(प्रतिष्ठित साहित्यकार श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ जी के साप्ताहिक स्तम्भ – “विवेक साहित्य ” में हम श्री विवेक जी की चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाने का प्रयास करते हैं। श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र जी, मुख्यअभियंता सिविल (म प्र पूर्व क्षेत्र विद्युत् वितरण कंपनी , जबलपुर ) से सेवानिवृत्त हैं। तकनीकी पृष्ठभूमि के साथ ही उन्हें साहित्यिक अभिरुचि विरासत में मिली है। आपको वैचारिक व सामाजिक लेखन हेतु अनेक पुरस्कारो से सम्मानित किया जा चुका है।आज प्रस्तुत है एक कविता – “एक शब्द चित्र भोपाल की गैस त्रासदी… ” ।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – विवेक सहित्य # 316 ☆
कविता – एक शब्द चित्र भोपाल की गैस त्रासदी… श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ☆
☆
कलम
कहती है
खींचो एक शब्द चित्र भोपाल की गैस त्रासदी का.
बुद्धि कहती है छेड़ो एक जिहाद मौत के सौदागरों के खिलाफ.
(वरिष्ठ साहित्यकार श्री प्रदीप शर्मा जी द्वारा हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए साप्ताहिक स्तम्भ “अभी अभी” के लिए आभार।आप प्रतिदिन इस स्तम्भ के अंतर्गत श्री प्रदीप शर्मा जी के चर्चित आलेख पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है आपका आलेख – “सबसे ऊंची, प्रेम सगाई…“।)
अभी अभी # 539 ⇒ सबसे ऊंची, प्रेम सगाई श्री प्रदीप शर्मा
मानते हैं, प्रेम अमर होता है, लेकिन जहां सगाई है, वहां आगे चलकर शहनाई भी तो बजनी चाहिए। जो विवाह की मर्यादा में विश्वास रखते हैं, वे पहले विवाह करते हैं और उसके पश्चात् प्रेम करते हैं। होता हैं, प्रेम विवाह भी होता हैं, लेकिन वहां भी चट मंगनी पट ब्याह होता है। जहां सिर्फ प्रेम सगाई है, और विवाह लापता है, माफ कीजिए वह प्रेम सगाई नहीं, लिव इन रिलेशन है।
आप अगर उधो से प्रेम की बातें करेंगे तो हम मर्यादा पुरुषोत्तम की बातें करेंगे। जिससे प्रेम सगाई, उससे केवल विवाह ही नहीं, एक पत्नीव्रत भी, फिर भले ही इसके लिए लक्ष्मण को दर्जनों शूर्पणखाओं की नाक ही क्यों ना काटनी पड़े।।
हम संसारी, संस्कारी जीव लोक लाज और मान मर्यादाओं से जकड़े हुए हैं। हमारे लिए विवाह एक अटूट बंधन है। हमारा प्रेम भी लौकिक ही होता है, आखिर देहधारी हैं, देहासक्त तो होंगे ही। हमारे जीवन में राम लीला के लिए तो स्थान है, रास लीला के लिए नहीं। मीरा और राधा की तरह हम अलौकिक प्रेम की बातें नहीं कर सकते।
हमारे संसार में सगाई को आजकल प्री – वेडिंग सेरेमनी कहते हैं, जी हां, वही राधिका – अनंत अंबानी वाली। कलयुग में कुछ लोग उसे अलौकिक भी मानते हैं, क्योंकि उसमें भव्यता भी थी और दिव्यता भी। लेकिन मर्यादा पुरुषोत्तम की तरह वहां भी अंततः शादी ही संपन्न हुई थी जिसमें मानो स्वर्ग की अप्सराएं और देवी देवता के साथ साधु संतों, महात्माओं, महामण्डलेश्वरों और शंकराचार्यों का आशीर्वाद भी शामिल था।।
हमारे आज के इस जगत में ना तो दुर्योधन का मेवा त्यागा जाता है और ना ही विदुर के साग से परहेज किया जाता है। कृष्ण ने अपने विपन्न मित्र सुदामा के पांव धोकर कोई तीर नहीं मार लिया, वह भी आज के नेताओं की तरह दलित के घर भोजन और लाडली बहना जैसी कोई टीआरपी बढ़ाने वाली लीला ही होगी। असली भक्त वही जो खंडन नहीं, अपने आराध्य का महिमामंडन करे।
जो छलिया, रसिया, माखनचोर कृष्ण कन्हैया है, वही समय आने पर कुरुक्षेत्र में अर्जुन को अपने विराट रूप का दर्शन करवाता है, शंख, चक्र, गदाधारी जिसके हाथों में कभी सुदर्शन चक्र है तो कभी तीर कमान। प्रेम हमारी कमजोरी नहीं ताकत है।
भक्तों के लिए अगर प्रेम की गंगा है तो दुष्टों के लिए महाकाल।
प्रेम के अलौकिक स्वरूप को पहचानना इतना आसान नहीं। प्रेम से ही प्रेम की उत्पत्ति होती है।
निश्छल, अनासक्त प्रेम जब परवान चढ़ता है तब ही प्रेम सगाई की स्थिति आती है। राग द्वेष अस्मिता और अहंकारमुक्त होता है शुद्ध असली अलौकिक प्रेम। नित्य शुद्ध और मुक्त होती है प्रेमवस्था। जहां बिना शर्त समर्पण है, बस वही है शायद सबसे ऊंची प्रेम सगाई।।
(श्री राकेश कुमार जी भारतीय स्टेट बैंक से 37 वर्ष सेवा के उपरांत वरिष्ठ अधिकारी के पद पर मुंबई से 2016 में सेवानिवृत। बैंक की सेवा में मध्यप्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगढ़, राजस्थान के विभिन्न शहरों और वहाँ की संस्कृति को करीब से देखने का अवसर मिला। उनके आत्मकथ्य स्वरुप – “संभवतः मेरी रचनाएँ मेरी स्मृतियों और अनुभवों का लेखा जोखा है।” आज प्रस्तुत है आलेख की शृंखला – “देश -परदेश ” की अगली कड़ी।)
☆ आलेख # 110 ☆ देश-परदेश – धूम्रपान ☆ श्री राकेश कुमार ☆
उपरोक्त चित्र को देखकर कई मित्र तो माचिस ढूंढने लग गए होंगे। साठ से नब्बे के दशक तक सिगरेट के भी खूब ठाठ हुआ करते थे। खैनी से बीड़ी पर पहुंचे लोग, सिगरेट की तरफ बढ़ चुके थे।
फिल्मी हीरो, फिल्मों और पत्र पत्रिकाओं के विज्ञापन में सिगरेट का सेवन करते हुए अतिरिक्त राशि भी अर्जित करते थे। सस्ते ब्रांड में पनामा और चारमीनार प्रचलित हुआ करते थे।
सिगार का चलन बड़े वाले अमीर परिवार या अंग्रेजी फिल्मों में होता था। हमने भी फिल्मों में ही इसके दर्शन किए थे, क्योंकि अमीर लोग हमारे परिचय में नहीं थे।
सिगरेट के असली शौकीन तो पाउच वाली सिगरेट बना कर पीते थे। इसका लाभ ये होता था, कि सिगरेट कम पी जाती थी। स्वयं पाउच से कागज में तंबाकू भरने के बाद चिपका कर सिगरेट का सेवन, समय और पेशेंस मांगता है, जो बहुत कम लोगों के पास होता था। साधारण पान की दुकानों में पाउच मिलता भी नहीं था।
इंडियन टोबैको और गोल्डन टोबैको बहुत बड़े विख्यात नाम हुआ करते थे, सिगरेट उद्योग के लिए। केंद्रीय बजट में हर वर्ष सिगरेट महंगी होती थी। सिगरेट की लंबाई भी इसकी कीमत तय करने का पैमाना हुआ करता था।
कॉलेज के दिनों में हम भी जेब में माचिस रखा करते थे, ताकि किसी शौकीन को आवश्यकता पड़े, तो काम आ सकें। हमारी माचिस के एवज में कुछ सुट्टे या एक आध सिगरेट का सेजा हो ही जाता था। ऐसे मौके यात्रा के समय बस और ट्रेन में अधिक मिलते थे।
सिगरेट के धुएं से छल्ले बनाकर हवा में उड़ाने से लड़कियां भी आकर्षित हो जाया करती थी, ऐसा हमने बॉलीवुड की फिल्मों में खूब देखा था। हमने भी प्रयास किया था, लेकिन असफल रहे थे।
टाइम पास के लिए भी सिगरेट एक अच्छा साधन हुआ करता था, जैसे आजकल मोबाइल भी हैं। सिगरेट आपके फेफड़ों को छलनी कर देता है, तो मोबाइल आपके दिमाग को छलनी कर रहा है।
आंबट कैरीच्या अर्धकच्च्या वयात बा. भ. बोरकरांची` ‘माझ्या गोव्याच्या भूमीत’ ही कविता अभ्यासली होती. तेव्हाच गोमंतक भूमीच्या दर्शनाची ओढ मनात रुजली. पुढे कॉलेजच्या पाडाच्या कैरीच्या वयात बोरकरांच्या गोव्याच्या लावण्यभूमीचे वर्णन करणार्या अनेकानेक कविता वाचनात आल्या आणि ती लावण्यभूमी पुन्हा पुन्हा खुणावू लागली. तिथल्या माडांच्या राया त्यावर निथळणारे चांदणे, त्यामधून झिरपणारी प्रकाश किरणे, केळीची बने, तांबड्या वाटा, लाटांवरची फेनफुले हे सारं स्वप्नदृश्याप्रमाणे जागेपणीदेखील मिटल्या डोळ्यांपुढे साकार व्हायचं. उघड्या डोळ्यांनी हे आपल्याला कधी बघायला मिळेल का? कधी बरं मिळेल? हेच विचार तेव्हा मनात असायचे. ते वयही कविता आवडायचं होतं.
पुढे गोव्यातील पोर्तुगिजांची राजवट संपुष्टात आली. गोवा अखील भारताचा अविभाज्य भाग बनला. गोव्यातील कॉलेजेस मुंबई विद्यापीठाला जोडली गेली आणि माझे मेहुणे (मामेबहिणीचे यजमान) गोव्याला संस्कृतचे हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणून रुजू झाले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचचीच ही गोष्ट. ते गोव्यात गेले, या बातमीनेच मी खूश झाले. कारण गोमंतकभूमी आता माझी स्वप्नभूमी राहणार नव्हती. मला तिथे जाणं आता शक्य होणार होतं. याची देही याची डोळा मला त्या भूमीचं सौंदर्य, लावण्य निरखता, न्याहाळता येणार होतं.
माझी बहीण लता तिथे जाऊन बिर्हाडाची मांडामांड करते न करते, तोच मीदेखील तिथे पोहोचले. त्या नंतर गोव्याला मी अनेकदा गेले, पण तिथे जातानाचा पहिला प्रवास मी कधीच विसरणार नाही. रात्री मिरजेहून बसलो. पहाटे पहाटे लोंढा स्टेशन आलं. कॉफी घेऊन मी खिडकीला जशी खिळलेच. लोंढा मागे पडलं आणि झाडा-झुडुपांच्या हिरव्या खुणा जागोजागी पालवू लागल्या.
कॅसलरॉकपासून हे गहिरेपण अधीकच गहिरं होऊ लागतं. नानाविध छटातून आणि आकारातून डोळ्यांना सुखवू लागतं. हे हिरवेपण दिठीत साठवता साठवता एकदम वेगळंच दृश्य डोळ्यापुढे साकारतं. शंकराची स्वयंभू पिंड वाटावी, अशा पहाडातून तीन धारांनी दुधाचा प्रवाह खाली उतरताना दिसतो. गंगेचा उगम काही मी पाहिला नाही. पण, दूधसागरचा हा धबधबा पाहून गंगोत्रीच्या दर्शनाइतकी कृतार्थता वाटली. सभोवताली चैतन्य फुलवण्यासाठी, जीवन घडवण्यासाठी हा प्रवाह दूधसागर नदी होऊन पुढे पुढे जाणार होता. गाडी दोन मिनिटं त्या धबधब्याशी थांबून पुढे पुढे जाऊ लागली पण मन मात्र अजूनही त्या धबधब्याखाली सचैल स्नान करत होतं. दूधधारेचा तो जीवनस्त्रोत अंगांगावर वागवीत होतं.
मडगावमधलं बहिणीचं पहिलं घर गावाबाहेर टेकडीच्या उतारावर होतं. घरकामापुरतं घरात वास्तव्य आणि रात्री किंवा बाराच्या उन्हाच्या वेळेला घराचं छप्पर. एरवी टेकडी हेच घर झालं होतं तेव्हा. कलंदरपणे मनमुराद भटकायची हौस त्या टेकडीवर भागली. सकाळी सूर्योदय बघायला टेकडी चढायची. संध्याकाळी सूर्यास्त बघायला टेकडीचा माथा गाठायचा. दूरवर पश्चिम क्षितिजावर समुद्रात सूर्य बुडताना, टेकडीवरून बघणं मोठं बहारीचं वाटे. शिवाय हे सारं बघायला आम्ही घरचेच तेवढे. मी, बहीण, सत्यवती-सतन म्हणजे बहिणीची माझ्याएवढीच नणंद. कधी कधी प्रोफेसर महाशयही आमच्या पोरकटपणात सामील होत. सगळ्यात मला एक गोष्ट बरी वाटे. फिरायला जाण्यासाठी तयार होणं, कपडे बदलणं, वेणी-फणी, नट्टापट्टाटा करणं याची कटकट नव्हती. घरातही आम्ही तिघे-चौघे. टेकडीवरही आम्हीच तेवढे. नाही म्हणायाला गावड्यांची काही शाळकरी मुले इकडे तिकडे दिसत. किंवा कुणी कष्टकरी गावडे. त्यामुळे घरच्या पोषाखातआ आणि अवतारात बाहेर पडायला हरकत नव्हती. तेवढे १५-२० दिवस सूर्य केवळ आमच्यासाठीच उगवायचा आणि मावळायचा.
कधी-मधी आम्ही गावात जात होतो. चालत जायचं आणि चालत यायचं. सार्वजनिक वाहन व्यवस्था अद्याप साकारलेली नव्हती. त्यावेळी वाटायचं, स्वच्छ, चकचकितडांबरी रस्ते केवळ आमच्यासाठी उलगडलेआहेत. गावात गेलं, की तिथल्या एका उडपी हॉटेलमध्ये अडीच आण्याचा मसाला डोसा खायचा आणि चालण्याचा शीण शमवायचा. कोलवा बीचवर एकदा गेलो होतो. तुरळक माणसं तिथे दिसली तेव्हा. आमच्यासारखीच नवशी-हौशी आलेली असणार. तेव्हाही वाटायचं पुळणीवरती रेतीचा मऊशार किनारा आमच्यासाठीच हांतरलाय. लाटांचं नर्तन केवळ आमच्यासाठीच चाललय. माडांच्या झावळ्यासुद्धा फक्त आमच्यासाठी झुलताहेत. तेव्हा असं वाटायचं कारण हे सारं दृश्य अनिमिषपणे पाहणारे फक्त आम्हीच असायचो.
सुरुवातीला वाटायचं, काय करंटी इथली माणसं. निसर्ग आपलं लावण्य नाना कळांनी उधळतोय. यांची आस्वादाची झोळीच फाटकी. मग लक्षात आलं, इथला निसर्ग प्रत्येकाच्याच अंगणा-परसात आपलं वैभव उधळतोय. माझ्यासारखी निसर्ग सौंदर्य शोधत फिरण्याची यांना गरजच काय?
त्यानंतर अनेकदा अनेक कारणांनी गोव्याला जाणं होत गेलं. एकदा गोव्याला गेले असताना माझी गोव्यातील मैत्रिण मुक्तामाला सावईकर मला तिच्या घरी जांबवलीला घेऊन गेली. तिच्या घरी त्यावेळी तिच्या आजोबांच्या पुण्यतिथीचा मोठा उत्सव होता. त्यांच्या घरची आपुलकी, जिव्हाळा, आजही मनात घर करून आहे. तितकीच मनात खोलवर खोलवर रूतलेली आहे, जांबवलीच्या आस-पास केलेली मनमुक्त भटकंती.
माडांच्या रायातून मुक्तामालाने आम्हाला एका छोट्याशा धबधब्याजवळ नेले. दीड पुरुष उंचीवरून खाली उडीमारणारा हातभर रुंदीचा तो पाण्याच प्रवाह म्हणजे कुशावती नदीचं उगम स्थान. हे मला नंत रकळलं. खालच्या सखल भागात गळाबुडी पाणी साठलेलं. छोट्याशा विहिरीएवढाच विस्तार असेल तिथे साठलेल्या पाण्याच्या तळ्याचा. तिथून पाण्याची निर्झरणी लचकत मुरडत दूर निघून गेलेली. शाळेत असताना अभ्यासलेला, कड्यावरूनउड्या घेणारा, लता-वलयांशी फुगड्या खेळणारा, बालकवींच्या कवितेतला निर्झर मी इथे प्रत्यक्ष पाहिला. मुक्तामालाची सात-आठ वर्षाची आत्येबहीण पण आमच्याबरोबर होती. ती म्हणाली, `’माई न्हायाचं. ‘ मुक्तामालाला घरी माई म्हणत. मी पण डिक्लेअर केलं, `माका पण न्हायाचं. मग आम्ही तिघी त्या गळाबुडी पाण्यात डुंबू लागलो. वरून कोसळणर्या प्रवाहाखाली किती तरी वेळ पाण्याच्या धारा झेलत राहिलो. आस-पास माणसांची वस्तीच काय, चाहूलही नव्हती. एक निळाभोर पक्षी तेवढा पंख फडफडवत दूर उडून गेला, तेव्हा वाटलं, तळ्याच्या पाण्याचा ओंजळभर तुकडाच सघन होऊन आणि चैतन्य रूप घेऊन एखाद्या दूतासारखा आभाळाकडे चाललाय. आस-पास सळसळत्या वृक्ष-वेलींशिवाय तिथे दुसरी कसलीच चाहूल नव्हती. सारा भवताल त्यावेळी आमच्यासाठी स्नानगृह झालेला. बराच वेळ पाण्यात डुंबल्यावर आम्ही बाहेर आलो, तेव्हा लक्षात आलं, आम्ही फिरण्यासाठी बाहेर पडलो होतो, नदीत डुंबण्यासाठी नव्हे. अर्थात बरोबर कपडे नेले नव्हते.
मग आम्ही अंगावरच्या कपड्यांसकट स्वत:ला सूर्यकिरणी वाळवलं. पुढेपाच-सहा वर्षांनी लिरीलची जाहिरात पाहिली, तेव्हा वाटलं, या अनाघ्रात निर्झरणीचा लिरीलच्या अॅड एजन्सीलाही शोध लागला की काय?
दुसर्या दिवशीजांबवलीहूनरिवणला आलो. कशासाठी तिथे गेलो होतो, हे आता आठवत नाही. आठवते ती फक्त केलेली भटकंती. कुणाकुणाच्या कुळागरातून, माडांच्या रायातून, पोफळीच्या बनातून, मेंदीसारखे पायरं गवणार्या लाल चुटूक, नखरेल पायवाटांवरून, पाण्याच्या पाटातून चटक-फटक पाणी उडवत केलेली भ्रमंती आणि आठवतात जागोजागी झालेलीस्वागतं. समोर आलेले पिवळे धमक केळीचे घड, थंडगार शहाळी आणि कोकमसरबत. सुमारे ४९- ५० वर्षापूर्वी गोव्याच्या इंटिरिअरमधून केलेली ही भटकंती, माझ्या सदाचीच स्मरणात राहिलीय.
एका दिवाळीत गोव्याला असण्याचा योग आला. दिवाळीत महाराष्ट्रातील वातावरण जसं चैतन्याने रसरसलेलं असतं, तसं गोव्यात काही जाणवलं नाही. मात्र दिवाळीच्या म्हणजे नर्क चतुर्दशीच्या आदल्या दिवशी, घरोघरीच्या चुलाण्यावर लखखित घासून ठेवलेले पाण्याचे तांब्याचे हंडे दिसले. त्यावर पांढर्या मातीने आणि गेरूने नाजुक नक्षीकाम केलेलं. हंड्याची पूजा केलेली. वाटलं, आता लगेचच खालचं चुलाणं रसरसून पेटवावं. भोवती रांगोळी घातलेल्या पाटावर आडवं लावून बसावं. वासाचं तेल-उटणं लावून अंग छानपैकी चोळून –मोळून घ्यावं आणि हंड्यातील वाफाळलेलं पाणी घेऊन शिणवठा, हवेमुळे जाणवणारी चिकचिक दूर करावी. ताजं-तवानं, प्रसन्न व्हावं, पण या सार्यासाठी आणखी सात-आठ तास तरी मला धीर धरायला हवा होता.
दिवाळीत गोव्यात सगळ्यात जास्त महत्व असतं, ते नर्क चतुर्दशीला. नरकासुरांची मिरवणूक (आपल्याकडे गणपती विसर्जनाची असते तशी) आणि नरकासूर व श्रीकृष्णाचे लुटुपुटीचे युद्ध पाहत आम्ही रात्र जागवली. दुसर्या दिवशी सकाळी सगळं लवकर आवरून प्रा. सोमनाथ कोमरपंतांकडे काणकोणला गेलो. ते साधारणपणे १९८०साल असावं.
कोमरपंतांच्या अंगणात बाहेरच्या उंबर्याशी टेकलो. पांढर्या स्वच्छ मऊ रेतीनं आमच्या पावलांचं स्वागत केलं. वाटलं, चपला काढून तिथेच फतकल मारून बसावं आणि रेतीचा तो मऊ मुलायम स्पर्श अंगभर शोषून घ्यावा. ती रेती, पाढरी वाळू मुद्दाम आणून शोभेसाठी पसरलेली नाही, तर रेतीचंच अंगण आहे, रेतीचीच जमीन आहे, हे लक्षात यायला खूप वेळ लागला. कोमरपंतांकडे इतवकं आग्रहाचं जेवण झालं, की पाय पसरून बसताक्षणीच डोळे मिटू लागले. पोहे आणि मासे यांचे अगणित प्रकार. आम्ही मात्र, गाढवाला गुळाची चव नसल्याने, माशांची कालवणे बाजूला सारली आणि पोह्यांचे विविध प्रकार आस्वादत, कौतुकत राहिलो. जेवल्यानंतर सुस्ती आली, तरी उठलोच. समुद्रावर जायचंहोतं. पाळोळ्याचा समुद्र किनारा कोमरपंतांच्या घराच्या अगदी जवळ. परसात असल्यासारखा. गोव्याला येणर्या पर्यटकांमध्ये कळंगुट, कोलवा, मिरामार हे सागर किनारे महत्वाचे. पाळोळ्याच्या सागर किनार्यावर आम्ही पाऊल ठेवलं आणि अक्षरश: स्तिमित झालो. अगदी अनाघ्रात सागर किनारा. `पदोपदी नवांमुपैती’. पावला-पावलाव रलावण्याचा अनुपम साक्षात्कार घडला. समुद्राच्या पाण्याचा छोटासा प्रवाह वळून आत आलेला. शेतातल्या झडा-झुडपापर्यंत पाणी पोचावं, म्हणून शेता-भाटातून पाट काढतात, इतका छोटा प्रवाह. तो ओलांडून पुढे गेलो, आणि एक ठेंगणी-ठुसकी टेकडी स्वागत करती झाली. टेकडीवर चढून गेलो आणि चारीबाजूला नजर फिरवली. सागरानं चंद्रकोरीचा आकार धारण केलेला. प्रत्येक दिशेलाच काय, प्रत्येक कोना-कोनातून वेगळीच रम्यता. कुठे दूरवर आकाशाच्या निळाईत मिसळून गेलेली समुद्राच्या पाण्याची निळाई, कुठे निळ्या पाण्याने वेढलेला, कासवाच्यापाठीसारखा दिसणारा जमिनीचा तुकडा, कुठे हिरवी गोल टोपी पाण्यात पालथी घालावी तशी दिसणारी हिरवीगार छोटीशी टेकडी. सारं भवताल मनस्वी. आत्ममग्न. गोव्यातले सारेच सागरकाठ स्वच्छ सुंदर देखणे. पण पाळोळ्याला अनुभवलेली निरामय मनस्विता मी पाहिलेल्या इतर किनार्यानवर मला प्रतीत झाली नाही. पाळोळ्याच्या सागरकाठाची रमणीयता आज आठवताना आणि तो अनुभव शब्दबद्ध करताना जाणवतय, आपलं अभिव्यक्तीचं सामर्थ्य किती तोकडं आहे. फारच तोकडं.
गोमंतकीय दुसरं साहित्य संमेलन डिचोली इथे झालं. अध्यक्ष होते, पंडित महादेवशास्त्रीजोशी. या संमेलनात माझ्या बहिणीचा सौ. लता काळेचा बालगीतांचा संग्रह `जमाडीजम्मत’ प्रकाशित होणार होता, तिच्या संग्रहाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने पुन्हा गोव्यात जाणं झालं. या निमित्ताने तिथे गेलेल्या मला संमेलनाचा आनंद मनमुराद घेता आला. प्रकाशन करणारे अध्यक्ष पंडित महादेवशास्त्री जोशी आमच्या जवळिकितले. म्हणजे सौ. सुधातार्इंना माझे मामा बहीणच मानत. त्यामुळे त्यांच्या हस्ते लताच्या पुस्तकाचं प्रकाशन ही गोष्ट आम्हा सर्वांनाच अप्रूप वाटणारी. संग्रहाचं प्रकाशन अगदीऔपचारिकपणेच झालं, पण या संमेलनाच्या निमित्ताने तिथे गेलेल्या मला संमेलनाचा आनंद मनमुराद घेता आला या संमेलनाच्या निमित्ताने तिथे आलेल्या अनेक समान धर्मियांशी माझी नव्याने ओळख झाली. जुन्या ओळखींना नव्याने उजाळा मिळाला. संमेलनाला प्रेक्षकांची खूप गर्दी होती, तरीही वाटलं, इथल्या वातावरणातला नित्याचा निवांतपणा ही गर्दीदेखीलं पांघरून बसलीय. व्यासपीठावरचे कार्यकम रंगले, त्याहीपेक्षा अधीक रंगल्या खोल्या-खोल्यातून झडणार्या गप्पांच्या मैफली आणि हो, कवितांच्यासुद्धा. विठ्ठल वाघ यांनी व्यासपीठावरून सादर केलेली आणि नंतर पोरा-टोरांच्या, नवकवींच्या आग्रहामुळे खोल्या-खोल्यातून पुन्हा पुन्हा म्हंटलेली, खानदेशी लयकारीची डूब असलेली कविता `’मैना उडून चालली आता उदास पिपय’ ही कविता आणि नंतरच्या काळात` ‘अरे संसार संसार’ या चित्रपटातलं त्यांचं लोकप्रिय झालेलं गीत `काळ्या मातीत मातीत तिफण चालतय.. ‘ या कविता म्हणजे खानदेशी लयकारीतलं त्यांचं तेव्हाचं कविता-वाचन अजूनही स्मरणात आहेत. प्रा. विठ्ठल वाघ हेही व्यासपीठावरला भारदस्तपणा जरा बाजूला ठेवून, शिंग मोडूनवासरात शिरले. बा. सा. पवार, पुष्पाग्रज, मेघना कुरुंदवाडकर, चित्रसेन शबाब या सार्या पोरांबरोबर त्यांच्यातलेच होऊन गेले. गोव्यातील अनेक नवोदित कवींचं कविता वाचन, व्यासपीठापेक्षा, खोल्या- खोल्यात रंगलेल्या अनौपचारिक बैठकीतून अधीक रंगलं. त्या सगळ्यांच्या कविता ऐकता ऐकता, एक गोष्ट सहजच जाणवून गेली. अलिकडे बर्याच कविमंडळींच्या काव्यातून ऐकू येणारा कटुतेचा सूर, विद्रोहाची, विस्फोटाची जहालता, या गोमंतीय कविमंडळींच्या कवितेतून अगदी तुरळकपणे आली आहे. मुक्तछंदापेक्षा वृत्तबद्ध, संगितात्मक रचना करण्याकडे त्यांचा अधीक कल दिसला. मनात आलं, हाही त्यांच्या भवतालचाच प्रभाव असेल का? समुद्राची गाज तालबद्ध. माडांचं डोलणं तालबद्ध. वार्याचं वाहणं तालबद्ध. या सार्या लयकारीनं भारलेल्या परिसरात, मनात उमटणार्या भावनाही लय घेऊनच येणार. या आश्वासक निसर्गाच्या सहवासात माणूस आनंदित होईल. त्याच्या गूढतेने चकित होईल. क्वचित दिङ्मूढही होईल, पण त्याच्यात कडवटपणा येणार नाही. कधीच नाही. डिचोली येथे झालेल्या साहित्य संमेलनात, गोव्यातील बुजुर्ग साहित्यिक, बा. द. सातोस्कर यांचा परिचय झाला. नुसता परिचयच नव्हे, तर इतकी आत्मीयता आणि जिव्हाळा निर्माण झाला, की त्या क्षणापासून ते मला मुलगीच मानू लागले. दादा सातोस्कर या नावाचा आणि व्यक्तिमत्वाचा गोव्यातखूपच दबदबा. फार मोठ्या माणसांशी माझं सहसा जमत नाही. जमतनाही, म्हणजे काय, तर माझ्यातील न्यूनगंडाची भावना अधीक गडात होत जाते. वागता-बोलताना सतत अंतर जाणवत राहतं. त्यांच्याशी वागता-बोलताना एक प्रकारचं दडपण येतं. धाकुटेपणाची भावना मनाला सतत वेढून राहते. पण दादांचं मोठेपण असं, की हे अंतर त्यांनी स्वत:हून तोडलं आणि ते आपल्या मनमोकळ्या वागण्यानेआणिबोलण्याने धाकुटेपणाच्या जवळ आले. `उदंड साहित्य प्रेम’ हाच केवळ आम्हालाजोडणारा भावबंध. एरवी त्यांची साहित्य सेवाकिती प्रचंड. एक लेखक म्हणून, संपादक म्हणून, प्रकाशक म्हणून. मी तर अजून धुळाक्षरेच गिरवित होते.
पुढच्याच वर्षी मंगेशीला झालेल्या गोमंतकीय तिसर्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. संमेलनाला मला त्यांनी आवर्जून निमंत्रण दिले होते. संमेलनासाठी तिथे जमलेले गंगाधर गाडगीळ, जितेंद्र अभिषेकी, कृ. बा. निवुंâब अशा किती तरी मोठमोठ्या लोकांशी त्यांनी माझी ओळख`ही माझी मुलगी उज्ज्वला. कथा-कविता फार चांगल्या लिहिते’, अशी करून दिली. अनेक वर्षे शारदेची उपासना करणार्या या व्यक्तीने तितक्याच तोला-मोलाच्या महान व्यक्तींपुढे माझं कौतुक करावं, मला अगदी संकोचल्यासारखंच नव्हे, , तर ओशाळल्यासारखंही झालं. त्यांच्या एका गोवेकर मित्राने थट्टेने विचारले, `आम्हाला माहीत नसलेली ही मुलगी तुला झाली तरी केव्हा?’ ते सहजपणे म्हणाले, `गेल्या वर्षीच्या डिचोलीच्या साहित्य संमेलनात!’
मनात आलं, नातं जोडणं सोपं असतं, पण आपल्याला निभावणार आहे का ते? ज्या अभिमानाने त्यांनी माझी ओळख एक लेखिका म्हणून करून दिली, तो अभिमान सार्थ ठरेल, असं लेखन खरोखरच होणार आहे का आपल्या हातून?
बा. द. सातोस्करांशी मुलीचं नातं जोडल्यानंतर साहजिकच त्यांचा गोवा माझे`माहेर’ झाले. माझी मामेबहीण लताताई तर मडगावला होतीच होती. एके काळची माझी स्वप्नभूमी अशी माझं `माहेर’ बनली. माझ्या तापलेल्या, त्रासलेल्या मनाला गारवा देण्यासाठी या माहेराने आपलीहिरवी माया माझ्यासाठी पसरून ठेवली. गोव्यातील करंजाळे येथील दादांचे घर `स्वप्नगंध’ आणि घरातले दादा-आई जेव्हा आठवतात, तेव्हा तेव्हा विजय सुराणाच्या कवितेच्या ओळी अपरिहार्यपणे ओठांवर येतात,
‘असंमाहेर ग माझं, गाढ सुखाची सावली
क्षणभरी पहुडाया, अनंताने अंथरली. ’
अलिकडे गोव्याच्या प्रत्येक ट्रीपमध्ये गोव्याचं हिरवेपण कमी कमी होऊ लागलेलं जाणवतय. त्यातच नुकतीच अरुण हेबळेकरांची बहुदा, `रुद्रमुख’ ही कादंबरी वाचनात आली. कादंबरी वाचून झाली आणि मन अतिशय उदास, अस्वस्थ झालं. कादंबरी होती, गोव्यात वाढत जाणार्या प्रदूषणाविषयी. कादंबरी वाचली आणि जिवाचा थरकाप झाला. गोवा- माझं माहेघर, इथं मिळणारं क्षणाचं सुख, गारवा, डोळ्यांना लाभणारी तृप्ती, अनंत काळाच्या ताणाचा नि मनस्तापाचा त्याने विसर पडतो. मग संजीवनी मिळाल्यासारखं ताजं-तवानं, टवटवित होता येतं. मग वाटलं हे क्षणाचं सुख तरी आपल्याला अनंत काळ लाभणार आहे का? की तेही प्रदूषणाच्या धुक्याने वेढलेलं असेल.
आता इतक्यावर्षानंतर गोवा आता पहिल्यासारखा राहीला नाही, असे गोव्याचेच लोक म्हणताहेत. त्यात आता बा. द. सातोस्कर म्हणजे दादा राहिले नाहीत. माझ्या बहिणीने लताने ८-१० वर्षापूर्वी गोवा सोडून पुण्याला बिर्हाड केले. आता तर तीही तिथे उरली नाही. आता माझे गोव्याचे माहेर क्षणभरी पहुडायाही उरलेनाही.
(त्याने घाबरुन नेहाकडे पाहिलं आणि म्हणाला, ” डाॅक्टरांना पटकन फोन लाव. अण्णा…”
पुढे त्याला काही बोलता येईना.) – इथून पुढे
डाॅक्टर आले. अण्णा गेल्याचं निदान करुन गेले. शिरीष त्यांच्या पार्थिवाला कवटाळून हमसून हमसून रडू लागला. घरात शेजारपाजाऱ्यांची गर्दी जमली तसा शिरीष भानावर आला. त्याने बाहेर येऊन मोठ्या भावाला-निर्मलला फोन लावला.
” दादा अण्णा गेले”
“काय?असे कसे गेले?मागच्या आठवड्यात तर चांगले होते. मग अचानक असं कसं झालं?तू त्यांची व्यवस्थित काळजी घेत होतास ना?”
” अरे सकाळपर्यंत चांगले होते. माझ्या हातून पाणी प्यायले. नंतर अचानक काय झालं माहीत नाही. बरं तू लवकर ये मग सांगेन तुला सविस्तर”
“अरे बापरे, शिरीष, आम्हांला आज ट्रिपला जायचं होतं रे. आता निघणारच होतो. आता कॅन्सल करावं लागणार “
तेवढ्यात शोभा वहिनीने फोन घेतला
” शिरीष भाऊजी, अण्णांना बरं वाटत नव्हतं तर आम्हांला रात्रीच कळवायचं ना! आता आम्ही ट्रीपला जाण्यासाठी गाडी बोलावून ठेवलीये. तिचे पैसे आता कोण देणार?”
शिरीषला संताप आला पण तो शांत राहिला. वाद घालायची ही वेळ नव्हती. त्याने फोन बंद करुन मधला भाऊ-गुणवंतला फोन लावला. अण्णांची बातमी सांगितली
“अरे बापरे. मी आता जालन्यात आहे. मला यायला उशीर लागेल. पण तू रात्रीच मला का कळवलं नाहीस?”
“अरे, असं होईल याची मला पुसटशीही कल्पना नव्हती. तू लवकर ये मग मी तुला सगळं सांगतो”
” बरं. मी निघतोय आता इथून. अण्णांना स्मशानात न्यायची सगळी तयारी झाली की मला कळव. मग मी येतो “
शिरीषला गुणवंतच्या निर्लज्ज आणि कोडगेपणाची चीड आली. पण बोलण्यात अर्थ नव्हता. आपल्या भावांना तो चांगलाच ओळखत होता.
निर्मल लवकर आला खरा पण त्याने कोणत्याही कामाला हात लावला नाही. पाठीमागे हात बांधून तो शिरीषची होणारी धावपळ बघत राहिला. जणू अण्णा त्याचे कुणी लागत नव्हते. अण्णांना न्यायची वेळ झाली तरी गुणवंतचा पत्ता नव्हता. शेवटी शिरीषने त्याला फोन लावला तेव्हा तो म्हणाला
“अरे मी दोन तासापुर्वीच आलो. तुझ्याच फोनची वाट बघत होतो. झाली सगळी तयारी?बरं आलोच”
सगळेजण त्याची वाट पहात बसले. अर्ध्या तासाने एखाद्या परक्या माणसासारखा तो उगवला.
तेराव्या पर्यंतचे सगळे विधी आटोपले. आतापर्यंत शिरीषच्या दोन्ही भावांनी एक रुपयासुध्दा खर्च केला नव्हता. तेराव्याच्या जेवणाचा मोठा खर्चही शिरीषनेच सहन केला.
चौदाव्या दिवशी सगळे बसले असतांना निर्मलने विषय काढला
“अरे शिरीष अण्णांनी काही मृत्युपत्र करुन ठेवलं होतं का?नाही म्हणजे आता अण्णा गेले. त्यांच्या संपत्तीचे वाटेहिस्से नको का व्हायला?” हा विषय निघणार याची कल्पना शिरीषला होतीच पण तो इतक्या लवकर काढल्या जाईल अशी मात्र त्याला अपेक्षा नव्हती.
” दादा मला तरी मृत्युपत्राबद्दल काही माहीत नाही. आणि असंही तुम्ही रहाता तो बंगला, हा फ्लॅट आणि आपली मेडिकल एजन्सी याव्यतिरिक्त दुसरं काही असेल असं मला वाटत नाही “
“असं कसं म्हणता भाऊजी?त्यांची काही फिक्स्ड डिपाॅझिट्स असतील किंवा एखादा प्लाॅट वगैरे असेल तर आपल्याला माहीत नको?”शोभा वहिनी मध्येच बोलली
“हो शिरीष” गुणवंत म्हणाला” मरण्यापुर्वी त्यांनी तुला काही सांगितलं असेल तर आम्हाला स्पष्ट सांग किंवा त्यांचा एखादा वकील असेल तर त्याला फोन करुन बोलावून घे. म्हणजे पुढे आपल्यात वादविवाद नकोत “
” रणदिवे नावाचे वकील अण्णांचे मित्र होते ते बऱ्याचदा घरी यायचे. अण्णांच्या अंत्यविधीलाही ते हजर होते. त्यांना विचारायला हवं ” शिरीष आठवून म्हणाला
” अरे मग वाट कसली बघतोस?लाव त्यांना फोन ताबडतोब” दोघंही भाऊ एकदमच ओरडले.
शिरीषने डायरीतून वकीलाचा फोन नंबर शोधून त्यांना फोन लावला. त्यांच्याशी बोलून फोन ठेवत तो म्हणाला
” ते आपल्याकडेच यायला निघालेत. त्यांच्याकडे मृत्युपत्र आहे”
दोन्ही भाऊ आणि त्याच्या बायकांचे चेहरे प्रफुल्लित झाले.
वकीलसाहेब आले. सगळी मंडळी उत्सुकतेने त्यांच्याभोवती जमा झाली.
” मृत्युपत्रात खास काही सांगण्यासारखं नाही” वकीलसाहेबांनी मृत्युपत्र काढून वाचायला सुरुवात केली ” निर्मल आणि गुणवंत ज्या बंगल्यात रहातात तो बंगला त्यांच्याच नावे करण्यात आलाय. पुढेमागे निर्मल आणि गुणवंत यांचं पटलं नाही तर तो बंगला विकून आलेली रक्कम दोघांनी वाटून घ्यायची आहे. सध्या या बंगल्याची किंमत एक कोटी रुपये आहे. शिरीष ज्या फ्लॅटमध्ये रहातोय म्हणजे हाच फ्लॅट अण्णांनी शिरीषच्याच नावे केलाय. सध्याच्या घडीला या फ्लॅटची किंमत पस्तीस लाख आहे. तसंच मेडिकल एजन्सी ज्या जागेत आहे तीची बाजारभावाने किंमत पंचवीस लाख आहे तीसुध्दा शिरीषच्या नांवे करण्यात आली आहे”
” याचा अर्थ शिरीषला अण्णांनी दहा लाख जास्त दिले आहेत ” निर्मल अस्वस्थ होऊन रागाने म्हणाला.
वकीलसाहेबांनी त्याच्याकडे काही क्षण रागाने पाहिलं. मग म्हणाले ” अण्णांच्या तीस लाखाच्या मुदतठेवी तुम्ही दोघा भावांनी अण्णा आजारी असतांना मोडल्या. शिरीषला त्याबद्दल का सांगितलं नाही त्याचं स्पष्टीकरण द्या अगोदर”
निर्मल चपापला. त्याने घाबरुन गुणवंतकडे पाहिलं. गुणवंतने त्याला नजरेने शांत बसायची खुण केली.
“तुमच्या कौटुंबिक भानगडीत मला पडायचं नाहिये. नाहीतर तुमची एक एक प्रकरणं, भानगडी उकरुन काढायला मला वेळ लागणार नाही. मी तुमच्या वडिलांचा वकीलच नाही तर चांगला मित्र होतो हे ध्यानात ठेवा” वकीलसाहेब तीव्र स्वरात म्हणाले तशा दोन्ही भावांनी माना खाली घातल्या.
” बस एवढंच होतं मृत्युपत्र” वकीलसाहेबांनी ते शिरीषच्या हातात दिलं.
“पण वकीलसाहेब अजून काही प्राॅपर्टी नव्हती का अण्णांकडे?”गुणवंतने विचारलं
” ते मला कसं माहित असणार?तुम्ही शोधून काढा आणि मला सांगा. पण लक्षात ठेवा ते काही सापडलं तरी तुम्हांला सहजासहजी मिळणार नाही. कदाचित कोर्टाची पायरीही चढावी लागेल” गुणवंतच्या बोलण्यातला लोभीपणा ओळखून वकीलसाहेब म्हणाले.
वकीलसाहेब गेले. त्यांच्यापाठोपाठ निराश होऊन निर्मल, गुणवंत त्यांच्या बायकांसह निघून गेले.
” ते ठिक आहे हो. पण तुम्हांला नाही वाटत अण्णांनी आपल्याला त्यामानाने खुपच कमी दिलंय?”
” त्यामानाने म्हणजे?”
” म्हणजे आपण जे काही त्यांच्यासाठी केलं त्याचा खुपच कमी मोबदला त्यांनी आपल्याला दिलाय”
शिरीष हसला
“नेहा, अण्णांनी मला जन्म दिला, मला वाढवलं, शिकवलं, मोठं केलं, मेडीकल एजन्सी माझ्या नावावर केली. ह्याचा तर त्यांनी कधी मला मोबदला मागितला नाही”
“अहो मला तसं म्हणायचं नाहिये. तुमच्या दोन भावांच्या तुलनेत आपल्याला कमी दिलंय असं मला म्हणायचं होतं. विचार करा. तुमच्या भावांनी अण्णांसाठी काय केलं?
त्यांच्या तब्ब्येतीची कधी काळजी घेतली नाही. त्यामुळेच अण्णांना पॅरॅलिसीस झाला. पॅरॅलिसीस झाल्यावरही अण्णांना साधं सहा महिने त्यांनी घरात राहू दिलं नाही. लगेच आपल्या घरात आणून टाकलं. नंतरही कधी त्यांनी अण्णांच्या तब्येतीची साधी चौकशीही केली नाही. विचार करा…..
आप्पांविषयी माझ्या वडिलांना नुसताच आदर नव्हता तर त्यांच्यावर त्यांचे अलोट प्रेम होते. आप्पा म्हणजे माझ्या वडिलांसाठी ते त्यांच्या पित्यासमान होते. पप्पांनी त्यांच्या वडिलांना पाहिले सुद्धा नव्हते कारण ते जेमतेम चार महिन्याचे असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले.
आप्पा म्हणजे पप्पांच्या मावशीचे यजमान. पप्पांचे बालपण, कुमार वय घडवण्यात माझ्या आजीचा वाटा, तिचा त्याग, तिची तळमळ आणि केवळ मुलासाठी जगण्याचं तिचं एकमेव ध्येय हे तर अलौकिकच होतं. पण या सर्व बिकट वाटेवर माझ्या आजीला आप्पांनी खूप सहाय्य केलं होतं. अगदी निस्वार्थपणे. त्यांनीच आजीला शिवणाचे मशीन घेऊन दिले आणि तिच्या उदरनिर्वाहाची सोय करून दिली होती. शिवाय पप्पांचीही त्या त्या वेळची मानसिकता त्यांनी सांभाळली होती. बरंच व्यावहारिक, बाहेरच्या जगात वावरताना आवश्यक असणारं शिक्षण त्यांच्याकडूनच पप्पांनी घेतलं असावं. अगदी भाजीपाला, फळे, मटण, मासे यांची पारख कशी करावी इथपासून सहजपणे जाता जाता अप्पांनी त्यांना बरंच काही शिकवले होते. माय—लेकाच्या आयुष्यात कुठलंही लहान मोठं संकट उभं राहिलं की आप्पांचा त्यांना आधार असायचा.
आप्पा आणि गुलाबमावशीला चार मुलं. भाऊ, पपी, बाळू आणि एक मुलगी कुमुद आत्या. या परिवाराविषयी पप्पांना अपरंपार जिव्हाळा होता आणि तितकाच जिव्हाळा त्यांना सुद्धा पप्पांविषयी होता. पप्पा म्हणजे त्यांचा मोठा भाऊच होता. मोठ्या भावाविषयी असावा इतका आदर त्यांनाही पप्पांविषयी होता. पप्पांची तीच फॅमिली होती आणि पर्यायाने आमचीही. आमची एकमेकांमधली नाती प्रेमाची होती, रुजलेली होती, अतूट होती आणि आजही ती टिकून आहेत अगदी तिसऱ्या पिढीपर्यंत.
पप्पांच्या आयुष्यातले आप्पा आणि मी मोठी होत असताना पाहिलेले, अनुभवलेले अप्पा यांच्यात मात्र तशी खूप तफावत होती. माझ्या आठवणीतले आप्पा पन्नाशी साठीतले असतील. डोक्यावरचे गुळगुळीत टक्कल, अंगावर शुभ्र पांढरा सदरा पायजमा आणि दोन्ही खांद्यावर अडकवलेली शबनम पिशवी.. एखाद्या पुढार्यासारखेच ते मला कधी कधी वाटायचे. सकाळ संध्याकाळ ते घराबाहेर पडायचे. तसे ते निवृत्तच होते पण घरासाठी बाजारहाट ते करायचे, देवळात वगैरेही जायचे. त्यांचा थोडाफार मित्रपरिवारही असावा. संध्याकाळी मात्र ते ठाण्याच्या स्टेशन रोडवरच्या मराठी ग्रंथ संग्रहालयात जात आणि घरी येताना त्यांच्या शबनम पिशवीत निरनिराळ्या वर्तमानपत्राच्या घड्या आणत. ते नियमित पेपर वाचन करत आणि राजकारणावरच्या जोरदार चर्चा त्यांच्या घरी घडलेल्या मी ऐकल्या आहेत त्यात माझे पप्पाही असायचे.
मला आता नक्की आठवत नाही पण कुणा एका जिवलग मित्राला कर्ज घेताना त्यांनी गॅरंटी म्हणून सही दिली होती आणि त्यांच्या या जिवलग मित्राने बँकेचे कर्ज न फेडता गावातून गाशा गुंडाळला होता. तो चक्क बेपत्ता झाला आणि आप्पा गॅरेंटियर म्हणून बँक कर्ज वसुलीसाठी त्यांच्या मागे लागली. आप्पांची मालमत्ता म्हणजे त्यांचं राहतं घर… त्यावरही टाच आली. कर्जाची रक्कम तरी ही पूर्ण भरली गेली नसती तर आप्पांना अटकही होऊ शकत होती. पण अशा संकट समयी त्यांचे सुसंस्कारी आणि आप्पांविषयी आदर बाळगणारे त्यांचे जावई बाळासाहेब पोरे त्यांच्यापाठी खंबीरपणे उभे राहिले. आमच्या कुमुदात्यावर त्यांचं निस्सीम प्रेम होतं. तिच्या डोळ्यात साठलेल्या अश्रुंमुळेही ते भावुक झाले असावेत पण त्यांनी त्यांच्या जवळची सगळी पूंजी, स्वतःचे घर मोडून आप्पांसाठी बँकेतलं कर्ज फेडलं आणि या गंडांतरातून आप्पांना सहीसलामत मुक्त केलं. या बदल्यात बाळासाहेब, कुमुदआत्या आणि त्यांची तीन मुलं यांच्या राहण्याची व्यवस्था आप्पांनी त्यांच्याच घरातल्या माळ्याचे नूतनीकरण करून आणि तो माळा राहण्यायोग्य करून केली. कदाचित हा खर्चसुद्धा बाळासाहेबांनीच केला असावा. आता त्या घरात वरती कुमुदआत्याचा परिवार आणि खाली आप्पांचा परिवार असे एकत्र राहू लागले. अर्थात या सर्व प्रकरणात खरी गैरसोय सोसली ती बाळासाहेब आणि कुमुदआत्यांनी.. पण तरीही भावंडं, आई वडील यांच्यावरील प्रेमामुळे तसे सारेच आनंदाने राहत होते आणि या अखंड परिवाराला आमचाही परिवार जोडलेला होताच. आज जेव्हा मी या सर्वांचा विचार करताना माझ्या बालपणात जाते तेव्हा मला एक जाणवते की नाती का टिकतात? ती का बळकट राहतात ? असं कुठलं रसायन अशा नात्यांमध्ये असतं की जे अविनाशी असतं!
हीच नाती नंतरच्या काळात बदलत गेलेली मी पाहिली, पण आज मला फक्त याच टप्प्यापर्यंत जाणवलेलं तुम्हाला सांगायचं आहे आणि जेव्हा या परिवाराच्या चौकटीतल्या, जरी सुखी असलेली ही चौकट असली तरीही तिच्या केंद्रबिंदूविषयीचा विचार करताना, अर्थात या केंद्रबिंदूशी आप्पांची मूर्ती असायची आणि असं वाटायचं आज जे काही चित्र आहे ते केवळ आप्पांमुळे. हे वेगळं असू शकलं असतं. पहिला प्रश्न माझ्या मनात यायचा की पप्पांना व्यवहाराचे धडे देणारे आप्पा असे फसवणुकीच्या जाळ्यात अडकलेच कसे आणि कुठेतरी मला असंही वाटायचं आप्पांच्या मनात अपराधीपणाचा लवलेशही नव्हता. त्यांची नोकरीही टिकली नव्हती तरी त्यांचं घरातलं बोलणं, वागणं रुबाबदारच असायचं. त्यांच्यामुळे त्यांच्या थोरल्या मुलाला— भाऊला पुढे शिकता आलं नाही. मिळेल ती नोकरी पत्करून लहान भावंडांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी, आई-वडिलांच्या संसाराला हातभार लावण्याची जबाबदारी त्याला उचलावी लागली होती आणि कदाचित परिवारामध्ये जे पुढे कलह निर्माण झाले त्याची कुठेतरी बीजं इथेच रोवली गेली असावीत.
बाळासाहेब आणि कुमुदआत्यांनी तर स्वतःच्या संसाराला मुरड घालून आप्पांना वेळोवेळी मदत केली पण आप्पांनी कधीच कुठल्याही प्रकारचं अपराधीपण स्वतःवर पांघरून घेतलंच नाही. किती गमतीशीर असतं हे जीवन!
माझ्या आठवणीले आप्पा हे असे पुढचे होते म्हणून त्यांच्याविषयी माझ्या मनात थोडा राग होता. मला ते दुसर्यांच्या जीवावर आरामशीर जगणारे वाटायचे. पण याच आप्पांनी माझ्या आजीला आणि वडिलांना मायेचा आधार दिला होता, त्याची नोंद मी का ठेवू शकत नव्हते? उपकारकर्त्या आप्पांची प्रतिमा माझ्या मनात निर्माण होत नव्हती. त्यावेळी मी पप्पांना आवडणार नाही म्हणून माझा आप्पांविषयी असलेला एक वेगळाच सुप्त राग कधी उघड करू शकले नाही.
आप्पा ही व्यक्ती मला फारशी नाही आवडायची. शिवाय तो राग कधीही निवळला नाही त्याला आणखी एक कारण होतं, ते म्हणजे माझ्या आठवणीत ते गुलाबमावशीशी म्हणजे त्यांच्या पत्नीशी कधीही चांगले प्रेमाने, आदराने, वागले नाहीत. गुलाबमावशी मला फार आवडायची……. गोरीपान, ठुसका थुलथुलीत बांधा, गळ्यातलं ठसठशीत मंगळसूत्र आणि कपाळावरचं गोल कुंकू, गुडघ्यापर्यंत अंगावर कसंतरी गुंडाळलेलं सैलसर काष्टा असलेलं नऊवारी लुगडं पण तरीही ती सुंदरच दिसायची आणि अशी ही गुलाबमावशी मला फार आवडायची. ती माझ्या आजीइतकी हुशार नव्हती, भोळसट, भाबडी होती, तिचं बोलणंही खूप वेळा गमतीदारच असायचं. तिला नक्की काय म्हणायचं ते कळायचे नाही. आणि हो ती अत्यंत सुंदर स्वयंपाक करायची.
आमची शाळा त्यांच्या घरापासून जवळ असल्यामुळे शाळा सुटल्यावर मी खूप वेळा गुलाबमावशीकडे जायची. मला खूप भूक लागलेली असायची. मग ती डब्यातली सकाळची नरम पोळी, आणि वालाचं बिरडं किंवा कुठलीतरी भाजी, तिने केलेलं कैरीचं लोणचं ताटलीत वाढायची. अमृताची चव असायची त्या अन्नाला. पैशाची इतकी ओढाताण असलेल्या कुटुंबातही ती जे घरात उरलं सुरलं असेल त्यातून चविष्ट पदार्थ रांधून सगळ्यांना पोटभर खायला द्यायची मग तिला अन्नपूर्णा का नाही म्हणायचे? आणि अशा या भाबड्या अन्नपूर्णेवर आप्पा पुरुषी हक्काने, मिजासखोर नवरेगिरी करायचे. सतत तिला हुडुत हुडुत करायचे. कुणाही समोर तिचा अपमान करायचे. ती जर काही आपली मतं मांडू लागली तर तिची अक्कल काढायचे आणि तिला जागच्या जागी गप्प बसवायचे. त्यावेळी मला ती गुलाबमावशी नव्हे तर गुलाममावशी भासायची. तिच्या अशा अनेक उतरलेल्या चर्या माझ्या मनात आजही वस्ती करून आहेत. कुणीच का आप्पांना रोखत नाही असे तेव्हा मला वाटायचे आणि आज वाटते की “मी पण का नाही गुलाब मावशीची बाजू घेऊन आप्पांना कधीच बोलले नाही?” केवळ लहान होते म्हणून? पप्पाच सांगायचे ना, ” जिथे चूक तिथे राहू नये मूक”.
पप्पांचे आप्पांइतकेच गुलाबमावशी वर प्रेम होतं. मग त्यांनीही आप्पांना कधीच का नाही त्यांच्या या वागण्याविषयी नापसंती दर्शविली? या कुठल्याही प्रश्नांची उत्तर मला तेव्हा आणि नंतरही कधीच मिळाली नाहीत. पण ही न मिळालेली उत्तरं शोधणं हा एक प्रकारे माझ्या जडणघडणीचा भाग ठरत होता.
गुलाबमावशी आमच्या घरी यायची तेव्हा आजीजवळ मन मोकळं करायची. आजीही बहिणीच्या मायेने तिची आसवं पुसायची. आप्पांचे उपकार जाणून ती आप्पांविषयी गैर बोलू शकली नसेल पण गुलाबमावशीला धीर द्यायची. कधी बोचक्यात तांदूळ बांधून द्यायची. तिच्या आवडीचा गोड मिट्ट चहा द्यायची. आमच्या घरातल्या मधल्या खोलीत चाललेलं या दोन वृद्ध बहिणींचं मायेचं बोलणं आजही माझ्या मनाला चरे पाडतं.
पण त्यावेळी मुलगी म्हणून जगत असताना मी मात्र मनाशी एक ठरवलं होतं, “आयुष्यात आपली कधीही गुलाबमावशी होऊ द्यायची नाही. जगायचं ते सन्मानानेच, स्वत:चा स्वाभिमान, स्वत्व आणि ओळख ठेऊनच.
एक म्हातारा मीठवाला यायचा. त्याचे ‘मीऽऽठ’ हे शब्द इतके हळू असायचे की कोणालाच ते ऐकू जायचे नाहीत. पण त्याची येण्याची वेळ ठरलेली होती. सकाळी अकराची त्याची वेळ कधी चुकली नाही. त्यामुळे त्या वेळात लोक त्याला बघायचे आणि हाक मारायचे. त्याच्या मोठ्या टोपलीत पुठ्ठ्याने दोन भाग केलेले असत. एका भागात खडे मीठ आणि दुसऱ्यात बारीक मीठ. त्याच्याकडे मीठ मोजून द्यायचं मापच नव्हतं. आपण जी बरणी समोर ठेवू ती गच्च भरून तो मीठ द्यायचा आणि बरणीचा आकार बघून पैसे सांगायचा. गिऱ्हाईकांनाही त्यात काही गैर वाटायचं नाही. तो सांगेल ते पैसे लोक देत असत. तोही अवास्तव पैसे सांगत नसे.
एखाद्याने जर सांगितलं की मला अर्धीच बरणी मीठ हवं आहे तरी तो बरणी गच्च भरूनच मीठ द्यायचा. “अरे, अर्धी बरणी सांगितली होती, ” असं म्हटलं तर म्हणायचा, “मला कुणाची बरणी रिकामी ठेवलेली आवडत नाही. मग आपल्याला आयुष्यात अर्धंच सुख मिळतं. तुम्ही पैसे अर्ध्या बरणीचेच द्या. ”
तो खरंच ह्या भावनेने बरणी भरत होता का त्याला माहित होतं की बरणीभर मीठ घेतल्यावर कुणीच अर्ध्या बरणीचे पैसे देत नसत. पुरे पैसेच देत. त्यामुळे त्याच्या वृत्तीचा अंदाज लागत नसे. पण मिठासारखी जेवणातली सर्वात महत्त्वाची जेवणाला चव देणारी गोष्ट तो आम्हाला घरबसल्या मोठ्या आपुलकीने पुरवत होता हे नक्की.
* * * *
हातगाडीवर केळ्यांचे खूप घड रचून एक केळीवाला यायचा. हिरवी आणि वेलची अशी दोन्ही केळी असायची. अजिबात ओरडायचा नाही. कॉलनीत आला की एका इमारतीच्या सावलीत गाडी उभी करायचा आणि दोन्ही हातात मावतील तेवढी पाच-सहा डझन केळी घेऊन प्रत्येक इमारतीच्या पाचही मजल्यांवर फिरायचा. मजल्यावर गेल्यावर ‘केऽऽळीवाला’ अशी हाक द्यायचा. दाराशी केळी आल्यामुळे खूप जण केळी घ्यायचे. खूप खप व्हायचा. तो असा फिरत असताना गाडीची राखण करायला कुणीही नसायचं. ती बेवारशीच उभी असायची. पण केळीवाल्याला त्याची काळजी नसायची.
मी एकदा त्याला म्हटलं, “ गाडी अशी इथे टाकून जातोस. दोन-चार डझन केळी जर कुणी चोरली तर तुला कळणारही नाही. ”
तो म्हणाला, “नाही ताई. ह्या कॉलनीत कुणी केळी चोरणार नाही ह्याचा मला विश्वास आहे. फुकट कोणी केळी उचलणार नाही. आम्ही पण माणसं ओळखतो. आणि ताई, कुणी उचललीच तर तो वरचा बघतो आहे. तो चोरणाऱ्याला ती पचून देणार नाही. ” देवावरची श्रद्धा आणि माणसांच्या चांगुलपणावर विश्वास, ह्यावर त्यावेळी व्यवसाय चालत होते. विकणारा आणि विकत घेणारा ह्या दोघांची मनं स्वच्छ होती बहुतेक.
* * * *
फुलांची मोठ्ठी टोपली डोक्यावर घेऊन फुलवाला यायचा. मोगरा, जाई, सायली अशी हाराला उपयोगी पडणारी फुलं तो प्लॅस्टिकच्या पिशवीत वेगवेगळी बांधून आणायचा. खूप लोक हारासाठी ती सुटी फुलं घ्यायचे. बाकी सर्व टोपली लांब देठांच्या, विविध रंगांच्या, विविध जातींच्या, विविध आकारांच्या फुलांनी भरलेली असायची. त्याला फुलांचा बुके बनवता यायचा नाही पण आपल्याला हवी ती आणि परवडतील ती फुलं त्याला निवडून दिली की तो टोपलीच्या तळाशी ठेवलेली पानं बाहेर काढायचा आणि त्या निवडलेल्या फुलांची सुंदर रंगसंगती साधून ती पानं लावून, दोऱ्याने बांधून सुबक गुच्छ तयार करायचा. फुलदाणीत तो गुच्छ फार छान दिसायचा. घरी आलेला प्रत्येक जण त्या गुच्छाचं कौतुक करायचा.
मी त्याला म्हटलं, “असं उन्हातान्हात दारोदार फिरण्यापेक्षा तू दुकान का टाकत नाहीस?”
तो म्हणाला, “ताई, दुकानाची फार कटकट असते. त्याचं भाडं मला परवडत नाही. म्युन्सिपाल्टीचे वेगवेगळे नियम पाळावे लागतात. हप्तेही वसूल केले जातात. ते झंझट मागे लागण्यापेक्षा मला हेच बरं वाटतं. दाराशी येत असल्यामुळे गिऱ्हाईकं खूप मिळतात. दगदग होते पण धंदा बरा होतो. खूप ओळखीही होतात. माणसं जोडली जातात. मध्यंतरी माझ्या मुलीचं ऑपरेशन होतं तेव्हा कॉलनीतीलच लोकांनी मला पैशांची मदत केली. मी पैसे बुडवणार नाही हा त्यांना विश्वास होता. दुकानावर गिऱ्हाईकांशी इतकी जवळीक होत नाही. ”
प्रत्येकाचं धंद्याचं गणित वेगळं असलं तरी एकमेकांवरचा विश्वास हेच त्यामागचं खरं सूत्र होतं.
* * * *
आंब्याच्या दिवसांत पाट्या घेऊन चार-पाच आंबेवाले यायचे. पण रघु पाट्या घेऊन येईल त्या दिवशी ते धंदा न करता सरळ बाहेर पडायचे. ह्याचं कारण म्हणजे रघु इतरांपेक्षा स्वस्त आंबे द्यायचा. त्यामुळे तो येईल त्या दिवशी इतरांचा धंदा होत नसे. रघु पोरसवदा आणि अगदी काटकुळा होता. तो येईल तेव्हा पाच पाट्या घेऊन यायचा. झाडाच्या सावलीत पण वॉचमनच्या जवळपास पाट्या ठेवायचा आणि एक पाटी घेऊन इमारतीत शिरायचा. बहुतेक वेळा त्याला त्यापूर्वीच एखाद्या ब्लॉकमधून हाक यायची. तो तिथे हमखास पाटी विकूनच यायचा.
त्याचे आंबे बाजारभावापेक्षा स्वस्त असायचे. तरी त्याच्याशी खूप घासाघीस करावी लागायची. तो पाटीचे तीनशे रुपये म्हणाला की माहितगार गिऱ्हाईक दीडशे म्हणायचा. मग तो खूप वेळ आपले आंबे कसे चांगले आहेत आणि भावही कसा रास्त आहे त्याचं वर्णन करायचा. शेवटी दोनशेला सौदा ठरायचा. तो भाव अर्थातच बाहेरपेक्षा स्वस्तच असायचा. आंबेही चांगले असायचे. दोन-तीन तासांत त्याच्या पाचही पेट्या संपायच्या, मग आठवडाभर तो दिसायचा नाही.
“बाजारभावापेक्षा स्वस्त आंबे तू कसे विकतोस? तुझं नुकसान होत नाही का?” शेजारणीने एकदा त्याला विचारलं.
तो म्हणाला, “ताई, कोकणात आमच्या आंब्याच्या बागा आहेत. आम्ही आंबा विकत घेऊन विकत नाही. मोठा धंदा आहे आमचा. क्रॉफर्ड मार्केटमध्ये दुकान आहे. मी हाच धंदा पुढे करणार आहे. पण वडील म्हणतात एकदम गल्ल्यावर नाही बसायचं. धंद्याची गणितं स्वतः शिकायची. गिऱ्हाईकांना कसं पटवायचं, माणूस कसा ओळखायचा, मेहनत कशी करायची हे शिकत मग धंद्यात यायचं. वडील मला पाच पेट्या देतात. घरोघरी जाऊन विकायला सांगतात आणि येणारे पैसे तूच घे सांगतात. मला घरचा खर्च नसल्याने तेवढे पैसे मला पुरतात पण धंद्याची गणितंही कळतात. दोन वर्षांनी वडील मला स्वतंत्र गाळा घेऊन देणार आहेत. मग मला माझा वेगळा धंदा सुरु करता येईल.”
खरंच धंद्याची गणितंच वेगळी असतात. ‘वेष बावळा तरी अंतरी नाना कळा’ असा तो आंबेवाला होता.
* * * *
जस्ताची भली मोठी पेटी घेऊन खारी बिस्कीटवाला यायचा. त्याच्या ह्या मोठ्या पेटीत अनेक चौकोनी भाग होते. ते सगळे वेगवेगळ्या प्रकारच्या बिस्किटांनी भरलेले असत. ही बिस्किटं स्वस्त आणि वजनाला हलकी असल्याने भरपूर यायची. त्यामुळे बिस्कीटवाला आला की मुलं एकदम खूश असत. तो माणूस अगदी म्हातारा आणि अशक्त होता पण जिद्दीने कॉलनीभर फिरून पेटी रिकामी करूनच परत जायचा.
“दादा, एवढी पेटी घेऊन दारोदार फिरण्यापेक्षा एक बेकरी का उघडत नाही? थोडं कर्ज काढायचं आणि बेकरी सुरु झाल्यावर हळूहळू फेडायचं, ” मी सहज एकदा म्हटलं.
“कर्ज?” तो एकदम उसळून म्हणाला. “ताई जमिनीच्या तुकड्यासाठी माझ्या बापाने कर्ज काढलं आणि अचानक तो दगावला. कर्ज माझ्या डोक्यावर आलं. उमेदीची सारी वर्षं कर्ज आणि संसार ह्या दोन्हींच्या ओढाताणीत संपली. कर्ज फिटल्यावर कळलं तो सारा लबाडीचा मामला होता. ती जमीनही हातात आली नाही. आम्ही सारेच अशिक्षित. म्हणून ठरवलं, मुलांना शिकवायचं. जाताना त्यांच्यासाठी पैसा नाही ठेवून जाणार पण कर्जही नाही ठेवून जाणार. बेकरी टाकली तर मुलांना हाच व्यवसाय पुढे करावा लागेल. ते बंधनही मी ठेवणार नाही. त्यांना हवं ते त्यांनी त्यांच्या मनाने स्वतंत्रपणे करावं. मनासारखं आयुष्य जगावं. माझ्यासारखं आधीची ओझी उचलत जगायला नको. ”
मी थक्क झाले. आयुष्यात एवढं सोसलेल्या माणसाशी आपण मात्र तो पाच रुपये म्हणाला तर चार रुपयांना दे म्हणून घासाघीस करत राहतो. अशिक्षित असूनही मुलांच्या भविष्याचा त्याने एवढा विचार केला होता. रोज पाहत असलेल्या त्या माणसात मला वेगळाच माणूस दिसू लागला.
लेखिका : अज्ञात
प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈