मराठी साहित्य – जीवनरंग ☆ स्थळ…. भाग – 3 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? जीवनरंग ❤️

☆ स्थळ…. भाग – 3 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

 (दीपा काकूला सांगते,”या मुलांना आपल्या चिंता कळतच नाही)

गावात शिरल्यावर लोकेशने नेमका पत्ता विचारण्यासाठी गाडीचा चा वेग कमी केला.

रिक्षावाल्यांना विचार, पादचाऱ्यांना विचार, रस्त्यावर बसलेले भाजीवाले .. फुल वाले.. बरंच मागेपुढे केल्यावर आणि काही दिलेल्या खुणा सापडल्यावर, लोकेशन मुलीच्या वडिलांना फोन लावला.

” जवळच आहात. आता डावीकडे वळून हनुमानाच्या मंदिरापर्यंत या. तिथेच थांबा. मी सुयश ला पाठवतो.”

घर  रस्त्यापासून बरच आतल्या भागात होतं. नवी जुनी घरं होती. घरांच्या बांधणीवरुन, आजूबाजूच्या वातावरणावरून ,तिथे राहणाऱ्या लोकांची जीवनपद्धती ,वर्ग सर्वसाधारणपणे ओळखता येत होते.

लोकेश ची लांबलचक मर्सीडीझ त्या गल्लीच्या कोपऱ्यावर अगदीच विसंगत वाटत होती.

सुयश तिथे उभा होता स्कूटर घेऊन.

लोकेशन खिडकी उघडली. 

सुयश तत्परतेने म्हणाला,” या काका इथे जवळच आहे घर. माझ्या मागून या.”

” गाडी जाईल ना ?”

“हो आरामात. पार्किंगला जागा आहे.” 

काय गंमत असते ना सगळेच पहिल्यांदा भेटत होते. कुणीच कुणाला ओळखत नव्हते.

घर पहिल्याच मजल्यावर होतं. दरवाजातच आई वडील उभे होते. उंबरठ्याबाहेर रांगोळी होती. दाराच्या चौकटीत तोरण होतं, भिंतीला लागून चार-पाच कुंड्या होत्या. त्यात तुळस, मोगरा, जास्वंद फुलले होते. 

” या या!  घर सापडायला काही त्रास झाला नाही ना? इथे आता सगळं नव्याने बांधकाम चाललंय. गेल्या दहा वर्षांत प्रचंड कायापालट झालाय इथला.”

अग! पाणी आण ग!”

सुयशने न पटकन कोपर्‍यातले टेबल मध्ये ठेवलं. आईने पाण्याचे ग्लास त्यावर ठेवले.

” कसा झाला प्रवास? तसा रस्ता चांगला आहे.  हायवे चौपदरी असल्यामुळे वेगाने येता येते. आता नवीन सरकार आल्यापासून, रस्त्यांची कामे फार चांगल्या रीतीने चालू आहेत. वगैरे वगैरे      

लोकेश तसा  मोकळा आहे. त्यांने त्या लहानशा घरात फेरफटका मारून घेतला.

” छान आहे काका तुमचं घर. हा भिंतीवरचा फॅमिली फोटो वाटतं तुमचा? वा काय मस्त हवा  उजेड!”

अशा रातीने, हवापाणी, सरकार, सुधारणा, आगामी निवडणुका, यावर गप्पा झाल्या. नंतर एकदम विषय संपल्या सारखे झाले. मुख्य विषयाची काही सुरुवात होत नव्हती. दडपण खूपच होते. आई, सुयश आत  बाहेर करत होते. 

क्रमश:…

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ गरज सरो… ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

 ? मनमंजुषेतून ?

☆ गरज सरो… ☆ डॉ. ज्योती गोडबोले☆ 

याही गोष्टीला खूप खूप वर्षे झाली.

सहज मनात आले, काय करत असेल सरोज आता? माझ्या दवाखान्यात ते कुटुंब नेहमी येणारे.

मी त्यांची फॅमिली डॉक्टर होते. त्यांच्या तिघी मुली,औषधाला यायच्या. दिसायला देखण्या. कॉन्व्हेंटमध्ये अगदी हौसेने घातलेले आईवडिलांनी.

परिस्थितीही छानच होती त्यांची. आईवडील नोकरी करत आणि या बहिणी आपले शाळा-कॉलेज सांभाळून

घराकडेही लक्ष देत.

 त्यादिवशी रंजूताई, म्हणजे मुलींच्या आई सरोजला घेऊन आल्या. “ ताई, सरोजला खूप खोकला झालाय हो.

आज आठ दिवस खोकतेय आणि डॉक्टरकडे चल म्हटले तर नकोच म्हणतेय. जरा चांगले औषध द्या तिला.”

 मी म्हटले, “ सरोज, वजन किती वाढलंय ग तुझं .काही व्यायाम करतेस  की नाही? “ 

 बोलत बोलतच मी तिला टेबलावर घेतले. स्टेथोस्कोप  छातीवर ठेवायला  घेणार, तर मला भलतेच दृश्य दिसले.

सरोजचे पोट केवढे मोठे झाले होते. मी नीट तपासले. मला चक्क बाळाचे हृदयाचे ठोके ऐकू येत होते. सरोज जवळजवळ आठ महिन्यांची गर्भवती होती.

 तिने माझी नजर चुकवली.

“ सरोज,हे काय?? तुला कल्पना आहे ना,हे काय झालेय याची?”

  मी हात धुवून बाहेर आले. तिच्या आईला म्हटले, ” सरोजला काय झालंय याची कल्पना आहे का तुम्हाला? ”

“ नाही हो बाई. काही गंभीर झालंय का.” 

“ रंजूताई, तुम्हाला मुद्दाम करताय म्हणू, का समजत नाही म्हणू .सरोजला दिवस गेले आहेत,आणि तिला आठवा महिना चालू आहे.आता पूर्ण डिलिव्हरी करण्या शिवाय इलाजच नाही. मी म्हणते , सरळ लग्न का लावून देत नाही जो कोण असेल त्याच्याशी? ” 

त्या एकदम पांढऱ्याच पडल्या. “अहो काहीही काय. कारटे, अग काय बोलताहेत या डॉक्टर बाई? मला कसे समजले नाही? “ त्या जोरजोरात रडू लागल्या.

 सरोजने सांगितले, की  चार महिने training ला आलेला  आणि त्यांच्याच घरी राहिलेला तिचा सख्खा चुलतभाऊ होता तो.

“ अहो मग आता द्या लग्न लावून.” 

त्यावर ती म्हणाली, “ मी नाही लग्न करणार त्याच्याशी. दारुडा आहे तो.”

रंजूताई म्हणाल्या, “ अहो,सख्ख्या चुलत भावाशी कोणी लग्न करते का? आमच्या घरी हे चालणारच नाही.” 

“ अहो, मग  हे आधी नव्हते का समजत? आणि आठ महिने गप्प बसलीस तू, हो ग? आणि तुझ्या संमतीनेच ना हे घडले? रंजूताई, चूक तुमचीही आहे. लांबून सुद्धा समजते दिवस असलेली बाई. तुम्हाला समजू नये हो?

काय म्हणावे तुम्हा मायलेकींना…. “ मीच हादरून गेले होते हा प्रकार बघून.

त्या घरी गेल्या. दुसऱ्याच दिवशी सरोजचे वडील भेटायला आले. त्यानी विचारले, “ बाई, काय करू मी…. 

तोंड दाखवायला जागा नाही ठेवली हो .तुम्हीच मार्ग सांगा.” ते माझ्या पायाशी वाकले.

“ अहो असे काय करता ? आपण तिची डिलिव्हरी करूया. दुसरा उपायच नाही. मग ते बाळ नाईलाजाने एखाद्या चांगल्या संस्थेला देऊ. ते देतील दत्तक, चांगल्या आई बापाना. काय हो हे….  इथे लोकांना मूल होत नाही म्हणून  लोक रडतात. माझ्याचकडे मी रोज देतेय किती जोडप्याना  ट्रीटमेंट… आणि इथे बघा. काय देव तरी.” 

मी हताश होऊन बडबड केली. मला आश्चर्य वाटत होते, ‘कमाल आहे हो या मुलीची. काय केले असते हिने?

मी जर तपासून सांगितले नसते तर?’

  त्यावेळी माझ्या हॉस्पिटलचे renovation चालले होते. म्हणून मी आमच्या नेहमीच्या डॉक्टरांकडे तिची  डिलिव्हरी करायचे ठरवले. माझ्या सरांना ही सगळी कल्पना मी देऊन ठेवलीच होती. पुढच्याच आठवड्यात त्यांचा फोन आला.“ तुझी सरोज पेशंट आली आहे. ये तू.”

 मी लगेचच त्यांच्या हॉस्पिटलमध्ये गेले. सरोजला चांगल्याच कळा येत होत्या. एवढ्या मरण यातना होत असतानाही ती हू का चू करत नव्हती.

 सरोज ने एका मुलाला जन्म दिला. आठ पौंडी मुलगा होता तो.

 तिने एक रुपयाचेही औषध,टॉनिक काहीही न घेतासुद्धा ते इतके सुदृढ मूल जन्माला आले होते.

  मी, आमचे डॉक्टर सर, त्यांच्या डॉक्टर मिसेस, सगळे हळहळलो.

 बाई म्हणाल्या, “ काय ग ही  देवाची  लीला तरी.  मूल व्हावे म्हणून दोन बायकांची  केवढी मोठी  precedure कालच केली आम्ही. त्या तळमळत आहेत,मूल मूल करत. सरोज, काय करून बसलीस बाई.”

सरोजने ते बाळ बघितले. त्याच्या डोक्यावरून हात फिरवला, आणि म्हणाली, “ न्या त्याला. देऊन टाका.” 

   आम्ही सगळे थक्क झालो. तिच्या डोळ्यात पाण्याचा टिपूस नव्हता, की केलेल्या कृत्याचा पश्चाताप.

मीच अतिशय हळहळले. सरांना म्हटले की ‘ किती गोजिरवाणे बाळ आहे हो हे. काय पाप या बिचाऱ्याचे.

कोण दत्तक नेईल, कुठे जाईल….. ‘ ते बाळ मजेत मुठी चोखत पाळण्यात पडले होते.

आधीच ठरवलेल्या आणि सर्व माहिती देऊन ठेवलेल्या संस्थेला मी फोन केला. एका तासात त्यांच्या सोशल वर्कर बाई आल्या. त्यांच्या हातात सुंदर कपडे, बाळासाठी  छान ब्लॅंकेट होते.

त्या मायेने सरोजजवळ गेल्या. त्यांनी तिच्याकडून फॉर्म भरून घेतला….’ मूल दत्तक द्यायला आपली हरकत नाही, मग ते परदेशात पाठवायलाही माझी परवानगी आहे,’ असा बराच मोठा फॉर्म होता तो.

 सरोजने सह्या केल्या.

 “ बाळा, तुला याचे काही नाव ठेवायचे आहे का?” त्यांनी तिला विचारले.

सरोज कडवट हसली. 

“ कसले नाव ठेवताय. नकोसा असताना आला जन्माला.. कर्णासारखा. ठेवा करण नाव त्याचे.”

तिने मान फिरवली. त्या बाई, मी,आमचे डॉक्टर हतबुद्ध झालो.

सर म्हणाले, “ अग, इतकी वर्षे मी हॉस्पिटल चालवतोय, पण अशी  पेशंट नाही बघितली.”

 आमच्या सर्वांच्या डोळ्यात अश्रु होते, पण सरोज मात्र निर्विकार. तिची आई ते बाळ मांडीवर घेऊन टाहो फोडून रडत होती.

 संस्थेच्या बाई ते बाळ घेऊन गेल्या. आम्हाला म्हणाल्या, “ तुम्ही काळजी नका करू. आमच्याकडे दोन दोन वर्षे वेटिंग लिस्ट असते मुलांसाठी. हे बाळ चांगल्या घरी देऊ आम्ही. नशीब असेल तर जाईलही परदेशात. कल्याणच होईल त्याचे.” 

दुसऱ्याच दिवशी सरोज डॉक्टरांना विचारून घरी निघून गेली. “ अग थांब एखादा दिवस,” असे म्हटले, तरी  न ऐकता गेलीच ती. त्या नंतर ते कुटुंब मला कधीच भेटले नाही.

 

  —-अशीच कधीतरी मलाच आठवण येते,

काय झाले असेल पुढे त्या बाळाचे?…. 

सरोजने लग्न केले असेल का?….. 

पण याची उत्तरे मला कधीच मिळणार नाहीत.

त्या  लोकांनी, माझी गरज संपल्यावर माझ्याशी सम्बन्धच ठेवला नाही!!!

‘ गरज सरो,वैद्य मरो,’ हे माझ्या बाबतीत तरी त्यांनी खरे ठरवले।

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ भेट… ☆ संग्राहक – श्री अनंत केळकर ☆

?  वाचताना वेचलेले ? 

☆ भेट… ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

आयुष्यात भेटणारं कोणीच अकारण भेटत नसतं

विधात्याने जाणीवपूर्वक लिहिलेलं आयुष्यातलं ते एक पान असतं —-

 

भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून काहीतरी शिकणं त्याला अपेक्षित असतं

म्हणूनच बहुदा त्याने दोघांच्या भेटीचं नाट्य घडवून आणलेलं असतं —–

 

मित्र असोत वा शत्रू ,  प्रत्येक जण जणू एक पुस्तक असतं

ते कसं वाचायचं हे प्रत्येकाने आपापलं ठरवायचं असतं ——

 

शंभर टक्के चांगलं किंवा शंभर टक्के वाईट कोणीच नसतं 

प्रत्येकात चांगलं असं काही ना काही दडलेलंच असतं —–

 

त्यातलं चांगलं ते अधिक आणि वाईट ते उणे करायचं आहे

” मीपण ” पूर्ण वजा करून ” माणूसपण ” तेवढं जमा ठेवायचं आहे —–

 

स्वतःसाठी जगताना थोडं दुसऱ्यासाठीही जगता येतं का पाहायचं आहे 

कोणासाठी आधारवड तर कोणासाठी श्रावणधारा होऊन बरसायचं आहे —–

 

म्हणून मला भेटणाऱ्या प्रत्येकाच्या मनात माझ्यासाठी इवलासा कोपरा असू दे

त्यांच्याही आयुष्यात विधात्याने लिहिलेलं माझ्या नावचं फक्त एक पान असू  दे —–

 

——-असेल ना? 

 

संग्राहक : श्री अनंत केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! ☆ सासू आणि दुधीभोपळ्याची भाजी ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? चं म त ग ! 😅

🤣 सासू आणि दुधीभोपळ्याची भाजी ! 😂 💃श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

“काय गं हे सुनबाई ?”

“काय झालं आई ?”

“अगं आज चहाला काही चव नां ढव, नुसता पुचकावणी झाला आहे !”

“अहो रोजच्या सारखाच तर केलाय ! तुमच्या तोंडाची चव गेली असेल, म्हणून तसा लागतं असेल !”

“माझ्या तोंडाची चव जायला मी काय आजारी आहे ?”

“तसं नाही, पण या वयात जाते म्हणे कधी कधी जिभेची चव, त्यासाठी आजारीच पडायला हवं असंच काही नाही !”

“आता हे ज्ञानामृत तुला तुझ्या आईनं पाजलं वाटतं ?”

“हॊ !”

“मला वाटलंच !”

“म्हणजे ?”

“ते जाऊदे ! मला सांग, चहाची पावडर वगैरे बदलली आहे कां या महिन्याच्या वाण सामानात ?”

“अजिबात नाही आई ! पण असं कां वाटलं तुम्हांला ?”

“नाही, तुम्हीं हल्लीच्या मुली ! एखादा चहाचा नवीन ब्रँड आला आणि त्यावर एक काचेचा मग फुकट मिळतोय म्हटल्यावर, ती नवीन चहा पावडर घ्यायला तुम्ही मागे पुढे बघणार नाही, म्हणून म्हटलं !”

“नाही आई, चहा पावडर पण तीच आहे आणि दुध पण रोजचंच आहे !”

“तरी चव काही नेहमी सारखी नाही ती नाहीच !”

“आई द्या तो चहा माझ्याकडे, त्यात थोडी चहा पावडर आणि आल्याचा तुकडा टाकून उकळून आणते परत !”

“आता राहू दे सुनबाई ! तुला सांगते पूर्वी अख्ख्या मुंबईत कोपऱ्या कोपऱ्यावर इराणी हॉटेल असायची !तर त्यांच्या मुबंईतल्या कुठल्याही हॉटेलात जा, चहाची चव तीच, आता बोल !”

“म्हणजे आई, तुम्ही पूर्वी इराण्याकडे चहा प्यायला जायचात ?”

“काय तुझी अक्कल ! अगं मी कशाला जाते इराण्याकडे चहा प्यायला, अगं हे सांगायचे तसं !”

“बघा, म्हणजे तुमचा पण चहा कधीतरी बिघडायचा नां आई ?”

“कळलं कळलं, जास्त अक्कल नको पाजळूस !”

“बरं, आता तुम्ही चहा तसाच पीत असाल, तर मी लागू कां दुपारच्या स्वयपाकाला ?”

“लाग, पण जाण्याआधी मला सांग, मी केलेली कालची दुधी भोपळ्याची भाजी बाबूने खाल्ली नां ?”

“खाल्ली ? अहो आई, विलासने एकट्याने त्या दुधी भोपळ्याच्या भाजीचा पार फडशा पाडला ! मला आणि मुलांना उष्टवायला सुद्धा ठेवली नाही त्यानं ती !”

“मग ठीक आहे, जा आता तू, दुपारच्या स्वयपाकाचे काय ते बघ.”

“मी जाते, पण त्याच्या आधी मला एका प्रश्नाचं उत्तर द्याल का आई ?”

“विचार, खुशाल विचार तुझ्या मनांत काय प्रश्न आहे तो.”

“मला सांगा आई, मी जर दुधीभोपळ्याची भाजी केली तर….”

“माझा बाबू आणि मुलं त्याला तोंड सुद्धा लावत नाहीत आणि मी केली तर सगळेजण बोटं चाटून पुसून कशी खातात ? हेच विचारणार आहेस नां तू ?”

“हॊ, अगदी बरोबर!”

“अगं मी जेंव्हा दुधीभोपळ्याची भाजी करते नां, तेंव्हा त्यात एक खास पदार्थ आवर्जून घालते, म्हणून तर बाबू आणि त्याच्या बरोबर मुलं सुद्धा ती भाजी आवडीनं खातात हॊ !”

“कोणता पदार्थ आई ?”

“ते माझं सिक्रेट आहे सुनबाई !”

“पण मला सांगायला काय हरकत आहे आई ? अहो तुम्हीं गेल्यावर…..”

“अगं त्या दुधीभोपळ्याच्या भाजीच्या सिक्रेटसाठी माझ्या मरणावर टपलीस की काय ?”

“काही तरीच काय आई ? मी कशाला तुमच्या मारणावर टपू ?”

“अगं पण आत्ताच म्हणालीस नां, ‘तुम्हीं गेल्यावर’ म्हणून ?”

“बघा, तुम्हीच कसा अर्थाचा अनर्थ करता ते आई !”

“कसला अर्थाचा अनर्थ करत्ये मी ?”

“अहो तुम्ही गेल्यावर म्हणजे, तुम्हीं कधी गावाबीवाला गेलात आणि माझ्यावर दुधीभोपळ्याचीच भाजी करायची वेळ आली, तर तुमची रेसिपी माहित असावी, म्हणून विचारलं !”

“असं होय ! मला वाटलं….”

“आई, मी काही बोलले की तुम्हीं नेहमीच पराचा कावळा करता ! ते राहू दे, ते तुमचं भाजीच सिक्रेट आता तरी सांगाल का मला ?”

“अगं काही नाही गं सुनबाई, माझ्या बाबुला लहानपणापासून आपल्या कोपऱ्यावरच्या ‘लक्ष्मी फरसाण मार्ट’ मधली तिखट, मसालेदार कचोरी आवडते !”

“हॊ, ठाऊक आहे मला ते, विलास आणतो ती कचोरी अधून मधून. मुलं सुद्धा आवडीनं खातात ती कचोरी.”

“अगं तुला सांगते, ही जी दुधीभोपळ्याची भाजी आहे नां ती कितीही पौष्टिक असली, तरी त्याला नाक मुरडणारी लोकंच जास्त!”

“बरोबर.”

“माझा बाबू सुद्धा लहानपणी त्याला तोंड लावायचा नाही, पण नंतर नंतर त्याला ती आवडायला लागली बघ आणि आता तर काय एकट्याने सगळी भाजी फस्त करतो !”

“हॊ ते सगळं खरं आहे, पण अशी अचानक बाबुला आणि मुलांना तुमची दुधीभोपळ्याची भाजी आवडायचं कारण काय ?”

“कचोरी !”

“का sss य ? कचोरी ?”

“हॊ  sss य ! आपल्या ‘लक्ष्मी फरसाण मार्टची’ कचोरी !”

“आई, तुम्हीं जरा नीट एक्सप्लेन कराल का मला ?”

“अगं काही नाही, एकदा मी काय केलं बाबू त्या दुधीभोपळ्याच्या भाजीला तोंड लावत नाही म्हणून, त्यात एक दिवस चांगल्या तीन चार कचोऱ्या खलबत्त्यात कुटून घातल्या आणि तुमच्या भाषेत सांगायचं तर rest is history !”

“कमालच केलीत तुम्हीं आई !”

© प्रमोद वामन वर्तक

२९-०७-२०२२

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086

ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ संवाद # 96 ☆ जद्दोजहद ☆ डॉ. ऋचा शर्मा ☆

डॉ. ऋचा शर्मा

(डॉ. ऋचा शर्मा जी को लघुकथा रचना की विधा विरासत में  अवश्य मिली है  किन्तु ,उन्होंने इस विधा को पल्लवित करने में कोई कसर नहीं छोड़ी । उनकी लघुकथाएं और उनके पात्र हमारे आस पास से ही लिए गए होते हैं , जिन्हें वे वास्तविकता के धरातल पर उतार देने की क्षमता रखती हैं। आप ई-अभिव्यक्ति में  प्रत्येक गुरुवार को उनकी उत्कृष्ट रचनाएँ पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है एक युवा विमर्श एवं एक समसामयिक विषय पर आधारित विचारणीय लघुकथा ‘जद्दोजहद’. डॉ ऋचा शर्मा जी की लेखनी को इस लघुकथा रचने  के लिए सादर नमन।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – संवाद  # 96 ☆

☆ लघुकथा – जद्दोजहद ☆ डॉ. ऋचा शर्मा ☆

भोपाल रेलवे स्टेशन, रात साढ़े ग्यारह बजे का समय। झेलम ट्रेन आनेवाली थी।  सत्रह – अठ्ठारह साल के दो लड़के दीन – दुनिया से बेखबर रेलवे प्लेटफॉर्म पर  एक कोने में जमीन पर सो रहे थे। वहीं पास में कुछ कुत्ते भी आराम से बैठे थे। किसी को किसी से कोई परेशानी नहीं दिख रही थी। शायद उनका रोज का साथ हो ?  लड़के तो ऐसी चैन की नींद सो रहे थे कि जैसे मलमल की चादर और मुलायम गद्दों पर लेटे हों। झेलम ट्रेन आई और चली गई पर उनकी नींद में कोई खलल पैदा ना  कर सकी। दिन भर के कामों ने शायद उन्हें इतना थका दिया था कि ‘नींद ना जाने टूटी खाट’ वाली कहावत  सार्थक हो रही थी।

पूरे देश  में सेना में ‘अग्निवीरों’ की भर्ती को लेकर चर्चाएं, धरने और आंदोलन  चल रहे थे। युवाओं का आक्रोश सरकारी संपत्ति पर  फूट पड़ा था। खासतौर पर ट्रेनों को निशाना बनाया जा रहा था। अग्निवीर योजना का विरोध करनेवाले युवा देश का भविष्य हैं।  वे सजग हैं अपने भविष्य और अधिकारों को लेकर।  वे लड़ रहे थे और पुरजोर कोशिश कर रहे थे अपनी बात मनवाने की। इधर रेलवे प्लेटफॉर्म के एक कोने में जमीन पर बेखबर सोए इन युवाओं को वर्तमान की जद्दोजहद ने ही चूर –चूर कर दिया।  वे भविष्य से अनजान अपने कंधों पर वर्तमान को ढ़ो रहे हैं।

© डॉ. ऋचा शर्मा

अध्यक्ष – हिंदी विभाग, अहमदनगर कॉलेज, अहमदनगर. – 414001

122/1 अ, सुखकर्ता कॉलोनी, (रेलवे ब्रिज के पास) कायनेटिक चौक, अहमदनगर (महा.) – 414005

e-mail – richasharma1168@gmail.com  मोबाईल – 09370288414.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ व्यंग्य से सीखें और सिखाएँ # 110 ☆ आरोप – प्रत्यारोप ☆ श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ ☆

श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’

(ई-अभिव्यक्ति में संस्कारधानी की सुप्रसिद्ध साहित्यकार श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’ जी द्वारा “व्यंग्य से सीखें और सिखाएं” शीर्षक से साप्ताहिक स्तम्भ प्रारम्भ करने के लिए हार्दिक आभार। आप अविचल प्रभा मासिक ई पत्रिका की प्रधान सम्पादक हैं। कई साहित्यिक संस्थाओं के महत्वपूर्ण पदों पर सुशोभित हैं तथा कई पुरस्कारों/अलंकरणों से पुरस्कृत/अलंकृत हैं।  आपके साप्ताहिक स्तम्भ – व्यंग्य से सीखें और सिखाएं  में आज प्रस्तुत है एक सार्थक एवं विचारणीय व्यंग्य “आरोप – प्रत्यारोप”। इस सार्थक रचना के लिए श्रीमती छाया सक्सेना जी की लेखनी को सादर नमन।

आप प्रत्येक गुरुवार को श्रीमती छाया सक्सेना जी की रचना को आत्मसात कर सकेंगे।)

☆ साप्ताहिक स्तम्भ  – व्यंग्य से सीखें और सिखाएं # 110 ☆

☆ आरोप – प्रत्यारोप ☆ 

बात तू तू –  मैं मैं से शुरू होकर इतनी बढ़ जाएगी कि  सावन की झड़ी को नकारते हुए आरोपों की झड़ी आगे बढ़कर शीर्ष पर विराजित होने की ओर सबकी सलाह को एक तरफ रख अपनी बुद्धि का प्रयोग करने से नहीं चूकेगी। सारे ताम- झाम लगाकर कुछ सीटें हासिल की थीं किन्तु उसमें भी लोगों की नजर लग गयी। कोई यहाँ कोई वहाँ जाने में पूरे 5 वर्ष व्यतीत कर देता है। मजे की बात जब जनता की अदालत में पहुँचते हैं तो फिर से मासूमियत का दिखावा  काम कर जाता है। कोई भी दल हो जीतते व्यक्ति के कर्म हैं। लोगों ने तो जैसे नेताओं के लिए अघोषित पात्रता निर्धारित कर दी है। कहीं भी रहें जीतेगा तो वही जो पूरे दमखम से अपनी बात नजर मिलाकर रखेगा।

नजर क्या केवल लगने और उतारने के लिए होती है। इसी के बल पर लोगों को बिना कुछ बोले डराया व धमकाया भी जा सकता है। एक सीट वाला व्यक्ति भी उपयोगी होता है , उसे अपनी ओर करने के लिए अनवरत कोशिशें होती रहती है। खींच- तान के बीच झूलते प्रशासकीय अधिकारी भी अपने दल का चुनाव कर ही लेते हैं। आखिर सच्चे लोकतंत्र की परिभाषा इन्हीं बदलते रिश्तों पर ही टिकी होती है।

इन सबमें मतदाताओं की भूमिका  क्या होनी चाहिए इस पर कोई प्रश्न चिन्ह नहीं लगाता क्योंकि उन्हें मालूम है कि सब कुछ प्रायोजित है बस मेहनत  तो करनी पड़ेगी। वैसे भी गीता का ज्ञान यही कहता है – कर्म किए जा फल की इच्छा मत कर ए  इंसान।

एक प्रश्न और मन में कौंधता है कि जिस दल का घोषणा पत्र लेकर आए हैं क्या पूरे 5 वर्ष उसी पर अमल करेंगे या जिसके विरोध में उतरे थे उसी का हाथ पकड़  अपने उसूलों को स्वयं ध्वस्त करेंगे।

सारा समय डिजिटल प्लेटफार्म पर बिताने के साथ- साथ अच्छी खासी फैन फॉलोइंग   भी बना लेते हैं जिससे जरूरत पड़ने पर ट्विटर व इंस्टाग्राम पर समय व्यतीत कर सकें। आजकल मन की बातें करने का सबसे सशक्त माध्यम यही है। सारे सवाल- जबाव यहीं करते हुए समस्याओं को बढ़ाना- घटाना, जोड़ना, तोड़ना , मोड़ना यही करते रहते हैं।

कोई कुछ भी कहे बस कुर्सी के किस्से अपने हिस्से हो जाए, यही मूल मंत्र होता है।

©  श्रीमती छाया सक्सेना ‘प्रभु’

माँ नर्मदे नगर, म.न. -12, फेज- 1, बिलहरी, जबलपुर ( म. प्र.) 482020

मो. 7024285788, chhayasaxena2508@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – मुरारी ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। ) 

? संजय दृष्टि –  मुरारी ??

काल बावरा,

मेरी देह में

मुझे तलाशता रहा,

मुरारी की मानिंद

मेरा शब्द संसार,

काल के माथे पर

नाचता रहा!

© संजय भारद्वाज

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

writersanjay@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिंदी साहित्य – जीवन यात्रा ☆ जन्म दिवस विशेष – चर्चित व्यंग्यकार विवेक रंजन ☆ श्री प्रतुल श्रीवास्तव ☆

श्री प्रतुल श्रीवास्तव 

☆ 28 जुलाई जन्म दिवस पर विशेष – चर्चित व्यंग्यकार विवेक रंजन ☆ श्री प्रतुल श्रीवास्तव ☆

ऊर्जा से भरपूर सक्रिय कवि, नाटक लेखक, एवम् स्थापित व्यंग्यकार श्री विवेक रंजन श्रीवास्तव बात के धनी, मिलनसार किन्तु स्पष्ट वक्ता हैं । मंडला में जन्में विवेक रंजन देश के सुप्रसिद्ध वयोवृद्ध कवि, साहित्यकार प्रो. चित्रभूषण श्रीवास्तव के यशस्वी सुपुत्र हैं । आपने इंजीनियरिंग में पोस्ट ग्रेजुएट शिक्षा के उपरांत मध्यप्रदेश विद्युत मंडल में सेवा प्रारंभ की और गत वर्ष मुख्य अभियंता के रूप में सेवानिवृत्त हुए । इन्होंने लंबा समय जबलपुर में बिताया है । अपने सेवाकाल में आपने परमाणु बिजलीघर चुटका- मंडला का सर्वेक्षण, अनेक लघु पनबिजली योजनाओं के कार्य सहित विद्युत संबंधी अनेक महत्वाकांक्षी परियोजनाओं पर परिणाम दायी कार्य किये । विशेष बात यह है कि आपने विरासत में प्राप्त अध्ययन, चिंतन-मनन और साहित्यिक अभिरुचि को बनाये रखा ।

“कुछ लिख के सो, कुछ पढ़ के सो, तुम जिस जगह जागे सबेरे, उस जगह से बढ़के सो” के मार्ग पर चलते हुए विवेक भाई निरंतर साहित्य सृजन करते रहे । उन्होंने विभिन्न विषयों पर न सिर्फ कविताएं लिखीं वरन ज्वलंत समस्याओं, राजनीति, सामाजिक विसंगतियों पर लेख और तीखे व्यंग्य भी लिखे । आप जानेमाने समीक्षक भी हैं । देश के प्रमुख पत्र-पत्रिकाओं में आपकी रचनाओं का प्रकाशन और आकाशवाणी से प्रसारण होता रहता है । व्यंग्यकार के रूप में ख्याति अर्जित करने वाले विवेक रंजन की प्रमुख प्रकाशित कृतियाँ हैं- आक्रोश (काव्य संग्रह), राम भरोसे, कौआ कान ले गया, मेरे प्रिय व्यंग्य, धन्नो बसंती और बसंत, बकवास काम की, जय हो भ्रष्टाचार की, समस्या का पंजीकरण आदि (व्यंग्य संग्रह)। मिली भगत तथा लॉक डाउन 2 संयुक्त वैश्विक व्यंग्य संग्रहों के संपादन के साथ ही अनेक व्यंग्य संग्रहों में आपकी सहभागिता भी है । आपके द्वारा रचित नाट्य संग्रह हिन्दोस्तां हमारा और जादू शिक्षा का पुरस्कृत हो चुके हैं । साहित्य, कला-संस्कृति जगत में वर्षों से सक्रिय विवेक भाई अनेक संस्थाओं से सम्बद्ध हैं । साहित्य सेवा पर आपको मध्यप्रदेश साहित्य अकादमी, पाथेय, मंथन, हिंदी साहित्य सम्मेलन, तुलसी साहित्य अकादमी सहित प्रदेश और देश की अनेक संस्थाओं द्वारा सम्मानित किया जा चुका है । वे हिंदी ब्लागिंग के प्रारम्भ से तकनीकी विषयों पर हिंदी लेख , ब्लाग लिखते रहे हैं ।

बैंगलोर के चर्चित साहित्यकार अरुण अर्णव खरे के अनुसार- “क्रिकेट के सिद्ध बल्लेबाज जिस तरह विकेट के चारों तरफ शॉट लगाते हैं उसी तरह विवेक जी समसामयिक विषयों पर लगातार लेखन करते हैं । व्यंग्यकार रमेश सैनी का कथन है कि- “विवेक की नजर मात्र विसंगतियों पर नहीं वरन मानवीय प्रवृत्तियों पर भी गई है । मैं (प्रतुल श्रीवास्तव) समझता हूँ कि अनुज विवेक रंजन व्यापक दृष्टि वाले संवेदनशील रचनाकार हैं, इनकी रचनाओं में व्यंग्य प्रयास पूर्वक नहीं वरन सहजता से प्रगट होता है। मुझे विश्वास है कि उनकी कलम से निकली रचनाएँ साहित्य जगत में विशिष्ट स्थान बनाती रहेंगी ।

आज 28 जुलाई को विवेक रंजन के जन्म दिवस पर उनके सभी मित्रों, परिचितों, शुभचिंतकों, प्रशंसकों  एवं ई-अभिव्यक्ति परिवार की ओर से उन्हें बहुत बहुत बधाई 💐 शुभकामनाएं 💐

– प्रतुल श्रीवास्तव

जबलपुर, मध्यप्रदेश

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ विवेक की पुस्तक चर्चा # 115 – “पुत्तल का पुष्प वटुक” – सुश्री मीना अरोड़ा ☆ श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ☆

श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ 

(हम प्रतिष्ठित साहित्यकार श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’जी के आभारी हैं जिन्होने  साप्ताहिक स्तम्भ – “विवेक की पुस्तक चर्चा” शीर्षक से यह स्तम्भ लिखने का आग्रह स्वीकारा। श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र जी, मुख्यअभियंता सिविल (म प्र पूर्व क्षेत्र विद्युत् वितरण कंपनी, जबलपुर ) पद से सेवानिवृत्त हुए हैं। तकनीकी पृष्ठभूमि के साथ ही उन्हें साहित्यिक अभिरुचि विरासत में मिली है।  उनका पारिवारिक जीवन एवं साहित्य में अद्भुत सामंजस्य अनुकरणीय है। इस स्तम्भ के अंतर्गत हम उनके द्वारा की गई पुस्तक समीक्षाएं/पुस्तक चर्चा आप तक पहुंचाने का प्रयास  करते हैं।

आज प्रस्तुत है सुश्री मीना अरोड़ा द्वारा लिखित हास्य व्यंग्य उपन्यास  “पुत्तल का पुष्प वटुक” की समीक्षा।

💐 आज 28 जुलाई को विवेक रंजन के जन्म दिवस पर ई-अभिव्यक्ति परिवार की ओर से उन्हें बहुत बहुत बधाई 💐 शुभकामनाएं 💐

साप्ताहिक स्तम्भ – विवेक की पुस्तक चर्चा# 115 ☆

☆ “पुत्तल का पुष्प वटुक” – सुश्री मीना अरोड़ा ☆ श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ☆

पुत्तल का पुष्प वटुक (हास्य व्यंग्य उपन्यास)

सुश्री मीना अरोड़ा

शब्दाहुति प्रकाशन, नई दिल्ली

पृष्ठ १४४ मूल्य ३९५ रु

चर्चाकार… विवेक रंजन श्रीवास्तव, भोपाल ४६२०२३

उपन्यास मानव-जीवन के  विभिन्न आयामों के कथा चित्र ही हैं, मानवीय -चरित्र पर प्रकाश डालना और उसके रहस्यों को खोलना उपन्यास का मूल तत्व है. कथ्य की सजीवता और स्वाभाविकता उपन्यास के वांछनीय तत्व होते हैं. उपन्यास की सफलता यही होती है कि वह पाठक को उसके परिवेश का बोध करवा सके. पात्रो के संवाद, वर्णन शैली में हास्य तथा व्यंग्य का संपुट कहानी में पाठकीय रोचकता बढ़ा देता है. उपन्यास के लेखन का उद्देश्य स्पष्ट हो तो रचनाकार अपने पाठको व उपन्यास के पात्रों के साथ समुचित न्याय करने में सफल होता है. मीना अरोड़ा एक सुस्थापित व्यंग्य लेखिका हैं. उनकी कवितायें वैचारिक धरातल पर परिपक्व होती हैं. उनकी कविताओ की किताबें “शेल्फ पर पड़ी किताब” तथा ” दुर्योधन एवं अन्य कवितायें ” पूर्व प्रकाशित तथा पुरस्कृत हैं. मीना अरोड़ा की लेखनी का मूल स्वर स्त्री विमर्श कहा जाना चाहिये.

“पुत्तल का पुष्प वटुक ”  एक लम्बी ग्रामीण कहानी है.  भारतीय ग्रामीण परिवेश, गांव के मुखिया के इर्द गिर्द बुनी हुई कथा, जिसमें डाकू भी हैं, देवमुनि का आश्रम भी है. पुत्री की अपेक्षा पुत्र की कामनाएं… लेखिका का गांव के परिवेश का अच्छा अध्ययन है. उपन्यास में पाखण्ड पर प्रहार है, सामाजिक भ्रष्टाचार है, बिगड़ैल मुखिया की दास्तान है,  अंधविश्वास है और विसंगति का व्यापक  अंतर्विरोध भी है. अपने दायरे में मुखिया की माँ का दबदबा है. पुत्तल का पुष्प वटुक एक ग्रामीण परिवेश की कथा समेटे सामाजिक कथ्य की रचना है.

उपन्यास से कुछ व्यंग्य प्रयोग देखिये “रेवती माँ हर साल भगवान बदल बदल कर मन्नतें मांगती ” फरियाद पूरी होते न देख रेवती माँ को मंदिर में रखीं देवी देवताओ की मूर्तियां एक्सपायरी डेट की लगने लगी थीं”

“लोग आँखो देखी से ज्यादा कानों सुनी पर विश्वास करते थे. सयाने बुजुर्गों के पास लोगों के पाप कर्मों का लेखा जोखा, शायद चित्रगुप्त से भी अधिक था… अपने परिजनो से मारपीट, दूसरे की स्त्री ताड़ना, पाप के क्षेत्र में नहीं आता था, यद्यपि रोज मंदिर न जाना, लड़की जनना जैसे कार्य पाप की श्रेणि में थे.”

जब किसी व्यक्ति को उसके पापों का अहसास करवाया जाता तो वह गांव की नदी में सौ डुबकी लगा कर बिना साबुन अपने पाप धो डालता.

हत्या जैसे बड़े पाप हो जाने पर गंगा स्नान के लिये जाना अनिवार्य था. गंगा, गांव से बहुत दूर थी इसलिये लोग उतने ही पाप करते जितना गांव की नदी सह सके.

इसी तरह हास्य के अनेक रोचक प्रसंग भी सहजता से कथा प्रसंगों में प्रचुरता में हैं. मुखिया का बड़ा बेटा इंजीनियरिंग कर शहर में एक फ्लैट लेता है तब का प्रसंग देखें “… तीन कमरों पर पाँच कमरे भी बनाये जा सकते हैं, बस मकान को भूतल से ऊँचा उठाने के बाद आसपास हवा में उपलब्ध क्षेत्र को कब्जाना होता है, इसे अतिक्रमण नही एक्सटेंशन कहा जाता है….. वैसे यह कला मनुष्य से ही सीखी गई होगी, जैसे दो टांगो पर खड़ा आदमी अपना बड़ा सा पेट लेकर ज्यादा स्थान घेर लेता है.

नारी विमर्श की प्रतिनिधि पात्र पप्पू की दो चचेरी  बहनें संजना और रंजना हैं, वे ही एक बाहरी मजदूर द्वारा गांव की एक लड़की मालती के साथ किये गये अत्याचार के विरुद्ध निकम्में पप्पू को  गीता के  श्लोक “यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानम् धर्मस्य तदात्मनम् सृजाञ्यहम्”  की व्याख्या कर जगाती हैं.   इससे अनुप्राणित नाकारा पप्पू गांव से भाग गये अपराधी बकलू को बांधकर गांव में घसीट लाता है और चिल्लाता है “मांस तो इस नीच का कटेगा…. कोई हीरा चाचा कमला चाची और मालती को गाँव से बाहर जाने नही कहेगा “…  अस्तु सहज सरल भाषा वाद संवाद में व्यंग्य और हास्य, कहानी के ट्विस्ट उपन्यास की रोचकता बरकरार रखने में कामयाब हुये हैं. पठनीय पुस्तक है. हिंदी में व्यंग्य हास्य के उपन्यास बहुत ज्यादा नहीं हैं, महिला लेखिकाओ के तो नगण्य. मेरी शुभेच्छा  मीना जी के साथ हैं.

शब्दाहुति प्रकाशन ने आजादी की वर्षगांठ को मनाने इस उपन्यास को मनिकर्णिका सिरीज के अंतर्गत, त्रुटि रहित मुद्रण, अच्छे कागज पर, उम्दा तरीके से प्रकाशित कर किया, वे भी बधाई के सुपात्र हैं.

चर्चाकार… विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’

ए २३३, ओल्ड मीनाल रेसीडेंसी, भोपाल, ४६२०२३

मो ७०००३७५७९८

readerswriteback@gmail.com

apniabhivyakti@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिंदी साहित्य – कविता ☆ बाल कविता: ♣ संवेदी (हमदर्द) ♣ ☆ डॉ अमिताभ शंकर राय चौधरी ☆

डॉ अमिताभ शंकर राय चौधरी

(डॉ अमिताभ शंकर राय चौधरी जी एक संवेदनशील एवं सुप्रसिद्ध साहित्यकार के अतिरिक्त वरिष्ठ चिकित्सक  के रूप में समाज को अपनी सेवाओं दे रहे हैं। अब तक आपकी चार पुस्तकें (दो  हिंदी  तथा एक अंग्रेजी और एक बांग्ला भाषा में ) प्रकाशित हो चुकी हैं।  आपकी रचनाओं का अंग्रेजी, उड़िया, मराठी और गुजराती  भाषाओं में अनुवाद हो  चुकाहै। आप कथाबिंब ‘ द्वारा ‘कमलेश्वर स्मृति कथा पुरस्कार (2013, 2017 और 2019) से पुरस्कृत हैं एवं महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा द्वारा “हिंदी सेवी सम्मान “ से सम्मानित हैं।)

बाल कविता: संवेदी (हमदर्द) ♣ ☆ डॉ अमिताभ शंकर राय चौधरी 

(रवीन्द्रनाथ के बाल-कविता-संकलन ‘शिशु’ की एक कविता ‘समव्यथी’ का भावानुवाद)

 अगर न होकर तेरा मुन्ना

                      मैं पिल्ला ही होता,

   मुझको पास न आने देती

                       जितना भी मैं रोता ?

 

   जब तू खाने बैठा करती

                       अगर पहुँच मैं जाऊँ

   मुझे भगाती डाँट कर कहीं

                       जाकर मुँह न लगाऊँ,

   कहती, कुतवा, अरे भाग रे,

                        बिलकुल पास न आना।’

   हाथ से तेरे फिर न खाऊँ,

                        मुझे न गोद उठाना।

 

   मुझे कभी मत चूमा करना

                        तेरे हाथ न खाऊँगा।

   तेरी थाली तुझे मुबारक

                        तेरे पास न जाऊँगा।

 

   तेरा मुन्ना कहीं न होकर

                        अगर बना मैं तोता,

   कहीं पिंजड़े से उड़ न जाऊँ

                        जंजीरों में होता ?

 

   सच सच कहना मेरी अम्मां,

                        मुझसे छल मत करना

   कहती, नमक हराम बड़ा है,

                        पिंजड़े में बन्द रखना।’

 

   प्यार मुझे तब तुम मत करना

                        दो गोदी से उतार।

   जंगल में बस अभी चला माँ

                          मत करो मुझे दुलार।                

© डॉ. अमिताभ शंकर राय चौधरी 

नया पता: द्वारा, डा. अलोक कुमार मुखर्जी, 104/93, विजय पथ, मानसरोवर। जयपुर। राजस्थान। 302020

मो: 9455168359, 9140214489

ईमेल: asrc.vns@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares