सूचना/Information ☆ सम्पादकीय निवेदन – श्रीमती उज्ज्वला केळकर आणि श्री अमोल केळकर – अ भि नं द न !☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

☆ सम्पादकीय निवेदन ☆ 

? अ भि नं द न ?

शुक्रवार दि. 20 मे 2022 रोजी सांगली येथे सौ.उज्वला केळकर यांच्या ‘हिरव्या हास्याचा कोलाज’ आणि श्री.अमोल केळकर यांच्या ‘माझी टवाळखोरी’ या पुस्तकांचा प्रकाशन समारंभ संपन्न झाला.

💐 ई-अभिव्यक्ती समुहातर्फे श्रीमती उज्ज्वला केळकर आणि श्री अमोल केळकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा 💐

 संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ जीवन… ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर☆

सुश्री अरूणा मुल्हेरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ जीवन… ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

जीवन आहे नितांत सुंदर  ध्यान असू दे जगताना

विसरुन जा तू गत दुःखांना नको खिन्नता हसताना

 

आयुष्याच्या वाटेवरती वळणे असली फार जरी

त्या वळणांवर हसत रहावे सुखदुःखांना बघताना

 

माहेराचे अंगण सोडुन लेक निघाली सासरला

कष्टी झाले मन आईचे निरोप तिजला देताना

 

चुकला नाही वनवासही जो रामाला अन् सीतेला

प्राक्तनात जे लिहिले आहे ते बघते मी घडताना

 

संसाराची दोनच चाके आपण दोघे समजावे

सुखदुःखांना सोबत घेऊ संसारातच रमताना

 

चंदन झिजुनी गंध पसरतो वार्‍यासोबत सभोवती

संसाराचा गाडा उपसत आई बघते झिजताना

 

नाही केव्हा विचार आला छंद स्वतःचे जपण्याचा

कायम तत्पर दुसर्‍यासाठी अनेक कामे करताना

 

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 103 – नकोस देऊ आज साजणा ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 103 – नकोस देऊ आज साजणा ☆

नकोस देऊ आज साजणा भास नव्याने सारे।

आठवणींच्या मोर पिसांचे रंग उधळती तारे।

 

मऊ मुलायम कुरणावरती प्रीत पाखरू येई।

साद घालता ओढ लाविते नित्य जिवाला कारे।

 

शब्दतार तव नाद छेडती धुंद जणू हे गाणे।

मुग्ध जाहला देह स्वरांनी भाव अनामिक न्यारे।

 

गुंजन करितो भ्रमर कळीशी गूज तयांचे चाले।

अधर थरथरे अवचित जुळता नयन राजसा घारे।

 

तव स्पर्शाची किमया न्यारी गाली येई लाली।

स्पर्श फुलांचा गंध दरवळे दाही दिशांत वारे।

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ हरवलेलं आजोळ… ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆

?  विविधा ?

☆ हरवलेलं आजोळ… ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆ 

आजोळी जायचा विषय निघाला आणि माझ्या मुलांच प्लॅनिंग सुरू झालं. किती दिवस जायचे गाडीत, पुढच्या सीटवर कोणी बसायचे, कोणता सिनेमा पहायचा, कोणत्या ट्रेकींगला जायचे, मोबाईल मधे कोणते गेम लोड करायचे, domino’s चा pizza, अमूलच ice-cream, डॅशिंग कार कुठे जाऊन खेळायचे, मॉल कोणता पहायचा, शॉपिंग कुठे करायचे, बापरे बाप भली मोठी यादी ती…..

आमच्या लहानपणी आजोळी जायचे म्हटले की नुसती धमाल असायची.

आगगाडीत बसून धुरांचे ढग पहात जाण्यात एक अनोखा आनंद असायचा.

आम्ही भावंडं प्रत्येक वळणावर इंजिन पहायला मिळावे म्हणून खिडकीत बसण्यासाठी धडपडत असू.

जायच्या आधी चार- पाच दिवस आमचा बॅग भरण्याचा कार्यक्रम सुरू व्हायचा. आत्ता सारख्या चाकांच्या बॅगा नव्हत्या त्यावेळी. त्यावेळी होत्या पत्र्याच्या ट्रंका जड च्या जड. कोणते कपडे घ्यायचे, तिथे गेल्या वर कायकाय करायचे ह्याचे नियोजन आम्हा भावंडांचे चांगले पाचसहा दिवस आधी सुरू होई. आमच्या मामाला दर मंगळवारी सुट्टी असायची. त्यादिवशी तर नुसती धमाल असायची.

मला चांगले चार मामा आणि दोन मावश्या आहेत त्यामुळे सगळे एकत्र जमलो की धमाल यायची. मला आता कौतुक वाटते ते माझ्या मामींचे एवढं सगळ्यांचे करतांना एकही आठी नाही कपाळावर. उलट प्रेमाने सगळ्यांना आग्रह करून करून वाढायच्या.

माझी आजी मात्र कडक शिस्तीची पण तेवढीच प्रेमळ. जेवण झाल्यावर सगळ्यांनी आपापली ताट धुऊन टाकायची हा तिचा नियम होता. आजी प्रमाणेच आजोबा पण कडक होते. त्यांना शिस्त आवडायची. आणखीन एक त्यांचा कटाक्ष होता तो म्हणजे प्रत्येक मुलींनी कपाळावर कुंकू लावायचेच.

त्यावेळी रोज आजोबा सगळयांना काहीना काही खाऊ आणायचे. आत्ता सारखे कॅडबरी, कुरकुरे, वेफर्स, pizza, burger असं काही नसायचे बरं का त्यावेळी. त्यावेळी आम्हाला मिळायचे ते करवंद, जांभळं, बोरं, श्रीखंडाच्या गोळ्या, गरे एकूण काय रानमेवा. आणि एक गंमत म्हणजे ते सगळ्यांना ओळीत उभं रहायला सांगत आणि स्वतः प्रत्येकाला ते वाटत.

त्यावेळी त्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद आणि समाधान टिपण्या जोगा असायचा.

आत्ता सारखे हॉटेलिंग असं काही नसायचे त्यावेळी. बागेत डबे घेऊन जाऊन जेवायचे म्हणजेच हॉटेलिंग. काय मजा असायची सांगू त्यात !! खूप धमाल यायची. भाकरी, झुणका, वांग्याची भाजी, मसाले भात, पापड, तळलेल्या कुटाच्या मिरच्या आणि कांदा असा फक्कड ठरलेला बेत असायचा.

जेवणं झाली की मोठी मंडळी झाडाखाली चटई टाकून ताणून देत असत. आम्ही बच्चे कंपनी मात्र पत्यांचा डाव रंगवत असू. थोडसं उन उतरले की परत पकडापकडी, विटी दांडू असा खेळ रंगात येई. संध्याकाळी मात्र तिथली गाड्या वरची भेळ ठरलेली. आणि एक एक बर्फाचा गोळा.

आईस्क्रीमची सुद्धा एक धमाल असायची. मामा स्वतः ते पॉट मधे बनवायचा. खूप मेहनत घ्यावी लागते त्याला, आणि खूप वेळ लागतो, पण आजिबात तक्रार न करता आनंदाने आणि अगदी मनसोक्त ice-cream तो आम्हाला खाऊ घालायचा.

माझ्या आजोळी अंगणात छान मोठा जाई चा वेल होता. माझ्या मावसबहीणी सकाळी सकाळी त्या फुलांचे सुंदर गजरे बनवायच्या , मला काही बनवता येत नव्हता पण त्या कशा बनवतात ते पाहण्यातच खूप आनंद मिळायचा. दुपारच्या वेळी सगळे झोपले की आम्ही पत्र्यावर चढून जांभळे आणि पेरू तोडायचो. कधी सापडलोच तर एक धपाटा मिळायचा पण त्याचा काही फारसा परिणाम न होता वानरसेना दुसरे दिवशी परत पत्र्यावर हजर…

माझ्या एका मामाचे कार्यालय होते. त्यामुळे रात्री झोपायला दोन्ही बाजूला दहा दहा गाद्या घातलेल्या असायच्या. एकीकडे मुली आणि दुसरीकडे मुलं. साहजिकच आहे आम्ही सगळे मावस, मामे, आत्ते भाऊ बहीण जमलो की पंचवीस जण तर व्हायचो. मग काय रात्री पत्ते खेळणे, चिडवा चिडवी,चेष्टा मस्करी आणि गाण्याच्या भेंड्यांची मैफिल जमायची. शेवटी जेव्हा मामा चा ओरडा बसे तेव्हा शांतता पसरे.

आताना, कुठेतरी हरवली आहे ती अंगणातील जाई, जुई ,ती अमराईची मेजवानी , हरवला तो बर्फाचा गोळा, आणि तो पत्यांचा एक डाव, खरचं परत लहान व्हावं असं वाटतं परत बसावं आगगाडीत आणि परत धुरांच्या लोटांचा आनंद घेत मामाच्या गावी जावं, परत मनसोक्त दंगा करावा आणि लावावी पुरणपोळी ची पैज. रात्र रात्र जागून परत खिदळावे आणि जोरात मामाची हाक ऐकू यावी अरे झोपारे आता.

©  सौ. श्रेया सुनील दिवेकर

मो 9423566278

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ विटी-दाडू – भाग-8 ☆ श्री आनंदहरी ☆

श्री आनंदहरी

? जीवनरंग ❤️

☆ विटी-दाडू – भाग- 8 ☆ श्री आनंदहरी

चार दिवस झाले आजोबा बागेत आले नाहीत तेंव्हा स्मार्त आणि अर्थ अस्वस्थ झाले.. गेले तीन-चार महिने आजोबा आले नाहीत असे कधीही झाले नव्हते.

“अर्थ, आजही आजोबा आले नाहीत. का आले नसतील? ते आजारी तर नसतील ना? की त्यांच्या सुनेने त्यांना गावी पाठवून दिले असेल? “

“गावी गेले असते तर आपल्याला भेटून, सांगून गेले असते. कदाचित बरे वाटत नसेल त्यांना म्हणून आले नसतील. ए, आपण त्यांच्या घरी जाऊया का त्यांना भेटायला? आपल्याला अचानक समोर पाहून त्यांना खूप आनंद होईल. “

“हो. आपल्याला त्यांची आठवण येते तशी त्यांना ही आपली आठवण येत असणारच..  चल जाऊया. “

“कुठं राहतात रे ते? त्यांचा पत्ता काय आहे? “

“मला नाही ठाऊक. मला वाटलं तुला असेल माहीत. “

“नाही रे मलाही नाही माहीत. कुठं आणि कसं शोधायचे त्यांना? “

“कुठूनही, कसेही शोधून काढले असते रे, पण आजोबांचं नाव ही नाही माहीत आपल्याला.. “

अर्थ आणि स्मार्त  रावसाहेबांनी वाट पाहत राहिले. रावसाहेब काही आले नाहीत.

स्मार्त, अर्थ दोघेही बागेत येतात. विटीदांडू खेळतात.. बराचवेळ रावसाहेब बसायचे तो बाक रिकामा असतो. रोजच खेळून झाल्यावर अर्थ, स्मार्त तिथे पूर्वीसारखेच त्या बाकावर विसावतात. दोघांच्यामध्ये रावसाहेबांनी दिलेला विटी दांडू असतो.. ते दोघे एकमेकांशी गप्पा मारतात बहुतेकवेळा विषय आजोबांचा म्हणजेच रावसाहेबांचा असतो. ते दोघेही रावसाहेबांची वाट पाहत असतात.. आणि बहुदा विटी-दांडूही त्यांचीच वाट पाहत असणार..

‘किती वाजले रे?’ स्मार्त विचारतो, ‘सात वाजून गेले असतील ‘ अर्थ उत्तर देतो.. अर्थचा निरोप घेऊन स्मार्त आपल्या घरी परततो. रावसाहेबांनी दिलेला विटी दांडू घेऊन अर्थ ही आपल्या घरी जातो.. विटी खिशात असते तर आजोबांचं बोट धरावे तसा दांडू धरलेला असतो.

दुसऱ्या दिवशी ते दोघेही पुन्हा विटीदांडूने खेळायला येणारच असतात.. आणि आजोबांची म्हणजे रावसाहेबांची वाट ही पाहणारच असतात.

◆◆◆

समाप्त

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आईचा गर्भ… ☆ संग्राहिका – कालिंदी नवाथे

? वाचताना वेचलेले ?

☆ आईचा गर्भ… ☆ संग्राहिका – कालिंदी नवाथे ☆ 

किती मंद तो प्रकाश तुझ्या गर्भामध्ये होता.

________

स्वर्गातला तो काळ माझ्या भोवताली होता.

_________

एकटाच मी अन् माझं जग तूच होतीस.

________

या भयाण जगापासून मला लपवून तू होतीस.

________

तुझ्या हृदयाचा आवाज किती मधुर तो होता.

________

तुझ्या प्रत्येक स्पंदनावर माझा छोटा जीव होता.

_________

तुला मला जोड़णारी एक कोमल दोर आत होती.

________

तुझी नाळ ती जणू वेल मला लपेटलेली होती.

_________

तुझा आवाज येता ओठ माझे हसायचे.

_________

कान माझे फक्त़ तुझ्या आवाजाला तरसायचे.

_________

तू स्वतःला किती किती जपायचीस.

_________

एक मी जगावं म्हणून तू किती किती मरायचीस.

_________

जन्म मला देताना किती सोसले तू त्रास.

_________

पण मी जगावं फक्त हाच तुझा ध्यास.

_________

गर्भातले ते महिने पुन्हा येणार नाहीत.

_________

पण मी अजूनही तुझ्याशिवाय जगू शकणार नाही.

 

            – माझी आई..

 

संग्राहिका – सुश्री कालिंदी नवाथे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकावर बोलू काही ☆ “माझी टवाळखोरी” –  श्री अमोल केळकर ☆ परिचय – सौ.अस्मिता इनामदार☆

सौ.अस्मिता इनामदार

? पुस्तकावर बोलू काही ?

☆“माझी टवाळखोरी” –  श्री अमोल केळकर ☆ परिचय – सौ.अस्मिता इनामदार ☆ 

 विनोदी साहित्याने जीवन आनंदी होते. टवाळा आवडे विनोद असं जरी रामदासांनी म्हंटले तरी टवाळ हा शब्द रिकामटेकड्या लोकांसाठी त्यांनी वापरला आहे. पण अमोलची – आत्ता हा जरी लेखक असला तरी आम्हाला तो अमोलच आहे – टवाळ खोरी ही टवाळगिरी नाही हे लक्षात घ्यायला हवे. शुद्ध भावनेने केलेले विनोदी लेखन हा या पुस्तकाचा गाभा आहे. हे लेख मनोरंजनाबरोबरच बोधप्रदही आहेत. अमोल उवाच – १ व अमोल उवाच -२ असे दोन भाग या पुस्तकात आहेत. पहिल्या भागात आपण विनोदी आठवणीत रमातो तर दुसऱ्या भागात विडंबन गीते आपल्याला खदखदून हसवतात. विडंबन कसे असावे याचा उत्कृष्ट परिपाठ इथे मिळतो

” कायप्पा ” च्या माध्यमातून आमोलची टवाळखोरी आपल्या समोर आली. कायप्पा हा शब्दही टवाळ खोरीचा मामला आहे. व्हॉटस् ॲप्स चे मराठी भाषांतर त्याने केलेय. काय अप्पा? = कायप्पा. मजा आहे ना ? निखळ आनंदाचा सागर निर्भेळ विनोद घेऊन या पुस्तकाच्या रूपाने आपल्या समोर आलाय. यातील प्रत्येक लेखावर बोलायचे झाले तर एक प्रबंधच सादर करता येईल. पहिल्या भागात एकूण ७१ लेख आहेत. दुसऱ्या भागात ४३ विडंबन गीते आहेत.

 अमोल उवाच मधील काही निवडक लेखांचा मी उल्लेख करेन ज्यातून त्याच्या लिखाणाची सुंदर झलक दिसून येईल. सध्या कोरोना मुळे शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे. भविष्यात शाळेचा वर्ग कसा असेल हे ” आधुनिक शाळेतील एक दिवस ” यात समजते. या लेखातील शिक्षण पद्धती खरोखरच थक्क करणारी आहे. शाळा आली की अनुषंगाने गुण पत्रिकाही आलीच. त्यावर मस्त खुसखुशीत टवाळखोरी आहे.

भाई अर्थात पु. ल. यांच्या वरचे ५ ही भाग एकदम भन्नाटच आहेत. ते जर  पु. ल. नी वाचले तर तेही छान दाद देतील. या बरोबरच गायकी ढंगातले संगीत रागही आपले अस्तित्व दाखवून जातात. ” शाळा चांदोबा गुरुजींची ” या गीतातून सर्व ग्रह नक्षत्रांची मांदियाळीच भेटते. ” जो उस्ताद तोच वस्ताद ” यातल्या कोपरखळ्या खदखदून हसवतात. ” साप शिडी ” हा वैचारिक लेख आपल्या जीवनावरच बेतलेला वाटतो.

” एक रस्ता आ हा आ हा ” हा एक प्रवासी. प्रवास हा अमोलच्या जीवनाचा अविभाज्य घटकच आहे. प्रवास हा त्याचा छंदच आहे हे त्याच्या स्टेटस वरच्या फोटोने लक्षात येते.

” बदाम सत्ती ” हा एक वैचारिक लेख आपल्याला छान सल्ला देतो. आयुष्यातली अनियमितता किंवा कुठल्याही परिस्थितीत आशावादी राहणे हे या सत्तीकडून शिकायला हवे. ” एक संवाद त्यांचाही ” हा लेख अमोलची अप्रतिम कल्पनाशक्तीच प्रत्ययाला आणून देतो. सगळ्या रेल्वे गाड्या आपापसात जे काही बोलतात याची आपण कधीच कल्पना केलेली नसते. त्या बरोबरच एस टी चा ही संवाद आपल्याला प्रवासाचा आनंद देऊन जातात. ” मराठी भाषा दिन १ आणि २ हे लेख तर नक्कीच आवडण्या सारखे आहेत. मराठी भाषेचा अभिमान सर्वानाच असतो पण त्याबद्दलची अनास्था बघितल्यावर खंतच वाटते. ” इथे साहित्याचे साचे मिळतील ” हा ही लेख भन्नाट आहे. हा जो मॉल दाखवला आहे तो बघून थक्कच व्हायला होतं. त्याच्या मालकांनी तो मॉल बघायला बोलावलं आहे तेव्हा आपण नक्कीच जाऊ.

आता जरा विडंबनाकडे वळूयात. या भागाचे शीर्षकच मार्मिक आहे. ” अशी विडंबन येती आणिक मजा देऊनी जाती ” आठवलं ना ते गाणे ? अशी पाखरे येती…. यातले प्रत्येक विडंबन गाजलेल्या गाण्यावर आधारित आहे. हा साहित्य प्रकार फारसा लोकप्रिय नाहीय. विसंगती पकडणे हा विडंबनाचा मुख्य गाभा आहे, तो सापडला की विडंबन योग्य होते. सर्वच गीतांवर लिहिणे वेळेअभावी शक्य नाही, पण काही लक्षात राहण्यासारखींची शीर्षके सांगते, गाणी तुम्ही ओळखायची. ” खोटी खोटी रूपे तुझी “,

” जिवलगा कधी रे येशील तू ” ” स्विगीची भाकरी “,  ” ही पाल तुरू तूरू “, ” सुंदर ते यान “, ” अजी मोदकाचा दिनू “, ” योगा

योगा अखंड करूया “. ही गाणी प्रत्यक्ष वाचली तरच त्याचा आनंद मिळेल.

जाता जाता एक सांगावेसे वाटते की काही लेखात राजकीय भाष्य केले असले तरी राजकारणातला खवटपणा त्यात अजिबात नाही. अमोलची ही टवाळखोरी मनोरंजनाबरोबरच बौद्धिक विचारांना चालना देणारी नक्कीच आहे.

आता जास्त पाल्हाळ न लावता माझा हा टवाळ लेख इथेच संपवते.

जय टवाळखोरी….

परिचय – अस्मिता इनामदार

पत्ता – युनिटी हाईटस, फ्लॅट नं १०२, हळदभवन जवळ,  वखारभाग, सांगली – ४१६ ४१६

मोबा. – 9764773842

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रवासवर्णन ☆ चला आसाम मेघालयाला… भाग -2 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

✈️ प्रवासवर्णन ✈️

☆ चला आसाम मेघालयाला… भाग – 2 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

या प्रवासातील अविस्मरणीय भेट म्हणजे भारत-बांगलादेश मैत्री गेट. मेघालय मध्ये भारत-बांगलादेश सीमारेषा ४४३ किलोमीटर (२७५ मैल) इतकी आहे. या मैत्री द्वाराजवळ, अलीकडे पलीकडे दोन्ही देशांचे झेंडे फडकत असतात आणि संध्याकाळी ते खाली उतरवले जातात. झेंडे उतरवणे म्हणजेच, कुठल्याही प्रकारचे वैमनस्य दोन्ही देशांमध्ये नसणे हेच अध्याहृत आहे.  मेघालया मधून बांगलादेश मध्ये दगडांची निर्यात प्रचंड प्रमाणात होते. रस्त्यावरून जात असताना हे उंच उंच डोंगर ओरबाडले दिसतच होते.हे दगडही अनेक रंगी आहेत. लाल, जांभळे, पिवळे, स्वच्छ पांढरे. इथल्या लोकांचा दगडफोडी हा मुख्य व्यवसाय आहे व हे सर्व दगड बांगलादेशात पाठवले जातात. या मैत्री गेटावर ही दगड वाहतुक आम्ही प्रत्यक्ष पाहिली .अत्यंत सुरक्षित पद्धतीने ही निर्यात, येथील सैनिकांच्या देखरेखीखाली होत असते.. सीमेचे रक्षण करणारे हे नैसर्गिक पहाड आणि हे सैनिक दोन्हीही मला महान वाटले.

उमंगोट नदीच्या किनाऱ्यावर चे डावकी  हे सीमावर्ती शहर आहे.  यापूर्वी अमृतसरला वाघा बॉर्डर ला भेट दिली होती भारत-बांगलादेश मैत्री द्वाराची ही भेट तशीच संवेदनशील होती. उमंगोट नदी ही दोन्ही देशातून वाहते सहज मनात आले नदीला कुठले आहे सीमेचे बंधन !!या भिंती या मर्यादा मानवाने उभ्या केल्या.  आणि त्याबदल्यात मिळवली ती कायमची अशांती!

उमंगोट नदीचं पाणी अगदी स्फटिकासारखे स्वच्छ आहे. संथ वाहणारे पाणी, चौफेर हिरवाईने नटलेले उंच पहाड ,मावळतीच्या वेळी या नदीतून केलेला नौकाविहार अत्यंत सुखद होता. पाण्याचा तळ नजरेला भिडत होता. ते पाहताना वाटले की माणसाचं मन या नदी सारखच नितळ का नाही असू शकत ?

क्रमश:…

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य #133 ☆ सुनना और सहना ☆ डॉ. मुक्ता

डॉ. मुक्ता

(डा. मुक्ता जी हरियाणा साहित्य अकादमी की पूर्व निदेशक एवं  माननीय राष्ट्रपति द्वारा सम्मानित/पुरस्कृत हैं।  साप्ताहिक स्तम्भ  “डॉ. मुक्ता का संवेदनात्मक  साहित्य” के माध्यम से  हम  आपको प्रत्येक शुक्रवार डॉ मुक्ता जी की उत्कृष्ट रचनाओं से रूबरू कराने का प्रयास करते हैं। आज प्रस्तुत है डॉ मुक्ता जी का  वैश्विक महामारी और मानवीय जीवन पर आधारित एक अत्यंत विचारणीय आलेख सुनना और सहना। यह डॉ मुक्ता जी के जीवन के प्रति गंभीर चिंतन का दस्तावेज है। डॉ मुक्ता जी की  लेखनी को  इस गंभीर चिंतन से परिपूर्ण आलेख के लिए सादर नमन। कृपया इसे गंभीरता से आत्मसात करें।) 

☆ साप्ताहिक स्तम्भ – डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य  # 133 ☆

☆ सुनना और सहना

‘हालात सिखाते हैं सुनना और सहना/ वरना हर शख्स फ़ितरत से बादशाह ही होता है’ गुलज़ार इस कथन के माध्यम से समय व परिस्थितियों पर प्रकाश डालते हैं। वैसे यह तथ्य महिलाओं पर अधिक लागू होता है, क्योंकि ‘औरत को सहना है, कहना नहीं और यही उसकी नियति है।’ उसे तो अपना पक्ष रखने का अधिकार भी प्राप्त नहीं है। वैसे कोर्ट-कचहरी में भी आरोपी को अपना पक्ष रखने की हिदायत ही नहीं दी जाती; अवसर भी प्रदान किया जाता है। परंतु औरत की नियति तो उससे भी बदतर है। बचपन से उसे समझा दिया जाता है कि यह घर उसका नहीं है और पति का घर उसका होगा। परंतु पहले तो उसे यह सीख दी जाती थी कि ‘जिस घर से डोली उठती है, उस घर से अर्थी नहीं उठती। इसलिए तुम्हें इस घर में अकेले लौट कर नहीं आना है।’ सो! वह मासूम आजीवन उस घर को अपना समझ कर सजाती-संवारती है, परंतु अंत में उस घर से उस अभागिन को दो गज़ कफ़न भी नसीब नहीं होता और उसके नाम की पट्टिका भी कभी उस घर के बाहर दिखाई नहीं पड़ती।

परंतु समय के साथ सोच बदली है और आठ से दस प्रतिशत महिलाएं सशक्त हो गई हैं– शेष वही ढाक के तीन पात। कुछ महिलाएं समानता के अधिकारों का दुरुपयोग भी कर रही हैं। वे ‘लिव इन व मी टू’ के माध्यम से हंसते-खेलते परिवारों में सेंध लगा रही हैं तथा दहेज व घरेलू हिंसा आदि के झूठे इल्ज़ाम लगा पति व परिवारजनों को सीखचों के पीछे पहुंचा अहम् भूमिका वहन कर रही हैं। यह है परिस्थितियों के परिर्वतन का परिणाम, जैसा कि गुलज़ार ने कहा है कि समानता का अधिकार प्राप्त करने के पश्चात् महिलाओं की सोच बदली है। वे अब आधी ज़मीन ही नहीं, आधा आसमान लेने पर  आमादा हो रही हैं। मुझे स्मरण हो रही हैं स्वरचित पंक्तियां ‘मौसम भी बदलते हैं, हालात बदलते हैं/ यह समाँ बदलता है, जज़्बात बदलते हैं/ यादों से महज़ मिलता नहीं, दिल को सुक़ून/  ग़र साथ हो सुरों का, नग़मात बदलते हैं।’ जी हां! यही सत्य है जीवन का– समय के साथ- साथ व्यक्ति की सोच भी बदलती है। वैसे स्मृतियों में विचरण करने से दिल को सुक़ून नहीं मिलता। परंतु यदि सुरों अथवा संगीत का साथ हो, तो उन नग़मों की प्रभाव-क्षमता भी अधिक हो जाती है।

‘संसार में मुस्कुराहट की वजह लोग जानना चाहते हैं; उदासी की वजह कोई नहीं जानना चाहता।’ यहां ‘सुख के सब साथी, दु:ख में ना कोय।’ सो! इंसान सुखों को इस संसार के लोगों से सांझा नहीं करना चाहता, परंतु दु:खों को बांटना चाहता है। उस स्थिति में वह आत्म- केंद्रित रहते हुए दूसरों से संबंध-सरोकार रखना पसंद नहीं करता। अक्सर लोग सत्ता व धन- सम्पदा व सम्मान वाले व्यक्ति का साथ देना पसंद करते हैं; उसके आसपास मंडराते हैं, परंतु दु:खी व्यक्ति से गुरेज़ करते हैं। यही है ‘दस्तूर- ए-दुनिया।’

‘हौसले भी किसी हक़ीम से कम नहीं होते/ हर तकलीफ़ में ताकत की दवा देते हैं।’ मानव का साहस, धैर्य व आत्मविश्वास किसी वैद्य से कम नहीं होता। वे मानव को मुसीबतों में उनका सामना करने की राह सुझाते हैं। जैसे एक छोटी-सी दवा की गोली रोग-मुक्त करने में सहायक सिद्ध होती है, वैसे ही  संकट काल में सहानुभूति के दो मीठे बोल संजीवनी का कार्य करते हैं। ‘मैं हूं ना’ यह तीन शब्द से उसे संकट-मुक्त कर देते हैं। इसलिए मानव को विषम परिस्थितियों का डटकर मुकाबला करना चाहिए तथा हार होने से पहले पराजय को नहीं स्वीकारना चाहिए। दक्षिण अफ्रीका के पूर्व राष्ट्रपति नेल्सन मंडेला कहते हैं ‘हिम्मतवान् वह नहीं, जिसे डर नहीं लगता, बल्कि वह है जो डर को जीत लेता है’ तथा वैज्ञानिक मैडम क्यूरी का मानना है कि ‘जीवन डरने के लिए नहीं: समझने के लिए है। सकारात्मक संकल्प से ही हम मुश्किलों से बाहर निकल सकते हैं।’ सो! संसार में वीर पुरुष ही विजयी होते और कायर व्यक्ति का जीना प्रयोजनहीन होता है। इसके साथ हम सकारात्मक सोच व दृढ़-संकल्प से कठिनाइयों पर विजय प्राप्त कर सकते हैं। नैपोलियन का यह संदेश अनुकरणीय है कि ‘समस्याएं भय व डर से उत्पन्न होती हैं। यदि डर की जगह विश्वास ले ले, तो वे अवसर बन जाती हैं। वे विश्वास के साथ आपदाओं का सामना कर उन्हें अवसर में बदल डालते थे।’ इसलिए हर इंसान को अपने हृदय से डर को बाहर निकाल फेंकना चाहिए। यदि आप साहस-पूर्वक यह पूछते हैं–’इसके बाद क्या’ तो प्रतिपक्ष के हौसले पस्त हो जाते हैं। जिस दिन मानव के हृदय से भय निकल जाता है; वह आत्मविश्वास से आप्लावित हो जाता है और आकस्मिक आपदाओं का सामना करने में स्वयं को समर्थ पाता है। हमारे हृदय का भय का भाव ही हमें नतमस्तक होने पर विवश करता है। भगवान श्रीकृष्ण ने गीता में यही संदेश दिया है कि ‘अन्याय करने वाले से अधिक दोषी अन्याय सहन करने वाला होता है।’ हमारी सहनशीलता ही उसे और अधिक ज़ुल्म करने को प्रोत्साहित करती है। जब हम उसके सम्मुख डटकर खड़े हो जाते हैं, तो वह अपनी झेंप मिटाने के लिए अपना रास्ता बदल लेता है। यह अकाट्य सत्य है कि हमारा समर्पण ही प्रतिपक्ष के हौसलों को बुलंद करता है।

मौन नव निधियों की खान है; विनम्रता आभूषण है। परंतु जहां आत्म-सम्मान का प्रश्न हो, वहाँ उसका सामना करना अपेक्षित व श्रेयस्कर है। ऐसी स्थिति में मौन को कायरता का प्रतीक स्वीकारा जाता है। सो! वहाँ समझौता करने का सवाल ही पैदा नहीं होता। भले ही सुनना व सहना हमें हालात सिखाते हैं, परंतु उन्हें नतमस्तक हो स्वीकार कर लेना पराजय है।

‘यदि तुम स्वयं को कमज़ोर समझते हो, तो कमज़ोर हो जाओगे। यदि ख़ुद को ताकतवर सोचते हो, तो ताकतवर’– स्वामी विवेकानंद जी का यह कथन अत्यंत सार्थक है। हमारी सोच ही हमारा भविष्य निर्धारित करती है। इसलिए जीवन में नकारात्मकता को जीवन में कभी भी घर न बनाने दो। रोयटी बेनेट  के अनुसार चुनौतियाँ व प्रतिकूल परिस्थितियाँ हमें हमारा साक्षात्कार कराने हेतु आती हैं कि हम कहां हैं? तूफ़ान हमारी कमज़ोरियों पर आघात करते हैं, लेकिन तभी हमें अपनी शक्तियों का आभास होता है। समाजशास्त्री प्रौफेसर कुमार सुरेश के शब्दों में ‘अगर हमारा परिवार साथ है, तो हमें मनोबल मिलता है और हम हर संकट का सामना करने को तत्पर रहते हैं।’ अरस्तु के शब्दों में ‘श्रेष्ठ व्यक्ति वही बन सकता है, जो दु:ख और  चुनौतियों को ईश्वर की आज्ञा मानकर आगे बढ़ता है।’ सो! मानव को उन्हें प्रभु-प्रसाद व अपने पूर्वजन्म के कर्मों का फल स्वीकारना चाहिए। माता देवकी व वासुदेव को 14 वर्ष तक काराग़ार में रहना पड़ा। देवकी के कृष्ण से प्रश्न करने पर उसने उत्तर दिया कि इंसान को अपने कृत-कर्मों का फल अवश्य भोगना पड़ता है। आप त्रेतायुग में माता कैकेयी व पिता वासुदेव दशरथ थे। आपने मुझे 14 वर्ष का वनवास दिया था। इसलिए आपकी मुक्ति भी 14 वर्ष पश्चात् ही संभव थी। सो! ‘जो हुआ, जो हो रहा है और जो होगा, अच्छा ही होगा। इसलिए मानव को कभी भी निराशा का दामन नहीं थामना चाहिए और हर परिस्थिति का खुशी से स्वागत् करना चाहिए। समय कभी थमता नहीं; निरंतर गतिशील रहता है। इसलिए मन में कभी मलाल को मत आने दो। यह समाँ भी गुज़र जाएगा और उलझनें भी समयानुसार सुलझ जाएंगी। उसकी रज़ा में अपनी रज़ा मिला दें, तो सब अच्छा ही होगा। औचित्य-अनौचित्य में भेद करना सीखें और विपरीत परिस्थितियों में प्रसन्न रहें, क्योंकि शरणागति ही शांति पाने का सर्वोत्तम साधन है।

© डा. मुक्ता

माननीय राष्ट्रपति द्वारा पुरस्कृत, पूर्व निदेशक, हरियाणा साहित्य अकादमी

#239,सेक्टर-45, गुरुग्राम-122003 ईमेल: drmukta51@gmail.com, मो• न•…8588801878

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ साहित्य निकुंज #132 ☆ भावना के दोहे ☆ डॉ. भावना शुक्ल ☆

डॉ भावना शुक्ल

(डॉ भावना शुक्ल जी  (सह संपादक ‘प्राची‘) को जो कुछ साहित्यिक विरासत में मिला है उसे उन्होने मात्र सँजोया ही नहीं अपितु , उस विरासत को गति प्रदान  किया है। हम ईश्वर से प्रार्थना करते हैं कि माँ सरस्वती का वरद हस्त उन पर ऐसा ही बना रहे। आज प्रस्तुत हैं  “भावना के दोहे।) 

☆ साप्ताहिक स्तम्भ  # 132 – साहित्य निकुंज ☆

☆ भावना के दोहे ☆

धरती कहे आकाश से, तपन बहुत है आज।

बरसो घन अब आज तुम, हे बादल सरताज।।

 

ग्रीष्म काल की तपन का, अब होता आभास।

झुलस रहे देखो सभी, बस वर्षा की आस।।

 

धरती तपती ताप से, पंछी हैं बेहाल।

सूखे है जल कूप अब, बुरा हुआ है हाल।।

 

गर्मी जबसे आ गई, नहीं मिली है ठांव।

गांव गांव सब सूखते, गायब होती छांव।।

 

जितनी बढ़ती तपन हैं, सूरज खेले दांव।

धीरे- धीरे बढ़ रहे, वर्षा के अब पांव।।

 

© डॉ भावना शुक्ल

सहसंपादक… प्राची

प्रतीक लॉरेल, J-1504, नोएडा सेक्टर – 120,  नोएडा (यू.पी )- 201307

मोब. 9278720311 ईमेल : [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares