(आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’ जी संस्कारधानी जबलपुर के सुप्रसिद्ध साहित्यकार हैं। आपको आपकी बुआ श्री महीयसी महादेवी वर्मा जी से साहित्यिक विधा विरासत में प्राप्त हुई है । आपके द्वारा रचित साहित्य में प्रमुख हैं पुस्तकें- कलम के देव, लोकतंत्र का मकबरा, मीत मेरे, भूकंप के साथ जीना सीखें, समय्जयी साहित्यकार भगवत प्रसाद मिश्रा ‘नियाज़’, काल है संक्रांति का, सड़क पर आदि। संपादन -८ पुस्तकें ६ पत्रिकाएँ अनेक संकलन। आप प्रत्येक सप्ताह रविवार को “साप्ताहिक स्तम्भ – सलिल प्रवाह” के अंतर्गत आपकी रचनाएँ आत्मसात कर सकेंगे। आज प्रस्तुत है मुक्तक )
खूप दिवसांपूर्वी कधी नव्हे तो कल्हईवाला माझ्या दारी आला होता. त्याच्याकडून मी मग माझ्याकडे असलेल्या पितळेच्या भांडयांना कल्हई करून घेतली होती. त्याचं व्यक्तिमत्व, कल्हई करण्याची पद्धत, तो त्यासाठी वापरत असलेलं सामान, वापरत असलेले पदार्थ आदींचे निरीक्षण करून मी त्यावर एक लेख लिहिला होता. तो कल्हईवाला मला फार आवडला होता. त्याने माझ्या बालपणीच्या स्मृती जागृत केल्या होत्या. त्याने कल्हई केलेली भांडी पाहून मला खूप समाधान वाटले. त्याचे कल्हईचे काम मी जीवनाशी जोडले. माणसाच्या मनालाही कधी कधी असाच गंज चढतो. त्यालाही तो काढून कल्हई करण्याची गरज असते वगैरे अशा छान छान गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला.
लेख लिहून झाल्यावर तो माझ्या वाचकांसाठी व्हाट्सअप तसेच फेसबुकच्या भिंतीवर टाकला. वाचकांकडून तो खूप आवडल्याचा प्रतिसाद यायला लागला. अनेकांनी आपल्या जुन्या स्मृती जागृत झाल्याचे सांगितले. कोणाला तो कल्हईचा विशिष्ट वास आठवला. कोणाला त्या लेखात दिलेले ‘ लावा भांड्याला कल्हई ‘ हे गाणं आवडलं वगैरे. हे सगळं पाहून आपले श्रम सार्थकी लागल्याचे मला वाटले.
दुसऱ्या दिवशी हा लेख मी ईमेलने एका वर्तमानपत्रासाठी पाठवून दिला. तीनचार दिवसातच मला त्या संपादकांचा उलट टपाली संदेश आला की आम्ही तुमचा लेख आमच्या पेपरसाठी घेत आहोत. तुमचा एक पासपोर्ट साईझ फोटो पाठवून द्यावा. मला मोठा आनंद झाला. मी त्वरेने माझा फोटो पाठवून दिला. पेपरमध्ये लेख कधी येतो त्याची वाट पाहू लागलो. आणि धन्य तो मंगळवारचा दिवस उजाडला. एका नामांकित पेपरच्या पुरवणीत माझा लेख आला होता. सकाळी आठ पासून मला त्या संदर्भात फोन यायला सुरुवात झाली. त्यावरून मला कळले की आज अमुक अमुक पेपरमध्ये आपला लेख आला आहे. मी माझ्याकडे नेहमी पेपर टाकणाऱ्या मुलाला त्या पेपरबद्दल विचारणार तोपर्यंत तो दुसरा पेपर टाकून ( खरं म्हणजे फेकून ) पसार झाला.
त्यानंतर पहिला फोन आला तो औरंगाबादहून. आमचे झालेले संभाषण असे
हॅलो, मी औरंगाबादहून बोलतो. तुम्ही भांड्यांना कल्हई करता का ?
(मी उडालोच…!) कोण मी ? नाही बुवा.
अहो, असं काय करता ? पेपरमध्ये लेखाखाली तुमचा नंबर दिला आहे.
(आता माझ्या डोक्यात प्रकाश पडला) मी म्हटले, ‘ अच्छा, असं होय. पण अहो’ मी तो लेख लिहिला आहे. मी कल्हईवाला नाही.
बरं, पण भेटला तर सांगा. नंबर द्या त्याचा किंवा भेटला तर पाठवून द्या.
मी म्हटलं, ‘ हो, हो अगदी नक्की…’
परत दुसरा फोन अगदी तसाच. मला लोकांचं मोठं नवल वाटू लागलं. यांना एवढंही समजूही नये का की हा दिलेला नंबर लेखकाचा आहे म्हणून ! या सगळ्या धक्क्यातून सावरून मी बाहेर पडलो. आता प्रत्यक्ष पेपर पाहिल्याशिवाय काही लक्षात येणार नाही तेव्हा पेपर आणायचा म्हणून निघालो. घराच्या थोडेसेच पुढे गेलो. तो एका ए सी पी ऑफिसमधून फोन. मी अमुक अमुक पोलीस स्टेशनमधील हवालदार बोलतो आहे. पेपरमध्ये तुमचा लेख वाचला. त्याचे माझे झालेले संभाषण ( उगवतीचे रंग )
तुम्ही कल्हई करता का ?
नाही. मी तो लेख लिहिला आहे.
मग तो कल्हईवाला तुमच्या ओळखीचा आहे का ?
नाही.
त्याचा नंबर आहे का ?
नाही.
कुठे राहतो ?
माहिती नाही.
तुम्हाला कसा आणि कुठे भेटला ?
अहो, तो दारावर आला होता. त्याच्याकडून माझ्या भांड्यांना कल्हई करून घेतली.
ठीक आहे. तो भेटला तर त्याचा नंबर घ्या. आम्हाला या नंबरवर कळवा. आम्हाला महत्वाचे काम आहे.
असे म्हणून हवालदार साहेबांनी फोन ठेवला. मी मात्र हवालदिल झालो. या महाशयांचे काय काम असावे कल्हईवाल्याकडे ? पोलीस स्टेशनमध्ये कधी तांब्यापितळेची भांडी पाहिल्याचे मला आठवत नाही. म्हटलं जाऊ द्या. आपल्याला काय करायचे ! नाहीतरी अलीकडे सगळ्याच गोष्टींना कल्हई करायची गरज आहे !
अशा प्रामाणिक विचारात रस्ता पार केला. पेपरवाल्याकडे आलो. त्याला म्हटलं, ‘ बाबा, अमुक अमुक पेपर आहे का ?
आहे ना साहेब.
त्याला पुरवणी आहे का ? ( कधी कधी एखाद्या पेपरमध्ये त्यांचे पुरवणीचे पान टाकायचे राहून जाते )
आहे ना साहेब. त्याने पाहून खात्री केली.
मी पैसे दिले, पेपर घेऊन मार्गाला लागलो. रस्त्यात पेपर उलगडून पाहिला. त्यात कल्हईवाल्याच्या छायाचित्रासह माझा लेख आला होता. संपादक महाशयांनी लेखाच्या वर माझे नाव, फोटो छापला होता. लेखाच्या मध्यभागी ‘ कल्हईवाला ‘ असे ठळक शीर्षक होते. आणि लेखाच्या खाली संपर्कासाठी क्रमांक म्हणून माझा फोन नंबर दिला होता. आता लोकांचा काय गोंधळ झाला असावा याचा उलगडा मला झाला. लेखाच्या खाली दिलेला नंबर कल्हईवाल्याचा समजून त्यांनी मला फोन केला होता.
त्या दिवशी मला असे मोजून सातआठ फोन आले. एकाने तर चक्क विचारले की माझ्याकडे तांब्यापितळेची जुनी भांडी आहेत. ती वितळवून तुम्ही त्याच्या देवांच्या मूर्ती घडवून द्याल का ? त्या दिवशी मला अशा खूप नवनवीन गोष्टी कळल्या. नवीन उलगडा झाला. आपल्या लेखातून मनाला थोडीफार कल्हई करण्याचा आपण प्रयत्न करतो पण ते काही बरोबर नाही. आपल्याला आता प्रत्यक्ष कल्हईवाला होण्याची आवश्यकता आहे असेही वाटून गेले. ज्याची लोकांना गरज आहे असा एक नवीन व्यवसाय गवसला. आता कल्हई शिकून घेण्यासाठी तरी त्या कल्हईवाल्याला भेटणे आवश्यक झाले. तो पुन्हा कधी भेटतो बघू या. यावेळी मात्र मी त्याचा नंबर घ्यायला विसरणार नाही. त्या पोलीस स्टेशनला पण कळवावा लागेल ना !
माझ्या मनात ‘डफलीवाले डफली बजा’ च्या चालीवर उगाचच एक गाणे आकार घेऊ लागले.
☆ दोन अनुवादित कथा – १. त्या ग्रोसरी शॉपमध्ये – डॉ. हंसा दीप २. संस्कार – श्री सीताराम गुप्ता ☆ सौ. उज्ज्वला केळकर☆
१. त्या ग्रोसरी शॉपमध्ये – डॉ. हंसा दीप
त्या ग्रोसरी शॉपमध्ये पीटर नुकताच कामाला लागलाय. डेली नीड्स विभागाकडे लक्ष देण्याचे जबाबदारी त्याच्यावर देण्यात आलीय. मार्था रोज तिथे येते. सामान नीटपणे रचलेल्या शेल्फांमधून असलेल्या वाटेमधून ती जाते. तिथली प्रत्येक वस्तू हाताळते. उलटी-पालटी करून बघते. त्याची किंमत , त्याचा ब्रॅंड बघते. गेल्या आठवड्यातल्या किमती आणि या आठवड्यातल्या किंमती यात काय आणि किती फरक पडलाय, याचा शोध घेते. तासाभराने ती शॉपमधून बाहेर पडते.
मार्था करणार तरी काय बिचारी? ऐंशी वर्षाची मार्था घरी एकटीच असते. वेळ तरी कसा घालवणार? बाहेर थंडीचा कहर. भरभुरणारं बर्फ. त्यामुळे निसरडी झालेली वाट. पण व्यायाम नसेल, हता-पायांना चलन – वलन नसेल, तर झोप तरी अशी लागणार? त्यावर मार्थाने उपाय शोधून काढलाहे, या ग्रोसरी शॉपमध्ये रोज येऊन इथल्या वस्तू, फिरत फिरत बघून जायचा. इथे तासभर फिरताना तिचा व्यायाम होतो.
पीटरला मात्र पहिल्या दिवसापासूनच मार्था आवडली नाही. तिचे साधे खरबरीत, मळकट कपडे, विस्कटलेले केस, ठराविक वेळी येऊन वस्तू निरखून पहाणं, हाताळणं, तिथे घुटमळणं… त्याला काहीच आवडत नाही तिचं. रागच येतो. त्याला वाटते, ती चोर आहे. रोज चोरी करण्याच्या उद्देशानेच इथे येत असणार. हळू हळू त्याची खात्रीच झालीय याबद्दल. तो सतत तिच्यावर पाळत ठेवून आहे, पण ती अजून तरी कुठे सापडली नाही. आपण तिला पकडू शकलो नाही, हा आपला पराभव आहे, असा त्याला वाटतय. त्याच्या मनात कधीपासून एक विचार कुलबुलतोय. आज काही झालं, तरी तो तो उपाय अमलात आणणार आहे.
नेहमीप्रमाणे मार्था तासभर त्या शॉपमध्येफरून वस्तू हाताळून दोन-तीन वस्तू घेऊन, पेमेंट करण्यासाठी कौंटरजवळ गेली. घेतलेल्या वस्तूंचे पेमेंट केले आणि ती दुकानाबाहेर पडू लागली.
ती दाराशी पोचेपर्यंत पीटर तिथे उभा आहे. ‘मॅम, मला आपलं सामान आणि पावती दाखवा.’अतीव सभ्यतेने पीटर म्हणाला, ‘हे रूटीन चेक अप आहे.’ मार्थाने आपली पावती आणि सामानाची थैली पुढे केली. पीटरने सामान तपासले. त्यात बीन्सचे तीन डबे जास्त होते. त्याचं पेमेंट केलेलं नव्हतं. तो म्हणाला, ‘या तीन डब्यांचं पेमेंट केलेलं नाही.’
‘पण मी हे सामान मी घेतलेलच नाही. मी कधीच टीनमधले बीन्स कधीच खात नाही.’
‘चोरी सापडली की प्रत्येक चोर असंच म्हणतो.’ रागारागाने डोळे वटारत तो मनाला. त्याने मॅनेजरला आणि मॅनेजरने पोलिसांना बोलावले.
दहा मिनिटात पोलिसांची गाडी त्या शॉपसमोर उभी राहिली. दोन पोलीस खाली उतरले. त्यांनी मॅनेजरची तक्रार ऐकून घेतली. मग कार्यालयातील सीसीटीव्ही.चे फूटेज तपासले. त्यात आक्षेपार्ह काहीच दिसले नाही. मॅनेजरचे आभार मानून आणि मारठला घेऊन पोलीस गाडी निघून गेली. पीटरचा भाव आता वाढला होता. त्याला आता तिच्यापासून मुक्ती मिळाली होती. मोठ्या खुशीत होता तो.
अर्ध्या तासाने पुन्हा पोलिसांची गाडी त्या शॉपसमोर उभी राहिली. दोन पोलीस खाली उतरले. मार्था मात्र गाडीत तशीच बसून राहिली होती. पोलीस मॅनेजरशी काही बोलले. मॅनेजर त्यांना आपल्या रूममध्ये घेऊन गेले. दहा मिनिटांनी ते तिघे बाहेर आले. मॅनेजरनी पीटरला हाक मारली आणि कामावरून ताबडतोब काढून टाकल्याचा निर्णय सांगितला.
‘ का पण? चोरी पकडली म्हणून?’ त्याने तणतणत विचारले.
‘ नाही. चोरी केली म्हणून!’ मॅनेजर म्हणाला.
पोलिसांनी त्याला मॅनेजरच्या खोलीत असलेल्या सीसीटीव्ही.चे फूटेज दाखवले. त्यात पीटर मार्थाने पेमेंट केल्यानंतर दाराशी जाताना तिच्या थैलीत बीन्सचे डबे टाकताना स्पष्ट दिसत होतं. पीटरला या सीसीटीव्ही.ची काही कल्पना नव्हती. त्याने मार्थाच्या थैलीत टीन टाकताना कार्यालयातल्या सीसीटीव्ही.चा स्वीच ऑफ केला होता. पण दुकानात मॅनेजरच्या खोलीत आणखी एक सीसीटीव्ही.असू शकेल,याचा त्याला अंदाज आला नाही. पोलिसांनी मार्थाची क्षमा मागत तिला गाडीतून खाली उतरवलं आणि पीटरल ते घेऊन गेले. पीटरला मार्थापासून मुक्ती हवी होती. त्याला ती मिळालीही. पण कशी? त्याला दोषी ठरवून त्याचा सोनेरी भविष्यकाळ कळवंडत मिळालेली मुक्ती होती ती.
मूळ कल्पना – डॉ. हंसा दीप
लेखन – सौ. उज्ज्वला केळकर
♥ ♥ ♥ ♥ ♥
२. संस्कार – श्री सीताराम गुप्ता
रमेश कुमारांचा मुलगा रजत पिंपरीला राहून इंजिनियरिंगचा अभ्यास करत होता. योगायोगाने रमेश कुमारांच्या मित्राने तिथे एक फ्लॅट विकत घेतला होता. तो रिकामाच होता. रजत वर्षभर हॉस्टलमध्ये राहिला. मग वडलांच्या मित्राच्या फ्लॅटवर राहू लागला. रजतने आपल्या आणखी तीन मित्रांना तिथे राहायला बोलावले. एकूण चार विद्यार्थी तिथे राहत होते. तिथे त्यांना घरासारखाच आराम वाटायचा.
रमेश कुमार आग्र्याचे. त्यांनी स्वैपाक – पाणी आणि इतर कामे करण्यासाठी एका माणसाला नेमले. तो तिथेच राहत असे. एकदा मुलाची ख्याली-खुशाली बघण्यासाठी रमेश कुमार स्वत:च तिथे गेले. संध्याकाळची वेळ झाली, तेव्हा रजतचे अनेक मित्र तिथे आले. सगळे जण तिथेच जेवले. रमेश कुमार जोपर्यंत तिथे होते, तोवर रोज रोज हेच दृश्य ते पाहत होते. रोज संध्याकाळी मुले तिथे यायची. जेवायची. गप्पा-टप्पा व्हायच्या. थोडा दंगा-धुडगूसदेखील घातला जायचा. मग ती निघून जायची. त्यांचं अस्तित्व, गप्पा-टप्पा यामुळे मोठं चैतन्यपूर्ण वातावरण तिथे तयार व्हायचं.
रजतचे सगळे मित्र त्यांच्याशी अतिशय आदराने वागायचे. त्यांचा मान ठेवायचे. रमेश कुमारांना बरं वाटायचं. पण एक दिवस रजतचे सगळे मित्र निघून गेल्यावर त्यांनी रजातला विचारले, ‘रजत, तू इथे इंजिनियरिंगचा अभ्यास करण्यासाठी आला आहेस, की ढाबा चालवायला?’ त्यांच्या प्रश्नाने रजतचा चेहरा उतरला. तो जड आवाजात म्हणाला, ‘पापा, हेसुद्धा माझ्यासारखेच घरापासून दूर रहातात. बाहेर कसं जेवण मिळतं, आपल्याला कल्पना आहेच. हे कधी कधी यासाठीच इथे येतात, की घरी बनवलेलं चांगलं जेवण त्यांना कधी तरी मिळावं. इथे त्यांना घरी बनवलेलं चांगलं जेवण मिळतं. ‘
त्यावर रमेश कुमार म्हणाले, ‘पण त्यामुळे तुझा खर्च वाढत जातो, त्याचं काय? आणि तुझ्या अभ्यासावरदेखील त्याचा परिणाम होतो. अशा फालतू मुलांचं इथे येणं आणि रात्री दंगा घालणं बंद कर.’
रजत रोषपूर्ण आवाजात म्हणाला, ‘नाही बाबा, मी असं नाही करू शकणार! मुलं आली की जेवणासाठी त्यांना विचारावंच लागेल आणि ती जेवूनच जातील. खर्चाचं म्हणाल, तर मी माझ्या खर्चात तेवढी काटकसर करतोच आहे. आता मुले जमल्यावर थोड्या गप्पा-टप्पा, दंगा होणारच. ती काही रात्र रात्र दंगा करत नाहीत. त्यांनाही त्यांचा अभ्यास आहेच. ‘
राजतच्या या उत्तराने रमेश कुमार प्रसन्न झाले. ते एक प्रकारे रजतची परीक्षाच घेत होते. तो म्हणाला असता की पापा त्यांना उद्यापासून येऊ नका, म्हणून सांगतो, तर त्यांना वाईट वाटलं असतं. रमेश कुमारांच्या परिवारात ज्या काही चांगल्या गोष्टी होत्या, दुसर्याचा विचार करणं, त्यांचा आदर-सत्कार करणं, मान-सन्मान ठेवणं हे संस्कार बाहेर राहूनही किंवा काळाचा प्रभाव पडूनही रजतच्या बाबतीत बदलले नव्हते.
आता रमेश कुमार म्हणाले, ‘मी काही मनापासून बोललो नव्हतो. तुझी प्रतिक्रिया काय होते आहे, हेच मला बघायचं होतं. आता उद्या मला आग्र्याला परत जायला हरकत नाही.’ हे ऐकल्यावर राजताच्या चेहर्यावर आलेल्या प्रसन्न भावाने रमेश कुमारांची प्रसन्नता आणखी वाढवली.
मूळ कथा – संस्कार
मूळ लेखक – श्री सीताराम गुप्ता
अनुवाद – सौ. उज्ज्वला केळकर
♥ ♥ ♥ ♥ ♥
अनुवाद – सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ लक्षद्वीपचा रंगोत्सव… भाग-२ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
(इथे जामानिमा करून स्नॉर्केलिंगची मजा अनुभवली. पाण्याखालील प्रवाळांचं रंगीबेरंगी जग व रंगीत पारदर्शक लहान मोठे मासे ,सी ककुंबर यांचं दर्शन झालं.) — इथून पुढे
कालपेनी बेटावर परतल्यावर, जेवण व विश्रांती झाल्यावर तिथल्या स्थानिक रहिवाशांनी नाच करून दाखविला. लुंगीचा धोतरासारखा काच्या मारला होता. एका हातात लांबट चौकोनी पत्रा व दुसऱ्या हातात लाकडी दंडूका होता. झांजेच्या तालावर ‘भारत मेरा देश है’ म्हणत नाच करीत होते. गणपतीत आपल्याकडे कोकणातील बाल्ये लोक नाचतात तसा प्रकार होता.
नंतर तिथल्या होजिअरी फॅक्टरीला भेट दिली. तिथे बनविलेले टी-शर्ट, शुद्ध खोबरेल तेल, नारळाचे लाडू, डेसिकेटेड कोकोनट यांची खरेदी झाली.
आज बोटीवर परतल्यावर बोटीच्या डेकवर गेलो. अंधार होत आला होता. आकाश आणि आजूबाजूचा समुद्र सगळं राखाडी काळसर झालं होतं. शुक्राची चांदणी चमचमत होती. थंडगार, शुद्ध हवेमुळे प्रसन्न वाटंत होतं. थोड्याच वेळात वेगाने दौडणाऱ्या बोटीच्या पाळण्यातील हलक्या झोक्यांमुळे डोळ्यावर पेंग आली.
कोचीपासून चारशे किलोमीटर दूर असलेले कवरत्ती हे बेट लक्षद्वीपची राजधानी आहे. आमच्या बोटीचं नावही ‘कवरत्ती’. इथे आम्हाला काचेचा तळ असलेल्या छोट्या दहा जणांच्या बोटीतून समुद्रात नेलं. असंख्य कोरल्स ,लहान- मोठे, काळे- पांढरे, निळे- पिवळे मासे, शंख शिंपले, सी ककुंबर, कासव अशी विधात्याने निर्मिलेली आगळीच जीवसृष्टी बघायला मिळाली. दुपारी जेवण झाल्यावर म्युझियम बघायला गेलो. समुद्रजीवांचे सांगाडे, असंख्य प्रकारची, रंगांची कोरल्स, पूर्वीची मासेमारीची साधने, होड्या, स्थानिक वापरातील वस्तू म्युझियममध्ये ठेवलेले आहेत. ॲक्वेरियममध्ये शार्कमाशासह अनेक प्रकारचे रंगीत मासे पोहत होते. इथे लक्षद्वीप डायव्हिंग ॲकॅडमी आहे.
केरळचा चेराकुलातील शेवटचा राजा चेरामन पेरूमल याच्या कारकीर्दीमध्ये लक्षद्वीप बेटावर वसाहत करण्यास सुरुवात झाली असं समजलं जातं. प्रथम हिंदू व बौद्ध लोकांची वस्ती होती. सातव्या शतकात येथे इस्लामचा शिरकाव झाला. १७८७ मध्ये टिपू सुलतानाच्या ताब्यात इथल्या पाच बेटांचे प्रशासन होतं. १७९९ च्या श्रीरंगपट्टणमच्या लढाईनंतर ही बेटं ब्रिटिश ईस्ट इंडियाच्या ताब्यात गेली. १८५४ मध्ये चिरक्कलच्या राजाने सारी बेटं ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात दिली. स्वातंत्र्यानंतर १९५६ मध्ये ‘युनियन टेरिटरी ऑफ लक्षद्वीप’ ची स्थापना झाली.
लक्षद्वीपवरील रहिवाशांचं आयुष्य तसं खडतरंच आहे. नारळ भरपूर होतात. थोड्याफार केळी, टोमॅटो, आलं अशा भाज्या व कलिंगडासारखं फळ एवढंच उत्पादन आहे. साऱ्या जीवनावश्यक गोष्टी कोचीनहून येतात. बेटांवर बारावीपर्यंत शाळा आहेत. पुढील शिक्षणासाठी कोचीनला यावं लागतं. भारत सरकारतर्फे शिक्षण आणि आरोग्य सुविधा विनामूल्य दिल्या जातात. बोटींवरील सुसज्ज हॉस्पिटल्समध्ये स्थानिकांच्या आजारांवर उपचार होतात. मोठ्या ऑपरेशनसाठी बोटीने कोचिनला नेण्यात येतं. इथला ८०% पुरुषवर्ग देशी- परदेशी बोटींवर काम करतो. लोक साधे व अतिशय तत्परतेने मदत करणारे आहेत. स्त्रिया शिक्षित आहेत. बुरख्याची पद्धत नाही. लग्नाच्या खर्च नवऱ्यामुलाला करावा लागतो. लग्नानंतर नवरामुलगा मुलीच्या घरी जातो.
बोटीवरील स्टाफ आपली सर्वतोपरी काळजी घेतो. बोटीवरील प्रवाशांच्या केबिन्सना कुलूप लावण्याची पद्धत नाही. तसेच वॉटर स्पोर्ट्सला जाताना तुम्ही किनाऱ्यावर ठेवलेली पर्स,पाकिटे, मोबाईल यांना कसलाही धोका नाही. सारं सुरक्षित असतं. विश्वासाने कारभार चालतो.
या बेटांवर पक्षी किंवा प्राणी फारसे आढळले नाहीत. समुद्र पक्षांच्या एक दोन जाती आहेत .या बेटांपैकी बंगाराम, अगत्ती, तिनकारा अशी बेटं परकीय प्रवाशांसाठी राखीव आहेत. इथे हेलिपॅडची सुविधा आहे. इथल्या निळ्या- निळ्या स्वच्छ जलाशयातील क्रीडांसाठी, कोरल्स व मासे पाहण्यासाठी परदेशी प्रवाशांचा वाढता ओघ भारताला परकीय चलन मिळवून देतो.
कोरल्स म्हणजे छोटे छोटे आकारविहीन समुद्रजीव असतात. समुद्राच्या उथळ समशीतोष्ण पाण्यात त्यांची निर्मिती होते. हजारो वर्षांपासूनच असं जीवन त्यांच्यातील कॅल्शियम व एक प्रकारचा चिकट पदार्थ यामुळे कोरल रिफ्स तयार होतात .ही वाढ फारच मंद असते. या रिफ्समुळे किनाऱ्यांचं संरक्षण होतं. संशोधकांच्या म्हणण्याप्रमाणे जागतिक तापमान वाढीमुळे आर्क्टिक्ट व अंटार्टिक्ट यावरील बर्फ वितळत असून त्यामुळे जगभरच्या समुद्रपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. म्हणूनच पर्यावरणाचे रक्षण ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे. लक्षद्वीप द्वीपसमूहातील बेटांवर डोंगर, पर्वत नाहीत तर पुळणीची वाळू आहे. या द्वीप समूहातील बंगाराम या कंकणाकृती प्रवाळ बेटाचा, एक मनुष्यवस्ती नसलेला भाग २०१७ मध्ये समुद्राने गिळंकृत केला. आपल्यासाठी पर्यावरण रक्षणाचं महत्त्व पटविणारा हा धोक्याचा इशारा आहे.
प्रवासाच्या शेवटच्या दिवशी सकाळी अकरा वाजता आमची बोट कोचीन बंदराला लागणार होती. थोडा निवांतपणा होता. रोजच्यासारखं लवकर आवरून छोट्या बोटीत जाण्याची घाई नव्हती. म्हणून सूर्योदयाची वेळ साधून डेकवर गेलो. राखाडी आकाशाला शेंदरी रंग चढत होता. सृष्टीदेवीने हिरव्यागार नारळांचे काठ असलेले गडद निळे वस्त्र परिधान केलं होतं. पांढऱ्याशुभ्र वाळूतील छोटे शंख, कोळी, समुद्रकिडे त्यांच्या छोट्या छोट्या पायांनी सुबक रेखीव रांगोळी काढत होते. उसळणाऱ्या निळ्याभोर पाण्याच्या लांब निऱ्या करून त्याला पांढऱ्या फेसाची झालर त्या समुदवसने देवीने लावली होती. छोट्या छोट्या बेटांवर नारळीच्या झाडांच्या फुलदाण्या सजल्या होत्या. अनादि सृष्टीचक्रातील एका नव्या दिवसाची सुरुवात झाली. आभाळाच्या भाळावर सूर्याच्या केशरी गंधाचा टिळा लागला. या अनादि अनंत शाश्वत दृश्याला आम्ही अशाश्वतांनी नतमस्तक होऊन नमस्कार केला.
☆ बातमी…अशीही…तशीही… (एक कल्पनाविलास) – लेखक : अज्ञात ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆
बातमी…अशीही…तशीही… (एक कल्पनाविलास)
“दादर स्टेशनसमोर एका माणसाने वडा-पाव खाल्ला.” ……
… जर ही बातमी वेगवेगळ्या लेखकांना लिहायला सांगितली तर ते कशा प्रकारे लिहीतील याची उदाहरणे….. एक कल्पनाविलास
***
नवकथा
मुंबईतला कुंद, घामट उन्हाळा. दादर स्टेशनवर तो उतरला तेव्हा सकाळी घातलेला पांढराशुभ्र शर्ट घामाने पार चोळा-मोळा होऊन गेला होता. त्याला वाटलं आपलं आयुष्य देखील ह्या शर्ट सारखंच मुंबईत पहिल्यांदा आलो तेव्हा असंच परीटघडीचं होतं, गेल्या काही वर्षांत इतके धक्के खाऊन तेही लोळा-गोळा होऊन पडलंय. पाय ओढत तो पुलाकडे चालायला लागला. फलाटावरचं गोल घड्याळ जणू डोळा वटारून त्याच्याकडे रागाने बघत होतं. अचानक त्याला जाणवलं, आपल्याला खूप भूक लागलीये, पोट जाळणारी, रौद्र भूक. लहानपणी माय कामावर गेली की शाळेतून आल्यावर लागायची तशी खवळलेली भूक. तो पुलाखालच्या वडा-पावच्या टपरीवर थांबला. तिथला माणूस मोठ्या काळ्याकुट्ट कढईत वड्यांचा घाणा तळत होता. गोल, मोठ्ठाले वडे तेलात तरंगत होते. त्याला अचानक लहानपणी आजीने सांगितलेल्या नरकाच्या गोष्टीची आठवण झाली. आजी सांगायची की यमाच्या दरबारी मोठ्या कढया आहेत, उकळत्या तेलाने भरलेल्या आणि त्यात पापी माणसांना तळून काढलं जातं. पुढ्यातल्या कढईतले वडे त्याला एकदम मानवी मुंडक्यांसारखे दिसायला लागले. इतका वेळ पोट कुरतडणारी भूक नाहीशी झाली, पण आपल्या त्या सहा बाय सहाच्या खुराड्यात जाऊन काही बनवायचं त्राण त्याला नव्हतं म्हणून त्याने एक वडा-पाव घेतला आणि चार घासात संपवून टाकला.
***
नवकविता
स्टेशनसमोरची रंगहीन टपरी
पुलाखाली झोपणाऱ्या म्हातारीसारखी
अंग चोरून पडलेली
वडे तळणाऱ्या माणसाच्या
कपाळावर तरंगणारे घामाचे थेंब
ठिबकतायत
पुढ्यातल्या कढईत
टप टप टप
येतोय आवाज
चुरर्र चुर्र
ही खरी घामाची कमाई
पुढ्यातल्या
टवका गेलेल्या बशीतला
वडा-पाव खाताना
त्याच्या मनात येउन गेलं
उगाचच
***
ललित
दुपारची वेळ, मुंबईतला कुंद, तरीही ओल्या फडक्यासारखा आर्द्रतेने भिजलेला उन्हाळा. मी दादर स्टेशनला उतरलो तेव्हा चार वाजले होते. वारुळातून भराभरा बाहेर पडणाऱ्या मुंग्यांसारखी चहुबाजूने माणसं चालत होती. प्रत्येकाची चालण्याची ढब वेगळी, गती वेगळी पण एकत्र पाहिलं तर सगळ्यांची लय एकच भासत होती. मुंबईच्या गर्दीची अंगभूत लय. माझं लक्ष सहज पुलाखाली असलेल्या वडा-पावच्या टपरीकडे गेलं. कधीकाळी पिवळा रंग दिलेली लाकडी टपरी. आता त्या रंगाचे टवके उडाले होते. मागच्या भिंतीच्या निळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर ती पिवळी टपरी उठून दिसत होती, मागे अखंड सळसळतं पिंपळाचं झाड, रंगसंगती खूपच उठून दिसत होती. व्हान गॉगच्या एखाद्या चित्रासारखी. भारल्यासारखा मी त्या टपरीकडे गेलो.
‘वडा-पाव द्या हो एक’ मी म्हटलं.
‘एक का, चार घ्या की’, मालक हसून बोलला, आणि त्याने माझ्या पुढ्यात बशी सरकवली. पांढऱ्या बशीत मधोमध ठेवलेला सोनेरी रंगाचा वाटोळा गरगरीत वडा, बाजूला आडवी ठेवलेली एखाद्या सिनेतारकेच्या डाव्या भुवईइतकी बाकदार हिरवी मिरची आणि भोवताली पेरलेला लालभडक चटणीचा चुरा. नुसती ती बशी बघूनच माझ्या तोंडाला पाणी सुटलं. वडा-पाव खाता खाता माझ्या मनाला विचार स्पर्शून गेला, देव तरी कुणाच्या हातात कसली कला ठेवतो बघा!
***
शामची आई व्हर्जन
‘शाम, बाळ खा हो तो वडा-पाव’, पाठीवरून हात फिरवत आई म्हणाली, ‘अरे, वडा-पाव खाण्यात पण धर्मच आहे. बघ तो पाव म्हणजे मानवी शरीर हो आणि आतला वडा म्हणजे आत्मा. वडयाच्या आत बटाट्याचं सारण भरलंय तसा आपल्या अंतरंगात ईश्वर असला पाहिजे. अरे वड्याशिवाय का पावाला किंमत असते? तसे आपले शरीर हो. आत आत्मा नसला की केवळ पिठाचा गोळा!’
***
जी. ए. कुलकर्णी व्हर्जन
रामप्पाच्या हाटेलातला कढईखाली धडधडून पेटलेला जाळ. लाल-पिवळ्या लसलसत्या जीभा वरपर्यंत गेलेल्या. काळ्याकुट्ट कढईत उकळणारा तेलाचा समुद्र आणि एका टोकाला वाकडा झालेला झारा घेऊन वडे तळ्णारे ते सतरा-अठरा वर्षांचे पोर. वातीसारखे किडकिडीत, डोक्यावर केसांचे शिप्तर आणि डोळ्याच्या कोपऱ्यात साचून राहिलेले वावभर दुःख. तो दुकानापुढल्या बाकड्यावर येवून बसला तेव्हा त्या पोराने त्याच्याकडे नजर उचलून नुसते पहिले. तेव्हढ्यानेच त्याच्या काळजाला किती घरे पडली. मुंबईत आल्याला आपल्याला पाच वर्षे झाली नव्हे, हे पोरही अजून तिथेच आहे आणि आपणही इथेच आहोत, त्याच्या मनाला तो विचार नकळत सुई टोचल्यासारखा टोचून गेला. एक दीर्घ सुस्कारा सोडत त्याने बका-बका वडा-पाव खायला सुरवात केली.
***
गो. नि. दांडेकर व्हर्जन
हिते पडघवलीस काही मिळत नाही हो, पण मुंबईस मिळतो म्हणे वडा-पाव का कायसा. आमचा आबा असतो ना, मुंबईस शिकावयास, तो जातो म्हणे कधी कधी खावयास. कसली मेली अभद्र खाणी. गुजभावजींस विचारू जावे तर ते गडगडाट करीत हासतात नी म्हणतात, ‘आगो वयनी, वडा म्हणजे आपला बंदरावर शिदुअण्णाच्या हाटेलात मिळतो तो बटाटावडाच गो’. असेल मेला, आम्ही बायका कधी कुठे गेलोत हाटेलात चरायला म्हणून आम्हाला कळेल?
***
ग्रेस व्हर्जन
विषुववृत्तावरून एक सोनेरी पक्षी आला आणि एक पीस मागे ठेऊन गेला. ते पीस फिरलं वडा-पावच्या गाडीवर, काजळकाळ्या रस्त्यावर आणि तिच्या रंगरेखल्या डोळ्यांवर. मग आल्या स्पर्शओल्या निळसर जांभळ्या सुगंधांच्या लाटांवर लाटा आणि तिच्या कबुतरी डोळ्यात उमटल्या पुढ्यातल्या वडा-पावच्या रूपदर्शी प्रतिमा. माझ्या जिभेवर वस्तीला आले चंद्रमाधवीचे प्रदेश आणि वडा-पाव खातानाच्या तिच्या सांद्र आवाजात मी गेलो हरवून, डोहकाळ्या यमुनेत डुंबणाऱ्या रंगबावऱ्या राधेसारखा !
मूळ लेखक – अज्ञात
प्रस्तुती : मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
तसं पाहिलं तर आम्ही सारेच ८० च्या उंबरठ्यावरचे. आयुष्यात या आधीही आम्ही अनेक प्रवास केले होते, अनेक पर्यटन स्थळांना धावून धावून, अत्यंत उत्सुकतेने, जग पाहण्याच्या दृष्टीने भेटी दिल्या होत्या. पण कालचा सूर्यास्त पाहताना जाणवत होती ती आमच्या आयुष्यातील संध्याकाळ.
या सहलीला येण्याचा एकच हेतू होता निवांतपणा अनुभवावा. पृथ्वीवरच्या एका वेगळ्याच परिसराचा, तिथल्या निसर्गाचा, मानवी जीवनाचा, आनंददायी, निराळा अनुभव घ्यायचा होता आम्हाला. मनातली हिरवळ जपत, वयाला न नाकारता निसर्ग आणि निराळ्या संस्कृतीत वावरण्याचा एक मजेदार अनुभव घेत स्वतःला रिफ्रेश्ड, तजेलदार करायचे होते. आज भी हम जवान है असे निदान एकमेकांना बजावायचं होतं. आलेल्या अनेक पर्यटकांमध्ये ९०% माणसं तरुण वर्गातली असली तरी दहा टक्के आमच्यासारखेच तरुण तुर्क म्हातारे अर्क होतेच की! आणि ही सारी तरुण माणसं आमच्याबरोबर कौतुकाने सेल्फी काढत होते, म्हणत होते,” आमचंही म्हातारपण असच तुमच्यासारखं टवटवीत असावं”
तेव्हा या टवटवीत सहा जणांचा आजचा पहिला स्थलदर्शनाचा दिवस.
सकाळीच मस्त complimentary नाश्ता घेतला. बालिअन पद्धतीचा नाश्ता होता. वेगळ्या चवीची पुडिंग्ज, खीर, काही भाज्या, सॅलड्स, ब्रेड, भात, फळे,, फळांचा रस वगैरे भरपूर होते. नाश्ता छान आरोग्यदायी आणि चविष्ट होतात आम्हाला फिरायला घेऊन जाण्यासाठी दारातच टॅक्सी उभी होती. जवळजवळ दिवसभराची आठ तासांची दूर होती. खर्च रुपये तेरा लाख इंडोनेशियन रुपीज. प्रत्येक वेळी या लाखांची गोष्ट अनुभवत होतो आम्ही. पण हे इंडियन नसून इंडोनेशियन रुपीज आहेत या विचाराने भानावरही येत होतो.
आमचा पहिला थांबा होता नुसा डुआ बीच. अतिशय विस्तीर्ण असा रम्य सभोवताल. तशी फारशी गर्दी जाणवत नव्हती. आम्ही एका शटलने किनाऱ्यापर्यंत आलो. लांबलचक पांढऱ्या वाळूचा किनारा, त्याला लागूनच नारळाची, तसेच नारळ जातीतल्या वृक्षांची रांग, काही पपनसाचे वृक्ष ही तिथे आम्ही पाहिले. किनाऱ्याचे जणू काही ही वृक्षवल्ली संरक्षणाच करत होती. समुद्राचे पाणी निळसर होते. पर्यटकांसाठी हे एक बाली इंडोनेशिया येथील अत्यंत आकर्षक स्थळ आहे. देशोदेशीचे पर्यटक येथे विखुरले होते आणि समोर पसरलेल्या महासागराच्या दर्शनाने थक्क होत होते. माझ्या मनात नेहमी एक प्रश्न येतो की जगातला कुठलाही सागर हा त्या त्या वेळी अथवा प्रत्येक वेळी सौंदर्यातली विविधता घेऊनच आपल्यासमोर का येतो? प्रत्येक किनारा आपण तितक्याच नवलाईने का पाहतो? कदाचित याचं एकच उत्तर असेल हीच त्या किमयागाराची किमया!
इथे आसपास अनेक रेस्टॉरंट्सही होती. अनेक साहसी सागरी क्रीडा होत्या. सांगितिक कार्यक्रमही होते. दरवर्षी मार्च महिन्यात येथे जाॅयलँड फेस्टिवल साजरा केला जातो. जी20 ची परिषद इथे भरली होती. अनेक सांगितिक क्षेत्रातल्या कलाकारांसाठी नुसा डुवा हे एक उत्तम व्यासपीठ आहे.
जितकं निसर्ग सौंदर्य डोळ्यात साठवता येईल तितकं साठवण्याचा आम्ही अक्षरशः प्रयत्न करत होतो. त्या विस्तीर्ण परिसरात असलेली राम, सीता, लक्ष्मण यांची सुरेख शिल्पं आमच्या कॅमेराला आकर्षित करीत होती. उन्हाचा तडका जसा जाणवत होता तसाच समुद्रावरून वाहत येणारा वाराही मनाला सुखावत होता.
बाली येथे दरवर्षी जवळजवळ देशोदेशीचे पाच मिलियन पर्यटक भेट देतात. इथल्या अनेक आकर्षणांपैकी एक प्रमुख आकर्षण म्हणजे गरुड विष्णू कल्चरल पार्क.(GWK).
या येथे गरुडावर बसलेल्या विष्णूचा ७५ मीटर उंच असा अत्यंत कलात्मक वास्तुकलेच्या आणि शिल्पकलेच्या दृष्टीने ही थक्क करणारा असा पुतळा आहे. तो एका सिमेंटच्या उंच पायावर बसवलेला आहे आणि हे सगळं बांधकाम पुन्हा एका तीन मजली इमारतीवर लॉन्च केलेलं आहे. त्यामुळे या पुतळ्याची संपूर्ण उंची जवळजवळ 121 मीटर होते. जगातले हे तिसऱ्या क्रमांकाचे उंच असे शिल्प गणले जाते. बालीमध्ये फिरत असताना ते अनेक ठिकाणाहून दिसते. आमचं विमान डेन्सपार विमानतळावर उतरत असतानाही आम्हाला सर्वप्रथम मोकळ्या आकाशात या गरुड विष्णूचे दर्शन झाले आणि आम्ही मनोमन आनंदलो.
बालीमध्ये हिंदू धर्माचे अधिक वर्चस्व आहे. विष्णू ही संरक्षक देवता मानली जाते. या पुतळ्यातील विष्णूच्या हातातही कमलपुष्प, शंख आणि राजदंड आहे. बाली येथील उंगासान बारुंग येथे एका उंच डोंगरावर या संपूर्ण शिल्पाची उभारणी केलेली आहे. जणू काही गरुडावरचा हा विष्णू उंचावरून बाली या बेटावर आपली संरक्षक नजर ठेवून आहे.
न्याओमन नुआरर्ता या वास्तुशास्त्रज्ञाने याची रचना केलेली आहे आणि या वास्तूचे उद्घाटन सप्टेंबर २०१८साली झाले आहे. म्हणजे बाली येथील हे पर्यटन स्थळ तसे नवीन, अलीकडचेच आहे. प्रवेशासाठी येथे प्रत्येकी ५० हजार इंडोनेशियन रुपीज ची दोन तिकिटे काढावी लागतात .म्हणजे आम्हाला सहा जणांसाठी सहा लाख IDR लागले. पुतळ्यापर्यंत जाण्यासाठी येथे विनामूल्य शटल सर्विस आहे. हे मात्र आमच्यासाठी दिलासा देणारे होते. परिसर खूपच भव्य आणि विस्तीर्ण आहे आणि जागोजागी रामायणातील, पुराणातील कथा सांगणारी विशेष व्यक्तींची अतिशय दिलखेचक आणि उंच मोठी शिल्पे उभारलेली आहेत. त्यात अगदी रावण, शूर्पणखा पण आहेत. ऋषि कश्यप, विनिता यांचे पुतळे आहेत. गरुडाची आई विनिता म्हणूनच गरुडाला वैनतेय असेही म्हणतात.
गरुडावर आरुढ झालेल्या विष्णूची एक कथा येथे सांगतात. गरुडाला त्याच्या आईला गुलामगिरीतून मुक्त करायचे होते आणि त्यासाठी त्याला समुद्रमंथनातून निर्माण झालेले अमृत हवे होते.
“मी तुला माझ्या पंखावर घेतो आणि तू मला ते अमृत दे” असा गरुड आणि विष्णु मध्ये करार होतो. विष्णूचे वाहन गरुड असल्या मागची ही एक दंतकथा आहे.
पक्षी श्रेष्ठ गरुडाचे पसरलेले पंख आणि त्यावरचा रुबाबदार सुंदर विष्णू पाहताना अक्षरशः डोळ्याचे पारणे फिटते. हे शिल्प कॉपर, ब्रास आणि सिमेंटच्या मिश्रणातूनच बनवलेले आहे. पण पाहताना मात्र ते दगडी असल्याचा भास होतो. १९९३ ला या बांधकामाची सुरुवात झाली आणि २०१८ साली त्याचे उद्घाटन झाले. २१७ फूट रुंद आणि चारशे फूट उंच असलेलं हे भव्य सौंदर्य पहायला बालीत आलेले देशोदेशीचे पर्यटक गर्दी करतात. थक्क होतात, तृप्त होतात.
शिवाय इथे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम जसे की संगीत, नृत्य, बालीअन सादर करतात. लोक परंपरा जपण्याच्या भावनेतून झालेले हे कार्यक्रम मनोरंजक वाटतात. असा आनंददायी अनुभव घेत, तीस हजाराचं(IDR) आईस्क्रीम खाऊन आणि बालीनीज कन्ये बरोबर छायाचित्र खेचून आम्ही तेथून तृप्त मनाने परतलो. घेता किती घेशील आणि सांगू किती सांगशील अशीच आमची अवस्था झाली होती.