हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ व्यंग्य / आलेख # 90 – देश-परदेश – चर्चा : राष्ट्रीय विवाह ☆ श्री राकेश कुमार ☆

श्री राकेश कुमार

(श्री राकेश कुमार जी भारतीय स्टेट बैंक से 37 वर्ष सेवा के उपरांत वरिष्ठ अधिकारी के पद पर मुंबई से 2016 में सेवानिवृत। बैंक की सेवा में मध्यप्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगढ़, राजस्थान के विभिन्न शहरों और वहाँ  की संस्कृति को करीब से देखने का अवसर मिला। उनके आत्मकथ्य स्वरुप – “संभवतः मेरी रचनाएँ मेरी स्मृतियों और अनुभवों का लेखा जोखा है।” ज प्रस्तुत है व्यंग्य/आलेख की शृंखला – “देश -परदेश ” की अगली कड़ी।)

☆ व्यंग्य # 90 ☆ देश-परदेश – चर्चा : राष्ट्रीय विवाह ☆ श्री राकेश कुमार ☆

खिलाड़ी और बॉलीवुड के विवाह की चर्चा तो होती ही रहती हैं। कुछ दिन पूर्व रामायण परिवार की सुपुत्री सोनाक्षी का विवाह चर्चा और विवाद में रहा हैं। अभिताभ बच्चन का विवाह के फोटो में ना दिखना आदि। जब तक कोई और फिल्मी विवाह नहीं हो जाता तब तक इसके किस्से और अफवाहें गर्म रहेंगे।

इसी बीच एक भारतीय आर्थिक भगोड़े ने अपने पुत्र का विवाह लंदन में आयोजित कर दिया। कुछ चर्चा भी हुई, विशेष कर एक अन्य चर्चित नाम ललित मोदी उपस्थित थे। चोर चोर मोसरे भाई।

हाल ही में एक सर्वे रिपोर्ट आई है, जिसमें ये जानकारी दी गई है, कि भारतीय शिक्षा से अधिक विवाह में खर्च करते हैं। इस बात का राष्ट्रीय विवाह जोकि 12 जुलाई को अम्बानी परिवार में होने जा रहा है, से कोई दूर दूर तक संबंध नहीं हैं।

विवाह पूर्व आयोजनों को प्रोहत्सन देने के लिए देश व्यापी प्रचार के लिए दो कार्यक्रम तो संपन्न हो चुके हैं। ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी हैं, मेरे व्हाट्स एपिया दोस्तों।

विषय राष्ट्रीय है, निमंत्रण पत्र, मेहमान, स्थान, भोजन, रिटर्न गिफ्ट, आदि लंबी सूची है। अलग अलग विषयों पर चर्चा भी तो अलग अलग ही होनी चाइए।

हमने तो आशीर्वाद के रूप में प्रति माह कुछ राशि जियो के जुलाई माह से बढ़े हुए बिल के माध्यम से देना तय कर लिया हैं। आप भी तो कुछ तय करें।

© श्री राकेश कुमार

संपर्क – B 508 शिवज्ञान एनक्लेव, निर्माण नगर AB ब्लॉक, जयपुर-302 019 (राजस्थान)

मोबाईल 9920832096

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #244 ☆ प्रीतिची शिल्लक… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 244 ?

प्रीतिची शिल्लक ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

वार एवढे नको करू तू  पाठीवरती

अनेक जखमा तुझ्याच आहे नावावरती

*

हृदय वाहुनी तुला टाकले नको काळजी

वार झेलण्या मीही तत्पर छातीवरती

*

जुने वाद ते नकोच आता उकरुन काढू

बोलत जा ना कधीतरी तू प्रेमावरती

*

साक्षर नव्हती बहिणाबाई तरी प्रतीभा

बहिणाईला ओव्या सुचल्या जात्यावरती

*

युद्धासाठी तो आलेला रणांगणावर

शर नाही तर गुलाब दिसले भात्यावरती

*

नको वल्गना नकोच चिंता नकोच संशय

शुद्ध भावना डाग नसावा नात्यावरती

*

नको बंगला नकोच गाडी प्रेम असावे

मज प्रीतिची शिल्लक दिसुदे खात्यावरती

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ वृक्षारोपण… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ वृक्षारोपण... ☆ श्रीशैल चौगुले ☆

माझीया मनात  अंकुर फुलावे

पानात झुलावे    दृष्टीगगनी.

*

मातीही हसावी   सदैव बहर

वाढिचा कहर     निसर्गसखा.

*

हळूच शाखांत    पोक्तले  रोपटे

वृक्षही  चौपटे    सावलीझुले.

*

विश्राम जीवाला थकल्या पांथस्था

फळेही  हसरी   रानराज्यात.

*

ढगास आळवी   वार्याशी सलगी

वाजती हलगी    गडगडात.

*

मानवा संदेश    पाऊस पडतो

वृक्षाशी छेडतो   चक्रकारण.

*

युवांची ताकत   युगाला घोषीत

श्वासाला पोशीत   वृक्षारोपण.   

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मागण्या आणि मागण्या… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

मागण्या आणि मागण्या ☆ सौ कल्याणी केळकर बापट

काही गोष्टी करायला खूप सहज सोप्या असतात तर काहीं गोष्टी ह्या करण्यासाठी खूप अवघड असतात. ह्या काही गोष्टींमधील एक गोष्ट म्हणजे “मागण्या”. मागण्या करणं खूप सोप्प पण मागण्या पूर्ण करणं हे जरा अवघड काम. खरंतर मागण्या करणं आणि मागण्या पूर्ण करणं ह्या वाक्याममधे फक्त एका शब्दाचा फरक, पण अर्थाने मात्र दोन शेवटची टोकं.

आपलं सगळ्यांचंच लहानपण, हे मोठ्यांनी जे शिकविलं ते  आज्ञाधारक पणे शिकायचं , नुसतचं शिकायचं नाही तर ते आपल्याला आचरणातपण आणावचं लागायचं,ह्यात गेलयं.सरसकट सगळ्या भावंडांमध्ये एखादा अपवाद वगळता बाकी सगळे मुकाट्याने पटो की न पटो पण सांगितलेले निमूटपणे स्विकारायचे.एखाद्यामध्ये मात्र थोडीफार हिंमत,  धमक असायची मग ते भावंड जरा बंडखोरी करुन  हवं ते मिळविण्यासाठी आपली बाजू हिरीरीने मांडायचे .थोडफार फडफडल्याने कधी त्या बंडखोर व्यक्ती च्या मनासारखं व्हायचं तर कधी मात्र नजरेच्या धाकाच्या जोरावर वा चौदाव्या रत्नाचा प्रसाद देऊन मोठी वडील माणसं त्या प्रश्नाचा,त्या समस्येचा निकाल लावतं.

ह्या सगळ्या समस्येच मूळ म्हणजे “मागण्या”हेच असायचं.प्रत्येक व्यक्ती ही आपापल्या भूमिकेतून अगदी योग्यच असतो.आमच्या लहानपणी आजुबाजूचे,परिसरातील,

नात्यातील,परिचीत आणि मैत्रातील बहुतेक सगळ्या कुटूंबांची एकूणच आर्थिक परिस्थिती,जीवनमान,स्तर हे अगदी थोड्याफार फरकाने पण सारखचं होतं.त्यामुळे एकूणच सर्वांचा राहणीमानाचा दर्जा हा जवळपास सारखाच होता. त्यामुळे परस्परांत दरी,विषमता ह्याची धग कधी फारशी जाणवलीच नाही.

मग अशा वेळी मागण्या वा डिमांड पुरविल्या गेल्या नाहीत तर अचानक आपल्याला डावलल्या गेल्याचं फील यायचं,उगाचच फक्त आपल्यावर अन्याय झालायं असा गैरसमज मनात ठाण मांडून बसायचा.वास्तविक पाहता आईवडील, पालक वा वडीलधारी मंडळी त्यांच्या जागी अगदी योग्यच असायची.तेव्हा आम्ही मागण्या करायचो,बंडखोरी करायचो पण आमच्या अल्लड, अजाणत्या वयातचं बरं का.जसजसं वयं वाढलं,परिपक्वता वाढली तसतसं अडचणीच्या काळात, आणीबाणीच्या काळात किंवा एखादं रोगराई सारखं अचानक अस्मानी संकट अंगावर येऊन पडल्यास मोठ्यांना, पालकांना वेठीस धरू नये एवढी जाण,समज तश्या फारशी पाचपोच नसलेल्या वयातही कोठून आणि कशी आली ते आमचं आम्हालाही कळलं नाही.

महिना अखेरचे दिवस हे पालकांचे सत्वपरीक्षेचे दिवस असतात हे अनुभवाने आम्हांला पाठ झालं होतं.खरचं जेथे घर चालवितांना एवढ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं,परिवारातील सगळ्यांची मर्जी सांभाळावी लागते तेथे कोणीही सत्तेवर असलं तरी सत्तेवर असलेल्या कोणाही साठी अगदी सत्वपरीक्षेचाच काळ असतो हे पण खरं.

पालकांच्या अडचणीच्या काळात,प्रमुख आलेल्या आपत्तीकडे कानाडोळा करुन त्यांच्या मागे मागण्यांच तुणतुणं वाजवून त्यांना पिडू नये,बेजार करु नये ही जाण,हा शहाणपणा आम्ही लहान असलो तरी सगळ्यांजवळ होता.जी समज लहानवयात येऊ शकते ती समज, ते शहाणपण निव्वळ सत्तेसाठी , एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी मोठ्यांजवळ नसावं ह्यांच खरचं वैषम्य वाटतं.

अगदी आपण करीत असलेल्या मागण्या आपल्या दृष्टीने खरोखरच योग्य आहेत हे शंभर टक्के आम्हाला कळलेले असले तरीही आम्ही लहान असूनही

परिस्थितीचा,पालकांच्या मानसिकतेचा अभ्यास करायचो,त्या पोशिंद्यांचा विचार करायचो आणि आता परिस्थिती कोणती,संकटाची तीव्रता किती हे सगळं कळूनही निव्वळ दुराग्रह, अट्टाहास ह्याला प्राधान्य देऊन,स्वतःतील”मी”ला खतपाणी घालतं,कुरवाळत बसणं खरोखरच योग्य आहे का, ह्याचा प्रत्येकाने विचार करण्याची वेळ आलेली आहे.

शेवटी काय तर पालक असो वा सरकार त्यांच्याकडे आपल्याला काही मागण्या करायच्या असल्यासं त्या मागण्यांसाठी  आपण वेळकाळ पहाणं खूप गरजेच आहे जरी आपल्या मागण्या अगदी रास्त असतील तरी.सध्याच्या आर्थिक मंदीच्या काळात पालकांना तसेच जे जगावर अस्मानी महामारीचे संकट आले असतांना ते आरक्षण वगैरे मागणे हे योग्य आहे का हे प्रत्येकाने  आपल्या सदसद्विवेकबुद्धी ला विचारुन बघावे.आपले खरे उत्तर आपल्याला आपले मनचं देईल हे नक्की.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सूर्य नवा दिवस नवा- भाग – १ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆

श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

सूर्य नवा दिवस नवा- भाग – १ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली

सकाळी जाग येताच शुभदाने भिंतीवरच्या घड्याळाकडे पाहिलं. साडेसहा वाजायला आले होते. बेडवरून उठून तिची पावले किचनकडे वळली. चहाचं आधण ठेवलं. बेसिनवर जाऊन ब्रश करून तिने तोंडावर पाणी मारलं. फक्कड वाफाळत्या चहाचे घुटके घेत ती बाल्कनीतल्या खुर्चीत बसली. गार वार्‍याची झुळुक तिला सुखावून गेला.

अजून सगळं आवरून स्वत:साठी जेवण बनवायचं होतं. आज जेवायला काय करायचं, हा मोठा प्रश्न असायचा. एकटीसाठी म्हणून कसली आवडनिवड असते? नवरोबा रविवारी येतो तेंव्हा त्याची कसलीच फर्माईश नसते. आपली लेक मात्र उद्याच्या ब्रेकफास्टचा, लंचचा, डिनरचा मेनू एक दिवस अगोदर सांगायची. कधी सुशांतला विचारलं तर, ‘आई तुझ्या हातचं काहीही चालेल, पण मेदूवडे करशील तर मज्जा येईल.’ असं म्हणायचा. आता सगळंच बदललं आहे.  

‘शुभदा’ या हाकेने तिचं लक्ष खाली वॉकिंग ट्रॅककडे गेले. वॉकिंगला चाललेल्या सुमित्राकाकूंनी हाय म्हणण्यासाठी आवाज दिला होता. शुभदाने त्यांना वरती येण्यासाठी खूण केली. थोड्याच वेळात सुमित्राकाकू लिफ्टने वरती आल्या. 

सुमित्राकाकू म्हणजे मध्यम बांधा, गोरा रंग, स्वच्छ सुती साडी, पिकलेल्या केसांवर मेंदी लावून सोनेरी झालेले केस, लुकलुकणारे निरागस टपोरे डोळे आणि सुरकुतलेल्या चेहर्‍यावर मधाळ हसू  ल्यालेली सुंदर मूर्ती.  

‘काकू, बसा तुमच्यासाठी चहा करते.’

‘नको ग, हे गेल्यापासून मी सकाळचा चहा सोडला आहे. बरं तुझी लेक काय म्हणतेय? सुशांतचं मेडिकल कसं चाललंय?’

‘खरं सांगू, काकू लेकीच्या लग्नानंतर माझ्या शरीराचाच एक भाग विलग झाल्यासारखं मला वाटलं होतं. माझ्या अवतीभवती मांजरीसारखी सदैव घुटमळणारी माझी लेक सासरी गेल्यानंतर मला पार विसरली आहे. गावात असून देखील तिला इकडे यायला वेळ नसतो. कधी अचानक वादळासारखी येते अन झपाट्याने निघून जाते. अधूनमधून केवळ रेसिपी विचारून झालं की ‘चल ठेवते, परत बोलू’ असं म्हणत लगेच फोन ठेवते. 

सुशांतला मेडिकलची अ‍ॅडमिशन मिळाल्यावर त्यानं घर सोडलं अन त्याच्या माघारी मी खूप रडले. तो सदैव कुठल्या ना कुठल्या सेमिनारमध्ये व्यग्र असतो. त्याच्याकडेही वेळ नसतो. माझ्याशी फोनवर चाललेलं संभाषण कधी एकदा संपेल याची त्याला घाई असते. 

पतिदेव मात्र रोज रात्री न चुकता फोन करतात. ‘जेवलीस काय? आजचा दिवस कसा गेला?’ हे आवर्जून प्रेमाने विचारतात. मुंबईलाच बदली झाल्यानं ते रविवारी किंवा मध्ये सुट्या पडल्या की येऊन जातात. एरव्ही मी एकटीच असते. दिवसभर बॅंकेत असते म्हणून बरं आहे. संध्याकाळी मात्र मला एकटीला घर खायला उठतं. 

काकू, मला आता कसलंच टेन्शन नाही. पण अलीकडेच उच्च रक्तदाब असल्याचं निदान झालं. आता एक कायमची गोळी नियमितपणे घ्यावी लागतेय. एक वेळ गोळी चुकली तरी चालेल पण फिरायला मात्र न चुकता जायला हवे असा डॉक्टरांनी आवर्जून सांगितलं आहे. पण अजूनपर्यंत तरी फिरायला जात नाहीये.

‘अगं, तुझी मुलं आता आईबाबांचे बोट सोडून स्वतंत्रपणे चालायला शिकली आहेत. त्यांना त्यांचं म्हणून एक स्वतंत्र विश्व निर्माण करायचं आहे. स्वत:चे निर्णय घ्यायला ते सक्षम आहेत, यातच तुला आनंद मानायला हवा.

आपण नागपूरहून इतक्या लांब आलो म्हणून काय आपलं आपल्या आईबाबांच्यावरचं, भावाबहिणीवरचं प्रेम ओसरलं आहे काय? आपल्या पंखाखाली पिलांना ऊब देणं हा मायेचा धर्म असला तरी त्यांना पंख फुटल्यावर आकाशात स्वच्छंद उडू देणं हे देखील पालकांचं कर्तव्यच असतं. जीवनातला हा बदल अपरिहार्य असतो तो स्वीकारायला हवा. मुलं आपल्यापासून कायमची विलग झाली म्हणून उगाच चिंता करू नकोस. त्या चिंतेचाच परिणाम आहे, तुझा रक्तदाब. सकाळी फिरायला जात जा, किती प्रसन्न वाटेल पाहा.

या विश्वात प्रत्यक्ष दिसणारा एकमेव देव सूर्यनारायण किरणांच्या रथावर आरूढ होऊन आपल्या भेटीला नित्य नव्या स्वरूपात येत असतो. कधी अनुभवून पाहा. जमलंच तर संध्याकाळच्या वेळी वंचित मुलांच्यासाठी काही करता आलं तर बघ.’ 

‘काकू, बसा मी पोहे करते. तुमच्यासाठीच म्हणून नाही, मलाही खायचे आहेत.’ 

‘शुभदा, तुझी हरकत नसेल तर पोहे मी बनवू काय?’ काकूंच्या लाघवी बोलण्यात आर्जव होतं.

शुभदा रिलॅक्स होत म्हणाली, ‘ठीक आहे काकू, बनवा. मी आंघोळ आटोपून येते.’               

शुभदा तयार होऊन येताच काकूंनी पोह्यांची प्लेट तिच्या हातात दिली. ‘पोहे अगदी मस्त झाले आहेत. काकू तुमच्या हाताला केवढी चव आहे!.’

‘अग हो, कुणाला तरी खाऊ घालणं आणि कुणाच्या हातात काही ठेवणं याचंच या हातांना अप्रूप वाटत आलंय. आता ती दोन्ही कामं थांबली आहेत. माझी सून मला किचनमध्ये फिरकू देत नाही. त्यांचं ते सामिष चमचमीत जेवण बनवणं मला जमत नाही. 

तुझे काका असताना घरखर्चासाठी म्हणून मुद्दामहून जास्ती पैसे द्यायचे. हिशेब पाहायचेच नाहीत. आतापर्यंत त्याच पैश्यातून पुरवून पुरवून मी मुलां-नातवंडाना काही तरी देत होते. आता तेहि संपत आलेत. कुणाकडे मागायची लाज वाटते. तुझी हरकत नसेल तर मी तुझा सकाळ संध्याकाळचा स्वयंपाक करू काय?. महिन्याअखेरीस तू जमेल तेवढे पैसे माझ्या हातात टिकवले तरी चालतील. एवढंच वाटतं की माझ्या हातांची दानत शेवटपर्यंत टिकायला हवीय. आणि हे गुपित आपल्या दोघांतच असायला हवं.’ 

– क्रमशः भाग पहिला

© श्री व्यंकटेश देवनपल्ली

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “परफेक्शनिस्ट आई…” – भाग – १ – लेखक : श्री बिभास आमोणकर ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

??

☆ “परफेक्शनिस्ट आई…” – भाग – १ – लेखक : श्री बिभास आमोणकर ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

आईसाठी गाणं हेच सर्वस्व होतं. तिने अनेक प्रकारचे त्याग त्या संगीताच्या, अमृताच्या पूजेसाठी केले. ते आम्ही सारं पाहत होतो. कुणाला असंही वाटेल की, तिच्या त्या अमृतपूजेमुळे आम्हाला आमची आई कमी मिळाली. पण तिने केलेल्या अनेक गोष्टींच्या त्यागापुढे आमचा त्याग काहीच नव्हता.

आपली आई ही इतरांसारखी हाडामांसाची आई असली तरी ती इतर आईंपेक्षा खूप वेगळी आहे, याची जाणीव आम्हा दोन्ही भावांना अगदी लहानपणापासून न कळत्या वयातही होतीच. सामान्यपणे आई शाळेत सोडायला वगैरे येते तसं आमच्याबाबतीत कधी घडलं नाही. ठरावीक पातळीपर्यंत ती आमची आई असायची आणि नंतर ती इतरांसाठी बरंच काही असायची. लहानपणी आयुष्यात प्रथमच चित्रकलेसाठी बक्षीस मिळालं तेव्हा ते नेऊन आईला दाखवावं अशी खूप इच्छा होती, धावत घरी गेलोदेखील, पण नंतर लक्षात आलं आई कानपूरला गेलीय मैफिलीसाठी, ती नाहीये घरात, मग मावशीला दाखवलं. अनेकदा मावशी आणि माई म्हणजेच आजी मोगुबाई कुर्डिकर याच आमची आई झाल्या होत्या. त्यांनी आमची जबाबदारी घेतली होती. आईसाठी गाणं हेच सर्वस्व होतं. तिने अनेक प्रकारचे त्याग त्या संगीताच्या, अमृताच्या पूजेसाठी केले. ते आम्ही सारं पाहत होतो. कुणाला असंही वाटेल की, तिच्या त्या अमृतपूजेमुळे आम्हाला आमची आई कमी मिळाली, पण तिने केलेल्या अनेक गोष्टींच्या त्यागापुढे आमचा त्याग काहीच नव्हता. शिवाय कळायला लागल्यापासून ती जे काही करते आहे ते एकाच वेळेस अद्भुत आणि दुसरीकडे रसिकांना परब्रह्माची अनुभूती देणारं आहे, याचीही प्रचीती आम्हाला येतच होती. त्यामुळे ती आम्हाला इतर आईंसारखी फार वेळ नाही देऊ शकली याचं आम्हा दोघाही भावांना कधीच वैषम्य नाही वाटलं. उलट आपणही तिच्या या साधनेच्या कुठे तरी कामी यायला हवं, तिच्या त्या अमृताच्या पूजेत आमचाही खारीचा का असेना पण वाटा असावा, असं सारखं वाटायचं. ती जे काही करते आहे त्याला तोड नाही, याची कल्पना होती. समजू उमजू लागल्यापासून तर तिच्या त्या कर्तृत्त्वाचा अभिमान वाटायचा. अर्थात, तिच्या त्या अमृताच्या पूजेत आम्ही करण्यासारखं काहीच नव्हतं; तिला त्रास होणार नाही किंवा तिच्या रियाझामध्ये खंड पडणार नाही अशा प्रकारे घरातला वावर असावा, हेच आमच्या हाती होतं. ते आम्ही परोपरीने राखण्याचा प्रयत्न केला इतकंच!

आई मैफिलीच्या दौऱ्यावरून परत येण्याच्या दिवशी आम्हीही इतर मुलांप्रमाणे तिची वाट पाहत बसायचो. त्या वेळेस मुंबईत फार कमी टॅक्सीज होत्या. आमच्या घराच्या दिशेने टॅक्सी येताना दिसली, की कोण आनंद व्हायचा. मग आमच्याकडचा रामा बॅगा घ्यायला खाली उतरायचा आणि आम्ही मात्र बॅगा काढून झाल्या, की त्याच टॅक्सीत बसून केम्प्स कॉर्नरच्या त्या खेळण्यांच्या दुकानात तिला घेऊन जायचो. ती दौऱ्यावरून थकून भागून आलेली असेल, दौऱ्याचे काय कष्ट असतात ते समजण्याचं ते वयच नव्हतं. आम्ही तिच्याकडून मग खूप लाड करून घ्यायचो. केम्प्स कॉर्नरचे दुकान असल्याने खेळणी महाग असत. पण बहुधा आम्ही काही गोष्टींना मुकलोय याची जाणीव तिलाही असायची आणि मग सारं काही विसरून तीही आमच्यात मूल होऊन रमायची त्या दिवशी. मग दुसऱ्या दिवसापासून आई परत वेगळी असायची. नंतर मोठे झाल्यानंतर आम्हाला आईच्या दिवसाचं मोल अधिक कळलं होतं!

बाबांच्याच शाळेत म्हणजे गिरगावात राममोहनमध्ये असलो तरी अनेकदा राहायला माईकडे (मोगुबाई) गोवालिया टँकला आणि कधी वरळीला मावशीकडे असायचो. सुट्टीच्या दिवशी आईला भेटायचो. मे महिन्यात अनेकदा मावशीकडेच असायचो. इतर घरांमध्ये अनेकदा आई मुलांना घेऊन शिकवायला बसते. तसं आमच्याकडे कधीच झालं नाही. आई शिकवायला बसली असती तर थेट संगीतकारच झालो असतो. पण आईच्या वागण्याबोलण्यातून नकळत झालेल्या संस्कारांमुळे खूप काही शिकलो. भाऊ निहार तबला शिकला, पण मी काही संगीताकडे वळळो नाही. नाही म्हणायला टाइमपास म्हणून तबल्यावर बसायचो. दोनच ताल जमायचे- सवारी आणि योगताल! पंधरा आणि साडेपंधरा मात्रांचे हे ताल फार कमी वाजवणारे आहेत. ते बहुधा आईच्या पोटातूनच आलेल्या अभिजात संगीताच्या संस्कारामुळे साध्य झालं असावं. माई तेव्हा आईला म्हणाली होती, बिभासची लय हलत नाही. ती बहुधा आईचीच देण होती. संगीताचं शिक्षण नसल्यानं सूर नाही ओळखता येत, पण त्याचा रंग सांगता येतो. सुरांच्या रंगांचं एक पॅरामीटर असतं. ते कळतं. ते युनिव्हर्सल स्केल आहे. त्यासाठी जो कान असावा लागतो, तो आईमुळे जन्मापासूनच तयार झाला असावा.

आईच्या प्रत्येक कृतीत परफेक्शन असायचं. काम करत असतानाही तिच्या मनात बहुधा ते संगीतच रुंजी घालत असावं. बॅक ऑप द माइंड तेच सुरू असायचं हे जाणवायचंही. जेव्हापासून, म्हणजे जन्मापासून ऐकू येतंय तेव्हापासून सतत आयुष्यात परफेक्ट सूरच ऐकत आलोय. मग ते आजीचे म्हणजेच माईचे सूर असतील नाही तर आईचे. त्यामुळे संगीताचं व्याकरण सांगता आलं नाही तरी चुकलेलं कळतं आणि कुठे चुकलंय तेही नेमकं कळतं. तिने केलेली प्रत्येक गोष्ट नेमकी व परफेक्टच असायची. मग ती तिने काढलेली रांगोळी का असेना. आईला रांगोळी प्रचंड आवडायची. ती सुंदर रांगोळी काढायची, तीदेखील चार फूट बाय चार फूट अशी मोठय़ा आकारात. दीनानाथ दलालांची चित्रं आईने रांगोळीत साकारलेली आम्ही अनेकदा पाहिली आहेत. तिने काढलेली रांगोळीची रेषाही रेखीव असायची. तिच्यासारखी रेखीव रांगोळी नाही जमली काढायला कलावंत असूनही. आधी कार्डबोर्डवर चित्र चितारायची आणि मग रांगोळीत. कदाचित कार्डबोर्डवरचा तो तिचा रियाझ असावा चित्रकलेचा. आई कविताही छान करायची. त्या कवितेतील शब्दही तेवढेच जपून वापरलेले आणि नेमके असायचे. त्या शब्दांमध्ये खोलीही आहे. पण या कविता आम्हा केवळ घरच्यांनाच माहीत आहेत. बाहेर कुणाला याची गंधवार्ताही नाही.

घरात असताना आई नेहमी तिच्याच जगात असायची. रात्री अनेकदा उशिरा झोप, सकाळी साधारण चार-पाच तासांचा रियाझ. अगदी शेवटच्या दिवसापर्यंतही हे चुकले नाही. अलीकडे तर लोक विचारायचे, ‘आता या वयात कशाला रियाझ?’ त्यावर ती म्हणायची, ‘हा माझा श्वास आहे. ज्या दिवशी गाणार नाही त्या दिवशी या जगात नसेन!’ रात्री उशिरा झोपायची. अनेकदा दीड- दोन वाजायचे. त्यामुळे दुपारची झोप तिच्यासाठी महत्त्वाची असायची. कधी फार भेट झाली नाही तर खोलीत फक्त डोकावायचं. गानसमाधी लागलेली असताना तिला काहीच कळायचं नाही. पण कुणाला शिकवत असेल तर तिला लक्षात यायचं, मग बाहेर येऊन आवर्जून विचारपूस करायची. ती काही मिनिटांची तिची भेटही आमच्यासाठी खूप काही असायची.

आम्ही आईसाठी काय त्याग केला याहीपेक्षा आईने संगीतासाठी किती त्याग केला ते अधिक महत्त्वाचं आहे. आम्ही ते सारं जवळून पाहिलंय. अप्पा जळगावकर आईच्या मैफिलीच्या वेळेस साथ करायचे. त्या काळी अनेकदा त्यांनी तिसऱ्या वर्गाच्या डब्यातून रेल्वेप्रवास केलेला असायचा. कार्यक्रमही अनेकदा मोफतच केलेला असायचा, एखाद्या संस्थेसाठी धर्मादाय म्हणून. हे असं तिने अनेकदा धर्मादाय कार्यक्रम करणं आवडायचं नाही. तिला आम्ही नाराजीही अनेकदा सांगायचो, पण तरीही ती ते करायची. अनेकदा ती रागीट वाटायची किंवा मानी. पण विमानतळावर विमानाला उशीर झाल्यानंतरही व्हीआयपी लाऊंजमध्ये प्रवेश नाकारल्यानंतर तिने कधी तमाशा नव्हता केला. पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण तिने कधी मिरवले नाहीत. तिच्यासाठी ‘गानसरस्वती’ हाच सर्वात मोठा बहुमान होता. कधी तिने स्वत: तापाने फणफणत असताना कार्यक्रम केले आहेत, तर कधी आम्ही तापाने फणफणत असतानाही जाऊन कार्यक्रम केले. हे कार्यक्रम मिरवण्यासाठी नव्हते तर ती तिच्यासाठी अमृताची पूजा असायची, याची आम्हालाही कल्पना होती. पण याची कल्पना नसलेले रसिक मग ताई साडेनऊ वाजले तरी स्टेजवर नाही म्हणून कागाळी करायचे. कधी तिला मनासारखी वाद्यं लागलेली नसायची, तर कधी इतर काही कारण असायचं. ती परफेक्शनिस्ट होती. त्यामुळे कधी वेळ व्हायचा. हे सारं मी जवळून पाहिलं आहे.

– क्रमशः भाग पहिला 

लेखक : श्री बिभास आमोणकर 

प्रस्तुती : सौ. स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ डार्क वेब : भाग – 4 ☆ श्री मिलिंद जोशी ☆

श्री मिलिंद जोशी

? इंद्रधनुष्य ?

 ☆ डार्क वेब : भाग – 4 ☆ श्री मिलिंद जोशी ☆ 

(ही अतिशय महत्वपूर्ण माहिती देणारी लेखमाला दर सोमवारी आणि मंगळवारी प्रकाशित होईल) 

डार्कवेब बद्दल जे काही गैरसमज आहेत त्यातील एक प्रमुख गैरसमज म्हणजे, ‘डार्कवेबचा वापर करणे कायद्याने गुन्हा आहे.’ हा गैरसमज इतका प्रचलित आहे की उद्या एखाद्याने कुणाला सांगितले की, ‘मी डार्कवेबचा वापर केला आहे’, तर लगेच त्याच्याकडे कुणीतरी मोठा गुन्हेगार आहे असे बघितले जाते. किंवा मग तो खूप मोठा हॅकर असल्याचा समज करून घेतला जातो. 

आजपर्यंत कोणत्याही देशाने डार्कवेबवर बंदी घातलेली नाही. भारतात तर त्याबद्दल कोणते कायदेही नाहीत. त्यामुळे कुणी आपल्या लॅपटॉपवर टोर ब्राउजर इंस्टाल केले असेल तर तो आपल्या देशात गुन्हा नाही. ते फक्त एक साधन आहे. आपण जोपर्यंत त्यावर कोणतेही बेकायदेशीर काम करत नाही, कायद्याच्या कचाट्यात येत नाही. 

हे समजवण्यासाठी एक अगदी घरघुती उदाहरण देतो. आजकाल प्रत्येकाच्या घरात सुरी असतेच. वेगवेगळ्या आकारात ती सुपरमार्केटमध्येही मिळते. ज्यावेळी आपण तिचा वापर फळे / भाजी कापण्यासाठी करतो, ती साधन असते, पण तीच एखाद्याच्या शरीरावर चालवली तर? तर त्याला शस्त्र म्हटले जाते. वस्तू एकच आहे पण तिचा वापर काय होतो त्यानुसार वस्तूचे नांव बदलते. हीच गोष्ट डार्कवेबचा वापर करण्यासाठी बनवलेल्या टोर ब्राउजरबाबतही लागू होते. 

डार्कवेबचा वापर कायद्याने गुन्हा नाही तर लोकांना त्यापासून दूर राहण्याचा सल्ला का दिला जातो? त्याचे कारण एकच. इथे ज्या गोष्टी केल्या जातात त्यावर कोणत्याही सरकारचे नियंत्रण नसते. समोरची व्यक्ती खरी की खोटी हेही आपल्याला माहित नसते. अशा वेळी आपण फसवले जाण्याची टक्केवारी अनेक पटीने वाढलेली असते. त्यापासून वाचावे यासाठीच इथे जाऊ नये असे सांगितले जाते. तसेच काही जण अनवधनाने एखाद्या अशा साईटवर गेले, जिथे हत्यारांची विक्री होत असेल, लहान मुलांच्या अश्लील फिल्म बनवल्या जात असतील, स्त्री पुरुषांची खरेदी विक्री केली जात असेल, बंदी घालण्यात आलेल्या नशिल्या पदार्थांची विक्री केली जात असेल तर मात्र ते कायद्याच्या कचाट्यात सापडू शकतात. जसे भारतात रस्तावर चालताना ‘डाव्या बाजूने चालावे हे मला माहिती नव्हते’ असे सांगता येत नाही, तसेच इथेही आहे.   

या संदर्भात अजून एखादे उदाहरण द्यायचे झाले तर, अनेक मोठ्या शहरात ‘रेड लाईट एरिया’ असतो. त्या शहरात राहणाऱ्या लोकांना ते माहितीही असते. पण अनेकदा त्याच्या जवळपास राहणारे लोक जवळचा रस्ता म्हणून त्या भागातून कायम ये जा करतात. त्यांना त्याबद्दल कुणीही विचारत नाही. पण समजा त्या भागात पोलिसांची धाड पडली आणि तुम्हीही त्या भागात सापडला, तर पोलीस तुम्हालाही त्यांच्यातील एक समजून अटक करू शकतात. अर्थात ज्यावेळी तुम्ही त्यांच्यातील नाहीत याची पोलिसांची खात्री पटेल, तुम्हाला सोडून दिले जाईल. पण ते होईस्तोवर तुम्हाला जो मनस्ताप होईल त्याचे काय? किंवा लोकांचा तुमच्याबद्दल जो गैरसमज होईल त्याचे काय? हाच विचार करून आपल्या घरचे आपल्याला सांगतात, ‘बाबारे… त्या भागात जाऊ नकोस.’ तीच गोष्ट याबाबतही आहे.

सावधानीचा इशारा : डार्कवेब वापरणे कायद्याने गुन्हा नाही, पण त्यावरचा वावर तुमची सिस्टीम हॅक होण्यास कारणीभूत ठरू शकतो. किंवा नशीब अगदीच खत्रूड असेल तर पोलिसांशी प्रश्नोत्तरेही होऊ शकतात. 

क्रमशः भाग चौथा 

©  श्री मिलिंद जोशी

वेब डेव्हलपर

नाशिक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘…पंढरीच्या वाटेवर’- वारीवर्णन : श्री सारंग कुसरे ☆ माहिती संग्रहिका आणि शब्दांकन : सौ राधिका-माजगावकर-पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘…पंढरीच्या वाटेवर’- वारीवर्णन : श्री सारंग कुसरे ☆ माहिती संग्रहिका आणि शब्दांकन : सौ राधिका-माजगावकर-पंडित ☆

आयुष्याचं गणित सोपं करून सांगणारी माणसं इथे वारीत भेटतात.

मनांत असलेली भक्ती, साऱ्या गात्रात भरभरून वाहणारी शक्ती घेऊन ‘ती’  पारूमाऊली दिंडीतून जरा बाजूला होऊन सावलीला विसावली.मिटल्या डोळ्यांपुढे सावळा पंढरी नाचत होता, ती त्याच्या पायाशी वाकली. आणि म्हणाली ,” किती नाचतोस ? दमशील नां रे बाबा ! थांब! मी तुझे पाय दाबते.असं म्हणून ती पुढे वाकली खरी, पण हे काय ? आपल्याच पायाला हा कोणाचा  स्पर्श ? डोळे उघडले तर एक हंसतमुख तरुण म्हणत होता , ” माऊली दमली असशील,अगं! मी वारीतला सेवेकरी.पंढरीला या वेळी नाही येऊ शकत. पण तुझ्या रूपात इथेच मी पंढरी पाहीन . पाय मागे घेऊ नकोस. तुझ्या फोड आलेल्या अनवाणी पायांना जरासं तेल लावतो. तेवढीच रखुमाईची सेवा केल्याचा आनंद.आणि तो पंढरीच्या वाटेवरचा तरुण सेवेकरी सेवेला भिडला.

अडचणीवर मात करून, आहे त्या परिस्थितीचा स्विकार करून विठ्ठल भक्तीची ‘आस ‘ तिची सेवा करून पूर्ण करणाऱ्या त्या सेवेकऱ्याच्या डोळयातली धन्यता फार मोठं भक्तीचे ‘ सार ‘ सांगून गेली.

आमच्या सन सॅटॅलाइट सोसायटीतले हुशार,अतिशय उत्साही, हौशी, परदेशवारी करून आलेले चिरतरुण श्री. सारंग कुसरे पंढरीच्या वारीत सामील झाले आहेत .त्यांचे अनुभव त्यांच्या कडून ऐकताना, अक्षरशः वारी डोळ्यासमोर उभी राहते. आणि आपणच पंढरीच्या वारीत सामील झाल्याचा आभास होतो . इतकं अप्रतिम वर्णन ते करतात.  कमी शिकलेल्या साध्या भोळ्या माणसांच्या, पण जगातलं मोठं तत्त्वज्ञान अंगीकृत बाणलेल्या, अनुभवसिद्ध ज्ञानाचं  खूप सुरेख वर्णन केलं आहे. श्री सारंग म्हणाले , ” छोट्याशा दुकानांत त्यांना पिठलं, भात,  चुलीवरची भाकरी मिळाली. त्या अन्नाला  पंचपक्वानांची चव होती. त्या माउलीला, “अन्नदात्री सुखी भव ” असें म्हणून तृप्तीची ढेकर देतांना त्यांनी विचारलं, ” मालक कोण आहेत या दुकानाचे ?   पुढे येत सांवळासा तरुण म्हणाला, ” माऊली मालक पंढरीला , विटेवर उभा आहे.मी नाही  तो आहे मालक .आम्ही  अवाक झालो, त्या भक्ती भावाने,  आणि त्याच्या बोलण्याने”.

पुढील वाटचालीत वारकऱ्यांची गैरसोय झाली.त्या गैरसोईला सामोरे जाताना  वारकरी म्हणतात . “अरे गैरसोईला सोय म्हणतो, गैरसोईतूनच सोय शोधतो तोच खरा वारकरी.”  गैरसोईतही पॉझिटिव्ह असलेले सारंग म्हणाले, “पैशाची रास करून गाद्या गिरद्यांवर लोळून जे समाधान मिळालं नाही तो आनंद चांदण्या मोजत, ‘ नीले गगन के तले ‘आम्ही, शाळेच्या पटांगणात झोपून लुटला.आणि साध्या सतरंजीवर शांत झोपलो.अंधाराकडून प्रकाशाकडे जाणाऱ्या, अभंग,झिम्माफुगडी खेळणाऱ्या, अभंगावर नाचत ठेक्याचा ताल धरून आनंद तरंगात तरंगणाऱ्या या वारकऱ्यांकडे बघून मनांत येत,या श्रद्धायुक्त भक्तांकडे एवढा उत्साह एवढी ऊर्जा येते कुठून ?एका वारीतच आपण गार होतो. 18 वाऱ्या करणारे भाग्यवान पंढरीच्या वाटेवरून धावत असतात. श्री सारंग म्हणाले, “अभंगाशी ही माणसं इतकी तन्मय होतात आणि अभंग असे गातात की आपण त्या काळात केव्हां पोहोचतो कळतच नाही. प्रगल्भ विद्याविभूषित पंडित सुद्धा एक वेळ अडखळेल. पण न थांबता  टाळ् मृदंगाच्या ठेक्यावर  वारकरी म्हणतो, ” तुकोबाची कांता सांगे  लोकांपाशी..   गोसावी झाले गं माझे पती”आणि हे ऐकतांना तल्लीन झालेल्या सारंग ह्यांनी आपल्या मधुर आवाजात त्या ओळी गाऊन टाळ वाजऊन,सगळ्यांची वाह वा! मिळवली. स्रिची भावना 

स्रिचं ओळखू शकते हे लक्षात येऊन माझ्या मनात आलं, तुकाराम पत्नी जिजाऊंची मनातली व्यथा,आणि संसाराची कथा, व्यथेने भरली आहे. मातीच्या घरात गरिबीतही कोंड्या चा मांडा करून संसार करण्याची अगदी साधी अपेक्षा होती तिची. पण नवऱ्याच्या वैराग्याने गरिबीतही तिने हार नाही मानली.मनाला मुरड घालून तिने संसार केला.तुकारामांची कीर्ती जगभर पसरली. पण त्यांच्या यशामागे उभी असलेली ही अर्धांगिनी अंधारातच राहीली. नाथ असूनहीं ती अनाथ होती.कारण तुकारामाचे संसारात लक्षचं नव्हतं.एकतर्फी संसार चालवणाऱ्या त्या असामान्य मनोधैर्याच्या  माऊलीला माझा भक्तीपूर्ण नमस्कार.     मी म्हणेन खूप काही घेण्यासारखं होतं तिच्यापासून.

 विठ्ठल नामाचा गजर करताना  वारकऱ्यांची सगळी गात्र विठ्ठलाधिन होतात. वारकऱ्यांच्या मुखात अभंग असतात मग हात तर,टाळ वाजवण्यासाठी मुक्त हवेत ना? म्हणून धोरणांनी ते  वारीला निघताना शबनम  घेतात.सारंगना घरून  निघतांना प्रश्न पडला होता, मी बरोबर चप्पल घेऊ का स्लीपर?  झब्बा कुर्ता घेऊ की  सदरा?  छत्री की रेनकोट ? या प्रश्नमंजुषेत ते फिरत होते. तर तिकडे वारकरी विचार करीत होते मी कोणता अभंग म्हणू ? आणि कोणतं भजन गाऊ ? त्यातून बरेचसे अभंग अगदी तोंडपाठ होते त्यांचे. त्यातले काहीजण निरक्षर असूनही श्रवणशक्ती व तल्लख  मेंदूच्या जोरावर आणि विठ्ठल प्रेमावर ते भजनात तल्लीन व्हायचे. यासाठी कुठल्याही शाळा कॉलेजात जाण्याची त्यांना गरजच पडली नाही.जगाच्या शाळेत त्यांनी ही भक्तीची डिग्री मिळवली होती.

हम भी कुछ कम नही,’ असं म्हणून पुढे  असणाऱ्या बायकाही सेवेच्या बाबतीत मागे नसतात. अन्नपूर्णेच व्रत घेऊन कष्टाला भिडणाऱ्या वारीतल्या बायका,पोळ्या पिठलं भाकरी करून आपल्याबरोबर इतरांचीही पोटोबा शांती त्या करतात. दहा बारा पोळ्या  केल्यावर कमरेचे टाके ढीले होणाऱ्यांना त्या मोठ्या आकारात व मोठ्यां प्रमाणात पोळ्या करून पोटभर वाढून त्या  लाजवतात.आपल्या चार पोळ्या तर त्यांची एकच मोठी पोळी पाहून खाण्याआधीच खाणारा गार होतो. कारण त्या पोळीत रामकृष्ण असतो. विठ्ठल रखुमाई असते आणि अन्नपूर्णेचा वास असतो. प्रत्येक जण वारीत सेवाभावी असतो शक्ती प्रमाणे खारीचा वाटा उचलण्यात या भक्ती सागरात तरुणही न्हांहून निघतात. वयस्करांची हातपाय दाबून सेवा,रुग्णांना मलम पट्टी करणे,प्लॅस्टिक गोळा करून त्याची विल्हेवाट लावणे याआणि अशा कामांबरोबर अपंगांची, आंधळ्यांची ते काठी होतात. काही तरुण, वारकरी माऊलींना फुकट चार्जिंगची सोय करून देतात.वारकऱ्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या त्यांच्या घरच्यांना खुशाली नको का कळायला! म्हणून घरच्यांशी संवाद साधून देतात. इथे ‘स्ट्रगल’  असूनही  आनंद आहे. सकारात्मक विचारांची जोड आहे . नामस्मरणात दंग असल्याने कुविचारांना अति विचारांना इथे थारा नाही. कौन्सिलर ची गरज असते लोड गादीवर लोळणाऱ्या,रिकाम्या मनातल्या रिकाम टेकडयांना. ईथे निराश  व्हायला कुणी रिकामच नसत.विठ्ठल नामांत, विठ्ठल भक्तीत ते अखंड बुडाले आहेत . आणि म्हणूनच मला मनापासून खूप खूप कौतुक वाटतं ते सारंग सारख्या उत्साही तरुणांचं.परदेशात विमानाने सुखात आरामात प्रवास करण्याचा आनंद जितक्या तन्मयतेने त्यांनी घेतला तितक्याच समाधानाने त्यांनी हा खडतर प्रवास आनंदाने स्विकारला आहे.पुढील वाटचालीसाठी त्यांना आपण मनःपूर्वक शुभेच्छा देऊया. श्री.सारंग यांचे विचारही प्रगल्भ आहेत ते उत्तम शिघ्र कवी,कलाकार आहेत.त्यांच्या गाण्यात कमालीचा गोडवा असून बारकावे शोधून वारी वर्णन करण्यात  त्यांचं कसब अप्रतिम आहे. ते म्हणतात, “एकदा मनाने ठरवलं की सगळं होतं”. वारी प्रवास संपत आला, एक सुंदर गाणं आठवल त्यांना,…. दोन ओडक्यांची होते सागरात भेट.. त्याचे वारकरी त्यांना भेटले असतील. या जनसागरात वारकरी संप्रदायात त्यांना खूप खूप आनंद अनुभव,भरपूर ऊर्जा मिळाली. माणसातले देव  भेटले. चारीधामचा आनंद, पुण्य  मिळाल. माऊलीचा अतिशय सुंदर अर्थ त्यांना उमगला. सुरेख वर्णन धावपट्टीवरचंच होतं. ते पुढे म्हणतात, मा… म्हणजे मानवता. ऊ म्हणजे उदारता. आणि ली म्हणजे लिनता.. अतिशय सुंदर माऊली चा अर्थ सांगून श्रद्धेचा सुरेख सारीपाटच वारकऱ्यांनी आपल्यापुढे मांडला आहे. या सामान्य वाटणाऱ्या पण असामान्य बुद्धीनें, सकारात्मक विचाराने, जीवनाचा आनंद घेणाऱ्या,वारकऱ्यांना माझा   म्हणजे सौ.राधिकेचा शिरसाष्टांग  नमस्कार असो. …

मी पदवीधर आहे,खूप सुवर्ण पदके मिळवली आहेत. मला उच्च स्थान आहे. हा माणसांचा गर्व इथे वारकऱ्यांपुढे,  पंढरीच्या वाटेवर गळून पडतो… नतमस्तक होऊन मी म्हणते .धन्य ती माऊली.,धन्य ते तुकाराम, आणि धन्य धन्य ते पंढरीच्या वाटेवरचे वारकरी.  

 मंडळी आपणही विठ्ठल नामाचा गजर करूया. जय  जय राम कृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल. माऊली माऊली,

वारीवर्णन : श्री सारंग कुसरे

© सौ राधिका – माजगावकर – पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ वटपॊर्णिमा तुझी… कवयित्री : सुश्री संजीवनी बोकील ☆ प्रस्तुती – डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ वटपॊर्णिमा तुझी… कवयित्री : सुश्री संजीवनी बोकील ☆ प्रस्तुती – डॉ. ज्योती गोडबोले 

मैत्रिणींसारखी सज धज 

नव्या पैठणीची घडी मोड

नाजूक कलाकुसरीचे दागिने घाल अंगभर 

पण आरशात बघशील

स्वतःकडे

ते तुझ्या नजरेनं,

तुझ्यासाठी,

माझ्या नाही…..

दुसऱ्यासाठी सजवणं 

हा अपमानच तुझ्या 

आभूषणांसाठी !!

*

असणं सिद्ध केल्यावर

दिसणं सिद्ध करायचा

हा आटापिटा कशासाठी ?

गळ्याला काचणा-या,

बोटांना रुतणाऱ्या,

कानांना टोचणाऱ्या

या दागिन्यांपेक्षा

तुला- मला सुखवणारे किती दागिने

आहेत ना आपल्यापाशी?

*

चढावर बळ देणारा तुझा धीर, 

उतारावर थोपवणारा माझा संयम, 

होडी बुडत असताना

आलटून पालटून मारलेल्या

वल्हयातील इच्छाशक्ती….

माझ्या आधी तुला वाचवण्याची

माझी असोशी…. 

तुझ्यापेक्षा माझ्या उपाशी पोटानं

तुझी कासाविशी….

जिव्हाळ्याच्या एकाच विहिरीत सापडणारे

किती किती अस्सल मोती…!

*

वडाच्या फेऱ्यांपेक्षा 

घाल मला बाहूंची मिठी

आणि माझा विळखा

तुझ्या कमरेभोवती….

*

सवाष्ण म्हणजे सवे असणं

मध होऊन दुधात राहणं

सात जन्म पाहिलेत कोणी 

साथ निभावण्याची शपथ घेऊ…

माझ्यासाठी तू धागा

तुझ्यात मला गुरफटून घेऊ…

*

तू आधाराचा पार 

बांध माझ्या भोवती,

पारंबी होऊन मी 

झेपावेन तुझ्यासाठी…

*

अंगण असेल तुझ्या

आरस पानी हृदयाचे, 

पौर्णिमा होऊन

बरसेन मी तिथेच… 

अवतीभवती !

 

कवयित्री : संजीवनी बोकील

संग्रहिका : डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ वटवृक्ष… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – वटवृक्ष – ? ☆श्री आशिष  बिवलकर ☆

कुटुंबवत्सल वटवृक्ष,

पसरला दाट दुरवर!

घनदाट  छाया त्याची,

वाटसरूच्या शिरावर!

*

लहान मुले खेळती बागडती,

खेळती सुरपारंब्या मनसोक्त!

मोठ्यांना मोह न आवरे खेळाचा,

टांगाळून घेती आनंद होऊन  मुक्त!

*

प्राणवायूचे संतुलन राखतो,

विषारी वायू  स्वतः शोषून!

सहवास त्याच्या सोबत असावा,

सांगती शास्त्र आपणा उद्देशून!

*

भूजल साठा करतो मुळाशी,

सोडतो बाष्प उन्हाळ्यात!

अक्षयवृक्ष म्हणती यासी ,

हिरवागार साऱ्या ऋतूकाळात!

*

सुहासिनी पूजती यास,

मागती  दीर्घायुष्य पतीचे!

जन्मोजन्मीची साथ मांगे,

पूजन करती  पतिव्रतेचे!

*

उपयोग याचे असती अनेक,

दूर करी दंतदुखी असो मधुमेह!

लेप याचा ठरे  मोठा गुणकारी,

आयुर्वेदात महत्व नि:संदेह !

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares