(संस्कारधानी जबलपुर की सुप्रसिद्ध साहित्यकार सुश्री मीना भट्ट ‘सिद्धार्थ ‘जी सेवा निवृत्त जिला एवं सत्र न्यायाधीश, डिविजनल विजिलेंस कमेटी जबलपुर की पूर्व चेअर हैं। आपकी प्रकाशित पुस्तकों में पंचतंत्र में नारी, पंख पसारे पंछी, निहिरा (गीत संग्रह) एहसास के मोती, ख़याल -ए-मीना (ग़ज़ल संग्रह), मीना के सवैया (सवैया संग्रह) नैनिका (कुण्डलिया संग्रह) हैं। आप कई साहित्यिक संस्थाओं द्वारा पुरस्कृत एवं सम्मानित हैं। आप प्रत्येक शुक्रवार सुश्री मीना भट्ट सिद्धार्थ जी की अप्रतिम रचनाओं को उनके साप्ताहिक स्तम्भ – रचना संसार के अंतर्गत आत्मसात कर सकेंगे। आज इस कड़ी में प्रस्तुत है आपकी एक अप्रतिम रचना – नवगीत – गुरुवर वंदना…।
(साहित्यकार श्रीमति योगिता चौरसिया जी की रचनाएँ प्रतिष्ठित समाचार पत्रों/पत्र पत्रिकाओं में विभिन्न विधाओं में सतत प्रकाशित। कई साझा संकलनों में रचनाएँ प्रकाशित। दोहा संग्रह दोहा कलश प्रकाशित, विविध छंद कलश प्रकाशित। गीत कलश (छंद गीत) और निर्विकार पथ (मत्तसवैया) प्रकाशाधीन। राष्ट्रीय/अंतरराष्ट्रीय मंच / संस्थाओं से 350 से अधिक सम्मानों से सम्मानित। साहित्य के साथ ही समाजसेवा में भी सेवारत। हम समय समय पर आपकी रचनाएँ अपने प्रबुद्ध पाठकों से साझा करते रहेंगे।)
☆ कविता ☆ प्रेमा के प्रेमिल सृजन… नागपंचमी☆ श्रीमति योगिता चौरसिया ‘प्रेमा’ ☆
☆ नाती आणि विश्वास… भाग-१ ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
आयुष्यात शिक्षण, संस्कार, प्राथमिक मुलभूत गरजा यांच्या सोबतीने आवश्यक असते ती म्हणजे आपण जोडलेली, निभावलेली नाती. ही नातीच आपला समाज असतो. या समाजाचं आपण काही ना काही देणं लागतो.
पैसा आयुष्यात जितका महत्त्वाचा आहे तितकीच नाती आणि जिवाभिवाची माणसं देखील महत्वाची आहेत. माणसाचं माणूस पण, माणुसकी जपणारी ही नातीच त्याचं समाजातील अस्तित्व ठरवतात.
अमली पदार्थ सेवन, व्याभिचार या वैयक्तिक बाबी आहेत. त्याचा अतिरेक किंवा लपवा छपवी नात्यात अत्यंत घातक असते. “जसा बाप तसा बेटा” ही म्हण कायमच चांगल्या अर्थाने वापरात यायला हवी.
आपल्या मुलानं तरी आपण केलेल्या चुका करून इतरांची मने दुखावू नयेत या करिता आपण आपली वागणूक, वर्तन, व्यवहार आदर्श वत असावा.
आपण कुणाचा आदर्श घ्यायचा? कुणाचा आदर्श समोर ठेवायचा? आपली जबाबदारी ,आपली कर्तव्ये हे सारे जर आपण आपल्या आर्थिक परिस्थितीशी निगडीत केले तर हा गुंता सोडवायला अतिशय कठीण जाईल.
आपण आणि आपली जबाबदारी यात जोपर्यंत ”आई बाबा ‘, यांचा समावेश होत नाही तोपर्यंत ही पळवाट आडवाटेनं या समाज व्यवस्थेला , कुटुंब व्यवस्थेला दुर्बल करीत रहाणार यात शंका नाही.
विश्वास हा दोघांचा दोघांवर, दोन्ही कडून तितकाच दृढ असायला हवा. नात्यात हा विश्वास पटवून देण्यासाठी कींवा संशयास्पद वातावरण निर्मिती साठी,नात्यात कटूता, संशय, सामंजस्य निर्माण होण्यासाठी,तिसऱ्या व्यक्तीची गरज लागावी यांसारखे दुर्दैव नाही. नात्यात पारदर्शकता असेल संशय, अविश्वास निर्माण होत नाही आणि जर झालाच तर तो वेळीच निराकरण होणे अत्यंत गरजेचे असते अन्यथा नाते संपुष्टात येते. नात्यात बदली माणूस येऊ शकतो पण तो आपल्या माणसाची जागा घेईलच असं नाही. आपण आपल्या कुटुंबास जसे वागवतो तसेच आपली पुढची पिढी त्याच्या कुटुंबाशी, समाजाशी वागणार आहे याचा विचार करून आपण आपले वागणे ठेवायला हवे.
“मी माझ्या माणसांचा आहे, घरातील बाई माणूस माझ्या कुटुंबाचा घटक आहे त्याच मन जपणे ही माझी जबाबदारी, आद्यकर्तव्य आहे…” हे जोपर्यंत पुरुष प्रधान संस्कृती मान्य करीत नाही तोपर्यंत ही पळवाट अशीच निघत रहाणार. आपण घडायचं की आपण बिघडायचं ..? घरातल्या स्री ला आधार द्यायचा की , आपल्या संशयास्पद वागणुकीचा भार व्हायचं हे आता ज्याचं त्यानचं ठरवायचं. ..!
पुरूषाला मैत्रीणी आणि स्त्रियांना विवाहोत्तर मित्र जरूर असावेत..पण त्यात दोन्ही बाजूंनी पारदर्शकता असावी..! “मी सांगतो आहे तेच खरं आहे.. तुला विश्वास ठेवायचा असेल तर ठेव” असं सांगून जर आपण असत्याचा आधार घेतला तर आपण इतरांना नाही पण स्वतः ची मात्र अवश्य फसवणूक करतो.
आयुष्याच्या प्रवासात प्रत्येकावर खोटं बोलण्याची वेळ येते.. काही वेळा इतरांचे मन जपण्यासाठी ते आवश्यक देखील असते..पण या खोट्या ची बोलणाऱ्याला आणि ऐकणाऱ्याला सवय होऊ नये हे पथ्य पाळायला हवे.
पती पत्नीच्या नात्यात विश्वास अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रेमापोटी नात्यातील एकच व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या सर्व चुका माफ करत असेल,त्याने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीला सत्य मानून त्यावर विश्वास ठेवत असेल तर त्या व्यक्तीचा विश्वासघात होऊ नये याची काळजी दुसऱ्या व्यक्तीने घ्यायला हवी. आपले गृहस्थ जीवन जितके सुखी, आनंदी, समाधानी असेल,तितके आपण जीवनात यशस्वी होतो. आपल्या मनात येईल तसे वागणे, भरपूर पैसा कमावणे,आपली व्यसने जोपासणे, उच्च शिक्षण घेऊन विशिष्ट समाजात नाव लौकीक निर्माण करणे म्हणजे यशस्वी जीवन नव्हे.. “आपल्या मनातली माणूसकी इतरांच्या मनात अबाधित रहाणं” हे यशस्वी जगण्याचं खरं सूत्र आहे.
आई वडील जन्म भर पुरत नाहीत पण आईवडिलांनी केलेले संस्कार आपण आपल्या पुढील पिढीला समर्पित करणे आपले आद्य कर्तव्य आहे.
आपल्या वडिलांच्या दुर्गुणांचा त्याग करून त्यांच्या मधील सद्गुणी वारसा उचलणे जास्त हितकारक असते.
“आपलं ठेवायचं झाकून.. अन् दुसऱ्याचं पहायचं वाकून” ही मानसिकता बदलायला हवी. मैत्री च्या नात्यात तर (पारदर्शकता,) प्रेम आणि विश्वास हेच त्या नात्यांचे श्वाच्छोश्वास ठरतात. मैत्री त अशी काही गुपिते जिवापाड जपली जातात जी, जीव गेला तरी एकमेकांच्या ओठांवर येतं नाहीत.वेळप्रसंगी असे मित्र आपल्या कठीण काळात आपले आधार ठरतात. अशा मित्रांना कधीही विसरू नये. असा मित्र रागावला तरी तोच आपला खरा, सच्चा नातेवाईक असतो.कारण त्याचा राग म्हणजे दुसऱ्याच्या चुकीसाठी स्वतः ला करून घेतलेली शिक्षा असते. जिथे जिवापाड प्रेम असते.. नात्यात तिथेच राग ही असतोच.
मी मध्यंतरी वाचले होते,
“मनुष्याचा पृथ्वीतलावरचा प्रवास संपला की त्याच्या गुणकर्मास आठवून इष्टमित्र व नातेवाइकांस अश्रू अनावर होतात. हे स्वाभाविकही आहे. ज्याच्याबरोबर खेळलो, बागडलो, सुख-दु:खाचे अनेक प्रसंग वाटून घेतले तो आयुष्याचा साथीदार जर निघून गेला तर दु:खाचा बांध फुटतोच*
परंतु ज्याचे कुणीच नाही, ज्याने जगताना सुख-दु:ख कधी वाटून घेतले नाही, कुणाच्या हाकेला कधी धावून गेला नाही अशा माणसाचा मृत्यू झाल्यानंतर रडायचे कुणी? पण कुणीतरी गेल्यावर,कुणीतरी रडणे ही तर एक जगरहाटी आहे. म्हणून निव्वळ यासाठी तरी नाती जोडा नाती जपा….!!!”
माणसाच्या माघारी कोण त्यांच्या साठी किती रडला,कसा रडला यापेक्षा तो कसा जगला..कसा होता याच्या आठवणी माणसाला जास्त रडवतात.माणसाचं माणूसपण त्याच्या खरे पणाने सिद्ध होत.त्यानं नात्यात केलेल्या आर्थिक उलाढाली वर नाही. हिशोब कागदावर रहातो.पण नाती मनात कायम जिवंत रहातात.. अगदी कोणी कितीही दूर गेला तरी मनात जोडलेली नाती मनात कायम रहातात. कारण त्या व्यक्तीनं दिलेलं प्रेम, विश्वास, आपलेपणा आणि निभावलेलं नातं यांवर त्याच, तिचं नातं अबाधित रहातं.
अतिशय सुंदर असा संदेश यातून दिला गेला. कुटुंबातील व्यक्ती हाच आपला एकमेव आधार आहे . “आपल्या कुटुंबातील माणसांना आपण आपला वेळ द्यायला हवा” आपण हा सल्ला इतरांना देताना आपण आपल्या कुटुंबातील व्यक्तींसाठी विश्वास पात्र आहोत का..? “आपण आपल्या कुटुंबातील व्यक्तींना किती विश्वासात घेतो, किती वेळ देतो..?” तसेच आपण, “आपल्या पत्नीला/पतीला, मुलांना आपण समाधानी,खूष ठेवले आहे का..?” याचा विचार प्रत्येक पुरुषाने/स्त्रीने नाती निभावताना करायला हवा.
☆ ‘नागपंचमी…‘ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’☆
सनातन वैदिक हिंदू धर्म हा एकमेवाद्वितीय आहे. हिंदू धर्मातील प्रत्येक सर्व सण/उत्सव हे विज्ञानावर तरी आधारित आहे किंवा कर्तव्यावर. ‘कृतज्ञता’ हा हिंदू संस्कृतीचा आत्मा आहे. निव्वळ ‘सोहळा’ (इव्हेंट) साजरा करणे हा कोणत्याही सणांचा किंवा उत्सवाचा हेतू खचितच नाही. नागपंचमी सुद्धा त्यास अपवाद नाही. एकच चैतन्य सर्व प्राणीमात्रांत भरून राहिले आहे, यावर हिंदू धर्माचा नुसता विश्वास नाही तर तशी पक्की धारणा आहे. हिंदू धर्मियांनी ‘तसे’ आचरण करून दाखविले आहे, असे आपल्या लक्षात येईल. ही परंपरा खूप प्राचीन आहे. त्याकाळात दळणवळणाची, संपर्काची अल्पसाधने असतानाही तत्कालीन समाज व्यवस्थेने ही परंपरा रुजवली, सांभाळली आणि वृद्धिंगत केली. याबद्दल आपण सर्वांनी आपल्या पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे अत्यावश्यक आहे. आज मात्र ही हजारो / लाखो वर्षांची परंपरा कुठेतरी शीण होते की काय असे वाटण्यासारखी परिस्थिती आहे. ब्रिटिशांना जे त्यांच्या सुमारे दीडशे वर्षांच्या राजवटीत जमले नाही ते मात्र त्यांनी घालून दिलेल्या शिक्षणपद्धतीने सत्तर वर्षात करून दाखविले आहे असे खेदाने नमूद करावे लागत आहे. एका अर्थाने आज हिंदू धर्म हा अप्रागतिक, बुरसटलेल्या विचारांचा आणि एकूणच मागासलेला आहे असा जो प्रचार सर्वच माध्यमांतून चालू आहे त्यास प्रत्युत्तर देणे हा या लेखनाचा हेतू निश्चित आहे, पण तो गौण आहे. या लेखाचा मूळ हेतू हा आहे की आपला हिंदू धर्म हा विश्वातील सर्व धर्मांमध्ये वैज्ञानिकता आणि कृतज्ञता याबाबतीत सर्वश्रेष्ठ आहे आणि तसे आपण साभिमानाने जगास सांगितले पाहिजे. आज त्याची नितांत गरज आहे.
हिंदू धर्मात पशुपक्षांचीही कृतज्ञभावाने पूजा करण्याची पद्धत आहे, परंपरा आहे. गायीवासरांसाठी ‘वसुबारस’, शेतीच्या कामास उपयुक्त ठरणाऱ्या बैलांसाठी ‘बैलपोळा’, मधुर आवाजाने मंत्रमुग्ध करणाऱ्या कोकिळेसाठी ‘कोकिळाव्रत’ तर शेतीचे उंदरांपासून आणि इतर किटकांपासून संरक्षण करणाऱ्या नागांसाठी ‘नागपंचमी’, वनरक्षणासाठी ‘वटपौर्णिमा’, अशा प्रमुख सणांचा उल्लेख करता येईल. नागांचा इतिहास मनुष्याइतकाच पुरातन आहे असे म्हणता येईल. साक्षात देवाधिदेव महादेव यांनी नागाला आपल्या कंठी धारण केलेले आहे. कृष्णलीलांमध्ये कालिया मर्दन प्रसिद्ध आहे. त्यानंतर मंगलमूर्ती गणपतीच्या कमरेत नाग आहे, तर सर्व सृष्टीचे पालक भगवान विष्णू हे स्वतः शेषशायी निवास करतात. रामावतार आणि कृष्णवतारात स्वतः शेषनाग भगवंताचे एकदा ज्येष्ठ बंधू झाले तर एकदा कनिष्ठ बंधू झाले. नागास शेतकऱ्यांचा मित्र असेही म्हणतात. सरपटणाऱ्या प्राण्यांचे राजे हे ‘नागराज’ असावेत. राजाचा मान केला की स्वाभाविकपणे तो आपसूकच प्रजाजनांचाही होतो. या दृष्टीने विचार करता नाग हा आपल्या संस्कृतीचा तसेच आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग आहे.
नाग देवता आणि त्यांची प्रजा यांविषयी कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे. वडाच्या फांद्या तोडून पूजा करणे आणि नागोबाला पकडून त्याची पूजा करणे हे दोन्ही एकाच प्रकारचे आहे आणि दोन्हीही त्याज्यच आहे. भले साप दूध पीत नसेल, नागाणे खात नसेल, पण त्यामागील मुख्य हेतू अथवा मर्म लक्षात न घेता मी त्यावर टीका करणार नाही, आपल्याच परंपरांची खिल्ली उडवणार नाही, असे आज प्रत्येकाने ठरवण्याची गरज आहे. हा सण श्रावणात येतो. या महिन्यात हवा सारखी बदलत असते, पोटातील वैश्वानर थोडा मंद असतो, म्हणून भाजलेले कडधान्य, दूध, लाह्या इ. पदार्थ पचावयास हलके आणि पौष्टिक असतात. म्हणून ते नागाला वाहण्याची पद्धत असावी. दुर्वा ही औषधी वनस्पती आहे. ती सुद्धा नागास वाहिली जाते. त्यानिमित्ताने दुर्वा दारी राहतील असाही प्रयत्न असावा. कृषिप्रधान देशात कृषिला उपयुक्त ठरणाऱ्या सर्व भूतमात्रांचे मनुष्याने ऋणी असणे अत्यंत गरजेचे आहे असे मला वाटते.
नाग, सापांची उपयुक्तता घरोघरी, शाळा, महाविद्यालये यांच्यामध्ये जाऊन सांगितली पाहिजे. नागांमुळे उंदरांच्या संख्येवर नियंत्रण राहते. हरित क्रांतीची मनीषा पूर्ण व्हायची तर उंदरांच्या पोटात जाणारे धान्य वाचवावे लागेल. प्रत्येक तीन पोत्यापैकी एक पोते उंदीर खातात. म्हणूनच नागपंचमीचे आधुनिक व्रत ‘धामण पाळा नि धान्योत्पादन वाढवा’ अशा उद्घोषणाबरोबरच ते कृतीतूनही व्हायला हवे. तरारून आलेल्या शेताकडे पाहून कृषी कन्यांना केवढा आनंद होतो ! मग त्या भविष्याची सुख- स्वप्ने पाहात उंच उंच झोके घेतात व हा सण साजरा करतात. या काळात मुलांनी मैदानी खेळ खेळावे अशी जुनी प्रथा आहे. त्यासाठी मैदानी खेळांच्या स्पर्धा भरविण्याचा संकल्प श्रावणात धरावा व चातुर्मासात पूर्ण करावा. पर्यावरण संतुलन करण्यामध्ये सरपटणाऱ्या प्राण्यांचा अर्थात नागदेवतेचा मोठा वाटा आहे. निसर्गात प्रत्येक जण एकमेकांवर अवलंबून आहे. ही एक जीवनसाखळी आहे. यातील एक दुवा जरी निस्टला तरी पूर्ण साखळी तुटते. आज पर्यावरणाची जी गंभीर समस्या निर्माण झाली आहे त्यामागे या ‘साखळी’चा कमकुवतपणा कारणीभूत आहे. याबाबतीत आज ‘सर्पमित्र’ अतिशय जबाबदारीने कार्य करीत आहेत. आजच्या मंगलदिनी त्यांचेही कौतुक करायला हवे आणि त्यांच्याप्रती कृतज्ञताही व्यक्त करायला हवी. सरपटणाऱ्या प्राण्यांबद्दल आदर करण्यासाठी घरांमधून कापणे, चिरणे आदी आजच्या दिनी वर्ज्य केले जाते. शेतकरी आजच्या दिवशी जमीन नांगरत नाहीत, एकूणच शेतीच्या कामांना सुट्टी असते.
याबाबत काही पौराणिक कथाही सांगितल्या जातात. विस्तार भयास्तव त्या इथे देत नाही. आपण सर्वांनी नागपंचमीचे महत्व समजून घेऊ आणि पर्यावरण संतुलन राखण्यासाठी या सरपटणाऱ्या प्राण्यांची हत्या न करण्याचा संकल्प करू आणि खऱ्या अर्थाने नागपंचमी साजरी करू.
दुपारचे दोन वाजून गेले होते.रोजच्यापेक्षा जेवणासाठी मला घरी जायला मला त्यादिवशी बराच उशीर झाला होता. मी त्यावेळी संस्थेच्या कॉर्टर्समध्ये राहायला होतो. आमची खोली दुसऱ्या मजल्यावर शेवटची होती.गाडी पार्किंगमध्ये लावून मी पटापट जी ने चढून वर गेलो. माझ्या पावलांचा आवाज ऐकून आई दरवाजात येऊन उभी होती. माझ्या येण्याची ती वाटच पाहत होती. दुपारी मी घरी येईपर्यंत ती सुद्धा जेवण करीत नसायची. तू लवकर जेवण करत जा असं मी अनेक वेळा सांगूनही ती ऐकत नव्हती आणि ऐकणारही नव्हती. कारण आईची मायाच असते तशी. लेकरांसाठी आपले तहानभूक हरवणारी ती एकमेव व्यक्ती असते.
मी दरवाजात उभ्या असलेल्या आइकडे पाहिले तर त्यावेळी मला ती थोडी नर्व्हस दिसली. आज मला यायला उशीर झाल्यामुळे ती सुद्धा जेवणासाठी ताटकळी असल्यामुळे तसे झाले असेल असा अंदाज मी बांधला. “आई,जेवलीस का?” मी आत येताना तिला सहज विचारले.
” न्हाय ” तिने हलक्या आवाजात उत्तर दिले.
“जेवून घ्यायचंस ना मग?” मी सोप्यावर बसत म्हटले.
” अरे जेवणारच व्हते पण धुणं वालीची वाट बघत होते. “
“म्हणजे? ती अजून आली नाही?”
” नाही बाबा अजून … “
“ती काल काही बोलली का?”
“न्हाय रे, काल तर ती एकदम खुशीत व्हती.”
“मग तिला पगार वगैरे कमी ठरवलंस काय?”
” न्हाय रं बाबा… असं कसं! आरं बाबा नुसत्या धुणेभांड्याचेच ती सहाशे रुपये घेती. पण आपले फकस्त धुणं आणि फरशी मिळून सातशे रुपये ठरवले मी तिला.
ती सहाशेच रुपये द्या म्हणत होती पण मी म्हटलं जाऊद्या गरिबाला शंभर रुपये जास्तीचे.एकेकाळी मी बी अशीच लोकांकडं शेतात पडल ते काम करायची म्हणूनच मला पांडुरंग उभा राहिला, माझ्या पोरांचं चांगलं झालं अन अजूनबी लय चांगलं व्हाईल. ” जुने दिवस आठवून आई इमोशनल झाली होती. बोलताना तिच्या डोळ्यात हलकेच पाणी तरळले होते.मी पटकन विषय बदलत म्हटले, “मग तिला आपलं घर आवडलं नाही का?”
“तसं बी काय न्हाय.मावशी तुमच्या घरी याची माझी विच्छा होती ती आज पुरी झाली असं ती आनंदानं म्हणत होती.
तसं म्हणायला आपल्या घरी माणसं पण कमी आहेत होय आपल्या सगळ्यांना ओळखते ती. आली असेल काहीतरी अडचण तिला आज थोडा वेळ वाट पाहू.
दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच दुपारी तीन वाजेपर्यंत मोलकर्णीची वाट पाहिली शेवटी आईने भिजवलेले ओले कपडे धुऊन टाकले पण ती काही आली नाही.
मात्र ती का आली नाही याचे कोडे आईला व मला पडले होते.
विशेष म्हणजे ती न येण्यामागचे एकही सबळ कारण आम्हाला सापडत नव्हतं…
आमच्या घरी धुणं-भांडी करण्यासाठी खरे तर तीच आमच्या मागे गेल्या दोन महिन्यापासून लागली होती.
मावशी मला तुमच्या घरी कामाला न्या असं सारखं म्हणायची. पण आमच्या घरी निर्मला आधीपासूनच होती तीही कामाला व स्वभावाला खूप चांगली होती गरजू व होतकरू होती. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आईची आणि तिची छान गट्टी जमली होती आणखी दहा पाच वर्षे तरी निर्मला आपल्या घरचे काम सोडणार नाही असे मला त्यावेळी वाटत होते.
निर्मला एक तरुण विधवा होती. तिला दोन लहान मुले होती. चार-पाच घरची धुणं -भांडी करून ती मुलांना सांभाळत होती. तिला जवळच असं कोणीच नव्हतं. पण गुणांनी ती खूप चांगली होती. तिचा चेहरा निरागस होता. डोळ्याची पापणी सदा खाली पडलेली असायची. वाट्याला आलेले भोग स्वीकारून ती परिस्थितीशी लढा देत होती. आयुष्याचा अजून खूप मोठा टप्पा बाकी होता पण तिने सुरुवात तर झकास केली होती.त्यामुळे ती आपल्या कामात यशस्वी होण्याची खात्री वाटत होती. लेकरांसाठी पडतील ते कष्ट घेण्याची तिची तयारी दिसत होती. शिवाय आई तिला दररोज धीर दयायची.
” सरून जातील दिस आज ना उद्या.काळजी करू नगो. कष्ट करत रहा. ” असा सल्ला द्यायची अन मग निर्मलाला नवी उभारी मिळायची. ती धावून धावून घरातली कामं करायची.
दुसऱ्या कोणाकडे हात न पसरता आपणच कष्ट करून स्वाभिमानाने जगावे असे तिने जणू ठरवले होते आणि त्याप्रमाणे ती वागत होती म्हणून आम्हालाही तिचा फार अभिमान वाटत होता. निर्मला आमच्याकडे कामाला आल्यापासून साधारणपणे चार महिने सगळे काही व्यवस्थित चालले होते. परंतू एके दिवशी भलतेच घडले!
एक किराणा दुकानदार तिच्या झोपडीत घुसला तिला दमदाटी करून त्याने आपले साध्य साध्य केले… त्याप्रसंगी निर्मला खूपच घाबरली होती. परंतू तिला प्रतिकाराची फारशी संधी त्या नराधमाने दिली नव्हती. रात्रीच्यावेळी घरात एकटी गाठून त्याने त्याचा कुटील डाव साधला होता. हा घडलेला प्रसंग तीने आईला दुसऱ्या दिवशी सांगितला. आईने तिला धीर दिला. खोली बदलून एखाद्या ओळखीच्या नातेवाईकाचा आधार घेण्याचा सल्ला आईने तिला दिला. त्या दिशेने तिची नव्या झोपडीसाठी शोधाशोध सुरू झाली. परंतु कुठे काही जमले नाही.दोन लेकरांच्या एकट्या तरण्याताठ्या एकट्या बाईला खोली कोण देणार…!
दरम्यान त्या दुकानदाराला चांगलीच चटक लागली होती.त्याच्या तोंडाला रक्त लागले होते. तहान लागली की भागवायला तो निर्मलाच्या झोपडीत राजरोसपणे घुसायचा.निर्मला खूपच भेदरली होती पण आपलीच अब्रू जाईल म्हणून बिचारी कुठेही न वाच्यता करता निमटपणे सगळे सहन करत होती. परंतु त्या नराधमाने तिचा चांगलाच गैरफायदा घेतला होता…
शेवटी त्यानेच तिला त्याच्या सोईचीच एक खोली परहस्ते मिळवून दिली व आपल्या बैठकीतल्या मित्रांना तिच्याकडे घेऊन येऊ लागला…!
हे सगळे भयानक होते. संताप आणणारे होते. परंतू कोणाला काही करता येत नव्हते.
ज्यांचे जीवनच सारे..‘गमप’मय झाले होते, त्या आदरणीय लोकशाहीर विठ्ठल उमपांचा आज जन्मदिन. त्यानिमित्त त्यांच्या बरोबरच्या काही सुंदर आठवणी भराभरा जाग्या झाल्या, त्या तुमच्याबरोबर शेअर करत आहे.
काही वर्षांपूर्वी एका टीव्ही चॅनलसाठी उमपांचं आणि माझं गाण्याचं शूटिंग होतं. माझं गाणं झाल्यावर मी उमपांना ऐकण्यासाठी थांबले आणि इतका ‘पांडुरंगमय झालेला विठ्ठल’ मी प्रथमच पहिला! परमेश्वराला अत्यानंदानं आळवीत, ते ‘स्वरचित’ काव्य गात होते…
गोरोबाच्या हाती, मातीचा चिखल
बोलतो विठ्ठल पांडुरंग… ||१||
*
सावतामाळी तो मळ्यात राबता
मळा होई बोलता, पांडुरंग… ||२||
*
नामदेव शिंपी शिवताना कपडे,
शिलाई ओरडे पांडुरंग… ||३||
*
विठ्ठल अभंग – गातो रे विठ्ठल
ऐकतो विठ्ठल – पांडुरंग… ||४||
एखादा चित्रपट पहावा, त्याप्रमाणे त्यांच्या ओठून शब्द सहजपणे ‘जिवंत’ होऊन येत होते. स्टुडिओची ‘पंढरी’ झाली होती! साक्षात् विठ्ठलाचं दर्शन त्यांनी आम्हाला घडवलं. परमेश्वराशी तद्रुप होणं म्हणजे काय, याचा सुंदर आविष्कार होता तो! प्रत्येक अंतऱ्यागणिक डोळ्यांत पाणी आणि अंगावर काटा येत होता!
त्यानंतर एकदा उमपांनी मला ‘जांभूळ आख्यान’चं निमंत्रण दिलं. मुलाच्या परीक्षेमुळे लवकर परतायचं ठरवूनही, संपूर्ण आख्यान पाहूनच घरी आले. खुर्चीला खिळवणारं हे संगीत आणि नृत्यही भारावून टाकणारं होतं. परमेश्वरानं दिलेल्या पुरुषी रूपातही ७८ वर्षांच्या (त्यावेळी) उमपांनी साक्षात् सुंदर कोवळी द्रौपदी ‘जिवंत’ उभी केली. पांडवांच्या अनुपस्थितीत कर्ण आल्यावेळी, तिचं कर्णाला पाहून लाजणं, मिलनोत्सुक होणं, अधीर होणं आणि पांडवांसमोर, कृष्णाने सत्य उघड केल्यावर बिथरणं, सारं इतकं थरारक, की प्रत्येक श्रोता ‘स्वतःतच’ द्रौपदीला अनुभवत असावा! या वयात त्यांचा स्टेजवरील वावर, खड्या आवाजातील भावस्पर्शी गाणं, अभिनयाच्या बादशहालाही लाजवेल असा अलौकिक आविष्कार पाहून वाटलं, देहभान विसरून कलेचा ‘परमोच्च आनंद’ घेणं म्हणजेच ‘अध्यात्म’!
मी महाराष्ट्र टाइम्समध्ये ‘माझं अध्यात्म’ या सदरात त्यांच्या ‘जांभूळ आख्यान’ मधील मला अत्यंत अध्यात्माविषयी लिहिलेलं वाचून उमपांचा मला फोन आला. ते म्हणाल, “पद्मजा ताई, तुम्हाला संतांचं संचित मिळालं आहे. एखाद्या पोक्त माणसानं इतरांबद्दल मनमोकळेपणे, मुक्तपणे लिहावं, तसं स्वानुभवाचं गांठोडं तुमच्या आत्म्याच्या कप्प्यातून आलंय. ती दृष्टी तुम्हाला इतक्या लहान वयात मिळाली आहे, ही परमेश्वरी कृपाच!” असं सांगून त्यांनी भरभरून आशीर्वाद दिले.
आजही जांभूळ आख्यानातील ‘अन् कर्णाला पाहून द्रौपदीचं मन पाकुळलं…’
या ओळी कानी घुमू लागल्या, तरी उमपांचा चतुरस्र अभिनय डोळ्यांसमोरून हलत नाही!
याच आदरणीय शाहीर विठ्ठल उमपांच्या नावे मला २४ नोव्हेंबर २०१३ रोजी ‘वत्सला प्रतिष्ठान’ तर्फे ‘मृद्गंध’ हा मानाचा पुरस्कार दिला गेला. तो स्वीकारताना विठ्ठल उमपांच्या ‘आठवणींचा गंध’ मला पहिल्या पावसानंतरच्या मृद्गंधासारखाच उत्साहित करून गेला! काव्य, गायन, वादन, लेखन, नृत्य, सर्वच क्षेत्रांत अशी ‘अलौकिक’ मुशाफिरी करणारा असा कलावंत, पुन्हा होणे नाही!
☆ अवयवांची गंमत – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆
☆
१. जिभेचे वजन खूप हलके असते, पण तिचा तोल सांभाळणे खूप कठीण असते.
२. जीवन जगायचं पावलांप्रमाणे. प्रथम पडणार्या पावलाला गर्व नसतो, आणि मागे पडणाऱ्या पावलाला कुठलाच कमीपणा नसतो.
३. पाठ मजबूत ठेवा कारण शाबासकी किंवा धोका पाठीमागूनच मिळणार आहे.
४. माणसाने घमेंडीत एवढे उडू नये की एक दिवस जमिनीवरच पाठ ठेवायची असते हे विसरू नये.
५. सगळ्यात सुंदर नातं हे डोळ्यांचं. एकत्र मिटतात, उघडतात, रडतात आणि एकत्र झोपतात, पण एकमेकांना न पाहता.
६. नातं हे हात आणि डोळ्यांप्रमाणे पण असावं, कारण हाताला लागलं की डोळ्यात पाणी येतं आणि डोळ्यात पाणी आलं तर हात डोळे पुसतात.
७. एकदा हाताने पायांना विचारले, “तुझ्यावर सगळे डोके ठेवतात तो अधिकार मला का नाही?”त्यावर पाय हसून म्हणाले, “यासाठी जमिनीवर असाव लागतं, हवेत नाही.”
८. दुःखात बोटं अश्रू पुसतात, तर आनंदात तीच बोटं टाळ्या वाजवतात. आपले अवयवच असे वागतात तर दुनियेकडून काय अपेक्षा ठेवायची!
९. जगातील सुंदर जोडी म्हणजे अश्रू आणि हास्य. पण ते एकत्र कधीच नसतात, पण जेव्हा एकत्र येतात तो सगळ्यात सुंदर क्षण असतो.
१०. एकदा देवाच्या पायावरची फुले गळ्यातील फुलांना म्हणाली, “तुम्ही असं कोणतं पुण्य केलं म्हणून देवाच्या गळ्यात आहात?” त्यावर हारातील फुले म्हणाली, “त्यासाठी काळजात सुई टोचून घ्यावी लागते.”
११. कान नावाचा घातक अवयव जे ऐकतो, तेच डोळ्यांना बघायला लागतो.
१२. या जगात चप्पल शिवाय योग्य जोडीदार कोणीच नाही कारण एक हरवली की दुसऱ्याचं जीवन तिथेच संपतं..
☆
कवी :अज्ञात
प्रस्तुती :सौ. सुचिता पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈