी मुले !

काट्याकुट्यांच्या मार्गामध्ये,

अडखळत होती त्यांची पाऊले!…. १

*

 आळंदीकरांनी हिणविले तयांना,

‘संन्याशाची मुले’ म्हणूनी!

 व्याकुळलेली मने घेऊनी,

 चालली लेकरे हतबल होऊनी!.. २

*

निवृत्तीचा स्वभाव संयत,

ज्ञानाची त्या होती साथ!

सोपान मुक्ता पाठी त्यांच्या,

 चालू लागले अवघड वाट!… ३

*

 पैठण क्षेत्री गेली भावंडे,

 मिळेल काही न्याय म्हणूनी!

 मोठे पण त्यांचे नाही आले,

 शास्त्री पंडित यांच्याही ध्यानी!.. ३

*

दुःखी होऊनी परत निघाली,

घेऊन आली शुद्धिपत्रास !

आता तरी मिळेल का हो,

 करण्या आम्हा आळंदीत वास!.. ४

*

पैठण, नेवासे वाट चालता,

 केले काही चमत्कार जनी!

कळून येता त्यांची महती,

 अवाक् झाली सारीच मनी!… ५

*

आळंदीला परतून येता,

 ज्ञाना म्हणे कार्य ते झाले!

गुरु निवृत्तीची आज्ञा होता,

 समाधी घेण्या सिद्ध जाहले!.. ६

*

तिथे पाहिली जागा सत्वर,

 खोल विवर शोधिले त्यांनी!

ज्ञानदेव त्या विवरी शिरता,

 शिळा ठेवली निवृत्तीनाथांनी!… ७

*

योगेश्वर रूप ते ज्ञानदेव,

आळंदीस समाधीस्थ झाले!

अजून त्याची साक्ष देत हा,

 सोन्याचा पिंपळ त्यावरी झुले !… ८

© सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आयुष्याच्या होकाराला… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

☆ आयुष्याच्या होकाराला… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

आयुष्याच्या होकाराला, कौल जरासा लाविन म्हणतो

वाट संपली वाटचाल पण, अजुन जराशी करीन म्हणतो

*

जागविल्या मी कितीक राती, नभांगणीचे मोजत तारे

जपमाळेमधि स्वप्नांच्या ह्या, नवीन तारे ओविन म्हणतो

*

अंतर्यामी कुसुमांच्या मी, शिरता वाटे कवी जाहलो

ह्रदयकवाडे काट्यांचीही, जरा किलकिली करीन म्हणतो

*

नकार होता ह्या मातीचा, बीज उधळले वाऱ्यावर मी

सुदूर कोठे असेल रुजले, शोध तयाचा घेइन म्हणतो

*

कालपरत्वे गहाळ झाली, काळजातली काही गावे

प्राणप्रतिष्ठा पुन्हा तयांची, नकाशात मी करीन म्हणतो

*

द्यावी बुडवुन भोगशिदोरी, तळ नसलेल्या अथांग डोही

पुन्हा लिहाया नवी कहाणी, कागद कोरा होइन म्हणतो

*

विलया न्यावी कशी सागरा, मलीन अजुनी इतुकी गंगा

कुठे अजूनी स्वर्ण कसाला, अजुन जळत मी राहिन म्हणतो !

(वनहरिणी )

 

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सांगा बाई कधी रिकामी असते का? ☆ सौ. वृंदा गंभीर ☆

सौ. वृंदा गंभीर

? कवितेचा उत्सव ?

☆ सांगा बाई कधी रिकामी असते का ? ☆ सौ. वृंदा गंभीर

सांगा बाई कधी रिकामी असते का?

कुठेतरी ठेवलेली पोटली

सापडतेच ना?

डाळींच्या डब्यात गव्हाच्या पोत्यात

कुठे न कुठे पैसे सापडतात ना?

बाई ची नजर आणि भविष्याचा विचार खराच असतो ना?

सांगा बाई कधी रिकामी असते का?

*

डबा जरी रिकामा असला तरी वळचणीला सापडतच ना,

पोत्याची थप्पी नसली तरी उतरंडीत धान्य असतंच ना,

भाजी नसेलतर आमटी शिजतेच ना.

सांगा बाई कधी रिकामी असते का?

*

घर सांभाळून काम करतेच ना,

बरोबरीने काम करून शेरडं, करडं सांभाळतेच ना,

ठेवती जपून पैसापाणी वेळेनुसार देतेच ना,

जेव्हा कुणाचा आधार मिळत नाही तेंव्हा मदत करतेच ना

सांगा बाई कधी रिकामी असते का?

*

का होते पुरुषांचेच कौतुक नेहमी?

 बाई कौतुकाची अधिकारी असतेच ना,

संकटाना तोंड देऊन तीही संसार सावरतेच ना,

गोड बोलून नाती जपून एकोप्याने राहतेच ना,

तरीही बाईच दोषी असं म्हणतात च का?

सांगा बाई कधी रिकामी असते का?

© सौ. वृंदा पंकज गंभीर (दत्तकन्या)

न-हे, पुणे. – मो न. 8799843148

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 196 ☆ अभंग… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 196 ? 

अभंग…☆ महंत कवी राज शास्त्री ☆

बालपण गेले, निघूनिया माझे

झाले पहा ओझे, तारुण्याचे.!!

*

बालपणा सवे, खूप काही गेले

मनात स्मरले, सर्व कोष.!!

*

खोड्या आठवल्या, काड्या आठवल्या

जागा आठवल्या, रमलेल्या.!!

*

काळा फळा सुद्धा, स्मृतीत राहिला

अधांतरी झाला, आता फळा.!!

*

काळा होता फळा, हिरवा जाहला

खडू बदलला, रंगा-सवे.!!

*

पाटी नि लेखणी, आणि उजळणी

घरी शिकवणी, होतं नाही.!!

*

दफ्तर फाटले, वह्याही फाटल्या

शाळेच्याही खोल्या, मृत-झाल्या.!!

*

असंख्य चित्रण, मनात बंदिस्त

जवळचे दोस्त, फितूरले.!!

*

कविराज म्हणे, लिहितांना शब्द

मनं हे निःशब्द, होते आहे.!!

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ व्रतोपासना – १. मानवता ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

व्रतोपासना – १. मानवता ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

आज सकाळच्या बातम्या ऐकल्या आणि मनात विचार आले. बातमीच तशी होती. जसे हवामान सांगतात तसे प्रत्येक ठिकाणची प्रदूषण पातळी सांगत होते. आणि हा खूप जास्त धोक्याचा इशारा आहे असेही सांगत होते. आणि असा इशारा मोठ्या सणाच्या नंतर नेहेमीच दिला जातो.

गेले काही दिवस सगळीकडे दीपावली आनंदोत्सव चालू आहे. वर्षातून एकदाच येणारा मोठा सण. सगळे मोठ्या आनंदात साजरा करतात. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने सण साजरे करतो. त्यात वावगे काहीच नाही. मुलांना शाळेला सुट्टी पण असते. आपल्या परंपरा, त्याचे महत्व लक्षात घेणे या दृष्टीने आपले सण फार महत्वाची कामगिरी बजावतात.

पण गेले काही वर्षे आपण जर निरीक्षण केले तर त्यातील गाभा किंवा उद्देश नष्ट होत चाललेला दिसत आहे. हल्ली तर असे सण नकोसे वाटतात. कारण त्यात दिखावाच जास्त वाटतो. आणि समाजाला होणारा त्रास जास्त दिसतो. सगळे सण साजरे करताना विद्यार्थी, आजारी, वृध्द यांचा विचार कुठेही नसतो. आणि तसे कोणी सुचवले तर दार लावा म्हणतात. आणि जास्त त्रास होईल असे करतात.

खरे तर दिवाळीत प्रत्येक दिवशी वेगळ्या निसर्ग देवतेची पूजा असते. ते लक्षात घेऊन आचरणात आणणे आवश्यक आहे. या निमित्ताने काही व्रते मनात आली. व्रत वैकल्ये आपण आचरणात आणतो. त्या त्या पूजा, उपासना, उपास करतो.

व्रत म्हणजे संकल्प, प्रतिज्ञा, उपासना इत्यादी साठी

विशिष्ठ नितीनियमांनी करावयाचे आचरण. व्रत हे विशिष्ठ काळासाठी, विशिष्ठ तिथीस, विशिष्ठ महिन्यात, विशिष्ठ वाराला किंवा विशिष्ठ पर्वात आचरले जाते. याचे निरनिराळे प्रकार आहेत. व त्यांचे उद्देश पण वेगवेगळे असतात.

हे उत्तमच आहे. पण त्यात काळानुसार काही बदल करावे असे वाटते. या सणाच्या निमित्ताने एक व्रत जे मी अनेक वर्षे आचरणात आणत आहे. त्याचा विचार व्हावा असे वाटते.

मानवता – याचे महत्व मला एका छोट्या मुलीकडून जास्त पटले. आम्ही शिक्षक शाळेतील मुलांची स्वतःच्या मुलांच्या प्रमाणे काळजी घेत असतो. बरेचदा आमच्या शाळेतील मुले काहीही न खाता शाळेत येतात. त्याला अनेक कारणे असतात. पण आम्ही शिक्षक कित्येकदा स्वतःचा जेवणाचा डबा अशा मुलांना देत असतो. असेच एकदा मी एका मुलीला डबा दिला. तिने तो घेतला आणि त्यातील निम्मा डबा ( भाजी पोळी) एका कागदावर काढून घेतली. आणि डबा परत दिला. तिला जेव्हा विचारले असे का केले? त्यावेळी ती म्हणाली, मी सगळा डबा खाल्ला तर तुम्ही काय खाणार? तिच्या या उत्तराने मला विचार करायला भाग पाडले. स्वतःला भूक लागलेली असताना दुसऱ्याचा विचार करणे किती महत्वाचा संस्कार आहे. यात मला तिच्यातील मानवता जाणवली.

अशी मानवता आपण कुठे कुठे दाखवतो असे म्हणण्यापेक्षा कुठे कुठे विसरत चाललो आहोत याचा विचार सर्वांनीच करावा असे वाटते. कोणताही आनंद साजरा करताना लाखो रुपयांचे फटाके फोडण्या पेक्षा काही गरजवंत लोकांना काही गोष्टी देऊन आनंद मिळवू शकतो. आणि आपल्या प्रमाणे त्यांचीही दिवाळी थोडी फार आनंदी करु शकतो. घरातील काम करणारे यांची दिवाळी तर आपण आनंदी करतोच. पण आज समाजात काही मंडळी अशी आहेत की कोणतेही अनुदान न घेता अनेक अनाथ मुलांचा सांभाळ करतात. त्या मुलांना आपण आनंद देऊ शकतो. त्यांना फराळ, नवीन कपडे दिले तर त्यांच्या चेहेऱ्यावर जो खरा आनंद दिसतो तो आपल्यालाही आनंदी करतो.

खरे तर मानवता हे फार मोठे आणि महत्वाचे व्रत आहे. यावर लिहीण्या सारखे पण खूप आहे. आज फक्त दिवाळीत काय करु शकतो, आपला आनंद मिळवून, प्रदूषण टाळून आपल्या मुलांवर न कळत चांगले संस्कार कसे करु शकतो या विषयी माझे विचार व्यक्त केले आहेत.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मोबदला… भाग – १ ☆ श्री दीपक तांबोळी ☆

श्री दीपक तांबोळी

 

? जीवनरंग ?

☆ मोबदला… भाग – १ ☆ श्री दीपक तांबोळी

शिरीष जसा घरात शिरला तशी त्याची बायको नेहा त्याला म्हणाली

” अहो जरा अण्णांना बघता का?खुप अस्वस्थ वाटताहेत. जेवलेही नाहीत “

“हो. फ्रेश झालो की लगेच बघतो “

बाथरुममध्ये फ्रेश झाल्यावर तो पटकन अण्णांच्या रुममध्ये गेला. नेहमीप्रमाणे अण्णा पलंगावर झोपले होते. जवळ जाऊन शिरीषने त्यांच्याकडे पाहिलं. खरंच अस्वस्थ वाटत होते. त्यांचे खोल गेलेले डोळे, निस्तेज नजर, चेहऱ्यावरची उद्विग्नता पाहून त्याला गलबलून आलं. लक्षण काही ठिक दिसत नव्हतं

” काय झालं अण्णा?काय होतंय?”स्वतःलाच धीर देत त्याने विचारलं. अण्णांनी काही न बोलता उजवा हात आकाशाकडे नेला. त्यांच्या तोंडातून अस्पष्ट शब्द बाहेर पडले पण ते शिरीषला समजले नाहीत. त्यांच्या तोंडाजवळ कान नेत तो म्हणाला

“काय म्हणालात कळलं नाही. परत एकदा सांगा”

“म…. ला….. दे…… वा…… क….. डे…… जा…. य… चं…. य” परत हात वर करुन ते अस्पष्ट आवाजात म्हणाले शिरीषच्या डोळ्यात पाणी आलं. तरी स्वतःला सावरत तो म्हणाला

“मी कोण तुम्हांला देवाकडे नेणारा. त्याला न्यायचं तेव्हा नेईल. आणि अजून तुम्हांला नातवंडांची लग्न बघायची आहेत. इतक्या लवकर कुठे निघालात देवाकडे?”

अण्णांनी जोरजोरात नकारार्थी मान हलवली. परत एकदा हात वर दाखवून ते अस्पष्ट बडबडले.

“बरं बरं तुम्ही पडा. काही दुखतंय का तुमचं?”

त्यांनी नकारार्थी मान हलवली. मग हाताने त्याला जवळ बोलावलं. तो जवळ येताच त्यांनी त्याच्या डोक्यावरुन, पाठीवरुन प्रेमाने हात फिरवला. का कुणास ठाऊक त्यांचा जाण्याचा क्षण जवळ आलाय असं शिरीषला जाणवून गेलं. त्या विचाराने त्याला गहिवरुन आलं. पण असं रडून चालणार नव्हतं. स्वतःचे डोळे पुसत त्याने त्यांना विचारलं

“डाॅक्टरला बोलावू?”

त्यांनी नकारार्थी मान हलवल्यावर तो म्हणाला.

“बरं बरं. मी रोहनचं जेवण झालं की त्याला पाठवतो तुमच्याजवळ बसायला”

अण्णांनी होकारार्थी मान हलवली. शिरीष बाहेर आला

“काय झालं?काय होतंय त्यांना?”नेहानं काळजीनं विचारलं

” काही होत नाहिये. त्यांना आता जायचे वेध लागलेत. त्यांचंही बरोबर आहे. किती दिवस अशा स्थितीत रहाणार आहेत. कधी ना कधी माणसाचा धीर खचणारच ” उदास होत शिरीष म्हणाला.

शिरीष योग्यच म्हणतोय हे 

नेहाच्या लक्षात आलं. गेली सात वर्ष अण्णा पॅरॅलिसीस होऊन पडले होते. त्यांचं सगळं काही बेडवरच करावं लागायचं. नाही म्हणायला कधीतरी उठून ते चालायचा प्रयत्न करायचे. पण ते तेवढंच. खरं तर शिरीषची आई वारली तेव्हाच ते खचले होते. पण तीन मुलांच्या सहाय्याने आपलं जीवन निर्धोकपणे चालू राहील असं त्यांना वाटलं. सुरवातीचं एक वर्ष बरं गेलं. एकत्र कुटुंबात शिरीषचे दोन्ही भाऊ निर्मल, गुणवंत आणि त्यांच्या दोघांच्या बायका नोकरीला जात. नेहा एकटी घरी असायची. अण्णांची मेडिकल एजन्सी शिरीषने स्वबळावर भरभराटीला आणली होती. नवऱ्याचं चांगलं उत्पन्न असल्यामुळे नेहाला उच्चशिक्षित असूनही नोकरी करायची गरज नव्हती. पण ती घरी असते म्हणून तिनं मोलकरणीसारखी घरातली सर्व कामं केली पाहिजेत असा शिरीषच्या दोन्ही वहिन्यांचा समज झाला होता. घरात कटकटी वाढल्या आणि भांडणं होऊ लागली तसं निर्मल आणि गुणवंत यांनी शिरिषला वेगळं निघायला सांगितलं. नेहाही जावांच्या शिरजोरपणाला आणि या रोजच्या कटकटींना कंटाळली होती. शिरीषची इच्छा नसतांनाही त्याला वेगळं व्हावं लागलं. अण्णा मात्र आपल्या दोन्ही मोठ्या मुलांसोबतच राहिले. शेवटी ते त्यांनी बांधलेलं घर होतं. त्याचे ते मालक होते. पण नंतरच्या सहाच महिन्यात दोन्ही मुलं आणि सुनांनी या मालकाचं जीवन आश्रितासारखं करुन टाकलं. नेहा आणि शिरीष असतांना त्यांची खुप काळजी घेतली जायची. वेळच्या वेळी जेवण, औषधं असायची. त्यामुळे अण्णा ठणठणीत होते. नेहा आणि शिरीष वेगळं निघाल्यापासून त्यांची फार आबाळ होऊ लागली. जेवणाचं तर सोडाच संपलेली औषधंसुध्दा कुणी त्यांना लवकर आणून देत नव्हतं. त्या औषधांचा खर्च कुणी करायचा यावरुन दोघा भावांची आणि जावांची भांडणं व्हायची. शेवटी अण्णांकडूनच पैसे घेतले जायचे. आपण आपल्याच घरात निराधार झालोय या जाणीवेने अण्णा मानसिकरीत्या खचत गेले. त्याचा परीणाम व्हायचा तोच झाला. त्यांचा रक्तदाब प्रमाणाबाहेर वाढून त्यांना पॅरॅलिसीसचा अटॅक आला. आता तर निर्मल, गुणवंतची चांगलीच पंचाईत झाली. अण्णांकडे लक्ष देण्यासाठी कुणाला तरी नोकरी सोडण्याची गरज होती पण कुणीही तडजोड करायला तयार होईना. सुट्या तरी घेऊन किती घेणार? केअरटेकर ठेवला तरी त्याचे पैसे द्यायची एकाही भावांची तयारी नव्हती. घरात परत एकदा भांडणं होऊ लागली. अण्णा त्यांच्याच घरात सर्वांना नकोसे झाले. शेवटी दोन्ही भाऊ आणि त्यांच्या बायकांनी “अण्णांची ही ब्याद आता शिरीषनेच सांभाळावी. अशीही त्याची बायको रिकामटेकडीच असते “या विचारावर संगनमत केलं आणि अण्णांना एक दिवस शिरीषकडे आणून टाकलं. शिरीष आणि नेहाला अगोदरच निर्मल आणि गुणवंत यांनी अण्णांच्या चालवलेल्या हेळसांडीबद्दल वाईट वाटत होतं. दोघांनीही आनंदाने अण्णांची जबाबदारी स्विकारली. एजन्सीत जाण्याअगोदर शिरीष त्यांची अंघोळ वगैरे सगळं आटोपून जायचा. नेहा त्यांना जेवू घालणं, त्यांना औषधं देणं, त्याच्या हातापायाला मालीश करणं वगैरे आनंदाने करायची. शिरीषचं आपल्या वडिलांवर अतिशय प्रेम होतं. त्यांच्यामुळेच आपल्याला चांगले दिवस आलेत यावर त्याची श्रद्धा होती. त्यामुळे तो अण्णांची काळजीने सेवा करायचा. अतिशय कामात असतांना देखील दिवसातून एकदा तरी तो अण्णांची चौकशी करायचा. त्यांच्याशी जमेल तसं बोलायचा. रात्री जेवण झालं की अण्णांना उचलून तो गाडीत बसवायचा आणि पुर्ण शहरातून फिरवून आणायचा. तो आणि नेहा करत असलेल्या सेवेमुळे अण्णांच्या तब्येतीत बरीच सुधारणा झाली होती. पण दुर्दैवाने एक दिवस अण्णांचा एक जीवलग मित्र वारल्याची बातमी अण्णांनी पेपरमध्ये वाचली. मित्राच्या निधनाचा जबरदस्त धक्का अण्णांना बसला. त्या दिवसापासून त्यांची जगण्याची इच्छा कमीकमी होत गेली. त्याबरोबरच त्यांची तब्येतही खालावू लागली. आता तर ते पलंगावरच दिवस काढत होते.

झोपण्याची वेळ आली तसा शिरीष आपला मुलगा रोहनला म्हणाला

” आज तू राहू दे, मी झोपतो अण्णांसोबत. रात्री काही झालं तर अण्णा तुला सांगणार नाहीत ” मग अण्णांच्या खोलीत जाऊन तो त्यांना म्हणाला

” अण्णा आज मी झोपतोय तुमच्यासोबत. रात्री काही वाटलं तर उठवा बरं का मला”

अण्णांनी मान डोलावली.

रात्री दोन तीन वेळा उठून शिरीषने अण्णांकडे बघितलं. पण ते शांत झोपले होते. त्यांचा श्वासही नियमित सुरु होता.

सकाळी तो उठला तेव्हा अण्णा जागे होते. आज रविवार असल्याने मुलं आणि नेहा अद्याप झोपलेली होती. शिरीषने अण्णांकडे बघितलं. ते फ्रेश वाटत होते.

“कसं वाटतंय?”त्याने विचारलं. त्यांनी हाताने ठिक असल्याचं सांगितलं. मग पाणी हवं असल्याचा इशारा केला. शिरीषने पाणी आणून त्यांना पाजलं.

“अण्णा मी येतो अंघोळ करुन. मग तुमचा चहा झाला की तुम्हाला अंघोळ घालेन”

अण्णांनी मान डोलावली. शिरीष रुमच्या बाहेर आला तर नेहा उठलेली दिसली. शिरीषने अण्णांना बरं वाटतंय असं सांगितल्यावर तिला हायसं वाटलं.

शिरीष अंघोळ करुन बाथरुमच्या बाहेर आला तशी नेहा त्याला म्हणाली

“अहो अण्णा परत झोपले वाटतं. मघाशी मी आवाज दिला तर त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही”

शिरीषला शंका आली. एकदा उठल्यावर अण्णा कधी परत झोपायचे नाही. त्यांच्या रुममध्ये जाऊन त्याने त्यांना हाक मारली. त्यांनी डोळे उघडले नाहीत. शिरीषने त्यांच्या नाकाजवळ हात धरला. काहीही जाणवलं नाही. त्याने घाबरुन नेहाकडे पाहिलं आणि म्हणाला

“डाॅक्टरांना पटकन फोन लाव. अण्णा…. ” पुढे त्याला काही बोलता येईना.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझं काम माझ्यासाठी नक्की काय आहे? ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ माझं काम माझ्यासाठी नक्की काय आहे? ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी 

आपल्यापैकी अनेकांना असं वाटतं की कष्टकरी लोक म्हणजे शारीरिकदृष्ट्या श्रम करणारी लोकं पैशाची अडचण किंवा चणचण असते म्हणूनच काम करतात. यापेक्षा फार काही वेगळी अपेक्षा ते आपल्या कामाकडून ठेवत नसावेत किंवा नसतात. पण असं नक्कीच नाहीये.

नुकत्याच घडलेल्या प्रसंगांनं हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं.

गोष्ट अशी की आमच्या सोसायटीत इमारतीचा जिना झाडायला येणाऱ्या आणि कचरा गोळा करायला येणाऱ्या मावशी काल अॅडमिट होत्या. त्यामुळे त्या आज काही कामावर येतील असं मला वाटलं नाही. पण आश्चर्याचा धक्का म्हणजे त्या आज चक्क कामावर आल्या आणि त्यांनी सर्व काम केलं.

याबाबत नंतर त्यांची मुलगी आमच्याकडे काम करण्यासाठी आली असताना मी तिच्याशी विचारपूस केली. तेव्हा ती मला म्हणाली, “की ताई सगळेजण तिला समजावून सांगत होते पण तिने कुणाचंही ऐकलं नाही. आणि मग मी विचार केला की आईच्या जागी मी असते तर मीदेखील अशीच कामावर आले असते. ” 

मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं आणि विचारलं की, “अहो तुम्हाला इतक्या इमर्जन्सीमध्ये कामावर न येतादेखील पैसे दिलेच असते. इतकी माणुसकी तर कुणीच सोडत नाही. अनुभव आहे की त्यांना. ” 

यावर त्यांची मुलगी म्हणाली, “पण ताई पैसा म्हणजे सगळं नव्हे. “

मी म्हटलं म्हणजे? यावरती त्यांची मुलगी बोलू लागली. ती म्हणाली, “गेल्या दोन वर्षांपासून मलासुद्धा लोक आडून आडून विचारतात आता तुमची दोन्ही मुलं शिकली. नोकरीला लागली. सुना आल्या. नातवंड झालं. सून नोकरी करते. मग तुम्ही इतर घरची कामं का करता? ती सोडून आराम करा. नातीला सांभाळा. इतकी दगदग करण्याची गरज नाही. पण मी कुणाचं ऐकलं आणि ऐकणारही नाही. कारण मला माझं काम म्हणजे फक्त पैसे मिळवून देण्याचं साधन असं वाटत नाही.” 

मग मी त्यांना विचारलं, “काय वाटतं तुम्हाला तुमचं काम म्हणजे ? काय आहे ते तुमच्यासाठी?”

यावर त्या म्हणाल्या, “ताई आपलं काम म्हणजे आपलं इमान असतं. आपला मान असतो. पैसा नंतर येतो पण आधी आपल्याला विश्वास असतो की आपण आपल्या पायावर जगू शकतो. मी चार घरची धुणीभांडी, केरफरशी करते. सगळ्यांच्या घराच्या किल्ल्या माझ्याकडे असतात. विश्वासाने सगळे नसताना त्यांच्या घरात काम करून वर्षानुवर्ष त्या किल्ल्या मी माझ्या घराच्या असल्यासारख्या सांभाळते. सगळेजण सणासुदीला मला त्यांच्या घरातला माणूस असल्यासारखं वागवतात. चार माणसं चार चांगल्या गोष्टी सांगतात. अगदी सहज मला बराच चांगल्या गोष्टी ऐकायला, बघायला मिळतात. रोज बाहेर येताना जाताना घडणाऱ्या गोष्टी मला नवीन विचार करायला भाग पाडतात. हे सगळं मला माझ्या कामामुळे अनुभवायला मिळतं. माझा आत्मविश्वास आणि सन्मान म्हणजे काम आहे. जर मी हे सगळं सोडून घरी नुसती बसून राहिले. तर मला खायला प्यायला, कपडे घालायला सगळं मिळेल. पण माझी ओळख जी काही आहे ती मात्र नसेल. मी फक्त आई, बायको, आजी एवढ्याच नात्यापुरती उरेल आणि मला तसं जगायचं नाहीये. मला माझी ओळख वेगळी ठेवायचीय. शिकले असते नोकरी केली असती तरी मी कायम नोकरीतलं काम करत राहिले असते नंतर आणखीन काही वेगळं करत राहिले असते. आता शिकले नाही म्हणून काय झालं.. जे काम करायला मला मिळालं आहे त्याने एक प्रामाणिक बाई.. एक चांगलं काम करणारी बाई म्हणून माझी ओळख झाली आहे ती मला जास्त महत्त्वाची वाटते. ” 

जेमतेम सातवी शिकलेल्या घरकाम करणाऱ्या बाईचे हे विचार खऱ्या अर्थाने पुढारलेले आहेत. वर्षानुवर्ष त्या सगळ्यांकडे काम करतात. त्यांच्याबाबत आत्तापर्यंत काहीच तक्रार नाही. अतिशय आनंदाने गाणं गुणगुणत हसत खेळत त्यांचं काम चालू असतं. यामागे त्यांचा हा विचार आहे हे आज मला इतक्या वर्षांनी कळलं. आणि खरच खूप छान वाटलं. शिक्षणाचा आणि प्रगल्भ विचारांचा किंवा जगण्याचा प्रत्येक वेळी संबंध असतोच असं नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.

मनात विचार आला की प्रत्येकाने असा विचार करायला हवा की माझं काम माझ्यासाठी नक्की काय आहे ! फक्त पैसे मिळवून देणारे साधन की आणखीन काही? कारण या ‘आणखीन काही वरतीच’ मनाचं सुखसमाधान अवलंबून आहे. नाही का? 

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ माझे गाव कापडणे… ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆

प्रा. सौ. सुमती पवार

? इंद्रधनुष्य ?

☆ माझे गाव कापडणे… ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆

माझे गाव कापडणे…

मंडळी, आपले स्वातंत्र्यवीर कसे जीवावर उदार होऊन फिरत होते ते आपण वाचले. किती किती अभिमान दाटून येतो हो या वीरांविषयी मनात नि मला तर खूप धन्य वाटते की देशासाठी झगडणाऱ्या एका क्रांतिवीराच्या पोटी मी जन्म घेतला व ध्यानी मनी नसतांना त्यांच्या कार्यकर्तृत्वावर “ चला कापडण्याला” नावाचे पुस्तक २०२१ साली लिहून मी त्यांच्या ऋणातून थोडेफार उतराई होण्याचा प्रयत्न केला. 

तसे तर आई वडीलांचे ऋण कधीही न फिटणारेच असतात. आणि शिवाय आता “ आपला महाराष्ट्र”धुळे, कपोले साहेबांच्या आग्रहास्तव “ माझे गाव कापडणे”ही मालिका मी दर रविवारी लिहिते आहे.आणि

महत्वाचे म्हणजे तुमचा तिला भरभरून प्रतिसाद आहे. खरे सांगते तुम्हाला, मोबाईल हातात घेईपर्यंत मी आज काय लिहिणार आहे हे मला मुळीच माहित नसते. पण एकदा का बोट ठेवले की तुम्ही जणू माझ्याकडून लिहवून घेता असेच मला वाटते. कारण त्या आधी मी एकदम ब्लॅंक असते. पण अचानक कोणी तरी सांगितल्या प्रमाणे लिहू लागते.तुम्ही सारे ते गोड मानून घेताच. बायाबापड्या, भाऊ वहिनी साऱ्यांचेच मला फोन येत असतात. भरभरून बोलतात मंडळी. मला ही छान वाटते. आपल्या लिखाणाचे चीज झालेले पाहून. असो..

आता, चला.. चले जाव कडे …

मंडळी .. 

ह्या चिमठाणा प्रकरणाच्या आधी पासूनच म्हणजे १९४२ पासूनच ह्या क्रांतीकारकांनी गावोगावी ब्रिटिशांना सतावणारे नाना उद्योग सुरू ठेवले होते. ब्रिटिशांना भारतात काम करणेच मुश्किल करून टाकायचे.. सहकार्य तर नाहीच पण अडचणीच निर्माण करायच्या या उद्देशाने पूर्ण खानदेश पेटून उठला होता. त्यामुळे सरकारी कचेऱ्या जाळणे .. तारा यंत्राच्या तारा तोडणे.. जेणेकरुन संदेशवाहन यंत्रणाच बंद पडून पोलिस खाते अडचणीत यावे अशा प्रकारची धाडसी व जोखीम पत्करणारी कामे जीवावर उदार होऊन ही देशभक्त मंडळी करत होती. ते स्वत: क्रांतीकार्यात असल्यामुळे पैशांची वानवा होती. बंदी असतांनाही ही मंडळी सरकारी कचेऱ्यांवर झेंडा फडकवत होती.

नामदेव संपत पाटील यांनी साक्री कचेरीवर जाऊन झेंडा फडकवला. सवाई मुक्टी, पाष्टे येथील तरूणांनी शिंदखेडा मामलेदार कचेरीवर झेंडा लावण्याचा प्रयत्न केला.अटक व्हायला हे देशभक्त जरा ही डगमगत नसत .जाळपोळीचे सत्र चालूच होते.

याच वेळी खानदेश मधील काही देशभक्तांनी एकत्र येऊन प.खानदेशमधील सरकारी विश्रांती गृहे जाळण्याचा कार्यक्रम ठरविला. श्री.विष्णू सीताराम पाटील यांनी चिमठाण्याचा(शिंदखेडा),श्री.व्यंकटराव धोबी यांनी बोराडीचा(शिरपूर), श्री.रामचंद्र पाटील यांनी धुळ्याचा,देऊरच्या नेत्यांनी साक्रीचा बंगला जाळायचे ठरवले.या कामी अप्रत्यक्षपणे मदत करणारे अनेक देशभक्त होते.यांचे काम रॅाकेलचे डबे पुरवणे , काळे पोषाख  पुरवणे,पोलिसांवर नजर ठेवणे,पोलिस कारवाईची माहिती देशभक्तांना देणे अशी जोखमीची कामे इतर मंडळी करत असत..

समाजातील दानशूर लोक अशा क्रांतिकार्याला पैसे पुरवत असत. या कार्यक्रमासाठी श्री.रामेश्वर शेठ पोतदार धुळे, यांनी प्रथम ७००/- रूपये श्री. विष्णू सीताराम पाटील,कापडणे यांना दिले.” मुंबईहून अण्णासाहेब सहस्रबुद्धे यांनी २००० रूपये पाठवले. “ या शिवाय अनेक सामान्य लोक देशभक्तांना विविध मार्गांनी मदत करत होते….

पुढे … विष्णूभाऊंनी चिमठाण्याचा बंगला जाळला …कसा ….? ते पाहू या पुढे.

२६ सप्टेंबर १९४२ रोजी तळोदा येथील रेस्टहाऊस पेटविण्यात आले.तेथल्या वॅाचमनला लोकांनी बांधून ठेवले. रेस्टहाऊसच्या मुख्य हॅालमध्ये रॅाकेल शिंपडून ते पेटविण्यात आले. त्या मुळे रेस्टहाऊसचा मुख्य हॅाल पूर्ण जळून गेला. ८००/- रुपयांचे नुकसान झाले.वॅाचमनने लोकांच्या मदतीने स्वत:ची सुटका करून घेतली.त्यानंतर त्याने रेस्ट हाऊसची आग विझवली.

श्री.विष्णू सीताराम पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी १३ ॲाक्टोबरला चिमठाण्याचा सरकारी बंगला जाळला.एका खोलीत बंगल्यातील सारे फर्निचर एकावर एक रचून ठेवले.त्यावर रॅाकेल शिंपडले आणि नंतर बंगला पेटवून दिला. त्यामुळे विश्रांतीगृहाचे छप्पर पूर्णपणे खाली कोसळले.२५०० /- रूपयांचे नुकसान झाले.(१९४४ सालातील) हा बंगला जाळतांना रॅाकेल शिंपडण्यासाठी डांगुर्णे येथील …..श्री.कैलासगीर गोकुळगीर महाराज यांच्याकडील धान्य मोजण्याचे माप अधेली (आदलं) देशभक्तांनी नेले होते. बंगला पेटवून देशभक्त परत येतांना त्यांना एकदम या भांड्याची आठवण झाली.कारण त्या भांड्यावर श्री.कैलासगीर महाराजांचे नाव होते. हे भांडे जर तसेच तेथे राहिले तर पोलिसांना आपला सुगावा लवकर लागेल,आणि आपण पकडले जाऊ हा विचार करून……

मग…

अर्ध्या रस्त्यातून … श्री.विष्णूभाऊ पाटील आणि श्री.गंगाधर पाटील हे मागे फिरले. भडकलेल्या आणि अग्नीज्वाळांनी लपेटलेल्या हॅालमध्ये त्यांनी प्रवेश केलाआणि मोठ्या मुष्किलीने ते भांडे त्यांनी परत आणले.

केवढे हे अग्नीदिव्य… डोळ्यांसमोर प्रसंग आणून पहा .. आणि हे सारे  “ गुलामगिरीत सापडलेल्या आपल्या मातृभूमीला मुक्त करण्यासाठी …. ही मंडळी प्रसंगी आगीशीही खेळत होती.”

चिमठाणा बंगला जाळण्यात ….श्री रामचंद्र गोविंद पाटील,श्री.नरोत्तमभाई पटेल, श्री.यशवंत पाटील, जुनवणे, श्री.बाबुराव गुरव शिंदखेडा, श्री. माणिकलाल छाजेड(धुळे),श्री.नामदेवराव पाटील,पोलिस पाटील डांगुर्णे, गंगाराम पाटील डांगुर्णे,श्री.राजाराम पाटील डांगुर्णे,श्री.रामदास भील,डांगुर्णे,व विष्णूभाऊ पाटील कापडणे अशा १० व्यक्तिंनी  भाग घेतला. मुख्य सहभाग कापडण्याचे विष्णुभाऊ पाटील यांचा होता. नेतृत्वही त्यांचेच होते.

चिमठाणा बंगला जाळल्यामुळे पोलिसखाते हैराण झाले.शेजारच्या गावावर त्यांचा मोठा रोष झाला.त्यांनी दडपशाही सुरू केली.सामान्य जनतेला धमक्या देणे सुरू झाले. तरीही पोलिसांना कोणी माहिती देण्यास तयार झाले नाही.एवढी निष्ठा खानदेशच्या जनतेच्या हृदयात निर्माण झाली होती. डिसेंबरच्या २८

तारखेला नंदुरबारच्या क्रांतिवीरांनी तेथील  हिल बंगल्यास पेटविले.त्यामुळे रेव्हेन्यू खात्याच्या या इमारतीचे बाथरूम आणि छप्पर पूर्ण जळाले.सुमारे ६००/-रुपयांचे नुकसान झाले. बोराडीचे रेस्टहाऊस श्री.व्यंकटराव धोबी यांनी २९ मे १९४३ रोजी जाळण्याचा प्रयत्न केला. त्यात बोराडीच्या बंगल्याचे सुमारे १५००/- रूपयांचे नुकसान झाले. 

मंडळी.. 

आज ह्या रकमा आज आपल्याला किरकोळ वाटत असल्यातरी तो १९४२ चा काळ आहे हे लक्षात घ्या म्हणजे त्याचे मूल्य लक्षात येईल. खानदेश पूर्ण पेटून उठला होता.जिकडे तिकडे जाळपोळ  करून ब्रिटिश सरकारला या ना त्या प्रकारे कोंडीत पकडण्याचे प्रयत्न चालू होते.. व जीवावर उदार होऊन तरूण पिढीने

या धगधगत्या स्वातंत्र्ययज्ञात झोकून दिले होते . देशभर “चले जाव” आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळत होता व ब्रिटिश सरकार चवताळून उठले होते, व  आपले वीर बिलकूल घाबरत नव्हते.

बरंय मंडळी, राम राम . जयहिंद.. जय महाराष्ट्र..

आपलीच,

© प्रा.सौ.सुमती पवार 

 नाशिक

(९७६३६०५६४२)

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “रिटायर्ड  वडील…!!!” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? वाचताना वेचलेले ?

☆ “रिटायर्ड  वडील…!!!” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

आज जेवून झाल्यावर वडील म्हणाले …

 

” मी आता रिटायर्ड होतोय.

मला आता नवीन कपडे नको. 

जे असेल, ते मी जेवीन. 

रोज वाचायला पेपर नको. 

आजपासून सिगरेट बंद. 

तुम्ही मला जसं ठेवाल, तसा मी राहीन.”

 

…. काहीतरी कापताना सुरीनं बोट कापलं जावं आणि 

टचकन पाणी डोळ्यात यावं .. काळीजच तुटावं, 

अगदी तसं झालं…

 

एवढंच कळलं, की आजवर

जे जपलं, ते सारंच फसलं…

 

का वडिलांना वाटलं, ते

ओझं होतील माझ्यावर…?

 

मला त्रास होईल, जर ते गेले 

नाहीत कामावर…?

 

ते घरात राहिले, 

म्हणून कोणी ऐतखाऊ म्हणेल…

की त्यांची घरातली किंमत शून्य बनेल…???

 

आज का त्यांनी दम दिला नाही…?

“काय हवं ते करा, माझी तब्बेत बरी नाही, 

मला कामावर जायला जमणार नाही…”

 

खरंतर हा अधिकार आहे, त्यांचा सांगण्याचा. 

पण मग ते काकुळतीला का आले…?

 

ह्या विचारातच माझं मनं 

खचलं. नंतर माझं उत्तर मला मिळालं…

 

…. जसजसा मी मोठा होत गेलो, वडिलांच्या कवेत मावेनासा झालो. 

तेव्हा नुसतं माझं शरीरच वाढत नव्हतं, 

…. तर त्याबरोबर वाढत होता तो अहंकार 

…. आणि त्यानं वाढत होता, तो विसंवाद…

 

आई जवळची वाटत होती.

पण, वडिलांशी दुरावा साठत होता…

 

मनाच्या खोल तळापर्यंत

प्रेमच प्रेम होतं. पण, ते कधी शब्दांत सांगताच आलं नाही…

 

वडिलांनीही ते दाखवलं असेल

…  पण, दिसण्यात आलं नाही.

 

मला लहानाचा मोठा करणारे वडील, 

आज स्वतःच स्वतःला लहान समजत होते…

 

मला ओरडणारे – शिकवणारे वडील, 

का कुणास ठाऊक.. बोलतांना धजत होते…

 

मनानं कष्ट करायला तयार असलेल्या वडिलांना, 

शरीर साथ देत नव्हतं…

 

शून्यातून सारं उभं केलेल्या तपस्वीला, 

घरात नुसतं बसू देत नव्हतं…

 

…… हे मी नेमकं ओळखलं…!!

 

खरंतर मी कामावर जायला लागल्यापासून, 

सांगायचंच  होतं त्यांना – 

की थकला आहात, आराम करा. पण,

 

आपला अधिकार नव्हे, सूर्याला सांगायचा, की 

“मावळ आता”…!!

 

लहानपणीचे हट्ट पुरवणारे वडील… 

मधल्या वयांत अभ्यासासाठी ओरडणारे वडील…

आणि नंतर चांगलं वागण्यासाठी कानउघडणी करणारे वडील…

 

आजवर सारं काही देऊन 

कसलीच अपेक्षा न ठेवता, 

जेव्हा खुर्चीत शांत बसतात,

तेव्हा वाटतं, की जणू काही 

आभाळंच खाली झुकलंय !!

 

कधीतरी या आभाळाला जवळ बोलवून 

.. खूप काही बोलावसं वाटतं…!!

 

पण तेव्हा लक्षात येतं, की 

आभाळ कधीच झुकत नाही, 

ते झुकल्यासारखं फक्त वाटतं…!!

 

आज माझंच मला कळून चुकलं, 

की आभाळाची छत्रछायाही 

खूप काही देऊन जाते…!!!

 

सर्व रिटायर्ड आणि जेष्ठ नागरिकांना समर्पित…!!!

कवी : अज्ञात

संग्राहक : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares