मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “अतिशहाणा…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

🔆 जीवनरंग 🔆

☆ “अतिशहाणा…” ☆ श्री मंगेश मधुकर 

नेहमीप्रमाणे कंपनीत राऊंड मारताना डीकेना काही ठिकाणी कॉम्प्युटर आणि स्टाफच्या बसण्याची जागा बदलल्याचं लक्षात आलं. 

“हे कोणी करायला संगितलं”

“संकेत सरांनी !!”सुप्रीटेंडेंटने  उत्तर दिलं.

“मॅनेजर कोणयं ?”

“तुम्ही !!”

“मग हे बदलायच्या आधी विचारलं का नाही ? ”

“जे सांगितलं ते करावं लागतं. दोघंही साहेबच.”

“मला भेटायला सांगायचं”

“मी त्यांना बोललो पण गरज नाही असं म्हणाले.” .. हे ऐकून डी के भडकले.वादावादी सुरू झाली. 

“सर,रागावणार नसाल तर एक बोलू ? ”

“बोल. ” 

“इतके वर्षे सोबत काम करतोय.आपल्यातही वाद झालाय. पण गेल्या काही दिवसांपासून कंपनीत सतत काही ना काही कटकटी चालूयेत..  कारण तुम्हाला चांगलंच माहितीयं.” 

“आलं लक्षात.काय करायचं ते. बघतो. परत जसं होतं तसं ठेव आणि कोणीही सांगितलं तरी मला विचारल्याशिवाय काहीही करू नकोस.”

—-

या घटनेनंतर संकेत डी के विरुद्ध जास्तच आक्रमक झाला.मुद्दाम त्रास होईल असं वागायला लागला.हवं तेच करण्याच्या हटवादीपणामुळे संकेतचं कोणाशीच पटत नव्हतं.मोठे साहेब सोडले तर इतरांना तो किंमत द्यायचा नाही.त्यावरून वाद झाले. संकेतविरुद्ध अनेकांनी तक्रारी केल्या परंतु केवळ कामातला उत्तम परफॉर्मन्स आणि  कंपनीचा होणारा फायदा त्यामुळं सिनियर्सनी दुर्लक्ष केलं.सांभाळून घेतलं,कायम झुकतं माप दिलं परंतु हळूहळू कुरबुरी वाढून त्याचा कामावर परिणाम व्हायला लागला.शेवटी मोठया साहेबांना लक्ष द्यावं लागलं. साहेबांच्या केबिनमध्ये डी के आणि संकेत समोरासमोर बसले होते.

“दोघंही हुशार,मेहनती आहात. एकत्र काम केलंत तर कंपनीसाठी फायद्याचं आहे.”

“मी नेहमीच बेस्ट काम करतो. बाकीच्यांचं माहीत नाही” संकेतनं पुन्हा स्वतःची टिमकी वाजवली.तेव्हा वैतागून डीके म्हणाले “सर,काहीतरी करा.आता पाणी डोक्यावरून जातंय.तुम्ही सांगितलं म्हणून गप्प बसलो पण दिवसेंदिवस काम करणं अवघड झालयं.याचं वागणं सहन करण्यापलीकडं गेलयं. सगळ्याच गोष्टीत नाक खुपसतो.दुसऱ्यांच्या कामात लुडबूड करून विचार न करता परस्पर निर्णय घेतो.कंपनीच्या दृष्टीनं हे चांगलं नाही.यापुढं मला सांगितल्याशिवाय कोणताही निर्णय घायचा नाही हे फायनल.”

“मी जे काही करतो ते कंपनीच्या भल्यासाठीच आणि मला असले फालतू प्रोटोकॉल फॉलो करायला जमणार नाही.”संकेत उद्धटपणे म्हणाला.

“फालतू?विल शो यू माय पॉवर”डी के भडकले.

“आय डोन्ट केअर.जे वाटतं ते मी करणारच.हू आर यू”संकेत. 

“संकेत,बिहेव युअरसेल्फ,से सॉरी तो हिम.”मोठे साहेब चिडले पण संकेतनं ऐकलं नाही.

“सर,आपल्या इथं टीम वर्क  आहे.हा टीममध्ये फिट नाही.  आता यावर जास्त काही बोलत नाही.तुम्ही योग्य तो निर्णय घ्याल याची खात्री आहे.एक सांगतो,इतके दिवस दुर्लक्ष केलं पण आता लिमिट क्रॉस झालीय.”एवढं बोलून डी के बाहेर गेले तेव्हा संकेत छदमीपणे हसला.

“संकेत,धिस इज नॉट गुड. बी प्रोफेशनल”

“सर,मी काहीच चुकीचं केलं नाही.”

“असं तुला वाटतं पण कंपनीचे काही नियम तुला पाळावेच लागतील.अडजेसटमेंट करावी लागेल.दरवेळेला “मी” मह्त्वाचा नसतो.प्रसंगानुसार तो बाजूला ठेवावाच लागतो.तडजोड करावी लागतेच ”

“पण सर,माझ्यामुळे कंपनीचा फायदाच होतोय ना मग मी कशाला तडजोड करू. आतापर्यंत मी कधीच चुकलेलो नाही.”

“पुन्हा तेच.जरा हा ‘मी’पणा कमी करून दुसऱ्यांचंसुद्धा ऐकायला शिक.”साहेबांच्या स्पष्ट बोलण्याचा संकेतला फार राग आला पण गप्प बसला.  

“हुशार,बुद्धिमान,धाडसी आहेस.पंचवीशीतचं मोठं यश मिळवून इतरांच्या तुलनेत पुढे गेलास.कामातल्या स्किल्समुळं सांभाळून घेतलं,वागण्याकडं दुर्लक्ष केलं.परंतु…..”

“माझी योग्यता फार मोठी आहे.इथल्या कोणाशीच बरोबरी होऊ शकत नाही.मी फार मोठा होणार असं सगळेच म्हणतात.”संकेतची आत्मप्रौढी सुरूच होती. 

“नेहमी कामाचं कौतुक होतं त्याच गोष्टीचा तुला अहंकार झालाय.कौतुकाची इतकी चटक लागलीय की थोडंसुद्धा मनाविरुद्ध बोललेलं सहन होत नाही.“आपण करतो ते बरोबर,तेच बेस्ट”या भ्रमानं  आत्मकेंद्री बनलायेस.”साहेबांनी पुन्हा समजावण्याचा प्रयत्न केला पण संकेतनं ऐकलं नाही उलट जास्तच हेकेखोर झाला.शेवटी नाईलाजानं साहेबांनी निर्णय घेतला.फायनल वॉर्निंग दिली. संकेतच्या ईगोला फार मोठा धक्का बसला.प्रचंड अस्वस्थ झाला.अपमानाने राग अनावर झाला त्याच तिरमिरीत कसलाही विचार न करता रिजाईन केलं.हे अपेक्षित असल्यानं साहेबांनी ताबडतोब राजीनामा मंजूर केला.संकेतला रिलीव्ह लेटर दिलं.तीन वर्ष काम करत असलेल्या नोकरीला एका फटक्यात लाथ मारली या आनंदात संकेतला नोकरी गेल्या विषयी वाईट वाटलं नाही.

लगेच दुसरी नोकरी मिळाली पण तिथंही पुन्हा तेच झालं. वागणुकीमुळे कंपनीनं बाहेरचा रस्ता दाखवला तरीही संकेतची धुंदी उतरली नाही.स्वतःला बदलण्याऐवजी इतरांना दोष देत तो नोकऱ्या बदलत राहिला.विचित्र स्वभावामुळं लोक टाळू लागले.मित्र मंडळी लांब झाली.संकेत एकटा पडला.

फक्त बाहेरच नाही तर घरीसुद्धा संकेत मग्रूरीत वागायचा. त्यामुळं घरात सतत अशांतता.रोजची वादावादी. शेवटी त्याच्या एककल्ली वागण्याला कंटाळलेल्या बायकोनं घटस्फोट घेतला.

सर्व काही उत्तम असूनही केवळ आडमुठेपणामुळं एकाकी पडलेल्या संकेतचं आयुष्य भरकटलं.दिशाहीन झालं.

असे स्वप्रेमात अडकलेले अनेक संकेत आपल्या आजूबाजूला आहेत जे कधीच तडजोड करायला राजी नसतात. हेकेखोरपणे आपलं तेच खरं करण्याच्या नादात जबर किंमत मोजतात,  पण ‘अहं’ सोडत नाहीत .स्वतःची फरपट करतातच आणि जिवलगांची सुद्धा…..

थोडा लवचिकपणा स्वभावात आणला तर अनेक प्रश्न निर्माणच होत नाही.

अतिशहाण्यांना एवढं साधं शहाणपण नसतं हे मात्र खरं.

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ लक्षद्वीपचा रंगोत्सव… भाग-१ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

??

☆ लक्षद्वीपचा रंगोत्सव… भाग-१ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

अथांग अरबी महासागरात ‘कवरत्ती’ नावाची आमची पाच मजली बोट नांगर टाकून उभी होती. समोर दिसत असलेल्या मिनीकॉय बेटावर नारळाची असंख्य हिरवीगार झाडं वाऱ्यावर डोलत आमचं स्वागत करीत होती. आता आमच्या मोठ्या बोटीतून छोट्या यांत्रिक बोटीत उतरण्याची कसरत करायची होती. वाऱ्यामुळे, लाटांमुळे आमची बोट आणि छोटी यांत्रिक बोट, दोन्ही झुलत होत्या. त्या दोघींची भेट झाल्यावर बोटीच्या दारात उभा असलेला बोटीचा स्टाफ आम्हाला दोन्ही दंडांना धरून छोट्या बोटीमध्ये अलगद उतरवत होता. (लहानपणी केळशीला जाताना हर्णै बंदरातून किनाऱ्यावर पोहोचायला हाच उद्योग करावा लागत असल्याने त्याची प्रॅक्टिस होतीच.)

लक्षद्वीप द्वीपसमूह हा भारताच्या पश्चिम किनाऱ्यापासून साधारण चारशे किलोमीटर दूर असलेला ३६ बेटांचा समूह आहे. यापैकी फक्त अकरा बेटांवर मनुष्यवस्ती आहे. केंद्रशासित असणाऱ्या या बेटांवर जाण्यासाठी केरळ मधील कोची (कोचीन/ एर्नाकुलम) इथून ठराविक दिवशी बोटी सुटतात.

समुद्रावरील ताजा मोकळा वारा भरून घेत मिनीकॉय बेटावर  उतरलो. साधारण ११ किलोमीटर लांबीचं, अर्धवर्तुळाकार पसरलेलं हे बेट लक्षद्वीप समूहातील आकाराने दुसऱ्या क्रमांकाचं बेट आहे. नारळीच्या दाट बनातून आमची गाडी दीपगृहाजवळ पोहोचली. ब्रिटिश काळात १८८५ साली बांधलेल्या या भक्कम दीपगृहाच्या २२० अर्धगोलाकार पायऱ्या चढून जावं लागतं. तिथून अफाट, निळ्या- निळ्या सागराचं नजर खिळवून ठेवणारं दर्शन घडतं. अगदी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या

सुनील नभ हे सुंदर नभ हे

नभ हे अतल अहा

सुनील सागर सुंदर सागर 

सागर अतलची हा

या कवितेची आठवण झाली. तिथून रिसॉर्टला पोचल्यावर सर्वांचं शहाळ्याच्या मधुर पाण्याने, त्यातल्या कोवळ्या, गोड खोबऱ्याने स्वागत झालं. पारदर्शी, स्वच्छ, नितळ निळा समुद्र सर्वांना साद घालित होता. सेफ्टी जॅकेट्स व पायात रबरी बूट चढवून पाण्यात डुंबण्यासाठी सज्ज झालो. समुद्रातील पोहणं, डुंबणं, कयाकिंग,स्नॉर्केलिंग वगैरे साऱ्या गोष्टींसाठी सेफ्टी जॅकेट्स व पायात रबरी बूट\ चपला घालणं बंधनकारक आहे. नाहीतर पाण्यातून चालताना धारदार कोरल्स  आपल्याला टोचतात. तिथे अनेक प्रशिक्षित ट्रेनर आमच्या मदतीसाठी सज्ज होते.

किनाऱ्यावरील पाण्यात अलगद बसण्याचा प्रयत्न केला पण लाटांनी वर ढकलून दिलं. शेवटी धबाकन् फतकल मारून बसलो. अंगावर झेपावणाऱ्या थंड लाटांनी छान समुद्रस्नान झालं. समुद्रात आजूबाजूला हात घातला की नानाविध कोरल्स हातात येत. काहींचा आकार झाडांचा तर काहींचा आकार फुलांचा, पानांचा पक्षांचा. कुणाला गणपतीसुद्धा सापडले. तासाभराने उठलो तेव्हा जमविलेल्या कोरल्सची संपत्ती  समुद्राला परत केली. कुठल्याही प्रकारचे कोरल्स लक्षद्वीपहून  आणणं हा दंडनीय अपराध आहे.

मदतनिसाबरोबर कयाकिंगला गेले. मजबूत प्लास्टिकच्या लांबट हलक्या होडीतून वल्ही मारत जाण्याचा अनुभव अविस्मरणीय होता.  आकाशाच्या घुमटातून परावर्तित होणारे ढगांचे विविध रंग, पारदर्शी निळ्या पाण्यात  उतरले होते. निळा, जांभळा, पिवळा, केशरी, सोनेरी, गुलाबी असे अनंत रंग पाण्यात तरंगत होते. हेमगर्भ सौंदर्य आणि गूढरम्य सुशांतता यांचा अपूर्व मिलाप झाला होता. अथांग पाणी आणि असीम  क्षितिज यांच्या शिंपल्यात आपण अलगद शिरत आहोत असा एखाद्या परीकथेतल्याप्रमाणे आभास झाला. त्या शिंपल्यात स्वतःला अलगद मिटवून घ्यावं असं वाटणारा, देहभान विसरणारा तो स्वर्गीय सुंदर अनुभव होता. 

जेवण व थोडी विश्रांती झाल्यावर दुपारी आम्हाला तिथल्या एका गावात नेण्यात आलं. अकरा हजार लोकसंख्या असलेल्या मिनीकॉय बेटावर छोटी- छोटी अकरा गावं आहेत. मुखिया म्हणजे गावप्रमुख एकमताने निवडला जातो. ग्रामपंचायत व जिल्हा पंचायतही आहे .प्रत्येक गावात सार्वजनिक वापरासाठी एक मध्यवर्ती जागा आहे. गावातल्या कुठच्याही घरी काहीही कार्य असलं तरी प्रत्येकाने मदत करायची पद्धत आहे. आम्हाला ज्या गावात नेलं होतं ते तीनशे वर्षांपूर्वी वसलेलं गाव आहे. चहा, सामोसा आणि नारळाची उकडलेली करंजी देऊन तेथील स्त्रियांनी आमचं स्वागत केलं. पांढऱ्याशुभ्र वाळूवर दोन लांबलचक होड्या सजवून ठेवल्या होत्या. दर डिसेंबरमध्ये तिथे ‘नॅशनल मिनीकॉय फेस्ट’ साजरा होतो. शर्यतीसाठी प्रत्येक बोटीमध्ये वीस जोड्या वल्हवत असतात. 

इथे ट्युना कॅनिंग फॅक्टरी आहे. ट्युना माशांना परदेशात खूप मागणी आहे. त्यांची निर्यात केली जाते. साऱ्या बेटांवरील बोलीभाषा, मल्याळम असली तरी या बेटावर महल (Mahl) नावाची भाषा बोलली जाते.

रात्रभर प्रवास करून बोट कालपेनी या कोचिनपासून २८७ किलोमीटर्सवरील बेटाजवळ आली. आठ किलोमीटर्सच्या या लांबट बेटावर नारळाची असंख्य झाडं झुलत होती. शहाळ्याचा आस्वाद घेऊन समुद्रकिनाऱ्यावरील आरामखुर्च्यांवर बसून निळा हिरवा आसमंत न्याहाळत होतो. एकाएकी आभाळ भरून आलं. पावसाचे टपोरे थेंब अंगावर घेत सारे मांडवात परतलो. कोकणातल्यासारख्या नारळाच्या विणलेल्या झापांच्या त्या मोठ्या मांडवात टेबलखुर्च्यांची व्यवस्था होती. थोड्यावेळाने पाऊस थांबला पण आभाळ झाकोळलेलं राहिलं. त्यामुळे कडक उन्हाचा त्रास न होता सर्वांनी वॉटर स्पोर्ट्सची मजा अनुभवली. वॉटर स्पोर्ट्ससाठी समोरच्या दुसऱ्या बेटावर होडीतून जावं लागलं. समोरचं बेट आणि त्याच्या शेजारचे बेट यांच्यामध्ये शुभ्र फेसाच्या लाटा अडकून राहिल्या आहेत किंवा तिथे बर्फाचा शुभ्र चुरा भुरभुरला आहे असं वाटत होतं. नंतर तिथल्या मदतनीसांकडून कळलं की तो पांढराशुभ्र, मऊ,  मुलायम वाळूचा बांध तयार झाला आहे. त्याचंच एक बेट तयार झालं आहे. त्यावर मनुष्यवस्ती नाही. गंमत म्हणजे त्या बेटाजवळील पाणी गडद निळं होतं आणि आमची छोटी बोट हिरव्या पाण्यातून जात होती. इथे जामानिमा करून स्नॉर्केलिंगची मजा अनुभवली. पाण्याखालील  प्रवाळांचं रंगीबेरंगी जग व रंगीत पारदर्शक लहान मोठे मासे ,सी ककुंबर यांचं दर्शन झालं.

– क्रमशः भाग पहिला 

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अधिकमास म्हणजे काय? ☆ संग्राहक – सुश्री कालिंदी नवाथे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ अधिकमास म्हणजे काय? ☆ संग्राहक – सुश्री कालिंदी नवाथे ☆

अधिक मासाविषयी…

अधिकमास  म्हणजे काय? व त्याला एवढे महत्व कां?

सण हे चंद्रावर अवलंबून आहेत.आणि ऋतू हे सूर्यावर अवलंबून आहेत.आपल्या कालगणनेत चांद्र आणि सौर पद्धतीचा  उत्तम असा मेळ घातलेला  आहे. या गणितावरुन येणारा जास्तचा जो महिना असतो तो म्हणजे “अधिक मास” व कमी झालेला  जो महिना असतो  त्याला “क्षयमास” असे म्हटले जाते. 

सूर्य एका राशीमधे असताना.  जर दोन चांद्र महिन्यांचा प्रारंभ झाला, तर पहिला येणारा महिना  जो असतो तो अधिकमास असतो व दुसरा तोच असणारा महिना हा 

निजमास असतो. 

ज्या चांद्रमहिन्यात सूर्याचा राशीबदल होत नाही तो अधिकमास . 

या आधिक मासात ३३ या संख्येला विशेष महत्व (प्राधान्य) आहे.

अधिक महिन्याचा आणि ३३ अंकांचा संबंध  काय?

तर एका चांद्रवर्षात ३६० तिथी असतात. 

आणि एका सौर वर्षात ३७१ तिथी असतात.

म्हणजेच प्रत्येक चांद्रवर्ष हे सौरवर्षापेक्षा ११ तिथीने लहान आहे. 

आता प्रत्येक वर्षात  ११ तिथी जर कमी झाल्या. तर ११ या संख्येप्रमाणे तिन वर्षात ३३ तिथी कमी होतात.

आणि ३३ तिथी  ज्या कमी होतात. त्या कमी तिथींचा योग्य मेळ बसावा म्हणून एक महिना हा वाढीव धरण्यात येतो. आणि त्या वाढीव येणाऱ्या  महिन्यालाच

अधिक महिना (अधिकमास, धोंडामास) म्हणतात. 

दोन अधिकमासात कमीतकमी २७ महिने व जास्तीतजास्त 

३४ महिने अंतर असते. 

आता अधिकमासात कोणती कर्मे करावीत ? कोणती कर्मे करू नयेत ?

तर अधिकमासात नित्य व नैमित्तिक कर्मे करावीत  म्हणजेच नामकरण, अन्नप्राशन इत्यादी कर्मे करावी. परंतू देव प्रतिष्ठापना, चौल, उपनयन, विवाह, संन्यासग्रहण, वास्तुशांत, गृहारंभ इत्यादी कर्मे करू नयेत असे शास्त्रात सांगितले आहे.

अधिकमासाला पुरुषोत्तममास असे का म्हणतात ?

याविषयी एक कथा सांगितली जाते. अधिकमासाला धोंड्यामहिना,अथवा मलमास असेही म्हटले जाते. 

या महिन्यात शुभ कार्ये केली जात नाहीत. फक्त नैमित्तिक कार्येच होतात. याचे  या अधिकमासाला खूप वाईट वाटले. म्हणून एकदा हताश, निराश,दु:खी

झालेला अधिकमास हा श्रीविष्णूंकडे गेला

व आपली निराशा सांगितली

श्रीविष्णूने अधिकमासाला श्रीकृष्णाकडे पाठवले.

श्रीकृष्णाने मात्र अधिकमासाचे स्वागत करुन त्याचे  “पुरुषोत्तम मास”

असे नांव ठेवले. आणि  सांगितले  हा सर्वोत्तम मास आहे. लोक या महिन्यात जास्त दानधर्म करतील. व  त्या मुळे हा मास पुण्यकारक मास म्हणून ओळखला जाईल. 

म्हणून याला अधिकमास अथवा ‘ पुरुषोत्तममास ‘ असे नांव प्राप्त झाले.

अधिकमासात ‘ विष्णूपूजनाला प्राधान्य आहे. तसेच अपूप दान ‘ देण्याची पद्धत आहे. अपूप म्हणजे जाळीदार पदार्थ. उदा. 

(अनारसे, बत्तासे, मेसूर)

वेदकालातही 

“न पूयते विशीयंति” इति -अपूप ‘ असे वर्णन आहे.

गहू किंवा तांदूळाच्या पिठात तूप व गूळ मिसळून केलेला विशेष पदार्थ (अपूप) म्हणजे “अनरसा” 

अधिकमासात ३३ अनरशांचा नैवेद्य विष्णूला अर्पण करावा. व ३३ अनरसे दान करावेत असे सांगण्यात आले आहे.

विवाह समारंभात कन्यादानाचे वेळी जावई व मुलगी यांना विष्णू व लक्ष्मी स्वरुप मानून माता,पिता त्यांना नमस्कार  करतात. त्यामुळे जावई हा विष्णूसमानच असतो.  

म्हणून विष्णूरुपी जावयाला ३३ अनरसे दान देण्याची पद्धत पडली आहे.

किती महिने अधिक येतात?

सूर्याच्या भासमान गतीमुळे ठराविकच महिने अधिक येतात. 

चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक आणि फाल्गुन हे  ९ महिने अधिक येतात. 

मार्गशीर्ष व पौष हे २ महिने क्षयमास होतात.

राहिला उर्वरीत माघ महिना.  हा मात्र कधीच क्षय किंवा अधिक होत नाही.

आता क्षयमास म्हणजे काय?

कधी कधी एका चांद्रमहिन्यात सूर्य दोन राशीत प्रवेश करतो. तो क्षयमास असतो.  

आणि एक क्षयमास आला की त्यावर्षी दोन अधिकमास येतात.

संदर्भ–  श्री दा. कृ. सोमण, पंचांगकर्ते, खगोलअभ्यासक.

संग्राहिका : सुश्री कालिंदी नवाथे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ चांगुलपणाची शिक्षा… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ चांगुलपणाची शिक्षा… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

(घरात किंवा एखाद्या कार्यक्रमात उरलेलं अन्न तुम्ही गरीबांना दान म्हणून देणार असाल, तर‌ त्यापूर्वी हे आवर्जून वाचावे !) 

साधारण महिन्याभरापूर्वीची गोष्ट असेल. मी राहतो त्या चौकापासुन काही अंतरावर एक लहान गल्ली आहे त्या गल्लीतल्या अपार्टमेंट मधुन राहणारे बरेचसे भाडेकरू I.T. मध्ये काम करणाऱ्यांपैकी आहेत. त्यांच्यापैकीच सुरज हा एक माझा मित्र आहे. मुळचा सोलापूरचा असणारा हा तरुण अभियांत्रिकीची पदवी मिळवून आता नोकरीनिमित्त पुण्यात स्थायिक झाला आहे.

अविवाहित असल्यानं तो आणि त्याच्याच कंपनीतील अजून दोघे असे फ्लॅट भाड्याने घेऊन राहतात. एखाद्या रविवारी सकाळी चहाच्या निमित्तानं आम्ही अधुन मधुन भेटत असतो. अशाच एका सकाळी चहाच्या कपासोबत त्याने ऐकवलेला हा अनुभव.

..

“शनिवारी रात्री आमची जोरदार पार्टी झाली होती. घरमालकाच्या कडक सुचना असल्यानं आमच्या पार्ट्या घराबाहेरच साजऱ्या होतात. रात्री बऱ्याच उशिरा आम्ही आटोपतं घेतलं. अन्न बरंच शिल्लक राहिलं होतं, काही काही पदार्थांना तर अक्षरश: हात सुद्धा लावलेला नव्हता. अन्न वाया घालवणं माझ्या जीवावर आलं होतं, त्या मुळे मी त्यांना पार्सल करून देण्याची विनंती केली. रात्री खूप उशिरा आम्ही फ्लॅटवर परत आलो. मी आल्या आल्या सर्व अन्न फ्रीजमध्ये ठेवुन दिलं आणि झोपायला गेलो. दुसऱ्या दिवशी जाग आली तेव्हा सकाळचे अकरा वाजले होते, दोन्ही मित्र अजूनही घोरत होते. मला चहाची खूप तलफ आली होती पण चहा बनवून घ्यायचा कंटाळा आला होता, दूध विकत आणण्यापासून तयारी होती.

असेच जाऊन खाली चौकातल्या टपरीवर चहा घ्यावा आणि परत येताना दूध घेऊन यावं असा विचार करून मी शॉर्ट्स आणि टी शर्ट वर बाहेर पडलो. चांगला एकाला दोन कप कडक चहा झाल्यावर थोडं बरं वाटलं.

..

मग जरा आजुबाजुला लक्ष गेलं, टपरी चौकातच असल्यानं गर्दी बऱ्यापैकी असते आणि गर्दी असते म्हणून मग भिकारीही बरेच असतात. असाच एक हडकुळा, गालफडं बसलेला, एका हाताने फाटक्या शर्टचा गळा घट्ट आवळुन धरलेला एक वयस्कर भिकारी माझ्या समोर येऊन उभा राहिला आणि दीनवाणेपणाने काहीतरी पुटपुटत एक हात पुढं केला. मी शक्यतो पैसे देत नाही पण बऱ्याचदा जुने पण धडके कपडे, वापरात नसलेल्या वस्तु वगैरे देत असतो. त्याला पहाताच मला फ्रीजमधल्या अन्नाची आठवण झाली. आम्ही तिघांनी खाऊन सुद्धा बरचसं उरलं असतं एवढं अन्न शिल्लक होतं. त्यातील त्याला थोडंसं द्यावं म्हणुन मी त्याला विचारलं, त्यानंही मान डोलावून होकार दिला. मग पुढं मी आणि माझ्या मागुन रखडत्या पावलांवर तो असे फ्लॅटजवळ आलो. त्याला फाटकाबाहेरच थांबवून मी आतुन अन्नाची काही पॅकेट्स प्लॅस्टिकच्या पिशवीतून आणली आणि त्याच्या हातात दिली. त्यानं एकवार त्याच्याकडं पाहीलं आणि कृतज्ञतेने दोन्ही हात जोडुन मला नमस्कार केला. आणि त्याच रखडत्या चालीने हळू हळू निघून गेला. मलाही हातुन एक चांगलं काम घडल्याचं समाधान वाटलं.

..

पाहता पाहता रविवार संपला आणि दुसऱ्या दिवशीचे वेध लागले. माझी सकाळची ९ वाजताची ड्युटी असते त्यामुळं मी आठ वाजताच घरातुन बाहेर पडतो. अंघोळ आटोपुन आरश्यासमोर भांग पाडत असताना कसला तरी आरडाओरडा आणि गोंधळ माझ्या कानावर पडला. काय झालंय ते पहावं म्हणुन मी दार उघडुन बाल्कनीमधून खाली डोकावून पाहिलं. सोसायटीच्या गेटबाहेर झोपडपट्टीतल्या असाव्यात अश्या वाटणाऱ्या आठ दहा स्त्रिया आणि सात आठ पुरुषमंडळी वॉचमन समोर कलकलाट करत हातवारे करत होती. मी बाल्कनीतुन खाली पहात असताना त्यांच्यातील एकाचं लक्ष माझ्याकडे गेलं आणि तो माझ्याकडे बोट दाखवून काहीतरी ओरडायला लागला आणि मग सर्वच जण वरती पाहत गोंगाट करायला लागले.

..

मला कश्याचीच कल्पना नव्हती. तेवढयात वॉचमनने मला खूण करून खाली बोलावलं. दरवाजा लोटुन घेऊन मी खाली गेलो. त्या घोळक्यात तो कालचा भिकारीही दिसत होता पण त्याच्या आदल्या दिवशीच्या आणि त्या वेळच्या रूपात आता जमीन अस्मानाचा फरक होता. आदल्या दिवशी पुटपुटल्यासारखा येणार आवाज आता चांगला खणखणीत येत होता आणि कंबरेत वाकुन रखडत चालणारा म्हातारा आता चांगला दोन पायांवर ताठ उभा होता. मला समोर पहाताच त्यानं माझ्यावर एक बोट रोखुन अर्वाच्य शिव्यांची लाखोली वाहायला सुरुवात केली आणि मग बाकीचे लोकही ओरडु लागले.

..

मला नक्की काय घडतंय तेच कळत नव्हतं. अजून दहा पंधरा मिनिटे गोंधळ झाल्यानंतर मग मला असं सांगण्यात आलं की, मी आदल्या दिवशी दिलेलं अन्न खाऊन त्यांच्यातील एक लहान मुलगा आजारी पडला, त्याला दवाखान्यात न्यावं लागलं आणि त्यापोटी झालेला खर्च सात हजार रुपये हा मी द्यावा असं त्यांचं म्हणणं होतं. 

..

ते ऐकून मी सर्दच झालो, वास्तविक तेच अन्न आम्हीही रविवारी दुपारी खाल्लं होतं आणि आम्ही ठणठणीत होतो. आता त्यांच्यातल्या बायका पुढं झाल्या आणि त्यांनी अक्षरश: मला चहूबाजुंनी घेरून शिव्यांचा दणका उडवला. एव्हाना अपार्टमेंट मधील प्रत्येक बाल्कनीतुन चेहरे डोकावून पहायला लागले होते. मला मेल्याहुन मेल्यासारखं झालं होतं. तोपर्यंत मित्रही खाली आले होते.

..

ते लोक सरळ सरळ आम्हाला लुटतायत हे कळत असुनही काही करता येत नव्हतं. आमच्या अगतिक अवस्थेची त्यांना कल्पना आल्यामुळं आता त्यांच्यातील पुरुष मंडळी आमच्या अंगाशी झटायला लागली. बहुतांशी लोकांच्या तोंडाला आंबुस वास येत होता. मी कशीबशी सुटका करून त्यांच्या घोळक्यातून बाहेर आलो आणि पोलिसांना फोन लावावा म्हणून फोन बाहेर काढला (इतक्या वेळ फोन बाहेर काढला नव्हता, न जाणो त्यांनी कदाचित हिसकावूनही घेतला असता.)

..

“काय करताय साहेब ?” मला वॉचमनने विचारलं. “पोलिसांना फोन करतोय” मी उत्तरलो. “काही फायदा नाही साहेब, या लोकांना काही फरक पडत नाही. उलट उद्या पुन्हा शंभरभर लोकं येऊन गोंधळ घालतील, तुम्ही कशाला दिलात त्यांना खायला?” वाॅचमन म्हणाला.

..

माझ्या चांगुलपणाची ही परिणीती पाहून मी हबकुन गेलो होतो. वॉचमन मराठी होता, माझ्याच जिल्ह्यातील होता. अखेरीस त्याने पुढं होऊन रदबदली केली आणि दोन हजारांवर सौदा तुटला. मी आणि माझ्या मित्रांनी निमूटपणे पैसे गोळा करून त्यांच्या हातात दिले तेव्हाच जमाव हलला. 

..

माझ्या निर्णयाबद्दल मी क्षणोक्षणी पस्तावत होतो.

हल्ली मी उरलेलं अन्न फक्त कुत्र्यामांजरांनाच खाऊ घालतो किंवा चक्क फेकुन देतो. आणि गंमत म्हणजे तो म्हातारा भिकारी अजूनही मी दिसलो कि निर्लज्जपणे फिदीफिदी हसत माझ्यापुढे हात पसरतो “दादा, द्या काही गरिबाला पोटाला !”

..

माझ्या चांगुलपणापायी झालेली हि शिक्षा माझ्या नेहमीच स्मरणात राहणार आहे”

..

ता. क. हल्ली पुण्यात तरी हा धंदा जोरात सुरू आहे असं दिसतं. आदल्या दिवशी शिळं पाकं अन्न घेऊन जायचं, अन दुसऱ्या दिवशी अख्खी वस्ती आणुन राडा करायचा. दिवसाला सात आठ हजार रुपयाला मरण नाही.

लेखक : अज्ञात 

संग्राहिका  : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “अळवावरचं पाणी” – शब्दांकन – सौ. राधिका भांडारकर ☆ परिचय – सौ.अंजोर चाफेकर ☆

सौ.अंजोर चाफेकर

? पुस्तकांवर बोलू काही ?

☆ “अळवावरचं पाणी” – शब्दांकन – सौ. राधिका भांडारकर ☆ परिचय – सौ.अंजोर चाफेकर ☆ 

(सौ. उषा चौधरी यांच्या अनुभव-कथनावर आधारित)

शब्दांकन : सौ.राधिका भांडारकर 

(सौ. उषा चौधरी यांच्या अनुभव-कथनावर आधारित)

प्रकाशिका : डाॅ.सौ.स्नेहलता कुलकर्णी, नीहारा प्रकाशन. 

किंमत : २५०/—

पृष्ठे : १७२

अळवावरचं पाणी हे पुस्तक हातात आले. मुखपृष्ठच इतके छान.. .हिरव्या पानावर मोत्यासारखे चमकणारे जलबिंदू… काय म्हणायचे असेल लेखिकेला?— आयुष्य म्हणजे अळवावरचे पाणी, ते घरंगळून जाते.

आयुष्यातल्या कटू आठवणी, कुणाबद्दलही कटुता मनात न ठेवता केलेला हा उषाताईंचा जीवनप्रवास.

त्यांनी जशा आठवतील तशा आठवणी राधिकाताईंना सांगितल्या. त्यांनी त्या टिपून घेतल्या आणि शब्दांकित करून या पुस्तकरूपाने आपल्यासमोर ठेवल्या.

एका कर्तृत्वावान स्त्रीची ही जीवनगाथा खूप प्रेरणादायी आहे.

सौ.राधिका भांडारकर

राधिकाताईने या पुस्तकात उषाताईंच्या जीवनयात्रेचे विविध पैलू दाखविण्यासाठी ३१ भाग केले आहेत.

कुठलेही पान उघडून कुठलेही पान वाचले तरी त्यातून एक मनस्विनी, कार्यरत, संवेदनाशील झुंजार व्यक्त्तिमत्वाचे दर्शन होते. प्रत्येक प्रसंग डोळ्यासमोर जसाचा तसा उभा राहतो.अंगावर सरसरून काटा येतो.

उषाताईंचे लहानपण अमळनेर येथे गेले. त्यांना सानेगुरुजींचा सहवास मिळाला.त्यांचे संस्कार बालवयातच घडले. राष्ट्रीय भावना ,सामाजिक बांधिलकी, धर्मसहिष्णुतेची रेघ मनावर कोरली गेली. घरी हरिजनांची वेगळी पंगत गुरूजींनी बंद केली. खेडेगावातील वसतिगृहातील मुलांना उषाताईंची आई  घरी जेवण द्यायची. त्यामुळे माणुसकीचा धर्म मनावर लहानपणापासून बिंबला.

हा काळ होता १९४० ते १९७५ पर्यंतचा. त्याकाळी मुला मुलींत आईवडील खूप भेदभाव करत.

मुलांना दूध तर मुलींना ताक…  का तर सासरी दूध मिळाले नाही तर मुलीला सवय असावी.

मुलीला नहाण आले की तिच्या लग्नाची बोलणी सुरू. मुलींना सारखा नन्नाचा पाढा.हे करू नको,ते करू नको. पाचवारी साडी नेण्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागे.

— हा संघर्ष करताना उषाताईंना जाणवले की त्या प्रतिकार करू शकतात. त्यांच्या संवेदना प्रखर आहेत. त्या इतरांहून वेगळ्या आहेत….. राधिकाताईंनी हे मनाचे हेलकावे सुंदर टिपले आहेत.

उषाताईंमधली कार्यकर्ती त्यांना स्वस्थ बसू देत नसे. पुण्यातील कामगार महिलांना संघटित करुन त्यांना शिवणकाम शिकविले. महिलांना मोठ्या ऑर्डर मिळवून दिल्या. कांग्रेस भवन उद्योगाने भरले. महिलांना रोजगार मिळाला. मालाची ने आण उषाताई स्वतः करीत. पण आबासाहेब खेडकरांनी वैयक्तिक अधिकारात परवानगी देऊन सुद्धा विरोधकांच्या पोटदुखीमुळे काँग्रेस भवन खाली करावे लागले.

असे खच्चीकरणाचे प्रसंग वेळोवेळी आले. विरोधक त्यांना नामशेष करण्याचा प्रयत्न करत होते. त्यांची खिल्ली उडवीत होते. समाजातील हा कडवट अंतःप्रवाह त्यांची उमेद जाळत होते… परंतु त्यांची जिद्द त्यामुळे वाढली.

सामाजिक कार्यासाठी त्यांनी त्यांचे कौटुंबिक जीवनही कसे पणाला लावले याचे वर्णन राधिकाताईंनी केले आहे. मात्र त्यांचे कुटुंबीय भक्कमपणे त्यांच्या पाठीशी सदैव होते.

उषाताईंचे यजमान श्री.चौधरी त्यांना सांगत, “समाजकार्य करायचे असेल तर भविष्यात पदरात दगड धोंडे पडतील.ते झेलण्याची तयारी ठेव. तू पक्की रहा. नंतर खचू नकोस. मी खंबीर आहे.”

‘उषाताई वाईट चालीची बाई आहे, तिचे पदस्थांशी अनैतिक संबंध आहेत ‘…  इतक्या खालच्या पातळीवरची  चिखलफेक विरोधकांनी  केली. .परंतु तरीही त्यांचा संसार अबाधित राहिला.कारण श्री.चौधरी यांचे भक्कम कवच त्यांच्या पाठीशी होते. सालस मुलगी अलका, हुषार मुलगा अजय, देवमाणसासारखा जावई सतीश, समंजस सून, सूनेचे आई वडील, सर्वांचा त्यांना सदैव पाठिंबा मिळाला.

राजकारणात त्यांना जसे पाय मागे खेचणारे भेटले तसेच त्यांच्या कार्याची जाणीव ठेवून मदतीचा हात पुढे करणारेही भेटले. मुख्यमंत्री वसंतराव नाईक, इंदिरा गांधी, यांना कदर होती. त्यांच्या कार्याला स्वतःहून देणगी देणारे ही भेटले. तरीही राजकारणातून त्यांचे मन उबगले. 

करायची इच्छा असेल तर करता येण्यासारखे खूप असते.. उषाताई म्हणतात, “ मी दैववादी नव्हते. श्रमवादी होते. काहीतरी सृजनशील करावे ही मनाची भूक. समाजकार्याची तळमळ असेल तर त्यासाठी राजकीय पदाची आवश्यकता नाही. दुसरे माध्यम असू शकते. राजकारणात कधी कधी तत्त्वांची गळचेपी होते. जनतेचा फायदा व्हावा म्हणून मी झटले. परंतु त्यामुळे मी वैरभाव ओढवून घेतला. पक्षाच्या गणितात माझी वजाबाकी झाली. परंतु शेवटी महत्वाचे काय? कामगारांचे कल्याण की माझे राजकीय स्थैर्य?

एखादे कार्य हाती घ्यावे .. उदा. महिला उद्योजक संघाची स्थापना. बी पेरावे,अंकुर फुटावा, त्याने जोम धरावा, आणि विरोधकांचे वादळ उठावे.हा अनुभव प्रत्येकवेळी आला. त्यामुळे सतत अडथळे ओलांडावे लागले. त्यामुळे मी जीवन जगायला शिकले.”

राधिकाताईंनी उषाताईंच्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंग चित्तथरारक रितीने  शब्दांकन केला आहे. असं  वाटतं की आपल्यावर असा प्रसंग ओढवला असता तर ! प्रत्येक प्रसंग जीवनाला कसे सकारात्मक सामोरे जायचे हे दर्शवितो.

उषाताईंचे आयुष्य म्हणजे अर्धा पेला सुखाचा, अर्धा पेला दुःखाचा. एक घोट गोड तर एक घोट कडू.

आज उषाताई हयात नाहीत. परंतु त्यांची कार्यप्रणाली चालू राहील.

आयुष्याच्या संध्याकाळी त्यांच्या मनात कुणाबद्दलही कडवटपणा नाही.आकस नाही.

अळवावरच्या पाण्यासारखा तो ही त्यांनी घरंगळून दिला. निराधार, परित्यक्ता, असहाय्य,अगतिक स्त्रियांसाठी त्या शेवटपर्यंत झटल्या. त्यासाठी कुठले पद नको, हुद्दा नको,.. त्यांच्याकडे होते समाजशील मन.

या पुस्तकाबद्दल लिहावे तेवढे थोडेच. भाषा अतिशय साधी, सरळ, सोपी पण काळजाचा ठाव घेणारी. अंतःकरण हेलावून टाकणारे हे चरित्र आहे. शिवाय या पुस्तकासोबत उषाताईंच्या कुटुंबियांनीही त्यांच्याविषयीच्या आठवणी आत्मीयतेने आणि कृतज्ञ भावनेने लिहिल्या आहेत. सर्वार्थाने हे पुस्तक सुरेख आहे. सर्वांनी जरूर वाचावे व संग्रही ठेवावे असे हे पुस्तक आहे.

राधिकाताई उत्कृष्ट कथालेखिका आहेत,.कवयित्री आहेत. हा चरित्रात्मक प्रकारही त्यांनी अप्रतिमपणे मांडला आहे. मी त्यांना या पुस्तकासाठी व त्यांच्या पुढील लिखाणासाठी खूप खूप शुभेच्छा देते.

परिचय : सौ.अंजोर चाफेकर, मुंबई.

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य #217 ☆ वाणी माधुर्य व मर्यादा… ☆ डॉ. मुक्ता ☆

डॉ. मुक्ता

डा. मुक्ता जी हरियाणा साहित्य अकादमी की पूर्व निदेशक एवं माननीय राष्ट्रपति द्वारा सम्मानित/पुरस्कृत हैं।  साप्ताहिक स्तम्भ  “डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य” के माध्यम से  हम  आपको प्रत्येक शुक्रवार डॉ मुक्ता जी की उत्कृष्ट रचनाओं से रूबरू कराने का प्रयास करते हैं। आज प्रस्तुत है डॉ मुक्ता जी का  मानवीय जीवन पर आधारित एक अत्यंत विचारणीय आलेख वाणी माधुर्य व मर्यादा। यह डॉ मुक्ता जी के जीवन के प्रति गंभीर चिंतन का दस्तावेज है। डॉ मुक्ता जी की  लेखनी को  इस गंभीर चिंतन से परिपूर्ण आलेख के लिए सादर नमन। कृपया इसे गंभीरता से आत्मसात करें।) 

☆ साप्ताहिक स्तम्भ – डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य  # 216 ☆

वाणी माधुर्य व मर्यादा... ☆

‘सबद सहारे बोलिए/ सबद के हाथ न पाँव/ एक सबद औषधि करे/ एक सबद करे घाव,’  कबीर जी का यह दोहा वाणी माधुर्य व शब्दों की सार्थकता पर प्रकाश डालता है। शब्द ब्रह्म है, निराकार है; उसके हाथ-पाँव नहीं हैं। परंतु प्रेम व सहानुभूति के दो शब्द दोस्ती का विकल्प बन जाते हैं; हृदय की पीड़ा को हर लेने की क्षमता रखते हैं तथा संजीवनी का कार्य करते हैं। दूसरी ओर कटु वचन व समय की उपयुक्तता के विपरीत कहे गए कठोर शब्द महाभारत का कारण बन सकते हैं। इतिहास ग़वाह है कि द्रौपदी के शब्द ‘अंधे की औलाद अंधी’ सर्वनाश का कारण बने। यदि वाणी की मर्यादा का ख्याल रखा जाए, तो बड़े-बड़े युद्धों को भी टाला जा सकता है। अमर्यादित शब्द जहाँ रिश्तों में दरार  उत्पन्न कर सकते हैं; वहीं मन में मलाल उत्पन्न कर दुश्मन भी बना सकते हैं।

सो! वाणी का संयम व मर्यादा हर स्थिति में अपेक्षित है। इसलिए हमें बोलने से पहले शब्दों की सार्थकता व प्रभावोत्पादकता का पता कर लेना चाहिए। ‘जिभ्या जिन बस में करी, तिन बस कियो जहान/ नाहिं ते औगुन उपजे, कह सब संत सुजान’ के माध्यम से कबीरदास ने वाणी का महत्व दर्शाते हुये उन लोगों की सराहना करते हुए कहा है कि वे लोग विश्व को अपने वश में कर सकते हैं, अन्यथा उसके अंजाम से तो सब परिचित हैं। इसलिए ‘पहले तोल, फिर बोल’ की सीख दिन गयी है। सो! बोलने से पहले उसके परिणामों के बारे में अवश्य सोचें तथा स्वयं को उस पर पलड़े में रख कर अवश्य देखें कि यदि वे शब्द आपके लिए कहे जाते, तो आपको कैसा लगता? आपके हृदय की प्रतिक्रिया क्या होती? हमें किसी भी क्षेत्र में सामाजिक, राजनीतिक, सांस्कृतिक आदि क्षेत्रों में अमर्यादित शब्दों का प्रयोग नहीं करना चाहिए। इससे न केवल लोकतंत्र की गरिमा का हनन होता है; सुनने वालों को भी मानसिक यंत्रणा से गुज़रना पड़ता  है। आजकल मीडिया जो चौथा स्तंभ कहा जाता है; अमर्यादित, असंयमित व अशोभनीय भाषा  का प्रयोग करता है। शायद! उसका मानसिक संतुलन बिगड़ गया है। इसलिए अधिकांश लोग टी• वी• पर परिचर्चा सुनना पसंद नहीं करते, क्योंकि उनका संवाद पलभर में विकराल, अमर्यादित व अशोभनीय रूप धारण कर लेता है।

‘रहिमन ऐसी बानी बोलिए, निर्मल करे सुभाय/  औरन को शीतल करे, ख़ुद भी शीतल हो जाए’ के माध्यम से रहीम जी ने मधुर वाणी बोलने का संदेश दिया है, क्योंकि इससे वक्ता व श्रोता दोनों का हृदय शीतल हो जाता है। परंतु यह एक तप है, कठिन साधना है। इसलिए कहा जाता है कि विद्वानों की सभा में यदि मूर्ख व्यक्ति शांत बैठा रहता है, तो वह बुद्धिमान समझा जाता है। परंतु जैसे ही वह अपने मुंह खोलता है, उसकी औक़ात सामने आ जाती है। मुझे स्मरण हो रही हैं यह पंक्तियां ‘मीठी वाणी बोलना, काम नहीं आसान/  जिसको आती यह कला, होता वही सुजान’ अर्थात् मधुर वाणी बोलना अत्यंत दुष्कर व टेढ़ी खीर है। परंतु जो यह कला सीख लेता है, बुद्धिमान कहलाता है तथा जीवन में कभी भी उसकी कभी पराजय नहीं होती। शायद! इसलिए मीडिया वाले व अहंवादी लोग अपनी जिह्ना पर अंकुश नहीं रख पाते। वे दूसरों को अपेक्षाकृत तुच्छ समझ उनके अस्तित्व को नकारते हैं और उन्हें खूब लताड़ते हैं, क्योंकि वे उसके दुष्परिणाम से अवगत नहीं होते।

अहं मानव का सबसे बड़ा शत्रु है और क्रोध का जनक है। उस स्थिति में उसकी सोचने-समझने की शक्ति नष्ट हो जाती है। मानव अपना आपा खो बैठता है और अपरिहार्य स्थितियाँ उत्पन्न हो जाती हैं, जो नासूर बन लम्बे समय तक रिसती रहती हैं। सच्ची बात यदि मधुर वाणी व मर्यादित शब्दावली में शांत भाव से कही जाती है, तो वह सम्मान का कारक बनती है, अन्यथा कलह व ईर्ष्या-द्वेष का कारण बन जाती है। यदि हम तुरंत प्रतिक्रिया न देकर थोड़ा समय मौन रहकर चिंतन-मनन करते हैं, तो विषम परिस्थितियाँ उत्पन्न नहीं होती। ग़लत बोलने से तो मौन रहना बेहतर है। मौन को नवनिधि की संज्ञा से अभिहित किया गया है। इसलिए मानव को मौन रहकर ध्यान की प्रक्रिया से गुज़रना चाहिए, ताकि हमारे अंतर्मन की सुप्त शक्तियाँ जाग्रत हो सकें।

जिस प्रकार गया वक्त लौटकर नहीं आता; मुख से नि:सृत कटु वचन भी लौट कर नहीं आते और वे दांपत्य जीवन व परिवार की खुशी में ग्रहण सम अशुभ कार्य करते हैं। आजकल तलाक़ों की बढ़ती संख्या, बड़ों के प्रति सम्मान भाव का अभाव, छोटों के प्रति स्नेह व प्यार-दुलार की कमी, बुज़ुर्गों की उपेक्षा व युवा पीढ़ी का ग़लत दिशा में पदार्पण– मानव को सोचने पर विवश करता है कि हमारा उच्छृंखल व असंतुलित व्यवहार ही पतन का मूल कारण है। हमारे देश में बचपन से लड़कियों को मर्यादा व संयम में रहने का पाठ पढ़ाया जाता है, जिसका संबंध केवल वाणी से नहीं है; आचरण से है। परंतु हम अभागे अपने बेटों को नैतिकता का यह पाठ नहीं पढ़ाते, जिसका भयावह परिणाम हम प्रतिदिन बढ़ते अपहरण, फ़िरौती, दुष्कर्म, हत्या आदि के बढ़ते हादसों के रूप में देख रहे हैं।  लॉकडाउन में पुरुष मानसिकता के अनुरूप घर की चारदीवारी में एक छत के नीचे रहना, पत्नी का घर के कामों में हाथ बंटाना, परिवाजनों से मान-मनुहार करना उसे रास नहीं आया, जो घरेलू हिंसा के साथ आत्महत्या के बढ़ते हादसों के रूप में दृष्टिगोचर है। सो! जब तक हम बेटे-बेटी को समान समझ उन्हें शिक्षा के समान अवसर उपलब्ध नहीं करवाएंगे; तब तक समन्वय, सामंजस्य व समरसता की संभावना की कल्पना बेमानी है। युवा पीढ़ी को संवेदनशील व सुसंस्कृत बनाने के लिए हमें उन्हें अपनी संस्कृति का दिग्दर्शन कराना होगा, ताकि उनका उनका संवेदनशीलता व शालीनता से जुड़ाव बना रहे।

© डा. मुक्ता

माननीय राष्ट्रपति द्वारा पुरस्कृत, पूर्व निदेशक, हरियाणा साहित्य अकादमी

संपर्क – #239,सेक्टर-45, गुरुग्राम-122003 ईमेल: drmukta51@gmail.com, मो• न•…8588801878

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – तीन ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

? संजय दृष्टि – तीन ? ?

तीनों मित्र थे। तीनों की अपने-अपने क्षेत्र में अलग पहचान थी। तीनों को अपने पूर्वजों से ‘बुरा न देखो, बुरा न सुनो, बुरा न कहो’ का मंत्र घुट्टी में मिला था। तीनों एक तिराहे पर मिले। तीनों उम्र के जोश में थे। तीनों ने तीन बार अपने पूर्वजों की खिल्ली उड़ाई। तीनों तीन अलग-अलग दिशाओं में निकले।

पहले ने बुरा देखा। देखा हुआ धीरे-धीरे आँखों के भीतर से होता हुआ कानों तक पहुँचा। दृश्य शब्द बना, आँखों देखा बुरा कानों में लगातार गूँजने लगा। आखिर कब तक रुकता! एक दिन क्रोध में कलुष मुँह से झरने ही लगा।

दूसरे ने भी मंत्र को दरकिनार किया, बुरा सुना। सुने गये शब्दों की अपनी सत्ता थी। सत्ता विस्तार की भूखी होती है। इस भूख ने शब्द को दृश्य में बदला। जो विद्रूप सुना, वह वीभत्स होकर दिखने लगा। देखा-सुना कब तक भीतर टिकता? सारा विद्रूप जिह्वा पर आकर बरसने लगा।

तीसरे ने बुरा कहा। अगली बार फिर कहा। बुरा कहने का वह आदी हो चला। संगत भी ऐसी ही बनी कि लगातार बुरा ही सुना। ज़बान और कान ने मिलकर आँखों पर से लाज का परदा ही खींच लिया। वह बुरा देखने भी लगा।

तीनों राहें एक अंधे मोड़ पर मिलीं। तीनों राही अंधे मोड़ पर मिले। यह मोड़ खाई पर जाकर ख़त्म हो जाता था। अपनी-अपनी पहचान खो चुके तीनों खाई की ओर साथ चल पड़े।

(‘दैनिक चेतना’ में प्रकाशित।)

© संजय भारद्वाज 

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

💥 🕉️ मार्गशीर्ष साधना सम्पन्न हुई। अगली साधना की सूचना हम शीघ्र करेंगे। 🕉️ 💥

नुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – आलेख ☆ आकाशगंगा… ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆

सुश्री सुनिता गद्रे 

?काशगंगा? सुश्री सुनिता गद्रे ?

घटना वैसे पुरानी ही… मतलब सन उन्नीस सौ पैंसठ की! मैं तब ग्यारहवीं में पढ़ती थी।… उस जमाने में उसे मैट्रिक कहते थे। उसके  बाद डिग्री के लिए चार साल की कॉलेज की पढ़ाई… !तो ग्यारहवीं में हमारे साइंस पढ़ाने वाले सर जी ने एक बार हमारे क्लास के सब छात्रों को हमारे गाॅंव की सबसे ऊंची बिल्डिंग के (तीन मंजिला बिल्डिंग के) छत पर रात के वक्त बुलाया था। वह अमावस की रात थी। अमावस की काली  रात  …. नहीं, डरने की  कोई बात नहीं ।…. खगोल शास्त्र के ‘आकाशगंगा’ टॉपिक पर हमें वह प्रत्यक्ष आकाशगंगा और ग्रह तारे नक्षत्र दिखाने वाले थे।

हमारे साइंस के टीचर जैसा डेडीकेटेड शिक्षक मैं ने आज तक नहीं देखा। अपने सब्जेक्ट का पूरा-पूरा ज्ञान उनके पास था और उसको छात्रों तक ले जाने की तीव्र इच्छा भी उनके अंदर थी। फिजिक्स, केमिस्ट्री के बहुत सारे  एक्सपेरिमेंट जो हमारे पढ़ाई का हिस्सा भी नहीं थे, उन्होंने हमसे करवा लिए थे।

उस रात सर जी ने हमें उत्तर से दक्षिण तक, या कहो दक्षिण से उत्तर तक फैला हुआ अनगिनत सितारों से भरा हुआ आकाशगंगा का( मिल्की वे) पट्टा दिखाया था। उसके बारे में बहुत सारी जानकारी भी दी।  इस वजह से हमें खगोल शास्त्र की अलग से पढ़ाई भी नहीं करनी पड़ी।

शादी के बाद मेरा वास्तव्य दिल्ली में ही रहा। बहुत बार हमारे चार मंजिला अपार्टमेंट के छत पर जाकर मैं आकाशगंगा ढूंढने का प्रयास करती थी, अमावस की रात को।….लेकिन बिजली की लाइट के चकाचौंध में वह आकाशगंगा मुझे कभी भी नजर नहीं आयी। अब तो छोटे-छोटे गांवों, कस्बों में भी बिजली पहुॅंच गई है। इसलिए आकाशगंगा वहाॅं भी, कितनी भी ऊंचाई पर जाओ दिखाई देगी ही नहीं।

गर्मी के दिनों में हम लोग छत पर सोया करते थे। अब ए.सी. की वजह से वह बात भी नहीं रही। और छत की ताजा हवा में सोने का सौभाग्य भी हमसे बहुत दूर चला गया।  छत पर बिस्तर पर बैठे-बैठे मैं बच्चों को बचपन में पढ़ा हुआ खगोल शास्त्र का ज्ञान जो थोड़ा-थोड़ा मुझे याद था, बताया- दिखाया करती थी। मृग नक्षत्र… हिरन… उसके पेट में घुसे हुए बाण के तीन चमकीले तारे…. व्याध, और उसी तरह सप्तर्षि का पतंग.. उसकी डोर पकड़े हुए , उत्तर की दिशा में ही दिखने वाला ध्रुव तारा…जो ज्यादा चमकता नहीं,… सप्तर्षि में, वशिष्ठ ऋषि साथ में ही एक छोटे से चमकीले के तारे के रूप में उनकी पत्नी अरुंधति… सब कुछ उनको दिखाती थी। सच में वह उतना साफ नहीं दिखता था जो मैंने बचपन में देखा था।  शर्मिष्ठा ,देवयानी, ययाति का वह एम् आकार वाला तारा समूह… जो एक अलग आकाशगंगा का हिस्सा है… (शायद) जो सर जी ने हमें दिखाया था, वह तो बिल्कुल ही नहीं दिखाई देता था। चमकीला शुक्र, लाल रंग का मंगल ग्रह भी कभी-कभी दिखाई देते थे, अगर आसमान साफ हो तो!… आगे चलकर बच्चे जब बड़े हो गए मैं उनको प्लेनेटोरियम ले गई थी। वहां मॉडर्न तकनीक से दिखाई हुई आकाशगंगा बच्चों के साथ मैंने भी देखी। लेकिन बचपन में देखी हुई आकाशगंगा मुझे वहाॅं भी नहीं मिली ,वह कहीं खो ही गई थी।

एक साल पहले की बात है। मुझे कर्नाटक के एक बहुत छोटे देहात में किसी काम के लिए जाना पड़ा। हम तीन लोग थे ।एक छोटे से बस स्टैंड पर बस रुकी, उतरकर हम हमारे गंतव्य की ओर जाने के लिए निकले। लगभग दो ढाई मैल का फासला चलकर तय करना था। वह भी अमावस की रात थी। ( हो सकता है एकाध दिन आगे- पीछे )चलते चलते मेरी नजर आसमान की तरफ गई…. और मैं सब कुछ भूल कर आसमान में उत्तर- दक्षिण फैली हुई आकाशगंगा को मुग्ध होकर देखती ही रह गई। वह दक्षिण उत्तर फैला हुआ आकाशगंगा का पट्टा (मिल्की वे) मुझे बचपन में ले गया। संपूर्ण गोलाकार क्षितिज… काला स्याह आसमान ..वह भी गहरी कटोरी समान.. और उसके अंदर चमकता हुआ आकाशगंगा का पट्टा! वह तो इतना नजदीक लग रहा था की सीडीपर चढ़कर कोई भी उसे हाथ  लगा सके। और हे भगवान, यह क्या?… मृग नक्षत्र के चौकोर में अनगिनत तारे चमक रहे थे।  फिर मैं अपने जाने पहचाने सितारे खोजने का प्रयास करने लगी। सच में अभी सर जी यहां होते तो कितना अच्छा होता, मन में विचार आया। पंद्रह-बीस मिनट के बाद, “काकी रुको मत,.. जल्दी-जल्दी आ जाओ।” इस भतीजे की आवाज से में खगोल छोड़कर भूगोल पर आ गई। बिना चंद्रमा के चमकने वाली ज्यादा से ज्यादा चाॅंदनियों को अपने मन में भरकर मैं आगे चल पड़ी।

बचपन में देखी हुई और बाद में खोयी हुई मेरी आकाशगंगा मुझे वहाॅं मिल गई थी।

♥ ♥ ♥ ♥ ♥

© सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ साहित्य निकुंज #218 ☆ भावना के दोहे – मन मयूर ☆ डॉ. भावना शुक्ल ☆

डॉ भावना शुक्ल

(डॉ भावना शुक्ल जी  (सह संपादक ‘प्राची‘) को जो कुछ साहित्यिक विरासत में मिला है उसे उन्होने मात्र सँजोया ही नहीं अपितु , उस विरासत को गति प्रदान  किया है। हम ईश्वर से  प्रार्थना करते हैं कि माँ सरस्वती का वरद हस्त उन पर ऐसा ही बना रहे। आज प्रस्तुत हैं  भावना के दोहे… मन मयूर)

☆ साप्ताहिक स्तम्भ  # 218 – साहित्य निकुंज ☆

☆ भावना के दोहे – मन मयूर ☆ डॉ भावना शुक्ल ☆

व्याकुल मन ये कर रहा, पाऊँ तेरा साथ।

पकडूँगा अब एक दिन, गोरी तेरा हाथ।।

*

विधि – विधान से मिल गया, तेरा ही उपहार।

साथ रहेगा हमेशा, तेरा मेरा प्यार।।

*

पलक खोलकर दिन गया, बीत गई है रात।

आशा के आकाश से, खूब हुई बरसात।।

*

खोल रहे संदूक को, दिखे पुराने चित्र।

बीती यादें बंद है, प्यारे -प्यारे मित्र।।

*

देखो इस संदूक को, रखना तुम संभाल।

जब -जब आऊँ याद मैं, खोल लेना हर हाल।।

*

मन मयूरी नाच रहा, मरुथल में बरसात।

रोम -रोम कलियाँ खिली, महके सारी रात।।

© डॉ भावना शुक्ल

सहसंपादक… प्राची

प्रतीक लॉरेल, J-1504, नोएडा सेक्टर – 120,  नोएडा (यू.पी )- 201307

मोब. 9278720311 ईमेल : [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – आलेख ☆ अभी अभी # 270 ⇒ घोड़े की नाल… ☆ श्री प्रदीप शर्मा ☆

श्री प्रदीप शर्मा

(वरिष्ठ साहित्यकार श्री प्रदीप शर्मा जी द्वारा हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए साप्ताहिक स्तम्भ “अभी अभी” के लिए आभार।आप प्रतिदिन इस स्तम्भ के अंतर्गत श्री प्रदीप शर्मा जी के चर्चित आलेख पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है आपका आलेख – “घोड़े की नाल।)

?अभी अभी # 270 ⇒ चांदी जैसे बाल… ? श्री प्रदीप शर्मा  ?

Horse Shoe

मुझे नहीं पता, जंगल के राजा शेर का महल और सिंहासन कैसा होता है और उसकी पोशाक और जूते कैसे होते हैं, लेकिन पवन वेग से उड़ने वाले महाराणा प्रताप के महान चेतक की शक्ति, बहादुरी और स्वामिभक्ति से दुनिया परिचित थी। महारानी लक्ष्मीबाई, शिवाजी महाराज और रामदेवरा के बाबा रामदेव की आप उनके घोड़े के बिना कल्पना ही नहीं कर सकते।

सदियों से घोड़ा इंसान का एक वफादार साथी रहा है। अश्वारोही कहें, अथवा घुड़सवार, वीर बहादुरों और जांबाज़ की जान होते हैं उनके घोड़े, जिनकी टाप उनके आगमन की सूचना देती है। हमारे सभी आधुनिक इंजन से चलने वाले वाहनों की तुलना अश्व शक्ति अथवा हॉर्स पॉवर से ही की जाती है।

सदियों से इंसान का सच्चा साथी और उपयोगी वाहन रहा है एक घोड़ा।।

इसके चार पांव किसी तेज गति से चलने वाले वाहन के पहियों से कम नहीं। जिस तरह एक फौजी के, चलते वक्त उसके जूतों की आवाज आती है, ठीक उसी प्रकार जब एक घोड़ा दौड़ता है, तो उसके टापों की आवाज आसानी से सुनी जा सकती है। यह घोड़े के पांव में लगी लोहे की नाल का कमाल है, जिसे अंग्रेजी में horse shoe कहते हैं। क्या होता है यह हॉर्स शू अथवा घोड़े की नाल ;

A horseshoe is a piece of metal shaped like a U which is fixed to a horse’s hoof.

इसे और अच्छी तरह से यूं भी समझा जा सकता है ;

पशु के पैरों के तलवे में लोहे का एक यू आकार का सोल लगाया जाता है, जिससे घोड़े को चलने और दौड़ने में दिक्कत नहीं होती है। अंग्रेजी के यू के आकर के इस सोल में जहां-जहां कील ठोकी जाती है, वहां-वहां छेद होते हैं। लोहे के इस सोल को नाल कहते हैं। आमतौर पर घोड़े की एक नाल हफ़्ता-10 दिन तक चलती है और इस दौरान घोड़ा सौ से 200 किलोमीटर तक चल लेता है।।

घोड़ा एक समझदार, लेकिन बेजुबां जानवर है। केवल युद्ध में ही नहीं इंसान उसको सवारी के रूप में भी उपयोग करता है। महाभारत के युद्ध में द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण जिस अर्जुन के रथ के सारथी बने थे, उसमें भी ये ही अश्व मौजूद थे।

कभी तांगा, टमटम और बग्घी हमारे प्रिय यातायात के साधन हुआ करते थे।

सेना में भी कैवेलरी रेजिमेंट होती है ;

The 61st Cavalry Regiment is a horse-mounted cavalry regiment of the Indian Army. It is notable for being one of the largest, and also one of the last, operational non mechanised horse-mounted cavalry units in the world.

एक घोड़े की नाल उसके लिए आवश्यक ही नहीं, वरदान भी है। वैसे तो जानवरों के खुर ही उनके जूते होते हैं, लेकिन उनका दर्द एक इंसान महसूस नहीं कर सकता। हम तो अगर नंगे पांव चलें तो पांव में छाले पड़ जाएं। सुना नहीं आपने फिल्म पाकीजा का वह राजकुमार का डायलॉग ;

आपके पांव बड़े नाजुक हैं, इन्हें जमीन पर मत रखिए, मैले हो जाएंगे।।

जब आदमी ही मशीन बनता चला जा रहा है तो फिर असली हॉर्स पॉवर की भी कद्र कौन करेगा। बेचारे घोड़े की सभी शक्ति आजकल मशीनों के इंजन में बदलती जा रही है।

लेकिन याद रहे, हजारों मशीनें एक चेतक पैदा नहीं कर सकती। शुक्र है, जब तक महालक्ष्मी की हॉर्स रेस है, हमारी सेना की ६१वीं अश्वारोही बटालियन मौजूद है, यह प्राणी किसी ना किसी बहाने से, हमारे बीच मौजूद रहेगा।

घोड़ी चढ़ना कोई घुड़सवारी नहीं। असली घुड़सवारी करें, फिर घोड़े की टाप का आनंद लें।

घोड़ा कहां आपसे अपना दर्द बयां करने वाला है। वह भले ही घास से यारी ना करे, लेकिन नाल उसके पांव का सुरक्षा कवच है।

नाल ठोंकने के लिए, पहले घोड़े के पांव बांधने पड़ते हैं, और बाकायदा पांवों में कीलें ठोंकी जाती है, क्योंकि घोड़े का जन्म, सिर्फ चलने के लिए हुआ है। स्वस्थ घोड़ा कभी नहीं बैठता। अगर एक बार बैठा, तो फिर कभी खड़ा नहीं होता।।

घोड़े की नाल के साथ कई टोटके जुड़े हैं और कुछ अंध विश्वास भी। कुछ लोग घर के मुख्य द्वार पर घोड़े की नाल लगाते हैं।

हम ऐसे टोटकों को तूल नहीं देते। वैसे जो घोड़े की नाल है, उसे भाग्यशाली तो होना ही चाहिए, वह एक घोड़े की हमसफर जो है ..horse ..!!

♥ ♥ ♥ ♥ ♥

© श्री प्रदीप शर्मा

संपर्क – १०१, साहिल रिजेंसी, रोबोट स्क्वायर, MR 9, इंदौर

मो 8319180002

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares