मराठी साहित्य – विविधा ☆ रंगबावरा वसंत… ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर

? विविधा  

☆ रंगबावरा वसंत… ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

आज सकाळी नेहमीसारखी फिरायला बाहेर पडले.नेहमीचा रस्ता,पण चालता चालता एकदम थांबले.माझं लक्ष बाजूच्या झाडाकडं गेलं. तर एरवी उदास वाटणाऱ्या या झाडाचा आजचा रुबाब बघितला.

हिरवट, पिवळ्या कळ्या फुलांची झुंबरे त्यावर लटकत होती. ही किमया कधी झाली असा प्रश्र्न पडला, तर शेजारचा गुलमोहर तसाच,कात टाकल्यासारखा. लाललाल लहानशा पाकळ्या आणि मध्ये शुभ्र मोती असे गुच्छ दिसू लागलेले. मला वाटलं लाजून लालेलाल झाला कि काय?

मग चटकन लक्षात आलं कि या तर ऋतुराजाच्या आगमनाच्या खुणा.

शहरी वातावरणात राहणारे आपण निसर्गाच्या या सौंदर्याच्या जादूला नक्कीच भुलतो. शिशिरातील पानगळीने,तलखीने सृष्टीचे निस्तेज उदालसेपण आता संपणार.कारण ही सृष्टी वासंतिक लावण्य लेऊन आता नववधू सारखी सजते.वसंत राजाच्या स्वागतात दंग होते.कोकिळ  आलापांवर आलाप घेत असतो.लाल चुटुक पालवी साऱ्या वृक्षवेलींवर  डुलत असते.उन्हात चमकताना जणू फुलांचे लाललाल मणी झळकत असल्यासारखे वाटते.चाफ्याच्या झाडांमधून शुभ्रधवल सौंदर्य उमलत असते.आजून जरा वेळ असतो, पण कळ्यांचे गुच्छ तर हळुहळू दिसायला लागतात.फुलझाडांची तर गंधवेडी स्पर्धाच सुरु असते.केशरी देठांची प्राजक्त फुले,जाई,जुई चमेली,मोगरा, मदनबाण,नेवाळी, सोनचाफा अगदी अहमहमिकेने गंधाची उधळण करत असतात.

या सुगंधी सौंदर्याला रंगांच्या सुरेख छटांनी बहार येते.फार कशाला घाणेरीची झुडपं.लाललाल आणि पिवळ्या,केशरी व पांढऱ्या, जांभळ्या आणि गुलाबी अशा विरुद्ध रंगांच्या छटांच्या फुलांनी लक्षवेधी ठरतात.

आपण हिला घाणेरी म्हणतो पण गुजरात,राजस्थान मध्ये या फुलांना “चुनडी”म्हणतात.त्यांचे कपडेही असेच चटकदार रंगांचे असतात.पळस,पांगारा रंगलेला असतो. हिरव्या रंगांच्या तर किती छटा.जणू त्याअनामिक चित्रकाराने मनापासून निसर्गदेवीला रंगगंधानी सजवले आहे.त्यासाठी नानाविध रंग आणि मदहोश सुगंधाच्या खाणीच खुल्या केलेल्या आहेत.

आंब्याची झाडे तर अतीव सुखातअसतात.फाल्गुनातील मोहोराचा गंध आणि त्यात लांब लांब देठांना लोंबणाऱ्या कैऱ्या उद्याचा “मधाळ ठेवा.”अगदी नारळा-पोफळीच्या झाडांना सुद्धा फुलं येतात.नखाएवढी फुलं एवढ्या मोठ्या नारळांची.

अगदी टणक पण हातात घेतली  कि त्याच्या इवल्याशा पाकळ्याही मृदू भासतात.पोफळीला फुटलेले इवल्याशा सुपाऱ्यांचे पाचूसम तकतकीत हिरवे लोंगर अगदी लोभस दिसतात.कडुलिंबाचा जांभळट पांढरा मोहोर तर गंधाने दरवळणारा. करंजाची झाडं सुद्धा नाजूक फुलांनी डंवरलेली.फणसाशिवाय हे वर्णनअपुरेहोईल.फणसाची झाडे सुद्धा टवटवीत दिसू लागतात.हळूहळू अगदी खालून वर पर्यंत इवलेसे फणस लटकलेले असतात. खरतर यादरम्यानउन्हंकडक.पणफुलायचा,गंधाळण्याचा या वृक्षलतांनी घेतलेला वसा पाहून मन थक्क होते.जांभूळही यात मागे नसतोच.

त्यातच कालपर्यंत शुकशुकाट असलेल्या झाडांवरलहान,मोठी,सुबक,बेढब,लांबोडकी,गोल घरटी दिसू लागतात.नव्या सृजनाची तयारी.वसंत ऋतू चैतन्याचा . कुणासाठी काहीतरी करण्याचा.नर पक्षी मादीला आकर्षित करण्याच्या खटपटीत.सुगरण पक्षी आपली कला घरटी बांधून प्रदर्शित करतात आणि मादीला आकर्षित करतात.काही नर पक्षी गातात, काही नाचतात. इकडं झाडं,वेली फुलोऱ्यात रंगून ऋतूराजा चे स्वागत करण्यात मश्गुल,साऱ्या सृष्टीतचहालचाली,लगबग.वसंत ऋतूचे हक्काचे महिने चैत्र, वैशाख. पण खरा तो रंगगंधानी न्हातो चैत्रात.कारण फुलांच्या, मोहोराच्या गोड सुगंधा बरोबर फळातील मधुरसही असतो.म्हणूनच हा मधुमास.निसर्गाचा मधुर आविष्कार. म्हणून तर चैत्र मास “मधुमास”होतो.

आता ऋतुपतीच्या आगमनासाठी सृष्टीचा कण न कण आतुरलेला.संयमाची सारी बंधने  निसर्ग राणी झुगारून देते.पक्षीगणांची सृजनासाठी आतुर,सहचरीची आर्जवे करणारे मधुरव, कोकिळ कंठातील मदमस्त ताना वातावरण धुंद करतात.

सजलेल्या,पुष्पालंकार ल्यायलेल्या गंधभऱ्या सृष्टीराणीच्या मोहात हा गंधवेडा,रंगबावरा वसंत पडला नाही तरच नवल.मग हा वसंतोत्सव पूर्ण वैशाख संपेपर्यंत रंगलेला असतो. निसर्गाचे हे बेबंद रुप, सौंदर्यासक्ती, कलाकारी खरंच थक्क करते.

गंधवेडा कि तू रंगबावरा|

ऋतुपती तू सदैव हसरा|

रत्युत्सुक रे मत्त मदभरा|

सृष्टीवेड्या रे जादुगारा||

 

आनंदाचा सुखमय ठेवा|

वाटत येशी तूची सर्वा|

फुलपंखी हा पर्णपिसारा|

फुलवित येशी चित्तचकोरा||

 

गंध उधळसी दाही दिशांना|

उजळत येशी दिशादिशांना|

धरतीच्या रे ह्रदय स्पंदना|

उत्सुक सारे तुझ्या दर्शना||

                

© वृंदा (चित्रा) करमरकर

सांगली

मो. 9405555728

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘भय…’ – भाग – 1 ☆ श्री आनंदहरी ☆

श्री आनंदहरी

?जीवनरंग ?

 ☆ ‘भय…’ – भाग – 1 ☆ श्री आनंदहरी  

त्याला जाग आली तर ती शेजारी नव्हती. तो झटकन उठला. त्याने घड्याळात पाहिले. साडेचार वाजून गेले होते. ‘बाबा उठले असतील ..’ मनात विचार येऊन त्याने.बाबांची चाहूल घेण्याचा प्रयत्न केला. बाबांच्या आणि तिच्या बोलण्याचा आवाज ऐकू येत होता.  तो बाहेर आला.

“ आता मी आलेय ना बाबा ? मग आता पहाटेचा चहा मी करून देणार हं तुम्हाला.. तुम्ही नाही स्वतः करून घ्यायचा. ”

“ अगं, पण मला सवय आहे त्याची.. उगाच तुझी झोपमोड कशाला ? जा. झोप जा तू.. घेईन मी करून चहा. “

“ ते काही नाही हं …बाबा, मी असताना तुम्ही चहा करून घेतलात तर मला ते नाही हं आवडणार. आजवर तुम्ही खूप केलेत…पण आता नाही. आता तुम्ही फक्त आराम करायचा, तुमच्या आवडी-निवडी जपायच्या, छंद जोपासत राहायचे. आता कुठल्याच कामाला मी नाही हं हात लावू देणार तुम्हांला. चला, तुम्ही हॉलमध्ये जाऊन बसा बघू,  मी आणते लगेच चहा करून.. अगदी तुमच्या आवडीचा.. आलं घालून .”

‘ बरं. तू आण चहा करून..’ असं म्हणून बाबा किचन मधून बाहेर येऊन हॉलमध्ये बसले..’ किती चांगली सून मिळालीय आपल्याला.. आपण खूप नशीबवान आहोत..’ बाबांच्या मनात आले. तो हे सारे  ऐकत होता.. तो हॉल मध्ये आला.

“ अरे, तू ही उठलास? ये. “

तो हॉल मध्ये आला. बाबांच्याशेजारी बसला. ती चहा घेऊन आली तेव्हा तिने त्याच्यासाठीही चहा आणला होता.

“ तुमचा आवाज आला म्हणून तुमच्यासाठीही आणलाय चहा.. घ्या. “

ती ओठातल्या ओठात हसत त्याच्या हातात त्याचा चहाचा कप देत म्हणाली.

चहा पिऊन झाल्यावर बाबा फिरायला बाहेर पडले. 

बाबा रोज पहाटे साडेचारला उठून, सारे आवरून स्वतःचा चहा स्वतः करून घेऊन पाचला फिरायला जात असत. गेल्या कित्येक वर्षाचा त्यांचा तो नेमच होता.  आधी आईही लवकर उठायची, बाबांना तीच चहा करून द्यायची पण तिची झोप पूर्ण होत नाही हे लक्षात येताच बाबांनीच तिला लवकर उठायला मनाई केली होती..

बाबा फिरायला निघून गेले आणि ती आणि तो,  दोघेही  त्यांच्या बेडरूम मध्ये आले. त्यांच्या लग्नाला काही दिवसच झाले होते पण तिने आपल्या वागण्याने घरच्यांचीच नव्हे तर शेजार-पाजाऱ्यांचीही मनं जिंकली होती.. तोही खुश होता.

“ उद्यापासून तूही उठायचंस लवकर.. मी उठवेन तूला ..”

बेडरूममध्ये शिरताच बेडरूमचे दार लोटून आतून कडी लावत ती त्याला म्हणाली. आईबाबांसमोर, इत्तरांसमोर ती त्याला अहो s जाहो म्हणत असली तरी दोघंच असताना मात्र ती त्याला अरेतूरे करत होती आणि त्यालाही ते खूप आवडत होते.

“ अरे वा ss! पहाटे पहाटे? नेकीं और पुछ पुछ ? “

तो मिश्कीलपणे डोळा बारीक करत म्हणाला. त्यावेळी तिच्या आवाजातला कोरडा आणि हुकमी स्वर त्याच्या ध्यानातच आला नाही.

“ उगाच लाडात येऊ नकोस.. उठून तू बाबांसाठी चहा करायचा आहेस.. मी कितीही तुला ‘नको,नाही म्हणले तरीही.. ‘ तू कशाला चहा करतोयस?  आता मी आहे ना..मी करते चहा ‘ असं  म्हणलं तरीही… चहा तूच करायचा आहेस हे लक्षात ठेव. “

“ए, मी नाही हं करणार चहा..”

ती आपली मस्करी करत आहे असे वाटून तो काहीसा लाडात येऊन, काहीसा चेष्टेने म्हणाला.

“ म्हणजे ? एकच लक्षात ठेव.. तू  करणार आहेस म्हणजे करणार आहेस.. “

ती काहीशा कठोरपणे म्हणाली .तिच्यातल्या या बदलाने तो आवाक होऊन तिच्याकडे पहात असतानाच ती हसत हसत म्हणाली,

“ कायदा स्त्रियांच्या बाजूने आहे ठाऊक आहे ना..?  आत जायचं नाही ना तुला ?”

त्याने दचकून तिच्या चेहऱ्याकडे पाहिले.  ती नेहमी जशी दिसते त्याहून वेगळीच भासली त्याला. तो अंतर्बाह्य थरारला. ‘ ही अशी काय वागतेय ? हिच्याशी एवढे प्रेमाने, समजुतीने वागूनही अगदी शांतपणे धमकी काय देतेय ?.. काही वाद, भांडण झाले असते आणि रागाच्या भरात बोलली असती तरी एकवेळ ते समजून घेण्यासारखं होते पण तसे काहीच नसताना, हे काय म्हणायचं ?…’ त्याच्या मनात विचार आला. त्याला तिच्या अशा वागण्याचं काहीच कारण कळेना पण तिच्या त्या वाक्याने त्याच्या मनात भीतीने घर केलं. तो मनोमन काहीसा घाबरलाय हे तिला जाणवले.. ती स्वतःशीच हसल्यासारखं हसून त्याला म्हणाली,

“ अरे, गंमत केली तुझी..”

ती ‘गंमत’ म्हणाली असली तरी ती गंमत नाही हे त्याच्या ध्यानात आलं होतं.

” आणि आपली ही गंमत कुणाला सांगायची नाही हं ! कुणाला म्हणजे कुणालाच. तुझ्या आई-बाबांनाही नाही. राहील ना हे तुझ्या लक्षात ? “

तो तिच्या बोलण्याने, तिच्यातील बदलाने अवाक होऊन तिच्याकडे पहातच राहिला होता.

               क्रमशः…

© श्री आनंदहरी

इस्लामपूर जि. सांगली – मो  ८२७५१७८०९९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “प्राजक्त…” लेखक – अज्ञात ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆ “प्राजक्त…” लेखक – अज्ञात ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

झाडावरुन प्राजक्त ओघळतो, 

त्याचा आवाज होत नाही, 

याचा अर्थ असा नाही की त्याला इजा होत नाही’…

“प्राजक्त” किंवा “पारिजातक” 

किती नाजुक फुलं..!

कळी पूर्ण उमलली की, इतर फुलझाडांप्रमाणे फूल खुडायचीही गरज नसते. डबडबलेल्या डोळ्यांतून अश्रु ओघळावा, तसं देठातुन फूल जमिनीवर ओघळतं.

“सुख वाटावे जनात,

दुःख ठेवावे मनात”

— हे या प्राजक्ताच्या फुलांनी शिकवलं.

एवढसं आयुष्य त्या फुलांचं..!

झाडापासुन दूर होतांनाही गवगवा करीत नाहीत.

छोट्याशा नाजुक आयुष्यात आपल्याला भरभरुन आनंद देतात.

आणि केवळ आपल्यालाच नाही,  तर आपल्या कुंपणात लावलेल्या झाडाची फुलं शेजारच्यांच्या अंगणातही पडतातच की. 

खरंच…! माणसाचं आयुष्यही असंच… एवढसं… क्षणभंगुर प्राजक्तासारखं…!

कधी ओघळून जाईल माहीत नाही.

आज आहे त्यातलं भरभरुन द्यावं हेच खरं…!!                 

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆  ॥श्री विंध्येश्वरी स्तोत्रम्॥ ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

 ॥श्री विंध्येश्वरी स्तोत्रम्॥ ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

मूळ संस्कृत स्तोत्र व त्याचा मराठी भावानुवाद : 

निशुम्भशुम्भमर्दिनीं प्रचण्डमुण्डखण्डिनीम्।

वने  रणे  प्रकाशिनीं   भजामि   विन्ध्यवासिनीम्।।१॥

निशुम्भशुम्भ हारिणी मुंडचंड नाशिनी

पराक्रमी रणी वनी भजितो विंध्यवासिनी ॥१॥

त्रिशूलरत्नधारिणीं  धराविघातहारिणीम्।

गृहे  गृहे  निवासिनीं  भजामि  विन्ध्यवासिनीम।।२।।

रत्नत्रिशूल धारिणी अवनी संकट हारिणी

घराघरात वासिनी भजितो विंध्यवासिनी  ॥२॥

दरिद्र दुःख हारिणी, सदा विभूति कारिणी।

वियोग शोक हारिणी, भजामि विन्ध्यवासिनी॥३॥

दीन दुःखहारिणी साधूसुखकारिणी

विरहशोकनिवारिणी भजितो विंध्यवासिनी ॥३॥

लसत्सुलोलचनां  लतां  सदावरप्रदाम्।

कपालशूलधारिणीं भजामि विन्ध्यवासिनीम्।।४।।

चंचलसुनेत्र सुकुमारी सदैव शुभवरदायिनी

कपालशूल धारिणी भजितो विंध्यवासिनी ॥४॥

करे    मुदा    गदाधरां    शिवां    शिवप्रदायिनीम्।

वरावराननां   शुभां    भजामि   विन्ध्यवासिनीम्।।५।।

गदाहस्त शोभिणी सर्वमंगल दायिनी

सर्वरूप धारिणी भजितो विंध्यवासिनी ॥५॥

ऋषीन्द्रजामिनप्रदां त्रिधास्यरूपधारिणिम्।

जले स्थले निवासिनीं  भजामि   विन्ध्यवासिनीम्।।६।।

ऋषीश्रेष्ठ कन्यका त्रिस्वरूपधारिणी

भूजले निवासिनी भजितो विंध्यवासिनी ॥६॥

विशिष्टसृष्टिकारिणीं   विशालरूपधारिणीम्।

महोदरां  विशालिनीं   भजामि   विन्ध्यवासिनीम्।।७।।

विशेष सृष्टी निर्माती प्रचंड रूपधारिणी

विशाल उदर धारिणी भजितो विंध्यवासिनी ॥७॥

प्रन्दरादिसेवितां मुरादिवंशखण्डिनीम्।

विशुद्धबुद्धिकारिणीं भजामि विन्ध्यवासिनीम्।।८।।

इंद्रादि सुर सेविती मुरादि दैत्य विनाशिनी

सुबुद्ध बुद्धीदायिनी भजितो विंध्यवासिनी ॥८॥

॥ इति श्रीविन्ध्येश्वरीस्तोत्रं सम्पूर्णम् ॥

॥ इति  निशिकान्त भावानुवादित श्री विंध्येश्वरीस्तोत्र संपूर्ण ॥

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ Believe – विश्वास आणि Trust – विश्वास… ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला पई ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ Believe – विश्वास आणि Trust – विश्वास… ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला पई ⭐

Believe-विश्वास आणि Trust -विश्वास.

दोन्ही शब्दांचा अर्थ “विश्वासच” आहे. पण तरीही दोन्ही विश्वासात अंतर आहे.

एकदा शेजारी शेजारी असलेल्या दोन उंच इमारतींच्या मधे केबल टाकून ती घट्ट बांधून व हातात मोठा बांबू घेऊन एक डोंबारी त्या केबलवरून या इमारतीवरून त्या इमारतीवर जात होता. त्याच्या खांद्यावर  त्याचा लहान मुलगा होता.

दोन इमारतींच्या मध्ये हजारो माणसे जमा झाली होती व श्वास रोखून त्याची ती जीवघेणी कसरत पहात होती.

हलणारी केबल, जोरदार वारा, स्वतःचा आणि मुलाचा जीव पणाला लावून त्याने ते अंतर पूर्ण केलं.

जमलेल्या लोकांनी उत्साहाने टाळ्या, शिट्या वाजवल्या, तोंड भरून कौतुक केले. तो इमारतीच्या खाली लोकांमधे आला. लोक त्याच्या बरोबर फोटो, सेल्फी  काढू लागले. त्याचं अभिनंदन करू लागले.

तो डोंबारी सगळ्यांना उद्देशून म्हणाला,

“मला हे पुन्हा एकदा करावसं वाटतं. तुम्हाला विश्वास वाटतो का मी हे पुन्हा करू शकेन?”

सगळी माणसं एक आवाजात म्हणाली, “हो, तू हे परत एकदा नक्कीच करू शकतोस.”

डोंबारी म्हणाला “तुम्हाला विश्वास आहे ना, मी हे परत करू शकेन?”

पुन्हा सगळे ओरडले, “हो हो.आम्हाला विश्वास आहे. तू पुन्हा हे नक्कीच करू शकशील.”

“तुम्हाला नक्की विश्वास आहे ना?”

“हो. तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तू खात्रीने करू शकशील.”

डोंबारी म्हणाला “ठीक आहे. तुमच्यापैकी कोणीतरी मला तुमचा मुलगा द्या.  त्याला खांद्यावर  घेऊन मी या केबलवरून चालतो.”

जमावामध्ये एकदम शांतता पसरली. सगळे चिडीचूप झाले. डोंबारी म्हणाला, “काय झाले. घाबरलात का?”

“अरे!आताच तर तुम्ही म्हणालात ना, की माझ्यावर पूर्ण विश्वास आहे म्हणून?”

तात्पर्य :- जमावाने जो डोंबाऱ्यावर दाखवलेला विश्वास हा Belief आहे, Trust  नाही.

तसेच हाच भ्रम सगळ्यांना आहे, परमेश्वर आहे. पण परमेश्वराच्या सत्तेवर विश्वास नाही.

You only believe in God, But you don’t trust him.

परमेश्वरावर विश्वास असेल तर चिंता आणि ताण – तणाव कशाला हवेत.

त्याच्या नामाने दगड तरले तर आपण का नाही तरणार?

परमेश्वरावर ठाम विश्वास बसण्यासाठी आपण चमत्काराची वाट पाहत बसतो. पण खरा चमत्कार हाच आहे की रोज तो आपल्याला नवीन करकरीत कोरा दिवस देतो.आपल्या गत चुकांमधून शिकण्यासाठी आणि नवीन क्षितिजे पादाक्रांत करण्यासाठी.

आपल्या जीवनात प्रत्येक क्षणाला आपला परमेश्वर आपल्या सोबत असतोच आणि आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाची खबर त्याला असतेच, हा विश्वास असला तर आपल्यासाठी जगातील कोणतीही गोष्ट अशक्य नाही.

संग्राहिका : सौ. उज्ज्वला पई

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासिनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक 33 – भाग-3 – सुंदर, शालीन आणि अभिमानी जपान ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक 33 – भाग- 3 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ सुंदर, शालीन आणि अभिमानी जपान ✈️

रात्री अकराच्या बसने टोकियोला जायचे होते. आमचा जपान रेल्वे पास या बससाठी चालत होता. तीस जणांची झोपायची सोय असलेली डबल डेकर मोठी बस होती. बसण्याच्या जागेचे आरामदायी झोपण्याच्या जागेत रूपांतर केले आणि छान झोपून गेलो. पहाटे साडेपाच-सहाला जाग आली. सहज बाहेर पाहिले. अरे व्वा! बसमधून दूरवर फुजियामा पर्वत दिसत होता. निळसर राखाडी रंगाच्या त्या भव्य पर्वताच्या माथ्यावर बर्फाचा मुकुट चकाकत होता. सारे खूश झाले. ट्रॅफिक जॅममुळे टोक्यो स्टेशनला पोहोचायला नऊ वाजले. स्टेशनवरच सारे आवरले. आज आम्ही फुजियामाला जाणार होतो व उद्याची टोक्यो दर्शनची तिकीटं काढली होती. आजची रात्र आम्ही टोक्योचे एक उपनगर असलेल्या कावासकी इथे सीमा आणि संदीप लेले यांच्याकडे राहणार होतो. त्यामुळे जवळ थोडे सामान होते.

फुजियामाला जाताना हे सामान नाचवायला नको म्हणून आम्ही ते टोक्यो स्टेशनवरील लॉकरमध्ये ठेवायचे ठरविले. जपानमध्ये सर्व रेल्वे स्टेशन्सवर लॉकर्सची व्यवस्था आहे. आपल्या सामानाच्या साइजप्रमाणे लॉकर निवडून त्यात सामान ठेवायचे. किती तासांचे किती भाडे हे त्यावर लिहिलेले असते. सामान ठेवून लॉकरला असलेली किल्ली लावून ती किल्ली आपल्याजवळच ठेवायची. मात्र सामान परत घेताना योग्य ते भाडे त्या लॉकरला असलेल्या होलमधून टाकल्याशिवाय लॉकर उघडत नाही. तिथल्या एका लॉकरमध्ये सामान ठेवून आम्ही फुजियामाला जाण्यासाठी निघालो. तीन-चार गाड्या बदलून, अनेकांना विचारत शेवटी माथेरानसारख्या छोट्या गाडीने कावागुचिकोला पोहोचलो.फुजियामा  इथे असलेल्या पाच लेक्सपैकी हा एक लेक आहे. तिथून फुजियामाचे सुंदर दर्शन होत होते. हळूहळू थंडी, बोचरे वारे वाढू लागले. तेव्हा परतीचा तसाच प्रवास करून टोक्यो स्टेशनवर आलो.

जगातले सर्वात वर्दळीचे स्टेशन म्हणून टोक्यो ओळखले जाते. जमिनीखाली आणि जमिनीवर  पाच-सहा मजले अवाढव्य रेल्वे स्टेशन्सचे जाळे पसरले आहे. दररोज लक्षावधी लोक या स्टेशन मधून जा- ये करत असतात. त्या प्रचंड वाहत्या गर्दीत आम्ही हरवल्यासारखे झालो. आम्ही ज्या प्लॅटफॉर्मवर उतरलो तिथून सकाळी आम्ही ज्या दिशेच्या गेटजवळ सामान ठेवले होते, तो लॉकर काही सापडेना. त्यात भाषेची मोठीच पंचाईत. सगळेजण त्या गर्दीत लॉकर शोधत बसायला नको म्हणून आम्ही तिघे- चौघे एका ठिकाणी बसून राहिलो. लॉकर शोधायला गेलेल्या दोघा जणांना लॉकर सापडून परत आम्ही सर्व एकमेकांना सापडण्यात चांगले दोन तास गेले.

ट्रीपचा शेवटचा दिवस टोक्योदर्शनचा होता. हवामानाच्या अंदाजाप्रमाणे पाऊस पडतच होता .आयफेलटॉवरसारख्या असणाऱ्या टोक्यो टॉवरवरून शहराचे दर्शन घडले. जपानचा पारंपारिक चहा समारंभ पाहिला. तो हिरव्या रंगाचा, भातुकलीच्या कपांमधून दिलेला कोमट चहा आपल्याला आवडत नाही पण सुंदर किमोनोमधल्या त्या बाहुल्यांसारख्या स्त्रिया, चहा बनविण्याचे हळुवार सोपस्कार वगैरे पाहायला गंमत वाटत होती. नंतर एम्परर गार्डनमध्ये थोडे फिरून जेवायला गेलो. एका मोठ्या हॉटेलात सर्वांसाठी बार्बेक्यू पद्धतीचे जेवण होते. टेबलावर प्रत्येकाजवळ छोटीशी शेगडी ठेवलेली होती. त्यावर कांदा, बटाटा, वांगी, रताळे, मशरूम, लाल भोपळा, लाल मिरची असे सारे गरम गरम भाजून दिलेले होते. जोडीला भात, हिरवा चहा, रताळ्याचा गोड पदार्थ असे आमचे शाकाहारी जेवण होते. परंतु काड्यांनी जेवायची कसरत काही जमली नाही. मग काटे- चमचेच वापरले. त्या दिवशी त्या हॉटेलात बरीच लग्नं होती. ती पाहायला मिळाली. लग्नाच्या वऱ्हाडात उंची किमोनो घालून जपानी गजगामिनी मिरवत होत्या.

आता पाऊस थांबला होता. सुमिडा नदीतून क्रूझने सहल करायची होती. बसमधून तिथे जाताना टोक्योचा आपल्या फोर्टसारखा विभाग दिसला. तेरा ब्रिजच्या खालून आमची क्रूज गेली. ब्रिजवरून कुठे रेल्वे तर कुठे रस्ते होते. इकडून तिकडे सतत वाहतूक चालू होती. बोटीतून उतरल्यावर दोन्ही बाजूंच्या खरेदीच्या दुकानांवर एक नजर टाकून नंतर पॅगोडा पाहिला. टोक्योदर्शनच्या बसमधून उतरण्यापूर्वी गाइडला “आरीगाटो गोसाईमास” म्हटले. म्हणजे जपानी भाषेत त्याचे आभार मानले.

जपानी लोक हे अत्यंत मेहनती, शिस्तप्रिय आणि शांत वृत्तीचे आहेत. आपला देश, आपली संस्कृती, आपली भाषा याचा त्यांना विलक्षण अभिमान आहे. हा देश सतत भूकंपाच्या छायेत वावरत असला तरी कुठेही भीतीचा लवलेश नसतो. सर्व नवीन बांधकामे भूकंपाला तोंड देण्यास योग्य अशीच बांधलेली आहेत. नियमाप्रमाणे प्रत्येक घरामध्ये दरवाज्याजवळ पिण्याच्या पाण्याच्या दोन बाटल्या, बॅटरी, मेणबत्त्या, काड्यापेटी, एका वेळचे घरातील सर्वांचे कपडे व थोडी बिस्किट्स, चॉकलेट्स अशी जय्यत तयारी एका बॅगमध्ये करून ठेवलेली असते. जपानमधील राहणीमान खूपच खर्चिक आहे. इथे सगळीकडे झाडे, फुले आहेत पण सारी झाडे, फुले अगदी सैनिकी शिस्तीत वाढल्याप्रमाणे आहेत. नैसर्गिकरित्या वाढलेले, फळाफुलांनी डवरलेले असे एकही झाड आढळत नाही. जपानी लोक ठरवतील तसेच झाडांनी वाढायचे, फुलांनी फुलायचे, बोन्सायरुपाने  दिवाणखाने सजवायचे! तरुण पिढीवर अमेरिकन जीवनशैलीचा फार मोठा प्रभाव आहे. व्यक्तिस्वातंत्र्याचं वेड व प्रचंड महागाई यामुळे लग्न, मुलंबाळं, एकत्र कुटुंबपद्धती हळूहळू कमी होत आहे. जपानमध्ये अतिवृद्धांची संख्या वाढते आहे तर लहान मुलांची संख्या कमी होत आहे. कोणी सांगावे, उद्या जपानी शास्त्रज्ञ यावरही काही उपाय शोधून काढतील.

आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. पहाटेच्या थोड्याशा पावसाळी धुक्यातून उगवत्या सूर्यदेवाचे लांबलचक किरणांचे हात आम्हाला निरोप देत होते. डोळ्यांपुढे दिसत होते–

  प्रशांत महासागराच्या हिंदोळ्यावर झुलणारे,

  पाचूच्या कंठ्यामधल्या रत्नासारखे शोभणारे,

   आकाराने लहान, कर्तृत्वाने महान,

   फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून उभे राहिलेले,

   अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या गरुडझेपेने,

   आकाशाला कवेत घेणारे,

    एक स्वच्छ, सुंदर ,शालीन राष्ट्र, जपान!

भाग ३ व जपान समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ मनोज साहित्य # 71 – गीत – भगत सिंह सुखदेव जी राजगुरू… ☆ श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज” ☆

श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज”

संस्कारधानी के सुप्रसिद्ध एवं सजग अग्रज साहित्यकार श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज” जी  के साप्ताहिक स्तम्भ  “मनोज साहित्य ” में आज प्रस्तुत है  गीत “भगत सिंह सुखदेव जी राजगुरू…”। आप प्रत्येक मंगलवार को आपकी भावप्रवण रचनाएँ आत्मसात कर सकेंगे।

✍ मनोज साहित्य # 71 – गीत – भगत सिंह सुखदेव जी राजगुरू… ☆

 भगतसिंह सुखदेव जी, राजगुरू हैं शान ।

फाँसी में हँसते चढ़े, प्राण किया बलिदान ।।

 

            भारत माँ के लाड़लों, को हम करें प्रणाम ।

            बलिदानों से देश ने, पाया आज मुकाम ।।

 

ब्रिटिश जजों ने लिख दिया, फॉंसी का आदेश ।

तब तीनों थे हँस रहे, माथे शिकन न क्लेश ।।

 

            कह कर वंदे मातरम, नाच उठे थे लाल ।

            इक दूजे के गले लग, झूमे थे दे ताल ।।

 

कलम तोड़कर जज उन्हें, देख रहे थे घूर ।

सजा मौत की सुन सभी, नाचे थे भरपूर ।।

 

            कोर्ट देखता रह गया, उत्सव जैसा हाल ।

            कैदी तो सुन कर सजा, हो जाते बेहाल ।।

 

हतप्रभ न्यायाधीघ थे, देख मौत नजदीक ।

किस माटी के तुम बने, जो दिखते निर्भीक ।।

 

            हँस कर तीनों ने कहा, हमें देश से प्यार ।

            मातृ भूमि के वास्ते, लाखों हैं तैयार ।।

 

सुनकर उनकी बात को, सहमा जज दरबार ।

लगे देखने द्वार में, कम हैं पहरेदार ।।

 

            देश प्रेम की वह छटा, तनमन भरी उमंग ।

            मस्ती में वे झूमकर, बजा रहे थे चंग ।।

 

उनको निर्भय देखकर, जनता हुयी निहाल।

बच्चे बूढ़े जग गये, तब आया भूचाल ।।

 

            फंदे को फिर चूमकर, डाल गले में हार ।

            जिन्दा आँखें रो पड़ीं, दुश्मन भी बेजार ।।

 

सत्ता भय से ग्रस्त थी, मुलजिम बना वजीर ।

अंधकार की आड़ में, खाक हुई तस्वीर ।।

 

क्रांति मशालें जल उठीं, उपजा था आक्रोश।

            अंग्रेजों के कृत्य से, जन-मन में था रोष ।।

 

काँप उठी सत्ता तभी, देखा जन सैलाब ।

सारी जनता जग उठी, गिन-गिन लिया हिसाब ।।

 

            सतलज की माटी कहे, नव पीढ़ी से आज ।

            याद रखो बलिदान को, कैसे मिला सुराज ।।

©  मनोज कुमार शुक्ल “मनोज”

संपर्क – 58 आशीष दीप, उत्तर मिलोनीगंज जबलपुर (मध्य प्रदेश)- 482002

मो  94258 62550

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ यात्रा संस्मरण – यायावर जगत # 01 ☆ मेरी डायरी के पन्ने से… नागालैंड… ☆ सुश्री ऋता सिंह ☆

सुश्री ऋता सिंह

संक्षिप्त परिचय

सुश्री ऋता सिंह जी शिक्षिका हैं। पिछले चालीस -पैंतालीस वर्षों से हिंदी अध्ययन कर रही हैं। हिंदी के साथ -साथ मराठी, अंग्रेज़ी ,पंजाबी तथा मातृभाषा बाँगला भाषा पर  भी अच्छी पकड़ है। पिछले सोलह वर्षों से लैंग्वेज कन्सल्टेंट ऍन्ड टीचर ट्रेनर के रूप में भी सेवा प्रदान करती आ रही हैं। बच्चों के मन में हिंदी भाषा के प्रति प्रेम निर्माण करने हेतु भाषा पर  विविध खेलों द्वारा अपनी छोटी – सी संस्था चलाती हैं। छात्रों को भाषा सीखने में आसानी हो इसलिए कई खेलों का निर्माण  किया है। आपने देश -विदेश का प्रचुर भ्रमण किया है। यात्रा वर्णन पर लेख लिखने में आनंद लेती हैं। कहानी, कविता ,संस्मरण आदि सभी क्षेत्र में लिखने में रुचि रखती हैं। हिंदी आंदोलन परिवार, पुणे द्वारा हिंदी श्री से 2021 में सम्मानित की गई हैं।

प्रकाशित पुस्तकें –

  • खेल -खेल में सीखें हिंदी ( भाग 1 से 5)
  • नानीमाँ की झोली से – सचित्र द्विभाषीय पुस्तकें (दो प्रकाशित हुईं हैं )
  • प्रतिबिंब – कविता संग्रह
  • पुरानी डायरी के फटे पन्ने – कहानी संग्रह
  • स्मृतियों की गलियों से – संस्मरण संग्रह
  • अनुभूतियाँ – कहानी संग्रह

(सुश्री ऋता सिंह जी का ई- अभिव्यक्ति में हार्दिक स्वागत। आपने हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए अपने यात्रा संस्मरणों पर आधारित आलेख साझा करना स्वीकार किया है। इसके लिए हार्दिक आभार। अब आप प्रत्येक मंगलवार, साप्ताहिक स्तम्भ -यायावर जगत के अंतर्गत सुश्री ऋता सिंह जी की यात्राओं के शिक्षाप्रद एवं रोचक संस्मरण  आत्मसात कर सकेंगे। इस श्रृंखला में प्रस्तुत है आपका यात्रा संस्मरण – मेरी डायरी के पन्ने से…नागालैंड… .)

☆ साप्ताहिक स्तम्भ –यात्रा संस्मरण – यायावर जगत # 01 ☆  

? मेरी डायरी के पन्ने से… नागालैंड…  – ?

भारत तीर्थस्थलों का देश है। साथ ही अनेक राज्य अपनी संस्कृति, त्योहार खान-पान की विविधता और  विशेषता के लिए भी प्रसिद्ध है। धर्म,जाति,भाषा,आहार सब कुछ अलग अलग होने के बावजूद भी संपूर्ण देश एक अदृश्य सूत्र से बँधा है और वह है भारतीयता।

इसी सूत्र और रंगीन भूमि के त्योहारों का आनंद लेने इस वर्ष 2022 में हमारे परिवार ने नागालैंड की यात्रा का निर्णय लिया।

अब संपूर्ण भारत में यातायात के साधन भरपूर उपलब्ध हैं। पर्यटक तो अब नियमित रूप से विमान, रेलगाड़ी तथा  अपनी मोटरगाड़ी द्वारा भी यात्रा करते दिखाई देते हैं। हमारे महामार्ग अत्यंत सुलभ, सुंदर और सुविधाजनक बनाए गए हैं। सभी राज्य अब महामार्गों द्वारा जुड़े हुए भी हैं।

नागालैंड में प्रतिवर्ष हॉर्नबिल फेस्टीवल मनाया जाता है। यह त्योहार प्रति वर्ष 1 दिसंबर से 10 दिसंबर तक मनाया जाता है। इस स्थान में सत्रह आदिवासी (ट्राइबल कम्यूनिटी)  वास करते हैं। इस भूभाग पर हॉर्नबिल नामक पक्षियों की प्रजाति बहुसंख्या में पाए जाते थे। यहाँ के नागा जाति के आदिवासी अपने सिर पर हॉर्नबिल पक्षी के पंख लगाते हैं। इन पंखों को प्राप्त करने की उत्कट इच्छा ने आज इस सुंदर पक्षी की प्रजाति को प्रायः विलुप्त होने के कगार पर लाकर खड़ा कर दिया।

सन 2000 में यहाँ पर पहली बार सभी आदिवासी प्रजातियाँ एकत्रित हुईं और पहली ही बार फेस्टीवल मनाया गया। इसका मूल उद्देश्य था नागा आदिवासियों की आपसी मतभेदों को दूर करना, उनकी  संस्कृति से राष्ट्र के अन्य प्रदेशों को परिचित कराना तथा देश की मुख्य धारा से उन्हें जोड़ना। इस उत्सव ने न केवल नागा जन जातियों की संस्कृति को पुनर्जीवित किया बल्कि नागालैंड की सुंदरता से पूरे संसार को परिचित भी कराया।

नागालैंड भारत के उत्तरी -पूर्व राज्यों में से एक है। यहाँ के सभी राज्य सदा से ही उपेक्षित रहे और भारत के बाकी राज्यों से कुछ हद तक कटे भी रहे। सन 1962 में  इसे अलग राज्य का स्टेटस मिला। फिर भी राज्य उपेक्षित ही रहा।

सन 2000 से हॉर्नबिल फेस्टीवल देखने के लिए दर्शकों की संख्या बढ़ने लगीं तो होटल और होम स्टे की व्यवस्था भी होती रही। बड़ी संख्या में होटल खुले और विदेशों से भी यात्री इस रंगीन उत्सव का आनंद लेने आने लगे। नागावासियों का उत्साह बढ़ा,शहर स्वच्छ बनते रहे और लोगों को काम मिलने लगा। इस तरह वे अपनी पहचान बनाने लगे, भारत के मानचित्र ही नहीं संसार के मानचित्र पर उनकी चमक और पहचान बनी। बल्कि नागा आदिवासियों की संस्कृति फिर एक बार जागृत हुई।

आपको नागालैंड के निवासी भारत के अन्य राज्यों में कम ही दिखाई देंगे। वे सेल्फ शफीशियंट प्रजातियाँ तो हैं ही साथ ही उनसे बातचीत करने पर एक और बात सामने आई कि वे भारत के अन्य राज्यों में अपने अलग चेहरे,कद -काठी और भोजन आदि के कारण सहर्ष स्वीकृत नहीं हैं। यह अत्यंत दुख की बात है।

कोहीमा  नागालैंड की राजधानी है। पर यह शहर पहाड़ों से घिरा होने के कारण यहाँ पर रेलवे और हवाई अड्डे की व्यवस्था नहीं है। इस शहर से सत्तर किलोमीटर की दूरी पर दीमापुर नामक शहर है। यहाँ एक छोटा -सा हवाई अड्डा है, रेलगाड़ी की सुविधा उपलब्ध है। यह नागालैंड का सबसे बड़ा शहर है। ऑटोरिक्शा, टैक्सियाँ और प्राइवेट टैक्सियाँ भी उपलब्ध हैं। सभी पर्यटक दीमापुर तक आते हैं और आगे की यात्रा टैक्सियों द्वारा पूरी करते हैं।

दीमापुर शहर की भीतरी सड़कें खास ठीक नहीं क्योंकि उपेक्षित राज्य होने के कारण रास्तों की मरम्मत संभवतः कभी की ही न गई होगी। लेकिन हॉर्नबिल फेस्टीवल के चलते दीमापुर से कोहीमा तक का रास्ता बहुत ही सुंदर और शानदार बनाया गया है जिस कारण डेढ़ -दो घंटों में टैक्सी द्वारा कोहीमा पहुँचा जा सकता है। यहाँ सड़कों के किनारे लोकल फलों की दुकानें दिखाई देती हैं। मीठे और सस्ते अनन्नास का हमने भरपूर स्वाद लिया। यहाँ लंबे -लंबे अनन्नास काटकर, मसाले लगाकर एक पतली बाँस की सलाख  उसमें ठूँस देते हैं जिससे इसे खाने में सुविधा हो जाती है। हमने बचपन को याद करते हुए इसका आनंद लिया।

हॉर्नबिल फेस्टीवल  कोहिमा में आयोजित किया जाता है। कोहिमा से 12 किलोमीटर की दूरी पर किसामा नामक छोटा -सा कस्बा है जहाँ पिछले 22 वर्षों से उत्सवों का उत्सव हॉर्नबिल फेस्टीवल मनाया जाता  आ रहा है।

यहाँ की आबादी  ईसाई धर्म को मानती है। 2022 का  वर्ष इस दृष्टि से भी महत्वपूर्ण रहा कि इस राज्य में  ईसाई धर्म की नींव रखे 150 वर्ष पूरे हुए हैं। इसका भी हर्षोल्लास सुसज्जित शहर को देखकर लगाया जा सकता है। क्रिसमस इनका सबसे बड़ा त्योहार है।

हर भारतीय को नागालैंड आने से पूर्व ILP ( Internal line of permit) लेने की अनिवार्यता होती है। यह ऑनलाइन उपलब्ध है। अगर आप इस उत्सव का हिस्सा बनना चाहते हैं तो जुलाई के महीने में ही बुकिंग कर लें कारण ऑक्तूबर माह से सभी होटल और होम स्टे बुक हो जाते हैं। हमने सितंबर में बुकिंग की थी और हमें ऊँची कीमत भरनी पड़ी। पाँच हज़ार वाले कमरे पंद्रह हज़ार में बुक होते हैं। इससे बचा जा सकता है।

हमारी यात्रा पुणे से प्रारंभ हुई,दिल्ली होते हुए  हम दीमापुर पहुँचे। लोग अपने शहरों से गुवाहाटी पहुँचकर भी रेल द्वारा दीमापुर पहुँच सकते हैं।

 दीमापुर लकड़ी और बेंत से बननेवाले वस्तुओं के कुटीर उद्योगों का शहर  है जो अपने आप में देखने लायक स्थान है। इसके आसपास कुछ गाँव भी हैं। इन गाँवों की महिलाएँ घर-घर में  सुंदर, आकर्षक, टिकाऊ विविध प्रकार की टोकरियाँ, फल रखने के बास्केट और हाथ करघे पर कई प्रकार की वस्तुएँ बुनती हैं। इन्हें बनाने में बहुत समय लगता है। यह इस क्षेत्र का सबसे बड़ा उद्योग है। हॉर्नबिल फेस्टीवल के दौरान बड़ी मात्रा में इन वस्तुओं और बेंत के फर्नीचर आदि की बिक्री होती है। हम इन्हीं गाँवों को देखना चाहते थे। हम जब गाँवों में पहुँचे तो तैयार माल हॉर्नबिल फेस्टीवल के लिए पैक किए जा रहे थे।

दीमापुर के बाज़ार में  घूमने पर ही  यहाँ के लोगों के  खानपान के तौर – तरीकों से हम परिचित हुए। नागा जाति के लोग दुबले-पतले तथा कद के छोटे होते हैं। शारीरिक श्रम तथा जलवायु के कारण हाई प्रोटीन डायट इनकी आवश्यकता होती है। इस कारण बाज़ार में आपको कई प्रकार के जीवित कीड़े, इल्लियाँ,रेशम कीड़े, मछलियाँ, मेंढक, टिड्डे, घोंघें,  केंचुएँ,आदि दिखाई देंगे। साथ ही यहाँ के निवासी सुअर तथा कुत्ते के माँस का भी बड़ी मात्रा में सेवन करते हैं। इसे डेलिकेसी कहते हैं। कुत्ते का माँस होटलों में नहीं दिए जाते परंतु सुअर का माँस बहुप्रचलित है। यह उनका भोजन है अतः उसका सम्मान करना हम सबका धर्म है।

हम दो सखियाँ शाकाहारी हैं, हमें शाकाहारी भोजन आसानी से ही प्राप्त हुए हैं। लोग अफवाह फैलाते हैं कि शाकाहारी भोजन की यहाँ व्यवस्था नहीं है। यह ग़लत है। हमें शाक सब्ज़ियाँ और कई प्रकार के फल बाज़ार में दिखाई  दिए। होटलों ने उत्तम शाकाहारी भोजन, सूप,सलाद आदि की व्यवस्था की और हम दोनों सखियों ने इसका भरपूर आनंद लिया।

यहाँ के लोग भात खाना पसंद करते हैं। भोजन में मसाले के रूप में कई जड़ी-बूटियों तथा शाक का उपयोग करते हैं। यहाँ शराब की दुकानें नहीं हैं। यहाँ के लोग घर -घर में राइस बीयर बनाते हैं। यह उनकी बहुप्रचलित मदिरा है।

तीन दिन दीमापुर में रहने के बाद हम लोगों ने खोनोमा होते हुए कोहिमा जाने का फैसला लिया।

खोनोमा एक छोटा –  सा गाँव है जिसे  एशिया का ग्रीनेस्ट विलेज कहा जाता है। वास्तव में यहाँ रहनेवाले गाँव वासी इस बात से वाकिफ़ हैं और वे अपने गाँव को बहुत साफ़ -सुथरा रखते हैं। जगह -जगह पर बेंत से बने कूड़ेदान के रूप में  टोकरियाँ रखी दिखाई दी। इस गाँव को देखने के लिए बड़ी संख्या में लोग आते हैं जिस कारण यहाँ एक गाइड सेंटर भी खोला गया है, जहाँ पर प्रति सदस्य दो सौ रुपये देकर पैंतालीस मिनट में पूरा गाँव चलकर दिखाए जाने की व्यवस्था की गई है। गाँव में तीन हज़ार लोग रहते हैं। सभी ईसाई धर्म को मानते हैं। यह अंग्रेज़ों की देन है। आदिवासियों को वे अपने धर्म का जामा पहना कर गए और वे अपनी प्राकृतिक पूजा-पाठ से विमुख हो गए। खैर यहाँ धर्मों पर विवाद या झगड़े नहीं। यहाँ एक विशाल गिरिजाघर है और सभी उत्साह से क्रिसमस मनाते हैं। इस छोटे से गाँव में छह पाठशालाएँ हैं। शाम होते होते चार बजे बादल नीचे उतर आए और हरियाली से भरे जंगलों के पेड़ पौधों को ओस की बूँदों से सजाने लगे। यहाँ चार साढ़े चार तक अंधकार हो जाता है। ठीक उसी तरह यहाँ प्रातः भी साढ़े चार बजे सूर्यदेव दर्शन देते हैं। यहाँ से आगे हम छह किलोमीटर की दूरी पर कोहिमा पहुँचे।

कोहिमा छोटा सा शहर है, यहाँ खास दर्शनीय स्थल नहीं है। सुभाषचंद्र बोस इस शहर में कभी रहे थे और नागाओं का उन्हें साथ मिला था,इस इतिहास का वहाँ कहीं उल्लेख नहीं है। इस बात का हमें बहुत दुख हुआ। यहाँ  एक विशाल वॉर सेमिट्री है जहाँ ब्रिटिश सैनिकों के कब्र बने हुए हैं। पर्यटक इस स्थल को देखने जाते हैं। यहाँ दुकानें सात बजे तक खुल जाती है और चार बजे तक सब बंद भी कर दिए जाते हैं।

अर्ली टू बेड,अर्ली टू राइज़ यहाँ का मूल मंत्र है। लोग स्वस्थ,परिश्रमी तथा हँसमुख हैं।

हमें पूरे पर्यटन के दौरान एक भी भिखारी नज़र नहीं आया। यह एक बहुत बड़ी बात है। यहाँ आज भी संयुक्त परिवार की प्रथा है। घर के बड़े बूढ़ों का सम्मान सभी करते हैं। बुजुर्ग अपने घर के छोटे बच्चों के साथ काफी समय व्यतीत करते हैं।

हॉर्नबिल फेस्टीवल इस राज्य का आकर्षण बिंदु है, सभी वस्तुएँ बहुत कीमती हो जाती हैं। पाँच -छह किलोमीटर की यात्रा के लिए पाँचसौ रुपये लोकल टैक्सियाँ लेती हैं।

यहाँ मेरू,उबेर या ओला टैक्सियाँ नहीं चलतीं बल्कि काली-पीली टैक्सियाँ शेयर में चलती हैं। ये सुविधा सर्वत्र उपलब्ध है। यही लोकल ट्रान्सपोर्ट है। सड़कें पहाड़ी और संकरी हैं जिस कारण छोटी गाड़ियाँ बहुसंख्यक हैं। यहाँ गाड़ी पर कैरियर लगाने की इज़ाज़त नहीं है।

हॉर्नबिल फेस्टीवल

1 दिसंबर से यह पर्व प्रारंभ हुआ। पर्व प्रारंभ होने के कई माह पूर्व तैयारी शुरू होती है। यहाँ हर नागा आदिवासी अपने तौर-तरीके और खानपान की व्यवस्था के साथ अपने आवास की व्यवस्था का रेप्लिका प्रस्तुत करता है इसे मोरॉन्ग कहते हैं। इस वर्ष 17 प्रजातियों में से छह प्रजातियों ने हिस्सा नहीं लिया है। ये छह प्रजातियाँ मुख्य नागालैंड राज्य से अलग होने की माँग रखते हैं।

किसामा में पहुँचकर पर्यटक नागा जातियों के मोरॉन्ग पर जाकर समय व्यतीत कर सकते हैं। उनके साथ बातचीत कर तस्वीरें खींच सकते हैं। उनके भोजन का आनंद ले सकते हैं। वस्त्र तथा आभूषण भी खरीद सकते हैं। नागा अत्यंत मिलनसार जाति हैं। वे पर्यटकों के साथ समय बिताना भी पसंद करते हैं।

इस वर्ष देश के उपराष्ट्रपति श्री धनकड़ जी सपत्नीक इस उत्सव के लिए उपस्थित हुए। शाम को चार बजे कार्यक्रम प्रारंभ हुआ। विशाल मैदान के एक तरफ मंच बना हुआ है तथा तीनों ओर पर्यटकों के बैठने की सुविधाजनक व्यवस्था है। स्वच्छ शौचालय की भी व्यवस्था है। ऑस्ट्रेलिया, फ्रांस और इंग्लैंड के राजनीतिक उच्च पदाधिकारी तथा राज्यपाल इस वर्ष आमंत्रित थे। शहर के प्रमुख चर्च के मुख्य पादरी ने सभी को शुभकामनाएँ दी तथा प्रार्थना से कार्यक्रम प्रारंभ हुआ। नागालैंड के मुख्यमंत्री, पर्यटन विभाग के मंत्री, मान्यवर धनकड़ जी तथा विदेश से आए आमंत्रित सदस्यों ने अपने विचार प्रकट किए।

1 तारीख को कुछ ही नृत्य प्रस्तुत किए गए। एक नागा छात्रा ने गिटार पर राष्ट्रगीत बजाकर सबको मंत्र मुग्ध कर दिया।

2 तारीख सुबह 10 बजे से दर्शक एकत्रित होने लगे। 11.30 बजे तक विविध नागा प्रजातियों ने अपने नृत्य प्रदर्शन किए। फिर मोरॉन्ग दर्शन तथा नागा भोजन के लिए 1.30 बजे तक समय दिया गया। फिर कुछ नृत्य प्रदर्शन हुए और फिर शाम को 3बजे से अंग्रेज़ी और बॉलीवुड संगीत पर वहाँ के निवासियों ने नृत्य प्रदर्शित किए। इस तरह दस दिन कार्यक्रम चलते रहे।

नागाप्रजातियों के वस्त्र अत्यंत रंगीन होते हैं। लाल, काला और सफेद मूल रंग हैं। इन कपड़ों की बुनाई भी अलग तरीके से होती है। हर प्रजाति के स्त्री -पुरुष के सिर पर मुकुट जैसा पहना जाता है इसे हेडगीयर कहते हैं। हरेक के अस्त्र-शस्त्र अलग होते हैं। उनके गीत और उनकी पुकार भी अलग होती है। वे नृत्य प्रस्तुत करते समय खूब आवाज़ करते हुए आते हैं। वे नंगे पैर चलते हैं तथा पुरुषों का ऊर्ध्वांग वस्त्रहीन होता है। स्त्री -पुरुष के वस्त्र घुटने तक ही होते हैं। कुछ प्रजातियाँ अपने पैरों पर पेंटिंग करते हैं। सभी खूब आभूषण पहनते हैं।

हर प्रजाति अत्यंत अनुशासित दिखाई देती है।

प्रतिदिन जो नृत्य प्रस्तुत किए गए उनमें उनके जीवन के विविध पहलुओं को दर्शाया गया।

फसल काटे जाने, खलिहान में रखे जाने की कथा नृत्य द्वारा प्रस्तुत की गई।

नवविवाहित दंपत्ति विवाह में आए मेहमानों को उपहार देकर विदा करते हैं इस प्रचलन को नृत्य के रूप में प्रस्तुत किया गया।

अपने अस्त्र-शस्त्र का प्रयोग युद्धाभ्यास में किस तरह उपयोग में लाया जाता था तथा वॉर क्राय कैसी ध्वनि होती थी यह भी दर्शाया गया। कुल मिलाकर यह आनंददायी उत्सव रहा है।

आज नागालैंड के आदिवासी शिक्षित हैं, वे अलग अलग जगह पर नौकरी करते हैं। इसकारण अलग -अलग प्रकार के नृत्य के लिए अलग अलग अकादमी बनी हुई हैं जहाँ आज के छात्र-छात्राएँ नृत्य सीखने जाते हैं।

यहाँ की लिखित भाषा अंग्रेज़ी है। बाकी सबकी बोलियाँ अलग हैं। यहाँ के निवासी ऊँची आवाज़ में बात नहीं करते। पर्यटकों का सम्मान करते हैं तथा स्वभाव से अत्यंत मिलनसार होते हैं।

हमारी आगे आसाम और मेघालय की यात्रा तय थी इसलिए तीन दिन हम दीमापुर में रहे फिर तीन दिन हमने हॉर्नबिल फेस्टीवल का आनंद लिया और फिर अगली यात्रा के लिए रवाना हुए। अगली यात्रा काजीरंगा, शीलाँग, चेरापूंजी आदि स्थानों  की ओर थी। अतः हम पुनः दीमापुर लौट आए। एक रात रहकर अगली यात्रा प्रारंभ की।

© सुश्री ऋता सिंह

फोन नं 9822188517

ईमेल आई डी – ritanani [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – परिवर्तन ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )

? संजय दृष्टि – परिवर्तन ??

परम सत्य…,

शाश्वत सत्य…,

अंतिम सत्य…,

अपना पांडित्य

अपने को छलता रहा,

सारे विशेषण उदर में लिए

सत्य अपनी राह चलता रहा..!

© संजय भारद्वाज 

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

मर्यादापुरुषोत्तम श्रीराम को समर्पित आपदां अपहर्तारं साधना गुरुवार दि. 9 मार्च से श्रीरामनवमी अर्थात 30 मार्च तक चलेगी।

💥 इसमें श्रीरामरक्षास्तोत्रम् का पाठ होगा, साथ ही गोस्वामी तुलसीदास जी रचित श्रीराम स्तुति भी। आत्म-परिष्कार और ध्यानसाधना तो साथ चलेंगी ही।💥

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ विवेक साहित्य # 202 ☆ आलेख – नवाचार… — ☆ श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ☆

(प्रतिष्ठित साहित्यकार श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ जी के साप्ताहिक स्तम्भ – “विवेक साहित्य ”  में हम श्री विवेक जी की चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाने का प्रयास करते हैं। श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र जी, मुख्यअभियंता सिविल  (म प्र पूर्व क्षेत्र विद्युत् वितरण कंपनी , जबलपुर ) से सेवानिवृत्त हैं। तकनीकी पृष्ठभूमि के साथ ही उन्हें साहित्यिक अभिरुचि विरासत में मिली है। आपको वैचारिक व सामाजिक लेखन हेतु अनेक पुरस्कारो से सम्मानित किया जा चुका है।आज प्रस्तुत है एक विचारणीय आलेख – नवाचार …

☆ साप्ताहिक स्तम्भ – विवेक सहित्य # 202 ☆  

? आलेख – नवाचार…  – ?

https://www.ieindia.org इंस्टिट्यूशन आफ इंजीनियर्स इंडिया देश की 100 वर्षो से पुरानी संस्था है । यह प्राइवेट तथा शासकीय विभिन्न विभागों , इंजीनियरिंग शिक्षा की संस्थाओं, इंजीनियरिंग की सारी फेकल्टीज के समस्त इंजीनियर्स का एक समग्र प्लेटफार्म है । जो विश्व व्यापी गतिविधियां संचालित करता है । नालेज अपडेट , सेमिनार आयोजन , शोध जर्नल्स का प्रकाशन , इंजीनियर्स को समाज से जोड़ने वाले अनेक आयोजन हेतु पहचाना जाता है । यही नहीं स्टूडेंट्स चैप्टर के जरिए अध्ययनरत भावी इंजीनियर्स के लिए भी संस्था निरंतर अनेक आयोजन करती रहती है ।

इंस्टिट्यूशन सदैव से नवाचारी रही है । लोकतांत्रिक प्रणाली से प्रति वर्ष चुने गए प्रतिनिधि संस्था का संचालन करते हैं। संस्था के सदस्य सारे देश में फैले हुए हैं अतः चुनाव के लिए ओ टी पी आधारित मोबाइल वोटिंग प्रणाली विकसित की गई है।

जब देश में इंजीनियरिंग कालेजों की संख्या सीमित थी तो इंस्टिट्यूशन ने बी ई के समानांतर ए एम आई ई डिग्री की दूरस्थ शिक्षा प्रणाली से परीक्षा लेने की व्यवस्था की । अब इंजीनियरिंग कालेजों की पर्याप्त संख्या के चलते AMIE में नए इनरोलमेंट तो नहीं किए जा रहे किंतु पुराने विद्यार्थियों हेतु परीक्षा में नवाचार अपनाते हुए, प्रश्नपत्र जियो लोकेशन, फेस रिक्गनीशन, ओ टी पी के तिहरे  सुरक्षा कवच के साथ आन लाइन भेजने की अद्भुत व्यवस्था की गई है ।

मुझे अपने कालेज के दिनों में इस संस्था के स्टूडेंट चैप्टर की अध्यक्षता के कार्यकाल से अब फैलो इंजीनियर्स होने तक लगातार सक्रियता से जुड़े रहने का गौरव हासिल है । मैने भोपाल स्टेट सेंटर से नवाचारी साफ्टवेयर से चुनाव में चेयरमैन बोर्ड आफ स्क्रुटिनाइजर्स और परीक्षा में केंद्र अध्यक्ष की भूमिकाओं का सफलता से संचालन किया है ।
इंस्टिट्यूशन के चुनाव तथा परीक्षा के ये दोनो साफ्टवेयर अन्य संस्थाओं के अपनाने योग्य हैं, इससे समय और धन की स्पष्ट बचत होती है ।

© विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ 

ए 233, ओल्ड मिनाल रेजीडेंसी भोपाल 462023

मोब 7000375798

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares