☆ जीवन जगण्याची कला : अध्यात्म – भाग २ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’☆
(सर्वप्रथम आपले एकमत आहे ना की आपल्याला आपल्या जीवनात आनंद हवा आहे. सर्वाना मान्य असेल तर आपण पुढे जाऊ. धन्यवाद.)….
आपला आजचा विषय आहे जीवन जगण्याची कला:- अध्यात्म !! अर्थात कोणतीही कला शिकायची असेल तर ती शिकण्यासाठी काही नियम असणे स्वाभाविक आहे.
१. ही सृष्टी निसर्गनियमानुसार चालते
२. आपण सुद्धा यासृष्टीचे एक अविभाज्य घटक आहोत.
३.’पिंडी ते ब्रह्मांडी’ या न्यायाने वरील सर्व नियम मलाही तंतोतंत लागू होतात.
४. मी आजपासून दृढनिश्चय केला आहे की मला ‘आनंदी जीवन जगण्याची’ कला शिकायची आहे.
५. त्यामुळे ही कला शिकण्यात यशस्वी होणे ही सर्वस्वी माझी जबाबदारी आहे.
सामान्य मनुष्याला साधारणपणे जबाबदारी झटकण्याची थोडी सवय असते असे आपल्या लक्षात येईल. प्रत्येक गोष्ट सरकारने करावी असा त्याचा मूक हट्ट असतो. त्याला यो योग्य जागी व्यक्त करता येत नाही, त्यामुळे त्यातून अपेक्षित लाभ त्याला होत नाही आणि झालाच तर तो योग्य वेळी मिळत नाही. थोडक्यात त्याचा अपेक्षाभंगच होतो. एकदा त्याने स्वतः स्वतःची जबाबदारी घेतली तर ‘अचानक उन्हात चांदणे पडावे’ असा त्याच्यामध्ये, त्याच्या दृष्टिकोनात बदल झाल्याचे दृष्टीस पडते. कालपर्यंत नकोसे असलेले तेच जग दृष्टिकोन बदलल्यामुळे त्याला आज अधिक आकर्षक वाटू लागते.
समाजात सध्या काही शब्दांचे खरे अर्थ पुन्हा एकदा समजावून सांगण्याची गरज आहे असे जाणवते. तसेच बऱ्याच शब्दांचे अर्थ समजून घेण्यात किंवा समजून देण्यात आपण गल्लत करीत आहोत असे वाटते. त्यात प्रामुख्याने ‘धर्म’ आणि ‘अध्यात्म’ हे दोन शब्द येतात किंवा आज आपल्या विषयाशी निगडित असे हे दोन शब्द आहेत. आधी आपण धर्म म्हणजे काय ते पाहू. सध्या आपल्याकडे धर्म हा शब्द ‘पंथ’ (religion) या अर्थाने शासनाने स्वीकारला आहे आणि शालेय अभ्यासक्रमातून तेच शिकविले गेल्यामुळे मागील पिढीपासून हाच अर्थ मनामध्ये रुजला आहे. यामुळे धर्म या शब्दाबद्दल अनेक समजुती/गैरसमजुती समाजात रुढ झाल्या आहेत असे जाणवते. जो सर्वांची धारणा करतो, तो धर्म! आपल्याकडे मातृधर्म, पितृधर्म, राजधर्म, पुत्रधर्म असे विविध धर्म सांगितले गेले आहेत. वरील शब्दांतून मनुष्याचे कर्तव्य प्रगट होते. पण सध्या पूजपाठादि कर्म म्हणजे धर्म, उपासतापास म्हणजे धर्म. सणसमारंभ म्हणजे धर्म अशा अनेक चुकीच्या समजुती समाजात रुढ झाल्या आहेत. देवळात जाणे आणि धर्मापर्यंत जाणे यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. देवळात जाणे ही भौतिक, शाररिक घटना आहे. धर्मांजवळ जाणे ही आत्मिक घटना आहे. देवळापर्यंत जाणे ही भौतिक यात्रा आहे, ही अध्यात्मिक यात्रा नव्हे. ज्याची अध्यात्मिक यात्रा सुरु होते त्याला सारी पृथ्वीचं मंदिरासारखी दिसायला लागते. आणि मग मंदिर कुठे आहे, हे शोधणं त्याला कठीण होऊन जातं. मानणं हा धर्म नाही तर जाणणं हा धर्म.
१. अध्यात्म म्हणजे भगवी वस्त्रे, अध्यात्म म्हणजे गळ्यात माळ, अध्यात्म म्हणजे जपतप, अध्यात्म म्हणजे कर्मकांड, अध्यात्म म्हणजे उपासतापास, अध्यात्म म्हणजे तिर्थ यात्रा, अध्यात्म म्हणजे दानधर्म, अध्यात्म म्हणजे देवदर्शन, अध्यात्म म्हणजे ब्रह्मचर्य, अध्यात्म म्हणजे वारी, अध्यात्म म्हणजे कथा कीर्तन, अध्यात्म म्हणजे भजन पूजन, अध्यात्म म्हणजे गुरू, अध्यात्म म्हणजे अनुग्रह/दीक्षा, अध्यात्म म्हणजे मठ मंदिर, अध्यात्म म्हणजे गूढ, अध्यात्म म्हणजे फक्त बिनकामाच्या लोकांचा उद्योग, अध्यात्म म्हणजे दासबोध, ज्ञानेश्वरी गाथा इ. ग्रंथांचे वाचन, अध्यात्म म्हणजे साठीनंतर वेळ घालवण्याचे साधन असे अध्यात्म शब्दाचे अनेक अर्थ आज समाजात रूढ आहेत. पण अध्यात्म या शब्दाच्या काही समर्पक अर्थ पुढीलप्रमाणे असू शकतील. अध्यात्म म्हणजे निरासक्ती ( detachment), अध्यात्म म्हणजे प्रतिसाद आणि सर्वात चांगला आणि सर्वाना सहज समजेल असे दोनच शब्द ‘आई’!! आनंदी किंवा अध्यात्मिक जीवन जगण्यासाठी एकतर ‘सर्वांची आई’ व्हा अन्यथा ‘सर्वांना आई’ माना.
आई म्हणजे वात्सल्य. बाळाला जन्म देऊन फारतर एखादी स्त्री जन्मदात्री होऊ शकेल आई होण्यासाठी अधिक काही असण्याची, करण्याची निश्चित गरज आहे. आई कधी रागावते का? सगळा दया-क्षमा-शांतीचा कारभार!. ज्यांनी प्रत्येक स्त्री मध्ये मातृत्व बघितले ते संत झाले आणि ज्या मातांनी आपल्या मुलांना प्रत्येक स्त्रीकडे बघताना, समाजाकडे बघताना, देशाकडे बघताना पुत्रभावाने बघायला शिकविले ते महापुरुष झाले. भारतातील सर्व महापुरुष महान मातृभक्त होते. जो मातृभक्त नाही तो महान होऊच शकत नाही. आज ‘मातृत्व’भावाचा अभाव असल्यानेच अनेक समस्या भीषण रूप धारण करीत आहेत. आपण खऱ्या अर्थाने ‘मातृत्व भावना’ पुनः प्रस्थापित करु शकलो तर पन्नास टक्के समस्या आपसूक संपतील.
एक संतवचन आहे, “आपल्या बायकोतील आई दिसायला लागली साधक पक्का झाला.” हा ‘भाव’ जागृत रहावा म्हणून पूर्वी स्त्रिया स्वतःची ओळख मी ‘अमक्याची आई’ अशी करुन द्यायच्या. छोट्या छोट्या गोष्टींचा मनुष्याच्या मनावर परिणाम होत असतो हे आज आधुनिक विज्ञान सुद्धा मान्य करते. आपल्या पूर्वसूरींना किती सूक्ष्म विचार केला होतां याचे हे आपल्या यावरुन लक्षात येईल. मेमरी कार्ड वरील एखादा bite खराब झाला तर अख्खे memori card corrupt होते, तसेच मनावरील तृष्णेचा एखादा छोटासा डाग देखील आयुष्याच्या नाशास कारणीभूत होऊ शकतो. शिल्प घडवताना कारागीर पुरेशी सावधनाता बाळगून काम करतो. अगदी त्याचप्रमाणे मानवी जीवनाचे शिल्प घडवताना अखंड सावधानता बाळगणे अत्यावश्यक आहे, म्हणून समर्थ म्हणतात, “अखंड सावधान असावे।” तर तुकाराम महाराज म्हणतात, “रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग।” तर श्री सद्गुरू गोंदवलेकर महाराज म्हणतात की ‘सतत नामात राहावे.’ आजच्या भाषेत सांगायचे झाले तर ‘range’ मध्ये रहा. ‘Be Connected.’
संत तुकाराम महाराजांची एक गोष्ट आहे. महाराज वारीला जाताना नेहमी आपल्या मित्राला सोबत येण्यास सांगत. तो नेहमी एक कारण सांगे की मी येणारच होतो पण मला माझ्या ओसरीवरील खांबाने धरुन ठेवले आहे. एकदा उत्सुकतेने महाराज त्याच्या घरी गेले आणि बघतात तो काय? त्यांच्या मित्रानेच त्या खांबाला धरुन ठेवले होते. महाराजांनी मित्राच्या ते लक्षात आणून दिले आणि मग तो नित्य वारीला जाऊ लागला. आपलीही अवस्था त्या मित्रासारखीच आहे. फक्त आपल्या ओसरीवरील खांब थोड्या वेगळ्या प्रकारचे आहेत आणि मुख्य म्हणजे आपल्या ओसरीवर अनेक खांब आहेत. एक खांब असमाधानाचा आहे, एक काळजीचा आहे, एक भीतीचा आहे, एक द्वेषाचा आहे, एक आळसाचा, एक कटू वचन किंवा कटू वाणीचा आहे. हे सर्व खांब आपण सोडले तर आपण ‘तुकाराम महाराजां’बरोबर आनंदाने आनंदाच्या वारीला जाऊ शकतो. वारकऱ्यांना वारीत जाऊन जो आनंद मिळतो तो आनंद आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात लाभू शकतो. याची सूत्र आपल्याला अध्यात्मात मिळतात. संतांनी ती सूत्रे आचरणात आणून, पडताळून बघितली आणि मग आपल्या सारख्या सामान्य मनुष्याना सांगितली.
हे वरील वचन संत तुकाराम महाराज जगले. ते जगले यामागे त्यांना काही सिद्ध करायचे नव्हते, त्यांना काही कमवायचे नव्हते, त्यांना लौकिक संपत्ती नको होती, त्यांना पदप्रतिष्ठा नको होती. म्हणून आज चारशे वर्ष होऊनही त्यांचे नाव अबाधित राहिले आहे. संत तुकारामांची गाढवावरून धिंड काढली गेली, त्यांचा प्रतिसाद होता, गावकरी चांगले आहेत, त्यांनी माझे खूप मोठं कौतुक केले, नाहीतर माझी मिरवणूक कोणी काढली असती ? मला सारा गावं बघता आले, त्यांच्या गळ्यात शिराळे, घोसाळे, आदी भाज्यांच्या माळा घातल्या तेव्हा ते म्हणाले, चला! चार दिवसांची भाजी सुटली”. जन्मजात सावकारी असतानाही दुष्काळात सर्व कर्जांचे कागद त्यांनी खातेदारांना परत देऊन टाकले. कोणत्याही शेतकऱ्याने आत्महत्या केलेली नसताना, आंदोलने केलेली नसताना, तसा सरकारी आदेश नसताना ‘उस्फुर्त कर्जमाफी’ केली. पुढे सावकारी बुडाली आणि दिवाळे निघाले तेव्हा सुद्धा तुकाराम महाराज यांनी फक्त प्रतिसादच दिला. बायको, मुले, भाऊ जेव्हा दुष्काळाची शिकार झाली, तेव्हा ते म्हणाले,
“बरे जाले देवा निघाले दिवाळे , बरी या दुष्काळे पीडा केली ॥
बरे जाले तुझे केले देवाईल , लेकरे बाईल उपेक्षिली ॥
तुका म्हणे बरें व्रत एकादशी , केले उपवासी जागरण ॥”
*
त्याच्याही पुढे जाऊन ते म्हणतात,
*
“बाप मेला न कळता । नव्हती संसाराची चिंता॥
विठो तुझे माझे राज्य । नाही दुसऱ्याचे काज ॥
बाईल मेली मुक्त जाली । देवे माया सोडविली ॥
विठो तुझे माझे राज्य । नाही दुसऱ्याचे काज ॥
पोर मेले बरे जाले । देवे मायाविरहित केले।
विठो तुझे माझे राज्य । नाही दुसऱ्याचे काज।।
माता मेली मज देखता । तुका म्हणे हरली चिंता ।।
विठो तुझे माझे राज्य । नाही दुसऱ्याचे काज।।”
इतके कर्तव्यनिष्ठुर होणे आपल्याला जमणार नाही, परंतु आपण प्राप्त स्थितीचा स्वीकार तरी नक्कीच करु शकतो. कारण एकच त्यांनी आपल्या वाट्याला आलेल्या प्रारब्धाचा खुल्या मनाने संपूर्ण स्वीकार केला आणि आयुष्यास समर्पक प्रतिसाद दिला. थोडा अभ्यास केला तर हा अलिखित नियम सर्व संतांनी काटेकोरपणे पाळला आहे असे आपल्या लक्षात येईल. संत ज्ञानेश्वर अर्थात माऊली,
संत मीराबाई , अगदी अलिकडील संत गाडगे महाराज, ह्या सर्वांनी आपल्या वाट्याला आलेले प्रारब्ध आनंदाने भोगून संपवले, झालेल्या हालअपेष्टा, यातना, उपेक्षा सहजपणे स्वीकारल्या. अर्थात ‘प्रतिसाद’ देऊन, कोणाही माणसावर आकस न ठेवता. माऊलींनी पसायदानात ‘खळ सांडो’ असे न म्हणता ‘खळांची व्यंकटी सांडो’ असे म्हटले हा सुद्धा प्रतिसादच!!
आयुष्याला तुमच्या तर्कशास्त्राशी वा तत्वांशी काहीही देणेघेणे नाही, ते आपापल्या पद्धतीने प्रवाही होत असते. अखेरीस तुम्हांला या जीवन प्रवाहातून प्रवाहित व्हायचे असते. म्हणून जीवनाला सर्वोत्तम प्रतिसाद द्या. कारण आयुष्य हे कधीही आपल्या तर्कशास्त्रावर चालत नाही.
बदल हा जीवनाचा सर्वश्रेष्ठ नियम आहे. गोपाळ कृष्णाच्या चरित्रात आपल्याला याचे दर्शन होते. ज्याला गर्भात असल्यापासून शत्रू मारायला टपले होते. जन्म झाल्यावर देखील लगेच स्वतःच्या आईला सोडून दुसऱ्या ठिकाणी जावे लागले, तिथे सुद्धा पुतना मावशी आलीच. आपण कृष्ण चरित्र बघतांना तो अवतार होता हा ‘समज’ मनातून काढून टाकूया. कृष्ण ‘समाजाच्या’ गरजेनुसार आणि लोकांसाठी उपयुक्त असेच जीवन जगला. वेळप्रसंगी स्वतःचे नाव खराब होईल याची त्याने तमा बाळगली नाही. आजही त्याला ‘रणछोडदास’ असे म्हटले जाते. राजपुत्र म्हणून जन्माला आलेला मुलगा एक गवळ्याच्या घरी वाढला, गुरुकुलात राहिला, अगदी सोळा सहस्त्र नारीचा पती झाला, पण प्रत्येक गोष्ट त्याने समाजाचे व्यापक हीत ध्यानात ठेऊन समाज केली. “मैं नही, तू ही” हे सूत्र श्रीकृष्णाने जीवनातील बदल आनंदाने स्वीकारत आजीवन पाळले. म्हणूनच ते ‘पुरुषोत्तम’ झाले. ह्यालाच ‘अध्यात्म’ म्हणतात. म्हणूनच श्रीकृष्ण आज प्रत्येक भारतीयाच्या मनात स्थान प्राप्त करून आहे.
अगदी अलिकडील उदा. घ्यायचे तर लोकमान्य टिळकांचे घेता येईल. मुलगा गेल्याची वार्ता कोणीतरी येऊन टिळकांना सांगितले, लोकमान्य त्यावेळी केसरीचा अग्रलेख लिहीत होते, ते सहज म्हणाले की अग्रलेख पूर्ण करुन येतो. हा धीरोदत्त पणा अध्यात्म जीवनशैलीतूनच येतो. इथे सुद्धा लोकमान्यांनी ‘प्रतिसादच’ दिला आहे आणि परिस्थितीचा आनंदाने स्वीकार केला आहे. स्वा. सावरकरांना ५० वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा झाली, तेंव्हा त्यांचे पाहिले उद्गार काय होते ? “पन्नास वर्षे ब्रिटिशांचे राज्य टिकेल ?” हा प्रतिसादच होता. सर्व क्रांतिकारक, स्वातंत्र्यसेनानी, शास्त्रज्ञ ‘अध्यात्म’च जगत आलेले आहेत.
‘प्रतिक्रिया’ ही अपरिहार्यता असू शकते पण ‘प्रतिसाद’ नेहमीच मनुष्याची खिलाडू वृत्ती दाखविणारा, उस्फुर्त आणि सकारात्मक असतो. जीवनाकडे परमेश्वराची ‘लीला’ म्हणून पाहणारा असतो. आत्मविश्वास दाखविणारा आणि जगण्याची उमेद वाढविणारा असतो.
म्हणोन आळस सोडावा ।
येत्न साक्षेपें जोडावा ।
दुश्चितपणाचा मोडावा ।
थारा बळें ।।
दा. १२.९.८।।
समर्थ रामदास
आपण दुसऱ्याला बदलण्याचा प्रयत्न अनेक वेळा करुन बघितला आहे. त्यात आपण किती यशस्वी झालो हे आपल्याला चांगलें कळले आहे. त्यामुळे आपण आता स्वतःला बदलूया, कारण ‘बदल स्वीकारणे’ आणि ‘स्वतःत बदल करणे’ हे दोन्ही आव्हानात्मक आहे. आपण बदललो की त्यामानाने जग बदलतेच.
“नजरे बदली तो नजारे बदले।
नाव ने कष्ती बदली तो किनारे बदले।”
एक दगडाचा व्यापारी होता. त्याच्याकडे विविध रंगाचे , विविध दर्जाचे, विविध आकाराचे दगड विकायला होते. एक भला मोठा दगड त्याच्याकडे बरेच दिवस पडून होता. तो दगड बरेच दिवस विकला जात नव्हता. एकदा एक कारागीर त्याच्याकडे आला. त्याला म्हणाला हा दगड मला देता का? बरेच दिवस तो पडून होता, म्हणून तो म्हणाला फुकट ने कारण त्याने माझी जागा अडवली आहे. कारागिराने तो दगड नेला, त्यातून सुंदर शिल्प तयार केले. एकदा व्यापारी त्याच्याकडे गेला असताना त्याने शिल्प बघितले. तो सुद्धा आश्चर्य चकित झाला. त्याने कारागिराचे तोंड भरुन कौतुक केले. म्हणाला, “तुम्ही चांगले शिल्प घडवले. त्यावर तो कारागीर म्हणाला की त्या दगडात आधीपासूनच ते शिल्प होते, मी त्याच्या आजूबाजूचा अनावश्यक भाग काढून टाकला”.
आपण सुद्धा ईश्वराचे अंश आहोत, लेकरे आहोत. आपल्यातील अनावश्यक भाग आपल्याला काढून टाकता आला तर आपल्या जीवनांचे देखील सुंदर शिल्प निश्चित बनू शकेल, यात शंका नाही. फक्त अनथक प्रयत्न अत्यावश्यक आहेत. नाहीतर मॉर्निंग वॉकला जाण्यासाठी घड्याळाला गजर लावणे आणि सकाळी गजर वाजला की सवयीने तो बंद करणे हाच बरेच लोकांचा ‘व्यायाम’ असतो, तसे व्हायला नको.
अध्यात्माच्या आजच्या कालानुरूप नवीन व्याख्या कराव्या लागणार आहेत , त्या खालीलप्रमाणे असू शकतील.
१. ‘असेल तर असो, नसेल तर नको’ म्हणजे अध्यात्म.
२. ‘हवेनको पण’ जाणे म्हणजे अध्यात्म विनातक्रार स्वीकार्यता (Unconditional acceptance) म्हणजे अध्यात्म.
३. कुटुंबाची, समाजाची, देशाची ‘आई’ होणे म्हणजे अध्यात्म, उदा. सिंधुताई सपकाळ उर्फ माई.
४. ‘मेरी झाशी नही दुंगी’ म्हणणे आणि तशी कृती करणे म्हणजे अध्यात्म.
५. स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करणे म्हणजे अध्यात्म.
६. ‘श्रवण’ केल्याप्रमाणे कृती करणे म्हणजे अध्यात्म.
७. आपल्या कलागुणांचा, उपलब्ध साधन संपत्तीचा समाजासाठी उपयोग करणे म्हणजे अध्यात्म. इ.
‘जीवन जगण्याची कला- अध्यात्म‘ साठी ह्या लेखाचा समारोप एका कवितेने करतो.
☆ “जरा हा पत्ता कुठे आला सांगता?…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर☆
बबनराव शिवडीकर रिटायर्ड हाडाचा प्राथमिक शाळेचा मास्तर… उंच शरीरयष्टी, किरकोळ बांधणीचा देह, नाकावर चष्मा गॅलरीतून वाकून बघण्याऱ्या माणसा सारखा.. विद्यादानाच्या सेवाव्रतालाच अख्ख आयुष्य वाहून घेतलेलं ,त्यामुळे गृहस्थाश्रमाला तिलांजली दिलेली.. दोन वेळेचा सरस्वतीबाईंच्याकडे जेवणाचा डबा लावलेला… बाकी सर्व स्वावलंबनाचा परिपाठ ठेवलेला… शाळा सुरू होती तोपर्यंत सगळं काही सुरळीत सुरू होतं… घड्याळात फावला वेळ नसायचा.. नि आता दिवसाचे बरोबर रात्रीचे तास जाता जात नसत… रिटायर्ड होईपर्यंत विद्यादानाचं अग्निहोत्र अखंड चालू होतं ..पण आता त्यात विरंगुळा हवा होता… म्हणून शिकवण्याच्या मोहा पासून दूर राहिले… आणि हो पेन्शन उत्तम मिळत होती त्यामुळे कसलीच ददात नव्हती… सकाळी फिरायला जाणे, वाचनालयातून पेपर वाचणे, पुस्तक घरी आणून वाचनाची भूक भागवणे, संध्याकाळी कुठे टेकडीवर, एखाद्या देवळात नाहीतर बागेत फेर फटका मारून रात्र वस्तीला घरी चल म्हटल्यावर झोपायला घरी येणे…एक दोन जुन्या शिक्षकांशी स्नेह होता पण जुजबी… त्या सगळ्यांना प्रपंच होता अर्थात त्याच्या जबाबदाऱ्याही होत्या.. बबनराव काय सडाफटींग माणूस.. पिंपळावरचा मुंजा असल्यासारखा… सुखी माणूस, राजा माणूस.. कसलं व्यसन नाही कि कुठं जाणं येणं नाहीच… कुणी जवळचे नातलग सुद्धा नाहीत… रिटायर्ड झाल्यावर सुरवातीला कसे अगदी आखून रेखून मोजून मापून दिवसाचा सगळा कार्यक्रम पार पडला जाई.. नि रात्री शांत झोप लागे… पण पण जेव्हा हा दिनक्रम यांत्रिकी सारखा वाटू लागला, तेव्हा निरस, उदास उदास वाटू लागले… शेजारी पाजारी अवतीभवती जरी असले तरी त्यांचे त्यांचे व्याप का कमी होते.. नाही म्हणायला जुजबी बोलाचाली होत असे. पण बबनरावानाची संवादाची भुक मात्र शमत नसे.. हळूहळू त्यांनी सगळ्या शेजारी पाजारींचा वेळ खायला सुरुवात केली… त्यांना बरं वाटत होतं पण लवकरच शेजारी पाजारी शहाणे झाले.. त्यांना हळूहळू टाळू लागले.. ते समोर दिसताच दिशा बदलू लागले.. स्वताची सुटका करून घेण्यात धन्यता मानू लागले… बबनरावानां ही बाब लक्षात आली. .. आता पुढचा पर्याय काय शोधावा या विचारात असताना.. त्यांना रस्त्यावरून जाणारा पोस्टमन दिसला आणि त्यांच्या सुपिक डोक्यात एक कल्पना अवतरली…
… रोज सकाळी वाचनालयात पेपर वाचताना त्यातील जाहिरातीतील पत्याचा एकच भाग लिहून घेऊन त्यापुढे दुसऱ्या जाहिरातीतील दुसरा भाग, त्यापुढे तिसरा, चौथा… असं करत एक संपूर्ण आगळा वेगळा पत्ता कागदाच्या चिटोऱ्यावर लिहून घेऊन वाचनालयातून जे बाहेर पडायचं ते चिठोऱ्यावर लिहिलेला पत्ता हुडकण्यासाठी… मग त्यासाठी सुरुवातीला रस्त्यावर पहिला जो भेटेल त्याला थांबवून,
“मला जरा हा पत्ता कुठे आला सांगाल काय? ” असं म्हणून त्या माणसाकडे तो पुढे काय सांगतोय इकडे उत्सुकतेने नजर फिरवून बघणे .. पत्ता वाचला कि माणूस अचंबित होऊन जाई… कशाचा कशाला लागाबांधा लागायचाच नाही.. जर घाईत असेल तर
” नाही बुवा नक्की कुठला पत्ता आहे ते कळत नाही.. तुम्ही शेजारच्या दुकानदाराला विचारा. तो तुम्हाला नीट सांगेल.. “
संवाद खुंटला कि बबनराव ते चिठोरे घेऊन पुढे निघत.. मग एखादा दुकानदार, चहाचा टपरीवाला.. एकादा रिक्षावाला असे नवे नवे गिर्हाईक शोधली जायची.. पण पत्ता सापडयला मदत होत नसे.. कुणी विचारले या गावात नवीन आलात काय? तर तोच धागा पकडून काही वेळा संवादाची गाडी सुरू करत असत.. ” नाही हो इथलाच…गावाकडचा जुना मित्र या पत्त्यावर आला आहे त्यानं मला तिथं भेटायला बोलावलं असल्यानं हा पत्ता शोधतोय… गडबडीत मोबाईल नंबर लँडलाईन नंबर लिहून घ्यायचा राहून गेला.. आणि असा हा पत्ता शोधण्याची पायपीट करतोय… तुम्ही त्या पत्त्याच्या एरियातले आहात तर… ” संवाद रेंगाळत चालला आहे पाहून बबनरावांना आनंद झाला… पण फार काळ तो टिकला नाही…पत्तात बरीच सरमिसळ झालेली दिसतेय.. एव्हढं बोलून मग समोरचा माणूस कलटी मारे… वाचनालयातून निघाल्या पासून दोन तीन तासाचा वेळ छान जाई… मग दुपारी घरी येऊन जेवण करून विश्रांती घेतली जाई.. त्यावेळी कोण कसं रिॲक्ट झालं याची मनाशी उजळणी होई.. बबनराव हसू येई… संध्याकाळी पुन्हा पत्ता शोध मोहीम सुरू व्हायची…आता रोजचा कार्यक्रम ते राबवू लागले.. रोज नवी नवी डोकी धरु लागली.. कधी संवादाची गाडी रेंगाळे तर कधी जलदगतीने निघून जाई… रोज नव्या नव्या एरियातल्या आड रस्तावर ते बाहेर पडायचे… सकाळचा नि संध्याकळचा घराजवळच्या चहाच्या टपरीवाला कडून चहा पिऊन झाला कि आपल्या पत्ता शोध मोहिमेला निघत असत…त्या चहाच्या टपरीवाल्याला सुद्धा त्यांनी सोडलं नाही… तो तर कायम बुचकळ्यात पडलेला असायचा.. या माणसाला असा विचित्र पत्ता दिला कुणी असा प्रश्न त्याला पडायचा.. कि हा पत्ता कधीच न सापडेल असाच आहे.. आणि हा शाळा मास्तर असून याला हे ठाऊक असू नये.. म्हणजे… का काहीतरी या माणसाचा रिकामटेकडेपणाचा चाळा असावा…कधी कधी बबनरावांचे ग्रह फिरलेले असले तर बोलाचाली… वादावादी… गाव जमा होऊन आरोप प्रत्यारोप… लफंगा, भुरका चोर… बाईलवेडा… वगैरे वगैरे शेलक्या शब्दात, तर कधी प्रकरण हातघाई वर येई.. त्यांच्या घराबाहेर असलेल्या त्या चहा टपरीवाल्याकडे पोलिसांनी बबनरावांची चौकशी केली..तो टपरी टपरीवाला म्हणाला अरे साब वो मास्टर एक नंबरका पागल है..उसका कोई नही है इसिलिए एक झुठा पत्ता धुंडने लता है और उसके बहाने लोगोंसे बाते करता रहता है..जिस दिन बाते ज्यादा होती है तो खुशीकेमारे सिटी बजाता देर रात को घर आता है..और जिस दिन बात ही नहीं बनती तो मेरे यहा दो दो कप कटिंग चूप चाप पी के घर चलता है… रात्री घरी आल्यावर त्यांना खूप खजिल वाटायचे.. हा पत्ता शोध उपक्रम आपल्या हवा तसा प्रतिसाद मिळत नाही हे पाहून ते खूप दुखी कष्टी झाले.. एक दोन दिवस बाहेर सुध्दा पडले नाहीत.. नवा मार्ग शोधयाचा प्रयत्न करून पाहू लागले… पण एकांत सुटावा संवाद घडावा याची भुक मात्र खूप खवळली जाऊ लागली… . त्या टपरीवाला चहावाल्याला सुद्धा बबनराव दोन दिवस न दिसल्या बदल वेगळीच शंका येऊन गेली.. तो घरी जाऊन त्यांना दारातून पाहून आला… बबनराव एका कागदाच्या चिठोऱ्यावर पत्ता लिहिण्यात मश्गुल होते… दहाबारा पते त्यांनी तयार करून घेतले… आज त्यांनी हा पत्ता शोधायचा नाद सोडून देण्याचे मनानेच ठरवले होते.. तयार होऊन घराबाहेर पडले.. टपरीवाला चहावाल्याच्या समोरून शीळ घालत पुढे निघून गेले…
… चालत चालत नदीच्या काठावर आले… संध्याकाळची वेळ होती काठ अगदी निर्मनुष्य असल्याने शांत शांत होता… बबनरावांनी खिशातले ते सगळे पत्ते काढले आणि हळूहळू एकेक करत त्या नदीच्या प्रवाहात सोडत राहिले… जणूकाही आपल्या छंदाला त्यांनी जलार्पण केले होते… आपणच आपल्या या वेगळ्या छंदाला हसत होते…
.. अरे हा तर माझ्या घराशेजारचाच पत्ता आहे कि.. कोणीतरी बोललं.. त्या वाहत्या पाण्यातील एक पत्याचा भिजलेला अक्षर धुवून गेलेला कागद हाती घेऊन तो बबनरावांकडे बघत म्हणाला… बबनराव चमकले त्यांनी त्या अनोळखी व्यक्ती कडे पाहिले आणि हसत हसत विचारले..
” इथं बसून तुम्ही काय करता आहात..काय शोधताय या ठिकाणी ?… त्या अनोळखी माणसाने आपल्या खिशातील एक कागदाचा चिटोरा काढत म्हटले…..
कधी आणि केव्हा आपले ऋणानुबंध जुळले ते सांगता येत नाहीये मला. कदाचित पूर्वजन्मीचंच आपलं काही देणंघेणं असावं. कारण या सुंदर जगात पहिला श्वास मी घेतला, तो तुझ्या वैशाखातल्या दमदार तडाख्यातच… त्यामुळे माझ्या जन्मापासून तुझ्या आणि माझ्या नात्याची नाळ गुंफली गेली. पुढे कळत्या वयात तुझ्याशी अधिकाधिक सलगी होत गेली. प्रकाशाची विलक्षण ओढ तुझ्यापासून क्षणभराचा दुरावासुद्धा सहन होऊ देत नाही. तुझी सगळी रूपं नजरेत, स्मृतित गोंदली गेली आहेत.
पावसाळ्यातल्या ढगाआडून हळूच डोकवणारे तुझे हळदुले किरणं… ओलेत्या मातीला, हिरव्यागार वनराईला हळूच सोनेरी वर्ख लावून जातात. कधी कधी तर मुलांच्याच भवितव्यासाठी त्यांच्यापासून दुरावा सहावा लागणाऱ्या, सटीसामाशी येणाऱ्या वडिलांसारखाच बिलगतोस तू धरतीला. पण पुन्हा कर्तव्यदक्ष वडिलांसारखा ओलेतेपण टिपून लगेच निघूनही जातोस आपल्या कामाला.
हिवाळ्यात, थंडीच्या अंतरंगात शिरून तिच्याशी गुफ्तगू करत अलगद बाहेर पडणारी तुझी उबदार मऊसुत सोनेरी किरणं… जणू गोधडीची हवीहवीशी वाटणारी उबच… ठराविक वेळी अंगभर लपेटता येणारी. स्वप्नांना रंग देणारी. माध्यान्हीच्यावेळी तुझा हलकासा आश्वासक स्पर्श रेंगाळणाऱ्या रजनीलाही तोंड द्यायला पुरेसा असतो.
आम्हा माणसांना वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या रुपांत सावरत राहतोस तू…
आणि उन्हाळ्यात तर धरतीवर तुझंच साम्राज्य असतं… त्याचा थाट तो काय वर्णावा…
त्यावेळी प्रत्येक क्षणाक्षणाला दिसणारी तुझी रूपं किती मोहक…. रसांनी, गंधानी, रंगांनी भारलेली.
एखाद्या गायकानं बेभान होऊन कधी तीव्र… कधी मध्यम… कधी मंद्र वेगवेगळ्या सप्तकांत, स्वरात अविरत गुणगुणत राहावं तसा असतोस तू…
तुला तमाही नसते रे तुझं हे गुणगुणणं आम्ही कुणी ऐकतोय की नाही याची.
एखाद्या चित्रकाराने एकाच रंगाच्या कुंचल्याचे वेगवेगळे फटकारे, वेगवेगळे आकार, वेगवेगळे पोत कॅन्व्हासवर दाखवावेत आणि आपल्या नितळ अन् तजेलदारपणाने तो सबंध कॅन्ह्वास व्यापून उरावास तसाच आहेस. तू…
एकाच रंगात बुडूनही अनेक रंगछटा दाखवणारा…
तू म्हणजे एकोहं बहुस्याम!
मला ना त्यामुळे तू एखादा जोगी वाटतोस. आपण जे काही रसरसून जगलो आहोत ते सगळं… अगदी सगळं काही अर्पण करण्याचा तुझा हा सोहळा असतो. खरं सांगू, विरक्तीची आसक्ती आहे तुला… का विरक्तीच्या आसक्तीचं रूप आहेस तू! असो.
आणि ती याची देही याची डोळा पाहायला मिळते ना तेव्हा सहन होत नाही… इतकं नितळ तजेलदार असणं…
अन् लडिवाळा, तू काय देतोयस , त्यापेक्षा तू काय देत नाहीस हे बघण्यातच सामान्य ऊर्जा खर्च होत राहते रे…
तेव्हा वाटतं अगदी आतून वाटतं वर्षानुवर्षं आपलं काम निरसलपणे करणारा एखाद्या ऋतूला समजण्यासाठी
सुमारे चाळीस एक वर्षांपूर्वीची घटना आहे ही. आता मी जनसामान्यांबरोबरच साहित्यिकांमध्ये देखील प्रथितयश कवी म्हणून ओळखला जाऊ लागलो होतो. तरीही आपल्यापेक्षा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ हे थोरच नाही का!
पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरात कवी संमेलनात मी माझी ‘शब्दांची वादळं’ ही कविता सादर करायला व्यासपिठावर उभा होतो. मी पहिलाच चरण म्हटला,
‘शब्दांची अनेक वादळं आली, कधी तसा डगमगलो नाही’.
आणि अचानक माझ्या मागून, व्यासपिठाच्या मागील भागातून ‘वाः! सुंदर’ अशी दाद मिळाली. मी चमकून, तरीही कृतज्ञतेने मागे वळून पाहिले; आणि काय सांगू तुम्हाला, ही दाद मिळाली होती विंदा करंदीकर आणि मंगेश पाडगावकर या दोन ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कविवर्यांकडून! माझ्या अंगावर शहारे आले आणि मोठ्या उत्साहात मी ती संपूर्ण कविता सादर केली. कवितेला टाळ्यांच्या कडकडाटाचा प्रतिसाद तर मिळालाच; शिवाय मेनका प्रकाशनच्या पु. वि. बेहेरे यांनी माझा दुसरा काव्यसंग्रह प्रकाशित करण्याची इच्छा प्रकट केली. साहजिकच या काव्यसंग्रहाचे नाव आहे ‘शब्दांची वादळं’!
☆ तिसऱ्या स्फोटाच्या उंबरठ्यावर… – लेखक : श्री अच्युत गोडबोले ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता काय करू शकते, याची चुणुक जगाला दिसू लागली आहे.
या तंत्रज्ञानाचे ‘गॉडफादर’ म्हणवले जाणारे डॉ. जेफ्री हिंटन यांनी त्याविषयीची भीती व्यक्त केली आहे. ‘एआय’ काय आहे, ते विनाशक का होऊ शकते याविषयी…
‘कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी (एआय) मी जे काम केले, त्याबद्दल मला थोडा खेदच वाटतो,’ हे उद्गार आहेत ‘एआय’ तंत्रज्ञानाचे ‘गॉडफादर’ असे बिरूद लाभलेले डॉ. जेफ्री हिंटन यांचे.
‘‘एआय’, त्या तंत्राच्या भयावह शक्यता यांविषयी बोलताना नोकरीमध्ये असताना मर्यादा येतील, म्हणून राजीनामा देत आहे,’ असे त्यांनी ‘गूगल’ सोडताना सांगितले.
मी याला ‘तिसरा स्फोट’ म्हणतो. सन १८९६च्या आसपास ‘डायनामाइट’चा शोध लावणाऱ्या आल्फ्रेड नोबेलचा स्फोट पहिला. सन १९४५मध्ये ‘मॅनहॅटन प्रोजेक्ट’मधील अणुबॉम्बचा शोध लावणारा ओपेनहाइमरचा स्फोट दुसरा. आल्फ्रेड नोबेलच्या भावाचे निधन झाल्यानंतर, आल्फ्रेडचेच निधन झाले आहे असे समजून एका वृत्तपत्राने ‘मृत्यूच्या व्यापाऱ्याचे निधन’ अशी बातमी छापली.
आपण मेल्यावर जग आपल्याला कसे ओळखेल, आठवेल याविषयीची ‘याची देही याची डोळा’ जाणीव झाल्यानंतर उपरती झालेल्या आल्फ्रेडने, पापक्षालनासाठी ‘नोबेल पारितोषिका’ची घोषणा केली.
गंमत म्हणजे याच नोबेल पारितोषिकासाठी १९४६, १९५१, १९६७ असे तीन वेळा नामांकन मिळालेल्या; परंतु पुरस्कार मिळू न शकलेल्या रॉबर्ट ओपेनहाइमरने अणुबॉम्ब बनवला. त्याचा स्फोट ‘डायनामाइट’पेक्षा कित्येक पट विध्वंसक होता. त्यानंतर त्या संशोधनाच्या विनाशक शक्तीमुळे, ओपेनहाइमरने खेद व्यक्त केला होता.
आताचा डॉ. जेफ्री हिंटन यांचा राजीनामा आणि त्यानंतरची खेदयुक्त काळजी हा ‘एआय’ तंत्राच्या अजूनही अव्यक्त; पण नजीकच्या भविष्यातील महास्फोटाची जणू नांदीच!
इतकी वर्षे ‘गूगल’मध्ये कार्यरत असूनही, त्याने आत्ताच राजीनामा देण्याची मला तीन कारणे वाटतात. पहिले म्हणजे, ‘एआय’मुळे नजिकच्या काळात जवळजवळ ६० ते ८० टक्के नोकऱ्या कमी होण्याचे भाकित वर्तविले जात आहे; त्यामुळे प्रचंड सामाजिक अस्थैर्य निर्माण होईल. दुसरे म्हणजे, अलीकडेच ‘चॅट जीपीटी’ आणि ‘लार्ज लँग्वेज मॉडेल’ने (एलएलएम) घातलेला धुमाकूळ आणि तिसरे म्हणजे, या अत्यंत प्रगत ‘एआय’मुळे तयार होत असलेल्या विध्वंसक शस्त्रांची भीती.
‘स्वार्म तंत्रज्ञान’, म्हणजे अनेक छोटे ड्रोन एकत्रित काम करतात. एखाद्या व्यक्तीचे छायाचित्र दिल्यास हे सारे छोटे ड्रोन एकत्र काम करून त्या व्यक्तीला ठार करू शकतात. या हल्ल्यातून बचाव होणे शक्य नाही. ही तिन्ही कारणे ज्या तंत्रज्ञानामुळे शक्य झाली, त्यात डॉ. हिंटन यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.
‘चॅट जीपीटी’ आणि ‘डीप फेक’ तंत्रज्ञानासारख्या गोष्टींमुळे सोशल मीडियावर बनावट छायाचित्रे, व्हिडिओ, मजकूर यांचा अनिर्बंध सुळसुळाट होण्याची नुसती शक्यताच नव्हे, तर अनेक शास्त्रज्ञांना खात्री वाटते. हे अत्यंत प्रगत तंत्रज्ञान वाईट हेतू असणाऱ्या, आसुरी महत्त्वाकांक्षेने प्रेरीत लोकांच्या हाती पडल्यास जगाचा विनाश अटळ आहे, याबाबतही त्यांच्यात एकवाक्यता आहे.
याच्याही पुढे जात, जगाचा विनाश ‘होईल का’, यापेक्षा ‘कधी होईल’ एवढेच विचारणे आपल्या हातात आहे, अशी भीतीही अनेक विचारवंत व्यक्त करीत आहेत. याच प्रकारची विधाने, काळजीयुक्त भाषणे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि प्रसिद्ध तंत्रज्ञ-उद्योजक इलॉन मस्क, बिल गेट्स करीत आहेत.
आपण ती ऐकत, वाचत आहोत. व्हाइट हाउसने नुकतेच ‘गूगल’चे सुंदर पिचाई आणि ‘मायक्रोसॉफ्ट’चे सत्या नाडेला यांना ‘एआय’चा जबाबदारीपूर्वक वापर व त्यासाठीचा आराखडा करणे यासंबंधी बोलावले होते. त्या बैठकीत ‘ओपन एआय’च्या (‘चॅट जीपीटी’ची जनक कंपनी) सॅम आल्टमनबरोबरच अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिसही उपस्थित होत्या. ‘विश्वासार्ह एआय’साठी व्हाइट हाउसने १४ कोटी डॉलर जाहीर केले आहेत.
‘एआय’ची उपशाखा असणारी ‘न्यूरल नेटवर्क’ खूप जुनी आहे. ‘न्यूरल नेटवर्क’ अतिप्रगत करण्यात, तिचे २०१२मध्ये ‘डीप लर्निंग’मध्ये रूपांतर करण्यात डॉ. हिंटन यांचे मोलाचे योगदान आहे. या ‘डीप लर्निंग’ प्रकारामुळे आज ही परिस्थिती ओढावली आहे. डॉ. हिंटन म्हणतात, की हे तंत्रज्ञान मानवापेक्षाही पुढे जाईल, अशी शक्यता आहे आणि ती भयावह आहे.
काही दिवसांपूर्वी ‘सॅमसंग’ कंपनीने ‘चॅट जीपीटी’च्या वापरावर बंदी घातली. वॉरन बफे या गुंतवणूक क्षेत्रातील अग्रेसर सीईओने तर ‘एआय’ला ‘दुसरा अणुबॉम्ब’ म्हटले आहे. ‘एआय’ तंत्रज्ञानामुळे ६० ते ८० टक्के लोकांच्या हातचे काम जाईल, ते बेरोजगार होतील, याचा अनेक पाऊलखुणा दिसत आहेत.
‘रायटर्स गिल्ड’ या अमेरिकेतील लेखकांच्या संघटनेने नुकत्याच काढलेल्या मोर्चाने हे दाखवून दिले. ‘चॅट जीपीटी’ कथा, पटकथा लिहून देणार असेल, तर लेखकांना कोण मानधन देणार?
परवाचीच बातमी आहे, की ब्रिटनमध्ये गुंतवणूक तज्ज्ञांच्या सल्ल्यापेक्षा ‘चॅट जीपीटी’ने गुंतवणुकीवर अधिक परतावा दिला. ‘सोनी’च्या छायाचित्र स्पर्धेत प्रथम पारितोषिक जाहीर झालेल्या जर्मन छायाचित्रकाराने ते नम्रपणे नाकारले; कारण ती ‘एआय’ची कलाकृती होती.
‘एआय’, ‘बिग डेटा’, ‘क्लाउड’ इत्यादींचा समुच्चय असणारी, २०१३मध्ये अस्तित्वात आलेली चौथी औद्योगिक क्रांती म्हणजेच ‘इंडस्ट्री ४.०’ किंवा ‘आय ४’. याला मागे टाकत, दहा वर्षांत ‘इंडस्ट्री ५.०’ उदयाला आली आहे. यामध्ये मानव आणि यंत्र-तंत्र-रोबो एकत्र काम करतील. याला ‘कोबॉट’ म्हणतात. ‘कोबॉट’मुळे जीवन सुखावह (की आळशी?) झाले, तरी असंख्य नोकऱ्यांवर गदा येऊन, सामाजिक अस्थैर्य वाढेल.
प्रख्यात मानववंश शास्त्रज्ञ युवल हरारी (‘सेपियन्स’चा लेखक) याने एका ‘टेड टॉक’मध्ये म्हटले आहे, की ९० टक्के लोकांना भविष्यात काही कामच नसेल.
यावर काहीसा उपाय म्हणून बिल गेट्स यांनी ‘एआय एथिक्स ग्रुप’ सुचवला आहे. त्यांनी असेही म्हटले आहे, की एखाद्या उद्योगाने लोकांना काढून रोबोंना काम दिले, तर त्यांना ‘रोबो कर’ लावण्यात यावा.
‘एआय’वरील संशोधन सहा महिने थांबवावे, असे अनेक तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ, विचारवंत सुचवत आहेत. तंत्रज्ञानाने केलेली कलाकृती वा काम आणि मानवाने केलेले काम यांत फरक करता आला नाही, तर त्याला ‘ट्युरिंग टेस्ट’ म्हणतात. ‘कोबॉट’ या ‘इंडस्ट्री ५.०’मधील तंत्रज्ञानात आपण तेथपर्यंत पोहोचलो आहोत. डॉ. जेफ्री हिंटन हे ‘ट्युरिंग पुरस्कार’ विजेते आहेत.
एवढे सामाजिक अस्थैर्य, विध्वंस होणार असेल, तर ‘एआय’ करायचेच कशाला, असा प्रश्न मनात उद्भवू शकतो. शेवटी ती मानवाचीच निर्मिती आहे. त्याचे उत्तर दडले आहे लोभीपणात.
‘एआय’ मध्ये काम करणाऱ्या कंपन्यांना त्यांच्या भागधारकांना उत्तम परतावा देऊन स्वत:ची तुंबडी भरायची आहे. जगात अस्थैर्य निर्माण होईल वगैरे तात्त्विक गोष्टींत त्यांना रस नसून, त्यांच्यात ‘एआय’मधील अग्रणी होण्याची उघडी-नागडी स्पर्धा आहे, हे नि:संशय.
या स्पर्धेत आपण टिकून राहण्यासाठी शिक्षणपद्धतीत शिक्षकांनी ‘गूगल’ व्हावे आणि विद्यार्थ्यांनी ‘चॅट जीपीटी’. म्हणजेच शिक्षकांनी ‘गूगल’पलीकडचे ज्ञान द्यावे आणि विद्यार्थ्यांनी ‘चॅट जीपीटी’चा वापर करावा; पण त्यावर पूर्ण अवलंबून न राहता स्वत:चा तरतम भाव वापरावा.
या पुढे आपली स्पर्धा ‘एआय’शी असणार आहेच; त्याहीपेक्षा ती ‘एआय’बरोबर काम करणाऱ्या मानवांशी अधिक असेल.
लेखक : अच्युत गोडबोले
प्रस्तुती : मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “कालजयी…” – लेखक : प्रा. डॉ. श्रीकांत तारे ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर ☆
वपुंसोबत शेअर केलेलं असंख्य अविस्मरणीय क्षण मी मनाच्या गाभाऱ्यांत जपून ठेवले आहेत. मधूनच कुणीतरी भेटतं, वपुंचा विषय निघतो, नवीन काही आठवणी बाहेर येतात, अलगद मी भूतकाळांत शिरतो. ‘ज्या चहेत्यांमुळे आज आपण एका विशिष्ट उंचीला पोहोचलोय, ते चहेते म्हणजे आपलं सर्वस्व’ हे ब्रीदवाक्य असणारा आणि माणुसकी जपत आभाळाची ऊंची गाठणारा असा एक ‘कालजयी’ माणूस त्याच्या निर्वाणापर्यंत आपल्या मित्रपरिवारांत होता याकरता स्वत:चाच हेवा वाटू लागतो.
काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमांत, मंगला गोडबोल्यांची मुलाखत घ्यायला आलेली लेखिका नीलिमा बोरवणकर भेटली. कार्यक्रमानंतर एकत्र बसून जेवताना मी वपुंचं नाव घेतलं आणि नीलिमा रोमांचित झाली. खांदे उडवत म्हणाली ,
‘वपुंच्या ऐन उमेदीतील हा किस्सा तुला ठाऊक नसणार’. प्रीमियर ऑटोमोटिव्ह कंपनीचे उपाध्यक्ष होते केशव पोळ. पुण्यात कोथरूडला रहायचे. वृद्धत्वाच्या उंबरठ्यावर किडनी बिघडल्या आणि आठवड्यातून दोनदा डायलिसीस करायचा सल्ला डॉक्टरांनी दिला.’
‘बाप रे, वय वाढत गेलं की डायलिसीस कठीण होत जातं.’ मी ऐकीव माहितीवर ज्ञान पाजळलं.
‘हो ना. त्यातून तीस वर्षांपूर्वीचं डायलिसिस आजसारखं सोपं नव्हतं. पेशंटचे हाल व्हायचे. दोन दिवस दवाखान्यात रहावं लागायचं. घरी आलं की पुढल्या डायलिसिसची मानसिक तयारी करावी लागायची.
दवाखान्यातील त्रासाच्या धसक्यानं रात्र रात्र झोप लागायची नाही. पोळांची पत्नी मग वपुंच्या कथाकथनाची कॅसेट त्यांच्या डोक्याशी लावून त्यांचे पाय चेपत बसायची, वपुंनी सांगितलेली कथा डोक्यात घोळवीत, पोळ झोपी जायचे.’
माझ्या चेहऱ्यावर स्मित आलं. वपुंच्या कॅसेट्ची किमया मी स्वत: कितीदातरी अनुभवली आहे. एकबोटे, भदे, दामले, नळात जाऊन बसलेली भुताची पोरं वगैरे पात्रं, त्यांच्या तोंडचे संवाद मला अक्षरश: तोंडपाठ होते. कॅसेटच्या रूपाने वपु आमच्या घरांत शिरले आणि आमच्या कुटुंबाचा एक भाग झाले. मी नीलिमाला हे सारं सांगणारच होतो, तर मला हाताने थांबवत ती म्हणली,
‘थांब, रे, ही नुसती प्रस्तावना होती, खरा किस्सा तर पुढे आहे. पोळांची दगदग कमी व्हावी म्हणून प्रीमियर कंपनीनं त्यांना घरीच डायलिसीसचं मशिन बसवून दिलं. ओळखीचे एक डॉक्टर, बरोबरीला एक सहाय्यक, एक नर्स अशी टीम यायची, पोळांना घरीच डायलिसिस लावलं जायचं. गंमत म्हणजे, या दरम्यानही वपुंच्या कथाकथनाची कॅसेट त्यांच्या डोक्याशी लावून त्यांचं दुखणं हलकं करण्याचा प्रयत्न केला जायचा.’
मी ऐकतच राहिलो. तीस वर्षापूर्वी घरच्या घरी घरी डायलिसीस करता यायचं ही बातमी माझ्यासाठी आजही थक्क करणारी होती. मी माझं आश्चर्य नीलिमाला बोलून दाखवलं आणि तिनं समोरच्या टेबलवर हलकीशी थाप मारली.
‘बरोबर हेच वपुंना वाटलं. म्हणजे झालं काय की पोळांच्या पत्नीने वपुंना फोन केला एकदा. नवऱ्याचा आजार, घरी लावलेली मशीन, डायलिसीसचे निश्चित दिवस. हे सगळं बोलून झाल्यावर त्यांनी वपुंचे मनःपुर्वक आभार मानले. तुमच्या कथांचा आणि त्या रंगवून सागणाऱ्या तुमच्या आवाजाचा खूप आधार वाटतो माझ्या नवऱ्याला, डायलिसीस होत असतां मी त्यांचे पाय चेपते पण त्यांच्या चेहऱ्यावर स्मित येतं ते तुमच्या आवाजाने. तुमचे ऋण फेडणं कठीण आहे वगैरे बोलल्या. वपुंनीही अगत्याने पोळांच्या प्रकृतीची माहिती करून घेतली, बाईंना धीर दिला. डोळे पुसतच, अतीव समाधानाने बाईंनी फोन ठेवला.’
निलीमा बोलत होती आणि मला वपुंबरोबर माझे टेलिफोनवर घडणारे संवाद आठवत होते. आपल्या चहेत्यांचे फोन घेताना एक नैसर्गिक आनंद त्यांच्या प्रत्येक शब्दांत जाणवायचा. वाचकाने केलेली त्यांच्या लेखनाची तारीफ, समीक्षा, आलोचना, त्याचे व्यक्तिगत प्रश्न, सल्ले, वपु श्रद्धेनं ऐकायचे. एखाद्या वाचकाशी बोलताना त्यांनी वेळेचा विचार केलेला माझ्या ऐकिवात नाही. वपुंच्या मधाळ आवाजाने, आणि आपण त्यांचे ‘खास’ आहोत या जाणीवेनं तृप्त होऊन वाचक फोन ठेवायचा. आठवून माझ्या चेहऱ्यावर आगळी चमक आली असावी, कारण आणि नीलिमा हसली. माझ्या मनातले विचार तिने नेमके ओळखले. माझी उत्कंठा पुरेशी ताणली गेलीय याची खात्री करून घेत तिने पुन्हा सुरुवात केली,
‘तर, या टेलिफोन संवादानंतर दोनेक आठवडे उलटले आणि एके दिवशी अचानक, वपुंचा फोन आला पोळांकडे. कथाकथनाच्या कार्यक्रमा निमित्त पुण्यांत येतोय, कार्यक्रम रात्री आहे, पण पोळसाहेबांच्या डायलिसीसचा दिवस असल्याने डायलिसीस मशीन ऑपरेट होताना बघण्याची इच्छा आहे अश्या अर्थाचा तो फोन होता. वपु आपल्या घरी येणार या नुसत्या कल्पनेनं पोळांकडे उत्साहाला उधाण आलं. त्याकाळी मोबाईल हातात आले नव्हते पण मुंबईहून ते येणार म्हणजे मुंबईहून कितीही लवकर निघाले तरी सकाळी दहा साडे दहाच्या आधी त्यांचं येणं शक्य नाही असा अंदाज पोळ कुटुंबीयांनी बांधला. आपला आवडता लेखक, कथाकथनसम्राट प्रत्यक्ष आपल्या घरी येणार म्हणून शक्तिहीन पोळही वेगळ्याच विश्वात वावरत होते. आणि तुला गंमत सांगते श्रीकांत, सकाळी आठ वाजताच पोळांच्या दारांत वपु हजर होते. भल्या पहाटे चार वाजता त्यांनी मुंबई सोडलं आणि सकाळी लवकर डायलिसीस करायचं असतं हे ठाऊक असल्यामुळे स्पेशल टॅक्सी करून वपुंनी पोळांची ही वेळ गाठली.’
‘माय गॉड. व्हेरी इंटरेस्टिंग.’
‘हो ना. पोळांकडे हीsSSS धांदल. डॉक्टर येऊन बसलेले, सहायक कामाला लागले आणि वपु घरात. एका खुर्चीवर शरीराचा डॉक्टर बसलेला तर दुसरीवर मनाचा. श्री व सौ पोळ यांना तर काय करावं सुचेना,डायलिसीस नित्याचं असलं तरी आज उडालेली त्यांची तारांबळ काही वेगळीच होती.’
निलिमाच्या कथेत मी गुंगत चाललो. पोळ कुटुंब, वपु आणि डॉक्टर यांचे सोबत एका खुर्चीवर मीही जाऊन बसलो. पोळांकडील गड्याने वपुंसोबत मलाही चहा दिला, घड्याळाकडे बघत असलेल्या डॉक्टरांना आग्रहाने मी चहा दिला, वातावरण अधिकाधिक खेळकर करणाऱ्या मस्त गप्पा मारत वपुंनी चहा संपवला, आपला आजार विसरून पोळ, वपुंच्या बोलण्याला, कोट्यांना खळखळून दाद देताहेत, टाळी घेण्यासाठी पुढे केलेला हात माझा आहे कि वपुंचा याकडे लक्ष न देता उत्साहाने टाळी देताहेत हे सारं मला स्पष्ट दिसत होतं. वपु माझ्या घरी आल्यावर होणारी धावपळ आठवत, काही वेळासाठी मी पोळांच्या घरचा एक सदस्य झालो. निलिमाचंही असचं काहीसं झालं होतं. या क्षणी माझ्याबरोबर बहुधा तीही पोळांकडे पोहोचली असावी. तिचा स्वर गंभीर झाला. रणांगणावरील देखावा धृतराष्ट्राला सांगताना संजयचा झाला असेल तसा.
‘तर डायलिसीसची तयारी झाली, पोळांना पलंगावर झोपवलं, सौ पोळांनी कपाटातून कथाकथनाची कॅसेट काढली आणि टेपरेकॉर्डरच्या खटक्याचा आवाज ऐकून, आतापर्यंत डायलिसीस मशीनचं सूक्ष्म निरीक्षण करत असलेले वपु अचानक पलंगापाशी आले. सौ पोळांना थांबवत म्हणाले, आज कॅसेट नाही, वपु आज स्वत: पोळांजवळ बसून नवीन कथा त्यांना सांगतील. सौ पोळ ह्बकल्याच हे ऐकून, मग भानावर येत त्यांनी गड्याला खुर्ची लावायला सांगितली, पोळांच्या डोक्याशी खुर्ची ठेवली गेली, आणि वपुंनी नम्रपणे ती खुर्ची नाकारली. सौ पोळांसाठी राखीव खुर्चीवर पोळांच्या पायाशी बसू द्यायची त्यांनी विनंती केली आणि सौ पोळ गहिवरल्या. डोळे पुसतच त्यांनी पायथ्याची खुर्ची रिकामी केली. वपुंची कथा प्रत्यक्ष त्यांचेकडून फक्त आपल्याला ऐकायला मिळणार या अवर्णनीय आनंदानं डॉक्टर, त्यांचे सहकारी, सौ पोळ प्रचंड भारावले. पोळांचं डायलिसीस सुरु झालं, त्यांच्या पायाशी वपु बसले, आपलं चिरपरिचित स्मित चेहऱ्यावर खेळवीत, धीरगंभीर आवाजांत त्यांनी कथा सांगायला सुरुवात केली.’
किस्सा सांगता सांगता नीलिमा थबकली. शब्दांची जुळवाजुळव तिला करावी लागत असावी. ‘श्रीकांत, आणि….आणि कथा सांगता सांगता वपु चक्क पोळांचे पाय चेपू लागले. चारच श्रोते, पण सारेच अंतर्बाह्य थरारले, स्वप्नातही कल्पना न करू शकणारं दृश्य आपण आज बघतोय याची जाणीव तिथल्या साऱ्यांनाच होत होती. वपुंची कथा विनोदी असूनही श्री व सौ पोळांच्या डोळ्याला धार लागली.’
किस्सा संपवताना निलिमाच्या अंगावरील रोमांच मला स्पष्ट दिसत होता. माझ्या तर संवेदनाच खुंटल्या होत्या. मागे कधीतरी वपुंशी बोलत असतां, ’माझ्या आयुष्यातील सर्वश्रेष्ठ कथाकथनाच्या प्रयोगाला फक्त चारच श्रोते हजर होते’ असं त्यांनी म्हटलेलं मला नेमकं तेव्हाच आठवलं, कधीच सुटणार नाही म्हणून मनाच्या कोपऱ्यांत दडवून ठेवलेलं कोडं अचानक उलगडलं.
माणसं समजून घेत त्यांना आनंदात ठेवण्याची सातत्याने धडपड करीत जगलेल्या या ग्रेट लेखकाच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.
☆
लेखक : प्रा डॉ श्रीकांत तारे
प्रस्तुती : उज्ज्वला केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈
(जन्म – 17 जनवरी, 1952 ( होशियारपुर, पंजाब) शिक्षा- एम ए हिंदी, बी एड, प्रभाकर (स्वर्ण पदक)। प्रकाशन – अब तक ग्यारह पुस्तकें प्रकाशित । कथा संग्रह – 6 और लघुकथा संग्रह- 4 । ‘यादों की धरोहर’ हिंदी के विशिष्ट रचनाकारों के इंटरव्यूज का संकलन। कथा संग्रह – ‘एक संवाददाता की डायरी’ को प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी से मिला पुरस्कार । हरियाणा साहित्य अकादमी से श्रेष्ठ पत्रकारिता पुरस्कार। पंजाब भाषा विभाग से कथा संग्रह- महक से ऊपर को वर्ष की सर्वोत्तम कथा कृति का पुरस्कार । हरियाणा ग्रंथ अकादमी के तीन वर्ष तक उपाध्यक्ष । दैनिक ट्रिब्यून से प्रिंसिपल रिपोर्टर के रूप में सेवानिवृत। सम्प्रति- स्वतंत्र लेखन व पत्रकारिता)
☆ संस्मरण – मेरी यादों में जालंधर – भाग -20 – कुमार विकल मैं बहुत उदास हूँ ☆ श्री कमलेश भारतीय ☆
(प्रत्येक शनिवार प्रस्तुत है – साप्ताहिक स्तम्भ – “मेरी यादों में जालंधर”)
जब जालंधर की यादें लिखनी शुरू की थीं, तब लगता था कि दो चार दिन लिखकर आपसे विदा ले लूंगा लेकिन यादें जालंधर से चलती हुईं मुझे न जाने कौन कौन से देश में लिए जा रही हैं ! थोड़ा सा चंडीगढ़ की ओर भी आ निकला हूँ तो प्रसिद्ध कवि कुमार विकल और पत्रकार निरूपमा दत्त को एक साथ याद कर रहा हूँ क्योंकि जब कुछ समय के लिए निरूपमा दत्त दिल्ली पत्रकारिता के लिए चली गयी थीं तब कुमार विकल ने एक कविता लिखी थी :
निरूपमा दत्त !
मैं बहुत उदास हूँ
तुम चाहे यहाँ से चली गयी हो
लेकिन मैं तुम्हारे आसपास हूँ !
इस तरह इन दोनों को एक साथ ही याद कर रहा हूँ ! वैसे यह अकेलापन या प्रेम सिर्फ कविता तक ही सीमित है न कि कुमार विकल या निरूपमा दत्त किसी और तरह जुड़े रहे । निरूपमा दत्त ने कुमार विकल की कविताओं की निरंतर चर्चा कर उनकी प्रतिभा की ओर आकर्षित किया और यही एक अच्छे पत्रकार का काम भी है और होना भी चाहिए ! यह भी सच है कि कुमार विकल की कविताओं या प्रतिभा को किसी सहारे की जरूरत नहीं थी । साम्प्रदायिक दंगों पर लिखी कविता की याद आ रही हैं कुछ पंक्तियाँ :
यह जो सड़क पर बहता खून है
इसे सूंघ कर बताओ
यह किसका है?
यानी सबके खून का रग एक जैसा ही है, फिर इसे आप हिंदू या मुस्लिम में कैसे बांट रहे हो?
साइकिल से गिरे
मज़दूर के बिखरे डिब्बे की रोटी
खून से लाल है गयी है
कुछ ऐसी पंक्तियां भी रही हैं जो मेहनतकश की ओर ध्यान खींचती हैं !
यह सिर्फ एक बानगी भर है , कुमार विकल की कविताओं की लेकिन कुछेक लोग इनकी शराब पीने की बात उठा कर इनकी कविताओं और व्यक्तित्व को कम करने की कोशिश करते हैं, जो कभी सफल नही हुए और न ही इनका लेखन कभी इनको सफल होने देगा ! यह यक्ष प्रश्न जरूर है कि कुमार विकल के बाद फिर पंजाब या चंडीगढ़ का कोई कवि इतनी ऊंचाई को क्यों नहीं छू पाया?
ऐसे ही किस्से पंजाबी के प्रसिद्ध कवि शिव कुमार बटालवी के बारे में चर्चित हैं लेकिन उनके गीत आज भी बड़े लोकप्रिय हैं और ऐसे ही उन्हें विरह का सुल्तान नहीं कहा जाता है!
खैर, कुमार विकल पंजाब विश्वविद्यालय के प्रकाशन विभाग में काम करते थे और यदि इनसे कोई हिंदी के प्रसिद्ध कवि धूमिल से कम आंके तो यह नादानी होगी ।
अब रही बात निरूपमा दत्त की तो वे पत्रकार के साथ साथ एक्टिविस्ट हैं और आधी दुनिया की आवाज़ बड़े ज़ोर शोर से उठाती आ रही हैं । मैं इन्हें चंडीगढ़ आने से पहले से जानता था और चंडीगढ़ आकर और ज्यादा जाना ! एकदम खुली किताब जैसी ज़िंदगी और खुला व्यक्तित्व ! इन्होंने एक किताब पंजाबी में प्रकाशित की थी, जो मुम्बई की किसी महिला वकील की सच्ची कथा पर आधारित थी और उसका एक वाक्य नहीं भूलता कि मेरा पति मुझे बुरी तरह मारता था । उसकी मार से मिले ज़ख्म तो कुछ दिन बाद भर जाते और भूल जाते पर आत्मा से उनके निशान कभी न जाते! निरूपमा दत्त बहुत अच्छी कवयित्री भी हैं और एक्टिविस्ट तो हैं ही! निरूपमा दत्त ने एक बार इंडियन एक्सप्रेस के अपने काॅलम में मेरे बारे में लिखा था- गुडमैन द लालटेन! यह सर्टिफिकेट की तरह आज भी मेरी फाइलों में से कभी कभी झांक जाता है ! निरूपमा दत्त के खिलंदड़दने की एक रोचक याद है । उस दिन मेरे मित्र रमेंद्र जाखू के काव्य संग्रह पर पंजाब विश्वविद्यालय के आईसीसीएसआर के सभागार में विचार गोष्ठी थी और मैं और निरूपमा सबसे पीछे बैठे थे। निरूपमा दत्त अपने स्वभाव के अनुसार सुन रही थी दत्तचित्त होकर । गोष्ठी खत्म हुई। हम अपने अपने अखबार के दफ्तर भागे । दफ्तर में रमेंद्र का फोन आया कि यार, किसी तरह निरूपमा को रोक लो, वह मेरे बारे में पता नहीं क्या लिख दे । मैंने कहा कि आप आ जाओ, आपको निरूपमा के घर ले चलता हूँ और ऐसा ही हुआ। हम निरूपमा के सेक्टर आठ स्थित घर पहुंचे और निरूपमा को मैंने कहा कि मेरी दोस्ती दोनों से है। रमेंद्र को जो लग रहा है कि आप अच्छा नहीं लिखने जा रही तो इतना ही करो कि कुछ भी न लिखो। यह मित्र इसी में खुश है। निरूपमा ने हमें उस बरसात में ही बढ़िया चाय पिलाई और हंसते हंसते विदा किया। रिपोर्ट से जाखू गद्गद् हो गये!
निरूपमा में दूसरों की प्रशंसा करने और कवरेज की सराहना करने का बहुत बड़ा गुण है, जो सीखने लायक है। मैंने प्रयाग शुक्ल के दामाद सिद्धार्थ की कला प्रदर्शनी पर राइट अप लिखा जो निरूपमा दत्त को बहुत पसंद आया और उसने मुझे फोन पर बधाई दी ! यह गुण सीखने की बात है । वह आज भी अपने अंदाज में जी रही है, कोई और महिला पत्रकार चाह कर भी वैसी ऊंचाई को छू नहीं पाई !
ज्यादा न कह कर इतना ही कहूँगा कि मेरी बात को महसूस कर रहे होंगे कि निरूपमा जैसी होना बहुत मुश्किल है!