हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री ओमप्रकाश जी का साहित्य #196 – बाल साहित्य – आत्मकथा– हवाई जहाज का जन्म ☆ श्री ओमप्रकाश क्षत्रिय ‘प्रकाश’ ☆

श्री ओमप्रकाश क्षत्रिय “प्रकाश”

(सुप्रसिद्ध साहित्यकार श्री ओमप्रकाश क्षत्रिय “प्रकाश” जी का  हिन्दी बाल -साहित्य  एवं  हिन्दी साहित्य  की अन्य विधाओं में विशिष्ट योगदान हैं। साप्ताहिक स्तम्भ “श्री ओमप्रकाश जी का साहित्य”  के अंतर्गत उनकी मानवीय दृष्टिकोण से परिपूर्ण लघुकथाएं आप प्रत्येक गुरुवार को पढ़ सकते हैं। आज प्रस्तुत है आपका बाल साहित्य व्यंग्य आत्मकथा– हवाई जहाज का जन्म )

☆ साप्ताहिक स्तम्भ – श्री ओमप्रकाश जी का साहित्य # 196 ☆

☆ बाल साहित्य – आत्मकथा– हवाई जहाज का जन्म ☆ श्री ओमप्रकाश क्षत्रिय ‘प्रकाश’ 

मेरा जन्म 1900 की शुरुआत में ओहियो के डेटन में एक छोटे से वर्कशॉप में हुआ था। मेरे निर्माता ऑरविल और विल्बर राइट नाम के दो भाई थे। वे पक्षी की उड़ान से प्रेरित थे। वे कई वर्षों से मेरे डिजाइन पर काम कर रहे थे।

मैं एक बहुत ही साधारण मशीन था। मेरे पास दो पंख थे, एक प्रोपेलर और एक छोटा इंजन। लेकिन मैं भी बहुत नवीन था। मैं पहला हवाई जहाज था जो कुछ सेकंड से अधिक समय तक उड़ान भरने में सक्षम था।

17 दिसंबर, 1903 को मैंने अपनी पहली उड़ान भरी। मैं ऑरविल के नियंत्रण में था। विल्बर मेरे साथ दौड़ रहा था। वह एक रस्सी पकड़े था। मैंने 12 सेकंड के लिए उड़ान भरी। 120 फीट की यात्रा की। यह एक छोटी उड़ान थी, लेकिन यह एक ऐतिहासिक थी।

मेरी उड़ान ने साबित कर दिया कि इंसान उड़ सकता है। इसने अन्य अन्वेषकों को नए और बेहतर हवाई जहाज बनाने के लिए प्रेरित किया। और इसने दुनिया को हमेशा के लिए बदल दिया।

मैं अब 100 से अधिक वर्षों से उड़ रहा हूं। मैंने उस समय में काफी बदलाव देखे हैं। हवाई जहाज बड़े और तेज हो गए हैं। वे ऊंची और दूर तक उड़ सकते हैं। वे अधिक लोगों को ले जा सकते हैं।

लेकिन एक चीज नहीं बदली है: मैं अभी भी दुनिया की सबसे आश्चर्यजनक मशीन हूं। मैं लोगों को नई जगहों और नए अनुभवों के साथ ले जा सकता हूं। मैं लोगों को एक-दूसरे से और उनके आसपास की दुनिया से जुड़ने में मदद कर सकता हूं। मैं दुनिया को एक छोटी जगह बना दिया है।

मुझे मेरे हवाई जहाज होने पर गर्व है। लोगों को यात्रा करने और अन्वेषण करने में मदद करने पर मुझे प्रसन्न्ता होती है। मुझे मेरी प्यारी दुनिया के भ्रमण करने पर गर्व है।

© श्री ओमप्रकाश क्षत्रिय “प्रकाश”

24-05-2023

संपर्क – 14/198, नई आबादी, गार्डन के सामने, सामुदायिक भवन के पीछे, रतनगढ़, जिला- नीमच (मध्य प्रदेश) पिनकोड-458226

ईमेल  – [email protected] मोबाइल – 9424079675 /8827985775

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ .. भारूड… ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆

प्रा. सौ. सुमती पवार

? कवितेचा उत्सव ?

.. भारूड… ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆

मी अनरसे तळते बाई..

मी चकल्या पाडते बाई…

लई जाळीदार अनरसे त्यावर खसखस पेरली

अन् माझ्या नंदेने ती खसखस नेमकी हेरली..

अगंऽऽऽ नको खाऊ म्हंनलं, पन ऐकती कुठं

खसखसनं घेरली तिला न मंग मळमळ सुटं…मी….

*

चकलीची भाजणी लई खमंग लई चटकदार

काटेरी मसालेदार चकली लई लई काटेदार

ववा नि तीळ घातला पोट दुखू नये म्हनून

पनं ऐकती कुठं खाल्या की खनून खनून….

मंग व्हायचं तेच झालं की.. पळतीया परसदारी…

वळखा तुमीच काय म्हनून…?. मी

*

लाडूचा घेतलाय धसका तिनं आता नग नग म्हनती

पन दिसतांच गळतीया लाळ नि चार चार हानती

पोटातं बसलेत गच्च नि तळमळतोय आता जीव

अन् तिच्याकडं पाहून मलाच भरलंय् आता हिवं

काय करू बाई मी कसं ग करू..

ह्या नंदेचं त्वांड मी कसं ग धरू..

*

मी सांगते, सुमती पवार,

अन्न लोकांचं असलं तरी, पोट लोकाचं नाही…

बाई.. बाई. पोट सांभाळून खाल्लं पाहिजे की नाही…? नाही, विचार करून खाल्लं नाही तर… ? असे पोटाचे हाल, होतात बाई…

मी अनरसे तळते बाई… मी चकल्या पाडते बाई…

© प्रा.सौ.सुमती पवार 

 नाशिक

(९७६३६०५६४२)

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ दूर तरी दूर तरी… जवळ ☆ श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ दूर तरी दूर तरी… जवळ ☆ श्री अनिल वामोरकर ☆

दूर तू तेथे

मी मात्र येथे

तरी मी आत्मानंदात

डुंबतो येथे…

 

जाग येताच

मनोमनी घालीतो दंडवत,

चरणस्पर्ष करून

दिनक्रमाची करितो सुरवात…

 

कर्म ते आवश्यक

करीतो कृष्णार्पण

फलापेक्षा नच मज

सद्गुरू करी पाठराखण…

 

क्षण न ऐसा एक

विस्मरण ते सदगुरुंचे

देहभान विसरून

गातो स्तवन तयांचे..

 

अष्टौप्रहर मी

मानस सानिध्यात

सांगा बरं मी

दूर दूर कसा?

© श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ३५ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ३५ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- आम्ही बाबांजवळ पोचण्यापूर्वीच बाबांनी अखेरचा श्वास घेतला होता… ! आम्ही त्यांच्यापासून एका श्वासाच्या अंतरावरच उभे तरीही त्यांच्यापासून लाखो योजने दूरसुद्धा… !!

बाबांचं असं अनपेक्षित जाणं पुढे येणाऱ्या अतर्क्य अनुभवांना निमित्त ठरणार होतं! )

 बाबांचं असं अनपेक्षित जाणं माझं भावविश्व उध्वस्त करून गेलं होतं. मी अगदी हताश, हतबल होऊन त्यांचे दिवस होईपर्यंत आई व भावंडांबरोबर असूनही स्वतःच्याच दुःखात रुतून बसलो होतो. माझ्याही नकळत्या वयापासून वर्षानुवर्षे साठत गेलेल्या बाबांच्या कितीतरी आठवणी मनात गर्दी करीत रहायच्या ! त्या आठवणींमधेच मी गुंतून पडायचो. गप्पगप्प रहायचो.

 बाबांच्या व्यक्तिमत्त्वातल्या अगदी साध्या साध्या गोष्टी पण ते गेल्यावर मात्र त्यांचं महत्त्व आणि मोल आत्ता खऱ्या अर्थानं जाणवतंय असंच वाटत रहायचं. त्या आठवणींमधली बाबांची कितीतरी रूपं! सगळीच आज हरवून गेलेली तरीही हवीहवीशी!! प्रतिकूल परिस्थितीतही कधी हतबल न होणारे, दत्त महाराजांवर अतिशय निखळ, दृढ श्रद्धा असणारे आणि अखेरच्या श्वासापर्यंत ती जपणारे, आर्थिक ओढग्रस्तीतही समाधानाने रहाणारे, जांभळाच्या झाडाचं लाकूड ठिसूळ असतं, आम्ही पडून इजा करुन घेऊ नये म्हणून काळजीपोटी आम्हाला कधीच दारातल्या जांभळाच्या झाडावर चढू न देता स्वतःचा जीव धोक्यात घालून, आमच्यासाठी रोज स्वत: झाडावर चढून आम्हाला ताजी टपोरी जांभळं काढून देणारे, आर्थिक ओढग्रस्तीमुळे आमचे अगदी साधे बालहट्टही बऱ्याचदा पुरे करता यायचे नाहीत तेव्हा त्यांच्या नजरेत भरून राहिलेली दुखरी खंत केविलवाणं हसत लपवायचा प्रयत्न करणारे… अशी बाबांची कितीतरी रूपं!

 बाबा कधीच आमच्यावर हात उगारणं सोडाच आम्हाला रागवायचेही नाहीत. कधीतरी अतीच झालं तर चिडून आईच आम्हाला धपाटा घालायला यायची तेव्हाही, ” मारु नकोस गं.. लहान आहेत ती.. ” म्हणत आमची सुटका करायचे.. !

 आम्हा सर्वच भावंडांवर त्यांचं प्रेम, माया होतीच पण त्याबाबतीत त्यांच्याकडून प्रत्येक वेळी झुकतं माप मिळत गेलं होतं ते मलाच. माझं काही खास कर्तृत्त्व होतं असं नाही, पण लहान वयात दोन इयत्ता एकदम करून मी माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठ्या असणाऱ्या माझ्या भावाबरोबर तिसरीत शाळेत जाऊ लागलो याचंच त्यांना अप्रूप वाटायचं. माझ्यापेक्षा तो अभ्यासात कितीतरी पटीने हुशार. त्यामुळेच परीक्षेत माझ्यापेक्षा कितीतरी जास्त मार्क मिळवून तो नेहमी नंबरात असायचा. त्याला शाबासकी मिळायची पण जवळ घेऊन कौतुक मात्र माझंच व्हायचं. बाबा गेल्यानंतर हे सगळं आठवायचं तेव्हा मात्र एक वेगळीच रुखरुख मन कुरतडू लागायची. बाबांकडून लहानपणापासून असं उदंड प्रेम, माया मिळवूनही त्यांची सेवा करणं मात्र माझ्या नशिबात नव्हतं. बाबांचं आजारपण सुरू झाल्यापासून मी नोकरी निमित्ताने कायम त्यांच्यापासून दूर तिकडे मुंबईत. आई आणि माझे दोन्ही भाऊ यांनी बाबांच्या संपूर्ण आजारपणात त्यांची अतिशय प्रेमाने, मनापासून सेवा केली पण मला मात्र ते समाधान मिळालं नाही याचं दुःख मनात घर करुन राहिलेलं! बाबांचे दिवस होईपर्यंतच्या प्रत्येक क्षणी मला ते त्रास देत राहिलं होतंच आणि पुढंही दीर्घकाळ मनात रुतून बसलं होतं. त्या विचारात लपलेली माझ्या मनातली अस्वस्थता बाबांच्या पर्यंत मी न सांगता अलगद जाऊन पोचलेली होती याचा प्रत्यय देणाऱ्या घटना पुढे माझ्या आयुष्यात जेव्हा घडल्या तेव्हा मृत्यू आणि पुनर्जन्मामागच्या गूढ रहस्याची दारं थोडीतरी किलकिली झाली पण ते सगळं मधे बरीच वर्षे उलटून गेल्यानंतर! पण त्याही आधी बाबा गेल्याच्या आम्हा सर्वांच्याच मनातल्या दुःखावर हळुवार फुंकर घालून ते दु:ख हलकं करु पहाणारी एक घटना माझ्या मोठ्या भावाच्या संदर्भात घडली तीही आश्चर्याने थक्क व्हावं अशीच होती. आमचं समाधान करता करता बरंच कांही हातचं राखून ठेवणारी आणि म्हणूनच अनाकलनीय वाटावी अशीच ती घटना होती!

 ती घटना अतुलच्या, माझ्या पुतण्याच्या तान्हेपणीची. बाबा सप्टेंबर १९७३ मधे गेले. त्यानंतर वर्षाच्या आत भावाचं लग्न करायला हवं म्हणून आमच्या जवळच्या नातेवाईकांनी त्याच्यासाठी वधुसंशोधन सुरु केलेलं. योगच असे जुळून आले की बाबा जाऊन वर्ष व्हायच्या आत मे १९७४ मधे भावाचं लग्नही झालं. अतुलचा म्हणजे माझ्या पुतण्याचा जन्म १९७५ मधला. जन्मतः तो अतिशय चांगला, तब्येतीने छान, सुदृढ होता. काळजी वाटावी असं कांही नव्हतंच. पण बाळंतपणानंतर तो तीन महिन्याचा झाल्यावर वहिनी त्याला घेऊन इस्लामपूरला परत आल्या आणि अचानक कधी कल्पनाही केली नव्हती असं विपरीत घडलं. तोवर एरवी अगदी शांत, लाघवी असणारं बाळ दिवसभर अगदी आनंदी, खेळकर असायचं पण तिन्हीसांजेला मात्र कर्कश्श रडू लागायचं. कितीही थोपटलं, जोजवलं, शांत करायचा प्रयत्न केला तरी त्याचं रडणं थांबायचंच नाही. खूप रडून थकल्यानंतर भुकेल्या अवस्थेतच मलूल होऊन झोपून जायचं. दुसऱ्या दिवशीही असंच घडलं. वरवर लक्षात येईल अशी कांहीच लक्षणं जाणवली नाहीत आणि आजीच्या बटव्यातल्या औषधाचाही काही उपयोग झाला नाही तेव्हा मात्र तातडीने त्याला ओळखीच्या डॉक्टरांकडे नेलं. त्यांनी बाळाला तपासलं. सगळंच तर व्यवस्थित होतं. ‘एकदम वातावरण बदलल्यामुळं रडत असेल. काळजी करण्यासारखं कांहीही कारण नाही’ एवढा दिलासा डॉक्टरांनी दिला तेव्हा मनातली भीती काही अंशी कमी झाली खरी पण तिसऱ्या दिवशी संध्याकाळीही अंधार पडू लागताच बाळ रडू लागलं तसा मात्र सगळ्यांचाच जीव टांगणीला लागला. तो गुरुवार होता. आई देवापुढे दिवा लावत होती. तिने घाईघाईने दिवा लावून देवाला मनोभावे नमस्कार केला. तिच्या काय मनात आलं कुणास ठाऊक. ती जागची उठली. बाहेर येऊन तिने वहिनींकडून बाळाला घेतलं. मांडीवर घेऊन त्याला थोपटत शांत करायचा प्रयत्न करत असतानाच तिने भावाला जवळ बोलावलं. म्हणाली, “हे बघ, मी देवापुढं दिवा लावून आलीय. आज गुरुवार आहे. तू आत जाऊन देवाला हात जोडून प्रार्थना कर, डबीतला चिमूटभर अंगारा हातात घे आणि यांचं स्मरण करुन त्यांना सांग, म्हणावं, ‘आम्ही तुम्हाला विसरलेलो नाही आहोत. आणि कधी विसरणारही नाही. ‘ आणि बाळाला तो अंगारा लाव. यापेक्षा आत्ता याक्षणी बाकी आपल्या हातात कांहीही नाहीय. “

 बाळाचं रडणं सुरूच होतं. भाऊ लगोलग जागचा उठला. आत गेला. देवाला प्रार्थना करून, बाबांचं स्मरण करून, त्यांने बाळाला अंगारा लावला आणि क्षणार्धात हळुहळू शांत होत बाळाचं रडणं कमी होत गेलं. हात-पाय हलवत इकडं तिकडं पहात बाळ आपली

बाळमूठ चोखत अलगद डोळे मिटत झोपून गेलं!

 घडल्या गोष्टीचं आश्चर्य करीत सर्वांनी त्या रात्री अंथरुणाला पाठ टेकली खरी पण त्या आश्चर्याइतकंच दुसऱ्या दिवशी संध्याकाळी काय घडतंय त्याचं नाही म्ह़टलं तरी थोडं दडपण प्रत्येकाच्या मनावर होतंच.

 दुसऱ्या दिवशी तिन्हीसांजेला जेव्हा न रडता बाळ छान खेळत राहिलं, तेव्हा मात्र सगळ्यांच्या डोक्यावरचं ओझं आपसूकच हलकं झालं होतं!

 या अनपेक्षित अशा अघटीत घटनेमुळे अतुल बाळाच्या रूपानं बाबाच या घरी परत आलेत अशीच भावना सगळ्यांच्याच मनात निर्माण झाली आणि ते सहाजिकही होतंच!

 हे सगळं पुढं कधीतरी गप्पांच्या ओघात मला प्रथम समजलं तेव्हा मनातल्या दृढ श्रद्धेमुळेच असेल पण त्याबद्दल कणभरही साशंकता माझ्याही मनात निर्माण झालेली नव्हती एवढं खरं. पण त्यावेळी मला न वाटलेली साशंकता माझ्या मनात नंतर डोकावून गेली ती या घटनेला परस्पर छेद देणारी, कधीच विसरता न येणारी, सर्वांच्याच मनाला चटका लावून जाणारी एक अनपेक्षित घटना पुढे माझ्याही संसारात घडली तेव्हा! मनात डोकावून गेलेल्या त्या साशंकतेत मृत्यू आणि पुनर्जन्म याबाबतचं अनामिक असं कुतूहलही नकळत मिसळून गेलेलं होतं आणि तेच पुढं अनेक दिवस मला बेचैनही करीत राहिलं होतं!!

 क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “अन्याभाई” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

🔆 जीवनरंग 🔆

☆ “अन्याभाई” ☆ श्री मंगेश मधुकर

मध्यरात्र उलटून गेलेली, सगळी सोसायटी चिडीचूप. भटक्या कुत्र्यांचा आवाज सोडला तर एकदम शांतता. इतक्यात मोठमोठ्यानं हॉर्न वाजवत तीन कार वेगानं गेटच्या आत येऊन थांबल्या. त्यातून उतरलेल्या दहा बारा तरूणांनी आरडा ओरडा करत फटाक्यांची मोठी लड लावली. पुढची दहा एक मिनिटं फक्त आणि फक्त आवाज. सगळी सोसायटी जागी झाली. बेधुंद नाचणाऱ्या पोरांकडं वैतागलेले, हतबल सोसायटीकर असहाय्यपणे पाहत होते. त्यांच्यातच ‘शुभा’ सुद्धा होती. सगळ्यांना वाटत होतं पण मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची हिंमत नव्हती. शुभाला राहवलं नाही. दोन जिने उतरून ती गेटजवळ गेली. पाठोपाठ नवरा होताच.

“ए, बंद करा. अकला नाहीत का. किती वाजले ? ” शुभा किंचाळली पण परिमाण शून्य. मग शुभानं थेट स्पीकरचं बंद केला तेव्हा एकजण ओरडला “ओ बाई, हे काय, कुणाला इचरून बंद केलं”

“वेळ काळ समजते का”

“का? काय झालं”

“वर तोंड करून मलाच विचार”

“इथ दुसरं कोणये? ज्याला इचरू” बोलणारा खी खी करत हसला.

“लोकांना त्रास होतोय.. हा धांगडधिंगा बंद करा”

“आमी आमचा एंजॉय करतोय. कुणाला त्रास देत नाहीये. ”

“सगळ्यांची झोप मोड झाली. इतक्या रात्री धिंगाणा कशासाठी?”

“बड्डे सेलिब्रेशन”

“कोणाचा”

“अन्याभाईचा”

“मग त्याचा त्रास दुसऱ्यांना का? घरी जाऊन सेलिब्रेट करा. फुकटचा तमाशा कशाला?”

“बाई, जरा नीट बोला. सोसायटीत नवीन दिसताय. ”

“महिना झालाय. ”

“तरीच इतकं बोलण्याची डेरिंग करताय”

“तू काय धमकी देतोयेस. ”

“ही सोसायटीच अन्याभाईची आहे”

“असेल मी काय करु. गप घरी जा. आता आवाज नको”

“अजून केक कापायचा नंतर फॅन्सी फटाके.. फुल टू एंजॉय” 

“पुन्हा सांगते. घरी जा”

“बाई, ऐकून घेतो म्हणून जास्त बोलू नका. महागात जाईल”

“सस्ती चिजो का शौक मुझे नही”हिंदीत सुरू झालेली शुभा नवऱ्यानं खांद्यावर थोपटल्यावर गप्प झाली. तेव्हा पोरं चेकाळली आणि जास्तच आरडाओरडा करायला लागली. शुभाचा संताप अनावर झाला. “वा रे वा, एका बाईला गप्प केलं म्हणून एवढी खुशी !!”

“बाई!! काय प्रॉब्लेम आहे ”.. कारच्या बाजूनं आवाज आल्यावर पोरं एकदम गप्प झाली. जवळपास सहा फुट ऊंची, कमावलेलं आडदांड शरीर, लांब उभट चेहरा त्यावर झुपकेदार मिशी, लिननचा पांढरा शर्ट, जीन्स, स्पोर्टस बूट घातलेला एकजण पुढे आला. “मी अन्याभाई !!, काय अडचण आहे. ”अन्याभाईला पाहून शुभा प्रचंड घाबरली पण चेहऱ्यावर उसनं आवसान आणित म्हणाली “नमस्कार दादा”

“हा नमस्कार, मघाशी जे बोलला ते परत एकदा ऐकायचंय”

“जाऊ द्या ना. या पोरांना बोलत होते. तुम्हांला नाही”

“मला का नाही”अन्याभाईच्या अनपेक्षित प्रश्नानं शुभा गोंधळली.

“तुम्हांला कोण बोलणार?”

“का?मला शिंग आहेत”भाईच्या जोकवर पोरं मोठ्यानं हसली.

“हे बघा. रोज रात्री इथं येऊन नाचत नाही. आज बड्डे म्हणून पोरं एंजॉय करतायेत. त्रास होत असेल तर कानात कापूस घालून बसायचं. एक दिवस सहन करा. परत सांगणार नाही. समजलं. चला गुड नाइट!!”अन्याभाईचं प्रेमळ बोलणं शुभाला नेमकं समजलं. पोरं परत नाचायला लागली. फटक्याची लड पुन्हा लावली. बिल्डिंगच्या दाराशी गेलेली शुभा परत फिरली आणि अन्याभाई समोर जाऊन उभी राहिली.

“काय पोलिसाना बोलवायचं”

“नाही हो. तुम्ही असताना पोलिस कशाला?”

“मग काय!!एकदा सांगितलं सहन करा. आता जा”

“एक बोलायचं होतं. चिडणार नसाल तर बोलू”शुभा.

“बिनधास्त, आज आपला स्पेशल दिवस आहे”

“तेच तर सांगायचं होतं. तुमचा वाढदिवस आणि लोकं शिव्या घालतायेत”

“एवढी कुणाची हिंमत, नाव सांगा”

“तोंडावर कुणी बोलणार नाही पण इतक्या रात्री झोपमोड झाल्यावर कुणी कौतुक तर नक्कीच करत नसणार. ”

“बाई, नक्की काय म्हणायचंय”दारूचा वास येऊ नये म्हणून अन्याभाई लांबूनच शुभाशी बोलत होता.

“कसं य दादा, दरवर्षी वाढदिवस असाच साजरा करता. ”

“असाच म्हणजे”

“हेच धिंगाणा, आरडाओरड, चार पाच केक कापणे, फटाके, दारू, मटन वगैरे”

“मग बड्डे अजून कसा साजरा करतात. ”

“एक विनंती आहे. उद्या माझ्या घरी जेवायला या. छान स्वैपाक करते. तुम्हांला काय आवडतं. ”

शुभाचं बोलणं ऐकून अन्याभाई एकदम गडबडला. नक्की कसं रिअॅक्ट व्हावं हेच समजत नव्हतं. खरंतर इतक्या प्रेमानं आतापर्यंत कोणीच बोललं नव्हतं. भाई चक्क इमोशनल झाला. पोरांसाठी हे सगळे फारच नवीन होतं. सगळे एकदम गप्प झाले.

“पाच मिनिटांत आले”म्हणत शुभा धावतच घरी गेली. काय चाललयं कोणालाच काही कळत नव्हतं. जो तो एकमेकांकडे पहायला लागला इतक्यात शुभा परत आली तिच्या हातात ओवाळणीचं ताट होतं.

“हे काय”.. अन्याभाई 

“दादा, वाढदिवस आहे म्हणून तुम्हांला ओवाळते. आपली परंपरा तीच आहे ना”

अन्याभाईनं लगेच डोक्यावर रुमाल ठेवला. शुभानं ओवाळलं तेव्हा गॅलरीत, खिडकीतून पाहणाऱ्यांनी टाळ्या वाजवून शुभेच्छा दिल्या तेव्हा अन्याभाईनं सगळ्यांना हात जोडून नमस्कार केला. बदललेली परिस्थिती पाहून सगळी पोरं एकेक करून निघून गेली. पुन्हा एकदा जेवायचं आमंत्रण देऊन घरी आलेल्या शुभानं काही वेळानं खिडकीतून पाहिलं तर मंदिराच्या पायरीवर एकटाच बसलेला अन्याभाई शर्टाच्या बाहीनं डोळे पुसत होता. ते पाहून शुभाला गलबलून आलं.

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “गुरुचरित्र” का वाचावे ?… ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

??

गुरुचरित्र” का वाचावे ?… ☆ श्री सुनील शिरवाडकर

चंपाषष्ठी झाली की दत्तभक्तांना दत्तजयंतीचे वेध लागतात. आपापल्या परीने नियम पाळुन एक सप्ताहाचे पारायण सुरु होते. नरसिंह सरस्वतींच्या विविध लिलांचे वर्णन गुरुचरित्र ग्रंथात विस्ताराने केले आहे. दत्तभक्त मोठ्या श्रध्देने या ग्रंथाचे पारायण करीत असतात. या ग्रंथाच्या पारायणाने अनेक दिव्य अनुभव आलेली पण अनेक मंडळी आहेत मी स्वतः या ग्रंथाची अनेक पारायणे केली आहेत. मग मला त्यातून काय मिळाले? काय अनुभव आले?

येथे एक गोष्ट स्पष्ट करावीशी वाटते. बुद्धीला न पटणाऱ्या, आजच्या काळाशी विसंगत वाटणाऱ्या अनेक कथा, उपदेश या ग्रंथात आहेत. विवाहित स्त्रियांचे, विधवा स्त्रियांचे आचरण, ब्राम्हणांनी करावयाची आन्हिके, कर्मकांड वगैरे बाबी पटणार्या नाही. पण मग हा ग्रंथ का वाचायचा?पारायण करताना मनात काही कामना, इच्छा धराव्यात का?कारण भगवद्गीतेत तर सांगितले आहे “मा फलेषु कदाचन”..

गजानन विजय ग्रंथात दासगणू म्हणतात,

“प्रसंग याचना करण्याचा।

मनी नको आणूस साचा।”

पण मग पारायण करताना वाटतेच ना असे की आपल्याला काहीतरी फळ मिळावे… हे हे असे असे घडावे…. असे असे व्हावे. सगळ्यांच्याच मनात असे विचार येतील असे नाही. पण पारायण केल्यावर त्याचे फळ मिळावे, काही positive व्हावे असे तर बहुतेकांना वाटतेच.

आणि तसेही ग्रंथात जागोजागी उल्लेख आहेतच. । 

जो का भजेल श्रीगुरुते ।

इहपर साधेल तयाते । 

अखंड लक्ष्मी सदनाते।

अष्टैश्वर्ये नांदती।

*

सिध्द म्हणे नामधारकासी।

श्रीगुरुमहिमा आहे ऐसी।

भजावे मनोभावेसी।

कामधेनू तुझे घरी।

गुरुचरित्रातील सर्वच ओव्यांचा अर्थ नाही समजत. बऱ्याच वेळा असेही होते, वाचन चालू आहे.. पण मन भरकटत चालले आहे. पण थोडाच काळ. पुन्हा मन आपोआप वाचनात गुंतत जाते.

आणि मग…

जसे जसे पारायण पूर्णत्वाकडे जाते…. मनातील इच्छा आपोआप कमी कमी होत जातात. ही सेवा गुरूंनी आपल्याकडून करून घेतली हेच मोठे फळ असे वाटायला लागते. आणि जेव्हा पारायण पूर्ण होते तेव्हा….

… तेव्हा, त्या क्षणी मिळणारी अनुभूती… ते मानसिक बळ…. ती आत्मिक शांती कोणत्याही ऐहिक, भौतिक सुखापेक्षा मोठी वाटु लागते.

… आणि खरे तर हेच असते पारायणाचे फळ.

पारायण सात दिवसांचे करा… तीन दिवसांचे करा, अगदी काही जण रोज एखादा अध्यायही वाचतात. पण ग्रंथाला जवळ करा. मनोभावे वाचन करा. ग्रंथाच्या शेवटी ग्रंथकार म्हणतात,

।। मुख्य भाव कारण।।

।।प्रेमे करिता श्रवण पठण।।

।।निजध्यास आणि मनन।।

।।प्रेमे करोनि साधिजे।।

*

।।श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु।।

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ स्टान्जीन पद्मा: आपल्या सेनेचा ‘स’पोर्टर! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

स्टान्जीन पद्मा: आपल्या सेनेचा ‘स’पोर्टर! ☆ श्री संभाजी बबन गायके 

स्टान्जीन पद्मा: आपल्या सेनेचा ‘स’पोर्टर!

The (sup)porters of the Indian Army !  

स्टान्जीन पद्मा सियाचीन ग्लेशियर परिसरातील नुब्रा खोऱ्यातील एका दुर्गम गावात राहतो. या भागातील जीवन अतिशय कष्टाचे आणि जिकीरीचे. तापमान कायमच जवळजवळ शून्याच्या खाली. उदरनिर्वाह करणे खूपच कठीण. पण येथील मूळच्या लोकांना या हवामानाची सवय झालेली असते. यांपैकीच एक तरुण, स्टान्जीन पद्मा. याने सुमारे बारा वर्षे भारतीय सैन्यासाठी भारवाहक म्हणून सेवा बजावताना संकटात सापडलेल्या जवानांचे प्राण वाचवलेले आहेत. शिवाय गिर्यारोहक, सैनिक यांचे मृतदेह शोधण्यात बचाव पथकाला अनमोल सहाय्य केले आहे.

१९८४ मध्ये भारतीय सेनेने ‘ऑपरेशन मेघदूत’ हाती घेतले आणि सियाचीन ग्लेशिअर वर वर्चस्व प्रस्थापित केले. या अतिशय धाडसी, रोमांचक आणि शौर्यपूर्ण कामगिरीस या वर्षी एप्रिल मध्ये चाळीस वर्षे पूर्ण झाली. पाकिस्तानी सैन्याने याच ठिकाणी आपल्या आधी पोहोचून त्यांच्या सैन्य चौक्या प्रस्थापित करण्याची गुप्त योजना आखली होती…. पण भारतीय सैन्य त्यांच्या आधी तेथे पोहोचले! तिथे टिकून राहण्यासाठी अत्यावश्यक रसद हवाई मार्गाने पोहोचवली गेली. आणि हजारो सैनिक बर्फातून तीन दिवस-रात्र चालत इच्छित स्थळी पोहोचले. आणि म्हणूनच आज ती सीमा भारतासाठी सुरक्षित करण्यात भारतीय सैन्याला यश आले आहे… आणि पाकिस्तान आपल्याकडे पहात थयथयाट करीत बसला आहे… अन्यथा आज चित्र काहीसे वेगळे असले असते. असो.

सियाचीन ग्लेशिअरवर तापमान उणे चाळीस आणि आणखीही खाली जात असते. अशा भयावह, जीवघेण्या हवामानात निव्वळ श्वास घेणे हेच मोठे आव्हान ठरते. तेथील हवामानात हेलीकॉप्टर उडवणे हे अत्यंत धोक्याचे ठरते. पण बरेचदा यातूनच रसद खाली टाकावी लागते, आणि मग ही रसद पाठीवर लादून घेऊन वरपर्यंत पोहोचवावी लागते. काहीवेळा या कामासाठी याक सारख्या प्राण्यांचा वापर केला जातो, पण हे प्राणीसुद्धा या हवामानात फार काळ तग धरू शकत नाहीत, किंवा त्या उंचीवर पोहोचू शकत नाहीत. मग हे वाहतुकीचे काम कोण करणार? जिथे मोकळ्या माणसाला बर्फात एक-एक पाऊल टाकीत पुढे जायला कित्येक तास लागतात, पायांखाली शेकडो फूट बर्फाची दरी असू शकते, शरीराचा कोणताही भाग काही वेळासाठी उघडा राहिला तर हिमदंश होतो, साधा श्वास घ्यायला त्रास होतो तिथे हे काम कोण उत्तम करू शकेल?

सियाचीन परिसरातील निसर्गसुंदर नुब्रा खोऱ्यातील रहिवासी उदरनिर्वाहाचे साधन म्हणून हे काम अक्षरश: अंगावर घेतात. पाठीवर सुमारे वीस किलो वजनाचे सामान घेऊन उंच पर्वत चढतात…. सियाचीन येथे बर्फातील चौक्यांवर तैनात असलेल्या सैनिकांसाठी खाद्यपदार्थ, इंधन पोहोचवतात…. पिण्यायोग्य पाणी बनविण्यासाठी बर्फ खोदून देतात, डोंगर कड्यांवर पोहोचण्यासाठी शिड्या, दोर लावून देतात. सुमारे बावीस हजार फूट उंचीवर तैनात असलेल्या आपल्या सैनिकांसाठी हे पोर्टर-तरुण खूप महत्वाची भूमिका बजावतात.

बर्फाळ भागात आयुष्य गेल्यामुळे ह्या लोकांना त्या परिसराची, हवामानाच्या लहरीपणाची खूप जवळून ओळख असते. या ठिकाणी वारंवार घडणाऱ्या हिमस्खलनाच्या घटनांत या पोर्टर्सची खूप मोठी मदत होते. काही ठिकाणी तर केवळ दोरीच्याच साहाय्याने पोहोचता येते. आणि यात या लोकांचा हातखंडा आहे.

वैद्यकीय आणीबाणीच्या प्रसंगी तर सैनिकाना त्वरीत हलवावे लागते… अशा वेळी हेच पोर्टर्स मदतीला धावून येतात. भारतीय लष्कर या लोकांना सलग नव्वद दिवसच काम देऊ शकते. एरव्ही हे तरुण तेथे येणाऱ्या गिर्यारोहकांचे वाटाडे म्हणून काम करतात.

जेंव्हा पोर्टरचे काम उपलब्ध नसते तेंव्हा जवळच्या शहरात जाऊन हे लोक मिळेल ते काम करतात. आणि पोर्टर म्हणून भरती होण्यासाठी अक्षरश: दोन अडीचशे किलोमीटर्सचे अंतर बर्फातून चालत पार करतात. भरती करून घेताना या लोकांची रीतसर शारीरिक चाचणी, निवड स्पर्धा घेतली जाते. सियाचीन मध्ये सुमारे शंभर लोकांची या कामासाठी निवड केली जाते.

अतिधोकादायक ठिकाणी भारवाहकाचे काम करणाऱ्यास एका दिवसासाठी रुपये ८५७ आणि तळावर काम करण्यासाठी रुपये ६९४ इतका मोबदला दिला जातो. आता या दरांमध्ये बदल झाला असेल. कामाच्या ठिकाणी असलेली हवामानाची आव्हाने, शत्रूपासून असलेला धोका यांमुळे काही भारवाहकांना आपला जीवही गमवावा लागला आहे.

एकदा पदमाला आपल्या सेनेच्या अतिउंचीवरील चौकीवर तातडीने अन्नपदार्थ पोहोचवण्याचे आदेश मिळाले. अत्यंत प्रतिकूल हवामानाची पर्वा न करता हा गडी स्नो स्कूटर घेऊन निघाला आणि चौकीवर अन्न पोहोचवले. मात्र माघारी येत असताना त्याची स्कूटर नादुरुस्त झाली ती तशीच ठेवून तो पायी खाली निघाला. मात्र धुक्यामुळे पुढचे काही दिसू न शकल्याने एका अत्यंत खोल दरीत कोसळला आणि बेशुद्ध पडला. त्याच्या सुदैवाने सकाळी एक गस्ती पथक त्याला शोधायला येऊ शकले. आणि मोठ्या परीश्रमाने त्याला तिथून बाहेर काढले गेले.

 त्याचा एक सहकारी निमा नोर्बु असाच एका दरीत कोसळला होता. त्याच्या सुटकेचे सर्व प्रयत्न विफल झाले होते. पण पदमाने अगदी हट्टाला पेटून वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगून हेलीकॉप्टरची व्यवस्था करवून घेतली आणि निमाचा ठावठिकाणा शोधून काढला. स्वत: बर्फाच्या खोल दरीत उतरून काही तासांच्या अथक परिश्रमाने निमाला मृत्यूच्या खाईतून सुरक्षित बाहेर काढले… परंतू बर्फदंशामुळे निमाचा एक हात आणि दोन्ही पाय गुडघ्यापर्यंत कापावे लागले! 

 सियाचीन मध्ये सैनिक जेवढे कष्ट, त्रास भोगतात तेवढेच हे आपले स’पोर्टर्स’ ही कष्ट करतात… पण त्यांचे देशप्रेम अतूट आहे.

तांत्रिक कारणामुळे एका भारवाहकास सलग नव्वद दिवसांपेक्षा जास्त दिवस कामावर ठेवता येत नाही. ८९ दिवस भरल्यावर हे तरुण पुन्हा आपल्या गावी परततात, वैद्यकीय तपासणी करून घेतात आणि काही दिवसांनी पुन्हा कामावर येऊ शकतात…

पदमा वर्षातून किमान तीन वेळातरी सियाचीन वर जायचा.. ! लेह मधील जवाहर नवोदय विद्यालयातून माध्यमिक शिक्षण पूर्ण केलेल्या पदमाने आपल्या सहकारी भारवाहकांचा हिशेब ठेवण्याची, त्यांच्या कामाचे नियोजन, पर्यवेक्षण करण्याचीही जबाबदारीही उत्तमरीत्या पार पाडली आहे.

२०१३ मध्ये पाच सैनिक बर्फाखाली गाडले गेले होते. त्यांना वाचवण्यासाठी पाच जणांचे पथक धाडले गेले, त्यात पदमाही होता. पण या बचाव पथकावर एक बर्फाचा कडा कोसळला. या पाचपैकी एक जण केवळ कमरेइतकाच गाडला गेल्याने तो बाहेर पडला आणि त्याने इतरांना बाहेर काढले. आपल्या जीवाची पर्वा न करता हे पाचही जण दुसऱ्या दिवशी पुन्हा बचाव मोहिमेवर गेले आणि त्यांनी दोन सैनिकांचा जीव वाचवण्यात यश मिळवले! 

स्टान्जीन पद्मा याला भारताच्या राष्ट्रपती महोदयांनी ‘जीवन रक्षा पुरस्कार’ देऊन सन्मानित केले आहे. भारतीय सैनिकांच्या पाठीशी आणि मागे पुढे उभ्या असणाऱ्या या भारवाहकांचे आभार! 

शत्रू या भारवाहकांवर गोळीबार करायला कमी करत नाही. काल परवाच कश्मीरमध्ये दोन पोर्टर्स अतिरेक्यांच्या गोळीबारात मरण पावले. आपल्या देशाच्या सीमा राखायला असे अनेक तरुण कामी येतात…. त्यांच्या प्रती आपण आभारी असायला पाहिजे!

कृपया या शूर, हिम्मतवान, साहसी देशभक्तांविषयीची ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवावी. मी ही माहिती आंतरजालावरून इंग्रजी भाषेतील ‘दी बेटर इंडिया’, ‘द कॅरावान’ अशा स्रोतामधून मिळवली असून भाषांतरित केली आहे..

जय हिंद ! 

© श्री संभाजी बबन गायके

 ९८८१२९८२६०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कॉकटेल… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्रीमती प्रफुल्ला शेणॉय ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ कॉकटेल – लेखक  : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्रीमती प्रफुल्ला शेणॉय

आम्ही अजूनही शिकतोय ! आधीच्या पिढीकडून शिकलो. आता नंतरच्या पिढीकडून शिकतोय.

दोन्हीची कॉकटेल बनवली तर आयुष्य सुखाचे होईल !

*

आधीच्या पिढीकडून पैसे वाचवायला शिकलो.

नंतरच्या पिढीकडून पैसा वापरायला शिकतोय.

*

आधीच्या पिढीकडून सहवासाने नाती जपायला शिकलो.

नंतरच्या पिढीकडून डिजिटली नवीन नाती जोडायला शिकतोय.

*

आधीच्या पिढीकडून मन मारून जगायला शिकलो.

नंतरच्या पिढीकडून मन भरून जगायला‌ शिकतोय.

*

आधीच्या पिढीने, Use and use moreमधली उपयुक्तता शिकवली.

नंतरच्या पिढीकडून Use and throw मधली नावीन्याची गंमत अनुभवायला शिकतोय.

*

आईकडून पिकनिकलाही घरच्या पोळीभाजीची लज्जत अनुभवायला शिकलो.

मुलांकडून घरात असतानाही पिकनिक एंजॉय करायला शिकलोय.

*

आधीच्या पिढीबरोबर निरांजन लावून, दिवा उजळून वाढदिवस साजरा केला.

नंतरच्या पिढीबरोबर मेणबत्ती विझवून, अंधार करून वाढदिवस साजरा करायला लागलो.

*

आधीच्या पिढीने बिंबवले, घरचेच लोणी सर्वात उत्तम.

नंतरची पिढी पटवून देत आहे, अमूल बटरला पर्याय नाही‌.

*

थोडक्यात काय, आधीच्या पिढीने शिकवले, अधिक वर्षे कसे जगायचे ते;

तर नंतरची पिढी शिकवत आहे, मरणापर्यंत आनंद घेत कसं जगायचं ते !

*

दोन्हीच कॉकटेल बनवलं तर आयुष्य सुखाचं होईल..

 

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : श्रीमती प्रफुल्ला शेणॉय

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ बगळे, कावळे आणि कडबोळे ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

? बगळे, कावळे आणि कडबोळे ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

असते राजकारण गल्लीतले फारच वेगळे 

तेच असते प्रत्येक हायकमांडचे कल्पनातीत निराळे – –

*

सारे नेते वावरती नेहमी चेहऱ्याचे करून ठोकळे

करून सवरून सदा राहती नामा निराळे – –

*

करू शकत नाही कार्यकर्ते नेत्यांसमोर मन त्यांचे मोकळे

मनांत शिरण्या नेत्यांच्या पहावे लागतात अनेक पावसाळे – –

*

कधी झेलावी लागती कार्यकर्त्यांना अपमानाची ढेकळे

अशा ठिकाणी टिकत नाहीत कोणी कार्यकर्ते दुबळे – –

*

उभे इथे पदोपदी एका पायावर ध्यानस्थ बगळे

कळत नाही कोण नेता कोणता खेळ खेळे – –

*

बोलण्यात असून चालत नाही मोकळे ढाकळे

नाहीतर वेळ नाही लागणार स्वप्नांचे होण्या खुळखुळे – – 

*

पिंड खायला जागो-जागी टपले काळे गोरे कावळे

वाटे राजकारण्यांना निघाले जनतेच्या अकलेचे दिवाळे

शेवटी सत्तेवर येणार “यांचे” नाहीतर “त्यांचे” कडबोळे…

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ तन्मय साहित्य #258 – कविता – ☆ चलो गुनगुनाएँ हम… ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ ☆

श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’

(सुप्रसिद्ध वरिष्ठ साहित्यकार श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ जी अर्ध शताधिक अलंकरणों /सम्मानों से अलंकृत/सम्मानित हैं। आपकी लघुकथा  रात  का चौकीदार”   महाराष्ट्र शासन के शैक्षणिक पाठ्यक्रम कक्षा 9वीं की  “हिंदी लोक भारती” पाठ्यपुस्तक में सम्मिलित। आप हमारे प्रबुद्ध पाठकों के साथ  समय-समय पर अपनी अप्रतिम रचनाएँ साझा करते रहते हैं। आज प्रस्तुत है आपकी एक अप्रतिम बाल गीत चलो गुनगुनाएँ हम” ।)

☆ तन्मय साहित्य  #258 ☆

चलो गुनगुनाएँ हम☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ ☆

एक गीत गाएँ हम

जीवन की बगिया में

चलो खिलखिलाएँ हम।

*

भिन्न-भिन्न जाति पंथ

है अनेक धर्म ग्रंथ

सबका है एक मंत्र

प्रेम प्यार पाएँ हम।

एक गीत गाएँ हम।।

*

मातृभूमि का वंदन

माटी इसकी चंदन

इसका सम्मान करें

शीश पर लगाएँ हम।

एक गीत गाएँ हम।।

*

तुलसी मीरा कबीर

गाई दीनन की पीर

संतो के पावन पद

सबको सुनाएँ हम।

एक गीत गाएँ हम।।

*

हम सब मिल खूब पढ़ें

आपस में नहीं लड़ें

भेदभाव भूल,

ऊंच-नीच को मिटाएँ हम

एक गीत गाएँ हम

*

सीमा पर है जवान

खेतों में है किसान

योगदान को इनके

नहीं भूल पाएँ हम।

एक गीत गाएँ हम।।

☆ ☆ ☆ ☆ ☆

© सुरेश कुशवाहा ‘तन्मय

जबलपुर/भोपाल, मध्यप्रदेश, अलीगढ उत्तरप्रदेश  

मो. 9893266014

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares