मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पसंत आहे मुलगा… – भाग – १ ☆ प्रा. विजय काकडे ☆

प्रा. विजय काकडे

परिचय

नाव : प्रा. विजय काकडे (कथाकार,लेखक,वक्ते)

शिक्षण : एम एस्सी (SET),संगीत विशारद

नोकरी : विद्या प्रतिष्ठानचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बारामती. जि. पुणे

पद : विभाग प्रमुख, इलेक्ट्रॉनिक्स विभाग

विशेष कार्य :

१) कथाकथनाचे दोन हजार पेक्षा जास्त प्रयोग व विविध विषयावर पाचशे पेक्षा जास्त व्याख्याने

२)सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, बहि:शाल वक्ते म्हणून २००७ पासून कार्यरत आहे.

३) ९४ व्या अ.भा. साहित्य संमेलनासाठी निमंत्रित कवी तसेच अंमळनेर येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनात गझल कट्ट्यासाठी निमंत्रित गझलकार म्हणून निवड झाली आहे.

४) ” के विजय ” या नावाने कविता व गझल लेखन तसेच ” विजलहरी ” या नावाने चारोळी लेखन

५) विजलहरी या गझल वृत्ताचे स्वतंत्रपणे संशोधन केले आहे.

६) नुकतेच सूलक म्हणजेच सूक्ष्म लघू कथा या कथा प्रकाराचे स्वतंत्र संशोधन केले आहे.

प्रकाशित साहित्य : सहा कथासंग्रह प्रकाशित.

पुरस्कार :

  • राष्ट्रीय पुरस्कार : (१) कोविड योद्धा, विशाखा फाउंडेशन, नवी दिल्ली (२) कोविड- १९ फायटर सन्मान, महावीर इंटरनॅशनल मेडीकल सर्विसेस, मुंबई (३) Dr. Babasaheb AmbedkarNational Exllence award 2022
  • राज्य पुरस्कार : (१) छ. शाहू महाराज आदर्श शिक्षक पुरस्कार, लोकरंजन कला मंडळ, नाशिक (2010) (२) वपु काळे स्मुर्ती प्रतिष्ठानच्यावतीने वपु कथन गौरव पुरस्कार (2013) (३) आदर्श शिक्षक पुरस्कार, गंगाधर लोकवार्ता, कोल्हापूर(2020) (४) उत्कृष्ट स्थंभलेखक पुरस्कार, जाई फाउंडेशन, मुंबई ( २०२१ ) (५) साहित्य भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, बाल संस्कार संस्था, ठाणे

साहित्य सन्मान : माझा शाळा प्रवेश दिन या ग्रंथास ५ राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

आगामी प्रकाशने : एक कथासंग्रह, दोन कवितासंग्रह,

चारोळी संग्रह : १) नातीगोती 2) विजलहरी

  • लेखसंग्रह व काव्य संग्रहांसाठी प्रस्तावनालेखन.
  • विविध दिवाळी अंक व वृत्तपत्र यातून सातत्याने कथालेखन चालू असते.

मराठी ॲपच्या माध्यमातून डिजिटल खालील माध्यमावर विपुल प्रमाणात लेखन केले आहे-

१) प्रतिलिपी २) स्टोरी मिरर ३) पॉकेट नॉव्हेल

स्वतःचा युट्युब चॅनेल आहे ज्यावर अनेक कथा, मिमिक्री, भाषणे उपलोड आहेत.

? जीवनरंग ❤️

☆ पसंत आहे मुलगा…  भाग – १ ☆ प्रा. विजय काकडे

महिनाभरानंतर मी महेशच्या घरी जात होतो तो आठ ते दहा दिवसांपासून कॉलेजला आला नव्हता. त्याची तब्येत बरी नाही की काय अशी शंका सहज माझ्या मनात आली.शिवाय माझे एक पुस्तक आणि दोन टॉपिकच्या नोट्स त्याच्याकडेच होत्या त्या मला त्याच्याकडून घ्यायच्या होत्या. मी गेलो त्यावेळी महेश घरीच होता आपली जुनी एम 80 गाडी पुसत होता. मला पाहताच त्याचा चेहरा खुलला. “का रे कसा आलास? “

“सहजच, आठवडाभर झाले कॉलेजला आला नाहीस,म्हटलं गेला की काय ते बघावं…”

” असा कसा जाईन रे? तुला बरोबर घेतल्याशिवाय! ” त्याच्या या वाक्यावर आम्ही दोघेही खळखळून हसलो आणि हासतहासतच एकमेकांना अलिंगन दिले.

” मग?काय झालं? कॉलेजमध्ये, काही विशेष? “

” विशेष काही नाही रे पण वहिनी जरा जास्तच कावऱ्याबावऱ्या झाल्यात… मला पण काही सांगता येईना. म्हणून थेट तुझ्याकडं आलो. “

” आत्ता गप्प बसं नाहीतर उगाच मार खाशील, अन हळू बोल आई घरात हाय,चल घरात, ” तो म्हणाला तसे बोलत बोलत आम्ही घरात गेलो. घरात जाऊन खाटेवर बसलो.

“आई, पाणी दे विजू आलाय,” महेशने आईला आवाज दिला त्याबरोबर पाण्याचा तांब्या घेऊन महेशच्या आई बाहेर आल्या. मी त्यांना मावशी म्हणत असे.

“बरेच दिवसांनी आलास रे ?”

” हो मावशी हल्ली अभ्यास फार वाढलाय ना, परीक्षा पण जवळ आल्यात ना? महेश आ…चार दिवस झालं कॉलेजला आला नाही (खरेतर मी आठ दिवसच म्हणत होतो परंतू महेशच्या वटारलेलंय डोळ्याकडे पाहून मी लागलीच आठ वरून चारवर आलो)म्हटलं चला त्याला भेटून तर यावं. “

अरे त्याला बरं नव्हतं अन रानात कामं पण चालल्यात ना म्हणून म्हटलं रहा घरी चार दिवस, काय व्हत न्हाय. बरं झालं बाबाआलास. बसा जेवायला दोघं.”

” नको, नको मावशी,मी डबा खाऊन आलोय आत्ताच.”

” ये विज्या लय नाटक करू नकोस,वाढ गं आई आम्हाला,मला पण खूप भूक लागलीय, ” महेश पुढे म्हणाला.

” अरे, पण मी खरंच जेवलोय म…महेश… ” पण माझ्या तशा म्हणण्याचा काही उपयोग झाला नाही कारण खरं सांगायचं तर मी जेव्हा जेव्हा महेशच्या घरी जायचो तेव्हा तेव्हा जेवण केल्याशिवाय तिथून माझीच काय पण सोबत असलेल्या कोणाही मित्राची कधीच सुटका व्हायची नाही आणि तिथे नाही म्हणायची तर आमची बिषाद नसायची. त्याच्या आईचा स्वभावच तितका प्रेमळ होता. असे मित्र आणि अशी आई मिळायला खरंच खूप भाग्य लागतं! शिवाय आमच्या दोघांची मैत्री तर फारच दृढ होती. एकमेकांना आम्ही खूप समजावून घ्यायचो.

महेश एक चांगला स्पोर्टमन होता पण अभ्यासात मात्र सोसोच होता. लेक्चर पेक्षा मॅचेस, पिक्चर आणि स्टाईल हेच त्याचं जीवन होतं.मी लेक्चरला रेग्युलर असायचो त्यामुळे महेशला नोट्स पुरवण्याचे माझे काम असायचे. महेशचा स्वभाव खूप मनमोकळा होता. त्याचा मित्रपरिवार सुद्धा खूपच मोठा होता. त्याची पर्सनॅलिटी पण छान होती. सडसडीत बांधा,उंचपुरा, स्टायलिश केस, दिसायला सावळा असला तरी तो नाकीडोळी छान होता. त्याचा चेहरा नेहमी हसतमुख असायचा. सगळ्यांशी छान बोलायचा. कोणाशी भांडणतंटा वगैरे असली काही भानगड नव्हती. सगळ्यांच्यात मिळून मिसळून वागायचा. त्या उलट मी मात्र शांत संयमी आणि अभ्यासू असल्याने थोडा हुशारात मोडत होतो. आमच्या दोघांच्या मैत्रीचं खरं कारण म्हणजे एसटी. आम्ही दोघे एकाच एसटीने प्रवास करायचो.माझ्या गावातून सकाळी एसटी निघायची आणि दोन गावे ओलांडून महेशच्या गावात प्रवेश करायची. तोपर्यंत गाडीत शाळेच्या मुलांची गर्दी व्हायची. पण मी बहुतेकवेळा माझ्या शेजारची जागा महेशसाठी राखून ठेवायचो. वर्गात सुद्धा बहुतेकवेळा आम्ही दोघे एका बाकावरच बसायचो कारण त्याचं लिहिण्याचं स्पीड कमी असल्यामुळे तो माझं पाहून त्याच्या वहीत लिहायचा. लेक्चर संपल्यावर प्रॅक्टिकलला लॅबमध्ये जाण्याअगोदर मधल्या ब्रेकमध्ये आम्ही झाडाखाली डबे खायचो. एकमेकांच्या भाज्याच नव्हेतर थेट डबेच एकमेकांना शेअर करायचो. डबा नसलेले मित्रही आमच्यात मिसळायचे आणि मग अवघा रंग एकच व्हायचा. मौज- मजा -मस्ती खूप व्हायची.

खरेच,आयुष्यातले ते खरे सोनेरी दिवस होते!

हे सगळं मी आठवत असतानाच अचानक महेशने आवाज दिला.

“बस खाली.” तेव्हा कुठे मी भानावर आलो!

मावशींनी लगेच दोन ताटे वाढून आमच्यापुढे आणून वाढून ठेवली. आम्ही जेवायला बसलो. जेमतेम दोन घास खाल्ले आणि माझ्या पटकन काहीतरी लक्षात आल्याने मी म्हणालो, “मावशी, परवाच्या स्थळाचं काय झालं?”

” गप्प बस ! जेव गपचिप!,” विषय टाळण्यासाठी महेश म्हणाला.

तेवढ्यात आईचा आवाज आला, ” अरे पसंत आहे मुलगा त्यांना…! लगेच फोन येऊन गेला त्यांचा. “

” अरे वा! अभिनंदन महेशराव!मावशी आता होऊन जाऊ द्या! लवकर बार उडवा भावड्याचा !”

” अरे बाबा, बार उडवायचा पण महेशचा नाही.”

” मग? “

” तुझा… “

” माझा? म्हणजे मला नाही कळलं?, ” मी हातातला घास परत ताटात ठेवत आश्चर्याने म्हटले.

” अरे त्यांनी महेशला नाही तुला पसंत केलंय. “

” काय?,” मावशींच्या तोंडचे ते शब्द ऐकून मी उडालोच!”

” अरे, ते लोक म्हणाले, आम्हाला नवरदेवासोबत आलेला तो दुसरा मुलगा पसंत आहे. त्याला आम्ही आमची मुलगी देऊ, “मावशी माहिती देत म्हणाल्या.

” काहीतरीच काय मावशी, तुम्ही माझी मस्करी करताय… हो ना? महेश तू तरी… “

” अरे बरोबर बोलतेय आई, काही मस्करी वगैरे नाही. ” महेश म्हणाला.

” अरे पण माझा काय संबंध? माझा प्रश्न येतोच कुठे? आणि हे काय माझ्या लग्नाला अजून पाच ते सहा वर्षे लागतील. मला एम एस्सी करायचंय, त्यापुढे नोकरी आणि… “

” ते खरंय, पण त्यांनी तुलाच पसंत केलय आणि मुलगी छान आहे असं तूच तर म्हणत होतास?”

” हो पण ते सगळं महेशसाठी होतं…शिवाय त्याला पण मुलगीही पसंत आहे.”

” अरे पण तिला तू पसंत आहेस ना? हाच तर मोठा घोळ आहे. “

” मावशी प्लिज तुम्ही माझी चेष्टा करू नका.”

” अरे मी खरं बोलतेय बाळा. महेश? तूच सांग बाबा काय म्हणत होते ते लोक त्यादिवशी फोनवर?,” त्या महेश कडे बोट दाखवत म्हणाल्या.

मी महेशकडे पाहिले पण त्याला काय बोलावे ते सुचत नव्हते तो जाम टेन्शनमध्ये दिसत होता.

बोलण्यापेक्षा तोंडातला घास भराभर चावण्याचे नाटक तो करू लागला.

– क्रमशः भाग पहिला 

© प्रा. विजय काकडे

बारामती. 

मो. 9657262229

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ अशी पाखरे येती…!!! – भाग-१ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ अशी पाखरे येती…!!! – भाग-१ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

(श्री अजय कटारिया सर यांना सादर समर्पित) 

पुण्यामध्ये आप्पा बळवंत चौकाचं नाक जिथून सुरू होतं, तिथे चॉईस नावाचं पुस्तकाचे दुकान आहे. दुकानाच्या मालकांचे नाव आहे श्री अजय कटारिया. 

बरोबर सहा वर्षांपूर्वी एका स्नेह्यांच्या माध्यमातून यांची आणि माझी ओळख झाली. 

बोलता बोलता ते म्हणाले, ‘माझे पुस्तकाचे दुकान आहे, कधी काही लागलं तर या…!’

भीक मागणाऱ्या अनाथ मुलांना आपण दत्तक घेऊन, त्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले आहे. दरवर्षी मला खूप शैक्षणिक साहित्य लागतेच. 

कटारिया साहेबांच्या चॉईस दुकानात गेलो; तर थोडी सूट मिळेल आणि चांगल्या क्वालिटीचे साहित्य मिळेल, हा स्वार्थी विचार करून मी त्यांना चार-पाच वर्षांपूर्वी प्रथमच, सर्व शैक्षणिक साहित्याची लिस्ट दिली. 

त्यानंतर दोन दिवसांनी सर्व साहित्य आले.

बॉक्स उघडून पाहिला, आम्ही दिलेल्या लिस्टपेक्षाही सामान जास्त होते. 

आम्ही एक वही मागितली तिथे पाच वह्या होत्या, एक दप्तर मागितले तेथे पाच दप्तरे होती, पाच कंपास पेट्या मागितल्या तिथे 25 होत्या…

मी त्यांना फोन करून म्हणालो, ‘कटारिया साहेब, बहुतेक हा दुसऱ्यांचा बॉक्स आमच्याकडे आला आहे… हि आमची लिस्ट नव्हे ! 

ते हसून म्हणाले, ‘असू द्या हो डॉक्टर, अनाथ पोरांना शिकवताय… थोडं इकडे तिकडे चालणारच…  पोरं आहेत… 

घ्या आमच्याकडून डोनेशन समजून…’ 

एक्स्ट्रा सामानाची मी त्यांना देणगी म्हणून पावती दिली, त्यांनी ती हसत खिशात ठेवली. 

पुढच्या वर्षी म्हणजे साधारण 2021 ला त्यांना पुन्हा लिस्ट दिली… पुन्हा पाचपट सामान जास्त होते… मी पुन्हा तोच फोन केला… पुन्हा त्यांचे तेच उत्तर आले… एक्स्ट्रा सामानाची मी त्यांना पुन्हा पावती दिली… ही पावती हसत त्यांनी पुन्हा खिशात ठेवली…! 

एकावर एक फ्री… हि बिझनेस स्ट्रॅटेजी मी समजू शकतो, पण एकावर पाच फ्री… ??? 

मग 2022 साल उजाडले… 

यावेळी सामानाची लिस्ट घेऊन मी स्वतः दुकानात गेलो. दुकानात भरपूर कर्मचारी आहेत, परंतु माझ्याकडची लिस्ट घेऊन त्यांनी स्वतः सामान बांधायला सुरुवात केली. 

मी बारकाईने पाहत होतो, माझ्या लिस्ट पेक्षा पाचपटीने जास्त गोष्टी ते स्वतःच्या हाताने बॉक्समध्ये भरत होते. 

मी त्यांना म्हणालो साहेब, आपण आपले नुकसान का करून घेता ? माझ्या लिस्ट प्रमाणेच मला सामान द्या…

यावर ते माझ्याकडे न बघता, स्टूल घेऊन, वरच्या कप्प्यातले सामान काढता काढता म्हणाले, ‘डॉक्टर भरगच्च भरलेल्या ताटामधून दोन घास चिमण्यांना टाकले म्हणजे आपलं काही नुकसान होत नाही हो …! 

ए त्या चौथा कप्प्यातला, नवीन माल काढ… त्यांचं सगळं लक्ष बॉक्स भरण्याकडे….

तरीही मी माझं बोलणं रेटत म्हणालो,  पण हा आपला व्यवसाय आहे साहेब, मला साहित्य देणे म्हणजे आपला तोटा आहे …! मी आवंढा गिळत म्हणालो. 

तितक्याच उत्स्फूर्तपणे बॉक्समध्ये साहित्य टाकत ते म्हणाले, ‘साहेब धंदा म्हणा, व्यवसाय म्हणा, कारभार म्हणा, कारोबार म्हणा…. जे काही करायचं ते नफ्यासाठी… मी पक्का व्यापारी आहे, तोट्यामध्ये कधीच व्यापार नाही केला मी … 

‘आत्ता बी मी तोट्यामंदी नाहीच, नफ्यामंदीच आहे…’ चष्म्या मागून डोळे मिचकावत ते बोलले. 

मागितलेल्या गोष्टीपेक्षा, पाचपटीने भरलेल्या बॉक्स कडे बघत ‘ हे कसं काय बुवा ?’ हा प्रश्न मला त्यांना विचारायचा होता…

माझ्या बावळट चेहऱ्यावर त्यांना तो दिसला असावा… ! 

‘छोटू, आपल्याकडच्या दुरेघी वह्या संपल्या का रे ?  शेजारच्या दुकानातून दहा डझन मागव आणि घाल या बॉक्समध्ये…. !’ हात झटकत ते बोलले. 

माझा बावळट चेहरा अजून तसाच असावा. 

नफा तोट्याचा त्यांनी मग उलगडा केला… 

‘डॉक्टर तुमी कितीबी नाय म्हणले तरी जास्तीचा सामान पाहून तुम्हाला आनंद होतो का नाही ? तो माझा नफा…. 

दहा पोरं नाही, आता तुम्ही 50 पोरांना सामान देऊ शकता, त्या पोरांना आनंद होतो की नाही…? तो माझा नफा…

कटारिया काका कोण ? हे पोरांना कधीच कळणार नाही… पण 50 पोरं शिकत आहेत,  याचा मला आनंद होणार का नाही ? तोच माझा नफा… 

जलमाला येऊन आपण कोणाच्या उपयोगी नाही पडलो, हा खरा तोटा… ! 

“तोटा” या शब्दावर जोर देत , डाव्या हाताच्या तळहातावर उजव्या हाताने त्यांनी जोरात टाळी मारली…! 

आपून तोट्यात धंदाच करत नाही सायेब, पक्का व्यापारी आहे मी …’

काउंटर वरच्या टेबलावर बोटांनी तबला वाजवत ते म्हणाले, ‘ए चाय सांगा रे डॉक्टरला…!’  

तोट्याची शेती करून, आनंदाची बाग फुलवत; नफ्याची फुलं वेचणाऱ्या या माणसापुढे मी मनोमन नतमस्तक झालो ! 

चहाचा घोट घेऊन मी त्यांना म्हणालो, ‘सर पण हे नुकसान किती आहे तुमचं, यात विनाकारण खर्च खूप आहे…’ 

ते पुन्हा हसत म्हणाले, ‘डॉक्टर पोरगं तुमचं असो, माझं असो किंवा आणखी कोणाचं असो, पोराच्या शिक्षणावर झालेला खर्च मी खर्च समजतच नाही, पोरांच्या शिक्षणासाठी केलेला खर्च हा भविष्यामध्ये भरभक्कम परतावा देणारी गुंतवणूक असते

गोरगरिबांची पोरं शिकतील तोच माझा परतावा… मंग खर्च झालाच कुठे ? 

आलतू फालतू स्कीम मध्ये अपुन पैसा गुतवतच नाही… सांगितलं ना ? पक्का व्यापारी आहे मी… ! 

मी खर्च केला नाही सायबा… फक्त गुंतवणूक केली… माझ्या पोरांवर गुंतवणूक केली… बघा भरभक्कम परतावा येणारच… 

“येणारच” म्हणताना पुन्हा डाव्या हाताच्या तळहातावर उजव्या हाताने त्यांनी जोरात टाळी मारली…! 

मी भारावून म्हणालो या अनाथ मुलांसाठी तुम्ही किती करत आहात… ? 

अनाथ कशानं हो… पालक म्हणून तुम्ही आहे…  मी आहे…. काय डॉक्टर तुम्ही सुद्धा…! 

‘चहा संपवा तो…’ म्हणत, टेबलावर पुन्हा त्यांनी हसत तबला वाजवला… 

तो तबला होता ? की माझ्या हृदयाची धडधड ?? माझं मलाच कळलं नाही…!

शर्टाच्या बाहीला डोळे पुसत कटारिया साहेबांची नजर चुकवत मी बाहेर पडलो !  

सर्व साहित्य घेऊन मी आलो… दहा ऐवजी 50 मुलांना ते वाटले… तरीही कुठेतरी अपराधीपणाची भावना होती. 

भावनेच्या भरात हा “वेडा माणूस” स्वतःचं खूप नुकसान करून घेत आहे, याची मला मनोमन जाणीव होती. 

– क्रमशः भाग पहिला

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘सावरकरांचा हास्यविनोद करतानाचा फोटो !’… लेखिका : श्रीमती नीलकांती पाटेकर ☆ प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘सावरकरांचा हास्यविनोद करतानाचा फोटो !’… लेखिका : श्रीमती नीलकांती पाटेकर ☆ प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर ☆

सावरकरांचा हास्यविनोद करतानाचा फोटो ! … मी प्रथमच असा बघितला.

खूप वर्षांपासून शोधत होते.त्यांचा कुठलाच फोटो असा नाहीये.आणि मला तर असा फोटो बघायचाच होता.म्हणून मी चित्रा, माझी मैत्रीण,तिला म्हटलं, “मला त्यांना हसताना बघायचं आहे.”

हा तिने आत्ता पाठवला. बघितल्यावर कित्येक वर्षांची कोंडी फुटली.

सश्रम कारावासाच्या २ जन्मठेप शिक्षा….

११वी मध्ये कविता होती… ‘जयोस्तुते…’ नंतर नाटक वाचलं – ‘संन्यस्त खड्ग’.नंतर…

जिथं मिळेल तिथं वाचणं.

त्यांचं साहित्य वाचून वाटायचं, ‘किती प्रगल्भ, बुद्धिमान व्यक्ती ही!आणि त्यांनी सश्रम कारावास भोगला, अख्खं तारुण्य त्यात गेलं. साधं स्वस्थ आयुष्य कधी जगले असतील ते? काही हलकेफुलके क्षण असतील का त्यांच्या वाट्याला? अनेक क्षणी अनेक विचार.

शिवाजीपार्क मध्ये रहात होते, तेव्हा शेजारच्या मधुकरनी,आत्ताच्या उद्यान गणेशच्या मागची त्यांची बसायची जागा दाखवली.

समोरच सावरकर स्मारक आहे. आता “ते पार्काकडे तोंड करून, कित्येक तास बसायचे”… म्हणाला तो. आपल्याला स्वातंत्र्य मिळून बरीच वर्षं झाली होती.कदाचित हा मोकळा श्वास, त्याची आस, कसं समजणार मला हे? पार्काला फेरी मारताना, मला त्या जागी उगाचच जाणवायचे. गोल भिंगातले घारे तीक्ष्ण डोळे, कित्येक वर्षांच्या सश्रम कारावासाचा थकवा शरीरावर असावा. पण डोळ्यातली भेदकता तितकीच तीव्र असावी. त्यातच कधीतरी त्यांना हसरं बघायची इच्छा झाली मला.वाटलं, असेल की कुठं एखादा फोटो पण आज ५४ वर्ष झाली त्याला. 

हल्लीच चित्राला म्हटलं, बघायचं आहे त्यांना, हसताना. मध्ये काही दिवस गेले आणि आज अचानक हा फोटो पाठवला तिनं. एरवी एकच स्टँडर्ड फोटो बघितला आहे. योगायोग कसा बघा. आज सकाळी, कुठला तरी जुना पेपर हाती आला. लता मंगेशकर, हृदयनाथ आणि ब. मो. पुरंदरे दिसले फोटोत. उत्सुकतेनं लेख वाचला, शिव कल्याण राजा. राज्याभिषेकाला साडे तीनशे वर्षे झाली शिवाजी महाराजांच्या ! ५० वर्षांपूर्वीची LP त्यात सावरकरांची कविता घेतली होती. हृदयनाथांनी लिहिलेला लेख तो.रमून गेले पार मी. त्यात असलेलं प्रत्येक गाणं – ते त्यात का समाविष्ट झालं, त्याचं प्रयोजन… हृदयनाथांना भेटले नाही कधी पण दीदीच्या  संदर्भातली  गाण्याची प्रत्येक गोष्ट त्यांच्या तोंडून ऐकताना राजसूय यज्ञात, यज्ञवेदीच्या रक्षेत लोळून, सोनेरी झालेल्या मुंगुसाप्रमाणे होते स्थिती माझी. ती हुरहूर जागवते, आत खोल जागवते निष्ठा आणि बरंच काही…

त्या LP मधले कवी दिग्गज.त्यात सावरकरही…पुन्हा तीच ओढ, त्यांना हसताना बघायचं.

आणि नोटीफिकेशनचा टोन वाजला.

बघितलं तर फोनच्या डोक्यावर लिहून आलं, चित्रा फडके. मी सगळं सोडलं हातातलं आणि उघडलं पेज, तर हा फोटो, म्हटलं तिला लगेच, ” व्वा ! किती छान वाटलं बघूनच ! डोळे निवले. बाकीचे दोघेही आहेत. पण मला दिसलं, त्यांचं हसू…” कुणाला वाटेल, काय वेडेपणा!

एव्हढी काय ती तगमग! हो. तगमगच. इतक्या वर्षांच्या सश्रम कारावासात, हरवलं तर नाही ना, हसू त्यांचं…? आयुष्यातली इतकीशी, इवलीशी गोष्ट हरवली आणि ज्या आमच्यासाठी त्यांनी कारावास भोगला, त्या आम्हाला साधी जाणीवही नाही ? आणि ओढ लागली त्यांचा हसरा चेहेरा बघायची, इतकंच…

लेखिका : श्रीमती नीलकांती पाटेकर 

प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य –  इंद्रधनुष्य ☆ झाशीवाली शौर्य शालिनी ! – भाग – २ – लेखिका : मेजर मोहिनी गर्गे कुलकर्णी (नि.) ☆ प्रस्तुती – जुईली अमोल ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ झाशीवाली शौर्य शालिनी ! – भाग – २  – लेखिका : मेजर मोहिनी गर्गे कुलकर्णी (नि.) ☆ प्रस्तुती – जुईली अमोल ☆

किल्ल्याला वेढा देत इंग्रजांनी २५ मार्च १८५८ रोजी झाशी किल्ल्यावर प्रत्यक्ष आक्रमण केलं. मेजर जनरल हयू रोज समोर मोठं आव्हान होतं. त्यावेळी त्यांना रसद उपलब्ध होऊ नये म्हणून भोवती गवताचं पातंही शिल्लक न रहाण्याची खबरदारी तिनं घेतली होती अशी नोंद सर हयू रोज करून ठेवतो. तोफा आग ओकत होत्या. चकमकी वाढत होत्या. रातोरात पडलेल्या भिंती उभ्या करून राणी सैन्याला सतत प्रेरित करत होती. जखमी,आश्रितांची व्यवस्था, दारुगोळा, अन्नछत्र अशा विविध पातळ्यांवर राणी अहोरात्र झुंजत होती. मदतीला येणारे तात्या टोपेही तिथपर्यंत पोहोचू शकले नाहीत हे ऐकून राणीचे सरदार निराश झाले तेव्हा ही झाशीवाली त्यांच्यावर कडाडली! स्वबळावर ही लढाई सुरूच ठेवण्यासाठी तिनं त्यांचं मन वळवलं. ३ एप्रिल रोजी किल्ल्याची भिंत फोडून इंग्रज आत शिरले तेव्हा राणीनं आत्माहुती न निवडता मोठंच धाडस दाखवलं. अशाही परिस्थितीत स्थिर चित्तानं पुढची निरवानीरव करत ११/१२ वर्षांच्या दामोदरला घेऊन ती बाहेर पडली. अंगात चिलखत,कमरेला विशाचं पाणी दिलेला जंबिया, एक मजबूत तलवार साथीला. आता पुन्हा कधी झाशीचं दर्शन!

झाशीतली भीषण लढाई, पाठलाग करणाऱ्या वॉकरशी झालेलं द्वन्द्व यानंतर अन्नपाण्याविना राणी लक्ष्मीई सलग १०२ मैल (१६४ किलोमीटर्स) एवढी घोडदौड करत मध्यरात्री काल्पी इथे पोहोचली. हे प्रचंड अंतर आहे. आज चांगल्या रस्त्यावरून,गाडीनं कमीत कमी अडीच-तीन तास लागणारं हे अंतर तेव्हा डोंगराळ असताना, रात्रीच्या गडद अंधारात, प्रचंड तणावाखाली राणीनं कसं पार केलं असेल? मुळात हाच घोडदौडीचा, आत्यंतिक धाडसाचा तिचा पराक्रम भारतीय इतिहासात नोंदवलेला आहे. काल्पीला पोहोचताक्षणीच घोड्यानं अंग टाकलं पण रजस्वला अवस्थेत पोहोचलेल्या राणीनं तशातही मोठंच बळ एकवटलं. पुन्हा हिंमत बांधली.

एवढ्या कडक सुरक्षेतून राणी निघून गेली हे कळताच सर हयू रोज संतापला. राणीचे वडील मोरोपंत तांबे यांना ५ एप्रिल रोजी भर दुपारी सर हयू रोजनं झाशीच्या राजवाड्यासमोर जाहीरपणे फासावर चढवलं. झाशीची प्रचंड लूट सुरू झाली. मोठा नरसंहार झाला. प्रत्यक्ष तिथे असलेला डॉ. थॉमस लिहितो, “Death was flying from house to house with mercurial speed, not a single man was spared. The streets began to run with blood.”

हे ऐकल्यावर राणीची काय अवस्था झाली असेल? त्यातूनही ती पुन्हा उभी राहिली! दुर्मिळातल्या दुर्मिळ अशा स्त्री मधल्या अद्वितीय शौर्याला प्रकट करणारं राणीचं एकेक धाडस वंदनाला पात्र आहे. रावसाहेब पेशव्यांच्या पायावर तलवार ठेवत या रणरागिणीनं त्यांना पूर्वजांच्या पराक्रमाचं स्मरण करून दिलं. पेशवे, नवाब यांच्या साथीनं राणीनं १५ में रोजी काल्पीजवळ मोठाच लढा दिला. वीजेसारखी तिची समशेर शत्रूसंहार करत चौफेर फिरली.

काल्पी इंग्रजांच्या हाती लागल्यावर पुनश्च हरि ॐ! छत्रपतींचा आदर्श डोळ्यांसामोर ठेवत ग्वाल्हेरचा किल्ला घेण्याचा आग्रह तिनं धरला. इंग्रजांची साथ देत पेशव्यांवर चालून आलेल्या जयाजीराव शिंदेंचा चोख बीमोड केल्यावर त्यांच्या सैन्यातली मराठी अस्मिता जागवून आपल्या बाजूनं वळवण्याचं मोठं काम राणीनं केलं. केवळ साधनांवर युद्धं जिंकली जात नाहीत तर त्यासाठी पराक्रम हवा हे राणी लक्ष्मीबाईनं पुन्हा पुन्हा सिद्ध केलं.

आता मात्र अंतिम लढाई! १७ जून १८५८. इंग्रजांचा तळ ब्रिगेडियर स्मिथच्या नेतृत्वाखाली कोटा की सराई इथे उभारण्यात आला होता. एक नव्या शुभ्र घोड्यावर स्वार झालेली राणी घोड्यावरून फिरत, सैन्यरचना करत होती, योजना समजावत होती. ते तिचं स्वतःचं सैन्य नसून ठिकठिकाणचं एकत्र झालेलं विस्कळीत सैन्य होतं. ती त्यांचा मनापासून गौरव करत होती, त्यांचं मनोबल उंचावत होती. इंग्रजांच्या ९५ व्या पायदळ तुकडीनं रेन्स या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली धावा पुकारला. भोवती कोरडे तसंच पाणी असणारे ४-५ फुट खोलीचे मोठे नाले, उंचसखल भाग कशाची तमा न बाळगता राणी सैन्य समुद्राला भिडली! राणी, तात्या, नवाब,सगळं सैन्य यांच्यात स्वाभिमान आणि स्वातंत्र्याची एक अभूतपूर्व अशी उंच लाट उसळली होती! राणी दिवसभर अथकपणे लढली.

लढाईचा दुसरा दिवस. राणीच्या घोड्याला मोठा नाला ओलांडता न आल्यानं तो संथ झाला आणि तेवढ्यात राणीच्या मस्तकावर मागून आघात झाला. मागचा भाग विच्छिन्न झाला. समोरून सपासप वार झाले. डोळा बाहेर आला. छातीवर, अंगावर मोठ्या जखमा होऊन रक्तबंबाळ लक्ष्मीबाई कोसळली. अखेरचा श्वासही स्वातंत्र्य देवतेला अर्पण करून ती अनंतच्या प्रवासाला निघून गेली. आकाशानं टाहो फोडला. रामचंद्र देशमुखांनी राणीनं सांगून ठेवल्याप्रमाणे तिचा देह शत्रूच्या हाती लागू दिला नाही. एका कुटीजवळ नेऊन त्यांनी शिताफीनं तिला अग्नी दिला. तात्यां टोपेनच्या टोपेंची मनू त्यांच्या पुढे निघून गेली!

राणीबरोबर प्रत्यक्ष लढलेला स्वतः सर हयू रोज अंतर्मुख होऊन राणीविषयी लिहितो – “Although a lady, she was the bravest and best military leader of the rebels. A man among the mutineers.”

स्वा. सावरकरांचे शब्द जणू प्रत्येक भारतीयाच्या मनातला राणी लक्ष्मीबाईविषयीचा गौरव प्रकट करतात- “जातीने स्त्री, वयाने पंचविशीच्या आत, रूपाने खूबसूरत,वर्तनाने मनमोहक, आचरणाने सच्छील,राज्याचे नियमनसामर्थ्य, प्रजेची प्रीति, स्वदेशभक्तीची जाज्वल्य ज्वाला, स्वातंत्र्याची स्वतंत्रता,मानाची माननीयता, रणाची रणलक्ष्मी ! ‘लक्ष्मीराणी आमची आहे’ हे म्हणण्याचा मान मिळणे परम दुष्कर आहे. इंग्लंडच्या इतिहासाला तो मान अजून मिळालेला नाही! इटलीतील राज्यक्रांती इतकी वीररसयुक्त असतांनाही तसल्या उदात्त प्रसंगातही इटलीच्या गर्भात राणी लक्ष्मीसारखा गर्भसंभव नाही!लक्ष्मीच्या अंगात जे रक्त खेळत होते ते रक्त, ते बीज, ते तेज आमचे आहे’ ही यथार्थ गर्वोक्ती करण्याचे भाग्य, हे भारतभू, तुझे आहे!”

— समाप्त —

लेखिका : मेजर मोहिनी गर्गे – कुलकर्णी (नि.)

प्रस्तुती : जुईली केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “हेच तर ते देवदूत…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? वाचताना वेचलेले ?

☆ “हेच तर ते देवदूत…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

भर पावसात भिजत उभ्या असलेल्या तरूणास विचारले , “नुसताच भिजतो कश्याला?”

 तो उत्तरला “नही साब”.. त्याच्या डाव्या बाजूला जमिनीकडे बोट दाखवतं तो म्हणाला,

“इधर निचे बडा पाईपलाईन है. ढक्कन निकल गयेला है”

तो त्या मॅनहोलमध्ये कोणी पडू नये, म्हणून तिथे ऊभा होता!

रस्त्याखालचा पाईप पूर्ण भरला असावा, अन्यथा पाणी चक्राकार आत घुसताना दिसले असते. फुटभर ऊंचीचे पाणी वरून वेगाने जात होते. पायी चालणाऱ्याला वा दुचाकीवरून जाणाऱ्या कोणाला जाणवलेही नसते, की खाली खोल सांडपाण्याचा पाईप आहे!

मी अवाक झालो!

कोण होता हा? कोणासाठी हा असा पाण्यात ऊभा राहिलायं?

मी भरं पावसातं खाली ऊतरलो. त्याला म्हंटले, “बहोत बढिया, भाई!”

तो फक्त कसनूसं हसला आणि म्हणाला,

“बस, कोई गिरना नै मंगता इधर”

“कबसे खडा है?”

“दो बजे से”

घड्याळातं पाच वाजले होते..!

३ तास तसेचं ऊभे राहून याला भूक लागली असणारं. दुर्दैवाने माझ्याकडे काहीच नव्हते. सगळी दुकानेही बंदं. हा भूक लागल्यामुळे जागा सोडेल, असे काहीच चिन्ह नव्हते!

कुठल्या प्रेरणेने तो हे करतं होता? त्या घाण गुडघाभर ऊंचीच्या पाण्यात उभे राहून तो तीन तासांपासून कोणाला वाचवतं होता? आणि का? दोन वाजल्यापासून त्याने कित्येक  जणांना वाचवले असणार. कोणाला त्याची जाणीवही नव्हती. खुद्द याला तरी त्याची कुठे पर्वा होती?

ही अशी छोटी छोटी माणसें हे जग सुंदर करून जातात!

मागच्या डिसेंबरमध्ये दादरला फुटपाथवर एक आंधळा म्हातारा ‘कालनिर्णय’ विकतं बसलेला दिसला.

दुकानातून घेण्याऐवजी, याच्याकडून घेतलेले काय वाईट, असा विचार करून थबकलो.

“केवढ्याला ‘कालनिर्णय’, काका?”

“फक्त बत्तीस रूपये, साहेब” केविलवाणे तो म्हणाला. सकाळपासून एकही विकले  गेलेले दिसतं नव्हते. मी एक घेतले. पन्नासची नोट होती. ती त्याला दिली. हाताने चाचपडत तो ती नोट तपासतचं होता, की अचानक उंची कपडे घातलेला साठीतला एक देखणा गृहस्थ खाली वाकला.

“कितने का है ये?”

“बत्तीस रुपया”

“कितने है?”

“चौदा रहेंगे, साब”

ज्याला मराठी येतं नाही, असा हा माणूस मराठीतले कालनिर्णय कशासाठी विकत घेतोयं?

त्या माणसाने खिशातून साडेचारशे रुपये काढून त्याला दिले आणि ते सगळे कालनिर्णय बखोटीला मारले! 

मी आश्चर्यचकित..! छापील किंमतीत विकतं घेतोय, म्हणजे पुनर्विक्रीसाठी निश्चितच घेतं नाहीये. तसाही, कपड्यांवरूनही हा असले किरकोळ धंदा करणाऱ्यातला वाटतं नव्हता.

तो गृहस्थ थोडा पुढे गेला असेल. मला राहवलेचं नाही. मी थांबवून त्यांना विचारलेच!

हे मुळचें लखनौचे महोदय एअरइंडियातल्या मोठ्या पदावरून नुकतेचं निवृत्त झाले होते. शिवाजीपार्कात स्वत:चे घर होते. एकुलता एक मुलगा अमेरिकेत स्थायिक झाला होता. लठ्ठ पेन्शन येत होती.

“वो बेचारा पंधरा कालनिर्णय बेचके कितना कमाता होगा? सौ, डेढसौ? वैसे भी बेचारे को सौ रुपये के लिए दिनभरं ऐसेही धुप मे बैठना पडता था. मैने ऊसका काम थोडा हलका करं दिया. बस इतनाही!”

मला काही बोलणेचं सुचले नाही! पण एवढ्या चौदा कालनिर्णयांचे तो करणारं काय होता?

“सोसायटी मे बहोत मराठी फ्रेंडस है, उन को बांट दूंगा!”

मी दिग्मूढ!

“तु एक मिनीट लेट आता, तो तुझे भी फोकट मे देता!” मला डोळा मारतं, हसतं तो लखनवी देवदूत रस्ता पार करून गेला सुद्धा!

माणूसकी याहून काय वेगळी असते? 

एखाद्या हॉस्पिटलबाहेर ‘तात्काळ रक्त हवे’ असा फलक वाचून, ऑफिसला वा घरात जायला ऊशीर होईल, याची तमा न बाळगतां रक्त देणारे कोण असतात? ते ही रांग लावून! 

कोण असतात हे? कुठल्या जातीचे? कोणत्या धर्माचे? ‘भैये’ असतात की ‘आपले’ मराठी?

मुंबईत रस्त्यावर चहा विकणारे लाखो ‘चायवाले’ आहेत. 

बहुतांश उत्तरेकडले. सकाळी चहा बनवल्यावर पहिला कपभरं चहा ते रस्त्यावर फेकतात.

दिवसाचा पहिला चहा रस्त्यावर न फेकता भिकाऱ्याला पाजणारा बांद्र्याचा एक ‘चायवाला’ मला माहिती आहे! सकाळी सकाळी भिकारी आलाचं नाही, तर एका भांड्यात तेवढा चहा बाजूला काढून, धंद्याला सुरूवात करतो!

“बर्कत आती है” एवढीचं कारणमिमांसा त्याने दिली होती.

डोळे ऊघडून पाहिले, तर असे असंख्य अज्ञात देवदूत आपल्याला ठायीठायी आढळतात, पण आपली नजरचं मेलेली असते.

परवा थायलंडमध्ये गुहेत अटकलेल्या मुलांना बाहेर काढण्यासाठी हजारो अनामिक हात मदतीस आले. 

गुहेतले पाणी पंपाने बाहेर काढावे लागले. ते पाणी कुठे फेकले?

ज्याच्या शेतातं ते पाणी फेकावे लागले, त्या शेतातलें तीन एकरातले ऊभे पिक या पाण्याने अक्षरशः वाहून गेले. एका छोट्या शेतकऱ्यासाठी हे प्रचंड नुकसान.

एका पत्रकाराने त्या शेतकऱ्याला या नुकसानीविषयी खोदून खोदून विचारले.

“नुकसानीचे काय एवढं? मुले वाचली ना? पेरणी परतं करता येईल. मुलांचे प्राण परतं आणता आले असते का?”

हे ऊत्तर ऐकूनचं डोळ्यात पाणी आल!

हे जग सुंदर आहे. ते सुंदर करणारे अनामिक देवदूत आजही या जगात आहेत आणि राहतीलही.

फक्त तो तिरस्काराचा, आत्मकेंद्री स्वार्थाच्या काळ्या काचांचा गॉगल डोळ्यावरून काढला पाहिजे!

लेखक : अज्ञात

संग्राहक : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ तू, मी, आणि पाऊस… ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆

सुश्री संगीता कुलकर्णी

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – तू, मी, आणि पाऊस ?  सुश्री संगीता कुलकर्णी ☆

बरसू दे

अंगावरूनी थेंबांना

गालावरूनी निथळू दे

पापण्यांवरून ओघळू दे..

झोंबू दे वारा

मनात पसरू दे गारवा

तुझ्यासवे गंध मातीचा

झिरपू दे मनात..

घेता तुझा हात हाती

मोहक तुझ्या त्या स्पर्शाने

अंगी चमकेल वीज

गारवा पळून जाईल दूर..

स्पर्श तुझ्या नजरेचा

करतो बेधुंद माझ्या मना

बेभान होऊनी 

ओंजळीत घे या

अनमोल प्रीतीच्या क्षणांना..

©  सुश्री संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे

9870451020

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ तन्मय साहित्य #236 – कविता – ☆ चलाचली की बेला… ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ ☆

श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’

(सुप्रसिद्ध वरिष्ठ साहित्यकार श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ जी अर्ध शताधिक अलंकरणों /सम्मानों से अलंकृत/सम्मानित हैं। आपकी लघुकथा  रात  का चौकीदार”   महाराष्ट्र शासन के शैक्षणिक पाठ्यक्रम कक्षा 9वीं की  “हिंदी लोक भारती” पाठ्यपुस्तक में सम्मिलित। आप हमारे प्रबुद्ध पाठकों के साथ  समय-समय पर अपनी अप्रतिम रचनाएँ साझा करते रहते हैं। आज प्रस्तुत है आपकी एक विचारणीय कविता चलाचली की बेला” ।)

☆ तन्मय साहित्य  #236 ☆

☆ चलाचली की बेला… ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ ☆

चलाचली की बेला

गठरी गाँठ लगा लें

खोया जो उसको भूलें

पाया जितना कुछ

उसे सँभालें।

 

बेचैनी उदासियों को

इक तरफ फेंक दें

रहे न शेष प्रमाद

तमस को समूल मेट दें

गीत लिखे उजियारे के जो

मुक्तकंठ से उनको गा लें

चलाचली की……

 

मेले-ठेले गाँव, शहर

कस्बे बस्ती में

क्या अच्छा क्या बुरा घटा 

जग की कश्ती में,

जीवन सागर के प्रवाह सँग

निज अन्तर्सम्बन्ध बना लें

चलाचली की……

 

पुण्याई-सत्कर्म साथ

गठरी में रख लें

पूर्व रवाना होने के

फिर देख-परख लें,

अब तो मनवा मोहपाश की

त्यागे सब मायावी चालें

चलाचली की……

 

प्रश्न करेंगे ऊपर

क्या धरती से लाये

गए लक्ष्य लेकर जो

वह पूरा कर आये,

वहाँ खुलेंगे पोथी-पन्ने

साँच-झूठ के उजले-काले

चलाचली की……।।

☆ ☆ ☆ ☆ ☆

© सुरेश कुशवाहा ‘तन्मय

जबलपुर/भोपाल, मध्यप्रदेश, अलीगढ उत्तरप्रदेश  

मो. 9893266014

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ जय प्रकाश के नवगीत # 60 ☆ पहचान… ☆ श्री जय प्रकाश श्रीवास्तव ☆

श्री जय प्रकाश श्रीवास्तव

(संस्कारधानी के सुप्रसिद्ध एवं अग्रज साहित्यकार श्री जय प्रकाश श्रीवास्तव जी  के गीत, नवगीत एवं अनुगीत अपनी मौलिकता के लिए सुप्रसिद्ध हैं। आप प्रत्येक बुधवार को साप्ताहिक स्तम्भ  “जय  प्रकाश के नवगीत ”  के अंतर्गत नवगीत आत्मसात कर सकते हैं।  आज प्रस्तुत है आपका एक भावप्रवण एवं विचारणीय नवगीत “पहचान…” ।

✍ जय प्रकाश के नवगीत # 60 ☆ पहचान… ☆ श्री जय प्रकाश श्रीवास्तव

चिट्ठियाँ अब

डाक से आती नहीं

मौन पीती

जी रही अभिव्यक्तियाँ ।

 

दौर है मोबाइलों का

एस एम एस बन गए संदेश

सूचनाओं तक हुए सीमित

जान पाते नहीं मन के क्लेश

 

बात करते

छलकती आँखें

पसर जाती

होंठों पर हैं चुप्पियाँ ।

 

उँगलियों से नेट पर

कटते सुबह से शाम तक दिन

उम्र के सिमकार्ड पर नचती

ज़िंदगी रिंगटोन सी पल-छिन

 

आदमी का

नाम इक नंबर

है यही

पहचान की मजबूरियाँ ।

***

© श्री जय प्रकाश श्रीवास्तव

सम्पर्क : आई.सी. 5, सैनिक सोसायटी शक्ति नगर, जबलपुर, (म.प्र.)

मो.07869193927,

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – चुप्पी – 21 ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

? संजय दृष्टि –  चुप्पी – 21 ? ?

(लघु कविता संग्रह – चुप्पियाँ से)

तुम्हारी चुप्पी में

शब्दों की

गूँज होती है,

मैं निर्निमेष

देख रहा हूँ

बिलोने की ध्वनि में

अंतर्भूत

माखन की अनुगूँज!

© संजय भारद्वाज  

प्रातः 9:39 बजे

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय, एस.एन.डी.टी. महिला विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

🕉️ आषाढ़ मास साधना ज्येष्ठ पूर्णिमा तदनुसार 21 जून से आरम्भ होकर गुरु पूर्णिमा तदनुसार 21 जुलाई तक चलेगी 🕉️

🕉️ इस साधना में  – 💥ॐ नमो भगवते वासुदेवाय। 💥 मंत्र का जप करना है। साधना के अंतिम सप्ताह में गुरुमंत्र भी जोड़ेंगे 🕉️

💥 ध्यानसाधना एवं आत्म-परिष्कार साधना भी साथ चलेंगी 💥

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साहित्यिक स्तम्भ ☆ कविता # 64 ☆ समुंदर की है मुमकिन थाह लेना… ☆ श्री अरुण कुमार दुबे ☆

श्री अरुण कुमार दुबे

(वरिष्ठ साहित्यकार श्री अरुण कुमार दुबे जी, उप पुलिस अधीक्षक पद से मध्य प्रदेश पुलिस विभाग से सेवा निवृत्त हुए हैं । संक्षिप्त परिचय ->> शिक्षा – एम. एस .सी. प्राणी शास्त्र। साहित्य – काव्य विधा गीत, ग़ज़ल, छंद लेखन में विशेष अभिरुचि। आज प्रस्तुत है, आपकी एक भाव प्रवण रचना “समुंदर की है मुमकिन थाह लेना“)

☆ साहित्यिक स्तम्भ ☆ कविता # 64 ☆

✍ समुंदर की है मुमकिन थाह लेना… ☆ श्री अरुण कुमार दुबे 

अभी जी भर तुझे देखा नहीं है

तू है क्या वक़्त जो ठहरा नहीं है

सभी अब मोहतरम सत्ता में आकर

है इनमें कौन जो नंगा नहीं है

 *

मज़ारें मुन्तज़िर अज़दाद की सब

चढ़ाने गुल कोई आता नहीं है

 *

जहां के झूठ सब रिश्ते है तन के

किसी से रूह का नाता नहीं है

 *

किताबों में पढ़े है इनके किस्से

शरीफ इंसान पर मिलता नहीं है

 *

समुंदर की है मुमकिन थाह लेना

दिलों के जितना ये गहरा नहीं है

 *

धजी को सांप छोड़ो तुम बनाना

समझ से अब कोई बच्चा नहीं है

 *

घमंडी का न देता साथ भाई

विभीषण ने किया धोखा नहीं है

 *

मशीनों का अरुण है हाथ इसमें

लियाकत भर से तू जीता नहीं है

© श्री अरुण कुमार दुबे

सम्पर्क : 5, सिविल लाइन्स सागर मध्य प्रदेश

सिरThanks मोबाइल : 9425172009 Email : arunkdubeynidhi@gmail. com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares