एक रंगसंवेदना असते.आवडत्या रंगाला त्याच्या मनःपटलावर एक स्थान असतं. रंगीबेरंगी दुनियेतला तोच एक रंग त्या व्यक्तीला भावतो आणि आनंदही देतो.
‘रंग रंग के फुल खिले है भाए कोई रंग ना’ ह्या प्रेमिकेच्या ओळीतून तोच अर्थ प्रतीत होतो.’प्रेमरंगा’चा शोध घेत तिचे डोळे भिरभिरत असतात. नेमक्या परावर्तित होणाऱ्या किरणांच्या (प्रेमिकाच्या) शोधात ते असतात.आणि तसे एकदा झालं की मग,’ मुझे रंग दे, मुझे रंग दे’ असं म्हणत हर्षोल्हासात ती रंगून जाते.
लहानपणी इंद्रधनुष्यातले रंग ‘जातानाहीपानीपी’ असा ठेका धरून पाठ केलेले…..तेव्हाच मनांत आलं की या इंद्रधनुष्यात गोरा रंग कुठे आहे?धाडसानं तसं बाईंना विचारलं देखील होतं. विज्ञानाची शिडी धरून बाईंनी ‘सात रंग मिळून जो होतो तो गोरा म्हणजे पांढरा रंग.’ असही सांगितल्याचं आठवतंय. माझ्या बाल मनानं सोयिस्कर अर्थ असा लावला होता की सगळे रंग नसले की ‘अंधार’ म्हणजे काळा रंग…. मग या अंधाराला पारंब्या फुट्याव्यात तसा काळा रंग मला दिसू लागला आणि आठवली ती संत नामदेवांची गवळण… ‘रात्र काळी घागर काळी जमुना जळे ही काळी ओ माय’. … ‘देव माझा विठू सावळा’ या गाण्यातील सावळ्या रंगाचं सौख्यही विठूला पाहिल्यावर डोळ्यात भरलं. डोळे आणि मन सावळ्या रंगाचा शोध घेत घेत श्यामलसुंदर अजिंठा-वेरूळची लेण्या पर्यंत पोहोचलं. या स्त्रियांचं सौंदर्य सावळ्या रंगा व्यतिरिक्त आणखी कोणत्याही रंगानं खुललं नसतं हे मनोमन पटलं.
लोकसाहित्यात चंद्रकलेचा उल्लेख पैठणी पेक्षाही जास्त आढळतो. त्यातही तांबड्या चन्द्रकळेपेक्षाही काळी चंद्रकळा जास्ती रूढ…. त्या काळ्या चंद्रकळेतील नारी काळे मणी आणि काजळ यांनी खुलून दिसते. त्यात तिने काळी गरसोळ घातलेली असेल तर मग त्या श्यामलेचे वर्णन ते काय करावे?
विठ्ठलाला माउली म्हणत ज्ञानोबांनी’ रंगा येई वो’ अशी हाक मारली आहे. रंगांच्या यादीत काळ्यासावळ्या रंगाला अव्वल स्थान मिळालं ते त्यांच्या या हाकेनं…
‘निळा सावळा नाथ’ असे आपल्या पतीचे वर्णन करताना निळ्या रंगाच्या आडून सावळेपण दाखवताना नारीच्या भावनेतील शीतलता, घनता आणि गारवा जाणवतो. कृष्ण आणि विष्णू यांच्या सावळ्या रंगात निळसर रंगाची झाक आहे. निळ्या सावळ्या रंगांसोबतच पांढऱ्या रंगाच अप्रूपही तितकंच आहे. लेखक कवी साहित्यिक यांनी आपल्या साहित्यातून या रंगीबेरंगी दुनियेतील सर्व रंगांची उधळण केली आहे.
पद्मजा फेणाणी यांचं ‘शुभ्र ज्वाला’ या अल्बम मधील ‘पेटून कशी उजळेना ही शुभ्र फुलांची ज्वाला’ हे गीत पांढऱ्या रंगाचं सौंदर्य खुलवतं. ‘पुस्तकातली खूण कराया दिले पण एकदा पीस पांढरे’ या त्यांच्याच गाण्यात त्यांच्या आवाजातून शुभ्र पांढऱ्या पिसार्याचं सौंदर्य झाकोळतं.
लावणीतील रंग बरसातही अनुभवण्यासारखी आहे. होळीच्या सणातली रंगांची उधळण करताना ‘खेळताना रंग बाई होळीचा म्हणत… तर ‘कळीदार कपूरी पान केशरी चुना रंगला कात’ म्हणत सुलोचना बाईंनी खाऊ घातलेलं पान लावणीचा ठसका देतं.’पिवळ्या पानाचा देठ की हो हिरवा’म्हणत हिरव्याकंच शालूतील लावणीसम्राज्ञी मन जिंकते. ‘श्रावणाचं ऊन मला झेपेना पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना. हिरव्या मोराची थुईथुई थांबेना’ अशी लडिवाळ तक्रार करत लावणीसम्राज्ञी रंगात येते तेव्हा मन लावणीत रंगून जातं.
इंद्रधनुष्यातले रंग, काळा पांढरा रंग यांच्यासोबतच लिंबू, पारवा, श्रीखंडी, चिंतामणी गुलबक्षी पोपटी, आकाशी, डाळिंबी, तपकिरी, शेवाळी, मोतिया, राखाडी, केतकी, आमसुली याआ णखीन अशा अनेक रंगानी माझं आयुष्य रंगीबेरंगी करून टाकलं. लहानपणी एका रंगानं मात्र मला कोडयात टाकलं होतं. ‘गणराज रंगी नाचतो’ हा रंग कोणता? तो कलेचा रंग होता हे मोठे झाल्यावर लक्षात आलं.’अवघा रंग एक झाला’ असं म्हणत सोयराबाईंनी मानव जातीतील सारे भेद मिटवले. हा रंग देखील समजायला मोठं व्हावं लागलं….
अशा अनेकविध गाण्यांच्या लोलकातून गीतकारांच्या प्रतिभेचे किरण जाऊन माझ्या मनःपटलावर रंगीबेरंगी इंद्रधनुष्य उमटलं. या इंद्रधनुष्यात अगणित रंग होते. त्या रंगात मनानं रंगून जायचं ठरवलं.रंग उडलेल्या मनाच्या पापुद्र्यांवर आता आगळे वेगळे रंग चढू लागले. आयुष्याचं चित्र रंगीबेरंगी रंगांनी रंगवून टाकायचं त्यानं ठरवलं…..
☆ कचरेवाल्याची मुलगी – भाग 4 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆
‘मी गेले तीन वर्षे कॉलेजला जात आहे पण माझा एकही मित्र काय एकही मैत्रीण सुद्धा नाही. ‘ चिन्नू सांगत होती. जर मी कोणाशी मैत्री केली असती, तर काही दिवसांनी त्यांना माझी खरी ओळख ‘कचरेवाल्याची मुलगी’ ही कळली असती. त्या ओळखीची मला लाज वाटत नाही पण त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला नावे असतात आणि आम्हीही माणूस म्हणूनच जन्माला आलो आहोत याचा लोकांना विसर पडलेला असतो. आज मी कितीही चांगले मार्क्स मिळवून कॉलेजमधून पहिली आलेव, तर उद्या न्यूज पेपरला हेडिंग येणार ‘एका कचरेवाल्याची मुलगी पहिली आली’. आमची ओळख तेवढयापुरतीच सिमीत रहाते. पुढे मी तुमचा स्विकार केला काय किंवा दुसऱ्याशी लग्न केले काय तरी सगळ्यांसाठी, तुमच्या घरच्यांसाठी माझी ओळख ही एक कचरेवाल्याची मुलगी म्हणूनच राहणार आणि म्हणूनच मला खूप शिकून अवकाश शास्त्रज्ञ व्हायचे आहे. मलाच माझे नाव मोठे करून माझ्या खऱ्या नावाने जगायचे आहे.” चुन्नीने मनापासून तिच्या मनातली सल रवीला बोलून दाखवली.
चुन्नीने रवीच्या प्रेमाचा स्वीकार नाही केला तरी रवीच्या डोक्यातून काही चुन्नी जात नव्हती. तिच्या विचाराने रवी अधीकच प्रभावित झाला होता. त्याला ह्यातून काहीतरी मार्ग काढावासा वाटत होता. दोन दिवस सतत त्याच्या डोक्यात चुन्नीचाच विचार चालू होता आणि त्याने एक वेगळाच मार्ग निवडला.
चुन्नीच्या नकाराने अस्वस्थ झालेल्या रवीने दुसऱ्याच दिवशी आपल्या आईवडिलांना सांगितले, मला काही येथे रहायला आवडत नाही. माझे सगळे मित्र मैत्रिणी अमेरिकेत आहेत तर मी परत अमेरिकेत जातो आणि आपले अमेरीकेतील ऑफिस सांभाळून मी आपल्या निर्यात वाढीवर जोर देईन. रवीच्या ह्या निर्णयाचे त्याच्या घरून स्वागतच झाले. पुढच्या आठवड्यात रवी परत अमेरिकेत परतला. अमेरिकेत स्वतःचे बस्तान बसविल्यानंतर त्याच्या डोक्यात चुन्नीचे विचार चालू झाले. तसे दोन एक दिवसातून तिच्याशी चाट करणे त्याचे चालूच होते आणि त्यातूनच त्याने चुन्नीला अमेरिकेत शिक्षणासाठी येण्याचे सूचित केले. चुन्नीला तिच्या शिक्षणासाठी अमेरिकेचा विचार करणे म्हणजे जरा जोकच वाटला पण रवीने तिला मार्गदर्शन करून स्कॉलरशिपसाठी प्रयत्न करायला लावले. रवीही तिकडून तिला वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीची माहिती पुरवीत होता. दोघांच्या प्रयत्नाला यश येऊन थोड्याच दिवसात चुन्नीला तिच्या पुढील शिक्षणासाठी चांगल्या युनिव्हर्सिटीत ऍडमिशन मिळाली. तिला तिथे स्कॉलरशिप मिळेल ह्याची रवीने सोय केली. आता प्रश्न होता विमानभाड्याचा. तेवढे पैसे काही चुन्नीकडे नव्हते. त्यासाठीही रवीनेच तोडगा काढला. स्वतःच्याच अमेरिकेतल्या कंपनीत तिला अर्धवेळ काम देऊन तिचा व्हिसा आणि तिकीट पाठविले. रवीने चुन्नीच्या मनातील अवकाश शास्त्रज्ञ होण्यासाठीचा मार्ग सुकर केला होता.
आता त्याला खात्री होती अमेरिकेत चुन्नीला कचरेवाल्याची मुलगी असे न ओळखता सगळे चुन्नी या नावानेच ओळखतील आणि ती शास्त्रज्ञ झाल्यावर जर तिला वाटले तर रवीशी नाहीतर कोणाशीही लग्न करून भारतात जाईल तेंव्हा चुन्नीची ओळख ही एक कचरेवाल्याची मुलगी अशी न रहाता शास्त्रज्ञ चुन्नी अशी असेल आणि मुन्ना वाल्मिकी ह्या कचरेवाल्याची ओळख एका शास्त्रज्ञ मुलीचा बाप अशी होईल.
खरचं मनात असले तर कुठच्याही कठीण प्रसंगात, आहे त्या परिस्थितीत मार्ग काढता येतो…..फक्त नीट विचार करून समोर आलेल्या प्रश्नाला संयम ठेऊन सामोरे जायला लागते….. अगदी आपल्या रवी सारखे.
☆ मी प्रवासिनी क्रमांक १९ – भाग २ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
विद्या आणि कला यांचं माहेरघर– ग्रीस
प्राईम मिनिस्टर रेसिडन्स म्हणजे पूर्वीच्या रॉयल पॅलेस इथे उतरलो. इथे दर तासाला ‘चेंजिंग द गार्डस्’ सेरीमनी होतो. दोन सैनिक पांढरी तंग तुमान व त्यावर पांढरा, तीस मीटर्स कापडाचा, ४०० सारख्या चुण्या असलेला घेरदार ड्रेस घालून, डोळ्यांची पापणीसुद्धा न हलवता दोन बाजूंना उभे होते. त्यांच्या डोक्यावर लाल पगडीसारखी टोपी आणि हातात तलवारी होत्या. त्यांच्या पायातील लाकडी तळव्यांचे बूट प्रत्येकी साडेतीन किलो वजनाचे होते. थोड्यावेळाने सैनिकांची दुसरी जोडी आल्यावर या सैनिकांनी गुडघ्यापर्यंत पाय उचलून बुटांचा खाडखाड आवाज करीत शिस्तशीर लष्करी सलामी दिली. ते निघून गेल्यावर त्यांची जागा दुसऱ्या जोडीने घेतली.
प्लाका या भागात शहराचं जुनं खानदानी सौंदर्य दिसतं. जुन्या पद्धतीची घरं, उघडमीट होणारी शटर्स असलेल्या काळ्या लाकडी पट्टयांच्या खिडक्या, घरापुढील कट्टयावर सुंदर फुलझाडं, षटकोणी लांबट लोलकासारखे काळ्या रंगाचे डिझाईनचे दिव्याचे खांब, चर्चेस, जुन्या वास्तू, घरांच्या कलापूर्ण गॅलेऱ्या ब्राँझचे रेलिंग असलेल्या होत्या.अशा या भागात जुन्या काळी श्रीमंत व्यापारी, राजकारणी,विद्वान यांची घरं असायची .आजही तिथे घर असणं अभिमानास्पद समजलं जातं.
ॲक्रोपोलीसवरील तोडमोड केलेली अनेक शिल्पं आणि शहरभर उत्खननात सापडलेले अनेक भग्न अवशेष आता ॲक्रोपोलिस म्युझियममध्ये अत्यंत काळजीपूर्वक जतन करण्यात आले आहेत. प्राचीन इतिहास, मानवी जीवन, स्थापत्यशास्त्र, शिल्पकला यांचा जागतिक महत्त्वाचा हा खजिना बघण्यासाठी तसंच ॲक्रोपोलिसचे उद्ध्वस्त अवशेष पाहण्यासाठी जगभरातून दरवर्षी लाखो प्रवासी ग्रीसला भेट देतात. उत्खननात सातव्या ते नवव्या शतकातील बेझेन्टाईन काळातील एका छोट्या वसाहतीचे अवशेष मिळाले . हे सापडलेले अवशेष साफसफाई करून त्यावर जाड काचेचे आवरण घालून ॲक्रोपॉलिस म्युझियमच्या प्रांगणात ठेवण्यात आले आहेत .इथून म्युझियममध्ये प्रवेश करताना या लोकवस्तीची वर्तुळाकार रचना, सार्वजनिक हॉल, मध्यवर्ती असलेली विहीर अशी रचना पाहता येते. ॲक्रोपोलीसमध्ये सापडलेल्या मार्बलच्या पट्टिका म्युझियमच्या तिसऱ्या मजल्यावर आहेत. पॅसिडॉन, अथेना, अपोलो आणि इतर अनेकांचे अतिशय रेखीव कोरलेले पुतळे तिथे आहेत. त्यांची बसण्याची आसने, अंगावरील वस्त्रे, बसण्याची ऐटदार पद्धत, कुरळे केस, दाढी, चेहऱ्यावरील भावभावना ,शरीराच्या स्नायूंचा डौलदारपणा, तेजस्वी डोळे असं पाहिलं की त्या प्राचीन शिल्पकारांच्या कलेला मनापासून दाद द्यावीशी वाटते.पर्शियाने ग्रीसवर आक्रमण केलं व तोडफोड सुरू केली त्यावेळी ॲक्रोपोलीसवरील सौंदर्य देवतेचा पुतळा शत्रूपासून वाचविण्यासाठी जमिनीत पुरला होता. तो १८८६ मध्ये उत्खननातून वर काढला. तिचा हसरा चेहरा, डोक्यावरील रुंद महिरप आणि दोन्ही खांद्यांवरून पुढे आलेल्या पीळ घातल्यासारख्या तीन-तीन वेण्या बघत रहाव्या अशा आहेत. त्रिकोणी आसनावर नृत्याच्या मुद्रा करणारी, डोक्यावरून पदरासारखं मार्बलच वस्त्र घेतलेली स्त्री वर्षभरातील वेगवेगळ्या ऋतूंचं अस्तित्व दाखवते. तिने उजव्या खांद्यावरून मार्बलचे चुणीदार वस्त्र घेतले आहे. त्याचे काठ व वस्त्रावरील डिझाईन रंगीत काळसर मार्बलचं आहे. काही पाठमोरे स्त्री पुतळे कुरळ्या केसांच्या पाचपेडी वेण्या घालून खाली केसांचे झुपके सोडलेल्या अशा आहेत.
महान योद्धा अलेक्झांडर खुष्कीच्या मार्गाने भारतापर्यंत आला होता. त्याचा फक्त मानेपर्यंत चेहरा असलेला एक पुतळा इथे आहे. त्याच्या कुरळ्या केसांची महिरप, तरतरीत नाक आणि हिरवे घारे डोळे बघण्यासारखे आहेत. लहान मोठ्या अनेक उंच खांबांवर स्त्री-पुरुषांचे उभे पुतळे ठेवले आहेत. त्यातील कोणाचे हात तुटलेले आहेत तर कुणाचं नुसतं धडच आहे. तरीही त्यांचं शरीरसौष्ठव, उभे राहण्याची पद्धत, अंगावरील वस्त्रांच्या चुण्या यावरून त्यांच्या शरीराच्या प्रमाणबद्ध रचनेची कल्पना येऊ शकते.
भाजलेल्या मातीच्या, भोवर्याच्या आकाराच्या, सुंदर रंगकाम केलेल्या अनेक स्पिंडल्स १९५० साली उत्खननात सापडल्या. प्राचीन काळातील स्त्रिया हे *स्पिंडल देवीच्या पायाशी वाहत असत असे गाईडने सांगितले. काही पट्टीकांवर ग्रीक आणि पर्शियन योद्धे एकमेकांशी लढताना दाखविले आहेत. तीन सशक्त, हसऱ्या मुद्रेच्या पुरुष प्रतिमा एकाला एक चिकटून आहेत. पाणी, अग्नी आणि वायू यांचे ते प्रतीक आहे. एका घोडेस्वाराची तंग तुमान आणि चुडीदार अंगरखा रंगीत आहे तर घोड्याच्या आयाळीवरील लाल हिरवा मार्बलचा पट्टा रेशमी वस्त्रासारखा दिसतो. घोड्याच्या शेपटीलाही हिरवट रंगाचा मार्बल वापरला आहे. समाजातील उच्चभ्रू स्त्रियांची स्कर्टसारखी फॅशनेबल व रंगीत डिझाईनच्या मार्बलची वस्त्र लक्षवेधी आहेत. एक दाढीवाला तरूण मानेभोवती गाईच्या छोट्या वासराला घेऊन निघाला आहे तर हात तुटलेल्या एका नग्न उभ्या युवकाचं प्रमाणबद्ध शरीर, तेजस्वी डोळे, छाती- पोटाचे, पायाचे स्नायू अतिशय रेखीव आहेत.एका पेल्मेटवरील रंगीत उमलत्या फुलांचं शिल्प वाऱ्यावर डोलत असल्यासारखं वाटतं. गतकाळातील हा अमूल्य सांस्कृतिक वारसा पाहता-पाहता खरोखरच हरवल्यासारखं झालं.
सॅ॑टोरिनी हे ग्रीसचं छोटसं बेट एजिअन समुद्रात आहे. अथेन्सहून विमानाने सॅ॑टोरिनीला पोचलो. एका चढणीवरच्या रस्त्यावरील सुंदर प्रशस्त बंगला हे आमचं हॉटेल होतं. हॉटेलच्या आवारात टोमॅटो, अंजीर, रंगीत बोगनवेल ,सुवासिक मॅग्नेलिया बहरली होती. लंबवर्तुळाकार निळ्या पोहण्याच्या तलावाभोवती आमच्या रूम्स होत्या. रूमला छोटी गॅलरी होती. वाटलं होतं त्यापेक्षा हॉटेल खूपच मोठं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी दाराचा पडदा सरकवला तर काय आश्चर्य स्विमिंगपुलावरील आरामखुर्च्या बाजूला सरकवून त्या जागेवर योगवर्ग चालू होता. एक कमनीय योग शिक्षिका समोरच्या पंचवीस-तीस स्त्री पुरुषांकडून योगासनं, प्राणायाम करून घेत होती. खरं म्हणजे हा योगवर्ग हॉटेलमधील सर्व प्रवाशांसाठी होता. आदल्या दिवशी संध्याकाळी तिथे आल्यावर बाजारात फेरफटका मारताना अतिशय रसाळ, लालसर काळी, मोठाली चेरी मिळाली होती. मोठे पीच आणि तजेलदार सफरचंद आपल्यापेक्षा खूप स्वस्त व छान वाटली म्हणून घेतली होती. जेवून हॉटेलवर आल्यावर सर्वांनी तिथल्या हॉलमध्ये बसून गप्पा मारताना त्या फळांवर ताव मारला होता आणि त्या गडबडीत हॉलमध्ये लावलेली योगवर्गाची नोटीस वाचायची राहिली. नाही तर आम्हालाही योगवर्गाचा लाभ घेता आला असता. पण आमचा ‘योग’ नव्हता. भारतीय योगशास्त्राचे महत्त्व आता जगन्मान्य झालं आहे हे मात्र खरं!
माझी मैत्रीण शोभा भरतकाम आणि विणकाम करण्यात कुशल आहे. नाश्त्याच्या वेळी तिथल्या एका खिडकीचा विणकाम केलेला पांढरा स्वच्छ पडदा तिला आवडला म्हणून ती जवळ जाऊन बघायला लागली तर टेबलावरच्या आमच्या डिश उचलून, टेबल साफ करणारा इसम लगबगीने तिच्याजवळ गेला. आणि कौतुकाने सांगू लागला की हे सर्व भरतकाम, क्रोशाकाम माझ्या आईने केले आहे. तीन चार वर्षांपूर्वी आमची आई आणि नंतर वडीलही गेले. आम्ही सर्व बहिण भावंडं मिळून हा फॅमिली बिझनेस चालवतो. मग त्याने आम्हाला आपल्या आई-वडिलांचे फोटो, आईने केलेल्या अनेक वस्तू, विणलेले रुमाल दाखवले. खरोखरच सर्व हॉटेलमधील निरनिराळ्या पुष्परचना, सोफ्यावरील उशांचे अभ्रे, पडदे, दिवे, कलात्मक वस्तू उच्च अभिरुचीच्या, स्वच्छ, नीटनेटक्या होत्या. आई-वडिलांबद्दलंच प्रेम आणि अभिमान त्या देखणेपणात भर घालीत होतं.
आज दिवसभर छोट्या बोटीतून एजिअन समुद्रात फेरफटका होता. आम्हा दहाजणांसाठीच असलेली ती छोटीशी बोट सर्व सुविधायुक्त होती. चालक व त्याचा मदतनीस उत्साहाने सारी माहिती सांगत होते आणि अधून मधून वेगवेगळे खाद्यपदार्थ देऊन आमची जिव्हा तृप्त करीत होते. त्या छोट्याशा बोटीच्या नाकाडावर बसून समुद्राचा ताजा वारा प्यायला मजा वाटत होती. दोन्ही बाजूला उंच कड्यांच्या डोंगररांगा होत्या. काहींचा रंग दगडी कोळशासारखा होता. काही डोंगर गाद्यांच्या गुंडाळीसारखे वळकट्यांचे होते. काही पांढरट पिवळट लालसर मार्बलचे होते. काही डोंगर ग्रॅनाइटचे होते. एका छोट्या डोंगराजवळ बोट थांबली. हा जागृत ज्वालामुखी आहे. त्याच्या माथ्यावरच्या छिद्रातून सल्फ्युरिक गॅसेस बाहेर पडताना दिसतात. दगडी कोळशासारखा दिसणार तो डोंगर अतिशय तप्त होता.
तिथून जवळच थर्मल वॉटरचे झरे समुद्रात आहेत. आमच्या आजूबाजूला असंख्य लहान- मोठ्या बोटी प्रवाशांनी भरलेल्या होत्या. सर्फिंग करणारे, छोट्या वेगवान यांत्रिक बोटीतून पळणारे अनेक जण होते.उष्ण पाण्याच्या झऱ्यांजवळ आल्यावर आजूबाजूच्या बोटीतून अनेकांनी समुद्रात धाड् धाड् उड्या मारल्या. जल्लोष,मौज मस्ती यांना ऊत आला होता. समुद्रस्नान, परत डेकवर सूर्यस्नान असा मनसोक्त कार्यक्रम चालू होता. इथे बाकी कशाची नाही पण अंगावरच्या कपड्यांची टंचाई नजरेत भरत होती. आणि सिगारेटसचा महापूर लोटला होता. बोट थिरसिया बेटाजवळ आल्यावर चालकाने बोट थांबवून बोटीतच सुंदर जेवण दिलं. तिथून परतताना एका उंच डोंगरकड्यावर पांढरीशुभ्र असंख्य घरं एका ओळीत बसलेली दिसली. पांढरे शुभ्र पंख पसरून बसलेला राजहंसांचा थवाच जणू!’ इथे कुठे यांनी घरं बांधली? वर जायची- यायची काय सोय?’ असं मनात आलं तर चालकाने डोंगरातून वर जाणाऱ्या केबल कार्स आणि डोंगराच्या पोटातून जाणारी फनिक्युलर रेल्वे दाखविली. उच्चभ्रू श्रीमंत लोकांची ती उच्च वसाहत होती.
(मागील भागात आपण पाहिलं – त्यात उत्स्फूर्तता अशी फारशी नसायची. फार गंभीरपणे आम्ही तिकडे बघतही नव्हतो. आता इथून पुढे-)
उज्ज्वला – तरीही काही बर्या कविता त्यावेळीही माझ्याकडून लिहिल्या गेल्या. मी एस. वाय. बी.ए. ला असताना कॉलेजच्या आजी माजी विद्यार्थ्यांचा कविता संग्रह काढायचा ठरला. ‘शिल्प’ नावाने तो निघालादेखील त्यात माझी ‘बंधन ‘ही कविता निवडली गेली होती. एव्हाना चांगली कविता आणि वाईट कविता याबद्दलची माझी समाज काहीशी वाढली होती.
मी – त्यावेळी मासिकातूनही तू कविता पाठवायचीस ना!
उज्ज्वला- हो. चांगली लिहून झालीय असं वाटलं तर पाठवायची. ‘माणूस’ म्हणून पाक्षिक तेव्हा निघायचं. त्यात मी कविता पाठवायची आणि समोरच्याच पानावर गोपीनाथ तळवलकर यांनी कवितेचा आस्वाद घेतलेलं लेखन असायचं. माझ्या कवितांचं त्यांनी खूप कौतुक केलं होतं. तिथे पाठवलेल्या कवितांच्या संदर्भात एक मजेशीर आठवण आहे.
मी – कोणती ग?
उज्ज्वला – ‘धुंद धुक्यातील अशा पहाटे’ अशी एक कविता मी पाठवली होती. लहानशीच कविता. कवी वामन देशपांडे यांना ती इतकी आवडली होती की त्यांची पाठ झाली. पुढे योगायोगाने त्यांची ओळख झाली स्नेह संबंध जुळले. एकदा अशीच काही मंडळी जमली होती. एकमेकांना कविता वाचून दाखवत होतो. मी ती कविता वाचली. ते म्हणाले, ‘ही कविता तुमची नाही.’ मी म्हंटलं ‘का माझीच आहे.’ ते म्हणाले ‘ही कविता मी कुठे तरी मासिकात वाचलीय. मी म्हंटलं, ‘माणूस’ मध्ये पाठवली होती. तीच तुम्ही वाचली असेल. तर त्यांचं म्हणणं असं की खाली कवायत्रीचं नाव वेगळं होतं.’ मी म्हंटलं, ‘असणारच. कारण मी ती लग्नापूर्वी लिहिलेली व पाठवलेली कविता होती. त्यावेळी मी उज्ज्वला केळकर नसून कुमुदिनी आपटे होते.’ तेव्हा कुठे त्यांची खात्री पटली, कविता माझीच होती म्हणून. यानंतर पुन्हा जेव्हा जेव्हा भेट होईल, तेव्हा या कवितेची आठवण काढून आम्ही खळखळून हसतो.
मी – पण आपण केलेली कविता कुणाला तरी आवडते, लक्षात ठेवावीशी वाटते, ही गोष्टदेखील आनंददायक आणि प्रेरणादायक होती, नाही का?
उज्ज्वला – हो नक्कीच
मी – मग पुढे?
उज्ज्वला – पुढे काय? चार-चौघींसारखं लग्न झालं. मी संसाराला लागले. कविता करण्यापेक्षा कविता जगायला लागले. कवितेचा प्रवाह नव्हे, थेंबुटे ओंजळित येऊ लागले. या मधल्या काळात चांगल्या कवींच्या खूप चांगल्या कविता वाचल्या. चांगली कविता म्हणजे काय, हे मनात स्पष्ट झालं.
या काळात, उमेद वाढवणारी आणखी एक घटना घडली. किर्लोस्करने जिल्हावार नवनवोन्मेषांचा शोध घेण्यासाठी एक उपक्रम राबवायचे ठरवले. जिल्हावार कविसंमेलने घ्यायची. त्याची जबाबदारी एखाद्या स्थानिक संस्थेकडे द्यायची. त्यांनी कविता मागवायच्या निवडायच्या व तेवढ्याच कविता संमेलनात वाचायच्या. दोन दोन कविता मागवल्या होत्या. संमेलनाचे वेळी किर्लोस्करचे संपादक कुणा तरी मोठ्या कवींना घेऊन येणार होते. तिथे वाचल्या गेलेल्या कवितांपैकी ७ कविता किर्लोस्करमध्ये छापण्यासाठी निवडल्या जाणार होत्या. सांगलीत एकूण 300 कविता आल्या, असे प्रस्ताविकातून कळले. त्यापैकी संमेलनात वाचायला 30 कविता निवडल्या होत्या. त्यापैकी ‘जन्म आणि ‘पेपर’ आशा माझ्या 2 कविता वाचायला निवडल्या गेल्या. त्यापैकी ‘पेपर’ ही कविता त्यांनी किर्लोस्करमध्ये छापण्यासाठी निवडली. त्यानंतर संपादक ह. मो. मराठे यांचे पत्र आले, ‘पेपर’मध्ये कथेचे बीज आहे. तुम्ही परवानगी देत असाल, तर त्यावर मी कथा लिहीन.‘ मी नकार देण्याचं काही कारणच नव्हतं. एक मोठा कथाकार माझ्या कवितेवर कथा लिहितो, म्हंटल्यावर मी हुरळूनच गेले. पुढे त्यांनी कथा लिहिली. ती प्रसिद्धही झाली, पण मला वाचायला मिळाली नाही. त्यानंतर दुसरी ‘जन्म ‘ही कविता मी ‘स्त्री’मध्ये पाठवली. तीही छापूनही आली.
या सगळ्या गोष्टींमुळे माझा आत्मविश्वास वाढत गेला. आपण लिहितो, ते लोकांना आवडतं, हे नक्कीच प्रेरणादायी होतं. त्या काळात अनेक वेळा कविसंमेलने होत आणि मी बहुतेक ठिकाणी हजर राहत असे. श्रोत्यांनाही कविता आवडतात, हे त्यांच्या प्रतिसादावरून म्हणजे टाळ्यांवगैरे वरून कळत होतं.
संस्कारधानी के सुप्रसिद्ध एवं सजग अग्रज साहित्यकार श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज” जी के साप्ताहिक स्तम्भ “मनोज साहित्य” में आज प्रस्तुत है बुंदेली गीत “सामंजस्य रहे जीवन में… ”। आप प्रत्येक मंगलवार को आपकी भावप्रवण रचनाएँ आत्मसात कर सकेंगे।
मनोज साहित्य # 23 – सजल – सामंजस्य रहे जीवन में… ☆
(हम प्रतिष्ठित साहित्यकार श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’जी के आभारी हैं जिन्होने साप्ताहिक स्तम्भ – “विवेक की पुस्तक चर्चा” शीर्षक से यह स्तम्भ लिखने का आग्रह स्वीकारा। श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र जी, मुख्यअभियंता सिविल (म प्र पूर्व क्षेत्र विद्युत् वितरण कंपनी, जबलपुर ) पद से सेवानिवृत्त हुए हैं। तकनीकी पृष्ठभूमि के साथ ही उन्हें साहित्यिक अभिरुचि विरासत में मिली है। उनका पारिवारिक जीवन एवं साहित्य में अद्भुत सामंजस्य अनुकरणीय है। इस स्तम्भ के अंतर्गत हम उनके द्वारा की गई पुस्तक समीक्षाएं/पुस्तक चर्चा आप तक पहुंचाने का प्रयास करते हैं।
आज प्रस्तुत है सुश्री सुषमा व्यास राजनिधि जी की पुस्तक “परमानंदम्” की समीक्षा।
पुस्तक चर्चा
पुस्तक चर्चा
कृति… परमानंदम्
लेखिका… सुषमा व्यास राजनिधि
संस्मय प्रकाशन, इंदौर
ISBN 978-81-952641-3-1
पृष्ठ 48
☆ साप्ताहिक स्तम्भ – विवेक की पुस्तक चर्चा# 109 ☆
☆ “परमानंदम्” – सुश्री सुषमा व्यास राजनिधि ☆ श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ☆
आध्यात्म को बड़ा गूढ़ विषय समझे जाने की भ्रांति है.
रिटायरमेंट के बाद ही धर्म आध्यात्म के लिये समय दिये जाने की परम्परा है.
लम्बे लम्बे गंभीर प्रवचन आध्यात्मिक उन्नयन के लिये जरूरी माने जाते हैं. किंतु वास्तव में ऐसा है नहीं. सुषमा व्यास राजनिधि की कृति परमानंदम् पढ़िये, उनके छोटे छोटे आलेख, आपमें आध्यात्मिकता के प्रति लगाव पैदा कर देंगे. गुरु के प्रति आपमें समर्पण जगा देंगे. इन दिनों धर्म सार्वजनिक शक्ति प्रदर्शन का संसाधन बनाकर राजनैतिक रूप से प्रस्तुत किया जा रहा है. जबकि वास्तव में धर्म नितांत व्यक्तिगत साधना है. यह वह मार्ग है जो हमारे व्यक्तित्व को इस तरह निखारता है कि हमारा मन, चित्त परम शांति का अनुभव कर पाता है. ईश्वरीय परम सत्ता किसी फ्रेम में बंधी फोटो या जयकारे से बहुत परे वह शिखर नाद है जिसकी ध्वनि मन ही कह सकता है और मन ही सुन सकता है. परमानंद अभिव्यक्ति कम और अनुभूति अधिक है. सुषमा व्यास राजनिधि ने नितांत सरल शब्दों में गूढ़ कथ्य न्यूनतम विस्तार से लिख डाली है. जिनकी व्याख्या पाठक असीम की सीमा तक अनुभव कर सकता है. वे नर्मदा को अपनी सखी मानती हैं. रेवासखि में यही भाव अभिव्यक्त होते हैं. भगवान श्रीकृष्ण और श्रीमद्भगवतगीता, आधुनिक युग में राम और रामायण की महत्ता, श्रीमद् देवी भागवत पुराण, युवा वर्ग में धार्मिक ग्रंथो के प्रति अरुचि, उनका आलेख है, दरअसल हमारे सारे धार्मिक पौराणिक ग्रंथ संस्कृत में हैं, और आज अंग्रेजी माध्यम में पढ़ने वाले सारे युवा संस्कृत ही नही जानते. इसीलिये मेरे पिता प्रो चित्र भूषण श्रीवास्तव जी ने भगवतगीता, रघुवंश, भ्रमरगीत, दैनंदिनी पूजन श्लोक आदि का हिन्दी काव्यगत अनुवाद किया है, जिससे युवा पीढ़ी इन महान ग्रंथो को पढ़ समझ व उनका मनन कर सके. और इन वैश्विक ग्रंथो के प्रति युवाओ में रुचि जाग सके. धार्मिक ग्रंथो में नारी पात्र, प्रसिद्ध मंदिर रणजीत बाबा हनुमान की महिमा, सृष्टि के सबसे दयालु संत, गोस्वामी तुलसीदास के ग्रंथो में राम का स्वरूप, कृष्ण चिंतन तथा अंधकार में उगता सूरज जैसे विषयों पर सारगर्भित लेखों का संग्रह किताब में है.
(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही गंभीर लेखन। शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं। हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )
त्रिकाल
कालजयी होने की लिप्सा में,
बूँद भर अमृत के लिए,
वे लड़ते-मरते रहे,
उधर हलाहल पीकर,
महादेव, त्रिकाल भये!
हलाहल की आशंका को पचाना, अमृत होने की संभावना को जगाना है।
आप सभी मित्रों को महाशिवरात्रि की हार्दिक बधाई। महादेव की अनुकंपा आप सब पर बनी रहे। ? नम: शिवाय!
– संजय भारद्वाज
प्रत्येक बुधवार और रविवार के सिवा प्रतिदिन श्री संजय भारद्वाज जी के विचारणीय आलेख एकात्मता के वैदिक अनुबंध : संदर्भ – उत्सव, मेला और तीर्थयात्रा श्रृंखलाबद्ध देने का मानस है। कृपया आत्मसात कीजिये।
संजय दृष्टि – एकात्मता के वैदिक अनुबंध : संदर्भ- उत्सव, मेला और तीर्थयात्रा भाग – 24
श्री हरिगंगा मेला अधिकांश छोटे-बड़े मंदिरों में वार्षिक मेले की प्रथा और परंपरा है। तीर्थ क्षेत्र शूकरक्षेत्र सोरों कासगंज में भगवान का वराह अवतार लिया हुआ था। यहीं श्री हरिगंगा कुंड है। इस कुंड में डाली गई अस्थियाँ तीन दिन में जल में पूर्णत: विलीन हो जाती हैं। इस विषय को लेकर कुछ वैज्ञानिक अनुसंधान भी हुए हैं किसी निष्कर्ष पर नहीं पहुँचा जा सका है। वराह विग्रह ने अपनी काया भी यहीं तजी थी।
पुष्कर मेला- अजमेर से 11 किलोमीटर दूर स्थित पुष्कर में कार्तिक पूर्णिमा को यह मेला लगता है। मेले में पुष्कर झील में स्नान किया जाता है। श्रीरंग जी और अन्य मंदिरों के दर्शन की परंपरा है। इस अवसर पर लगने वाला पशु मेला विश्व भर में प्रसिद्ध है। इन पशुओं में भी विशेषकर ऊँट मेला खास आकर्षण का केंद्र होता है। इसी क्रम में अन्य अनेक स्थानों पर पशु मेला लगता है। इसी संदर्भ में कार्तिक पूर्णिमा से लगनेवाले पशु मेला उल्लेखनीय है। चीनी यात्री फाहियान ने चौथी सदी में की अपनी भारत यात्रा के संस्मरणों में इसका उल्लेख किया है। इनके अलावा भी देशभर में अनेक पशु मेला लगते हैं।
सूरजकुंड मेला- समयानुकूल परिवर्तन एवं मेले का आधुनिक रूप है हरियाणा का ‘सूरजकुंड मेला।’ यहाँ शिल्पियों की हस्तकला के लिए पंद्रह दिन हस्तशिल्प मेला लगाया जाता है। यह मेला पिछले लगभग चार दशक से चल रहा है। हस्तशिल्पी, हथकरघा कारीगरों के लिए यह मेला एक अवसर होता है। विविध अंचलों के हस्तशिल्प, वस्त्रपरंपरा, लोककला में रुचि रखनेवाले इस मेले में बड़ी संख्या में जुटते हैं।
अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार ☆सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय ☆संपादक– हम लोग ☆पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆
(श्री राकेश कुमार जी भारतीय स्टेट बैंक से 37 वर्ष सेवा के उपरांत वरिष्ठ अधिकारी के पद पर मुंबई से 2016 में सेवानिवृत। बैंक की सेवा में मध्यप्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगढ़, राजस्थान के विभिन्न शहरों और वहाँ की संस्कृति को करीब से देखने का अवसर मिला। उनके आत्मकथ्य स्वरुप – “संभवतः मेरी रचनाएँ मेरी स्मृतियों और अनुभवों का लेखा जोखा है।”
आज प्रस्तुत है समसामयिक विषय पर आधारित आलेख – “तीसरा विश्वयुद्ध!”.)
☆ आलेख ☆ “तीसरा विश्वयुद्ध!” ☆ श्री राकेश कुमार ☆
(समसामयिक)
तीसरा विश्वयुद्ध! विगत अनेक वर्षों से इस शब्द को सुनते आ रहे हैं। कब होगा ?
पहला और दूसरा तो इतिहास बन चुके हैं। आने वाले विद्यार्थियों को एक विषय और इसकी तारीखें भी याद रखनी पढ़ेगी। हमारे सोशल मीडिया तो हमेशा से मज़े लेने में अग्रणी रहता ही हैं। इलेक्ट्रॉनिक मीडिया भी चौबीसों घंटे रक्षा विशेषज्ञों के मुंह में अपने शब्द डालकर उनको भी अपनी विचार-वार्ता का भाग बनाने में गुरेज़ नही करते। नए नए विश्व के राजनैतिक समीकरण और ना जाने अपनी कल्पना की उड़ान से सामरिक महत्व की बातों से मीडिया प्रतिदिन नई सामग्री परोस का अपनी टीआरपी को बढ़ा कर विज्ञापन की दरों से अपनी आय में वृद्धि कर रहे हैं।
केन्द्रीय सरकार के कुछ मंत्री यूक्रेन के पड़ोसी देश रवाना हो गए हैं। इसी प्रकार अनेक राज्य सरकारों ने भी अपने आला अधिकारियों को दिल्ली और मुंबई में वापिस आए हुए छात्राओं के स्वागत के लिए तैनात कर दिया हैं। संभवतः ……!
हॉलीवुड और बॉलीवुड के फिल्म निर्माताओं को भी एक विषय मिल गया है। उन्होंने भी अपने फिल्मी लेखकों को इस कार्य के लिए बयाना भी दे दिया होगा।सुनने में आया है,कुछ फिल्मों के टाइटल भी इस बाबत रजिस्टर्ड करवा लिए हैं।
हमारे भविष्य वक्ता अपनी पंचांग में छपी हुई भविष्य वाणी सच साबित बता कर अपने पंचांग की वृद्धि करने में लग गए हैं।हर कोई अपनी दुकान / व्यापार में यूक्रेन युद्ध को भंजा रहा हैं। दूसरों के घर में लगी हुई आग पर हर कोई रोटियां सेकने की कोशिश कर रहा हैं। टेंशन और खोफ का वातावरण बनाए जाने के प्रयास चारो दिशाओं में हो रहे हैं।