मराठी साहित्य – विविधा ☆ महिना अखेरचे पान – 7 ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? विविधा ?

महिना अखेरचे पान – 7 ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

ज्येष्ठाच्या अखेरीस पावसाने हजेरी लावलेली असते. जणू काही ‘मी आलोय’ हे सांगण्यासाठीच सरी येऊन जातात. पण लवकरच हा पाऊस आपल्या लवाजम्यानिशी येतो तो मुक्काम करण्याच्या बेतानेच. सरी निघून गेलेल्या असतात आणि कोसळणारा पाऊस आषाढ घेऊन येतो. जून मध्ये निसर्गाची पाऊले नुसतीच ओली झालेली असतात. ती जुलैमधल्या चिखलात कधी बुडून जातात समजतही नाही.

आषाढ म्हटला की ओथंबलेल्या मेघमाला तर डोळ्यासमोर येतातच पण मनही कसं भरून आल्यासारखं वाटतं. पावसामुळं हवेत येणारा गारवा,कधी कुंद वातावरण,हातात वाफाळलेल्या चहाचा कप,जमिनीवर वाढत जाणारी हिरवाई,शेतात चाललेली लगबग,छत्री नाहीतर रेनकोटची रस्त्यावर वाढलेली वर्दळ, हे सगळं आषाढातच बघायला मिळणार.

पण आषाढ आला म्हटलं की पहिली आठवण होते ती कवी कुलगुरू कालिदासाची. आषाढाचा पहिला दिवस हा कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो. खरं तर ही त्याची जयंती नव्हे किंवा पुण्यतिथीही नव्हे. पण त्याच्या अजरामर अशा ‘मेघदूत’ या महाकाव्याच्या स्मृती जागवून त्याच्या प्रतिभेला सलाम करण्याचा हा दिवस !

याच आषाढाचा म्हणजे सर्वांच्या परिचयाचयाच्या जुलै महिन्याचा पहिला दिवस कृषी दिन म्हणूनही साजरा होतो. तसेच हाच असतो डाॅक्टर्स डे आणि नॅशनल पोस्टल वर्कर्स डे. डाॅक्टरांबद्द्ल कृतज्ञता आणि पोस्ट कर्मचा-यांच्या कामाची दखल घेण्याचा हा दिवस. हा दिवस सी. ए. दिनही आहे.

सात जुलै हा चाॅकलेट डे असतो तर दहा जुलै आपण मातृ सुरक्षा दिन म्हणून साजरा करतो.

अकरा जुलै हा आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिवस म्हणून पाळला जातो.

भारताच्या दृष्टीने एकोणीस जुलै हा दिवस ही महत्त्वाचा आहे. कारण याच दिवशी 1969 साली प्रमुख खाजगी बॅंकांचे राष्ट्रीयिकरण करण्यात आले आणि लोकाभिमुख बॅकिंग ला सुरूवात झाली.

वीस जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन व व्याघ्र दिन म्हणून जाहीर झाला आहे.

याच दिवशी 1969 साली मानवाने प्रथम पृथ्वीच्या बाहेर म्हणजे चंद्रावर पाऊल ठेवले. म्हणून वीस जुलै हा चांद्रदिनही आहे.

वन आणि पाऊस यांचे नाते लक्षात घेऊन तेवीस जुलै हा दिवस वनसंवर्धन दिन म्हणून साजरा केला जातो. तर चोवीस जुलै आहे कझिन्स डे. आपल्याच भावंडांना शुभेच्छा देण्याचा दिवस.

1999 साली कारगील येथे युद्धात  मिळवलेल्या विजयाची आठवण ताजी ठेवण्यासाठी सव्वीस जुलै हा कारगील विजय दिन म्हणून साजरा केला जातो. वाघांची घेती संख्या लक्षात घेऊन ,त्याविषयी जागृती करण्यासाठी एकोणतीस जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन म्हणून साजरा केला जातो.

 तीस जुलै हा आंतरराष्ट्रीय मैत्री दिन असतो.

भारतात जुलै महिन्याचा चौथा रविवार हा पालक दिन म्हणून साजरा केला जातो.

असे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दिवस साजरे करत असतानाच आपण पारंपारिक सणवारही तेवढ्याच उत्साहाने साजरे करतो. ज्येष्ठात काही ठिकाणी कर्नाटकी बेंदूर झालेला असतो. आता या महिन्यात महाराष्ट्रीय बेंदूर येतो. तर मुस्लिम बांधवांचा बकरी ईद हा सणही याच महिन्यात असतो.  

आषाढ महिन्यातील पौर्णिमा आणि अमावस्या या दोन्ही दिवसांना विशेष महत्त्व आहे. कारण पौर्णिमा ही गुरुजनांना वंदन करण्यासाठी व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘गुरूपौर्णिमा’ म्हणून साजरी होते. तर,अमावस्या ही ‘दिव्याची अमावस्या’ असल्यामुळे घरातील सर्व दिप,समया,यांचे पूजन करून त्या प्रज्वलीत केल्या जातात. प्रकाशाची पूजा करून अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा संदेश देणारा हा दिवस.

शुद्ध पक्षात येणारी एकादशी ही आषाढी एकादशी. ज्येष्ठात मार्गस्थ झालेल्या पालख्या पंढरपूरात येऊन पोहोचलेल्या असतात आणि अवघी पंढरी विठूरायाच्या नामाने दुमदुमून गेलेली असते.

याच महिन्यात थोर समाजसुधारक गो. ग. आगरकर आणि लोकमान्य टिळक  यांचा जन्मदिन आहे. तर बाजी प्रभू  देशपांडे,अण्णाभाऊ साठे,सरखेल कान्होजी आंग्रे,वीर शिवा काशीद, संत सावतामाळी आणि डाॅ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची पुण्यतिथि असते.  

एकीकडे निसर्गाच्या चक्राबरोबर पुढे पुढे जात आपण संस्कृती आणि परंपरा जपताना इतिहासातही डोकावून पाहत असतो. वर्तमानातील एक महिना संपतो आणि सर्वांचा मनभावन असा श्रावण खुणावू लागलेला असतो. मेघांनी भरपूर देऊन झालेल असतं. म्हणूनच की काय रिमझिमणा-या पावसासाठी मन आसुसलेलं असतं. ऊन पावसाचा खेळ बघायला डोळे आतूर झालेले असतात आणि हिरवाळीच्या वाटा श्रावणाकडे घेऊन जात असतात. 

© सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तुज पंख दिले देवाने… भाग -2 ☆ डॉ मेधा फणसळकर ☆

डॉ मेधा फणसळकर

? विविधा ?

☆ तुज पंख दिले देवाने…भाग -2 ☆ डॉ मेधा फणसळकर ☆ 

याशिवाय अनेकदा घरातील  प्लबिंग, इलेक्ट्रिक कामे किंवा गॅस शेगडी दुरुस्त करणे यासारख्या छोट्या- मोठ्या कामांसाठी कोणी व्यक्ती उपलब्ध होत नाहीत. कॉम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल दुरुस्ती हीही आजच्या काळातील आवश्यक असणारी गोष्ट आहेत. त्यातही कौशल्य असणारे लोक कमी आहेत. करियर म्हणून अशाही काही क्षेत्रांमध्ये कौशल्य प्राप्त करून एखादा विद्यार्थी आपली एक नवी वाट निर्माण करू शकतो. याशिवाय संगीत- नृत्य क्षेत्रात वापरली जाणारी वाद्ये तयार करणे- त्याची दुरुस्ती करणे, स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांची दुरुस्ती, वॉशिंग मशीन दुरुस्ती अशाही कामांमध्ये कौशल्य असणाऱ्या व्यक्ती हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्याच आहेत. त्यामुळे या क्षेत्रातही करियरच्या अगणित संधी उपलब्ध होऊ शकतात. अशी कामे करणाऱ्या व्यक्तींना एकत्र करून एखादी एजन्सी तयार करणे व लोकांना घरपोच सेवा उपलब्ध करून देणे हाही एक व्यवसाय होऊ शकतो. दर महिन्याला मेंटेनन्स या स्वरूपात या सेवा उपलब्ध करून दिल्या तर लोक आनंदाने या सेवेचा लाभ घेतील.

“योजक: तत्र दुर्लभ:|” असे संस्कृतमध्ये एक वचन आहे. म्हणजे जगातील कोणतीही गोष्ट निरुपयोगी नसते. फक्त त्याचा योग्य वापर करणारा दुर्लभ असतो. आपले आयुष्यही इतके कवडीमोल नाही की ते सहज संपवून टाकावे. म्हणूनच ते सुंदर कसे करता येईल याचा विचार करण्याची गरज आहे. म्हणूनच दहावी/ बारावी हे केवळ आपल्या आयुष्यातील केवळ मैलाचा दगड आहेत एवढाच विचार विद्यार्थ्यांनी केला तर गुणांच्या चढाओढीत त्यांना नैराश्य येणार नाही.

आता लवकरच नवीन शैक्षणिक धोरण अमलात येणार आहे. कदाचित यावर्षीच्या बोर्डाची परीक्षा ही शेवटची बोर्डाची परीक्षा असेल. हे नवीन शैक्षणिक धोरण हे पूर्णपणे विद्यार्थीकेंद्रित आणि कौशल्याधारीत आहे. नवीन क्षितिजांचा, नवीन काळाला अनुसरून अनेक कौशल्यांचा यात समावेश करण्यात आला आहे. शिवाय विविध विद्याशाखेमधील वेगवेगळे अडसर दूर करून एक पारदर्शक प्रणाली निर्माण करण्याचा यात प्रयत्न केला गेला आहे आणि मुळात पुस्तकी अभ्यासावर गुण न देता विद्यार्थ्यांच्या मूलभूत कौशल्यांचा अभ्यास करून गुण दिले जाणार आहेत. विद्यार्थ्यांच्या मानसिक, भावनिक, सांस्कृतिक, सामाजिक , शारीरिक वाढीच्या दृष्टीने आवश्यक असणारे घटक या धोरणात समाविष्ट करण्यात आले आहेत. मुलांनी अधिकाधिक संशोधन, प्रयोगशीलता यावर भर देऊन परिस्थितीनुसार नवीन काहीतरी निर्मिती करावी. त्यासाठी  सर्व शाळांमधून अशाप्रकारची वातावरणनिर्मिती व्हावी अशी कल्पना या धोरणामध्ये आहे. त्यामुळे मुलांना येणारे नैराश्य आणि त्यातून नकळत केल्या जाणाऱ्या आत्महत्या यावर आपोआप नियंत्रण येईल अशी आपण आशा करु या.

परमेश्वराने सर्वच पक्ष्यांना उडण्यासाठी पंख दिले आहेत. पण कोणी किती भरारी मारावी हे त्या पंखांच्या क्षमतेवर अवलंबून असते. त्यामुळे घार जेवढ्या उंचावरून उडू शकेल तितक्या उंचावरून चिमणी उडू शकणार नाही. पण आपल्या मर्यादेत  आपल्याला आवश्यक तेवढी भरारी ती निश्चितच मारू शकेल. म्हणूनच आज निकाल जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना असे म्हणावेसे वाटते की-

 “ तुज पंख दिले देवाने कर विहार सामर्थ्याने”

तुमच्यातील क्षमता ओळखून, त्याचा पुरेपूर वापर करून भरारी मारायची ठरवली तर जीवन का नाही सुंदर बनणार?

© डॉ. मेधा फणसळकर

सिंधुदुर्ग.

मो 9423019961

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ स्थळ… भाग – 5 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? जीवनरंग ❤️

☆ स्थळ…. भाग – 5 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(शिवांगी आतल्या खोलीत गेली.तिच्यापाठोपाठ तिची आईही गेली…आता पुढे.)

बाहेरच्या वातावरणात एक अवघडलेपण होतं .शिवांगी आतल्या खोलीतून बाहेर आली.

तिने  छान हसून पाहिलं सर्वांकडे. आईने डोळ्यांनी इशारा केला म्हणून, तिने आम्हा सर्वांना वाकुन नमस्कार केला.  काहीसे विस्कटलेले, मानेवर बांधलेले, खांद्यापर्यंतचेच  केस. साधाच फिकट रंगाचा टॉप आणि जीन्स. गळ्यात कानात काहीच नाही. फक्त हातावर एक घड्याळ. 

दीपाच्या  मनात आले अनुभवला लांब केस आवडतात. आधुनिक रहाणी, थोडी फॅशन त्याला आवडते. शिवांगी फारच साधी होती. मुळात आपली छाप पडावी म्हणून तिने कुठलाच विशेष प्रयत्नही केला नव्हता.

मग लोकेशनं तिला विचारलं,” कसा झाला सेमिनार?”

“छान चाललाय. मी मध्यंतरात घरी आले. पण मला परत जायचंय् .”

शिवांगी च्या आईने तिच्याकडे अगदी नाराजीने पाहिले.

पण तिचे वडील   म्हणाले,” शिवांगीला  लहानपणापासूनच अभ्यासाची आवड आहे. खूपच सर्व गोष्टी गांभीर्याने करते. एकदा जबाबदारी स्वीकारली की ती पार पडेपर्यंत तिच्या डोक्यात दुसरा विषय नसतो.”

“चांगली गोष्ट आहे ही.” मी म्हणाले.

“पण घरातल्या कामात मागे नाही बरं का?” तिच्या आईने काहीतरी तुटत जाणार सांधण्याचा प्रयत्न केला.

मग मी  या संभाषणात भाग घेतला. काही प्रश्न विचारले. पण एकंदरच सगळ्या संभाषणाच्या केंद्रस्थानी केवळ शिवांगी असल्यामुळे तिनेच विषय तोडला.

“नाही काकू. मला काही स्वयंपाकाची वगैरे इतकी आवड नाही. ती आवड आमच्या सुयशला  आहे. हं! आणि एक सांगते, मला कसल्याच कला अवगत नाहीत. म्हणजे चित्रकला, भरत काम, वगैरे. माझं मन अशा गोष्टीत रमत नाही. गाणी ऐकायला मला आवडतात. पण गाता वगैरे मुळीच येत नाही. पण जीवनाबद्दलचे  माझे निश्चित आराखडे आहेत. मला काय करायचंय, काय बनायचे आहे हे मी पक्क ठरवलं आहे.माझी दिशा मला माहित आहे.

माझे इंटरेस्ट्स मला माहित आहेत.”

तिच्या बोलण्यात कमालीचा आत्मविश्वास होता. तिच्या संपूर्ण साध्या व्यक्तिमत्त्वात एक निश्चित चमक होती. तिच्यात कुठल्याही प्रकारचं, पाहायला आलेली मुलगी किंवा यंदा कर्तव्य असलेली मुलगी ही सामुग्री नव्हती. तिला ना होकाराची परवा होती ना नाकारले जाण्याची चिंता होती!  घरात आलेल्या कुणाशी सहज गप्पा माराव्यात इतका मोकळेपणा तिच्यात जाणवला. खरं म्हणजे अनुभव सारख्या मुलाचा होकार मिळावा म्हणून कित्येक मुलींनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले असतील. पण हिच्या ते गावीही नव्हतं. ही वेगळी होती.

क्रमश:…

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ इंदिरा : तीन ऋणे – सुश्री विनिता तेलंग ☆ सुश्री सुलू साबणे जोशी ☆

? मनमंजुषेतून ?

☆ इंदिरा : तीन ऋणे – सुश्री विनिता तेलंग ☆ सुश्री सुलू साबणे जोशी ☆

‘आपल्या अंधाऱ्या प्रवासात प्रकाशाचे झोत फेकणाऱ्या ‘ तीन जणांच्या ज्या ऋणांविषयी इंदिराबाईंनी लिहिलं आहे, ते सारं खरं तर कोणत्याही उमलू पहाणाऱ्या कलाकारासाठी फार मोलाचे आहे..

इंदिराबाई लिहितात —-

कवी माधव जूलियन त्यांना शिकवायला होते. ते एकदा, ‘ तुम्ही कविता लिहिता असं समजलं, तर येतो एकदा पहायला ‘ असं म्हणून एक दिवस खरंच घरी आले. जाताना माझ्या मनाविरुध्द आईने त्यांना कवितांची वही दिली..

आता इथे काय अभिप्राय येतो म्हणून प्राण कंठाशी आलेले !आठ दिवसांनी सरांनी वही आणून दिली आणि सांगितले….. “ शब्दसंग्रह वाढवा.. त्यासाठी  ज्ञानेश्वरी वाचा. शब्दासाठी कविता अडली असे दारिद्र्य असू नये. शब्द म्हणजे काय ते ज्ञानेश्वरी तुम्हाला सांगेल. दुसरे, जेव्हा कविता लिहावी वाटते तेव्हा जे वाटते ते प्रथम गद्यात लिहून काढा. ते झाले की कवितेत लिहा. काही बदल हवा वाटला तर तो पुन्हा गद्यात लिहा.. पुन्हा त्यानुसार कवितेत बदल करा..”

दुसरे दुर्गाबाई भागवतांचे सांगणे…..

बोलता बोलता त्यांनी विचारले, ” सध्या काय वाचताय?”

” तसे विशेष काही नाही..”

यावर त्या उत्तरल्या, ” पण जे वाचता त्याचे टिपण ठेवता ना?…”

“नाही हो..” असे उत्तरताना इंदिराबाई गुदमरल्याच !….  पुढे बाई सांगतात….. .

“आणि मग एक अद्भुत झाले ! त्यांनी मला क्षुद्र, अडाणी ठरवले नाही. त्या मला म्हणाल्या,  “ कसे वाचन करावे, मी सांगते…” असे म्हणत त्यांनी कागद पेन घेतले, त्यावर रेघा ओढून खण पाडले आणि त्या सांगू लागल्या. अगदी मनापासून व जिव्हाळ्याने.

त्यांच्या सांगण्याचा तपशील आठवत नाही, पण सारांश असा होता……

“ वाचन नेहमी जाणीवपूर्वक करावे. कोणतेही पुस्तक वाचा, शेजारी एक वही ठेवावी. त्या पुस्तकातील आवडलेले, न आवडलेले मुद्दे नोंदवावेत. त्यावरचे आपले मत नोंदवावे. झाल्यावर एकूण पुस्तकाविषयीचे मत नोंदवावे. ही नोंद स्वतंत्र करावी; व मागील नोंदी व ही नोंद तपासून लेखनाविषयीचे तुमचे निष्कर्ष नोंदवावेत. मग एकूण पुस्तकाचे एक स्वतंत्र टिपण या साऱ्यावरुन करावे. तुम्ही कविता अशा तऱ्हेने वाचा. बघा तरी !”  इतके तपशीलवार त्यांनी मला सांगितले ! त्या विदुषी खऱ्याच !”

तिसरे वि.स.खांडेकर…

एकदा ते म्हणाले, ” तुम्हाला मी एक काम सुचवणार आहे. तुम्ही कविता प्रत्यक्ष कागदावर उतरू लागलात की, हे करायचे. एका वहीत तारीख टाकून त्या दिवशी सुचलेल्या ओळी, कविता लिहायची. पुन्हा त्यात काही भर पडली, बदल झाले, तर पुन्हा तारीख टाकून पुढच्या पानावर लिहायचे. मागच्या ओळींसकट. क्रम बदलला, शब्द बदलले तर त्याचीही नोंद करायची. मथळे बदलले वा काहीही काम त्या कवितेवर केले तरी ते नोंदवायचे. अशी ती कविता- रचनेची डायरी ठेवायची.. अगदी प्रामाणिकपणे. तुम्ही हे करु शकाल म्हणून सांगतो. हे काम समीक्षेला पुढे नेणारे आहे….”

“या साऱ्या सूचना मी सहीसही अमलात आणल्या असे नाही. पण ही तीन ऋणे माझ्या मनात बिल्वदलांसारखी टवटवीत आहेत. या सूचनांचा गाभा मी आत्मसात केला आहे. माझ्या लेखनप्रवासाची वाटचाल या प्रकाशकिरणांनी थोडीफार उजळली आहे, हे निश्चित.”

हे वाचल्यावर पुन्हा प्रकर्षानं आपल्या तोकडेपणाची जाणीव झाली !

वाटलं की उत्स्फूर्तता, सहजभाव, लालित्य हे सारं जपूनही शास्त्रशुध्द पध्दतीने लिखाण विकसित करता येऊ शकतं, तसं ते केलं पाहिजे .

एखादा कसलेला नट त्याच्या नैसर्गिक जिवंत अभिनयाचा प्रभाव पाडतो, तेव्हा त्यामागे त्याची शास्त्रशुद्ध मेहनत असते. गायक रियाज करतो, ताना पलटे घोटतो, तसे लेखक, कवी म्हणून आपण काय करतो ?

तर या इंदिराबाईंच्या बिल्वदलानं असं विचारात पाडलं !

लेखिका – सुश्री विनिता तेलंग

संग्राहिका – सुश्री सुलू साबणे जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सन्माननीय अपवाद : लो. टिळक ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

?  वाचताना वेचलेले ? 

☆ सन्माननीय अपवाद : लो. टिळक ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे☆

पुण्यातील ज्ञानप्रकाश हे दैनिक व टिळक यांचे अजिबात पटत नसे .  एकदा ज्ञानप्रकाशच्या संपादकांना अग्रलेख लिहिणे जमणार नव्हते, म्हणून हरीपंत गोखले हे टिळकांकडे आले व म्हणाले उद्यासाठी मला एक अग्रलेख लिहून द्या. टिळक म्हणाले ‘अर्ध्या तासाने या !’ गोखले आल्यावर टिळकांनी एक लखोटा त्यांच्या हातात दिला.  तो उघडून पाहिल्यावर त्यांचा डोळ्यांवर विश्वास बसेना.  टिळकांनी ज्ञानप्रकाशच्या संपादकांच्या शैलीत अग्रलेख लिहिला होता– आणि तो त्यांच्या परंपरेशी साधर्म्य राखणारा— टिळकांवर टीका करणारा ! असे होते टिळक महाराज !

एका संपादकाने दुसऱ्या वृत्तपत्रात स्वतःवरच टीका करणारा अग्रलेख लिहावा, हा कधीही मोडला न जाणारा जागतिक विक्रमच होय . 

“SWARAJYA IS MY BIRTH RIGHT, AND I SHALL HAVE IT.“ असे परकीय सत्तेला ठणकावून सांगणाऱ्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना त्यांच्या नुकत्याच झालेल्या जयंतीनिमित्त मनःपूर्वक वंदन 

संग्राहिका : मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ स्व र्ग ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ ? स्व र्ग ! ? ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆ 

पात्र खळाळते सिंधचे

पहा वाहे दुथडी भरून,

नदीचा नजारा सोनमर्गी

ठेवी नजरेस खिळवून !

शुभ्र जलद उतरती खाली

आसुसलेले तिच्या भेटीला,

वाटे इथेच या धरणीवर

जणू स्वर्गच अवतारला !

छायाचित्र  – कस्तुरी सप्रे, ठाणा (सोनमर्ग)

© प्रमोद वामन वर्तक

ठाणे.

मो – 9892561086

ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिंदी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ आतिश का तरकश #150 – ग़ज़ल-36 – “स्वर्ग भी मंज़ूर नरक भी क़बूल…” ☆ श्री सुरेश पटवा ‘आतिश’ ☆

श्री सुरेश पटवा

(श्री सुरेश पटवा जी  भारतीय स्टेट बैंक से  सहायक महाप्रबंधक पद से सेवानिवृत्त अधिकारी हैं और स्वतंत्र लेखन में व्यस्त हैं। आपकी प्रिय विधा साहित्य, दर्शन, इतिहास, पर्यटन आदि हैं। आपकी पुस्तकों  स्त्री-पुरुष “गुलामी की कहानी, पंचमढ़ी की कहानी, नर्मदा : सौंदर्य, समृद्धि और वैराग्य की  (नर्मदा घाटी का इतिहास) एवं  तलवार की धार को सारे विश्व में पाठकों से अपार स्नेह व  प्रतिसाद मिला है। श्री सुरेश पटवा जी  ‘आतिश’ उपनाम से गज़लें भी लिखते हैं ।प्रस्तुत है आपका साप्ताहिक स्तम्भ आतिश का तरकशआज प्रस्तुत है आपकी ग़ज़ल “स्वर्ग भी मंज़ूर नरक भी क़बूल …”)

? ग़ज़ल # 36 – “स्वर्ग भी मंज़ूर नरक भी क़बूल…” ☆ श्री सुरेश पटवा ‘आतिश’ ?

सच की बाँह थामे चलता रहा झूठ को थोड़ा निहार लिया।

नौतपा धूप में जलता रहा यारों की अमराई बुहार लिया।

 

ईमान की चादर भी बिछाई बेईमान गमछा उधार लिया।

वैसे तो काफ़ी संयम में रहा थोड़ा मज़ा दयार-ए-यार लिया।

 

बहादुरी भी यारो खूब दिखाई थोड़ा डरते हुए वार लिया।

नफ़रत की भी हुई कमाई साथ में थोड़ा सा प्यार लिया। 

 

धर्म की दुकाने भी खूब घूमा पुराना माल तैयार लिया,

आँखें खोलकर देखीं जब दिल खोल कर दिलदार लिया। 

 

स्वर्ग भी मंज़ूर नरक भी क़बूल हँस कर स्वीकार लिया।

बचपन नहीं छोड़ा ‘आतिश’ ने गुलों के साथ ख़ार लिया।

© श्री सुरेश पटवा ‘आतिश’

भोपाल, मध्य प्रदेश

≈ सम्पादक श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ “श्री हंस” साहित्य # 27 ☆ मुक्तक ।। बच्चे ही भारत के भविष्य भाग्य विधाता।। ☆ श्री एस के कपूर “श्री हंस”☆

श्री एस के कपूर “श्री हंस”

(बहुमुखी प्रतिभा के धनी  श्री एस के कपूर “श्री हंस” जी भारतीय स्टेट बैंक से सेवानिवृत्त अधिकारी हैं। आप कई राष्ट्रीय पुरस्कारों से पुरस्कृत/अलंकृत हैं। साहित्य एवं सामाजिक सेवाओं में आपका विशेष योगदान हैं।  आप प्रत्येक शनिवार श्री एस के कपूर जी की रचना आत्मसात कर सकते हैं। आज प्रस्तुत है आपका बाल साहित्य में एक भावप्रवण मुक्तक । बच्चे ही भारत के भविष्य भाग्य विधाता)

☆ मुक्तक ।। बच्चे ही भारत के भविष्य भाग्य विधाता।। ☆ श्री एस के कपूर “श्री हंस”☆ 

[1]

भविष्य का भारत  ही  तो  आज  का बच्चा है।

ढाल लो जैसे  भी  उसको कि मन का सच्चा है।।

जिस साँचे  में  डालोगे उसे बन जायेगा वैसा ही।

अभी पका नहीं कि आज भी मिट्टी सा कच्चा है।।

[2]

बहुत  सारे  विकल्प आपके पास आजमाने  को।

उसको   सुसंस्कृत  संस्कारी  जैसा  बनाने को।।

चाहो  तो  आधुनिकता की अंधी दौड़ में झोंक दो।

यही उचित समय है उन्हें शौर्य गाथायें सुनाने को।।

[3]

बच्चा आगे बनेगा हठी बात यह आज तय करेगा।

जो कुछ  सिखायेंगे आज वो वैसी ही लय भरेगा।।

बच्चे  देश के  कर्णधार  भारत के भाग्य विधाता।

आज की शिक्षा सहारे ही चुनौतियों से वो लड़ेगा।।

[4]

आज के नौनिहाल ही  कल  के  राष्ट्र निर्माता हैं।

आज  डालिये  अच्छी आदतें  कि भविष्यदाता हैं।।

स्वस्थ,  सुडौल,  आज से  ही उनको बनाये आप ।

बच्चे भारत नव निर्माण के सच्चे भाग्य विधाता हैं।।

© एस के कपूर “श्री हंस”

बरेली

ईमेल – Skkapoor5067@ gmail.com

मोब  – 9897071046, 8218685464

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – ठनक ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। ) 

? संजय दृष्टि – ठनक ??

बहुत पीड़ा है

तुम्हारे स्वर में,

घनीभूत वेदना है

तुम्हारे स्वर में,

पर साथ ही

सुनाई देती है

आशावाद की ठनक..,

कैसे कर लेते हो ये…?

मैं हारे हुए लोगों की

आवाज़ हूँ..,

हम वेदना पीते हैं

पर उम्मीद पर जीते हैं,

यद्यपि देवनागरी

उच्चारण का लोप नहीं करती,

तब भी मेरी वर्णमाला

‘हारे हुए’ को निगलती है,

और ‘लोगों की आवाज़’

बनकर उभरती है..!

© संजय भारद्वाज

प्रातः 8:43 बजे 16.7.19

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

writersanjay@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ काव्य धारा # 92 ☆ ’जग तो है मेला’…” ☆ प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ ☆

प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध

(आज प्रस्तुत है गुरुवर प्रोफ. श्री चित्र भूषण श्रीवास्तव जी  द्वारा रचित एक भावप्रवण कविता  “जग तो है मेला …”। हमारे प्रबुद्ध पाठक गण  प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ जी  काव्य रचनाओं को प्रत्येक शनिवार आत्मसात कर सकेंगे। ) 

☆ काव्य धारा 92 ☆ जग तो है मेला…”  ☆ प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ ☆

अकेला भी आदमी जीता तो है संसार में

जिंदगी पर काटनी पड़ती सदा दो चार में।

 

कटके दुनियाँ से कहीं कटती नहीं है जिन्दगी

सुख कहीं मिलता तो मिलता है वो सबके प्यार में।

 

लोभ में औ’ स्वार्थ में खुद को समेटे आदमी

ऐंठ करके समझता है सुख है बस अधिकार में।

 

पर वहाँ तो खोखलापन और बस अलगाव है

सुख तो बसता प्रेम के रिश्तों भरे परिवार में।

 

भुलाने की लाख कोई कोशिश करे पर आप ही

याद आते अपने हर एक पर्व औ’ त्यौहार में।

 

जहां होते चार बर्तन, खनकते भी हैं कभी

सबकी रुचियाँ-सोच होते हैं अलग घर-बार में।

 

मन में जो भी पाल लेते मैल, वे घुटते हैं पर

क्योंकि कोई भाव कब स्थिर रहे बाजार में।

 

जो जहां हो खुश रहें सब, हरे हों, फूले फले

समय पर मिलते रहें क्या रखा है तकरार में।

 

कमाई कोई किसी की छीन तो लेता नहीं

खुशियाँ फलती फूलती हैं प्रेम के व्यवहार में।

 

चर दिन की जिंदगी है कुछ समय का साथ है

एक दिन खो जाना सबकों एक घने अंधियार में।

 

है समझदारी यही सबको निभा, सबसे निभें

जग तो मेला है जो उठ जाता घड़ी दो-चार में।

 

© प्रो चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ 

ए २३३ , ओल्ड मीनाल रेजीडेंसी  भोपाल ४६२०२३

मो. 9425484452

vivek1959@yahoo.co.in

 संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares