मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “सोपं नाही हो हे…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “सोपं नाही हो हे…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यकारिणीचे आम्ही सर्वजण एका  वृद्धाश्रमाला भेट द्यायला निघालो होतो. संचालकांनी  “एकदा येऊन बघून जा” असे सांगितले होते . आमचे अध्यक्ष श्री जोशी यांची बायको आणि मी जाताना  जवळ बसलो होतो. त्या जरा वेळाने मला म्हणाल्या ,

“अग माझी नणंद यांची सख्खी बहिण तेथे आहे. आज  आठ महिन्यांनी आमची भेट होईल.”

” ती तिथे असते” ?

मला आश्चर्यच वाटले .

” हो..अग तिचा मुलगा अमेरिकेत.. तो एकुलता एक.. आईची इथं सोय करून गेला आहे. गेली आठ वर्ष ती तिथेच आहे. पहिल्यांदा आम्ही सारखे  जात होतो तिला भेटायला. पण आता आमची आमची ही वयं झाली ….प्रेम आहे ग… पण ….”

यावर काय बोलणार? सत्यच होते ते…

“तुमच्या घरी त्या येत होत्या का?”

” त्या लोकांनी सांगितलं ..घरी जास्ती नेऊ नका .कारण नंतर मग त्यांना इथे करमत नाही. “

“त्यांना  ईतरांच्या अनुभवाने ते जाणवले असणार…”

“हो ग… पहिले काही दिवस भाचे, पुतणे, नातेवाईक त्यांना भेटायला गेले. नंतर हळूहळू त्यांचेही जाणे कमी होत गेले …. हल्ली इतका वेळही नसतो ग कोणाला..”

हे सांगताना  वहिनींचा गळा दाटून आला होता….

आम्ही तिथे पोहोचलो. गाडीतून उतरलो .एक नीटस, गोरीपान, वयस्कर अशी बाई धावतच आली…..

तिने जोशी वहिनींना मिठी मारली. शेजारी काका उभे होते. त्यांना वाकून नमस्कार केला .तिघांचे डोळे भरून आले होते .

मी ओळखले या नणंदबाई असणार… त्यांना झालेला आनंद आम्हालाही जाणवत होता. तिथे आम्ही चार तास होतो .तेव्हढा वेळ त्या दोघांच्या आसपासच होत्या .

सेक्रेटरींनी संस्थेची माहिती दिली. आणि संस्था बघा म्हणाले.सगळेजण गेले.

मी जोशी वहिनींबरोबर त्यांच्या नणंदेच्या रूममध्ये गेले .वहिनी दमल्या होत्या. नणंदेनी त्यांना कॉटवर झोपायला लावले. चादर घातली आणि पायाशी बसून राहिल्या.

विश्रांती घेऊन वहिनी उठल्यानंतर ते तिघ गप्पा मारत बसले. लहानपणीच्या ,आईच्या, नातेवाईकांच्या आठवणी काढत होते. हसणं पण चालू होतं.

इतक्यात “जेवण तयार आहे” असा निरोप आला.

जेवण वाढायला तिथे लोक होते. तरीसुद्धा नणंदबाई स्वतः दोघांना वाढत होत्या. काय हवं नको बघत  विचारत होत्या .

त्यांचं जेवण संपत आल्यावर त्यांनी पटकन जेवून घेतलं.

थोड्यावेळाने आम्ही निघालो.

तेव्हा नणंदबाईंना रडू आवरेना… तिघही नि:शब्द रडत होते.. बोलण्यासारखं काय होतं?

सगळं समोर दिसतच होत….

सर्वात शेवटी दोघे गाडीत चढले.

बाहेर पदर डोळ्याशी लावून उभ्या असलेल्या नणंदबाई….

आम्हाला सर्वांनाच पोटात कालवत होत.

परत येताना वहिनी तर हुंदके देऊन रडत होत्या.

गप्प गप्प होत्या….

नंतर काही वेळानंतर म्हणाल्या

” वाईट वाटतं ग.. पण माझ्याकडे तरी कस आणणार? आमची एक मुलगी. आमचचं आजारपण करताना तिची किती तारांबळ होते …नणंदेची जबाबदारी तिच्यावर कशी टाकणार?तीलाही तिचा संसार नोकरी आहे. आणि हा एक दोन दिवसाचा प्रश्न नाही ग….पण नणंदेला एक  सांगितलं आहे …आमच्या दोघांपैकी एक जण गेलं की मी  किंवा हे तिकडेच राहायला येणार…”

हे ऐकल आणि  माझेही डोळे भरून आले..

जे वास्तव आहे ते वहिनी सांगत होत्या तरीपण…….

वहिनी पुढे म्हणाल्या

 ” ती नेहमी म्हणते  तुम्ही दोघ एकत्रच रहा…..तुम्हाला  दोघांना उदंड आयुष्य देवो देवांनी… “

पण ते झालंच नाही…. जोशी काका गेले आणि पंधरा दिवसांनी वहिनी पण गेल्या……

अशाच कधीतरी मला नणंदबाई आठवतात …आणि डोळे भरून येतात…. 

तिथे राहणाऱ्या प्रत्येकाची एक वेगळी कथा आहे………

तुम्ही घरी तक्रार न करता सुखात आनंदात रहा…

कारण असं जाऊन राहणं सोप्पं नसतंच…..

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सी. डी. ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

? इंद्रधनुष्य ? 

☆ “सी. डी.” ☆ श्री सुनील शिरवाडकर

दुपारची निरव शांतता..विस्तीर्ण हिरवळीवर दाट व्रुक्षांच्या छाया पडल्या आहेत.त्याला लागुनच ऐसपैस ग्रंथालय..त्याच्या ऊंचच ऊंच काचांच्या खिडक्या.. आणि त्या खिडक्यांजवळ असलेली टेबल्स,खुर्च्या. तेथे बसलेली एक एक अलौकिक व्यक्तीमत्वे.कधी अब्दुल कलाम.. कधी अम्रुता प्रीतम..कधी गुलजार.. तर कधी नरसिंहराव.

हो..अशी एक जागा आहे दिल्लीत.’इंडिया इंटरनैशनल सेंटर’. तेथे नजरेस पडतील फक्त आणि फक्त प्रतिभावंत. मग ती कुठल्याही क्षेत्रातील असो.

देशातील विविध क्षेत्रातील नामवंतांना म्हणजे शास्त्रज्ञ, साहित्यिक, कलावंत,पत्रकार, राजनितिज्ञ,विचारवंतांना  एकत्र येण्यासाठी.. विचार विनिमय करण्यासाठी एक जागा असावी ही मुळ कल्पना डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची.हे असे केंद्र प्रत्यक्षात उभे करायचे तर त्यासाठी तश्याच उत्तुंग व्यक्तीमत्वाची गरज होती.

१९६० च्या आसपासची ही गोष्ट. संयुक्त महाराष्ट्र प्रकरणात वाद झाल्यामुळे डॉ.सी.डी.देशमुख मंत्रीमंडळातुन राजीनामा देऊन बाहेर पडले होते. पं.नेहरुंमध्ये आणि त्यांच्यामध्ये काही बाबतीत  मतभिन्नता जरुर होती.पण पं.नेहरु ‘सिडीं’ ची विद्वत्ता, योग्यता जाणुन होते. त्यांनी या प्रकल्पाची संपुर्ण जबाबदारी ‘सी.डीं. ‘ वर सोपवली. त्यांच्या सोबत होते जोसेफ स्टाईन…. एक अमेरिकन वास्तुविशारद. यांच्या विचारांवर..किंवा एकूणच व्यक्तीमत्वावर रवींद्रनाथ टागोरांचा प्रभाव होता.

सर्वप्रथम जागा निवड… नवी दिल्लीत लोधी गार्डन परीसर आहे. पाचशे वर्षांचा इतिहास असलेल्या या निसर्गरम्य परीसरातील जवळपास पाच एकराचा भूखंड निवडण्यात आला.बांधकाम सर्वस्वी वेगळ्या पद्धतीने करायचे ठरले. प्री फैब्रीकेटेड बांधकाम साहित्य आणि जोडीला ओबडधोबड दगड असा एक प्रयोग करण्यात आला. आणि हळुहळु सिडींना अभिप्रेत असलेली साधेपणात सौंदर्य शोधणारी वास्तु आकार घेऊ लागली.

प्रशस्त हिरवळीच्या पार्श्वभूमीवर असलेली ही देखणी वास्तू .. .प्रवेशद्वारापासूनच त्याचं वेगळेपण जाणवतं.आत प्रवेश केल्यानंतर डाव्या हाताला ग्रंथालय आणि सीडींच्या नावाचे भव्य सभागृह. सीडींना अभिप्रेत असलेली बौध्दिक सौंदर्य खुलवणारी ही वास्तू उभी करतांना कुठल्याही प्रकारची तडजोड करण्यात आली नाही.

पन्नास सदस्यांनी सुरुवात झालेल्या ‘आयसीसी’ चे आजची सदस्य संख्या सात हजारांपर्यंत पोहोचली आहे. येथील सदस्यत्व मिळणे तितकेसे सोपे नाही. मोठी वेटिंग लिस्ट असते. वर्षोनुवर्षे प्रतिक्षा केल्यानंतर योग्य व्यक्तीस तेथे सदस्यत्व बहाल केले जाते. पण तरीही केंद्रात सत्ता असलेल्या पक्षाच्या समर्थक व्यक्तीला तुलनेने प्राधान्य दिले जाते. आणि ते साहजिकच आहे.

येथील सदस्यसंख्या मोठी आहे.. पण त्यात स्वाभाविकच वयस्कर अधिक आहे. नवीन रक्ताला वाव मिळुन नवीन तंत्रज्ञान, आधुनिकीकरण व्हावे अशी भावना तेथील तरुण प्रतिभावंतांची आहे.

सध्या ‘आयसीसी’ अनेक उपक्रम सुरु आहेत.थिंक टँक.. चर्चासत्रे.. संमेलने..पुस्तक प्रकाशने हो आहेतच.लंच किंवा डिनर पार्टीच्या निमित्ताने विचार, कल्पनांची देवाणघेवाण होत असते.

साठ वर्षे उलटुन गेल्यानंतरही या वास्तुचे सौंदर्य तसुभरही कमी वाटत नाही. आजही राजधानीतीलच नव्हे तर देशातील बुध्दीमानांना आकर्षित करुन घेणारे हे ‘आयसीसी’..आणि त्याचे शिल्पकार आहेत डॉ.चिंतामणराव देशमुख. येथील प्रमुख सभागृहाला त्यांचे नाव देऊन त्यांच्या स्मृती चिरंतन ठेवण्यात आल्या आहेत.

यंदाचे वर्ष म्हणजे सीडींचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जन्मवर्ष. बरोब्बर १२५ वर्षापुर्वी जन्म झालेल्या डॉ. चिंतामणराव देशमुख यांचे राजधानीत असलेले हे स्मारक समस्त मराठी जनांना अभिमानास्पद आहे यात शंका नाही.

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “त्या तरुतळी विसरले गीत …” – लेखिका : सुश्री माधुरी ताम्हाणे देव ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ “त्या तरुतळी विसरले गीत …” – लेखिका : सुश्री माधुरी ताम्हाणे देव ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे

आपल्या स्वतःच्या कवितेच्या दोन ओळी किंवा शब्द कुठे लिहून ठेवण्याआधी अगदी मनातल्या मनात हरवून जातात तेव्हा होणारी मनाची घालमेल शब्दात न सामावणारी असते. आपली कविता दुसऱ्याने स्वतःच्या नावाने किंवा नाव न देताच माध्यमावर दिली की जीवाची होणारी बेचैनीही शब्दातीत असते. एकूणच, कविता हरवणे हा अनुभव शब्दात व्यक्त करणे आणि ती व्याकुळ अवस्था इतरांपर्यंत पोहोचवणं सोपे नव्हे. 

परंतु कवी वा.रा कांत यांच्यासारखा  कवी कवितेचे हे हरवणं इतक्या उत्कटपणे काव्यातून व्यक्त करतो की त्या काव्याचं एक अविस्मरणीय असं विरहगीत म्हणूया किंवा भावगीत  पिढ्यान पिढ्या मनाचा ठाव घेत आहे. 

“त्या तरुतळी  विसरले गीत” हे वा.रा कांत यांचं गीत एका “हरवण्याच्या” अनुभवातून आकारलं आहे. वा. रा कांत हे नांदेडचे कवी सायकल घेऊन नोकरीच्या ठिकाणी  जात असत. हा रस्ता रानातून जात असे. तिथेच एका तळ्याकाठी असलेल्या  झाडाखाली बसून ते अनेकदा कविता लिहीत असत. या कविता किंवा सुचलेल्या ओळी एका वहीत लिहून ठेवत असत. एक दिवस घरी परतल्यावर आपण कवितांची वही  त्या झाडाखालीच विसरलो हे त्यांच्या लक्षात आलं. आणि मग मनाची झालेली घालमेल व्यक्त करताना शब्द त्यांच्या समर्थ लेखणीतून  आले –  

“ त्या तरुतळी विसरले गीत “ 

जेव्हा जेव्हा मी हे गीत ऐकत असे  तेव्हा अपुऱ्या राहिलेल्या भेटीची ही व्याकुळ आठवण आहे असं मला वाटत असे. “हरवलेल्या वही”ची ही गोष्ट कळल्यावर मात्र ह्या गीतातील शब्दांचे संदर्भ मनाला अधिकच अस्वस्थ करू लागले. 

आपली वही उद्या मिळेल का? ही. मनाची घालमेल सांगणार तरी कुणाला? मनाच्या या अवस्थेतून   वा,रा कांत यांच्यातील सृजनशील कवी कडून कशा ओळी लिहिल्या जातात बघा –  

त्या तरुतळी विसरले गीत

हृदय रिकामे घेऊनि फिरतो, 

इथे तिथे टेकीत

मुक्या मना मग भार भावना

स्वरातुनी चमकते वेदना

तप्त रणे तुडवीत हिंडतो, ती छाया आठवीत.

आपण आणखी कविता लिहू शकतो, लिहिल्या जातील इतकी विशाल प्रतिभा आपल्याकडे आहे हे जाणणाऱ्या कवीच्या मनात गेलेल्या कवितांची हुरहूर आहेच. 

“विशाल तरु तरी फांदी लवली”

दुसऱ्या दिवशी सकाळी साशंकपणेच ते त्या तळ्याकाठी   पोचतात तेव्हा काय आश्चर्य? 

त्यांची वही तिथे असतेच पण ती झाडाखाली नुसतीच पडलेली नाही. तर झाडाला रेलून आपल्या सख्याची  वाट बघत उभ्या असलेल्या एका सुंदर तरुणीच्या हातात ती वही आहे असे दृश्य त्यांना दिसते. आणि ते लिहून जातात – 

मदालसा तरुवरी रेलुनी

वाट बघे सखी अधिर लोचनी

पानजाळि सळसळे, वळे ती, मथित हृदय कवळीत

आणि त्या तरुणीचं वर्णन करताना शब्दचित्रच रेखातात –

पदर ढळे, कचपाश भुरभुरे

नव्या उभारित ऊर थरथरे

अधरी अमृत उतू जाय परि, पदरी हृदय व्यथीत.

वाट बघून ती तरुणी जणू शिणली आहे, थकलेली आहे. कवीची अवस्था तरी  कुठे वेगळी आहे? कवितेच्या वही साठी वणवण करून माझाही देह (तनु ) थकलेला आहे. मात्र  दोघांची परिस्थिती त्या क्षणी  अशी एक  अशी असली तरी दोघांच्याही हृदयातील  आकांक्षा मात्रवेगवेगळी आहे. दोघांच्यात असलेले हे साम्य आणि विरोधाभास  वा.रा  कांत किती सुंदर शब्दात लिहून गेलेत  –  

उभी उभी ती तरुतळि शिणली

भ्रमणी मम तनु थकली गळली

एक गीत, परी चरण विखुरले, द्विधा हृदय-संगीत तरुतळी गीत विसरल्यानंतर झालेली मनातील घालमेल उत्कटतेने व्यक्त करणारं भावगर्भ  असं  हे गीत यशवंत देवां सारख्या संवेदनशील संगीतकाराला भावणं हा आणखी एक सुंदर योग. कवीच्या भावना उत्कटपणे व्यक्त करणारं हे गीत यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलं  आणि ते गाण्यासाठी  साक्षात सुधीर फडके यांचा आवाज लाभावा? हा सुवर्ण योग ?  आपण आपल्या पुरते तरी याला रसिकांचे भाग्य समजूया.   

त्या तरुतळी विसरले गीत कवितेमागची कथा संपूर्णपणे  खरी असो वा नसो. तो विचार दूर सारून.

“ तप्त रणे तुडवीत हिंडतो” 

 “त्या तरुतळी विसरले गीत” 

..हे शब्द  सुधीर फडके यांच्या आवाजात कानावर येतात तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळी  आपल्याला व्याकुळ आणि भावनावश करतात इतके मात्र खरे.    

लेखिका : सुश्री माधुरी ताम्हाणे देव

संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ दणका ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

 

?️?  चित्रकाव्य  ?️?

? दणका श्री प्रमोद वामन वर्तक ☆

मुखपृष्ठाचा अप्रतिम नमुना 

सादर केला टाइम मासिकाने,

खरा ट्रम्प आणला जगासमोर 

दणका देऊन न्यायमंडळाने !

*

“गिर गया तो भी टांग उपर”

उभा रहाणार निवडणुकीला,

निर्लज्‍जं सदा सुखी म्हणीचा 

म्हणावा कां ताजा मासला ?

*

कळस किळसवाणा त्याने 

काळीकृत्य करतांना गाठला,

तोंड बंद ठेवण्या ‘त्या सखीला’

कोटी रुपयाचा मलिदा चाखला !

*

पट्टी असली जरी डोळ्यावरी 

नसते न्याय देवता आंधळी,

यथा अवकाश सगळ्यांची

बाहेर येती सारी कर्म काळी !

बाहेर येती सारी कर्म काळी !

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ तन्मय साहित्य #232 – कविता – ☆ धूप तेज है गर्म हवाएँ…… ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ ☆

श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’

(सुप्रसिद्ध वरिष्ठ साहित्यकार श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ जी अर्ध शताधिक अलंकरणों /सम्मानों से अलंकृत/सम्मानित हैं। आपकी लघुकथा  रात  का चौकीदार”   महाराष्ट्र शासन के शैक्षणिक पाठ्यक्रम कक्षा 9वीं की  “हिंदी लोक भारती” पाठ्यपुस्तक में सम्मिलित। आप हमारे प्रबुद्ध पाठकों के साथ  समय-समय पर अपनी अप्रतिम रचनाएँ साझा करते रहते हैं। आज प्रस्तुत है आपकी एक विचारणीय कविता “नया पथ अपना स्वयं गढ़ो…” ।)

☆ तन्मय साहित्य  #231 ☆

धूप तेज है गर्म हवाएँ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ ☆

(मेरे बाल गीत संग्रह “बचपन रसगुल्लों का दोना” से एक बालगीत)

धूप तेज है गर्म हवाएँ

बोलो! कैसे बाहर जाएँ।

मौसम जब आए गर्मी का

सूरज जी की हठधर्मी का

सभी तरफ सूखा ही सूखा

इंतजार शीतल नरमी का,

जैसे तैसे कूलर वुलर से

हम अपने मन को समझाएँ

बोलो कैसे ……।

*

कुम्हला गए फूल गमलों के

पेड़ सभी हो गए उदासे

इधर पिया पानी कुछ पल के

बाद वही प्यासे के प्यासे,

शीतल पेय बर्फ के गोले

ये भी ताप नहीं हर पाएँ

बोलो कैसे …….।

*

माँ कहती बारी-बारी से

मौसम तो आते जाते हैं

हर मौसम में कुछ तकलीफें

तो फिर कुछ अच्छी बातें हैं,

गर्मी के कारण ही तो, बादल

नभ से पानी बरसाए

बोलो कैसे ……।

*

मिली छुट्टियाँ है गर्मी की

खेल-कूद में समय बिताएँ

लूडो, केरम साँप-सीढ़ी तो

सुबह शाम बाहर क्रीड़ाएँ,

इस्केटिंग तैराकी, कथा-कहानी

आपस में बतियाएँ

धूप तेज है गर्म हवाएँ

बोलो! कैसे बाहर जाएँ।।

☆ ☆ ☆ ☆ ☆

© सुरेश कुशवाहा ‘तन्मय

जबलपुर/भोपाल, मध्यप्रदेश, अलीगढ उत्तरप्रदेश  

मो. 9893266014

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ जय प्रकाश के नवगीत # 56 ☆ खुल गया आकाश… ☆ श्री जय प्रकाश श्रीवास्तव ☆

श्री जय प्रकाश श्रीवास्तव

(संस्कारधानी के सुप्रसिद्ध एवं अग्रज साहित्यकार श्री जय प्रकाश श्रीवास्तव जी  के गीत, नवगीत एवं अनुगीत अपनी मौलिकता के लिए सुप्रसिद्ध हैं। आप प्रत्येक बुधवार को साप्ताहिक स्तम्भ  “जय  प्रकाश के नवगीत ”  के अंतर्गत नवगीत आत्मसात कर सकते हैं।  आज प्रस्तुत है आपका एक भावप्रवण एवं विचारणीय नवगीत “खुल गया आकाश…” ।

✍ जय प्रकाश के नवगीत # 56 ☆ खुल गया आकाश… ☆ श्री जय प्रकाश श्रीवास्तव

खिड़कियों पर

धूप के पर्दे टँगे

खुल गया आकाश ।

 

हवाओं ने

खोलकर जूड़ा

सुखाए वसन गीले

पंछियों के

सधे पंखों पर

सुबह के रंग पीले

 

जंगलों के

बीच फूलों की हँसी

छा गया मधुमास।

 

किसानों के

हाथ,हल की मूठ

हरियाली का सपना

बंजरों तक

जा लिखें हैं श्रम

बोकर पसीना अपना

 

अंकुरित है

हृदय की पगथली में

झूमता उल्लास ।

***

© श्री जय प्रकाश श्रीवास्तव

सम्पर्क : आई.सी. 5, सैनिक सोसायटी शक्ति नगर, जबलपुर, (म.प्र.)

मो.07869193927,

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – औरत ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

? संजय दृष्टि –  औरत  ? ?

(1)

ईश्वर फूँकता है प्राण

सृष्टि की रचना हो जाती है,

कोख में पालती है जीव

औरत, ईश्वर हो जाती है!

(2)

औरत के पेट में

दम तोड़ती

भविष्य की औरत,

गौशाला

मानो कत्लगाह हो गई है!

© संजय भारद्वाज  

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

🕉️ 💥 श्री हनुमान साधना सम्पन्न हुई। अगली साधना की जानकारी आपको शीघ्र ही दी जाएगी। 💥 🕉️

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – आलेख ☆ अभी अभी # 382 ⇒ विषय… ☆ श्री प्रदीप शर्मा ☆

श्री प्रदीप शर्मा

(वरिष्ठ साहित्यकार श्री प्रदीप शर्मा जी द्वारा हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए साप्ताहिक स्तम्भ “अभी अभी” के लिए आभार।आप प्रतिदिन इस स्तम्भ के अंतर्गत श्री प्रदीप शर्मा जी के चर्चित आलेख पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है आपका आलेख – “विषय…।)

?अभी अभी # 382 ⇒ विषय ? श्री प्रदीप शर्मा  ?

अगर विचार ही शून्य हों, तो विषय कहां से सूझे। सुबह परीक्षा तो देने जा रहे हैं, लेकिन पेपर किस विषय का है, यह ही पता नहीं, तो परीक्षा क्या खाक देंगे। बिना तैयारी परीक्षा नहीं दी जाती। लेकिन जहां जीवन में रोज परीक्षा चल रही हो, वहां बिना प्रश्न पत्र और बिना विषय के ही परीक्षा देनी पड़ती है।

अभी अभी मेरी रोज परीक्षा लेता है, आज भी ले रहा है। जब तक विषय वस्तु समझ नहीं पाता, विषय प्रवेश कैसे करूं। मुझे तो लगता है, यह विषय शब्द ही विष से बना है, क्योंकि जहां विषय है वहां विकार अवश्य ही होगा। जितना संबंध विषय का विकार से है, उतना ही वासना से भी है।।

अगर इस दृष्टिकोण से विषय सूची बनाई जाए तो उसमें विषधर और विषकन्या भी शामिल हो जाएंगे। विषपान तो केवल विश्वेश्वर नीलकंठ महादेव ही कर सकते हैं, हां विष वमन के लिए राजनीति के विषधर अवश्य मौजूद हैं।

तो क्या विषयांतर नहीं किया जा सकता। विषय में रहते हुए विषयांतर इतना आसान नहीं होता।

ज्ञानेंद्रियों द्वारा प्राप्त रस, पदार्थ या तत्त्व (जैसे—गंध और स्वाद का विषय)।

आधारिक कल्पना (जैसे अभी अभी का विषय क्या होगा)

अध्ययन की सामग्री, सब्जेक्ट आदि।

विवेचन, विचार, मैटर ..

वैसे विषय का शाब्दिक अर्थ, ज्ञानेंद्रियों द्वारा प्राप्त रस, पदार्थ या तत्त्व (जैसे—गंध और स्वाद का विषय) है। विषय का एक और व्यावहारिक अर्थ

आधारिक कल्पना अर्थात् theme और सब्जेक्ट है।।

संसार के सभी विषयों में तो सुख दुख हैं। जीव दुख से भागना चाहता है, उसे सिर्फ सुख की चाह है। सुख के विषय उसे प्रिय हैं,

अनंत सुख वह जानता नहीं, इसलिए विषय भोग में उलझा रहता है। नीरस जीवन किसे अच्छा लगता है, रसना बिना जीवन में रस ना। विषयासक्त और अनुरक्त से बेहतर स्थिति होती है, एक विरक्त की। विषय में विकार है, विरक्त में कोई विकार नहीं। सूरदास हमारी स्थिति बेहतर जानते हैं, शायद इसीलिए इस विषय को एक खूबसूरत मोड़ देकर कहते हैं ;

मेरो मन अनत कहां सुख पावै।

जैसे उड़ि जहाज कौ पंछी पुनि जहाज पै आवै॥

कमलनैन कौ छांड़ि महातम और देव को ध्यावै।

परमगंग कों छांड़ि पियासो दुर्मति कूप खनावै॥

जिन मधुकर अंबुज-रस चाख्यौ, क्यों करील-फल खावै।

सूरदास, प्रभु कामधेनु तजि छेरी कौन दुहावै॥

♥ ♥ ♥ ♥ ♥

© श्री प्रदीप शर्मा

संपर्क – १०१, साहिल रिजेंसी, रोबोट स्क्वायर, MR 9, इंदौर

मो 8319180002

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कविता ☆ मुसीबतों से हमारा न हौसला टूटा… ☆ श्री अरुण कुमार दुबे ☆

श्री अरुण कुमार दुबे

(वरिष्ठ साहित्यकार श्री अरुण कुमार दुबे जी, उप पुलिस अधीक्षक पद से मध्य प्रदेश पुलिस विभाग से सेवा निवृत्त हुए हैं । संक्षिप्त परिचय ->> शिक्षा – एम. एस .सी. प्राणी शास्त्र। साहित्य – काव्य विधा गीत, ग़ज़ल, छंद लेखन में विशेष अभिरुचि। आज प्रस्तुत है, आपकी एक भाव प्रवण रचना “मुसीबतों से हमारा न हौसला टूटा“)

✍ मुसीबतों से हमारा न हौसला टूटा... ☆ श्री अरुण कुमार दुबे 

हम ऐसे ऐसे फकीरों के साथ बैठे हैं

ख़ुदा के जैसे सफ़ीरों के साथ बैठे हैं

 *

उतर गए हैं चढ़े रूढ़ियों के सब चश्मे

हयात में जो कबीरों के साथ बैठे हैं

 *

सियासतों की हकीकत से हम हुए वाकिफ

बहुत जो दफ़्य वज़ीरों के साथ बैठे हैं

 *

मुसीबतों से हमारा  न हौसला टूटा

अनेक बार क़दीरों के साथ बैठे हैं

 *

पलट के बात से आँखें फिरायें हम अपनी

बड़ों से सीखे न कीरों के साथ बैठे हैं

 *

ये शुहवतों का असर है नहीं चमक अपनी

मिला है साथ मुनीरों के साथ बैठे है

*

मैं फैसला जो लू तो सोचता सभी पहलू

सबब यही है वशीरों के साथ बैठे हैं

*

मदद को हाथ उठे रहते हैं हमेशा  जो

असर है हमपे नसीरों के साथ बैठे हैं

*

अरुण कभी न कोई बात हम करें छोटी

न आज तक जो हक़ीरों के बैठे हैं

© श्री अरुण कुमार दुबे

सम्पर्क : 5, सिविल लाइन्स सागर मध्य प्रदेश

सिरThanks मोबाइल : 9425172009 Email : arunkdubeynidhi@gmail. com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कथा-कहानी # 106 – बैंक: दंतकथा: 3 ☆ श्री अरुण श्रीवास्तव ☆

श्री अरुण श्रीवास्तव

(श्री अरुण श्रीवास्तव जी भारतीय स्टेट बैंक से वरिष्ठ सेवानिवृत्त अधिकारी हैं। बैंक की सेवाओं में अक्सर हमें सार्वजनिक एवं कार्यालयीन जीवन में कई लोगों से मिलना   जुलना होता है। ऐसे में कोई संवेदनशील साहित्यकार ही उन चरित्रों को लेखनी से साकार कर सकता है। श्री अरुण श्रीवास्तव जी ने संभवतः अपने जीवन में ऐसे कई चरित्रों में से कुछ पात्र अपनी साहित्यिक रचनाओं में चुने होंगे। उन्होंने ऐसे ही कुछ पात्रों के इर्द गिर्द अपनी कथाओं का ताना बाना बुना है। आज से प्रस्तुत है एक विचारणीय आलेख  बैंक: दंतकथा: 3

☆ कथा-कहानी # 106 –  बैंक: दंतकथा: 3 ☆ श्री अरुण श्रीवास्तव ☆

अविनाश अतीत में गोते लगाते रहते  पर मोबाईल में आई नोटिफिकेशन टोन ने उन्हें अतीत से वर्तमान में ट्रांसपोर्ट कर दिया. आंचलिक कार्यालय की घड़ी रात्रि के 8 बजे के दरवाजे पर दस्तक दे रही थी. पर मोबाईल में वाट्सएप पर आया केके का मैसेज उन्हें लिफ्ट में ही रुककर पढ़ने से रोक नहीं पाया।

मैसेज : Dear AV, Mr. host of the month, what will be the menu of sunday lunch ?

Reply from AV : It will be a secret surprise for both of us, only Mrs. Avantika Avinash & Mrs. Revti Kartikay know. But come on time dear Sir. Reply was followed by various whatsapp emojis which were equally reciprocated by KK.

अविनाश और कार्तिकेय की दोस्ती सही सलामत थी, मजबूत थी. ये दोस्ती ऑफिस प्रोटोकॉल के नियम अलग और पर्सनल लाईफ के अलग से, नियंत्रित थी. हर महीने एक संडे गेट टु गेदर निश्चित ही नहीं अनिवार्य था जिसकी शुरुआत फेमिली लंच से होती थी, फिर बिग स्क्रीन टीवी पर किसी क्लासिक मूवी का लुत्फ़ उठाया जाता और फाईनली अवंतिका की मसाला चाय या फिर रेवती की बनाई गई फिल्टर कॉफी के साथ ये चौकड़ी विराम पाती. जब कभी मूवी का मूड नहीं होता या देखने लायक मूवी नहीं होती तो कैरमबोर्ड पर मनोरंजक और चीटिंग से भरपूर मैच खेले जाते. ये चीटिंग कभी कभी खेले जाने वाले चेस़ याने शतरंज के बोर्ड पर भी खिलाड़ियों को चौकन्ना बनाये रखती. शतरंज के एक खिलाड़ी की जहाँ knight याने घोडों के अटेक में महारत थी, वहीं दूसरा खिलाड़ी बाजी को एंडगेम तक ले जाने में लगा रहता क्योंकि उसे पैदलों याने Pawns को वजीर बनाने की कला आती थी।घोड़े और पैदल शतरंज के मोहरों के नाम हैं और उनकी पहचान भी.

जहाँ अविनाश और अवंतिका प्रेमविवाह से बंधे युगल थे वहीं रेवती का चयन, कार्तिकेय के परंपराओं को  कसकर पकड़े उनके पेरेंट्स की पसंद से हुआ था. मिसेज़ रेवती कार्तिकेय जी विश्वविद्यालय में दर्शनशास्त्र पढ़ाती थीं पर उससे भी बढ़कर सांभर बनाने की पाककला में पीएचडी थीं. उनका इस कहावत में पूरा विश्वास था कि दिल तक पहुंचने के रास्ते की शुरुआत, सुस्वादु भोजन के रूप में पेट से होती है.

तो इस मंथली लंच टुगेदर के होस्ट कभी अविनाश होते तो कभी कार्तिकेय।महीने में एक बार आने वाले ये सुकून और आनंददायक पल, कुछ कठोर नियमों से बंधे थे जहाँ बैंक और राजनीति पर चर्चा पूर्णतया वर्जित थी. स्वाभाविक था कि ये नियम रेवती जी ने बनाये थे क्योंकि उनके लिये तीन तीन बैंकर्स को झेलना बर्दाश्त के बाहर था।

कार्तिकेय जानते थे कि कैरियर के लंबे सफर के बाद पुराने दोस्त से मुलाकात हुई है और पता नहीं कब तक एक सेंटर पर रहना संभव हो पाता है, तो इन खूबसूरत लम्हों को दोनों भरपूर इंज्वाय करना चाहते थे. वैसे इस बार लंच का मेन्यु, अविनाश की बनाई फ्राइड दाल, अवंतिका की बनाई गई मसालेदार गोभी मटर थी और देखी जा रही मूवी थी ऋषिकेश मुखर्जी निर्देशित और राजेश खन्ना, अमिताभ बच्चन अभिनीत “नमकहराम”. और जो गीत बार बार रिपीट किया जा रहा था वो था

दिये जलते हैं, फूल खिलते हैं

बड़ी मुश्किल से मगर, दुनियां में दोस्त मिलते हैं

दौलत और जवानी इक दिन खो जाती है

सच कहता हूँ सारी दुनिया दुश्मन हो जाती है

उम्र भर दोस्त मगर साथ चलते हैं, दिये जलते हैं

ये फिल्म देख रहे दोनों परिवारों का पसंदीदा गीत था और हो सकता है कि शायद कुछ पाठकों का भी हो.

तो खामोश मित्रों और मान्यवरों, ये दंतकथा अब इन परिवारों की समझदारी और दोस्ती को नमन कर यहीं विराम पाती है।हो सकता है फिर कुछ प्रेरणा पाकर आगे चले, पर अभी तो शुभकामनाएं और धन्यवाद !!!

© अरुण श्रीवास्तव

संपर्क – 301,अमृत अपार्टमेंट, नर्मदा रोड जबलपुर 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares