मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # 204 ☆ नदी काठी ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 204 – विजय साहित्य ?

☆ नदी काठी ☆ कविराज विजय यशवंत सातपुते  ☆

नदी काठी विसावल्या

दोन संसारिक पिढ्या

उगवती मावळती

भाव भावनांच्या उड्या…! १

नातवंडे खेळताना

येई नदीला बाळसे

गुजगोष्ठी मनातल्या

हसे वार्धक्य छानसे…! २

देई बोलका दिलासा

आधाराची काठी हाती

टाळी वाजता पाण्यात

उजळली पहा नाती…!३

उगवती मावळती

नदी काठी संगमात

बाल,तारूण्य वार्धक्य

आठवांच्या आरश्यात…!४

उगवती दावी जोर

बालपण झाले जागे

सांजावली दोन मने

अनुभव राही मागे…!५

नदी धावते धावते

पोटी घेऊन जीवन

काठावरी फुलारले

सानथोर तनमन…!६

© कविराज विजय यशवंत सातपुते

हकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘स्वामी विवेकानंद-ज्योतिर्मय आदर्श’ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? विविधा ?

‘स्वामी विवेकानंद-ज्योतिर्मय आदर्श’ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

नमस्कार वाचकांनो!

नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्याचे निमित्य साधण्यासाठी हा लेख आहेच! पण या वर्षाच्या नूतन लेखासाठी माझे आदर्श स्वामी विवेकानंदांविषयी लिहिण्याची संधी मिळणे यापेक्षा दुसरे औचित्य कांहीच असू शकत नाही. आपण ‘स्वामी’ या नावाचा उच्चार करताक्षणी आपल्या डोळ्यासमोर भगव्या वस्त्रांकित, एकाकी जंगलात किंवा गुहेत कठोर तपश्चर्या करणारे एखादे व्यक्तिमत्व उभे राहते! जाणून बुजून स्वीकारलेल्या अशा विजनवासाचे कारण असते, या नश्वर जगातील मायेच्या मोहपाशातून मुक्ती शोधत ईश्वर प्राप्तीचे! 

पण मंडळी याला एक अपवाद स्मरतो, स्वामी विवेकानंद, हिंदू धर्माच्या समृद्ध संकल्पनेचे महान वैश्विक दूत! ‘वसुधैव कुटुंबकम’ म्हणजेच संपूर्ण वसुधा किंवा विश्व हे एका कुटुंबासारखे आहे, हा मौलिक आणि अमूल्य संदेश जगाला देणारे खरे खुरे जागतिक नेते! मैत्रांनो, आजच्या पवित्र दिनी अर्थात, १२ जानेवारीला या महान वैश्विक नेत्याची जयंती आहे. १८६३ साली या तारखेला कोलकाता येथे जन्मलेल्या, ‘ईश्वराबद्दल पूर्ण अविश्वासी’ अशा अत्यंत जिज्ञासू नरेंद्रनाथ दत्त (स्वामीजींचे पूर्वीचे नाव) हे अनेक ज्ञानी लोकांना आणि संतांना प्रश्न विचारायचे, “तुम्ही ईश्वर पाहिलाय कां?” दक्षिणेश्वर मंदिरातील ‘काली माँ’ चे प्रखर, अनन्य भक्त, महान संत, स्वामी रामकृष्ण परमहंस यांच्याकडून मात्र एकमेव ‘हो’ असे उत्तर आले आणि मग गुरू आणि शिष्याचा लौकिक अणि पारलौकिक असा ऐतिहासिक समांतर प्रवास सुरू झाला. यांत नरेंद्रला देवी माँ आणि त्याच्या परम गुरूंचे शुभाशीर्वाद आणि मोक्षप्राप्ती मिळती झाली.

स्वामीजी महान भारतीय संन्यासी आणि महान तत्वज्ञानी होते. १९ सप्टेंबर १८९३ रोजी शिकागो येथे जागतिक धर्माच्या संसदेत, विवेकानंदांचे सुप्रसिद्ध भाषण म्हणजे ‘हिंदू धर्म आणि आंतरधर्मीय संवादाच्या इतिहासातील एक ऐतिहासिक आणि प्रभावशाली क्षण’ होता हे स्पष्टपणे दिसून आले. जेव्हां इतर सर्व धार्मिक नेते अत्यंत औपचारिकपणे ‘सभ्य स्त्री पुरुषहो!’ म्हणून उपस्थितांना संबोधित करत होते, तेव्हां ब्रिटिश भारताच्या या युवा आणि तेजस्वी प्रतिनिधीने उपस्थित ७००० हून अधिक प्रतिष्ठित सभाजनांना ‘माझ्या अमेरिकेतील बंधू आणि भगिनींनो’ असे प्रेमभराने संबोधित केले. धर्म, वंश, जात अन पंथ ही सर्व बंधने झुगारून या अलौकिक बुद्धिमत्तेच्या स्वयंप्रकाशित तरुणाने मानवतेच्या समान धाग्याने सभागृहातील प्रत्येक व्यक्तीशी अनवट नातं जोडलं. त्यानंतर तीन मिनिटांहून अधिक काळ हे सर्वस्वी परके लोक त्याला टाळ्यांचा कडकडाट करत प्रतिसाद देते झाले यात नवल ते काय? म्हणून त्याला भाषणासाठी दिलेला अल्पावधी मोठ्या आनंदाने वाढवला गेला.या प्रथम दिव्य भाषणाचे अनोखे प्रतीक म्हणून ‘दि आर्ट इन्स्टिट्यूट ऑफ शिकागो’ मध्ये आजही हे ‘४७३ प्रकाशमय शब्द’ अभिमानाने प्रदर्शित केला जात आहेत. या एका भाषणाने जणू या तेजस्वी भारतपुत्राने अखिल जग पादाक्रांत केले आणि नंतर जगभरातील अनेक ठिकाणी त्याला अति सन्मानाने मार्गदर्शन वक्ता म्हणून आमंत्रित केले गेले.

अतीव आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपल्या या पहिल्या भाषणात स्वामीजी म्हणाले होते, ‘धर्म हा भारताचा अग्रक्रम नाही, तर गरिबी आहे!’ आपल्या गरीब भारतीय बंधुबांधवांची हर तऱ्हेने उन्नती व्हावी हे त्यांचे मूलभूत लक्ष्य होते. याच सामाजिक कारणासाठी ‘रामकृष्ण मठ’ आणि ‘रामकृष्ण मिशन’ ची स्थापना करण्यात आली. हे मिशन जगातील २६५ केंद्रांद्वारे (२०२२ च्या आकडेवारीनुसार भारतात अशी १९८ केंद्रे आहेत) गरजू लोकांना सेवा पुरवते. धार्मिक प्रवचनांच्या पलीकडे जाऊन या संस्था बरेच कांही करतात. हे मिशन स्वामीजींचे स्वप्न पुढे नेण्यासाठी, तळागाळातील जनतेची सेवा करण्यासाठी नेहमीच अग्रस्थानी असते. स्वामीजी आणि त्यांच्या शिष्यांच्या विविध भारतीय आणि आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये प्रकाशित झालेल्या साहित्याद्वारे या उद्दिष्टांचा प्रचार आणि प्रसार करण्यात येतो. मिशनद्वारे चालवण्यात येणारी धर्मादाय रुग्णालये, फिरते दवाखाने आणि प्रसूतीकेंद्रे भारतभर विखुरलेली आहेत. तसेच मिशनची परिचारिकांसाठी प्रशिक्षण केंद्रे, अनाथाश्रम आणि वृद्धाश्रम देखील आहेत. हे सामाजिक कार्य ग्रामीण आणि आदिवासी कल्याण कार्यासोबत समन्वय साधीत अव्याहतपणे सुरु आहे. शाळांमध्ये शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना शाळेचा गणवेश, अल्पाहार आणि पुस्तके दिली जातात.

मानवतेची मूर्तिमंत प्रतिमा, निस्वार्थी सामाजिक नेते आणि हिंदू धर्माचे कट्टर अनुयायी असलेल्या स्वामीजींनी प्रत्येक भारतीयात देव पाहिला. त्यांनी संपूर्ण देशाचा पायी प्रवास केला. जनतेशी जवळीक साधत त्यांनी भारतीयांचे प्रश्न समजावून घेतले, आत्मसात केले अन त्यांच्या या प्रश्नांचा गुंता सोडवण्यात आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत केले. त्यांचे दिव्य प्रतिभासंपन्न गुरु परमहंस यांच्या सांगण्यावरून त्यांनी हा संपूर्ण भारत-प्रवास केला. परमहंसांनी स्वामीजींना बहुमोल सल्ला दिला होता, “हिमालयाच्या गुहांमध्ये ध्यान करीत केवळ स्वतःची मुक्ती साधण्यापेक्षा भारतातील सकल गरीब लोकांची सेवा कर.” आपल्या गुरूंची आज्ञा शिरोधार्य मानीत प्रकृती अस्वास्थ्य असतानाही विवेकानंदांचे हे सेवाव्रत सुरूच होते. स्वामीजी ४ जुलै १९०२ रोजी वयाच्या जेमतेम ३९ व्या वर्षी बेलूर मठ, हावडा येथे महा-समाधीत लीन झाले. 

मैत्रांनो, स्वामीजींच्या प्रेरणादायी उद्धरणांची वारंवार आवर्तने होता असतात. त्यांपैकीच माझ्या आवडीची त्यांची काही अनमोल वचने उद्धृत करते:

*परमेश्वराची लेकरे असल्याचा आत्मविश्वास

“तू सर्वशक्तिमान आहेस. तू कांहीही आणि सर्व काही करू शकतोस”

*आत्मचिंतन

“दिवसातून किमान एकदा स्वत:शी बोला, नाहीतर तुम्ही या जगातील एका बुद्धिमान व्यक्तीला भेटण्याची संधी गमवाल”

*अडथळे आणि प्रगती

“ज्या दिवशी तुम्हाला कोणतीही समस्या भेडसावत नाही, तेव्हा तुम्ही खात्री बाळगू शकता की, तुम्ही चुकीच्या मार्गाने प्रवास करत आहात”

प्रिय वाचकांनो, आजच्या या विशेष दिनी भारताचे महान सुपुत्र, प्रभावशाली तत्त्वज्ञ, समाजसुधारक आणि संपूर्ण जगाला वंदनीय असलेले वेदांताचे विश्व प्रचारक अशा स्वामी विवेकानंदांच्या स्मृती-चरणी विनम्र प्रणाम करून त्यांचे प्रेरणादायी तत्वज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न करू या!

धन्यवाद🙏🌹

©  डॉ. मीना श्रीवास्तव

दिनांक-१२ जानेवारी २०२४

ठाणे

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मोगरा फुलला ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे

सौ. अर्चना सुरेश देशपांडे

? जीवनरंग ?

मोगरा फुलला ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे ☆

शाळेतून निवृत्त झाल्यावर आयुष्य कसं आनंदात चालले होते. सकाळी पांच वाजता उठायचे, सकाळच्या प्रसन्न वातावरणात एक तास फिरून यायचे, आल्यावर बागेतून चक्कर मारायची. तोपर्यंत घरातील सर्वजण उठायचे. मग चहा करून बाल्कनी मध्ये बसून गरम चहाचे घोट घ्यायचे. कधी कधी फुले काढता काढता शेजारच्या काकूंशी गप्पा व्हायच्या. मग घरातील पुढचे व्यवसाय सुरू करायचे. पण आज माझी लगबग पाहून माझी मुलगी सोनू म्हणाली, “का ग आई !आज फार खुशीत दिसते आहेस आज काहीतरी विशेष दिसते “. मिस्टरांनी पेपर बाजूला करून माझ्या चेहऱ्याकडे पाहिले”अगं माझी बाल मैत्रीण’ विद्या तिच्या पुस्तकाचे प्रकाशन आहे. त्यासाठी कलेक्टर मेधाताई साने प्रमुख पाहुण्या म्हणून येणार आहेत आणि त्या सोहळ्याला मला आग्रहाचे निमंत्रण आहे. “त्यावर माझा मुलगा म्हणाला, “कोणाच्या? विद्यामावशीचया पुस्तकाचे का?”त्यावर मी होकार दिला आणि माझे मन भूतकाळात गेले.

आम्ही सांगलीला रहात असताना आमच्या शेजारी जोशींचे बिऱ्हाड राहायला आले. ते जोशी काका जिल्हा परिषद मध्ये नोकरीला होते. त्यांच्या घरी त्यांची पत्नी व दोन मुली आणि त्यांची आई असा परिवार होता. त्यांची थोरली मुलगी संध्या माझ्याच वर्गात होती व धाकटी विद्या माझ्यापेक्षा दोन वर्षांनी लहान होती. जोशी आजींना पहिली नात झाली तेव्हा त्या थोड्या नाराज झाल्या, त्यांना नातू हवा होता पण काही दिवसांनी दुसरी नात जन्मली आणि तिच्या दुर्दैवाने काही दिवसांनी त्यांचे यजमान अकस्मितपणे हृदयविकाराने स्वर्गवासी झाले. त्यांच्या जाण्याचे खापर विद्याच्या डोक्यावर फोडले गेले तिचे बारसेही केले नाही. ती दिसायला सुंदर होती. काळेभोर केस, टपोरे डोळे, गौरवर्ण आणि भरपूर बाळसे. इतकी सुंदर की पाहिली की उचलून घ्यावी अशी छान मुलगी होती ती, पण सगळेजण तिलाही हिडीस फिडीस करत. आजीनंतर तिचं नाव “नकोशी “ठेवलं होतं. आईचा मात्र तिच्यावर फार जीव होता. शेवटी मातृ हृदयच ते! आई तिला विद्या नावाने हाक मारत असे. ती अतिशय हुशार होती जणू तिच्यावर सरस्वतीचा वरदहस्त होता. अर्थात या सर्व गोष्टी मी मोठी झाल्यावर माझ्या आईकडून मला कळल्या.

हळूहळू विद्या मोठी झाली. तिला आमच्या शाळेत प्रवेश घेतला गेला. कोणतीही स्पर्धा असो ती कशातच मागे नव्हती. तिचं अक्षर मोत्यासारखं सुंदर होते.

प्रवेशद्वाराजवळील फलकावर सुविचार लिहिण्याचा मान तिलाच मिळायचा. शाळेमध्ये पहिला नंबर तिने कधीच सोडला नाही. दहावी परीक्षेत तर गुणवत्ता यादीत येण्याचे भाग्य तिला लाभले. तिला मोगऱ्याची फुले फार आवडत। कायम मोगऱ्याच्या दिवसात तिच्या शेपट्यावर मोगऱ्याचा गजरा असायचाच.

दहावी परीक्षेत गुणवत्ता यादीत आल्यावर तिने कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. गौरवर्ण, बोलके डोळे लांब सडक केसांचा शेपटा व त्यावर मोगऱ्याचा गजरा यामुळे एकदम सर्वांच्या नजरा तिच्याकडे वळू लागल्या. हुशारी आणि मनमोकळा स्वभाव या गुणांनी लवकरच “कॉलेज क्वीन “होण्याचा मान तिला मिळाला. कॉलेजच्या स्नेहसंमेलनाचे नियोजन तिने केले होते

स्नेह संमेलनाच्या वेळी तिचे सौंदर्य ‘हुशारी व सभधीटपणा पाहून एका गर्भ श्रीमंत गृहस्थांनी माधवरावांनी, आपल्या एकुलत्या एक मुलासाठी तिला मागणी घातली. तिच्या वडिलांनी आनंदाने तिचे कन्यादान केले. लग्न होऊन सोन पावलांनी घरची लक्ष्मी घरी आणली. घरचा व्याप सांभाळून ती घरच्या व्यवसायातही मदत करू लागली. माधवरावांना तिचे खूपच कौतुक होते, आपल्या गुणांनी तिने सर्वांची मने जिंकून घेतली माधवरावांच्या निधनानंतर व्यवसायाची जबाबदारी तिने अंगावर घेतली व सुनीलच्या खांद्याला खांदा लावून ती मेहनत करत होती. अशा रीतीने दोन वर्षे भुरकन उडून गेली. आता मात्र सर्वांना लहान बाळाची चाहूल हवी होती. त्याचे बोबडे बोल ऐकण्यासाठी सर्वांचे कान आसुसले होते. . खूप डॉक्टरी उपचार करून झाले पण दैव साथ देत नव्हते. तिच्या मातृत्वाचा हक्क दैवाने नाकारला होता तिला मूल होणारच नाही हे समजता क्षणी घरची माणसे बदलली, सगळीच नाती विस्कटली. समारंभाला जाताना सारे जण तिला टाळू लागले पण नणंदेला तिचे कौतुक होते. विद्या मात्र शांत होती समईतील वातीसारखी. माणूस ठरवतो एक आणि नियती घडवते दुसरच आपण तिच्या हातातलं बाहुलं असतो हेच खरे!

पुढे दोन वर्षांनी नणंद बाळंतपणासाठी माहेरी आली. तिच्या डोहाळे जेवणाचा घाट विद्याने पुढाकार घेऊन घातला. तिला प्युअर सिल्कची साडी व गळ्यातील नेकलेस आणला. त्यावेळी सुद्धा ओटी भरताना विद्याच्या मावस सासूला ओटी भरायला सांगितले गेले, जाणून बुजून सुनेला डावलले गेले.

दिवस भरल्यावर नणंदेला मुलगा झाला. तिच्या सोबत सासूबाई दवाखान्यात दोन दिवस राहिल्या. मुलगी व बाळ घरी आल्यावर तिच्या खोलीत जाण्यास विद्याला बंदी केली गेली, बारशाचया दिवशी तर कहरच झाला नणंदेची ओटी भरायला पुढे आलेल्या विद्याला हात धरून मागे ओढले गेले आणि” अगं ‘बाळंतिणीची ओटी लेकुरवाळी स्त्रीने भरायची असते हे तुला माहित नाही का? असे म्हणत सासूबाई डाफरल्या आणि शेजारच्या काकूंना ओटी भरण्याचा मान दिला. प्रत्येक ठिकाणी अपशकुनी ठरवून तिच्या सासूने, एका स्त्रीने एका स्त्रीची अवहेलना केली.

विद्याने कधीही चकार शब्द काढला नाही. येईल ती परिस्थिती निमूट पणे सहन करत होती. माहेरच्या माणसांना वाटे, ” विद्या नशीबवान आहे’ चांगला बंगला आहे, दारात  चार चाकी गाडी आहे, घरात नोकरांचा राबता आहे” आणि विद्या सुद्धा सर्वांच्या पुढे हसतमुख राहून आनंदी असल्यासारखी दाखवायची.

सुनील ‘तिचा नवरा सुद्धा रंग बदलू लागला सरड्यासारखा. ज्याच्या जीवावर आपलं घरदार सोडून, पुढील शिक्षण सोडून ती आली होती याचा विचार न करता तो तिला हिडीस-फिडीस करू लागला, मोलकरणी सारखा वागू लागला. मातृत्वाच्या कमतरतेवर वारंवार टोचून बोलू लागला. असेच दिवस चालले होते. नणंदेच मुलगा पाच वर्षाचा झाला. आजीने त्याचा वाढदिवस थाटामाटात साजरा केला. कार्यक्रमासाठी बरेच मित्र नातेवाईक, विद्याची बहिण व मेहुणे मुलासह आले होते.

कार्यक्रमाच्या दुसरे दिवशी घरातली मंडळी, नातेवाईक यांची सरबराई करण्यात विद्या दंग होती, त्यावेळी नणंदेचा मुलगा आणि तिच्या बहिणीचा मुलगा शेजारच्या आमराईत खेळायला गेले. तिथे कैऱ्या पडण्यासाठी आलेल्या मुलांपैकी एका मुलाचा दगड  चुकून उत्सव मूर्तीला लागला आणि कपाळाला खोक पडली. कोणीतरी  घरी येऊन सांगता क्षणीच नवऱ्याने तिच्यावर तोंड सुख घेतले” तू अवलक्षणी आहेस आता इतरांनाही तुझ्या पायगुणाचा प्रसाद मिळू लागला आहे तेव्हा तुझा घरात राहण्याचा अधिकार संपला आहे. तू घरातून चालती हो”

सर्व नातेवाईकांसमोर अपमानित झालेल्या विद्याने दोन कपड्यानिशी घर सोडले. रात्री ती स्टेशन वरील वेटिंग रूम मध्ये बसून राहिली. दुसऱ्या दिवशी सकाळी रेल्वेने तिने पुणे गाठले आणि “हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेत” दाखल झाली. तिने आपली कर्म कहाणी तिथल्या संस्थापकांच्या कानी घातली. तिथल्या संस्थापक ताईंनी संस्थेमध्ये राहण्याची तिला परवानगी दिली. संस्थेत राहून तिने बी. एड. केले. तिच्यातील जिद्द पाहून तिला त्यांच्या शाळेत नोकरीत रुजू करून घेतले. नोकरी करता करता तिने पी. एच. डी. पदवी संपादन केली आणि वसतिगृहाच्या संचालक पदाची सूत्रे हाती घेतली.

नोकरीतून जमलेल्या पुंजीतून आणि काही कनवाळू लोकांच्या देणगीतून पुण्याजवळ मायेची पाखर घालणारी” स्नेहालय” ही संस्था तिने सुरू केली. त्या संस्थेत अनाथ मुलं, दुर्लक्ष केलेल्या स्त्रियांना आसरा दिला. त्यांच्यासाठी व्यवसायाभिमूख कार्यशाळा सुरू  केल्या, त्यांना स्वावलंबी होण्याचा मार्ग दाखवला. आपलं स्वतःच नाही म्हणून काय झाले संस्थेत येणारी मुले आपलीच आहेत असे मानून यावर मातेप्रमाणे प्रेमाचा वर्षाव केला आणि आपले जीवन सार्थक केले.

आज तिने लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन होते. नाव होते “मोगरा फुलला “. समाजामध्ये अनेक सामान्य स्त्रिया आहेत की ज्यांच्या पदरी दुःख आले असताना सुद्धा त्यांनी दुःखावर मात करून यशस्वी वाटचाल केली होती. रूढी अंधश्रद्धा यांना झुगारून प्रयत्नांची कास धरली होती आणि  त्या यशस्वी झाल्या होत्या, अशा स्त्रियांचे उदाहरणे देऊन तिने कथा लिहिल्या होत्या.

मोगऱ्याचे छोटेसे सुंदर ताजे फूल सुगंध देते, गजरा करून डोक्यात माळला तर केसांनाही सुगंधित करते. ते हातात घेतलं तर हातांना सुगंध येतो, आपले सुगंध पसरविण्याचे काम ते सोडत नाही.

प्रकाशनाचा कार्यक्रम सुरळीतपणे पार पडला. प्रखर बुद्धिमत्ता, श्रमाची आवड, मन ओतून काम करण्याची पद्धती या विद्याच्या गुणांमुळे अनेक प्रतिष्ठित लोकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत होता. कलेक्टर मेधाताईंनीही विद्याच्या कार्याचे कौतुक केले आणि तिच्या कामात सहकार्य करण्याची इच्छा दर्शवली. आता तिचं मित्र मंडळ ही मोठं होतं॰ कुठेच कमतरता,. . न्यूनता नव्हती. चहापानानंतर मेधाताईंना प्रवेशद्वाराशी निरोप देऊन आम्ही परत हॉलमध्ये आलो. त्यावेळी एक मोगऱ्याचा गजरा आणि चिठ्ठी असलेले एक तबक कार्यकर्त्याने विद्याच्या हाती दिले. चिठ्ठी कोणाकडून आली असावी ?असे प्रश्नचिन्ह तिच्या चेहऱ्यावर उमटले. शांत चित्ताने  विद्याने चिठ्ठी उघडली. चिठ्ठीतील मजकूर पुढीलप्रमाणे होता.

विद्या

प्रिय विद्या म्हणण्याचा अधिकार मी केव्हाच गमावून बसलो आहे वर्तमानपत्रात पुस्तक प्रकाशन सोहळ्याची बातमी वाचली आणि  आर्जवून समारंभास येण्याचे धाडस केले. पण तुला  भेटण्याचे मनात असूनही पुढें आलो नाही. तसे पाहता माझ्याकडून तुझी अवहेलनाच झाली, मी तुझा शतशः अपराधी आहे. जमली तर मला क्षमा कर. मी माझं राहतं घर” स्नेहालय “संस्थेच्या नावे केले आहे त्याचा   अव्हेर करू नकोस. केलेल्या चुकांचे परिमार्जन करण्याचा हाच एक मार्ग माझ्यासमोर होता माझ्या या विनंतीचा स्वीकार कर आणि यशस्विनी हो!.

सुनील !

अंधश्रद्धा आणि रुढीला चिकटून राहून सर्वांनी विद्याची अवहेलना केली होती पण त्या दुःखाला कवटाळित न बसता विद्याने पिडीत स्त्रियांना आणि निराधार बालकांना आधार दिला होता. त्यांची ती माय झाली होती. अशा प्रकारे महान कार्य करणारी माझी मैत्रीण खरोखर सर्वांची विद्याई झाली होती.

समारंभ संपता क्षणीच तिनं मला मिठी मारली. त्या मिठीत कौतुकाचा आनंद आणि पती न भेटता गेल्याचे दुःख सामावले होते. माझ्या डोळ्यात आनंदाश्रू आले. आज खऱ्या अर्थाने विद्याच्या जीवनाचे सार्थक झाले होते.

*साहित्य प्रेमी भगिनी मंडळला पाठवलेली व प्रथम क्रमांक मिळालेली कथा

©  सौ. अर्चना सुरेश देशपांडे

पुणे

मो. ९९६०२१९८३६

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘यात काही राम नाही’…. म्हणजे काय ? ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

यात काही राम नाही…. म्हणजे काय ?

आपण सहज जेव्हा म्हणतो यात काही राम नाही… म्हणजे काय ?

राम याचा अर्थ काय ?

राम असणे म्हणजे आनंद…

राम म्हणजे देव, दशरथ नंदन ,कोदंडधारी,  सीतापती, कौसल्याचा पुत्र, असा इतकाच त्याचा अर्थ नाही.

राम म्हणजे परिपूर्णता ,सौख्य ,सुख, विश्राम …. राम म्हणजे  आंतरिक समाधान……

सेतू बांधताना खारीने रामरायांना मदत केली .त्यांनी तिच्या पाठीवरून हात फिरवला .म्हणून खारुताईच्या पाठीवर रामाची बोटं उमटली आहेत…

 चांगलं काम केलं की रामराया पाठीशी उभा राहतोच..

 खारीचा वाटा आपणही उचलूया. काय करूया तर…

… एक श्लोकी रामायण आहे ते पाठ करू या .

सहज सोपं जमणार आहे आणि त्याच्याशी निगडित कायमची आठवण राहणार आहे ती आपल्या राम मंदिराची.

तर हे काम जरूर करा ही नम्र विनंती.

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय तिसरा— कर्मयोग— (श्लोक ४१ ते ४३) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय तिसरा— कर्मयोग— (श्लोक ४१ ते ४३) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

तस्मात्त्वमिन्द्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ । 

पाप्मानं प्रजहि ह्येनं ज्ञानविज्ञाननाशनम्‌ ॥ ४१ ॥ 

गात्रांना वश करुनीया  ठेवी त्यांच्यावर अंकुश 

विनाशी ज्ञानविज्ञानाच्या भारता बळे करी तू नाश ॥४१॥

इन्द्रियाणि पराण्याहुरिन्द्रियेभ्यः परं मनः । 

मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धेः परतस्तु सः ॥ ४२ ॥ 

इंद्रिये असती परा त्याहुनी आहे मन सूक्ष्म

मनाहुनीही बुद्धी परा आत्मा त्याहुनी सूक्ष्म  ॥४२॥

एवं बुद्धेः परं बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना । 

जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम्‌ ॥ ४३ ॥ 

जाणुनी घेई महावीरा सूक्ष्मतम अशा आत्म्याला 

मनास घेई वश करुनीया  तल्लख बुद्धीने अपुल्या

अंकित करुनी अशा साधने दुर्जय अरिला कामाला

अंत करूनी कामरिपूचा प्राप्त करुनी घे मोक्षाला ॥४३॥

ॐ तत्सदिति श्रीमद्‌भगवद्‌गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मयोगो नाम तृतीयोऽध्यायः ॥ ३ ॥ 

ॐ श्रीमद्भगवद्गीताउपनिषद तथा ब्रह्मविद्या योगशास्त्र विषयक श्रीकृष्णार्जुन संवादरूपी कर्मयोग नामे निशिकान्त भावानुवादित तृतीय अध्याय संपूर्ण ॥३॥

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “गावठी !!!! –” लेखिका : सुश्री संध्या साठे जोशी ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? वाचताना वेचलेले ?

☆ “गावठी !!!! —” लेखिका : सुश्री संध्या साठे जोशी ☆ श्री सुनील देशपांडे ☆

आम्ही मातीच्या भिंती 

आणि शेणाने सारवलेल्या 

जमिनीच्या घरात रहायचो…

 

‘ते’ सिमेंटच्या भिंती आणि 

चकचकीत टाईल्स लावलेल्या 

घरात रहायचे… 

आणि 

आम्हाला गावठी म्हणायचे…!

 

आम्ही कोंड्याच्या रांगोळीत मीठ कापूर मिसळून 

त्या पावडरने दात घासायचो…

‘ते’ चकाचक वेष्टणात मिळणाऱ्या 

पांढऱ्या टूथपेस्टने दात घासायचे…

आणि 

आम्हाला गावठी म्हणायचे…!

 

आम्ही जात्यावर धान्य दळायचो 

आणि पाट्यावरवंट्यावर 

चटण्या वाटायचो…

‘ते’ आयतं किंवा गिरणीवरुन 

पीठ दळून आणायचे,

मिक्सरात चटण्या वाटायचे…

आणि

आम्हाला गावठी म्हणायचे…!

 

आम्ही तांब्यापितळेच्या 

कल्हई लावलेल्या भांड्यातून 

चुलीवर शिजवलेलं जरा धुरकट वासाचं अन्न खायचो…

 

‘ते’ गॅसवर स्टीलच्या 

चकचकीत भांड्यात शिजवलेलं अन्न खायचे…

आणि 

आम्हाला गावठी म्हणायचे…!

 

आम्ही हातसडीच्या तांदळाचा भात 

आणि नाचणीची भाकरी …. लसणीच्या चटणीबरोबर हाणायचो…

‘ते’ शुभ्र पांढऱ्या तांदुळाचा भात अन् गव्हाची पोळी 

तुपसाखरेबरोबर खायचे ……

आणि 

आम्हाला गावठी म्हणायचे…!

 

आम्ही घाण्यावरुन काढून आणलेलं 

तेल वापरायचो…

‘ते’ डबल रिफाइंड तेल वापरायचे ……

आणि

आम्हाला गावठी म्हणायचे…!

 

आम्ही साधे सुती कपडे वापरायचो…

‘ते’ टेरिलीन टेरिकाॅट वापरायचे…

आणि 

आम्हाला गावठी म्हणायचे…!

 

आमच्या घरी न्हावी यायचा,

मागीलदारच्या पडवीत पाटावर बसून 

थोरापोरांचे केस कापायचा…

‘ते’ मागेपुढे आरसेवाल्या सलुनात 

खुर्चीत बसून केस कापून घ्यायचे…

आणि

*आम्हाला गावठी म्हणायचे…!

 

काळ बदलला…

 

‘ते’ करायचे त्या सगळ्या गोष्टी 

सोसासोसाने आम्ही पण करु लागलो…

 

आता ‘ते’ दामदुप्पट रकमा मोजून 

मन्थेंडांना आणि वीकेन्डांना 

मुद्दाम मातीच्या घरात 

रहाण्याची चैन करतात…

 

चुलीवर शिजवलेलं 

धुरकट वासाचं .. (साॅरी स्मोकी फ्लेवरचं)

अन्न आवडीने खातात…

घरी रिफाइंड तेलाऐवजी 

‘कोल्ड प्रेस’वर काढलेलं 

महागडं तेल वापरतात…

 

हौसेने नाचणीची बिस्कीटं खातात…

नमकवाल्या टूथपेस्टा वापरतात…

महागड्या ब्रॅन्डांचे 

सुती कपडे वापरतात…

आणि 

आणि आम्हाला गावठी म्हणतात…!!!

 

लेखिका :  संध्या साठे-जोशी, चिपळूण. 

प्रस्तुती : श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ किरण शलाका… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ किरण शलाका… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

आज मलाही वाटलं  नभातून खाली उतरून यावे. तुझे चरण स्पर्शाने पवित्र व्हावे.. नेहमीच तुझ्या अवतीभवती असतो लता तरूंचा घनदाट काबिला,  श्वापदांच्या पदभाराने  त्या भुईवरची पिकली पानांचा नाद कुरकुरला..विविध रानफुलं नि पर्णांच्या  गंधाचा परिमळाचा अत्तराचा फाया कुंद हवेत दाटून बसला..पान झावळी अंधाराच्या कनातीत सुस्त पहुडलेला असतो धुक्याचा तंबू.. गगनाला भेदणारे इथे आहेत एकापेक्षा एक उंच च्या उंच बांबू.. विहंग आळवती सूर संगिताचे आपल्या मधूर कंठातून शाखा शाखा  पल्लवात दडून..दवबिंदुचे थेंब थेंब ओघळती टपटप नादाची साथ साधती  त्यासंगितातून…  तुझे ते वरचे शेंड्याचे टोक बघायला  रोजच मिळत असते मजला.. किती उंच असशील याचा अंदाज ना बाहेरून  समजला… नभ स्पर्श करण्याची तुझी ती महत्त्वकांक्षा पाहून मी देखील निश्चय केला आपणही जावे तुझ्या भेटीला आणि व्हावे नतमस्तक तुझ्या पुढे… सोनसळीच्या किरणाचे तुझ्या पायतळी घालावे सडे…अबब काय ही तुझी ताडमाड उंची..त्यावर काळाकुट्ट अंधाराची डोक्यावरची कुंची..किती थंडगार काळोखाचा अजगर वेटोळे घालूनी बसलाय तुला.अवतीभवती तुझ्या हिरव्या पिवळ्या पानांफुलाचा पडलाय पालापाचोळा.. कुठला दिवस नि कुठली रात्र याचे भान असे का तुला.जागं आणण्यासाठी रोजच यावे तुझ्या भेटीला  वाटे मजला.बघ चालेल का तुला? एक नवचैतन्य लाभेल मजमुळे तुजला..? प्रसन्नतेची हिरवाई हरखेल नि हसवेल तुझ्या भवतालाला.. पिटाळून लावेल तुझ्या उदासीपणाला.. मग बघ असा मी रोजच येत जाईन चालेल का तुला?.

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ विवेक की पुस्तक चर्चा # 154 ☆ “श्रीमदभगवदगीता हिन्दी पद्यानुवाद… ” – श्री चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ ☆ चर्चा – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ☆

श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ 

(हम प्रतिष्ठित साहित्यकार श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’जी के आभारी हैं जो  साप्ताहिक स्तम्भ – “विवेक की पुस्तक चर्चा” शीर्षक के माध्यम से हमें अविराम पुस्तक चर्चा प्रकाशनार्थ साझा कर रहे हैं । श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र जी, मुख्यअभियंता सिविल (म प्र पूर्व क्षेत्र विद्युत् वितरण कंपनी, जबलपुर ) पद से सेवानिवृत्त हुए हैं। तकनीकी पृष्ठभूमि के साथ ही उन्हें साहित्यिक अभिरुचि विरासत में मिली है। उनका दैनंदिन जीवन एवं साहित्य में अद्भुत सामंजस्य अनुकरणीय है। इस स्तम्भ के अंतर्गत हम उनके द्वारा की गई पुस्तक समीक्षाएं/पुस्तक चर्चा आप तक पहुंचाने का प्रयास  करते हैं।

आज प्रस्तुत है श्री चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ जी द्वारा रचित पुस्तक – श्रीमदभगवदगीता हिन्दी पद्यानुवादपर चर्चा।

☆ साप्ताहिक स्तम्भ – विवेक की पुस्तक चर्चा# 154 ☆

☆ “श्रीमदभगवदगीता हिन्दी पद्यानुवाद… ” – श्री चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ ☆ चर्चा – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ☆

कृति चर्चा

पुस्तक चर्चा

कृति … श्रीमदभगवदगीता हिन्दी पद्यानुवाद

अनुवादक …. प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ” विदग्ध ”

प्रकाशक …. ज्ञान मुद्रा पब्लीकेशन, भोपाल

पुस्तक प्राप्ति हेतु संपर्क +918720883696

 पृष्ठ … 300

चर्चा… विवेक रंजन श्रीवास्तव, भोपाल

☆ पुस्तक चर्चा – श्रीमदभगवदगीता हिन्दी पद्यानुवाद… विवेक रंजन श्रीवास्तव ☆

श्रीमदभगवदगीता एक सार्वकालिक ग्रंथ है . इसमें जीवन के मैनेजमेंट की गूढ़ शिक्षा है . आज संस्कृत समझने वाले कम होते जा रहे हैं, पर गीता में सबकी रुचि सदैव बनी रहेगी, अतः संस्कृत न समझने वाले हिन्दी पाठको को गीता का वही काव्यगत आनन्द यथावथ मिल सके इस उद्देश्य से प्रो चित्र भूषण श्रीवास्तव “विदग्ध” ने मूल संस्कृत श्लोक, फिर उनके द्वारा किये गये काव्य अनुवाद तथा शलोकशः ही शब्दार्थ  पहले हिंदी में फिर अंग्रेजी में को उम्दा कागज व अच्छी प्रिंटिंग के साथ यह बहुमूल्य कृति भोपाल के ज्ञान मुद्रा पब्लीकेशन ने पुनः प्रस्तुत किया  है . अनेक शालेय व विश्वविद्यालयीन पाठ्यक्रमो में गीता के अध्ययन को शामिल किया गया है, उन छात्रो के लिये यह कृति बहुउपयोगी बन पड़ी है .

भगवान कृष्ण ने  द्वापर युग के समापन तथा कलियुग आगमन के पूर्व (आज से पांच हजार वर्ष पूर्व) कुरूक्षेत्र के रणांगण मे दिग्भ्रमित अर्जुन को, जब महाभारत युद्ध आरंभ होने के समस्त संकेत योद्धाओ को मिल चुके थे, गीता के माध्यम से ये अमर संदेश दिये थे व जीवन के मर्म की व्याख्या की थी .श्रीमदभगवदगीता का भाष्य वास्तव मे ‘‘महाभारत‘‘ है। गीता को स्पष्टतः समझने के लिये गीता के साथ ही  महाभारत को पढना और हृदयंगम करना भी आवश्यक है। महाभारत तो भारतवर्ष का क्या ? विश्व का इतिहास है। ऐतिहासिक एवं तत्कालीन घटित घटनाओं के संदर्भ मे झांककर ही श्रीमदभगवदगीता के विविध दार्शनिक-आध्यात्मिक व धार्मिक पक्षो को व्यवस्थित ढ़ंग से समझा जा सकता है।

जहॉ भीषण युद्ध, मारकाट, रक्तपात और चीत्कार का भयानक वातावरण उपस्थित हो वहॉ गीत-संगीत-कला-भाव-अपना-पराया सब कुछ विस्मृत हो जाता है फिर ऐसी विषम परिस्थिति मे गीत या संगीत की कल्पना बडी विसंगति जान पडती है। क्या रूद में संगीत संभव है? एकदम असंभव किंतु यह संभव हुआ है- तभी तो ‘‘गीता सुगीता कर्तव्य‘‘ यह गीता के माहात्म्य में कहा गया है। अतः संस्कृत मे लिखे गये गीता के श्लोको का पठन-पाठन भारत मे जन्मे प्रत्येक भारतीय के लिये अनिवार्य है। संस्कृत भाषा का जिन्हें ज्ञान नहीं है- उन्हे भी कम से कम गीता और महाभारत ग्रंथ क्या है ? कैसे है ? इनके पढने से जीवन मे क्या लाभ है ? यही जानने और समझने के लिये भावुक हृदय कवियो साहित्यकारो और मनीषियो ने समय-समय पर साहित्यिक श्रम कर कठिन किंतु जीवनोपयोगी संस्कृत भाषा के सूत्रो (श्लोको) का पद्यानुवाद किया है, और जीवनोपयोगी ग्रंथो को युगानुकूल सरल करने का प्रयास किया है।

 इसी क्रम मे साहित्य मनीषी कविश्रेष्ठ प्रो. चित्रभूषण श्रीवास्तव जी ‘‘विदग्ध‘‘ ने जो न केवल भारतीय साहित्य-शास्त्रो धर्मग्रंथो के अध्येता हैं बल्कि एक कुशल अध्येता भी हैं स्वभाव से कोमल भावो के भावुक कवि भी है। निरंतर साहित्य अनुशीलन की प्रवृत्ति के कारण विभिन्न संस्कृत कवियो की साहित्य रचनाओ पर हिंदी पद्यानुवाद भी आपने प्रस्तुत किया है . महाकवि कालिदास कृत ‘‘मेघदूतम्‘‘ व रघुवंशम् काव्य का आपका पद्यानुवाद दृष्टव्य, पठनीय व मनन योग्य है।गीता के विभिन्न पक्षों जिन्हे योग कहा गया है जैसे विषाद योग जब विषाद स्वगत होता है तो यह जीव के संताप में वृद्धि ही करता है और उसके हृदय मे अशांति की सृष्टि का निर्माण करता है जिससे जीवन मे आकुलता, व्याकुलता और भयाकुलता उत्पन्न होती हैं परंतु जब जीव अपने विषाद को परमात्मा के समक्ष प्रकट कर विषाद को ईश्वर से जोडता है तो वह विषाद योग बनकर योग की सृष्टि श्रृखंला का निर्माण करता है और इस प्रकार ध्यान योग, ज्ञान योग, कर्म योग, भक्तियोग, उपासना योग, ज्ञान कर्म सन्यास योग, विभूति योग, विश्वरूप दर्शन विराट योग, सन्यास योग, विज्ञान योग, शरणागत योग, आदि मार्गो से होता हुआ मोक्ष सन्यास योग प्रकारातंर से है, तो विषाद योग से प्रसाद योग तक यात्रासंपन्न करता है।

इसी दृष्टि से गीता का स्वाध्याय हम सबके लिये उपयोगी सिद्ध होता हैं . अनुवाद में प्रायः दोहे को छंद के रूप में प्रयोग किया गया है .  कुछ अनूदित अंश बानगी के रूप में  इस तरह  हैं ..

 अध्याय ५ से ..

 नैव किंचित्करोमीति युक्तो मन्येत तत्ववित्‌।

पश्यञ्श्रृण्वन्स्पृशञ्जिघ्रन्नश्नन्गच्छन्स्वपंश्वसन्‌ ॥

प्रलपन्विसृजन्गृह्णन्नुन्मिषन्निमिषन्नपि ॥

इन्द्रियाणीन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्‌ ॥

 

स्वयं इंद्रियां कर्मरत, करता यह अनुमान

चलते, सुनते, देखते ऐसा करता भान।।8।।

सोते, हँसते, बोलते, करते कुछ भी काम

भिन्न मानता इंद्रियाँ भिन्न आत्मा राम।।9।।

 

भोक्तारं यज्ञतपसां सर्वलोकमहेश्वरम्‌।

सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति ॥

 

हितकारी संसार का, तप यज्ञों का प्राण

जो मुझको भजते सदा, सच उनका कल्याण।।29।।

 

अध्याय ९ से ..

 

अहं क्रतुरहं यज्ञः स्वधाहमहमौषधम्‌।

मंत्रोऽहमहमेवाज्यमहमग्निरहं हुतम्‌ ॥

 

मै ही कृति हूँ यज्ञ हूँ, स्वधा, मंत्र, घृत अग्नि

औषध भी मैं, हवन मैं, प्रबल जैसे जमदाग्नि।।16।।

इस तरह प्रो श्रीवास्तव ने  श्रीमदभगवदगीता के श्लोको का पद्यानुवाद कर हिंदी भाषा के प्रति अपना अनुराग तो व्यक्त किया ही है किंतु इससे भी अधिक सर्व साधारण के लिये गीता के दुरूह श्लोको को सरल कर बोधगम्य बना दिया है .गीता के प्रति गीता प्रेमियों की अभिरूचि का विशेष ध्यान रखा है। गीता के सिद्धांतो को समझने में साधको को इससे बडी सहायता मिलेगी, ऐसा मेरा विश्वास है। अनुवाद बहुत सुदंर है। शब्द या भावगत कोई विसंगति नहीं है। अन्य गीता के अनुवाद या व्याख्येायें भी अनेक विद्वानो ने की हैं पर इनमें  लेखक स्वयं अपनी संमति समाहित करते मिलते हैं जबकि इस अनुवाद की विशेषता यह है कि प्रो श्रीवास्तव द्वारा ग्रंथ के मूल भावो की पूर्ण रक्षा की गई है।

चर्चाकार… विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’

समीक्षक, लेखक, व्यंगयकार

ए २३३, ओल्ड मीनाल रेसीडेंसी, भोपाल, ४६२०२३, मो ७०००३७५७९८

readerswriteback@gmail.कॉम, [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ व्यंग्य से सीखें और सिखाएँ # 178 ☆ मखमल के झूले पड़े… ☆ श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ ☆

श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’

(ई-अभिव्यक्ति में संस्कारधानी की सुप्रसिद्ध साहित्यकार श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ जी द्वारा “व्यंग्य से सीखें और सिखाएं” शीर्षक से साप्ताहिक स्तम्भ प्रारम्भ करने के लिए हार्दिक आभार। आप अविचल प्रभा मासिक ई पत्रिका की  प्रधान सम्पादक हैं। कई साहित्यिक संस्थाओं के महत्वपूर्ण पदों पर सुशोभित हैं तथा कई पुरस्कारों/अलंकरणों से पुरस्कृत/अलंकृत हैं। आपके साप्ताहिक स्तम्भ – व्यंग्य से सीखें और सिखाएं  में आज प्रस्तुत है एक विचारणीय रचना मखमल के झूले पड़े। इस सार्थक रचना के लिए श्रीमती छाया सक्सेना जी की लेखनी को सादर नमन। आप प्रत्येक गुरुवार को श्रीमती छाया सक्सेना जी की रचना को आत्मसात कर सकेंगे।)

☆ साप्ताहिक स्तम्भ  – व्यंग्य से सीखें और सिखाएं # 178 ☆

☆ मखमल के झूले पड़े…

भावनाओं को सीमा में नहीं बाँधा जा सकता, हर शब्द का अपना एक विशिष्ट अर्थ होता है जिसको परिस्थितियों के अनुसार हम परिभाषित करते हैं। लाभ – हानि , सुख- दुख ये मुख्य कारक होते हैं; व्यक्ति के जीवन में एक के लिए जो अच्छा हो जरूरी नहीं वो दूसरे के लिए भी वैसा हो। काल और समय के अनुसार विचारों में परिवर्तन देखने को मिलते हैं।

परिभाषा वही सार्थक होती है जो दूरदर्शिता के आधार पर निर्धारित हो, इसी तरह कोई भी रचना जब भविष्य को ध्यान में रख वर्तमान की विसंगतियों पर प्रकाश डालती है तो वो लोगों को अपने साथ जोड़ने लगती है तब उसमें निहित संदेश व मर्म लोगों को समझ आने लगता है।

केवल मनोरंजन हेतु जो भी साहित्य लिखा व पढ़ा जाता है उससे हमारे व्यक्तित्व विकास में कोई प्रभाव नहीं पड़ता किन्तु जब हम ऐसे लेखन से जुड़ते हैं जो कालजयी हो तो वो आश्चर्यजनक रूप से आपके स्वभाव को बदलने लगता है और जो संदेश उस सृजन में समाहित होता है आप कब उसके हिस्से बन जाते हो पता ही नहीं चलता अतः अच्छा पढ़े, विचार करें फिर लिखें तो अपने आप ही सारे शब्द व विचार परिभाषित होने लगेंगे।

यही बात जीवन के संदर्भ में समझी जा सकती है, निर्बाध रूप से अगर जीवन चलता रहेगा तो उसमें सौंदर्य का अभाव दिखायी देगा, क्योंकि परिवर्तन ही प्रकृति का नियम है। सोचिए नदी यदि उदगम से एक ही धारा में अनवरत बहती तो क्या जल प्रपात से उत्पन्न कल- कल ध्वनि से वातावरण गुंजायमान हो सकता था। इसी तरह पेड़ भी बिना शाखा के बिल्कुल सीधे रहते तो क्या उस पर पक्षियों का बसेरा संभव होता।बिना पगडंडियों के राहें होती, केवल एक सीध में सारी दुनिया होती तो क्या घूमने में वो मज़ा आता जो गोल- गोल घूमती गलियों के चक्कर लगाने में आता है। यही सब बातें रिश्तों में भी लागू होती हैं इस उतार चढ़ाव से ही तो व्यक्ति की सहनशीलता व कठिनाई पूर्ण माहौल में खुद को ढालने की क्षमता का आँकलन होता है। सुखद परिवेश में तो कोई भी अपनी प्रतिभा का प्रदर्शन कर वाहवाही लूट सकता है पर श्रेष्ठता तो प्रतिकूल परिस्थितियों में भी अपना लोहा मनवाने में होती है , सच पूछे तो वास्तविक आंनद भी तभी आता है जब परिश्रम द्वारा सफलता मिले। हम सब सौभाग्यशाली हैं, 500 वर्षों की तपस्या रंग ला रही है, भावनात्मक जीत का प्रतीक राम जन्मभूमि स्थान पुनः जगमगाने लगेगा।

©  श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’

माँ नर्मदे नगर, म.न. -12, फेज- 1, बिलहरी, जबलपुर ( म. प्र.) 482020

मो. 7024285788, [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – दर्शन ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

? संजय दृष्टि – दर्शन ? ?

जब नहीं बचा रहूँगा मैं

और बची रहेगी सिर्फ देह,

उसने सोचा…,

सदा बचा रहूँगा मैं

और कभी-कभार नहीं रहेगी देह,

उसने दोबारा सोचा…,

पहले से दूसरे विचार तक

पड़ाव पहुँचा,

उसका जीवन बदल गया…,

दर्शन क्या बदला,

जो नश्वर था तब

ईश्वर हो गया अब…!

© संजय भारद्वाज 

(रात्रि 11: 53 बजे, 28.2 2020)

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

💥 🕉️ मार्गशीर्ष साधना सम्पन्न हुई। अगली साधना की सूचना हम शीघ्र करेंगे। 🕉️ 💥

नुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares