मराठी साहित्य – विविधा ☆ घन सावळा आषाढ… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

सौ. सुचित्रा पवार

घन सावळा आषाढ… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

मिरगाने होणाऱ्या जेष्ठातल्या पेरण्यांची धांदल संपते न संपते आषाढाचे काळेभोर मेघ चोहोबाजूनी गर्दी करू लागतात. सावळे सावळे जलद पाळणारे कधी एकाच ठिकाणी हट्टी बाळासारखे थांबणारे ढग मनात वेगळीच हुरहूर उठवत राहतात.काहीतरी हरवल्यासारखे वाटत राहते उगीचच त्या पाण्याने गच्च भरल्या नभांकडे बघून.म्हणून तर कालिदासाच्या यक्षाला वियोग झालेल्या पत्नीची आठवण अस्वस्थ करून गेली असेल.हे मेघच पत्नीला निरोप देतील आणि विरह अग्नीत तडफडणाऱ्या मनाचा तिला अंदाज येईल असे त्याला वाटले असावे.आषाढाच्या पहिल्या दिवशी ढगांकडे बघून कालिदासाची आठवण आल्याशिवाय राहत नाही.

थंडगार हवा सगळ्या आसमंतात शिरून शेत शिवाराला हुडहुडी येते.चराचर आनंदी झालेलं असतं.पाखरांचा मधूर किलबिलाट सगळ्या वातावरणात भरून राहतो.इंदिरा संतांच्या रंगरंगुल्या,सान-सानुल्या गवतफुलांवर काळी, पिवळी,पांढरी,तपकिरी फुलपाखरे रुंजी घालत असतात.उन्हाळभर माळावर खुरट्या,वाळक्या कुरणावर दात आपटून ल्याप झालेली जनावरं आता वाऱ्यावर सळसळणाऱ्या हिरव्यागार कोवळ्या लूस गवतावर अंगावरची पावसाची सर झिंझाडत तुटून पडतात.किती खाऊ न किती नको!हावऱ्यासारखी नुसती हुंदडत गवतात मस्ती करत राहतात.

कुळवाची पाळी देऊनही मागे उरलेल्या चुकार तणाला खुरप्याच्या टोकाने उचलणाऱ्या शाला, माला, मंदा ,नंदाला सभोवतीच्या काळ्याकुट्ट ढगात पंढरीचा विठोबा दिसतो आणि वारीची आठवण येऊन त्यांना आनंदाचे भरते येते.आपला हात सरसर हलवत “अगं वारीला कवाशी जायाचं?”म्हणत मनातच वारीच्या वाटेवर टाळ मृदुन्गाच्या गजरात गाऊ-नाचू लागतात.

कृषिवलाना बेंदराच्या सणाची चाहूल लागलेली असते.जाता येता वाघाटीच्या वेलावर पानाआड दडलेल्या वाघाटया काढून घरधणीनीला

बारशीला कालवण करायला द्यायच्या असतात.हुनंगा झाला की खिचडा. वेळात वेळ काढून बैलांना ,गुरांना धुवून कांती तुकतुकीत करायची असते.चांगला खुराक घालून बैलांचा लाड करायचा असतो.मागच्या बेंदराला आणलेले कंडे विरून गेलेले असतात, दिष्टीचे मणी पण फुटलेले असतात.शिंगांचा रंग उडालेला असतो.येत्या बाजारातून सगळं सगळं न चुकता आणायचं असतं. फाटकी झूल शिवायला टाकायची असते.गोंडे ऐनवेळी कुठं सापडत नाहीत,तेही यावर्षी नवेच घ्यायचा विचार असतो.झालंच तर लेकीच्या पहिल्या करीवर नवे कासरे, कंडे ठेवायचे असतात.

घरधणीनींना खिचडा कांडायचा असतो,आकाडाची कर तळायला कापण्या-दामट्याचं दळण दळून आणायचं असतं.आकाड पाळायला आलेल्या लेकी हातातला चुडा अन अंगभर दागिने मिरवत सगळ्या आळीत चहा पाण्याला फिरत असतात.

देवळात  मागच्या वर्षी सप्ता झाल्यावर कपाट बंद केलेले तबला,पेटी,मृदंग बाहेर येतात.पथाऱ्या टाकल्या जातात.एकादशी होईपर्यंत आता दररोज विठ्ठल मंदिरात भजन कीर्तन रंगणार असतं.

अ ss आ  अवघे गरजे पंढरपूर

चालला नामाचा गजर,चालला नामाचा गजर..कोणतरी सूर लावत असतो,ताल धरायला मग एकेकजण येऊन बसतो.पोराठोरांचा पाय देवळातून निघत नाही.जेवण करून धोतराची खोळ अंगभर पांघरून भजनात तल्लीन झालेल्यांच्या अंगातला गारठा कधीच पळून गेलेला असतो.

आषाढ एकादशीचा तो पवित्र दिवस येतो.दिवसभर देवळाला जत्रेचे रूप आलेले असते.घंटा खणखणत राहते.भोळा भाबडा जीव फक्त विठूच्या जीर्ण शिर्न चरणांवर लीन होतो.मागत काहीच नसतो,त्याच्या आत्म्याशी फक्त क्षणभर एकरूप  होतो.अबीर बुक्का कपाळावर लावून थोड्याशा नकळत केलेल्या पापाची वजाबाकी करतो.

अध्यात्मातल्या सत्शील लोकांचा चातुर्मास आताशा सुरू झालेला असतो.श्रावणाला पवित्र महिना मानत असले तरी आषाढ सुद्धा त्याचा सख्खा भाऊच असतो.त्याच्याइतकाच तो शुद्ध अन पवित्र असतो म्हणूनच अवसेच्या दिवे उजळून आषाढ जणू त्याचे स्वागत करतो.नव्हनाच्या लाह्या याचदिवशी भाजल्या जातात.

वर्षभर ज्ञान देणाऱ्या गुरूंच्या ऋणातून काही अंशी मुक्त होण्याची गुरुपौर्णिमा असो,अवघ्या महाराष्ट्राचा आषाढी एकादशीचा उपवास -वारी असो,बेंदूर असो,म्हसोबा ताई आईचा गोडा-खारा निवद असो,की तेजोमय दिव्याची पूजा असो,आषाढ गुंग असतो आपल्याच तालात,धांदलीत,नव्या नवरीच्या पैंजनाच्या तालात, लाजऱ्या नजरेत,कापऱ्या वाऱ्यात,भुरभुरत्या पावसात,अवसेच्या दिव्याच्या प्रकाशात आणि त्या

‘और ना डरा दे मुझको

ए काले काले घन..’वाल्या मनाला विव्हळ करणाऱ्या घनसावळ्या पाण्याने ओथंम्बलेल्या दाटीवाटीच्या मेघात…

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तेजस्विनी… – भाग – १ ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

डॉ. शैलजा करोडे

🌸 जीवनरंग 🌸

☆ तेजस्विनी… – भाग – १ ☆ डॉ. शैलजा करोडे

” महाराज, जेवणाची काय काय तयारी झाली आहे ” ” सगळं झालंय बाईसाहेब, मावा बर्फी, गुलाबजाम तयार आहेत. तवा भाजीची तयारी झालीय.काबुली चणे, भरली वांगी तयार आहे ” ” आणि जेवणापूर्वीचे सगळे स्नॅक्स तयार आहेत ? ” ” होय बाईसाहेब, पाणीपुरी, दहीवडा, नुडल्स तयार आहेत. जेवणानंतर बर्फाच्या गोळा, कुल्फीही तयार आहेत.मुखशुद्धीसाठी मसाला पानही तयार असेल “

” महाराज, उद्या वरात परतीच्या प्रवासाला लागेल. त्यांच्यासाठी आणि पाहुण्यांसाठी काय तयार केलंय ” ” बाईसाहेब, मसाला शेव आणि मोहनथालची पाकिटे तयार आहेत. तुम्ही आता ती ताब्यात घ्या म्हणजे ऐनवेळी गोंधळ होणार नाही आणि उद्या वरातीच्या परतीच्या प्रवासात इडली चटणी, मसाला पुरी, बटाट्याची सुकी भाजी फ्रेश तयार करून देईन ” ” छान महाराज,उत्तम तयारी केलीय, पाहुणे मंडळींनी हाॅलही गच्च भरलाय.दाराशी सजवलेला घोडाही आणलाय. नवरदेवाकडून ग्रीन सिग्नल मिळाला कि ” सुक्या “( नवरीचा भाऊ ) लगेच नवरदेवाला घेण्यासाठी जाईल.

” अगं अगं, मीरा, थांब थोडी, कोठे निघालीय ” ” काय ग आक्का, काय म्हणतेस ” ” अगं सुवासिनींच्या ओटीचं सामान कोठे ठेवलंय ” ” अगं, माझ्या रूममधल्या कपाटात ठेवलंय व्यवस्थित. प्रत्येक पाकिटात तांदूळ, खोबरं, एक रूपयाचं नाणं, आणि ब्लाउज पीसेस सगळं व्यवस्थित ठेवलंय आणि होय नवरीची विदाई करतांना सोबत देण्यासाठी गूळ पोळीही तयार केलीय ” ” शाब्बास बाई, लग्नासाठी सगळ्यांचा हातभार लागला कि कामं कशी व्यवस्थित पार पडतात “

” ए अप्पा, अप्पा, काय करतोहेस तू.” ” काय गं

आक्का ” ” अरे हवनकुंडं आणलंहेस काय ?” ” होय गं आक्का, आणलंय सगळं.त्यासाठी समिधा, शुद्ध तूप, खारीक, खोबरं, पूजा साहित्य सगळी व्यवस्थित तयारी केलीय आणि होय गुरूजींचाही फोन येऊन गेलाय, तेही येण्यासाठी निघालेत. थोड्या वेळात येथे पोहोचतील ” ” ठीक आहे. कर तू तुझी कामं “

” ए विठ्ठल, बाहेर कार आलीय. कोण आलं आहे बघ. स्वागत कर त्यांचं ” ” आक्का मुंबईचे काका आलेत. सोबत मुलगा व सूनबाईही आहेत ” ” या काका या, नमस्कार करते. कसा झाला प्रवास ? काही त्रास नाही ना झाला ? ” ” नाही बेटा, काही त्रास झाला नाही. अगदी मजेत झाला प्रवास, कुठे आहे आमची छकुली, सेलिब्रिटी गर्ल ” ” आहे ना, बोलावते, ए सीमा, छकुलीला बोलव जरा, काका आलेत ” ” आक्का नववधूचा मेकअप चाललाय ” ” असू दे गं, काकांना भेट म्हणावं पाच मिनीटे “

लाजरी,साजिरी,गोजिरी माझी छकुली मूळातच नक्षत्रासारखी सुंदर आणि आज तर वधूवेषात फारच खुलून दिसत होती.” छकुली मुंबईचे बाबा आलेत. नमस्कार कर त्यांना” ” छकुली नमस्कारासाठी वाकली तशी वरचेवर झेलत काकांनी तिला ह्रदयाशी धरले. ” नमस्कार काय करायला लावते बेटा तिला. मुलगी तर दुर्गेचं रूप असते.आणि दुर्गाची तर आपण पूजा करतो.तिला नमस्कार करायला लावून आपण पापाचे धनी कसे होणार. बाळा खूष राहा, सुखी राहा. जीवनात तुला सगळी सुखे मिळोत. नांदा सौख्य भरे ” म्हणत काकांनी आशीर्वादाचा हात तिच्या माथ्यावर ठेवला.माझ्याही डोळ्यात नकळत पाणी आलं.” रडू नकोस बेटा, आजचा दिवस मोठा शुभ.तुझी चिमणी स्वतःच्या घरट्यात विसावणार आहे.स्वतःच्या घरट्याचा विस्तार करणार आहे.तुझी तपस्या सफल झाली बेटा.” “काका ” म्हणत मी ही नकळत काकांच्या ह्रदयावर विसावले.

“आई, काय करतेस तू ” ” अगं बेटा ही अन्नपूर्णा मावशी, शोभा मावशी, सखू मामी, मीना आत्या आल्यात बघ ” ” काय म्हणते आमची वधूआई. परमेश्वरानं आनंदाचा क्षण आणलाय जीवनात. आनंदानं साजरा करा “, सगळ्या सुवासिनींनी बांगड्या भरा. कासाराला बोलावलंय मी. बघा त्या कोपर्‍यात बसलाय.” मी सगळ्यांना बांगड्या भरण्यास पाठविले. ” काय ताई आक्काच्या कपाळाला तांदूळाचा मळवट भरला नाहीस अजून. नवरीची आई आहे ती ” अन्नपूर्णा बोलत होती.” “अगं होय, नुसती धावपळ चाललीय सगळ्यांची. कोणाच्या लक्षातच आलं नाही. ” सुमन, ए सुमन ” ” काय म्हणता वन्स ” सुमन आक्काच्या कपाळाला तांदूळाचा मळवट भर ना ” ” होय वन्स, मी करते ते काम “

वर्‍हाडींना फेटा बांधण्याचे काम सुरू होते. अरे वाजंत्रीवाले वाजवा ना जरा. सगळे धार्मिक विधी सुरू आहेत आणि तुम्ही वाजंत्री नाही वाजवत “. लगेच वाजंत्री सुरू झाली.वातावरण निर्मिती झाली. कामाला गती आली.

” आप्पा, आप्पा वरमाला कोठे ठेवल्यात ?” ” मला नाही माहित.फुलवाल्याने सकाळी आँर्डरची डिलीव्हरी दिलीय.तुम्ही कोठे ठेवलीय मला माहित नाही “. ” काय रे बाबा, ऐनवेळी घोटाळा नको व्हायला.सुनेत्रा शोध घे गं जरा ” होय मी शोधते ” ” आक्का गूरूजींनी जयमाला वधूवरांच्या खुर्चीवरच ठेवल्या आहेत ” ” ठीक आहे. एक काळजी दूर झाली “

आप्पा वेळ होत आली रे. अजून मुलाकडच्या मंडळींकडून काही निरोप नाही ” ” येतील, आली असेल काही अडचण. मी फोनही ट्राय करतोय केव्हाचा पण तो ही लागत नाही आहे. तू काळजी करू नकोस. मी पाहतो काय ते ” म्हणत आप्पा निघून गेला. माझी काळजी वाढली.मनांत नको नको त्या शंका येऊ लागल्यात. ” हे विघ्नेश्वरा  गजानना, तुझ्यावरचं सोपवलंय रे बाबा. तूच सगळ्यांचा त्राता, विघ्नहर्ता, तूच तार रे बाबा या संकटातून “.

पंधरा मिनीटे, वीस मिनीटे, अर्धा तास, एक तास. घड्याळ पुढे पुढे सरकत होतं आणि माझ्या काळजात धस्स होत होतं. लग्न मंडपातही कुजबूज सुरू झाली होती.” अहो मला आँफिस गाठायचेय.इन्स्पेक्शन सुरू आहे.म्हटलं नवरदेव नवरीला आशीर्वाद देऊ आणि लगेच निघू,पण इथे तर काहीच तयारी दिसत नाही आहे,वरातीचा घोडाही इथेच आहे. शुभ मुहूर्त कोणी पाळतच नाही आजकाल. आपल्याला पाहिजे तेवढा वेळ ही मंडळी घेतातच.वरातीची मिरवणूक, त्यात यांची नाच गाणी, नववधूचा मेकअप दोन दोन तीन तीन तास केव्हाच निघून जातात. मग लागतात लग्नं यांच्या सोयीनुसार.कोणी या संदर्भात बोलतही नाहीत. कारण काय तर लग्न ही आयुष्यात घडणारी एकमेव गोष्ट. हौस मौज आता नाही करायची तर केव्हा करायची, हा यांचा मुख्य सवाल.

” आप्पा, आप्पा, काय झालं ? लागला काय फोन ? ” होय आक्का, लागलाय फोन ” ” काय म्हणतात ते लोक ?, अजून का आले नाहीत ? विवाहमुहूर्त टळायला नको ” ” आक्का, मुलाला पुण्यात फ्लॅट विकत घेण्यासाठी पन्नास लाख पाहिजेत ” ” पण ही मागणी तर ठरली नव्हती. आता एनवेळी कसं काय मागत आहेत, आणि आपण कशी काय पूर्ण करणार “.

होय, ही मागणी तशी आपल्या आवाक्याबाहेरची आहे.मी ही सेवानिवृत्त माणूस,मलाही कुटुंबाची जवाबदारी आहे. काय करावं ? सुचतच नाही आहे. पण हे बघ, तू काळजी करू नकोस.मी काकांशी चर्चा करतो, चार लोकही सोबतीला घेतो आणि त्या लोकांची समजूत काढतो.छकुलीला काही कळू देऊ नकोस.लग्नमंडपातील लोकांनाही तू सांभाळून घे.करशील ना एवढं सगळं व्यवस्थित.” होय मी सांभाळते सगळं  तू बघ पुढे काय करायचं ते “,

आप्पा, काका समाजातील चार प्रतिष्ठित मंडळी नवरदेवाच्या जानसघरी गेली.( जानोसा — नवरदेव व वर्‍हाडी मंडळीसाठी केलेली राहण्याची व्यवस्था ) ” हे बघा विवाह हा सोहळा दोन जीवांच्या मधुर मिलनाचा, त्यात पैशांचा अडसर नसावा. मुलगा मुलगी दोघे शिकलेले आहेत. दोघांनाही चांगल्या नोकरी आहेत.ते वसवतील आपलं घरकुल “.

” होय ना,विवाह हा दोन जीवांच्या मधुर मिलनाचा क्षणच.पण नुसती स्वप्नेच कामी येत नाहीत,त्याला वास्तवाचीही जोड हवी. मुलाच्या शिक्षणासाठी, करिअरसाठी आम्ही भरपूर मेहनत घेतली. हाडाची काडं केलीत आम्ही अक्षरशः. आता सुख हवयं आम्हांला, मुलाला स्वतःचं घरकुल हवयं.त्यासाठी हवा पन्नास लाख रूपयांचा निधी.काही आम्हीही टाकू.काही तुम्ही टाका.तुमच्या मुलीच्या सुखासाठीच तर करतोय आम्ही हे सगळं “. ” बाई, आमच्रा मुलीचं सुख कशात आहे हे आम्ही जाणतो.तुम्ही मुलाला शिकवलंत, करिअर केलंत, पण आम्हीही कुठे कमी नाही पडत आहोत.मुलगी शिकलेली आहे. करिअरीस्ट आहे, अखंड लक्ष्मी येईल तुमच्या घरी. राहिला सवाल फ्लॅटसाठी पैसे देण्याचा. तेवढी ताकद माझी नाही.मी काही देऊ शकत नाही.

” देऊ शकत नाही ? मग लग्न मोडलं असं समजा. 

” काय ? लग्न मोडलं ? आमची मुलगी अंगाला हळद लावून नववधूच्या वेषात भावी जीवनाची स्वप्ने घेऊन तिच्या स्वप्नातल्या राजकुमाराची लग्नमंडपात वाट पाहातेय आणि तुम्ही लग्न मोडण्याच्या गोष्टी करताहेत ? लग्नापूर्वी तर ही बोलणी झाली नव्हती.तसं असतं तर आम्ही मुलगी दिलीही नसती.जरूर विचार केला असता या गोष्टीवर “

” मग आता विचार करा ना. आता मागतोय आम्ही.तुम्ही नाही म्हटलं तर दुसर्‍या मुलीवाले तयार आहेत ना ” ” अच्छा, तर हे कारण आहे होय. दुसरीकडे जास्त हुंडा मिळतोय म्हणून तुम्ही लग्न मोडताय ? शुद्ध फसवणूक आहे ही आमची.हुंडा मागणं आणि हुंडा देणं कायद्यानं गुन्हा आहे.हा अन्याय मी नाही सहन करणार “

” जा, जा तुम्ही, जे होत असेल तुमच्याकडून ते खुशाल करा ” 

” अहो, एवढा माज बरा नाही. मुलीचा बाप असलो तरी इज्जत आहे मला.चला काका पोलीस स्टेशनात FIR दाखल करायला,

नवरदेव, त्याचे आई वडील व इतर नातेवाईक ( मध्यस्थ ) पोलीस स्टेशनात लाॅकअप मध्ये बंद झाले.

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ. शैलजा करोडे

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – [email protected] 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – ३ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… भाग – ३ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टूडे)

शाळा नंबर १२

रॉबर्ट ब्रेक एकदा म्हणाला होता, 

“I FEEL I WANT TO GO BACK IN TIME,NOT TO CHANGE THINGS BUT TO FEEL A COUPLE OF THINGS TWICE…

I WISH I COULD GO BACK TO SCHOOL NOT TO BECOME A CHILD BUT TO SPEND  MORE TIME WITH THOSE FRIENDS,I NEVER MET AFTER SCHOOL.”

माझं अगदी असंच काहीसं झालेलं आहे.

आम्ही मुलं नगरपालिकेच्या शाळेत शिकलो.  म्हणजे माझं प्राथमिक पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण नगरपालिकेच्या शाळेत झालं. माझ्या शाळेचे नाव शाळा नंबर १२.  घरापासून अगदी जवळच आमची शाळा होती.  माझ्या काही बालमैत्रिणी शाळा नंबर चार मध्ये जात तर मुलगे दगडी शाळेत जात. आमची शाळा फक्त मुलींची होती. शाळेची अशी नावं आठवली तरी आता गंमत वाटते. लिटिल मिलेनियम स्कूल, ब्लूमिंग पेटल्स, किडझी. स्माईल अशी आकर्षक नावं असलेल्या शाळा तेव्हा नव्हत्याच.  नर्सरी, प्लेग्रुप्स यांची ओळखही नव्हती म्हणजे शिशुविहार, बालक मंदिर वगैरे सारखे काही खासगी शैक्षणिक समूह होते पण आमच्या शिक्षणाची सुरुवात मात्र शाळा नंबर १२ या नगरपालिकेच्या शाळेपासूनच झाली.

त्यावेळी ठाण्यात एक कॉन्व्हेंट स्कूल होतं. सेंट जॉन द बाप्टीस्ट हायस्कूल पण मला वाटतं आमची पालक मंडळी मराठी भाषेचा जाज्वल्य अभिमान बाळगणारी होती.  आपल्या मुलांचं शिक्षण हे मातृभाषेतूनच झालं पाहिजे याच विचारांची होती.  कदाचित आपल्या मुलांना एखाद्या मिशनरी इंग्रजी माध्यमाच्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये का पाठवू नये असा विचारही त्यांच्या मनाला तेव्हा शिवला नसेल आणि आमच्या बालमनावरही नगरपालिकांच्या शाळांतून मिळणारं  शिक्षण हेच खरं शिक्षण असा काहीतरी विचार पक्का केला असावा आणि त्यावेळी आमचा जो मराठी माणसांचा एक गट होता त्यातली सगळीच मुलं मराठी आणि नगरपालिकांच्या शाळेतून शिकत होती. त्यामुळे याहून काहीतरी उच्च, दर्जेदार असू शकतं हा विचार त्यावेळेच्या मुलांच्या मनात कशाला येईल?  मात्र काही अमराठी मुलं आमच्या परिसरात होती आणि ती मात्र कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिक्षण घेत होती. याचा परिणाम असा झाला की   नकळतच इंग्लिश माध्यमातून शिकणारी मुलं आणि मराठी माध्यमातून शिकणारी  मुलं यांच्यात संस्कृतीच्या  भिंती त्यावेळी निर्माण झाल्या. या भिंती थेट महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत टिकल्या.

टेंभी नाक्यावर टाऊन हॉल समोर बारा नंबर शाळेची इमारत होती. ब्रिटिश कालीन दगडी इमारत होती ती! शाळेला मागचं— पुढचं अशी दोन प्रवेशद्वारे होती. मागच्या बाजूला पटांगण होतं आणि ते रस्त्याला लागून होतं पुढचे प्रवेशद्वार हे मुख्य द्वार होते आणि नऊ दहा लांबलचक अशा दगडी पायऱ्या चढून आमचा शाळेच्या मधल्या आवारात प्रवेश व्हायचा आणि त्याच्या डाव्या उजव्या बाजूला वर्ग होते.

शाळेच्या समोर चाळ वजा घरे होती. अडचणीची, खडबडीत बोळातली आणि अरुंद घरात दाटीवाटीने राहणारी, खालून पाणी भरणारी, भाजीपाला किराणाच्या पिशव्या सांभाळणारी, सायकलवरून कामाच्या ठिकाणी जाणारी, जीवनाची दहा टोकं एकमेकांशी जुळवण्यासाठी अहोरात्र कष्ट करणारी माणसं होती ती. वयाच्या सहाव्या वर्षापासून डोक्यात बसलेलं हे जीवन आज इतकी वर्ष झाली, स्वतःच्याच आयुष्यात इतकी स्थित्यंतरे झाली. एका उजळ वाटेवरून प्रवास होत गेला तरीही ही चित्रं पुसली गेली नाहीत.

बारा नंबर शाळेच्या त्या दगडी पायऱ्यांवर दहा मिनिटाच्या आणि अर्ध्या तासाच्या सुट्टीत बालमैत्रिणींसोबत केलेल्या गप्पा,  गायलेली बडबड गीते आणि चवीने चोखत खाल्लेली आंबट चिंबट चिंचा बोरं, एकमेकांना दिलेली सोनचाफ्याची फुलं आजही आठवतात. 

एक छोटसं दफ्तर… शाळेत जाताना आईच  दफ्तर भरायची.  त्यात एखादं पाठ्यपुस्तक, काळी दगडी पाटी आणि पेन्सिल आणि मधल्या सुट्टीत खायचा डबा एवढेच सामान शाळेसाठी आम्हाला पुरायचं.  आमच्या शालेय जीवनाचं नातं होतं पाटी— पेन्सिल, खडू —फळा आणि बुटके लांबलचक वर्गात बसायचे बाक यांच्याशी.

एकेका वर्गाच्या अ ब क ड अशा तुकड्या असायच्या.”अ तुकडीतली  मुलं हुशार आणि “ड” तुकडीतली मुलं ढ!

 “ढ” हे अक्षर मला तेव्हा फार त्रासदायकच वाटायचं कारण “ढ” या अक्षराला माझ्या मते फारशी चांगली पार्श्वभूमी नसताना माझे आडनाव मात्र ढगे  होतं.

एक दिवस वर्णमाला शिकत असताना बाई सांगत होत्या “क कमळातला …

“ख”  खटार्‍यातला ..

“ग”  गडूतला ..

असं करत करत त्या “ढ”जवळ आल्या आणि माझ्या शेजारी बसलेली रत्ना पेडणेकर नावाची मुलगी मोठ्याने म्हणाली “ढ” ढगेतला.

सगळा बालचमु  हसला.  माझे डोळे पाण्याने भरले.

बाईंनी मात्र रत्नाला हात पुढे करायला सांगितला आणि तिच्या हातावर सपकन छडी मारली.  तिचेही डोळे गळू लागले आणि त्याचेही मला फार वाईट वाटले. पण त्यानंतर  मी आणि रत्ना एकमेकींच्या जीवाभावाच्या मैत्रिणी झालो हे नवल नाही का?  यालाच मी आमचे बालविश्व म्हणेन.

मात्र त्यादिवशी शाळेतून घरी परतल्यावर मी— संध्याकाळी पप्पा ऑफिसमधून घरी आल्यावर त्यांना पहिला प्रश्न विचारला होता,

“ आपण आपलं आडनाव बदलू शकतो का?”

त्यावेळी पपा मिस्कीलपणे म्हणाले होते..

“म्हैसधुणे,धटींगण,झोटींग असे आपले  आडनाव असते तर..”

शेक्सपियर म्हणतो नावात काय आहे? मला आजही असं वाटतं नावात खूप काही असतं. सहज आठवलं म्हणून सांगते वरपरीक्षेच्या त्या अप्रिय काळात माझ्या कन्येने “टकले” नावाच्या सर्वगुणसंपन्र स्थळाला केवळ आडनावापायी नकार दिला होता.असो..

रत्ना  पेडणेकर ही ठाण्यातल्या एका मोठ्या कलाकाराची मुलगी होती. सिव्हील हॉस्पिटलच्या समोर त्यांचा सुंदर बंगला होता.  गणपती उत्सवात तिचे वडील गणेश मूर्ती समोर अतिशय कलात्मक असे पौराणिक  कथांवर आधारित  देखावे  उभे करायचे आणि ठाण्यातली सगळी मंडळी पेडणेकर यांचा गणपती बघण्यासाठी त्यांच्या बंगल्यासमोर प्रचंड गर्दी करायचे.

अशा घरातली ही रत्ना  शाळा नंबर १२ मध्ये टांग्याने यायची. सुरेख इस्त्री केलेले तिचे फ्रॉक्स असायचे. तिच्या वडिलांचा ठाण्यात दबदबा होता.  हे सांगण्याचे कारण इतकंच की असे असतानाही तिने केलेल्या एका किरकोळ चुकीलाही बाईंनी थोडेसे हिंसक शासन केले पण तिच्या वडिलांनी शाळेत येऊन कुठल्याही प्रकारची तक्रार केली नाही. एकदा आपलं मूल शाळेत गेलं की ते शिक्षकांचं. तिथे हस्तक्षेप नसायचा हे महत्त्वाचं. त्यामुळे घर, शाळा, आजुबाजूची वस्ती ही सारीच आमची संस्कार मंदिरे होती. आम्ही सारे असे घडलो. नकळत, विना तक्रार.

१२ ते ५ अशी शाळेची वेळ होती. एक दहा मिनिटांची सुट्टी आणि एक डबा खायची सुट्टी.

सगळे वर्ग एका शेजारी एक. मध्ये भिंत नाही फक्त एक लाकडी दुभाजक असायचा.  वर्ग चालू असताना शेजारच्या वर्गातल्या बाईंचा आवाज आणि शिकवणंही ऐकू यायचं.  कुठे गणितातले पाढे, कुठे कविता पठण, कुठे उत्तर दक्षिण दिशांचा अभ्यास, कुठे बाराखड्या, तोंडी गणितं आणि अशा सगळ्या खिचडी अभ्यासातून आम्ही एकाग्र चित्ताने शिकत होतो.

“आईने आणssले चाssर पेरू.

माधवने दोन चोरून खाल्ले. किती उरलेsss?

आम्ही आमच्या हाताची चार बालबोटं उघडायचो, दोन दुमडायचो आणि एक साथ उत्तर द्यायचचो

दोssन.

मग बाई म्हणायच्या, “शाब्बास!”

आयुष्यातल्या बेरजा, वजाबाक्या, गुणाकार, भागाकार या साऱ्यांची सुरुवात जणू काही अदृश्यपणे या शाळा नंबर १२ पासूनच सुरू झाली.

आज नातीचा अभ्यास घेताना लॅपटॉप,टॅब्लेट(यास मी अधुनिक युगातली पाटी असेच म्हणते.) त्यावरचे अभ्यासक्रम, उत्तरे देण्याची पद्धत, आकर्षक पुस्तके, त्यातील रंगीत चित्रे! एकंदरच दृक् श्राव्य अभ्यासाचं बदलतं, नवं,स्वरूप बघताना मला माझी बारा नंबरची शाळा हमखास आठवते.

पण इथेच आम्ही शिकलो, वाढलो घडलो.

आजही नजरेसमोर ते फुलपाखरू बागडतं,

“फुलपाखरू छान किती दिसते फुलपाखरू ..”

नाही तर 

“देवा तुझे किती सुंदर आकाश

सुंदर प्रकाश सूर्य देतो ।”

ये ग ये ग सरी 

माझे मडके भरी 

सर आली धावून

मडके गेले वाहून 

 

सरसर गोविंदा येतो 

मजवरी गुलाल फेकि.तो…

 

झिम पोरी झिम कपाळाचा भीम

भीम गेला फुटून

पोरी आल्या उठून..

 

अडम तडम तडतड बाजा

उक्का तिक्का लेशमास

करवंद डाळिंब फुल्ला…

 

लहान माझी बाहुली

मोठी तिची सावली…

अशा  सुंदर गाण्यातून खरोखरच आमचं बालपण हसलं, बागडलं.

मला जर आज कोणी प्रश्न विचारला,” मराठी भाषेनं तुला काय दिलं तर मी नक्की सांगेन माझ्या  मराठी भाषेने मला असं सुंदर काव्यमय बालपण दिलं.”

आजही त्या शाळेतल्या दफ्तराची मला आठवण येते.  माझं दफ्तर आणि माझी आई यांच्याशी माझं एक सुंदर, भावनिक अतूट नातं आहे.

आठवणीच्या पेटीत

एक दफ्तर होतं

एक पाटी होती

दफ्तर जागोजागी

ऊसवलं होतं

पाटीही फुटली होती.

पण पाटीवरची अक्षरं

नव्हती पुसली.

कळायला लागेपर्यंत

आईने रोज

पाटी दफ्तर भरलं

वह्या पुस्तकं,खडु पेन्सीली..

आज आई नाही

पण दफ्तर आहे

पाटी फुटली

तरी अक्षरे आहेत

त्या जीर्ण दफ्तरावर आता

माझाच सुरकुतलेला

हात फिरवताना वाटतं,

हेच तर आईनं

दिलेलं संचीत.

वेळोवेळी तिने

हव्या असलेल्या गोष्टी

आत भरल्या.

नको असलेल्या काढल्या.

हळुच….ऊसवलेल्या ,

दफ्तरात डोकावून पाह्यलं,

त्यात नव्हते मानअपमान,

दु:खं ,निराशा, राग,

होतं फक्त समाधान,

आनंद….तृप्ती!!

एकेका अक्षरात ,

जपून ठेवलेला…

मानवतेचा ओलावा….

 

खरंच या साऱ्या आठवणींच्या लाटेवर मी तरंगतच राहिले की… आता थोडा ब्रेक घेऊया.

 

शाळेची घंटा घणघण वाजली

दहा मिनिटांची सुट्टी झाली…

–  क्रमशः भाग ३. 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ गुरुपौर्णिमेनिमित्त… ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? मनमंजुषेतून ?

☆ गुरुपौर्णिमेनिमित्त… ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

गुरुपौर्णिमेनिमित्त अनेकांचे संदेश आले – काही वैयक्तिक तर काही समूहांमधून. खूप बरे वाटले. व्हॅलेंटाइन दिवस, १ जानेवारीला नव वर्ष मानणे, Thanksgiving day, अशा पाश्चिमात्य रुढीत नव्या पिढीला आपल्या येथील पवित्र दिवसांची आठवण राहिली याचे निश्चितच कौतुक वाटले.
तरीही …

हो, तरीही एका गोष्टीचे निश्चितच वैषम्य वाटले.

गुरुपौर्णिमा हा पवित्र दिवस गुरूला नमस्कार करून त्याच्याकडे आशीर्वादाची याचना करण्याचा! तथापि, आलेल्या बऱ्याच संदेशांवर अजूनही पाश्चिमात्य पगडा दिसत होता. काही संदेश Happy Gurupornima असे होते तर काही गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देणारे होते; गुरूला नमस्कार किंवा वंदन करणारे संदेश तुरळकच होते.
हेच इतरही सणांच्या आणि पवित्र दिवसांच्या वेळी घडते. ज्या त्या दिवसाचे महत्त्व लक्षात घेऊन त्यानुसार उचित संदेश पाठवायला पुढच्या पिढीला शिकविणे हे आधीच्या पिढीचे कर्तव्य आहे. आपला धर्म आणि संस्कृती टिकविण्यासाठी हे अभियान अंगीकारलेच पाहिजे ना!

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ इतिहास पंढरपूर वारीचा – लेखक :अज्ञात  ☆ प्रस्तुती – सौ.अस्मिता इनामदार ☆

सौ.अस्मिता इनामदार

? इंद्रधनुष्य ?

☆  इतिहास पंढरपूर वारीचा – लेखक :अज्ञात ☆ प्रस्तुती  – सौ.अस्मिता इनामदार ☆

“…आणि म्हणून पंढरीची वारी पंढरीत !” गडबडू नका, बरोबर वाचलंत !

वर्षानुवर्षे, पिढ्यानपिढ्या चालत आलेली पंढरीची वारी कधीच चुकू नये हि वारकऱ्यांची भावना असते. अगदी जीवाचा आटापिटा करून तिथपर्यंत जाण्याची ओढ , तळमळ ! कधी एकदा पंढरीला जातो आणि पांडुरंगाचं दर्शन घेतो हि भावना मानस साद घालत असते.

वारकरी संप्रदायाच्या म्हणजे ओघानेच महाराष्ट्राच्या इतिहासात एक अभूतपूर्व घटना घडली आणि त्यामुळे वारी अर्धवट होण्याचा प्रसंग वारकऱ्यांवर ओढवला. घटना होती इसवीसन १५०८ ते १५११ दरम्यानची. विजयनगर साम्राज्याच्या राजाने पंढरपूरच्या पांडुरंगाची मूर्ती त्याच्या राज्यात अनागोंदी (सध्याचे नाव हंपी) येथे नेली. आषाढी वारीसाठी वारकरी पंढरीत दाखल झाले परंतु ज्याच्या दर्शनासाठी आपण इथवर आलो आहोत तोच पांडुरंग जागेवर नाही हे पाहून सारेजण आलाप करू लागले. परंतु राजाच्या शक्तीसमोर कोणाचे काय चालणार ? सर्व भाविकांनी पांडुरंगाचे निस्सीम भक्त श्रीसंत भानुदास महाराजांना हे कार्य पूर्ण करण्याची विनंती केली. भानुदासांच्या घराण्यात पंढरीची वारी पिढ्यानपिढ्या चालत आलेली होती. पांडुरंगाच्या दर्शनाचा ध्यास त्यांनाही होताच. त्यांनी पुढाकार घेतला आणि दर कोस दर मुक्काम करीत ते हंपीस पोचले. एके रात्री पांडुरंगाच्या मंदिराजवळ गेल्यावर सैनिकांच्या कड्या बंदोबस्तात कुलूपबंद गाभाऱ्यात पांडुरंगाची मनोहर मूर्ती विराजमान होती. दरवाजास स्पर्श करताच कुलुपे गळाली व सैनिकांना झोप लागली. भानुदास महाराज मूर्तीसमोर जाऊन उभे राहिले. म्हटले देवा, ” अरे सगळे भक्त तुझी पंढरीत वाट पाहत आहेत आणि तू येथे आलास ? तुला येथे सर्व राजोपचार प्राप्त होतील परंतु पंढरीत प्राप्त होणाऱ्या भक्तांच्या भक्ति प्रेमास तू मुकशील. चल माझ्या समवेत !” दोघांचा काही संवाद झाल्यानंतर भगवंताने आपल्या गळ्यातील तुळशीचा हार भानुदास महाराजांच्या गळ्यात घातला. बरोबरीने नवरत्नांचा एक हारही त्यांच्या गळ्यात घातला. महाराज बाहेर पडले. परिस्थिती पूर्ववत झाली. सकाळी राजा काकडआरतीस आल्यानंतर त्याच्या लक्षात आले कि देवाच्या गळ्यातील नवरत्नांचा हार गायब झाला आहे. शोधाशोध सुरु झाली. राजाने फर्मान सोडले कि, जो कोणी चोर असेल त्याला सुळावर चढवा. पहाटे तुंगभद्रा नदीच्या तीरावर भानुदास महाराज स्नान-संध्या करीत असताना त्यांच्या गळ्यात असलेला नवरत्नांचा हार चमकला. चोर सापडला या भावनेने राजाज्ञेप्रमाणे भानुदास महाराजांना सुळावर देण्याचे नियोजन झाले. परंतु चमत्कार झाला.

कोरडीये काष्ठी अंकुर फुटले ! येणे येथे झाले विठोबाचे !!

सुळाला पालवी फुटली. बातमी राजापर्यंत गेली. पांडुरंगाच्या नियोजनानुसार त्याच्या भक्ताचा छळ झाल्यास तेथे क्षणभरही राहायचे नाही याप्रमाणे पांडुरंगाने अंगुष्ठ एवढे रूप धारण केले व संत भानुदास महाराजांच्या पडशीत बसले. दोघेही पंढरीच्या दिशेने निघाले. पंढरीच्या वेशीजवळ आल्यानंतर वारकर्यांना संत भानुदास महाराजांनी पांडुरंगास आणल्याची शुभवार्ता कळली. दोघांच्याही स्वागतासाठी रथ सज्ज झाला. वारकऱ्यांचा आनंद गगनात मावेना, ” पुंडलिक वरदा हरिविठ्ठल ” च्या गजराने पंढरी दुमदुमली. वारकरी दिंडी घेऊन दोघांना घेण्यासाठी तिथपर्यंत आले. पुष्पवृष्टी झाली. स्थानिकांनी सडासारवण केले. सुवासिनींनी पायघड्या घातल्या, ओवाळले. वेशीजवळ आल्यानंतर पांडुरंगाने आपले मूळ रूप धारण केले. पांडुरंग पंढरीत आले तो दिवस होता कार्तिकी एकादशीचा ! पांडुरंगाने पुन्हा येथून बाहेर जाऊ नये यासाठी भाविकांच्या विनंतीवरून संत भानुदास महाराजांच्या हस्ते प्रदक्षिणा मार्गावरील काळ्या मारुतीची स्थापना करण्यात आली. मंदिरात गेल्यानंतर सोबत भानुदास महाराजांच्या हस्तेच पांडुरंगाची पुनर्स्थापना करण्यात आली. पांडुरंगाने भानुदास महाराजांना आशीर्वादरूपी दोन वर दिले कि, ” तुझ्या वंशात मी जन्म घेईन व तू अखंड माझ्याजवळच असशील.”  त्याप्रमाणे संत भानुदास महाराजांचे पुत्र चक्रपाणि त्यांचे पुत्र सूर्यनारायण व त्यांचे पुत्र म्हणजेच शांतिब्रम्ह संत एकनाथ महाराज होय. अर्थात संत एकनाथ महाराज हे संत भानुदास महाराजांचे पणतू होय. दुसऱ्या वरा प्रमाणे आजही संत भानुदास महाराज हे पांडुरंगाच्या जवळच आहेत. गाभाऱ्यातून बाहेर पडले कि चार खांबी मंडप लागतो. त्याच्या बाहेर पडले कि सोळा खांबांचा मंडप लागतो त्यास सोळखांबी मंडप असे संबोधण्यात येते. त्याच्या डाव्या हातास पहिली ती संत भानुदास महाराजांची समाधी होय. संत भानुदास महाराजांनी आषाढ शुद्ध १४ या तिथीस समाधी घेतली. आजही त्या ठिकाणी परंपरेने त्यांच्या वंशजांच्या हस्ते पूजाअर्चा आदींद्वारे त्यांचा समाधी सोहळा साजरा करण्यात येतो. तसेच या तिथीचे स्मरण म्हणून कार्तिकी एकादशीस रथोत्सव साजरा करण्यात येतो.

संत भानुदास महाराजांच्या भक्ती आणि कर्तृत्त्वाचे फळ म्हणजे आज पांडुरंगाचे दर्शन आपणांस पंढरीत होत आहे. म्हणूनंच आजही पंढरपूरला जाऊन आपण वारी करतो. नसता ‘हंपीची वारी’ करावी लागली असती. संत ज्ञानेश्वरादिक संतांनी पंढरीचा जो महिमा लिहिला आहे तो गाता आला नसता. संत एकनाथ व संत तुकारामांना पंढरीपर अभंग लिहिता आले नसते. धन्य ते संत भानुदास आणि धन्य त्यांची भक्ती कि ज्यांच्यामुळे आज आपण पंढरपुरात पांडुरंगाचे दर्शन घेत आहोत. आजही ज्याठिकाणी हंपीच्या विठ्ठल मंदिरात पांडुरंगास स्थापित केले होते त्या ठिकाणी गाभाऱ्यात पांडुरंग नाहीये. तेथे एक खाच दिसते कि ज्यात पांडुरंगाची मूर्ती विराजमान करण्यात आली होती.

हा इतिहास ८०% भाविकांना माहित नाहीये. 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : अस्मिता इनामदार 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ आजी आणि व्हाट्सअप : सुखांतिका की शोकांतिका ? – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) ☆

सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ आजी आणि व्हाट्सअप : सुखांतिका की शोकांतिका ? – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) 

आजीला गाव सोडून कुठेही जाण्याची इच्छा होत नसे. शेतीवाडीत तिचे मन रमत असे. मुलगा शहरात एका कंपनीत मोठ्या हुद्द्यावर होता. त्याचा अनेक दिवसांपासून आग्रह होता, “आई, इकडे येऊन रहा. सध्या शाळेला सुट्टी आहे. मुलं पण विचारत असतात आजी कधी येणार आहे.” तिलाही नातवंडांना भेटण्याची इच्छा होती. आठ दिवसांसाठी येईन असे मुलाला कळवले. रविवार असल्यामुळे सर्वजण एकत्र भेटीला म्हणून शनिवारी रात्री उशीरा आजी मुलाकडे आली.

रविवारी सकाळी उठल्यावर आजीला प्रत्येकजण वेगवेगळ्या रूममध्ये असल्याचे दिसले. मोबाईलवर स्क्रोलिंग करत लोळत पडलेली 10 वर्षांची पिंकी आजीला बघताच ‘हाय आजी’ चित्कारली. मोबाईलमध्ये डोके घालून बसलेल्या 7 वर्षाच्या पिंटूने आजीला हाय केले. आजीने दोघांनाही जवळ घेतले व नाश्त्याला काय करू असे विचारले. पिंकीने चौघांच्या व्हाट्सऍप ग्रुपवर आजीचे म्हणणे सेंड केले. झोमॅटोने मागवून घेऊया असा आईचा मेसेज आला. ‘मला सिझलर पाहिजे’ पिंट्याने मेसेज पाठवला. पिंकीने मेसेजवर बर्गरची ऑर्डर दिली. आईने सिझलर, बर्गर व त्यांच्यासाठी पोहे व शिरा यांची ऑर्डर प्लेस केली. पंधरा मिनिटांनी नाश्ता आला. सगळं कसं सुरळीत व शांतपणे पार पडल्याचं बघून आजी आश्चर्यचकित झाली.

मुलाने अमॅझॉनवरून नवीन मोबाईल मागवला. पिंकीने नवीन सिम कार्ड मोबाईलमध्ये टाकले व आजीला ग्रुपमध्ये ऍड केले. तिने आजीला मेसेज वाचणे, त्याला रिप्लाय देणे, ई.फंक्शनस समजून सांगितली. एका दिवसात आजी सर्व फंक्शन शिकली व प्ले स्टोअरमधून आवश्यक असलेली ऍप्स डाउनलोड केली. मुलाने आईची भेट घेऊन म्हटले, “आई तुला काही हवे असल्यास ग्रुपवर मेसेज टाकत जा. आम्ही सर्वजण तूझ्या सेवेला हजर आहोत.”

अशा प्रकारची पुनरावृत्ती रोजच होऊ लागली. दिवसभरात सर्वांच्या गाठीभेटी क्वचितच होत असे. खरे तर तिला मुलांच्या सहवासात राहायचे होते. परंतु सर्वजण मोबाईलवर बोलत असत म्हणून तिनेही ही सवय लावून घेतली. फारसे बोलणे नाही म्हणून वाद विवाद नाहीत, त्यामुळे आजी मनोमन सुखावली. वर्क फ्रॉम होम असल्यामुळे मुलगा व सून दिवसभर लॅपटॉपवर काम करत असत. रोज नातवंडांचे गुड मॉर्निंग, गुड नाईटचे मेसेज बघून आजी भांबावून जात असे. जसे काही नियतीने ठरवून दिल्याप्रमाणे सर्व काही यंत्रवत चाललं होतं. आठ दिवसात आजी या यांत्रिक जीवनाला कंटाळली व परत गावी जाण्याचे ठरवले.

आजीने ग्रुपवर ‘मी उद्या जाणार आहे’ असा मेसेज टाकला. सर्वांनी आजीला मोबाईलवर प्रवासाच्या शुभेच्छा दिल्या.  सुनेने आईला पुढील वेळेस आल्यावर महिनाभर रहा असा मेसेज पाठवला. मुलाने मोबाईलवर ई-तिकीट पाठवले. पिंकीने आजी सकाळी लवकर जाणार म्हणून उबेर टॅक्सी बुक केली. निघताना मुलांनी आजीच्या मोबाईलवर मेसेज पाठवला, “बाय आजी, तु गेल्यावर आम्हाला करमणार नाही. लवकर परत ये.” तत्पूर्वी पिंकीने आजीचा मोबाईल घेऊन तिचे लाईव्ह लोकेशन स्वतःच्या मोबाईलवर सेंड केले. तेच लोकेशन तिने बाबांना फॉरवर्ड केले. आजीचे मन कृतककोपाने भरून आले.

आजी निघाली म्हटल्यावर प्रथमच मुले आजीला येऊन बिलगली. आजीने आपले अश्रू आवरले. टॅक्सीत बसल्यानंतर आजीने मुलाला व सुनेला आशीर्वादाचा ईमोजी पाठवला. पिंकी आणि पिंटूला 501 रुपयांचा गुगल पे केला. टॅक्सी ड्रायव्हरला प्लॅटफॉर्म क्र. दोनच्या गेटवर सोड असा मेसेज पाठवला. मागच्या सीटवर आजीने हताशपणे डोळे मिटले. काही वेळाने ड्रायव्हरचा मेसेज टोन ऐकून आजी जागी झाली. ड्रायव्हरचा स्टेशन आल्याचा मेसेज वाचून आजी टॅक्सीच्या बाहेर आली. रेल्वे अधिकाऱ्याचा नंबर घेऊन आजीने त्याला ट्रेन नं. 2301 कधी येणार असा मेसेज पाठवला. काही वेळाने गाडी प्लॅटफॉर्म क्र दोनवर आल्याचा आजीला मेसेज आला. संध्याकाळी आजी स्टेशन बाहेर आल्यानंतर सुखरूपपणे पोहोचल्याचा मेसेज ग्रुपवर पाठवला.

घरी आल्यावर आजीने ctrl चे बटण दाबून स्वतःवर कंट्रोल केला. नंतर व्हाट्सऍप सर्चमध्ये जाऊन ‘My Life My Family’ हा ग्रुप ओपन करून डीपीवरील दोन्ही नातवंडांना डोळे भरून बघितले. सर्वांना बायचा मेसेज टाकून आजी ग्रुपमधून एक्झिट झाली. हे कसलं मोबाइलग्रस्त जीवन. कौटुंबिक गप्पा नाहीत, सुख-दुःखाच्या गोष्टी नाहीत, मुलांचा धांगडधिंगा नाही. आजीला हुंदका अनावर झाला. पतीच्या निधनानंतर आजी पहिल्यांदाच इतकं मुसमुसून रडली. ज्यांनी लिहिले त्यांनी खूप छान लिहिले. 

 या मध्ये चुकीचे कोणी आहे असे वाटते का????

लेखक : अज्ञात  

प्रस्तुती :  शुभदा भा.कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे

मो.९५९५५५७९०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ कृपेचे आभाळ… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – कृपेचे आभाळ – ? ☆श्री आशिष  बिवलकर ☆

सुंदर लोभस | सखा पांडुरंग |

जीवनात संग | श्वासापरी ||१||

*

ललाटी शीतल | चंदनाचा टिळा |

शोभे हार गळा | तुळशीचा ||२||

*

सावळा विठ्ठल | कटेवरी कर | 

उभा वीटेवर | युगे युगे ||३||

*

मकर कुंडल | कर्ण झळकती |

तेज उधळती | दिव्यत्वाचे ||४||

*

सुवर्ण मुकुट | भव्य शिरावरी |

पंढरीत हरी | वैष्णवांचा ||५||

*

कुंतल कुरळे | सावळी ही काया |

हृदयात माया  | माऊलीच्या ||६||

*

लेकरांचा करे | माऊली सांभाळ |

कृपेचे आभाळ | धरोनिया ||७||

(चित्र सौजन्य :कु.ह्रदया सखाराम उमरीकर ) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य #241 ☆ आज ज़िंदगी : कल उम्मीद… ☆ डॉ. मुक्ता ☆

डॉ. मुक्ता

(डा. मुक्ता जी हरियाणा साहित्य अकादमी की पूर्व निदेशक एवं माननीय राष्ट्रपति द्वारा सम्मानित/पुरस्कृत हैं। साप्ताहिक स्तम्भ “डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य” के माध्यम से  हम  आपको प्रत्येक शुक्रवार डॉ मुक्ता जी की उत्कृष्ट रचनाओं से रूबरू कराने का प्रयास करते हैं। आज प्रस्तुत है डॉ मुक्ता जी का  मानवीय जीवन पर आधारित एक विचारणीय आलेख आज ज़िंदगी : कल उम्मीद… । यह डॉ मुक्ता जी के जीवन के प्रति गंभीर चिंतन का दस्तावेज है। डॉ मुक्ता जी की  लेखनी को  इस गंभीर चिंतन से परिपूर्ण आलेख के लिए सादर नमन। कृपया इसे गंभीरता से आत्मसात करें।) 

☆ साप्ताहिक स्तम्भ – डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य  # 241 ☆

☆ आज ज़िंदगी : कल उम्मीद… ☆

‘ज़िंदगी वही है, जो हम आज जी लें। कल जो जीएंगे, वह उम्मीद होगी’ में निहित है… जीने का अंदाज़ अर्थात् ‘वर्तमान में जीने का सार्थक संदेश’ …क्योंकि आज सत्य है, हक़ीकत है और कल उम्मीद है, कल्पना है, स्वप्न है; जो संभावना-युक्त है। इसीलिए कहा गया है कि ‘आज का काम कल पर मत छोड़ो,’ क्योंकि ‘आज कभी जायेगा नहीं, कल कभी आयेगा नहीं।’ सो! वर्तमान श्रेष्ठ है; आज में जीना सीख लीजिए अर्थात् कल अथवा भविष्य के स्वप्न संजोने का कोई महत्व व प्रयोजन नहीं तथा वह कारग़र व उपयोगी भी नहीं है। इसलिए ‘जो भी है, बस यही एक पल है, कर ले पूरी आरज़ू’ अर्थात् भविष्य अनिश्चित है। कल क्या होगा… कोई नहीं जानता। कल की उम्मीद में अपना आज अर्थात् वर्तमान नष्ट मत कीजिए। उम्मीद पूरी न होने पर मानव केवल हैरान-परेशान ही नहीं; हताश भी हो जाता है, जिसका परिणाम सदैव निराशाजनक होता है।

हां! यदि हम इसके दूसरे पहलू पर प्रकाश डालें, तो मानव को आशा का दामन कभी नहीं छोड़ना चाहिए, क्योंकि यह वह जुनून है, जिसके बल पर वह कठिन से कठिन अर्थात् असंभव कार्य भी कर गुज़रता है। उम्मीद भविष्य में फलित होने वाली कामना है, आकांक्षा है, स्वप्न है; जिसे साकार करने के लिए मानव को निरंतर अनथक परिश्रम करना चाहिए। परिश्रम सफलता की कुंजी है तथा निराशा मानव की सफलता की राह में अवरोध उत्पन्न करती है। सो! मानव को निराशा का दामन कभी नहीं थामना चाहिए और उसका जीवन में प्रवेश निषिद्ध होना चाहिए। इच्छा, आशा, आकांक्षा…उल्लास है,  उमंग है, जीने की तरंग है– एक सिलसिला है ज़िंदगी का; जो हमारा पथ-प्रदर्शन करता है, हमारे जीवन को ऊर्जस्वित करता है…राह को कंटक-विहीन बनाता है…वह सार्थक है, सकारात्मक है और हर परिस्थिति में अनुकरणीय है।

‘जीवन में जो हम चाहते हैं, वह होता नहीं। सो! हम वह करते हैं, जो हम चाहते हैं। परंतु होता वही है, जो परमात्मा चाहता है अथवा मंज़ूरे-ख़ुदा होता है।’ फिर भी मानव सदैव जीवन में अपना इच्छित फल पाने के लिए प्रयासरत रहता है। यदि वह प्रभु में आस्था व विश्वास नहीं रखता, तो तनाव की स्थिति को प्राप्त हो जाता है। यदि वह आत्म-संतुष्ट व भविष्य के प्रति आश्वस्त रहता है, तो उसे कभी भी निराशा रूपी सागर में अवग़ाहन नहीं करना पड़ता। परंतु यदि वह भीषण, विपरीत व विषम परिस्थितियों में भी उसके अप्रत्याशित परिणामों से समझौता नहीं करता, तो वह अवसाद की स्थिति को प्राप्त हो जाता है… जहां उसे सब अजनबी-सम अर्थात् बेग़ाने ही नहीं, शत्रु नज़र आते हैं। इसके विपरीत जब वह उस परिणाम को प्रभु-प्रसाद समझ, मस्तक पर धारण कर हृदय से लगा लेता है; तो चिंता, तनाव, दु:ख आदि उसके निकट भी नहीं आ सकते। वह निश्चिंत व उन्मुक्त भाव से अपना जीवन बसर करता है और सदैव अलौकिक आनंद की स्थिति में रहता है…अर्थात् अपेक्षा के भाव से मुक्त, आत्मलीन व आत्म-मुग्ध।

हां! ऐसा व्यक्ति किसी के प्रति उपेक्षा भाव नहीं रखता … सदैव प्रसन्न व आत्म-संतुष्ट रहता है, उसे जीवन में कोई भी अभाव नहीं खलता और उस संतोषी जीव का सानिध्य हर व्यक्ति प्राप्त करना चाहता है। उसकी ‘औरा’ दूसरों को खूब प्रभावित व प्रेरित करती है। इसलिए व्यक्ति को सदैव निष्काम कर्म करने चाहिए, क्योंकि फल तो हमारे हाथ में है नहीं। ‘जब परिणाम प्रभु के हाथ में है, तो कल व फल की चिंता क्यों?

वह सृष्टि-नियंता तो हमारे भूत-भविष्य, हित- अहित, खुशी-ग़म व लाभ-हानि के बारे में हमसे बेहतर जानता है। चिंता चिता समान है तथा चिंता व कायरता में विशेष अंतर नहीं अर्थात् कायरता का दूसरा नाम ही चिंता है। यह वह मार्ग है, जो मानव को मृत्यु के मार्ग तक सुविधा-पूर्वक ले जाता है। ऐसा व्यक्ति सदैव उधेड़बुन में मग्न रहता है…विभिन्न प्रकार की संभावनाओं व कल्पनाओं में खोया, सपनों के महल बनाता-तोड़ता रहता है और वह चिंता रूपी दलदल से लाख चाहने पर भी निज़ात नहीं पा सकता। दूसरे शब्दों में वह स्थिति चक्रव्यूह के समान है; जिसे भेदना मानव के वश की बात नहीं। इसलिए कहा गया है कि ‘आप अपने नेत्रों का प्रयोग संभावनाएं तलाशने के लिए करें; समस्याओं का चिंतन-मनन करने के लिए नहीं, क्योंकि समस्याएं तो बिन बुलाए मेहमान की भांति किसी पल भी दस्तक दे सकती हैं।’ सो! उन्हें दूर से सलाम कीजिए, अन्यथा वे ऊन के उलझे धागों की भांति आपको भी उलझा कर अथवा भंवर में फंसा कर रख देंगी और आप उन समस्याओं से मुक्ति पाने के लिए छटपटाते व संभावनाओं को तलाशते रह जायेंगे।

सो! समस्याओं से मुक्ति पाने के लिए संभावनाओं की दरक़ार है। हर समस्या के समाधान के केवल दो विकल्प ही नहीं होते… अन्य विकल्पों पर दृष्टिपात करने व अपनाने से समाधान अवश्य निकल आता है और आप चिंता-मुक्त हो जाते हैं। चिंता को कायरता का पर्यायवाची कहना भी उचित है, क्योंकि कायर व्यक्ति केवल चिंता करता है, जिससे उसके सोचने-समझने की शक्ति कुंठित हो जाती है तथा उसकी बुद्धि पर ज़ंग लग जाता है। इस मनोदशा में वह उचित निर्णय लेने की स्थिति में न होने के कारण ग़लत निर्णय ले बैठता है। सो! वह दूसरे की सलाह मानने को भी तत्पर नहीं होता, क्योंकि सब उसे शत्रु-सम भासते हैं। वह स्वयं को सर्वश्रेष्ठ समझता है तथा किसी अन्य पर विश्वास नहीं करता। ऐसा व्यक्ति पूरे परिवार व समाज के लिए मुसीबत बन जाता है और गुस्सा हर पल उसकी नाक पर धरा रहता है। उस पर किसी की बातों का प्रभाव नहीं पड़ता, क्योंकि वह सदैव अपनी बात को उचित स्वीकार कारग़र सिद्ध करने में प्रयासरत रहता है।

‘दुनिया की सबसे अच्छी किताब हम स्वयं हैं… ख़ुद को समझ लीजिए; सब समस्याओं का अंत स्वत: हो जाएगा।’ ऐसा व्यक्ति दूसरे की बातों व नसीहतों को अनुपयोगी व अनर्गल प्रलाप तथा अपने निर्णय को सर्वदा उचित उपयोगी व श्रेष्ठ ठहराता है। वह इस तथ्य को स्वीकारने को कभी भी तत्पर नहीं होता कि दुनिया में सबसे अच्छा है–आत्मावलोकन करना; अपने अंतर्मन में झांक कर आत्मदोष-दर्शन व उनसे मुक्ति पाने के प्रयास करना तथा इन्हें जीवन में धारण करने से मानव का आत्म-साक्षात्कार हो जाता है और तदुपरांत दुष्प्रवृत्तियों का स्वत: शमन हो जाता है; हृदय सात्विक हो जाता है और उसे पूरे विश्व में चहुं और अच्छा ही अच्छा दिखाई पड़ने लगता है… ईर्ष्या-द्वेष आदि भाव उससे कोसों दूर जाकर पनाह पाते हैं। उस स्थिति में हम सबके तथा सब हमारे नज़र आने लगते हैं।

इस संदर्भ में हमें इस तथ्य को समझना व इस संदेश को आत्मसात् करना होगा कि ‘छोटी सोच शंका को जन्म देती है और बड़ी सोच समाधान को … जिसके लिए सुनना व सीखना अत्यंत आवश्यक है।’ यदि आपने सहना सीख लिया, तो रहना भी सीख जाओगे। जीवन में सब्र व सच्चाई ऐसी सवारी हैं, जो अपने शह सवार को कभी भी गिरने नहीं देती… न किसी की नज़रों में, न ही किसी के कदमों में। सो! मौन रहने का अभ्यास कीजिए तथा तुरंत प्रतिक्रिया देने की बुरी आदत को त्याग दीजिए। इसलिए सहनशील बनिए; सब्र स्वत: प्रकट हो जाएगा तथा सहनशीलता के जीवन में पदार्पण होते ही आपके कदम सत्य की राह की ओर बढ़ने लगेंगे। सत्य की राह सदैव कल्याणकारी होती है तथा उससे सबका मंगल ही मंगल होता है। सत्यवादी व्यक्ति सदैव आत्म-विश्वासी तथा दृढ़-प्रतिज्ञ होता है और उसे कभी भी, किसी के सम्मुख झुकना नहीं पड़ता। वह कर्त्तव्यनिष्ठ और आत्मनिर्भर होता है और प्रत्येक कार्य को श्रेष्ठता से अंजाम देकर सदैव सफलता ही अर्जित करता है।

‘कोहरे से ढकी भोर में, जब कोई रास्ता दिखाई न दे रहा हो, तो बहुत दूर देखने की कोशिश करना व्यर्थ है।’ धीरे-धीरे एक-एक कदम बढ़ाते चलो; रास्ता खुलता चला जाएगा’ अर्थात् जब जीवन में अंधकार के घने काले बादल छा जाएं और मानव निराशा के कुहासे से घिर जाए; उस स्थिति में एक-एक कदम बढ़ाना कारग़र है। उस विकट परिस्थिति में आपके कदम लड़खड़ा अथवा डगमगा तो सकते हैं; परंतु आप गिर नहीं सकते। सो! निरंतर आगे बढ़ते रहिए…एक दिन मंज़िल पलक-पांवड़े बिछाए आपका स्वागत अवश्य करेगी। हां! एक शर्त है कि आपको थक-हार कर बैठना नहीं है। मुझे स्मरण हो रही हैं, स्वामी विवेकानंद जी की पंक्तियां…’उठो, जागो और तब तक मत रुको, जब तक तुम्हें लक्ष्य की प्राप्ति न हो जाए।’ यह पंक्तियां पूर्णत: सार्थक व अनुकरणीय हैं। यहां मैं उनके एक अन्य प्रेरक प्रसंग पर प्रकाश डालना चाहूंगी – ‘एक विचार लें। उसे अपने जीवन में धारण करें; उसके बारे में सोचें, सपना देखें तथा उस विचार पर ही नज़र रखें। मस्तिष्क, मांसपेशियों, नसों व आपके शरीर के हर हिस्से को उस विचार से भरे रखें और अन्य हर विचार को छोड़ दें… सफलता प्राप्ति का यही सर्वश्रेष्ठ मार्ग है।’ सो! उनका एक-एक शब्द प्रेरणास्पद होता है, जो मानव को ऊर्जस्वित करता है और जो भी इस राह का अनुसरण करता है; उसका सफल होना नि:संदेह नि:शंक है; निश्चित है; अवश्यंभावी है।

हां! आवश्यकता है—वर्तमान में जीने की, क्योंकि वर्तमान में किया गया हर प्रयास हमारे भविष्य का निर्माता है। जितनी लगन व निष्ठा के साथ आप अपना कार्य संपन्न करते हैं; पूर्ण तल्लीनता व पुरुषार्थ से प्रवेश कर आकंठ डूब जाते हैं तथा अपने मनोमस्तिष्क में किसी दूसरे विचार के प्रवेश को निषिद्ध रखते हैं; आपका अपनी मंज़िल पर परचम लहराना निश्चित हो जाता है। इस तथ्य से तो आप सब भली-भांति अवगत होंगे कि ‘क़ाबिले तारीफ़’ होने के लिए ‘वाकिफ़-ए-तकलीफ़’ होना पड़ता है। जिस दिन आप निश्चय कर लेते हैं कि आप विषम परिस्थितियों में किसी के सम्मुख पराजय स्वीकार नहीं करेंगे और अंतिम सांस तक प्रयासरत रहेंगे; तो मंज़िल पलक-पांवड़े बिछाए आपकी प्रतीक्षा करती है, क्योंकि यही है… सफलता प्राप्ति का सर्वोत्तम मार्ग। परंतु विपत्ति में अपना सहारा ख़ुद न बनना व दूसरों से सहायता की अपेक्षा करना, करुणा की भीख मांगने के समान है। सो! विपत्ति में अपना सहारा स्वयं बनना श्रेयस्कर है और दूसरों से सहायता व सहयोग की उम्मीद रखना स्वयं को छलना है, क्योंकि वह व्यर्थ की आस बंधाता है। यदि आप दूसरों पर विश्वास करके अपनी राह से भटक जाते हैं और अपनी आंतरिक शक्ति व ऊर्जा पर भरोसा करना छोड़ देते हैं, तो आपको असफलता को स्वीकारना ही पड़ता है। उस स्थिति में आपके पास प्रायश्चित करने के अतिरिक्त अन्य कोई भी विकल्प शेष रहता ही नहीं।

सो! दूसरों से अपेक्षा करना महान् मूर्खता है, क्योंकि सच्चे मित्र बहुत कम होते हैं। अक्सर लोग विभिन्न सीढ़ियों का उपयोग करते हैं… कोई प्रशंसा रूपी शस्त्र से प्रहार करता है, तो अन्य निंदक बन आपको पथ-विचलित करता है। दोनों स्थितियां कष्टकर हैं और उनमें हानि भी केवल आपकी होती है। सो! स्थितप्रज्ञ बनिए; व्यर्थ के प्रशंसा रूपी प्रलोभनों में मत भटकिए और निंदा से विचलित मत होइए। इसलिये ‘प्रशंसा में अटकिए मत और निंदा से भटकिए मत।’ सो! हर परिस्थिति में सम रहना मानव के लिए श्रेयस्कर है। आत्मविश्वास व दृढ़-संकल्प रूपी बैसाखियों से आपदाओं का सामना करने व अदम्य साहस जुटाने पर ही सफलता आपके सम्मुख सदैव नत-मस्तक रहेगी। सो! ‘आज ज़िंदगी है और कल अर्थात् भविष्य उम्मीद है… जो अनिश्चित है; जिसमें सफलता-असफलता दोनों भाव निहित हैं।’ सो! यह आप पर निर्भर करता है कि आपको किस राह पर अग्रसर होना चाहते हैं।

© डा. मुक्ता

माननीय राष्ट्रपति द्वारा पुरस्कृत, पूर्व निदेशक, हरियाणा साहित्य अकादमी

संपर्क – #239,सेक्टर-45, गुरुग्राम-122003 ईमेल: drmukta51@gmail.com, मो• न•…8588801878

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिंदी साहित्य – कविता ☆ माँ !! ☆ श्री आशीष गौड़ ☆

श्री आशीष गौड़

सुप्रसिद्ध साहित्यकार श्री आशीष गौड़ जी का साहित्यिक परिचय श्री आशीष जी के  ही शब्दों में “मुझे हिंदी साहित्य, हिंदी कविता और अंग्रेजी साहित्य पढ़ने का शौक है। मेरी पढ़ने की रुचि भारतीय और वैश्विक इतिहास, साहित्य और सिनेमा में है। मैं हिंदी कविता और हिंदी लघु कथाएँ लिखता हूँ। मैं अपने ब्लॉग से जुड़ा हुआ हूँ जहाँ मैं विभिन्न विषयों पर अपने हिंदी और अंग्रेजी निबंध और कविताएं रिकॉर्ड करता हूँ। मैंने 2019 में हिंदी कविता पर अपनी पहली और एकमात्र पुस्तक सर्द शब सुलगते  ख़्वाब प्रकाशित की है। आप मुझे प्रतिलिपि और कविशाला की वेबसाइट पर पढ़ सकते हैं। मैंने हाल ही में पॉडकास्ट करना भी शुरू किया है। आप मुझे मेरे इंस्टाग्राम हैंडल पर भी फॉलो कर सकते हैं।”

आज प्रस्तुत है एक विचारणीय एवं हृदयस्पर्शी कविता माँ !!

☆ कविता ☆ माँ !! ☆ श्री आशीष गौड़ ☆

मुझे बचपन का बहुत कुछ याद नहीं पड़ता।

उस पल का तो कुछ भी नहीं, जब मैं गर्भ में था ॥

 

कष्ट, डर, भूख और याद

अनुभूति की इन्ही विधाओं से मैंने तुम्हें पहली बार जाना था।

 

कुछ और पलों को, मैंने संभावनाओं और आकांक्षाओं वाले कमरे में जिए।

उसी कमरे के दाहिने वाले दरवाज़े से बाहर सड़क शहर जाती थी ॥

 

कुछ कुछ याद है, तब का जब मैं पहली बार घर छोड़ रहा था।

याद नहीं की मैंने पूछा नहीं या तुमने बताया नहीं, की अब घर छूट रहा था ॥

 

विस्थापन सदा सुखद नहीं रहते।

नहीं याद मुझे की मेरे जाने के बाद, तुमने मुझे कितने पलों तक वहीं से देखा था ॥

 

वही मुँडेर जहाँ से मैं कूद नहीं पाता था, उसी को लांघते देख तुमने मुझे विदा किया था ॥

 

 – २ –

 

अनंत में शून्य से इस शहर में,

इकाई से शुरू हुए जीवन में,

टाइम मशीन मेरे साल निगलती रही ॥

 

तुम आती रही, जब जब मैंने बुलाया।

तब भी, जब जब तुम्हें आना था ॥

 

माँ तुम्हारे सुनहरे होते बालों में

एक आज, मुझे दो कल सा प्रतीत होता था ॥

 

मेरे बच्चों को बड़ा किया

पर मैं ना देख पाया बचपन उनका, जैसे नहीं जानता था मैं बचपन मेरा ॥

 

मैंने नहीं देखे मेरे खिलौने

जैसे नहीं देखी, मैंने तुम्हारी भी डिग्रियाँ ॥

 

मेरे जीवन की त्रासदी यह होगी, कि मैं तुम्हें बूढ़ा होते देख रहा हूँ।

जैसे इस सभ्यता की एक त्रासदी यह,

कि  गाँव से विस्थापन ने, माँ को गाँव और बेटों को शहर कर दिया ॥

 

अब जब तुम यहाँ नहीं होती

तब भी रहती हो तुम थोड़ा थोड़ा,गाँव से लाए गए बर्तन बिस्तरों में।

दिखती हो तुम हमेशा, दीवार पर टंगी मेरा बचपन ढोती तस्वीरों में ॥

 

©  श्री आशीष गौड़

वर्डप्रेसब्लॉग : https://ashishinkblog.wordpress.com

पॉडकास्ट हैंडल :  https://open.spotify.com/show/6lgLeVQ995MoLPbvT8SvCE

https://www.instagram.com/rockfordashish/

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – पुस्तक समीक्षा ☆ संजय दृष्टि – कुएँ का पानी (काव्य संग्रह) – कवयित्री – अपर्णा कडसकर ☆ समीक्षक – श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। आज से प्रत्येक शुक्रवार हम आपके लिए श्री संजय भारद्वाज जी द्वारा उनकी चुनिंदा पुस्तकों पर समीक्षा प्रस्तुत करने का प्रयास करेंगे।)

? संजय दृष्टि –  समीक्षा का शुक्रवार # 5 ?

?कुएँ का पानी (काव्य संग्रह) – कवयित्री – अपर्णा कडसकर ?  समीक्षक – श्री संजय भारद्वाज ?

पुस्तक का नाम – कुएँ का पानी

विधा – कविता

कवयित्री – अपर्णा कडसकर

प्रकाशन – क्षितिज प्रकाशन, पुणे

 

? अंतस से उपजी ‘इनबिल्ट’ कविताओं का संग्रह  श्री संजय भारद्वाज ?

सेतु का जन्म

पहले हृदय में होता है,

बाद में ही हो सकता है

प्रत्यक्ष निर्माण!

कविता मानवता का सेतु है। इस सेतु के जन्म की पृष्ठभूमि को अभिव्यक्त करने के लिए उपरोक्त पंक्तियाँ सार्थक हैं। कोरी लफ़्फ़ाज़ी नहीं होती कविता। सच्ची कविता को पहले जीना पड़ता है, तब जाकर काग़ज़ पर उतरी शब्द-लहरी, सेतु बना पाती है। समाज की सोच को वही कविता प्रभावित कर सकती है जो भीतर से जन्मती है। कवयित्री अपर्णा कडसकर की सोच और कलम में कविता ‘इनबिल्ट’ है। यह इनबिल्ट प्रस्तुत कविता संग्रह ‘कुएँ का पानी’ में यत्र-तत्र-सर्वत्र दिखाई देता है।

यद्यपि कवयित्री कहती है,‘मुझे नहीं, मेरी कविता को जानो’ पर कविता को जानना, कवि को जानना होता है। व्यक्तित्व का परिचय हैं शब्द। भीतर और बाहर अंतर हो तो अंतस से नहीं उपजती कविता। जो कविता कवि के अंतस से नहीं उपजती, वह पाठक के अंतस को बेधती भी नहीं। कृत्रिम रूप से शब्दों की जुगत द्वारा हिज्जों की मदद से खड़ी कर भी ली जाए कविता तो ऐसी कृति संकर प्रजाति के फल-सी होती है, सुडौल, चटक पर बेस्वाद।

कविता, विशेषकर अतुकांत कविता में चमत्कृत करने की क्षमता होती है। घने बादलों की मूसलाधार बारिश के बाद सहसा इंद्रधनुष-सा प्रकट होता है कवित्व। यही चमत्कारी कवित्व अपर्णा की कुछ रचनाओं में दृष्टिगोचर होता है। यथा-

दुनिया कभी सर पे बिठा लेती है,

कभी ज़मीन पर पटक देती है,

लेकिन दुनिया छोड़ कर

कोई नहीं जाना चाहता,

…तुम मेरी दुनिया हो!

रचना की अंतिम पंक्ति काव्य का रस है। यह पंक्ति न केवल चमत्कृत करती है वरन रचनाधर्मी की बहुआयामी प्रतिभा को भी प्रकट करती है। प्रत्येक पाठक, अपने अनुभव जगत के आधार पर इस पंक्ति में अपने जीवन-दर्शन का दर्शन कर सकता है।

कविता का आलेख आरोही होना चाहिए। वैचारिक उधेड़बुन को मथकर नवनीत निकालने की इच्छा रखने वाले कवि की कविता अपनी यात्रा की दिशा, मार्ग और गंतव्य को लेकर स्पष्ट होती है। यह स्पष्ट-भाव रचना को उत्कर्ष पर ले जाता है। बानगी स्वरूप एक रचना का आरंभ बिंदु देखिए-

मुझे पता नहीं था

कोई आसमान होता है!…

इसी कविता का उत्कर्ष देखिए-

मुझे पता नहीं था

ऐसे भी कोई आसमान होता है!

कवयित्री अपने समय की साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक स्थितियों में दख़ल रखती हैं। बिकाऊ विषयों विशेषकर स्त्री की दैहिकता को विषय बनाकर चर्चित होने की वृत्ति हो या इसके ठीक उलट स्त्री की सहज स्वतंत्रता को स्वच्छंदता निरूपित करने की मानसिकता हो, समाज की विभिन्न प्रकार की सोच के कटाक्ष झेलती कविता, कटाक्ष से ही प्रखर उत्तर देती है-

नहीं होगी मेरी कविता में

पुरुषों से अधिक बुद्धिमत्ता,

……….

स्त्री के लिए तथाकथित

अशोभनीय, अकल्पित,

असराहनीय, असाहित्यिक,

और हाँ अपौरुषेय कुछ भी,

नहीं मिलेगा कोई चिह्न

मेरे मनुष्य होने का,

नहीं होगी कविता बदनाम

 ….निश्चिंत रहो!

बदले काल में भी  लड़की  की ‘पौरुषेय’ परिभाषा को धता बताती लड़कियों में कवयित्री अपना प्रतिबिम्ब देखती हैं-

मुझे पसंद हैं लडकियाँ ,

थोड़ा डर-डरके ही सही

जो जीती हैं

मस्त, मज़ेदार ज़िंदगी

खुद के साथ,

अलग स्वतंत्र दुनिया में

बिलकुल मेरे जैसी…!

हिंदी आंदोलन परिवार में हमने एक सूत्र दिया है- ‘ जो बाँचेगा-वही रचेगा, जो रचेगा-वही बचेगा।’ रचने के लिए अनिवार्य है बाँचना। पुस्तकों से लेकर मनुष्य और मनुष्येतर जो कुछ है, उसे भी बाँचना। यह वाचन कवयित्री के सृजन में परिलक्षित होती है। यही कारण है कि चंद्रकांत देवल की पुस्तक से माधवी को जानकर उस पर आधारित कविताएँ हों, परवीन शाकिर से प्रेरित रचनाएँ हों, अमृता प्रीतम के प्रेम को समझने का प्रयास हो, अरुणा शानबाग की अमानवीय त्रासदी हो, स्त्री की वेदना और चेतना के विविध स्वर हों, साहित्यिक जगत के आडम्बर हों, किन्नरों के प्रश्न हों, पर्यावरण विमर्श हो, प्रेम के रंग हों, कल्पना हो या यथार्थ, निराशा हो या जिजीविषा, सभी कुछ अपर्णा कडसकर के कवित्व की परिधि में आता है। माधवी के संदर्भ में स्थापित मूल्यों की दारुण शोकांतिका द्रष्टव्य है-

निष्काम स्त्रियों को

यही फल मिलता है कि

वे निर्फल रह जाती हैं..!

अपर्णा कडसकर की यह पहली पुस्तक है। पुस्तकों की संख्या मायने नहीं रखती। शिल्प में सुघड़ता, भाव में अबोधता और कहन में परिपक्वता हो तो प्रश्नों के बीच प्रसूत होती कविता, प्रश्नों का उत्तर बन जाती है, औरत की तरह। बस इन उत्तरों को पढ़ने, समझने की व्यापक दृष्टि पाठक में होनी चाहिए। बकौल कवयित्री-

प्रश्नोें के बीच ही

पैदा होती हैं औरतें,

औरतों को पता  होते हैं

उनके जवाब,

बस वे जवाब नहीं देती!

साहित्यिक जगत में अपर्णा कडसकर की उम्मीद जगाती कविताओं का स्वागत है। अनेकानेक शुभकामनाएँ।

© संजय भारद्वाज  

नाटककार-निर्देशक

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय, एस.एन.डी.टी. महिला विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares