मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ऐ वतन, मेरे वतन… भाग-2 ☆ सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

? इंद्रधनुष्य ?

☆ ऐ वतन, मेरे वतन… भाग-2 ☆ सुश्री सुनीला वैशंपायन 

(“सैनिकाने लढताना नीतिमत्ता विसरता कामा नये” हे वाक्य बोलताना त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती. उदाहरण म्हणून, कारगिल युद्धातली एक सत्य घटना त्यानेे सांगितली.) इथून पुढे —- 

एका चकमकीत, त्याच्या युनिटच्या जवानांनी पाकिस्तानी घुसखोर सैनिकांच्या चौकीला वेढा घातला होता. बराच वेळ धुमश्चक्री सुरु होती. शेवटी, निकराचा हल्ला चढवून भारतीय सैनिकांनी पाकिस्तान्यांचा कडवा प्रतिकार मोडून काढला. चौकीमध्ये पाकिस्तानी सैनिकांची प्रेते इतस्ततः पडलेली होती. भारतीय हद्दीत छुपी घुसखोरी केलेली असल्याने त्या सैनिकांच्या अंगावर युनिफॉर्मऐवजी स्थानिक रहिवाश्यांसारखेच कपडे होते. मात्र, हे आपल्या आयुष्यातले शेवटचेच युद्ध असल्याचे ओळखून, मुलकी कपड्यांमधल्या त्या प्रत्येक सैनिकाने छातीवर आपापली पदके लावलेली होती! एक सच्चा सैनिक म्हणून वीरमरण पत्करण्यासाठी त्यातला प्रत्येकजण सज्ज होता!

चौकीवर विजय मिळवल्यानंतर या भारतीय मेजरने सर्वप्रथम, पाकिस्तानी सैनिकांच्या ओळखपत्रांवरून प्रत्येकाची ओळख पटवली. एका पत्राद्वारे त्या नावांची यादी पाकिस्तानी सेनेकडे पाठवून, त्या सर्व मृत सैनिकांचा यथोचित सन्मान व्हावा अशी इच्छा त्याने व्यक्त केली! 

काही काळानंतर त्याला समजले की त्याच्या विनंतीनुसार, पाकिस्तानी सैन्याकडून त्या शहीदांचा सन्मान केला गेला होता!   

त्याच युद्धात, बॉम्बचा तुकडा गालफडात घुसल्यामुळे त्याचा चेहरा असा विचित्र, आणि ओबड-धोबड झालेला होता, हेही सहजच बोलल्यासारखे त्याने सांगितले. इतकेच नव्हे तर, त्याच्या मणक्यांमध्ये आणि पायांमध्ये शस्त्रक्रियेद्वारे रॉड बसवलेले होते. म्हणूनच, सोबतच्या महिला सहप्रवाश्यांना तो स्वतःचा खालचा बर्थ देऊ शकला नव्हता हेही त्याने काहीश्या दिलगिरीच्या स्वरातच सांगितले! 

आर्मीच्या डॉक्टरांचे तो तोंड भरून कौतुक करीत होता. “माझे फाटलेले थोबाड छान शिवून मला एक नवीन चेहरा त्यांनीच तर दिला ना!” हे म्हणताना त्याच्या चेहऱ्यावर दुःखाचा लवलेशही नव्हता. त्याउलट, एक मिश्किल भावच मला जाणवला! मी थक्क होऊन त्याच्याकडे पाहत होते. त्याच्या त्या बदललेल्या चेहऱ्याबद्दल घरच्या मंडळींना काय वाटले? असे आम्ही विचारताच तो हसून म्हणाला, “माझी बायको, आणि आमची सहा वर्षांची मुलगी म्हणतात, आता मी पहिल्यापेक्षा जास्त देखणा दिसतो!”

काश्मिरातल्या खेड्या-पाड्यांमधल्या घरात लपून बसलेले अतिरेकी शोधणे आणि त्यांना ठार करणे, हे त्याच्या मते सगळ्यात अवघड काम होते. (त्यावेळी नुकताच मुंबईवर अतिरेकी हल्ला होऊन गेला होता.  सैन्यदलाच्या आणि नौदलाच्या कमांडो सैनिकांनी ‘ताज’ हॉटेलमध्ये आणि इतरत्र केलेली कारवाई माझ्या डोळ्यांसमोर उभी राहिली). 

“Cordon & Search कारवाई म्हणजे एक जीवघेणा लपंडावाचा खेळ असतो. त्यामध्ये आमच्या सतर्कतेची आणि संयमाची अक्षरशः अग्निपरीक्षाच असते. अशा कारवाया बहुदा रात्रीच्या अंधारातच होतात. संपूर्ण खेड्याला आम्ही वेढा घालतो आणि एकेक घर तपासत जातो. अतिरेकी नेमका कुठे लपला असेल याचा पत्ता लावायचा असतो. त्याला बेसावध गाठून आम्ही ठार करणार, की तोच आधी आमचा वेध घेणार हे मात्र ‘काळ’च ठरवतो!”

मेजर शांतपणे बोलत राहिला, “आम्ही आता पूर्वीपेक्षा अधिक अनुभवी झालो आहोत.  पण, अतिरेकीसुद्धा अधिक शहाणे झाले आहेत. ते आता आमच्या डोक्यावर किंवा छातीवर नेम धरत नाहीत. मांड्यांवर गोळ्या झाडतात. मांडीमधली रक्ताची धमनी फुटलेल्या सैनिकाला तातडीने हॉस्पिटलात न्यावेच लागते. नाही तर अत्यधिक रक्तस्त्रावाने त्याचा मृत्यू होऊ शकतो. त्या जवानाला सुखरूपपणे हलवण्यात आमचे मनुष्यबळ आणि वेळ खर्च होतो आणि अतिरेक्यांना नेमके तेच हवे असते.” 

ऐकता-ऐकता आमच्या डोळ्यावरची झोप केंव्हाच उडून गेली होती. मी आणि इतर सहप्रवासी अचंबित होऊन, जणू तो थरार प्रत्यक्ष अनुभवत होतो. 

मी सहज त्याला विचारले, “अतिरेक्यांविरुद्धच्या तुझ्या कामगिरीबद्दल तुला एखादे शौर्यपदक मिळाले असेल ना?”

“नाही, मॅडम.”

मी आश्चर्यानेच विचारले, “का बरं? का नाही मिळालं?”

“मॅडम, मी जे केलं, ते करणाऱ्या प्रत्येकाला जर आर्मीने शौर्यपदक देणं सुरु केलं, तर पदकांचा स्टॉकच संपून जाईल!” तो हसत-हसत म्हणाला. 

त्याच्या या अनपेक्षित उत्तराने आम्ही सगळेच अवाक झालो होतो. आमच्या मते जे अतुलनीय शौर्य होते, ती त्याच्या दृष्टीने जणू एखादी सामान्य घटनाच होती. 

कदाचित, जम्मू-काश्मीरमध्ये अतिरेक्यांसोबत लढणाऱ्या प्रत्येक सैनिकाचे आणि अधिकाऱ्याचे तेच दैनंदिन जीवन असेल! 

निःस्वार्थ सेवा म्हणजे काय, ते मला माझ्या डोळ्यासमोर, मूर्तस्वरूपात दिसत होते, आणि मी ते रूप मनात साठवून घेत होते.  

एका सहप्रवाशाने अचानकच विचारले, “कुठून येते ही एवढी प्रेरणा तुम्हा लोकांमध्ये?”

“या देशावर, देशवासीयांवर असलेले प्रेम, आणि मी एक भारतीय असल्याचा सार्थ अभिमान. आणखी काय?”

अगदी सहजपणे त्याने उच्चारलेले ते वाक्य ऐकून माझ्या सर्वांगावर रोमांच उभे राहिले. मला माझे लहानपण आठवले. त्या काळी, सिनेमा संपल्यावर राष्ट्रगीत वाजत असे. आम्ही सगळे उठून उभे राहायचो. स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन हे निव्वळ मौजमजा करण्याचे, सुट्टीचे दिवस नव्हते. आम्ही सकाळी आनंदाने घराबाहेर पडायचो, आणि अभिमानाने ध्वजवंदन करायचो. “जय जवान, जय किसान” हे वाक्य उच्चारत, मातृभूमीच्या त्या दोन सच्च्या सेवकांना मनापासून अभिवादन करायचो. 

आजदेखील जवानांची आणि किसानांची आपल्या देशाला पूर्वीइतकीच नितांत गरज आहे. मला खात्री आहे की आपल्या सर्वांच्या मनात, खोल कुठेतरी, त्यांच्याबद्दलचा आदर आणि अभिमान दडलेलाही आहे. मात्र, तो मनातच न ठेवता, बाहेर काढून, झाडून, झटकून, छातीवर मिरवायची आज गरज आहे. आपल्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्यासोबत त्याची जाणीव आपल्याला होत राहिली तरच आपल्या वागण्या-बोलण्यातही तो आदर दिसत राहील. 

“… मी एक भारतीय असल्याचा सार्थ अभिमान. आणखी काय?” —- “जय हिंद”

– समाप्त –

मूळ इंग्रजी अनुभव लेखिका : सौ. स्मिता (भटनागर) सहाय. [भारतीय नौदलातील कॅप्टन सहाय यांच्या पत्नी]

मराठी भावानुवाद : कर्नल आनंद बापट [सेवानिवृत्त]— ९४२२८७०२९४ (#केल्याने भाषाटन) 

संग्रहिका : सुश्री सुनीला वैशंपायन

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ II विठ्ठलनामाचा रे टाहो II ☆ सुश्री विनिता तेलंग ☆

सुश्री विनिता तेलंग

? इंद्रधनुष्य ?

☆ II विठ्ठलनामाचा रे टाहो II ☆ सुश्री विनिता तेलंग ☆

।। परब्रह्मलिंगं भजे पांडुरङ्गम् ।। 

ज्येष्ठ अर्धा सरलाय ,आकाशात ढगांची जमवाजमव सुरु झालीय ..या दिवसात आकाशात मळभ दाटून येतं पण मराठी मन मात्र मरगळ झटकून एका निराळ्याच चैतन्ययात्रेची वाट पहात असतं.त्याला आषाढी एकादशीला पंढरपुरात जाऊन त्या सावळ्या परब्रह्माचं दर्शन घ्यायचं असतं.शतकानुशतकं ही चैतन्यदायी परंपरा मराठी माणसानं जिवंत ठेवली .

कदाचित पंढरपूरची वाट चालून आमची पावलं प्रत्यक्ष मळणार नाहीत ,पण मनं अबीर गुलालानं रंगल्याशिवाय कशी रहातील ? मग वाटतं की पांडुरंगाच्या भेटीकरता निदान मानसवारी करु ! मनाच्या वाटेवर ओव्यांचं शिंपण घालू ,कवितांच्या रांगोळ्यांनी नटवू ,आरत्यांचे दीप लावू , चित्रगीतांच्या पताका उभारु आणि लोकगीतांनी ती वाट दुमदुमवून टाकू ! 

या वाटेवरुनच पोचायचं मनगाभार्‍यात आणि तिथं विराजत असलेल्या त्या श्रीमूर्तीचं दर्शन घ्यायचं अंतःचक्षूंनी ..तो आपली वाट पहातोच आहे ..

अनेक संतांनी विठ्ठलाच्या योगमूर्तीचं वर्णन करणाऱ्या सुंदर रचना केल्यात.

ही परंपरा किती जुनी? सातव्या आठव्या शतकात भारतभ्रमण करताना आदि शंकराचार्य भीमेच्या तटावर आले असतील.. या भूमीवर आल्यावर हे केवळ तीर्थक्षेत्र नाही तर महायोगपीठ असल्याची जाणीव त्यांना झाली असेल..आणि मग त्या योगिराजाचं सगुण दर्शन झाल्यावर त्याचं वर्णन करणारं हे नितांतसुंदर पांडुरंगाष्टक त्यांच्या अमृतवाणीतून झरलं असेल..

॥ परब्रह्मलिंगं भजे पांडुरङ्गम् ॥

महायोगपीठे तटे भीमरथ्या        

वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः ।        

समागत्य निष्ठन्तमानंदकंदं        

परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ॥ १ ॥        

 

तटिद्वाससं नीलमेघावभासं        

रमामंदिरं सुंदरं चित्प्रकाशम् ।        

वरं त्विष्टकायां समन्यस्तपादं        

परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ॥ २ ॥

 

प्रमाणं भवाब्धेरिदं मामकानां        

नितम्बः कराभ्यां धृतो येन तस्मात् ।        

विधातुर्वसत्यै धृतो नाभिकोशः        

परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ॥ ३ ॥

 

स्फुरत्कौस्तुभालङ्कृतं कण्ठदेशे        

श्रिया जुष्टकेयूरकं श्रीनिवासम् ।        

शिवं शांतमीड्यं वरं लोकपालं        

परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ॥ ४ ॥

 

शरच्चंद्रबिंबाननं चारुहासं        

लसत्कुण्डलाक्रांतगण्डस्थलांतम् ।        

जपारागबिंबाधरं कञ्जनेत्रं        

परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम॥ ५ ॥

 

किरीटोज्वलत्सर्वदिक्प्रांतभागं        

सुरैरर्चितं दिव्यरत्नैरनर्घैः ।        

त्रिभङ्गाकृतिं बर्हमाल्यावतंसं        

परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम॥ ६ ॥

 

विभुं वेणुनादं चरंतं दुरंतं        

स्वयं लीलया गोपवेषं दधानम् ।        

गवां बृन्दकानन्ददं चारुहासं        

परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ॥ ७ ॥

 

अजं रुक्मिणीप्राणसञ्जीवनं तं        

परं धाम कैवल्यमेकं तुरीयम् ।        

प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं        

परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ॥ ८ ॥

 

स्तवं पाण्डुरंगस्य वै पुण्यदं ये        

पठन्त्येकचित्तेन भक्त्या च नित्यम् ।        

भवांभोनिधिं ते वितीर्त्वान्तकाले        

हरेरालयं शाश्वतं प्राप्नुवन्ति ॥ ९ ॥

 

भीमेच्या तीरावर आहे ते पंढरीचं महायोगपीठ ! 

तिथं पुंडलिकाच्या भेटीकरता तो आनंदकंद युगानुयुगं उभाच आहे ! त्या भक्तवत्सलास नमस्कार ! 

सजल श्यामवर्णी मेघातून वीज चमकावी तसं त्याचं तेज , रमेच्या हृदयात विराजमान होणारं त्याचं चित्तप्रसादक रुप ,त्याचे नेटके समचरण ,यानं जे नेत्रसुख होतं ,त्यापुढं स्वर्गही फिका पडेल ! त्या राजस सुकुमार मदनपुळ्यास वंदन ! 

तो कमरेवर हात ठेवून सांगतो आहे ,बघ जीवनाचा सागर माझ्या कमरेइतकाच खोल आहे ! माझ्या भक्ताला मी सहज त्यापार पोचवतो ..अन् तिथून केवळ चार बोटांवर ब्रह्मलोक ,असं नाभीकडे बोटं करुन सहज दाखवतो आहे, त्या दयानिधीस नमन ! 

कंठात झळाळता कौस्तुभमणी ,भुजांवर केयूरबंध ,शिरी धरलेलं शिवलिंग नि हृदयात लक्ष्मीचा वास असं हे रमणीय रूप ! शारदीय पौर्णिमेसारख्या तेजाळ सुहास्य मुखचंद्रावर कुंडलांची रत्नप्रभा फांकलेली, सूर्यबिंबासम रक्तवर्णी असलेल्या जास्वंदीसारखे त्याचे अधर ,आणि ते आकर्ण कमलनयन ! 

त्याच्या हिर्‍याचा झळाळत्या मुकुटानं आसमंत तेजाळला आहे ,त्याला पुजण्याला देवही हाती रत्नमाला घेऊन उभे आहेत .तीन जागी वाकून उभा राहिल्यानं अन गळ्यात वनमाळा नि मुकुटात मोरपीस ल्यायल्यामुळं तो बाळकृष्णच शोभतो आहे ..

ह‍ाच लीलानाटकी सर्वसंचारी गोपालक .. हाच वेणूचा नाद ,हाच वादक .गोपगोपींना मोहक हास्यानं वेड लावणारा हाच ! याला ना आदि ना अंत,

हा अजन्मा -अजर -अमर -अनुपम -अद्वितीय !

हा दीनबंधू ,हा कृपासिंधू . हे रुक्मिणीचे चित्सुखधाम ,हा जगताचा विश्राम .

याच्या केवळ दर्शनानंच मोक्षाचा लाभ होतो .

या परब्रह्मलिंगाच्या उपासनेचं हे स्तोत्र  आपल्या वाणीवर कानावर आणि मनावर संस्कार करतं.शक्य तर हे मुखोद्गत करावं, निदान काही निमित्ताने ठरवून ऐकावं आणि अपार प्रसन्नतेची अनुभूती घ्यावी!

© सुश्री विनिता तेलंग

सांगली. 

मो ९८९०९२८४११

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ओंजळ… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

??

☆ ओंजळ… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

रोज सकाळी उठताना ‘कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती….’ ‘म्हणत दोन्ही हाताची ओंजळ सर्वप्रथम डोळ्यासमोर येते आणि ‘प्रभाते कर दर्शनम्’….’ म्हणत रोजचा दिवस दाखवणाऱ्या परमेश्वराला त्याच हाताने आपण नमस्कार करतो !

‘ओंजळ’ म्हटली की डोळ्यासमोर येतो तो कर्ण ! सकाळच्या वेळी गंगेच्या पाण्यात उभा राहून सूर्याला अर्घ्य देताना केलेल्या ओंजळीतून पाणी देत असलेला ! दानशूर कर्णाची ओंजळ कधी रीती रहा ]त नव्हती.  गंगा स्नानानंतर तो हा दानयज्ञ ओंजळीने करीत असे !  दानशूर कर्णाची भरली ओंजळ ज्याला जे पाहिजे ते देण्यात व्यस्त असे ! त्यामुळे कर्णाकडून कोणाला काही पाहिजे असेल तर ते सूर्योदयाला दानाच्या वेळी त्याला भेटले तर मिळत असे. इंद्राने त्याची कवच कुंडले ही अशाचवेळी मिळवली. 

‘ओंजळ’ हे दातृत्वाचे प्रतीकच आहे जणू ! दोन्ही हातांचे तळवे एकमेकांना जुळवून ओंजळ तयार होते. तहानलेल्या माणसाला ओंजळीत पाणी ओतत असताना प्यायले की पोटभर पाणी प्याल्यासारखे वाटते, तसेच ओंजळभर धान्य एखाद्याच्या झोळीत टाकले की झोळी भरल्यासारखी होते. ओंजळ ही नेहमी भरलेली असावी. दानासाठी आपण हाताचे महत्त्व सांगतो, तसेच ओंजळ ही नेहमी दोन हाताने काही देण्यासाठीच असते !

फुलांनी भरलेली हाताची ओंजळ डोळ्यासमोर आली की मन प्रसन्न होते. सकाळच्या वेळी जर कोणी सुवासिक जाई, जुई, मोगरा, बकुळी यासारखी फुले ओंजळ भरून दिली तर अगदी श्रीमंत असल्यासारखेच वाटते मला ! त्या फुलांचा वास भरभरून मनाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचतो आणि तीच फुले देवाच्या देव्हाऱ्यात सजलेली पाहताना ते फुलांनी सजवलेले परमेश्वराचे रूप पाहून मन भरून येते ! 

ओंजळ हे छोटेसे प्रतीक आहे जीवनाचे ! आकाशात भरून आलेला पाऊस हत्तीच्या सोंडेने जरी धरतीवर कोसळत असला तरी त्या धारेची साठवण आपण हाताच्या ओंजळीत करतो तेव्हा ती सीमित असते. ओंजळ आपल्याला तृप्त राहायला शिकवते असे मला वाटते !….. भुकेच्या वेळी मिळालेले ओंजळभर अन्न  किंवा तृषार्त असताना मिळालेले ओंजळभर पाणी याचे महत्त्व माणसाला खूपच असते. अशावेळी तृप्तीचे आसू आणि हसू आल्याशिवाय रहात नाही. जे मिळते ते समाधानाने घ्यावे, त्यातच जीवनाचे सार सामावलेले असते ! 

ओंजळ भरून लाह्या जेव्हा पती-पत्नी लाजा- होमात घालत असतात तेव्हा हीच त्यागाची भावना एकमेकांसाठी मनात भरून घेतात ! जीवनाच्या वेदीवर पाऊल टाकताना नवरा- बायको लाह्यांची ओंजळ समर्पण करून एकमेकासाठी आपण आयुष्यभरासाठी जोडलेले आहोत ही जाणीव एकमेकांना देत असतात., तर कन्यादानाच्या वेळी मुलीचे आई-वडील आणि नववधू- वर हाताच्या ओंजळीत पाणी घेतात, जणू आई-वडिलांकडून कन्येचे दान या ओंजळीतून होत असते !

‘ओंजळभर धान्य ‘ या संकल्पनेतून घराघरातून धान्य जमा करून एका सेवाभावी संस्थेत देत असलेले ऐकले आहे. त्याठिकाणी प्रत्येक घरातून आलेल्या ओंजळभर धान्याचे रूपांतर एका खूप मोठ्या धान्यासाठ्यात होते. देणाऱ्यांना एक ओंजळभर धान्य देताना फारसा त्रास वाटत नाही, पण अशा असंख्य ओंजळीच्या एकत्रीकरणातून नकळत खूप मोठी समाजसेवा घडत असते… गोंदवलेकर महाराज म्हणत असत की दारी आलेल्या भुकेल्या माणसाला कधी हाकलून देऊ नये. फार तर त्यांना पैसे देऊ नयेत पण ओंजळभर धान्याची भिक्षा द्यावी. त्याकाळी अन्नदानाचे पुण्य मोठे वाटत असे आणि त्या अन्नाचा आशीर्वाद संपूर्ण कुटुंबाला मिळत असे.

आपण लक्ष्मीचे चित्र बघतो तेव्हा ती ओंजळीने नाणी ओतत असते आणि तिची ओंजळ सतत भरभरून वाहत असते ! अशा लक्ष्मीची कृपा आपल्यावर सतत राहू दे असंच मनात येते. लक्ष्मीपूजनाला आपण अशा लक्ष्मीची पूजा करतो. 

आत्ता सहज आठवली ती व्ही. शांताराम यांच्या चित्रपटात सुरुवातीला दाखवली जाणारी कमनीय स्त्री, जी ओंजळीतून फुले उधळीत असते.  त्या कमनीय  देहाचे सौंदर्य त्या ओतणाऱ्या ओंजळीतून इतके प्रमाणबद्ध रेखाटले आहे की, ते चित्र आपल्या सर्वांच्या मन: पटलावर कोरले गेले आहे !

आपल्या दोन हातावरील रेषा आपले भविष्य दाखवतात असे आपण म्हणतो. जेव्हा ते दोन हात एकत्र येतात आणि जी ओंजळ बनते ती आपल्याला काम करण्यास प्रवृत्त करते. अशी ही ‘ओंजळ’ शब्दबद्ध करताना माझी शब्दांची ओंजळ अपुरी पडते असे मला वाटते ! पण भावपूर्ण शब्दांच्या या ओंजळीला सतत ओतत राहण्यासाठी सरस्वती मला साथ देऊ दे, असंच या छोट्या ओंजळीसाठी  मला वाटते !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ संसारी लोणचं… लेखक : श्री. प्रमोद पाटकर ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ संसारी लोणचं… लेखक : श्री. प्रमोद पाटकर ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

संसारी लोणच्याच्या फोडी आधी करकरीत असतात,

नंतर कुरकुरत का होईना,

हळूहळू मुरतात.

 

हे लोणचं बाजारात मिळत नाही.

कुटुंबानं मिळून ते घालायचं असतं.

त्याशिवाय जगण्याला

चव येत नाही.

 

कडवट शब्दांची मेथी जरा

जपूनच वापरावी.

स्वत:च्या हातांनी कशाला

लोणच्याची चव घालवावी ?

 

जिभेने तिखटपणा आवरला, तर

बराच फायदा होतो.

लोणच्याचा झणझणीतपणा

त्यानं जरा कमी होतो.

 

‘मी’पणाची मोहरी जास्त झाली,

तर खार कोरडा होतो

इतरांच्या आपुलकीचा रस

त्यात उगाच शोषला जातो.

 

रागाचा उग्र हिंग तसा तितकासा

बाधत नाही.

लवकर शांत झाला तर

लोणच्याची चव बिघडत नाही.

 

प्रेमाची हळद लोणच्याला खरा रंग आणते.

विकारांच्या बुरशीपासून संरक्षणही करते.

 

समृध्दीचं तेल असलं, की

काळजीचं कारण नसतं.

त्या थराखाली लोणचं बरचसं सुरक्षित असतं.

 

लोणचं न मुरताच नासावं, तसं काही संसारांचं होतं.

सहनशक्तीच्या मिठाचं प्रमाण बहुधा कमी पडलेलं असतं.

लेखक : श्री.प्रमोद पाटकर

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – काटेरी सौंदर्य…– ☆ सौ. अलका ओमप्रकाश माळी ☆

सौ. अलका ओमप्रकाश माळी

अल्प परिचय 

मराठी गद्य, पद्य, ललित लेख आणि विषयानुरूप लिखाणाची आवड. वाचनाची आवड तसेच अभिवाचन करण्यास आवडते.

?️?  चित्रकाव्य  ?️?

?काटेरी सौंदर्य– ? ☆ सौ. अलका ओमप्रकाश माळी ☆

 काट्यातही इतकं छान फुलता येत..

हेच तर जीवनाचं गुपित असत..

संकटांच्या काट्यावर करून मात..

आयुष्य उमेदीने फुलवता येत..

सभोवती जरी नुसतेच बोचरे काटे..

भय तरी ना फुलण्याचे कधी वाटे..

हिच तर खरी जीत आहे..

जगण्याची नवी रित आहे..

काट्यांना आपलंसं करता आलं पाहिजे..

काट्यांच्या सोबत ही हसत फुललं पाहिजे..

हेच तर काटेरी कॅक्टस शिकवतं..

जगण्याला एक नवी दिशा देतं…

© सौ. अलका ओमप्रकाश माळी

मोब. 8149121976

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ तन्मय साहित्य #188 – कविता – मानसून की पहली बूंदे… ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ ☆

श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’

(सुप्रसिद्ध वरिष्ठ साहित्यकार श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ जी अर्ध शताधिक अलंकरणों /सम्मानों से अलंकृत/सम्मानित हैं। आपकी लघुकथा  रात  का चौकीदार”   महाराष्ट्र शासन के शैक्षणिक पाठ्यक्रम कक्षा 9वीं की  “हिंदी लोक भारती” पाठ्यपुस्तक में सम्मिलित। आप हमारे प्रबुद्ध पाठकों के साथ  समय-समय पर अपनी अप्रतिम रचनाएँ साझा करते रहते हैं। आज प्रस्तुत है आपकी एक भावप्रवण कविता  “मानसून की पहली बूंदे)

☆  तन्मय साहित्य  #188 ☆

☆ मानसून की पहली बूंदे☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ ☆

मानसून की पहली बूंदे 

धरती पर आई

महकी सोंधी खुशबू

खुशियाँ जन मन में छाई।

 

 बड़े दिनों के बाद

 सुखद शीतल झोंके आए

 पशु पक्षी वनचर विभोर

 मन ही मन हरसाये,

      बजी बाँसुरी ग्वाले की

      बछड़े ने हाँक लगाई।…..

 

 ताल तलैया पनघट

 सरिताओं के पेट भरे

 पावस की बौछारें

 प्रेमी जनों के ताप हरे,

      गाँव गली पगडंडी में

      बूंदों ने धूम मचाई।……

 

 उम्मीदों के बीज

 चले बोने किसान खेतों में

 पुलकित है नव युगल

 प्रीत की बातें संकेतों में,

       कुहुक उठी कोकिला

       गूँजने लगे गीत अमराई।

       मानसून की पहली बूंदें

       धरती पर आई..

☆ ☆ ☆ ☆ ☆

© सुरेश कुशवाहा ‘तन्मय

जबलपुर/भोपाल, मध्यप्रदेश, अलीगढ उत्तरप्रदेश  

मो. 9893266014

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ जय प्रकाश के नवगीत # 13 ☆खींच कर लकीर… ☆ श्री जय प्रकाश श्रीवास्तव ☆

श्री जय प्रकाश श्रीवास्तव

(संस्कारधानी के सुप्रसिद्ध एवं अग्रज साहित्यकार श्री जय प्रकाश श्रीवास्तव जी  के गीत, नवगीत एवं अनुगीत अपनी मौलिकता के लिए सुप्रसिद्ध हैं। आप प्रत्येक बुधवार को साप्ताहिक स्तम्भ  “जय  प्रकाश के नवगीत ”  के अंतर्गत नवगीत आत्मसात कर सकते हैं।  आज प्रस्तुत है आपका एक भावप्रवण एवं विचारणीय नवगीत “खींच कर लकीर।)

✍ जय प्रकाश के नवगीत # 13 ☆  खींच कर लकीर… ☆ श्री जय प्रकाश श्रीवास्तव

पानी पर

खींचकर लकीर

भरते हैं सागर का दम।

 

अंगद का पाँव जमा

चाट लोकतंत्र

आँखों में धूल झोंक

भोग राजतंत्र

 

फिर बैठे

बन गए अमीर

लौलुपता नहीं हुई कम।

 

भावों के ऊसर में

शब्दों की फसल

छंद के लिफ़ाफ़े में

रख कोई ग़ज़ल

 

और कहें

स्वयं को कबीर

पाल रहे मीर का भरम।

 

तिनकों पर इतराएँ

डकराएँ खूब

अघा गए चर-चरकर

निर्धन की दूब

 

फैलाएँ

झूठ,बन फकीर

बेचें ईमान और धरम ।

          ***

© श्री जय प्रकाश श्रीवास्तव

सम्पर्क : आई.सी. 5, सैनिक सोसायटी शक्ति नगर, जबलपुर, (म.प्र.)

मो.07869193927,

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – समझ समझकर ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )

? संजय दृष्टि – समझ समझकर ??

प्रातः भ्रमण कर रहा हूँ। देखता हूँ कि लगभग दस वर्षीय एक बालक साइकिल चला रहा है। पीछे से उसी की आयु की एक बिटिया बहुत गति से साइकिल चलाते आई। उसे आवाज़ देकर बोली, ‘देख, मैं तेरे से आगे!’ इतनी-सी आयु के लड़के के ‘मेल ईगो’ को ठेस पहुँची। ‘..मुझे चैलेंज?… तू मुझसे आगे?’ बिटिया ने उतने ही आत्मविश्वास से कहा, ‘हाँ, मैं तुझसे आगे।’ लड़के ने साइकिल की गति बढ़ाई,.. और बढ़ाई..और बढ़ाई पर बिटिया किसी हवाई परी-सी.., ये गई, वो गई। जहाँ तक मैं देख पाया, बिटिया आगे ही नहीं है बल्कि उसके और लड़के के बीच का अंतर भी निरंतर बढ़ाती जा रही है। बहुत आगे निकल चुकी है वह।

कर्मनिष्ठा, निरंतर अभ्यास और परिश्रम से लड़कियाँ लगभग हर क्षेत्र में आगे निकल चुकी हैं। हमारी शिक्षा व्यवस्था लड़के का विलोम लड़की पढ़ाती है। लड़का और लड़की, स्त्री और पुरुष विलोम नहीं अपितु पूरक हैं। एक के बिना दूसरा अधूरा। महादेव यूँ ही अर्द्धनारीश्वर नहीं कहलाए। कठिनाई है कि फुरसत किसे है आँखें खोलने की।

कोई और आँखें खोले, न खोले, विवाह की वेदी पर लड़की की तुला में दहेज का बाट रखकर संतुलन(!) साधनेवाले अवश्य जाग जाएँ। आँखें खोलें, मानसिकता बदलें, पूरक का अर्थ समझें अन्यथा लड़कों की तुला में दहेज का बाट रखने को रोक नहीं सकेंगे।

समझ समझकर समझ को समझो।…क्या समझे!

© संजय भारद्वाज 

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

writersanjay@gmail.com

☆ आपदां अपहर्तारं ☆

🕉️ आषाढ़ मास साधना- यह साधना आषाढ़ प्रतिपदा तदनुसार सोमवार 5 जून से आरम्भ होकर देवशयनी एकादशी गुरुवार 29 जून तक चलेगी। 🕉️

💥 इस साधना में इस बार इस मंत्र का जप करना है – 🕉️ ॐ नारायणाय विद्महे। वासुदेवाय धीमहि। तन्नो विष्णु प्रचोदयात्।।🕉️💥

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ सलमा की कलम से # 68 ☆ नज़्म – उसे भूल जा ना याद कर… ☆ डॉ. सलमा जमाल ☆

डॉ.  सलमा जमाल 

(डा. सलमा जमाल जी का ई-अभिव्यक्ति में हार्दिक स्वागत है। रानी दुर्गावती विश्विद्यालय जबलपुर से  एम. ए. (हिन्दी, इतिहास, समाज शास्त्र), बी.एड., पी एच डी (मानद), डी लिट (मानद), एल. एल.बी. की शिक्षा प्राप्त ।  15 वर्षों का शिक्षण कार्य का अनुभव  एवं विगत 25 वर्षों से समाज सेवारत ।आकाशवाणी छतरपुर/जबलपुर एवं दूरदर्शन भोपाल में काव्यांजलि में लगभग प्रतिवर्ष रचनाओं का प्रसारण। कवि सम्मेलनों, साहित्यिक एवं सांस्कृतिक संस्थाओं में सक्रिय भागीदारी । विभिन्न पत्र पत्रिकाओं जिनमें भारत सरकार की पत्रिका “पर्यावरण” दिल्ली प्रमुख हैं में रचनाएँ सतत प्रकाशित।अब तक 125 से अधिक राष्ट्रीय एवं अंतर्राष्ट्रीय पुरस्कार/अलंकरण। वर्तमान में अध्यक्ष, अखिल भारतीय हिंदी सेवा समिति, पाँच संस्थाओं की संरक्षिका एवं विभिन्न संस्थाओं में महत्वपूर्ण पदों पर आसीन।

आपके द्वारा रचित अमृत का सागर (गीता-चिन्तन) और बुन्देली हनुमान चालीसा (आल्हा शैली) हमारी साँझा विरासत के प्रतीक है।

आप प्रत्येक बुधवार को आपका साप्ताहिक स्तम्भ  ‘सलमा की कलम से’ आत्मसात कर सकेंगे। आज प्रस्तुत है आपकी एक भावप्रवण नज़्म “उसे भूल जा ना याद कर…

✒️ साप्ताहिक स्तम्भ – सलमा की कलम से # 68 ✒️

?  नज़्म – उसे भूल जा ना याद कर… ✒️  डॉ. सलमा जमाल ?

(सन्दर्भ : कोविड)

जो जुदा हुए वो अजीज़ थे,

तेरे अपने तेरे क़रीब थे ।

उन्हें भूल जा ना याद कर ,

जो तूने सहा ना फ़रियाद कर ।।

 

यह कैसी ग़म की हवा चली ,

सुनसान हो गई है गली – गली ,

सुबहा से पहले शाम ढली ,

चमन को सिर्फ़ ही ख़िज़ां मिली ,

जो गया ख़ुदा का हबीब था ,

तू फ़िर से गुलशन आबाद कर ।

जो तूने ————————- ।।

 

वो करोना से जुदा हुए ,

सारी उम्र तुझ पर फ़िदा हुए ,

ना वबा का कोई कुसूर था ,

ये सब इंसान का ही फ़ितूर था ,

ये क़हर हमारा नसीब था ,

बची उम्र को ना बर्बाद कर ।

जो तूने ———————— ।।

 

किसी के जाने से कमी नहीं ,

ये दुनियां आज तक थमीं नहीं ,

जो मिल रहा वो ग़नीमत है ,

अभी कुछ दिनों की अज़ीयत है ,

वो दीन – दुनिया का रक़ीब था ,

उसे रिश्तों से आज़ाद कर ।

जो तूने ———————— ।।

 

दवा अस्पताल का बहाना था ,

क़ज़ा को उन्हें ले जाना था ,

जो बचा है उसका बन रहनुमा ,

कहीं सब हो जाए ना धुंआं ,

बहारों का वो अक़ीब था ,

उसकी यादों को पुरताब कर ।

जो तूने ————————- ।।

 

इक बार मिलती है ज़िन्दगी ,

कर शुक्र अल्लाह की बन्दगी ,

जो बचा है उसको सहेज ले ,

तू गिले-शिकवे सारे समेट ले ,

फ़लसफ़ा ये तेरा अजीब था ,

‘ सलमा ‘ तू अपना दिल शाद कर ।

जो तूने ————————– ।।

© डा. सलमा जमाल

298, प्रगति नगर, तिलहरी, चौथा मील, मंडला रोड, पोस्ट बिलहरी, जबलपुर 482020
email – salmakhanjbp@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – आलेख ☆ अभी अभी # 84 ⇒ दान, दहेज, और दक्षिणा… ☆ श्री प्रदीप शर्मा ☆

श्री प्रदीप शर्मा

(वरिष्ठ साहित्यकार श्री प्रदीप शर्मा जी द्वारा हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए साप्ताहिक स्तम्भ “अभी अभी” के लिए आभार।आप प्रतिदिन इस स्तम्भ के अंतर्गत श्री प्रदीप शर्मा जी के चर्चित आलेख पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है आपका आलेख – “दान, दहेज, और दक्षिणा”।)  

? अभी अभी # 84 ⇒ दान, दहेज, और दक्षिणा? श्री प्रदीप शर्मा  ? 

इंसान को दान पुण्य करते रहना चाहिए। अगर दानवीर कर्ण हो, तो सभी दान के पात्र होते हैं, लेकिन अगर आपको कहीं कोई पात्र नजर नहीं आए, तो आसपास दान पात्र पर नजर दौड़ाएं, क्योंकि दान से ही पुण्य की प्राप्ति होती है।

दान तो किसी को भी दिया जा सकता है, लेकिन दक्षिणा सिर्फ गुरु को ही दी जाती है। गुरु से ज्ञान की दीक्षा दान में ली जाती है और प्रतिदान स्वरूप दक्षिणा दी जाती है। पंडित पुजारी की बात अलग है, वहां दान और दक्षिणा दोनों यजमान ही देता है और बदले में यश, कीर्ति, मनोवांछित फल और ढेरों आशीर्वाद प्राप्त करता है।।

दान दक्षिणा तो ठीक है, लेकिन दान दहेज की बात हमारे मुंह से अच्छी नहीं लगती। लेकिन कौन समझाए उस बाबुल को, जो आज भी दुआ के साथ अपनी कन्या का दान करता है। हमारे भाई मुकेश तो कह भी गए हैं ;

कोई पुण्य करे कोई दान करे

कोई दान का रोज बखान करे।

जिन कन्या धन का दान दियो

उन और को दान दियो न दियो। ।

सती प्रथा, बाल विवाह और दहेज प्रथा के खिलाफ तो अब कानून भी है, नारी स्वयं आजकल अपने अधिकारों के प्रति सजग है, दुल्हन ही दहेज है, बेटियां बचाई जा रही हैं और लाड़ली योजना के अंतर्गत उन पर दिल की दौलत लुटाई जा रही है।

ऐसे में दान दहेज की बात शोभा नहीं देती।

आज से ५० वर्ष पूर्व एक बाबुल ने हमें भी भरे मन से अपनी कन्या का दान किया था। दान के साथ दहेज में क्या आया, आज कुछ याद नहीं लेकिन हां एक हाथ से चलाने वाली उषा सिलाई मशीन जरूर हमें नजर आई थी। वैसे भी खाली हाथ कौन अपनी कन्या को विदा करता है।

हमने भी अपनी बहन बेटियां ब्याही हैं। ।

हम अपने माता पिता के एक आज्ञाकारी पुत्र हैं, हमारे माता पिता भी आधुनिक विचारों के ही थे, लेकिन व्यवहार कुशल थे और सबकी मान मर्यादा का पूरा खयाल रखते थे।

अपनी सभी बहुओं को उन्होंने बेटियों की तरह ही रखा। शादियों में अपनी बेटियों को भले ही अपनी हैसियत अनुसार कुछ दिया हो, लेकिन घर आई बेटियों को ही लक्ष्मी माना।

हम तब भी अजीब थे, आज भी अजीब हैं। खुद को समझदार समझते हैं, लेकिन कभी सामने वाले को समझने की कोशिश नहीं करते। उस उषा सिलाई मशीन से जुड़ी किसी की भावना की हमने कभी कद्र नहीं की, हमें वह मशीन हमेशा पराई ही लगी। थाली में परोसी मिठाई तो हमें पसंद आई लेकिन करेला कड़वा लगा। ।

कुछ वर्ष पूर्व एकाएक हमें पुराना घर खाली करना पड़ा। हमें और हमारे सामान को भी लदकर, दूसरे मकान में जाना पड़ा। हमारी नज़रों में खटकने वाली उषा सिलाई मशीन से हमेशा के लिए छुटकारा पाने का हमें मौका मिल गया। हमने आव देखा न ताव, जो मजदूर सामने नज़र आया, उसे ही कह दिया, भैया यह मशीन तुम ले जाओ। उसे कुछ क्षण विश्वास नहीं हुआ, लेकिन उसने भी मौका हाथ से नहीं जाने दिया, बाबू जी पैसे ? हमने जोश में जवाब दिया, कुछ नहीं, ऐसे ही ले जाओ।

जोश में होश नहीं खोना चाहिए, लेकिन अब पछताए होत क्या, जब चिड़िया चुग गई खेत। हमने न तो अपनी धर्मपत्नी से राय ली, न उन्हें कुछ बताया, बस चले दानवीर बनने! बाद में पता चला, वह मशीन हमारी पत्नी के ही, स्कॉलरशिप की बचत के पैसे से खरीदी हुई मशीन थी, जो उनके पिताजी ने आशीर्वाद स्वरूप अपनी बेटी के साथ भिजवाई थी। ।

अब हमारे पास सिवाय पछताने और प्रायश्चित करने के, कोई विकल्प नहीं। पत्नी की अब सिलाई बुनाई की उम्र नहीं रही।

उन्हें उनकी मशीन जाने का कोई रंज, अफसोस प्रकट रूप से नहीं। दोष हमारा ही है, दान दहेज के भ्रम में हम किसी की अमानत में खयानत कर बैठे। आज हमारी कारगुजारी पर अफसोस करने वाले ना तो वे बाबुल हैं, जिन्होंने अपनी बेटी का कन्यादान किया था, और ना ही हमारे माता पिता।

बस हम हैं, हमारा झूठा अहंकार है और दुनिया भर की बेवकूफी है।

आज हम अपनी मर्जी के मालिक हैं, कोई हमारा कान पकड़ने वाला नहीं, डांटने वाला नहीं, दो बातें सुनाने वाला नहीं। लगता है, अब यही सब काम भी हमें ही करना पड़ेगा। आज अगर उषा सिलाई मशीन होती तो शायद हमारा घाव भर जाता। उसने कई बार हमारे कपड़ों को रफू किया होगा, हमारे लिए रूमाल तैयार किए होंगे। शायद कोई पुराना रूमाल मिल जाए, हमारे पश्चाताप के आंसू केवल उसे ही नजर आएंगे, उसके बनाए रूमाल ही शायद वे आंसू पोंछ पाएंगे। ।

♥ ♥ ♥ ♥ ♥

© श्री प्रदीप शर्मा

संपर्क – १०१, साहिल रिजेंसी, रोबोट स्क्वायर, MR 9, इंदौर

मो 8319180002

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares