मराठी साहित्य – जीवनरंग ☆ व्हॅलेंटाईन डे भाग-2 ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆

सुश्री सुनिता गद्रे

? जीवनरंग ❤️

 ☆ व्हॅलेंटाईन डे भाग-2 ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆ 

(14 फेब्रुवारी हा प्रेमी जोडप्यांचा दिवस  व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा करण्याची तिकडे पद्धत आहे…. आता पुढे)

“हा जुन्या काळापासून चालत आलेला सण नां.. एक आपलं सोडा हो, पण आपल्या मुलांकडून हे  असलं कधी काही मी कसं ऐकलं नव्हतं‌?”नानी शंका समाधान करून घेत होत्या.

“काय आहे नानीजी, ग्लोबलायझेशन मुळं सगळं जग हल्ली एक झालंय ना…. शिवाय सगळं डंका पिटत मोठ्या प्रमाणात साजरं करायची पद्धत आलीय त्यामुळे!… आता तर एक दिवसाऐवजी पुरा आठवडा धुमाकूळ चालू असतो…

पुन्हा दोघं गप्प होऊन अंथरुणावर बसून राहिले. त्यांना काहीच सुचत नव्हतं. टीव्ही बघणं तर दूरच…. पण झोपावसं ही वाटत नव्हतं. दहा वाजून गेले होते. तेवढ्यात अमर महाशय धाड्दिशी दरवाजा उघडून घरात दाखल झाले. त्यांनी हातातला मोठा गिफ्ट बॉक्स सोफ्यावर आदळला ….आणि ते बेडरूम मध्ये अंतर्धान पावले.

अन् दोघांचं जोरजोरात भांडण ऐकू येऊ लागलं. कानावर आदळलेल्या तुटक-तुटक शब्दांचा त्यांनी लावलेला अर्थ असा होता… की ठरलेल्या जागी… ठरलेल्या वेळी… अमर पोहोचू शकला नव्हता.एक तर त्याची ही स्वतःची नवी कंपनी होती आणि अचानक  कंपनीमध्ये खूप मोठं एक महत्त्वाचं काम आलं. त्यामुळे लवकर त्याची सुटका झाली नाही. आणि कधी नव्हे ते त्याला आपल्या जीवनात पहिल्यांदाच लोकलच्या मरणाच्या गर्दीत उभा राहून प्रवास करावा लागला. त्यातच त्याचा मोबाईल चोरीला गेला. व्यवस्थित संभाषण होऊ शकलं नव्हतं. त्यामुळं दोघांची चुकामूक  …मग गैरसमजावर गैरसमज ….शब्दाला शब्द वाढणं ….आरोप-प्रत्यारोप…. नताशाचं रडणं… अमरचं तिरसटणं…सगळं चालू होतं. एका दृष्टीने पाहिले तर दोघांचंही आपापल्या परीने बरोबर होतं. पण हे कबूल कोण करणार?.. समोरच्याला समजून घेण्याचा दृष्टीकोन कोणातच नव्हता. फक्त एकाच वाक्यात दोघांच्या बोलण्यामधे समानता होती. “माझ्यावर तुझं प्रेमच नाहीय.”

मियाॅं बिबीच्या भांडणात पडण्यात काहीच अर्थ नव्हता.

थोड्या वेळानं सगळं शांत… शांत झालं. न खाता-पिता दोघं तशीच रागारागानं झोपली होती.

बारा वाजत आले होते.

‘नानाजी अहो ,पण हा लग्नाआधी प्रेम करणाऱ्यांचा सण नां ‘वगैरे मनात आलेले विचार त्या फुलांकडे पाहता पाहता नानी विसरून गेल्या. टेबलावरून मोठ्या प्रेमानं त्यांनी बुके हातात घेतला. आणि त्या म्हणाल्या,” बघाना ही दोघं यडी पोरं कशी भांडून झोपली… आता काय.. पुन्हा उद्या याहून महाग बुके आणतील.. आणिअधिक किंमती गिफ्टही… पण मला उद्या ही उदास, दुःखी कष्टी मलून झालेली बुकेतली फुलं बघवणार नाहीत. आपण असं करू या का?… बोलता बोलता त्या वळल्या.समोर बघताहेत तर नाना कपाटातून मोठा चॉकलेट बार काढून घेऊन उभे होते. नाना आणि चॉकलेट?.. जगातली ती एकमेवचअशी व्यक्ती असावी जिला चॉकलेट आवडत नाही.  आपण दोघं एकच विचार करतोय नां ! नाना हसत म्हणाले,”चलो फिर… मौका भी है और दस्तूर भी”

मग काय पिक्चरचा सीनच साकार झाला. नानांनी मोठ्या आदबीनं गुडघ्यावर बसत नानींना बुके दिला. नानी थँक्यू म्हणाल्या. त्यांनी दिलेल्या चॉकलेटचा एक बाईट घेतला. उरलेलं चॉकलेट नानांच्या तोंडात भरवत त्या म्हणाल्या, “नानाजी हॅपी व्हॅलेंटाइन डे!”पुन्हा काहीतरी चुकल्यासारखं वाटल्यामुळे त्या म्हणाल्या,” मी हे बरोबर बोलतेय ना? का मेरी क्रिसमस सारखं मेरी व्हॅलेंटाइन ….आणि त्यांचं कुजबुजून बोलणं चालूच राहीलं……

एरवी इतिहासाच्या पानात लपलेला पण या आठवड्यात बाहेर आलेला तो महान संत ‘श्री व्हॅलेंटाईन बाबा’ जरूर लग्नाच्या पासष्टीत पहिलावहिला व्हॅलेंटाइन डे सेलिब्रेट करणार्‍या या जोडप्याला  ब्लेसिंग देत असेल.

समाप्त

© सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ दिदी ssss… (कविता)….प्रमोद जोशी ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

?  वाचताना वेचलेले ? 

☆ दिदी ssss…  (कविता)….प्रमोद जोशी ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

अशोकाच्या वाटेवर,

कुणी पसरला शोक?

टोचे देठानाच आता,

पाकळ्यांचे तीक्ष्ण टोक!

 

तुझे जाणे ना सामान्य,

आनंदाचा हा युगांत!

संवादिनीला असह्य,

तिच्या भात्याचा आकांत!

 

मंगेशाच्या मंदिरात,

देई हुंदका ओंकार!

घंटा बडवूनसुद्धा,

तिचा गोठला झंकार!

 

कुणी कुणाचे सांत्वन,

आता करायाचे सांग?

आसवांच्या पाठीमागे,

उभी हुंदक्यांची रांग!

 

कोणताही भाव नाही,

तुझ्या गाण्यातून वर्ज!

पिढ्यापिढ्याना हवेसे,

तुझे सप्तसुरी कर्ज!

 

दुस्वासाने “लता” शब्द,

उलटाही केला तरी!

तोही “ताल होतो आणि,

येई संगिताच्या घरी!

 

भैरवीचा फुटे बांध,

हमसून रडे नांदी!

साती स्वर वेडेपिसे,

शोधतात त्यांची दिदी!

 

मंगेशीच्या गाभाऱ्यात,

ज्योत स्फुंदे समईत!

अभिषेकही तुटक,

धार विसरली रीत!

 

वाट पाही दिनानाथ,

त्यांच्या लेकीची स्वर्गात!

तीही चालली तृप्तीत,

अलौकिक स्वर गात!

 

आज क्षितिजावरती,

सूर्य उगवला नाही!

गेल्या तमात बुडून,

आंधळ्याच दिशा दाही!

 

 -प्रमोद जोशी, देवगड.

9423513604

संग्राहक – मंजुषा सुनीत मुळे 

९८२२८४६७६२

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – संस्मरण ☆ लेखांक # 10 – मी प्रभा… सहेलियोंकी बाडी ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? आत्मकथन ?

☆ लेखांक# 10 – मी प्रभा… सहेलियोंकी बाडी ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

माझा जन्म पुणे जिल्ह्य़ातील एका छोट्याशा गावातल्या बागायतदार कुटुंबातला, भरपूर शेतीवाडी,घरात सुबत्ता होती, माझी आयुष्यातील पहिली मैत्रीण त्या गावातील कमल बडदे! ती माझ्यापेक्षा एक वर्षाने मोठी होती. आम्ही गावातल्या इतर मुलींबरोबर खेळायचो नाही.दोघीच काहीतरी खेळत असायचो. मी माॅन्टेसरीत असतानाच पुण्यात रहायला गेले पण सुट्टीत गावाकडे गेल्यावर मी आणि कमल भेटत असू.

पुण्यात भांडारकर रोडवर रहात असताना मालती पांडे ही मैत्रीण मिळाली तीही माझ्यापेक्षा एक वर्षाने  मोठी होती, आम्ही एकमेकींच्या घरी येत जात असू. आम्ही पुणं सोडून गावाकडे आलो, पुण्यातील जागा रिकामी करण्यासाठी आईवडील गेले तेव्हा मालू भेटायला आली होती,आणि मी भेटले नाही आणि पुण्यात परत येणार नाही,म्हणून ती खूप रडली होती असं आईनी सांगितलं होतं.

आम्ही गावाकडे गेल्यावर, कमल भेटली,तिचे वडील मिलिट्रीत होते,ते माझ्या वडिलांचे चांगले  मित्र होते ! तिची आई मुलांच्या शिक्षणासाठी घोडनदी-शिरूरला रहात होती.कमल नी आम्हाला शिरूरला चलण्याविषयी  सुचविले होते हे मला आजही आठवतंय. शिरूर आमच्या गावापासून जवळ असल्यामुळे सोयीचं म्हणून वडिलांनी शिरूर मध्येच बि-हाड केलं!

पण शिरूरमधे गेल्यावर कमलची आणि माझी मैत्री टिकली नाही. तिथे मला राणी गायकवाड, सरस बोरा,उज्वल धारिवाल, निर्मल गुंदेचा, संजीवनी कळसकर या मैत्रीणी मिळाल्या! राणी गायकवाड शी माझे पूर्वजन्मीचे काहीतरी ऋणानुबंध असावेत असं मला नेहेमीच वाटतं.तिची मैत्री म्हणजे एक सुंदर कविताच होती….त्या मैत्रीची फार मोठी किंमत मला मोजावी लागली  आहे. दहावी नंतर अकरावीला मी हिंगण्याच्या (कर्वेनगर ) महिलाश्रम हायस्कूल मधे हॉस्टेल वर राहू लागले तिथे जयश्री जमनारेची ओळख झाली . त्या हॉस्टेलवर मी महिनाभरही राहिले नाही, तिथे अजिबातच करमेना मग शिरूरचं मोडलेलं बि-हाड परत उभारलं ,राणी गायकवाड आणि जयश्री लोहकपूरे या खूप जिवलग मैत्रीणी पण त्या तरुण वयातच या जगातून निघून गेल्या!पण माझ्या आयुष्यात त्या दोघींना अनन्यसाधारण महत्त्व आहे.

या शाळेतील मैत्रीणी, काॅलेज मधे गेल्यावर  नवीन मैत्रीण मिळाली सिंधू  शेटे! तिची मैत्री अनेक वर्षे टिकली,पण दोन वर्षांपूर्वी तीही आजारपणाने गेली.

लग्न होऊन पुण्यात आले तेव्हा पहिली मैत्री यशवंत दत्त ची बायको वैजयंती महाडिकशी झाली. त्यानंतर काही वर्षांनी शिरूर च्या शाळेतली हुशार मुलगी माधुरी तिळवणकर ही भेटली, तिच्याशी मैत्री झाली ती तिच्या मिस्टरांमुळे, ते पूर्वी सोमवार पेठेत रहात होते, माधुरीचे पति अशोक कामत हे ह्यांचे मित्र बनले.माझ्या मुलाची आणि तिच्या मुलाचीही मैत्री झाली,एकमेकींच्या घरी जाणं हिंडणं फिरणं हे माधुरी बरोबर खूप झालं, फिरकी दिवाळी अंकाच्या संपादिका शोभा ठाकूर यांची ओळख माधुरीच्या मिस्टरांनी करून दिली, मी फिरकीची सहसंपादक झाले, असा साहित्य क्षेत्रात माझा शिरकाव झाला आणि शोभा ठाकूर ही मुंबई ची मैत्रीण मिळाली.त्याचकाळात लेखिका नंदा सुर्वे यांच्याशी खूप घनिष्ठ मैत्री झाली,नंदाताईंचं घर हे मला खूप शाश्वत, हक्काचं ठिकाण वाटतं!

पुढे “काव्यशिल्प”  या कवींच्या संस्थेत मीरा शिंदेंशी पहिल्यांदा मैत्री झाली.मीराताई मैत्रीण वाटण्यापेक्षा मोठी बहिण जास्त  वाटतात, त्यांच्यामैत्रीत एकप्रकारचं वेगळेपण आहे.

त्या नंतर मीनल बाठे, स्वाती सामक, स्नेहसुधा कुलकर्णी,ज्योत्स्ना चांदगुडे यांच्याशी खूप जवळची मैत्री झाली. आम्ही पाचजणींनी “मैत्रपंचमी” हे आत्मकथनपर पुस्तकही प्रकाशित केलं…..आयुष्याच्या जडणघडणीत आम्हा पाचजणींना एकमेकींची साथ खूप मोलाची ठरली आहे.

आयुष्यात खूप मैत्रीणी येऊन गेल्या ज्यांच्यामुळे आयुष्य सुखकर झालं अभिनेत्री ज्योती चांदेकर ही सुद्धा खूप जवळची मैत्रीण, तिच्यामुळे ओळख झालेली मीना जावडेकरही खूप प्रेमळ आणि काळजीवाहू मैत्रीण,आम्ही तिघी एकमेकींना खूप छान ऐकून घेतो आणि ऐकवतोही.या पाच सहा वर्षांत खूप जवळीक निर्माण झालेलं हे मैत्र !

खरंतर एक एक मैत्रीण ही एक एक कादंबरीच होईल! वर्षा कुलकर्णी ही सुद्धा खूप जवळची वृत्तबद्ध कवितेचा अभ्यास असलेली,माझ्यावर उदंड प्रेम करणारी मैत्रीण!

प्रसिद्ध कवयित्री आसावरी काकडे,अंजली कुलकर्णी, आश्लेषा महाजन, मृणालिनी कानिटकर या मैत्रीणी असल्याचा सार्थ अभिमान!

सामाजिक कार्यकर्ती सरोज फडके, स्नेहलता धूत ही स्वाध्याय महाविद्यालयात  एम.ए. करताना मिळालेली हुशार मैत्रीण ! शीला शेळके,भक्ती पंडित, मेघना कुलकर्णी,लाजवंती साळुंकेआणि कवयित्री वैशाली मोहिते ही नावं घेतल्याशिवाय ही “सहेलियोंकी बाडी” पूर्ण होऊच शकत नाही. “सहेलियोंकी बाडी” राजस्थानातलं राजकन्येला तिच्या मैत्रीणींबरोबर खेळण्यासाठी राजानी बनवलेलं एक उद्यान आहे. माझ्यासाठी माझी प्रत्येक मैत्रीण  राजकुमारी आणि तिची मैत्री हे एक  सुंदर  उद्यानच आहे !        

अजून बरीच नावं नाही लिहिली गेली, विस्मरणात गेली, ज्ञात अज्ञात सर्व मैत्रीणींना हा लेख समर्पित!

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ लेखनी सुमित्र की # 77 – दोहे ☆ डॉ. राजकुमार तिवारी “सुमित्र”

डॉ राजकुमार तिवारी ‘सुमित्र’

(संस्कारधानी  जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर डॉ. राजकुमार “सुमित्र” जी  को सादर चरण स्पर्श । वे आज भी  हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया।  वे निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणा स्त्रोत हैं। आज प्रस्तुत हैं आपके अप्रतिम कालजयी दोहे।)

✍  साप्ताहिक स्तम्भ – लेखनी सुमित्र की # 77 –  दोहे ✍

तब के नेता और थे, अब के नेता और ।

लुटा गए सर्वस्व वे, खींच रहे हैं कौर।।

 

अध: पतित हम हो गए, नए-नए है ढंग ।

वस्त्र हीनता ओढ़ कर, बनते फिरे दबंग।।

 

पूर्वोत्तर नींदे हुई, सफल हुए संथाल ।

अमृतसर में उग रहे, संशय के शैवाल।।

 

बदनाम ‘बार बाला’ हुई, राजनीति सरनाम।

वास्तव में है एक ही, दोनों ही के नाम।।

 

आजादी आई नहीं, आजादी के बाद।

‘होरी’ की सर पंचियत, सपने की बकवाद।।

 

© डॉ राजकुमार “सुमित्र”

112 सर्राफा वार्ड, सिटी कोतवाली के पीछे चुन्नीलाल का बाड़ा, जबलपुर, मध्य प्रदेश

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ अभिनव-गीत # 77 – “वाणी में कम्पन सा …” ☆ श्री राघवेंद्र तिवारी

श्री राघवेंद्र तिवारी

(प्रतिष्ठित कवि, रेखाचित्रकार, लेखक, सम्पादक श्रद्धेय श्री राघवेंद्र तिवारी जी  हिन्दी, दूर शिक्षा ,पत्रकारिता व जनसंचार,  मानवाधिकार तथा बौद्धिक सम्पदा अधिकार एवं शोध जैसे विषयों में शिक्षित एवं दीक्षित । 1970 से सतत लेखन। आपके द्वारा सृजित ‘शिक्षा का नया विकल्प : दूर शिक्षा’ (1997), ‘भारत में जनसंचार और सम्प्रेषण के मूल सिद्धांत’ (2009), ‘स्थापित होता है शब्द हर बार’ (कविता संग्रह, 2011), ‘​जहाँ दरक कर गिरा समय भी​’​ ( 2014​)​ कृतियाँ प्रकाशित एवं चर्चित हो चुकी हैं। ​आपके द्वारा स्नातकोत्तर पाठ्यक्रम के लिए ‘कविता की अनुभूतिपरक जटिलता’ शीर्षक से एक श्रव्य कैसेट भी तैयार कराया जा चुका है।  आज प्रस्तुत है एक भावप्रवण अभिनवगीत – वाणी में कम्पन सा …।)

☆ साप्ताहिक स्तम्भ # 77 ☆।। अभिनव-गीत ।। ☆

☆ || “वाणी में कम्पन सा …|| ☆

यादों में,गये साल के ।

ठहरे से लगते दिन

टप्पे-खयाल के ।।

 

कुछ तो बदलाव यहाँ

अब आया समाज में।

राग यमन बदल गया

जैसे खम्माज में।

 

ऐसा कुछ

जैसे रुमाल के।

कोनो पर लिखा है

थोडा सम्हाल के।।

 

वाणी में कम्पन सा

जाने क्या बैठ  रहा।

जठर से दिमाग तक

कुछ-कुछ जो ऐंठ रहा ।

 

जिसमें कुछ सपने

भोपाल के ।

मिले- जुले लगते

फिलहाल के ।।

 

सांसें जो सभागार में

चुपके  आ  ठहरीं-

रेशमी लिबासों में,

डूब गई हैं गहरीं ।

 

मौसम की धीमी

पड़ताल के।

देख रहे हैं तिरछे

पंछी एक डाल के ।।

 

©  श्री राघवेन्द्र तिवारी

10-02-2022

संपर्क​ ​: ई.एम. – 33, इंडस टाउन, राष्ट्रीय राजमार्ग-12, भोपाल- 462047​, ​मोब : 09424482812​

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – एकात्मता के वैदिक अनुबंध : संदर्भ- उत्सव, मेला और तीर्थयात्रा भाग -12 – रक्षाबंधन ☆ श्री संजय भारद्वाज

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। ) 

प्रत्येक बुधवार और रविवार के सिवा प्रतिदिन श्री संजय भारद्वाज जी के विचारणीय आलेख एकात्मता के वैदिक अनुबंध : संदर्भ – उत्सव, मेला और तीर्थयात्रा   श्रृंखलाबद्ध देने का मानस है। कृपया आत्मसात कीजिये। 

? संजय दृष्टि – एकात्मता के वैदिक अनुबंध : संदर्भ- उत्सव, मेला और तीर्थयात्रा भाग – 12 – रक्षाबंधन ??

भाई-बहन के सम्बन्धों का उत्सव मनाने वाला रक्षाबंधन संभवत: विश्व का एकमात्र पर्व है। इस पर्व में बहन, भाई को राखी बांधती है। पुरुष भी परस्पर राखी बांधते हैं। पुरोहित द्वारा भी राखी बांधी जाती है। अनेक स्थानों पर वृक्षों को भी राखी बांधी जाती है। ‘भविष्यपुराण’ के अनुसार इंद्राणी द्वारा निर्मित रक्षा सूत्र को देवगुरु बृहस्पति ने इंद्र के हाथों बांधते हुए स्वस्तिवाचन किया था।  रक्षासूत्र का मंत्र है-

येन बद्धो बलि राजा, दानवेन्द्रो महाबल:

तेन त्वामपि बध्नामि रक्षे मा चल मा चल:।

इस मंत्र का सामान्यत: यह अर्थ लिया जाता है कि दानवीर महाबली राजा बलि जिससे बांधे गए थे,(धर्म में प्रयुक्त किए गये थे)  उसी से तुम्हें बांधता हूं। ( प्रतिबद्ध करता हूँ)।  हे रक्षे!(रक्षासूत्र) तुम चलायमान न हो, चलायमान न हो। चलायमान न होने का अर्थ स्थिर अथवा अडिग रहने से है।

प्रकृति के विभिन्न घटकों, समाज के विभिन्न वर्गों को रक्षासूत्र बांधना/ उनसे बंधवाना राष्ट्रीय एकात्मता का प्रदीप्त और चैतन्य है। भारतीय समाज को खंडित भाव से खंड-खंड निहारने वाली आँखों के लिए यह अखंड भाव का अंजन है।

एक विचारप्रवाह है कि वैदिक काल से  रक्षाबंधन रक्षासूत्र एवं प्रतिबद्धता का उत्सव रहा। विदेशी आक्रमणकारियों के भारत में प्रवेश के पश्चात स्थितियाँ बदलीं। आक्रांताओं से  अपनी अस्मिता की रक्षा के लिए कन्याएँ, भाई को रक्षासूत्र बांधने लगीं। सहोदर की समृद्धि वह सुरक्षा के लिए कार्तिक शुक्ल द्वितीया को मनाया जाने वाला भाईदूज या यमद्वितीया का त्योहार भी इसी शृंखला की एक कड़ी है।

क्रमश: ….

©  संजय भारद्वाज

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार  सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय  संपादक– हम लोग  पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

writersanjay@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ व्यंग्य # 124 ☆ “वेलेंटाइन डे पर पत्र” ☆ श्री जय प्रकाश पाण्डेय

श्री जय प्रकाश पाण्डेय

(श्री जयप्रकाश पाण्डेय जी   की पहचान भारतीय स्टेट बैंक से सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी के अतिरिक्त एक वरिष्ठ साहित्यकार की है। वे साहित्य की विभिन्न विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। उनके  व्यंग्य रचनाओं पर स्व. हरीशंकर परसाईं जी के साहित्य का असर देखने को मिलता है। परसाईं जी का सानिध्य उनके जीवन के अविस्मरणीय अनमोल क्षणों में से हैं, जिन्हें उन्होने अपने हृदय एवं साहित्य में  सँजो रखा है।आज प्रस्तुत है बैंकर्स के जीवन पर आधारित एक अतिसुन्दर समसामयिक व्यंग्य वेलेंटाइन डे पर पत्र”।)  

☆ व्यंग्य # 124 ☆ “वेलेंटाइन डे पर पत्र” ☆ श्री जय प्रकाश पाण्डेय

_

…………………….

प्राण प्यारी प्रिये,

     जुग जुग जियो।

यहां कुशल सब भांति सुहाई,

      वहां कुशल राखें रघुराई,

रघुराई का सहारा इसलिए लेना पड़ रहा है कि वेलेंटाइन डे सामने खड़ा हो गया है, और हमें चिंता है कि इस साल तुम सुरक्षित रहो, पिछले साल वेलेंटाइन डे मनाते समय तुम्हारी उन लोगों ने पिटाई कर दी थी, हालांकि उस पिटाई में हम भी शामिल थे, अपन दोनों वेलेंटाइन डे के स्वागत के लिए गार्डन में एक दूसरे से चिपके बैठे थे तो पीछे से कुछ लोगों ने लठ्ठ पटक दिया था। इस बार का वेलेंटाइन डे तुम किसी और के साथ कहीं और मना लेना क्योंकि इन दिनों अपना उपयोग गधे की भांति किया जा रहा है। टारगेटों से लदे हुए हम कराह रहे हैं। इधर सरकारी योजनाओं का टारगेट पूंछ उठा कर खड़ा है, डिपाजिट और एडवांस का टारगेट  ओमीक्रान बन गया है। पत्नी ने जो टारगेट दिया था वो हवा में उड़ गया है। ससुराल वालों का साहब बने रहो के टारगेट से टांग टूट गई है। बच्चे पैदा करने का टारगेट  हवा हवाई हो गया है। इस बार गरीबी रेखा के साथ मजबूरी में वेलेंटाइन डे मनाने का टारगेट हाथ लगा है, तुम चिंता नहीं करना, एंज्वॉय में कमी न करना, भरपूर एंज्वॉय के साथ वेलेंटाइन डे मनाना, चाहे जिसके साथ मनाओ पर बीच-बीच में हमें भी याद कर लेना। इस बार यदि वसूली का टारगेट पूरा हो जाएगा तो तुम्हारे लिए बरेली के बाजार से सोने का झुमका लेकर आयेंगे, तुम चिंता नहीं करना क्योंकि अभी हम मीटिंग में बैठे हैं और तरह तरह के टारगेट पर टारगेटेड हैं। थोड़ी देर में बाॅस गाली देने का टारगेट पूरा करेंगे, इस बार बाॅस की चमचागिरी का टारगेट नयी आयी सुंदर सी स्टेनो को दिया गया है, इस बार बाॅस अपने केबिन में नयी स्टेनो के साथ वेलेंटाइन डे मनाने वाले हैं, और हमें एनपीए महारानी के साथ वेलेंटाइन डे मनाने का टारगेट दिया गया है। अपनी इज्जत अपने हाथ बचाने का टारगेट हमने फिक्स कर लिया है इससे लठ्ठ पड़ने का डर खतम हो गया है। तुम अपना बहुत ख्याल रखना, इस बार लठ्ठ चलाने वाले बहुतायत से घूम रहे हैं, इन्हें बड़े बड़े टारगेट दिये गये हैं। ये टारगेट पूरा करने बहुरुपिए बनकर आयेंगे, इसलिए सेफ वेलेंटाइन डे मनाने के तरीकों का सहारा लेना। बहुत बहुत शुभकामनाएं तुम इस वेलेंटाइन डे को खूब ऐश करो और तुम्हें खूब सुख मिले।

शेष कुशल है।

 

तुम्हारा टारगेटेड प्रेमी

© जय प्रकाश पाण्डेय

416 – एच, जय नगर, आई बी एम आफिस के पास जबलपुर – 482002  मोबाइल 9977318765

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ क्या बात है श्याम जी # 67 ☆ # बसंती बयार # ☆ श्री श्याम खापर्डे

श्री श्याम खापर्डे

(श्री श्याम खापर्डे जी भारतीय स्टेट बैंक से सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी हैं। आप प्रत्येक सोमवार पढ़ सकते हैं साप्ताहिक स्तम्भ – क्या बात है श्याम जी । आज प्रस्तुत है आपकी एक भावप्रवण कविता “# बसंती बयार  #”) 

☆ साप्ताहिक स्तम्भ ☆ क्या बात है श्याम जी # 67 ☆

☆ # बसंती बयार # ☆ 

मैं कब इनकार करती हूँ 

हाँ ! मै तुमसे प्यार करती हूँ 

 

जब हम पहली बार मिले थे

मिलकर दूर किये

जो शिकवे गिले थे

भ्रमर बन जिन कलियों को

तुमने चूमा था

वो आज पुष्प बन

उपवन में खिले थे

तुम्हारी खुशबू से ही

मैं महकती हूं

हाँ ! मैं तुमसे प्यार करती हूँ 

 

पीले पीले फूलों की रूत आई है

संग संग “बसंत”की खुशी लाई है

मदनोत्सव में डूबें है नर-नारी

मदन को जगाती यह पुरवाई है

मैं भी हर घड़ी

तुम्हारा इंतज़ार करतीं हूँ 

हाँ ! मैं तुमसे प्यार करती हूँ 

 

“बसंत” प्रेमियों के लिए उपहार है

जिसके कण कण में बस

प्यार ही प्यार है

फूलों से सजे स्वागत द्वार है

सजनी के गले में बाहों का हार है

तुमसे मिलने को

मन ही मन मैं दहकती हूँ 

हाँ ! मै तुमसे प्यार करती हूँ 

 

इस रूत में,

कामदेव-रति पृथ्वी पर आते हैं

प्रेम प्रणय का संदेश साथ लाते हैं

तुम भी आ जाओ,

कहीं बीत ना जाए यह घड़ी

मैं प्रणय-विव्हल

तुमसे बार बार कहती हूँ 

हाँ ! मै तुमसे प्यार करती हूँ 

हाँ ! मै तुमसे प्यार करती हूँ /

 

© श्याम खापर्डे 

फ्लेट न – 402, मैत्री अपार्टमेंट, फेज – बी, रिसाली, दुर्ग ( छत्तीसगढ़) मो  9425592588

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कविता ☆ “श्री रघुवंशम्” ॥ हिन्दी पद्यानुवाद सर्ग # 12 (71-75)॥ ☆ प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

॥ श्री रघुवंशम् ॥

॥ महाकवि कालिदास कृत श्री रघुवंशम् महाकाव्य का हिंदी पद्यानुवाद : द्वारा प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

☆ “श्री रघुवंशम्” ॥ हिन्दी पद्यानुवाद सर्ग #12 (71-75) ॥ ☆

सर्गः-12

सेन सहित श्रीराम तब जाकर सागर पार।

घेरा लंका का बना सोने का प्राकार।।71।।

 

हुआ युद्ध भीषण वहाँ वानर-राक्षस बीच।

फैला जय-जय घोष औ’ मची रक्त की कीच।।72।।

 

वृक्षों से परिधा कटी प्रस्तर से धन चूर।

नख से शस्त्र विनष्ट हुये पर्वत से गज दूर।।73।।

 

देख राम का कटा सिर, सीता हुई बेहोश।

त्रिजटा ने माया बता दिया उन्हें संतोष।।74।।

 

कहा सिया ने- खुशी है जीवित है श्रीराम।

पर पहले मृत जान भी मरी न मैं विधि वाम।।75।।

 

© प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’   

A १, विद्युत मण्डल कालोनी, रामपुर, जबलपुर. म.प्र. भारत पिन ४८२००८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कसे? ☆ श्रीमती अनुराधा फाटक

श्रीमती अनुराधा फाटक

? कवितेचा उत्सव ?

☆ कसे? …  ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆ 

कसे देऊ दान तुला

हात माझे रिते रे…

कसे ढाळे अश्रू तरी

नेत्र झाले कोरडे रे…

कशी काढावी समजूत

ओठ माझे बंद रे…

कशी येऊ तुजसमोर

पायी साखळदंड रे…

काय बोलू तुजसवे

शब्द झाले मुके रे…

 

© श्रीमती अनुराधा फाटक

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares