मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुखाचे माहेर… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

श्री शरद कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

सुखाचे माहेर… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

घर स्वप्नाचे डोळ्यात,

जेंव्हा तुझ्या मी पाहतो.

घर डोळ्यात स्वप्नाचे,

मी स्वप्नात बांधतो.

*

घर बांधावे वाळूत,

भव्यदिव्य दिमाखात .

सारे अद्भुत अगम्य ,

जग,थोडा शैशवात.

*

ठरे चिमणी शहाणी,

तिचे मेणाचेच घर.

गेले वाहून काऊचे,

शेणामातीचे ते घर.

*

वर मायेचे छप्पर ,

आत सुखाचे माहेर .

नाही धाकाचा उंबरा,

असे बांधीन मी घर.

© श्री शरद  कुलकर्णी

मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मनाचे प्रोग्रामिंग… ☆ सौ. अंजोर चाफेकर ☆

सौ. अंजोर चाफेकर

🔅 विविधा 🔅

☆ मनाचे प्रोग्रामिंग… ☆ सौ. अंजोर चाफेकर

आपल्या मेंदूमधे 1000 कोटी न्यूराॅन्स असतात.

आणि हे न्यूरल नेटवर्क खूप प्रभावी असते.

जर आपण या नेटवर्कला चांगला इनपुट दिला

तर नक्कीच चांगले आउटपुट मिळेल.

 

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता) मधे सुद्धा कृत्रिम न्यूराॅन नेटवर्क बनविले ते.

आणि मग पाहिजे ते इनपुट देऊन नेटवर्क ऑपरेट करतात.

 

धीरूभाई अंबानीजी त्यांच्या आत्मचरित्रात म्हणतात, माझ्यापुढे खूप आव्हाने उभी होती. अडचणींचे डोंगर मार्गात आडवे होते.अपयशाचे अनेक फटके बसले. पण मी अडचणींकडे  शिकण्याची संधी म्हणून बघितले. मनाला असे प्रोग्राम केले की प्रत्येक अडथळा मला नवीन दिशा दाखवत गेला.

जेव्हा आपण मोठी स्वप्ने साकारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा लहान गोष्टींमधे घुटमळू नये. संत ज्ञानेश्वर एक दाखला देतात.

सांगे कुमुद दळाचिने ताटेl

जो जेविला चंद्रकिरणे चोखटेl

तो चकोरू काय वाळुवंटी l

चुंबितु असे।

जो चकोर चन्द्रकिरण चाखतो तो कशाला वाळूचे कण चाखेल?

मनाला असे प्रोग्राम करायचे की क्षुल्लक गोष्टींकडे लेट गो करता आले पाहिजे.

कुठलीही कृती करताना आपली सत् सद विवेकबुद्धी जागृत असली पाहिजे. कारण कधी कधी भावनेच्या भरात किंवा मोहात पडून चुकीच्या गोष्टी आपल्या हातून घडतात पण मग अपराधीपणाची भावना सतत टोचत राहते.

उदा. महान सायन्टीस्ट ओपनहायमर यांनी अमेरिकेसाठी  ऑटमब्माॅम्ब बनवला.जेव्हा मेक्सिकोच्या डेझर्टमधे त्याचे टेस्टिंग झाले तेव्हा ते इतके आनंदात होते. “गाॅड इज अब्सेंट” असे ते म्हणाले. परंतु नंतर मरेपर्यंत त्यांना गिल्ट फिलींग राहिले. अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी मात्र ऑटमबाॅम्ब बनवायला नकार दिला.

मनात कुठल्या गोष्टी साठवायच्या व कुठल्या गोष्टी डिलीट करायच्या याचेही प्रोग्रामिंग करता आले पाहिजे. आपले मन वाईड लेन्स कॅमेरा सारखे असते. प्रत्येक पिक्चर क्लिक करत जाते. शिवाय मनाची स्टोरेज कपॅसिटीही प्रचंड असते. परंतु मनाला त्रास देणा-या गोष्टी, मत्सर, असुया, राग, द्वेष ताबडतोब डिलीट करता आल्या पाहिजेत.

©  सौ.अंजोर चाफेकर

मुंबई.

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ प्रभाव — भाग-१ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ प्रभाव — भाग-१ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

काल  पूजा लग्न होऊन  सासरी गेली. घर किती रिकामे रिकामे झाले मोहिनी बाईंचे.. त्यांना त्या उदास घरात बसवेनाच. बंगल्याच्या अंगणात सहज आल्या आणि बागेतल्या झोपाळ्यावर बसल्या क्षणभर. शेजारच्या बंगल्यातल्या पद्माची हाक आली, “ मोहिनी,ये ना ग जरा.मस्त चहा पिऊया दोघी.” मोहिनी बाई म्हणाल्या “अग तूच ये पद्मा. मी चहा केलाच आहे तो घेऊन येते .ये गप्पा मारायला.”

मोहिनीने चहाचा ट्रे आणला. पद्मा तिची अगदी सख्खी शेजारीण. लग्न होऊन दोघी जवळपास एकदमच सासरी आल्या आणि चांगल्या मैत्रिणी झाल्या. दोघीही एकमेकींच्या मदतीला तत्पर असत,एकमेकींची सुखदुःख शेअर करत. पद्माची दोन्ही मुलं अमेरिकेत स्थायिक झाली होती. दुर्दैवाने पद्माचा नवरा फार लवकर कॅन्सरने गेला आणि पद्मा फार एकटी पडली. पण त्यावेळी मोहिनी आणि तिच्या नवऱ्याने – उमेशने तिला खूप आधार दिला. मुलं अमेरिकेहून महिनाभर आली,आईला तिकडे घेऊन गेली.चार महिन्यांनी पद्मा इकडे परत आली. म्हणाली, “ मी इथेच रहायचा निर्णय घेतलाय  मोहिनी. थोडे दिवस तिकडे ठीक आहे ग, पण माझं सगळं विश्व इथे भारतातच नाही का? मी मुलांना तसं समजावून सांगितलं आणि त्यांना ते पटलं देखील.आता पुढचं पुढे बघू.” मोहिनीने तिला दुजोरा दिला आणि पद्मा बंगल्यात एकटी रहायला लागली.  .

आत्ताही पद्मा मोहिनीला म्हणाली “ खूप सुंदर केलंस ग लग्न पूजाचं. सुटलीस ग बाई. प्रसाद सुद्धा आलाय सिंगापूरहून ते उत्तम झालं.कुठे गेलाय ग? “

 “अग कालच मुंबईला गेले सूनबाई आणि तो तिच्या माहेरी. आता मी आणि हे दोघेच आहोत  हा आठवडाभर.”. पद्मा म्हणाली “ मोहोनी,प्रसादच्या लग्नाला नाही तुला काही त्रास झाला, पण पूजाच्या लग्नाला केवढा विरोध ग उमेशचा? मला सांग,एवढी शिकलेली मुलगी,आपल्याला आवडेल,योग्य वाटेल तोच जोडीदार निवडणार ना? नाहीतरी उमेश अतीच करतात. जणू काही पूजावर मालकी हक्कच आहे यांचा. तीही वेडी बाबा बाबा करत किती ऐकायची ग त्यांचं.”

“ मोहिनी, इतकी आदर्श आई असूनही ही मुलगी लहानपणी तुला नव्हती कधी attached. पण मग काय जादू झाली तेव्हा की आई आणि दादाचे महत्व समजले. मलाच काळजी वाटायला लागली होती.पण बाई, झालं सगळं नीट. देवाला असते काळजी./’ पद्मा म्हणाली.

मोहिनी म्हणाली “ हो ना ग “ .. .पण खरी गोष्ट  फक्त आणि फक्त मोहिनीलाच माहीत होती. मोहिनीचं मन झोपाळ्याच्या झोक्याबरोबरच मागं गेलं.मोहिनीला लग्नानंतर वर्षभरात प्रसाद झाला.अगदी शहाणं बाळ होतं ते. कधी हट्ट नाही कधी खोड्या नाहीत. आईवडिलांचे लाड करून घेत प्रसाद मोठा होत होता. तो सहा वर्षाचा झाल्यावर ध्यानीमनी नसताना मोहिनीला दिवस गेले. हे गर्भारपण आणि  बाळंतपण जडच गेलं तिला. मोहिनीला सुंदर मुलगी झाली तीच ही पूजा. तिची आई येऊन राहिली दोन महिने म्हणून मोहिनीला खूप विश्रांती मिळाली. उमेशचे लेकीवर जगावेगळं प्रेम होतं. प्रसाद लहान असताना त्याने फारसे त्याला जवळ घेतले, फिरायला नेले असं कधी झालं नाही, पण उमेश पूजाला मात्र खूप खेळवायचा, बागेत न्यायचा. पूजा मोठी व्हायला लागली.उमेश म्हणाला, “आता ही शाळेत जाईल ग.आपण हिला जवळच्याच शाळेत घालू म्हणजे आपल्या नजरेसमोर राहील “ मोहिनी उमेशकडे बघतच राहिली.

“ हे काय उमेश?प्रसादच्याच शाळेत मी तिचं नाव घालणार आणि जाईल की स्कूल बसने. सगळी मुलं नाही का जात? भलतंच काय सांगता? मी ऍडमिशन घेऊन टाकलीय तिची.” पूजा  शाळेतून आली की आधी बाबांच्या गळ्यात पडे. “बाबा ,आज शाळेत असं झालं, मी पहिली आले. “ सगळ्या गोष्टी पूजा बाबांशी शेअर करी. आई आणि भाऊ तिच्या गावीही नसत. मोहिनीला हे फार खटके. विशेष म्हणजे जेव्हा तिच्या मैत्रिणी सांगत की आई मुलीचं एक वेगळंच जिव्हाळ्याचं नातं असतं, तेव्हा तर मोहिनीला वाटे,हे आपलं आणि पूजाचं का नाही?ही मुलगी इतकी कशी वडिलांनाच attached? नाही, त्यात काही चूक नाही,पण  आपणही हिच्यासाठी सगळं करतो, प्रसाद किती लाड करतो, पण हे म्हणजे अजबच आहे हिचं. उमेशला आपली मुलगी फक्त आपलं ऐकते,आईला अजिबात महत्व देत नाही याचा कुठेतरी सूक्ष्म आनंदच व्हायला लागला. हौसेने मोहिनीने एखादा सुंदर फ्रॉक आणावा आणि तिने तो बाबांना धावत जाऊन दाखवावा.उमेश म्हणे .. ‘ छानच आहे ग बेटा हा फ्रॉक पण तुला निळा रंग आणखी सुंदर दिसला असता.’ हट्ट करून पूजा तो  फ्रॉक बाबांबरोबर जाऊन बदलून आणायची आणि मगच तिचे समाधान व्हायचे. उमेश मोहिनीकडे मग जेत्याच्या नजरेने बघायचा. हे असं का व्हावं हेच मोहिनीला समजेनासे झाले. प्रसादच्याही हे लक्षात येऊ लागलं होतं. “आई, तू आणलेली कोणतीच गोष्ट कशी ग पूजाला आवडत नाही? किती सुरेख चॉईस आहे तुझा. माझे मित्र तर नेहमी म्हणतात ‘प्रसाद, तुझे सगळे कपडे मस्त असतात रे.छानच आहे काकूंचं  सिलेक्शन. ’पण मग तू कोणतीही गोष्ट आणलीस की बाबा ती बदलून का आणतात ग? “ मोहिनी त्याला जवळ घेऊन म्हणे, “ अरे,नसेल आवडत त्या दोघांना माझी निवड. जाऊ दे ना. तुला आवडतंय तोपर्यंत मी आणत जाईन  तुझे कपडे हं.” काय होतंय हे समजण्याचं प्रसादचं वय नव्हतं. 

प्रसादला बारावीत फार सुंदर मार्क्स मिळाले. उमेश प्रसादजवळ बसला आणि म्हणाला,” वावा,जिंकलास रे प्रसाद. आता तू मेडिकलला जा. तुला हसत मिळेल ऍडमिशन.मग तू मोठं हॉस्पिटल काढ. माझं स्वप्न आहे तू  डॉक्टर व्हावंस असं.” त्यावेळी प्रसादने त्याच्या नजरेला नजर देऊन सांगितलं होतं .. . ” पण माझ्या स्वप्नांचं काय बाबा? मला अजिबात व्हायचं नाहीये डॉक्टर.मी इंजिनिअरच होणार.मी तिकडेच घेणार प्रवेश. बोलू नये बाबा,पण तुम्ही माझा विचार कधी केलात का लहानपणापासून? माझी आई भक्कम उभी आहे आणि होती म्हणून मी इथपर्यंत आलो. तुम्हाला तुमच्या पूजाशिवाय दुसरं जग आहे का? ती करील हं तुमची स्वप्नं पुरी. मी नाही तुमच्या अपेक्षा पुऱ्या करणार !” प्रसाद तिथून निघूनच गेला.आपल्या या मुलाकडे  उमेश बघतच राहिला.असं आजपर्यंत त्याला कोणी बोलले नव्हते. मोहिनी हे सगळं ऐकत होतीच.

ठरल्याप्रमाणे प्रसादने इंजिनियरिंगला ऍडमिशन घेतली आणि तो  गेला कानपूरला.आता उमेशने आपलं सगळं लक्ष पूजावर केंद्रित केलं. तिचं एक वेळापत्रकच आखून दिलं. स्वतः तिच्याबरोबर अहोरात्र बसून तिची तयारी करून घेऊ लागला. सतत मनावर बिंबवू लागला ‘ पूजा,तुला डॉक्टर व्हायचंय. इतके इतके मार्क्स पडलेच पाहिजेत तुला.’  पूजा जिद्दीने अभ्यासाला भिडली. मोहिनी हे नुसतं बघत होती. तिला पूजाची अत्यंत काळजी वाटायला लागली. पूजाचा कोंडमारा होतोय हेही लक्षात आलंच तिच्या. एकदा पूजाला तिने त्यांच्या फॅमिली डॉक्टरकडे नेले.आधी मोहिनी त्यांना जाऊन भेटली होती. या मुलीवर वडिलांचा असलेला प्रचंड प्रभाव तिने डॉक्टरांना सांगितला

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ समजलंच नाही आपण कधी रक्तपिपासू बनलो ! —  लेखिका : सुश्री मुक्ता चैतन्य ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ समजलंच नाही आपण कधी रक्तपिपासू बनलो ! —  लेखिका : सुश्री मुक्ता चैतन्य ☆ श्री सुनील देशपांडे

‘भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे..’

… शाळेत असताना दिवसाची सुरुवात राष्ट्रगीताबरोबर या प्रतिज्ञेने होत असे. कित्ती भारी वाटायचं. प्रतिज्ञा खणखणीत आवाजात म्हणायला मला खूप आवडायचं. एकही दिवस असा गेला नाही ज्या दिवशी शाळेत प्रतिज्ञा झाली नाही. हल्लीच्या शाळांमध्ये राष्ट्रगीत म्हटलं तरी पुष्कळ आहे अशी परिस्थिती आहे. ते असो… 

… प्रतिज्ञा म्हटल्यावर, म्हणताना आपण जे म्हणतोय तसं वागलं पाहिजे हे आपोआप मनात रुजत गेलंच. पण त्याच पुस्तकात हजारो वर्षांपूर्वी भारतातून सोन्याचा धूर निघत असे असं वाचलं की प्रश्न पडायचा, हजारो वर्षांपूर्वी निघणाऱ्या सोन्याच्या धुराचं कवतिक मला आज का सांगितलं जातंय? अर्थात हा प्रश्न मी कधी कुणाला विचारला नाही, कुणी त्याचं आपणहून उत्तर दिलं नाही. 

मी शहरात जन्माला आले, शहरात वाढले. आपला देश कृषिप्रधान आहे या वाक्याचा अर्थ समजायला पुढे बरीच वर्ष जावी लागली. शाळेच्या पुस्तकांनी मला काय दिलं माहित नाही पण शाळेने कळत नकळत माझ्यात ‘सेक्लुअर’ जगणं रुजवलं. त्यामुळे इतकी वर्ष मला माझा देश म्हणजे आजूबाजूचा समाज आवडायचा. त्यात त्रुटी होत्या, वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर त्या दिसायच्या, त्यांच्याशी दोन हात करावे लागायचे, पण तरीही राग यायचा नाही. कारण कितीही बुरसटलेला, कर्मठ असला तरी तो रक्त पिपासूं नव्हता. दुसऱ्याचं उघड उघड वाईट चिंतणारा नव्हता. दुसऱ्याचं वाईट झालं तरच माझं भलं होणार आहे असं मानणारा नव्हता. दुसऱ्याचं वाईट चिंतण्यात गैर काहीच नाहीये, उलट ते मर्दुमकीचं लक्षण आहे असं म्हणणारा आणि मानणारा नव्हता. तो दंगेखोर असेलही, क्वचित प्रसंगी असहिष्णू होतही असेल पण त्वरेने सावरणारा आणि आपल्या चुकांचं उघड समर्थन करत त्या चुकांचा पायंडा पडावा यासाठी धडपडणारा नव्हता. तो सर्वसाधारणपणे चांगला होता. 

सातवी-आठवी पासून मी एकटीने प्रवास करते आहे. एकटीने प्रवास करताना ना मला तेव्हा भीती वाटली ना माझ्या पालकांना. शाळेत असल्यापासून कॉलनीतल्या मित्रांबरोबर भटकत होते, कधी कुणी मुलगी असून मुलांबरोबर खेळते म्हणून टोकलं असेल पण तितकंच..त्याचा न्यूसन्स कधी झाला नाही. की कुणी गॉसिप करण्याच्या भानगडीत पडलं नाही. 

आज हे सगळं आठवण्याचं आणि लिहिण्याचं कारण, गेल्या अनेक वर्षांपासून माझ्या आजूबाजूचा समाज मला अवस्थ करतोय. त्याचं वेळोवेळी खालावत चाललेलं रूप मला आतून पिळवटून काढतंय. 

त्रास होतोय कारण तो रक्तपिपासू बनला आहे. सतत काहीतरी ओरबाडून घेण्याच्या वृत्तीचा बनला आहे. हपापेलेला वाटायला लागला आहे. सतत काहीतरी हवंय, अशी भूक जी कधीच शमणारी नाहीये.. माणसं शांत नाहीत, सुखी नाहीत, समाधानी नाहीत. साधं सिग्नलवर कुणी कुणाच्या पुढे गेलं तर माणसं एकमेकांकडे खाऊ की गिळू अशा नजरेने बघत असतात. रस्त्यावर माणसे कावलेली आहेत. त्यांना कायम कसला तरी राग आलेला असतो. आणि तो राग आजूबाजूच्या सगळ्या सहप्रवाशांवर सतत काढला जातो. माणसे कधी नाहीत इतकी जाती आणि धर्माच्या नावाने वेडीपिशी झाली आहेत. अचानक अस्मितांच्या भिंती उभ्या राहिल्या आहेत. 

असंख्य जाती आणि विविध धर्म-भाषा यांनी बनलेल्या आपल्या देशाची माती सहिष्णू बनली आहे कारण त्याशिवाय या मातीत गुण्या गोविंदाने कुणालाच जगता येऊ शकणार नाही. सतत माझी जाती-धर्म-भाषा श्रेष्ठ म्हणत दुसऱ्याच्या जीवावर उठायचं ठरवलं तर उद्या इथे रक्ताच्या पाटापलीकडे काहीही शिल्लक राहणार नाही. म्हणून पिढयानुपिढ्यांच्या मशागतीनंतर सहिष्णू जगणं तयार झालंय. जी आपली सगळ्यात मोठी ताकद आहे. आपण भिन्न असलो तरीही आनंदाने एकत्र राहू शकतो यात असणारी विलक्षण ताकद, सामर्थ विसरून माणसं कप्पाबंद आयुष्य जगू बघतायेत. माणसाला एखाद्या छोट्या चौकोनी खोलीत बंद करून टाकलं आणि तिथं ऊन, वारा, नवा चेहरा यातलं काहीही येणार नाही, दिसणार नाही याची काळजी घेतली, त्या खोलीत कोंडलेल्या माणसाला कुणाशीही बोलता येणार नाही याची काळजी घेतली तर त्या माणसाचं काय होईल, तसं काहीसं आता आपल्या समाजाचं झालं आहे असं अनेकदा वाटतं. सगळं कोंडलेलं. कोंदट. कुबट. 

मी शाळेत होते तेव्हा माझे मित्र मैत्रिणी कुठल्या जाती धर्माचे आहेत याकडे माझ्या पालकांचं लक्ष नसायचं. रादर कुणाच्याच पालकांचं नसायचं. तो महत्वाचा मुद्दा नव्हता. पण आज आजूबाजूला बघितलं तर आपल्या मुलांनी कुणाशी मैत्री करायची, याचे निर्णयही पालक घेऊ लागले आहेत. लहान मुलं सुरक्षित नाहीत. चाईल्ड पोर्नोग्राफीचा भारत मोठा ग्राहक आहे यातच आपली विकृत सामाजिक मनोवृत्ती दिसते. जातीबाहेर लग्न केलं म्हणून स्वतःच्या गर्भार मुलीला जाळणारे वडील हा आपल्या समाजाचा कर्तृत्ववान चेहरा आहे. आणि अशा बापाचं समर्थन करणारे हे समाजाचं भीषण वास्तव. माणासांना मारणे गैर आहे, चूक आहे ही  जाणीव नसलेला आणि आदीम भावनांना खतपाणी घालून त्याच कशा योग्य आहे हे ठसवायला निघालेला आपला समाज बनला आहे. 

हे अचानक बनलेलं नाही..हळूहळू रुजत आता प्रस्थापित होऊ बघतंय. 

रोजच्या जगण्याच्या धबडग्यात माणसांच्या मनातला कोलाहल आता उघड उघड अंगावर येतो आहे. शहरं बकाल झाली आहेत. माणसं नुसतीच धावत आहेत. गावांच्या समस्या आहेत तशा आहेत. शेतकरी अस्वस्थ आहेत. बेकारी वाढली आहे. कर्मठपणा वाढतो आहे. माणूस असुरक्षित झाला की तो त्याचं जगणं जाती-धर्मात शोधायला सुरुवात करतो. आपण असुरक्षित मनाच्या माणसांचा देश बनलोय का? अशा रक्तासाठी चटावलेल्या देशात आपण आपल्या पुढच्या पिढ्यांना वाढवणार का? त्यांना आपण कसा आणि कसला समाज देऊ करतोय याचा थोडा तरी विचार आपण करणार की नाही?

सरकारं येतात जातात. राजकारणाच्या गणितात आपण सामान्य माणसांनी, जो हे देश खऱ्या अर्थाने चालवतात त्यांनी किती वाहवत जायचं, किती अडकून पडायचं हे ठरवण्याची वेळ आली आहे. कुठलं सरकार येतं याहीपेक्षा आपल्या समाजाची रक्तपिपासू वृत्ती बदलणं जास्त गरजेचं आहे. सतत रक्ताची तहान लागल्यासारखा दिसतो आपला देश !

… खरंच इतकं रक्तपिपासू बनण्याची गरज आहे का आपल्याला?ज्या देशाने जगाला अहिंसा शिकवली त्या देशाला कधीही न शमणारी रक्ताची तहान लागावी? 

मातीतल्या सहिष्णुतेची बाधा सगळ्यांना पुन्हा एकदा होणं गरजेचं आहे. 

आपण एकमेकांच्या रक्ताला चटावलेला समाज नाहीयोत. हे पुन्हा पुन्हा एकमेकांना सांगण्याची गरज आहे. 

हा देश ग्रेट होता की नाही माहित नाही, पण तो ग्रेट व्हावा यासाठी जात-धर्म-पंथ-भाषा-लिंग भेदाच्या पलीकडे भारतीय म्हणून विचार करायला हवाय. नाहीतर पुढल्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत. 

लेखिका : सुश्री मुक्ता चैतन्य

प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे.

नाशिक मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘शौर्य मरण…’ ☆ माहिती संग्रहिका आणि शब्दांकन : सौ राधिका-माजगावकर-पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘शौर्य मरण’ ☆ माहिती संग्रहिका आणि शब्दांकन : सौ राधिका-माजगावकर-पंडित

महापराक्रमी  पृथ्वीराज चौहान सुलतानाविरुद्ध लढा देऊन,  विजयश्रीची माळ लेऊन परतले होते.

समोर पराजित झालेला सुलतान खाली मान घालून उभा होता. पृथ्वीराज महाराजांनी मोठा लढा देऊन विजयश्री मिळवली होती तरीही, पृथ्वीराज चौहानाचे पाय जमिनीवरच होते. अभयदान देणारा दाता नेहमी श्रेष्ठच असतो नाही कां? आणि त्या श्रेष्ठत्वाला स्मरून त्यांनी सुलतानाला अभय देऊन  बंधमुक्त केलं  होतं. 

पुढे अशा घनघोर लढाईची पुनरावृत्ती दोन वेळा झाली. विशाल अंतःकरणाच्या चौहानांनी सुलतानाला तीन वेळा अभय दिलं. पण सूडाच्या भावनेने, अहंकाराने पेटलेल्या सुलतानाने, त्या सैतानाने, आपल्या उपकार कर्त्यावरच चाल करून त्याचा पराभव केला. सापाला दूध पाजलं तरी तो गरळच ओकतो ना !  तसंच  झालं. सुलतानाने,घनघोर प्रबळ सैन्याच्या बळावर चौहानांचा पराभव केला. आणि तो महापराक्रमी नरसिंह पृथ्वीराज चौहान शत्रूच्या जाळ्यात अडकून जायबंदी झाला.

पिसाळलेला सुलतान शब्दांचे आसूड फटकारून विचारत होता,  “बोल चौहान क्या सजा   चाहिये  तुझे ? अब तो तुम हमारे कब्जेमे हो l और हमारे कैदी बन गये हो l  अब तुम्हारे लिये एकही सजा काफी है l हमारा इस्लाम धर्म स्वीकार करो …l बस यही एकही रास्ता है तुम्हारे लिये l “  

संतापाने लालबुंद झालेला तो नरकेसरी त्वेषाने म्हणाला, ” हमे सजा देनेवाले तुम कौन हो सुलतान? हमारी जान जायेगी लेकिन जबान नहीं जायेगी l हम जानकी कुर्बानी करेंगे लेकिन अपना धर्म कभी नही छोडेंगे ! “ डोळ्यातून अंगार ओकत दुभाषाला चौहान म्हणाले  ” सांग तुझ्या पाखंडी सुलतानाला, शरणागताला अभय देणाऱ्या धर्माची आमची जात आहे. तर कपट नीतीने उपकारकर्त्यावरच उलटणारी  तुझी सापाची जात आहे. अभय देऊन विषारी सापाला दूध पाजण्याची चूक झालीय आमच्याकडून.  प्राण  गेला तरी चालेल. पण इस्लाम धर्म आम्ही कधीही स्विकारणार नाही. आमच्या धर्माशी शेवटपर्यंत आम्ही एकनिष्ठच राहू.”  

चौहानांच्या डोळ्यातील अंगार बघून सुलतान आणखीनच चवताळला. त्या क्रूरकर्माने त्यांचे डोळे फोडण्याची आज्ञा फर्मावली  आणि तो पराक्रमी निरपराधी धर्मनिष्ठ पुरुष पृथ्वीराज चौहान पुरता  जायबंदी झाला. अनेक प्रकारे त्याचा छळ झाला, पण  निश्चयापासून  तो शूरवीर  जराही ढळला नाही . त्यांनी आपला धर्म सोडला नाही . त्यांच्या एकनिष्ठतेची आणि त्यांच्यावर चाललेल्या अन्वनित अत्याचाराची  बातमी वाऱ्यासारखी त्यांच्या राज्यात सगळीकडे पसरली. चौहानांची प्रजा कासाविस झाली. स्वामीनिष्ठ सेवक बैचेन झाले .आणि मग त्यांच्यातलाच एक सेवक मनाशी मनसुबा रचून सुलतानासमोर हाजिर झाला. आणि म्हणाला …” आपको  सादर प्रणाम सुलतानजी l एक शेवटची संधी आम्हाला द्या. आमचे महाराज आवाजाच्या दिशेने निशाणा साधण्यात तरबेज आहेत . तुम्ही एकदा परीक्षा तर पहा ..  त्यांचा नेम चुकला तर मग खुशाल त्त्यांच्यावर तलवार चालवा .” 

सुलतान छद्मीपणे हसून म्हणाला, ” पागल हो गये क्या? वो अंधा क्या तिरंदाजी करेगा ? उसकी आखोंकी  रोशनी तो गायब हो गयी है l  मनावर कमालीचा ताबा ठेवत, सेवक शांतपणे म्हणाला, ” एक..  सिर्फ एक बार पहचान कर लो सुलतानजी” l अशी विनंती केल्यावर अखेर उत्सुकतेपोटी सुलतान तयार झाला .

मैदानात मोठे लोखंडी गोळे ठेवले गेले.आपल्या प्रजेसह, सैन्यासह,सुलतान तिथे विराजमान झाला. एक अंधा आदमी निशानेबाजी क्या करेगा ? हा  कुचकट भाव मनात होताच.  लोखंडी गोळे एकमेकांवर आदळले. ध्वनी झाला आणि बरोब्बर त्याच दिशेने पृथ्वीराजानी निशाणा साधला.. हे कसं शक्य आहे? सुलतान ठहाका मारून हसून म्हणाला  ” इसमे कुछ गोलमाल है” .. 

सेवकाने अदबीने उत्तर  दिले ” सुलतानजी आणखी एकदा परीक्षा पहायची असेल तर अवश्य बघा. पण त्याआधी तुम्ही स्वतः नेमबाजी करण्याची महाराजांना आज्ञा द्या, कारण आमचे महाराज तुमचे कैदी आहेत. त्यामुळे तुमची आज्ञा मिळाल्याशिवाय ते बाण सोडूच शकत नाहीत.” या स्तुतीने सुलतान खुलला . त्याने विचार केला,  चौहान महापराक्रमी, युद्धकलानिपूण होगा तो क्या ! ये शेरका बच्चा पृथ्वीराज चौहान  अभी अपनेही कब्जे मे हैं ” …  आणि याचाच सुलतानाला गर्व झाला होता . मिशीवरून हात फिरवत सेवकाची विनंती त्यांनी मान्य केली. सेवक धावतच आपल्या स्वामींजवळ गेला. सुलतानाने विनंती मान्य केल्याची, सूचना, त्याला स्वामींपर्यंत पोहोचवायची घाई झाली होती .तो स्वामींजवळ पोहोचला. आपल्या स्वकीय भाषेतील कवितेच्या रूपाने, सुलतानाच्या आणि महाराजांच्या मधल्या अंतराचे मोजमाप, त्यानी आपल्या स्वामींना कवितेद्वारे सूचित केलं . जड साखळदंडांनी वेढलेला , दृष्टिहीन असा तो ‘ नरकेसऱी ‘  आवाजाचा मागोवा घेण्यासाठी सज्ज झाला.

गडगडाटी हसून टाळ्या पिटत सुलतान छद्मीपणे म्हणाला .. ” चौहान.. अबे अंधे,कर ले नेमबाजी और दिखा दे अपनी होशियारी !”

आणि काय सांगावं मंडळी.. अहो  ! आवाजाच्या दिशेने बाण सूं    सूं   करीत सुसाट सुटला .आणि–आणि –सुलतानाच्या छातीत घुसला .कपट कारस्थानी सुलतान क्षणार्धात, खाली कोसळला. त्याच्या पापाचा घडा भरला होता. मैदान माणसांनी गच्च भरलं होतं. सुरक्षा दलाला काही कळायच्या आतच हे सगळं घडलं. हजारो लोकांच्या साक्षीने, सुसज्ज सैन्याच्या देखत, संरक्षक नजरेचं पात लवण्याच्या आतच पृथ्वीराजांच्या बाणाने शत्रूला यमसदनास  पोहोचवलं होत.   “दगा-दगा “असं ओरडतच सैन्य चौहानांच्या दिशेने धावले. आता खरी परीक्षा होती ती राजांच्या स्वामीनिष्ठ सेवकाची,

विजेच्या चपळाईने त्यानें राजांच्या छातीत पहिल्यांदा  खंजिर खुपसला  . लगेच तोच खंजिर   स्वतःच्या छातीत घुसवला . आणि- त्या दोघांना त्याक्षणीच  शौर्य मरण आलं. शत्रूच्या हाती पडून स्वामींची विटंबना होण्यापेक्षा त्या स्वामीनिष्ठ सेवकाने स्वामींबरोबरच स्वतःलाही खंजिर खूपसून ,मरणाला आपणहून कवटाळून संपवलं .आणि ते दोघे स्वामी, सेवक ‘ ‘  ‘नरवीरकेसरी ‘  अजरामर झाले.  

धन्य तो धर्मासाठी ,स्वामींसाठी प्राणांची आहुती देणारा कर्तव्यतत्पर सेवक आणि धन्य धन्य! ते पृथ्वीराज  चौहान .. .अशा शौर्य मरण पत्करणार्‍या त्या पराक्रमी ‘ नरकेसरींना ‘  माझा.  मानाचा मुजरा,– मानाचा मुजरा .

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ “इतिहासातील ‘हिट अँड रन‘ प्रकरण…” – लेखिका : डॉ. सुनीता दोशी ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

? वाचतांना वेचलेले ?

☆ “इतिहासातील ‘हिट अँड रन‘ प्रकरण…” – लेखिका : डॉ. सुनीता दोशी ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

महाराणी अहिल्याबाई होळकर

पुण्यात कल्याणी नगर येथे घडलेले ‘हीट अँड रन’ प्रकरण बरंच चर्चेत आहे सध्या…!सुरुवातीला मुलाला शिक्षा म्हणून 300 शब्दांचा निबंध लिहायला सांगितला आणि समज देऊन सोडून दिलं ही चर्चा खूपच रंगली…!  आपल्या मद्यपान केलेल्या अल्पवयीन मुलाला…, जो नशेत अतिशय वेगाने गाडी चालवत होता…आणि त्याच्या हातून घडलेल्या अपघातात दोघांचा जीव गेला…त्याला वाचवण्यासाठी आजोबा आणि वडील गैरमार्गाचा वापर करत होते… पैशाने कायद्याला…माणुसकीला विकत घेऊ पहात होते…!  

या पार्श्वभूमीवर एक घटना खूपच विचार करण्यासारखी आहे…! 31 मे…राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती…!सर्व देशभर ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली…! त्यांच्याच जीवनात घडलेला एक प्रसंग या पार्श्वभूमीवर अतिशय बोलका आणि डोळ्यात अंजन घालणारा आहे…!

हा प्रसंग जरी त्या वडिलांना आणि आजोबांना सांगितला असता, तरी निबंध लिहिण्यापेक्षा आहे तो परिणामकारक झाला असता…. असं मात्र वाटत रहातं…! 

“राजमाता अहिल्यादेवी होळकर…!”एक आदर्श व्यक्तिमत्व …! दानशूर…कुशल प्रशासक … वीरांगना…अतिशय न्यायप्रिय… दूरदृष्टी असलेल्या… पुरोगामी विचाराच्या… शिवभक्त…आणि… प्रजाहितदक्ष…पुण्यश्लोक…  महाराणी  अहिल्यादेवी त्यांच्या आयुष्यात घडलेल्या एक प्रसंग…

अहिल्यादेवी यांचा पुत्र मालोजी रथामधून जात असताना रस्त्यामध्ये एक वासरू बागडत उड्या मारत  रथासमोर येते… वासराला त्या रथाची धडक बसते आणि ते वासरू  मृत्यूमुखी पडते…!मालोजीराव तसेच पुढे निघून जातात…! जवळच त्या वासराची आई… म्हणजेच गाय उभी असते…! आपलं बाळ गेलेलं तिच्या लक्षात येते… अतिशय दुःखी अशी ती गाय त्या वासराभोवती गोल गोल फिरते आणि शेवटी त्या वासराच्या बाजूला बसून राहते…! काही वेळाने त्याच रस्त्यावरून अहिल्यादेवीचा रथ  जातो… त्यांना हे दृश्य दिसते… आणि लक्षात येते की कुठल्यातरी अपघातामध्ये हे वासरु गेलेले आहे…!  त्यांना अतिशय वाईट वाटते… चौकशी केल्यानंतर कळते की हे कृत्य आपल्या मुलाच्या हातून घडले आहे…! त्या  अतिशय संतापतात…! आणि अतिशय रागात घरी येतात…आपल्या सुनेला विचारतात….”जर एखादया आईसमोर तिच्या बाळाला कोणी आपल्या रथाखाली चिरडलं … आणि ती व्यक्ती न थांबता तशीच निघून गेली….तर काय न्याय द्यायला हवा…?”

सून  म्हणते…,”  ज्या पद्धतीने त्या व्यक्तीने  वासराला चिरडले …त्या पद्धतीनेच त्या व्यक्तीला देखील मृत्युदंड द्यायला हवा…!”

अहिल्यादेवी दरबारामध्ये मुलाला बोलवून घेतात आणि मृत्युदंडाची शिक्षा सुनावतात…! तो मृत्यू देखील ज्या पध्द्तीने वासराला चिरडले गेले…त्याच पध्द्तीने…!  मालोजीरावांना हात पाय बांधून रस्त्यावर टाकण्यात येते…! परंतु मालोजीरावांच्या अंगावर जो रथ घालायचा…त्याचे सारथ्य करायला कोणीच तयार होत नाही…! मालोजीरावांना माफ करावे म्हणून प्रजाजन अहिल्यादेवींना खूप विनंती करतात…! परंतु आता त्यांचा निर्णय झालेला असतो… त्यांनी एकदा दिलेला निर्णय परत बदलायचा विषयच नसतो…!    

शेवटी अहिल्यादेवी स्वतः हातात लगाम घेतात … त्या रथावर चढतात आणि त्या रथाचे सारथ्य करतात…! परंतु एक अद्भुत घटना त्या वेळेस घडते…! अहिल्यादेवींच्या रथासमोर ती गाय येऊन उभा रहाते…! कितीही हाकलून दिले तरी ती गाय पुन्हा पुन्हा त्या रथाला आडवी येते… ! जणू ती सांगते की…’ हे अपत्य विरहाचे दुःख फार वाईट आहे… एका आईच्या हातून आपल्या बाळाचा मृत्यू होऊ नये …आणि आईला हे दुःख सहन करायला लागू नये …! ‘ 

ह्या घटनेने सर्वजण अवाक होतात…!  अहिल्यादेवींची समजूत काढतात…! शेवटी अहिल्यादेवी आपल्या मुलाला माफ करतात…!

ही घटना ऐकून अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहतात…! प्रत्येक स्त्रीमध्ये एक ‘आई ‘असते…! त्या आईने दुसऱ्या आईला न्याय देण्यासाठी आपल्या स्वतःच्या मातृत्वाचा देखील विचार केला नाही…! आपल्या पोटच्या पोराला इतकी कठोर शिक्षा त्यांनी सुनावताना मातृत्वावर कर्तव्याने विजय मिळवला होता…! परंतु त्या क्षणी त्यांच्या मनामध्ये विचारांची किती वादळे उठली असतील…? मन किती खंबीर करावं लागलं असेल…!  खरंच विचार करण्यापलीकडेच आहे सारे …!

आज अशा न्यायाची खरंच खूप गरज आहे…पैशाने न्याय विकत घेऊ पाहणाऱ्यांसाठी…! आणि अशा इतिहास घडविणाऱ्या इतिहासातल्या घटना समाजापुढे ठेवण्याची गरज आहे…  पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवींची जयंतीच्या निमित्ताने…!

हीच खरी अहिल्यादेवींनी वाहिलेली आदरांजली …आणि हेच कदाचित समाज-प्रबोधनही असेल…!

लेखिका : डॉ सुनिता दोशी

संग्रहिका : सुश्री सुनीला वैशंपायन

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ मित्र होऊया निसर्गाचे … ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ मित्र होऊया निसर्गाचे … ☆ सुश्री नीलांबरी शिर्के 

पर्यावरणाचा समतोल हवा

तर रोजचा दिन त्याचा हवा

समतोल हवा माती पाण्याचा

जागृत सर्वानीच रहाण्याचा

*

पाणी वापर जल साठवण

वृक्ष कत्तलीवरती नियंत्रण

जे जे करती  वृक्षारोपण

त्यांनीच करावे की संगोपन

*

 आज कितीतरी रोपं लावती

 सुकती किती पण नसते गणती

 मीडियावरती फोटो झळकती

 मागे केवळ खड्डेच उरती

*

 म्हणून घेऊया रोज काळजी

 पाणी ,माती अन झाडे जपू

 मित्र होऊया निसर्गाचे आता

 दूर ठेवुया प्ल्यास्टिकासम रिपू

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ संस्मरण – मेरी यादों में जालंधर – भाग-21 – जाने किस घड़ी वक्त का बदले मिज़ाज… ☆ श्री कमलेश भारतीय ☆

श्री कमलेश भारतीय 

(जन्म – 17 जनवरी, 1952 ( होशियारपुर, पंजाब)  शिक्षा-  एम ए हिंदी, बी एड, प्रभाकर (स्वर्ण पदक)। प्रकाशन – अब तक ग्यारह पुस्तकें प्रकाशित । कथा संग्रह – 6 और लघुकथा संग्रह- 4 । ‘यादों की धरोहर’ हिंदी के विशिष्ट रचनाकारों के इंटरव्यूज का संकलन। कथा संग्रह – ‘एक संवाददाता की डायरी’ को प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी से मिला पुरस्कार । हरियाणा साहित्य अकादमी से श्रेष्ठ पत्रकारिता पुरस्कार। पंजाब भाषा विभाग से  कथा संग्रह- महक से ऊपर को वर्ष की सर्वोत्तम कथा कृति का पुरस्कार । हरियाणा ग्रंथ अकादमी के तीन वर्ष तक उपाध्यक्ष । दैनिक ट्रिब्यून से प्रिंसिपल रिपोर्टर के रूप में सेवानिवृत। सम्प्रति- स्वतंत्र लेखन व पत्रकारिता)

☆ संस्मरण – मेरी यादों में जालंधर – भाग – 21 – जाने किस घड़ी वक्त का बदले मिज़ाज… ☆ श्री कमलेश भारतीय ☆

(प्रत्येक शनिवार प्रस्तुत है – साप्ताहिक स्तम्भ – “मेरी यादों में जालंधर”)

यादों से घिरा रहता हूँ, सुबह शाम ! जब जब यादें आती हैं, कितने खट्टे मीठे अनुभव याद कराती हैं और यह भी कि वक्त क्या क्या दिन दिखाता है ! आज जब चंडीगढ़ की ओर निकल रहा हूँ, तब बस स्टैंड के पास ही स्थित हरियाणा आई जी ऑफिस की याद हो आती है, जिसमें आज के दिन साहित्य अकादमी के अध्यक्ष माधव कौशिक, सुभाष रस्तोगी, उर्मिल और गार्गी तिवारी जैसे रचनाकार एक ही ऑफिस में एक साथ काम करते थे यानी पूरा आई जी ऑफिस रचनाकारों से भरा पड़ा था । ‌जब मैंने सन् 1990 में ‘ दैनिक ट्रिब्यून’ में उप संपादक के तौर पर ज्वाइन किया, तब इन लोगों ने मुझे अपनी गोष्ठियों में बुलाना शुरू किया, यही नहीं, ऑफिस की पत्रिका में भी मेरी रचनायें प्रकाशित की जाने लगीं । ये लोग भी मुझसे मिलने ऑफिस आते रहते ! ये दिन कभी भूलने वाले नहीं । ‌यह प्यार और सम्मान भूलने वाला नहीं ! फिर‌ इतने वर्षों के बीच गार्गी तिवारी को हिसार की कारागार में देखने का दुखद दृश्य भी देखा । मैं किसी कवरेज के सिलसिले में कारागार गया था, महिला जेल अधीक्षक ने एक कैदी की तारीफ करनी शुरू की कि वह लेखिका है और पता नहीं उसकी बदनसीबी उसे कैसे यहाँ तक ले आई । मैंने कहा कि आप मिलवाइये उससे। उन्होंने अंदर किसी को भेजा और देखता हूँ कि मेरे सामने कैदियों के भेस में गार्गी तिबारी खड़ी है ! वह मुझे विस्फारित आंखों से देख रही थी और मैं उसे!

– क्या हुआ गार्गी? यहाँ इस हाल में कैसे?

जेल अधीक्षक ने जवाब दिया कि इस प्यारी सी गुड़िया पर अपने ही पति की हत्या का इल्जाम इसके देवर ने मढ़ दिया है !

गार्गी टप् टप् आंसू बहाये जा रही थी और मैं वहाँ से चला आया – निशब्द! क्या और कैसी सांत्वना दूं? फिर जब नया साल आया तब मैंने नीलम को कहा कि आज हम एक व्यक्ति को नया साल मुबारक करने जायेंगे । इस तरह मैं पत्नी को बिना कुछ बताये गंगवा रोड स्थित कारागार की ओर ले गया । महिला अधीक्षक को गार्गी से मिलने की इज़ाज़त मांगी । उन्होंने बुला दिया । तब मैंने कहा कि गार्गी, आज शायद तुमने सोचा भी न हो और मैंने भी कैसे सोच लिया कि गार्गी को नये साल की विश करके जायेंगे हम पति पत्नी और यह विश भी कि आपको फिर यहाँ न देखना पड़े ! इसके बाद उसी साल गार्गी सारे दोषों से मुक्त हो गयी ! फिर एक दो बार चंडीगढ़ में भी मुलाकात हुई और वह ज्योतिष यानी भविष्यवाणी करने का काम करने लगी थी‌ । इन दिनों कहाँ है, नहीं जानता पर इंसान कहाँ से कहां पहुंच जाता है वक्त के फेर मे ! हैरान हूँ आज तक !

इतने वर्षों बाद माधव कौशिक सीढ़ियां चढ़ते चढ़ते देश की सबसे बड़ी साहित्य अकादमी के अध्यक्ष की कुर्सी पर विराजमान हुए और उपाध्यक्ष कुमुद शर्मा भी हरियाणा के आईटी हब गुरुग्राम में रहती हैं। ‌वे प्रसिद्ध कथाकार अमरकांत की पुत्रवधू हैं और इनके पति अरूण बर्धन से ‘सारिका’ के कार्यालय में कुछ मुलाकातें हुईं रमेश बतरा के माध्यम से! खेद उन्हें कोरोना लील गया । जिन दिनों हरियाणा ग्रंथ अकादमी की पत्रिका ‘ कथा समय’ का संपादन कर रहा था , उन दिनों अमरकांत की कहानी ‘अमलतास के फूल’ प्रकाशित की थी और इनके बड़े बेटे से बातचीत भी प्रकाशित की थी ! तब एक स्तम्भ शुरू किया था कि बड़े लेखक अपनी ही संतानों की नज़र में क्या हैं और उनकी कौन सी रचना क्यों पसंद है !

पर एक सवाल जहाँ भी हरियाणा में जाता हूँ जरूर उठता है कि हरियाणा ने साहित्य अकादमी को अध्यक्ष और उपाध्यक्ष तो दिये लेकिन आज तक हरियाणा के किसी साहित्यकार को अकादमी पुरस्कार नहीं मिला ! यह भी एक अलग तरह का कीर्तिमान कहा जा सकता है !

सुभाष रस्तोगी आजकल जीरकपुर में रहते हैं और‌ उनकी कहानियाँ ‘कथा समय ‘ में भी लीं, खासतौर पर दिल्ली के रेप केस पर आधारित ‘सात पैंतालिस की बस ‘ जो मुझे बहुत पसंद आई ! वैसे रस्तोगी बहुमुखी प्रतिभा के धनी हैं और प्रमुख कवियों में एक! ‘साक्षी’ नाम से सहित्यिक संस्था भी चलाते रहे!

माधव‌ कौशिक और कुमुद शर्मा के छोटे छोटे साक्षात्कार भी मैंने इनके साहित्य अकादमी के लिए चुने जाने के बाद किये!

शायद आज इतना ही काफी! यह कहते हुए कि अच्छे और बुरे दिन सब पर आते हैं लेकिन अपने दिनों को भूलना नहीं चाहिए और न ही संबंधों को क्योंकि

वक्त की हर शै गुलाम

वक्त का हर शै पे राज

आदमी को चाहिए

वक्त से डर कर रहे

कौन जाने किस घड़ी

वक्त का बदले मिज़ाज!

क्रमशः…. 

© श्री कमलेश भारतीय

पूर्व उपाध्यक्ष हरियाणा ग्रंथ अकादमी

1034-बी, अर्बन एस्टेट-।।, हिसार-125005 (हरियाणा) मो. 94160-47075

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिंदी साहित्य – आलेख ☆ भूत भभूत ☆ सुश्री इन्दिरा किसलय ☆

सुश्री इन्दिरा किसलय

☆ भूत भभूत ☆ सुश्री इन्दिरा किसलय ☆

सियासत में “भूत” को “वर्तमान “नहीं बनाया जाता। भूत तो भूत है “अभूतपूर्व” नहीं होता। बहुत कम भूतों को वर्तमान बनने का सौभाग्य मिलता है। मिल भी गया तो उन्हें तोता बना दिया जाता है। कुछ को भेड़ में रूपान्तरित कर दिया जाता है।

 पांव छूकर नेतागण, विदेह भूत को “आदर की भभूत “मल देते हैं। भूत इसी में खुश कि चलो कुर्सी पर तो बैठेंगे भले ही किसी को दिखाई न दें। सदेह कुछ और मिलने से रहा। कुछ नहीं तो हैप्पीवाले बर्थ डे मतलब जन्म जयंती या पुण्यतिथि पर खुशबूदार फूलों का गुच्छा और एक दीया तो मिल ही जायेगा।

 वैसे भी भूत को “खंडहर “में रहना चाहिए। जिसके दरवाजे चरर मरर करते हों, खिड़कियों के पल्ले बंद होते खुलते हों, अंधेरे उजाले का तिलिस्म फैला हो, और जहां चमगादड़ों की फड़फड़, मकड़ियों के जाले और छिपकलियों की चिकचिक सुनाई देती हो। भूत, “काल” हो या “व्यक्ति” उन्हें एक जैसा “संवैधानिक उपहार” मिलता है।

 बात सियासत की हो तो “बिचौलिए “यहां हरे हरे नोटों की सूटकेस लेकर “गिरगिटिया जीवों” को पलक झपकते गाँठ लेते हैं। चीता भी फीका है उनके आगे।

आयरलैंड की “अमांडा” को भी बिचौलिए ने ही भूत से मिलवाया था। यहां तक कि शादी के वक्त” अँगूठी “भी भूत की तरफ से पहनाई। 5 बच्चों की माँ अमांडा और 300 साल की उम्र वाला “समुद्री लुटेरा जैक। ” ये अलग बात है कि अमांडा की ढेरों भूतों से दोस्ती थी पर कसम है है जो कभी उसने उनकी तरफ उस नजर से देखा हो। सारा खेल नज़र का है। क्या पता भूतों ने शादी का प्रस्ताव दिया हो और अमांडा ने बेदर्दी से ठुकरा दिया हो।

अमांडा ने प्राइवेट बोट पर शादी की। दिल लिया और दिया भी।

 आजकल “आर्टीफिशियल इंटेलीजेंस “का जलवा है। हाल ही में लिसा नाम की चीनी व्लाॅगर, डैन नाम के चैटबाॅट से दीवानों की तरह प्यार कर बैठी। उसने लिसा का निक नेम” लिटिल किटन” रख दिया।

 लोग” रोबो “से शादी कर सकते हैं तो “भूत “ने क्या बिगाड़ा !यूं भी कुछ पति नामक जीवों के पुरुष मुक्ति आन्दोलन चलते रहते हैं। वे कहते हैं कि उनकी पत्नियां” वर्तमान” में भी “भूत” की तरह बर्ताव करती हैं। वे कुछ इस तरह से टॉर्चर करती हैं जैसे अशरीरी भूत। मजाल है जो किसी को प्रमाण मिल जाये। जेब से इतने रुपयों का गबन करती हैं कि त्रिकाल में कोई माई का लाल सबूत न जुटा सके।

 उन्हें “सियासी भूतों “को देखकर तसल्ली कर लेनी चाहिए। उनका भी अंदाज़ कातिलाना होता है। दिखाई देकर भी दिखाई नहीं देते। इसे कहते हैं भूतिया कलाकारी, साजिश, षडयंत्र। भूत एक ही तरह के नहीं न होते। नज़र न आने वाले सुरक्षित होते हैं पर चलते फिरते भूत ज्यादा खतरनाक होते हैं।

एक लतीफा वायरल हुआ था। बला का खूबसूरत।

“अच्छी पत्नी और भूत में क्या समानता है?”

“दोनों दिखाई नहीं देते”

“कल्पना कला “भी कोई चीज़ होती है कि नहीं !इसी के बूते बोतलबंद भूत का धंधा भी कर लिया किसी ने। काहे का स्टार्ट अप। न लोन की झंझट न सदेह भूतों का एहसान।

 एक उद्योग ऐसा भी—किसी को अगर शक हो कि वह जिस घर में रहने जा रहा है कहीं वहां भूत तो नहीं—भूत ढूंढने का व्यवसाय करनेवाले इसमें दक्ष होते हैं।

सबसे मुश्किल है यह दौर जहां अमूमन ये पता करना टेढ़ी खीर है कि जिन्दा दोपाया, भूत तो नहीं या जिसे हमने भूत समझा वह चलता फिरता धड़कते दिल का मालिक हो।

💧🐣💧

©  सुश्री इंदिरा किसलय 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – मेरी चुप्पी… ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

? संजय दृष्टि –  मेरी चुप्पी… ? ?

(लघु कविता संग्रह – चुप्पियाँ से)

वे निरंतर कोंच रहे हैं मुझे –

……लिखो!

मैं चुप हो गया हूँ..,

अपनी सुविधा

में ढालकर

मेरे लेखन की

शक्ल देकर

अब बाज़ार में

चस्पा की जा रही है

मेरी चुप्पी..,

बाज़ार में मची धूम पर

क्या कहूँ दोस्तो,

मैं सचमुच चुप हूँ!!!

© संजय भारद्वाज  

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

🕉️ 💥 श्री हनुमान साधना सम्पन्न हुई। अगली साधना की जानकारी आपको शीघ्र ही दी जाएगी। 💥 🕉️

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares