मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग 7 – कृतज्ञता ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

[भारतीय संस्कृतीतमध्ये आपल्या जीवनात असणार्‍या गुरूंना अर्थात मार्गदर्शन करणार्‍या व्यक्तिंना अत्यंत महत्वाचे स्थान आहे, हे महत्व आपण शतकानुशतके वेगवेगळ्या पौराणिक, वेदकालीन, ऐतिहासिक काळातील अनेक उदाहरणावरून पाहिले आहे. आध्यात्मिक गुरूंची परंपरा आपल्याकडे आजही टिकून आहे. म्हणून आपली संस्कृतीही टिकून आहे.

एकोणीसाव्या शतकात भारताला नवा मार्ग दाखविणारे आणि भारताला आंतरराष्ट्रीय विचारप्रवाहात आणणारे, भारताबरोबरच सार्‍या विश्वाचे सुद्धा गुरू झालेले स्वामी विवेकानंद.

आपल्या वयाच्या जेमतेम चाळीस वर्षांच्या आयुष्यात, विवेकानंद यांनी  गुरू श्री रामकृष्ण परमहंस यांचे शिष्यत्व पत्करून जगाला वैश्विक आणि व्यावहारिक अध्यात्माची शिकवण दिली आणि धर्म जागरणाचे काम केले, त्यांच्या जीवनातील महत्वाच्या घटना आणि प्रसंगातून स्वामी विवेकानंदांची ओळख या चरित्र मालिकेतून करून देण्याचा हा प्रयत्न आहे.] 

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग 7 – कृतज्ञता ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

“कोणावरही उपाशी राहायची वेळ येऊ नये”, अशी राजकीय वाक्यं सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर सतत ऐकायला मिळत आहेत. एरव्ही रस्त्यारस्त्यात कुणी अडवून काही मागायला लागलं तर चीड येते आणि भीक मागण्यापेक्षा काहीतरी काम करावं असं आपण सुचवित असतो. त्याउलट, मंदिराबाहेर दान देणारे  श्रद्धावान भाविक खूप असतात, तर हे दान स्वीकारणार्‍या व्यक्तीही मंदिराबाहेर खूप दिसतात. पण आजची उपाशी राहण्याची परिस्थिति वेगळी आहे. लॉक डाउन काळात आपआपल्या गावी परत जाणारे मजूर, कामगार व काही लोक यांच्यावर अशी वेळ आली आहे. हे बघून आपल्याला दु:ख होते. असच कलकत्त्यात एक माणूस उपासमारीने मेला अशी बातमी पेपर मध्ये छापून आली, ती वाचून स्वामी विवेकानंद, “देशाचा सर्वनाश ओढवणार, देश रसातळाला जाणार” असे दु:खाने म्हणू लागले. या दुखाचे कारण त्यांचे मित्र हरिपाद मित्र यांनी विचारलं. त्यावर स्वामी म्हणले, “ इतर देशात कितीतरी अनाथ आश्रम, गरीबांना कामं पुरवणार्‍या संस्था, धर्मादाय, सार्वजनिक फंड असूनही शेकडो लोक दरवर्षी उपासमारीने मेल्याचं आपण वर्तमानपत्रात वाचतो. पण भुकेलेल्याला मूठभर अन्न देण्याची  प्रथा आपल्या देशात असल्यामुळे कधी कोणी मेल्याचे ऐकिवात नव्हते. आज प्रथमच वाचले की, दुष्काळाचे दिवस नसतानाही उपासमारीने एक मनुष्य अन्नान्न दशा होऊन कलकत्त्यासारख्या शहरात मृत्यूमुखी पडला”.

आपण नेहमीच अनुभवतो की आज काही पैसे दान दिले तर फुकट मिळतात म्हणून त्या पैश्यातून व्यसनाधीन होऊन खितपत पडणारे लोक आहेत. तशी सवय लागते त्यांना. पण स्वामी विवेकानंद म्हणतात, दारात भिकारी आला तर, आपल्या ऐपतीनुसार त्याला काहींना काही देणेच योग्य आहे. त्याचा सदुपयोग होईल की नाही याची नसती चिंता कशाला करायची? कारण तुम्ही त्याला दान दिले नाही तर तो  पैशांसाठी तुमच्याकडे चोरी करेल, त्यापेक्षा दोन पैसे भीक मिळाली तर स्वस्थ तरी बसेल घरात. त्यामुळे निदान चोर्‍या होणार नाहीत.

त्यांच्या मते, आपले कर्तव्य म्हणजे लोकांना सहाय्य करणे. त्यांच्याशी कृतज्ञतेचे वर्तन ठेवणे. कारण तो गरीब असल्यामुळेच मागतोय. लक्षात ठेवा दानाने धन्य होत असतो तो देणारा, घेणारा नव्हे. जगावर आपल्या दयाशक्तीचा प्रयोग करण्यास वाव मिळाल्यामुळेच तुम्ही स्वताला समर्थ बनवू शकता या बद्दल तुमच्या मनात कृतज्ञता असली पाहिजे.  

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सेवेची गोष्ट ☆ संग्राहिका: सुश्री प्रतिमा जोशी ☆

? जीवनरंग ❤️

☆ सेवेची गोष्ट ☆ संग्राहिका: सुश्री प्रतिमा जोशी ☆

आमचे वडीलोपार्जित घर भोपाळ मध्ये होते आणि मी कामासाठी चेन्नई  येथे राहत होतो. अचानक एक दिवस घरून वडीलांचा फोन आला ताबडतोब निघून ये, महत्त्वाचे काम आहे. मी घाईघाईने रेल्वे स्टेशनवर पोहोचलो व रिझर्वेशनचा प्रयत्न केला, पण उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे एकही जागा शिल्लक नव्हती.

समोरच्या प्लॅटफॉर्मवर ग्रँड ट्रंक एक्सप्रेस गाडी उभी होती, पण त्यातही बसायला जागा नव्हती. कोणत्याही परिस्थितीत घरी जायचे होते, त्यामुळे मी कोणताही मागचा पुढचा विचार न करता, समोरच्या साधारण श्रेणीच्या डब्यात घुसलो. मला असे वाटले की एवढ्या गर्दीत रेल्वेचा  टि.सी. काही बोलणार नाही.

डब्यात कुठे जागा मिळते का, हे बघण्यासाठी मी इकडे तिकडे बघितले. तर एक सज्जन गृहस्थ बर्थवर झोपले होते. मी त्यांना, “मला बसायला जागा द्या” म्हणून विनंती केली. ते सज्जन उठले, माझ्याकडे पाहुन हसले व म्हणाले, “काही हरकत नाही आपण येथे बसू शकता.”

मी त्यांना धन्यवाद दिले व तिथेच कोपऱ्यात बसलो. थोड्याच वेळात गाडीने स्टेशन सोडले व गाडी वेगाने धावू लागली. डब्यामध्ये प्रत्येकाला व्यवस्थित जागा मिळाली होती. प्रत्येकाने आपापले जेवणाचे डबे आणले होते, ते उघडून सर्वांनी जेवायला सुरुवात केली. डब्यामध्ये सर्वत्र जेवणाचा वास दरवळला होता. डब्यातील माझ्या सहप्रवाशाशी संवाद साधण्याची चांगली वेळ आहे असा विचार करून मी माझा परिचय करून दिला,  “माझ नाव आलोक आणि मी इस्रो ( ISRO ) मध्ये शास्‍त्रज्ञ आहे. आज अचानक मला गावी जावे लागत आहे, म्हणून या साधारण श्रेणीच्या डब्यात मी चढलो. अन्यथा मी ए.सी.डब्ब्याशिवाय प्रवास करत नाही.”

ते सज्जन गृहस्थ माझ्याकडे पाहून हसले व म्हणाले, “अरे वा ! म्हणजे माझ्या बरोबर आज एक शास्त्रज्ञ प्रवास करीत आहेत. ते म्हणाले, “माझ नाव जगमोहन राव आहे. मी वारंगळ येथे चाललो आहे. तिथे जवळच्या एका गावामधे मी राहतो. मी बऱ्याच वेळा शनिवारी घरी जातो.”

एवढे बोलून त्यांनी आपली बॅग उघडली व त्यातून आपला जेवणाचा डबा काढला व म्हणाले, “हे माझ्या घरचे जेवण आहे, तुम्ही घेणार का?”

माझ्या संकोची स्वभावामुळे, मी नकार दिला व माझ्या बॅग मधील सँडविच काढून, खाऊ लागलो.

खाताना मी मनाशीच विचार करीत होतो की, ‘जगमोहन राव ‘ हे नाव मी कुठेतरी ऐकल्या सारखे वाटतेय, पण आठवत नाही.

काही वेळातच सर्व लोकांची जेवणे झाली व सगळे झोपण्याची तयारी करू लागले. माझ्या समोरच्या बर्थवर एक कुटुंब होते. आई वडील व दोन मोठी मुले होती. ते पण झोपण्याच्या तयारीला लागले आणि मी एका बाजूला बसून मोबाईल मधील गेम खेळू लागलो.

रेल्वे वेगात धावू लागली होती. अचानक माझे लक्ष समोरच्या बर्थवर झोपलेल्या 55 – 57 वर्षाच्या त्या सज्जन गृहस्थाकडे गेले, तर ते तळमळत होते व त्यांच्या तोंडातून फेस बाहेर येत होता. त्यांचा परिवार घाबरून जागा झाला व त्यांना पाणी पाजू लागला. पण ते गृहस्थ बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. मदतीसाठी मी जोराने ओरडलो, “अरे कोणीतरी डॉक्टरांना बोलवा. इमर्जन्सी केस आहे.”

पण रात्रीच्या वेळी स्लीपर श्रेणीच्या डब्यात डॉक्टर कुठला मिळणार? त्यांचा सारा परिवार त्यांची असहाय्य अवस्था पाहून रडायला लागला. तेवढ्यात माझ्या सोबतचे जगमोहन राव जागे झाले व त्यांनी मला विचारले, “काय झाले?”

मी त्यांना सर्व वृत्तान्त सांगितला. त्यांनी ताबडतोब आपली बॅग उघडली. त्यातून स्टेथोस्कोप काढला व त्या गृहस्थाला तपासू लागले.

काही मिनिटातच त्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे जाळे पसरले, परंतु ते काही बोलले नाहीत. मात्र त्यांनी आपल्या बॅगेतून इंजेक्शन काढले आणि त्या गृहस्थाला छातीत इंजेक्शन दिले. त्यानंतर त्यांच्या छातीवर दाब देऊन, तोंडाला रुमाल लावून त्यांनी तोंडावाटे त्याला श्वास देण्यास सुरुवात केली. काही वेळातच, त्या श्वासोच्छ्वासामुळे त्या गृहस्थांचे तडफडणे कमी झाले.

नंतर जगमोहन रावांनी आपल्या बॅगमधील काही गोळ्या त्या गृहस्थांच्या मुलाला दिल्या व सांगितले, “तुम्ही घाबरू नका. तुमच्या वडिलांना गंभीर हार्ट अटॅक आला होता पण मी इंजेक्शन दिल्यामुळे त्यांचा धोका आता टळला आहे. त्यांना आता या गोळ्या द्या.”

त्या मुलाने आश्चर्याने विचारलं, “पण आपण कोण आहात?”

ते म्हणाले, “मी एक डॉक्टर आहे. मी एका कागदावर त्यांच्या तब्येतीची माहिती व औषध लिहून देतो.  कृपया तुम्ही पुढच्या स्टेशन वर उतरा व त्यांना चांगल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करा.”

त्यांनी आपल्या बॅगमधून एक लेटर पॅड बाहेर काढले व लेटर पॅड वरील माहिती वाचल्यावर मला आठवले.

त्यावर छापले होते – डाॅ.जगमोहन राव, हृदय रोग तज्ञ, अपोलो हॉस्पिटल, चेन्नई.

आता मला आठवले की, काही दिवसांपूर्वी मी माझ्या वडिलांना अपोलो हॉस्पिटल मध्ये उपचाराकरिता घेऊन गेलो होतो, तेव्हा डॉक्टर जगमोहन रावांबद्दल ऐकले होते. त्या हॉस्पिटल मधील, ते सर्वात हुशार व वरिष्ठ हृदयरोग तज्ञ होते. त्यांची अपॉइंटमेंट घेण्याकरिता कित्येक महिने लागत असत. मी आश्चर्यचकित नजरेने त्यांच्याकडे पहात होतो. एवढा मोठा डॉक्टर रेल्वेच्या साधारण डब्यातून प्रवास करीत होता. आणि मी एक छोटा शास्त्रज्ञ – मी ए.सी. शिवाय प्रवास करत नाही अशा बढाया मारत होतो. आणि हे एवढे असामान्य, अलौकिक व्यक्तिमत्त्व असूनही सामान्य माणसासारखे वागत होते!

एवढ्यात पुढचे स्टेशन आले व ते आजारी गृहस्थ आणि त्यांचा परिवार टि.सी.च्या मदतीने खाली उतरले.

रेल्वे पुन्हा सुरू झाली. मी उत्सुकतेने त्यांना विचारले, “डॉक्टर! आपण तर आरामात ए.सीच्या डब्यातून प्रवास करू शकला असता, मग या सामान्य डब्यातून प्रवास का करता ?”

ते हसून म्हणाले, “मी जेव्हा लहान होतो, गावाकडे राहत होतो. तेव्हा माझ्या लक्षात आले की रेल्वेमध्ये विशेषतः सेकंड क्लासच्या डब्यामध्ये डॉक्टर उपलब्ध नसतात. त्यामुळे मी जेव्हा गावी जातो किंवा प्रवासाला जातो तेव्हा सामान्य डब्यातून प्रवास करतो. कारण कुणाला कधी डॉक्टरची गरज लागेल सांगता येत नाही. आणि मी डॉक्टर झालो ते लोकांची सेवा करण्याकरताच. आम्ही कोणाच्या उपयोगी पडलो नाही तर मग आमच्या शिक्षणाचा काय फायदा?”

नंतरचा प्रवास मी त्यांच्याशी गप्पा मारतच केला. पहाटेचे चार वाजले होते. वारंगल स्टेशन जवळ आले होते. ते उतरून गेले व बाकीचा प्रवास मी त्यांच्या सीटकडून येणाऱ्या सुगंधामध्ये न्हाऊन निघत पूर्ण केला. येथे एक महान माणूस बसलेला होता, जो हसत खेळत लोकांची दुःख वाटून घेत होता, प्रसिद्धीची हाव न बाळगता निरपेक्षपणे जनसेवा करीत होता.

आत्ता माझ्या लक्षात आले की डब्यात इतकी गर्दी असूनही हा सुगंध कसा काय जाणवत होता. तो सुगंध दरवळत होता त्या महान, असामान्य व्यक्तिमत्त्वाचा आणि एका पवित्र मनाच्या आत्म्याचा, ज्याने माझे विचार आणि जीवन दोन्ही सुगंधित करून टाकले होते.

म्हणूनच तर, “जसे आम्ही बदलू, तसे जग ही आपोआपच बदलेल.”

__♥️__

संग्राहिका :सुश्री प्रतिमा जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवन यात्रा ☆ आत्मसंवाद…भाग 5 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? जीवन यात्रा ?

☆ आत्मसंवाद…भाग 5 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

(मागील भागात आपण पाहिलं  – उज्ज्वला–मी अनुवादात घुसले. आणि चक्रव्यूहासारखी त्यातच अडकले. मग माझं स्वतंत्र कथालेखन थांबल्यासारखच झालं. आता इथून पुढे) 

मी – तुला कादंबरी लिहावीशी नाही वाटली?

उज्ज्वला – नाही. तेवढा स्टॅमिना मला नाही, असं वाटलं. तसंच मी नाटकाही लिहिलं नाही.

मी – पण संवाद माध्यम तू हाताळलं आहेस.

उज्ज्वला – हो. आकाशवाणीवरील कार्यक्रमात मी संवाद लिहिले आहेत. सांगली आकाशवाणीवर ‘प्रतिबिंब’ ही कौटुंबिक श्रुतिका सुरू झाली. पूर्वी मुंबईहून ‘प्रपंच’ मालिका सादर व्हायची. त्या स्वरूपाची. हे सादर १० वर्षे चालू होते. यात मी एकूण १०० तरी श्रुतिकांचं लेखन केलय. श्रोत्यांची पत्रे आणि त्यांनी प्रत्यक्ष भेटल्यावर दिलेल्या प्रतिक्रिया यातून लोकांना ते लेखन आवडल्याचं लक्षात आलं. अनेक जणी मला विचारायच्या, ‘आमच्या घरातले संवाद तुला कसे कळतात? ‘

मी – आणि तुझी नभोनाट्ये?

उज्ज्वला – माझी ५ नभोनाट्ये आकाशवाणीवरून प्रसारित झाली. त्यापैकी पहिले नभोनाट्य ‘इथे साहित्याचे साचे मिळतील’, हे मी स्वत: नेऊन दिले होते. इतर सर्व नाटके मी सबंधित विभागांच्या प्रमुखांनी सांगितली म्हणून मी लिहिली.

मी – म्हणजे?

उज्ज्वला – त्यावेळी शशी पटवर्धन नाट्यविभागाचे प्रमुख होते. एकदा त्यांनी मला बोलावलं . म्हणाले,’जागतिक आरोग्यदिन’ आहे. या निमित्ताने ‘फास्ट फूड’ या विषयावर नाटक लिहा.’ मी विचार करू लागले. ‘फास्ट फूड’वरून जुनी पिढी- नवी पिढी यातील वाद हा ठरीव विषय मनाला काही भिडेना. विचार करता करता मला ‘फास्ट फूड’च्या अनेक परी सुचल्या, जसे इंटलेक्चुअल ‘फास्ट फूड’ ( १० दिवसात १०वी मराठी, इतिहास, भूगोल, विज्ञान वगैरे…),  संस्कृतिक ‘फास्ट फूड’ (झट मंगनी, पट ब्याह, फट विभाजन ). तरी क्लायामॅक्स पॉइंट मिळेना. मग सुचलं, ‘जेनेटिक फास्ट फूड ‘. ९ महीने बाळंतपणासाठी लागतात. त्यामुळे स्त्रियांची कार्यशक्ती फुकट जाते. तेव्हा  त्या ९ आठवड्यात आणि पुढल्या काही वर्षात ,९ दिवसात बाळंतीण झाल्या तर… महिला कल्याण विभागाच्या अध्यक्षा संशोधनाला उत्तेजन देतायत. त्यांचा प्रयोग पूर्णत्वाला येऊ पहातोय . सर्व डाटा पी.सी. वर सुरक्षित आहे आणि त्याच वेळी विष्णु त्यात व्हायरस सोडून तो सगळा प्रयोगाचा तपशील डी लिट. करून टाकतो. फॅंटसीवर आधारलेलं हे नभोनाट्य छान जमून गेलं. आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून ते प्रसारित झालं. ही नाटिका मला लिहायला सांगितली नसती, तर लेखनाचा विषय म्हणून मला हे सुचलं नसतं. त्यामुळे माझ्या लेखनात योगायोगाचासुद्धा भाग आहे.

मी – पुढे यावर तू कथासुद्धा लिहिलीस. 

उज्ज्वला – हो. त्यानंतर थोड्याच दिवसात सावंतवाडीचा साहित्य संमेलनात, किस्त्रीमचे संपादक ह. मो. मराठे भेटले. ‘नवीन काय लिहिलय’ वगैरे बोलणं झालं. नुकतच ‘फास्ट फूड’ लिहिलेलं असल्यामुळे मी त्याबद्दल बोलले. ते म्हणाले, ‘ताबडतोब याचं कथा रूपांतरण कर आणि ‘स्त्री’कडे पाठव.’ नंतर ती कथा स्त्री’च्या महिला विनोद विशेषांकात आली. पुढे मी जेव्हा विनोदी कथांचं पुस्तक काढलं, तेव्हा त्याचं नाव ‘फास्ट फूड’च दिलं.

मी – तुझ्या आणि नभोनाट्यांचं काय?

उज्ज्वला – तिसरं नभोनाट्य मी एड्स्वर लिहिलं. ‘सुनीलची डायरी’ म्हणून. तेही त्यांच्याच सांगण्यावरून. हेही आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून प्रसारित झालं होतं. यासाठी मला आर्यापाइकी अभ्यास कारावा लागला होता. त्यानंतर ‘पठ्ठे बापूराव’ यांच्यावर ‘नाही तर रंग पुन्हा सुना सुना..’ हे नभोनाट्य झालं. शेवटचं नभोनाट्य ‘सावित्री’ ( सावित्रीबाई फुले) मी संजय पाटील यांच्या सांगण्यावरून लिहिलं.त्यानंतर आकाशवाणीकडून मला पुन्हा काही बोलावणं आलं नाही आणि माझं नभोनाट्य लेखन थांबलं.

मी – तू अनुवादाकडे कशी वळलीस?

क्रमश: ….

©  श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ केतकी जानी ☆ संग्राहिका – सौ. स्मिता पंडित ☆

?इंद्रधनुष्य?

केतकी जानी ☆ संग्राहिका – सौ. स्मिता पंडित ☆

आज एका अतिशय वेगळ्या व्यक्तिमत्त्वाला पाहण्या भेटण्या, ऐकण्याचा योग मैत्र या आमच्या ग्रुप मुळे आला! मूळ अहमदाबादच्या पुण्यात नोकरी करणाऱ्या दोन मुलांच्या आईचे केस अचानक जाऊ लागतात. ऍलोपेशिया असे निदान होते. steroids मुळे 85 kg वजन झाले. पूर्ण केस गेल्याने विद्रुपता आली. लोकांच्या नजरा, प्रश्नोत्तरे, केविलवाणी मुले, सतत विग किंवा स्कार्फ वापरणे याने जेरीला आली. लोकांना कॅन्सरची शंका येई! तुमची आई वारणार सोसायटीतील मुले हिच्या मुलांना म्हणत! नैराश्यात जाऊन स्टूल, दुपट्टा असा सरंजाम पंख्याखाली मांडला आणि समोरच्या खोलीत झोपलेल्या मुलांकडे पाहून विचार बदलला आणि ती पण आमूलाग्र बदलली!

दुसऱ्या दिवशी विग फेकून दिला, स्कार्फ टाकून दिला!  लोकांच्या नजरा चुकवण्यासाठी, प्रश्न टाळण्यासाठी वेळेआधी ऑफिसला पोचून वेळेनंतर बाहेर पडणारी ताठ मानेने, आनंदी चेहऱ्याने वेळेत ऑफिसला पोचू लागली, बाहेर पडू लागली.

मी जशी आहे तशीया भावनेने स्वतःवर प्रेम करू लागली! पूर्ण लाईफ स्टाईल बदलली.  आहार, व्यायाम, योगा, सकारात्मकता यांची कास धरली! नवी क्षेत्रे, यशाच्या वाटा खुणावू लागल्या.

मॉडेलिंग ला निवड झाली आणि मागे वळून पाहिले नाही बालभारती मधील नोकरी आणि शनि रवि मॉडेलिंग!

Mrs Universe 2018

Mrs Confidence

अशी खूप खूप बक्षिसे मिळवली!

सकारात्मक आणि आनंदी वृत्तीने आपले न्यून मागे टाकून पाय रोवून आयुष्यात उभी राहिली! केसांविना डोक्यावर अपार वेदना सोसून पूर्ण गोंदवून घेतले.

तिचा जन्म झाल्यावर आजी म्हणाली पत्थर जन्मला!

मुलगा मोठा झाल्यावर म्हणाला , आजीला कळले नाही तो  हिरा होता!

उपेक्षित आणि खडतर गेलेल्या बालपणाने पुढचे आघात ती झेलू शकली!

तिच्यासारख्या स्त्रियांसाठी आधार गट स्थापन करायचा तिचा मानस आहे.

‘अग्निजा’ तिच्या आयुष्यावर आधारित पुस्तक गुजराती भाषेत प्रसिद्ध झाले आहे. ते अनेकांना प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही.

संग्राहिका : स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ परिहार जी का साहित्यिक संसार #130 ☆ व्यंग्य – व्यंग्यकार की शोकसभा ☆ डॉ कुंदन सिंह परिहार

डॉ कुंदन सिंह परिहार

(वरिष्ठतम साहित्यकार आदरणीय  डॉ  कुन्दन सिंह परिहार जी  का साहित्य विशेषकर व्यंग्य  एवं  लघुकथाएं  ई-अभिव्यक्ति  के माध्यम से काफी  पढ़ी  एवं  सराही जाती रही हैं।   हम  प्रति रविवार  उनके साप्ताहिक स्तम्भ – “परिहार जी का साहित्यिक संसार” शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते  रहते हैं।  डॉ कुंदन सिंह परिहार जी  की रचनाओं के पात्र  हमें हमारे आसपास ही दिख जाते हैं। कुछ पात्र तो अक्सर हमारे आसपास या गली मोहल्ले में ही नज़र आ जाते हैं।  उन पात्रों की वाक्पटुता और उनके हावभाव को डॉ परिहार जी उन्हीं की बोलचाल  की भाषा का प्रयोग करते हुए अपना साहित्यिक संसार रच डालते हैं।आज  प्रस्तुत है आपका एक अतिसुन्दर व्यंग्य  ‘व्यंग्यकार की शोकसभा’। इस अतिसुन्दर व्यंग्य रचना के लिए डॉ परिहार जी की लेखनी को सादर नमन।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – परिहार जी का साहित्यिक संसार  # 130 ☆

☆ व्यंग्य – व्यंग्यकार की शोकसभा

शहर के जाने-माने व्यंग्यकार अनोखेलाल ‘बेदिल’ अचानक ही भगवान को प्यारे हो गये। दरअसल हुआ यह कि एक स्थानीय अखबार के पत्रकार ने उनके नये व्यंग्य-संग्रह ‘गधे की दुलत्ती’ की समीक्षा छापी थी, जिसमें संग्रह की रचनाओं को घटिया और बचकानी बताया गया था। समीक्षा छपने के दो घंटे बाद ही ‘बेदिल’ जी को दिल का दौरा पड़ा था और उन्हें अस्पताल में भर्ती करना पड़ा था। उनके दिल को लगा धक्का इतना ज़बरदस्त था कि दो दिन अस्पताल में रहने के बाद वे इस बेवफा दुनिया को अलविदा कह गये।

उनके निधन पर तत्काल दो तीन व्यंग्यकारों ने एक वक्तव्य देकर समीक्षा करने वाले पत्रकार की कठोर भर्त्सना की और शहर के साहित्य-जगत को हुई इस अपूरणीय क्षति के लिए उसे सीधे सीधे ज़िम्मेदार ठहराया।साथ ही अखबार के प्रबंधन से अपील की कि दोषी पत्रकार के खिलाफ कठोर कार्यवाही की जाए।

श्मशान में ‘बेदिल’ जी को विदाई देने के लिए 15-20 व्यंग्यकार इकट्ठे हुए।उन्हें उनके कंधों पर लटकते झोलों से पहचाना जा सकता था।सब वहाँ बनी सीमेंट की बेंचों पर बैठकर कार्यक्रम संपन्न होने का इंतज़ार करने लगे।

अचानक पता चला कि ‘बेदिल’ जी के दामाद वायु-मार्ग से आ रहे हैं और उन्हें वहाँ पहुँचने में कम से कम एक घंटा लग जाएगा।तब तक कार्यक्रम रुका रहेगा।

नगर के एक और सक्रिय व्यंग्यकार बेनी प्रसाद ‘खंजर’ के दिमाग़ में कुछ कौंधा और उन्होंने दो तीन साथियों से खुसुर-पुसुर की। उसके बाद उन्होंने सभी व्यंग्यकारों को सभा-भवन में इकट्ठा होने के लिए इशारा करना शुरू किया, कुछ उसी तरह जैसे शादियों में मेहमानों को भोजन- कक्ष में पहुंचने का इशारा किया जाता है।

सारे व्यंग्यकार सभा-भवन में इकट्ठे हो गए। ‘खंजर’ जी उनसे बोले, ‘भाइयो, अभी कार्यक्रम में कम से कम एक घंटा लगेगा। सोचा, क्यों न ‘बेदिल’ जी के सम्मान में एक व्यंग्य-गोष्ठी करके इस समय का सदुपयोग कर लिया जाए। इसलिए आप लोगों से अनुरोध है एक एक व्यंग्य सभी पढ़ें। आपके मोबाइल में रचनाएँ तो होंगी ही।’

एक व्यंग्यकार बोले, ‘हमने तो मोबाइल में नहीं डालीं।’

खंजर जी बोले, ‘स्मरण-शक्ति से सुना दीजिए। थोड़ा बहुत हेरफेर होगा, और क्या?’

दो तीन व्यंग्यकार अपना झोला बजाकर बोले, ‘हम तो हर जगह अपनी कॉपी लेकर चलते हैं। पता नहीं कहाँ पढ़ना पड़ जाए।’

व्यंग्य-गोष्ठी शुरू हो गयी। सभी पूरे जोश और तन्मयता से पढ़ते रहे। इस बीच दामाद साहब आ गये और उधर का कार्यक्रम शुरू हो गया।

थोड़ी देर में संदेश आया कि सब लोग चिता की परिक्रमा को पहुँचें। तत्काल तीन चार व्यंग्यकारों ने हाथ उठा दिया। कहा, ‘हम तो रह गये। यह ठीक नहीं है। हमें भी पढ़ने का मौका मिलना चाहिए।’

‘खंजर’ जी ने उन्हें आश्वस्त किया,कहा, ‘यहाँ अभी शोकसभा होगी। उसके बाद आप लोग यहीं रुके रहिएगा। कोई जाएगा नहीं। बचे हुए लोगों को भी अपनी रचना पढ़ने का मौका दिया जाएगा।’

शोकसभा के बाद सभी व्यंग्यकार वहीं रुके रहे। दूसरे लोगों के जाने के बाद गोष्ठी फिर शुरू हो गयी और बाकी व्यंग्यकारों को भी अपनी रचना पढ़ने का सुखद अवसर प्राप्त हुआ। उसके बाद सभी व्यंग्यकार ‘बेदिल’ जी के प्रति कृतज्ञता से भरे हुए अपने घर को रवाना हुए।

© डॉ कुंदन सिंह परिहार

जबलपुर, मध्य प्रदेश

 संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

English Literature – Poetry ☆ Anonymous litterateur of Social Media# 82 ☆ Captain Pravin Raghuvanshi, NM ☆

Captain Pravin Raghuvanshi, NM

☆ Anonymous Litterateur of Social Media # 82 (सोशल मीडिया के गुमनाम साहित्यकार # 82) ☆

Captain Pravin Raghuvanshi —an ex Naval Officer, possesses a multifaceted personality. He served as a Senior Advisor in prestigious Supercomputer organisation C-DAC, Pune. He was involved in various Artificial Intelligence and High-Performance Computing projects of national and international repute. He has got a long experience in the field of ‘Natural Language Processing’, especially, in the domain of Machine Translation. He has taken the mantle of translating the timeless beauties of Indian literature upon himself so that it reaches across the globe. He has also undertaken translation work for Shri Narendra Modi, the Hon’ble Prime Minister of India, which was highly appreciated by him. He is also a member of ‘Bombay Film Writer Association’.

Captain Raghuvanshi is also a littérateur par excellence. He is a prolific writer, poet and ‘Shayar’ himself and participates in literature fests and ‘Mushayaras’. He keeps participating in various language & literature fests, symposiums and workshops etc. Recently, he played an active role in the ‘International Hindi Conference’ at New Delhi.  He presided over the “Session Focused on Language and Translation” and also presented a research paper.  The conference was organized by Delhi University in collaboration with New York University and Columbia University.

हिंदी साहित्य – आलेख ☆ अंतर्राष्ट्रीय हिंदी सम्मेलन ☆ कैप्टन प्रवीण रघुवंशी, एन एम्

In his naval career, he was qualified to command all types of warships. He is also an aviator and a Sea Diver; and recipient of various awards including ‘Nao Sena Medal’ by the President of India, Prime Minister Award and C-in-C Commendation.

Captain Pravin Raghuvanshi is also an IIM Ahmedabad alumnus.

His latest quest involves social media, which is filled with rich anonymous literature of nameless writers, shared on different platforms, like,  WhatsApp / Facebook / Twitter / Your quotes / Instagram etc. in Hindi and Urdu, he has taken the mantle of translating them as a mission for the enjoyment of the global readers. Enjoy some of the Urdu poetry couplets as translated by him.

हम ई-अभिव्यक्ति के प्रबुद्ध पाठकों के लिए आदरणीय कैप्टेन प्रवीण रघुवंशी जी के “कविता पाठ” का लिंक साझा कर रहे हैं। कृपया आत्मसात करें।

फेसबुक पेज लिंक  >>  कैप्टेन प्रवीण रघुवंशी जी का “कविता पाठ” 

☆ English translation of Urdu poetry couplets of  Anonymous litterateur of Social Media# 82☆

❃ ❃ ❃ ❃ ❃ ❃ ❃ ❃

मेरी उदासियाँ तुम्हें

नज़र आएँगी भी कैसे

तुम जब भी देखते हो

हम मुस्कुराने लगते हैं…

 

How would you ever

notice my sadness

Whenever you look at me

I begin to smile…!

❃ ❃ ❃ ❃ ❃ ❃ ❃ ❃

तहजीब, अदब और सलीका

भी तो कोई चीज़ है…

झुका हुआ हर शख्स भला

बेचारा तो नहीं होता…!

 

Etiquettes, manners and grace

are something to reckon with

Every bowed down person is

not necessarily a destitute…!

❃ ❃ ❃ ❃ ❃ ❃ ❃ ❃

 ये तेरा वहम है कि

हम तुम्हें भूल जाएंगे ,

वो ‪शहर तेरा होगा, जहाँ

बेवफा लोग बसा करते हैं…

It’s your delusion only

that I’ll forget you,

That city will be yours where

unfaithful people live…!

 

❃ ❃ ❃ ❃ ❃ ❃ ❃ ❃

© Captain Pravin Raghuvanshi, NM

Pune

≈ Editor – Shri Hemant Bawankar/Editor (English) – Captain Pravin Raghuvanshi, NM ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ संजय उवाच# 128 ☆ स्टैच्यू…(2) ☆ श्री संजय भारद्वाज

श्री संजय भारद्वाज

(“साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच “ के  लेखक  श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।श्री संजय जी के ही शब्दों में ” ‘संजय उवाच’ विभिन्न विषयों पर चिंतनात्मक (दार्शनिक शब्द बहुत ऊँचा हो जाएगा) टिप्पणियाँ  हैं। ईश्वर की अनुकम्पा से आपको  पाठकों का  आशातीत  प्रतिसाद मिला है।”

हम  प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते रहेंगे। आज प्रस्तुत है  इस शृंखला की अगली कड़ी । ऐसे ही साप्ताहिक स्तंभों  के माध्यम से  हम आप तक उत्कृष्ट साहित्य पहुंचाने का प्रयास करते रहेंगे।)

☆ संजय उवाच # 128 ☆ स्टैच्यू…(2) ?

आलस्य रोदनं वापि भयं कर्मफलोद्भवम्।
त्वयीमानि न शोभन्ते जहि मनोबलैः॥

अर्थात अपनी इच्छाशक्ति की सहायता से आलस्य और रुदन छोड़ो, प्रारब्ध से मत डरो- ये सब तुम्हें शोभा नहीं देते।… इच्छाशक्ति सीधी परमात्मा के पास से आती है। तुम अपनी दृढ़ इच्छाशक्ति के बल पर जो चाहो, कर सकते हो।

‘स्टैच्यू’ शृंखला में आज इच्छाशक्ति के धनी एक और अनन्य व्यक्तित्व की चर्चा करेंगे। नाम है, स्टीफन विलियम हॉकिंग, प्रसिद्ध भौतिकी एवं ब्रह्मांड विज्ञानी। इक्कीस वर्ष की आयु में स्टीफन मोटर न्यूरॉन नामक असाध्य बीमारी के शिकार हुए। इस रोग में मनुष्य के सारे अवयव शनै:- शनै: काम करना बंद कर देते हैं। आगे चलकर श्वसन-नलिका भी बंद पड़ जाती है और व्यक्ति की मृत्यु हो जाती है। अलबत्ता मस्तिष्क को यह रोग नुकसान नहीं पहुँचा पाता।

स्टीफन के इस रोग से ग्रसित होने के बाद डॉक्टरों के अनुसार उनके पास जीवन के थोड़े ही वर्ष शेष बचे थे। अपार मेधा और अजेय इच्छाशक्ति के धनी स्टीफन बुदबुदाये,” मैं अभी 50 साल और जीऊँगा।”

इक्कीस वर्ष की अवस्था में कहे इस वाक्य को स्टीफन की जिजीविषा ने प्रमाणित कर दिया। उनका देहांत 76 वर्ष की आयु में हुआ।

मोटर न्यूरॉन के चलते उनके शरीर के सभी अवयव निष्क्रिय होने लगे। धीरे-धीरे पक्षाघात ने देह को जकड़ लिया। एक विशेष व्हीलचेयर पर उनका जीवन बीता। अपने सक्रिय मस्तिष्क की सहायता और व्हील चेयर पर लगाए विभिन्न बटनों के माध्यम से उन्होंने न केवल प्रकृति प्रदत्त शारीरिक पंगुता का सामना किया अपितु भौतिकी और ब्रह्मांड विज्ञान में अनेक अनुसंधान भी किए। अपनी आवाज़ खोने के बाद उन्होंने हस्तचालित स्विच से चलाये जा सकने वाले स्पीच जेनेरेटिंग डिवाइस के माध्यम से संवाद बनाये रखा। बीमारी के बढ़ते प्रभाव के कारण इस उपकरण को बाद में गाल की माँसपेशी की सहायता से सक्रिय किया गया।

स्टीफन हॉकिंग द्वारा विशेषकर ब्रह्मांड विज्ञान के क्षेत्र में प्रतिपादित सिद्धांतों को व्यापक स्वीकृति मिली। वैश्विक स्तर पर उन्हें अनेक सम्मान और पुरस्कार मिले। इनमें अमेरिका का सर्वोच्च सम्मान, ‘प्रेसेडेंशियल मेडल ऑफ फ्रीडम’ भी सम्मिलित है।

स्टीफन के संघर्ष के मूल में थी, उनकी जिजीविषा। स्टैच्यू बनी देह के भीतर बसी इस प्रवहमान जिजीविषा ने इतिहास रच दिया। उन्होंने जीवन ऐसा जिया कि समीप आकर खड़ी मृत्यु को उनकी देह ग्रसने के लिए 56 वर्ष तक प्रतीक्षा करनी पड़ी।

शायद ऐसे ही बिरले लोगों के लिए कन्हैयालाल नंदन जी ने लिखा था,

जीवन के साथ थोड़ा बहुत / मृत्यु भी मरती है, इसलिए मृत्यु / जिजीविषा से बहुत डरती है..!

जीवन परमात्मा की देन है। जिजीविषा भी परमात्मा की दी हुई है। अपने जिजीविषा का उपयोग ना करना परमात्मा के प्रति कृतघ्न होना है। वैदिक दर्शन ने जिजीविषा को सर्वोच्च स्थान इसीलिए तो दिया है। आलेख के आरम्भ में उल्लेखित ‘आलस्य रोदनं…’ जैसा उद्घोष इसीके अनुरूप है।

ऐसे ही उद्घोष किसी स्टीफन हॉकिंग को बनाते हैं जो उद्घोष में प्राण संचारित कर शब्दों को जीवित कर देता है। मानवजाति का अनुभव जानता है कि जिसने शब्दों में प्राण फूँककर प्रेरणा को साकार कर लिया हो, उस को किसी तरह का कोई ‘स्टैच्यू’ बांध नहीं सकता।..इति।

© संजय भारद्वाज

☆ अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार  सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय  संपादक– हम लोग  पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – सलिल प्रवाह #83 ☆ सॉनेट गीत – मानव ☆ आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’ ☆

आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’

(आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’ जी संस्कारधानी जबलपुर के सुप्रसिद्ध साहित्यकार हैं। आपको आपकी बुआ श्री महीयसी महादेवी वर्मा जी से साहित्यिक विधा विरासत में प्राप्त हुई है । आपके द्वारा रचित साहित्य में प्रमुख हैं पुस्तकें- कलम के देव, लोकतंत्र का मकबरा, मीत मेरे, भूकंप के साथ जीना सीखें, समय्जयी साहित्यकार भगवत प्रसाद मिश्रा ‘नियाज़’, काल है संक्रांति का, सड़क पर आदि।  संपादन -८ पुस्तकें ६ पत्रिकाएँ अनेक संकलन। आप प्रत्येक सप्ताह रविवार को  “साप्ताहिक स्तम्भ – सलिल प्रवाह” के अंतर्गत आपकी रचनाएँ आत्मसात कर सकेंगे। आज प्रस्तुत है आचार्य जी द्वारा रचित  ‘सॉनेट गीत – मानव।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – सलिल प्रवाह # 83 ☆ 

☆ सॉनेट गीत – मानव ☆

(विधा- अंग्रेजी छंद, शेक्सपीरियन सॉनेट)

मानव वह जो कोशिश करता।

कदम-कदम नित आगे बढ़ता।

गिर-गिर, उठ-उठ फिर-फिर चलता।।

असफल होकर वरे सफलता।।

 

मानव ऐंठे नहीं अकारण।

लड़ बाधा का करे निवारण।

शरणागत का करता तारण।।

संयम-धैर्य करें हँस धारण।।

 

मानव सुर सम नहीं विलासी।

नहीं असुर सम वह खग्रासी।

कुछ यथार्थ जग, कुछ आभासी।।

आत्मोन्नति हित सदा प्रयासी।।

 

मानव सलिल-धार सम निर्मल।

करे साधना सतत अचंचल।।

 

©  आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’

२७-२-२०२२

संपर्क: विश्ववाणी हिंदी संस्थान, ४०१ विजय अपार्टमेंट, नेपियर टाउन, जबलपुर ४८२००१,

चलभाष: ९४२५१८३२४४  ईमेल: [email protected]

 संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ आलेख – आत्मानंद साहित्य #112 ☆ वसंत/मधुमास ☆ श्री सूबेदार पाण्डेय “आत्मानंद” ☆

श्री सूबेदार पाण्डेय “आत्मानंद”

☆ साप्ताहिक स्तम्भ – आत्मानंद साहित्य# 112 ☆

☆ ‌आलेख – आत्मानंद साहित्य #112 ☆ ‌वसंत /मधुमास ☆ श्री सूबेदार पाण्डेय “आत्मानंद” ☆

इस धरती पर अनेक सभ्यता अनेक संस्कृति अनेक प्रकार के आहार विहार , तथा रहन सहन देश काल प्राकृतिक परिस्थितियों के अनुसार, व्यवहार में प्रयुक्त होते है, कहीं कहीं बारहों मास एक जैसा प्राकृतिक  मौसम रहता है, इसी धरती पर कहीं  बारहों मास बरसात होती है तो कहीं भयानक  ठंड पड़ती है, तो कहीं मरूस्थलीय इलाके बिना बरसात के सूखे रहते हैं , लेकिन एक मात्र भारत वर्ष ही एकमात्र ऐसा देश है जहां  जाड़ा, गर्मी, बरसात, चार चार महीने के तीन मौसम है तो, दो दो महीने की छः ऋतुएं है जिसमें उष्म, ग्रीष्म,  शरद,  शिशिर, हेमंत, वसंत है ,यहां हमारी परिचर्चा का विषय वसंत/मधुमास है इस लिए चर्चा की विषय वस्तु  भी यही है।

हेमंत ऋतु की अवसान बेला के अंत में बसंत ऋतु का आगमन होता है ,उसका धरती पर प्राकट्योत्सव  हिंदू पंचांग के अनुसार माघ मास की  शुक्ल पक्ष की पंचमी तिथि को, मनाया जाता है, बसंत के आगमन का संदेश खेतों में खिले सरसों के पीले पीले फूल मटर के सफेद गुलाबी फूल तथा अलसी के नीले रंग के फूल देते हैं, वृक्ष में  फूटती हुई कोंपले तथा उनके भीतर से निकले नव पल्लव  प्रकृति के सम्मोहक स्वरूप का दर्शन कराते है और मानव जीवन को नव चेतना तथा उमंग उत्साह से भर देते है। वसंत पंचमी, महाशिवरात्रि तथा होली बासंती पर्व है,इनका बड़ा ही गहरा नाता प्राकृतिक रूप भारतीय  जीवन पद्धति से जुड़ा है। वहीं पर मधु मास का आरंभ चैत्र मास के शुक्ल पक्ष के प्रथम तिथि एकम से आरंभ होता है,इसी पक्ष के प्रथम तिथि से

बासंतिक नवरात्र आरंभ होता है, तथा नवमी तिथि को रामनवमी के दिन  रामजन्म के त्यौहार के रूप में मनाया जाता है। और उसी दिन शारदीय नवरात्र का समापन होता है।

मधुमास के बारे में राम जन्म के प्रसंग में मधुमास का वर्णन करते हुए गोस्वामी तुलसीदास जी लिखते हैं कि—–

नवमी तिथि मधुमास पुनीता।

सुखद पक्ष अभिजित हरि प्रीता।।

मध्यदिवस अति शीत न घामा।

पावन काल लोक विश्रामा।।

(रा०च०मा०बा०का०)

यह बसंत ऋतु के शैशव तथा युवा से प्रौढ़ावस्था में प्रवेश कर मधुमास के आगमन का संकेत देता है। इस समय बहुत तेजी के साथ प्राकृतिक परिवर्तन होता है। खेतों में फसलों की बालियां दानों से लद जाती है। बाग बगीचों अमराई में आम्र मंजरियों  कटहल तथा महुआ के फूलों और मधुमक्खियों के छत्तों से मधुरस टपकने लगता है, बगीचों से होकर गुजरने वाली भोर की ठंडी हवा के झोंको पर सवार  हो मादक सुगंध लेकर  सैर को निकलने वाली हवा मानव मन तथा जीवन को एक

अलग ही मस्ती से भर देती है, रामनवमी तथा बैसाखी का उत्सव मधुमास के त्योहार है , जिसमें पकने वाली फसलें खेत खलिहानों को समृद्ध कर देते हैं बगीचों में आम के टिकोरे, तथा  बगीचों की कर्मचारियों में खिलने वाले  गेंदा बेला गुलाब डहेलिया के पुष्प आकर्षक नजारों के मोह पास में मानव को जकड़ देते हैं ।  तभी तो ऋतु राज वसंत को कामदेव का प्रतिनिधि कहा जाता है ,और काम के प्रहार से नवयुवा मन त्राहि-त्राहि कर उठता है, और बिरहिनि का मन आकुल व्याकुल हो उठता है।

जिसमें संयोग जहां सुखद अनुभूति कराता है वहीं बियोग चैता तथा होली गीतों के सुर के साथ मुखरित हो उठता है।

– सूबेदार  पांडेय “आत्मानंद”

संपर्क – ग्राम जमसार, सिंधोरा बाज़ार, वाराणसी – 221208, मोबा—6387407266

 संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कविता ☆ “श्री रघुवंशम्” ॥ हिन्दी पद्यानुवाद सर्ग # 13 (56-60)॥ ☆ प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ ☆

॥ श्री रघुवंशम् ॥

॥ महाकवि कालिदास कृत श्री रघुवंशम् महाकाव्य का हिंदी पद्यानुवाद : द्वारा प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

☆ “श्री रघुवंशम्” ॥ हिन्दी पद्यानुवाद सर्ग #13 (56 – 60) ॥ ☆

सर्गः-13

 

या काला गुरू से लिखित चंदन चर्चित भूमि।

कहीं मेघ-छाया सहित चंद्र-ज्योत्सना वाम।।

 

कहीं शोभती शरद की मेघ पंक्ति सी साफ।

जिसके बिखरे जाल से दिखता है आकाश।।56।।

 

और कहीं भस्मी लगा शिव का रूप विशाल।

जिनकी ग्रीवा पै सजी कृष्ण-नाग की माल।।57।।

 

गंगा-यमुना मिलन स्थल में कर के स्नान।

मृत्यु बाद पाता हरेक प्राणी पद निर्वाण।।58।।

 

श्रृंगवेरपुर यह वही जहाँ थे मिले निषाद।

जहाँ मौलिमणि त्याग कर किया जटाँ का ताज।।59अ।।

 

जहाँ देख यह रो पड़े थे सारथी सुमंत्र।

कह- ‘केकई पूरी हुई तेरे मन की अन्त’’।।59ब।।

 

मूल प्रकृति ही बुद्धि को करती है उत्पन्न।

सांख्य ज्ञान की मान्यता करती यह उपपन्न।।60अ।।

 

जिसके पद्यरज लगाती यक्षिणि कर स्नान।

त्योंहि मानसर सरयू का है उद्गम स्थान।60ब।।

 

© प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’   

A १, विद्युत मण्डल कालोनी, रामपुर, जबलपुर. म.प्र. भारत पिन ४८२००८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares