☆ मला फक्त मज्जा हवीय… लेखक – अनामिक ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे☆
(अतिशय गंभीर चिंतनीय पोस्ट!)
“मला फक्त मज्जा हवीये” (Todays Goal of Every Youth)
तुमच्या आयुष्याचं उद्दिष्ट काय आहे?
प्राचीन काळी “ज्ञानप्राप्ती आणि परमार्थसाधना” हे उदात्त उत्तर मिळत असे.
अर्वाचीन काळी “प्रापंचिक सुख” हे व्यवहारात बसेल इतपत उत्तर देत असत.
आत्ता काल-परवा “पैसा, समाधान, शांती” हे शब्द ऐकू यायचे.
हल्ली थेट विकेट पडते –
“मला फक्त मज्जा करायचीये”.
विषय संपला.
“मज्जा केलीच पाहीजे” ही बळजबरी माणसं एकमेकांच्या ऊरावर पांघरू लागलीयेत.
इथे “मज्जा” ही निवडीची गोष्ट राहीली नाहीये; ती “निकड” झालीये; केली गेलीये. मज्जा कशी करायची हे निवडण्याचंही स्वातंत्र्य नाही; ती समाजातल्या “मॉडर्न” शहाण्यांनी (!) आखून दिलेल्या पद्धतीनेच व्हायला हवी.
तशी ती नाही केली म्हणजे फालतू आहात तुम्ही, हे तुमच्या तोंडावर फेकून मारलं जातंय. म्हणजे पहा –
“बर्थडे सेलिब्रेशन घरात? शी…”
“पार्टी नाही? शी…”
“फ्रायडे नाईट, आणि तू घरी आहेस? शी… पथेटिक…”
तुम्ही घरी स्वयंपाक वगैरे करून खाता विकेंडला!? फारच बोरिंग ….
“तू आजवर कधी पब मध्ये गेलीच नाहीस? काय काकूबाई आहेस गं…”
यात नफ्याची आर्थिक गणितं ठासून भरलेली आहेत. नव्वदच्या दशकात ग्लोबलायजेशन आपल्यावर येऊन आदळलं; आणि त्या नवश्रीमंतीच्या लाटेवर अनेकजणांनी विचार-विवेक गहाण टाकले.
तसे त्यांनी ते टाकावेत, जास्तीत जास्त मासे या भोगवादात सापडावेत, यासाठी (त्यातल्या त्यात।पाश्चात्य) कॉर्पोरेट कंपन्यांनी मार्केटिंगची जाळी मस्तपैकी सर्वदूर फेकली होतीच.
TV, सिनेमा, सततच्या जाहिरातींच्या भडिमाराने आमचा सुरेख ब्रेन वॉश केला.
न्युरोलिंग्विस्टिक प्रोग्रामिंग तंत्राच्या वापराने, ध्वनी व दृश्य या दोघांनी आमचे कान आणि डोळे स्वप्नांत गुंतवले. मध्यमवर्गीय काटकसरीने म्हातारपणाच्या चिंता सोडून “आजचं बघा” हा अमेरिकन मंत्र स्वीकारला. मग अचानक वाढदिवसाला निरांजनांच्या ओवाळणी backward झाल्या; वीस-पंचवीस हजारांचं हॉटेलवालं सेलिब्रेशन रितीचं झालं.
“अनलिमिटेड बुफे” च्या नावाखाली बार्बेक्यूंच्या भट्टीत पगार जाळून घेणं हे “त्यात काय एवढं?” असं झालं.
जीन्स पाचशेच्या पाच हजार झाल्या. पुर्वी कुत्रा कोण ज्या कॉटनला विचारत नव्हतं, तेच कॉटन “लिनन”च्या रुपात थेट स्टेटस सिम्बॉल बनलं.
एक दिवसाचं मराठी लग्न पाच दिवसांचं “big fat पंजाबी वेडिंग” झालं; घराच्या हॉलमधले साखरपुडे नि टिळे हे फाईव स्टारवाले “इवेन्ट्स” झाले.
मज्जा, आनंद, आपल्या आत निर्माण करायचा असतो म्हणताय? तुमची संस्कृती तसं सांगते? हड. चुलीत घाला तुमची संस्कृती. आमचं Grand Live life kingsize उधळणं घ्या. बायकोला सोन्या-चांदीतून बाहेर काढा; हिरे नि प्लेटिनम मध्ये तिला बुडवून काढा.
तुमच्या पोराला गर्लफ्रेन्ड नि पोरीला बॉयफ्रेन्ड असलाच पाहीजे. त्यांच्या “प्रेमाचं” मूल्यमापन गिफ्टच्या किमतीवर ठरेल.
कमवा; आणि उडवा.
तुम्ही तुमच्या नवाबज़ाद्यांकडे पाहा बघू. लिव Macho !!
भले तुम्ही स्टायपेन्डवाले ट्रेनी इंजिनिअर असा.
विषय इतपत येऊन थांबलेला नाही. दारू नि सिगरेटचं उदात्तीकरण तर आता जुनं झालं. आता त्याच्यापुढे सर्वसामान्य मराठी मध्यमवर्गीय पोरांच्या तोंडीही “वीड”, “ग्रास” हे शब्द येऊ लागलेत.
यांचे अर्थ माहितीयेत? गांजासारख्या भयानक नशील्या पदार्थांची अमेरिकेतून उचललेली बोली भाषेतली नावं आहेत ही.
या घाणीची जाहिरात थेट करता येत नाही; पण त्यासाठी आमचे नव्याने पैदास झालेले “रॉकस्टार्स” आणि “rap singers” आहेत ना! त्यांच्या गाण्यांतून या अमली विकृतीची भलावण रोजच्या रोज होतेय. “मनाली ट्रान्स” म्हणे. शोधा गुगलवर लिरिक्स. शब्दांना जोड दृश्यांची. दृश्यांत ठासून भरलेला सेक्स. अनिर्बंध, अमर्याद आणि मुद्दाम चाळवणऱ्या अनैतिक नात्यांचा, अगदी घरच्या अंतर्गत नात्यातही तो मुक्तहस्ते सपोर्ट करणारा !!! एकेक वेब सिरिज मनोरंजन कमी, आणि पोर्नोग्राफी जास्त इतपत मज्जेच्या डेफिनेशन्स गेलेल्या !!! तरुणांना नाद लावायला तेवढं पुरतं.
चील… एंजॉय… पार्टी चलेगी टिल सिक्स इन द मॉर्निंग.
मग मेलात तरी चालेल.
आपण ठरवलेलं उद्दिष्ट हे प्रत्यक्षात आपण स्वत: निवडलेलं नसून, ते आपल्याला गंडवून आपल्याकडून निवडून घेतलं गेलंय, हे लक्षात येतंय आपल्या?
चंगळवाद हा एक कॉर्पोरेटधार्जिणा पंथ झालाय. पंथामध्ये विचार आणि आचार निवडीचं स्वातंत्र्य नसतं. कुणीतरी महाभागाने सांगितलेलं तत्वज्ञान तो महापुरूष आहे असं सगळे म्हणतात म्हणून, मुकाट्याने नाकासमोर धरून चालणं, हे पंथाचं आचारशास्त्र असतं. तेच चंगळवादाचं आहे. “आम्ही कित्ती आनंदात आहोत”, “आमचं कित्ती मस्त चालू आहे”, “आम्ही कित्ती एंजॉय करतोय”, हे दुसऱ्याला दाखवणं, हा चंगळवादाचा अट्टहास असतो.
ते दुसऱ्याने सत्य म्हणून मान्य केलं, तर चंगळवादाचा विजय असतो. आणि आपण ओढवून घेतलेल्या पद्धतीचा दुसऱ्याने स्वीकार केला, तर तो चंगळवादाचा दिग्विजय असतो.
मुद्दा हा आहे, की या झुंडीत सामील झाल्यावर आपण किती “cool” आहोत, याच्या देखाव्यांचं एक compulsion असतं ना; त्यात बऱ्याच जणांचा श्वास कोंडला जातो.
तो देखावा न करणाऱ्यांना पाखंडी समजून झुंडीबाहेर फेकलं जातं.
मुळात जे झुंडीत कधी सामील झालेच नाहीत, किंवा आर्थिक कारणांमुळे होऊ शकले नाहीत, त्यांच्याकडे आगाऊपणाने “सो पथेटिक” म्हणून नकारात्मकतेने पाहीलं जातं; त्यांच्या मनात स्वत:बद्दल न्यूनगंड निर्माण होईल याचे पद्धतशीर प्रयत्न सुरू होतात.
गंमत म्हणजे, चंगळवादाचे पुरस्कारकर्ते व्यक्तिस्वातंत्र्याच्या गप्पा मारतात; पण हीच सोंगं आयुष्य आनंदाने जगण्याचे प्रत्येकाचे स्वतंत्र वेगळे मार्ग असू शकतात, हे साधं सत्य दुसऱ्याला नाकारतात.
त्यावेळी आपण त्याच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच करतोय, हे यांच्या गावीही नसतं. म्हणूनच मग “तुम्ही दारू पिऊन पार्ट्या करत नाही, म्हणजे आयुष्य कसं एंजॉय करायचं ते तुम्हाला माहीतच नाही”, अशी बिनडोक तर्कटं मांडली जातात; जी हास्यास्पद ठरतात.
हेअर जेल, मेक अप आणि ब्रांडेड कपड्यातली बिनधास्त आहोत हे दाखवत राहण्याची केविलवाणी धडपड नजरेत लपत नसते. ब्रांडेड आयुष्यातल्या पोकळ्या वेडावतातच.
जागे होऊया रे.
स्वत्व नको विकूया आपण.
दुनियेतल्या प्रत्येकाला आपण आवडलोच पाहीजे, हा मूर्ख विचार सोडूया; आणि करूया हिंमत स्वत:चा स्वतंत्र जीवनभाव निवडण्याची. सेलिब्रेशन्स मिळकतीची होऊ देत; आणि ती नजाकतीची होऊ देत !!
उधळण्याच्या फुलबाज्या क्षणभरच चमकतात; स्वतंत्र विवेकाचा सूर्य अनंतकाळ चमकतो.
आपण सूर्य निवडू या.
लेखक – अज्ञात
प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “पुन्हा एकदा अश्रुंची फुले झालीत…” – लेखक – डाॅ. संजय ☆ सुश्री हेमा फाटक ☆
“अजय, इकडे ये, माझ्या समोर येऊन सरळ उभा रहा, ही वेळ आहे का शाळेत यायची..? तूच सांग आता कुठली शिक्षा करु मी तुला, ह्या पूर्वीही छड्या मारुन झाल्या, कान पिळून झालेत, बाकावर उभं करुन झालं, वर्गाच्या बाहेर काढून झालं, काही फरकच कसा नाही तुझ्यात, सगळ्या शिक्षा आपल्या हू की चू न करता रोज चुपचाप सहन करतो, दिसतोस तर हडकुळा पण कुठल्या हाडा मासाचा बनला आहेस मला तर काही कळत नाही, काहीच फरक कसा नाही पडत रे तुझ्यात..?
लक्षात ठेव तु अजय, आता एकदाच शेवटचं सांगते, पुन्हा जर तू वर्गात वेळेवर नाही आलास ना तर एकदिवस मीच शाळा सुरू होण्यापूर्वी तुझ्या घरी येऊन तुझ्या पालकांचा समाचार घेईन, विचारीन त्यांना, कुठे लक्ष असतं तुमचं, तुमचा मुलगा केव्हा येतो शाळेत, बाहेर काय उद्योग करतो, शाळेच्या नावाखाली कुठे जातो, मुलाची काही फिकीर आहे की नाही तुम्हाला ..? अन् घेऊन येईन त्यांच्यासमोर तुला ओढत वेळेवर शाळेत, कळू दे एकदा तुझ्या पालकांना तूझे खरे गुण ..! “
अजय वर्गातला खरतर एक गोड, निर्मळ, सोज्वळ, शांत चेहऱ्याचा, नीटनेटका मुलगा होता, वर्गात कधी दंगा न करणारा, अतिशय हुशार, नियमित होमवर्क करुन येणारा, आणि शाळेत आल्यावर वर्गात नीट लक्ष देऊन शिकणारा, नेहमी पहिल्या पाचात येणारा गुणी मुलगा पण इतक्यांदा सांगूनही कधीच तो वर्गात वेळेवर येत नसे, कधी अर्धा तर कधी चांगला तासभर उशीर करायचा यायला, एवढा हुशार असून का हा असं वागतो ह्याचं त्याच्या ह्या मॅडम ला कोडं होतं, घरच्यांना ठाऊक नसतांना हा बाहेर काही वाईट कामं तर करुन येत नसेल अशी भीती त्यांच्या मनात होती..!
आईवडिलांना त्यांनी कितीदा निरोप पाठवले, डायरीत शेरे मारुन दिले पण हा दाखवतच नाही डायरी त्यांना ..!
काल एवढं बजावून देखील आज उलट हा अजून तासभर उशिराच आला आणि शांतपणे मॅडम समोर आपला उजवा हात पुढे करून छड्या खाऊन घेतल्या ..!
कालच्या सांगण्याचा जराही उपयोग न झाल्याने व आज उलट जास्तीच उशिरा आल्याने मॅडम रागातच होत्या, त्यांनी त्याच्याकडे न बघता रागानेच त्याच्या कोमल हातांवर रोजच्या पेक्षा तीन छड्या जास्ती मारल्या, हात लाल होऊन गेला होता, डोळ्यातलं पाणी गालांवर ओघळू न देता निमूटपणे सहन करुन तो आपल्या जागेवर जाऊन बसला ..!
मॅडमचं आज शिकवण्यात लक्ष नव्हतं, त्याचेच विचार त्यांच्या डोक्यात येत होते, का हा असं करतो..? एवढा हुशार मुलगा असून रोज का आपला मार खातो ह्याचं त्यांना वाईटही वाटत होतं, तो लिहीत असतांना अधून मधून चोरून त्या त्याच्याकडे बघत होत्या, शांत, निर्वीकार तो नेहमी असतो तसाच होता, आज त्यांनी मनात पक्क ठरवलं उद्या कुठल्याही परिस्थितीत शाळा सुरू व्हायच्या आधी अजयच्या घरी जाऊन यायचं, दुसऱ्या दिवशी ठरवल्या प्रमाणे शाळेच्या अर्धातास आधी घरातून निघून त्यांनी स्कूटी अजयच्या घराकडे वळवली, अजयच्या घरासमोर थोड दूरच त्या थांबल्या अजय शाळेच्या वेळेस कुठे जातो ते बघायला म्हणून.!
शाळेची वेळ झाली होती, अजय लगबगीने घरातून बाहेर पडला पण स्कूल bag न घेताच, शाळेच्या वेळेत हा बाहेर राहून नक्कीच काहीतरी वाईट कामं करतो हा मॅडम चा समज दृढ होत नाही तेवढ्यात चालतच तो साधारण एक फर्लांग भर दूर असलेल्या सरकारी हॉस्पिटल मधे गेला, मॅडम त्याच्या मागे गेल्या, स्कूटी स्टँडवर लावून जाणारच होत्या त्या आत तोवर त्यांना अजयच व्हील चेअर वर बहुतेक त्याचे वडील असावेत, त्यांना बसवून लगबगीने बाहेर येत असलेला दिसला, आजूबाजूला त्याचं लक्ष नव्हत, काळजीपूर्वक वडीलांना त्याने घरात नेऊन सोडलं, मॅडम पुन्हा दूरच थांबल्या होत्या, थोड्याच वेळात पुन्हा अजय गडबडीत व्हील चेअर वर बहुतेक आता आई असावी, तिला घेऊन बाहेर पडला, पुन्हा हॉस्पिटल, पुन्हा थोड्या वेळात तिला घेऊन घरी आला व मोकळी व्हील चेअर हॉस्पिटल मधे परत देऊन आला, घरी येऊन लगेच पुन्हा बाहेर पडला, आता मात्र स्कुलबॅग खांद्यावर होती, साधारण पाऊण एक तास मॅडम हे सगळं बघत होत्या ..!
अजय शाळेत गेल्यावर त्या अजय च्या घरी गेल्या त्याच्या आईवडिलांना भेटायला पण माहित नाही का आपण अजय च्या मॅडम आहोत हे त्यांनी सांगितलं नाही त्यांना, अर्धा पाऊण तास काय बोलणं झालं असेल त्यांचं तेवढंच, बाहेर पडल्या तेव्हा त्यांचे डोळे भरून आले होते..!
अजय च्या आईवडिलांना त्यांच्या मधुमेहा साठी दिवसातून दोनदा इन्सुलिन injection घ्यावं लागतं, औषधं महाग असल्याने विकत आणून घरात घेणं त्यांच्या परिस्थिती मुळे त्यांना परवडत नाही, सरकारी हॉस्पिटल मधे free होत असल्याने दोघांना ते दिवसातून दोनदा तिथे नेऊन देऊन आणायची जबाबदारी अजय च्या खांद्यांवर ह्या लहान वयात येऊन पडली आहे जी तो त्याची शाळा आणि अभ्यास सांभाळून आज तीन वर्ष झाले एकही दिवस न चुकता पार पाडतो आहे ..!
शाळेत जायचा आता मॅडमचा मूड नव्हता म्हणून त्या पुन्हा घरी गेल्या, बोलून आल्यापासून थोड्या अस्वस्थ होत्या बहुतेक त्या ..!
दुसऱ्या दिवशीपण शाळेत त्या गुमसुम होत्या, शिकवण्यात लक्ष लागत नव्हतं त्यांचं म्हणून मुलांना त्यांनी एक विषय देऊन निबंध लिहिण्यात गुंतवले नीटनेटका अजय नेहमी प्रमाणे आजही लेट आला, स्कूल bag जागेवर ठेऊन खाली बसणार इतक्यात मॅडम ने बोलावले …
“अजय इकडे ये “
अजय खाली मान घालून मॅडम समोर येऊन उभा राहिला, त्यांनी न सांगताच त्याने उजवा हात पुढे केला त्यांना आज खरतर त्याच्याकडे बघायची पण हिम्मत होत नव्हती तरी बसल्या बसल्या त्यांनी छडी उचलली अन् अचानक अजय च्या हातात छडी देऊन स्वतः चा उजवा हात त्याच्या समोर केला ..
” मार अजय मार, आज तू मला शिक्षा करणार आहेस, मी नाही, मार आज तुला किती छड्या मारायच्या आहेत मला त्या मार “
हे काय चाललंय अजय ला काही कळेना, कावरा बावरा झाला तो ..
” नाही मॅडम मी चुकलो, मीच नेहमी चुकतो “
रोज मार खाऊन देखील मॅडम विषयी प्रचंड आदर होता त्याच्या मनात रोज आपण चुकतोय म्हणून मॅडम नाराज होऊन असं म्हणताएत असं वाटलं त्याला, त्याने छडी टेबल वर ठेवली मॅडम उठल्या, त्याला जवळ घेतलं अन् घट्ट उराशी धरलं आणि मिटलेल्या डोळ्यातून अश्रूंना वाट करुन दिली ..!
त्यालाही रडू कोसळले गुरुशिष्यांचे अश्रू टपाटप पायावर पडून पुन्हा एकदा त्यांची फुले झालीत..!
🏵️🌹🏵️
लेखक – डॉ संजय
संग्रहिका – सुश्री हेमा फाटक
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
एकदा, इतर साऱ्या धर्मांसमोर हिंदुत्वाला अगदी क्षुल्लक समजणाऱ्या, एका तथाकथित ‘सेक्युलर’ स्त्री पत्रकारानं स्वामीजींना विचारलं :
पत्रकार : “इस्लामचा संस्थापक कोण आहे?”
स्वामीजी : “मोहम्मद पैगंबर”
पत्रकार : “आणि ख्रिस्ती धर्माचा?”
स्वामीजी : “येशु ख्रिस्त.”
पत्रकार : “आणि हिंदु धर्माचा संस्थापक?”
आपण स्वामीजींना निरुत्तर केलं आहे, असा तिचा समज झाला होता. ती विजयी स्वरात पुढे म्हणाली.. :
” या धर्माचा कुणीच संस्थापक नाही आणि म्हणूनच हिंदुत्व हा धर्म नाही, हेच सिद्ध होतं.”
स्वामीजी म्हणाले :
“अगदी बरोबर.!”
” हिंदुत्व हा धर्म नाहीच मुळी ! हिंदुत्व म्हणजे निखळ विज्ञान आहे. मानवी जीवन जगण्याचा सत्य मार्ग आहे.”
— त्या महिला पत्रकाराला काहीच कळलं नाही….
आता, स्वामीजींनी तिला प्रश्न विचारायला सुरूवात केली.
स्वामीजी : ” भौतिक शास्त्राचा संस्थापक कोण? “
पत्रकार : ” कुणाही एका व्यक्तीचं नाव नाही सांगता येणार.”
स्वामीजी :- ” बरं, रसायनशास्त्राचा संस्थापक कोण? “
पत्रकार : ” इथंही कुणा एका व्यक्तीचं नांव, नाही सांगता येणार.”
स्वामीजी : ” प्राणिशास्त्राचा संस्थापक कोण?”
पत्रकार : “अर्थातच, कुणा एका व्यक्तीचं नांव नाही सांगता येणार. अनेक शास्त्रज्ञांनी, तसंच वेगवेगळ्या काळात; ह्या शास्त्रांबद्दलच्या ज्ञानात आपापल्या परीनं वेळोवेळी भर घालून, ही शास्त्रे समृद्ध केली आहेत.”
यावर स्वामीजी बोलले –
“आधुनिक शास्त्रज्ञांनी मानवाच्या भौतिक गरजांचा विकास करण्यासाठी, वैज्ञानिक संशोधन केले आहे. त्याप्रमाणे,
हिंदूधर्मही विज्ञानच आहे—
‘ ऋषी ‘ या शब्दाचा अर्थ ‘शास्त्रज्ञ’ ! त्यांनी मानवाचा मानसिक, बौद्धिक, सामाजिक विकास करण्यासाठी संशोधन करून, लोक जागृती केली. अनेक ग्रंथ लिहून मार्गदर्शन केले आणि शतकानुशतकं त्याचा विकास होत आलेला आहे. अनेक थोर संतमहंतांनी, ऋषिमुनिंनी यावर वेळोवेळी संस्कार करून आणि आपल्या संशोधन आणि अनुभवांद्वारे समाजाला योग्य दिशा देण्याचं कार्य अव्याहतपणे सुरूच ठेवलेलं आहे.—- इस्लामचा अभ्यास करायला एकच ग्रंथ – कुराण – पुरेसा आहे. ख्रिस्ती धर्माचा अभ्यास करायला एकच ग्रंथ – बायबल – पुरेसा आहे.——
— पण हिंदुत्व म्हणजेच ‘ मानव जीवन मार्गाचा ‘ अभ्यास करण्यासाठी, अनेक ग्रंथालयांत जाऊन शेकडो पुस्तकांचा अभ्यास करावा लागेल. कारण हिंदू धर्म हा संपूर्णपणे विज्ञानाधिष्ठित धर्म आहे. तो एकाच कोणी व्यक्तीने स्थापन केलेला धर्म नाही. मानवाच्या जीवन विकासाकरिता आणि मानवाचे जीवन सुखी आणि संपन्न होण्याकरिता जो मार्ग भगवान श्रीकृष्ण, भगवान श्रीराम, अनेक ज्ञानी ऋषी, मुनी आणि संतांनी दाखवला आहे; त्या सत्य महामार्गालाच ‘ सत्य सनातन वैदिक हिंदू धर्म ‘ असे म्हणतात.”
— यावर ती महिला पत्रकार निरुत्तर झाली.
आज हिंदू धर्मीय लोकांनाही त्यांच्या धर्माबाबत अज्ञान आहे, कारण ते धर्मग्रंथांचा अभ्यास करत नाहीत. म्हणूनच म्हणतात, की जर ग्रंथ समजले तर संत समजतील, आणि संत समजले तर भगवंत समजेल; तसेच धर्म ही समजेल.
संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
त्यामुळे शाळेतून घरी आलं की आधी मॅसेजेस चेक करावे लागतात की आज किती घरी हळदीकुंकू आहे. मग एक घरी असेल तर ड्रेस, दोनचार घरी असेल तर साडी शोधावी लागते..
काय आहे ना…… एका घरासाठी साडी नेसणं म्हणजे बारशासाठी लग्नाची तयारी करण्यासारखं आहे… त्यामुळे मग ड्रेस अडकवायचा.
जर आपल्याला फारच मेकअप वगैरे काहीही करायला वेळ नसेल तर मग तर मी त्या घरी पटापट सहा वाजताच जाऊन यायचं बघते… म्हणजे अगदी सुंदर तयार होऊन आलेल्या बायकाही भेटत नाहीत आणि आपल्याला उगच आपल्याकडे सगळं असून लंकेची पार्वती बनल्याचं दुःखही होत नाही..
असो. पण हळदीकुंकवामुळे ज्या मैत्रिणी गणपतीच्या मिरवणुकीनंतर भेटल्या नव्हत्या त्याही भेटतात आणि त्या भारतातच असल्याची खात्री पटते….. तेवढेच बरे वाटते हो दुसरं काय…
शिवाय अनेक ठेवणीतल्या साड्यांना हवा लागते नी त्यानिमित्ताने त्या नेसल्या जातात……..
काही मैत्रिणींच्या नवीन साड्यांच्या घड्या मोडल्या जातात…
चांदीची भांडी त्यानिमित्ताने कपाटरुपी जेलमधून बाहेर येतात आणि त्यांना आंघोळ पांघोळ घालून आपण चकाचक करतो…
तेच ठेवणीतल्या मोठ्या पातेल्याच्या बाबतीतही होतं…. कपाटात वर कुठेतरी पडलेले मोठ मोठे भांडे बाहेर येतात नी चकाचक स्वच्छ होऊन त्यात मसाला दूध खळखळ उकळायला लागतं…
दार झाडून पुसून स्वच्छ होतं नी तिथे सुंदर रांगोळी काढली जाते… भलेही मग उठताना पायही आखडतात आणि कंबरही… तुटून हातात येतात की काय असं वाटायला लागतं, नी पाच मिनिटं म्हाताऱ्या आज्जीसारखं वाकूनच चालावं लागतं..
हळदीकुंकवाच्या दिवशी पोळ्या सकाळीच केल्या जातात आणि एखादी साधी भाजी किंवा खिचडी होणार हे जगजाहीर असतं..
घरातला पुरुष वर्ग दबकत दबकत बुटासकट थेट बेडरूम गाठतो नी तिकडेच आरामात डुलक्या घेतो….
…. असं करत करत पावणेदहा होतात आणि आता कुणी राहिलं तर नाही ना?? याचा कानोसा घेत आपण साडी फेडून गाऊन घालतो आणि जेवायला पान घेतलं की टाणकन बेल वाजते…
“ उशिरच झाला गं जरा “म्हणत मैत्रिण येते नी पुन्हा आपण हळदीकुंकवाचं ताट हाती घेतो…… आणि अशा रितीने साडीपासून सुरु झालेला हळदीकुंकवाचा प्रवास गाऊनवर येऊन संपतो..
संक्रांतीचा हा पर्वकाळ म्हणजे खरंच एक पर्वणीच असते सगळ्या मैत्रिणींना भेटण्याची…… आणि लई म्हणजे लईच बिजी असण्याची….
सखी (फक्त महिलांसाठी)
लेखिका – सुश्री योगिता कुलकर्णी
प्रस्तुती : सुश्री मीनल केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ मी प्रवासिनी क्रमांक 36 – भाग 1 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
काळं पाणी आणि हिरवं पाणी
अंदमान, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि काळं पाणी या शब्दांचं नातं अतूट आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांप्रमाणेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पदस्पर्शाने हे स्थान पवित्र झालं आहे. लोकमान्यांना ब्रह्मदेशातील मंडाले येथील तुरुंगात नेताना एका दिवसासाठी येथील कारागृहात ठेवण्यात आलं होतं. इसवी सन १९४२ साली सुभाषचंद्र बोस यांनीही या तुरुंगाला भेट दिली होती.
अंदमान व निकोबार हा दक्षिणोत्तर पसरलेला जवळजवळ ३५० बेटांचा समूह भारताच्या आग्नेय दिशेला बंगालच्या उपसागरात आहे. चेन्नई आणि कोलकता अशा दोन्हीकडून साधारण १२०० किलोमीटर अंतरावर ही बेटं येतात. पूर्वी तिथे बोटीने पोहोचण्यासाठी चार-पाच दिवस लागत. आता चेन्नई किंवा कोलकताहून विमानाने दोन- तीन तासात पोहोचता येतं. आम्ही चेन्नईहून विमानाने अंदमानची राजधानी पोर्ट ब्लेअरच्या वीर सावरकर विमानतळावर उतरलो. जेवून लगेच सेल्युलर जेल बघायला निघालो.
ब्रिटिशांनी १९०६ साली या जेलचं बांधकाम पूर्ण केलं. चक्राच्या दांड्यांसारख्या सात दगडी, भक्कम तिमजली इमारती व त्या इमारतींना जोडणारे मधोमध असलेले वॉच टाॅवर अशी या तुरुंगाची रचना आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर काही काळ अंदमान जपानी लोकांच्या ताब्यात होते. इमारतींच्या सात रांगांपैकी तीन रांगा जपान्यांनी नष्ट करून टाकल्या. आता एका इमारतीत हॉस्पिटल आहे व एकात सरकारी कर्मचारी राहतात.हा सेल्युलर जेल म्हणजे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अनेक ज्ञात व अज्ञात शूरवीरांनी भोगलेल्या हालअपेष्टांचं काळं पान. साम्राज्यवादी ब्रिटिशांना हाकलून देऊन स्वातंत्र्य मिळविण्याच्या वेडाने भारलेल्या अनेकांनी या यज्ञकुंडात उडी घेतली. अशा अनेकांना अंदमानला सश्रम कारावासाच्या शिक्षेवर पाठविले जाई. ब्रिटिशांच्या क्रूर, कठोर, काळ्याकुट्ट शिक्षांमधून केवळ काळच त्यांची सुटका करू शकणार असे. अंदमानचा तुरुंग म्हणजे काळं पाणी. एकदा आत गेला तो संपल्यातच जमा!
दगडी, दणकट, अंधारलेले जिने चढून तिसऱ्या मजल्यावर आलो. तिथल्या शेवटच्या ४२ नंबरच्या खोलीत स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वास्तव्य होते. आज त्याला पवित्र तीर्थस्थानाचं महत्त्व आहे. सावरकरांनी लिहिलेले ‘कमला’ काव्यही तेथील दगडी भिंतीवर आहे. स्वातंत्र्यवीरांचा फोटो व अशोकचक्राची प्रतिमा आहे. एकावेळी एकच माणूस जेमतेम वावरू, झोपू शकेल अशी ती अंधार कोठडी. भिंतीवर अगदी वरच्या बाजूला एक लहानशी खिडकी. जेलची रचनाच अशी की समोरासमोरच्या खोल्या एकमेकांना पाठमोऱ्या. खोल्यांच्या दगडी भिंती भक्कम आणि बाहेर लोखंडाचे मजबूत दार. बाहेरून कुलूप लावायची कडी सरळ भिंतीत घुसवलेली. स्वातंत्र्यासाठी हे लोक काय साहस करतील याचा नेम नाही म्हणून एवढा बंदोबस्त केलेला असावा. आम्ही तिथे ‘ने मजसी ने….’ जयोस्तुते श्री महन् मंगले….’ अशी गाणी म्हणून श्रद्धांजली वाहिली. अनेक ज्ञात- अज्ञात वीरांना मनोमन, मनःपूर्वक नमस्कार केला.
ध्वनीप्रकाश शोमध्ये पूर्व इतिहासावर प्रकाश पाडला आहे. अपार कष्ट भोगणारे, कदान्न खाणारे, कोलू पिसणारे, उघड्या पाठीवर फटके खाणारे, वंदे मातरम् म्हणत हसतमुखाने फासावर जाणारे ते कोवळे जीव हृदयात कालवाकालव निर्माण करतात.
स्वातंत्र्यवीर सावरकर अतिशय विज्ञाननिष्ठ होते. आधुनिक विचार व विज्ञान आपलंसं केलं तरच राष्ट्राची प्रगती होईल. राष्ट्र कणखर सुसज्ज व बलवान हवं अशीच या साऱ्या थोर नेत्यांची शिकवण होती. गोरगरीब, कष्टकरी, दलित या साऱ्यांबरोबर माणुसकीने वागण्याची, शिक्षणाचे महत्त्व सांगणारी अशी त्यांची शिकवण होती. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही हे विचार आपण पूर्णतः आत्मसात करू शकलो नाही याची खंत वाटली.
देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने आज अंदमान- निकोबार बेटांना अतिशय महत्त्व आहे. निकोबार ही संरक्षित बेटं आहेत. आपल्या हवाई दलाचा तळ इथे आहे. सर्वसामान्य प्रवाशांना तिथे जाण्याची परवानगी नाही. या निकोबार बेटाचं दक्षिण टोक जे कन्याकुमारीपेक्षाही दक्षिणेला होतं त्याला इंदिरा पॉईंट असं नाव दिलं होतं. २००४ सालच्या त्सुनामीमध्ये हे स्थान सागराने गिळंकृत केलं. अंदमानला आपल्या नौदलाचा तळ आहे. तसंच तटरक्षक दलही आहे. त्यांची अति वेगवान व अत्याधुनिक जहाजं सतत समुद्रावर गस्त घालित असतात. किनाऱ्याजवळ फ्लोटिंग डॉक आहे. त्याचे १६ अवाढव्य टँकर्स पाण्याने भरले की ते डॉक समुद्राखाली जातं. मग डॉकच्या वरच्या प्लॅटफॉर्मवर दुरुस्तीसाठी बोटी घेतल्या जातात. बोटीची दुरुस्ती, देखभाल होऊन ती बाहेर पडली की टँकर्समधलं पाणी काढून टाकलं जातं व डॉक पुन्हा समुद्रावर येतं
संस्कारधानी के सुप्रसिद्ध एवं सजग अग्रज साहित्यकार श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज” जी के साप्ताहिक स्तम्भ “मनोज साहित्य” में आज प्रस्तुत है “मनोज के दोहे”। आप प्रत्येक मंगलवार को आपकी भावप्रवण रचनाएँ आत्मसात कर सकेंगे।
(प्रतिष्ठित साहित्यकार श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ जी के साप्ताहिक स्तम्भ – “विवेक साहित्य ” में हम श्री विवेक जी की चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाने का प्रयास करते हैं। श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र जी, मुख्यअभियंता सिविल (म प्र पूर्व क्षेत्र विद्युत् वितरण कंपनी , जबलपुर ) से सेवानिवृत्त हैं। तकनीकी पृष्ठभूमि के साथ ही उन्हें साहित्यिक अभिरुचि विरासत में मिली है। आपको वैचारिक व सामाजिक लेखन हेतु अनेक पुरस्कारो से सम्मानित किया जा चुका है।आज प्रस्तुत है एक विचारणीय आलेख – वैश्विक वितरण का ई कामर्स।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – विवेक सहित्य # 191 ☆
आलेख – वैश्विक वितरण का ई कामर्स
भारतीय तथा एशियन डायसपोरा सारी दुनिया में फैला हुआ है । पिछले लंबे समय से मैं अमेरिका में हूं , मैने पाया है की यहां अनेक लोग भारत में मिलने वाली वस्तुएं लेना चाहते हैं पर वे चीजें अमेजन यू एस में उपलब्ध नहीं हैं । अमेजन द्वारा या अन्य किसी के द्वारा वैश्विक वितरण का ई कामर्स शुरू हो सकता है , लोग फ्राइट चार्ज सहज ही दे सकते हैं । इस तरह की सेवा शुरू हो तो लोगों की जिंदगी आसान हो सकेगी । अभी भी ये वस्तुएं अमेरिका में मिल तो जाती हैं पर उसके लिए किसी इंडियन या पाकिस्तानी , बांग्लादेशी स्टोर्स में जाना होता है । अमेजन का अमेरिका सहित प्रायः विभिन्न देशों में बड़ा वितरण , तथा वेयर हाउस नेटवर्क है ही , केवल उन्हे अंतरराष्ट्रीय स्तर पर डिलीवरी प्रारंभ करनी है ।
मुझे स्मरण है की पिछले कोरोना काल में मैने अपने बच्चों को बड़े बड़े पार्सल सामान्य घरेलू खाने पीने के सामानों की भेजी थी , जिसमे मकर संक्रांति पर तिल के लड्डू भी थे । सात दिन में पार्सल हांगकांग , अमेरिका , लंदन , दुबई पहुंच गए थे ।
नए स्टार्ट अप हेतु भी मेरा यह सुझाव एक बड़ा अंतर्राष्ट्रीय व्यवसाय बन सकता है , जो अच्छा खासा निर्यात कर सकता है ।