मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 152 – तुझे रूप दाता ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 152 – तुझे रूप दाता ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

तुझे रूप दाता स्मरावे किती रे ।

नव्यानेच आता भजावे  किती रे।

 

अहंकार माझा मला साद घाली ।

सदाचार त्याला जपावे  किती रे।

 

नवी रोज स्पर्धा  इथे जन्म घेते।

कशाला उगा मी पळावे किती रे ।

 

नवी रोज दुःखे  नव्या रोज  व्याधी।

मनालाच माझ्या छळावे किती रे।

 

कधी हात देई कुणी सावराया।

बहाणेच सारे कळावे किती रे ।

 

पहा  सापळे हे जनी पेरलेले ।

कुणाला कसे पारखावे किती रे।

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “बंकिमचंद्र…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “बंकिमचंद्र…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

काही गीतांच्या रचना ह्या जणू आपल्या आयुष्याचा अविभाज्य अंगच बनल्यात. ह्या ऐकल्यावर स्फूर्ती, स्वाभिमान, देशप्रेम, निष्ठा, जागृत होऊन ताजतवानं झाल्यासारखं वाटतं. ह्या रचनांमध्ये प्रामुख्याने राष्ट्रगीत, वंदेमातरम, ए मेरे वतन के लोगो, रंग दे बसंती, महाराष्ट्र गीत,मेरे देश की धरती आणि अशी कित्येक स्फुरणगीतं.

“वंदेमातरम” ह्या आपल्याला अतिशय पूज्य असणा-या गीताचे रचयीते बंकीमचंद्र ह्यांची जयंती नुकतीच  आठ मे ला झाली.त्यांना विनम्र अभिवादन.काही बाबी,काही घटना, काही प्रसंग तर काही गीतं ह्यांना आपल्या आयुष्यात खूप महत्वाचं स्थान असतं.

आज अशी काही गीतं आठवलीत की आपण चटकन आदराने स्तब्ध उभे राहतो , काही गीतं ऐकली की स्फुरण चढतं. आजही “जन गण मन ” व “वंदेमातरम”गीत कानी पडले की आपली मान गर्वाने उंच होते.

१८७५ साली बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेलं ” वंदेमातरम” हे गीत त्याकाळात स्वातंत्रासाठी लढणाऱ्यांना उर्जा देण्याचं काम करत होतं. मूळ गीतात एकूण पाच कडवी आहेत, त्यातील पाहिलं कडवं १९५० साली आपण राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारलं.

मुळात वंदे मातरम् हे गीत बंगाली व संस्कृत ह्या दोन भाषांच्या मदतीने फुललयं,तयार झालयं. ह्या दोन्ही भाषांचा सरसकट अभ्यास नसल्याने वा त्या नीट अवगत नसल्याने  काहींना याचा अर्थ समजून घेणं कठीण जातं.

वंदेमातरम गीताचा विषय निघाल्यावर एका छोट्या मुलाने त्यातील काही शब्दांचा अर्थ विचारल्याने मला स्वतःला देखील त्याचा नीट, अभ्यासपूर्ण अर्थ जाणून घेण्याची अनिवार ईच्छा झाली.

पहिल्यांदा ह्यातील सुरवातीच्या तीन चार ओळी म्हणजेच ध्रुवपद आणि नित्य गायल्या जणारे कडवे ,त्याचा अर्थ पुढीलप्रमाणे,

वंदे मातरम्, वंदे मातरम्!

सुजलाम्, सुफलाम्, मलयज शीतलाम्,

शस्यश्यामलाम्, मातरम्!

वंदे मातरम्!

शुभ्रज्योत्सनाम् पुलकितयामिनीम्,

फुल्लकुसुमित द्रुमदल शोभिनीम्,

सुहासिनीम् सुमधुर भाषिणीम्,

सुखदाम् वरदाम्, मातरम्!

वंदे मातरम्, वंदे मातरम्॥

 ह्या गीताचा मराठी अर्थ पुढीलप्रमाणे,

हे माते मी तुला मनोमन वंदन करते, पाणी म्हणजेच आपले जीवन,ह्या पाण्याने भरभरून ओसंडून वाहणारी, परिपूर्ण, फळांनी लदलदलेली,बहरलेली, पण त्याच बरोबर दक्षिणेकडील वा-याच्या झुळकांनी,लाटांनी शांत असणाऱ्या निरनिराळ्या पिकांनी समृद्ध  असलेल्या अश्या माझ्या मातेला,माझ्या भारतभू ला  मी प्रणाम करते.

शुभ्र धवल चमकत्या चांदण्यांमुळे बहरलेल्या ह्या पवित्र भूमीवरील रात्र ही  आल्हाददायक असते. फुलांच्या मदतीने फुललेली, वृक्षांच्या साथीने मढलेली, येथील ही आमची भूमाता ही खरोखरीच विलक्षण शोभून दिसते. म्हणूनच येथील पाण्याची अवीट गोडी, मधुर बोली, सुख समृद्धी ची अनूभुती देणा-या ह्या  भूमातेला माझे वंदन, माझा  प्रणाम !

ह्या गीताचे रचयिते मा.बंकिमचंद्र चट्टोपाध्याय हे बंगाली कवी, कादंबरीकार, पत्रकार होते. भविष्यात भारतीय प्रजासत्ताकाचे राष्ट्रगान ठरलेल्या वंदे मातरम् या गीताचे रचनाकार होते. इ.स. १८७६ साली त्यांच्या आनंदमठ या कादंबरीमध्ये त्यांनी हे गीत लिहिले. ही कादंबरी इ.स. १८८२ साली प्रकाशित झाली आणि काही दिवसातच हे गीत भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे प्रेरणागीत बनले.

बंकीमचंद्र ह्यांच्या जयंतीनिमित्त त्याचे स्मरण करून वंदेमातरम ह्या गीताने दिवसाची चांगली सुरवात करत जाऊया.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ महिला दिन म्हणजे ? ☆ सुश्री शैलजा करोडे ☆

? जीवनरंग ?

☆ महिला दिन म्हणजे ? ☆ सुश्री शैलजा करोडे ☆

“ए पोरी, ऊठ ना. ऊठ गं, किती जीव खाशील माझा. बाप फुटकी कवडीही देत नाही घरात. मीच कमवायचं, तुम्हां भावंडांना आणि त्यालाही खाऊ घालायचं. वरून त्याच्या दारूलाही पैसा पुरवायचा. काय जन्म आहे माझा ? नवरा म्हणून कपाळावर लाल कुंकू आणि गळ्यात काळेमणी मिरवायचे एवढाच काय तो त्याचा सहभाग. त्यानं फक्त पोरं जन्माला घालायची. त्यांचं संगोपन नको कि जवाबदारी नको, हिच काय समाजाची रूढी परंपरा ?

मायबापाचंही हेच म्हणणं ‘बाई तुला कुंकवाचा धनी करून दिलाय, आता तू तुझं बघ.’ नवरा नावाचं लायसन माझ्या गळ्यात, तेच माझं सुरक्षा कवच म्हणे ?

ए, ऊठतेस का बर्‍या बोलानं कि घालू लाथ तुला. मी एकटी कुठे कुठे पुरे पडू. जा कचरा गोळा करायला. त्यातून काय मिळतं का बघ. थोडं उशीरा गेलीस तर तुझ्या हाती काही लागायचं नाही. आधीच सगळे घेऊन गेलेले असतील. ऊठ पोरी ऊठ, माझ्या आजच्या चुलीला हातभार लाव गं बाई. काय करू गं, मी हतबल आहे. तुमचं पालन पोषण माझी जिम्मेदारी, पण दिवसरात्र कष्ट करुनही मी नाही पूरी करू शकत गं” म्हणत माय ढसढसा रडू लागली .

“नको रडू माय, मी उठलीय,” मी चूळ भरली, पेला भरुन पाणी प्यायली, आणि कचर्‍यासाठी थैली उचलली.

“लक्ष्मी, थांब बेटा, थोडी चहा पिऊन जा आणि टोपलीत पोळी आहे, चहासोबत खाऊन घे बेटा.”

“ए संतोषी, चल ना.”

“हो ग लक्ष्मी, आलेच मी” म्हणत संतोषी बाहेर आली. दोघीजणी उकीरड्यावर कचरा शोधू लागल्या, काही मिळतं का पाहू लागल्या. जुने सेल, बॅटरी, बिसलेरीच्या बाटल्या, फटाफट त्यांच्या थैलीत टाकत होत्या. लक्ष्मीच्या हाती जुना ट्रान्झिस्टर व जुने दिवार घड्याळ लागले. जणू आज लाॅटरीच लागली. ती आनंदली, मनोमन खुलली.

या आनंदातच घरी येतांना ती शाळेजवळ थबकली. रोजच ती शाळेजवळ थबकायची. युनिफाॅर्म घातलेल्या, दोन वेण्या, पाठीवर दफ्तर घेतलेल्या मुलींचा लक्ष्मीला हेवा वाटायचा. आपल्याला का नाही शाळा शिकवत आपली आई.

“सुलोचना, तुझ्या लक्ष्मीला पाठवत जा गं शाळेत. शिक्षणा प्रगती होईल, ज्ञान वाढेल आणि जे आयुष्य तुझ्या वाटेला आलं ना ते नाही येणार तिच्या वाटेला, कारण ती शिकलेली राहील, स्वतःच्या पायावर उभी राहील, आत्मनिर्भर बनेल.” शाळेच्या शिक्षिका तिला समजावित होत्या.

“खरंय बाई तुमचं, पण आमची पण मजबुरी समजून घ्या ना. लक्ष्मी सकाळी कचरा गोळा करते ४०- ५० रूपयं सुटतात. दुपारी आपल्या धाकट्या भावाला सांभाळते. ती त्याला सांभाळते म्हणूनच मी काम करू शकते बाई, आणि मी काम करते म्हणूनच घर चालतं माझं.”

लक्ष्मीला शाळेचं दर्शन काही झालं नाही. ती रोज अशी आशाळभूतपणे शाळेकडे बघायची. आज शाळेत वेगळंच वातावरण होतं. शाळेतील मुले महिला शिक्षिकांना कर्मचार्‍यांना गुलाबपुष्प व ग्रिटींग देत होती.  “Happy women’s day . महिलादिनाच्या खूप खूप शुभेच्छा” देत होते.

“ए संतोषी, महिला म्हणजे काय गं?”

“काय माहीत, पण ती मुलं बाईंना गुलाब फुलं देत आहेत, म्हणजे बाई म्हणजे महिला असेल बहुतेक,’

‘आणि महिलादिन म्हणजे ? ‘

‘ते नाही बाई मला माहित.”

दोघी घराच्या वाटेला लागल्या. लक्ष्मी ने आपल्या झोपडीचे दार उघडले. छोटा चेतन झोळीत झोपलेला होता. माय कामावर गेलेली होती. जाण्यापूर्वी तिनं वांग्या बटाट्याची भाजी करून झाकून ठेवली होती.

इतक्यात चेतन रडायला लागला. “अरे, झाली का झोप ? जागा झालास दादा. आली हं मी, म्हणत लक्ष्मीने त्याला अलगद झोळीतून बाहेर काढले आणि त्याला आपल्या छोट्याशा बाथरूमकडे (घरात केलेला छोटासा आडोसा) घेऊन गेली.      चेतनची शी शू झाली तशी तिने त्याला स्वच्छ केले, आंघोळ घातली आणि टॉवेलमध्ये गुंडाळून बाजेवर आणले. त्याला कपडे घातले. पावडर टिकली केली. बाळ खूपचं साजिरं दिसायला लागलं. ” माझा गोड गोडुला भाऊ…” म्हणत तिने त्याचा गालगुच्चा घेतला. मायनं सकाळी दूध आणून गरम करुन ठेवलं होतं. लक्ष्मीने दूध वाटीत घेऊन भावाला भरवलं. तो ही भराभर दूध पीत होता.      दूध पिऊन झाले तशी तिने भावाला खाली उतरविले, ” खेळ हं राजा आता, ताईला काम करू दे.” लक्ष्मीने घर स्वच्छ केलं, झाडून, पूसून काढलं, कपडे धुतले, वाळत टाकले, स्वतःची वेणी घातली, तोपर्यंत जेवणाची वेळ झाली. तिने भावाला वरणात पोळी चुरून बारीक बारीक घास त्याला भरविले, स्वतःचेही जेवण उरकले. 

आज कचर्‍यात तिला मूळाक्षरांचं पुस्तकंही मिळालं होतं, अन ते पाहून ती मनोमन आनंदली होती. अ अननसाचा अ सोबत अननसचं चित्र, लक्ष्मी मन लावून, भान हरपून ते पुस्तक पाहात होती. एवढ्यात आळीत शेवंता मावशी सगळ्यांना सांगत होती,

“आज आपल्या वार्डच्या नगरसेविकेने सगळ्यांना महिला दिनाच्या कार्यक्रमासाठी बोलावलंय, चला सगळ्यांनी.”

महिला दिन ?’ लक्ष्मीला पुन्हा प्रश्न पडला. चला आपणही पाहूया महिला दिन म्हणजे काय आहे ते ? तिने चेतनला कडेवर घेतले व ती ही निघाली आळीतल्या महिलांसोबत.

सभामंडपात अनेक स्त्रिया जमल्या होत्या. व्यासपीठावरही आज समाजातील उच्चपदस्थ महिला विराजमान होत्या. आयोजिका नगर सेविकेने प्रास्ताविकात म्हटले, “स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. कामाचे समान तास, समान वेतन, महिलांना मतदानाचा हक्क, अशा विविध मागण्यांसाठी हा लढा सुरू झाला आणि १९१० सालापासून ८ मार्च महिला दिन साजरा होऊ लागला व १९७७ या वर्षी युनो ने ८ मार्च जागतिक महिलादिन म्हणून घोषित केला.”

आता प्रमुख पाहुण्यांचं भाषण सुरु झालं. आपण महिला घर व नोकरी व्यवसाय अशी दुहेरी कसरत करतो. घरातील मुलांचं संगोपन, वृद्धांची सेवा, सण वार, व्रत वैकल्य, येणारा जाणारा, पाहुणा रावळा, सगळंच पाहातो. पुरूषाच्या खांद्याला खांदा लावत स्त्रियांनी आज सर्वच क्षेत्रात आपला ठसा उमटवलाय. पण तरीही तिचं आज विविध पातळीवर शोषण सुरू आहेच, मग हे शोषण आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, कौटुंबिक, राजकीय, सर्वच स्तरावर होत आहे, ते थांबलं पाहिजे, स्त्रियांना न्यायहक्क मिळालाच पाहिजे, ही जनजागृती व्हावी म्हणून हा महिला दिन. आज रोजच्या कामकाजातून उसंत मिळून तुम्ही क्षणभर विसावा घ्यावा म्हणून हा प्रपंच. आज महिलांसाठी विविध खेळ, विजेत्यांना बक्षिसे, पैठणीची सोडत व शेवटी स्नेह भोजन आपण करणार आहोत.”

लक्ष्मी कान देऊन ऐकत होती, समजण्याचा प्रयत्न करीत होती. माझा बाप दारू पिवून धिंगाणा घालतो, मायनं दिवसभर केलेल्या कष्टांची कमाई काढून घेतो, वरुन तिला मारहाण व शिवीगाळ, ही कसली समानता.

लक्ष्मी घरी आली. “कोठे गेली होतीस गं”

“माय महिलादिनाच्या कार्यक्रमाला आळीतल्या सगळ्या बायांसोबत गेले होते पण महिलादिन म्हणजे काय ते मला समजलं माय.”

“मोठी आली हुशार, मला सगळं समजलंय म्हणणारी….” सुलोचनाच्या डोळ्यात लेकीविषयी कौतुक होतं.

रात्री लक्ष्मीचा बाप सदा झिंगतच घरी आला. “ए, जेवाय वाढ.” त्यानं गुर्मीतच सुलोचनाला सुनावलं. सुलोचनानं कांदा घालून केलेला झुणका, लोणचं, हिरव्या मिरचीचा खर्डा वाढला.

“हे काय जेवाण आहे ?” म्हणत त्यानं अन्नाचं ताट भिरकावलं. चेतन भितीने रडायला लागला, लक्ष्मी दचकून कोपर्‍यात उभी राहिली. सदा आता सुलोचनाला मारहाण करू लागला तशी लक्ष्मी चिडली वॉर्डातील नगरसेविकेकडे गेली, “मॅडम, लवकर चला, माझा बाप मायला खूप मारतोय.”

मॅडमनी लगेच पोलीस स्टेशनला फोन केला व स्वतः लक्ष्मीच्या घरी जाण्यासाठी निघाल्या. नगरसेविकेला पहाताच सदा मारायचा थांबला, वरमला व माफी मागू लागला.     

“आता माफी मागतोय, रोज बायकोला मारहाण करायची, दारूत पैसा उडवायचा, संसाराची राखरांगोळी करायची, लाज नाही वाटत काय रे तुला. माफी कसली, तुला तर जेलची हवाच पाहिजे, तेव्हा कोठे तुझी अक्कल ठिकाणावर येईल.”

इतक्यात पोलीस आले, “घेऊन जा याला. सुलोचनाला घेऊन येते मी पोलीस स्टेशनला, कौटुंबिक हिंसाचाराखाली करा याला जेरबंद.” नगरसेविका मीनाक्षीताई बोलत होत्या.

“सुलोचना, लक्ष्मीला शिकू दे. गुणी मुलगी आहे तुझी. शाळेत तिला वह्या, पुस्तके, गणवेष, मध्यान्ह भोजनही मिळेल. चेतनसाठी पाळणाघर आहेच की. कष्टकरी, कामकरी महिलांच्या मुलांसाठी शासनाने पाळणाघराचीही योजना आणली आहे.”

“मग तर प्रश्नच मिटला ताई. पण यांना पोलिसांनी बंद केलंय.”

“राहू दे चार आठ दिवस तिथेच, येईल अक्कल ठिकाणावर, नंतर घरी येंणारच आहे तो. काही काळजी करू नकोस. येते मी.”

आज लक्ष्मीला महिला, महिलादिन, महिलांचे हक्क समजले होते. तिची शिक्षणाची वाटही मोकळी झाली होती. खर्‍या अर्थाने आज महिलादिन साजरा झाला होता.

©  सुश्री शैलजा करोडे 

संपर्क – नेरूळ, नवी मुंबई. मो.9764808391

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आईचा व्हॉट्सॲप… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? मनमंजुषेतून ?

आईचा व्हॉट्सॲप… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

चार दिवस झाले होते, मी आईला फोनच केला नव्हता. हिंमतच होत नव्हती माझी, पण कधीतरी कळवावं लागणारच होतं. कारण त्याआधीच बाबांचा फोन आला, तर ते फारच भयंकर होणार होतं. 

आज कळवू, उद्या कळवू म्हणत म्हणत इतके दिवस गेले, आजचाही दिवस गेला होता. अंथरुणावर पडून मी निद्रादेवीची आराधना करत होतो आणि तेवढ्यात व्हॉट्सॲप मेसेज आल्याची वर्दी देणारं पिंग वाजलं. गेले चार दिवस येणाऱ्या प्रत्येक फोनची रिंग आणि प्रत्येक मेसेजचं पिंग माझ्या काळजाचा ठोका चुकवत होतं – न जाणो बाबांचा फोन / मेसेज असला तर ?

पण आत्ता आईचा मेसेज होता.

“झोपला होतास का रे बाळा ?”— या परिस्थितीतही मी स्वतःशीच  खुदकन हसलो. कॉलेजला जाणाऱ्या – हॉस्टेलला रहाणाऱ्या घोड्याला “बाळा” असं फक्त आईच म्हणू शकते. 

“नाही ग, नुकताच पडत होतो.”

“चार दिवस झाले, फोन नाही तुझा, मेसेजही नाही. सगळं ठीक आहे ना रे ?”

” … “

“वाटलंच मला. काय झालं रे ? कुठं प्रेमाबिमात पडलास की काय ?”

“काहीतरी काय, आई ? तुझं आपलं काहीतरीच.”

“मग काय झालंय ? तू मेसेज टाकतोस का मी डायरेक्ट फोन करू ?”

“नाही, नाही. फोन नको करुस.” 

— सगळं आटोपून बाबाही आता झोपायला येत असतील, किंवा already शेजारी झोपलेही असतील. आई माझ्याशी फोनवर बोलत आहे, म्हटल्यावर तेही बोलायला येणार आणि मग नको तो विषय निघणार …नकोच ते. 

“आई, चार दिवसांपूर्वी पहिल्या सेमीस्टरचा रिझल्ट लागला.”

“हं, हं. आणि मग ?”

“आई, मला एका विषयात KT लागली आहे.”

“KT म्हणजे ?”

“KT म्हणजे मी त्या विषयात पास नाही झालो, आई. मी पुढच्या वर्गात जाईन, पण त्या विषयाची पुन्हा परीक्षा देऊन त्यात उत्तीर्ण व्हावं लागेल.”

— ‘पास नाही झालो’ हे ऐकल्यावर निशब्द होण्याची पाळी आता आईची होती. एका मोठ्ठ्या pause नंतर आईचा मेसेज आला —– 

“काय झालं रे ? विषय अवघड जातोय का ? शिकवलेलं कळत नाहीये का लक्षात रहात नाहीये ?”

“तसं काहीच नाहीये, आई. उगाच मी काहीतरी खोटंनाटं सांगणार नाही की बहाणेबाजी करणार नाही. थोडा अभ्यास कमी पडला आणि मी ओव्हरकॉन्फिडन्समध्ये गेलो हीच खरी कारणं आहेत. पण तू काळजी नको करुस, बघ पुढच्या परीक्षेत याच विषयात अव्वल गुण आणतो की नाही ते ! अगदी तुझी शप्पथ. पण …”

“तू खरं सांगितलंस ते आवडलं मला. उगाच रूममेटला करोना झाला होता, किंवा तुलाच बरं नव्हतं असली सहज पचून जाईल अशी थाप नाही मारलीस तू. तुझी चूक तुला कळली आहे. ती परत करू नकोस. आणि काळजी घेत जा रे स्वतःची. .. आणि तू ‘पण …’ म्हणून वाक्य अर्धवट सोडलंस ते काय ?”

“आई, मी नक्की छान मार्कस् आणेन पुढच्या वेळी, पण, पण तू बाबांना सांभाळून घे. त्यांना काय सांगायचं, कसं सांगायचं, कधी सांगायचं ? मला तर काही सुचतच नाही बघ.”

आईने कसा लगेच विश्वास ठेवला (आता त्याला सार्थ ठरवण्याची जबाबदारी माझी होती म्हणा). बाबा असते तर केवढं लेक्चर झाडलं असतं – परीक्षेचे गुण भविष्यासाठी कसे महत्त्वाचे आहेत, करिअर – वाढती महागाई – खर्च अशी त्यांची प्रवचनाची गाडी पटापटा पुढे सरकत गेली असती. 

पण एक मात्र होतं बाबांचं, कधी – आम्ही किती खस्ता काढला तुमच्यासाठी, कसं पोटाला चिमटा घेऊन तुम्हाला मोठं केलं – वगैरे कॅसेट नाही वाजवायचे ते. बोलायचे ते माझ्यापायीच्या चिंतेनेच बोलायचे, पण त्रास खूप करून घ्यायचे स्वतःलाच. 

आईचं तसं नव्हतं. ती समजून घ्यायची मला. आता कसं तिला सांगितलं होतं, ती घेईल सांभाळून. मी निर्धास्त झालो होतो….. 

“हां, बाबांना मी सांगते, समजावते. ती काळजी नको करुस तू. पण तू काळजी घेत जा. हे असं चार चार दिवस फोन केल्याशिवाय रहात जाऊ नकोस. चल, झोप आता.”

मी फोन ठेवला, आणि पटकन झोपी गेलो.

— —

“काय हो, झोप येत नाहीये का ? आणि माझ्या फोनशी काय करताय ?” आई बाबांना विचारत होती. 

“अरे तू जागी झालीस वाटतं ? कुठं काय, गजर लावत होतो.” 

— बाबा खोटं बोलले. लेकाचा चार दिवस फोन नाही आला तर केवढी कावरीबावरी झाली होती ती, नाही नाही ते विचार येत होते तिच्या मनात. पण फोन लावायला घाबरत होती. 

बरं, हे महाशय बापाशी स्वतःहून बोलतील तर शपथ. बाप म्हणजे कर्दनकाळ अशीच त्यांची समजूत. 

हे मेसेजचं बरं असतं. कोण टाईप करतंय कळत नाही. 

बाबा स्वतःशीच हसले, लेकाच्या रिझल्टबद्दल उद्या आईची समजूत काढावी लागणार होती, त्याचं प्लॅनिंग करत तेही निद्रादेवीच्या अधीन झाले….. 

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “नाच रे मित्रा नाच —” ☆ श्री कचरू चांभारे ☆

श्री कचरू चांभारे

? इंद्रधनुष्य ?

☆ “नाच रे मित्रा नाच —” ☆ श्री कचरू चांभारे ☆

जगण्याचा पायाच नाच आहे. नृत्य हा शब्द कानावर पडताच नृत्याचे अनेक दृश्य लगेच डोळ्यासमोर येतात. आपल्या संस्कृतीत नृत्याला खूप महत्व आहे. नाच रे मोरा आंब्याच्या बनात हे गाणं ऐकूनच आपण वयाने मोठे झालो आहोत. आज नृत्य पुराण आठवण्याचे कारण म्हणजे आज 29 एप्रिल आहे. हा दिवस जागतिक स्तरावर नृत्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो. बॕले नृत्याचे आद्य संस्थापक जीन जॉर्जेस नोव्हेर यांचा हा जन्मदिवस. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ युनेस्कोच्या भागीदार असलेल्या  आंतरराष्ट्रीय नृत्य संस्था या स्वायत्त संस्थेकडून आजचा दिवस जागतिक नृत्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

नृत्य कलेला आणि नृत्य कलावंतांना जगमान्यता मिळावी, या कलेचा उत्कर्ष आणि प्रसार व्हावा हा उद्देश या दिनामागे आहे.

हर्ष, भीती, नाच या मानवाच्या मूलभूत भावना आहेत. वर्ण, प्रांत, देश, भाषा, वंश इत्यादी अनेक प्रकाराने मानव परस्परांपासून भेदित झाला असला तरी आनंद, भीती, हातवा-यांच्या खुणेची भाषा भूतलावरच्या समस्त मानवजातीसाठी एकच आहे. उदा. भूक लागली, तहान लागली, इकडे ये, तिकडे, जा, नको अशा अनेक क्रिया आपण खाणाखुणांनी दाखवू शकतो. नृत्य ही पण अशीच एक सर्वव्यापी नैसर्गिक भावना आहे. मनासारखं घडलं की माणुस मनातून डोलतो.

आपल्या भारतात दहा नृत्य शैली प्रसिध्द आहेत. भरतमुनींचा नाट्यशास्त्र हा नृत्याशी संंबंधित अति प्राचिन ग्रंथ मानला जातो. कुचिपुडी, भरतनाट्यम, मणिपुरी, ओडिशी, कथकली, मोहिनीअट्टम या भारतातील अतिप्राचिन नाट्यपद्धती आहेत. भगवान शंकराचे तांडव नृत्य हा ही एक नृत्य प्रकारच. लावणी हा नृत्य प्रकार महाराष्ट्राच्या लोककलेचे अविभाज्य अंग आहे. पंजाबच्या भांगड्यावर व गुजरातच्या गरब्यावर ठेका धरणारेही खूपजन आहेतच.

नृत्य व नाचणे हे जरी समान अर्थाचे शब्द असले तरी आपल्याकडे नृत्य शब्द प्रतिष्ठेचा आब राखून आहे. नाचण्याच्या वाट्याला ती प्रतिष्ठा नाही. नृत्य हा प्रकार कला म्हणून मानला जाऊ लागला तेव्हापासून नृत्याची प्रकारानुसार नियमावली तयार झाली व त्यातली नैसर्गिक भावना लोप पावली. नाचता येईना अंगण वाकडे हे तेव्हापासून सुरु झाले. खरं म्हणजे नाचण्याचा व अंगणाचा काही संबंधच नाही. नाचणे ही पूर्णतः मानसिक क्रिया आहे. मनातारखा ताल मिळताच आपोआपच शरीर त्या तालाला प्रतिसाद देते हा नाच कलेचा अभिजात नैसर्गिक पुरावा आहे.

दुःख विसरुन पूर्णपणे वर्तमान आयुष्य जगायला शिकवणारी नृत्य ही सर्वश्रेष्ठ कलाकृती आहे. आंतरिक सुख भावनेशी शरीराचे पूर्ण मिलन हे नृत्याविष्कारतच घडते. आपली भारतीय सिनेसृष्टी तर नृत्यावरच उभी आहे. ताल, दिल तो पागल है, एबीसीडी, तेजाब, हम आपके है कौन, रबने बना दी जोडी अशा कितीतरी चित्रपटांना लाजवाब नृत्याने घराघरात पोहोचवलं. माधुरी, ऐश्वर्या, हेमामालिनी यांच्या पदन्यासाला न भुरळणारा माणूस भेटेल का ? तेरी मेहरबानियाँ मधला प्रामाणिक कुत्रा व त्याच्यावरचं टायटल साँग डोळ्यात पाणी आणतं. जय हो, सैराटची गाणी लागताच संपूर्ण तरुणाई थिरकायला लागते. ते यामुळेच. शांताबाई व शांताराम, आईची शपथ, चिमणी उडाली भूर्र या गाण्यांना तर लग्नापूर्वीचा एक अत्यावश्यक विधी अशी मान्यताच मिळाली आहे.

नृत्य हा एक सर्वोत्कृष्ट व्यायाम प्रकार आहे. जगाची चिंता न करता, लाज या भावनेला मुरड घालून स्वतःसोबतच ताल धरणे हा आनंद निर्मितीचा सहजभाव आहे. संगिताचा कुठलाही अभ्यासक्रम माहीत नसताना लहान मूल स्वताःच्या तालातच नाचतं डुलतं ते सहजभावनेमुळेच. पण माणुस वयाने मोठा होत चालला की लाजेचा प्रभाव वाढत जातो व माणसं नाचणं सोडून देतात. जगातला एकच खुला रंगमंच असा आहे की जिथं माणूस नाचायला लाजत नाही, तो रंगमंच म्हणजे स्वतःचा पाळणा व लहाणपणीचं अंगण. अन् एकच मालिक आहे असा आहे की जो आपल्या नृत्याचं भरभरून कौतुक करतो तो म्हणजे आपली आई. एकदा हा काळ संपला की वरातीतलं मुक्त नाचणं सोडलं तर सगळेच नृत्यप्रकार नियमाधिन झालेले, त्यामुळे बंधनं येतात. शोलेमधला धर्मेंद्र (वीरू) बसंतीला (हेमा)  इन कुत्तोंके सामने मत नाच असं ओरडून ओरडून सांगतो. त्याच्या उलट गंगा जमुना सरस्वतीमधली सरस्वती आपल्या गंगासाठी(अमिताभ बच्चन) चालत्या ट्रकवरच नृत्य करते. गाण्यांच्या मैफलीत खलनायकांना रंगवून नायकाची सुटका करणं वा इप्सित साध्य, साध्य करणं हे प्रकार आपण सिनेमात पाहिलेले आहेतच. म्हणजेच नृत्य ही दिल लुभानेकी बात है, तशी ती शस्त्र म्हणूनही वापरता येणारी बाब आहे.

शास्त्रीय नियमावलीत नृत्याला अडकवून तालासुरात जगण्याचा एक सोपा मार्ग आपण ठराविक लोकांच्या हाती दिला आहे. नृत्याची सोपी व्याख्या म्हणजे मनात उठलेल्या तरंगांना लयबद्ध अंगविक्षेपाची जोड देणे होय. नृत्य कलेची प्रतिष्ठा जपून तिचा प्रसार करणाऱ्या सर्व नृत्य शिक्षकांना सलामच. दीर्घ, निरोगी व सहज सुंदर आयुष्यासाठी नाच मित्रा नाच.

© श्री कचरू चांभारे

संपर्क – मुख्याध्यापक, जि. प. प्रा. शाळा, मन्यारवाडी, ता. जि. बीड

मो – 9421384434 ईमेल –  [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ काही कळलंच नाही… कवी – ना.धो. महानोर ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ काही कळलंच नाही… कवी – ना.धो. महानोर ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

का कुणास ठाऊक, 

काही कळलंच नाही,   

*मन मात्र म्हणतंय तरुण आहे मी..*

 

कसा संपला ०६ पासून ६० वयापर्यंतचा हा प्रवास,

काही कळलंच नाही.

 

काय मिळवलं, काय कमावलं,

काय गमावलं,

काही कळलंच नाही.

 

संपलं बालपण,

गेलं तारुण्य,

केव्हा आलं ज्येष्ठत्व,

काही कळलंच नाही.

 

काल मुलगा होतो, 

केव्हा बाप आणि नंतर सासरा झालो, 

काही कळलंच नाही.

 

केव्हा ‘बाबा’ चा

‘आबा’ होऊन गेलो,

काही कळलंच नाही.

 

कोणी म्हणतं साठी बुद्धी नाठी,

कोणी म्हणतं हाती आली काठी,

काय खरं आहे, 

काही कळलंच नाही.

 

पहिले आई बापाचं चाललं,

मग बायकोचं चाललं,

मग चाललं मुलांचं, 

माझं कधी चाललं, 

काही कळलंच नाही.

 

बायको म्हणते, 

आता तरी समजून घ्या , 

काय समजू,

काय नको समजू, 

कां कुणास ठाऊक, 

काही कळलंच नाही.

        

मन म्हणतंय तरुण आहे मी,

वय म्हणतंय वेडा आहे मी,

या साऱ्या धडपडीत केव्हा 

गुडघे झिजून गेले, 

काही कळलंच नाही.

 

झडून गेले केस, 

लोंबू लागले गाल,

लागला चष्मा, 

केव्हा बदलला हा चेहरा 

काही कळलंच नाही.

 

काळ बदलला,

मी बदललो

बदलली मित्र-मंडळीही

किती निघून गेले, 

किती राहिले मित्र,

काही कळलंच नाही.

 

कालपर्यंत मौजमस्ती

करीत होतो मित्रांसोबत,

केव्हा सीनियर सिटिझनचा 

शिक्का लागून गेला, 

काही कळलंच नाही.

 

सून, जावई, नातू, पणतू,

आनंदी आनंद झाला, 

केव्हा हसलं उदास हे जीवन,

काही कळलंच नाही.

 

भरभरून जगून घे जीवा

मग नको म्हणूस की,

“मला काही कळलंच नाही……. 

 

कवी – ना.धो. महानोर

संग्राहक : सुहास रघुनाथ पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकावर बोलू काही ☆ सागरात हिमशिखरे… सुश्री मेधा आलकरी ☆ परिचय – सौ. माधुरी समाधान पोरे ☆

सौ. माधुरी समाधान पोरे

(सौ. माधुरी समाधान पोरे आपलं ई-अभिव्यक्तीवर हार्दिक स्वागत)

अल्प परिचय

शिक्षण- बी. ए. आवड- वाचन, लेखन छंद- वारली पेंटिंग,  शिवणकाम.

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ सागरात हिमशिखरे… सुश्री मेधा आलकरी ☆ परिचय – सौ. माधुरी समाधान पोरे ☆

पुस्तक परिचय

पुस्तकाचे नाव – सागरात हिमशिखरे (अकरा देशांचा सफरनामा)

लेखिका – मेधा आलकरी

जगण्याची ओढ अशी उडण्याचे वेड असे

घरट्याच्या लोभातही गगनाचे भव्य पिसे

अशी मनःस्थिती झाली नाही अशी व्यक्ती सापडणं अशक्यच. घर हवं नि भटकणंही, हेच जीवन जगण्याचं मर्म असतं. मेधा अलकरींच्या कुंडलीत भटकण्याचे ग्रह उच्चस्थानी, आणि जोडीदारही साजेसा मग कायं सोने पे सुहागा….

उपजत आवड आणि फोटोंची योग्य निवड यामुळे पुस्तकाला जिवंतपणा आला.पुस्तकातील फोटोंचं पूर्ण श्रेय त्यांच्या पतींचे.

मेधाताईंनी देशविदेशात, सप्तखंडांत मनापासून भटकंती केली. किती वैविध्यपूर्ण प्रदेशातून त्या वाचकांना हिंडवून आणतात ते नुसतं लेखांची शीर्षक वाचलं तरी ध्यानात येतं.अनेक खंडात फिरण्याचे अनुभव, समुद्राचे नाना रंग, ज्वालामुखीचे ढंग, पुरातन संस्कृतीचे अवशेष आणि वैभव, तर दुसरीकडे जंगलजीवनाचा थरार, यामधे फुलांचे सोहळे असे चितारले आहेत की जणू वाचक शब्दातून त्यांच सौंदर्य जाणवू शकतो. हे सामर्थ्य आहे लेखनाचं.

सागरात हिमशिखरे हा लेख समुद्राचे बहुविध मूड दाखवतो. अंटार्क्टिका हे पृथ्वीचं दक्षिण टोक. तिथे निसर्गाचे अनेक चमत्कार पाहायला,अनुभवायला मिळतात. या प्रवासाची आखणी खूप आधीपासून करावी लागते.  इथला अंदाज वर्तवणं अशक्य. इथले रहिवासी पेंग्विन. आर्क्टिकचा राजा हा मान आहे पेंग्विनचा, मानवसदृश हावभाव न्याहाळणं हा अद्वितीय अनुभव आहे. त्यांची परेड म्हणजे  पर्यटकांच्या नयनांना मेजवानीच. सील माशाचं जगणं, अल्ब्राट्रास ह्या मोठया पक्ष्याचं विहरणं हे वाचताना देहभान हरपतं. हिमनगाच्या जन्माची कहाणी त्याचा जन्म रोमांचकारी अनुभव आहे. निसर्गमातेची ही किमयाचं! चिंचोळया समुद्रमार्गातून जाताना बसणारे हेलकावे, हिमनदी, उंच बर्फाचे कडे, शांत समुद्र, त्यात पडलेले पर्वताचे प्रतिबिंब, कयाकमधून हिमनदयांच्या पोकळयातून वल्हवणं यामुळे सर्वांच जवळून दर्शन होतं. इथे अनेक पथक संशोधनासाठी येतात. आपल्या भारताचंही पथक इथं आहे ही अभिमानाची बाब आहे. खरंच शुभ्र शिल्पांनी नटलेल्या या महासागराची, द्वीपकल्प ची सफर एकमेवाद्वितीय!

यातील पेरूची फोड तर फारच गोड पेरू  हा प्राचीन संस्कृतीचा, भव्यतेचा आणि अनोख्या सौंदर्याचा देश. शाकाहारी मंडळींना विदेशात फिरताना येणारा शाकाहाराचा अर्थ किती वेगळा भेटतो हे जाणवतं. बर्‍याचदा ब्रेड-बटरवरच गुजराण करावी लागते. तेथील सण, समारंभ, यात्रा, जत्रा, रंगबेरंगी पोषाखातील स्री-पुरूष, असे अनेक सोहळे पाहायला मिळतात.  अनेक भूमितीय आकृत्या, प्राणी, पक्ष्यांच्या आकृत्या, नाझका लाइन्सची चित्रं पाहून कोकणातील कातळशिल्प आठवतात.  ही कुणी व का काढली असतील हे वैज्ञानिकांनाही गूढच आहे. माचूपिचू हे प्रगत संस्कृतीची देखणी स्थानं. म्युझियम, सूर्योपासकांचं सूर्यमंदिर, दगडी बांधकामाच्या जुन्या भक्कम वास्तू असा सारा समृद्ध इतिहास कवेत घेऊन हे शहर वसलं आहे. खरंच हा दीर्घ लेख वाचावा- आनंद घ्यावा असाच आहे.

समुद्रज्वाला हा बिग आयलंडमधील जागृत ज्वालामुखी या लाव्हांचे वर्णन या लेखात आहे. 1983 पासून किलुआ ज्वालामुखी जागृत आहे. 2013 मधे त्याचा उद्रेक होऊन पाचशेएकर जमीन निर्माण झाली. आजही तो खदखदतोय. हे रौद्र रूप, गडद केसरी लाव्हा हे दृश्य खूपच विलोभनीय.  हा नेत्रदीपक, अनुपम निसर्गसोहळा डोळयांनी पाहताना खूप छान वाटते. या लव्हांचा कधी चर्र, कधी सापाच्या फुत्कारासारखा, तर कधी लाह्या फुटल्यासारखा आवाज असतो.

लेखिकेला मोहात टाकणारा फुलांचा बहर त्यांनी मनभरून वर्णन केलाय फूल खिले है गुलशन गुलशन!  या लेखात. बत्तीस हेक्टरचा प्रचंड मोठा परिसर, वेगवेगळया आकाराची रंग आणि गंध यांची उधळण करणारी असंख्य फुलं! खरंखुरं नंदनवन! एप्रिल आणि मे महिन्यात आठ लाख पर्यटक हजेरी लावून जातात. हाॅलंडची आन-बान-शान असलेला ट्युलिप हे हाॅलंडचं राष्ट्रीय पुष्प! या  बागेत फिरताना मनात मात्र एक गाणे सतत  रूंजी घालत होते…..’दूर तक निगाहमे हैं गुल खिले हुए’.

लाजवाब लिस्बन या लेखात लिस्बन या शहराचे वर्णन केले आहे. हे सात टेकड्यांवर वसलेले शहर आहे. सेंट जॉर्ज किल्ला उभा आहे. या किल्ल्यांचे अठरा बुरूज प्राचीन ऐश्वर्याची साक्ष देतात. तटबंदीवरून शहराचा मनोरम देखावा दिसतो.  गौरवशाली इतिहास, निसर्गसौंदर्य, स्वप्ननगरीतल्या राजवाड्यांचा तसेच भरभक्कम गडकिल्ल्यांचा आणि खवय्यांचा हा लिस्बन खरोखरच लाजवाब!

हाऊस ऑफ बांबूज या लेखात गोरिलाभेटीचा छान अनुभव मांडला आहे. हा मर्कटजातीतील अनोखा प्राणी,  याचे अस्तित्व पूर्व अफ्रिकेतील उत्तर रंवाडा, युगांडा व कांगो या तीन सीमा प्रदेशात आहे.   हा कुटुंबवत्सल प्राणी आहे. पण त्याच्या परिवाराच्या सुरक्षिततेला धोका आहे अशी शंका आली तर तो काहीही करू शकतो. त्याच्यासमोर शिंकायचे नाही, मनुष्याच्या शिंकेतू न त्याला जंतूसंसर्ग होण्याची शक्यता असते. घनदाट जंगल,  नयनमनोहर सरोवर आणि वन्यजीवांना मुक्त संचार करता यावा अशी अभयारण्यं, एक निसर्ग श्रीमंत देश! रवांडाच्या हस्तकलेचा एक वेगळाच बाज आहे.

आलो सिंहाच्या घरी या मसाई माराच्या जंगलसफारीवर लिहलेला लेख वाचताना लक्षात येत की, प्राणी दिसण्याची अनिश्चितता नेहमीच असते. प्राणी दिसले तरी शिकारीचा थरार दिसेल याचा नेम नाही. पण विविधतेनं नटलेलं जंगल पाहण्याचा, तेथील सुर्योदय-सूर्यास्त अनुभवण्याचा, तंबूत राहण्याचा आणि मसाई या अदिवासी जमातीची संस्कृती जवळून पाहण्याचा अनुभव आपल्या कक्षा रुंदावतो.

भव्य मंदिराच्या रंजक आख्यायिका या लेखात जपानमधील पर्यटनात मंदिराचा वाटा  मोठा आहे. तिथला परिसर, स्वच्छता, शांतता सारचं अलौकिक.  परंपरा जपणारे भाविक नवीन वर्षाच स्वागत सकाळी लवकर उठून मंदिरात जातात. खरंच  ‘उगवत्या सूर्याचा देश’  हे जपानचं नाव अगदी सार्थक आहे असे वाटते.

चीन देशाच्या रापुन्झेल ह्या लेखात लांब केसांच्या एका तरुणीच्या जर्मन परीकथेचा  उल्लेख येतो. पायापर्यंत लांब केसांच्या  असलेल्या ‘रेड याओ’ जमातीतील स्त्रीयांच्या  लांब केसाच्या मजेदार कथा आहेत.  केस हा स्त्रीयांचा आवडता श्रृंगार. तिथल्या केसांबद्दल काय रूढी आहेत याच्या गमतीदार कहाण्या वाचायला मिळतात.

प्रवास माणसाला,  आयुष्याला अनुभवसमृद्ध करतो. आपण गेलो नसलो तरी त्यांच वर्णन वाचून आपलं निसर्गाबद्दलचं आणि संस्कृतीच ज्ञान वाढतं. मेधाताईंच हे पुस्तक वाचकाला निखळ आनंद देईल अशा ऐवजाने भरलेले आहे.

सागरात हिमशिखरे हा अकरा देशांचा सफरनामा वाचत असताना खरोखरं सफर करून आल्यासारखं वाटंल!!

संवादिनी – सौ. माधुरी समाधान पोरे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य #182 ☆ ख़ुद से जीतने की ज़िद्द ☆ डॉ. मुक्ता ☆

डॉ. मुक्ता

डा. मुक्ता जी हरियाणा साहित्य अकादमी की पूर्व निदेशक एवं  माननीय राष्ट्रपति द्वारा सम्मानित/पुरस्कृत हैं।  साप्ताहिक स्तम्भ  “डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य” के माध्यम से  हम  आपको प्रत्येक शुक्रवार डॉ मुक्ता जी की उत्कृष्ट रचनाओं से रूबरू कराने का प्रयास करते हैं। आज प्रस्तुत है डॉ मुक्ता जी का  मानवीय जीवन पर आधारित एक अत्यंत विचारणीय आलेख ख़ुद से जीतने की ज़िद्द। यह डॉ मुक्ता जी के जीवन के प्रति गंभीर चिंतन का दस्तावेज है। डॉ मुक्ता जी की  लेखनी को  इस गंभीर चिंतन से परिपूर्ण आलेख के लिए सादर नमन। कृपया इसे गंभीरता से आत्मसात करें।) 

☆ साप्ताहिक स्तम्भ – डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य  # 182 ☆

☆ ख़ुद से जीतने की ज़िद्द 

‘खुद से जीतने की ज़िद्द है मुझे/ मुझे ख़ुद को ही हराना है। मैं भीड़ नहीं हूं दुनिया की/ मेरे अंदर एक ज़माना है।’ वाट्सएप का यह संदेश मुझे अंतरात्मा की आवाज़ प्रतीत हुआ और ऐसा लगा कि यह मेरे जीवन का अनुभूत सत्य है, मनोभावों की मनोरम अभिव्यक्ति है। ख़ुद से जीतने की ज़िद अर्थात् निरंतर आगे बढ़ने का जज़्बा, इंसान को उस मुक़ाम पर ले जाता है, जो कल्पनातीत है। यह झरोखा है, मानव के आत्मविश्वास का; लेखा-जोखा है… एहसास व जज़्बात का; भाव और संवेदनाओं का– जो साहस, उत्साह व धैर्य का दामन थामे, हमें उस निश्चित मुक़ाम पर पहुंचाते हैं, जिससे आगे कोई राह नहीं…केवल शून्य है। परंतु संसार रूपी सागर के अथाह जल में गोते खाता मन, अथक परिश्रम व अदम्य साहस के साथ आंतरिक ऊर्जा को संचित कर, हमें साहिल तक पहुंचाता है…जो हमारी मंज़िल है।

‘अगर देखना चाहते हो/ मेरी उड़ान को/ थोड़ा और ऊंचा कर दो / आसमान को’ प्रकट करता है मानव के जज़्बे, आत्मविश्वास व ऊर्जा को..जहां पहुंचने के पश्चात् भी उसे संतोष का अनुभव नहीं होता। वह नये मुक़ाम हासिल कर, मील के पत्थर स्थापित करना चाहता है, जो आगामी पीढ़ियों में उत्साह, ऊर्जा व प्रेरणा का संचरण कर सके। इसके साथ ही मुझे याद आ रही हैं, 2007 में प्रकाशित ‘अस्मिता’ की वे पंक्तियां ‘मुझ मेंं साहस ‘औ’/ आत्मविश्वास है इतना/ छू सकती हूं/ मैं आकाश की बुलंदियां’ अर्थात् युवा पीढ़ी से अपेक्षा है कि वे अपनी मंज़िल पर पहुंचने से पूर्व बीच राह में थक कर न बैठें और उसे पाने के पश्चात् भी निरंतर कर्मशील रहें, क्योंकि इस जहान से आगे जहान और भी हैं। सो! संतुष्ट होकर बैठ जाना प्रगति के पथ का अवरोधक है…दूसरे शब्दों में यह पलायनवादिता है। मानव अपने अदम्य साहस व उत्साह के बल पर नये व अनछुए मुक़ाम हासिल कर सकता है।

‘कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती/ लहरों से डर कर नौका पार नहीं होती’… अनुकरणीय संदेश है… एक गोताखोर, जिसके लिए हीरे, रत्न, मोती आदि पाने के निमित्त सागर के गहरे जल में उतरना अनिवार्य होता है। सो! कोशिश करने वालों को कभी पराजय का सामना नहीं करना पड़ता। दीपा मलिक भले ही दिव्यांग महिला हैं, परंतु उनके जज़्बे को सलाम है। ऐसे अनेक दिव्यांगों व लोगों के उदाहरण हमारे समक्ष हैं, जो हमें ऊर्जा प्रदान करते हैं। के•बी• सी• में हर सप्ताह एक न एक कर्मवीर से मिलने का अवसर प्राप्त होता है, जिसे देख कर अंतर्मन में अलौकिक ऊर्जा संचरित होती है, जो हमें शुभ कर्म करने को प्रेरित करती है।

‘मैं अकेला चला था जानिब!/ लोग मिलते गये/ और कारवां बनता गया।’ यदि आपके कर्म शुभ व अच्छे हैं, तो काफ़िला स्वयं ही आपके साथ हो लेता है। ऐसे सज्जन पुरुषों का साथ देकर आप अपने भाग्य को सराहते हैं और भविष्य में लोग आपका अनुकरण करने लग जाते हैं…आप सबके प्रेरणा-स्त्रोत बन जाते हैं। टैगोर का ‘एकला चलो रे’ में निहित भावना हमें प्रेरित ही नहीं, ऊर्जस्वित करती है और राह में आने वाली बाधाओं-आपदाओं का सामना करने का संदेश देती है। यदि मानव का निश्चय दृढ़ व अटल है, तो लाख प्रयास करने पर, कोई भी आपको पथ-विचलित नहीं कर सकता। इसी प्रकार सही व सत्य मार्ग पर चलते हुए, आपका त्याग कभी व्यर्थ नहीं जाता। लोग पगडंडियों पर चलकर अपने भाग्य को सराहते हैं तथा अधूरे कार्यों को संपन्न कर सपनों को साकार कर लेना चाहते हैं।

‘सपने देखो, ज़िद्द करो’ कथन भी मानव को प्रेरित करता है कि उसे अथवा विशेष रूप से युवा-पीढ़ी को उस राह पर अग्रसर होना चाहिए। सपने देखना व उन्हें साकार करने की ज़िद, उनके लिए मार्ग-दर्शक का कार्य करती है। ग़लत बात पर अड़े रहना व ज़बर्दस्ती अपनी बात मनवाना भी एक प्रकार की ज़िद्द है, जुनून है…जो उपयोगी नहीं, उन्नति के पथ में अवरोधक है। सो! हमें सपने देखते हुए, संभावना पर अवश्य दृष्टिपात करना चाहिए। दूसरी ओर मार्ग दिखाई पड़े या न पड़े… वहां से लौटने का निर्णय लेना अत्यंत हानिकारक है। एडिसन जब बिजली के बल्ब का आविष्कार कर रहे थे, तो उनके एक हज़ार प्रयास विफल हुए और तब उनके एक मित्र ने उनसे विफलता की बात कही, तो उन्होंने उन प्रयोगों की उपादेयता को स्वीकारते हुए कहा… अब मुझे यह प्रयोग दोबारा नहीं करने पड़ेंगे। यह मेरे पथ-प्रदर्शक हैं…इसलिए मैं निराश नहीं हूं, बल्कि अपने लक्ष्य के निकट पहुंच गया हूं। अंततः उन्होंने आत्म-विश्वास के बल पर सफलता अर्जित की।

आजकल अपने बनाए रिकॉर्ड तोड़ कर नए रिकॉर्ड स्थापित करने के कितने उदाहरण देखने को मिल जाते हैं। कितनी सुखद अनुभूति के होते होंगे वे क्षण …कल्पनातीत है। यह इस तथ्य पर प्रकाश डालता है कि ‘वे भीड़ का हिस्सा नहीं हैं तथा अपने अंतर्मन की इच्छाओं को पूर्ण कर सुक़ून पाना चाहते हैं।’ यह उन महान् व्यक्तियों के लक्षण हैं, जो अंतर्मन में निहित शक्तियों को पहचान कर अपनी विलक्षण प्रतिभा के बल पर नये मील के पत्थर स्थापित करना चाहते हैं। बीता हुआ कल अतीत है, आने वाला कल भविष्य तथा वही आने वाला कल वर्तमान होगा। सो! गुज़रा हुआ कल और आने वाला कल दोनों व्यर्थ हैं, महत्वहीन हैं। इसलिए मानव को वर्तमान में जीना चाहिए, क्योंकि वर्तमान ही सार्थक है… अतीत के लिए आंसू बहाना और भविष्य के स्वर्णिम सपनों के प्रति शंका भाव रखना, हमारे वर्तमान को भी दु:खमय बना देता है। सो! मानव के लिए अपने सपनों को साकार करके, वर्तमान को सुखद बनाने का हर संभव प्रयास करना श्रेष्ठ है। इसलिए अपनी क्षमताओं को पहचानो तथा धीर, वीर, गंभीर बन कर समाज को रोशन करो… यही जीवन की उपादेयता है।

‘जहां खुद से लड़ना वरदान है, वहीं दूसरे से लड़ना अभिशाप।’ सो! हमें प्रतिपक्षी को कमज़ोर समझ कर कभी भी ललकारना नहीं चाहिए, क्योंकि आधुनिक युग में हर इंसान अहंवादी है और अहं का संघर्ष, जहां घर-परिवार व अन्य रिश्तों में सेंध लगा रहा है; दीमक की भांति चाट रहा है, वहीं समाज व देश में फूट डालकर युद्ध की स्थिति तक उत्पन्न कर रहा है। मुझे याद आ आ रहा है, एक प्रेरक प्रसंग… बोधिसत्व, बटेर का जन्म लेकर उनके साथ रहने लगे। शिकारी बटेर की आवाज़ निकाल कर, मछलियों को जाल में फंसा कर अपनी आजीविका चलाता था। बोधि ने बटेर के बच्चों को, अपनी जाति की रक्षा के लिए, जाल की गांठों को कस कर पकड़ कर, जाल को लेकर उड़ने का संदेश दिया…और उनकी एकता रंग लाई। वे जाल को लेकर उड़ गये और शिकारी हाथ मलता रह गया। खाली हाथ घर लौटने पर उसकी पत्नी ने, उनमें फूट डालने की डालने के निमित्त दाना डालने को कहा। परिणामत: उनमें संघर्ष उत्पन्न हुआ और दो गुट बनने के कारण वे शिकारी की गिरफ़्त में आ गए और वह अपने मिशन में कामयाब हो गया। ‘फूट डालो और राज्य करो’ के आधार पर अंग्रेज़ों का हमारे देश पर अनेक वर्षों तक आधिपत्य रहा। ‘एकता में बल है तथा बंद मुट्ठी लाख की, खुली तो खाक़ की’ एकजुटता का संदेश देती है। अनुशासन से एकता को बल मिलता है, जिसके आधार पर हम बाहरी शत्रुओं व शक्तियों से तो लोहा ले सकते हैं, परंतु मन के शत्रुओं को पराजित करन अत्यंत कठिन है। काम, क्रोध, लोभ, मोह पर तो इंसान किसी प्रकार विजय प्राप्त कर सकता है, परंतु अहं को पराजित करना आसान नहीं है।

मानव में ख़ुद को जीतने की ज़िद्द होनी चाहिए, जिस के आधार पर मानव उस मुक़ाम पर आसानी से पहुंच सकता है, क्योंकि उसका प्रति-पक्षी वह स्वयं होता है और उसका सामना भी ख़ुद से होता है। इस मन:स्थिति में ईर्ष्या-द्वेष का भाव नदारद रहता है… मानव का हृदय अलौकिक आनन्दोल्लास से आप्लावित हो जाता है और उसे ऐसी दिव्यानुभूति होती है, जैसी उसे अपने बच्चों से पराजित होने पर होती है। ‘चाइल्ड इज़ दी फॉदर ऑफ मैन’ के अंतर्गत माता-पिता, बच्चों को अपने से ऊंचे पदों पर आसीन देख कर फूले नहीं समाते और अपने भाग्य को सराहते नहीं थकते। सो! ख़ुद को हराने के लिए दरक़ार है…स्व-पर, राग-द्वेष से ऊपर उठ कर, जीव- जगत् में परमात्म-सत्ता अनुभव करने की; दूसरों के हितों का ख्याल रखते हुए उन्हें दु:ख, तकलीफ़ व कष्ट न पहुंचाने की; नि:स्वार्थ भाव से सेवा करने की … यही वे माध्यम हैं, जिनके द्वारा हम दूसरों को पराजित कर, उनके हृदय में प्रतिष्ठापित होने के पश्चात्, मील के नवीन पत्थर स्थापित कर सकते हैं। इस स्थिति में मानव इस तथ्य से अवगत होता है कि उस के अंतर्मन में अदृश्य व अलौकिक शक्तियों का खज़ाना छिपा है, जिन्हें जाग्रत कर हम विषम परिस्थितियों का बखूबी सामना कर, अपने लक्ष्य की प्राप्ति कर सकते हैं।

© डा. मुक्ता

माननीय राष्ट्रपति द्वारा पुरस्कृत, पूर्व निदेशक, हरियाणा साहित्य अकादमी

संपर्क – #239,सेक्टर-45, गुरुग्राम-122003 ईमेल: drmukta51@gmail.com, मो• न•…8588801878

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कविता ☆ दिल मेरा पशेमां है… ☆ श्री अरुण कुमार दुबे ☆

श्री अरुण कुमार दुबे

(वरिष्ठ साहित्यकार श्री अरुण कुमार दुबे जी, उप पुलिस अधीक्षक पद से मध्य प्रदेश पुलिस विभाग से सेवा निवृत्त हुए हैं । संक्षिप्त परिचय ->> शिक्षा – एम. एस .सी. प्राणी शास्त्र। साहित्य – काव्य विधा गीत, ग़ज़ल, छंद लेखन में विशेष अभिरुचि। आज प्रस्तुत है, आपकी एक भाव प्रवण रचना “दिल मेरा पशेमां है “)

✍ कविता ☆ दिल मेरा पशेमां है … ☆ श्री अरुण कुमार दुबे 

मतलब नहीं है मुझको इधर से या उधर से

दिल मेरा पशेमां है तो दंगे की खबर से

रहमत से उसकी शुहरतें मिलते ही  हुआ क्या

नादान ख़ुदा मान रहा खुद को बशर से

रुसवाई न हो उसकी लिया चलते ये वादा

 गुज़रा भी नहीं फिर कभी मैं उसके नगर से

पत्थर की भले चोट पड़े देना समर है

सीखा है सबक मैंने ये फलदार शज़र से 

हर रात मेरे घर में रहे नूर मुसल्सल

कमतर नहीं महबूब मेरा दोस्त क़मर से

थे चंद सिपाही वो हुकूमत थी ब्रिटिश की

चूलें हिला के रख दी जवानों ने गदर से

गलियों में नहीं इसकी रहा पाक है दामन

गुजरा मैं इसी से न  सियासत की डगर से

© श्री अरुण कुमार दुबे

सम्पर्क : 5, सिविल लाइन्स सागर मध्य प्रदेश

मोबाइल : 9425172009 Email : arunkdubeynidhi@gmail. com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – ज्योतिर्गमय ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )

? संजय दृष्टि – ज्योतिर्गमय ??

अथाह, असीम

अथक अंधेरा,

द्वादशपक्षीय

रात का डेरा,

ध्रुवीय बिंदु

सच को जानते हैं

चाँद को रात का

पहरेदार मानते हैं,

बात को समझा करो

पहरेदार से डरा करो,

पर इस पहरेदार की

टकटकी ही तो

मेरे पास है,

चाँद है सो

सूरज के लौटने

की आस है,

अवधि थोड़ी हो

अवधि अधिक हो,

सूरज की राह देखते

बीत जाती है रात,

अंधेरे के गर्भ में

प्रकाश को पंख फूटते हैं,

तमस के पैरोकार,

सुनो, रात काटना

इसे ही तो कहते हैं..!

(रात्रि 3:31 बजे, 6.6.2020)

© संजय भारद्वाज 

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

🕉️ श्री हनुमान साधना 🕉️

अवधि – 6 अप्रैल 2023 से 19 मई 2023 तक।

💥 इस साधना में हनुमान चालीसा एवं संकटमोचन हनुमनाष्टक का कम से एक पाठ अवश्य करें। आत्म-परिष्कार एवं ध्यानसाधना तो साथ चलेंगे ही 💥

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares