ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १० मार्च -संपादकीय -सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी)
वि. वा. शिरवाडकर
विष्णू वामन शिरवाडकर (27 फेब्रुवारी 1912 ते 10 मार्च 1999) हे मराठीतील अग्रगण्य कवी, लेखक, कथाकार, नाटककार वगैरे होते. ‘कुसुमाग्रज’ या टोपणनावाने त्यांनी कविता लिहिल्या.
त्यांचे वास्तव्य नाशिकमध्ये होते.
सामाजिक आस्था, क्रांतिकारक वृत्ती, शब्दकलेवरचे प्रभुत्व ही त्यांच्या साहित्याची प्रमुख वैशिष्ट्ये. त्यांनी पौराणिक व ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वातील मानवी वृत्तीचा शोध घेतला. ईश्वरासंबंधी प्रश्न उपस्थित केले आणि माणसाच्या समग्रतेचे आकलन करायचा प्रयत्न केला.’पृथ्वीचे प्रेमगीत’सारख्या कवितेतून त्यांच्या प्रतिभेची उत्तुंग झेप प्रत्ययास येते. त्यांचे समृद्ध व प्रगल्भ व्यक्तिमत्त्व त्यांच्या साहित्यात प्रतिबिंबित झाले आहे.
त्यांची पुस्तके :
‘विशाखा’, ‘ वादळवेल’ इत्यादी 22कवितासंग्रह.
‘नटसम्राट’, ‘वीज म्हणाली धरतीला’ वगैरे 22 नाटके.
7 लघुनिबंध व इतर लेखनाचे संग्रह.
9 कथासंग्रह.
‘कल्पनेच्या तीरावर ‘ वगैरे 3 कादंबऱ्या.
‘वाटेवरच्या सावल्या’ हे आठवणीपर पुस्तक.
काही एकांकिका संग्रह.
याव्यतिरिक्त त्यांनी चित्रपटांसाठी पटकथा लिहिल्या आहेत.
‘सती सुलोचना’ या धार्मिक चित्रपटात त्यांनी अभिनेता म्हणूनही काम केले आहे.
सुरुवातीच्या काळात ते नियतकालिकात व वृत्तपत्रात संपादक होते.
याशिवाय ‘कुसुमाग्रजां’वर इतरांनी लिहिलेली सहा पुस्तके व वि. वा. शिरवाडकरांवर लिहिलेली दोन पुस्तके प्रसिद्ध आहेत.
त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. त्यापैकी काही :
1991 साली साहित्यक्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना ‘पद्मभूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
त्यांच्या ‘विशाखा’ या कवितासंग्रहासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. वि. स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते.
‘नटसम्राट’ या नाटकासाठी त्यांना साहित्य अकॅडमी पुरस्कार मिळाला.
1986मध्ये पुणे विद्यापीठाने त्यांना ‘डी. लिट.’ पदवी प्रदान केली.
अंतराळातील एका ताऱ्यास ‘कुसुमाग्रज’ हे नाव देण्यात आले.
त्यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी हा ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो.
शिवाय त्यांच्या नावानेही अनेक पुरस्कार दिले जातात.
10 मार्च 1999 रोजी त्यांचे देहावसान झाले असले, तरी मराठी साहित्यात ते अमर आहेत.
त्यांना ई -अभिव्यक्ती परिवारातर्फे सादर अभिवादन.
सौ. गौरी गाडेकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : शिक्षण मंडळ, कऱ्हाड, शताब्दी दैनंदिनी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ स्त्री कालची आणि आजची…! भाग १ ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆
‘कशी आहे ती?’ नारीशक्ती वरील एक लेख सहज वाचनात आला! खरंच कशी आहे स्त्री?-स्त्री ही घराची शोभा! संसाराचा गाडा ओढणारी, कुटुंबाशी निगडित असलेली व्यक्ती! फार प्राचीन काळी गार्गी, मैत्रेयी सारख्या विद्वान स्त्रिया होऊन गेल्या. त्यानंतरच्या काळातही अहिल्या, द्रौपदी, तारा,सीता, मंदोदरी यासारख्या पंचकन्यांना स्त्री सन्मान मिळाला.त्यानंतर जिजाऊ,राणी लक्ष्मीबाई, ताराराणी यांसारख्या कर्तृत्ववान स्त्रिया होऊन गेल्या. पण मध्यंतरी चा एक काळ असा आला की स्त्रीला चूल आणि मूल या चक्रात अडकून पडावे लागले. तेव्हा स्त्रीशिक्षणाचा अभाव होता. पुरुषप्रधान संस्कृतीच्या वलयाखाली स्त्री चे अस्तित्व दडपले गेले. कुटुंब सांभाळणारी, आल्या गेल्याचे स्वागत करणारी, वेळप्रसंगी एक हाती संसार करणारी हेच स्त्रीचे रूप राहिले. संसार रुपी रथाची दोन चाके म्हणून स्त्री आणि पुरुष दोघांचा विचार आपण करतो. स्त्री हे चाक असे काही पेलून धरते की, कधीकधी दोन्ही चाकांचा बोजा तिच्या अंगावर असतो. स्त्री ही अशी गृहिणी, सहधर्मचारिणी असते!
पूर्वी स्त्रियांना शिक्षण कमी होते, पण व्यवहारज्ञान मात्र खूप होते. पैसा कमी होता पण असणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा उपयोग जास्तीत जास्त कसा करता येईल याकडे लक्ष असे. त्यामुळे स्त्री काटकसरीने संसार करून तो यशस्वी करून दाखवत असे.
श्यामची आई मधील आई ही अशीच गरिबीत राहून स्वाभिमानाने संसार करणारी स्त्री होती. त्याकाळी कित्येक विधवा स्त्रियांना संसार करून मुलांची, कुटुंबाची जोपासना करावी लागली आहे. माझीच आजी एका मोठ्या घरातील होती.पतीच्या निधनानंतर शिक्षण नाही, हातात पैसा नाही, मुलांची शिक्षणे व्हायची होती, अशावेळी तिने न डगमगता संसार केला. मोठ्या घरातील फक्त दोन-तीन खोल्या स्वतःकडे ठेवून बाकी सर्व खोल्या विद्यार्थ्यांना रेंट वर दिल्या आणि त्या भाड्याच्या पैशात रोजचे व्यवहार भागवायला सुरुवात केली. घर हाच तिचा मोठा आधार होता. हातात असलेले दागिने विकून मुलांची पुढील शिक्षणे केली. त्यानंतर सुनांसाठी पुन्हा सोने खरेदी करून दागिने करून घातले. स्वतःच्या कर्तृत्वाने असे घर सांभाळणाऱ्या त्या काळातील अनेक महिलांच्या गोष्टी आपण ऐकतो.
काळाच्या ओघात शिक्षणाबरोबर स्त्रीच्या कर्तृत्वाच्या कक्षा रुंदावल्या आणि स्त्री पुरुषाशी बरोबरी करता करता त्याच्यापुढे कधी निसटून गेली हे कळलेच नाही! आज प्रत्येक आघाडीवर स्त्री पुढे आहे. अवकाश क्षेत्र, संशोधन, संरक्षण क्षेत्र, राजकारण यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात स्त्रिया कार्यरत आहेतच पण रोजच्या जीवनातही बरेचसे व्यवहार स्त्रिया सांभाळतात. पूर्वी मुलांवर असलेली माया, प्रेम स्वयंपाकघरातील कुशलतेवर अधिक दिसत असे. मुलांना स्वतः करून चांगले चांगले खाऊ घालणारी, प्रेमाने घास देणारी,कोंड्याचा मांडा करणारी स्त्री आदर्श होती. पण नंतरच्या काळात नोकरी करून, स्वतःची ओढाताण करून मुलांसाठी घरी पदार्थ बनवणारी स्त्री हळूहळू कालबाह्य झाली. कामावरून घरी येतानाच वडापाव, दाबेली, केक यासारखे पदार्थ घरी येऊ लागले, तर काही वेळा ऑर्डर करून आणलेल्या पिझ्झा मुलांना खुश करू लागला. काही ठिकाणी घरी स्वयंपाकाला बाई ठेवून ती गरज भागवू लागली. काही तडजोडी कराव्या लागल्या, पण त्याला इलाज नव्हता. त्यांची मुलांवरील माया, प्रेम कमी झालं असं नाही, पण दिवसभर ऑफिस काम करून घर सांभाळणे ही तिच्यासाठी तारेवरची कसरत होती. शेवटी तिच्या कष्टानाही मर्यादा असतेच ना!
रामरावआण्णांनी चार गोष्टी तात्याला समजावून सांगितल्या. त्याचा परिणाम असा झाला की तात्या त्या दिवशी जेवला. नेहमी परमानं तात्या गोट्यात जात हूता. पण रूप्या सोडून गोटा हे गणितचं तात्याच्या डोक्यात बसत नव्हतं.
आज तात्यानं सारं आवरलं. तो न जेवताच रामोसवाडीवर गेला. त्याला हे माहित होतं कि कापायला न्यायची बैलं जगू रामोशी खरेदी करायचा. आठ-दहा बैलं झालीं की तो ट्रकातनं बाहेर पाटवायचा. तात्या रामोसवाडीत शिरला. थोडं आत जाताच त्येला बैलांची दावण दिसली.
तात्याला पहाताच रूप्या ऊटून हंबराय लागला. तात्या रूप्याजवळ गेला. त्याला रडू आवरेना. त्यानं पाहिलं,रूप्यानं टाकलेल्या गवताच्या काडीला हात लावला नव्हता. तात्यानं रूप्याच्या तोंडावरंन हात फिरवला. तात्यानं शेजारी ठेवलेल्या ब्यरलमधलं पाणी पाजलं. तीन चार कळशा तो पाणी प्याला.
तोवर घेणारा मालक जगू तिथं आला. त्यानं ओळखलं. त्यानं लांबूनच रामराम केला. तात्यानं रामराम केला.
“काय राव आणल्यापस्न बैलानं वैरणीला तोंड लावलं नाय की त्यो पाणीसुध्दा प्याला नाय”
“आवं त्याची मायाचं हाय माझ्यावर तशी”
“ह्ये बघा आता बैलांच् वय झालंय. तुंम्ही सांभाळून तरी काय करणार?”
“हे तुमचं झालं. भावाला मी सांगितलवतं बैल दावणीला मरू दे. पण ईकू नका. आवं त्यो मी टाकल्याशिवाय वैरण खाणार नाय की पाणी पिणार नाय हे मला माहीती हूतं”
अशीच कांहीशी बोलाचाली झाली. शेवटी जातानां तात्यानं रूप्याला पाणी पाजलं. थोडी वैरण टाकली. तो भरल्या डोळ्यानीं वाडीत आला.
दोन दिवस कसंतरीं गेलं. तात्याला रूप्याशिवाय करमत नव्हतं. परत तिस-या दिवशी रूप्याला बघायला तात्या रामोशी वाडीवर गेला. दावण तशीच होती. तात्याला पाहताच रूप्यानं हंबरायला चालू केलं. कान टवकारलं. तात्यानं मायेनं तोंडावर अन अंगावर रूप्याच्या हात फिरवला. तात्यानं पाणी पाजलं. वैरण टाकली. रूप्या वैरण खायला लागला. तात्या तिथं थोडावेळ थांबला. मग शेजारच्या रानांतील आंब्याच्या झाडाखाली जावून बसला. असाच थोडावेळ गेला. कांहीवेळात जगू दावणीकडं आला. त्याला रूप्या वैरण खातूय म्हणल्यावर आश्चर्य वाटलं. गेले तीन चार दिवस तो वैरण टाकत हूता. पण रूप्यानं तोंड लावलं नव्हतं. उलट रागानं तो त्याच्याकडं पहायचा.
त्यानं पाहिलं. तात्या आंब्याखाली तंबाखू मळत बसलावता. तो तडक झाडाखाली आला. त्यानं तात्याच्या डोळ्यांतलं पाणी पाहिलं. आज त्याच्याही काळजात कालवाकालव झाली. त्यानं ह्यो पहिलाच मालक पाहीलावता जो आपला बैल ईकल्यावर बैलांकडं येत हूता,वैरण टाकत हूता,पाणी पाजत हूता.
सांजचा वकूत झाला तरी तात्या झाडाखालनं हालला नव्हता. ते पाहून शेवटी जगू म्हणाला,
“तात्या तूझी माया अजब हाय बाबा!असा मालक अन असा बैल मी माझ्या धंद्यात कवा बघितला नाय बघ. “
जगू ऊटला. त्यो दावणीकडं गेला. त्यानं रूप्याचं दावं सोडलं. रूप्या तात्याकडं जावून थांबला. तात्यानं परत रूप्याच्या तोंडावर अन अंगावर हात फिरवला.
जगूनं खाली पडल्यालं दांवं तात्याच्या हातात दिलं अन तो म्हणाला,
“तात्या घेवून जा त्येला”
“दादा ईकल्याला बैल मी परत कसा नेवू. बरं नेला असता त्यात आमचा कारभारी बसलाय पैका घेवून. मला काय पैसं लवकर माघारी देता येणार नायत”
त्यावर जगू म्हणाला,
“तात्या तूझा बैल घेवून जा बाबा! ऊगा शाप नको माझ्या ऊरावर. अन हे बघ, तूला जमलं तसं पैसं दे. अन नायचं जमलं तर दिवू नक. पण तूझा बैल तेवढा घेवून जा”
हे ऐकताच तात्यानं जगूच्या गळ्याला मिठी मारली. तो हमसाहमसी रडू लागला. त्यानं तात्याचं डोळं पुसलं. बैलाचं दोन्ही दावं परत त्याच्या हातात दिलं.
“जा बिनघोरी जा! कारभारी काय बोललां तर सांग,बैल तूझ्या मायेपोटी परत पाटवलाय म्हणांव”
तात्यानं जगूला हात जोडून रामराम केला. अन तो निघाला. रूप्या तात्याच्या पुढं चालत हूता. ही अजब माया जगू डोळ्यात साठवत हूता. तात्या नजरंआड होईपातूर तो त्यांच्याकडं एकटक पहात उभा हूता……बराचवेळ…..!
समाप्त
– मेहबूब जमादार
मु- कासमवाडी, पो-पेठ, ता-वाळवा
जि-सांगली.मो-९९७०९००२४३
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
थोडी पुढच्या वर्गात होती समिधा अगदी निम्न मध्यम वर्गातलीच म्हणा ना.
समिधा फार हुशार परिस्थितिची जाणीव असलेली आणि समजूतदार होती.
दिसायला तर ती छान होतीच,पण खूप हुशारही होती समिधा.
समिधाला लहान भाऊही होता, अगदी पाठोपाठचा तोही हुशार होता.
समिधाच्या आईने आम्हाला एकदा हळदीकुंकवाला बोलावले होते.
अगदी साधेसुधे, 3 खोल्यांचे पण नीटनेटके ठेवलेले घर.
त्या स्वत:ही शिकलेल्या होत्या पण घरीच असायच्या.
समिधा बोर्डाच्या परीक्षेत मेरिट लिस्ट मध्ये झळकली. .समिधाला खूप बक्षिसेमिळाली.
तिचे आईवडील पेढे घेऊन आले आमच्या घरी.
समिधा ला इंजिनिअर व्हायचे होते.
बारावीला तिने कसून अभ्यास केला.
तिला सुंदरच मार्क मिळाले आणि तिला चांगल्या कॉलेज मध्ये सहज मिळाली ऍडमिशन.
लागोपाठ ,तिचा भाऊ समीर ही होताच.
तिच्या वडिलांची, ओढाताण होत होती दोन्ही मुलांच्या फी, पुस्तके,क्लास ची फी भरताना. पण मुले हुशार होतीच.
समिधा च्या पाठोपाठ समीरही इंजिनीरिंग ला गेला.
समिधाच्या अंगावर अगदी साधे तेच तेच ड्रेस असत. पण तिने कधीही तक्रार नाही केली. ज्या कॉलेज मध्ये मुली नुसत्या फुलपाखरा सारखे स्वच्छंदी जीवन जगतात, मौजमजा करतात, त्याच ठिकाणी समिधा अतिशय साधी कोणत्याही मोहाला बळी न पडणारी होती.
मला फार कौतुक वाटायचे त्या कुटुंबाचे बघता बघता समिधा इंजिनिअर झाली तिला कॅम्पस interview होऊन लगेचच जॉब ही मिळाला.
किती आनंदात पेढे घेऊन आली समिधा.
त्या कुटुंबाची मी फॅमिली डॉक्टरही होते.
समिधा जॉईन झाली कंपनीत.
खूप चांगले पॅकेज मिळाले तिला.
पण ती होती तशीच साधी राहिली.
पण हळूहळू,तिच्यात चांगला बदल झालेला दिसू लागला.
छान कपडे,थोडा मेकअप तिचे रूप खुलवू लागला.
पूर्वी जरा गंभीरच असलेली समिधा आता हसरी खेळकर दिसू लागली.
मला तिच्या आजीला बरे नव्हते म्हणून घरी visit ला बोलावले होते मी घरात पाउल ठेवले मात्र.
मला घरात लक्षणीय बदल जाणवला घर तेच होते, पण आता उत्तम महाग रंग लावलेला, ज्या घरात फ्रीझही नव्हता तिथे मोठा फ्रीज,भारी सोफासेट.
घर खूप सुंदर आकर्षक दिसत होते.
भारी कपबशीत मला समिधाच्या आईने चहा दिला पूर्वीचा,जाड कपबशीतला, चहा आठवलाच मला.
लक्षात येण्यासारखे घर बदलले होते।छानच वाटले मला.
पण ही किमया घरात येणाऱ्या समिधाच्या पगाराची होती,हे माझ्या चाणाक्ष नजरेला समजलेच.
समिधाच्या आईला मीम्हटले, आता छानसा जावई आणा.
हसत हसत हो म्हणेल हिला कोणीही.
कायग, जमवलं आहेस का कुठे नाही हो काकू. मी सध्या ऑफिस झाले की क्लास लावलाय जावा चा.
बाबा म्हणाले,मग तुला प्रमोशन मिळेल.
मला हे कुठेतरी खटकलेच.
बाबा बेरकी पणे,माझ्याकडे बघत होते.
मी घरी आले पण समिधा चा विचार जाईना मनातून.
तिच्या पेक्षा थोडीच लहान असलेली माझी इंजिनीअर मुलगी, किती मस्त मजेत होती.
तिच्या मित्र मैत्रिणींचा घोळका घरी येतअ सायचा. तिलाही खूप पगार होताच पण आम्ही कधीही तिला विचारले नाही तीच सांगायची,आई,मी अमुकअमुक इन्व्हेस्टमेंट्स केल्यात समिधा मला या ना त्या कारणाने भेटत राहिली.
माझा जनसम्पर्क तर खूपच असतो समिधा आली होती, त्याचदिवशी एक बाई औषधासाठी आल्या होत्या छान आहे हो मुलगी डॉक्टर.
करतेय का लग्न.
माझा भाचा आहे लग्नाचा. बघा, त्यांनी त्या मुलाची माहिती,पत्ता मला दिला.
मी उत्साहाने समिधाच्या आईला ती माहिती दिली.
मग बरेच दिवस काही समजले नाही म्हणून मीच त्या बाईना विचारले त्या म्हणाल्या,अहो,त्या समिधाच्या आईकडून काहीच नाही आले उत्तर मला आश्चर्य वाटले.
नेमक्या समिधाच्या आईच दवाखान्यात त्या दिवशी आल्या मी त्यांना विचारले,तरमाझी नजर चुकवत म्हणाल्या,हं हं,ते होय.
अहो पत्रिका नव्हती जमत, मग नाही गेले बाई मी.
एक दिवस समिधा एका मुलाला घेऊन माझ्या दवाखान्यात आली.
काकू,हा माझा टीम लीडर आहे, संदीप याला तुम्ही मेडिकल certificate द्याल का .
मुलगा छानच होता .मी लगेच त्याला हवे ते certificateदिले दुसऱ्यादिवशी समिधा आली थँक्स हं काकू.
मी म्हटले,ते जाऊं दे ग,
छान आहे की ग मुलगा.
नुसताच मित्र आहे का आणखी काही.
समिधा हसली, म्हणाली काकू कित्ती चांगला मित्र आहे माझा तो.
त्याला कशाला नवऱ्यात बदलायचे.
काल गेला चीन ला, आता 3 महिने नाही येणार मी म्हटले,समिधा, चांगला मित्र, चांगला नवराही होऊ शकतो.बघ.
सगळ्या दृष्टीने मला आवडला हा तुझा मित्र.
असेच दिवस पुढे जात होते अचानक एक दिवस,संदीप दवाखान्यात आला म्हणाला,काकू ,थोडे बोलू का. अरे बोल की म्हणाला,मी चीन ला गेलो,तो पर्यंत मला समिधा बद्दल तसे काहीही वाटत नव्हते पण मला समजले की मी तिला खूपच मिस करतोय काकू,मला लग्न करायचंय तिच्याशी
तुम्ही बोलाल का तिच्याशी
अरे, मी कशाला, तू तिला जा घेऊन तुमच्या ccd मध्ये आणि बिनधास्त विचार
ती नाही म्हणणार नाही बघ
तो म्हणाला, करू असं मी?
अरे करच. ती नक्की हो म्हणेल
दुसऱ्याच दिवशी दोघेही हसत हसत आले दवाखान्यात.
काय रे मुलांनो, काय म्हणता
समिधा लाजली आणि म्हणाली
काकू, तुम्ही कित्ती बरोबर ओळखलंत
मलाही चैन पडेना, हा 3 महिने नव्हता तेव्हा .
आम्ही लग्न करायचे ठरवलेय.
ती म्हणाली, आई बाबांना आवडले नाही
मी परस्पर लग्न ठरवलेले.
म्हणाली इतकी घाई का करतेस
याहूनही चांगला मुलगा मिळेल की तुला
काकू,मी इतकी अडाणी राहिले नाहीये हो
मलाही माहीत आहे, खूप मुले आईने
माझ्या पर्यंत येऊच दिली नाहीत
पण मी तिला दोष नाही देणार
पण मी आता 27 वर्षाची आहे,
यापुढे
कधी मी लग्न करणार .
मला खात्री आहे, आम्ही या लग्नाने सुखी होऊ
समिधाच्या लग्नाला अर्थातच मी हजर होते
संदीप च्या आईने मला सुंदर साडी दिली
म्हणाली, तुमच्या मुळे छान सून मिळाली हो आम्हाला
सगळे सांगितलंय आम्हाला संदीप ने
वधुवेशातली सुंदर समिधा आणि तिला शोभणारा जोडीदार बघून मला अतिशय समाधान वाटले.
काल आणि आजही जगात सगळीकडेच महिला दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन, मेजवान्या, कौतुकाचा वर्षाव, सुभाषिते, कविता, सुंदर लेख, भाषणे, नृत्य-गायन व लघुनाटीकांचे आयोजन होत आहे. सजून सवरून महिला ही या सर्वांचा आनंद लुटत आनंदी होत आहेत. पण हा उत्सव फक्त या एक दोन दिवसांचा नसावा. तर त्यांचे महत्व सदोदित जाणून तसे त्यांचेशी वर्तन असावे व त्यांनीही आपला मुळ प्रेमळ काळजीवाहू स्वभाव टिकवून ठेवत कौतुकास्पद होऊन रहावे.
अशाच एक कर्तबगार महिला, सौ. मिनाक्षी कृष्णाजी जगदाळे या समुपदेशक असून त्यांना महिलांशी संबंधित व नातेसंबंधातील इतरही प्रश्न हाताळत असतांना निरनिराळे अनुभव व स्वभावछटा जाणवत असतात. विविध वृत्तपत्रांत त्यांचे मार्गदर्शक लेख ही येत असतात. या आधिही त्यांचे लेख सामायिक केलेले आहेतच. आलेल्या अनुभवांवरून त्यांनी लिहिलेला एक लेख आज सामायिक करीत आहे. वाचा व विचार करा.
– मेघःशाम सोनवणे
– 🌼 –
महिला दिनाचा संकल्प करूयात,
घरातील लक्ष्मी चा आदर ठेउयात !!!!
आठ मार्च, जागतिक महिला दिन !!! विविध स्वरूपात कार्य, कर्तृत्व गाजवणाऱ्या महिलांना अनेक ठिकाणच्या सोहळ्यांना बोलवलं जाईल, त्यांचा आदर, सत्कार, सन्मान केला जाईल. कुटुंबातील महिलांना देखील शुभेच्छा, भेट वस्तू देऊन तिच्यातील स्त्री शक्तीचा जागर केला जाईल. महिलांविषयक अनेक प्रेरक, सकारात्मक भाषणं केली जातील. स्त्री ला देवी चे रुप मानून ती किती पूजनीय आहे यावर लेख, बातम्या प्रसिद्ध होतील. आदर्श माता, आदर्श भगिनी, आदर्श पत्नी मानून विविध उपाध्या, विविध उपमा स्त्री ला बहाल करुन तिच्या शिवाय सृष्टी, आयुष्य कसं अपूर्ण आहे यावर प्रत्येकाच्या उत्कंठ भावना दाटून येतील यात शंकाच नाही !
महिला देखील प्रत्येक ठिकाणी आवर्जून स्वतःचे कौतुक करुन घेईल, तिला स्वतःबद्दल आत्मविश्वास, अभिमान वाटू लागेल आणि ती अधिक उत्साहाने, अधिक जोमाने पुढील कामाला लागेल यात शंकाच नाही.
पण खरंच प्रत्येक महिलेला, जिला समाजात नावाजलं जातं, तिच्या कार्य क्षेत्रात तिला विशेष मानलं जात, समाजातून गौरवलं जातं, जिच्या कार्याची, कामाची दखल कुटुंबाबाहेर घेतली जाते, जिच्या साठी कार्यक्रमांचे, सत्काराचे, पुरस्कारांचे सोहळे आयोजित केले जातात तिला तिच्या कुटुंबात तितक्याच प्रामाणिक पणे आदर, मान, सन्मान, प्रेम दिलं जातं का? हा देखील जागतिक पातळीवरील प्रश्न आहे. बहुतांश ठिकाणी या प्रश्नाचे उत्तर “नाही !!!!” असंच येईल, आणि येते आहे.
समुपदेशनाला आलेल्या असंख्य प्रकरणातून हेच समोर येते आहे की आजही स्त्रीला कुटुंबात कोणतेही आदराचे, मानाचे, आत्मसन्मान अबाधीत राहील असे स्थान नाहीये.
आपल्याला अध्यात्मिक, वैचारिक, सामाजिक विचारसरणी नुसार स्त्री ही घरची लक्ष्मी आहे !! घरातील माता, पत्नी, सून ही साक्षात लक्ष्मी आहे आणि तिला दुखावणं, तिचा अपमान करणं, तिचा अनादर करणं, तिच्या डोळ्यात कोणत्याही कारणास्तव पाणी येणं, हे पातक आहे !!
घरातील लक्ष्मी आनंदी हवी, हसतमुख हवी, सुखी, समाधानी हवी ! असं असलं की संपूर्ण घर कसं तेजोमय असतं हे आपण पूर्वांपार ऐकत आलो आहोत. अश्या घरात कशाची कमतरता नसते, भरभराटीचे दिवस असतात, त्या घराला देवतांचे आशीर्वाद लाभतात, हिच आपल्याला पूर्वजांची शिकवण आहे.
आजमितीला तर घरोघरी लक्ष्मी रडताना, जीव जाळताना, मन मारतांना, अपमानाचे घोट पीत, अपशब्दांचा भडीमार सहन करत तळतळताना दिसते आहे, तिचा आत्मा सातत्याने दुखावलेला दिसत आहे.
समुपदेशन मधील कित्येक प्रकरणातून हेच निदर्शनास येते की पत्नी आणि सून म्हणून वावरताना, जगताना स्त्री कमालीची त्रस्त झालेली आहे. प्रेमाचे, मायेचे, आपुलकीचे दोन शब्द तर सोडाच, पण ती घरातीलच सदस्यांकडून सातत्याने शिव्या, शाप, बदनामी, अर्वाच्य भाषा, हीन दर्जाची वागणूक, मारहाण, टोमणे, आरोप सातत्याने सहन करुन करुन प्रचंड दुखावली गेलेली आहे, मानसिक दृष्टीने उध्वस्त झालेली आहे, मनातून मोडून पडलेली आहे आणि तिच्या या दुभंगलेल्या मनस्थिती शी कोणालाही काहीही कर्तव्य नाहीये, घेणं देणं नाहीये !
तिचे विचार, तिची मतं, तिच्या अपेक्षा, तिची दुःखं, तिचा त्रास, तिची तगमग, तिचा त्याग, तिने केलेली तडजोड, तिचे गुण, तिच्या कला, तिच्या जाणिवा सर्व फाट्यावर मारणारे परके कोणीही नसून तिच्याच कुटुंबातील सदस्य आहेत.
हिच घरा घरातील लक्ष्मी आयुष्यभर विचार करत राहाते की मी कुठे चुकले, माझं काय चुकले, मी कुठे कमी पडले? माझे आईबाबा कुठे चुकले? माझ्याच नशिबात इतका त्रास का? मी काय वाईट केलं? मी कोणाशी वाईट वागले? मी च का सगळं भोगते आहे? कधी जाणीव होईल माझ्या चांगुलपणाची माझ्या सासरच्यांना??? कधी महत्व कळेल यांना माझं?
अश्या असंख्य प्रश्नांनी ही लक्ष्मी सतत स्वतःलाच कोसत राहाते, उत्तर शोधत राहाते, स्वतःलाच अपराधी मानत राहाते आणि स्वतःच्याच मनाची समजूत घालून परत परत उभी राहाते.
समुपदेशनला आलेल्या अनेक महिला, ज्या कोणाच्या पत्नी आहेत, सुना आहेत, माता आहेत, त्या ढसाढसा रडतात, आत्महत्या करण्याचे विचार करतात, दीर्घकालीन नैराश्यात असतात, स्वतःच्या जीवनाला कंटाळून गेलेल्या असतात, स्वतःला ताण तणाव, दररोज चे वाद विवाद, वैचारिक कलह, मतभेद, हेवेदावे यामुळे अनेक आजारांनी अतिशय कमी वयात ग्रस्त झालेल्या असतात. अशी असावी का घरातील लक्ष्मी??? अशी दुभंगलेली, तुटलेली, मोडलेली लक्ष्मी आपल्याला अपेक्षित आहे काय?? हे सर्व प्रकारचे अन्याय, अत्याचार निमूटपणे सहन करणारी स्त्री म्हणजे गृह लक्ष्मी का?? ही आपली पौराणिक, अध्यात्मिक शिकवण नक्कीच नाही…… आणि कधीही नव्हती !!
सातत्याने स्वतःचे दुःख लपवून, अपमानाचे घोट गिळत जगासमोर नटून थटून, भरजरी साडया नेसून, नट्टा पट्टा करुन, दाग दागिने घालून सुहास्य वदनाने मिरवते ती मनातून देखील तेवढीच प्रफुल्लित, प्रसन्न, शांत, समाधानी, सुखी आहे काय?? यावर विचार होणे आवश्यक आहे.
या महिला दिनाला प्रत्येकाने या बाबींचा खोलवर विचार करावा असे वाटते. प्रत्येक कुटुंबातील स्त्री भुकेली आहे फक्त प्रेमाची, तिला अपेक्षा आहे फक्त आदराची, तिला हवा आहे फक्त सन्मान, ती वाट बघते आहे फक्त कोणीतरी समजावून घ्यावं ऐकून घ्यावं म्हणून!!!
या महिला दिनाला एकच करूयात. इथून पुढे घरातील लक्ष्मी चा आदर ठेउयात… जी आपल्या घरात लग्न लावून आली, तिला शेवटच्या श्वासापर्यंत न्याय देऊयात !!! तिला समजूयात, तिला सामावून घेऊयात, तिला स्वीकारुयात आणि तिला नाही तर तिच्या अंतःकरणाला हसताना, तिच्या मनाला मोहरताना पाहुयात. ज्याला हे जमलं त्यानं जग जिंकलं… ज्यानं हे केल त्यानं सर्व काही कमावलं!
(हा लघुलेख आवडल्यास शेअर करतांना लेखात कुठलाही बदल न करता मुळ लेखिकेच्या नावासहच शेअर करा ही विनंती. -मेघःशाम सोनवणे. दररोज अशा सकारात्मक कथा व लेखांसाठी 9325927222 या व्हाट्सअप क्रमांकावर संपर्क साधा.)
स्वतः लेखिका सौ. मिनाक्षी कृष्णाजी जगदाळे यांच्या सौजन्याने.
संग्रहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे
९८२२८४६७६२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
वेद व पुराण काळातील महत्वाच्या स्त्रिया : ब्रह्मवादिनी सुलभा
वदिक काळात स्त्रियांना खूप मान होता. मुलांच्या बरोबरीने आवश्यक असे शिक्षण पण त्यांना मिळत असे. त्यांचे उपनयन सुद्धा होत असे. ब्रह्मवादिनी स्त्रिया आजन्म ब्रह्मचर्य पाळत. विद्येचा आणि ब्रह्मविद्येचा अभ्यास करत. सुलभा कुमारी संन्यासिनी होती. ती अत्यंत चतुर विद्वान आणि बुद्धिमान होती. प्रधान नावाच्या राजाची ती कन्या. तिने आजन्म ब्रह्मचारी राहून वेद विद्येचा आणि ब्रह्मविद्येचा अभ्यास व स्वतंत्र लेखनही केलं. ब्रम्हा यज्ञाच्या वेळी केल्या जाणाऱ्या तर्प णात गार्गी ,मैत्रेयी, वाचक्नवी यांच्याबरोबरच सुलभा चे नाव घेतले जाते. ती आत्मज्ञानी, ब्रह्मज्ञानी, तपअर्जिता, ओजस्वी आणि तेजस्वी स्त्री होती. तिने स्त्रियांच्या शिक्षणासाठी अनेक स्वतंत्र आश्रम उभे केले. परकायाप्रवेश याचे ज्ञान तिने मिळवले होते. त्याआधारे ती राजा जनकाच्या शरीरात प्रवेश करून विद्वानांच्या बरोबर शास्त्रशुद्ध चर्चा करत असे. ती सतत प्रवास करून धर्माचा उपदेश आणि प्रसार करत असे. तिला तिच्या योग्यतेचा वर मिळाला नाही म्हणून तिने लग्न केले नाही.
महाभारताच्या शांतिपर्वामध्ये जनक राजा आणि सुलभा यांचा संवाद विस्तारपूर्वक वाचायला मिळतो. तिने आपल्या वाणीचे आठ गुण आणि आठ दोष यावर विशेष अभ्यास केलेला आहे.
तिला एकदा कळले की राजा जनक अहंकारी झाला आहे. तिने त्याला भेट देण्याचे ठरवले. त्याला भेटण्यासाठी तिने आपल्या योगाच्या बळावर मूळ शरीर टाकून देऊन सुंदर रूप धारण केले. आणि मिथिला नगरीत आली. भिक्षा मागण्याचा बहाणा करून राजा जनकाच्या समोर आली. राजा जनक तिच्या सौंदर्याने आश्चर्यचकित झाला त्याने तिचे स्वागत केले. पाय धुवून यथोचित पूजा करून उत्तम जेवण दिले. जनक राजाने विचारले.,”तू ब्राम्हणी संन्यासिनी आहेस का?”सुलभ उत्तरली” मी क्षत्रिय कन्या .योग्य पती न मिळाल्यामुळे मी लग्न केले नाही. व्रतस्थ राहते”. राजाने विचारले
“खरे शहाणे कोण?” सुलभा उत्तरली “ज्ञानी माणूस कधीही स्वतःची स्तुती करत नाही तो कमी बोलतो आणि मौनात राहतो.मग तो राजा असो ,ग्रहस्थ असो अथवा संन्यासी असो.” जनक राजाला आपली चूक समजली. तो म्हणाला ,,”सुलभा ,तू माझे डोळे उघडलेस. तू खरी ज्ञानी आहेस. मी तुझे बोलणे लक्षात ठेवून यापुढे वाणीवर संयम ठेवीन.”
अशाप्रकारे महाज्ञानी जनकराजाला वठणीवर आणणारी ब्रह्मवादिनी सुलभा. तिला कोटी कोटी प्रणाम.
(सुप्रसिद्ध वरिष्ठ साहित्यकार श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ जी अर्ध शताधिक अलंकरणों /सम्मानों से अलंकृत/सम्मानित हैं। आपकी लघुकथा “रात का चौकीदार” महाराष्ट्र शासन के शैक्षणिक पाठ्यक्रम कक्षा 9वीं की “हिंदी लोक भारती” पाठ्यपुस्तक में सम्मिलित। आप हमारे प्रबुद्ध पाठकों के साथ समय-समय पर अपनी अप्रतिम रचनाएँ साझा करते रहते हैं। आज प्रस्तुत है अंतरराष्ट्रीय महिला दिवस पर कुछ “दोहे ”।)
☆ तन्मय साहित्य #123 ☆
☆ अंतरराष्ट्रीय महिला दिवस विशेष – “दोहे ” ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ ☆