मराठी साहित्य – विविधा ☆ “हो.. माहितीये मला..” ☆ योगिया ☆

? विविधा ?

☆ “हो.. माहितीये मला..” ☆ योगिया

महाराष्ट्रात सध्या जे काय चाललंय ते आपण सगळेच बघतोय. मला राजकारणातलं काही कळत नाही पण या सगळ्यामागे जे मूळ कारण आहे ते म्हणजे  “संवादाचा” अभाव.  ट्विटर / फेसबुक असूनही संवाद काही झाला नाहीये. आपलं तरी रोजच्या जीवनात काय झालंय? हल्ली माझ्या असं लक्षात आलंय कि कोणीही कोणाशीही बोलायला गेलं कि बोलणंच खुंटत कारण पहिल्या एक -दोन वाक्यानंतर प्रतिसाद असतो ” हो.. माहितीये मला.. ” आणि मग संवादच खुंटतो. मग ते नवरा बायको असो , पालक –  बालक असो, आजी-आजोबा  – नातवंड असो.  मित्र असोत. गुरु -शिष्य असोत, तज्ञ-जाणकार आणि शिकाऊ असोत. पण हाच अनुभव.

परवा घरी आलो आणि बायकोला सांगायला लागलो कि चांदणी चौकात ट्रॅफिक जाम जॅम होता..पुढे सांगणार होतो कि कसे हाल झाले…. त्यात आज नेमका ऑफिसला कसा उशीर झाला.. ती ऐनवेळची मिटींग … साहेबांनी केलेलं कौतुक ..प्रमोशन चा चान्स .. वगैरे,वगैरे पण माझं वाक्य कट करून ती म्हणाली “कि हो माहितीये मला..” , मला व्हाट्स ऍप वर व्हिडिओ आलाय..हा बघ .”  माझी पुढे बोलायची इच्छाच नाही झाली.   

IPL बघत होतो. मुलगा खाली खेळून आला. आल्या -आल्या त्याला आनंदाची बातमी सांगितली कि कोहोली आउट झाला (तो मुंबई फॅन आहे). तो म्हणाला “हो.. माहितीये मला.. . त्यावरचे इन्स्टा वर मिम्स पण आले आहेत कि तो अनुष्काच्या पदरा मागे लपलाय वगैरे.” तो कसा आउट झाला, त्याचा कोणी कॅच कसा अफलातून घेतला, नवीन बॉलरचा गुगली कसला भारी होता वगैरे सांगायचं राहून गेलं.

मुलगी शिकायला अमेरिकेला जायची होती. तिला म्हंटलं चल तुला माझ्या मित्राकडे घेऊन जातो..तो तिथे ४ वर्षे होता. तो तुला सांगेल तिकडे कसं असतं. ती म्हणाली बाबा “हो.. सगळं  माहितीये मला.” …मुलगी अमेरिकेला जायच्या आधी मित्राकडे जायच्या निमित्ताने तिच्याबरोबर तास दोन तास घालवायचे ठरवले होते.  जरा तिकडच्या कल्चर बद्दल तिच्याशी बोलू ठरवलं होतं ते राहून गेलं.

बाबांना ऐकू कमी येतं. म्हणून परवा म्हंटल त्यांना “मन कि बात” मधे मोदी काय बोलले ते सांगावं . जरा त्यांच्या बरोबर वेळ घालवता येईल. मी सुरवात केली तर तेच म्हणाले “हो.. माहितीये मला..” .. त्यांच्या जेष्ठांच्या ग्रुप वर आल्रेडी भाषण टाईप करून आलं होतं. 

बऱ्याच दिवसांनी ४ दिवसासाठी माहेरी गेले होते. आईशी खूप गप्पा मारायच्या होत्या. आईला म्हंटलं “आमच्या शेजारी नवीन बिऱ्हाड आलंय”. आई म्हणाली “हो.. माहितीये मला..  त्यांच्या ट्रक आला तेव्हाच तू फोन करून सांगितलं होतंस कि बहुदा तुमच्या शेजारचेच आले असावेत. मग आर्ध्यातासाने फोन करून तूच नाही का सांगितलंस कि कुलकर्णी म्हणून नगरचे आहेत. स्टेट बँकेत आहेत. दोन मुलं आहेत म्हणून. इ. इ . इ.  ” चार दिवसांसाठी गेलेली मी दोन दिवसांनीच परत आले.

परवा नातू धावत धावत आजी कडे गेला. आजी -आजी रिझल्ट लागला. पण पहिल्या वाक्यानंतर आजीचं म्हणाली “हो.. माहितीये मला.. आईने व्हाट्स ऍप केला होता..  गणितात ९४, शास्त्रात ९० … वगैरे वगैरे. नातवाला काय काय सांगायचं होतं, मी कितवा आलो, मित्रांपेक्षा कसे छान मार्क्स पडले, टीचर्स कशा गुड म्हणाल्या  , पण त्याच्या फ्लोच एकदम कट झाला आणि  नातू मोबाईल खेळायला पळाला.

मला माझं बालपण आठवलं. चौथीत असताना इतिहासात शिवाजी महाराज आले.  मी रोज शाळेतून आल्या आल्या इतिहासाच्या तासाला काय झाले ते आजी-आजोबांना , मग संध्याकाळी आई-बाबांना सांगायचो.  मला आठवतंय कि मी एक दिवस आल्या आल्या आजीला सांगितलं कि शिवाजी महाराजांनी शाईस्तेखानाची  बोटे छाटली.

आजीने विचारलं “हो का ? का छाटली पण”

मग मी का ,कसं ,कुठे सांगितलं… आजी प्रश्न विचारत राहिली आणि आम्ही थेट स्वराज्याची शप्पथ पर्यंत पोहोचलो. आता हसू येतं कि आजीला काय हे माहित नसेल? पण ती इतक्या निरागसपणे विचारात राहिली कि त्यावेळी मला वाटत होत मी आजीच्या ज्ञानात भर घालतोय.

शेवटी आजोबांनी एक प्रश्न विचारला “का रे पण उजव्या हाताची छाटली का डाव्या ?”

पुढे २  वर्षे मी याचा शोध घेत होतो. त्यादरम्यानच मग बाबांनी बाबासाहेब पुरंदरेंबद्दल सांगितलं. मग मी त्यांच्या पत्ता शोधून हा प्रश्न पोस्टाने त्यांना विचारल्याचं पण आठवतंय. त्यावेळी माहित नव्हतं यालाच ध्यास म्हणतात.

२ आठवडयांनी आजीनी विचारलं “मग शिवाजी महाराजांनी पुढची कुठली मोहीम हाती घेतली?”

“अंग इतिहासाचा तासच झाला नाही ..भूगोल शिकवला”

“काय शिकवलं भूगोलात” –  आजोबा

“गोदावरी नदी बद्दल”

“हा ते भाक्रानांगल धरण धरण बांधलंय ना पैठणजवळ”

“आजोबा तुम्हाला काहीच माहित नाही…ते जायकवाडी धरण” पहिलं मातीच धरण , मग गोदावरीला दक्षिण गंगा का म्हणतात .. गंगा , यमुना , सिंधू ..सिंधूच्या पार अटकेपर्यंत मराठे कसे गेले..पेशवे .. राजाराम महाराज , संभाजी महाराज ते परत शिवाजी महाराज … आता गंमत वाटते कि आम्ही कुठूनही कुठेही पोहोचायचो.”

“छोटू बाबा ..आम्ही तुझ्या एवढे होते तेव्हा हे धरणच नव्हतं त्यामुळे माहित नाही मला”….. आजोबा

आता माझ्या आजोबांना काय हे माहित नसेल पण आव तर असा आणायचे आणि माझ्याकडून माहिती काढून घ्यायचे..पाहायचे मला किती माहित आहे. नंतर आई -बाबांना सांगत असावेत कारण काही दिवसांनी आमची एक दिवसाची ट्रिप भाटघर  धरणावर झाली. आईचा एक चुलत भाऊ तिथे इंजिनिअर होता. मग त्याने धरण , पाणी कसं मोजतात, कॅचमेंट एरिया , धरणाची दारं , वीज कशी बनते , धरणाचं अर्थशास्त्र असं काय काय सांगितलं.  कदाचित पुढे मागे नुसतं वाचून माहिती झालं असतही पण कळलं कधीच नसतं. ते धरणावर कळलं. माझा आवाका वाढला हे निश्चित.

आता असं वाटतं कि आजी -आजोबा जर म्हणाले असते कि “हो.. माहितीये मला..” तर कदाचित हे सगळं कळलंच नसतं किंवा कधी तरी मी नुसतं वाचलं असत पण अनुभवलं नसतं. आजी-आजोबांना शिवाजी समजून सांगताना माझ्यात तो चढायचा असं आजोबा म्हणायचे. ते सगळं आता आठवतंय. खरंच ते म्हणले नाहीत “हो.. माहितीये मला..” आणि मी समृद्ध होत गेलो.

माणूस हा मुळात संवादशील प्राणी आहे. संवाद हि त्याची गरज आहे. बऱ्याचवेळा त्याला त्याचा अनुभव शेअर करून दुसऱ्याच्या  जाणिवेत व्हॅल्यू ऍड करायची असते. दुसऱ्याला सांगताना आपला अनुभव पडताळून पहायचा असतो. तो बोलतो तेव्हा माहिती सांगतो पण भावना शेअर करतो. पण “हो.. माहितीये मला..” या वाक्याने त्याच्या उत्साहाच्या धबधब्याच्या रूपांतर झऱ्यात होत आणि मग तो आटूनच जातो. आणि मग भावनांचा दुष्काळ वगैरे निर्माण होतो. मग चिडचिड. त्यापासून दूर राहण्यासाठी परत डिव्हाईस ला जवळ करायचं.. मग आहेतच लाईक्स, मिम्स , इन्स्टा स्टोरीज .त्यातून कळलेली अर्धवट माहिती (हे अर्धवट माहिती प्रकरण फार डेंजर आहे ..अफवा, दुस्वास , असहिष्णुता येथेच जन्म घेतात) आणि मग परत “हो.. माहितीये मला..”

एका विचित्र चक्रात आडकतोय आपण. चक्र कसलं ..समाज स्वास्थ्य बिघवडणारा चक्रव्यूव्हच तो.  ठेवायचं का आपण “हो.. माहितीये मला..” ला जरा दूर. समोरचा बोलत असताना त्याचं पूर्ण ऐकण्या एवढा वेळ काढू ना आपण.  “हो.. माहितीये मला..”  ऐवजी  “हो का..माहित नव्हतं ..मग पुढे काय झालं” असं म्हणून पाहू ना काही दिवस. नक्की फरक पडेल. मला खात्री आहे.  (प्लीज यावर हो.. माहितीये मला..म्हणू नका).

जरूर करून बघा. शेअर करून बघा. 

– योगिया

(ygokhale@hotmail.com / ९८८१९०२२५२)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ स्थळ…. भाग – 1 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? जीवनरंग ❤️

☆ स्थळ…. भाग – 1 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

रात्री झोपायचीच तयारी करत होते. 

गोळ्या घेतल्या. नाईट क्रीम लावली. डोळ्यात ड्रॉप्स टाकले. पांघरुणाची घडी उलगडली. पुस्तक हातात घेतलं. तेवढ्यात फोन वाजला.

पलीकडून आवाज.

” काकू झोपला नाही ना अजून?”

” नाही. तुझा फोन उचलला म्हणजे नक्कीच ना. हं बोल. “उद्या सकाळी सात वाजता आम्ही तुम्हाला घ्यायला येतो. तयार रहा. आपल्याला कोल्हापूरला जायचे आहे.”

” अग पण”

” नाही तुम्ही काही कारण सांगू नका. तुम्ही येणार आहात. “अग पण”

” हे बघा अनुभव साठी एक चांगलं स्थळ आलंय. फेसबुक वर मुलीचे फोटो पाहिलेत. चांगली  वाटते. बाकी सगळं सविस्तर मी तुम्हाला सांगेनच. मुख्य म्हणजे अनुभव ही मुलगी बघायला तयार झालाय.

” तो येणार असेलच ना?”

” नाही ना. पण तो म्हणाला, तुम्ही भेटून घ्या. तुम्हाला पटलं तर आपण पुढे जाऊ.

म्हणताना मी म्हणाले,” बरं येते. सकाळी तयार राहते.”

पण मनात दुसरंच होतं. एक तर मला अशा प्रकारच्या मुलाखतींना उपस्थित राहणे आवडत नाही. अनुभव का येणार नव्हता? लग्न तर त्याला करायचं ना? आणि लोकेश, दीपा तरी हे असं कसं चालवून घेतात?

गेली दोन-तीन वर्ष अनुभवचं वधु संशोधन चालू आहे. खरं म्हणजे भक्कम वैवाहिक पार्श्वभूमी असतानाही, कुठे मनासारखं जुळत नव्हतं. उत्तम शिक्षण. उत्तम नोकरी. भरभक्कम बँक बॅलन्स. पुण्यात प्रशस्त फ्लॅट. दाराशी महागड्या गाड्या. म्हणायला, अनुभवला थोडसं टक्कल होतं. पण तो काही मोठा अडथळा नव्हता. म्हणजे नसावा. म्हणजे काही मुलींनी, त्याला त्या कारणास्तव नाकारलं होतं. पण बऱ्याच ठिकाणी अनुभवच… “काहीतरीच काय मला मुळीच क्लिक होत नाही” असे म्हणून मोकळा व्हायचा.

आज-काल तर त्यांनी अशा  बैठकींना येण्याचही बंद केलं होतं.

दीपाची आणि त्याची खूप भांडणं व्हायची. वाद व्हायचे.तुझं लग्न तूच का नाही जमवलंस इथपर्यंत विषय ताणला जायचा. शेवटी अनुभव उठून बाहेर जायचा. आणि मग तो विषय संपायचा. नव्हे तिथेच अर्धवट राहायचा.

क्रमश:…

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “सोन्याची गट्टी फू”… भाग-2 – सुश्री शीतल श्रीधर माडगूळकर ☆ सुश्री सुलू साबणे जोशी ☆

? मनमंजुषेतून ?

☆ “सोन्याची गट्टी फू”… भाग-2 – सुश्री शीतल श्रीधर माडगूळकर ☆ सुश्री सुलू साबणे जोशी ☆

(हा विचारही त्यांच्या हळव्या कविमनाला सहन झाला नव्हता…)इथून पुढे —-

या सगळ्या प्रसंगातून एका सुंदर बालगीताचा जन्म झाला…. ते बालगीत असे होते….

आल गट्टी –गाल गट्टी

सोन्याची गट्टी फू…

तुला मी खेळात घेणार नाही

जेम गोळ्या देणार नाही 

आलास तर घेईन गालगुच्चा 

अंगावर सोडीन भू….

                     

पं गाडी, कुक गाडी, 

मामाघरची हम्मा गाडी

आम्ही सगळे भूर जाऊ

एकटाच बस जा तू …..   

                        

पप्पू, बिंटी, वेदा, राणी

आम्ही खेळू छप्पा पाणी 

तूच एकटा बाथरूममध्ये 

रडवे डोळे धू……

किती गोड बालगीत आहे हे…. सुमित्र लहानपणी बोबडे बोलायचा. त्यामुळे ‘सोन्याशी’ न म्हणता पपांनी लाडिकपणे ‘सोन्याची’ असा शब्द वापरला आहे आणि नंतर आपली नाराजी व्यक्त केली आहे. खरे तर त्यांना त्याच्याशी करायचीय ‘कट्टी फू’, पण लाडक्या नातवाशी ‘गट्टी’ असल्यामुळे ‘कट्टी फू’ शब्द न वापरता ‘गट्टी फू’ असा शब्द वापरला आहे.

एकदा असेच रात्री जेवण झाल्यावर पपा सुमित्रचे बोट धरून पंचवटीच्या अंगणात शतपावली करत होते. समोर आकाशात चंद्र शोभून दिसत होता. त्याने पपांना प्रश्न विचारला, “हा चंदामामा कोण असतो? त्याला पाय नसतात. मग तो पळतो कसा? तो मामा असून घरी का येत नाही?” त्याला पपांनी योग्य ती उत्तरे दिली आणि दुसरे एक बालगीत जन्माला आले.

सांगा ना हो आजोबा 

कोण असतो चांदोबा? 

     

पंख नाहीत, पाय नाहीत 

फिरतो कसा कुणाला माहीत?

बघावे तेव्हा खुशीत असतो

हसत असतो वेडोबा.

    

आजी म्हणते ‘चंद्रदेव’ 

रागवेल तो, आधी जेव 

नाहीतर तुझा दूध भात 

पळवून नेतील बोकोबा.

‘चंदामामा’ म्हणते आई 

घरी कधी तो येत नाही 

असला कसला भाऊ तिचा हा 

उंचावरचा शहाणोबा.

बाबा म्हणतात “कळेल कळेल”

तुझे उत्तर तुला मिळेल 

मोठा हो, शाळा शिक 

आजच कसला खोळंबा?

अधांतरी हा फिरतो गोल

त्याला कसले देता मोल? 

चांद म्हणजे माती, दगड 

बडबड करिती दादोबा.

सुमित्र सहा सात महिन्याचा असताना बालकृष्णासारखा एक पाय ओढत घरभर रांगू लागला होता. पपा व्हरांड्यात लिहीत बसले असले तरी त्यांचे सुमित्रकडे बारीक लक्ष असायचे. तो रांगत रांगत व्हरांड्यात गेला की, पायऱ्यांवरून पडेल अशा भीतीने ते त्याला उचलून घेत आणि हाक मारत, “माया, हा इथे आलाय बघ रांगत रांगत…”, मग मी किंवा कोणीतरी त्याला उचलून आत आणून हॉलचे दार तो पपांना त्रास देऊ नये म्हणून लोटून घेत असू. तो बंद दारापर्यंत जाऊन परत मागे फिरत असे.

एकदा असेच त्याची अंघोळ झाल्यावर त्याचे अंग पुसून कपडे घालण्याआधी तो भराभर रांगत आपल्या आजोबांना भेटायला गेला. नुकत्याच वर्तमानपत्रात वाचलेल्या देशा- विदेशातल्या विचित्र घटना आणि त्याची कल्पनाही नसणारे निरागस, अजाणपणे वावरणारे त्यांचे नातवंडं याचा दुवा त्यांच्या मनात नकळत सांधला गेला आणि पपांच्या एका सुंदर कवितेने जन्म घेतला. कवितेचे नाव होते – ‘नागडे नातवंडं’ 

त्या कवितेचा भावार्थ असा होता….. आजकाल मानवतेची विटम्बना होईल इतकी समाजात नीतीमूल्ये ढासळत आहेत. एकत्र कुटुंबपद्धती मोडीत निघाली आहे. सत्यालाच न्याय मिळेल आणि त्याचा विजय होईल अशी शाश्वती राहिली नाही. जगावर स्वामित्व गाजवण्यासाठी सत्ताधारी देश तीव्र संघर्षापर्यंत पोहोचत आहेत. जगात ही जी विपरित परिस्थिती निर्माण होतेय, जी उलथापालथ होतेय – त्याची या भावी निरागस पिढीला काही कल्पना नाही. ती अजाणपणे, निरागसपणे, निश्चिन्तपणे जगात वावरते आहे. ‘नागडे नातवंडं’ म्हणजे ही निरागस, तिसरी पिढी! खूप सुंदर कविता आहे ती….

त्या कवितेतील काही ओळी अशा होत्या….

प्रलय जवळ आला आहे 

अनीतीचा कळस झाला आहे 

न्यायाचे नाव राहिलेले नाही 

सत्याला गाव राहिलेले नाही 

असे वाटते आहे की

आभाळातील नक्षत्रमाळ तुटून 

धरणीच्या मस्तकावर पडते आहे

माझे अजाण नातवंडं अंगणात 

नागड्याने बागडते आहे…

क्रमशः…

  – सुश्री शीतल श्रीधर माडगूळकर

संग्राहिका – सुश्री सुलू साबणे जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ स्त्रियांच्या विविध आणि सुंदर छटा… ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ??‍?

स्त्रियांच्या विविध आणि सुंदर छटा… ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

डेअरी दुकानात श्रीखंडासाठी रांगेत उभा होतो. तिथे एकाच ठिकाणी ” दूध, दही, ताक, लोणी, तूप “

बघून वाटलं की अरेच्या, ह्या तर सर्वच स्त्रीच्या जीवनाच्या अवस्था आहे..!  पाहूया कसे ते..?—-

दूध” 

दूध म्हणजे लग्नापूर्वीचं जीवन: कुमारिका.

दूध म्हणजे माहेर . दूध म्हणजे आईवडिलांशी नातं —शुभ्र, सकस, निर्भेळ—-

स्वार्थाचं पाणी टाकून वाढवता येत नाही,ते लगेच बेचव होतं. 

त्यावेळी तिला आपल्यासारखं जग सुद्धा स्वच्छ ,सुंदर,निरागस दिसतं.

दही

कन्यादानाचं विरजण लग्नात दुधाला लागलं की  कुमारिकेची वधू  होते . दुधाचं  नाव बदलून दही होतं ! 

दही म्हणजे त्याच अवस्थेत थिजून घट्ट होणं !–लग्नाच्या दिवशी मुलीची झालेली बायको पुढे अनेक वर्षे त्याच भूमिकेत थिजून राहते. –दही म्हणजे मुलीचं आपल्या लग्नाशी असलेलं घट्ट नातं. ” कितीही मारहाण करणारा,व्यसनी,व्यभिचारी, मनोरुग्ण किंवा नुस्ता कुंकवाचा धनी असलेला नवरा असला “ तरी” स्त्री त्याच्याप्रती  एवढी निष्ठा का दाखवते ? नवरा हा “पती परमेश्वर” म्हणून ? नव्हे –

तर याचं उत्तर म्हणजे तिचं आपल्याच लग्नाशी असलेलं घट्ट नातं.

ताक” 

सर्वसामान्य स्त्रिया लग्नात दही झाल्या की दुसऱ्या दिवसापासून संसाराच्या रवीने घुसळल्या जातात,त्यांची आता सून होते, म्हणजे “ताक” होतं.– ” दूध जसं सकस तसं ताक बहुगुणी.”

‘बडबडणारी सासू असो ( वात प्रकृती ) किंवा  खवळलेला नवरा असो  (पित्त प्रकृती)’–ताक दोघांनाही शांत करतं.. हा यावरचा उत्तम उपाय आहे असं आयुर्वेद म्हणतो.

“ताक” म्हणजे सुनेचं सासरशी नातं. सासरी स्त्री ताकासारखी  बहुगुणी असावी लागते. सगळ्या प्रश्नावर तीच उपाय. तिथे दूध पचत नाहीच ! ‘दूध’ पाणी घालून बेचव होतं पण ‘ताक’ मात्र पाणी घालून वाढत राहतं आणि अनेक वर्ष  संसारातल्या सगळ्या प्रश्नांवर कामी येतं .

लोणी” 

अनेक वर्ष संसाराच्या रवीने घुसळून घेत ताक सर्वाना पुरुन उरतं. मग २० वर्षांनी जेव्हा माझं फलित काय असा प्रश्न ताक विचारतं, तेव्हा मऊ,रेशमी, मुलायम, नितळ लोण्याचा गोळा नकळत वर आलेला दिसतो . हे लोणी म्हणजे नवऱ्याशी नातं. रवीच्या प्रत्येक घुसळणीत ह्या नात्याचे कण  कण  ‘लोणी’ होऊन हळूच बाजूला जमा होत असतात हे तिच्या लक्षात येत नाही. कानावरच्या चंदेरी बटा खरं तर रोज आरशात  लाजून तिला सांगत असतात. पण तिला त्यांची ही भाषा कळत नाही . तरुण दिसण्यासाठी ती त्या बटांचं तोंड काळं करते. ‘ताकाला’ पुन्हा ‘दूध’ व्हायचं असतं, हा वेडेपणा नाही का ?

तूप

‘लोणी’ ही तिची अंतिम अवस्था नसते म्हणून ते फार काळ धरून ठेवता येत नाही. ते आपलं रूप बदलतं . नव-याच्या नात्याचं प्रेम कढवून ती आता घरासाठी, नातवांसाठी आज्जीचं नवं रूप घेते – आणि त्याच लोण्याचं आता कढवलेलं “साजूक तूप होतं”.  वरणभात असो ,शिरा असो ,किंवा बेसन लाडू असो, घरातल्या प्रत्येक गोष्टीत आता आजी नावाचं पळीभर  साजूक तूप पडतं आणि जादू घडते.

देवासमोरच्या चांदीच्या छोट्या निरांजनात तुपाच्या लहानश्या गोळ्यात खोचलेली वात  बघितली की मला घरासाठी येताजाता हात जोडणारी चंदेरी केसांची आजी दिसते.

घरासाठी, कुटुंबासाठी प्रार्थना करत करत हे ‘तूप’ संपून जातं.हीच ती स्त्रीची  अंतिम उच्च  अवस्था होय.

” दूध ते तूप ” हा असा अनोखा स्त्रीच्या आयुष्याचा प्रवास. 

” स्त्री आहे तर श्री आहे असं  म्हटलं तर वावगं ठरू नये.”

—” असा हा स्त्रीचा संपूर्ण प्रवास- न थांबणारा, सतत धावणारा,न कावणारा, न घाबरणारा, कुटुंबासाठी झिजणारा, कुटुंबाची काळजी घेणारा “. —–

ह्या प्रवासास तथा समस्त स्त्री वर्गास मानाचा मुजरा ll.

संग्राहिका : स्मिता पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मीप्रवासीनी ☆ मी प्रवासिनीक्रमांक २५- भाग १-कारीबू केनिया ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक २५- भाग १ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ कारीबू केनिया ✈️

मुंबईहून विमानाने केनियाची राजधानी नैरोबी इथे उतरलो तेव्हा ‘कारीबू केनिया’  असे लिहिलेल्या, सुहास्यवदना ललनांच्या जाहिराती दिसल्या. गाईडने सांगितले की ‘कारीबू’ म्हणजे सुस्वागतम!

नैरोबीच्या हॉटेलमध्ये नाश्ता करून खूप लवकर निघालो.   पाचशे किलोमीटर्सचा प्रवास करून ‘मसाईमारा’ या जगप्रसिद्ध नॅशनल रिझर्वमध्ये पोहोचायचे होते.आमच्या ‘टोयोटो लॅ॑डक्रुझर’ या दणकट गाडीचा ‘चक्रधर’ डॅनियल हा सुशिक्षित पदवीधर आणि बोलका होता. शेवटचे शंभर किलोमीटर रस्ता असा नव्हताच. उंच- सखल खडबडीत जमीन, गवत, झुडपे, पाण्याचे ओहोळ असे असलेला, प्रवासी गाड्यांच्या वाहतुकीने तयार झालेला, हाडं खिळखिळी करणारा तो जंगल मार्ग होता आणि डॅनियल म्हणत होता ‘हाकुना मटाटा, हाकुना मटाटा’. ‘नो प्रॉब्लेम, डोन्ट वरी. आणखी पुढे तुम्हाला खऱ्या जंगलाचा विलक्षण अनुभव मिळणार आहे त्याची ही पूर्वतयारी आहे!’

घनदाट जंगलातल्या हॉटेलमध्ये जेवण करून थोडी विश्रांती घेतली आणि गेम ड्राईव्हसाठी म्हणजे प्राण्यांच्या भेटीसाठी निघालो.

लँडक्रुझरमधून बाहेर मैलोगणती सोनेरी हिरवा गवताळ प्रदेश दिसत होता. निसर्गाच्या त्या भव्य  कॅनव्हासवर  काळे- पांढरे पट्टे असलेले झेब्रे, खाली माना घालून अखंड चरणाऱ्या थोराड, काळपट रानटी म्हशी, मोठ्या कानाचे हत्ती कळपांनी दिसत होते.सिंहाचे सहकुटुंब  कळप होते. नाकावर दोन शिंगे असलेले गेंडे होते आणि सोनेरी तांबूस रंगाच्या हरिणांचे ( गेझल्स ) कळपच्या कळप दिसत होते. सिंह, हत्ती, रानटी म्हैस, बिबळ्या आणि गेंडा यांना इथे ग्रेट फाईव्ह म्हणतात त्यांचे मनसोक्त दर्शन झाले.

आफ्रिकन आणि आशियाई हत्तीखालोखाल, पांढरा गेंडा हा पृथ्वीवरील अवाढव्य प्राणी आहे. आपल्या कळपाची विशिष्ट हद्द ते स्वतःच्या एक प्रकारच्या उग्र गंधाने आखून घेतात. त्या हद्दीत इतर गेंडे आल्यास जीवघेणी मारामारी होते. लांबवर एक मोठा पक्षी गवतात काही टिपताना दिसला. दुर्बिणीतून पाहिल्यावर त्याची लांबलचक चोच नजरेत भरली. लाल ,काळी आणि पांढरी अशी तिरंगी चोच,   पांढरे पोट आणि काळी पाठ असलेल्या या पक्षाला ‘सॅडल बिल्ड स्टॉर्क’  म्हणतात असे गाईडने सांगितले.

संध्याकाळ झाली होती. जोरदार पाऊस सुरु झाला होता.  जंगल अनुभवून हॉटेलच्या दाराशी आलो तर इतर प्रवासी समोरच्या डोंगराकडे दुर्बिणी आणि कॅमेरे रोखून पहात होते. डोंगर माथ्यावर काळ्या ढगांचा गच्च पडदा होता. पावसात भिजत नीट निरखून पाहिले तर त्या डोंगराच्या खबदाडीत एक सिंहाचे कुटुंब शिकारीवर ताव मारीत होते. सिंहीणीने शिकार करून आपल्या कुटुंबासाठी इथे ओढून आणली होती आणि ती बाजूलाच पंजे चाटीत बसली होती. ‘जीवो जीवस्य जीवनम्’.

दुसऱ्या दिवशी मसाईंचे एक गाव बघायला गेलो. तीन- चार तासांचा जीपचा खडतर प्रवास होता. या प्रवासात वाटेत खूप ठिकाणी शेकडो गाई- गुरांचे अनेक कळप दिसत होते. त्यांच्याबरोबर होते उंचनिंच, काटक, कणखर मसाई पुरुष! त्यांनी कमरेला अर्ध्या लुंगीसारखे लाल, भगव्या रंगाचे वस्त्र गुंडाळले होते.  मोठ्या डिझाईनची निळी, पिवळी चादर दोन्ही खांद्यांवरून गुंडाळून घेतली होती. हातात काठी, भाला आणि कमरेला धारदार सुरा होता. काही तरुणांच्या चेहऱ्यावर पांढऱ्या मातीने रंगविले होते. नुकतीच ‘सुंथा’ झालेले तरुण असे चेहरे रंगवितात अशी माहिती आमच्या ड्रायव्हरने दिली.

मसाई गावात पोचल्यावर तिथल्या एकाने इंग्लिशमधून बोलायला सुरुवात केली. तो व तिथल्या गावप्रमुखांनी जवळच्या मोठ्या गावात जाऊन शालेय शिक्षण घेतल्याचं कळलं. आधीच ठरविलेले डॉलर्स हातात पडल्यानंतर तिथल्या गावप्रमुखांनी डोक्यावर सिंहाच्या आयाळीची टोपी आणि हातात रानटी म्हशीचे लांब, वेडेवाकडे शिंग तोंडाजवळ आडवे धरून आमचे स्वागत केले. आम्ही दिलेले डॉलर्स मुलांच्या शाळेसाठी वापरण्यात येतात असेही त्याने सांगितले. साधारण तीनशे लोकवस्तीचे हे गाव. त्यांचा मूळ पुरुषही मध्येच डोकावून गेला. त्याला १७ बायका व ८७ मुले असल्याचे सांगण्यात आले. म्हणजे हे छोटं गाव एका पुरुषाच्या भल्या मोठ्या कुटुंबाचा विस्तार होता.

गोलाकार मोठ्या कुंपणाच्या कडेने छोट्या चौकोनी झोपड्या होत्या. माती, शेण, गवत यांनी बांधलेल्या त्या झोपड्यांवर घट्ट विणलेल्या गवताचे उतरते छप्पर होते. गाई- गुरांचे शेण सर्वत्र पडलेले होते. माशा घोंगावत होत्या. छोट्या मुली कडेवर भावंड घेऊन आमच्याकडे टुकूटुकू बघत होत्या. काही छोटी मुलं खाली जमिनीवर झोपली होती. मुलांच्या सर्वांगावर माशा बसत होत्या. शेणाचा धूर करून या माशांना हाकलत का नाही असं विचारल्यावर,’ या माशा प्रेमाचे प्रतीक आहेत. जितक्या जास्त माशा अंगावर तितके त्यांचे नशीब चांगले’ असे निरुत्तर करणारे उत्तर मिळाले.

आमच्या स्वागतासाठी आठ-दहा मसाई स्त्रिया अर्धगोलाकार उभ्या राहून नाच करू लागल्या. त्यांचा नाच म्हणजे केवळ उंच उड्या व अधून मधून किंचाळल्यासारखे ओरडणे होते. मग आमच्यातील काहीजणींनी त्यांना फुगड्या घालून दाखविल्या. गरबा खेळून दाखविला. तेव्हा त्यांनीसुद्धा आमच्याबरोबर फुगड्या घातल्या. सर्व स्त्रियांनी एका खांद्यावरून पदर घेऊन, अंगाभोवती वस्त्र गुंडाळले होते. आणि पाठीवरून एक वस्त्र घेऊन त्याची पुढे गाठ बांधली होती. लाल, पिवळ्या, भगव्या, निळ्या रंगांची ती मोठ्या डिझाईनची वस्त्रं होती. सर्वांच्या डोक्याचे गोटे केलेले होते. गळ्यात, हातात रंगीत मण्यांच्या  भरपूर माळा होत्या. कानामध्ये मण्यांचे इतके जड अलंकार होते की त्यांचे  कान फाटून मानेपर्यंत लोंबत होते.

केनिया  भाग १ समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – पुस्तक चर्चा ☆ एक देश जिसे कहते हैं – बचपन – दीप्ति नवल ☆ श्री कमलेश भारतीय ☆

☆ पुस्तक चर्चा ☆ एक देश जिसे कहते हैं – बचपन – दीप्ति नवल ☆ श्री कमलेश भारतीय ☆

(एक संवेदनशील अभिनेत्री, कवियित्री एवं लेखिका की संवेदनशील पुस्तक पर चर्चा निश्चित रूप से श्री कमलेश भारतीय जी जैसे संवेदनशील-साहित्यकार की संवेदनशील दृष्टी एवं लेखनी ही न्याय दे सकती है, यह लिखने में मुझे कोई संदेह नहीं है। श्री कमलेश भारतीय जी की इस चर्चा को पढ़कर इस पुस्तक की ई-बुक किंडल पर डाउनलोड कर कुछ अंश पढ़ने से स्वयं को न रोक सका। इसका एक कारण और भी है, और वह यह कि दीप्ति नवल जी हमारे समय की उन अभिनेत्रियों में हैं, जिनके प्रति हमारी पीढ़ी के हृदय में अभिनेत्री एवं साहित्यकार के रूप में सदैव आदर की भावना रही है। – हेमन्त बावनकर, संपादक – ई- अभिव्यक्ति  )

श्री कमलेश भारतीय 

(जन्म – 17 जनवरी, 1952 ( होशियारपुर, पंजाब)  शिक्षा-  एम ए हिंदी , बी एड , प्रभाकर (स्वर्ण पदक)। प्रकाशन – अब तक ग्यारह पुस्तकें प्रकाशित । कथा संग्रह – 6 और लघुकथा संग्रह- 4 । यादों की धरोहर हिंदी के विशिष्ट रचनाकारों के इंटरव्यूज का संकलन। कथा संग्रह -एक संवाददाता की डायरी को प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी से मिला पुरस्कार । हरियाणा साहित्य अकादमी से श्रेष्ठ पत्रकारिता पुरस्कार। पंजाब भाषा विभाग से  कथा संग्रह-महक से ऊपर को वर्ष की सर्वोत्तम कथा कृति का पुरस्कार । हरियाणा ग्रंथ अकादमी के तीन वर्ष तक उपाध्यक्ष । दैनिक ट्रिब्यून से प्रिंसिपल रिपोर्टर के रूप में सेवानिवृत। सम्प्रति- स्वतंत्र लेखन व पत्रकारिता)

‘मैंने अपने घर चंद्रावली की छत से एक पत्थर का टुकड़ा साथ की मसीत के गुम्बद की ओर फेंका – आखिरी बार। गुम्बद पर बैठे कबूतर उड़ गये। मैंने एक आह भरकर खुद से पूछा -जैसे ये कबूतर उड़कर वापिस आ जाते हैं, क्या मैं भी कभी अपने इसी घर में अमेरिका से वापिस आ पाऊंगी ?

सच कहा, सोचा दीप्ति नवल ने हम कभी वहीं, वैसे के वैसे जीवन में वापिस नहीं लौट सकते लेकिन जो लौट सकती हैं – वे होती हैं मधुर यादें। यही इस किताब के लेखन का केंद्र बिंदु है, बचपन लौट नहीं सकता लेकिन उसकी यादें जीवन भर, समय-समय पर लौटती रहती हैं।

दीप्ति नवल ने अपने बचपन और टीनएज के कुछ सालों की यादों को इस पुस्तक में पूरे 380 पन्नों में बहुत ही रोचक ढंग से लिखा है। वैसे इसे दीप्ति नवल की आत्मकथा का पहला पड़ाव भी माना जा सकता है। और खुद दीप्ति ने भूमिका में लिखा है कि इसे मेरी बचपन की कहानियां भी कहा जा सकता है। छोटी से छोटी यादें और उनसे मिले छोटे-छोटे सबक, सब इसमें समाये हुए हैं। जैसे बहुत बच्ची थी तो दीप्ति अपनी नानी से कहती ‘चीनी दे दो, चीनी दे दो’ कहती रहती और, जब चीनी न मिलती तो कहती – लूण ही दे दो। यानी समझौता और सबक यह कि फिर समझौते न करने की कसम खाई ली। ज़िंदगी में किसी भी कीमत पर कोई भी समझौता नहीं। जब माँ दूध बांटने जाती हैं और नन्ही दीप्ति साथ जाती है। एक दिन जब सारा दूध बंट चुका होता हो तो एक बच्चा दूध मांगता है और खत्म होने की बात सुनकर जो चेहरे पर उदासी आती है, निराशा होती है, वह दीप्ति को आज तक नहीं भूली और वे कोई पेंटिग बनाने की सोचती रहती हैं।

दीप्ति नवल एक एक्ट्रेस ही क्यों बनीं ? इसका जवाब कि इनकी पारिवारिक पृष्ठभूमि। दादा बहुत बड़े वकील थे लेकिन अमृतसर के दो तीन सिनेमाघरों में एक बाॅक्स बुक रखते और शाम को कोर्ट से लौटते हुए पहले किसी न किसी फिल्म का कुछ हिस्सा देखकर ही घर आते। मां हिमाद्रि भी कलाकार, डांसर और स्वतंत्रता आंदोलन में योगदान के लिए नाटक करती रहीं। सचमुच एक्ट्रेस ही बनना चाहती थीं। पर दीप्ति की दादी ने एक दिन इनकी माँ को कहा कि मेरी वीमेन कान्फ्रेंस की औरतें  कहती हैं कि तेरी बहू तो ड्रामे करती है। बस। दादी की बात दिल को ऐसी लगी कि वह दिन गया, फिर कभी मंच पर कदम नहीं रखा। इनके एक कजिन इंदु भैया बिल्कुल देवानंद दिखते थे और ‘दोस्ती’ फिल्म में छोटा सा रोल भी मिला लेकिन मुम्बई से असफल रहने पर लौट आये। इंदु भैया का देवानंद की लुक में फोटो भी है।

पर दीप्ति नवल जब बच्ची थी तब प्रसिद्ध अभिनेता बलराज साहनी अमृतसर एक नाटक मंचन करने आए और दीप्ति अपने पिता के साथ गईं। भरी भीड़ में अपने करीब से निकलते बलराज साहनी को बहुत धीमी आवाज में कहा कि ऑटोग्राफ प्लीज, वे थोड़ा आगे निकल गये। फिर अचानक लौटे और हाथ बढ़ाया ऑटोग्राफ बुक लेने के लिए। ऑटोग्राफ किये और कहा -माई डियर। यदि मैं इसी तरह ऑटोग्राफ देता रहा तो मेरी ट्रेन छूट जायेगी। यह वही उम्र थी जब दीप्ति ने फैसला कर लिया कि मैं एक्ट्रेस ही बनूंगी। किस किस एक्ट्रेस से प्रभावित रही यह पूरा खुलासा किया है -फिल्ममेनिया अध्याय में। कभी मीना कुमारी, तो कभी वहीदा रहमान, तो कभी शर्मिला टैगोर, तो कभी अमृतसर का काका यानी राजेश खन्ना, तो कभी साधना। साधना कट भी बनवाया। कत्थक सीखा, यूथ फेस्टिवल में पुरस्कार जीते लेकिन जब टिकटों के साथ दीप्ति के प्रोग्राम में लाइट चली गयी और माँ ने कुछ हुड़दंग देखा तब इस तरह के प्रोग्राम से तौबा करने का आदेश दे दिया और माँ की तरह खुद दीप्ति भी मन मसोस कर रह गयी। पर सफर जारी रहा। कोई सोचे कि दीप्ति ने अचानक से पेंटिंग शुरू कर दी। यह शौक भी बचपन से ही है। एक आर्ट स्टुडियो में बाकायदा कला की क्लासें लगती रहीं। और अब तो मनाली के पास बाकायदा पेंटिंग स्टूडियो है। हालांकि फिल्मी दुनिया का सफर कैसा रहा ? यह अनुभव नहीं लिखे गये, लेकिन एक बहुत प्यारी बात लिखी कि-  जिस दीप्ति नवल को कत्थक नृत्य आता था, उससे किसी फिल्म में किसी निर्देशक ने एक भी डांस नहीं करवाया।

यह हिंदी फिल्मों की भेड़चाल को उजागर करने के लिए काफी है कि कैसे किसी कलाकार को एक ही ढांचे में फिट कर दिया जाता है। फिर दीप्ति ने फिल्में भी बनाईं और सीरियल्ज भी, निर्देशन भी किया। वह एक्टिंग से आगे बढ़ गयी। वैसे दीप्ति नवल को वहीदा रहमान का ‘गाइड’ फिल्म का गाने ‘कांटों से खींच के ये पायल’ बहुत पसंद था और वहीदा रहमान की लुक की तरह मंच पर किसी और गाने पर प्रोग्राम भी दिया था। वहीदा रहमान की लुक में भी फोटो है। कविता लेखन भी स्कूल के दिनों में ही शुरू कर दिया था और इनकी सीनियर किरण बेदी ने इनकी कविता पढ़ी तो कहा किअच्छा लिखती हो और लिखती रहो। अमृता प्रीतम से मिली तो उन्होंने भी कहा कि आप कविता लिखा करो। इनका काव्य संग्रह ‘लम्हा लम्हा’ इससे पहले आकर चर्चित हो चुका है।

 पिता उदय चंद्र एक चिंतक, लेखक और अंग्रेजी के प्रोफेसर थे। दीप्ति उन्हें ‘पित्ती’ कहती थी यानी पिता जी का शाॅर्ट नेम पित्ती। सुबह अपनी बेटियों को हारमोनियम बजा कर जगाया करते थे। पंडित जवाहर लाल नेहरु, सर्वपल्ली राधाकृष्णन् और गुरुदेव रवींद्रनाथ टैगोर जैसे विद्वानों तक सम्पर्क रहा। पुस्तकें लिखीं। काॅलेज में प्रोफैसरी  की और दोस्त से कहा -यार तीन सौ रुपये में क्या होगा ? फिर इसी प्रोफैसरी से प्यार हो गया। इसी ने अमेरिका तक पहुंचाया। हालांकि वहां भी कम मेहनत नहीं करनी पड़ी। दिन में किसी लाइब्रेरी में तो रात में कहीं सिक्युरिटी गार्ड पर बच्चों के सुनहरे भविष्य के लिए सब खुशी खुशी करते गये और आखिर एक साल के भीतर बच्चों को अमेरिका बुला लिया।

मैंने इसलिए शुरू में इस पुस्तक को दीप्ति नवल की आत्मकथा का पहला भाग कहा। इसमें बचपन को ही समेटा है। स्कूल के दिनों की शरारतें, सहेली का पीछा करने वाले लड़के की पिटाई, भाग कर बैलगाड़ियों की सवारी के मजे, नकल मोमबत्तियों के साये में और पेपर रद्द लेकिन दीप्ति का कहना कि उसने कोई नकल नहीं की थी। नीटा देवीचंद का वो रूप जो बाद में मनोवैज्ञानिक शब्दावली में ‘लेस्बियन’ समझ में आया। पागलखाने में दाखिल नीटा देवीचंद को देखने जाना और फिर बरसों बाद पता लगना कि विदेश में नीटा देवीचंद ने आत्महत्या कर ली। शिमला में नीटा की मां को बुलाकर मिलना। इसी तरह मुन्नी सहित कितनी सखियों की यादें। यह सब संवेदनशील दीप्ति के रूप हैं। इतना सच कि फिल्मों में देखे कश्मीर को देखने के लिए अकेली घर से भाग निकली और रेलवे-स्टेशन पुलिस ने वापिस अमृतसर पहुंचाया। और पापा का कहना कि बेटा  एक रात घर से भागकर तूने मेरी बरसों की कमाई इज्जत मिट्टी में मिला दी पर बाद में एक सफल एक्ट्रेस बन कर ‘पित्ती’ यानी पिता का नाम खूब रोशन भी किया। एक पिता का दर्द बयान करने के लिए काफी है। यह भी उस समय की फिल्मों के प्रभाव को बताने के लिए काफी है कि बालमन पर ये फिल्में कितना प्रभाव छोड़ती थीं। कभी देशभक्ति उमड़ती थी तो दीप्ति नवल गीत गाती थी -साबरमती के संत तूने कर दिया कमाल या हकीकत फिल्म के गीत।

अमृतसर की बहुत कहानियां हैं।  इन कहानियों में भारत पाक विभाजन, सन् 1965 और सन् 1967 के युद्धों की विभीषिका, ब्लैक आउट के साथ साथ बर्मा के संस्मरण कि कैसे मां का परिवार वापिस पहुंच पाया। विश्व युद्ध की झलक और बहुत कुछ ऐतिहासिक घटनाओं का मार्मिक वर्णन। यह सिर्फ बचपन की स्मृतियां नहीं रह गयीं बल्कि अपने समय, समाज और देश का एक जीवंत दस्तावेज भी बन गयी हैं। अमृतसर के जलियांवाला बाग का मार्मिक चित्रण। वे वहां काफी देर तक बहुत भावुक होकर बैठी रहीं और यह प्रभाव आज तक बना हुआ है। सिख म्यूजियम और बाबा दीप चंद का फोटो। बहुत से फोटोज है ब्लैक एड व्हाइट।

बहुत कुछ है इन यादों में छिपा हुआ। अपने माता पिता के आपसी झगड़ों को भी लिखकर दीप्ति ने यह साबित कर दिया कि लेखन में वे कितनी सच्ची और ईमानदार हैं।

बहुत सी क्लासफैलोज के जिक्र भी हैं जिनमें इनको बड़ी बहन की  सहपाठी किरण पशौरिया जो बाद में किरण बेदी बनी – पहली महिला आईपीएस और नीलम मान सिंह जो बड़ी चर्चित थियेटर आर्टिस्ट हैं और पंजाब विश्वविद्यालय के इंडियन थियेटर विभाग की अध्यक्ष भी रहीं।

तो लिखने को तो बहुत कुछ है, अगर लिखने पे आते।

सबसे अंत में दीप्ति नवल के पिता हमारे नवांशहर के थे और यहीं इनका जन्म हुआ। यह किताब मुझे पंजाब के अमृतसर, नवांशहर, जलालाबाद और मुकेरियां तक ले गयी। जलालाबाद को छोड़कर सब देखे हुए हैं और इससे भी ज्यादा सुखद आश्चर्य कि वही वर्ष मैंने भी पंजाब के नवांशहर में बिताये और ऐसी बहुत सी स्मृतियां मिलती सी हैं पर जिस ढंग से, पूरी खोज, जांच पड़ताल से दीप्ति ने यह किताब लिखी, वह बहुत ही सराहनीय है और इसके लिए ढेरों बधाइयां।

© श्री कमलेश भारतीय

पूर्व उपाध्यक्ष हरियाणा ग्रंथ अकादमी

संपर्क :   1034-बी, अर्बन एस्टेट-।।, हिसार-125005 (हरियाणा) मो. 94160-47075

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ मनोज साहित्य # 43 – मनोज के दोहे ☆ श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज” ☆

श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज”

संस्कारधानी के सुप्रसिद्ध एवं सजग अग्रज साहित्यकार श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज” जी  के साप्ताहिक स्तम्भ  “मनोज साहित्य ” में आज प्रस्तुत है “मनोज के दोहे। आप प्रत्येक मंगलवार को आपकी भावप्रवण रचनाएँ आत्मसात कर सकेंगे।

✍ मनोज साहित्य # 43 – मनोज के दोहे

1 पावस   

पावस की बूँदें गिरीं, हर्षित फिर खलिहान।

धरा प्रफुल्लित हो उठी, हरित क्रांति अनुमान।।

 

2 पपीहा

गूँज पपीहा की सुनी, बुझी न उसकी प्यास।

आम्र कुंज में बैठकर, स्वाति बूँद की आस।।

 

3 मेघ

मेघ गरज कर चल दिए, देकर यह संदेश ।

बरसेंगे उस देश में, कृष्ण भक्ति -अवधेश।।

 

4 हरियाली

शिव की अब आराधना, हरियाली की धूम।

काँवड़ यात्रा चल पड़ी, आया सावन झूम।।

 

5 घटा

छाई सावन की घटा, रिमझिम पड़ी फुहार।

भीगा तन उल्हास से, उमड़ा मन में प्यार।।

©  मनोज कुमार शुक्ल “मनोज”

संपर्क – 58 आशीष दीप, उत्तर मिलोनीगंज जबलपुर (मध्य प्रदेश)-  482002

मो  94258 62550

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – जीवन ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। ) 

? संजय दृष्टि –  जीवन ??

जुग-जुग जीते सपने

थोड़े से पल अपने,

सूक्ष्म और स्थूल का

दुर्लभ संतुलन है,

नश्वर और ईश्वर का

चिरंतन मिलन है,

जीवन, आशंकाओं के पहरे में

संभावनाओं का सम्मेलन है।

© संजय भारद्वाज

प्रातः 8.11 , 30.3.19

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

writersanjay@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ विवेक साहित्य # 172 ☆ अच्छा लगता है ☆ श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ☆

श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’
(प्रतिष्ठित साहित्यकार श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ जी के साप्ताहिक स्तम्भ – “विवेक साहित्य ”  में हम श्री विवेक जी की चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाने का प्रयास करते हैं। श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र जी, मुख्यअभियंता सिविल  (म प्र पूर्व क्षेत्र विद्युत् वितरण कंपनी , जबलपुर ) से सेवानिवृत्त हैं। तकनीकी पृष्ठभूमि के साथ ही उन्हें साहित्यिक अभिरुचि विरासत में मिली है। आपको वैचारिक व सामाजिक लेखन हेतु अनेक पुरस्कारो से सम्मानित किया जा चुका है।आज प्रस्तुत है एक विचारणीय कविता  – अच्छा लगता है।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – विवेक सहित्य # 172 ☆  

? कविता  – अच्छा लगता है  ?

कवि गोष्ठी से मंथन करते, घर लौटें तो अच्छा लगता है

शब्द तुम्हारे कुछ जो लेकर,  घर लौटें तो अच्छा लगता है।

 

कौन किसे कुछ देता यूँ ही,  कौन किसे सुनता है आज

छंद सुनें और गाते गाते,  घर लौटें तो अच्छा लगता है।

 

शुष्क समय में शून्य हृदय हैं, सब अपनी मस्ती में गुम हैं

रचनायें सुन भाव विभोरित,  घर लौटें तो अच्छा लगता है।

 

मेरी पीड़ा तुम्हें पता क्या, तेरी पीड़ा पर चुप हम हैं

पर पीड़ा पर लिखो पढो जो,और सुनो  तो अच्छा लगता है।

 

एक दूसरे की कविता  पर, मुग्ध तालियां उन्हें मुबारक

गीत गजल सुन द्रवित हृदय जब रो देता तो अच्छा लगता है।

 

कविताओं की विषय वस्तु तो, कवि को ही तय करनी है

शाश्वत भावों की अभिव्यक्ति सुनकर किंतु अच्छा लगता है।

 

रचना  पढ़े बिना, समझे बिन,  नाम देख दे रहे बधाई

आलोचक पाठक की पाती  पढ़कर लेकिन अच्छा लगता है।

 

कई डायरियां, ढेरों कागज, खूब रंगे हैं लिख लिखकर

पढ़ने मिलता छपा स्वयं का, अब जो तो अच्छा लगता है।

 

बहुत पढ़ा  और लिखा बहुत, कई जलसों में शिरकत की

घण्टो श्रोता बने, बैठ अब मंचो पर अच्छा लगता है।

 

बड़ा सरल है वोट न देना,  और कोसना शासन को

लम्बी लाइन में लगकर पर, वोटिंग करना अच्छा लगता है।

 

जीते जब वह ही प्रत्याशी,  जिसको हमने वोट किया

मन की चाहत पूरी हो, सच तब ही तो अच्छा लगता है।

 

कितने ही परफ्यूम लगा लो विदेशी खुश्बू के

पहली बारिश पर मिट्टी की सोंधी खुश्बू से अच्छा लगता है।

 

बंद द्वार की कुंडी खटका भीतर जाना किसको भाता है

बाट जोहती जब वो आँखें मिलती तब ही अच्छा लगता है।

 

बच्चों के सुख दुख  के खातिर पल पल  जीवन होम करें

बाप से बढ़कर  निकलें बच्चें, तो तय है कि अच्छा लगता है।

 

© विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ 

ए २३३, ओल्ड मीनाल रेसीडेंसी, भोपाल, ४६२०२३

मो ७०००३७५७९८

apniabhivyakti@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्रीमति सिद्धेश्वरी जी का साहित्य # 132 – लघुकथा ☆ खुशियों का मोल ☆ श्रीमति सिद्धेश्वरी सराफ ‘शीलू’ ☆

श्रीमती  सिद्धेश्वरी सराफ ‘शीलू’

(संस्कारधानी जबलपुर की श्रीमति सिद्धेश्वरी सराफ ‘शीलू’ जी की लघुकथाओं, कविता /गीत का अपना संसार है। साप्ताहिक स्तम्भ – श्रीमति सिद्धेश्वरी जी का साहित्य  शृंखला में आज प्रस्तुत है आपकी एक हृदयस्पर्शी  एवं विचारणीय लघुकथा खुशियों का मोल”।) 

☆ श्रीमति सिद्धेश्वरी जी  का साहित्य # 132 ☆

☆ लघुकथा ☆ खुशियों का मोल 🌨️🌿

चंद्रशेखर एक छोटे से गाँव में पला बढ़ा। पढ़ – लिख कर अच्छी कंपनी में नौकरी मिल गई। विदेश जाने का मौका मिला और फिर लौटकर गाँव आने की उम्मीद भी कम हो गई।

गाँव में बूढ़े माँ बाप अपने एकमात्र संतान की खुशियों के आगे चुपचाप रह गए। वही की लड़की से शादी कर चंद्रशेखर विदेश का ही होकर रह गया।

कभी दो-तीन महीने में एक बार माँ-पिताजी को फोन कर हाल-चाल पूछ लिया करता था। पार्ट टाईम जॉब के लिए दोनों वहाँ वरिष्ठ आश्रम एन. जी. ओ. चला रहे थे।

जहाँ पर उम्र दराज महिला और पुरुष समय व्यतीत करने आते थे।और अपने समान सभी को देख खुश होते थे।

आज चंद्रशेखर को एक रजिस्टर्ड पत्र मिला। जिसमें लिखा था…. “बेटा बहुत मेहरबानी होगी मुझे और तेरी माँ को भी किसी वृद्धा आश्रम में यहाँ डाल दे। कम से कम उसमें अपना दुख – सुख तो बाँट लेंगे।

जब भी तुम आओगे हमें  भी सभी के साथ वहां पाओगे। और हमारा समय भी कट जायेगा। तुम्हें आने जाने के लिए हम लोग कभी भी नहीं कहेंगे।

तुम अपना एन. जी. ओ. अच्छे से चलाना। हमें भी खुशी होगी।”

चंद्रशेखर पत्र को पढ़कर आवाक था… क्या माँ पिताजी की खुशियों का मोल यही था!!

© श्रीमति सिद्धेश्वरी सराफ ‘शीलू’

जबलपुर, मध्य प्रदेश

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares