हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ साहित्य निकुंज #259 ☆ भावना के दोहे – – दुष्यन्त उवाच☆ डॉ. भावना शुक्ल ☆

डॉ भावना शुक्ल

(डॉ भावना शुक्ल जी  (सह संपादक ‘प्राची‘) को जो कुछ साहित्यिक विरासत में मिला है उसे उन्होने मात्र सँजोया ही नहीं अपितु , उस विरासत को गति प्रदान  किया है। हम ईश्वर से  प्रार्थना करते हैं कि माँ सरस्वती का वरद हस्त उन पर ऐसा ही बना रहे। आज प्रस्तुत हैं भावना के दोहे दुष्यन्त उवाच )

☆ साप्ताहिक स्तम्भ  # 259 – साहित्य निकुंज ☆

☆ भावना के दोहे – दुष्यन्त उवाच ☆ डॉ भावना शुक्ल ☆

आओ बैठो पास तुम, सुन लो मेरी बात।

कहना तुमको है बहुत, बड़ी सुहानी रात।।

शकुन्तले! तुम रूपसी, तुमको रहा निहार।

तुम हो मेरी प्रेमिका, दिल में प्यार अपार।।

प्रेम कुंज ऐसे सजा, अनुपम लगे विहार।

करता हूँ तुमसे शुभे, भाव भरी मनुहार।।

जड़ित अँगूठी देखकर, होता हर्ष अपार।

सुध तुम इतनी भूलती, डूबी जल की धार।।

परिणय मेरे के साथ में, देखो निज शृंगार।

नैन तुम्हारे कह रहे, झलक रहा है प्यार।।

© डॉ भावना शुक्ल

सहसंपादक… प्राची

प्रतीक लॉरेल, J-1504, नोएडा सेक्टर – 120,  नोएडा (यू.पी )- 201307

मोब. 9278720311 ईमेल : [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ इंद्रधनुष #241 ☆ एक बुंदेली गीत – भइया  उल्टी  चले  बयार… ☆ श्री संतोष नेमा “संतोष” ☆

श्री संतोष नेमा “संतोष”

(आदरणीय श्री संतोष नेमा जी  कवितायें, व्यंग्य, गजल, दोहे, मुक्तक आदि विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं. धार्मिक एवं सामाजिक संस्कार आपको विरासत में मिले हैं. आपके पिताजी स्वर्गीय देवी चरण नेमा जी ने कई भजन और आरतियाँ लिखीं थीं, जिनका प्रकाशन भी हुआ है. आप डाक विभाग से सेवानिवृत्त हैं. आपकी रचनाएँ राष्ट्रीय पत्र पत्रिकाओं में लगातार प्रकाशित होती रहती हैं। आप  कई सम्मानों / पुरस्कारों से सम्मानित/अलंकृत हैं. “साप्ताहिक स्तम्भ – इंद्रधनुष” की अगली कड़ी में आज प्रस्तुत है आपकी – एक बुंदेली गीत – भइया  उल्टी  चले  बयार आप  श्री संतोष नेमा जी  की रचनाएँ प्रत्येक शुक्रवार आत्मसात कर सकते हैं।)

 ☆ साहित्यिक स्तम्भ – इंद्रधनुष # 241 ☆

☆ एक बुंदेली गीत – भइया  उल्टी  चले  बयार☆ श्री संतोष नेमा ☆

कोऊ   नइयां  कोऊ  को यार।

भइया  उल्टी  चले  बयार।

धन – दौलत के पीछू भैया

छोड़  दए बापू  उर  मैया

भए   रिश्ते   सबै   बेकार

भइया  उल्टी  चले  बयार

दीनो – धर्म  बिसर खेँ  सारे,

बने   फिरें  ज्यूं हों मतवारे

कैसे  लग   है   नैया   पार

भइया  उल्टी  चले  बयार

पइसों  से पहचान रखत हैं।

 मन में लालच लोभ धरत हैं

आये  न कोनउं  उनके  द्वार।

भइया  उल्टी  चले   बयार

मतलब के सब रिश्ते – नाते

मतलब  सें  मीठे  बतियाते

यहां सब मतलब को संसार।

भइया  उल्टी   चले   बयार

हिरा गओ आंखों को पानी

खोज  रहे  ज्ञानी – विज्ञानी

अब   न कोऊ     ताबेदार।

भइया  उल्टी   चले   बयार।

चार  दिनन  के  लाने  भैया

कितनो  जोड़ खें  रखो  रुपैया।

“संतोष”  वो  ही  पालनहार

भइया  उल्टी   चले   बयार

© संतोष  कुमार नेमा “संतोष”

वरिष्ठ लेखक एवं साहित्यकार

आलोकनगर, जबलपुर (म. प्र.) मो 70003619839300101799

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ स्वागत नव्याने… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

? कवितेचा उत्सव  ?

☆ स्वागत नव्याने सुश्री नीलांबरी शिर्के 

रोज रात्री झोपल्यावर

उद्या उठूच असे नसते

म्हणूनच रोज सकाळी

नव्या सुर्याचे दर्शन घडते

*

 म्हणून रोजचा दिवस नीत्

 संपतो म्हणूनच जगायच

 आपली चांगली आठवण

 मागे राहीलस वागायच

*

 जे वाईट साईट बोलतात

 त्यांचे विचार त्यांच्यापाशी

 वाईट वागण खोट बोलणं

 ज्याच कर्म त्याच्या पाशी

*

 उगाच आपण झुरत राहून

 फरक कधीच पडत नसतो

 बाकीच्यांचा विचार करत

 मनस्वास्थ हरवून बसतो

*

 म्हणून आपणआता यापुढे

 आजचाच दिवस जगायच

 उद्या दिवस असेल आपला

 नव्याने स्वागत करायच

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पहाटें पहाटें… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

श्री रवींद्र सोनावणी

? कवितेचा उत्सव ?

☆ पहाटें पहाटें… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆ 

पहाटें पहाटें मला जाग आली,

तुझी याद ओल्या, सुगंधात न्हाली ।।ध्रु।।

*

वरी लाल आरक्त प्राची नवेली,

कुणी मुग्ध ललना, जणू लाज ल्याली,

समिरातूनी रंग शिंपीत गेली ।।१।।

*

जरी मध्यरात्री, तुझी साद आली,

परी मंचकी, मुक्त एकांत भाळी,

असें भास ह्रदयांस, या नित्य जाळी ।।२।।

*

झुलावे फुलारुन, वाटें कळ्यांना,

परी मर्म याचे, तुला आकळेनां,

म्हणूनच रात्र ही, निःशब्द झाली ।।३।।

© श्री रवींद्र सोनावणी

निवास :  G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५

मो. क्र.८८५०४६२९९३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ गीता जन्म दिन… ☆ सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

गीता जन्म दिन ☆ सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

(गीता जयंती विशेष -11 दिसंबर 2024)

जन्म झाला गीतेचा,

कुरुक्षेत्री युद्ध स्थळी !

कृष्ण अर्जुनाचे नाते,

उमगले ते त्यावेळी !

*

अर्जुन झाला हतबल,

कृष्णास ते पाहवेना!

उपदेश पार्थास देता,

मधुसूदनास राहवेना !

*

जन्म दोहोंचे जाहले,

विशिष्ट अशा हेतूने !

महाभारत ते घडले,

परब्रम्हाच्या साक्षीने!

*

बालपण तुझे कृष्णा,

गोकुळी खेळात रंगले!

गोकुळ सोडूनी जाता ,

कर्तव्यास तू वाहून घेतले!

*

 द्रौपदी होती मनस्विनी,

तशीच ती स्वाभिमानी!

नकळत तिच्या कृत्याने,

 झाली युध्दास कारणी !

*

कोणास जाणीव होती,

भविष्यात काय घडेल?

असहाय होता हे जाणून,

घडणारे कधी न चुकेल !

*

गीता धर्म सांगताना ,

अठरा अध्याय वदले!

ज्ञानामृत ते देताना ,

मागे काही न राखले !

*

गीता निरंतर मार्गदर्शक ,

पठण करू या गीतेचे !

सर्वांसाठी लाभदायक,

सार्थक होईल जन्माचे !

© सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “प्राक्तन…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “प्राक्तन…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

… ज्याचं त्याचं प्राक्तन किती वेगवेगळं असतं… हे जागतिक सत्य आहे आणि ते सर्वांना विदीत असतचं… फरक एव्हढाच असतो आपल्या सगळ्यांना मात्र हवं असतं फक्त अनुकूल असणारं प्राक्तन… म्हणजे बघा अथ पासून इति पर्यंत.. नव्हे नव्हे आदी पासून अंतापर्यंत अर्थात जन्मापासून ते मृत्युपर्यंत सगळा आयुष्याचा प्रवास कसा सुशेगात आणि सुखात होईल.. आता त्या मिळणाऱ्या सुखाची मात्रा थोडीफार कमीजास्त चालते पण अगदीच सुख मिळूच नये अशी भावना कधीच नसते बरं त्यात… तो आला राजा सारखा, सुखाचा जगला नि गेला अशी मागची जगरहाटी बोलत राहावी हिच एकमेव इच्छा असते…. पण पण…

प्राक्तनाचं दान देणाऱ्याच्या मनात नेहमी वेगळचं काहीतरी असतं… आपल्याला कायमचं ते गुढ असतं, रहस्यमय असतं… चारचौघांसारखाच असणारा आपला हा आयुष्याचा प्रवासात सतत आपल्या वाट्याला नेहमीच इतरांपेक्षा वेगळचं येत असतं… अनाकलनीय गोष्टी घडत असतात… अगदी कितीही पद्धतशीरपणे नियोजनबद्ध जगायचं आपणं ठरवतो हो पण तो नियंता तिसरचं आपल्या भाळी मारत असतो…घालमेल होते तेव्हा आपल्या जिवाची… सगळ्यांनाचं भलं करणार आपल्यालाच कसा विसरला असा प्रश्न पडतो.. आणि गमंत म्हणजे हे असं प्रत्येकाच्या मनात तस्सचं येतं.. मग तुम्ही कसंही जगा.. स्वतःसाठी, दुसऱ्या साठी काहीही फरक पडत नाही… जे जे होणार ते ते ठरल्याप्रमाणे तसेच होणार… ना आपल्याला ना दुसऱ्याला त्यात काडीमात्र बदल घडवून  आणता येत नाही… साधी गोष्ट जन्म कुठे कधी व्हावा ते शेवटचा श्वास कधी कुठे सोडून द्यावा आहे का आपल्या हातात… मग या दोघांच्या मधल्या प्रवासातील अनेक गोष्टींचा आयुष्यभर आटापिटा करत असतो तो अनुकुलता असावी… पण प्रतिकुलतेची छाया सतत मंडरत राहते आणि आपला संघर्ष तिथे सुरू असतो… क्षणाचा आनंद मिळतो आयुष्याची बाजी लावून… संघर्षात उभे असतात आपलेच म्हणवारे,शत्रू, हितचिंतक… मुखवटे घातलेले चेहरे दाखवून…आणि आणि यादी कितीही मोठी करता येईल… तर हा सगळा प्रपंच आठवला कशावरून… ते प्राजक्ताचं फुल दिसलं आणि हा फापट पसारा मांडत गेलो…

प्राजक्ताचं इवलं इवलसं नाजूक सुकोमल फुलं बघाना..  उमलून येतं तेव्हा सुंगधाने  किती परिलुप्त असतं.. फांदी फांदीवर लगडलेलं दिसतं.. किती किती प्रसन्न, टवटवीत नि आनंदविभोर असतं ते स्वतः आणि इतरांनाही ते तसाच अनुभव देतं… त्या प्राजक्तांच्या फुलांकडे बघताना प्रत्येकाला त्या फुलांबदल प्रेम हे वाटतचं… असं वाटतं या फुलानं असचं कायम या फांदीवर झुलत राहावं… पण तो वाहणारा वारा मात्र दोषाचा धनी होतो… अगदी मंद झुळूकेच्या रूपात वाहत  जातो तेव्हा तो या निष्पाप फुलांना फांदी वरून अलगदपणे उचलून घेऊन जातो आणि आणि मधेच जड झाले बुवा आता तू माझ्या मागे मागे चाली चाली करत ये बरं असं सांगून त्या फुलांना तो जमिनीवर सोडून जातो… काही वेळ ती अबोध फुलं जमिनीवरून देखील वाऱ्यासह घरंगळत पुढे पुढे जाउ लागतात… पण तो प्रवास अल्पजीवी असतो.. त्यांचं सुकोमल देह धुळीत, मातीत लोळून गेल्यानं दगड धोंडे यांसारख्या अडथळ्यांना तटल्याने   थकून जाऊन गलितगात्र होऊन मातीमय होतात… आपला शेवटचा श्वास त्या मातीमध्ये घेताना त्या मातीला आपला सुगंध अर्पण करून जातात… जवळपास सगळ्या फुलाचं असचं होतं… पण काही फुलं वाऱ्याने इतस्ततः होतात., भरकटतात… एकटीच पडतात… शोध घेत असतात इतरही फुलांचा ती कुठे आहेत… पण तो शोध कधीच लागत नाही… मग एकटेच पडल्याने त्यांच्या नशीबी बेवारसाचं मरणाला सामोरं जावं लागतं…जगणं आनंदाचं झालं वाटतं नाही तोच बाभळीच्या काट्यासारख्या झाडांच्या फांदीत अडकून पडणं होतं.. अरे तू कोण आहेस.. आणि इतका सुंदर सुगंध तुझ्याजवळ कोठून आला… थोडा आम्हालाही तो सुंगधानं न्हाऊ घालना.. नाही तरी आमच्या जगण्याला तसा काहीच अर्थ उरलेला नाही… ना आमच्या कडे कधी कोणी ढुंकूनही पाहिले जात नाही… आज तू आमच्या तावडीत बरा सापडला आहेस.. तेव्हा आमचं सगळ्याचं जिणं सुगंधीत करं बरं… असं म्हणून  त्या प्रत्येक काट्याने त्या फुलाला कवटाळून घेण्यास सुरुवात करायला घ्यावी… या काट्यांच्या धुसमुळेपणाने त्या प्राजक्ता च्या फुलाच्या नाजूक देहाला कैक ओरखडे बसू लागतात…एकेक पाकळी विर्दिण होत जाते.. छिन्नविछिन्न  होते.. केशरी देठ अलग होऊन  तो एकिकडे खाली मातीत पडतो  नि त्या त्या पाकळ्या आपला निश्वास सोडत दूर दूर मातीत गलितगात्र होऊन पडतात… त्या आक्रस्ताळी काट्यांना प्राजक्ताचा  सुगंध तर मिळालाच नाही… उलट  जनमानसाकडून त्याच्या या कृत्याची निर्भत्सना मात्र त्यांची  झाली… अरसिक,निर्दयी मनाचे काट्यांनी अखेर त्या चुकलेल्या फुलाची जीवन यात्राच संपविली…. मग कुणी सात्वंनपर म्हणत गेलं त्याचं प्राक्तनच तसं होतं… आगळं वेगळं जगावेगळं… क्षणभंगुर जीवनात सुगंधाची बरसात करून जगलं… मी नियंता असूनही मला त्या प्राजक्ताच्या सुंगधाला वंचित व्हावं लागावं हा केव्हढा दैवदुर्विलास आहे…त्या नियंत्याला सुध्दा एक वेळ मनात किंतु चा कंटक टोचत राहतो…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “सार्वजनिक संस्थेचा गाभा…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “सार्वजनिक संस्थेचा गाभा…–☆ श्री जगदीश काबरे ☆

लोकांपासून कसलेही काम घ्यावयाचे असेल, तर सोशिकपणा धारण केला पाहिजे, हा आपल्या विचाराचा गाभा असला पाहिजे तरच आपण समाजसुधारणेच्या कामात तग धरू शकू. सुधारणेची गरज वाटते ती सुधारकाला. तो ज्या लोकांना सुधारण्याची अपेक्षा करतो, त्यांच्याकडून त्याने विरोधाची, तिरस्काराची, किंबहुना जीवावरील संकटाचीही अपेक्षा ठेवली पाहिजे. कारण सुधारक जिला सुधारणा म्हणतो, ती कुधारणाच आहे, असे स्थितिशील समाजाला वाटत असते. अशा वेळेस सार्वजनिक संस्था उभारणे आणि शस्त्रकाट्याच्या कसोटीवर टिकवून ठेवणे ही एक कसरतच असते.

अनेक सार्वजनिक संस्था सुरू करून, त्यांची व्यवस्था चालविण्याच्या जबाबदारीचा अनुभव घेतल्यानंतरच मी अशा दृढ निर्णयावर आलो की, कोणत्याही जाहीर संस्थेने कायम फंडावर गुजारा करण्याचा प्रयत्न करू नये. तसे करण्यामध्ये तिच्या नैतिक अधोगतीचे बीज साठविलेले आहे. सार्वजनिक संस्था म्हणजे लोकांची मान्यता आणि लोकांचे पैसे यांवर चालणारी संस्था. अशा संस्थेला लोकांची मदत मिळेनाशी होईल, तेव्हा तिला अस्तित्वात राहण्याचा हक्कच राहत नाही. कायम फंडावर चालणाऱ्या संस्था लोकमताविषयी बेपर्वा होताना आढळतात; कित्येक वेळा तर धडधडीत लोकमतांविरुद्ध आचरण करताना दृष्टीस पडतात. अशा तऱ्हेचे अनुभव देशात आपल्याला पावलोपावली येतात. धार्मिक म्हटल्या जाणाऱ्या कित्येक संस्थांच्या हिशेबठिशेबांचा ठावठिकाणा नाही. त्यांचे संस्थापक, त्यांचे मालक होऊन बसले आहेत आणि त्यांच्यावर कोणाचा ताबा चालत नाही.

सृष्टी ज्याप्रमाणे रोजचे अन्न रोज तयार करून रोज खाते, त्याप्रमाणे सार्वजनिक संस्थांचे असले पाहिजे, याबद्दल मात्र मला तिळमात्र शंका नाही. ज्या संस्थेला लोक मदत करण्यास तयार नाहीत, त्या संस्थेला सार्वजनिक संस्था म्हणून जगण्याचा अधिकारच नाही. प्रतिवर्षी मिळणारा फंड, ही त्या त्या संस्थेच्या लोकप्रियतेची व तिच्या चालकांच्या प्रामाणिकपणाची कसोटी आहे आणि प्रत्येक संस्थेने या कसोटीला उतरलेच पाहिजे, तरच ती संस्था लोकांच्या विश्वासास पात्र ठरेल.

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दोघी — हिरवा चुडा… ☆ सुश्री स्वप्ना मुळे (मायी) ☆

सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

? जीवनरंग ?

☆ हिरवा चुडा… ☆ सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

आंब्याची पान तोडून त्याची सुंदर तोरणं दारावर छान शोभत होती,… दारं जरी जुनाट असली तरी त्याला रंगवून त्यावर नक्षी काढून रेवाने ती छान सजवली होती,… स्वतःच नवरी असली, तरी हौसेने आणि उत्साहाने कामं पेलत होती ती,… अगदी सडा रांगोळी, दारातली प्राजक्ताची फुलं जमवून देवघरातल्या देवीसाठी सुंदर हार बनवून ठेवला,.. सगळी लगबग सुरूच. ते बघून जमलेल्या मावश्या, आत्या म्हणत होत्या… “पोरगी जाईल तर अवघड होईल ग बाई ह्या घराचं,…. झालं आज देव ब्राह्मण परवा सुनं होईल अंगण,… ” 

आईची साधारण साडी घालूनच रेवा देवब्राह्मणाच्या पुजेला बसली,… आपल्या आईबाबांच्या परिस्थितीला ओळखुन कधीही हट्ट न करणारी हि रेवा,… एका शाळेत नोकरी पण करत होती,…. मिळेल तो पगारही घरी देत होती,.. हाताशी आलेला पोरगा आजारानं गमावला होता त्यात होतं नव्हतं ते सगळं गेलं होतं,… ह्या दोन खोल्याच घर आणि हे अंगणातलं किराणा दुकान ह्यावर सगळं सुरू होतं,…

दूरच्या नात्यात एका लग्नात रेवाला सासरच्यांनी बघितल्यापासून हा योग जुळून आला होता,… दाराशीच लग्न करायचं ठरलं होतं,… पण बैठकीत तीन तोळ्याच्या पोहे हारावरून मोडायला आलं होतं,… पण कोणीतरी मध्यस्थी करून दोन तोळ्यावर जमवलं होतं,… तेव्हा मात्र रेवा म्हणाली होती,… ” मला पोहे हार नको. त्या ऐवजी दोन सोन्याच्या बांगडया करू,… ” हिरव्यागार चुडयासोबत पिवळ्याधमक सोन्याच्या बांगड्या तिनी आपल्या सगळ्या मैत्रिणींच्या हातात पहिल्या होत्या.. तिला फार इच्छा होती तश्या घालण्याची,… ही अशी बैठक ठरून दोन महिने झाले आणि आज लग्न येऊन ठेपलं होतं,…

बारीक सनई सुरू होती, जातं, माठ, दारातला मांडव सगळं सजलं होतं,… चला नवरीने चुडा भरून या आधी,… गुरुजींनी सांगितलं,… सगळ्या बायकांच्या घोळक्यात ती येऊन बसली,… आत्या म्हणाली, “अग तुझ्या बापाने सोन्याच्या बांगडया केल्या ना तुला… त्या मागे घाल मग चुडा काढता येणार नाही,….

तसं तिला धस्स झालं,… ती म्हणाली हो आलेच घालून,… ती स्वयंपाक घरात गेली, “ आई माझ्या बांगडया दे ना,… ” आईने अवंढा गिळत तिच्याकडे बघितलं,..

त्याक्षणी तिला आई अधिकच केविलवाणी वाटली,… आईने डबी लपवत हळूच फक्त बांगड्या दिल्या,… ती घाबरतच बसली चुडा भरायला,… आजूबाजूचे हात तिच्या सोन्याच्या बांगड्या बघत होते,… “जास्तच पिवळं दिसतंय सोनं,.. ” कोणी म्हणे दोन तोळ्याच्या नसतील ग… जास्त लागलं असेल सोनं,.. कोणत्या सोनाराकडे केल्या,… ?

ती अगदी कावरीबावरी झाली सगळ्या प्रश्नांनी,… तेवढ्यात गुरुजींनी हाक मारली, आणि ती सुटका झाल्यासारखी पळाली,… नाजुक गोऱ्या हातावर चुडा अगदी सुंदर दिसत होता,… स्वतःच काढलेली मेंदी,… त्या मेंदीचा सुंदर सुगंध,… पण ह्या पिवळ्या बांगड्या ती अस्वस्थ होत होती,… कसं होईल लग्नानंतर?…… आपल्याला कोणी बांगड्यांच विचारलं तर, ?… तिला मध्येच घाम फुटायचा,… आई बाबा दोघेही अपराधी असल्यासारखे बघायचे एकमेकांना,…

आज ती खुप सुंदर दिसत होती,… स्वतः बनवलेलं रुखवत. सगळी बारीक सारीक तयारी,…

“सोन्यासारखं आहे ग बाई लेकरू,… पुण्यवान आहेत लोकं,… त्यांना म्हणा काय करता खऱ्या सोन्याला??? “ आजीचं असं वाक्य ऐकताच माय लेकींनी एकमेकांना बघितलं,… फक्त आपल्या तिघात असलेलं गुपित आजीला कळलं की काय,… असं जर तिकडे काही कळलं, तर वरात परत जाईल,… बापाला पण धस्स झालं,..

… पण आजी पुढे म्हणाली, “आजकाल असे समजुतदार लेकरं राहिले नाही,.. म्हणून म्हणते सोनं काय करायचं?अशी सुन मिळाली त्यांना,.. “

आजीचं वाक्य पूर्ण होताच सुटकेचा श्वास सोडला तिघांनी,.. , मुहूर्त घटिका आली आणि रेवाच्या डोक्यावर अक्षता पडल्या,.. दिवसभर सगळी लगबग सुरू होती,… नंदा, जावा जवळ येऊन बघु नवरीचा चुडा म्हणत त्या पिवळ्या बांगडया बघुन जात होत्या,… त्या प्रत्येक क्षणी हिच्या काळजाचा ठेका चुकत होता,… निघण्याची वेळ आली,… आई बाबांच्या गळ्यात पडून मनसोक्त रडून झालं,… देवघरातल्या देवीला नमस्कार करून निघताना देवीला ठेवलेला चुडा पाहून ती म्हणाली,… “आता ह्या चुड्याची लाज तुलाच,… सांभाळ आई जगदंबे, “.. ती वळून बघत होती,… आपलं गरीब माहेर,… सुंदर प्राजक्ताखाली सजलेला मंडप,… नक्षीदार लाकडी दरवाज्यात केविलवाणे, अपराध्यासारखे उभे हतबल असलेले आपले आई वडील,… ती परत माघारी पळत आली दोघांना घट्ट धरलं,… ” माझी चिंता करू नका मी बघेल सगळं,… निश्चिंत रहा…” 

सगळे विधी झाले. त्याने रात्री तिला जवळ ओढलं,… “ मला तुझे हे मेंदी भरले हिरव्यागार चुड्याचे हात बघू दे जर मनसोक्त,… जादू आहे तुझ्या हातात,… ” त्याने ते हात निरखले आणि ओठावर ठेवले तशी ती शहारली आणि मनातून घाबरलीही,… “ चुड्याचे हात बघताय कि सोन्याच्या बांगडीचे हात बघताय,… ?”

तो म्हणाला, “ चुड्याचेच गं,… किती छान दिसतो हिरवा रंग तुझ्या हातावर आणि मुळात तुझं सगळं कष्टमय आयुष्य मला माहित आहे,.. आईबाबांना सावरून धरणारे हे हात फार सुंदर आहेत ते माझं आयुष्य सावरायला आलेत हे भाग्यच ना माझं,… ” 

तिला जाणवलं हे बांगडयाच दडपण आता नाही पेलू शकणार आपण,… तिला एकदम रडूच आलं,… त्याला कळेना काय झालं एकाएकी,…

तीच बोलायला लागली,… “ तुम्ही रागावणार नसाल तर सांगते,… आम्ही सोन्याच्या बांगडया घेऊन घरी आलो,… पण दुसऱ्या दिवशी बँकेवाले हजर. दादाच्या आजारात काही कर्ज उचललं होत आम्ही,… घरावर जप्ती आणतो म्हणाले,… मला बांगडया मोडाव्या लागल्या,… आई बाबाला माझं लग्न करणं मुश्किल होतं,.. पण ते पेललं कसंबसं पण हे बांगड्याचं ओझं नव्हतं पेलण्यासारखं,… ”

त्याने पिवळ्या बांगडयाला हात लावला,… “ मग ह्या बांगड्या?? “ 

ती म्हणाली “ खोट्या आहेत,… आणि हे खोटं मला मनात त्रास देतंय,… खरं ते तुम्हाला सांगितलं. आता तुम्ही ठरवा मला नांदवायचं की नाही,… तशी शाळेशिवाय शिकवण्या घेऊन पैसे कमावून लवकर करेल मी बांगडया पण तुम्हाला असं फसवलं आहे आम्ही,…. ” 

तो म्हणाला, ” मग तर पोलिसच बोलवायला हवे मला पकडायला. कारण एवढ्या हुशार हातांना मी सोन्याच्या बांगड्यांची लाच मागितली – हे तर हातच सोन्याचे आहेत…“

तिने एकदम चमकून त्याच्याकडे बघितलं,… त्याने तिचे डोळे पुसले,.. “ अग वेडाबाई… असं म्हणतात पहिल्या रात्री काहीतरी भेट द्यावी एकमेकांना. चल उद्या जाऊन अश्याच डिझाईनच्या बांगडया करून घेऊ अगदी गुपचूप आणि तू मला काय गिफ्ट दे सांगू,… “

ती म्हणाली “ काय,.. ?”

तो म्हणाला.. “असाच हिरव्यागार चुडयासारख्या बांगडया भरलेले हात नेहमीसाठी,… माझ्या गळ्यात जे किणकिण वाजत प्रेमाच्या गोष्टी बोलत जातील माझ्याशी,… चालेल ना,.. “

ती लाजून गोरीमोरी झाली.. आता सारख्या त्या हिरव्या बांगडया तिला प्रेमाची आठवण तर देतात, पण त्या मागच्या सोन्याच्या बांगड्या मात्र सोन्यासारखं माणूस आयुष्यात आलं ह्याची सतत जाणीव देतात,… आणि मग तिचे हात आणखीनच खुलुन दिसतात…

© सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

फक्त व्हाट्सअप संपर्क +91 93252 63233

औरंगाबाद

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सम्राट अशोक आणि जागतिक शांतता. – ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ सम्राट अशोक आणि जागतिक शांतता. ☆ श्री सुनील देशपांडे

खालील मजकूर मला व्हाट्सअप वरून फिरत फिरत आला. तो आणि त्यावरचे माझे विचार सादर करीत आहे –

सम्राट अशोकाची जयंती आपल्या देशात का साजरी केली जात नाही?

खूप विचार करूनही “उत्तर” सापडत नाही ! तुम्हीही या “प्रश्नांचा” विचार करा !

 सम्राट अशोक

 वडिलांचे नाव – बिंदुसार गुप्त

 आईचे नाव – सुभद्राणी

 …. एकच “सम्राट” ज्याच्या नावाने जगभरातील इतिहासकारांनी “महान” हा शब्द लावला.

… या “सम्राटा” चे राजेशाही चिन्ह “अशोक चक्र” भारतीयांनी त्यांच्या ध्वजात ठेवले.

… हाच “सम्राट” ज्याचे शाही चिन्ह “चारमुखी सिंह” हे भारत सरकारने “राष्ट्रीय चिन्ह” मानून चालवले आहे आणि “सत्यमेव जयते” स्वीकारले आहे.

… ज्या देशात सैन्याचा सर्वोच्च युद्ध सन्मान, सम्राट अशोकाच्या नावावर आहे, तो “अशोक चक्र” आहे.

… “अखंड भारत” (आजचे नेपाळ, बांगलादेश, संपूर्ण भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान) च्या विशाल भूभागावर एकहाती सत्ता गाजवणारा सम्राट, ज्याच्या आधी किंवा नंतर असा राजा किंवा सम्राट कधीच नव्हता…

… सम्राट अशोकाच्या काळात “23 विद्यापीठे” स्थापन झाली. त्यामध्ये तक्षशिला, नालंदा, विक्रमशिला, कंदाहार इत्यादी विद्यापीठे प्रमुख होती. या विद्यापीठांमध्ये परदेशातून विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी भारतात येत असत.

… “सम्राट” च्या कारकिर्दीला जगातील विचारवंत आणि इतिहासकार भारतीय इतिहासातील सर्वात “सुवर्ण काळ” मानतात.

… “सम्राट” च्या काळात भारत “विश्वगुरु” होता. तो “सोन्याचा पक्षी” होता. जनता सुखी आणि भेदभावमुक्त होती.

… ज्यांच्या कारकिर्दीत, “ग्रॅंट ट्रंक रोड” या प्रसिद्ध महामार्गासारखे अनेक महामार्ग बांधले गेले. 2, 000 किलोमीटरच्या संपूर्ण “रस्त्या’च्या दोन्ही बाजूला झाडे लावण्यात आली. “सराय” बांधण्यात आली..

 माणसं माणसं आहेत.. , प्राण्यांसाठीही, पहिल्यांदाच “वैद्यकीय गृह” (हॉस्पिटल) उघडण्यात आली. प्राण्यांची हत्या बंद झाली.

……. असा “महान सम्राट अशोक” ज्यांची जयंती त्यांच्याच देशात का साजरी केली जात नाही? तसेच सुट्टीही का जाहीर केली जात नाही?

ज्या नागरिकांनी ही जयंती साजरी करावी ते आपला इतिहास विसरले आहेत, आणि ज्यांना हे माहित आहे, त्यांना ही जयंती का साजरी करावीशी वाटत नाही हे कळत नाही हे खेदजनक आहे.

… “जो जिंकतो तो चंद्रगुप्त” होण्याऐवजी “जो जिंकतो तो सिकंदर (अलेक्झांडर)” कसा झाला??

चंद्रगुप्त मौर्याचा प्रभाव पाहूनच अलेक्झांडरच्या सैन्याने युद्ध करण्यास नकार दिला होता हे सर्वांनाच माहीत आहे. सैन्याचे मनोबल वाईटरित्या तुटले आणि अलेक्झांडरला “मागे फिरावे” लागले.

वरील सर्व मजकूर वाचल्यानंतर खरोखरच हा प्रश्न प्रत्येकाच्याच मनात यावा आणि आत्तापर्यंत जे घडले नाही ते इथून पुढे तरी घडावे.

चंद्रगुप्त मौर्यापासून सम्राट अशोकापर्यंत भारत देश आणि संस्कृतीचा संपूर्ण जगावर प्रभाव पडला होता.

सम्राट अशोक हा आपल्या देशाचा सगळ्यात मोठा राजकीय आणि सांस्कृतिक ठेवा आहे हे सर्वमान्य आहेच, म्हणूनच त्याची प्रतिके आज सुद्धा स्वतंत्र भारताची प्रतिके म्हणून आपण अभिमानाने धारण करतो. अशा या महान सम्राटाची जयंती पुण्यतिथी कुणाला माहिती आहे काय? असल्यास ती साजरी करणे आणि जीवनगाथा सर्व समाजाला ज्ञात व्हावी अशा दृष्टीने जागृती करणे हे कार्य करण्याची गरज आहे.

…. अनेक सामाजिक संस्थांना विनंती की याबाबत काहीतरी अधिक कार्यवाही व्हावी. त्यातून आपल्या महान परंपरेची आठवण आणि समाज जागृती व्हावी. मला असे वाटते सम्राट अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारला म्हणून तर त्याचे महत्त्व अधिक आहे. सम्राट अशोकामुळे बौद्ध धर्माचा प्रचार प्रसारच नव्हे तर अंगीकार संपूर्ण आशिया खंडात, विशेषतः पूर्व आणि दक्षिण आशियामधील सर्व देशांमध्ये झाला होता. आपल्या मातीतील सर्वश्रेष्ठ चक्रवर्ती हिंदू सम्राट त्याच्या उत्तर आयुष्यात बुद्ध धर्माचा प्रचारक झाला ही खूप मोठी आणि अभिमानास्पद घटना आहे.

शांततेचा प्रसार शक्तिमान व्यक्ती किंवा राष्ट्राकडूनच चांगला होऊ शकतो. हिंसेचा अतिरेक झाल्यानंतर शांतीचा पुरस्कार ही खूप मोठी क्रांतिकारक घटना आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर युनोचा जन्म झाला. शेवटी अपरिमित मनुष्यहानी नंतरच माणसाला जाग येते, परंतु ती जास्त काळ टिकत नाही. दुसऱ्या महायुद्धानंतर शांततेचे वारे व युनोचा उदय या घटना घडून सुद्धा त्याचा परिणाम फार काळ टिकला नाही. सध्या तर सगळीकडे युद्धाचाच ज्वर पुन्हा पसरलेला दिसतो. यावेळी आपल्या भारतीय संस्कृतीतील या महान परंपरेची आठवण जागृत ठेवून जागतिक शांततेच्या दृष्टीने भारताने प्रयत्नशील राहावे. जागतिक शांततेसाठी सम्राट अशोक यांच्या जीवन कार्याची आठवण सतत जागती ठेवणं ही गोष्ट अत्यावश्यक आहे असे वाटते…… तीच चक्रवर्ती सम्राट अशोकाला सर्वात मोठी श्रद्धांजली आणि भारतीय संस्कृतीचा सर्वात मोठा सन्मान ठरेल. या दृष्टीने राष्ट्रीय पातळीवर काही हालचाल होईल का? आपण आशा करूया ! 

© श्री सुनील देशपांडे.

नाशिक मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-११ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

??

☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-११ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

लग्न पहावं करून-.

जोगेश्वरी परिसर म्हणजे अगदी मोक्याची जागा. आत्ताचा गजबजलेला लक्ष्मी रोड तेव्हा अस्तित्वातच नव्हता. तो रस्ता नागमोडी आणि कच्चा होता. काही अंतराने फक्त चार-पाच देवळे होती. गणपतीची मिरवणूक, लग्नाची वरात, भिक्षावळ, पालखी श्री जोगेश्वरी रस्त्यावरून पुढे जायची. ही वर्दळीची जागा म्हणून जोगेश्वरीजवळच श्री. शंकरराव कुलकर्णी ह्यांनी गाळा विकत घेतला होता. त्यामुळे छकडा किंवा बैलगाडीतून सायकली दुरुस्त करायला आणायला त्यांना सोईचं पडायचं. मंदिरात ओटा आणि दगडी फरशी होती. शुभकार्य निघाले की जोगेश्वरी परिसरात शिरल्यावर लग्न कार्यवाहक सगळीच काम करून समाधानाचा निश्वास सोडून निर्धास्तपणे तिथून बाहेर पडायचे. कारण सगळ्या वस्तू जोगेश्वरी परिसरातच मिळायच्या. ‘घर पहाव बांधून आणि लग्न पहावं करून ‘ इतकं शुभकार्य करणे अवघड होते. वधूपिता प्रथम वळायचा पत्रिकेच्या कारखान्यात. शामसिंग रामसिंग परदेशी उत्तम पत्रिका छापायचे. इतकी तत्पर सेवा होती की ‘शाम प्रिंटिंग प्रेस’ मध्ये पन्नास हजार पत्रिका तयार असायच्या, सगळा मसुदा एकदम रेडी. श्रीगणेश प्र. श्रीजोगेश्वरी प्र. वधू वर वडील मंडळी वधू-वर पिता सगळं छापलेले रकाने तयार असायचे नंतर फक्त नावं विचारून फायनल करून प्रिंट करायची. चला ! महत्वाचं शुभ मुहूर्ताचे पहिलं कार्य असं पार पडून पत्रिकांचे गठ्ठे 2 तासात लग्न घरी वेळेवर व्यवस्थित पोहोचायचे. अशा तऱ्हेने कार्याचा पहिला आणि महत्त्वाचा गड, ‘सर’ केला जायचा. काही हौशी पुणेकर पत्रिकेवर वधूवरांचे फोटो छापून घ्यायचे. आत्ताच्या अवजड, भरभरून, डेकोरेट केलेल्या अल्बम पत्रिका, वाचतानाच वाचणारा वाकतो. पण काही म्हणा हं !त्या वेळच्या ब्लॅक अँड व्हाईट पद्धतीची सर नाही येणार आत्ताच्या लग्न पत्रिकेला. कार्याला वाजंत्री, सनई, चौघडा हवाच. ती मंडळी याच परिसरात भेटायची. दूध भट्टी, गॅस बत्तीवाले, दारू गोळे, भुईनळे वाले आमंत्रणाची वाटच बघत बसलेले असायचे. राजीवडेकरांच्या प्रसिद्ध दुकानात धोतर, कोट-टोपी जॅकीट, पगडी घेऊन हौशी पुरुष मंडळी बाहेर पडायची, तर शालूकरांच्या दुकानातून शालू घ्यायला बायका अधीर व्हायच्या. मनासारखा शालू मिळाल्यावर नवरीची कळी खुलायची. देण्या घेण्यासाठी हलकी भारी नऊवारी निवडायला वडीलधाऱ्या बायका खण आळीकडे लगबगीने जायच्या. वाटेत आचारी अड्डा लागल्यावर अनुभवी माणसं मजुरी, मेनू, माणसांची संख्या सारं काही घासाघिस करून, व्यवहार पक्का करून मोकळे व्हायचे. चला ! जेवणावळीचं मुख्य काम संपलं ss. ढोल, ताशा, मिरवणूक, वाजंत्री ई. व्यवहार खुंटा बळकट करून पक्का केला जायचा. आता राहिला अत्यंत आवडीचा… हौसेचा व्यवहार म्हणजे सोनं, दागिने खरेदीचा. रु. 250 /- तोळा सोन्याचा भाव होता. गरीबाघरचे वधूपिते मणी मंगळसूत्र, जोडवी विरोली, खरेदी करायचे तर हौशी श्रीमंत वधूपिते लाडक्या लेकीसाठी पेशवाई थाटाचे दागिने पसंत करायचे, घोंगडे आळीतल्या घोंगड्यांची पण तेव्हा चलती होती. सगळ्या साईजच्या घोंगड्यांनी शरीराला मस्त उब मिळायची. ज्ञानविलास प्रसिद्ध कारखाना पण इथेच होता. लग्नात नवरा सायकल, घड्याळ्या- साठी आणि भारी शूज करता रुसून बसायला नको, म्हणून ओरिएंटल मध्ये लेटेस्ट बुटाची खरेदी व्हायची. नवी कोरी सायकल घ्यायला कुलकर्णी अँड सन्स तिथे सज्ज होतेच, आणि अजुनी आहेत. मिलन, कला विकास फोटो स्टुडिओ पण सेवेला हजर असायचे. सारं काही श्री जोगेश्वरीच्या सानिध्यातच मिळाल्यामुळे वरमायपिता वधूमायपिता धन्य धन्य होऊन मानाच्या कसबा गणपतीला पान सुपारी, अक्षत, विडा, शकुनाचे पाच लाडू आणि पत्रिका द्यायला नटून थटून बाहेर पडायचे.  

– क्रमशः भाग पहिला 

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares