“नारायण! नारायण!… देवा खाली मर्त्य लोकात मानवांची गर्दी…जत्रा भरली जत्रा पाहिलीत का.!.. नजरं ठरतं नाही तिथवरं पसरलेली!…त्यांचा कुणी क्रिकेट नामक क्रिडेतला विजयी शर्मणे नामविधान रोहीत, विराट सूर्य,ऋषभदेव , समुह तिथे अवतरणार आहे म्हणे त्या सगळया भक्त गणांना दर्शन देण्यासाठी!… कसलासा द्वि संवत्सराचा विश्वाचा रौप्य चषकाची विजयी श्री मिळवून आणली आहे त्यांनी त्याचा हा विजयोत्सव साजरा करण्यासाठी जमलेत सगळे!…अबब काय तो अलोट जनसागर!… त्यांच्या जयजयकाराच्या आरोळ्यांच्या ध्वनी कंपनाने येरु गडगडून खाली कोसळला.त्यांची प्रचंड उर्जा नि शक्ती बघून क्षीरसागर पण भयभीत होऊन आक्रसून मागे मागे हटला.! .. संध्यावंदनाच्या समयाला जन सागराच्या महाकाय लाटांवर लाटां त्या तिथे येऊन धडका देऊ लागल्यात… खरी भरतीची वेळ क्षीरसागराची ,उचंबळून किनाऱ्यावर येऊन धडका देण्याची होती…पण त्या जनसागराचे ते महाप्रचंड रूप पाहून तो भयभीत झाला.. आपला काही टिकाव त्या पुढे लागणार नाही हे त्याला कळून चुकले म्हणून त्याने सपशेल माघार घेऊन शांत राहणे पसंत केले…रवीला देखील तो सोहळा ऑंखेदेखा हाल पाहायचा होता..पण त्याला दुसरीकडे अपाॅईटमेंट असल्याने थांबता आले नाही..बिचारा किरमिजी,तांबूस चेहरा करून हिरमुसून निघून गेला…वरुणाने देखील हलकासा शिडकावा करत वातारणात तप्त मृतिकेचे सुंगंधी अत्तराचे सिंचन करण्यात धन्यता मानली… मरूतगण मंद मंद झुळूकेने वाहत असताना त्या जन सागराच्या आनंदाच्या लहरी लहरींना कुरवाळत राहिला आणि त्याचा मोद सगळ्या आसमंतात दूर दूर नेऊन पसरू लागला… संध्या रजनी हसत खेळत पदन्यास करत अवतरली, तिच्या पायीचे नुपूर पदपथावरील दिव्यांत खड्या सारखे झळाळले…पदपथावरील झाडे लता वेली आपल्या माना उंच उंचावून सरसावली, आकाशीच्या प्रांगणात निळा मखमली जाजम अंथरला त्यावर शशांक आणि लखलखत्या चांदण्या दाटीवाटीने सज्जा सज्जातून तो सोहळा पाहण्यासाठी उत्सुक झाल्या…वसुंधरेवर पौर्णिमेचा चांदणचुरा उधळू लागल्या…हे देवेंद्रा !एक वारी ..लाख वारी विठोबाची पंढरपूरास निघालेली आणि दुसरी हि अनुपम्य वारी सोहळा चाललेला पाहून… विजयी यात्रेचा रथ द्वारकेतून आणलेला पाहूनच काही कलुषितानी कांगावा केला त्यांना मुळी विजयी सोहळ्यात स्वारस्य नव्हतेच मुळी.. असं जरी असलं तरी जगज्जेतेपदाचा अश्वमेधाचा वारू विचरून आलाय…मानवाने आता देवगणांची जागा घेतली की!… कोण विचारतोय तुम्हाला तुमच्या देवलोकाला!… अब कि बार …मानव के लिए खुले स्वर्ग द्वार…आता तुम्हालाच त्यांचं मांडलिकत्व घ्यावं लागलं बरं.!.. असा हा भव्य दिव्य सोहळा पाहून डोळयाचे पारणे का बरं नाही फिटायचे!…त्या देवासाठी लाखावरी भक्त वेड्यासारखे धावून आलेत.. मानवाच्या राज्याचा विजयी डंका दुमदुमला…आणि आणि देवळाचा गाभारा काय आता अख्खं देऊळच रिते, ओस पडून गेले… संपली सद्दी आता तुमची देवा… हरी हरी म्हणत मानवाचा करा हेवा… मी त्यावेळीच तुम्हाला धोक्याची सुचना केली होती.. मानवाला अचाट बुद्धीचं वरदानं देऊ नका बरं.. तो दिवस दूर असणार नाही इंद्रालाच करील घाबरंघुबर… आता आला ना प्रत्यय आपल्या त्या घोड चुकीचा.. अहो असं ऐकलयं मानवांच्या राज्यात चुकीला माफी नाहीच…त्यांनी देखील आपली पूर्वापार चालत आलेली घटना कालमानानुसार अपडेट करून घेण्यास सुरुवात केलीय ..चित्रगुप्ताला म्हणावं तुला देखील अपडेट व्हर्जन आणल्या शिवाय पर्याय नाही….आजवरी कुठल्या देवदेवतांच्या जत्रेला झाली नसेल ईतकी प्रचंड गर्दी पाहून माझी छाती सुद्धा दडपून गेली… आता स्वर्गलोकी राहण्यात काहीच मतलब उरला नाही… आपला जर उदो उदो करून घ्यायचा असेल पृथ्वी सारखे स्थान नाही… एकजात सगळे मानव कायमचं वेडानं झपाटलेले असतात… तिथं एकच अमर सत्य आहे दुनिया झुकती है बस् झुकानेवाला चाहिए… आणि त्यांची तर रांग न संपणारी आहे… देवा मी सुद्धा त्या रांगेत उभा राहायला निघालोय… तुम्ही येताय का कसे.. नाहीतर मला निरोपाचा तांबुल द्या.. हा मी मार्गस्थ झालो… नारायण ! नारायण!… “
☆ सांगड नव्या जुन्याची… ☆ सौ राधिका माजगावकर पंडित ☆
“बाबा किती धावपळ करताय?पाच मिनिटं बसा ना जरा माझ्याजवळ!.बाबा मला बोलायचय तुमच्याशी.आधी ह्या गोळ्या घ्या बरं.!मी विसरलेच होते पण स्नेहा मावशिने आठवण करून दिली.” दम लागलेल्या वडिलांना प्रेमाने दम भरूनच अर्पिताने खाली बसवल. “किती थकलेत मानसिक ताणामुळे आपले बाबा. कोरोना मध्ये आई गेली आणि खचलेच आपले वडील. आई असतानाच अर्पिता चा साखरपुडा झाला होता.लग्न अगदी तोंडावर आलं होत.आणि अचानक ही कोरोना ची लाटआली. जबरदस्त तडाखा बसला त्यांच्या घराला.संकटाची ही लाट आली आणि अर्पिता च्या आईला घेऊन गेली. सांवरायला उसंतच मिळाली नाही. लग्न लांबणीवर पडले. पण मुलाकडच्यांना आता उसंतच नव्हती कारण अमरची वयस्कर आजी मागे लागली होती, त्यांचं म्हणणं,’ माझा काही भरोसा नाही. माझ्या डोळ्यासमोर नातसून आणा आता लवकर ‘. त्याप्रमाणे तिचे सासु सासरे घरी आले आणि त्यांनी बाबांना समजावलं . दुःखाचा डोंगर बाजूला सारून प्रयासाने दुःख आवरून लेकीच्या भवितव्यासाठी मधुकरराव लग्नकार्याच्या सिद्धतेसाठी उभे राहयले. नव्हे नव्हे! त्यांना उभारी धरणं भागच होत.
बोल बोलता लग्न दोन दिवसावर आल. हीच बाबांशी बोलायची वेळ आहे असे म्हणून अर्पिता ने मधुकररावांना जबरदस्तीने खाली बसवलं आणि म्हणाली, “बाबा उद्या मी सासरी जाणार कन्यादान करताना मी सांगते तो संकल्प सोडून एक हट्ट पुरा कराल ना माझा?” तिला जवळ घेत ते म्हणाले” काय वाटेल ते करीन मी तुझ्यासाठी बाळा !. सांग काय करू मी तुझ्यासाठी ? प्रसंगी माझ्या लाडक्या लेकीसाठी प्राण सुद्धा द्यायला तयार आहे मी”. असं नकां ना बोलू बाबा! कशाला ही मरणाची भाषा?आधीच ह्या कोरोनाने आई हिरावून घेतलीय माझी. तुम्ही आणखी पोरकं नका नं करू मला . दुर्दैवाने 21 साल खूप खूप वाईट गेले आपल्याला नवीन सालाला आपण सारे दुःख गिळून सामोरं नको का जायला? झाले गेले गंगेला मिळाले असे समजून मागची वर्ष विसरूया आपण ” . अर्पिता वडिलांना कळवळून विनवत होती .दुःखाचा उमाळा आवरत मधुकरराव तिला विचारत होते ” काय करू ग मी अर्पू? तुझ्या आईला नाही मी विसरू शकत”. “समजतय बाबा मला.. पण असं पहा हें ही तितकंच कटू सत्य आहे की,आपली आई तिच्या आठवणी, तिचा वियोग, ते मागचे दिवस परत नाही येणार आता. माणसे निघून जातात पण आपण हळवी माणसं मनाच्या तळात त्या दिवसांचे दुःख,दुरावा बांडगुळासारखं उराशी बाळगत राहतो.पण बाबा एवढ आयुष्य पडलय आपल्या पुढे .हे बोनस डे स्वतःला सावरून मनशांतीतच घालवायला हवेत तुम्ही ..मी सांगते तुम्हाला भूतकाळावर पडदा टाकून भविष्यकाळ कसा जगायचा ते.पण त्याआधी ऐकाल माझं? मला वचन हवय तुमच्याकडून. पुढील आयुष्य आरोग्य, सुख शांततेत जगण्यासाठी तुम्ही — तुम्ही दुसरे लग्न करा बाबा.”उरावर दगड ठेवून बाबांच्या सुखाकरीता एका दमात हे सगळं बोलतांना दम लागला तिला. पण काय करणार ? कधीतरी ह्या विषयाला वडिलांच्या भवितव्याचा विचार करून ,वाचा फोडावीच लागणार होती .
बाबा ओरडले तिच्या अंगावर पण आपल घोड पुढे दामटत ठामपणे ती म्हणाली,” हे सांगताना मला सुद्धा खूपच त्रास होतोय हो. पण तुमचा उदास,एकाकी भविष्य काळ डोळ्यांसमोर आला नां की जीव घाबरा होतोय हॊ माझा!आता तर तुमच्या तब्येतीची काळजी घ्यायला मी पण नाहीये . कसं होणार तुमच ?आजी पण आता थकलीय. मनाने शरीराने आणि तुमच्या काळजीने खचलीय ती. मुलाचा सुखाचा संसार सुखाने पहात आरामात दिवस काढायचे दिवस आहेत तिचे.तुमचा दोघांचा विचार करूनच काय करायचं ते आधीच ठरवलय मी. मागच्या अंधाराला दूर सारून नववर्षाच्या च्या प्रकाशात पदार्पण करूया बाबा आपण .आणि हो आजी मी,तुम्ही दुःखी असलेलं आईला पण नाही आवडणार. काळाच्या पडद्या आड गेलेली आई परत नाही येऊ शकणार हे कटू सत्य आहे. पण ते उरावर दगड ठेवून पचवायला हवय आपल्याला . त्यासाठी ऊसनं अवसान आणून बाहेर पडायलाच हवय ना आपण! आणि म्हणूनच आईच्या जागी दुसरी आई हवीय मला. माझं माहेरपण जपणारी, आजीची तुमची काळजी घेणारी,आणि आपलं हे घरकुल सावरून घेणारी अशी आई कीं तिच्या जीवावर निर्धास्तपणे मी सासरी आनंदाने राहू शकेन . बाबा तुम्ही फक्त हो म्हणा! पुढचं सगळं मी आणि आजी बघून घेतो.” आता मात्र आश्चर्य करण्याची पाळी मधुकर रावांची होती. ते म्हणाले, ” म्हणजे ? आई पण तुझ्या कटात सामील आहे की काय ? मला नाही वाटत,मलाच काय तिलाही नाही पटणार हे !” “नाही बाबा आपली आजी समंजस, धोरणी भविष्यकाळाचा वेध घेऊन, विचार करणारी कणखर बाई आहे. सगळ्यांच्याचं सुखाचा दूरदृष्टीपणे ती विचार करते. हॊकार फक्त तुमच्याकडून हवा आहे. ‘कालाय तस्मै नमः’ असं म्हणून या दुःखातून तुम्ही बाहेर पडा.” “नाही बाळा परिस्थितीने मी इतका खचंलोय की मी नाही बाहेर पडू शकत या दुर्दैवापासून”. तें निराशेने म्हणाले. ” तुम्ही आजीच्या वयाचा विचार करा. तिकडे बघा नं जरा.! खिडकीतून बाहेर त्या झाडाकडे बोट दाखवत अर्पिता वडिलांना समजावत म्हणाली, ” ते झाड पाहिलंत कां बाबा? कुणीतरी अर्धवट कापलं होतं,पण ते उन्मळून नाही पडलं अनेक पाखरांची घरटी सांवरण्याकरता ते नुसतं उभं नाही राहयलं तर नीट बघा त्याला पालवी फुटलीय. कापलं तरीही आपली उभारी नाही सोडली त्यानी. तुम्ही पण आमच्यासाठी उमेद धरा. आई मला पोरकं करून गेली. तुम्ही मला खूप वर्ष हवे आहात. तुम्हाला आता स्पष्टच सांगतें तुमच्या बरोबर सगळ्यांची कोसळणारी मनं संभाळणारी, तुम्हाला साजेशी अशी बायको म्हणून मी,आजी आणि आईकडचे आजी-आजोबा यांनी स्नेहा मावशीची निवड केली आहे.” मधुकरराव किंचाळलेच एकदम, ” कांsss य ?” “शांत व्हा बाबा तिचे मिस्टर अपघातात गेलेत, ती पण दुःखी आहे. शेवटी उरलेल्या आयुष्यात वेलीला झाडाचा आधार हा हवाच ना ? तिला पटवलय आम्ही. आता फक्त तुम्ही मदतीचा हात पुढे करा. या नव्या वर्षात तुमच्या पाऊल उचलण्याने,होकाराने तीन कुटुंब सावरतील. आपल्या आजीला मायेची सून मिळेल, आईचे माहेरघर सावरलं जाईल. कारण त्याआजी आजोबांनाही एक मुलगी गेल्याचे दुःख आहे आणि दुसरीही निराधार होऊन माहेरी आलीय.तिची केव्हढी मोठी काळजी उतारवयात आहे त्याना. आईच्या , जाण्याने आपण संकटात सापडलो होतो, तेव्हा आपल दुःख बाजूला सारून स्नेहा मावशीने फार मोठी मोलाची साथ दिली आहे आपल्याला. आता तुम्ही स्वतःला सावरून तिला मदतीचा हात देण्याची हीच वेळ आहे बाबा. मला हक्काचं माहेर मिळेल . माय गेली पण मावशी तर उरली आहे नां? दुसरी आईच आहे ती माझी! आणि हो आणखी हट्ट आहे माझा . तुमचं लग्न माझ्या आधीच झालं पाहिजे आणि ह्यांना तुमच्या दोघांकडूनच कन्यादान हव आहे. मग काय! हो म्हणाल ना बाबा?आता पण नाही आणि काही नाही . हा हट्ट पुरवण्याचं वचन दिलय तुम्ही मला. तेव्हा आधी लग्न तुमचं आणि स्नेहा मावशीच. मग लग्न माझ “.
अखेर लेकीच म्हणणं मधुकररावांना मान्य करावच लागल. शेवटी मायेनी विणलेलं नातं इतकं घट्ट असतं की ते उसवलं जातच नाही. बाल हट्ट त्यांना पुरवावाच लागला. ठरवल्याप्रमाणे त्या घरात दोन लग्नकार्य झाली .कन्यादानाच्या वेळी सारं घर हंसत होत. मागील वर्षांच्या काळोखाला ‘रामराम’ ठोकून ते घर नववर्षाच्या प्रकाशात न्हाहून निघाल होत.. अगदी शांत मनाने शुभ कार्य पार पडलं. तिन्ही घराचा डोलारा सावरला गेला. वयाने लहान असूनही अर्पिताने नव्या जुन्या विचारांची सांगड घालून माहेरघर सावरलं होतं. माप ओलांडून तिच्या लाडक्या स्नेहा मावशीचा तिच्या माहेरी प्रवेश झाला.आणि आता तिचं शुभमंगल होऊन सासरच माप ओलांडायला ती निघाली होती. रेडिओवर जुनं गाणं लागलं होतं उंबरठ्यावर माप ठेऊनी आले तुझीया घरी… कराया तुझीच रे चाकरी… मंडळी अशाप्रकारे आईचा आणि लेकीचा दोघींचाही गृहप्रवेश होऊन शुभकार्य पार पडले.
एकाच ऑफिसमध्ये काम करत असुनही रामची आणि माझी भेट बर्याच वर्षांत झाली नव्हती.त्या दिवशी अचानकच तो भेटला.ऑफिसमध्येच.दाढी थोडीशी वाढलेली.. कपाळावर भस्माचे पट्टे.इकडचं तिकडचं बोलणं झालं. म्हटलं.. चल चहा घेऊ.
तर तो म्हणाला.. नको माझं पारायण चालु आहे.
“अजुन करतोस तु पारायण?”
“हो वर्षातुन दोन पारायण करण्याचा नियमच आहे माझा. गुरुपौर्णिमा,आणि दत्त जयंती.”
हो.माहीत आहे मला. पण अजुनही करतो म्हणजे विशेषच की. होतं का वाचन या वयात?”
“हं..आता सगळेच नियम नाही पाळले जात. पण करतो. जसं जमेल तसं”
रामच्या घरी पुर्वीपासुनच दत्त भक्ती. आता ‘गुरुचरित्र’ पारायण करणं म्हणजे त्याचे अनेक नियम.पारायण करणार्याची अंतर्बाह्य शुचिर्भूतता..सोवळे,ओवळे..वाचनाची लय..पारायण काळातील आहार.. ते पांढऱ्या धाबळीवर झोपणे.. पारायणानंतरचे उद्यापन, महानैवेद्य.
हे सगळं रामकडुन आता या वयात कसं होत असेल?
“हे बघ..जेवढं जमेल तेवढं करायचं.आता मी वाचनही संध्याकाळी करतो.दिवसभर ऑफिस झालं की मग घरी गेल्यानंतर स्नान करून वाचनाला बसतो.तेही खुर्चीत. मांडी घालुन आता खुप वेळ नाही बसता येत.नियम म्हणशील तर या काळात बाहेरचं काही खात नाही. आपल्या कडुन होईल तेवढं करायचं.अखेर भावना मोठी.
कारण गुरुचरीत्रातच तर म्हटलंय..
‘अंतःकरण असता पवित्र..
सदाकाळ वाचावे गुरुचरित्र’
एकीकडे पारायण सुरु असतानाच वारकर्यांना ओढ लागते ती पंढरीची.शेतकर्यांनाही जरासा विसावा, चेंज हवाच असतो ना!आता आषाढ सुरु झाला. वेगवेगळ्या संतांच्या पालख्या पंढरपुरच्या वेशीजवळ येऊ लागतात.वर्तमान पत्रात फोटो, बातम्या येऊ लागतात.
पुण्यात ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे थाटात स्वागत.
‘आज सासवड मध्ये पालख्या पोहोचल्या.
वाखरी गावात रिंगण रंगले..
पंढरपुरात पालख्या दाखल..
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा करण्यात आली.
एकंदरीतच आषाढ महीना म्हणजे थोड्याशा विश्रांतीचा.आपल्या नेहमीच्या रुटीनपासुन वेगळं काही करण्याचा.ईश्वरभक्ती करण्याचा.निसर्गाच्या जवळ जाण्याचा.छोटासा ब्रेक घेण्याचा.
बर्याच कुटुंबात एक परंपरा असते.आषाढ महीन्यात देवीला नैवेद्य अर्पण करण्याची.गावाच्या वेशीवर असलेल्या ग्रामदेवतेला खिर पुरीचा नैवेद्य दाखवायचा.पावसाळ्यात साथीचे आजार जास्त प्रमाणात पसरतात.मग आपल्या लहानग्यांना त्याची बाधा होऊ नये यासाठी देवीला साकडे घालायचे.हा नैवेद्य बनवणे यालाच अनेक घरांमध्ये ‘आखाड तळणे’ असं म्हटलं जातं.
एकेकाळी व्यापारी वर्गासाठी हा महीना लाडका असायचा.म्हणजे बघा.. दोन तीन महीन्याची लग्नसराई आता संपलेली आहे. पुर्वी आषाढात लग्न होत नसायचे. तर लग्नसराईत चांगला धंदा झालेला.मुलांच्या शाळा आता रेग्युलर सुरु झाल्या आहेत.वह्या, पुस्तके, दप्तर वगैरे ची खरेदी पण आटोपली आहे. गाठीशी बर्यापैकी पैसा.दोन तीन महीने धावपळ, दगदग झालेली.अर्थात ती पण हवीहवीशी.
तर आता या महीन्यात आराम करायचा. सगळा आसमंत हिरवागार झालेला आहे.बाहेर छान पाऊस पडतो आहे. गावागावांत तर निसर्ग बहरलेला आहेच.पण शहरांच्या आसपासही हिरवाई पसरलेली आहे छोटे मोठे धबधबे कोसळत आहे.वर्षा सहलीसाठी पर्यटकांचे थवे बाहेर पडत आहे.
अगदीच काही नाही तर आपल्या बाल्कनीत बसुन चहाचे घोट घेत पावसाचा आनंद घ्यायचा.बस्स..आपल्यासाठी जगायचं.मग श्रावण सुरु झाला..सणवार सुरु झाले की आहेच सगळ्यांची धावपळ.
आषाढात गिर्हाईकी नाही.. धंदा शांत.पण त्याचा खेद करायचा नाही. कारण त्या पिढीतल्या लोकांचं म्हणणंच असायचं..
“आधुनिक वैद्यकीय उपचारपद्धतीचा पाया रचणारे डॉ. विल्यम ऑस्लर यांचे प्रसिद्ध वाक्य आहे, ‘चांगला डॉक्टर रोगावर उपचार करतो; महान डॉक्टर हा रोग असलेल्या रुग्णावर उपचार करतो.”
डॉ. बिधान चंद्र अर्थात डॉ. बी.सी. रॉय (१ जुलै, १८८२ – १ जुलै, १९६२) हे MRCP, FRCS या परदेशातील सर्वोत्तम पदव्यांनी अलंकृत असे निष्णात डॉक्टरच नाही तर आघाडीचे स्वातंत्र्यसेनानी होते. ते आधुनिक पश्चिम बंगालचे प्रणेते आणि दुसरे मुख्यमंत्री (१९४८-१९६१) होते. १९६१ साली त्यांना भारतरत्न पुरस्कार दिला गेला. १ जुलै १९६२ रोजी रॉय ह्यांचे त्यांच्याच जन्मदिवशी निधन झाले. १९९१ पासून भारतात १ जुलै हा त्यांचा जन्मदिन आणि स्मृतिदिन आपण ‘डॉक्टर्स डे’ म्हणून साजरा करतो.
मी शपथ घेतो की….. डॉक्टर म्हणजे अजातशत्रू व्यक्तिमत्व. त्याला लढायचे असते ते रोग्याच्या आजाराशी. डॉक्टरांची ‘आचारसंहिता’ पूर्वापार चालत आलेली आहे. याबाबत एक उदाहरण आठवले. प्रत्यक्ष रावण पुत्र इंद्रजिताने लक्ष्मणावर ब्रह्मास्त्राचा प्रयोग केल्याने लक्ष्मण बेशुद्ध पडला होता. या निकराच्या लढाईत देखील, बिभाषणाच्या सांगण्यावरून रामाने सुषेण या रावणाच्या राजवैद्याला पाचारण केले. राज्याच्या आचारसंहितेपेक्षा आपल्या वैद्यकीय व्यवसायाची ‘आचारसंहिता’ पाळीत सुषेणाने हनुमानाद्वारे आणल्या गेलेल्या संजीवनी औषधीचा योग्य उपयोग करीत लक्ष्मणाला मृत्यूच्या द्वारातून परत आणले. आश्चर्य असे की रावणाने यावर आक्षेप घेतला नाही. हिप्पोक्रेटस असो वा चरकाची शपथ, त्यातील सर्वात प्रमुख गोष्ट आहे, “एक डॉक्टर म्हणून माझे प्रथम कर्तव्य रुग्णसेवा हेच असेल. यापरीस कुठलीही बाब माझ्या दृष्टीने गौण आहे.” मंडळी, दुसऱ्या महायुद्धात चिनी सैनिकांसाठी चिकित्सक म्हणून गेलेल्या निस्वार्थ डॉक्टर कोटणीस यांचे चीन मध्येच वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी प्लेगच्या साथीत रुग्णसेवा करतांना त्याच आजाराने निधन झाले. आपले चीनशी कितीही राजनैतिक वैर असू दे, पण संपूर्ण चीन देशासाठी डॉक्टर कोटणीस हे आजही श्रद्धास्थान आहेत.
मेडिकल शिक्षण आणि वैद्यकीय उपचार सेवा तेव्हां अन आता- ‘आमच्यावेळी असे नव्हते हो! तेव्हाचे डॉक्टर म्हणजे साक्षात देवच! आता तर नुसता बाजार झालाय!’ मंडळी, लक्षात असू द्या, बदल हाच जीवनाचा स्थायी भाव आहे. स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर सरकारी मेडिकल कॉलेजेस सुरु झालीत. जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांप्रमाणे डॉक्टर पेशंटचे प्रमाण १:१००० असायला हवे. आपल्या देशाच्या वाढत्या लोकसंख्येला अनुसरून १९८०च्या दशकात खाजगी महाविद्यालयांना परवानगी देण्यात आली. मार्च २०२४ मधील (नॅशनल मेडिकल कौन्सिल) च्या आकडेवारीनुसार भारतात एकूण ७०६ वैद्यकीय महाविद्यालये आहेत. या ७०६ वैद्यकीय महाविद्यालयांपैकी ३८६ सरकारी आहेत तर ३२० खाजगी आहेत. डॉक्टर पेशंटचे प्रमाण आपल्या देशात १: ९००, म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांपेक्षाही चांगले आहे.
मी दोनही क्षेत्रात कार्य केले आहे. इथे मला सर्वात मोठा फरक जाणवतो ते उपलब्ध निधीचा. सरकारी रुग्णालयातील पायाभूत सुविधा कमी, डॉक्टरांची संख्या कमी, (रिक्त जागा हे कायमचे दुखणे) मात्र एका बाबतीत सरकारी क्षेत्र दुथडी भरून वाहते, ते म्हणजे पेशंटची संख्या. गरीब रुग्ण अजूनही सरकारी दवाखान्याचा आधार घेतात. बहुतेक प्रायव्हेट दवाखान्यात पेशंटची आवक कमी! सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना भरपूर पेशंट बघायला मिळतात. यात अपवाद नक्कीच आहेत. खाजगी वैद्यकीय महाविद्यालयातही हुशार विद्यार्थी आहेत. शेवटी चिकाटी, मेहनत आणि जिज्ञासू वृत्ती ही महत्वाची. अतिशय वेदनादायी भाग म्हणजे भरमसाठ फी भरून ‘मॅनेजमेंट कोट्यात’ आपल्या पाल्याला खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात घालणारे पालक. जिथे सुरुवातच ‘मेडिकल सीट’ विकत घेण्यापासून होते, त्या विद्यार्थ्याच्या भविष्यकालीन ATTITUDE विषयी मी काय बोलावे?
आता उद्भवणाऱ्या नवनवीन समस्यांमुळे डॉक्टर आणि पेशंटमधील दरी रुंदावत चालली आहे. कट प्रॅक्टिस, अनावश्यक वैद्यकीय चाचण्या, डॉक्टरांच्या फीमधली तफावत, पंचतारांकित रुग्णालयाकडे डॉक्टर आणि पेशंट्सचा वाढता कल, डॉक्टरांनी गावात जाऊन वैद्यकीय सेवा देण्याचे टाळणे, एक ना दोन! बघा मंडळी, डॉक्टर समाजाचाच एक हिस्सा आहे. जिथे सामाजिक निष्ठा आणि नैतिकतेचे सर्व क्षेत्रात अवमूल्यन होते आहे, तिथे डॉक्टर त्याला अपवाद कसे असतील? समाज म्हणतो, “डॉक्टरांनी त्यांच्या पांढऱ्या कोटासारखी स्वतःची स्वच्छ प्रतिमा जपायला हवी!” मात्र कांही घटना अशा घडतात की दवाखान्यात आणण्याआधीच पेशंट सिरीयस होता, डॉक्टरांनी शक्य ते सर्व उपचार केले, पण हाताबाहेर गेलेला आजार पेशंटचा बळी घेऊन गेला! अशा परिस्थितीत शोकमग्न नातेवाईकांचा क्रोध अनावर होऊन त्यांनी डॉक्टरला मारहाण करणे आणि त्याच्या क्लिनिकची तोडफोड करणे हे योग्य नव्हे.
एखाद्या दवाखान्याची गुणवत्ता तपासायची असेल तर त्यासाठी एक महत्वाचा निकष म्हणजे डॉक्टर मंडळी रोग्याची तपासणी सरासरी किती वेळ करतात. ‘तेव्हा’ आणि ‘आता’ यामध्ये बराच फरक पडला आहे. तेव्हांची फॅमिली डॉक्टरची संकल्पना अतिशय उत्कृष्ट होती. बहुतेक डॉक्टर्स पदवीधर असायचे (MBBS, RMP, LMP, Homeopath, Ayurvedic). मात्र त्यांच्या हाताला ‘गुण’ होता, मोजकीच बाटलीबंद औषधे, गोळ्यांच्या पुड्या आणि अगदी क्वचित इंजेक्शन यात त्यांचे उपचार बंदिस्त असायचे. रोग्याची संपूर्ण हिस्टरी, सखोल तपासणी, अनुभवाने आलेले वैद्यकीय ‘ज्ञान’, उपजत आणि कमावलेली सेवावृत्ती, यातून बहुदा अचूक निदान साधले जात होते. वैद्यकीय चाचण्या गरज असल्यास क्वचित व्हायच्या. परंतु याहून अधिक होता तो त्यांचा रोगी आणि त्याच्या नातेवाईकांशी सतत सुरु असलेला सुसंवाद, आश्वासक नजर आणि प्रेमळ वागणूक! त्यांच्या निदानाविषयी आणि दिलेल्या उपचारावर रोग्यांचा पूर्ण विश्वास असायचा. यातूनच बरे झाल्यावर अनुभवांती पेशंट डॉक्टरला खुशाल मनाच्या देव्हाऱ्यात बसवायचे. या विश्वासामुळे रोगी आज्ञाधारक बाळासारखे डॉक्टरची प्रत्येक सूचना अंमलात आणत असत. तंत्रज्ञान तितकेसे विकसित नसूनही ‘क्लिनिकल जजमेण्ट’ जबरदस्त असायचे.
‘क्लिनिकल जजमेंट’ (चिकित्साविषयक निर्णयक्षमता)
डॉ. विल्यम ऑस्लर म्हणतात, “वैद्यकीय उपचार ही दवाखान्यात प्रत्यक्ष काम करून शिकण्याची कला आहे, क्लासरूममधील धडे गिरवून ती साध्य होत नाही! आजकालचे वैद्यकीय शिक्षण पुस्तकी ज्ञानाच्या आहारी गेले आहे. प्रत्यक्ष व्यावहारिक वैद्यकीय ज्ञान मिळवण्याची प्रवृत्ती कमी झाली आहे. म्हणून भरगच्च आधुनिक वैद्यकीय चाचण्यांवर भर दिला जातोय. मात्र गेल्या ४-५ वर्षांपासून रोग्याशी ‘सुसंवाद’ साधण्याचे ‘शिक्षण’ मेडिकलच्या विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षांपासून देण्यात येत आहे.
एक गोष्ट मला प्रकर्षाने मांडायची आहे की मार्कांसहित मेडिकल शाखेकडे जाण्याचा विद्यार्थ्यांचा खरोखरच मनापासून कल (aptitude and ability) आहे कां हे निरपेक्ष वस्तुनिष्ठ चाचण्या घेऊन ठरवले पाहिजे. हे कां तर एक विद्यार्थ्याला डॉक्टर बनवण्यासाठीचा ७० % खर्च समाज उचलत असतो. मग पदवी प्राप्त केलेल्या डॉक्टरांनी समाजाला १००% उत्तम वैद्यकीय सेवा देणे हे उपकार नव्हेतच, तर ते डॉक्टरांनी फेडायचे समाजऋण आहे, अगदी बँकेतून एजुकेशनल लोन काढून तो हफ्ते भरतो तसेच. कधी तर MBBS ची आवड नसूनही पालकांच्या दबावाखाली किंवा अन्य कारणांनी ती डिग्री घेतल्यावर कांही हुशार पण असमाधानी विद्यार्थी IAS किंवा UPSC च्या परीक्षांकडे वळतात. एक अभिमानाची बाब ही की पुण्यातील AFMC मधून पास झालेले डॉक्टर भारतीय लष्करात सेवादाखल होतात! अशा डॉक्टर प्लस लष्करी अधिकाऱ्यांना माझा कडक सॅल्यूट!!!
जागतिक आरोग्य संघटनेनुसार आरोग्य ही केवळ रोग किंवा अशक्तपणाचा अभाव नसून संपूर्ण शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्याची स्थिती आहे.
लेखाच्या अंती खालील मुद्दे नमूद करते.
*डॉक्टर माणूस आहे, देव नव्हे, त्याच्याजवळ जादूची कांडी नाही.
*डॉक्टरांना त्यांचे वैयक्तिक आणि खाजगी आयुष्य असते, त्यांना कधीतरी त्यांच्या कुटुंबाला वेळ देणे आवश्यक असते. अशा वेळेस ते त्यांचा वैयक्तिक अधिकार म्हणून गंभीर आजार नसलेल्या रुग्णाचा उपचार करण्यास नकार देऊ शकतात. मात्र रोगी गंभीररित्या आजारी असेल तर माणुसकीच्या नात्याने ते दुसऱ्या डॉक्टरकडे रोग्याला पाठवायची व्यवस्था करू शकतात.
*प्रत्येक रुग्ण आणि त्याचा रोग हे वेगवेगळ्या वेळी डॉक्टरांसमोर वेगवेगळी आव्हाने उपस्थित करीत असतात, त्यातून सर्वोत्तम मार्ग काढणे आणि प्रयत्नात कुठेही कसूर न ठेवणे ही त्यांची जबाबदारी आहे. *मोठ्या कॉर्पोरेट दवाखान्यात डॉक्टर हा तेथील साखळीचा एक दुवा असतो, त्यातील आर्थिक नियोजनात बहुतांश डॉक्टरांचा सहभाग नसतो.
*डॉक्टरांनी सांगितलेल्या सर्व सूचना काटेकोरपणे पाळणे हे रोग्याचे परम कर्तव्य आहे. आजकाल हॉस्पिटल हॉपिंग (सेकंड, थर्ड किंवा त्याहून अधिक डॉक्टरांचे सल्ले घेणे), Mixopathy चा अवलंब करणे आणि आपले उपचार करणे, हे प्रकार वाढीस लागले आहेत.
*डॉक्टरांनी रुग्णाला निरोगी जीवनशैलीचे महत्व समजावून सांगणे आवश्यक आहे. त्यात संतुलित आहार, व्यायाम, योग आणि ध्यान यांचा खूप मोठा सहभाग आहे. त्यासाठी त्यांनी स्वतः निरोगी जीवन शैलीचा अंगीकार करायला हवा! सिगारेट पीत पीत रोग्याला ‘तू सिगारेट पिणे बंद कर’ असे सांगणार का डॉक्टर?
वरील मुद्यांवर वाचकांनी आत्मचिंतन करून आपल्या सेवेशी तत्परतेने हजर असलेल्या डॉक्टरांच्या व्यवसायाचा आदर करीत त्यांच्यावर विश्वास ठेवावा, तसेच आपल्या आजाराची आणि आधी घेतलेल्या उपचाराची संपूर्ण माहिती त्यांच्यासोबत शेअर करावी असे मी आवाहन करते.
ॐ सर्वे भवन्तु सुखिनः। सर्वे सन्तु निरामयाः।
सर्वे भद्राणि पश्यन्तु। मा कश्चित् दुःख भाग्भवेत्॥
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः॥
(“सर्वजण सुखी होवोत, सर्वजण रोगमुक्त असोत, सर्वजण मंगलमय घटनांचे साक्षीदार राहोत आणि कोणालाही दुःखाचे भागीदार बनण्याची वेळ ना येवो!”)
कृष्णाला बर्याच गोष्टी मिळाल्या नाहीत. त्याच्या जन्मानंतर तो लगेच आई वडिलांपासून वेगळा झाला, नंतर नंद-यशोदा भेटले, पण आयुष्यातून ते ही गेले. राधा गेली. गोकुळ गेलं. मथुरा गेली. त्याचं आयुष्यात काही ना काही निसटतचं गेलं. कृष्णाने आयुष्यभर त्याग केला, तो पण अगदी आनंदाने. ज्याला कृष्ण समजला त्याच्या आयुष्याचा सोहळा झाला. आयुष्यात काही सोडावं लागलं तरीही खुश कसं रहायचं? हे कृष्ण शिकवतो. कुरुक्षेत्रावरच्या कृष्णनीतीपेक्षा या गोष्टी जास्त व्याकुळ करतात. आयुष्यात बाकी काही जमलं नाही तरी, कृष्ण बनून हातातून निसटलेल्या गोष्टींचा, क्षणांचा, स्वप्नांचा, आठवणींचा सोहळा करता आला पाहिजे………
पहिली शिवी दिल्यानंतर मुंडके छाटण्याची शक्ती असून देखील नव्व्याण्णव आणखीन शिव्या ऐकण्याची क्षमता ज्याच्यात आहे तो कृष्ण आहे, सुदर्शन चक्रासारखे शस्त्र जवळ असून देखील हातात नेहमी बासरी आहे तो कृष्ण आहे, द्वारकेसारखे वैभव असून देखील सुदामासारखा मित्र आहे तर तो कृष्ण आहे, मृत्यूच्या फण्यावर उभारलेला असून देखील जो नृत्य करतो तो कृष्ण आहे, सर्वसामर्थ्यवान असून देखील जो सारथी बनला तो कृष्ण आहे.
लेखक : अज्ञात
संग्रहिका : अंजली दिलीप गोखले
मोबाईल नंबर 8482939011
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
(ई-अभिव्यक्ति में संस्कारधानी की सुप्रसिद्ध साहित्यकार श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ जीद्वारा “व्यंग्य से सीखें और सिखाएं” शीर्षक से साप्ताहिक स्तम्भ प्रारम्भ करने के लिए हार्दिक आभार। आप अविचल प्रभा मासिक ई पत्रिका की प्रधान सम्पादक हैं। कई साहित्यिक संस्थाओं के महत्वपूर्ण पदों पर सुशोभित हैं तथा कई पुरस्कारों/अलंकरणों से पुरस्कृत/अलंकृत हैं। आपके साप्ताहिक स्तम्भ – व्यंग्य से सीखें और सिखाएं में आज प्रस्तुत है एक विचारणीय रचना “कस न भेद कह देय…”। इस सार्थक रचना के लिए श्रीमती छाया सक्सेना जी की लेखनी को सादर नमन। आप प्रत्येक गुरुवार को श्रीमती छाया सक्सेना जी की रचना को आत्मसात कर सकेंगे।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – आलेख # 204 ☆ कस न भेद कह देय… ☆
बुद्धि और बुद्धिमान दोनों एक होकर भी अलग रहते हैं। यदि सही समय पर सही निर्णय नहीं लिया तो बुद्धि होने का क्या फायदा। बुद्धिमान व्यक्ति अपनी क्षमता का लोहा मनवा लेता है। अधूरी बातों पर प्रतिक्रिया देने वाले न केवल अपना वरन समाज का भी अहित करते हैं। किसी ने सही कहा है-
परिवार और समाज दोनों बर्बाद होने लगते हैं,जब समझदार मौन और नासमझ बोलने लगते हैं।
मनोवैज्ञानिक व्यक्ति का आचरण उसके हावभाव से तुरंत पता लगा लेते हैं। यदि व्यक्ति चालक हो तो उसे विवादों में लाकर पहले क्रोधित करते हैं फिर वास्तव में उसका व्यक्तिव क्या है ये लोगों के सामने आ जाता है। घमंड सर चढ़कर बोलता है, व्यक्ति सही गलत का भेद भूलकर अपने स्वार्थ में अंधा होने लगता है। दूसरी तरफ जमीन से जुड़ा व्यक्ति हर परिस्थिति में सही का साथ देता है। मेहनत रंग लाती है, धीरे- धीरे लोग उसके साथ जुड़कर उसे विजेता बनाने में जुट जाते हैं। सच्चे रिश्ते स्वार्थ से ऊपर उठकर जीना जानते हैं। डिजिटल युग में क्रियेटर अपने फालोवर के दम पर अपने को शक्तिशाली घोषित करते हैं। बहुत से ऐसे शो बन रहे हैं जहाँ दर्शक पात्रों के साथ जुड़कर उनके व्यक्तित्व को परखते हैं, उनके लिए वोटिंग करते हैं। सबके सामने असली चेहरा कुछ दिनों में आ जाता है। व्यक्ति अपने आचरण से अपनी कामयाबी की गाथा लिखता है। जनमानस के हृदय में स्थान ऐसे ही नहीं मिलता। अच्छे विचारों के साथ सबका हित साधने की कला जिस साधक के पास होगी वही सच्चे अर्थों में विजेता बनेगा।
(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही गंभीर लेखन। शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं। हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)
अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार ☆सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय, एस.एन.डी.टी. महिला विश्वविद्यालय ☆संपादक– हम लोग ☆पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆
आषाढ़ मास साधना ज्येष्ठ पूर्णिमा तदनुसार 21 जून से आरम्भ होकर गुरु पूर्णिमा तदनुसार 21 जुलाई तक चलेगी
इस साधना में – ॐ नमो भगवते वासुदेवाय। मंत्र का जप करना है। साधना के अंतिम सप्ताह में गुरुमंत्र भी जोड़ेंगे
ध्यानसाधना एवं आत्म-परिष्कार साधना भी साथ चलेंगी
अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं।
≈ संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈
(Captain Pravin Raghuvanshi—an ex Naval Officer, possesses a multifaceted personality. He served as Senior Advisor in prestigious Supercomputer organisation C-DAC, Pune. An alumnus of IIM Ahmedabad was involved in various Artificial Intelligence and High-Performance Computing projects of national and international repute. He has got a long experience in the field of ‘Natural Language Processing’, especially, in the domain of Machine Translation. He has taken the mantle of translating the timeless beauties of Indian literature upon himself so that it reaches across the globe. He has also undertaken translation work for Shri Narendra Modi, the Hon’ble Prime Minister of India, which was highly appreciated by him. He is also a member of ‘Bombay Film Writer Association’.)
We present his awesome poem ~ Lifeless Home… ~We extend our heartiest thanks to the learned author Captain Pravin Raghuvanshi Ji, who is very well conversant with Hindi, Sanskrit, English and Urdu languages for sharing this classic poem.
(डॉ. सुरेश कुमार मिश्रा ‘उरतृप्त’ एक प्रसिद्ध व्यंग्यकार, बाल साहित्य लेखक, और कवि हैं। उन्होंने तेलंगाना सरकार के लिए प्राथमिक स्कूल, कॉलेज, और विश्वविद्यालय स्तर पर कुल 55 पुस्तकों को लिखने, संपादन करने, और समन्वय करने में महत्वपूर्ण कार्य किया है। उनके ऑनलाइन संपादन में आचार्य रामचंद्र शुक्ला के कामों के ऑनलाइन संस्करणों का संपादन शामिल है। व्यंग्यकार डॉ. सुरेश कुमार मिश्र ने शिक्षक की मौत पर साहित्य आजतक चैनल पर आठ लाख से अधिक पढ़े, देखे और सुने गई प्रसिद्ध व्यंग्यकार के रूप में अपनी पहचान स्थापित की है। तेलंगाना हिंदी अकादमी, तेलंगाना सरकार द्वारा श्रेष्ठ नवयुवा रचनाकार सम्मान, 2021 (तेलंगाना, भारत, के मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव के करकमलों से), व्यंग्य यात्रा रवींद्रनाथ त्यागी सोपान सम्मान (आदरणीय सूर्यबाला जी, प्रेम जनमेजय जी, प्रताप सहगल जी, कमल किशोर गोयनका जी के करकमलों से), साहित्य सृजन सम्मान, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के करकमलों से और अन्य कई महत्वपूर्ण प्रतिष्ठात्मक सम्मान प्राप्त हुए हैं। आप प्रत्येक गुरुवार डॉ सुरेश कुमार मिश्रा ‘उरतृप्त’ जी के साप्ताहिक स्तम्भ – चुभते तीर में उनकी अप्रतिम व्यंग्य रचनाओं को आत्मसात कर सकेंगे। इस कड़ी में आज प्रस्तुत है आपकी विचारणीय व्यंग्य रचना ज़ूम पर झूम।)
☆ साप्ताहिक स्तम्भ ☆ चुभते तीर # 12 – ज़ूम पर झूम☆ डॉ. सुरेश कुमार मिश्रा ‘उरतृप्त’☆
(तेलंगाना साहित्य अकादमी से सम्मानित नवयुवा व्यंग्यकार)
जूम पर अभी झूमने वाले झूम रहे हैं। न हॉल की जरूरत, न पुष्पगुच्छ का झमेला, न भोजन की झिक-झिक। फोकट में जब काम चल रहा हो तो पैसे खर्च करना बेफिजूली है। आभासी दुनिया गपोड़ियों का अड्डा होता है। पिछले एक घंटे से बात कर रहे थे। बातचीत गुरु और बच्चा की तर्ज पर हो रही थी। बच्चे सवाल कर रहे थे। गुरुजी अपने हिसाब से जवाब दे रहे थे।
“अच्छा गुरुजी! फलां नेता कच्चा झूठ कैसे बोल पाते हैं? क्या उनका पेट खराब नहीं होता? कोई गूगल या किताब में जाकर झूठ की सच्चाई पता लगाने का प्रयास करे तो ऐसे नेताओं की हालत क्या होगी?”
“बच्चा! अब तुम्हें नेताओं की महानता के बारे में बताने का समय आ गया है। जब अपने पर आती है तो हमें आधुनिकता का उपयोग करना चाहिए। इसकी सबसे अच्छी मिसाल सोशल मीडिया है। इसका जितना इस्तेमाल इन नेताओं ने किया है, अब तक किसी ने नहीं किया है। हाँ यह अलग बात है कि पहले यह प्लाटफार्म उतना फला-फूला भी नहीं था। जब अपने पर आए तो आधुनिक चिकित्सा पर विश्वास करना चाहिए। किंतु अर्थशास्त्र में चाणक्य ने कहा था कि शासक को सदैव भौतिकवादी पद्धतियों का उपयोग करना चाहिए और जनता को भाववाद में उलझाकर रखना चाहिए। वेदों का ज्ञान न भी हो तो कोई बात नहीं, लोगों को बेवकूफ बनाओ। कह दो कि यह बात वेदों में है। वेद महान हैं। कौनसा लोग वेद पढ़ने लगेंगे। उन्हें खुद से फुर्सत नहीं वे खाक पढ़ेंगे वेद! कोई तुम्हारा विरोध करे तो कह दो कि यह तो विदेशी एजेंट है, चीनी भक्त है, पाकिस्तानी आतंकवादी या फिर देशद्रोही है। बाकी सब जनता पर छोड़ दो। जनता तो भाववाद के मोहजाल में ऐसी फंसी रहती है जैसे कस्तूरी की तलाश में मृग।”
“वाह गुरुजी! अद्भुत! आपके पास हर सवाल का काट है। तो फिर बताइए कि हम भुखमरी में विश्व के देशों में सबसे आगे क्यों हैं? रुपया गर्त में क्यों जा रहा है? आधुनिक जमाने में बाबा आदम जमाने के मुद्दों पर क्यों चुनाव लड़ रहे हैं? पहले मुर्गी के पंख नोचने और बाद में दाना डालने जैसी हरकत क्यों की जा रही है? खूब दाम बढ़ाकर फिर कुछ दाम घटाना कैसी राजनीति है? ईडी और आयकर को खुद का पालतू कुत्ता बनाना कहाँ तक उचित है?”
“मूर्ख! ऐसे सवाल करने वाला मेरा चेला नहीं हो सकता। तू तो देशद्रोही है! देशद्रोही! इसे तुरंत देश से निकाल दिया जाए। हो न हो यह पाकिस्तान से आया है। इसके कागज़ देखे जाएँ।”