ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २० जुलै – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सौ. गौरी गाडेकर

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २० जुलै – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

वा. म. जोशी.

वामन मल्हार जोशी (21 जानेवारी 1882 – 20 जुलै 1943) हे लेखक, पत्रकार होते.

एम. ए.झाल्यावर ते ‘राष्ट्रीय’ शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले.

नंतर जोशींनी ‘विश्ववृत्त’ नावाचे ‘राष्ट्रीय’ मासिक काढले. त्यातील ब्रिटिश कार्यकर्त्यांच्या विरुद्ध असलेल्या मजकुरामुळे त्यांना तीन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली गेली.

तुरुंगातून सुटल्यावर जोशी दोन वर्षे दैनिक केसरीचे संपादक होते.

पुढे ते महर्षी कर्वेंनी स्थापन केलेल्या महिला महाविद्यालयात तत्त्वज्ञान, मानसशास्त्र व इंग्रजी-मराठी साहित्याचे प्राध्यापक झाले.

कालांतराने जोशी पुण्याच्या एस.एन.डी.टी.महाविद्याल याचे प्राचार्य म्हणून निवृत्त झाले.

वा. म. जोशींनी, ‘आश्रमहरिणी’, ‘इंदू काळे व सरला भोळे’, ‘नीति-शास्त्र-प्रवेश’, ‘विचार सौंदर्य’, ‘सुशिलेचा देव’ इत्यादी अनेक पुस्तके लिहिली.

वा. म. जोशी यांच्यावर ‘वा. म. जोशी -चरित्र आणि वाङ्मय’, ‘वा. म. जोशी साहित्यदर्शन’, ‘वामन मल्हार आणि विचार सौंदर्य’ इत्यादी पाच पुस्तके लिहिली गेली आहेत.

1930च्या मडगाव, गोवा इथे भरलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद वा. म. जोशींनी भूषवले होते.

☆☆☆☆☆

डॉ. रघुनाथ विनायक हेरवाडकर

डॉ.रघुनाथ विनायक हेरवाडकर (25सप्टेंबर 1915 – 20 जुलै 1994) हे इतिहासविषयक लेखन व बखरींचे संशोधन करीत.

त्यांचे शिक्षण एम.ए., पीएच.डी. असे झाले होते.

ते विद्यार्थीप्रिय प्राध्यापक होते.

ते बखर वाङ्मयाने मोहित झाले. व त्यात त्यांनी स्वतःला झोकून दिले.

त्यांना 140 बखरी उपलब्ध झाल्या. त्यापैकी 78 बखरी ऐतिहासिक होत्या. त्या मोडी लिपीत होत्या. शिवाय त्यांत असणाऱ्या अरबी, फारसी, उर्दू शब्दांच्या अनेक अर्थांतून बखरकाराला अभिप्रेत असलेला नेमका अर्थ शोधून काढणे, हे खूप गुंतागुंतीचे असे.पण हे सर्व त्यांनी केले. एखाद्या मुद्यावर सर्वंकष आधार शोधून, समतोल मनाने त्याचा विचार करून ते संपादन करत. त्यांचे लेखन व संपादन शैली अतिशय पद्धतशीर होती.

त्यांनी ‘पानिपतची बखर’, ‘सप्तप्रकरणात्मक चरित्र’, ‘श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज व थोरले राजाराम महाराज यांची चरित्रे ‘ इत्यादी बखरींचे संपादन करून त्यांनी त्या पुनःप्रकाशित केल्या. याच विषयावर प्रबंध लिहून त्यांनी पीएच.डी. मिळवली.

याव्यतिरिक्त त्यांनी ‘भाऊसाहेबांची बखर’, ‘मराठी बखर’, ‘ श्रीमंत भाऊसाहेबांची कैफियत’, ‘थोरले शाहू महाराज’ इत्यादी अनेक पुस्तके लिहिली /संपादित केली.

वा. म. जोशी व डॉ. रघुनाथ हेरवाडकर यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली.🙏

☆☆☆☆☆

सौ. गौरी गाडेकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ :साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, विकीपीडिया, पोएम कट्टा.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ऐनवेळी… ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ ऐनवेळी… ☆ श्री तुकाराम दादा पाटील … ☆ 

मज याद बोचणारी येतेच ऐनवेळी

होतो पुढे खुलासा भलताच ऐनवेळी

 

मंजूर सर्व केले रुसवा कशास आता

मारू नकोस बाई मुरकाच ऐनवेळी

 

मोठ्या दिलेर बाता मारून खूप झाल्या

झाला आवाज त्यांचा फुसकाच ऐनवेळी

 

देवा पुढे पुजारी करतोच ढोंग सारे

 भाळावरी टिळा का दिसतोच ऐनवेळी

 

या बोल घेवड्यांच्या शपथा हवेत गेल्या

आवाज गर्जनांचा नुसताच ऐनवेळी

 

विश्वास काय आहे ठाऊक ज्यास नाही

घ्यावी खुशाल त्याची फिरकीच ऐनवेळी

 

नाचून बैठकीला रंगेल खूप केले

गिरकी अचूक नाही जमलीच ऐनवेळी

 

अपमान झेलताना हसतो खुशाल ढोंगी

 सोडून लाज घेतो डुलकीच ऐनवेळी

 

या राजकारण्यांनी केली धमाल आहे

झालीय चाल त्यांची दुडकीच ऐनवेळी

 

झाल्यात पेरण्या पण आहे जरूर आता

पाऊस ठार वेडा रुसलाच  ऐनवेळी

© श्री तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 142 ☆ प्रयाण ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 142 ?

☆ प्रयाण… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

(जुन्या डायरीतून…१ जानेवारी १९९७)

ती एकटीच निघाली आहे

दूरच्या प्रवासाला

रिक्त हाताने—

मुक्तपणे–फकिरीवृत्तीने

ती तोडू पहाते आहे–

तिच्या आयुष्याला जखडणारे

साखळदंड!

 

भीती एकच–

ती जिथे चालली आहे

तिथे असेल का माणसांचेच जंगल?

इथल्या सारखे तिथेही भेटतील का?

काही कनवाळू अन्

प्रेमळ पक्षी!

भव्य पिंपळवृक्ष आणि आधारवडही —

की अधून मधून इथे आढळणा-या लांडग्या,कोल्ह्यांचे आणि साप विंचवांचेच

असेल त्या जगात वास्तव्य??

 

निरीच्छपणे,एकाकी वाटेने जाताना

साखळदंडाच्या ओझ्यापेक्षाही

जंगलातल्या संभाव्य धोक्याचीच भीती—

गिळून टाकते अवसान,

समर्थपणे जगण्याचे!

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अवघा रंग एक झाला – भाग १ – अज्ञात ☆ संग्राहिका: सुश्री प्रतिमा जोशी ☆

? जीवनरंग ❤️

☆ अवघा रंग एक झाला – भाग १ – अज्ञात ☆ संग्राहिका: सुश्री प्रतिमा जोशी ☆

‘माई मी निघते, पोळी भाजी करून ठेवली आहे, दुपारी मावशी येतील, त्यांना वरण भाताचा कुकर लावायला सांगा, रात्रीचं मी बघेन आल्यावर…’

माई मख्ख चेहेऱ्याने अनुजाच्या सुचना ऐकत होत्या. त्यांच्या चेहेऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती, म्हणजे आजपण दिवसभर त्या एकट्याच असणार. नात काय शाळेतून आली की जेवेल आणि क्लासला जाईल. तिथून आली की खेळायला मैत्रिणीकडे पळेल.

अनुजाचं त्यांच्या कडे लक्ष गेलं.

काय झालं माई ? नाराज आहात का ? कसला राग आलाय का ?माझं काही चुकलंय का ?”

‘तुझं काही चुकलं नाहीये ग बाई, माझंच चुकलंय. मीच एक अडगळ होऊन राहिले आहे  तुमच्या घरात…” बोलता बोलता त्यांचा कंठ दाटून आला.

आज काहीतरी वेगळाच नूर दिसतोय माईंचा, त्या सहसा असा त्रागा करत नाहीत. अनुजाने पर्स खाली ठेवली त्यांच्या जवळ बसत तिने विचारलं,

‘काय झालं माई ? मनात काय असेल ते बोलून मोकळ्या व्हा म्हणजे तुम्हाला हलकं वाटेल’.

माईंनी एकदा अनुजाकडे बघितले, तिच्या आवाजात, नजरेत आर्जव होतं, त्यांना एकदम अपराधी वाटलं. खरं तर त्यांना तक्रार करायला काही जागा नव्हती. घरात सगळ्या सोयी होत्या, मुलगा, सून, नात सगळी त्यांच्याशी नीट वागत होती. त्यांचं औषधपाणी, व्यवस्थित होत होतं. फक्त प्रश्न होता तो त्यांच्या समोर अजगरासारख्या पसरलेल्या वेळेचा…

“कंटाळा येतो गं दिवसभर, काही काम न धाम, टिव्ही बघितला की डोकं दुखतं, तुम्ही सगळी आपापल्या व्यापात…. दिवस खायला उठतो बघ… पण हे बघ तुम्हा कोणाची काही चूक नाहीये…. तुम्ही माझं सगळं व्यवस्थित करता… ‘सुख दुखतं’ म्हणतात ना तसं झालंय माझं…

अनुजा जरा विचारात पडली. मग म्हणाली, “तुम्हाला वाती करायला जमतील का ?

“हो… बोटं दुखतात त्याने सुद्धा… पण थांबून थांबून करीन.”

“ठीक आहे, मी कापूस आणून ठेवीन तुम्हाला कंटाळा आला की तुम्ही वाती करत जा.”

अनुजा लहान मुलीची समजूत काढावी तशी बोलत होती. माईंनी मान डोलावली तशी अनुजा म्हणाली,

“निघू मग मी आता ? रात्री लवकर येते….”

अनुजा गेली आणि त्या घरात एकट्याच उरल्या….इतक्यात बेल वाजली….

त्यांनी दार उघडलं…. खालच्या वाण्याच्या दुकानातला मुलगा कापूस घेऊन आला होता.

अनुजाच्या तत्परतेचं त्यांना कौतुक वाटलं… त्यांनी पिशवी टेबलावर ठेवली जेवण झाल्यावर त्यांनी  पिशवीतून कापूस पुढे काढला… तो फुटबॉल एवढा गोळा बघून माईंना हसूच फुटलं… एवढ्या कापसाच्या हजार-दीड हजार वाती होतील… आणि घरात वर्षात एखादं दुसऱ्या वेळी निरांजन लावलं जातं… काय उपयोग इतक्या वाती करून ?

विचार मागे सारत त्यांनी वाती वळायला सुरवात केली. इतक्यात ऋत्विका तिथे आली.    ‘आजी मी पण करू ? नको तुला नाही जमणार.

“तू शिकवं ना मला.”

त्या दाखवतील त्याप्रमाणे ऋत्विका पण प्रयत्न करू लागली आणि विशेष म्हणजे तिला जमायलाही लागल्या

तिने केलेल्या वाती माई थोड्या सुधारून घेत होत्या….पुढचे दहा बारा दिवस माईंना एक उद्योगच झाला. वाती वळण्याचा… पण वेळही चांगला जात होता… वैषम्य एवढंच होतं की, एवढ्या वातींपैकी चार वातीसुद्धा घरात वापरल्या जाणार नव्हत्या…

एवढी कशी अश्रद्ध माणसं ? एकही परंपरा पाळावी असे वाटू नये यांना ?

अनुजा रोज सकाळी बाहेर पडत असे ती संध्याकाळीच परते…. आज तर सात वाजून गेले तरी अनुजाचा पत्ता नव्हता… शेवटी ७.३० ला आली… खूप थकलेली वाटत होती, हातात कसली तरी गुंडाळी होती…आल्या आल्या तिने माईंना हाक मारली…

माई आल्या… अनुजाने गुंडाळी उलगडली… आणि…. माईंच्या अंगावर काटा उभा राहिला… ते विठ्ठलाचे चित्र होते… मूर्तिमंत  पांडुरंग. त्यांच्या कडे फ्रेम होती… अगदी तसाच विठोबा रेखाटला होता… वत्सल, आश्वासक… माईंचे हात जोडले गेले.  स्वतःच्याही नकळत….

कोणी काढलं हे चित्र ? भानावर येत माईंनी विचारलं….

माई तुम्ही ऐकून थक्क व्हाल, हे चित्र करुणा नांवाच्या एका अनाथ, दिव्यांग मुलीने काढलंय… तिला दोन्ही हात नाहीयेत… पायाने काढलंय तिने हे चित्रं… तिलाच चित्र काढायला शिकवायला जात होते पंधरा दिवस…

“अगं किती सुरेख चित्र काढलंय… आपल्याकडे एक तसबीर होती पांडुरंगाची… अगदी हुबेहूब तसंच चित्र आहे.”

“अगदी बरोबर, कारण त्या फ्रेम वरूनच तिने हे चित्र काढलंय… मीच नेली होती तिला दाखवायला…  तिने काढलेल्या ह्या चित्राला स्पर्धेत पाहिलं बक्षीस मिळालं…

“आता ह्या चित्राचं काय करणार ?”

“काही नाही… खास तुम्हाला दाखवायला आणलंय.”

‘मी काय म्हणते हे चित्र आपण सोसायटीच्या लॉबी मध्ये लावूया, बाजूला चित्र कोणी काढलं त्याची माहितीही लिहू… नाहीतरी उद्या एकादशी आहे…’

“अरे वा ही आयडिया माझ्या डोक्यातच नाही आली…..फक्त सेक्रेटरींची परवानगी घेऊ म्हणजे झालं.”

झालं… सगळे कामाला लागले आणि चित्र खाली लागलं… बाजूला करुणाची माहिती… आणि बाजूला एक वही ठेवली… त्यात अभिप्राय लिहायचे होते…

क्रमश:…

लेखक – अज्ञात   

संग्राहिका – सुश्री प्रतिमा जोशी– संवादिनी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ज्ञानोबा तुकाराम –भाग– 2–लेखक– श्री आशुतोष अनिलराव बडवे पाटील ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

ज्ञानोबा तुकाराम  – भाग – 1 – लेखक – श्री आशुतोष अनिलराव बडवे पाटील ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे  ☆

( आणि ती व्यक्ती घराकडं गेली. गाडीवान गाडी घेऊन जागेला गेला.) इथून पुढे —-

देवळात अंधारच होता. कुठेतरी बारीक ठाणवई, एखादी पणती मिणमिणत होती. सारं काही सुमसाम झालं होतं . मंडपात माणसं घोरत पडली होती. त्या कोणत्याही गोष्टीकडे न पाहता मंडप पार करत अंधारातून ठेचकाळत एक एक अडथळे पार करून ती व्यक्ती देवाच्या गाभाऱ्यापर्यंत गेली. दाराशी आली. पळत आली. तर दाराला भलं मोठं कुलूप घातलं होतं.

आता हुरहूर जीव घेणारी ठरली. हुरहूर होती आज देवदर्शन मुकले याची. तसंच तगमगत दारासमोर साष्टांग दंडवत घातला. तिथेच नामस्मरण करत मांडी ठोकली. 

सगळीकडे शांतता होती. तेवढ्यात काही अस्पष्ट अस्पष्ट आवाज ऐकू यायला लागला. त्या व्यक्तीने इकडे तिकडे पाहिलं तर कुणीच नाही. मग आवाज कसला येतोय. बारीक बारीक किण किण करणारा पैंजणांचा आवाज. त्याचबरोबर चिपळ्यांचा स्वर. काही पुटपुटल्याचा आवाज. पैंजण वाजताहेत म्हणून बाई म्हणावं तर सोबत चिपळ्या वाजताहेत? स्वर ही पुरूषी येतोय?

कुठून स्वर येतोय? 

पैंजण कसले वाजताहेत? 

चिपळ्या कोठून वाजताहेत? 

आवाज कसला येतोय? 

याचा शोध सुरू झाला तर आवाजाची दिशा गाभाऱ्याकडे चालली. 

त्या व्यक्तीला वाटलं गाभाऱ्यात कोणी भक्त, भाविक, वारकरी अडकला असावा. चुकून कोंडला गेला असावा. रात्रीच्या गडबडीत राहिला असेल. आता रात्रभर बिचारा अडकेल. आणखी जरा पहावं म्हणून गाभाऱ्याचे दाराला असलेल्या छिद्रातून त्या व्यक्तीने आत दृष्टी टाकली, इकडे तिकडे शोधक नजरेने ठाव घेतला. कोणी दिसेना. येणारा आवाज मात्र गडद झाला. तेवढ्यात लक्ष सिंहासनाकडे गेलं तर आसनावर देव नाहीत. केवळ सिंहासन होते. समोर मात्र सर्वत्र प्रभा फाकणारा हिरेजडित सोन्याचा देवकिरिट सिंहासनावर ठेवलेला होता. मगाचची भक्त अडकल्याची चिंता कुठल्या कुठे पळाली. आता देव कुठे आहे? याची चिंता सुरू झाली. कोणते विघ्न तर आले नाही ना?  कोणीही मोगली यवन सरदार अवचित आला नाही, तरीही देव कसे जागा सोडून गेले? आतून आवाज येतोय? काय करावे? कसे शोधावे? कोणाला चौकशी करावी? रात्र पडली,  काहीच कळेना. 

तेवढ्यात एका खांबाआडून एक दिव्य देहधारी मानवाकृती बाहेर पडल्यासारखी दिसली. निरखून पाहतो तो खांद्यावर जरतारी रेशमी शेला, गळ्यात वैजयंती माळा, नर्तनाच्या पदलालित्यावर डोलत होत्या, डोईचे कुळकुळीत केस खांद्यावर रूळत आहेत. कमरेचा पितांबर हालतोय. दोन्ही हाती वाजत चिपळ्या होत्या. पायातले रत्नजडित तोडर बारिक बारिक वाजत होते. नेत्रकमल मिटलेले होते. नर्तन करीत करीत तोंडातून स्वर बाहेर येत होते —-

” ज्ञानोबा – तुकाराम “. 

” ज्ञानोबा – तुकाराम ” 

ती कोणी वारकरी व्यक्ती नव्हती.  ती व्यक्ती कोणी सामान्य दिसत नव्हती. तर प्रत्यक्ष परमात्मा पांडुरंग बेभान होऊन गाभाऱ्यात नाचत होता आणि तोंडाने म्हणत होता ” ज्ञानोबा – तुकाराम ”  ” ज्ञानोबा – तुकाराम “.

 मघापर्यंत चिंतातूर असणाऱ्या त्या व्यक्तीच्या चेहऱ्याचे भाव बदलले. चिंता बदलली. क्षणात आश्चर्य, क्षणात आनंद , क्षणात गंमत आलटून पालटून बदलत होती. आश्चर्य होते आपण काही अद्भूत पाहत आहोत याचे. दिसतेय ते काही विलक्षण आहे याचे. आनंद होता तो परमात्म्याचे आगळ्यावेगळ्या दर्शनाचा. दिव्य दर्शनाचा. आतापर्यंत परमात्मा असा भक्त-नाम गात नाचल्याचे वाचले वा ऐकले नव्हते. जो यति, योगी, तपी, ताडसी, यांना जपतपादी साधने वापरूनही सहज साध्य होत नाही, तो आपल्या दिठीसमोर नाचत असल्याचे पाहून गंमत वाटत होती. आनंद होत होता. तो परमात्मा केवळ दिव्यदृष्टी धारण करूनच दिसू शकतो असे ज्ञात होते. कारण महाभारतात त्याचं तेज दृष्टीला सहन न झाल्याने तो प्रत्यक्ष समोर असून अनेकांनी डोळे मिटले होते. तेज सहन न झाल्याने ते मिटावे लागले होते. डोळे मिटून घेवूनही त्याचे तेज डोळ्यांना सोसत नव्हते. तो दिव्य प्रकाशधारी, नव्हे शतसूर्य– नव्हे नव्हे कोटी भास्कराचे तेज ज्याचेपासून उगम पावते असा परमात्मा आपल्यासमोर नर्तन करतोय याची गंमत वाटत होती. आनंद वाटत होता. आश्चर्य वाटत होते. अनेकांना आपल्या इशाऱ्यावर नाचवणारा हा परमात्मा, हे परब्रह्म, त्या व्यक्तीच्या दृष्टीसमोर स्वतः एका वेगळ्या तालावर नाचत होते. अगदी देहभान हरपून. अन् तोंडाने बोलत होते–”ज्ञानोबा-तुकाराम”

आजपर्यंत पुराणात वाचलं होतं, ऐकलं होतं की, एकदा भगवंताचे गृही नारद आले. सेवक बोलले देव देवपूजा करत आहेत. देवर्षी नारद आश्चर्यचकित झाले.. ते म्हणाले देव कोणाची पूजा करतात पाहू या. म्हणून ते देवघरात हलकेच प्रवेशले. तो देवपाटावर एक एक देव मांडले होते. आणि देव पूजनात दंग होते. ते देव म्हणजे आपल्यासारख्या  देवप्रतिमा नव्हत्या. होत्या भक्त प्रतिमा. भक्त उद्धव, भक्त अक्रूर, भक्त नारद, भक्त हनुमान. आश्चर्यमुग्ध महर्षी नारदाचा भाव त्या महान व्यक्तीच्या मुखावर आता प्रगटला होता. 

क्रमशः …

लेखक : श्री आशुतोष अनिलराव बडवे पाटील. 

पंढरपूर ( फेसबुक वरून साभार ) 

संग्राहक : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ महानैवेद्य — पंढरपूरच्या “श्री विठ्ठल रुक्मिणीचा!”… भाग – 1 – श्री मंदार केसरकर ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ महानैवेद्य — पंढरपूरच्या “श्री विठ्ठल रुक्मिणीचा!”… भाग – 1 – श्री मंदार केसरकर ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

घरात पहिल्यापासून कोणताही गोडाधोडाचा म्हणा किंवा बिगर कांद्यालसणाचा स्पेशल पदार्थ असो… तो तयार झाला की, एखाद्या वाटीत घालून आज्जी म्हणायची..

“मनू… देवापुढं नैवेद्य ठेव … मग खाऊन चव सांग… कसा झालाय ते..”

तसा प्रत्यक्ष माझ्या तोंडात पहिला पदार्थ गेला असला, तरी…. देवापुढं पहिल्यांदा ठेवल्यामुळं घरातला मी second taster…पहिल्यांदा ‘देवच’…! त्यामुळे…

“पाहे प्रसादाची वाट…द्यावे धावोनिया ताट…

शेष घेउनि जाईन…तुमचें जालिया भोजन…”

—अशी जगद्गुरु तुकोबारायांच्या या अभंगाप्रमाणे माझी लहानपणापासून अवस्था…!

“आज्जी… तुझं काहीतरीच असतं बघ.. देव कुठं खात असतो का..?” …. असले ‘डावे’ प्रश्न सुरुवातीला विचारले… पण… माझ्या प्रश्नाला संतश्रेष्ठ नामदेवांच्या लहानपणीची कथा सांगत…… .. 

“ प्रत्यक्ष भगवंताला जेवण्याचा हट्ट करून शेवटी कंटाळून “नामदेवराय” भोवळ येऊन पडायला लागल्यावर…   मग… पांडुरंग जेवला बघ..” असे म्हणून …… 

” ऐसी ग्लानी करिता विठ्ठल पावला…. नैवेद्य जेविला… नामयाचा …।” — या अभंगानंतर, ” उजव्या ” हाताने ठेव बरं…वाटी..” अशा संभाषणाने ” नामदेवरायांच्या ” कथेचा शेवट झाल्यावर मगच ” प्रसाद ” तोंडात पडायचा…!

रोजच्या देवपूजेनंतर दूधसाखरेबरोबर… कधी एखादा रवा-बेसन-लाडू, करंजी … उपवास असेल तर राजगिरा-शेंगदाण्याचा लाडू… खजूर… गूळ-खोबरं.. सकाळच्या कोवळ्या उन्हात बसून केलेलं ताजं लोणी-साखर.. एखादं केळ.. असं काहीही असायचं.

सणावाराला मात्र पक्वांनांनी भरलेलं ताट ‘नैवेद्याला’ असायचं..! पण प्रत्यक्ष देवळात… ” काय नैवेद्य असेल…?” अशी उत्सुकता बोलून दाखवल्यावर… ” आपण “महानैवेद्य” आणू बरं का.. ” असं म्हणून वडील तसा निरोप द्यायचे. 

त्यावेळच्या विठ्ठल-रुक्मिणीच्या मंदिरातील अनेक “बडवे-उत्पात” मंडळी चांगल्या घरोब्याची… काही जवळच्या नात्यातली असल्यानं ” महानैवेद्य ” घरी आणण्यासाठी जास्त खटाटोप करावा लागला नाही. दोनचार दिवस आधी निरोप दिला तरी ” महानैवेद्य ” घरपोच यायचा.

ज्या दिवशी ” महानैवेद्य ” घरी यायचा, त्यादिवशी स्वयंपाकघरात चहापाण्याशिवाय जास्त काही करायची गरज नसायची… एखादा भाताचा डबा लावला तरी पुष्कळ व्हायचं….! दुपारी “नैवैद्या”चं जेवणार असल्यानं… आई-आजी सकाळी… “दूध, फळं, चिवडा”… अशा कोरड्या पदार्थाशिवाय काही खाऊ द्यायची नाही. “प्रसादिक” अन्न पोटात जायच्या आधी पोटात दुसरं शिळं-पाकं अन्न असू नये हा एक प्रांजळ हेतू… “त्याला काय होतंय…?..” अशी उद्धट बोलण्याची कधी हिंमत झाली नाही.

दुपारी साधारण साडेबारा नंतर…. परातीयेवढ्या मोठ्ठया आकाराच्या लखलखीत चांदीच्या ताटावर लाल रेशमी कापड झाकून… त्यावर चांदीचं पळी-पंचपात्र अन मुखशुद्धीसाठी पानाचा विडा घेऊन… कडक सोवळ्यात “बडवे-उत्पातांच्या” परिवारातील एखादा काका-मामा ‘ते’ वजनदार ताट दोन्ही हातांनी एका खांद्यावर घेऊन..”महानैवेद्य” आणायचा. प्रथम तो “नैवेद्य” घरातील देवासमोरील पाटावर ठेवून घरच्या देवाला .. “नैवेद्यम्‌ समर्पयामि…” म्हणून पळीने पाणी फिरवून दाखवला जायचा. ‘नैवेद्य’ घेऊन येणाऱ्या व्यक्तीस त्याच्या वयाकडे न बघता त्याच्या हाती दक्षिणा देऊन घरच्या सगळ्यांनी नमस्कार करण्याचा “आज्जीचा” शिरस्ता असायचा.

त्या अवाढव्य ताटावरील कापड बाजूला सारून ते भरगच्च ताट बघण्याची उत्सुकता मोठेपणीपर्यंत तशीच कायम राहिली… कारण ते नैवेद्याचं ताट… असायचंच तेवढं… “देखणं”… आणि पाच-सात व्यक्तींना भरपेट पुरेल एवढं “पूर्णब्रह्म”…! ताटाच्या मधोमध मोठ्या चांदीच्या वाडग्यात खचाखच शिग लावून भरलेला उत्तम प्रतीच्या वासाच्या तांदळाचा भात… त्यावर नुसता पांढरा भात नसावा म्हणून शास्त्रासाठी पिवळं धम्मक डावभर वरण…त्या भाताच्या शिगेवर अस्सल लोणकढी तुपाची वाटी खोचलेली…. त्याच्या शेजारी थोड्या छोट्या वाडग्यात तसाच शिग लावलेला केशरी रंगाचा अस्सल तुपातला “साखरभात”… त्यावर मस्तपैकी काजू, बदाम, बेदाणे, लवंग, वेलदोडे अन चार दोन केशराच्या काड्यानी सजावट केलेली…! त्या भाताच्या भांड्याच्या खालच्या बाजूला घसघशीत आकाराच्या पातळ पदर सुटलेल्या… वेलदोडा.. जायफळाच्या सुवासाने मोहित करणाऱ्या पिवळसर रंगाच्या तुपाने माखलेल्या “पुरणपोळ्या”…. तशाच पातळ साध्या “पोळ्या”… त्यावर पुरणाचा गोळा.. त्या गोळ्यावर वरच्यावर पापुद्रा काढता येणाऱ्या… चवीला नकळत मिठाळ लागणाऱ्या, वरून थोडं तूप टाकलेल्या पातळ “पुऱ्या”….! त्याच्या डाव्या बाजूला एका हाताच्या ओंजळीत बसतील एवढ्या आकाराचे तुपात खरपूस भाजलेले… टाळ्याला न चिकटणारे तुपाळलेले दोन “बेसन लाडू”…!

त्या लाडवाशेजारील एका वाटीत दह्यात मीठ- साखर- लालतिखट- दाण्याचं कूट घालून कालवलेली… वरून जिरे-मोहरीची फोडणी दिलेली.. आंबट-गोड-तिखट मिश्र चवींची “शेंगादाण्याची चटणी”… तर दुसऱ्या वाटीत बारीक खिसलेल्या काकडीची… मीठ- साखर- दही घालून कालवलेली आंबट-तुरट चवीची “कोशिंबीर”…! त्याच्या शेजारील अजून एका वाटीत त्या ऋतूत उपलब्ध असेल त्या पद्धतीने कधी पीठ पेरलेली “मेथीची”… अथवा मीठ- मिरची- साखर घालून.. वरून लिंबू पिळुन… बारीक किसलेलं खोबरं-कोथिंबिरीनं सजवलेली “बटाट्याची” सुकी भाजी असे….. त्याच वाटीत वर दोन लिंबाच्या फोडी असत….! ताटाची डावी बाजू झाल्यावर उजव्या बाजूच्या एका तांब्यात हरभऱ्याची डाळ, मेथ्या, शेंगादाणे, खोबऱ्याचे बारीक काप, मिरच्यांचे तुकडे घालून… चिंचगुळाचा कोळ घालून केलेली “आळू-चुक्याची” पातळ भाजी असे…

कधी शेंगदाण्याचं कूट… चिंचगुळ.. हिरव्या मिरच्या.. हिंग- मोहरी- जिरे- कढीपाल्याची फोडणी घातलेलं… चटकदार “मिरच्यांच पंचामृत”…! तर दुसऱ्या तांब्यात… खास पुरण करताना बाजूला काढून ठेवलेल्या कटाची अन थोड्या पुरणाचा गोळा एकत्र केलेल्याची… कढीपाल्याच्या फोडणीची… वरून कोथिंबीर.. खोबऱ्याचा खिस तेलावर तरंगताना दिसणारी चिंचगुळाचा कोळ घातलेली थोडी झणझणीत- आंबट- गोड चवीची “कटाची आमटी”… असायची. ज्या “कटाच्या” आमटीच्या एका ‘भुरक्यात’… तोंडं- घसा- नाक- कान- डोकं … हे सगळे अवयव refresh करायची ताकद आहे, ज्या आमटीच्या “भुरक्यात” … बेसनाचा लाडू अन साखरभाताने तुपाळलेला घसा… पूर्ववत करण्याची किमया आहे… ती कटाची आमटी..! त्या आमटीच्या बाजूलाच कधी एका गंजात (गंज – एक भांड्याचा प्रकार) दुधापासून आटवलेली.. जायफळाची चव खाताना जाणवणारी घट्ट “बासुंदी” असे… तर कधी आंबटगोड जायफळ-केशर घातलेलं घट्ट “श्रीखंड” … तर कधी उच्च प्रतीच्या आंब्याचा रस असे…!

– क्रमशः…

लेखक – श्री मंदार मार्तंड केसकर

पंढरपूर, मो. 9422380146

संग्राहिका : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मीप्रवासीनी ☆ मी प्रवासिनीक्रमांक २४- भाग ४ -वास्को-डि-गामाचे हिरवे पोर्तुगाल ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक २४- भाग ४ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️  वास्को-डि-गामाचे हिरवे पोर्तुगाल ✈️

तेगस नदीच्या पात्रात १५२१ मध्ये बेलहेम टॉवर बांधला गेला. येणाऱ्या- जाणाऱ्या व्यापारी जहाजांवर  लक्ष ठेवण्यासाठी बांधण्यात आलेले हे किल्ल्यासारखे मजबूत दगडी बांधकाम आहे. षटकोनी आकाराच्या या चार मजली टॉवरच्या प्रत्येक मजल्यावरून, त्याच्या नक्षीदार दगडी गवाक्षातून आपल्याला लांबवर पसरलेल्या नदीचे दर्शन होते. इथून जवळच ‘नॅशनल म्युझियम ऑफ आर्किऑलॉजी’ व नेव्हल म्युझियम आहेत.  नॅशनल म्युझियममध्ये इजिप्त, आफ्रिका इथल्या मौल्यवान कलात्मक वस्तू, विविध डिझाइनच्या मोझॅक टाइल्स, त्या काळातील नाणी आहेत तर नेव्हल म्युझियममध्ये नव्या जगाच्या शोधासाठी वापरण्यात आलेली जहाजे, राजेशाही नौका, समुद्र सफरीची इतर साधने, दक्षिण अटलांटिक महासागर ओलांडणारे पहिले जहाज अशा जगाच्या इतिहासातील अमूल्य वस्तू आहेत.

(बेलेम टॉवर, लिस्बन, मॉन्युमेंट टू डिस्कव्हरीज, क्रिस्तो रे (येशू ख्रिस्त) पुतळा)

तिथून जवळच ‘मॉन्युमेंट टू द डिस्कव्हरीज्’ उभारले आहे. पोर्तुगालमधील ज्या धाडसी दर्यावर्दींनी साहसी सागरी सफरीमध्ये भाग घेतला, आपल्या जिवाची बाजी लावली त्यांच्या स्मरणार्थ हे स्मारक १९६० मध्ये उभारण्यात आले. समुद्रावर आरूढ झालेल्या शिडाच्या भव्य नौकेसारखे याचे डिझाईन आहे. यावर पंधराव्या व सोळाव्या शतकातील २१ दर्यावर्दी, ज्यांनी पोर्तुगालचे समुद्रावरील अधिपत्य अधोरेखित केले त्यांचे पुतळे आहेत. या साऱ्यांच्या नेतृत्वस्थानी प्रिन्स  एनरीक, जो स्वतः उत्तम दर्यावर्दी होता त्याचा पुतळा आहे. या स्मारकाच्या बाजूला

लांबरुंद फुटपाथवर सबंध पृथ्वीचा नकाशा, जलमार्ग, सर्व देशांची महत्त्वाची ठिकाणे व त्यांच्या राजधानीचे ठिकाण वेगवेगळ्या रंगाच्या ग्लेज टाइल्समध्ये अतिशय सुंदर रीतीने दाखविले आहे.

‘जेरोनिमस मॉनेस्ट्री’ हा सोळाव्या शतकातील वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. या मोनेस्ट्रीच्या अंतर्भागातील डिझाईनमध्ये वास्को-डि-गामाने आपल्या सागर सफरींमधून जे असंख्य प्रकारचे सोने, रत्ने, हिरे, मौल्यवान धातू पोर्तुगाल मध्ये आणले त्यांचा वापर केलेला आहे.युनेस्कोने १९८३ मध्ये या मोनेस्ट्रीचा समावेश वर्ल्ड हेरिटेजमध्ये केला आहे. येशू ख्रिस्ताच्या आयुष्यातील अनेक प्रसंग इथे चितारलेले आहेत. प्रत्येक खांबावरील डिझाईन वेगवेगळे आहे. त्यावर धार्मिक चिन्हे, फुले, त्याकाळचे दागिने असे कोरलेले आहे.

या मोनेस्ट्रीमध्ये एका उंच चौथऱ्यावर वास्को-डि-गामाची टुम्ब ( थडगे ) आहे. त्यावर दोन्ही हात जोडून नमस्कार केल्याच्या स्थितीमध्ये आडवा झोपलेला असा वास्को-डि-गामाचा संगमरवरी पुतळा आहे. त्याच्या समोरच्या बाजूला पोर्तुगालचा प्रसिद्ध कवी व लेखक लुइस- डि- कामोस  याची तशाच प्रकारची टुम्ब आहे. या कवीने आपल्या महाकाव्यातून वास्को-डि-गामाच्या धाडसी सफरींचे गौरवपूर्ण वर्णन करून त्याला काव्यरूपाने अमर केले आहे. इसवीसन १५२४ मध्ये वास्को-डि-गामाचा मृत्यू कोचीन इथे झाला. त्यानंतर अनेक वर्षांनी त्याच्या मृतदेहाचे अवशेष पोर्तुगालला नेऊन ते या जेरोनिमस मोनेस्ट्रीमध्ये जतन करण्यात आले आहेत.

पोर्तुगाल म्हटलं की आपल्याला गोवा, दीव व दमण यांची आठवण होणं अपरिहार्य आहे. मसाल्याच्या व्यापारासाठी आलेल्या पोर्तुगीज, फ्रेंच, इंग्रज लोकांनी भारतातील राजकीय अस्थिरतेचा, फुटीरतेचा फायदा घेऊन हिंदुस्तानात आपले साम्राज्य स्थापन केले हा अप्रिय पण सत्य इतिहास आहे. पोर्तुगीजांनी सोळाव्या शतकात गोवा जिंकले. सत्तेबरोबर त्यांचा धर्मही रुजवायला सुरुवात केली. सत्ता, शस्त्रं, शक्तीच्या बळावर अत्याचार करून धर्मप्रसार केला. इंग्रजांचा इतिहासही काही वेगळे सांगत नाही.

भारत १९४७ मध्ये स्वतंत्र झाल्यावरसुद्धा गोवा स्वतंत्र होण्यासाठी १९६१ साल उजाडले. त्यासाठी गोवा मुक्तिसंग्राम घडला. गोवा सत्याग्रहामध्ये अनेकांचा बळी गेला. त्यानंतरही लिस्बनमधील तुरुंगात असलेले श्री मोहन रानडे यांची सुटका माननीय श्री सुधीर फडके यांच्या अथक प्रयत्नांमुळे झाली. हा सारा कटू इतिहास आपण विसरू शकत नाही. आजही गोवा, दीव, दमण इथे पोर्तुगीजकालीन खुणा चर्च, घरे, रस्त्यांची, ठिकाणांची नावे अशा स्वरूपात आहेत. पोर्तुगीज संस्कृतीचा प्रभाव तिथे जाणवतो.

इतिहास म्हणजे आपल्याला भविष्यकाळासाठी प्रेरणा देणारा काळाचा भव्य ग्रंथ आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अनेक ज्ञात-अज्ञात वीरांनी परकीय सत्ताधीशांच्या अनन्वित अत्याचाराला तोंड देत मृत्यूला जवळ केले आणि आपल्याला अनमोल स्वातंत्र्य मिळवून दिले. भारताच्या उज्ज्वल भविष्यकाळासाठी समृद्ध वर्तमान काळ उभा करणे हे आपलं परम कर्तव्य आहे. त्यासाठी प्रत्येक भारतीयाचे आपापल्या क्षेत्रातील प्रामाणिक योगदान ही स्वातंत्र्यवीरांसाठी कृतज्ञ श्रद्धांजली होईल. आपल्या भावी पिढ्यांसाठी ती अनमोल देणगी होईल.

भाग ३४ व पोर्तुगाल समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – संस्मरण ☆ मनाली : महाप्रलय के बाद प्राकृतिक सौंदर्य में बेजोड़ ☆ श्री कमलेश भारतीय ☆

श्री कमलेश भारतीय 

(जन्म – 17 जनवरी, 1952 ( होशियारपुर, पंजाब)  शिक्षा-  एम ए हिंदी , बी एड , प्रभाकर (स्वर्ण पदक)। प्रकाशन – अब तक ग्यारह पुस्तकें प्रकाशित । कथा संग्रह – 6 और लघुकथा संग्रह- 4 । यादों की धरोहर हिंदी के विशिष्ट रचनाकारों के इंटरव्यूज का संकलन। कथा संग्रह -एक संवाददाता की डायरी को प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी से मिला पुरस्कार । हरियाणा साहित्य अकादमी से श्रेष्ठ पत्रकारिता पुरस्कार। पंजाब भाषा विभाग से  कथा संग्रह-महक से ऊपर को वर्ष की सर्वोत्तम कथा कृति का पुरस्कार । हरियाणा ग्रंथ अकादमी के तीन वर्ष तक उपाध्यक्ष । दैनिक ट्रिब्यून से प्रिंसिपल रिपोर्टर के रूप में सेवानिवृत। सम्प्रति- स्वतंत्र लेखन व पत्रकारिता)

☆ संस्मरण : मनाली : महाप्रलय के बाद प्राकृतिक सौंदर्य में बेजोड़ ☆ श्री कमलेश भारतीय ☆

अचानक विजय के संदेश वट्स अप पर आने लगे कि मनाली में लेखक मिलन शिविर लगायेंगे सितम्बर में। आपको चलना है। दो बातें बहुत अच्छी थीं कि मनाली कभी गया नहीं था। दूसरे देश भर से लेखकों का साथ रहेगा तो मनाली यात्रा तो स्मरणीय हो जायेगी। वैसे भी हिमाचल या कहिए पर्वतों व वादियों में घूमना और प्राकृतिक सौदर्य में खो जाना, यह मुझे बहुत प्रिय है। धर्मशाला, शिमला इसी वर्ष गया हू। कई बार गया हूं लेकिन मनाली कभी नहीं। कुल्लू के लम्बे चलने वाले दशहरे के बारे में बचपन से सुनता आया हूं पर देखा कभी नहीं। मन ललचाता रहता है। मैंने झट से हां कह दी। एक और बात भी रही मन में कि अपनी पुस्तक यादों की धरोहर आने वाली है तो क्यों न वहीं लेखक शिविर में इसका लोकार्पण भी कर दूं? फिर छोटी मोटी तैयारियों में जुट गये परिवारजन।

आखिरकार यात्रा का दिन आ गया। मैंने वाया जालंधर जाने का निश्चय किया क्योंकि पुस्तक वहीं से ले जानी थी। वहीं रात जालंधर प्रेस क्लब में रुके। पत्रकार व परिचितों से मिलना हुआ जो इस यात्रा का बोनस रहा मेरे लिए। प्रेस क्लब बहुत अच्छा बना है औय नौ कमरे यात्रियों के लिए उपलब्ध हैं। अच्छी व्यवस्था। पत्रकारिता के अतिरिक्त अन्य सामाजिक व साहित्यिक आयोजनों का केंद्र बन चुका है यह क्लब।

दूसरी सुबह सिर्फ चाय पीकर चार बजे ही यात्रा शुरू की। पहले होशियारपुर आया। मेरा ननिहाल। मेरी जन्मभूमि पर मुंह अंधेरे में घर तो नहीं जा सकता था। अतः जन्मभूमि को प्रणाम करता हुआ आगे बढ़ गया। वैसे यहां आर्य समाज का बहुत बड़ा केंद्र है बजवाड़ा में। यहीं से विश्व ज्योति पत्रिका वर्षों से निकल रही है। कभी मैं संपादक से मिलने जाता था और मेरी अनेक रचनाएं इसके विशेषांकों में स्थान पाती रहीं। कह सकता हूं कि लेखन मेरी जन्मभूमि से घुट्टी में ही मिला होगा। थोड़ी दूरी के बाद ही पहाड़ शुरू हो गये जैसे कि होशियारपुर तो एक छोटी सी सीमा मात्र हो पहाड़ों और मैदान के बीच।

कहीं छोटा सा शहर आया। तब तक चाय और नाश्ते की जरूरत महसूस होने लगी थी। पहाड़ी सौदर्य के बीच हमने नाश्ते का आनंद लिया और निकल पड़े मनाली की मंजिल की ओर। जल्दी थी और पुस्तक के लोकार्पण का मन में चाव भी। कुल्लू तक ड्राइवर गाड़ी भगाता रहा और हम पर्वतीय सौंदर्य का रसपान करते रहे। सेबों के बाग देखने का बड़ा चाव था बेटी रश्मि को तो राह भर न केवल सेब ही सेब के बाजार बल्कि बागों के दर्शन भी होते रहे क्योंकि सीजन चरम पर था। दशहरा,  दीपावली त्योहार आने वाले थे। कुल्लू के बाजार में फिर होटल ढूंढा और दोपहर का भोजन किया। बहुत परिचित साहित्यकार हैं यहां लेकिन दिल ही दिल में याद किया। मंडी मैं तब आया था जब दैनिक ट्रिब्यून ज्वाइन किया था। तब नरेश पंडित और दीनू कश्यप से मिलना हुआ इनके एक कार्यक्रम में जो किसान भवन में रात्रि ग्यारह बजे तक चलता रहा था। साहित्य के आयोजन जरूरी हैं। नहीं तो इंटरनेट ने साहित्य का काफी स्वरूप बदल दिया है। इस तरह भागमभाग करते आखिर निर्धारित समय से थोड़ी देर से मनाल्सू पर्यटन होटल में पहुंच ही गये। रत्नचंद निर्झर और सैन्नी अशेष इंतज़ार और स्वागत् में खड़े थे। इस देरी के चलते पुस्तक किसी सुंदर आवरण में ढंक भी नहीं पाया और अनावरण का लोकार्पण कर दिया – कहानी लेखन महाविद्यालय के लेखक शिविर में श्रीमती उर्मि कृष्ण ने। इसके बाद छोटा सा कार्यक्रम और जलपान के बाद कमरों में आराम। रात के खाने के बाद जमी गाने सुनाने की महफिल। कुछ हंसी मज़ाक। कुछ अपने अपने साहित्यिक कद को भुला कर सबसे घुलमिल जाने की कोशिश। यही उद्देश्य है कि कभी सब नये थे लेखन में निरंतर अभ्यास व निखार के बाद स्थान बनता है।

दूसरी सुबह वनस्थल का कार्यक्रम रखा गया। नाश्ते के बाद मिन्नी बस में सवार मनाल्सू के किनारे वनस्थल है। खूब देवदार के लम्बे ऊंचे घने छायादार पेड़ों के नीचे धूप तो पहुंच ही नहीं पाती। नदी का प्यारा सा, खूबसूरत सा नज़ारा। थोड़ा नदी के पानी का संगीत। आत्मा गद्गद्। कैसे न कोई संन्यास ले ले यहां आकर। ओशो भी यहां आते रहे और स्टार विनोद खन्ना भी मानसिक शांति के लिए उनके पीछे पीछे मनाली आकर ओशो के लिए बर्तन मांजने तक के छोटे मोटे काम खुशी खुशी करते रहे। ये फोटोज तब अखबारों की सुर्खियां बने थे। नदी की कलकल ने सब भुला दिया। हिसार से चले राह भर की थकान को मुस्कान में बदल दिया। सब मिल गया। नयी ऊर्जा, नया उत्साह। नये मित्र। नये परिचय। कुल तीस लेखक पहुंचे थे देश भर में। सब फोटोज। सब सेल्फीज में जुट गये। एक घंटे बाद फिर मनाल्सू में भोजन। और बाद में छोटी सी साहित्यिक गोष्ठी। इंदु पटयाल और हिमसेतु की टीम व संपादक कृष्ण श्रीमान् से परिचय। चर्चा महिला पत्रकारिता पर की इंदु पटयाल ने । हमारा परिवार हिडिम्बा मंदिर की ओर चला। वैसे तो मनाल्सू होटल से थोड़ा ही ऊपर चढ़ाई चढ़ कर है लेकिन हमने अपनी गाड़ी से जाना ही ठीक समझा ताकि जो ताजगी पाई वह फिर पैदल चल कर खो न दें।

हमारे साथ कुल्लू से आये लेखक मित्र शेर सिंह भी थे। वे सारी बात और जानकारी देते रहे। लकड़ी का बना हिडिम्बा मंदिर और इसकी मान्यता लगता है कि यही संदेश देता है कि जन्म से हम चाहे किसी भी वंश के हों लेकिन अपने कर्मों से हम कुछ भी बन सकते हैं। अच्छे संस्कार से हम राक्षस वंश के बावजूद देवी बन सकते हैं। यही हिडिम्बा मंदिर का संदेश गूंजा मेरे मन में। खूब चहल पहल। देशी विदेशी पर्यटक। फोटोज की धूमधाम कि सब कैमरे में कैद कर लें। कुछ देर मंदिर के प्रांगण में बैठ मनाल्सू लौटे और रात के खाने के बाद फिर वही महफिल ए लेखक। गाना बजाना और हंसी मजाक। देर रात अपने अपने कमरों में। नींद ने कब अपनी आगोश में ले लिया। पता तक नहीं चला।

तीसरी और अंतिम सुबह। नाश्ता और वनविहार की ओर कूच मिन्नी बस से। यहां भी बड़े बड़े देवदार और नौकाविहार का आनंद भी। चहल पहल। हर पर्यटन केंद्र के आसपास पहाडी ड्रेस का प्रबंध कि आप एक बार पूरे पहाड़ी बन कर फोटो करवा लें। बेटी रश्मि इसी जन्म में पहाड़िन बन गयी और सौ रुपये के फोटो प्रमाण सहित लेकर फूली न समाई। सभी परिवार सचमुच पहाड़ी हो गये। सबका जन्म सफल हो गया और उन लोगों को मिला  रोज़गार। खरगोश भी साथ गोद में  लिए बैठी थीं। फोटोज के लिए जीवंत खरगोश। यहां थोड़ा दुख हुआ कि एक प्राणी कैसे सारा दिन गोद में फंसा रहता है। मन की कुलांचें नहीं भर सकता। मानव ने कैद कर रखा है। थोड़ा उदास मन से वन विहार से बाहर आया। मैं ऐसे शीर्षक से बहुत पहले लघुकथा लिख चुका हूं : मैं महात्मा बुद्ध नहीं हूं। सच हम महात्मा बुद्ध नहीं बन सकते पर प्राणियों और जीव जंतुओं की रक्षा का संदेश तो दे सकते हैं।

शाम के समय मनु मंदिर की ओर बढ़ चले। ऑटो रिक्शा आराम से मिल जाते हैं। सैन्नी अशेष तो एक गाइड से भी ज्यादा हैं मनाली में। इसीलिए वे कहते हैं कि मेरा नाम लेकर गाइड पूछना सब बता देंगे। वे हमें ऑटो में बिठाकर चौक तक खुद पैदल निकल लिए। हमसे पहले मौजूद क्योंकि छोटे रास्ते ढूंढ रखे हैं। मनु मंदिर के नाम से ही मनाली गांव बसा हुआ है। असली मनाली गांव और पर्यटकों की पहली पसंद के चलते मनाली बहुत बढ़ता गया। अब मनाली मंदिर के दर्शन के साथ ही असली मनाली के दर्शन हो रहे थे लेकिन रास्ते में देशी विदेशी सामान की दुकानें बड़ी संख्या में थीं। महाप्रलय के बाद मनु इसी जगह अकेले पूजा में जुटे थे। तभी श्रद्धा आईं और इस तरह जीवन फिर शुरू हुआ। जयशंकर प्रसाद की कामायनी का संदेश याद आया- अधिक सुख की तलाश में दुख मिलना स्वाभाविक है। यही तो हो रहा है मनुष्य के साथ। प्राकृतिक सौंदर्य का दोहन और पर्यावरण संकट। पराली से पराली तक धुआं ही धुआं। यह मनुष्य ने ही संकट पैदा किया है। प्रकृति का दोहन ही दोहन।

सैन्नी अशेष का घर पास ही था। वे हमारी टोली को अपने घर ले चले। पगडंडियां, खेत खलिहान और संध्या बेला में पशुओं का चारा पीठ पर लादे खेतों से लौट रहीं पहाड़ी महिलाएं। कहीं मक्की, कहीं सेब तो कहीं राजमाह की बेलें। सही मनाली। सैन्नी ने घर में एक बाल्टी में पानी भर कर सेब रखे थे उसमें ताकि हमें ठंडे सेब खाने को मिलें। सैन्नी ने अपनी व चर्चित स्नोवा बार्नो की किताबें भी दीं उपहार में। वहां से पैदल ही लौटे मनाल्सू होटल। थकान हो गयी पर सुखद। रात का भोजन। कुछ महफिल लेकिन ज्यादा उदासी। दूसरी सुबह बिछुड़ना जो था। सारी खुशी और बिछुड़ने का दुख। दूसरी सुबह हम मुंह अंधेरे बिना नाश्ते के ही निकल पड़े। सेब निशानी के तौर पर राह में खरीदे। कुल्लू में रुके शालिनी पत्रकार और शेर सिंह लेखक के साथ काॅफी की प्याली। शालिनी ने कहा- सर दशहरे तक रुक जाओ। फिर सही कह कर निकले क्योंकि मणिकर्ण गुरुद्वारे जाना था। 

मणिकर्ण की कथा भी बड़ी विचित्र। गुरु नानक देव यहां यात्रा करते बाला मर्दाना के साथ पहुंचे। रोटी कैसे बने। नदी थी। गुरु जी को बताया कि चावल उबाल लो। कैसे? शिष्यों ने पूछा तो गुरु नानक देव ने एक पत्थर हटाया और वहां गर्म पानी का चश्मा फूट गया। वह गर्म पानी आज भी मौजूद है और बहुत से रोग इसमें स्नान से दूर हो जाते हैं। दूसरी कथा शिव पार्वती से जुड़ी है। वे यहां तपस्या करते थे। पार्वती की मणि खो गयी। शिव ने ध्यान लगाया शेषनाग के पास थी। शिव के प्रभाव से एक मणि ही नहीं बल्कि रोज़ एक मणि अर्पण करने लगा। शिव ने पार्वती को कहा कि अपनी मणि ले लो और बाकी मणियों को पत्थर बना दिया ताकि इन्हें लेकर आपस में वैर न बढ़  जायें। यह बहुत बड़ा संदेश कि मणियों के लिए मणिकर्ण न आएं बल्कि सच्चे भाव से यहां आएं। इसीलिए गुरुद्वारे में शिव पार्वती की फोटो भी लगी है।

एक रात चंडीगढ़ यूटी गेस्ट हाउस और फिर अगली सुबह फिर मुंह अंधेरे का सफर ताकि बेटी यूनिवर्सिटी में समय पर अपने ऑफिस पहुंच सके। मनाली की यादें और सौंदर्य।

© श्री कमलेश भारतीय

पूर्व उपाध्यक्ष हरियाणा ग्रंथ अकादमी

संपर्क :   1034-बी, अर्बन एस्टेट-।।, हिसार-125005 (हरियाणा) मो. 94160-47075

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ मनोज साहित्य # 42 – मनोज के दोहे ☆ श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज” ☆

श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज”

संस्कारधानी के सुप्रसिद्ध एवं सजग अग्रज साहित्यकार श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज” जी  के साप्ताहिक स्तम्भ  “मनोज साहित्य ” में आज प्रस्तुत है “मनोज के दोहे। आप प्रत्येक मंगलवार को आपकी भावप्रवण रचनाएँ आत्मसात कर सकेंगे।

✍ मनोज साहित्य # 42 – मनोज के दोहे

कजरी

झूला सावन में लगें, गले मिलें मनमीत।

कजरी की धुन में सभी,गातीं महिला गीत।

देवी की आराधना, कजरी-सावन-गीत।

नारी करतीं प्रार्थना, जीवन-पथ में जीत।।

तीज

सावन-भादों माह में, पड़ें तीज-त्यौहार।

संसाधन कैसे जुटें, महँगाई की मार।।

भाद्र माह कृष्ण पक्ष को, आती तृतिया तीज ।

महिला निर्जल वृत करें, दीर्घ आयु ताबीज ।।

चूड़ी

लाड़ो चूड़ी पहन कर, भर माथे सिंदूर।

चली पराए देश में, मात-पिता मजबूर।।

शृंगारित परिधान में, चूड़ी ही अनमोल।

रंग बिरंगी चूड़ियाँ, खनकातीं कुछ बोल।।

मेहँदी

सपनों की डोली सजा, आई पति के पास।

हाथों में रच-मेहँदी, पिया मिलन की आस।।

लालरँग मेहँदी रची, आकर्षित सब लोग।

प्रियतम के मनभावनी, मिलते अनुपम भोग।।

झूला

सावन की प्यारी घटा, लुभा रही चितचोर।

झूला झूलें चल सखी, हरियाली चहुँ ओर।।

सावन में झूला सजें, कृष्ण रहे हैं झूल।

भारत में जन्माष्टमी, मना रहे अनुकूल।।

©  मनोज कुमार शुक्ल “मनोज”

संपर्क – 58 आशीष दीप, उत्तर मिलोनीगंज जबलपुर (मध्य प्रदेश)-  482002

मो  94258 62550

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – आर-पार ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। ) 

? संजय दृष्टि –  आर-पार ??

नदी का पाट चौड़ा है,

नदी में पानी गहरा है,

नदी में भंवर उठते हैं,

नदी में मगरमच्छ बसते हैं,

नदी में झंझावात है,

नदी में आघात है,

नदी सतत आशंका है,

नदी मृत्यु का घंटा है,

नदी से डरो..!

 

नदी में पानी है,

नदी की कहानी है,

नदी में सृष्टि है,

नदी एक दृष्टि है,

नदी में प्रवाह है,

नदी में उछाल है,

नदी अखंड संभावना है,

नदी का निमंत्रण स्वीकार करो,

नदी को पार करो…!

© संजय भारद्वाज

प्रातः 5:05 20 जून 2022

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

writersanjay@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares