मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नवे वर्ष… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

सुश्री दीप्ती कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ नवे वर्ष… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

दिनदर्शिका पाहता-पाहता

वर्ष सरते  डिसेंबर सरता

 

कडु-गोड आठवणींनी

फेर धरला दाट विणींनी

सुख-दु:खाच्या या धाग्यांनी

स्मरण  होई तरल मनी

 

वर्षातील या प्रसंगातुनी

कटुतेलाही ही दूर सारुनी

आठवू गोडी माधुर्यातुनी

आप्त-स्वकिया सवे घेऊनी

 

 निरोप देऊ मोद मानुनी

 ओंजळीतल्या बकुळ फुलांनी

 गंधासह त्या धुंद होऊनी

 गतवर्षाला  मनीच स्मरुनी

 

कालचक्र हे नित स्मरुनी

स्वागतास ही सज्ज होऊनी

वाट  पाहू या अधिर होऊनी

नव वर्षाच्या रम्य क्षणी.

© सुश्री दीप्ति कुलकर्णी

कोल्हापूर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 163 ☆ मनी दाटे हूरहूर ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 163 ?

☆ मनी दाटे हूरहूर ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

 

पक्षी जाता दूरदूर

मनी दाटे हूरहूर

 

चार दिसांसाठी येती

आणि उडुनिया जाती

 

लेक सून नातवंड

स्रोत प्रीतीचे अखंड

 

दूरदेशी राहण्यास

परी नित्य आसपास

 

   असो सुखात कुठेही

मोकळ्या या दिशा दाही

 

विस्तारल्या कक्षा आणि

   घरोघर ही कहाणी

 

मायबाप मायदेशी

पिले उडती आकाशी

 

असे क्षेम  दोन्ही कडे

आनंदच चोहिकडे

 

परी वाटे हूरहूर

परतून जाता दूर

© प्रभा सोनवणे

(३ जानेवारी २०२२)

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जरा विसावू या वळणावर….! ☆ श्री राहूल लाळे ☆

श्री राहूल लाळे

परिचय

शिक्षण –

  • B.E.:Electronics & telecommunications.
  • M.Sc.: Engineering Business Management.
  • इंग्लंडमधील  University of Warwik  विद्यापीठाचे सुवर्णपदक प्राप्त.

संप्रति –

  • भारत फोर्ज, पुणे येथे असोसिएटेड व्हाईस प्रेसिडेंट येथे कार्यरत.
  • भारत फोर्जच्या Machined component division चे  Head of Maintenance.
  • भारत फोर्ज तर्फे अनेक सेमिनार मध्ये प्रतिनिधित्व.
  • Association of Maintenance Management & Reliability forum चे क्रियाशील सभासद.
  • तसेच Corporate social responsibility अंतर्गत चालवल्या जाणा-या वृद्धाश्रमाशी निगडीत.
  • रोटेरियन, पुणे रोटरी क्लब.

अन्य – संगीत, गायन, वाचन, लेखन, काव्य, खेळ, पर्यटन, गिर्यारोहण अशा विविध कलांमध्ये रूची  आणि सहभाग .

?  विविधा ?

☆ जरा विसावू या वळणावर….! ☆ श्री राहूल लाळे ☆ 

लहानपणापासून…… रेडिओवर…”भले बुरे जे घडून गेले… विसरुनी जाऊ सारे क्षणभर”… हे गाणं अनेकदा कानावर पडत आलंय…!

जेव्हांही हे गाणं ऐकतो ..हळूहळू ते गाणं कानात झिरपतं आणि ऐकत रहावसं वाटतं…… अर्थपूर्ण कडवे…सुरेख चाल…! तेंव्हापासुन collection मधलं हे ही एक नितांत आवडीचं गाणं…!

खरंच आहे…आयुष्यात किती तरी वळणे येतात… कधी संकटातून.. वेदनेतून…कधी आनंदातून… ही वळणं येतातच येतात.. मग ते वळण कौटुंबिक स्तरातील असो अथवा नात्या समाजातलं, मित्रपरिवार असो… किंवा कामाच्या ऑफिसच्या ठिकाणी…! अगदी शाळा, कॉलेज, शैक्षणिक वयातलं सुद्धा… पुढचा प्रवास बदलणारा असतो… हेच वळण जे निर्विकार असतं.. एक वाट संपुन दुसरं सुरू होणार असल्याचं एक अंतराळ…अवकाश दाखवणारं असतं…! भलं बुरं.. घडामोडी घडून गेलेल्या असतात नि त्यामधला हा विसावा असतो …क्षणिक या वळणावर…!

खुप उन्हांनं बेजार झाल्यावर जसं पाऊस पडण्यापूर्वीचं आभाळ तयार होतं किंवा खूप पाऊस पडून कंटाळवाणं झाल्यावर पावसाने उघडीप दिल्यानंतर जसं स्वच्छ ऊन पडतं ना अगदी तसं..!

ह्याच वळणावर जरा आयुष्य संथ झालेलं असतं… मनाला वाटतं की घडामोडींना पूर्णविराम मिळालाय पण वास्तवात तो स्वल्पविराम असतो…… जसं एक वाक्य संपत असतं नी दुसरं वाक्य सुरू होण्याच्या बेतात असतं  तसंच जणू काही…!

पान उलटणार असतं नि माहिती नसतं पुढच्या पानावर काय ओळी लिहिल्यात ते…….! पुस्तक बंद करता येतं हो एकवेळ, पण आयुष्याचं पुस्तक शेवटच्या श्वासापर्यंत वाचावंचं लागतं…! नको असलेली पानं सोडून पुढं जाता येत नाही… अन हवी असलेली मागची पानं परत कधीतरी वाचताही येत नाहीत…! ती आपोआप पालटत असतात…! पलटवावीच लागतात…नवीन वाचावीच लागतात….! फक्त विसावा काय तेवढा आपला… बाकी वळणांचं नशिबावर सोपवुन आपण जीवन प्रवास करायचा…!

या वर्षाआधीच्या दोन वर्षांत आपण करोना – लॉक डाऊन – क्वारंटाईन यातून गेलो होतो. याच  कारणांमुळे अनेक दुःखद घटनांना सामोरेही गेलो  होतो.   आपल्या दैनंदिन आयुष्यात – कौटुंबिक, सामाजिक आणि व्यावसायिक सर्वच क्षेत्रात अनेक अडचणीं ना सामोरे गेलो होतो  – आर्थिक दृष्टया फटका बसला होता.  पण या सरत्या वर्षानं  आपल्या सर्वांच्या जीवनप्रवासात  आलेल्या बिकट वाटेतही आशेचा किरण दाखवला. – आपल्या सर्वांची काळाने जरा जास्तंच  परीक्षा घेतली. पण त्यातही आपण तावून सुलाखून बाहेर आलो आहोत.

करोनाचं सावट आता परत येईल अशा बातम्या येत आहेत, पण  न्यू नॉर्मल का काय म्हणतात त्याची आपल्याला चांगलीच सवय झाली आहे – थोडीफार ती गेली असेल तर परत ती लावायला लागेल . अनेक बंधनं  कंटाळा न करता आपल्यावर घालून घेऊन संयमाने वागायला लागेल.

अशा वेळी रजनीगंधा चित्रपटातलं मधलं माझं एक आवडतं  गाणं मला आठवतं  – “कई  बार यूं भी देखा है – ये जो मन की सीमारेखा है – मन तोडने लगता है – अनजानी आंस के पीछे … मन दौडने  लगता है “

सिनेमात गाण्याचा संदर्भ वेगळा असला तरी –  रोज हेच व्हायला पाहिजे – असंच  व्हायला हवं या मर्यादा आपणच आपल्याला घालून घेतलेल्या असतात – अनेकदा इतरांनी आपल्याला घातलेल्या असतात – त्या अनेकदा आपण पाळतो – अनेकदा त्या तोडून अमर्याद जागून आनंद घेण्याचा प्रयत्न करतो –

आता या काळात सर्व प्रतिबंधात्मक उपाय ,काळजी घेत राहून आपण आपल्यावरच घालून ठेवलेल्या कामाच्या- काही वेळेच्या आणि  इतर काही मर्यादा ओलांडून आपण नक्कीच मोकळेपणाने   आनंद घेऊ शकतो हे मात्र कळाले.

लवकरच एक आयुष्यातलं अवघड पण लक्षात राहील असं वळण संपून नवीन सुरु होईल….

आणि असंख्य अडचणी – खडतर मार्ग येऊन गेले असले तरी  सर्वच काही निराशजनक नाहीये..

सूर्योदय -सूर्यास्त चालू आहे – ऑफिसची -व्यवसायाची दैनंदिन  व्यावहारिक -कौटुंबिक अगदी सामाजिक- सांस्कृतिकही कामं चालू आहेत. प्रेम-माया , कुटुंबासाठीचा वेळ, संवेदनशीलता कल्पकता, शिकण्याची प्रोसेस,गप्पा गोष्टी , लेखन-वाचन, नाती-गोती , भक्ती, व्यायाम-विश्रांती ,आनंदित राहणं याला लॉकडाऊन, स्लो डाऊन कोण करू शकतो? –

यावर्षी अगदी संक्रांती- पाडव्यापासून गणपती – दसरा -दिवाळी पर्यंत सगळे सण  जोशात साजरे झाले

स्लो डाऊन  कायमचं राहणारं नाही आणि  ” As long as life is there, there is a hope”  याची खात्री पटली.

 मरनेवालों के लिये मरा नहीं  जाता – 

उनकी यादे जरूर  रहती है –

जीवन का सफर चालू रहता है !

शेवटी

जीवन है चलने  का नाम !

चलते रहो सुबह-ओ-शाम !!

दोन पावलं मागं सरकलो होतो …आता चार पावलं परत पुढे आलोय – रोज पुढंच जायचंय- मोठा पल्ला गाठायचाय – नक्कीच गाठू.

बरंच  काही करायचंय – अनेक वाटा शोधायच्यात –

परिस्थिती नक्कीच बदलतीय – नवीन आव्हानं सामोरी येतील – – पुढच्या वेगवान प्रवासासाठी…

रिता जरी दिन वाटे

मन भरलेले ठेवू

धीर धरून सदा

आशा जागती ठेवू

भले बुरे ते विसरुनी जाऊ

धैर्य -आनंदाने पुढे जाऊ

येणाऱ्या नववर्ष २०२3च्या हार्दिक शुभेच्छा !!

© श्री राहुल लाळे

पुणे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “Date with Dad…” लेखक – अनामिक ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहा वाघ ☆

? जीवनरंग ❤️

☆ “Date with Dad…” लेखक – अनामिक ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहा वाघ 

रविवारची आळसावलेली सकाळ. सुटीचा दिवस असल्यानं थोडासा उशिरा उठलो आणि सवयीनं मोबाइलमध्ये हरवलो. हॉलमध्ये आलो. तिथं रोजच्याप्रमाणे नाना पेपर वाचत बसलेले. मला पाहून त्यांनी पेपर पुढे केला. 

“ तुमचं वाचून होऊ द्या. मी नंतर वाचतो. ” नाना पुन्हा पेपरमध्ये हरवले. काळ बदलला तरी सत्तरी पार केलेल्या नानांची पेपर वाचण्याची सवय मात्र बदलली नाही. वाचनात हरवलेल्या नानांना पाहून जुने आठवणींचे एकेक फोल्डर उघडून मन मागे मागे जात थेट शाळेच्या दिवसात जाऊन थांबले. 

मी नानांचा अतिशय लाडका. त्यांच्यासोबत सायकलवरून डबलसीट केलेली फिरस्ती, पाहिलेले सिनेमे…  सगळं आठवलं. एकूणच बालपण मस्त होतं. नाना माझे बेस्ट फ्रेंड. त्यांच्याबरोबर खूप  बोलायचो. बराच वेळ आमच्या गप्पा चालायच्या, म्हणजे मी सांगत असायचो अन ते ऐकायचे. सातवी पर्यन्त हा सिलसिला चालू होता, परंतु नंतर नकळत सगळं बदलत गेलं. जसजसा मोठा झालो तसा शिक्षण, उच्चशिक्षण, करियर, नोकरी, लग्न, संसार, ऑफिस, टेंशन्स अशा एकेक जबाबदाऱ्यात गुरफटलो. मी माझ्या व्यापात आणि त्यांचे रिटायर्ड लाईफ. दोघांचे आयुष्य वेगवेगळे 

झाले . वाद नव्हता पण संवाद नक्कीच कमी झाला. आता तर फक्त कामापुरतं बोलणं व्हायचं. स्वभावानुसार त्यांनी कधीच बोलून दाखवलं नाही अन मलाही जाणीव झाली नाही.

मोबाईलच्या आवाजानं आठवणींची तंद्री तुटली. पुन्हा वास्तवात आलो. शाळेच्या व्हॉटसपच्या ग्रुपवर औपचारिक वाढदिवस शुभेच्छांचा पाऊस सुरू होता. मेसेज न करता फोन करून मित्राला शुभेच्छा देत असताना लक्षात आलं की आज २ ऑक्टोबर, म्हणजे ओळखीतल्या अजून काही जणांचा वाढदिवस. लगेच पाठोपाठ फोन करून शुभेच्छा दिल्या. 

सकाळीच फोनवर बिझी झालेल्या माझ्याकडं नानांनी अर्थपूर्ण नजरेनं पाहिलं.  

“ फोन करून शुभेच्छा देण्याची तुमचीच सवय घेतलीय ” नाना फक्त हसले. 

“ संध्याकाळी अमेरिकेवरून आलेल्या मित्राच्या घरी पार्टी आहे. खूप वर्षांनी भेटतोय. तेव्हा ताईच्या घरी  कार्यक्रमाला तू आणि रिया जा ” नाश्ता करताना मी म्हणालो तेव्हा अपेक्षित असल्यासारखं बायको सूचक हसली.

“ आपण ताईकडं पुढच्या रविवारी जाऊ. शंभर टक्के, प्रॉमिस ” मी.   

“ ठीकय. एंजॉय पार्टी पण लिमिटमध्ये ”

“ डोन्ट वरी, थॅंक यू बायको ”

“ दुपारी जेवायला गोड काय करायचं ” बायकोनं विचारलं 

“ राष्ट्रपित्याचा वाढदिवस म्हणून का?” मी गंमतीने म्हणालो. 

“ मिस्टर, विसरलात ना. आज तुमच्याही वडिलांचा वाढदिवस आहे. ”

आठशे चाळीस व्होल्टचा झटका बसला. पोह्याचा घास घशातच अडकून जोराचा ठसका लागला. दुनियेला आवर्जून शुभेच्छा देणारा मी, नानांचाच वाढदिवस विसरलो. एकदम कसंतरीच वाटायला लागलं. पोह्याची डिश बाजूला ठेवून नानांसमोर जाऊन उभा राहिलो. 

“ काय रे, काही पाहिजे का ? ”

“ वाढदिवसाच्या खूप खूप खूपच शुभेच्छा ” म्हणत वाकून नमस्कार केला आणि कडकडून मिठी मारली, तेव्हा नानांना खूप भरून आलं. मोठ्या मुश्किलीने त्यांनी स्वतःला सावरलं. खिडकीतून बाहेर पाहत उभे राहिले. काही क्षण विलक्षण शांततेत गेलं. मी सुद्धा खूप भावुक झालो. 

“ दुपारी गुळाचा शिरा करते. नानांना आवडतो ” बायकोनं नेहमीप्रमाणे परिस्थिती सांभाळली. सून असूनही नानांच्या आवडी तिला माहिती आहेत आणि मी???  प्रचंड गिल्ट आला. 

“ आज संध्याकाळी तू ताईकडे जाणारेस ना ? ”

“ हो, स्वयंपाक करून जाते ”

“ नको ”

“ का??”

“ आज बापलेक बाहेर जेवायला जातो. नानांना पार्टी!!”

“ आम्हांला !! ” बायको आणि मुलगी एकसुरात म्हणाल्या. 

“ नक्कीच!! पण नंतर. आज दोघंच जातो, प्लीज ” दोघीनी समजुतीने घेतलं.

“ उगीच खर्च कशाला. बाहेर नको ” सवयीने नानांनी नकार दिला. पण मी हट्ट सोडला नाही. 

संध्याकाळी हॉटेलच्या पायऱ्या चढताना नकळत आधारासाठी नानांचा हात हातात घेतला. तेव्हा ते हसले. त्यांच्या मनात काय आले असेल याची कल्पना आली. पस्तीस वर्षापूर्वीची परिस्थिती बरोब्बर उलटी होती.. तेव्हा त्यांनी मला आधार दिला होता.. आता मी. 

काळाने आमच्या दोघांच्या जागा बदलल्या आणि जबाबदाऱ्या सुद्धा….

हॉटेलमध्ये आल्यावर स्टार्टरची ऑर्डर दिली. समोर बसलेले नाना प्रचंड संकोचले होते. त्यांचं अवघडलेपण लक्षात आलं. मनातली अस्वस्थता चेहऱ्यावर दिसत होती. 

“ टेंशन घेऊ नका. रीलॅक्स. ”

“ फार महाग हॉटेल दिसतंय.” आजूबाजूला पाहत नाना म्हणाले. 

“ किती वर्षांनी आपण दोघंच असं आलोय.” 

“ तू अकरावीला असताना हॉटेलमध्ये गेलो होतो त्यानंतर आजच..”

“ बापरे, एवढं डिटेल लक्षात आहे. ग्रेट . ” नाना काहीच बोलले नाहीत. 

“ नाना, सॉरी, माफ करा.”

“ अरे, होत असं. आणि तसंही आता या वयात कसलं आलंय वाढदिवसाचं कौतुक!” 

“ वाढदिवस विसरलो म्हणून नाही तर एकूणच. तुमच्याकडे दुर्लक्ष झालं. नकळत का होईना पण चूक झालीच.”

“ अरे एकदम कोणता विषय घेऊन बसलास.”

“ आज मन मोकळं करू द्या. माझं यश-अपयश, आनंद, दु:ख, चुकलेले निर्णय, निराशा या सगळ्यात ठामपणे पाठीशी उभे राहिलात. माझ्यातला बदल सहज स्वीकारलात. स्वतःवर बंधनं घालून घेतलीत, आणि मी मात्र तुमचा कधी विचारच केला नाही. माझ्या प्रायोरिटीजमध्ये तुम्ही नव्हताच.”

“ हीच म्हातारपणाची खंत आहे. जे झालं ते झालं. सोडून दे.” नाना म्हणाले. 

“ तुम्हांला नेहमीच गृहीत धरलं, ”  मी हात जोडले. एकदम आवाज कापरा झाला तेव्हा आलेला मोठा हुंदका नानांनी आवरला. पुढचे काही क्षण शांततेचे होते. 

“ उगीच मनाला लावून घेऊ नकोस. बापलेकाचं नातं असंच असतं. आई जिवलग मैत्रीण होऊ शकते, पण वडील मित्र झाले तरी अंतर राहतेच.” 

“ खरंय, पण हे ठरवून होत नाही. तुम्ही कधीच इच्छा सांगितल्या नाहीत आणि मलाही त्या समजून घेता आल्या नाहीत.” पुढचं बोलता येईना.

“ वडील आणि कर्ता मुलगा यांच्यात कमी होणारा संवाद हा या नात्याला शाप आहे. ” एका वाक्यात नानांनी कैफियत मांडली. 

“ यापुढे काळजी घेईन.”

“ अरे तू मुद्दाम केलं नाहीस आणि करणार नाहीस हे माहितेय. एवढं मनाला लावून घेऊ नकोस.”

“ तरी पण.. खूप अपराध्यासारखं वाटतं.” 

नंतर बराच वेळ मी नळ सुरू केल्यासारखा धो धो बोलत होतो. सगळा बॅकलॉग भरायचा होता. अगदी शाळेत असताना त्यांच्याशी बोलायचो तसाच. नाना शांतपणे ऐकताना गालातल्या गालात हसत होते.

“ काय झालं. हसताय का ?”

“ इतका मोठा झालास तरी मूळ स्वभाव बदलला नाही,” नाना दिलखुलास हसत म्हणाले. मलाही खूप शांत वाटत होतं. मोठ्ठं ओझं उतरल्याचं समाधान होतं.  

“ खरं सांगू , बोलायची खूप इच्छा व्हायची. पण तुझी धावपळ, घरातली चिडचिड बघून बोलायची हिंमत झाली नाही. तुमच्या आयुष्यात मोबाईल आणि अस्वस्थता सतत सोबत असते.” 

“ पर्याय नाही.”

“ मान्य. तरीही पैसा, संपत्ती, सोशल स्टेटस हे सगळं मृगजळ. त्यामागे किती आणि कुठपर्यंत पळायचे याची लक्ष्मणरेखा आखून ठेव. स्वतःला जप. तब्येतीची काळजी घे. लोकांसाठी नाही तर आपल्या माणसांसाठी जगायचं.”

“ नक्कीच.”

“ आजचा दिवस कायम लक्षात राहील.”

“ माझ्याही.”

“ सर्वात महत्वाचं, आज माझा उपास नाहीये ” नाना मिष्किलपणे म्हणाले. बोलण्याच्या गडबडीत मी जेवणाची ऑर्डरच दिली नव्हती. 

“ आयला, हो की….” नकळत तोंडातून शब्द बाहेर पडले तेव्हा नानांकडे पाहत जीभ चावली. 

“ चायनीज खाऊ ”.. नानांची फर्माईश. जेवणाची ऑर्डर देताना नानांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून  डोळे भरून आले……. 

…….. बाप-लेकाच नातं रिचार्ज होऊन अपडेट झालं. आईच्या आठवणीनं एकदमच  दोघांची नजर आभाळकडं गेली. 

— घरातला अबोल आधारस्तंभ असलेल्या सर्व “बाप”माणसांना  समर्पित.. 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सुश्री स्नेहा वाघ

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सरत्या वर्षाला निरोप… ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ सरत्या वर्षाला निरोप… ☆ सौ राधिका भांडारकर

२०२२— वर्ष संपलं.

आज वर्षाचा शेवटचा दिवस.

उद्यापासून नवे वर्ष सुरू.

नवे पान, नवे पर्व, नवे संकल्प, येणाऱ्या नव्या वर्षाने निर्माण केलेली नवी आशा,  नवी स्वप्नं, उगवणारा नेहमीचाच सूर्यही जणू नवरंगांची किरणं घेऊन अवतरलाय, असा भास देणारा नव्या वर्षाचा पहिला दिवस!

मागे वळून पाहताना, जाणाऱ्या या वर्षाला निरोप देताना,  मनात संमिश्र भावनांचा कल्लोळ आहे.  काळाच्या बारा पावलांची, कधी सरळ, कधी वळणावळणाची, कधी चढ उताराची, काट्यांची, फुलांची, दगड गोट्यांची, रंगीत व रंगहीन वाट, पुन्हा एकदा न्याहाळून पाहताना, सहज मनात येते.. वर्ष संपले म्हणजे नक्की काय झाले?

कालचक्र अव्याहत फिरत असते.  कालगणनेची गणितं मनुष्यनिर्मित आहेत.  बाकी खरं म्हणजे एक दिवस जाणारा आणि एक दिवस येणारा यापेक्षा नवे काय? फक्त काळाच्या बारा पावलांनंतर आज आणि उद्या मधल्या अंतरात काही क्षणांची विश्रांती, असं म्हणूया आपण. वर्षाच्या चार आकडी संख्येच्या एककामध्ये एकाने झालेली बेरीज. भिंतीवरच्या जुन्या कॅलेंडरला काढणे आणि त्या जागी नवे कोरे कॅलेंडर लटकवणे.  काय बदलतं?

कसे गेले हे वर्ष?

राजकीय, सामाजिक, वैयक्तिक बेरजा वजाबाक्या  यांचं गणित मांडताना उत्तराचा झालेला गोंधळ हाही काही वेगळा असतो का?कुठे मंगल तोरणे तर कुठे प्रिय जनांचा वियोग.कुठे बढती कुठे बेकारी.कुठे यश कुठे अपयश.वादळं,तुफान,भूकंप तर कधी हिरवळ..आंसु आणि हंसु..माणसाने वर्षे मोजली आणि नियती हसली..

त्याच त्याच राजकीय धुळवडी पाहिल्या. नवे भाष्य, नवी विधानं, आरोप प्रत्यारोप, धार्मिक अन्याय,भावनिक गळचेपी वगैरे वगैरे… सगळा खमंग गोंधळ कान टवकारुन आणि डोळे फाडून पाहिला— ऐकला.  काही आत गेले काही बाहेर आले. निवडणुका रंगल्या. कोणी हरले कोणी जिंकले.  गुलाल उधळले, ढोल वाजले. पण हे सारं पाहताना मनात एवढंच आलं यापेक्षा मागचं वर्ष चांगलं गेलं!

आंतरराष्ट्रीय परिषदा भरल्या. सगळेच गोलमाल.युद्धे चालूच आहेत.सत्तेपायी अमानुषता बोकाळलीय्.प्रचंड हिंसाचार.”थांबवा रे!मला शांती हवी आहे!” हे सूरच गोठलेत.

पर्यावरणाविषयी कळवळून मुद्दे मांडले गेले आणि प्रत्यक्ष मात्र आम्हाला डोंगर तोडणारे, झाडे तोडणारे हातच दिसले. वीज नाही, पाणी नाही म्हणत वणवणारी जनताच दिसली.  कव्हर पेजवर विकासाची गणित मांडणारे आलेख, हसणारे चेहरे, दाटलेली हिरवळ आणि आतल्या पानात खून, बलात्कार,अपघात, भूकबळी. मसल पाॅवर. असा रक्तबंबाळ माणूस.. पूर्ण विश्वातलाच.. पाहताना एवढंच वाटलं काय बदललं?

डाव्या हातातलं जाणारं वर्ष उजव्या हातातल्या येणाऱ्या नव्या कोऱ्या वर्षाला सांगते आहे,” बघ रे बाबा! तुला काही जमतय का? मी तर चाललो. तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!”

जन्माला आलेलं हे दोन हजार तेवीस  नावाचं बाळ मात्र खूपच गोंडस भासतंय.  कुणा युगंधराचा अवतार असंच वाटतंय.  कायापालट घडवून आणेल हे बाळ! या क्षणी तरी  अनेक आशा, स्वप्नं,  सुख- शांती, समृद्धी घेउन अवतरले आहे , असं आतून जाणवत आहे. बघूया याच्याही कुंडलीतले नवग्रह योग!  विधात्यांनी मांडलेली २०२३ची ही पत्रिका अखिल विश्वासाठी फलदायी ठरो!इतकंच..

असावे सकारात्मक..

असावे आशादायी…

बाकी नम्रपणे वंदन—त्या कालचक्राला…

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “सरणारे वर्ष मी” – कविवर्य मंगेश पाडगावकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? इंद्रधनुष्य ?

☆ “सरणारे वर्ष मी” – कविवर्य मंगेश पाडगावकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

मी उद्या असणार नाही,

असेल कोणी दूसरे !

मित्रहो सदैव राहो,

चेहरे तुमचे हासरे

 

झाले असेल चांगले,

किंवा काही वाईटही !

मी माझे काम केले,

नेहमीच असतो राईट मी

 

माना अथवा नका मानु,

तुमची माझी नाळ आहे !

भले होओ, बुरे होओ,

मी फक्त “काळ” आहे

 

उपकारही नका मानु,

आणि दोषही देऊ नका !

निरोप माझा घेताना,

गेट पर्यन्त ही येऊ नका

 

उगवत्याला “नमस्कार”,

हीच रीत येथली !

विसरु नका “एक वर्ष”,

साथ होती आपली

 

धुंद असेल जग उद्या,

नव वर्षाच्या स्वागताला !

तुम्ही मला खुशाल विसरा,

दोष माझा प्राक्तनाला

 

शिव्या, शाप, लोभ, माया,

यातले नको काही !

मी माझे काम केले,

बाकी दूसरे काही नाही

 

निघताना “पुन्हा भेटु”,

असे मी म्हणनार नाही !

“वचन” हे कसे देऊ,

जे मी पाळणार नाही

 

मी कोण ?

सांगतो..

“शुभ आशिष” देऊ द्या,

“सरणारे वर्ष” मी,

आता मला जाऊ द्या !!

 

— कविवर्य मंगेश पाडगावकर 

संग्राहक : सुहास रघुनाथ पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘नावात काय आहे?’ … व. पु. काळे ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘नावात काय आहे?’ … व. पु. काळे ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

‘नावात काय आहे?’ – हा प्रश्न तसा जगजाहीर.

नावात खरंच तसं काही नाही. ते नाव घेऊन तुम्ही कोणत्या गावात जन्म घेतला, ह्याला जास्त महत्त्व . तुम्हाला कोणते आईवडील लाभले, त्यावर बरंचसं अवलंबून. तुमचा बँकबँलन्स पण नजरेआड करता येणार नाही.

पण तरीही ह्या सगळ्या गोष्टी तराजूतल्या एका ताटलीतल्या. दुसरी ताटली तुमची स्वत:ची. ती आकाशाला शरण जाते की आपली माती वेगळीच म्हणत जमिनीकडे झुकते त्यावर सगळं अवलंबून.

लेखक – व. पु. काळे

संग्राहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासिनी ☆ मी प्रवासिनी क्रमांक 33 – भाग 2 – ट्युलिप्सचे ताटवे – श्रीनगरचे ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक 33 – भाग 2 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ट्युलिप्सचे ताटवे – श्रीनगरचे ✈️

वेरीनाग इथल्या निर्झरातून झेलमचा उगम होतो. ‘श्री’ च्या आकारात वाहणाऱ्या झेलमच्या दोन्ही तीरांवर श्रीनगर वसले आहे. श्रीनगरमध्ये फिरताना सफरचंद आणि अक्रोड यांचे पर्णहीन वृक्ष दिसत होते.  बदाम, जरदाळू यांची एकही पान नसलेली सुंदर मऊ पांढऱ्या मोतीया आणि गुलाबी रंगाच्या फुलांनी डवरलेली झाडे दिसत होती. लांबवर पसरलेली मोहरीची शेतं हळदी रंगाच्या फुलांनी डोलत होती तर अजून फुलं न आलेली शेतं काळपट हिरव्या रंगाची होती. थंडी खूपच होती.पायघोळ झग्याआड पोटाशी शेगडी घेऊन जाणारे स्त्री- पुरुष दिसत होते. सर्वत्र तणावपूर्ण शांतता जाणवत होती. रस्तोरस्ती लष्कराची वाहने आणि बंदूकधारी जवान मनातल्या अस्वस्थतेत भर घालीत होती. दुकानांमध्ये कलिंगडे, संत्री, केळी, कमलकाकडी, इतर भाज्या दिसत होत्या. कहावा किंवा कावा या काश्मिरी स्पेशल चहाची दुकाने जागोजागी होती. अस्सल काश्मिरी केशराच्या चार काड्या आणि दालचिनीच्या तुकडा असं उकळत ठेवायचं. त्यात साखर घालायची. एका कपाला एक सोललेला बदाम जाडसर कुटून घालायचा आणि त्यावर केशर दालचिनीचे उकळते मिश्रण ओतायचं. झाला कहावा तयार!

गाईडने दिलेल्या या माहितीमुळे ‘कावा’ पिण्याची इच्छा झाली पण बस मध्येच थांबविणे अशक्य होते.

जहांगीरच्या काळात साधारण चारशे वर्षांपूर्वी निशात बाग, शालीमार बाग, व चष्मेशाही अशा सुंदर बागा बांधण्यात आल्या. तळहाताएवढ्या सुगंधी गुलाबाच्या फुलांचा हंगाम अजून सुरू झाला नव्हता, पण वृक्षांसारखे झाड बुंधे असलेली गुलाबाची झाड लालसर पानांनी बहरून फुलण्याचा तयारीत होती. उंचावरून झऱ्यासारखे वाहणारे पाणी पायऱ्या- पायऱ्यांवरून घरंगळत होते. मध्येच कमळाच्या आकारातली दगडी कारंजी होती. सगळीकडे दुरुस्तीची कामे मोठ्या प्रमाणावर चालू होती.

चष्मेशाहीमध्ये मागच्या पीर- पांजाल पर्वतश्रेणीतून आलेले झऱ्याचे शुद्ध पाणी आरोग्यदायी असल्याचे सांगण्यात आले. डेरेदार काळपट- हिरव्या वृक्षांना चोचीच्या आकाराची पांढरी फुले लटकली होती. ती नासपतीची झाडे होती.  हिरवा पर्णसंभार असलेली मॅग्नेलियाची (एक प्रकारचा मोठा सुगंधी चाफा ) झाडे फुलण्याच्या तयारीत होती. निशात बागेजवळ ‘हजरत बाल श्राइन’ आहे. हजरत मोहमद साहेबांचा ‘पवित्र बाल’ इथे ठेवण्यात आला आहे. मशीद भव्य आणि इस्लामिक स्थापत्यकलेचा नमुना आहे.मशिदीच्या आत स्त्रियांना प्रवेश नव्हता. मागील बाजूने थोडा पडदा किलकिला करून स्टेनगनधारी पहारेकर्‍याने ‘पवित्र बाल’ ठेवलेल्या ठिकाणाचे ‘दूरदर्शन’ घडविले. स्वच्छ आवारात चिनारची झाडं होती. दल सरोवराच्या पश्चिमेकडील काठावर असलेल्या या मशिदीची पुनर्बांधणी करण्यात आली आहे.

श्रीनगरपासून तीन किलोमीटरवर पांडेथ्रान गाव आहे आणि साधारण १४ किलोमीटरवर परिहासपूर नावाचं गाव आहे. या दोन्ही ठिकाणी राजा ललितादित्याच्या कारकिर्दीत म्हणजे आठव्या शतकात उभारलेल्या बौद्ध स्तूपांचे अवशेष आहेत. अनंतनागपासून चार-पाच किलोमीटरवर मार्तंड देवालयांचा समूह आहे.  डावीकडचे कोणे एकेकाळी भव्य दिव्य असलेल्या सूर्यमंदिराचे भग्नावशेष  संगिनींच्या पहाऱ्यात सांभाळले आहेत.

पहेलगामच्या रस्त्यावर खळाळत अवखळ वाहणारी लिडार नदी आपली सतत सोबत करते. नदीपात्रातील खडक, गोल गुळगुळी दगड यावरून तिचा प्रवाह दौडत असतो. गाईड सांगत होता की मे महिन्यात पर्वत शिखरांवरील बर्फ वितळले की नदी तुडुंब पाण्याने उसळत वेगाने जाते. त्यावेळी तिच्यावरील राफ्टिंगचा थरार अनुभवण्यासाठी अनेक देशी-विदेशी प्रवासी येतात. तसेच नदीपलीकडील पर्वतराजीत ट्रेकिंगसाठी अनेक प्रवासी येतात. त्याशिवाय घोडदौड, ट्राउट माशांची मासेमारी अशी आकर्षणे आहेत. हिमालयाच्या पार्श्वभूमीवर पोपटी हिरवळीवर वर्ल्डक्लास गोल्फ कोर्टस आहेत. त्यासाठीही हौशी खेळाडू येतात.

पहलगाम रस्त्यावर प्राचीन काळापासून केशराच्या शेतीसाठी प्रसिद्ध असलेलं पांपूर( पूर्वीचं नाव पद्मपूर ) लागतं. साधारण ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात जमिनीलगत उगवलेल्या जांभळ्या सहा पाकळ्यांच्या फुलांनी शेतेच्या शेते बहरतात. या फुलांमधील सहा केसरांपैकी केसरिया रंगाचे तीन केसर हे अस्सल केशर असतं. उरलेले तीन हळदी रंगाचे केसर वेगळ्या पद्धतीने वापरले जातात.

श्रीनगर भाग २ समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ मनोज साहित्य # 63 – मनोज के दोहे…अश्वगंधा  ☆ श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज” ☆

श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज”

संस्कारधानी के सुप्रसिद्ध एवं सजग अग्रज साहित्यकार श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज” जी  के साप्ताहिक स्तम्भ  “मनोज साहित्य ” में आज प्रस्तुत है “मनोज के दोहे…अश्वगंधा । आप प्रत्येक मंगलवार को आपकी भावप्रवण रचनाएँ आत्मसात कर सकेंगे।

✍ मनोज साहित्य # 63 – मनोज के दोहे…अश्वगंधा 

1 भारत आयुर्वेद में, जनक-निपुण-विद्वान।

वेदों में यह वेद है, रखे स्वस्थ बलवान।।

 

2 आयुर्वेद की यात्रा, वर्ष सहस्त्रों पूर्व ।

योग ज्ञान विज्ञान में, विद्वत-जन से पूर्ण ।।

 

3 जड़ी बूटियों में छिपी, रोग हरण की शक्ति।

सनातनी युग में मिला, कर ब्रह्मा की भक्ति।।

 

4 धन्वंतरि जी ने किया, रोग हरण की खोज।

ब्रह्मा जी की कृपा से, आयुर्वेदी ओज।।

 

5 पद चिन्हों में चल पड़े, अनुसंधानी रोज। 

चरक चिकित्सक हो गए,कृतित्व रहा मनोज।।

 

6 संस्थापक ये ऋषि रहे , जग में है पहचान।

चरक-संहिता लिख गए , मानव का कल्यान।।

 

7 सर्जन सुश्रुत ने किया, बड़ा अनोखा काम।

सुश्रुत-संहिता को लिखा, खूब कमाया नाम।।

 

8 पेड़ छाल पौधे सभी, जड़ पत्ते अरु बीज।

प्रकृति जन्य उपहार हैं, शोध परक ताबीज।।

 

9 हरें-रोग जड़ी-बुटियाँ, आयुर्वेद विज्ञान।

मानव की रक्षा करें,  करतीं रोग निदान।।

 

10 पौधा है असगंध का, करता बड़ा कमाल।

अश्वगंधा के नाम से, इसने किया धमाल।।

 

11अश्वगंध के नाम से, जग में भी विख्यात।

नाम अनेकों हैं मगर, करे रोग संघात।।

 

12 गुणकारी पौधा सुखद,जिसका नहीं जवाब।

औषधि में सर्वश्रेष्ठ है, शोधक रखें हिसाब।।

 

13 लम्बे पत्ते शाख में, पतली टहनी देख ।

जड़ लंबी होती सदा, खेतों की है रेख।।

 

14 झाड़ी या पौधे कहें, हरित रहें सब पात।

मेढ़ पहाड़ी में उगें, दिखें सदा हर्षात।।

 

15 देश विदेशों में अलग,भाँति-भाँति के नाम ।

विंटर चेरि पॉयजनस, करे सभी सत्काम।।

 

16 तुख्मे हयात,अमुकुरम,कुष्ठगन्धिनि,पुनीर।

वराहकर्णि,अमनगुरा,तन-मन हरती पीर।।

 

17 घोडासोडा,अमुक्किरा,असकन्धा से नाम।

काकनजे,टिल्ली कहें, रोग हरण के काम।। 

 

18 शोध हो रहे नित्य प्रति, रोगों का उपचार।

लगता है अब निकट ही, होगा बिग बाजार।।

 

19  दिखने में छोटा बड़ा, पौधा है असगंध।

घोड़े के पेशाब सी, रगड़ो आती गंध।।

 

20 नेत्र ज्योति में वृद्धि कर, पीड़ा-हरती नेत्र।

जड़ी-बूटि है यह बड़ी, व्यापक इसका क्षेत्र ।।

 

21 हरे रोग गलगंड के, दाबे अपनी काँख।

विज्ञानी औषधि निपुण, खुली देखते आँख।।

 

22 स्वेत-बाल यदि हो रहे, मत घबराएँ आप।

अश्‍वगंधा सेवन करें, मिट जाते संताप।।

 

23 कब्ज समस्या हो अगर, करता रोग निदान।

अन्य उदर बीमारियाँ, निरोगी-समाधान।।

 

24 छाती में यदि दर्द हो, इसका बड़ा महत्व ।

गुम गठिया-उपचार में, यही इलाजी तत्व।।

 

25 क्षय-रोगों के लिए यह, अनुपम करे इलाज।

रोग मुक्त टी बी करे, आयुष को है नाज ।।

 

26 ल्यूकोरिया-इलाज में, अश्‍वगंध सरताज ।

असगंधा में छिपा है,इसका पूर्ण इलाज। ।

 

27 अश्‍वगंध के चूर्ण से, मिटता रक्त विकार।

त्वजा रोग में यह करे, महत्वपूर्ण उपचार।।

 

28 शारीरिक कमजोरियाँ, करता है यह दूर।

खाँसी और बुखार में, उपयोगी भरपूर।।

 

29 चोट लगे या कट लगे,करे शीघ्र उपचार।

अश्वगंध सेवन करें, तन-मन करे निखार ।।

 

30 राजस्थान प्रदेश में, स्थान प्रमुख नागौर ।

जलवायु अनुकूलता, उत्पाद श्रेष्ठ का दौर।।

 

31 नागौरी असगंध की, औषधि बड़ी महत्व।

इसके चूरण तेल में, रोग निवारक तत्व।।

 

32 रोज रात पीते रहें, जिनका तन अस्वस्थ ।

दूध सँग अश्वगंध लें, होती काया स्वस्थ।।

 

33 दो ग्राम असगंध सँग, आँवला लें समान।

एक मुलेठी पीसिए,आँखों का कल्यान।।

 

34 तन-कमजोरी में करे, हर रोगों पर घात।

वीर्य वृद्धि पुरुषार्थ में, होता यह निष्णात।।

 

35 अश्वगंध का चूर्ण यह, होता पूर्ण  सफेद।

चर्म रोग नाशक रहे, कष्ट निवारक श्वेद।।

 

36 तन-मन की रक्षा करे, खाएँ चियवनप्राश।

सम्मिश्रण अश्वगंध का, करे रोग का नाश।।

 

37 द्राक्षासव में सम्मिलित, असगंधा का योग।

उदर रोग से मुक्ति दे, करें नित्य  उपभोग।।

 

38 जोड़ों में आराम दे, असगंधा का तेल ।

करिए मालिस नित्य ही, हो खुशियों का मेल।।

 

39 वात पित्त कफ दोष से,बने मुक्ति का योग ।

तन मन हर्षित हो सदा, जो करता उपभोग।।

 

40 कैंसर जैसे रोग में, इसका है उपयोग।

शोध परक बूटी सुखद, हरण करे यह रोग।।

 

41जिसको देखो तृषित है,डायबिटिक का रोग।

मददगार मधुमेह में, तन-रक्षा का योग।।

 

42 अनिद्रा अरु अवसाद में, बैठा आँखें-मींद।

चिंताओं से मुक्त हो, सुख की देता नींद।।

 

43 शुक्रधातु को प्रबल कर पौरुष देता बल्य।

वात रोग का नाश कर, हटे पेट का मल्य।।

 

44 माँसपेशियाँ दुरुस्त कर, रक्त करे यह शुद्ध।

तन-मन को मजबूत कर, योगी ज्ञानी बुद्ध।।

 

45 हृदय रोगियों के लिए, जीवन-मरण सवाल।

शुद्ध रक्त बहता रहे,औषधि करे कमाल।।

 

46 बालों का झड़ना रुके, बढ़ें प्रकृति अनुरूप।

ओजस्वी मुखड़ा दिखे, सबको लगे अनूप।।

 

47 यौन विकारों के लिए, इसमें छिपी है शक्ति।

जीवन नव संचार कर, भर दे जीवन भक्ति।।

 

48 थाइराइड कंट्रोल कर,दुख का करे निदान।

अश्वगंध की दवा से, परिचित हुआ जहान।।

 

49 महिलाओं के लिए यह, गर्भावस्था वक्त।

परामर्श सेवन करें, स्वस्थ निरोगी रक्त।।

 

50 घटे मुटापा व्यक्ति का, जो खाता असगंध।

रोग भगाता है सभी, कर्मयोग अनुबंध।।

 

51 औषधि में मिलती घटक,शोधपूर्ण का मेल।

रोगों का यह शमन कर, दौड़े सुखमय रेल।।

 

52 जहरीले पौधे बहुत, पर होते गुण-खान।

जहर-जहर को काटता, सबको इसका भान।।

 

53 डाक्टर से परामर्श लें, तभी करें उपभोग।

मात्रा-मिश्रण हो सही, भागे तब ही रोग।।

 

54 आसव चूरण तेल सब, मिले दवा बाजार।

सोच समझ उपयोग कर, तभी करें उपचार।।

©  मनोज कुमार शुक्ल “मनोज”

संपर्क – 58 आशीष दीप, उत्तर मिलोनीगंज जबलपुर (मध्य प्रदेश)- 482002

मो  94258 62550

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

English Literature – Juvenile Fiction ☆ The Tide of will – Part-4 ☆ Dr. Amitabh Shanker Roy Choudhury ☆

Dr. Amitabh Shanker Roy Choudhury

Brief Introduction

  • Birth – January 18, 1955
  • Education – MBBS (IMS/BHU)
  • Publications – 4 books (2 in Hindi, 1 each in English and Bengali) and two are yet to come.
  • Translations – Books and articles are translated in English, Odiya, Marathi and Gujarati.
  • Awards – CBT awarded stories and novel, “Kamaleshwar Smriti Katha Award (2013, 2017 and 2019)” by Kathabimb.
  • Honour – “Hindi Sevi Samman” by Mahatma Gandhi Antarrashtriya Hindi Vishwa Vidyalaya, Wardha (December 2016). 

☆ Juvenile Fiction ☆ The Tide of will – Part-4 ☆ Dr. Amitabh Shanker Roy Choudhury ☆

Welcome Onam!

Our little bird was out of her nest. The vast blue sky was beckoning her, ‘Come, try to fly. Just spread your wings.’

Frankly speaking Narayanan didn’t make an elaborate plan. At first it was his idea simply to make Gayatri interested in sports. After all how far a man can think? But Gayatri was now crazy. Before the roosters crowed early in the morning, she would become ready and come to her grandfather, ‘Appupan, are you not ready yet? When will we go?’

Past three years or so now she was swimming pretty well. Itukettu, while sewing his broken net or transferring the catch of fish to the baskets, had been watching them all these years. One morning he said, ‘Sir, now she is quite a good swimmer.’

Naryanan was pleased to hear this.         

Every household was getting ready for the Onam festival. The farmers harvested the paddy. Ananthi had so much to do. She would decorate the front of their house and the courtyard with ‘pukkalam’ or the designs made with grains and pulses of different colours. Next, various preparations of rice and coconut, ‘kalan’ prepared from curd and banana, ‘olan’ made of vegetables and curd and ‘kallappam’ made of toddy juice and ‘elayappam’ sweet – so many things to be cooked and prepared.

A long time ago in the past, people would celebrate Onam for ten days in a row. But nowadays it ends in just four days. Around this time the harvest is safely gathered in by the peasants. Therefore Onam is the beginning of life anew. In cities like Kochi and Kottayam boat races are organized during this.

In general, particularly Lord Vishnu is worshipped in Kearala. Padmanabhaswamy at Thiruvananthapuram is one of His incarnations. The family of the king of Travancore worshipped Him as His priest. As an appointed representative of the god they used to look after the kingdom.    

In our mythology, it is said that the Lord Vishnu had appeared on earth in many incarnations. Right from The Fish, The Tortoise, The Boar and The Lion Man Narasimha to Ram and all. The story of Kerala says it was the sage Parasuram, one of the incarnations, who had dug the shore near the sea with his axe. Thus the land of Kerala was dug out and gifted to the people to start living on it. The sage had established five temples, dedicated to lord Vishnu, around Kerala Tamil Nadu border.                           

It is said that the great king Mahavali, who once ruled over this land, come here to pay his yearly visit, on the eve of Oman, to meet his people. Even today the Malayali people praise his rule of justice. By defeating the gods of heaven he established his kingdom over the heaven, the earth and the undersea world of ‘Patala’.

Now, as had always happened, the gods went to Lord Vishnu and prayed with folded hands, ‘O’ the power supreme, please save us. Do something so that we can regain our lost kingdom.’

The king of the gods, Indra, bowed his head respectfully and said, ‘We don’t have any place to live in. Where should we go?’

Mahavali had a great reputation for his munificence. So Vishnu decided to take advantage of his generosity. He appeared before the king in the incarnation of Vamana, The Dwarf, with a little umbrella overhead.

‘What do you want, sir?’ asked the king.

The Dwarf said, ‘Give me just as much of land as will be covered by my three steps.’

‘Alright O’ venerable. Your wish is granted.’ the king assured him.

Vishnu was waiting for this opportunity. Craftily. The Dwarf made his body so big that his head touched the sky. He put forward his right foot and occupied the heaven. By his second step whole of the earth was under it. Now he roared, ‘Tell me king, where I can tread my third step?’

Mahavali knew everything. He bowed his head in reverence and said, ‘God, it is here on my head, please put your foot.’

‘Then go away and remember your kingdom is limited only to Patala, under the sea.’

Such is the story how Indra and other gods could get back their lost kingdom.

Next Mahavali too, made a request to Vishnu, ‘Grant me permission please, so that I might come to visit my people every year on the day of Onam.’

‘So be it.’ smilingly said Vishnu.

Since then Mahavali would visit his people every year to enquire their wellbeing. So all these decorations and festivities are just to welcome their king.

Haripadam, the name of the village, has its origin in this mythological story. The old folks of the village would say that it’s here, on this land, the dwarf incarnation of Vishnu had set his foot to acquire the right of the earth.

A shrill sound drifted all over from every house in the village. It was ‘kuruwava’, the whistling of the women folks. ‘Come, O’ King and accept our offerings. We have spread the petals all along the road. So your feet won’t get hurt.’

At Gayatri’s house, they had finished their lunch. Ananthi had served them food on the banana leaves. Narayan was very much fond of ‘kalappam’. He asked Manishankaran to distribute the home-made foods to everyone, ‘Let them enjoy today.’

After a little nap he got up and called for Gayatri, ‘Let’s go to Pompa. They have organized different competitions and sports. Must not we see them?’

Gayatri clapped her hands in delight, ‘Sure, appupan. We must.’ And she put her new dress on. A new cute frock. She peeped into the room where Ananthi was sleeping with little Rajan, ‘Amma, I’m going to Pampa with achchan.’

Both of them walked away from the home. By then the sun had come down on the top of the trees. But dusk was still far away.

Contd…      

© Dr. Amitabh Shanker Roy Choudhury

C0ntact: Care Dr. Alok Kumar Mukherjee, 104/93, Vijay Path, Mansarovar, Jaipur, Rajasthan 302020

Mo: 9455168359, 9140214489

Email: [email protected]

≈ Editor – Shri Hemant Bawankar/Editor (English) – Captain Pravin Raghuvanshi, NM ≈

Please share your Post !

Shares