(श्री श्याम खापर्डे जी भारतीय स्टेट बैंक से सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी हैं। आप प्रत्येक सोमवार पढ़ सकते हैं साप्ताहिक स्तम्भ – क्या बात है श्याम जी । आज प्रस्तुत है पितृ दिवस पर आपकी एक भावप्रवण कविता “# बात ही कुछ और है #”)
☆ ॥ मानस में भ्रातृ-प्रेम– भाग – 2 ॥ – प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’☆
इधर भरत चित्रकूट जाते हुये मन में भाई राम के प्रेम पर अटूट विश्वास था कि मिलने पर वे उन्हें क्षमा कर वापस आकर स्वत: राजा बनेंगे। अपने मन में भरत के लिये किसी प्रकार का बुराभाव नहीं रखेंगे क्योंकि बचपन से ही वे भरत को प्रेम करते हैं। न जाने माता कैकेयी ने किस दुर्बुद्धिवश सारी अयोध्या पर आपत्ति ला खड़ी की है। वे विश्वास रखते हैं-
मैं जानऊं निज नाथ स्वभाऊ, अपराधिहुं पर कोह न काऊ।
मो पर कृपा सनेहु विशेषी, खेलत खुनिस न कबहूं देखी॥
सिसुपन ते परिहरेहु न संगू कबहुं न कीनि मोर मन भंगू।
मैं प्रभु कृपा रीति जियं जोही, हारेहु खेलजिता एहु मोही॥
आन उपाय मोहि नहिं सूझा, को जिय की रघुबर बिन बूझा॥
भरत के दल बल सहित, राम के पास जाने के कारण कईयों को आशंकायें होती हैं। पर राम का पूरा विश्वास है भरत पर-
भरतहिं होई न राजमदु विधि हरिहर पद पाई।
कबहुँ कि काँजी सीकरनि, क्षीर सिंधु विनशाई॥
भरत चित्रकूट तो बड़े भाई राम को वापस लाने का संकल्प लेकर गये थे। उन्हें विश्वास था कि राम के राजा बनने के लिये उनके आग्रह वे मान लेंगे, क्योंकि वे उन्हें बहुत प्यार करते हैं और इससे उनका प्रायश्चित हो जायेगा। उन्हें मन में शांति भी मिलेगी और समस्त अयोध्या का मन प्रसन्न होगा। परन्तु चित्रकूट में राम के मन में उनके लिये अगाध प्रेम ने उनकी मनोभावना ही बदल दी जब राम ने उनपर उनकी शुभ इच्छानुसार ही सही निर्णय कर वापस अयोध्या ले जाकर राज्याभिषेक करने की जिम्मेदारी छोड़ दी। अपने आग्रह पर चलने के लिये दूसरे को बाध्य करने की अपेक्षा यह अधिक उद्दात्त विचार कि कर्तव्य और मर्यादा का उल्लंघन कर किसी को असमंजस में डाल काम कराना कितना सही प्रेम प्रदर्शन होगा, भरत को निर्णय लेना था। राम और भरत का पारस्परिक प्रेम को निभाते हुये दोनों को दोनों पर जिम्मेदारी डालना और निर्णय लेना मानस का अद्भुत मार्मिक प्रेम प्रसंग है। राम को लौटाने का आग्रह त्याग भरत को कहना पड़ा-
अब कृपाल मोहि से मत भावा, सकुच स्वामि मन जाई न पावा।
प्रभुपद सपथ कहऊँ सतभाउ, जग मंगल हित एक उपाऊ॥
प्रभु प्रसन्न मन सकुच तजि जो जेहि आयसु देव।
सो सिर धरि धरि करिहि सब मिटहि अनट अवरेह॥
तब- दीनबंधु सुन बंधु के वचन दीन छलहीन।
देशकाल अवसर सरिस बोले राम प्रवीण॥
तात तुम्हारि मोरि परिजन की चिंता गुरहि नृपहिं घर वन की।
माथे पर गुरु मुनि मिथलेसू, हमहिं तुम्हहिं सपनेहु न कलेसू॥
पितु आयसु पालहि दुहुँ भाई, लोक वेद भल भूप भलाई।
गुरु पितु मातु स्वामि सिख पाले, चलेहु कुमग पग परहि न खाले।
अस विचार सब सोच विहाई, पालहु अवध अवधि भर जाई॥
इस प्रकार आपसी प्रेम, पिता का वचन और रघुकुल की रीति का मान रख कर राम ने भरत को अयोध्या वापस जाकर राज्य का संचालन और सुरक्षा का भार दे दिया।
भरत और शत्रुघ्न अयोध्या आकर एक सेवक की भांति राम की चरणपादुकाओं को राज सिंहासन पर आसीन कर स्वत: भी राम की ही भांति तापस जीवन बिताते हुए 14 वर्षों तक राम के राज्य का उचित संचालन किया और राम के वापस आने पर उनका राजतिलक कर उन्हें उनका राज्य सौंप दिया।
‘स्वामी विवेकानंद’ यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका ‘विचार–पुष्प’.
तीर्थंभ्रमणाला निघायच्या आधी पण नरेंद्रनाथ आंटपूर, वैद्यनाथ, शिमूलतला इथे कित्येकदा आले होते. उजाडल्यानंतर सूर्य किरणे सर्व दिशांना पसरतात हे सांगायची गरज नसते. तसे स्वामीजी जिथे जिथे जातील तिथे तिथे प्रभाव पाडत असत. असाच अनुभव ते फिरलेल्या प्रत्येक प्रांतात दिसतो. बिहार प्रांत फिरत फिरत ते हिंदू भारतभूमीचं हृदय समजल्या जाणार्या काशीला आले. इथे ते संस्कृत भाषेचे पंडित आणि साहित्य व वेदांत पारंगत असलेले सद्गृहस्थ श्री प्रमदादास मित्र यांच्याकडे राहिले. स्वामीजींना त्यांच्या विद्वत्तेबद्दल आदरभाव वाटू लागला. पुढे पुढे तर ते वैदिक धर्म आणि तत्वज्ञान याबद्दल काही शंका असली की ते प्रमदादास यांना पत्र लिहून विचारात असत. आपले आजोबा दुर्गाप्रसाद हे संन्यास घेतल्यावर काशीत आले होते. श्रीरामकृष्ण पण इथे येऊन गेले होते. तिथे मद्रासी, पंजाबी, बंगाली, गुजराथी, मराठी हिंदुस्तानी अशी प्रभृती सर्वजण, आचारांची भिन्नता असूनही एकाच उद्देशाने विश्वेश्वराच्या मंदिरात एकत्र येत असत. यात नरेंद्रनाथांना या विविध लोकांमधला ऐक्याचा विशेष गुण भावला. म्हणूनच त्यांना सगळीकडे फिरून भारत जाणून घ्यावसा वाटला होता.
शिवाय इंग्रजांची सत्ता, गुलामी असताना वर्तमान अवस्थेत, देशातील आध्यात्मिक संस्कृती कशी आहे, सामान्य लोक कसे जगताहेत? शिक्षणाची काय परिस्थिति आहे? सनातन धर्म सगळीकडे कसा आहे? याची सगळीकडे हिंडून माहिती करून घ्यावीशी वाटली. त्यासाठी ते इथून निघून कन्याकुमारी पर्यन्त शहरे, खेडी, विविध लोक, शेतकरी, गरीब, दीन दुबळे, राजे रजवाडे, संस्थानिक आणि जे जे आवश्यक त्यांच्या भेटी घेत अवलोकन करता करता भ्रमण करत होते.
उत्तरेत फिरून झाल्यावर ते शरयू तीरावरच्या अयोध्येला येऊन पोहोचले. काशी आणि अयोध्या ही धर्मक्षेत्र होती. त्यामुळे स्वामीजींचे आध्यात्मिक मन तिथे रमले. ‘अयोध्या’ जिच्या मातीशी सूर्यवंशी राजांच्या गौरवाची स्मृती जोडलेली आहे. शरयू नदीच्या तीरावरून आणि घाटावरील विविध मंदिरातून फिरतांना त्यांच्या डोळ्यासमोर प्रभू श्रीरामचंद्रांचे चरित्रच उभे राहिले. आदर्श राजा, आदर्श पुत्र, आदर्श पती, आदर्श भाऊ, अशा प्रभू श्रीरामचंद्राच्या अयोध्येत आल्याबरोबरच त्यांना लहानपणची रामसीतेची भक्ती, रामायण प्रेम, वीरभक्त श्री हनुमानवरची गाढ श्रद्धा आणि आईच्या तोंडून ऐकलेल्या रामाच्या कथा सारे सारे आठवले असणारच. काही दिवस इथे त्यांनी रामायत संन्याशांच्या समवेत श्रीरामनामसंकीर्तनात घालवून पुढे ते ऑगस्ट१८८८ मध्ये लखनौ- आगरा मार्गाने पायी पायी चालत वृंदावनच्या दिशेने निघाले.
लखनौला त्यांनी बागा, मशिदी, नबाबाचे प्रासाद बघितले. आग्र्याला आल्यावर तिथल्या शिल्प सौंदर्याचा जगप्रसिद्ध नमुना ‘ताजमहाल’ मोगलकालीन इमारती, किल्ले पहिले. मोगल साम्राज्याचा इतिहास त्यांच्या डोळ्यासमोर उभा राहिला. लखनौ आणि आग्रा या ऐतिहासिक स्थळं सुद्धा त्यांच्या मनात भरली. कारण ती भारताच्या इतिहासाच्या पर्वाची महत्वाची खूण होती आणि स्वामीजी त्याबद्दल पण जागरूक होते. म्हणून एक वैभवशाली साम्राज्याची स्मृती म्हणून ते पाहत होते.
शिवाची काशी पाहिली, श्रीरामची अयोध्या पाहिली आता भगवान श्री कृष्णाच्या वृंदावनला स्वामीजी पोहोचले. राधा कृष्णाची लीलाभूमी असलेल्या वृंदावनात, मर्यादित परिसरात असलेले विविध प्रकारचे, भिन्न काळात बांधले गेलेले वास्तूकलेचे, अनेक मंदिरांचे नमुने त्यांना पाहायला मिळाले. वृंदावनला ते बलराम बसुंच्या पूर्वजांनी बांधलेल्या कुंजामध्ये राहिले. तिथे यमुनेच्या वळवंटात असो की भोवताल च्या परीसरात असो सगळीकडेच, श्रीकृष्णाच्या बासरीचा मधुर ध्वनी येतोय असे वाटावे अशा काव्यात्मक आणि भक्तिपूर्ण वातावरण त्यांनी अनुभवले. गोवर्धन पर्वताला त्यांनी प्रदक्षिणा घातली. तेंव्हाच त्यांनी मनाशी संकल्प केला की, कोणाकडेही भिक्षा मागायची नाही. कोणी आपणहून आणून दिले तरच त्या अन्नाचा स्वीकार करायचा. हे बिकट व्रत त्यांनी घेतले. एकदा तर त्यांना पाच दिवस उपाशी राहावे लागले होते. पण इथे त्यांनी दोन वेळा परमेश्वर भक्तीचा ईश्वरी अनुभव घेतला आणि श्रीकृष्णाची भक्ती आणखीनच दृढ झाली.
पुढे ते हरिद्वारला गेले. वाटेत जाता जाता ते हाथरस च्या स्थानकावर बसले असताना, त्यांना थकलेल्या अवस्थेत स्थानकाचे उपप्रमुख असलेले शरदचंद्र गुप्त यांनी पाहिले. आणि, “स्वामीजी आपल्याला भूक लागलेली दिसते आपण माझ्या घरी चलावे” अशी विनंती केली. स्वामीजींनी लगेच हो म्हटले आणि त्यांच्या घरी गेले. स्वामीजींचे व्यक्तिमत्व बघून शरदचंद्र गुप्त आकर्षित झाले होते , त्यांनी स्वामीजींना काही दिवस इथे राहावे असा आग्रह केल्याने ते खरच तिथे राहिले. सर्व बंगाली लोक संध्याकाळी एकत्र जमत. आपला धर्म आणि समाज यावरील सद्यस्थितीबद्दल स्वामीजी बोलत. आपल्या मधुर आवाजात गीतं म्हणत. येणारे सर्व बंगाली मोहित होऊन जात. त्यांच्यातील भांडणे जाऊन एकोपा निर्माण झाला.
एकदा चिंतेत असताना शरदचंद्रांनी स्वामीजींना पाहिलं आणि विचारलं, “आपण एव्हढे कसल्या विचारात आहात?” स्वामीजी म्हणाले, “मला खूप काम करायचं आहे. पण माझी शक्ती कमी. काम मोठं आहे. मातृभूमीचं पुनरुत्थान घडवून आणायच आहे. तीचं आध्यात्मिक सामर्थ्य क्षीण झालं आहे. सगळा समाज भुकेकंगाल आहे. भारत चैतन्यशाली झाला पाहिजे. अध्यात्मिकतेच्या बळावर त्यानं सारं जग जिंकलं पाहिजे”. अशा प्रकारचे संवाद होत होते. चर्चा होत होत्या. काही दिवसांनी स्वामीजी तिथून निघतो म्हटल्यावर, शरदचंद्र जाऊ नका म्हणून विनवणी करू लागले आणि ‘मला आपला शिष्य करून घ्या’ असेही म्हणू लागले. तुम्ही जिथं जाल तिथं मी तुमच्या मागोमाग येईन हा त्यांचा दृढ निश्चय ऐकून, “शेवटी तुम्ही माझ्याबरोबर येण्याचा आग्रहच धरता आहात तर घ्या हे भिक्षा पात्र आणि स्थानकातले जे हमाल आहेत त्यांच्या दरात जाऊन भिक्षा मागून आणा” असे स्वामीजी म्हटल्याबरोबर, शरदचंद्र तडक उठले आणि भिक्षा पात्र घेऊन सर्वांकडून भिक्षा मागून आणली. स्वामीजी अत्यंत खुश झाले. त्यांनी शरदचंद्रांचा शिष्य म्हणून स्वीकार केला. असे शरदचंद्र गुप्त हे स्वामीजींचे पहिले शिष्य झाले, आणि मातापित्यांचा आशीर्वाद घेऊन, नोकरीचा राजीनामा देऊन, स्वामीजीं बरोबर ते हाथरस सोडून हृषीकेशला आले. त्यांचे नाव स्वामी सदानंद असे ठेवण्यात आले. असा सुरू होता स्वामीजींचा प्रवास .
☆ भिकारी (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
त्याचं निधन झालंय. आत्ताच मी त्याच्या अंत्ययात्रेहून परत येतोय. त्यासाठी आलेले इतर लोक सांगत होते की, तो बऱ्याच दिवसांपासून आजारी होता. पण त्याने कुठलेच औषधोपचार केले नव्हते. कोणीतरी सांगत होतं की तो अतिशय घाणेरड्या घरात राहत होता. एकजण म्हणत होता की कुपोषणामुळे त्याचा मृत्यू झाला. त्यावर दुसरा एकजण म्हणाला की, तो रोज दोन वेळा पोटभर जेवला असता तर आणखी काही दिवस नक्की जगू शकला असता.
काही दिवसांपूर्वी जेव्हा तो मला भेटला होता, तेव्हा माझ्याशी अगदी मनमोकळेपणाने बोलला होता. कदाचित मी असा एकटाच माणूस असेन ज्याच्याशी तो इतक्या आपलेपणाने बोलला असेल. त्याच्याकडे काही लाख रुपयांची रोख रक्कम असल्याचे त्याने मला सांगितले होते. या एका शहरात त्याचे सहा फ्लॅट आहेत. त्यादिवशी आम्ही बोलत असतांना आतून कुणीतरी त्याला हाक मारली, म्हणून तो आत गेला. मी मग उगीचच त्याच्या घरात इकडेतिकडे पहात बसलो होतो. तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी ज्या खुर्चीवर बसलो होतो, ती खुर्ची अगदी मोडकळीला आलेली होती. कितीतरी वर्षांपूर्वी त्याच्या ऑफिसमधल्या जुन्या सामानाचा लिलाव झाला होता, त्यात त्याने ती विकत घेतली होती. त्याच्या घरात फर्निचर म्हणावं असं फारसं काही नव्हतंच. इतर जे सामान दिसत होतं– म्हणजे सायकल, शिलाई-मशीन, टेबलफॅन वगैरे, तेही त्याने कुठून कुठून सेकंडहॅंडच विकत घेतलेलं होतं. घरही भाड्याचंच होतं, आणि गेली तीस वर्षं तो तिथेच रहात होता. बऱ्याच वर्षांपासून त्याने त्या घराचं भाडं देणंही बंद केलं होतं. आणि त्या घराची अवस्था खरोखरच इतकी वाईट झालेली होती की कधीही ते कोसळून पडू शकलं असतं. घराचा मालक कधी या जगाचा निरोप घेतोय, याचीच ते घर– आणि बहुतेक तोही– वाट बघत होते.
थोड्या वेळाने एका मळकट-कळकट आणि तडा गेलेल्या कपात चहा घेऊन तो बाहेर आला. तो चहा नुसता पाहूनच इतकं कसंतरी वाटलं मला, की तो जर तिथे माझ्यासमोर उभा नसता ना, तर त्याच्या घराच्या दरवाज्यासमोरून वाहणाऱ्या उघड्या गटारात मी तो फेकूनच दिला असता. असो.– त्याने पुन्हा बोलायला सुरुवात केली होती. — त्याला जेव्हा नोकरी लागली, तेव्हा त्याची आर्थिक परिस्थिती फारच हलाखीची होती. त्यामुळे नोकरी लागल्या लागल्या तो कसंही करून पैसे वाचवण्याच्या मागे लागला. त्या नोकरीबरोबरच काहीतरी पार्ट-टाइम कामही करायला लागला होता. बघता बघता त्याचं उत्पन्न वाढलं–आणि वाढतच राहिलं. पण तरीही आधीपासूनच त्याने खर्चाला जो लगाम लावलेला होता, तो मात्र त्याने कधीच सैल सोडला नाही. मग काय — त्याची बचत चहूबाजूने जणू फुलायला लागली. एका बँकेनंतर दुसरी–दुसऱ्या बँकेनंतर तिसरी– असं करता करता अनेक बॅंकांमध्ये खाती उघडली गेली. आता पैसे दुप्पट नाही, तर चौपटीने वाढायला लागले.
मी त्याला एकदा विचारलं होतं की, “ इतक्या पैशांचं काय करणार आहेस तू ? “
यावर त्याने काय उत्तर द्यावं ? तो म्हणाला होता की, “ मी असा विचार करतोय की सगळी खाती बंद करायची आणि सगळे पैसे एकाच चांगल्या बँकेत टाकायचे. “
“मग पुढे ? “ मी विचारलं.
“मग सगळी रक्कम सहा वर्षांसाठी फिक्स्ड डिपॉझिटमध्ये टाकीन. म्हणजे एकूण सगळीच रक्कम दुप्पट होईल. “
“ याचा तुला काय फायदा मिळेल ? “
“ फायदा हा होईल की मला हिशोब ठेवणं सोप्पं जाईल. “
“ बरं, पण मग अशा रीतीने रक्कम दुप्पट झाल्यानंतर पुढे काय करशील ? “
“ मग पुन्हा ती सगळी रक्कम पुढच्या सहा वर्षांसाठी फिक्स्ड डिपॉझिटमध्ये टाकीन. “
“ म्हणजे कधी कुठला खर्च करणारच नाहीस का ? “
“ एवढी रक्कम खर्च कशी केली जाते ? “ त्याने भाबडेपणाने मलाच उलटा प्रश्न विचारला होता.
——- मी अगदी सहजच समोरच्या टीपॉयवर पडलेलं वर्तमानपत्र हातात घेतलंय. पहिल्याच पानावर एक बातमी छापून आलेली आहे —-” रस्त्यावर भीक मागणारा एक भिकारी, कडाक्याच्या थंडीमुळे गारठून गेल्यामुळे त्याच्या मोडक्या झोपडीत मृतावस्थेत सापडला. त्याला त्या झोपडीतून बाहेर काढण्यासाठी लोक जेव्हा आत गेले, तेव्हा त्यांना त्याच्या मृतदेहाखाली, चिल्लरने भरलेली दोन मोठी मडकी, आणि नोटांनी गच्च भरलेले पत्र्याचे दोन मोठे डबे, जमिनीत पुरून ठेवलेले सापडले.”
——- ज्याची अंत्ययात्रा संपवून मी थोड्या वेळापूर्वीच परत आलो होतो, तो मित्र क्षणात माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला.– आणि आता मी विचारात पडलोय, की त्याच्यात आणि या भिकाऱ्यात काय फरक आहे ? ——–
मूळ हिंदी कथा – ‘भिखारी’, कथाकार – भगवान वैद्य `प्रखर’
अनुवाद – सुश्री मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आंतरराष्ट्रीय योगा दिन – भाग – 2 ☆ डॉ मनीषा आणि डॉ अभिजीत सोनवणे ☆
हा दिवस जाहीर झाल्यापासून प्रत्येक वर्षी आम्ही हा दिवस याचना करणाऱ्या लोकांसाठी आयोजित करत आहोत… !
डॉ मनीषा सोनवणे ही खरंतर योगाची मास्टर ट्रेनर…. मास्टर ट्रेनर म्हणजे शिक्षकांचा शिक्षक…. !
मागील तीन वर्षांपूर्वी एका पत्रकाराने मनीषाला म्हटले होते, ‘अहो तुम्ही मास्टर ट्रेनर आहात…. सेलिब्रिटींचे योगासन घेण्याऐवजी, भीक मागणाऱ्या लोकांची योगासने काय घेत बसले आहात ?
मनीषा म्हणाली होती, ‘भीक मागणाऱ्या लोकांनाच आम्हाला सेलिब्रिटी बनवायचं आहे … ‘
—तर… आजच्या दिवशी आम्ही आमच्या वृद्ध आई-वडिलांना, ज्यांना भीक मागावी लागते अशांना, लालमहाल परिसर आणि शनिवार वाड्यावर घेऊन आलो… तिथे योगाचे धडे दिले…. नाचलो…. विठ्ठल नामाचा गजर केला….!
माझे बंधुतुल्य मित्र श्री धनंजय देशपांडे उर्फ डीडी हे हा कार्यक्रम लाईव्ह करत होते…. हा माणूस म्हणजे हरहुन्नरी… ! या माणसाला शब्दात कसा पकडू ??? इथे शब्द थिटे होतात…
त्यांनी मला विचारलं हाच एरिया का निवडला ? —लाल महाल आणि शनिवार वाडा ही इतिहासाच्या हृदयातली दोन स्थाने आहेत….
तशीच आई आणि बाप ही आपल्या प्रत्येकाच्याच हृदयातली दोन स्थानं आहेत…
आई बापाचा सन्मान करायचा…. तर याहून दुसरे श्रेष्ठ स्थान नाही, म्हणून हा एरिया निवडला…. !
—यावर डिडीनी मला घट्ट मिठी मारली…. !
कृष्ण सुदाम्याची ती भेट होती… मला या निमित्ताने आज कृष्ण भेटला…. !
श्री नितीन शिंदे, मधु तारा सोशल फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष…. अनेक सामाजिक कार्यक्रमांमध्ये सक्रीय सहभाग…. हा माणूस सध्या कोट्याधीश आहे…. पैशाने आणि मनानेसुद्धा !
हा माणूस रिक्षा पंचायतीचा पुणे जिल्हाप्रमुख आहे !
यांना कोणी विचारले, तुम्ही काय करता ? तर हे बेधडक सांगतात, ‘काय नाय ओ…. मी रिक्षा चालवतो… !’
यावरून एखाद्याला वाटतं हे “रिक्षावाले काका” आहेत…
नाही… , कोट्याधीश असून हा माणूस दिवसभर स्वतः रिक्षा चालवतो…. आणि रस्त्यात अडल्या नडल्या, अंध-अपंग यांना दवाखान्यात स्वखर्चाने ॲडमिट करतो, कोणताही कॅन्सर पेशंट असेल तर त्याला ऍडमिट करून त्याच्या ट्रीटमेंटचा खर्च ते स्वतः करतात…
आज वाटण्यासाठी किराणा मालाची पोती आम्ही आणली होती…
या वेड्या माणसाने शंभर शंभर किलोंची ही पोती स्वतःच्या पाठीवर वाहून आणली….
मी जरा रागावून माझ्या या मित्राला म्हणालो, ‘तुम्ही कशाला त्रास घेतला ? वेडे आहात का ?
ते म्हणाले…., ‘बास्स का राव डॉक्टर …. माझे पूर्वीचे निम्मे आयुष्य हमाली करण्यात गेले…’
“धन्याचा तो माल…. मी भारवाही हमाल …. “
या “येड्या” माणसाच्या मी पायाशी झुकलो आणि त्याने मला उठवून हृदयाशी लावलं …. !
ही आणि अशीच अनेक “वेडी” माणसं आम्हाला आज भेटून गेली… पाठीवर हात ठेवले….
श्री प्रभाकर पाटील सर, सौ विजयाताई जोशी, श्री जुगल राठी सर, डॉ बजाज सर, सौ गौरीताई पेंडसे, श्री बंकटलाल मुंदडा, सौ आरोही दिवेकर…. आणखी किती नावे लिहू?
यातील प्रत्येक व्यक्ती हे एक स्वतंत्र पुस्तक आहे….
या प्रत्येक व्यक्तिमत्वास शब्दात बांधण्यास मी असमर्थ आहे…. !
आजच्या योग दिनानिमित्त आलेले सर्व माझे आईबाप हे मला “वारकरी” दिसत होते…
आमच्याकडे तुळशीमाळ नव्हती…. म्हणून आम्ही त्यांच्या गळ्याभोवती हात गुंफले….
टाळ सुध्दा नव्हते आमच्याकडे… मग आम्ही टाळ्या वाजवल्या….
याचना करणाऱ्या या आई बापाच्या पायाखालची माती अबीर बुक्का म्हणून आम्ही आज कपाळाला लावली….
सर्व भेटलेल्या आईंनी डोक्यावरून हात फिरवून कडाकडा बोटे मोडली आणि तिथे मृदंग वाजत असल्याचा भास झाला….. आम्ही फुगड्या घातल्या नाहीत…. परंतु रिंगण करून खेळलो…. जणू…
खेळ मांडीयेला वाळवंटी घाई I
नाचती वैष्णव “आई” रे II
मनीषाच्या डोईवर “तुळशी वृंदावन” नव्हते म्हणूनच की काय …. कित्येक आईंनी तिच्या डोईवर पदर धरला….
शेवटी अल्पोपहार करवून… सर्वांना शिधा दिला !
सर्व आईंना नमस्कार करण्यासाठी आम्ही त्यांच्या पायाशी झुकलो…. त्यांनी खांदे धरून उठवत आम्हाला पदरात घेतलं…. जणू “माऊली” भेटली… !
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने, “भिक्षेकरी आणि गावकरी” ही दोन विरुद्ध टोक आम्ही यानिमित्ताने जोडण्याचा प्रयत्न केला…!
लाचारीची आहुती वाहून, स्वाभिमानाचा यज्ञ पेटवण्याचा प्रयत्न केला….
“Humanity” म्हणजे काय ? हे आम्हाला कळत नाही…. पण माणूस म्हणून जगण्या – जगवण्याचा आम्ही प्रयत्न केला….. या वृद्ध आई-वडिलांच्या चेहऱ्यावरचे, समाधानाचे हसू आज पाहिले आणि आम्हाला इथेच अख्खं पंढरपुर दिसू लागलं…
सरतेशेवटी गर्दीच्या गोंगाटात…. भरधाव वाहनांमधून वाट काढत, त्यांच्या हाताला धरून आम्ही त्यांना रस्ता क्रॉस करून दिला…
जाताना त्यांच्या पाठमोर्या आकृतीकडे पाहून सहज मनात विचार आला…. खरंच रस्ता कोणी कोणाला क्रॉस करून दिला ?
प्रत्यक्ष विठ्ठल रखुमाईने आमचा हात धरून आम्हालाच गर्दीचा हा रस्ता क्रॉस करवून दिला होता….
परतीच्या प्रवासाला चाललेली ती पाऊले पाहून….विठ्ठल-रखुमाईच्या चरणांचा साक्षात्कार झाला….
☆ फणसकिंग… श्री प्रदीप कोळेकर ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे – जोशी ☆
हरिश्चंद्र देसाई यांच्या ‘झापडे’ येथील बागेला दिलेल्या भेटीत उलगडला गेला तो एका अवलीयाचा “शासकीय कर्मचारी (एक्सरे टेक्निशियन) ते फणसकिंग” असा थक्क करणारा प्रवास.
एक शेतकरी वयाच्या 55 व्या वर्षी फणस लागवडीचा निर्णय घेतो. खरं तर हे निवृत्तीचे वेध लागणारे आणि नातवंडाच्यात रमण्याचे वय. पण हा माणूस या वयात देश-विदेशातील फणसाच्या जातीचा अभ्यास करतो, त्या बहुतांश फणसाच्या जातीची रोपे मिळवतो..अश्या 70 ते 80 प्रकारच्या फणसाच्या जातीची, 3000 हजार फणसाची झाडे आपल्या झापडे येथील 13 एकर जागेत लावतो.
बरं, एवढं करून एखादा माणूस फणसाच्या फळाची, त्याच्यापासून मिळणा-या उत्पन्नाची वाट पहात कोकणी शेतक-यासारखा निवांत राहील ना! पण, हा वेडा माणूस आपल्या IAS ची परिक्षा देत असलेल्या मुलाला चक्क नोकरीचा नाद सोड सांगतो. त्याला जॅकफ्रूट इंटरनॅशनल परिषदेला घेऊन जातो. मुलाचे मन परिवर्तन करण्यात यशस्वी होतो आणि मुलाच्या साथीने महाराष्ट्रातील “जॅकफ्रूटकिंग” म्हणून आपले आणि कोकणचे नाव जगाच्या नकाशावर आणतो.
बरं, हा फणसाच्या प्रेमात आकंठ बुडालेला माणूस – मग जगाला फणस लागवडीचे पर्यावरणविषयक आरोग्यविषयक फायदे पटवून देतो. उभ्या महाराष्ट्रात फणस लागवड शेतक-यानी करावी म्हणून फणसाची रोपे तयार करतो. अशी हजारो रोपे विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राला पुरवतो.
आता यंदा ह्या माणसाने साठी पार केली. तुम्ही म्हणाल, आता शेतकरी म्हणून याने क्षितीज गाठलंय, आता स्वतःला सिद्ध करायचे काय बाकी राहिलं आहे ? —- पण, संतुष्ट रहाणे म्हणजे जणू शरीराला जडलेली व्याधी असा ह्या माणसाचा पक्का समज असावा—–
म्हणून हा हिमाचल प्रदेशला जातो. तेथील दर्जेदार सफरचंदाची रोपे आणतो आणि आपल्या नर्सरीत लावतो. मशागत करतो. आपल्या 900 काजू झाडांच्यामधे सफरचंदाची यशस्वी लागवड करून दाखवेन, असे छातीठोकपणे सांगतो. हे सांगत असताना त्यांच्या डोळ्यांतील चमक आणि देहबोलीतला आत्मविश्वास आपली खात्री पटवतो .
शेतीत अभिनव प्रयोग करणे आणि ते यशस्वी करून दाखवण्याचा छंद जडलेली ही वल्ली. हा एक दिवस जंगल साफ करायला घेतो आणि ठरवतो यातील एकही जंगली झाड मी तोडणार नाही, पण यातून उत्पन्नही मिळवेन.
हा याचा आणखीन एक संकल्प..! ‘या झाडांवर (नैसर्गिक स्टीक’वर) मी काळीमिरीच्या (ब्लॅकपेपर) वेली सोडेन, मी येथे कृषी-पर्यटन सुरू करेन.’ हे त्यांचे आत्मविश्वासपूर्वक बोलणे ऐकल्यावर, जिद्दीला सलाम करणे एवढे एकच काम आपलं रहातं.
फणस हेच भविष्यात माणसाचे अन्न असेल असे तत्वज्ञान सांगून हा माणूस थांबत नाही, तर पिकलेल्या फणसापेक्षा कच्चा फणस माणसाची भूक भागवेल.. असा सिद्धांत मांडत, आपल्या बागेत फणासापासून कुरकुरित चिप्स बनवायचा प्लॅन्ट टाकतो. फणसापासून बिर्याणी ते कबाब, पकोडा ते डोसा आणि आईस्क्रीम ते मिठाई आणि असेच अन्य खाद्यपदार्थ कसे बनवता येतील याचा ध्यास घेऊन माहिती घेत रहातो…
“पुरूषाचे नशीब पाते-यात” अशी एक जुनी म्हण आहे. ती म्हण हा माणूस सिद्ध करण्यासाठी जणू इरेला पेटला आहे की काय? हे यांच्या शेतीतील कारवाया ऐकून/पाहून वाटते…. चक्क फणसाची हिरवी पाने हा माणूस टनच्या टन विकतो.
आंतरराष्ट्रीय कंपनीची चालून आलेली पार्टनरशीप.. बघू नंतर म्हणून टाळतो. तर दुसरीकडे.. काजूच्या झाडांचा पालापातेरा, जो कधीच कुजत नाही, त्याचे हा खत म्हणून तयार करायच्या मागे लागतो… ही खतनिर्मीती भविष्यात फक्त हाच माणूस करू शकेल. कारणहा शेतीमधला ‘एडिसन’आहे.
‘कल्पवृक्ष कन्येसाठी’च्या ऐवजी हा सासू-सास-यांना फणस द्या म्हणतो आणि फणस देखील कसा बहुगुणी आहे सांगत सासुरवाडीकडून आणलेल्या फणसाच्या जातीपासून “देसाई कप्पा” नावाची फणसाची नवी जात विकसित करतो आणि थेट कल्पवृक्षांच्या माहेरघरात केरळात जाऊन विकतो.
समस्या, अडचण हे शब्द या माणसाला कुठल्याही शिक्षकाने शिकवले नसावेत किंवा हा त्या दिवशी वर्गात गैरहजर असावा, यावर मी ठाम आहे. अहो, माकडांचा बंदोबस्त असो, गवा – रेड्यांचा उच्छाद असो, या माणसाकडे जालीम (रामबाण नको, संवेदनशील आहे) उपाय या माणसाकडून जाणून घ्यावा.
बरं, तांत्रिक समस्या म्हणाल तर त्यात हा टेक्निशियनचा बाप. हजारो मीटर विद्युतवहन विनाघट कसे करावे, हे प्रात्यक्षिकासह तुम्हाला दाखवून देतो..
एवढ्याने स्तंभित होऊन जाऊ नका, तुम्हाला हा माणूस फणासाची पिकलेली पिवळी पाने विकत घ्यायला लावणार आहे…. अठळा बदामच्या भावात विकणार आहे आणि फणसाचा समानार्थी शब्द हरिश्चंद्र देसाई असा तुमच्या शब्दकोषात बदल करायला भाग पाडणार आहे.
खरं सांगतो, एखाद्या फळझाडावर वेड्यासारखं प्रेम करणारी अशी व्यक्ती उभ्या आयुष्यात, @57 मी पाहिलेली नाही. या साठ वर्षाच्या तरुणाला तारूण्य, उर्जा, जिद्द, आत्मविश्वास ईश्वर मुक्तहस्ते प्रदान करेल यात शंका नाही. कारण, फणसाशी इमान राखणारा हा “फणस-राजा” हरिश्चंद्र या वरदानास पात्र आहे.
लेखक – प्रदीप कोळेकर, संस्थापक – माय राजापूर
संग्राहिका – सुश्री सुलू साबणे जोशी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
(वरिष्ठतम साहित्यकार आदरणीय डॉ कुन्दन सिंह परिहार जी का साहित्य विशेषकर व्यंग्य एवं लघुकथाएं ई-अभिव्यक्ति के माध्यम से काफी पढ़ी एवं सराही जाती रही हैं। हम प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – “परिहार जी का साहित्यिक संसार” शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते रहते हैं। डॉ कुंदन सिंह परिहार जी की रचनाओं के पात्र हमें हमारे आसपास ही दिख जाते हैं। कुछ पात्र तो अक्सर हमारे आसपास या गली मोहल्ले में ही नज़र आ जाते हैं। उन पात्रों की वाक्पटुता और उनके हावभाव को डॉ परिहार जी उन्हीं की बोलचाल की भाषा का प्रयोग करते हुए अपना साहित्यिक संसार रच डालते हैं।आज प्रस्तुत है समसामयिक विषय पर आधारित आपका एक अतिसुन्दर व्यंग्य ‘उदर-रोग आख्यान’। इस अतिसुन्दर व्यंग्य रचना के लिए डॉ परिहार जी की लेखनी को सादर नमन।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – परिहार जी का साहित्यिक संसार # 146 ☆
☆ व्यंग्य – उदर-रोग आख्यान ☆
सेवा में सविनय निवेदन है कि मैं पेट का ऐतिहासिक मरीज हूँ। मर्ज़ अब इतना पुराना हो गया है कि मेरे व्यक्तिगत इतिहास में लाख टटोलने पर भी इसकी जड़ें नहीं मिलतीं। अब तक इस रोग के नाना रूपों और आयामों में से गुज़र चुका हूँ।
पेट का रोग संसार में सबसे ज़्यादा व्यापक है। शायद इसका कारण यह है कि अल्लाह ने भोजन करने का काम तो हमारे हाथ में दिया है लेकिन आगे के सारे विभाग अपने हाथ में ले रखे हैं। काश कोई ऐसा बटन होता जिसे दबाते ही भोजन अपने आप पच जाता और शरीर का सारा कारोबार ठीक से चलता रहता। कमबख्त पेट की गाड़ी ऐसी होती है जो एक बार पटरी से उतरी सो उतरी। फिर आप पेट के मरीज़ होने का गर्व करने के अलावा और कुछ नहीं कर सकते।
एक विद्वान ने कहा है कि जिसे हम अक्सर आत्मा का रोग समझ लेते हैं वह वास्तव में पेट का मर्ज़ होता है। जो लोग दार्शनिक या कवि जैसे खोये खोये बैठे रहते हैं यदि उनकी दार्शनिकता की तह में प्रवेश किया जाए तो कई लोग पेट के रोग से ग्रस्त मिलेंगे। इसीलिए दार्शनिकों और कवियों की पूरी जाँच होना चाहिए ताकि पता लगे कि कितने ‘जेनुइन’ कवि हैं और कितनों का कवित्व ‘मर्ज़े मैदा’ से पैदा हुआ है।
पेट का मरीज़ मेहमान के रूप में बहुत ख़तरनाक होता है। वह जिस घर में अतिथि बनता है वहाँ भूचाल पैदा कर देता है। उसे तली चीज़ नहीं चाहिए, धुली हुई दाल नहीं चाहिए, नींबू चाहिए, काला नमक चाहिए, दही चाहिए, अदरक चाहिए। ‘बिटिया, शाम को तो मैं खिचड़ी खाऊँगा। ईसबगोल की भूसी हो तो थोड़ी सी देना और ज़रा पानी गर्म कर देना।’ ऐसा मेहमान मेज़बान को कभी पूरब की तरफ दौड़ाता है, कभी पच्छिम की तरफ। ऐसी चीजें तलाशना पड़ती हैं जिनका नाम सुनकर दूकानदार हमारा मुँह देखता रह जाता है। घर के बाथरूम पर मेहमान का पूरा कब्ज़ा होता है। वे दो बार, चार बार, छः बार, जितने बार चाहें वहाँ आते जाते रहते हैं। कई लोग जो आठ बजे घुसते हैं तो फिर दस बजे तक पुनः दर्शन नहीं देते।
पेट का मरीज़ अपने साथ दुनिया भर का सरंजाम लेकर चलता है— नाना प्रकार के चूर्ण, लहसुन वटी, चित्रकादि वटी, द्राक्षासव, और जाने कितने टोटके। दवाइयों के हजारों कारखाने पेट के रोगियों के लिए चलते हैं। पेट के रोगी का बिगड़ा हुआ पेट बहुत से पेट पालता है।
पेट के रोगी के साथ मुश्किल यह होती है कि उसकी दुनिया अपने पेट तक ही सीमित रहती है। वह हर चार घंटे पर अपने पेट के स्वास्थ्य का बुलेटिन ज़ारी करता है। जिस दिन उसका पेट ठीक रहता है वह दिन उसके लिए स्वर्णाक्षरों में लिखे जाने योग्य होता है। जब बाकी सब लोग अफगानिस्तान और ईरान की समस्या की बातें करते हैं तब वह बैठा अपना पेट बजाता है।
पेट का रोगी बड़ा चिड़चिड़ा, बदमिजाज़ और शक्की हो जाता है। इसलिए पेट के रोगी को कभी ज़िम्मेदारी के पद पर नहीं बैठाना चाहिए। ऐसा आदमी जज बन जाए तो रोज़ दो चार को फाँसी पर लटका दे, अफसर बन जाए तो रोज़ दो चार को डिसमिस करे, और किसी देश का प्रधानमंत्री या राष्ट्रपति बन जाए तो ज़रा सी बात पर जंग का नगाड़ा बजवा दे। घर और पड़ोस के लोग पेट के रोगी से त्रस्त रहते हैं क्योंकि वह हर बात पर काटने को दौड़ता है। उसका चेहरा बारहों महीने मनहूस बना रहता है।
पेट के रोग का यह वृतांत एक किस्से के साथ समाप्त करूँगा। एक दिन जब डॉक्टर के दवाखाने से पेट की दवा लेकर चला तो एक रोगी महोदय मेरे पीछे लग गये। वे स्वास्थ्य की जर्जरता में मुझसे बीस थे।
उन्होंने मुझसे पूछा, ‘आप पेट के रोगी हैं?’
मेरे ‘हाँ’ कहने पर उन्होंने पूछा, ‘कितने पुराने रोगी हैं?’
जब मैंने पंद्रह वर्ष का अनुभव बताया तो वे प्रसन्न हो गये। उन्होंने बड़े जोश में मुझसे हाथ मिलाया। बोले, ‘मैं भी अठारह वर्ष की हैसियत का पेट का रोगी हूँ। मेरा नाम बी.के. वर्मा है।’
मैंने प्रसन्नता ज़ाहिर की तो वे बोले, ‘आपसे मिलकर बहुत खुशी हुई। दरअसल हमने इस शहर में ‘एक उदर रोगी संघ’ बनाया है। उसकी मीटिंग इतवार को शाम को होती है। मैं चाहता हूँ कि आप भी इसमें शामिल हों।’
इतवार की शाम उनके बताये पते पर पहुँचा। वह घर उनके संघ के अध्यक्ष का था जो पैंतालीस वर्ष की हैसियत के उदर रोगी थे।वहाँ अलग अलग अनुभव वाले लगभग पच्चीस उदर रोगी एकत्रित थे। उन्होंने बड़े जोश से मेरा स्वागत किया, जैसे उन्हें ‘बढ़त देख निज गोत’ खुशी हुई हो।
उस सभा में पेट के रोगों के कई आयामों की चर्चा हुई। कई नई औषधियों का ब्यौरा दिया गया। वहाँ उदर रोग के मामले में ‘सीनियर’ ‘जूनियर’ का भेद स्पष्ट दिखायी दे रहा था। जो जितना सीनियर था वह उतने ही गर्व में तना था।
उस दिन के बाद मैं उदर-रोगी संघ की मीटिंग में नहीं गया। करीब पंद्रह दिन बाद दरवाज़ा खटका तो देखा वर्मा जी थे। वे बोले, ‘आप उस दिन के बाद नहीं आये?’
मैंने उत्तर सोच रखा था। कहा, ‘क्या बताऊँ वर्मा जी। अबकी बार मैंने जो दवा ली है उससे मेरा उदर रोग काफी ठीक हो गया है। इसीलिए मैं आपके संंघ के लिए सही पात्र नहीं रह गया।’
वर्मा जी का मुँह उतर गया। वे बोले, ‘तो आपका रोग ठीक हो गया?’
मैंने कहा, ‘हाँ, लगता तो कुछ ऐसा ही है।’
वे बोले, ‘इतनी जल्दी कैसे ठीक हो सकता है?’
मैंने कहा, ‘मुझे अफसोस है। लेकिन बात सही है।’
वर्मा जी बड़ा मायूस चेहरा लिये हुए मुड़े और मेरे घर और मेरी ज़िंदगी से बाहर हो गये।