मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विनवणी ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

☆ विनवणी ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

खळ नाही आभाळाला

अविरत धरलीस धार

ओल्या दुष्काळाचे सावट,

करू लागले मनी घर !

घे उसंत आता जराशी

नदी नाल्या आले पूर,

वावरात शिरे पाणी

तोडूनिया त्याची मेर !

धीर सुटे बळीराजाचा

पाणी डोळ्याचे खळेना,

उघड्या डोळ्यांनी पाहे

पेरणीच्या शेताची दैना !

कर उपकार आम्हांवर

पुन्हा एकदा विनवितो,

भाकर तुकडा लेकरांचा

सांग कशास पळवतो ?

सांग कशास पळवतो ?

 

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 183 ☆ पावसाळा… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 183 ? 

☆ पावसाळा… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

पावसाळा म्हंटल की, चिखल आला

पावसाळा म्हंटल की, छत्रीही आली.!!

*

पावसाळा म्हंटल की, शेतकरी सजग होतो

पावसाळा म्हंटल की, बळीराजा पेरणी करतो.!!

*

पावसाळा म्हंटल की, हिरवळ सजली

पावसाळा म्हंटल की, चहा भजी आली.!!

*

पावसाळा म्हंटल की, अगोदर हुरूप असतो

पावसाळा म्हंटल की, नंतर कंटाळा ही येतो.!!

*

पावसाळा म्हंटल की, शाळेला सुट्टी मिळते

पावसाळा म्हंटल की, नदी लिलया फुगू लागते.!!

*

पावसाळा म्हंटल की, प्रेम कविता बनतात

पावसाळा म्हंटल की, भावना अनावर होतात.!!

*

असा हा पावसाळा, अनेक कारणांनी गाजतो

तो कधी प्रलय तर, कधी सौख्य ही प्रदान करतो.!!

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “घरचा तांदूळ, प्लॅस्टिकचा तांदूळ ते कॅन्सरचा तांदूळ !” लेखक – श्री विनय जोशी ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? विविधा ?

☆ “घरचा तांदूळ, प्लॅस्टिकचा तांदूळ ते कॅन्सरचा तांदूळ !” लेखक – श्री विनय जोशी ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

यावर्षी भातशेती लावावी का नाही, प्रश्न होता. दरवर्षी भात लावणारे आमचे लोक विविध कारणाने वेंगलेले होते. आधीच कोकणी खेडेगावात लोकसंख्या झपाट्याने घटत आहे. त्यात शेतीसाठी मनुष्यबळ उपलब्ध होत नाही, मग तरीही भात लावलं आणि ते जून व्हायची वेळ आली की “वराहरूपं” आपले कारनामे दाखवतात. आमच्या बाजूला खाजण आहे, त्यात डुकरांच्या वसाहती आहेत. भाताचं पीक जून व्हायला लागलं की त्याचा घमघमाट सुटतो आणि डुकरांचे तांडे शेतात येऊ लागतात. यांच्या राठ केसात माश्या, गोचड्या आणि नारूचे जंत (टेप वर्म) असतात. त्यामुळे डुकरांना खूप खाज सुटते. मग ते तयार होत असलेल्या भात शेतात सामूहिक लोळतात! ओल्या शेतात लोळून भाताचा पेंढा, लोंब्या आणि ओली माती अक्षरशः एकजीव होऊन जाते!

रिपरिप पावसात केलेली लावणी, जमवून आणलेले मजूर आणि केलेले कष्ट धुळीस मिळालेले बघून शेतकरी रडायचा बाकी राहतो! अशा समस्त समस्यांमुळे यावर्षी भात लावायचं नाही हे जवळपास निश्चित होतं.

तेवढ्यात जालगावच्या विश्वासदादा फाटक यांचा मेसेज आला. त्यांना तांदुळात प्लास्टिकचे तांदूळ मिळाले! त्यांनी तांदूळ पाण्यात टाकले तर काही तरंगले म्हणून वर आलेले तांदूळ तव्यावर गरम केले, ते जळायच्या ऐवजी वितळून गेले! मी चार पाच वर्षांपूर्वी केरळमध्ये जप्त केलेल्या चिनी प्लास्टिक तांदुळाबद्दल ऐकलं होतं. पण प्रत्यक्षात असे कुणी बघितले, हे पहिलंच उदाहरण होतं.

यावरून मनाने परत एकदा उचल खाल्ली! भात लावूया असं ठरलं. याची पहिली तयारी खर्च किती केला आणि तांदूळ किती पिकला याचा हिशोब कागदावर मांडायचा नाही, असा निश्चय केला!

स्वस्त तांदूळ आणि कॅन्सर एक्स्प्रेस!

भातशेती परवडत नाही, मजूर मिळत नाहीत, घरचा तांदूळ महाग पडतो, बाजारात यापेक्षा स्वस्त तांदूळ मिळतो अशा विविध कारणांनी कोकणात भातशेती बंद पडली आहे. दराचा मामला खरंच सत्य आहे. घरी पिकवलेला तांदूळ बाजारी तांदुळापेक्षा दुपटीने, तिपटीने महाग असतो. पण तो तांदूळ येतो कुठून? आणि तो पिकतो कसा?

पंजाबच्या “माळवा” भागातून राजस्थानात रोज जाणारी बठिंडा बिकानेर पॅसेंजर रेल्वे ‘कॅन्सर एक्स्प्रेस’ नावाने कुप्रसिद्ध आहे. एकूणच पंजाबातील जमीन आणि भूजल कीटकनाशकांच्या अती वापराने विषारी झालेलं आहे. विषारी अन्न, पाण्यामुळे कॅन्सर आणि रासायनिक प्रदूषणाने मतिमंद मुलांचं प्रमाण तिथे अफाट आहे. त्यातही बठिंडा कॅन्सरबाबतीत सगळ्यात पुढे आहे. ही ट्रेन सर्वाधिक कॅन्सर पेशंट घेऊन रोज राजस्थानात जाते. भारताचं गहू आणि तांदुळाचं कोठार म्हणून आपण ज्या पंजाबला ओळखतो, त्या पंजाबची ही अवस्था आहे. असा पंजाबी तांदूळ भारतात सर्वत्र रेशन दुकानातून पोचत असतो!

आता कल्पना करा एका बाजूला प्लॅस्टिकचा तांदूळ, दुसऱ्या बाजूला कीटकनाशकांचा अतिरेकी, अवैज्ञानिक बेसुमार वापर करून पिकवलेला (नासवलेला?) पंजाबी तांदूळ आणि तिसरीकडे घरी पिकवलेला सकृतदर्शनी “महागडा”, “परवडत नसलेला” तांदूळ यापैकी कोणता श्रेयस्कर?

स्वतःची भातशेती असणं भाग्याची गोष्ट. त्यात ती शेती करायला कष्टाळू माणसे मिळणं अजून भाग्याची गोष्ट आणि त्यात बाजारभावापेक्षा जास्त खर्च येणार असला तरी तो खर्च करायला खिशात पैसे असणं ही त्याहून मोठ्या भाग्याची गोष्ट! सध्या तरी या तीन भाग्यांचा “त्रिवेणी संगम” झालेला आहे. त्यामुळे बंद पडता पडता शेती लावली गेली आणि अशीच पुढेही लावली जाईल, अशी अपेक्षा आहे!

🐗

‘वराहरुपं’चं काय करायचं?

अत्यंत उपद्रवी, चिक्कार पिलावळ जन्माला घालणारा रानडुक्कर हा प्राणी संरक्षित प्राण्यांच्या यादीत आहे! अनेक विनोदी सरकारी कायद्यापैकी हा एक कायदा! यामुळे रानडुक्कर मारून त्याचं मांस खाल्ल्यास किंवा विकल्यास गावातला कुणी चुगली करतो. मग वनविभाग सक्रिय होतो, पोलीस मागे लागतात आणि शिकारी स्वतःच शिकार होतो! यामुळे आता डुकराची शिकार क्वचित होते. परिणामस्वरूप आमच्या बागांमध्ये येऊन डुकरं नारळ सोलून टाकतात, नारळाची रोपं उकरून खालचा नारळ फोडून खातात, भाजीचा अळू उकरून त्याचे कंद खातात! भातशेतीत लोळून नासधूस करतात, अक्षरशः ५% भात हाती लागू देत नाहीत, अशी अवस्था आहे! पण तरीही डुक्कर “संरक्षित प्राणी” आहे!

डुकरं म्हणजे चार पायांचा जेसीबी असतो, समोर नांगराच्या फाळासारखा सुळा, अफाट ताकद आणि बेडर! समोर माणूस आल्यास सुळ्याने मांडी फाडून जातो. याला नियंत्रणात ठेवायचा एकमेव मार्ग ‘शिकार’ हाच आहे. यावर्षी वनविभागाला लेखी पत्र देऊन हजार डुकरं मारायची योजना मी केली आहे. शिवाय केंद्र सरकारमध्ये पाठपुरावा करून पाच वर्षांसाठी डुक्कर संरक्षित प्राण्यांच्या यादीतून काढण्यासाठी पाठपुरावा करत आहे!

शेवटी जी गोष्ट आपण संपूर्ण वर्षात सर्वाधिक खातो तो तांदूळ, कोणत्याही मार्गाने स्वतः पिकवून खाणे हाच सध्या तरी सर्वोच्च प्राथमिकता असलेला कार्यक्रम आहे. नाही तर कठीण अवस्था होणार आहे. छोट्या छोट्या शहरात सुद्धा सध्या कॅन्सरची साथ आल्यासारखी कॅन्सरप्रभावित लोकांची संख्या दिसते. त्याच्या मुळाशी ‘विषारी अन्न’ हेच सर्वात मोठं कारण आहे.

🌾🌾🌾🌾

येणाऱ्या काळात येईल त्या प्रत्येक समस्येला उत्तर शोधत, पडीक टाकलेल्या कोकणी शेतजमिनी परत एकदा डौलदार भातपिकाने हिरव्यागार झालेल्या दिसतील, असा मला विश्वास वाटतो!

लेखक : श्री विनय जोशी

संग्राहक : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ एक बोधकथा : आनंद चेंडू… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

? जीवनरंग ?

☆ एक बोधकथा : आनंद चेंडू ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

एक खूप गरीब माणूस… त्याचे नाव नारायण. शेतकरीच होता. अखंड काळ्या आईची सेवा करण्यात गुंतलेला. पण कोणत्याही वेळी त्याच्याकडे पहा.. कायम हसतमुख. सगळ्यांच्या मदतीला धावणारा, सगळ्यांना आपला सहारा देणारा. त्याच्या सान्नीध्यात जो कोणी येईल त्याला दिलासा वाटायचा. एक अनामिक सुख मिळायचे.

सगळ्यांनाच त्याचे कौतुक वाटायचे. कसा काय हा माणूस नेहमी आनंदी असतो हा प्रश्न सगळ्यांनाच पडायचा. त्याच्यावर कितीही संकटे येऊ देत, कितीही अडचणी येऊन ही  हसतच त्यावर मात करायचा.

शेवटी न रहावून त्यालाच हा प्रश्न विचारून याचे रहस्य जाणून घेऊया ठरले.

एक दिवस गावामध्ये मोठी जत्रा होती. त्यासाठी अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ऐनवेळेस एका कार्यक्रमाचे सादरकर्ते येऊ शकत नसल्याचे कळवले. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. पण आयोजक नाराज झाले. त्यांना खूप वाईट वाटून दु:ख झाले.

पण नारायण होतं असं कधी कधी त्यात कशाला वाईट वाटून घ्यायचे म्हणाला… नेहमी प्रमाणे हसरा चेहरा ठेवला… आणि जाऊ दे बाकी जत्रा बघायला मिळतेय ना? त्या निमित्ताने जास्त वेळही मिळतोय या समाधानाने तो आनंदी झाला व तेथून जाऊ लागला.

तेवढ्यात आयोजकांनी त्याच्याच मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर केला आणि त्याला स्टेजवर बोलावले.

प्रश्न पहिला :- तुमचा व्यवसाय कोणता आणि त्यातील समस्या काय काय आहेत?

नारायण :- व्यवसाय म्हणजे फायदा तोटा आला. म्हणून मी शेती करत असलो तरी त्याला माझा व्यवसाय मानत नाही. काळ्या आईची सेवा करणं असं मी मानतो. त्यामुळे आईच्या सेवेतून फायदा मी बघतच नाही तर त्यातून मिळणारे फळ असे मी मानतो आणि मग आईने दिलेले फळ जसे आपल्या आईने केलेले जेवण कोणी एकटा नाही खात तर सगळे मिळून खातो तसे सगळ्या बांधवाना ते देण्याचा प्रयत्न करतो. यामधे मला मी कोणासाठी तरी काहीतरी करू शकलो याचे समाधान मिळते आणि मी आनंदी होतो.

यातील समस्या म्हणजे पाऊस वेळेवर पडत नाही पडलाच तर योग्य प्रमाणात पडत नाही, त्यातूनही चांगले पीक मिळाले तरी अडते, दलाल योग्य भाव देत नाहीत, वेळेवर वाहनेही उपलब्ध होतं नाहीत.अशा अनेक सांगता येतील…

प्रश्न दुसरा :- तरीही तुम्ही कसे समाधानी रहाता?

नारायण :- मी अशावेळी जगाकडे पहातो, माझ्यापेक्षा जास्त अडचणी असलेल्या लोकांकडे बघतो आणि यातूनही आशावाद अंगी घेऊन सतत काही चांगलं होणार आहे असे मनाला समजावतो. त्यामुळे मला मी दुसऱ्यांपेक्षा जास्त बरा आहे ही जाणीव होते आणि मी आनंदी होतो. जे होते ते चांगल्यासाठीच ही धारणा ठेऊन आता काहीतरी चांगले घडणार आहे हे जाणून त्या चांगल्याच्या स्वागतासाठी मी आनंदी होतो.जगाकडे पाहिल्यावर आपल्याला काहीतरी चांगले शिकायला मिळणार आहे आणि त्यातून मिळणारे ज्ञान हे प्रगतीसाठी उपयोगी ठरणार असल्याने प्रगतीचित्र डोळ्यापुढे आणून मी आनंदी होतो.

प्रश्न तिसरा :- तरी पण जे भल्या भल्याना जमत नाही ते तुम्ही कसे जमवता? काय आहे याचे रहस्य?

नारायण :- रहस्य तर काहीच नाहीये. हे एक सोपे तंत्र आहे. मी दुःख झाल्याचे तोटे जाणतो म्हणून मी सतत मनाला दुःखी न होण्याची करणे सांगत असतो. त्यामुळे मन दुःखी होतं नाही, पर्यायाने आनंदी होते.

दुसरे असे की आनंदाच्या मागे लागायचे नाही असे ठरवल्याने आनंद पुढे पळतोय आपल्या हाती लागतं नाही हे दुःख होतं नाही. दुसरे आनंदी बघितले की ते आनंदी राहू शकतात मग आपण का नाही असे मनाला सांगितले की मन निदान आनंदी रहायच्या प्रयत्नाच्या नादात नकळत आनंदी होते. किंवा कोणी दुःखी दिसला तर आपल्याला ते दुःख नाही ना या विचाराने आनंद मिळतो आणि दुःखीतांचे दुःख हलके करण्याचा प्रयत्न करून जर त्याचे दुःख हलके केले तर त्या समाधानाने पण आनंदी रहाते.

तिसरे आणि महत्वाचे म्हणजे आनंद कोणती वस्तू नाही की ती मिळवायला पाहिजे. ती एक शाश्वत गोष्ट आहे जी स्वतःमधे असते याची कायम जाणीव ठेवली पाहिजे आणि आनंद कोणत्याही गोष्टीत नसून तो आपल्या दृष्टीत असला तर आपल्याला प्रत्येक गोष्टीत आनंद दिसेल. मग आपोआप आनंद मिळेल.

आपण जेवढे जे देऊ त्याच्या कैक पटीने ते आपल्याकडे चेंडू जमिनीवर आपटल्यावर अधिक उसळून परत आपल्याकडे येतो तसा दुसऱ्यांना दिलेला आनंद परत आपल्याकडे येतो मग परत हाच आनंद आपण दुसरीकडे पाठवला तर तेथूनही हा आनंद चेंडू परत आपल्याकडे येतो आणि या आनंद चेंडूच्या टप्प्याचा आनंदही आपल्याला मिळून एक चिरंतन निरंतर आनंद अनुभव आपण घेऊ लागतो.

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सत्य आणि फोन ::::: एक अलक ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? जीवनरंग ?

सत्य आणि फोन ::::: एक अलक ☆ श्रीशैल चौगुले ☆

सेवानिवृत्त्त वरिष्ठ आभियंता,जीवनप्राधिकरण विभाग,अधिकाऱ्याने आत्महत्या केलेली वार्ता सर्वत्र राज्यभर पसरली खरी. परंतु पोलीस तपास हेरखाते चौकशीत रात्री कुठून तरी चार फोन आलेले मोबाईलवरती आढळले. सदरील नंबरवर साईबरकडून हार्डवेअर सिस्टीम आॕडिओ काॕलींग ओपन करुन पाहिले तर एकच संदेश वेगवेगळ्या चार व्यक्तींनी केलेले ऐकविणेत आले.

“ हॕलो साहेब,तुमच्यावर दोन कोटी जलपुरवठा खात्यात भ्रष्टाचाराचा आरोप असून सकाळी अटक सत्रासाठी आमचे हेरपथक येणार असून आपण मानसिकदृष्ट्या संतुलनाने सज्ज रहावे.”

रात्री ठिकः १२ः०५ ,१२ःः०७,१२ः०९व १२ः११.या वेळेत झालेले फोन आढळले.

व आत्महत्या पहाटे ४ः५४ च्या सुमारास झालेले तपासात निषपन्न झाले.

मात्र दुसऱ्या  दिवशी अधिकाऱ्यांचा वाढदिवस होता व त्यांना “महाराष्ट्र राज्य प्राधिकरण उत्कृष्ठ जीवन सेवा” हा विशेष सन्मानार्थ प्रशासकिय पुरस्कार जाहिर झालेली बातमी सर्व मिडीया प्रसारमाध्यमे व वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाली होती.

चौघांना ताब्यात घेतले असता आॕफिस स्टाफ मित्रवर्गाने वाढदिवस व पुरस्कार बातमी आश्चर्याचा आनंदी हेतूने थट्टा  केल्याचा एकच रिपोर्ट चारी मित्रांकडून आला.

परंतु फोनवरील थट्टेने एका सेवाशील अधिकाऱ्याला पुरस्कार सन्मानास जीवंतपणी पहाता न आलेचे दुःख सर्व जि.प .व प.स. पासून सर्व प्रशासकिय खात्यास लपवता आले नाही. शोकांजलीकरिता तीन दिवस सुट्टी प्राधिकरण खात्यास जाहिर झाले.

१५ आॕगष्ट रोजी हा पुरस्कार सन्मान त्यांचे पश्चात श्रीमती पत्नीस अर्पण करणेत आला.

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “सावळा – –” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “सावळा – –” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

आभाळात काळ्या ढगांची गच्च दाटी झाली होती…

 काळोख दाटून आला होता ..  अंधारलं होतं 

 तो भार ढगाला सहन होईना

 तसा कोसळायलाच लागला

 धो धो ..  कितीतरी वेळ .. अविरत…

 मग एक क्षण असा आला

 .. सगळं मोकळं झालं

 ढगातून सोनेरी ऊन बाहेर पडलं

 ती बघतच राहिली…

 

 आता धरणी ते पाणी कुशीत घेईल नव्या सृजनासाठी..

 कोवळे अंकुर वर येतील पावसाळ्यातला हा सोहळा..

 आज तिने नीट समजून घेतला

 

 निसर्ग शिकवतो आपल्याला

 भरून आलं की योग्य ठिकाणी मोकळं करावं.. मन…

  मनातलं बोलून सांगून..

 प्रेमाने समजून घेणाऱ्याकडे

 

 मग समजूतीचे अंकुर फुटतात नव्याने जगण्यासाठी….

मायेचा प्रेमाचा प्रकाश मिळाला की अंकुरातून पाने येतील…

 पुढे फुलं फळं सुद्धा येतील

 

 तो सावळा ..

आभाळातला…

 आज तिच्यासाठीच बरसला

 म्हणजे खरंच तो तिथे असतो…

 

 अरे  खरंच की..

मग आता चिंताच नको 

आज तिचा तिला साक्षात्कार झाला.  तिने वर पाहून समाधानाने हात जोडले…

 कधी   कुठे कुठल्या रूपात भेटशील कळतच नाही रे .. .. 

  माझ्या सावळ्या…..

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ हसणं :  शिकायची बाब ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ हसणं :  शिकायची बाब !… ☆ श्री संभाजी बबन गायके 

काही मानवसदृश प्राण्यांचे चेहरे हसरे वाटू शकतात..पण ते हसू शकतात हे अजून सिद्ध झालेले नाही! एका हिंस्र प्राण्याचा आवाज माणसाच्या हसण्याशी साधर्म्य दाखवणारा आहे,पण त्याच्या जवळ गेले की माणसाचे हसणे भूतकाळात जमा होऊन जाण्याची शक्यता अधिक! अस्वल माणसाला गुदगुल्या करून करून मारून टाकते,असे कशावरून सांगतात ते न कळे!

मग राहता राहिला माणूस. हा प्राणी मात्र हसू शकतो. याचे हसण्याचे प्रकार नानाविध असतात,हेही खरेच.

कुणी इतरांना हसतो. कुणी कसंनुसं हसतो. स्वतःवर हसणारी माणसं तशी विरळाच असतात. अतीव दुःखातही एक उदास हसू चर्येवर उमटू शकते..नशीब थट्टा मांडते तेंव्हा !

हसवणे तसे बरेच सोपे असते..कारण माणसं फारसा विचार न करता हसू शकतात. किंवा आधी हसून घेऊन मग दातांनी ओठ चावून,किंवा जीभ बाहेर काढून काही क्षण दातांखाली दाबून ठेवून पश्चात्ताप व्यक्त करतात!

शेजारचा हसतो म्हणून काही माणसं मिले सूर मेरा तुम्हारा चालीवर हसतात.. विशेषतः इंग्लिश सिनेमा बघताना असे व्हायचे पूर्वी. दूरदर्शन मालिका वाल्यांनी मग पूर्व ध्वनिमुद्रित हास्य ऐकवून श्रोत्यांना इथे तुम्ही हसणे अपेक्षित आहे,असा दम देण्याचा प्रघात सुरू केला. हसताय ना? असं विचारून हसायलाच पाहिजे अशी गळ ही घातली जाते! Bench वर या शब्दाची शिवी करूनही हसण्याच्या जत्रेत रेवड्या वसूल केल्या जातात! दोन अर्थ निघतील..नव्हे काढलेच जातील अशी खात्री असलेल्यांचे दिवस होऊन गेलेत! अंगविक्षेप आणि डोळ्यांसह मुखविक्षेप करून हास्य सम्राट सुद्धा झालीत माणसं. मराठी भाषा किंवा कोणतीही भाषा अशुद्ध किंवा शुद्ध नसते..ती फक्त निराळी असू शकते! नव्हते जर शुद्ध तर व्हते अशुद्ध कसे? पण इतरांच्या निराळ्या शब्दोच्चारांचा विनोदाच्या अंगाने आपल्या बोलण्यात,लिहिण्यात उपयोग करून हशा वसूल करणारी उचली मंडळी सुद्धा आढळतात!

मनात शुद्ध हास्याचे कारंजे निर्माण करणाऱ्यांच्या नभोमंडलात सर्वाधिक तेजस्वी आणि तरीही नेत्रसुखद, कर्णसुखद माणूस म्हणजे.. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे नावाचे अवलिया !

यांनी हसायला शिकवले ! 

त्यांच्या स्मृतीने हसू न येता हात आपोआप जोडले जातात.. हे त्यांचे बलस्थान !

स्वर्गस्थ देवता आणि तत्सम अधिकारी आता ‘पुल’ नावाच्या आत्म्याला पुनर्जन्म देण्याची चूक करणार नाहीत…त्यांनाही स्वर्गात हसवायला ‘पुल’ कायमचे पाहिजे आहेत..नाही का?

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘पगार– –’ — लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. बिल्वा शुभम् अकोलकर ☆

?  वाचताना वेचलेले ? 

☆ ‘पगार – –’ — लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. बिल्वा शुभम् अकोलकर 

‘Miss World’ contest मधे  ‘हरियाणा’ ची डॉ मानुषी छिल्लर हिने विजेते पद पटकाविले होते.

शेवटच्या निर्णायक राऊंड मधे तिला प्रश्न विचारण्यात आला होता की सर्वात जास्त पगार कोणत्या क्षेत्रातील लोकांना मिळाला पाहिजे? तेंव्हा तिचे ‘winning’ उत्तर हे होते की “सर्वात जास्त पगार ‘आई’ला मिळाला पाहिजे.” आईच्या कामाचे मोल नाही!

तिच्या या उत्तराने तिने ती स्पर्धा तर जिंकलीच. बरोबर जगात एक नवीन विषय चर्चेला दिला. 

त्यानंतर फोर्ब्स व्दारे  संचालित वेबसाईट ‘Salary.com’ वर research सुरू झाला की एक आई जेवढं काम करते, त्या कामांसाठी जर वेगवेगळी माणसे ठेवली, तर त्यांना किती पगार द्यावा लागेल? तेंव्हा सर्व गोष्टी लक्षात घेता, एका आईचा पगार वर्षाला एक लाख पंधरा हजार डॉलर  (१,१५,००० डॉलर) असायला हवा. हा निष्कर्ष निघाला. म्हणजे तिला महिन्याला अंदाजे  ९,५०० डॉलर मिळायला हवा. म्हणजे भारतीय आईला ९,५०० × ७५ = ₹ ७,१२,५०० अंदाजे एवढा पगार मिळाला पाहिजे दरमहा.

तिच्या उत्तराने जगात ही  गोष्ट प्रकर्षाने उजागर झाली. जगासमोर भारतीय परिवार व त्यात आईची  भूमिका समोर आली.   अनंत काळापासून आई हेच काम करते आहे रोजच, वर्षानुवर्षे. न  थकता, न थांबता  आनंदाने. कुठेही उपकाराची भावना नाही. अहंपणा नाही. कंटाळा नाही. ती सुखी घराची किल्ली आहे.

एकाच वेळी ती  असंख्य  departments सहज सांभाळते. सकाळ ते संध्याकाळ असंख्य कामं सहज करते. अगदी काटेकोरपणे बिनबोभाट. ती घरची   Administrative officer आहे. वेळ पडली तर डॉक्टर,  टीचर, सल्लागार आहे आणि कधी कधी हिटलरही होते. जवळ जवळ सर्वच मंत्रालये  तिच्याकडे असतात. घराची गृह मंत्री, वित्त मंत्री आहे ती. थोडक्यात घराचा भक्कम आधारस्तंभ आहे. 

तज्ञ, कोणत्या तरी एकाच क्षेत्रात perfect असतात. तज्ञ असतात व त्यांच्या या expertise चे भरपूर पैसेही  मिळतात त्यांना. येथे प्रत्येक घरची आई प्रत्त्येक department किती कुशलतेने सांभाळते.

I think she is ‘The Best CEO’ in the world.

जगाची रीतच आहे ही. जुन्या काळापासून चालत आलेली. कुठेही न लिहिलेले नियमच आहेत ते की ही सर्व कामे तिनेच केली पाहिजेत.  ही कामे करण्यात तिला आनंदही  आहे.  समाधान आहे. एखादं काम जरी नीट झालं नाही, तर ती disturb होते‌. म्हणजे अगदी भरलेला डबा शाळेत जाताना मुलगा विसरला, तरी ती अस्वस्थ होते. माझी कुठे चूक झाली? याचा विचार करते व पुन्हा असे होणे नाही याची काळजीही घेते.

या सर्व कामाचा मला मोबदला मिळावा हा विचार तिच्या मनातही येत नाही.

“प्रत्त्येक घरी देव पोहचू शकत नाही म्हणून आई असते. आईच्या पायाशी स्वर्ग आहे. आईला केलेला नमस्कार देवाला पोचतो” वगैरे वगैरे हे मोठे, महान विचार पुस्तकात वाचायला मिळतात. काळ कितीही बदलू दे, आधुनिकता किती ही असू दे, “आई” आईच राहणार आहे.

तशीच कर्तव्यदक्ष. आपल्या घराला घरपण देणारी, जीव ओवाळून टाकणारी, सांभाळणारी….!

प्रत्येकाच्या या आईला साष्टांग नमस्कार !

लेखक : अज्ञात 

संग्राहिका : सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ परिहार जी का साहित्यिक संसार # 251 ☆ कथा-कहानी – वह नहीं लौटा ☆ डॉ कुंदन सिंह परिहार ☆

डॉ कुंदन सिंह परिहार

(वरिष्ठतम साहित्यकार आदरणीय  डॉ  कुन्दन सिंह परिहार जी  का साहित्य विशेषकर व्यंग्य  एवं  लघुकथाएं  ई-अभिव्यक्ति  के माध्यम से काफी  पढ़ी  एवं  सराही जाती रही हैं।   हम  प्रति रविवार  उनके साप्ताहिक स्तम्भ – “परिहार जी का साहित्यिक संसार” शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते  रहते हैं।  डॉ कुंदन सिंह परिहार जी  की रचनाओं के पात्र  हमें हमारे आसपास ही दिख जाते हैं। कुछ पात्र तो अक्सर हमारे आसपास या गली मोहल्ले में ही नज़र आ जाते हैं।  उन पात्रों की वाक्पटुता और उनके हावभाव को डॉ परिहार जी उन्हीं की बोलचाल  की भाषा का प्रयोग करते हुए अपना साहित्यिक संसार रच डालते हैं।आज प्रस्तुत है आपकी एक विचारणीय कहानी – वह नहीं लौटा। इस अतिसुन्दर रचना के लिए डॉ परिहार जी की लेखनी को सादर नमन।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – परिहार जी का साहित्यिक संसार  # 251 ☆

☆ कथा-कहानी ☆ वह नहीं लौटा 

 उस दिन खरे साहब दफ्तर से लौटे तो उनके स्कूटर के पीछे एक युवक सवार था। लंबे-लंबे हाथ पाँव, लंबा दुबला चेहरा, पैर में रबर की चप्पलें, तीन-चार दिन की बढ़ी दाढ़ी और लंबे-लंबे रूखे बाल। शायद महीनों से उनमें तेल नहीं लगा होगा। उसके चेहरे पर निस्संगता और बेपरवाही का भाव था।

दोपहर को खरे साहब का फोन श्रीमती सुधा खरे के पास आ चुका था— ‘बड़ी मुश्किल से एक डेली वेजर की नियुक्ति करायी है। शाम को लेकर आ रहा हूँ।’

सुधा देवी तभी से उत्तेजित हैं। बेसब्री से खरे साहब के लौटने की प्रतीक्षा कर रही हैं। बाइयाँ तो काम के लिए मिल जाती हैं, लेकिन उन्हें ज़्यादा निर्देश नहीं दिये जा सकते। पलटकर जवाब दे देती हैं और चार आदमी के सामने इज्जत का फ़ालूदा बना देती हैं। ज़्यादा बात बढ़ जाए तो काम छोड़ने में एक मिनट नहीं लगातीं। फिर अपनी इज्ज़त ताक में रखकर चिरौरी करते फिरो।
सुधा देवी को इन बाइयों का स्वभाव आज तक समझ में नहीं आया। जैसे भविष्य की, बाल-बच्चों की ज़िन्दगी की कोई चिन्ता नहीं। हाथ का काम जहाँ का तहाँ छोड़ा और चलती बनीं। कहाँ से इतनी हिम्मत और इतनी बेपरवाही जुटा पाती हैं? उन्हें याद है जब पहली बार खरे साहब सस्पेंड हुए तो वे इतनी परेशान हुईं कि दस हज़ार रुपये ज्योतिषियों और टोने-टोटके वालों को दे डाले। खरे साहब के शरीर से जाने कितने भूत और जिन्न निकल कर नये ठिकानों को प्रस्थान कर गये,तब जाकर खरे साहब वापस बहाल हुए। उसके बाद खरे साहब तीन चार बार और सस्पेंड हुए,और वे समझ गयीं कि यह सब नौकरी में चलता रहता है। सस्पेंड होने से अब न किसी की इज्ज़त जाती है, न नौकरी।

सुधा देवी दफ्तर का आदमी चाहती थीं क्योंकि कच्ची नौकरी वाला आदमी बहुत बर्दाश्त कर लेता है। रगड़कर काम लो तब भी पलट पर जवाब नहीं देता। नौकरी पक्की होने की उम्मीद में गैरवाजिब हुक्म भी बजाता रहता है।

खरे साहब आदमी को लेकर पहुँचे तो सुधा देवी ने सर से पाँव तक उसका जायज़ा लिया। वह सुधा देवी को हल्का सा सलाम करके खड़ा हो गया। सुधा देवी ने उसका लंबा कद,लंबे दुबले हाथ पाँव और कुल मिलाकर हुलिया देखा। वे समझ गयीं कि यह आदमी ज़्यादा काम का नहीं।

इसकी बनक बताती है कि इसके हाथ पाँव फुर्ती से चल ही नहीं सकते। देखने से ही एंड़ा बेंड़ा लगता है।

सुधा देवी ने कुछ असंतोष से पति से पूछा, ‘यह नमूना कहाँ से उठा लाये?’

खरे साहब सवाल सुनकर भिनक गये। बोले, ‘तुम्हें तो सब नमूने लगते हैं। डेली- वेजेज़ में ट्रेन्ड आदमी कहाँ मिलेगा? जिनकी नौकरी पक्की हो गयी है वे किसी के घर पर काम नहीं करना चाहते। कहते हैं झाड़ू पोंछा के लिए जेब से पैसा खर्च करके आदमी रखो, यह हमारा काम नहीं है। सब अपने अधिकार जानते हैं।’

सुधा देवी का खयाल है कि उनके पति प्रशासन में कच्चे हैं, इसलिए ये सब काम उनसे नहीं होते। उनके अपने दादाजी ज़मींदार हुआ करते थे, ऐसे रोबदार ज़मींदार कि कब जूता उनके पाँव में रहे और कब हाथ में आ जाए, जान पाना मुश्किल था। उनका खयाल है कि प्रशासन क्षमता उन्हें विरासत में मिली है और एक बार मौका मिल जाए तो वे दुनिया को सुधार दें। खरे साहब चूँकि किरानियों के वंशज हैं, इसलिए शासन करना उनके बस में नहीं।

सुधा देवी ने समझ लिया कि अब इसी आदमी से काम चलाना है, इसलिए मीन-मेख  निकालने से कोई फायदा नहीं। लेकिन काम कैसे चले? यह आदमी चलता है तो लंबे-लंबे पाँव लटर- पटर होते हैं। खड़ा होता है तो कमर को टेढ़ा करके कमर पर हाथ रख लेता है। बर्तन माँजता है तो उसकी रफ्तार देखकर सुधा देवी का ब्लड प्रेशर बढ़ता है। बर्तनों पर गुज्जा ऐसे चलाता है जैसे उन पर चन्दन लेप रहा हो। बर्तनों की गन्दगी साफ करते में मुँह पर वितृष्णा का भाव साफ दिखायी पड़ता है। झाड़ू लगाता है तो हर पाँच मिनट में रुक कर कमर में हाथ लगाकर उसे सीधी करता है। लंबी-लंबी लटें बार-बार मुँह पर आ जाती हैं। उन्हें हटाने में ही काफी समय जाता है।

सुधा देवी के पास मनचाहा काम लेने के लिए एक ही रास्ता है— सारे वक्त आदमी के सिर पर चढ़े रहो। युवक का नाम गोविन्द है। गोविन्द बर्तन धोता है तो सुधा देवी बगल में खड़ी रहती हैं। बताती हैं कि कहाँ-कहाँ चिकनाई रह गयी। ‘जरा जोर से रगड़ो। कुछ खा पीकर नहीं आये क्या?’

गोविन्द झाड़ू लगाता है तो सुधा देवी पीछे-पीछे डोलती हैं। कहाँ-कहाँ जाले लगे हैं, इशारा करके बताती हैं। फर्नीचर पर जहाँ धूल रह जाती है वहाँ उँगली चला कर बताती हैं। किवाड़ों और पर्दों को हटाकर अटकी छिपी गन्दगी दिखाती हैं। गोविन्द को लगता है यह सफाई का काम खत्म नहीं होगा। एक कोने से मुक्ति मिलती है तो सुधा देवी की उँगली दूसरे कोने की तरफ उठ जाती है। गोविन्द के लिए यह समझना मुश्किल है कि इतनी सफाई क्यों ज़रूरी है। कहीं थोड़ा बहुत कचरा रह जाए तो क्या फर्क पड़ेगा? कचरे की तलाश में इतनी ताक-झाँक करना क्यों ज़रूरी है?

यह स्पष्ट है कि गोविन्द को साहबों के घर में काम करने का अभ्यास नहीं है। खरे साहब, सुधा देवी या उनके बच्चों से बात करने में उसके स्वर में कोई अदब-लिहाज नहीं होता। आवाज़ जैसी कंठ से निकलती है वैसी ही बहती जाती है। कहीं नट-स्क्रू नहीं लगता। शब्दों के चयन में भी कोई होशियारी नहीं होती। जो मन में आया बोल दिया। सुधा देवी के लिए यह स्थिति बड़ी कष्टदायक है। किसी के भी सामने अक्खड़ की तरह कुछ भी बोल देता है। दो भले लोगों के बीच चल रही बातचीत में हिस्सेदारी करने लगता है। दिन में दस बार दुनिया के सामने सुधा देवी की नाक कटती है।

गोविन्द के साथ बड़ी मुश्किलें हैं। घर में सब्ज़ी बेचने और दूसरे कामों से आने वाले मर्द- औरतों से बात करने में उसे बड़ा रस आता है। जाने कहाँ-कहाँ की बात करता है। कुछ अपनी सुनाता है, कुछ दूसरों की सुनता है। बतियाते, हँसते बड़ी देर हो जाती है। सुधा देवी सुनतीं, अपना खून जलाती रहती हैं। काम भले कुछ न हो, लेकिन ऊँचे स्वर में बात करना, हा हा ही ही करना बर्दाश्त नहीं होता। इशारे में कुछ समझाओ तो कमबख्त की समझ में आता नहीं।

जब तक आदमी खाली बैठा रहता है तब तक सुधा देवी का खून सनसनाता रहता है। नौकर का खाली बैठना उन्हें बर्दाश्त नहीं होता। जब तक उसे फिर से किसी काम पर न लगा दें तब तक उनका किसी काम में मन नहीं लगता।

जिस कॉलोनी में खरे साहब रहते हैं उसके मुहाने पर सुरक्षा के लिए एक गार्ड रखा है जिसका वेतन कॉलोनी वाले सामूहिक रूप से देते हैं। सेना का रिटायर्ड हवलदार है, नाम चरन सिंह। बहुत दुनिया देखा हुआ, पका हुआ आदमी है। आदमी को बारीकी से पहचानता है। गोविन्द को देखता है तो उसके ओंठ नाखुशी से फैल जाते हैं। बुदबुदाता है— ‘यूज़लेस। एकदम अनफिट।’ उसकी नज़र में गोविन्द फौज के लिए किसी काम का नहीं है। इसे तो लेफ्ट राइट सिखाने में ही महीनों लग जाएँगे। लेकिन उससे बात करने में उसे मज़ा आता है क्योंकि गोविन्द की बातों पर अभी शहर की चतुराई और मजबूरी का मुलम्मा नहीं चढ़ा है। खरी खरी बात करता है।

दो-तीन दिन में गोविन्द पलट कर सुधा देवी को जवाब देने लगा है। ‘कर तो रहे हैं’, ‘आप तो पीछे पड़ी रहती हैं’, ‘सुन लिया, आप बार-बार क्यों दुहरा रही हैं?’ और ‘थोड़ा दम लेने दीजिए, आदमी ही तो हैं।’ सुधा देवी उसका जवाब सुनकर एक क्षण अप्रतिभ हो जाती हैं, लेकिन जल्दी ही उसकी प्रतिक्रिया को परे धकेल कर फिर मोर्चे पर डट जाती हैं। नौकरों की प्रतिक्रिया पर ध्यान देने लगे तो काम हो चुका।

लेकिन पाँच छः दिन में बाद ही विस्फोट हो गया। गोविन्द बाँस में झाड़ू बाँधकर बाहर दीवारों के जाले झाड़ रहा था और सुधा देवी हाइफन की तरह थोड़ा सा फासला रखकर उससे नत्थी उसके पीछे-पीछे घूम रही थीं। एकाएक उसने बाँस ज़ोर से ऐसा ज़मीन पर पटका कि  सुधा देवी की हृदयगति रुक गयी। चिल्ला कर बोला, ‘हमें नहीं करना ऐसा काम। आप हमेशा सिर पर खड़ी रहती हैं। हम आदमी नहीं हैं क्या?’

सुधा देवी इस अप्रत्याशित घटना पर अकबका गयीं। उन्होंने घूम कर इधर-उधर देखा कि कोई उनके इस अपमान का साक्षी तो नहीं है। फिर हकला कर बोलीं, ‘क्या? यह क्या तरीका है? काम कैसे नहीं करेगा?’

गोविन्द अपने दुबले पतले पंजे उठाकर बोला, ‘नहीं करेंगे। आप हमेशा पीछे-पीछे घूमती रहती हैं। यह काम कराने का कौन सा तरीका है?’

सुधा देवी तमक कर बोलीं, ‘पीछे-पीछे न घूमें तो तुम्हें कामचोरी करने दें? आधा काम होगा, आधा पड़ा रह जाएगा।’

गोविन्द अपना हाथ उठाकर बोला, ‘हमें नहीं करना आपका काम। हम जा रहे हैं। साहब को बता दीजिएगा।’

सुधा देवी कुछ घबरा कर बोलीं, ‘ऐसे कैसे चला जाएगा? कोई मजाक है क्या?’

गोविन्द पलट कर बोला, ‘हाँ मजाक है। आपका कर्जा नहीं खाया है।’

उसने अपनी साइकिल उठाई और लंबी-लंबी टाँगें चलाता हुआ निकल गया। सुधा देवी कमर पर हाथ धरे हतबुद्धि उसे जाते देखती रहीं।

चरन सिंह दूर से सारे नज़ारे को देख रहा था। गोविन्द के ओझल हो जाने के बाद धीरे-धीरे चलता हुआ सुधा देवी के पास आ गया। बोला, ‘नासमझ है। गाँव से आया है। अभी समझता नहीं है। कुछ दिन ठोकर खाएगा, फिर समझ जाएगा। अभी दुनिया नहीं देखी है। आप फिकर मत करो। कल वापस आ जाएगा।’

सुधा देवी ने अपने गड़बड़ हो गये आत्मसम्मान को समेटा, फिर दर्प से बोलीं, ‘जब पेट में रोटी नहीं जाएगी तब होश आएगा। बहुत अकड़ता है।’

उनके भीतर जाने के बाद चरन सिंह के ओठों पर हँसी की हल्की रेखा खिंच गयी।

खरे साहब के दफ्तर से आने पर सुधा देवी ने झिझकते हुए उन्हें सूचना दे दी। खरे साहब निर्विकार भाव से बोले, ‘कौन सी नई बात है? तुम्हारे साथ हमेशा यही होता है। कल आ जाए तो अपना भाग सराहना।’

दूसरे दिन सवेरे आँख खुलते ही सुधा देवी का ध्यान पिछले दिन की घटना पर गया। उन्हें भरोसा था कि गोविन्द लौटकर आएगा। भूख बड़े से बड़े अकड़ू की अकड़ ढीली कर देती है। यह किस खेत की मूली है। ताकत एक पाव की नहीं है, लेकिन अकड़ रईसों जैसी है।

उसके आने का वक्त हुआ तो सुधा देवी बेचैन आँगन में घूमने लगीं। सारे विश्वास के बाद भी कहीं खटका था कि कहीं न आया तो। प्रतिष्ठा का सवाल था।

दिन चढ़ने लगा लेकिन गोविन्द का कहीं पता नहीं था। सुधा देवी भीतर घूमते घूमते ऊबकर बाहर आ गयीं। सामने फैले रास्ते पर बार-बार नज़र डालतीं। चरन सिंह अपनी ड्यूटी पर तैनात था। उसने उनकी तरफ एक बार देखकर मुँह फेर लिया।

अचानक एक दस बारह साल का लड़का खड़खड़ करती साइकिल पर आया और चरन सिंह से कुछ पूछ कर उनकी तरफ बढ़ आया। उनके सामने आकर बोला, ‘गोविन्द गाँव चला गया। कह गया कि बता आना कि अब नहीं आएगा।’

सुधा देवी का मुँह उतर गया। बड़ी कोशिश से गला साफ कर बोलीं, ‘ठीक है। अच्छा हुआ।’ लड़का मुड़ने लगा तो पीछे से बोलीं, ‘अब आये तो कहना हमारे घर आने की जरूरत नहीं है।’

लड़का ‘अच्छा’ कह कर आगे बढ़ गया और सुधा देवी पराजित सी घर की तरफ चल दीं। चरन सिंह ने फिर उनकी तरफ देखा और चेहरे पर फैल रही मुस्कान को छिपाने के लिए चेहरा घुमा लिया।

© डॉ कुंदन सिंह परिहार

जबलपुर, मध्य प्रदेश

 संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ संजय उवाच # 250 – शिवोऽहम् ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(“साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच “ के  लेखक  श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।श्री संजय जी के ही शब्दों में ” ‘संजय उवाच’ विभिन्न विषयों पर चिंतनात्मक (दार्शनिक शब्द बहुत ऊँचा हो जाएगा) टिप्पणियाँ  हैं। ईश्वर की अनुकम्पा से आपको  पाठकों का  आशातीत  प्रतिसाद मिला है।”

हम  प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते रहेंगे। आज प्रस्तुत है  इस शृंखला की अगली कड़ी। ऐसे ही साप्ताहिक स्तंभों  के माध्यम से  हम आप तक उत्कृष्ट साहित्य पहुंचाने का प्रयास करते रहेंगे।)

☆  संजय उवाच # 250 शिवोऽहम् ?

।। चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम्।।

गुरु द्वारा परिचय पूछे जाने पर बाल्यावस्था में जगद्गुरु आदि शंकराचार्य द्वारा दिया गया उत्तर निर्वाण षटकम् कहलाया। वेद और वेदांतों का मानो सार है निर्वाण षटकम्। इसका पहला श्लोक कहता है,

मनोबुद्ध्यहङ्कार चित्तानि नाहं

न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे ।

न च व्योम भूमिर्न तेजो न वायुः

चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ॥

मैं न मन हूँ, न बुद्धि, न ही अहंकार। मैं न श्रवणेंद्रिय (कान) हूँ, न स्वादेंद्रिय (जीभ), न घ्राणेंद्रिय (नाक) न ही दृश्येंद्रिय (आँखें)। मैं न आकाश हूँ, न पृथ्वी, न अग्नि, न ही वायु। मैं सदा शुद्ध आनंदमय चेतन हूँ, मैं शिव हूँ, मैं शिव हूँ।

मनुष्य का अपेक्षित अस्तित्व शुद्ध आनंदमय चेतन ही है। आनंद से परमानंद की ओर जाने के लिए, चिदानंद से सच्चिदानंद की ओर जाने के लिए साधन है मनुष्य जीवन।

सर्वसामान्य मान्यता है कि यह यात्रा कठिन है। असामान्य यथार्थ यह  कि यही यात्रा सरल  है।

इस यात्रा को समझने के लिए वेदांतसार का सहारा लेते हैं जो कहता है कि अंत:करण और बहि:करण, इंद्रिय निग्रह के दो प्रकार हैं।  मन, बुद्धि और अहंकार अंत:करण में समाहित हैं। स्वाभाविक है कि अंत:करण की इंद्रियाँ देखी नहीं जा सकतीं, केवल अनुभव की जा सकती हैं। संकल्प- विकल्प की वृत्ति अर्थात मन, निश्चय-निर्णय की वृत्ति अर्थात बुद्धि एवं स्वार्थ-संकुचित भाव की वृत्ति अर्थात अंहकार। इच्छित का हठ करनेवाले मन, संशय निवारण में महत्वपूर्ण भूमिका निभानेवाली बुद्धि और अपने तक सीमित रहनेवाले अहंकार की परिधि में मनुष्य के अस्तित्व को समेटने का प्रयास हास्यास्पद है।

बहि:करण की दस इंद्रियाँ हैं। इनमें से चार इंद्रियों आँख, नाक, कान, जीभ तक मनुष्य जीवन को बांध देना और अधिक हास्यास्पद है।

सनातन दर्शन में जिसे अपरा चेतना कहा गया है, उसमें निर्वाण षटकम् के पहले श्लोक में निर्दिष्ट आकाश, भूमि, अग्नि, वायु, मन, बुद्धि, अहंकार जैसे स्थूल और सूक्ष्म दोनों तत्व सम्मिलित हैं। अपरा प्रकृति केवल जड़ पदार्थ या शव ही जन सकती है। परा चेतना या परम तत्व या चेतन तत्व या आत्मा का साथ ही उसे चैतन्य कर सकता है, चित्त में आनंद उपजा सकता है, चिदानंद कर सकता है।

आनंद प्राप्ति में दृष्टिकोण महत्वपूर्ण है। दृष्टिकोण में थोड़ा-सा परिवर्तन, जीवन में बहुत बड़ा परिवर्तन लाता है। मनुष्य का अहंकार जब उसे भास कराने लगता है कि उसमें सब हैं, तो यह भास, उसे घमंड से चूर कर देता है। दृष्टिकोण में परिवर्तन हो जाए तो वह धन, पद, कीर्ति पाता तो है पर उसके अहंकार से बचा रहता है। वह सबमें खुद को देखने लगता है। सबका दुख, उसका दुख होता है। सबका सुख, उसका सुख होता है। वह ‘मैं’ से ऊपर उठ जाता है।

यूँ विचार करें करें कि जब कोई कहता है ‘मैं’ तो किसे सम्बोधित कर रहा होता है? स्वाभाविक है कि यह यह ‘मैं’ स्थूल रूप से दिखती देह है। तथापि यदि आत्मा न हो, चेतन स्वरूप न हो तो देह तो शव है। शव तो स्वयं को सम्बोधित नहीं कर सकता। चिदानंद चैतन्य, शव को शिव करता है  और जगद्गुरु आदि शंकराचार्य के शब्द सृष्टि में चेतनस्वरूप की उपस्थिति का सत्य, सनातन प्रमाण बन जाते हैं।

इसीलिए कहा गया है, ‘शिवोहम्’, … मैं शिव हूँ.. ‘मैं’ से शव का नहीं शिव का बोध होना चाहिए। यह बोध मानसपटल पर उतर आए तो यात्रा बहुत सरल हो जाती है।

यात्रा सरल हो या जटिल, इसमें अभ्यास की बड़ी भूमिका है। अभ्यास के पहले चरण में निरंतर बोलते, सुनते, गुनते रहिए, ‘शिवोऽहम्।’

© संजय भारद्वाज 

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय, एस.एन.डी.टी. महिला विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

🕉️ श्रवण मास साधना में जपमाला, रुद्राष्टकम्, आत्मपरिष्कार मूल्याकंन एवं ध्यानसाधना करना है 💥 🕉️

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares