मराठी साहित्य – जीवनरंग ☆ जॉब… — लेखिका : सुश्री गीता गरुड ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

सौ.शशी.नाडकर्णी-नाईक

? जीवनरंग ?

☆ जॉब… — लेखिका : सुश्री गीता गरुड ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

“वहिनी,माझ्या आईला तू उलट कशी बोलू शकतेस?”

नणंद रेश्मा आईचा कैवार घेत मालतीशी भांडायला अगदी अर्ध्या दिवसाची रजा टाकून आली होती. 

उन्हातून आली म्हणून मालतीने तिला माठातलं गार पाणी दिलं. 

“आज लवकर सुटलं ऑफीस?” मालतीनं विचारलं

“हे असं आमच्याशी गोडगोड बोलतेस नि आमच्या अपरोक्ष आमच्या आईला..अगदी पोरक्यासारखी वागणूक देतेस. बरोबर ना.”

जीजी डोळ्याला पदर लावून बसली. “बघ बाई आता तुच काय ते. तू झालीस तेंव्हा दुसरीपण पोरगीच झाली म्हणून हिणवलं सासूसासऱ्यांनी पण तुम्हा लेकींनाच गं माझी कणव.”

“आई,तू अजिबात रडू नकोस. तुझी लेक जीवंत आहे अजून. खडसावून जाब विचारते की नाही बघ. कुणाचं मिंध रहायची गरज नाही तुला. पेंशन आहे चालू तुझी. यांच्या जीवावर नाही जगत तू.” भरल्या गळ्याने रेश्मा आईचे डोळे पुसत म्हणाली.

“आत्या काय चाललय तुझं. खालपर्यंत आवाज येतोय,” नुकतीच  घरात पाऊल टाकत असलेली किमया आत्याजवळ आपली स्याक ठेवत म्हणाली. 

“या पोरीला माझा आवाज सहन होत नाही गं रेशम. आता तुझाही सहन होत नाहीए बघ.”जीजी असं म्हणत परत रडू लागली.

“एक मिनिट. हे काय चाललंय आणि आत्तू तू माझ्या आईवर का कावत होतीस मगाशी? पहाटे उठल्यापासनं आई घरात वावरतेय. एकतर कामवालीही मिळत नाहीए हल्लीच्या काळात. मिळाली होती एक धुणी धुवायला पण आजी रोज आपली चादर धुवायला टाकू लागली,कधीकधीच्या कपाटातल्या साड्या काढून तिला धू म्हणून सांगू लागली. ती बिचारी मावशी पळून गेली नंतर पोळ्या करायला बाई लावली तर तिच्या खनपटी बसू लागली..इतक्याच पातळ हव्या,एकसारख्या हव्या..तीही परागंदा झाली. 

डॉक्टर म्हणतात,आजीला अल्झायमर झालाय. गोळ्या चालू केल्यात पण ही कधी घेते,कधी खिडकीतून फेकून देते. त्यादिवशी कुंडीतही सापडल्या हिच्या गोळ्या. कुठेही नाक शिंकरते,थुंकते..ते सगळं आई स्वच्छ करतेय. हल्ली तर अंथरुणातही..पण हे सारं एका शब्दाने आई बोलली का तुला!नाही नं. का तर तुला त्रास होईल. तू तुझ्या घरी सुखी रहावस म्हणून. 

हल्ली ऐकूही कमी येऊ लागलय आजीला. डॉक्टर म्हणाले,आता या वयात ऑपरेशन नको. ही मोठमोठ्याने बोलते. मोठ्या आवाजात टिव्ही लावते. दोन खोल्यांचं घर आमचं. कसं अभ्यासात लक्ष लागणार गं आत्तू! तरी आई मला हिला काही बोलू देत नाही. तूच लायब्ररीत जाऊन अभ्यास कर म्हणून सांगते. 

आजीला तेलकट कमी द्यायला स़ागितलय म्हणून घरात सगळ्यांनाच कमी तेलाचं,थोडसं अळणी स्वैंपाक  का तर आजीला वाटू नये की आम्ही तिला टाकून चांगलंचुंगलं करुन खातोय. आजीचा मधुमेह वाढलाय म्हणून आजीसोबत आमचं सर्वांच गोडधोड बंद का तर तिला टाकून कसं खायचं! 

आत्तू, माझी आई घरात रहाते म्हणून आजवर तुम्ही तिला ग्रुहित धरीत आलात. उन्हाळ्याची सुट्टी पडली की खुशाल तुझी नि मोठ्या आत्तुची मुलं आमच्याकडे. का तर मालतीवहिनी घरातच तर असते. घरात कसलं डोंबलाचं काम असतं एवढं.. नुसत्या झोपाच तर काढते!”

“किमया”..कपडे धुऊन ते वाळत घालण्यासाठी पिळे भरलेली बादली घेऊन आलेल्या मालतीने लेकीला दटावलं. 

“आई, मी कधी आत्याच्या घरी रहायला गेली की आत्या असंच बोलायची तुझ्याबद्दल. घरात तर असते. अरे,हौस होती का माझ्या आईला घरी रहायची? तुमच्याइतकीच शिकलेली ती पण आजीने मला सांभाळण्यास नकार दिला होता. मला पाळणाघरात ठेवायचं नाही असंही बजावलं होतं..खिंडीतच पकडलं होतं तिला. राहिली मग ती घरात. घरी शिकवण्या घेऊ लागली तर तेही आवडत नसायचं आजीला. मुलांना शिकवायला बसली की काहीतरी कामं सांगून उठवायची. मुलांच्या आया मुलांना पाठवेनाशा झाल्या. 

काही माणसं नं फक्त ऐकून घेण्यासाठीच जन्माला आलेली असतात त्यातलीच माझी आई. मला आठवतं,एकदा मावशीकडे मुंजीला जायचं होतं आईला आणि आईचा कैरीहार आजीने दडवून ठेवला. आई शोधूनशोधून रडकुंडीला आली. बाबाही तापले होते तिच्यावर. आजीला कोण हसू येत होतं. मला फाइव्हस्टॉर चॉकलेटसाठी पैसे देऊन माझं तोंड गप्प केलं होतं तिने तरी मी रात्री आईला आजीची करामत सांगितलीच. बाबा संतापले होते. तिला जाब विचारायला उठले तर आईनेच त्यांना शांत झोपायला लावलं होतं. 

आताशी आजी फार चिडचिड करते.  वाढलेलं ताट भिरकावून देते. आत्तू, खरंच माझी आई वाईट आहे असं धरुन चालुया आपण. तू घेऊन जा तुझ्या आईला. उगा या छळवादात नको ठेवूस तुझ्या माऊलीस.”किमयाने आत्यापुढे हात जोडले. 

“न्हेलं असतं गं पण..अतुलची फायनल एक्झाम आहे ना.  आणि आमचं घर पडलं खाडीजलळ. तिथली हवा सहन होणार नाही तिला.”

“बरं मग..”

“मग काय निघतेच मी. बराच वेळ झाला येऊन.”

तेवढ्यात किचनमधून मालतीने आवाज दिला. वन्सं,आमटी केलीय चिंचगुळाची तुमच्या आवडीची नि नाचणीचे पापड तळतेय. एकत्रच बसू जेवायला. तुमचं चर्चासत्र संपलं तर हात धुवून घ्या. मी पानं वाढते. 

“वहिनी,तुझं गं पान कुठेय?”

“आत्तु,हल्ली आजी नीट जेवत नाही ना म्हणून आई तिला कधीच्या जुन्या गोष्टी सांगत भरवते. चार घास जास्त जातात तिचे.” 

रेश्माच्या डोळ्यात पाणी आलं. 

“अहं,आत्तू,भरल्या पानावर डोळ्यात पाणी आणू नाही,”आईच म्हणते असं. आत्तुचे डोळे पुसत किमया म्हणाली. कधीतरीची गोड आठवण सांगत सासूला घास भरवणाऱ्या आपल्या वहिनीकडे पाहून जेवणाआधीच त्या माहेरवाशिणीचं मन समाधानाने भरुन पावलं.

रेश्मा जायला निघाली तेंव्हा मालतीने तिला गुळपापडीचा डबा दिला. रेश्माला अजब वाटत होतं..कधीच उलट न बोलणारी आपली भाची आपल्याला आज एवढं का बरं सुनावत होती याचं.  किमया तिला खाली सोडायला गेली..तिचा हात धरुन म्हणाली,”सॉरी आत्तू,आज जरा जास्तच बोलले तुला पण..”

“पण..काय?”

“अगं महिना झाला आईच्या अंगावर जातय. माझी परीक्षा चालू म्हणून कोणालाच बोलली नाही ती. आठ दिवसांपूर्वी चक्कर येऊन पडली. डॉक्टरकडे न्हेलं. त्यांनी स्त्रीरोगतज्ञांची चिठ्ठी दिली. तिथे सगळ्या तपासण्या झाल्या. रिपोर्टस आलेत. गर्भाशयात ट्यूमर आहे. मला आजीचा राग येतोय. हीच तिला सणावाराला गोळ्या घेऊन पाळी पुढेमागे ढकलायला लावायची. माझ्या लेकी यायच्यात. तू बाहेरची झालीस तर त्यांचं कोण करणार..देवाचं कोण करणार? आता माझ्या आईचं कोण करणार गं आत्तु?”

रेश्मा आपल्या भाचीकडे पहात राहिली. एक लेक तिच्या आईबद्दल जाब विचारायला आली होती. जाताना एक लेक तिला जाब विचारत होती!

लेखिका : सुश्री गीता गरुड

प्रस्तुती : सौ.शशी.नाडकर्णी-नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ टेनिस विश्वाचा अनभिषिक्त सम्राट रॉजर फेडरर… – लेखिका : नीलांबरी जोशी ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

? इंद्रधनुष्य ?

☆ टेनिस विश्वाचा अनभिषिक्त सम्राट रॉजर फेडरर… – लेखिका : नीलांबरी जोशी ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

टेनिस विश्वाचा अनभिषिक्त सम्राट रॉजर फेडरर

– आणि त्याने सांगितलेले  “तीन टेकअवेज

टेनिस विश्वाचा अनभिषिक्त सम्राट रॉजर फेडररला Dartmouth College नं सन्माननीय डॉक्टरेट दिल्यानंतर त्यानं केलेलं भाषण प्रचंड गाजतं आहे.. फेडररचं भाषण प्रेरणादायी होतंच. पण उत्कृष्ट भाषण कसं असावं याचा नमुना म्हणून ते इतिहासात अजरामर ठरेल याचं कारण म्हणजे प्रत्येक माणसासाठी ते उपयोगी आहे.

आपल्या सुमारे २५ मिनिटांच्या भाषणात त्यानं आजच्या भाषेत बोलायचं तर “तीन टेकअवेज” सांगितले आहेत. 

१. Effortless is a myth 

एफर्टलेस – एखादी गोष्ट लीलया करणं, ती सहजगत्या अवगत असणं ही केवळ दंतकथा आहे. केवळ एखाद्याकडे टॅलेंट आहे म्हणून त्याला / तिला ते जमतं असं कधीच नसतं. अनेक वर्षांचे परिश्रम त्यामागे असतात. लोक म्हणतात मी लीलया खेळतो. त्यांना माझं कौतुकच करायचं असतं. मात्र “तो किती सहजगत्या खेळतो” हे सारखं ऐकून मी वैतागायचो. खरं तर मला प्रचंड मेहनत करावी लागत होती. मी अनेक वर्षं रडगाणं गायलो, चिडचिड केली, रागानं रॅकेट फेकून दिली आणि मग मी शांत रहायला शिकलो. मी इथपर्यंत केवळ टॅलेंटवर पोचलेलो नाही. माझ्या प्रतिस्पर्ध्यांच्या खेळापेक्षा चांगला खेळ करण्याचा अविरत प्रयत्न करुन मी इथवर पोचलो.

२. It’s only a point

आपण खेळलेल्या १५२६ सिंगल मॅचेसपैकी फेडरर ८० टक्के मॅचेस जिंकला. मात्र पॉईंटस ५४ टक्केच जिंकला.. म्हणजे सर्वोच्च स्थानावरचे टेनिस खेळाडूदेखील निम्मे पॉईंटस गमावतात.. तेव्हा तुम्ही It’s only a point असा विचार करायला स्वत:ला शिकवायला हवं. आयुष्याच्या खेळात सतत आपण असे पॉईंटस गमावत असतो. मात्र तुमचा सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला नकारात्मक गोष्टींवर मात करायला शिकवतो. आत्मविश्वास त्यातूनच वाढतो. तळमळीनं, स्पष्टपणे आणि लक्ष केंद्रित करुन पुढचा गेम खेळायला तुम्ही तयार होता.

उत्तमोत्तम खेळाडू हे त्या स्थानापर्यंत प्रत्येक पॉईंट जिंकल्यानं पोचत नाहीत, तर आपण वारंवार हरणार आहोत आणि त्यावर कशी मात करायची ते सातत्यानं शिकत रहातात म्हणून उत्कृष्टतेपर्यंत पोचतात.

३.‘Life is bigger than the court’

आयुष्य हे टेनिस कोर्टपेक्षा फार मोठं आहे. मी खूप परिश्रम घेतले, खूप शिकलो आणि टेनिस कोर्टाच्या त्या छोट्या मैदानात कित्येक मैल पळलो. मात्र मी पहिल्या पाचांमध्ये असतानाही मला आयुष्य जगण्याचं महत्व कळत होतं. प्रवास, निरनिराळ्या संस्कृतींचा अनुभव, नातीगोती आणि विशेषत:, माझं कुटुंब. मी माझी मुळं कधी सोडली नाहीत, मी कुठून आलो ते मी कधीच विसरलो नाही.

टेनिसप्रमाणेच तुम्ही तुमच्या आयुष्यात एका बाजूला उभे असता. तुमचं यश तुमच्या प्रशिक्षकावर, तुमच्या टीममधल्या सहका-यांवर, तुमच्या प्रतिस्पर्ध्यांवर अवलंबून असतं. तुम्ही घडता ते या टीमवर्कमुळे..! 

लेखिका : नीलांबरी जोशी 

(फेडरर यांच्या संपूर्ण भाषणाची लिंक — https://www.youtube.com/watch?v=pqWUuYTcG-o&ab_channel=Dartmouth

प्रस्तुती : स्नेहलता गाडगीळ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “Mandatory Overs…” – लेखक – अवि बोडस ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ “Mandatory Overs…” – लेखक – अवि बोडस ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे

एका पाठोपाठ wicket पडाव्या तसा एक एक दात crease सोडून चाललाय! तरीही काही खायला जावं  तर घरातल्या घरात running between the wicket चालू होतं .डॉक्टर नावाचा umpire म्हणतोय,चालायचंच ! आता mandatory overs! विसरलात वाटतं !

डोळ्यात मोतीबिंदू झाला की काय? सारखं bad light चं  appeal  करतायत ! तरीही डोळे फाडून फाडून मोबाईल मधे cheer girls पाहायला जावं  तर बायको पाठीमागे cought behind साठी तत्पर! डॉक्टर नावाचा umpire म्हणतोय, बरोबरच आहे !आता mandetory overs! विसरलात वाटतं !

आजकाल पाय वळतात म्हणून जरा बाहेर मित्र मैत्रिणीकडे जायला पाय वळतात तर ते नेमके ते wide ball पडल्यासारखे उजवी डावीकडे पडतात. रस्ता अडवून बायको दारात उभी आणि मुलगा सून नातू सारे एक सुरात leg before wicket ..  out म्हणतात. खरं  म्हणजे इन म्हणतात. डॉक्टर नावाचा umpire म्हणतोय,चालायचंच ! आता mandatory overs! विसरलात वाटतं ! काठी ठेवत चला bat सारखी !

आजकाल कान माझं सुद्धा ऐकत नाहीत. त्यामुळे बरेच शब्द ,काही वेळा अख्खं वाक्य missfield होतं  आणि विषय पार boundry line च्या बाहेर ! हैं ना चौका देनेवाली बात ! डॉक्टर नावाचा umpire म्हणतोय,चालायचंच ! आता mandatory overs! विसरलात वाटतं !

डोक्याच्या peach वर जरा कुठे गवत राहिले असेल तर शप्पथ ! पार पाटा wicket. पोटाचा आकार  

Shape  बदललेल्या चेंडूसारखा होत चाललाय. डॉक्टर नावाचा umpire म्हणतोय चालायचंच.आता  mandatory overs ! विसरलात वाटतं….. 

गुळगुळीत दाढी करून पँटवर ball  घास घास घासून तकाकी लकाकी कायम ठेवावी तसं सुरकुतलेल्या चेहऱ्यावर क्रीम चोळून चोळून चेहेऱ्यावरची तकाकी कायम ठेवायचा निष्फळ प्रयत्न करतोय.पण व्यर्थ! डॉक्टर नावाचा umpire म्हणतोय,चालायचंच, mandatory overs. विसरलात वाटतं !

मनगट तर अशी दुबळी झाली आहेत की हातातली कपबशी कधी spin होउन कपाचा कान bells उडाव्या तसा उडतो ते माझे मलाच समजत नाही.डॉक्टर नावाचा umpire म्हणातोय,चालायचंच !आता mandatory overs! विसरलात वाटतं !

काहीही लक्षण नसताना सर्दी होते रुमालाची covers on होतात आणि  खेळ थांबतो नाक आणि घशाच field inspection होई पर्यंत!डॉक्टर नावाचा umpire म्हणतोय,चालायचंच !आता mandatory overs! विसरलात वाटतं !

कॉन्फिडन्स तर एवढा शेक झालाय की बारीक सारीक सरळ पडणारा ball सुद्धा bouncer वाटतो आणि विनाकारण bit होतो. hook करायला जावं तर हुकतो!डॉक्टर नावाचा umpire म्हणतोय,चालायचंच!आता mandatory overs! विसरलात वाटतं !

Umpire ने केव्हाच इशारा केलाय तुमच्या  Power play च्या overs केव्हाच संपल्यात.तेव्हा उगाच मोठे strok न मारता जमतील तेवढे chikki run काढून score board हलता ठेवावा हे मलाही उमगलय.पण यमराज टीम चा Power play मात्र सुरू झालाय.मोठी attacking field लावलीय. डायबेटिस,बीपी,

सांधेदुखी,कंपवात,विस्मरण हे fielder, slip, Gally,covers,point ला catch घ्यायला टपून बसलेत. यमदूत नेटाने inswing,outswing ची भेदक balling करतायत. *umpire म्हणतोय,चालायचंच!आता mandatory overs! विसरलात वाटतं !

.त्या सगळ्यांना चकमा देत गोळ्या इंजेक्शनचे  pad   बांधून इन्सुलिन चे helmet  घालून  gap काढत आपली मात्र batting चालू आहे.तरी एकदा attacking stroke  ने दगा दिलाच. mid on ला  चक्क catch out. तरीही umpire म्हणतोय,चालायचंच !आता mandatory overs! विसरलात वाटतं !

आम्ही जवळ जवळ crease सोडून निघालोच ! — 

— पण तो वरती बसलाय ना third umpire! त्यानें चित्रगुप्ताला action replay दाखवायला सांगितले परत परत !आणि फायनली तो no ball ठरून आम्ही crease वर परत दाखल !आता मात्र century मारायचीच! मगच pavilion ची वाट धरायची. मग भले त्या डॉक्टर नावाच्या umpire ला म्हणू दे ना… mandatory overs ! विसरलात वाटतं !

लेखक :  अवि बोडस

(प्रेरणा : क्रिकेट वर्ल्ड कप २०२४.– वरील घटनांशी माझा काहीही संबंध नाही. फक्त कल्पना विलास यांचा संबंध आहे.) 

संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ निसर्ग… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – निसर्ग – ? ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

निसर्ग ही तर खरी आठवण करून देतो 

मायावी आरसा होऊन तुझ्या समोर येतो 

ढळलेल्या मनाचा दु:खी माणूस तेव्हा

 आवेगाने  सावरून कसा सुखी होतो

*

अद्भुत किमया अचानक अशी उजागर होते 

बघणाराला ऐश्वर्याचे दृष्टी दान मिळते 

हीच अपार किमया असते परमेशाची

इथेच नात्यांची नात्याशी खरी नाळ जुळते

*

तू तुझा म्हण किंवा हवंतर माझा म्हण

पण हे जगच या जगाचा नित्य परिपोष करते 

हेच माणसांनी कधी काळी विसरू नये

येवढीच त्या अनंताची माफक अपेक्षा असते 

*

आपण काय आज आहेत उद्या कदाचित नाही 

विश्व त्याचे अफाट सौंदर्य कायम जपत राहील 

औदार्याच्या खुणा त्याच्या जगाला दिसतील कायम

पण मुक्तपणे जगणारा चिरंजीव आत्मा येईल जाईल

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ तन्मय साहित्य #239 – कविता – ☆ हम खुद को ही समझ न पाए… ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ ☆

श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’

(सुप्रसिद्ध वरिष्ठ साहित्यकार श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ जी अर्ध शताधिक अलंकरणों /सम्मानों से अलंकृत/सम्मानित हैं। आपकी लघुकथा  रात  का चौकीदार”   महाराष्ट्र शासन के शैक्षणिक पाठ्यक्रम कक्षा 9वीं की  “हिंदी लोक भारती” पाठ्यपुस्तक में सम्मिलित। आप हमारे प्रबुद्ध पाठकों के साथ  समय-समय पर अपनी अप्रतिम रचनाएँ साझा करते रहते हैं। आज प्रस्तुत है आपकी एक विचारणीय कविता हम खुद को ही समझ न पाए” ।)

☆ तन्मय साहित्य  #239 ☆

☆ हम खुद को ही समझ न पाए… ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ ☆

कितनी भूलें, कितनी भटकन

बहके कितनी बार विगत में

सोच-सोच कर चिंतित है मन

कैसे अब उनको बिसराएँ।

.

बीत गए दिन कितने अनगिन

मृगतृष्णाओं के मररुथल में

खुशियों को, पाने के भ्रम में

गये उलझते ही, दलदल में,

रहे भुलावे में जीवन भर

हम खुद को ही समझ न पाए

सोच-सोच कर…

.

अहंकारमय बुद्धि का व्यापार

रहे करते अपनों में

नापतौल शब्दों की चलती रही

समय बीता सपनों में,

सहज सरल माधुर्य भाव धारा में

अब कैसे बह पायें

सोच-सोच कर…

.

कभी वासनाओं ने घेरा

लोभ कभी सिर पर मँडराया

कभी क्रोध में दूजों के सँग

अपने को भी खूब जलाया,

समय गँवाया जो प्रमाद में

नहीं उन्हें वापस दुहराएँ

सोच-सोच कर…

.

आत्ममुग्ध हो, खुद अपने से

रहे अपरिचित, सारा जीवन

मृगछौना मन, रहा भटकता

कस्तूरी की ले कर तड़पन,

है तलाश, बाहर-बाहर तो

अन्तर का सुख कैसे पाएँ

सोच-सोच कर…

☆ ☆ ☆ ☆ ☆

© सुरेश कुशवाहा ‘तन्मय

जबलपुर/भोपाल, मध्यप्रदेश, अलीगढ उत्तरप्रदेश  

मो. 9893266014

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ जय प्रकाश के नवगीत # 63 ☆ उजालों के गीत… ☆ श्री जय प्रकाश श्रीवास्तव ☆

श्री जय प्रकाश श्रीवास्तव

(संस्कारधानी के सुप्रसिद्ध एवं अग्रज साहित्यकार श्री जय प्रकाश श्रीवास्तव जी  के गीत, नवगीत एवं अनुगीत अपनी मौलिकता के लिए सुप्रसिद्ध हैं। आप प्रत्येक बुधवार को साप्ताहिक स्तम्भ  “जय  प्रकाश के नवगीत ”  के अंतर्गत नवगीत आत्मसात कर सकते हैं।  आज प्रस्तुत है आपका एक भावप्रवण एवं विचारणीय नवगीत “उजालों के गीत…” ।

✍ जय प्रकाश के नवगीत # 63 ☆ उजालों के गीत… ☆ श्री जय प्रकाश श्रीवास्तव ☆

उजालों के गीत

रातों में लिखे हैं।

 

परिंदों की कथाओं में

चुप रहे सारे शिखर

और बादल ने बहाया

ढेर सा पानी मगर

 

घड़े पानी के

बहुत ऊँचे बिके हैं।

 

हर सबक़ झूठा लगा

अधूरी प्रविष्टियाँ

बाँच पाए नहीं अब तक

ज़िंदगी की चिट्ठियाँ

 

प्रेम के व्यवहार

घृणा से चुके हैं ।

 

क़ैद होकर रह गईं हैं

अपनी सभी पहचान

घोंसलों से दूर होती

साहस भरी उड़ान

 

सभी परिचय

डरे बैठे थके हैं।

***

© श्री जय प्रकाश श्रीवास्तव

सम्पर्क : आई.सी. 5, सैनिक सोसायटी शक्ति नगर, जबलपुर, (म.प्र.)

मो.07869193927,

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – क्षण-क्षण ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

? संजय दृष्टि –  क्षण-क्षण ? ?

कविता का एक दिवस होता है। लघुकथा का एक दिवस होता है। कहानी का एक दिवस होता है। नाटक का एक दिवस होता है। नृत्य का एक दिवस होता है। हर विधा, हर कला का एक दिवस होता है। कविता दिवस पर रचता हूँ कविता, लघुकथा दिवस पर लिखता हूँ लघुकथा। जैसा दिन होता है, वैसा सृजन करता हूँ, मैं हूँ जो सबसे हटकर जीता हूँ।

..सुनो,  हर क्षण अनुभूति का होता है। हर क्षण अभिव्यक्ति का होता है। अनुभूति स्वयं चुनती है अभिव्यक्ति। अभिव्यक्ति स्वयं चुनती है अपनी विधा। हर अनुभूति, हर अभिव्यक्ति, हर कला, हर विधा का हर क्षण होता है।

…हर क्षण सृजन का होता है, हर क्षण विसर्जन का होता है। हर क्षण जीवन का होता है और हर क्षण मरण का भी होता है।

याद रहेगा ना…!

© संजय भारद्वाज  

(संध्या 6:01 बजे, 23 जुलाई 2024)

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय, एस.एन.डी.टी. महिला विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

🕉️ श्रवण मास साधना में जपमाला, रुद्राष्टकम्, आत्मपरिष्कार मूल्याकंन एवं ध्यानसाधना करना है 💥 🕉️

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साहित्यिक स्तम्भ ☆ कविता # 67 ☆ लिख दिया गर नसीब में क़ातिब… ☆ श्री अरुण कुमार दुबे ☆

श्री अरुण कुमार दुबे

(वरिष्ठ साहित्यकार श्री अरुण कुमार दुबे जी, उप पुलिस अधीक्षक पद से मध्य प्रदेश पुलिस विभाग से सेवा निवृत्त हुए हैं । संक्षिप्त परिचय ->> शिक्षा – एम. एस .सी. प्राणी शास्त्र। साहित्य – काव्य विधा गीत, ग़ज़ल, छंद लेखन में विशेष अभिरुचि। आज प्रस्तुत है, आपकी एक भाव प्रवण रचना “लिख दिया गर नसीब में क़ातिब“)

☆ साहित्यिक स्तम्भ ☆ कविता # 67 ☆

✍ लिख दिया गर नसीब में क़ातिब… ☆ श्री अरुण कुमार दुबे 

खोलकर दिल सभी से मिलते हैं

ग़म छुपाकर ख़ुशी से मिलते हैं

कौम -ओ -मज़हब कभी न हम पूछें

जब किसी आदमी से मिलते हैं

 सोच बदली न पद न दौलत से

हम सदा सादगी से मिलते हैं

दूर रहने में हैं भला उनसे

लोग जो बेख़ुदी से मिलते हैं

समझे बिन दिल नहीं मिलाते हम

जब किसी अजनबी से मिलते हैं

चाह जिनकी हो वस्ल की गहरी

वो बड़ी बेकली से मिलते हैं

आम से खास हो गए जबसे

वो बड़ी बेरुखी से मिलते हैं

.

छोड़ते छाप हैं वही अपनी

जो भी जिंदादिली से मिलते हैं

.

गर्व जिनकी था हमको यारी पर

अब वही दुश्मनी से मिलते है

.

क्या हुआ प्यार कर बता उससे

सारे चहरे  उसी से मिलते हैं

.

ऐंब गैरों के आप को दिखते

क्या नहीं आरसी से मिलते हैं

.

वक़्त कैसा ये आ गया है अब

हक़ भी जो सरकशी से मिलते हैं

.

भूल जाते  थकन सभी दिन की

घर पे नन्ही परी से मिलते हैं

.

बात उनकी सदा सुनी जाती

जो बड़ी आजज़ी से मिलते हैं

.

लिख दिया गर नसीब में क़ातिब

सिंधु में वो नदी से  मिलते हैं

.

दुश्मनी व्यर्थ लगता मान लिया

तब ही वो दोस्ती से मिलते हैं

.

रोज़ मिलने को मन करे उनसे

जो सदा ताज़गी से मिलते है

.

टिमटिमाना वो भूले तारों सा

जब अरुण रोशनी से मिलते हैं

© श्री अरुण कुमार दुबे

सम्पर्क : 5, सिविल लाइन्स सागर मध्य प्रदेश

सिरThanks मोबाइल : 9425172009 Email : arunkdubeynidhi@gmail. com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – आलेख ☆ अभी अभी # 425 ⇒ गरीबी की रेखा… ☆ श्री प्रदीप शर्मा ☆

श्री प्रदीप शर्मा

(वरिष्ठ साहित्यकार श्री प्रदीप शर्मा जी द्वारा हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए साप्ताहिक स्तम्भ “अभी अभी” के लिए आभार।आप प्रतिदिन इस स्तम्भ के अंतर्गत श्री प्रदीप शर्मा जी के चर्चित आलेख पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है आपका आलेख – “गरीबी की रेखा।)

?अभी अभी # 425 ⇒ गरीबी की रेखा? श्री प्रदीप शर्मा  ?

तुम इतना जो मुस्कुरा रहे हो।

क्या ग़म है, जिसको छुपा रहे हो।।

गरीबी भाग्य का खेल है, या पुरुषार्थ का अभाव, यह अभिशाप है अथवा सियासी देन, इस पर संवाद विवाद से कभी कोई निष्कर्ष नहीं निकला है, और जमीनी हकीकत यही है कि गरीबी भी उतनी ही फल फूल रही है, जितनी अमीरी। वास्तव में सुख दुख और लाभ हानि की तरह ही अमीरी गरीबी एक ही सिक्के के दो पहलू हैं।

क्या दोनों के बीच कोई खाई है, अथवा यह छोटी मछली और बड़ी मछली वाला मामला है। लेकिन सच्चाई तो यही है, समंदर में छोटी मछली भी है और बड़ी भी।।

अगर इसे रेखाओं का खेल मानें तो जरूर हमारे हाथ में भाग्य और जीवन रेखा की तरह कोई गरीबी की रेखा भी होगी। एक हस्त रेखा विशेषज्ञ जब किसी व्यक्ति का हाथ देखता है, तो कई बार हाथ को टेढ़ा मेढ़ा और ऊपर नीचे करता है, मानो किसी डंडी चूम स्कूटर की पेट्रोल टंकी में पेट्रोल ढूंढ रहा हो। जब दृष्टि काम नहीं करती, तो मैग्निफाइंग ग्लास का उपयोग करता है। और जब फिर भी कुछ पल्ले नहीं पड़ता तो दूरदृष्टि का सहारा लेता है, जिसमें सारे ग्रहों का योगदान होता है और बात पुखराज, नीलम और गंडे ताबीज पर आ जाती है। लेकिन उस भले आदमी को कोई गरीबी की रेखा नजर नहीं आती।

रेखाओं का खेल है मुक़द्दर. रेखाओं से मात खा रहे हो.

इस बात में कितनी सच्चाई है, हम नहीं जानते, लेकिन केवल एक सरकार को ही यह कड़वी सच्चाई पता है कि कितने लोगों के हाथ में यह गरीबी रेखा है, और केवल मुफ्त राशन ही उनके चेहरे पर कुछ वक्त के लिए मुस्कुराहट ला सकता है।।

तकदीर की काट केवल तदबीर यानी युक्ति और प्रयास है। जो भाग्य के भरोसे रहते हैं, वे कहीं के नहीं रहते। जब हमने अच्छी तरह से ठोक बजाकर देख लिया है, और तसल्ली कर ली है, कि हमारे हाथ में कोई गरीबी की रेखा है ही नहीं, तो हम मुफ्त में चिंता क्यों पालें।

ऐसे में साहिर दो कदम आगे आते हैं और हमारा हाथ थाम लेते हैं। वे कहते हैं ;

तदबीर से बिगड़ी हुई

तकदीर बना ले।

अपने पे भरोसा हो

तो एक दांव लगा ले।।

डरता है जमाने की

निगाहों से भला क्यूं।

इंसाफ तेरे सर पर है

इल्जाम उठा ले।।

टूटे हुए पतवार हैं

कश्ती के तो हम क्या।

हारी हुई बाहों को ही

पतवार बना लें।।

♥ ♥ ♥ ♥ ♥

© श्री प्रदीप शर्मा

संपर्क – १०१, साहिल रिजेंसी, रोबोट स्क्वायर, MR 9, इंदौर

मो 8319180002

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कविता ☆ घुंगराले बाल… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कविता ?

☆ घुंगराले बाल☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

(स्मृतिशेष स्व. मामाजी को सादर समर्पित। ई-अभिव्यक्ति परिवार की ओर से विनम्र श्रद्धांजलि) 

कुछ दिन पहले,

मेरे नब्बे साल के मामाजी का फोन आया,

“ये तेरे बालों को क्या हुआ?”

“बालाजी को अर्पण किये है”

“इससे क्या होता है ?”

पढा था कहीं,

“बालाजी को बाल देने से,

हम जिन्दगी के सारे ऋणों से

मुक्त होते हैं।”

 

“ये अंधविश्वास है ʼ”– मामाजी बोले !

 

“और ऐसा भी लगता है,

नए बाल शायद सरल-सीधे आए” – मैं 

 

“क्यूं ? तुमको घुंगराले बाल क्यूं पसंद नहीं?”

 

“मेंटेन करना कठिन है ।”

 

“हाँ….” कहकर मामाजीने फोन बंद किया ।

 

बचपन में कहते थे लोग,

“घुंगराले बालों वाली लडकियाँ,

मामा के लिए भाग्यशाली होती है”!

 

सरल-सीधे  बालों की चाह होने पर भी,

अब मैं घुंगराले बाल ही माँगती हूँ…

मामाजी का भाग्य बना रहे ।

☆  

© प्रभा सोनवणे

१६ जून २०२४

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares