(श्री अरुण श्रीवास्तव जी भारतीय स्टेट बैंक से वरिष्ठ सेवानिवृत्त अधिकारी हैं। बैंक की सेवाओं में अक्सर हमें सार्वजनिक एवं कार्यालयीन जीवन में कई लोगों से मिलना जुलना होता है। ऐसे में कोई संवेदनशील साहित्यकार ही उन चरित्रों को लेखनी से साकार कर सकता है। श्री अरुण श्रीवास्तव जी ने संभवतः अपने जीवन में ऐसे कई चरित्रों में से कुछ पात्र अपनी साहित्यिक रचनाओं में चुने होंगे। उन्होंने ऐसे ही कुछ पात्रों के इर्द गिर्द अपनी कथाओं का ताना बाना बुना है। प्रस्तुत है एक विचारणीय आलेख “जीवन यात्रा“ की अगली कड़ी।)
☆ कथा-कहानी # 110 – जीवन यात्रा : 5 ☆ श्री अरुण श्रीवास्तव ☆
ध्वनि मानवजाति का ही नहीं बल्कि विश्व के सभी जड़-चेतन प्राणियों के संप्रेषण का माध्यम है. ध्वनियों को सुनना जहां श्रवणशक्ति पर निर्भर है वहीं ध्वनियों को समझने की कला विभिन्न चेतन प्रजातियों की भिन्न भिन्न होती है. ध्वनि एक कंपन है जो वायु एवं द्रव्य अवस्था में तरंगों के माध्यम से प्रवाहित होती है. जहां मनुष्य की श्रवण क्षमता हाथ खड़ा कर देती है, वहीं पर कुछ जीव जंतु इन तरंगों को ग्रहण कर लेते हैं. भूकंपीय गतिविधियों को सबसे पहले यही समझते हैं और अपनी शैली में चेतावनी भी देने की कोशिश करते हैं, हालांकि मनुष्य प्राय: इन्हें दरकिनार कर देते हैं. वाक्शक्ति के मामले में मानवजाति अग्रणी है, तरह तरह की भाषाओं के अध्ययन में पारंगत भी बन चुकी है पर मर्म समझने की शक्ति सबकी अलग अलग होती है.
जब आंखें, अभिव्यक्ति के लिये असमर्थ लगें तो मनुष्य वाणी का प्रयोग प्रारंभ कर देता है. शिशु वत्स ने अपनी आयु के अनुसार ही अभिव्यक्ति के लिये वाणी का उपयोग करने का अभ्यास प्रारंभ कर दिया. शिशु अपने अधर युग्म का संचालन, जन्म के साथ ही सीख जाते है पर बोलने की प्रक्रिया ओंठो के खुलने से प्रारंभ होती है तो जब उसकी अभिव्यक्ति की कोशिश सफल हुई तो पहला शब्द निकला “मां”.
इस शब्द की परिभाषा नहीं होती पर ये शब्द जब जननी को पहली बार सुनाई देता है तो वह शिशु से जुड़ी सारी पीड़ा, असुविधा भूल जाती है. यह वो शब्द है जो हर नारी कभी न कभी अवश्य सुनना चाहती है. इसके आगे मधुरतम संगीत की सरगम भी बेसुरी लगती है. मां बेटे के लिये बहुत सारे पर्यायवाची शब्दों का, उपमाओं का प्रयोग करती है पर संतान के पास कोई विकल्प नहीं होता. मां या फिर अम्माँ, अम्मी, मम्मी या फिर मॉम जो भाषा, धर्म और संस्कृति के अनुसार अलग हो सकते हैं, बहुत से तो हम जानते भी नहीं होंगे पर अर्थ सार्वभौमिक है, भावना भी सार्वभौमिक ही होती हैं क्योंकि ये शिशु के पहले प्रयास से आता है जो कि उसके अंदर विद्यमान ईश्वरीय अंश का उसके लिये बहुत सूक्ष्म सहयोग होता है.
आताच फेसबुक चाळत असताना मी एका ज्वेलर्स ची जाहिरात पाहिली. त्यात त्यांनी एक दागिना प्रमोट केलेला — बकुळ हार
मनात आले कोणत्याही प्रकारात म्हणजे १ग्रॅम, बेंटेक्स,चोख सोंने यात बकुळ हार मिळेल या जमान्यात, पणं खरी बकुळी मिळण कठीण झाले आहे. नाही म्हणायला कोल्हापूरच्या अंबाबाई देवळासमोर मिळतात बकुळीचे गजरे, पणं लोकली फारशी पहायला नाही मिळत बकुळी. झाडे पणं कमी झाली. रातराणीच कौतुक सगळ्यांना. ती असते कुंपणावर. पण बकुळ दुर्मिळ झाली. शहरातून हद्दपार झाली जवळजवळ. बांधावर शेताच्या किंवा रस्त्याकडेला एखादे बकुळ दिसते. नाहीतर नवग्रहांची, किंवा नक्षत्र झाडे असतात तिथे हमखास सापडेल. बकुळीच्या झाडाखालून गेल्यावर तो सुगंध पूर्ण श्वासात भरून घ्यावासा वाटतो. तो बाकी फुलांना नाही.
लहानपणी आम्ही एवढे बिझी नसायचो हा क्लास झाला की दुसरा तो झाला की तिसरा. त्यामुळे निसर्ग, सण साजरे करायला थोडा वेळ असे लहान मुलांना.
हादगा जवळ आला की विविध फुले शोधत मुली फिरत. त्यात गुलबक्षी विविध रंगात सजलेली, पिवळा, पां ढरा,अन् गुलबक्षी रंग. इतकी सुंदर फुले रस्त्याच्या कडेला उगवत अतिशय नाजूक, कमी आयुष्य असलेली फुले. दोन रंगाच्या कॉम्बिनेशन मधे ही उगवतात. जसे की पांढरा लाल, लाल पिवळा खुप छान दिसतात. त्याची देठे नाजूक असतात. एका विशिष्ठ कोनातून वाकवावी लागतात, नाहीतर लगेच तुटतात. देठाच्या शेवटी हिरव्या रंगाचा गोल असतो. असे फुल खुप छान रंगांनी सजलेले.
आता हादगा कमी झाला. मुलींना या सर्व गोष्टीत फारसा इटरेस्ट राहिला नाही. रस्त्याच्या कडेला ही फुले अजूनही दिसतात, अन् भूतकाळात घेऊन जातात. त्या फुलांची केलेली तीन पेडाची वेणी अजून आठवते, फुले दिसली की ती तोडून वेणी करावीशी वाटते. आम्ही मुलीचं अस नाही, मुल आमचे बालमित्र आम्हाला ह्या वेण्या करायला फुले तोडून आणुन देत असत. आणि आम्ही बसून त्या वेण्या गुंफत असु. मधे कुठे वेणी सुटत आली तर आमच्या मैत्रिणी मित्र सांगत इथे सुटत आलाय. मग कुणीतरी नाजुक हातानी सावरून वर घेत असे. त्यात मोडलेल फुल काढून आम्ही ती वेणी परत गुंफत असु. आणि त्या फुलाचा खालचा हिरवा गोल भाग हिरवे मिरे म्हणून भातुकली मधे घेत असु.
अजरणीची फुले, याला बोलीभाषेत हद्ग्याची फुले म्हणतात. मला वाटत होत ह्याची झाडे संपली. पण नाही बऱ्याच कॉलेज कॅम्पस मध्ये ही झाडे अजून तग धरून आहेत. त्याच्या पाकळ्यांच्या पिपण्या फार आनंद देवुन जात. मी कुणाच्या गालावर फोडली, मी कुणाच्या कपाळावर फोडली. याची स्पर्धा लागायची, त्यावरून चिडाचीडी, भांडाभांडी. सॉलिड मजा यायची. तू मला टिचकी मारलीय काग …काग.??😊
ह्याची पणं वेणी होते. भिजकी फुले असतील तरच याची वेणी मोडते. नाहीतर खुप मोठी वेणी होते. माझ्या हत्तीचा फोटो खुप मोठा म्हणजे पा टा एव्हढा होता. त्याला पुरेल एवढा हार व्हायचा. भानुंच्या वाड्यात हे झाड होत. आता नाही आहे. पण परवा सांगलीला जाताना वालचंद च्या कंपाऊनडला संपूर्ण अजरणी ची झाडे आहेत. तेव्हा अजून आजरणी अजून जिवंत आहे, हे मला पटले.
भानुवाड्यात पांढरा चाफा पणं होता. त्याच्या अंगठ्या फार पॉप्युलर होत्या. पाकळी बारीक चीमट्यानी भोक पाडायचं अन् ती पाकळी देठात ओवायची, सगळ्या पाकळ्या झाल्या की झाली अंगठी तयार.
असे हे लहानपणी चे दागिने.
गोरे वाड्यात, (आता कळल त्याला गोरेवाडा म्हणतात) बकुळीच झाड होते. जेरे बाईंच्या शाळेत जाताना मोठ्ठं बकुळी झाड होतं. शाळेला जाता येता आम्ही सगळे ही फुलं वेचायचो. कुणी मुठीत घट्ट पकडुन फुल घरी घेवून यायचो. कुणी मुठीचा वास घ्यायचा, पुन्हा, पुन्हा घेत राहायचा. कुणी ही फुल देवाला घालण्यास घरी घेवून येत, न वास घेता. कुणी वरून फुल पडल की पडल उचलून तोंडात घालत. फुलातील मध चोखायला. अशी किती मिळाली त्यावर आनंद द्विगुणित व्हायचा. हे सर्व शाळेतून येताना. कारण घरी जाताना आम्हाला कोणी घ्यायला येत नसे. कुणी ना कुणी आम्हाला सोडायला यायचे. तेंव्हा नुसता सुगंध श्वासात भरून घेत असु. जो आता फार दुर्मिळ झाला आहे.
बकुळ हार सोन्याचा किंवा इतर कोणत्याही धातूचा सध्या फार चलतीत आहे. ज्याचा आकार तेव्हडा बकुळीसारखा आहे. दिसते बकुळ फुल पणं त्यात तो मनात भरणारा सुगंध मात्र हरवलेला आहे…….
☆ तू सध्या काय करतेस ? – भाग-२ ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆
(त्यांच्याकडे आता पैशासाठी हात पसरणे नको वाटते. पण नाही मिळत जॉब. काय करू? इंटरव्ह्यू साठी गेले की अंगाला कंप सुटतो. पाय लटपट करायला लागतात.) – इथून पुढे –
“इशा, सांग ना, कुठली कंपनी? कुठुन तुला कॉल आला?”
ती भानावर आली. तो काय विचारतो, ते कळेचना. जेव्हा समजले तेव्हा ती उठली.वर रैकमध्ये ठेवलेली सैक काढून तिने त्यात ठेवलेले इंटरव्ह्यू चै लेटर काढून त्याच्या हातात ठेवले.
त्याने ते लेटर बघितले. आणि तो आश्चर्यचकित झाला.’सुप्रीम इलेक्ट्रो’ म्हणजे त्याच्या मामाचीच कंपनी.
“माहीत आहे तुला ही कंपनी? आहेत कुणी ओळखीचे तेथे?”
“हो.ही कंपनी माझ्या मामाचीच. सख्ख्या मामाची. बहुतेक तरी तुझे काम होईल असे वाटते. मी आता उतरल्यावर त्याला फोन करतो. तु रीतसर इंटरव्ह्यू वगैरे दे.बाकी मी बघतो”
आता आश्चर्यचकित होण्याची पाळी तिची होती. तिचा कानावर विश्वासच बसेना. हा खरंच सांगतोय की गंमत करतो हे ही तिला कळेना. काय उत्तर द्यायची ते पण सुचेना.
“अगं,ए इशा.. जागी आहे ना तु? मी काय म्हणतो आहे. तुला हा जॉब मिळाला असं समज.”
“हो..हो..अरे थैंक्स हं..खरोखर थैंक्स. मला ना अजूनही खरंच वाटत नाहिये. माझं नशीब खरंच इतकं चांगलं आहे?मला इतका पटकन जॉब मिळेल?”
“मिळाला समज.बरं एक सांग..पुण्याला आता त कुठे जाणार आहेस?म्हणजे कुठे उतरणार?” त्याने विचारले.
“अरे मावशी असते पिंपरीत. नाशिक फाट्यावर कोणीतरी घ्यायला येईल मला”
“ठिक आहे. मग काही हरकत नाही. उद्या तु एकदम कॉन्फिडन्टली इंटरव्ह्यू ला जा.हा जॉब बहुतेक तर तुला मिळेलच. पण जर नाहिच मिळाला.. तरी टेन्शन घेऊ नकोस. पुण्यात आहे आपल्या ओळखी.आता फक्त पार्टीचे लक्षात ठेव म्हणजे झालं”
“हो..नक्की”
तिच्या डोळ्यात एकदम पाणीच आलं.कसं नशीब क्षणात पलटतं.देव आहे आपल्या पाठिशी. आपले बाबा इतकी सेवा करतात, त्यांची पुण्याई आपल्याला ही अशी उपयोगी पडते. आईला सांगावं का फोन करून? पण नकोच.एकदा काय ते फायनल होऊ दे.मगच तिला ही गुडन्युज देऊ.
“चला.. गाडी अर्धा तास थांबेल”
ड्रायव्हर ने आवाज दिला. गाडी’दौलत’ वर थांबली होती.
“चल..कॉफी घेऊया का?” श्री ने विचारले.
दोघेजण खाली उतरले.
“तु फ्रेश हो,तोपर्यंत आलोच मी कुपन घेऊन”
श्री ने काउंटरवरुन कुपन्स घेतली. दोन कॉफी आणि दोन सैडविचेस घेऊन तो टेबलवर आला.
“अरे,इतके कशाला?”इशा म्हणाली.
“घे.मला पण भुक लागली आहे”
दोघांनी कॉफी संपवली .श्री इशाकडे पहात होता.. वेगळ्या नजरेने.
किती छान दिसते ही. गाडीत बसलो तेव्हा लक्षात आले नाही. तोंडावर स्कार्फ होता, नंतर तिने तो काढला.. पण शेजारी बसल्यामुळे कळलं नाही. आता तो प्रथमच तिला समोरून बघत होता. थोड्या वेळापूर्वी तिच्या चेहऱ्यावर जी काळजी, उदासीनता दिसत होती, ती आता कुठल्या कुठे पळाली होती. तिच्या डोळ्यात आता एक आत्मविश्वासाची चमक दिसत होती. आपण तिच्या उपयोगी पडु शकतो ही भावना त्याच्या मनाला समाधान देऊन गेली.
“श्री, अरे तु काय करतोस? काही सांगितलेच नाही मघापासून” अचानक इशाने विचारले.
तिचे तिलाच वाटले.. हा आपल्याला एवढी मदत करतो.. आणि आपण त्याला त्याच्याबद्दल काहीच विचारले नाही.
“बस्स..चालू आहे काहीतरी” त्याने विषय टाळण्याचा प्रयत्न केला.
“काही तरी म्हणजे नक्की काय?सागरमल मोदी सुटल्यानंतर आपण प्रथमच भेटतो आहोत. तु मग ‘पेठे’ ला नाही गेलास?”
“नाही. ती एक वेगळीच स्टोरी आहे”
“सांग ना मग”
“आपण चौथीतुन पाचवीत गेलो ना.. नेमकी त्याचवेळी बाबांची बदली झाली. पुण्यात. मग आम्ही पुण्यातच शिफ्ट झालो”
“मग पुढचं शिक्षण पुण्यात झालं?”
“हो.शिक्षण म्हणजे तरी काय गं..दहावीला मी दोन वर्ष घेतली. बाबांनी सांगितले.. बस झालं शिक्षण. मग नोकरीला लागलो”
“कुठे?”
“प्रविण मसाले मधे. बाबांची तिथे ओळख होती. मार्केटिंग मध्ये जॉब मिळुन गेला. तीन वर्ष केला जॉब. मग नोकरी सोडून दिली”
“मग आता काय करतोस?” तिने उत्सुकतेने विचारले.
तेवढ्यात बस सुरू झाल्याचा आवाज आला. धावत धावत दोघे बसमध्ये जाऊन बसले.
“आता मी माझी स्वतःची इंडस्ट्री सुरू केली आहे. स्मॉल स्केल.. फुड प्रॉडक्ट,मसाले वगैरे.ग्राईंडर्स घेतले आहे. छोटी छोटी कामे मिळताहेत. वर्ष दिड वर्ष झालं. अजून सेट व्हायला वेळ लागेल”
“नाशिकला कोण असतं? कोणाकडे आला होतास?”
“अगं एक मसाल्याचा ब्रैंड आहे तिथला..त्यांच्याकडून काही बल्क ऑर्डर मिळेल म्हणून आलो होतो. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन प्रयत्न चालू आहे”
“मग नाशिकला कुणाला भेटलास?
“ते नाही का शामसन्स मसाले.. त्यांच्याकडे गेलो होतो. एकानं रेफरन्स दिला होता”
“मग काय म्हणाले ते?”
“नेहमीचचं गं..हो..बघु..विचार करुन सांगतो. आताशा सवय झाली मला. हे लोक सरळ नाही म्हणून सांगत नाही. “सांगतो विचार करून” म्हणाले की समजायचं.. इथे आपले काम होणार नाही”
इशाने ते ऐकून घेतले. त्याला थांबवले. आणि हसुन म्हणाली,
“तु जशी मला मदत केली ना.. तशीच आता मी पण करु शकते. शामसन्स मसाले म्हणजे आपल्या एकदम घरचीच माणसं. माझ्या बाबांचे मित्रच आहे ते. शामकाका जाधव. मी सांगते बाबांना. बाकी मी काही करु शकत नाही. पण तुला बहुतेक तरीही तिथले काम मिळेल”
श्री चा आपल्या कानावर विश्वास बसेना. ही सहज भेटते काय..ओळख होते काय.. आपण तिचे काम करतो..ती पण आपले काम करते.किती योगायोग.. अगदी सिरीयलमधल्या सारखेच ना.
“इशा, तु खरंच सांगते आहेस?का गंमत नुसती?”
“थांब एक मिनिट..”इशा म्हणाली.
Whatsapp वर जाऊन तिने शामकाकांचा Dp दाखवला.
“यांनाच भेटला का तु?”
“हो”
“अरे हे आमचे शामकाका. फक्त तु त्यांची काय रिक्वायरमेंट आहे ती बघ.क्वॉलिटी चं वगैरे ते सांभाळ.मी सजेस्ट करते आहे.. पण कामाच्या बाबतीत ते फारच पर्टिक्युलर आहेत. त्यांची तक्रार नको यायला”
“ते सोड.एकदा का मला मोठी पार्टी मिळाली ना.. बघ कुठल्या कुठे जाईन मी. क्वॉलिटी च्या बाबतीत तु निश्चिंत रहा. तुझ्या काकांना सैटिस्फाइड करायची जबाबदारी माझी”
श्री पण आता निश्चिंत झाला
नाशिकला दोघे गाडीत बसले तेव्हा दोघांचेही मन उदासीनतेमुळे ग्रासले होते ती उदासी आता कुठच्या कुठे पळाली होती.दोघांच्याही मनस्थितीत आमुलाग्र बदल झाला होता. ते दोघेही आता प्रसन्न वाटत होते. आता त्यांना हा प्रवास कधीच संपु नये असे वाटत होते. पण गाडीने आता पुण्यात प्रवास केला होता. साडेनऊ वाजुन गेले होते. नाशिक फाट्यावर ती जेव्हा उतरण्यासाठी उठली तेव्हा त्यांनी उद्याच भेटण्याचे ठरवले.. आणि बाय..बाय..करून ती गाडीतून उतरली.
सखु बरोबर वारीला पंढरपूरला जायची तुळशीबाईची तयारी सुरू झाली होती .
पितळेचे तुळशी वृंदावन लख्ख घासून घेतलं. हळदीकुंकू वाहून पूजा केली. हार, फुलं घातली.
“बोला पुंडलिक वरदे हारी विठ्ठल
श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ महाराज की जय “
अस म्हणून सखुनी तुळशी वृंदावन डोक्यावर घेतल.
हा सोहळा बागेतली सगळी झाडं कौतुकानी बघत होती.
” किती ग भाग्यवान दरवर्षी वारी घडते तुला “.
” ये गं बाई जाऊन…”
” विठुरायाला रुक्मिणी मातेला आमचा नमस्कार सांग”
असं म्हणून सगळ्या झाडांनी तिला हात जोडले.
” मी कुठली जाते ….सखुबाई दिवसभर मला डोक्यावर घेते म्हणून घडत बघा.येते आता…असं म्हणत निरोप घेऊन तुळशीबाई निघाली वारीला….
खरंच तिला मनातून फार आनंद व्हायचा .ती या दिवसाची वाट पाहत असायची .दिंडीत चालताना चिपळ्यांचा, टाळांचा, विणेचा नाद ऐकू यायचा…
अभंग ,गौळणी, हरिपाठ,ओव्या कानी पडायच्या.
साध्याभोळ्या फुगड्या खेळणाऱ्या बाया बघून तिला समाधान वाटायचं .आनंदाने ती हरखुन जायची.वरूणराजा बरसायचा..ते पाणी अंगावर पडलं की तिला कृतार्थ झालो अस वाटायच.
दिंडीत चालताना शेजारच्या बाईच्या डोक्यावर पांडुरंग रुक्मिणी होती. तेव्हा तर तिच्या रुक्मिणी मातेबरोबर गप्पा झाल्या होत्या….
त्या दिवशी दिवसभर ती आनंदात होती .
सुरेखसा मोठा हार गळ्यात पडायचा. त्याच ओझ सखुबाईला वाटायचं नाही. ती कौतुकाने तिच्याकडे बघायची. तुळशी बाईच्या डोळ्यातून दोन टिपं गळायची….
” किती प्रेम करतेस ग “..म्हणून सखूची आलाबला घ्यावी असं तिला वाटायचं.
मुक्कामी पोचल्यावर खाली ठेवलं तरी येता जाता वारकरी श्रद्धेनी वाकून नमस्कार करायचे. त्यांच्या गळ्यातल्या तुळशीच्या माळा बघून तिला संतोष वाटायचा.
लांबवर पालख्या दिसायच्या….
तो अनुपम सोहळा किती बघु आणि किती नको अस तीला वाटायच….. आपल्या भाग्याचा तीला साक्षात्कार व्हायचा. बाया जाता जाता म्हणत असलेलं कानी पडायचं.
“तुळसा बाईचा हिरवा हिरवा पाला
कसा बाई तिनी गोविंद वश केला”
तेव्हा डोळ्यासमोर श्रीकृष्णाच मोहक रूप दिसायच…
वारी पंढरपूरला चालली आहे …तुळशी बाईला डोक्यावर घेऊन निघालेल्या बाया बापड्यांचे मला अपार कौतुक वाटतं.
☆ प्रत्येकाची “ अनंत चतुर्दशी”… लेखक : श्री जयंत विद्वांस ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆
तुटपुंज्या पगारात पै पै बाजूला काढून गणपतीला गावाला नेणारे वडील आठवतात, जिच्या चपलेचा सोडल्यास इतर कुठलाही कुरकुर आवाज न करणारी आई आठवते, पहाटेच्या अंधारात वडिलांची विहिरीवरची आंघोळ, ते मंत्रपठण आठवतं, आईच्या आवरून घेण्यासाठीच्या हाका आणि आजीनी गोधडी बाजूला करून गालावरून फिरवलेला खरबरीत हात आठवतो, ‘झोपलाय तर झोपू दे गं, रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता कळत नाही, अंग दुखत असेल, मुंबैहून यष्टीनी यायचं म्हणजे खायचं काम नाहीये, आरत्या व्हायच्या वेळेस उठेल बरोब्बर आणि मेले सगळे एकदम उठले तर पाणी कशात तापवशील एवढ्या सगळ्यांसाठी’ असं म्हणायची.
मला कायम प्रश्न पडायचा, असल्या खरबरीत हातांनी एवढे सुंदर, मऊसूत, एकसारखे पांढरेशुभ्र मोदक ती कशी काय करते?
तिला विचारलं तर ती धपाटा घालून म्हणाली होती, ‘रांडेच्या, माया लागते रे त्यासाठी मनात, पारीला चिकटून येते मग ती, पारी हातात फिरते ना तेंव्हा देवाचं म्हणते मी, चिरा सांधतो रे तो सगळ्या, नावं माझं मेलीचं होतं’.
आता यातलं कुणीही नाही. काय एकेक आठवणी असतात बघा, आईचा मोदक फुटू नये म्हणून मी तिच्याजवळ बसून देवाचं म्हणायचो लहानपणी.
वेडेपणा नुसता सगळा.
काय एकातून एक आठवत जातं बघा. आरत्या झाल्यावर आजीला नमस्कार केला की ती दोन तीन मिनिटांचा आशीर्वाद पुटपुटायची.
लहानपणी वाटायचं त्यात काय रडण्यासारखं आहे, आता कळतं.
आपलाही काळ आता सरत चाललाय, एक दिवस आपल्यावर हीच वेळ, असंच वाटत असावं का?
आजोबा गणपती उचलताना म्हणायचे, ‘पुढच्या वर्षी मी नसलो तरी चिंतामणी करेल हो तुझं सगळं नीट, पाठीवर हात असू दे तुझा सगळ्यांच्या’.
मग सगळे भरल्या डोळ्यांनी पाय ओढत नदीकडे जायचे. लहानपणी कळायचं नाही एवढं पण तेंव्हाही नदीवरून परत येताना काहीतरी हरवल्यासारखं, विसरून आल्यासारखं वाटायचं.
दुसऱ्या दिवशी निघताना आज्जी तोंडावरून हात फिरवायची आणि बोळक्या तोंडानी आवाज करत पापी घ्यायची.
आमच्या निघायच्या वेळेला आजोबा उगाच लक्षात नसल्यासारखं अंगणात कामं करत रहायचे. आम्हांला सोडायला पुलावर यायचे गड्यासोबत आणि गाडी सुटली की नदीवरून परत चालल्यासारखे हळू हळू परत जायचे.
घरातल्या सगळ्या मोठ्या माणसांचं विसर्जन करून सुद्धा खूप काळ लोटलाय आता.
त्यांच्यामागे जमेल तेवढा उत्सव केला. पण त्यात मन काही रमलं नाही एवढं खरं.
आयुष्याचे सरळ सरळ दोन भाग पडले, एक त्यांच्यासह, एक त्यांच्याशिवाय. आता उकडीचा मोदक तोंडात जाताना आजीच्या, आईच्या खरबरीत हाताचा स्पर्श ओठाला व्हावा असं वाटून जातं.
आता तो कितीही चविष्ट असला तरी घशाखाली आवंढ्याची सोबत असल्याशिवाय जात नाही.
माझंही वय विसर्जनाच्या आसपासच आहे म्हणा आता.
पाटावर बसून मीही तयार आहे.
पण विसर्जनाची मिरवणूक बघितली की मला हसू येतं.
देवाला सुद्धा नंबर लागल्याशिवाय विसर्जन सोहळा नाही तिथे माझ्यासारख्या सामान्याची काय कथा!
प्रत्येकाची ‘अनंत चतुर्दशी’ ठरलेली आहे…. ”कधी”? एवढाच काय तो जीवघेणा प्रश्नं.
(जवळ आलेल्या चतुर्दशीला नजरेआड करून, नव्हे तिच्या आगमनाची चाहूल टाळून चतुर्थीचा आभास निर्माण करणाऱ्या, आणि स्वतः “अनंत” असल्याची दिशाभूल करून घेणाऱ्या माझ्या पिढीला समर्पित…)
लेखक : जयंत विद्वांस
प्रस्तुती : श्री अनंत केळकर.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर
☆ जानुझ कोरझाक – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
दर शिक्षक दिनाला मला पोलंडमधील जानुझ कोर्झाक या शिक्षकाची आठवण येते. शिक्षणतज्ज्ञ आणि बालमानशास्त्राचा अभ्यास असणारा कोर्झाक मुलांसाठी काम करायचा. आई वडील नसलेली १९२ ज्यू बालकांसाठी त्याने बालगृह काढले. त्या बालगृहात त्याने अनेक उपक्रम केले. तो मुलांना शिकवायचा.
जर्मनी ने पोलंडवर आक्रमण केले.
त्या ज्यू मुले असलेल्या बालगृहाचा ताबा घेतला व ज्यू साठी असलेल्या छळ छावणीत मुलांना नेले. कोर्झाक ला तिथे न थांबण्याची सवलत दिली. पण माझी मुले जिथे राहतील तिथेच मी राहील अशी भूमिका त्याने घेतली. तिथे अतिशय हाल असूनही तो तिथेच राहिला. शेवटी गॅस चेंबर मध्ये त्या मुलांना पाठवण्याचा दिवस आला. कोर्झाक ने मुलांना नवे कपडे घालायला सांगितले. एका लहान मुलाला त्याने कडेवर घेतले व सर्वांच्या पुढे तो चालत राहिला. त्याला पुन्हा जर्मन सैनिकांनी तुम्ही पळून जा अशी सवलत दिली. यापूर्वीही अशी सूचना अनेकदा दिली. पण माझी मुले तुम्ही मारणार असाल तर मग मलाही मारा असे त्याने सांगितले आणि गॅस चेंबर मध्ये त्याने मृत्यू पत्करला…
मुलांवर इतके प्रेम करणाऱ्या या शिक्षकाला शिक्षकदिनाच्या दिवशी सर्वांनी आठवायला हवे…….?
लेखक : हेरंब कुलकर्णी
प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
☆ “थोरात म्हणजे मराठा का ?” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆
(हसून हसून रडायचे की रडून रडून हसायचे? हे तुमचं तुम्हीच ठरवा..)
मित्राच्या गावच्या जत्रे साठी त्याच्या बरोबर त्याच्या गावाकडे गेलो होतो. जत्रा झाल्यावर दोन दिवस थांबलो. दुसऱ्या दिवशी सकाळीच दोघांनी त्याच्या शेतावर चक्कर टाकली.
साठी पार केलेला म्हातारा पलीकडच्या ऊसाच्या बांदावर ऊन खात थांबलेला. मित्राकडे पाव्हणे कोण कुठले चौकशी झाली. पत्रकार होतो, पुस्तकं लिहितो वगैरे सांगितल्यावर त्याला माझ्या बद्दल आदर वाटला असावा. मला साहेब म्हणू लागला. कोरोना, भाजीपाला, महागाई, गुऱ्हाळाच्या आणि इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर लांबवर पाहत त्यानं प्रश्न विचारलाच…..