मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ भेट ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

? कवितेचा उत्सव ?

☆ भेट ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

भेटून आले तुला,

 मनास हर्ष झाला!

जीवनी या जगण्याला

परिसस्पर्श झाला !

 

ओढ तुला भेटण्याची,

 मनी सारखी लागली !

बोलले नाही जरी,

 भाव जाणलास तूही!

 

ओढ तुझी अनामिक,

 असतेच ही मनाला!

फुलवून आनंद देते,

 माझ्या खुळ्या मनाला!

 

आठवण तुझीच मजला ,

 येथेच हर क्षणाला !

समजून तूच घे या,

माझ्या खुळ्या मनाला!

 

नको रागावूस तू,

 चेहरा ठेव हासरा!

तुझ्या आनंदातच,

 आहे मला किनारा!

 

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नाव ☆ कै. पुरुषोत्तम शिवराम रेगे ☆

? कवितेचा उत्सव ?

☆ ☆ नाव ☆ कै. पुरुषोत्तम शिवराम रेगे ☆

उलटलेल्या

या दुपारच्या वेळी

ऊन स्वतःला विसरलेलं असतं.

क्वचित कुठे

त्याचे पाण्याने मुडपलेले ढलपे दिसतात

जरि मोकळ्या मोतिया आकाशाला 

त्याचा मागमूसही नसतो

भोवताली पाहताना

पायाखालची वाट हरवलेली असते.

तुला

हे सांगितलं तर खर वाटणार नाही…

त्या उन्हाला मी तुझं नाव दिलेलं असतं.

`

 – कै. पुरुषोत्तम शिवराम रेगे  (पु.शि रेगे)

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ सुजित साहित्य # 100 – अष्टविनायक…! ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

? साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य # 100 ?

☆ अष्टविनायक…! 

मोरगावी मोरेश्वर

होई यात्रेस आरंभ

अष्ट विनायक यात्रा

कृपा प्रसाद प्रारंभ….!

 

गजमुख सिद्धटेक

सोंड उजवी शोभते

हिरे जडीत स्वयंभू

मूर्ती अंतरी ठसते….!

 

बल्लाळेश्वराची मूर्ती

पाली गावचे भूषण

हिरे जडीत नेत्रांनी

करी भक्तांचे रक्षण….!

 

महाडचा विनायक

आहे दैवत कडक

सोंड उजवी तयाची

पाहू यात एकटक….!

 

थेऊरचा चिंतामणी

लाभे सौख्य समाधान

जणू चिरेबंदी वाडा

देई आशीर्वादी वाण…!

 

लेण्याद्रीचा गणपती

जणू निसर्ग कोंदण

रुप विलोभनीय ते

भक्ती भावाचे गोंदण….!

 

ओझरचा विघ्नेश्वर

नदिकाठी देवालय

नवसाला पावणारा

देई भक्तांना अभय….!

 

महागणपती ख्याती

त्याचा अपार लौकिक

रांजणगावात वसे

मुर्ती तेज अलौकिक….!

 

अष्टविनायक असे

करी संकटांना दूर

अंतरात निनादतो

मोरयाचा एक सूर….!

 

© सुजित कदम

संपर्क – 117,विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ क्रांतितले अप्रकाशित तारे – भाग-1 ☆ सुश्री प्रज्ञा मिरासदार ☆

? विविधा ? 

☆ क्रांतितले अप्रकाशित तारे – भाग-1 ☆सुश्री प्रज्ञा मिरासदार ☆ 

क्रांतीतले अप्रकाशित तारे – रानी मां गायडिल्लू (Gaidinlue)

ब्रिटिश काळात इंग्रजांच्या अत्याचाराच्या विरोधात असंख्य क्रांतिकारकांनी देशासाठी लढे दिले. कित्येकांनी प्राणही गमाविले. त्या सर्वांचीच नावे प्रकाशात आली नाहीत.काही जणांचे बलिदान खूप गाजले. आजही त्यांची नावे अभिमानाने घेतली जातात. पण काही जणांनची नावे फक्त इतिहासालाच माहीत आहेत.त्यांचे कार्य खूपच महान आहे. पण त्याची कुणाला फारशी माहिती नाही. त्यांच्यापैकीच एक नाव आहे ” रानी मां गायडिन्ल्यू”.

या मणिपूर राज्यात तेमेलून जिल्ह्यातील ल्युंकाऊं या गावी जन्मल्या. जन्मतारीख होती २६ जानेवारी, १९१५. त्यांचे वडील लाॅथॅनाॅंग हे त्यांच्या राॅन्ग माई या समाजातील मोठे समाजसुधारक कार्यकर्ते होते. आई कारोटल्यू या अत्यंत धार्मिक, सात्विक अशा गृहिणी होत्या.या दांपत्याला आठ मुले मुली होत्या, त्यापैकी  रानी ही त्यांचे सातवे अपत्य होते.

पूर्वोत्तर राज्यातील राणी लक्ष्मीबाई म्हणून त्या नागा लोकांमध्ये प्रसिद्ध होत्या. त्यांना ” क्रांतीच्या वीरांगना”  म्हटले जाई. इंग्रजांविरुद्ध त्यांनी वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी आंदोलनात सहभाग घेतला. कारण इंग्रज नागा लोकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन त्यांना ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याची सक्ती करत होते. हे इंग्रज नागा लोकांवर अतोनात अत्याचार  करीत होते. त्यासाठी रानी मां गायडिन्ल्यू यांनी त्यांचा चुलत भाऊ हैपॉव जाडूनॉन्ग याने सुरू केलेल्या चळवळीत उडी घेतली. ही चळवळ Heraka Religious Movement म्हणून ओळखली जायची. ही धार्मिक स्वरूप असलेली चळवळ नंतर राजकीय स्वरूपात परिवर्तित झाली. त्यामुळे रानी मां ही प्रथम अध्यात्मिक नेता म्हणून ओळखली जायची ती आता राजकीय नेता बनली.

इंग्रज लोकांनी तिला  ” पूर्वोत्तर की आतंकवादी” म्हणून घोषित करून टाकले होते. तिला पकडण्यासाठी इंग्रजांनी प्रथम २०० रू. , नंतर ५०० रू. अशी बक्षिसे जाहीर केली. तरीही ती पकडली गेली नाही. म्हणून इंग्रज सरकार उदार झाले. त्यांनी साऱ्या विभागाचा कर रद्द करण्याची घोषणा केली होती.

वयाच्या सतराव्या वर्षी रानी मां गायडिन्ल्यू यांनी ब्रिटिशांविरुद्ध चळवळीत प्रत्यक्ष भाग घेतला. आणि तिने Zeliangrong Three Tribe नावाच्या आर्मीची स्थापना केली. त्याचसाठी तिला. १९३२ साली इंग्रजांनी तुरूंगात डांबले. तिचा भाऊ, चळवळीतील सहकारी, नेता हैपॉव याला इंग्रजांनी १९३९ साली फाशीची शिक्षा दिली.

हरिपूर जेलमधून तिची  सुटका व्हावी म्हणून सुभाषचंद्र बोस यांच्या अध्यक्षतेखाली काॅ॑ग्रेसने ठराव संमत केला. तरीही तिची सुटका झाली नाहीच. जेलमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू तिला भेटायला गेले होते. त्यांनी ” नागाओंकी रानी”  असा तिचा गौरव केला. ते रानीपुढे नतमस्तक झाले. इंग्रजांनी सुनावलेली आजीवन कारावासाची शिक्षा ब्रिटिश देशातून जाईपर्यंत तिने भोगली.

तिचे कार्य झाशीच्या राणी इतकेच महान होते. ब्रिटिशांनी नागा लोकांचे जे हाल केले , त्यांना ख्रिश्चन बनण्यासाठी अत्याचार केले, त्याविरुद्ध ती मणिपूर, नागालँड च्या गावागावात फिरली.निरक्षर, अडाणी नागा आदिवासी हे ब्रिटिश ईसाईंचे लक्ष्य होते. ते वेगवेगळी आमिषे दाखवून त्यांना ख्रिश्चन बनवीत. त्याविरोधात रानी मां आदिवासी लोकांमध्ये जागृती करण्याचे काम करू लागली.

त्यासाठी तिने देवपूजा, भजन, कीर्तन ,या हिंदू पूजापाठ पद्धतीचा अवलंब करण्यास सुरुवात केली. आदिवासी लोकांमध्ये ती हिंदू धर्माविषयी जागृती, प्रेम निर्माण करू लागली.  तिने जुनी भजने लोकांमध्ये प्रसारित केली. तसेच नवी नवी भजने लिहायला ,गायला, शिकवायला सुरुवात केली. आणि जनजागृती करून लोकांना धर्मांतर करण्यापासून परावृत्त केले. रानी मां गायडिन्ल्यू फार शिकलेली नव्हती.पण तिच्या कार्याचा धडाका पाहून इंग्रज सरकार आणि ईसाई यांच्या छातीत मात्र धडकी भरत होती.

रानी मां गायडिन्ल्यू या Daughter of the Hills म्हणून नागालँड मणिपूर मध्ये सुप्रसिद्ध होत्या. त्या न घाबरता, न डगमगता नागांच्या हक्काकरिता ब्रिटिश सत्तेविरुद्ध सतत लढे देत राहिल्या. वयाची उमेदीची चौदा पंधरा वर्षे  त्यांना तुरूंगवास सोसावा लागला.

क्रमशः…

© सुश्री प्रज्ञा मिरासदार

पुणे 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ गटुळं – भाग-2 ☆ श्री आनंदहरी ☆

श्री आनंदहरी

? जीवनरंग ❤️

☆ ग्रामीण एकांकिका – गटुळं – भाग-2 ☆ श्री आनंदहरी 

(रंगाच्या घराचा सोपा… सोप्यात फर्निचर असे काही नाही.. भिंतीवर देवाचे कॅलेंडर / चित्र..  भिंतीकडेला घोंघडं अंथरलंय..  तिथं भामा  काहीतरी भाजी निवडत किंवा तत्सम काहीतरी घरातील काम करीत बसलीय…)

भामा  :-  (दाराकडे पहात चाहूल घेत स्वतःशीच ) आजून कसं आलं न्हायती..( क्षणभराने ) आलं वाटतं…( खाली मान घालून मुसमुसायला सुरवात करते .. मध्येच डोळ्याला पदर लावते )

रंगा :- ( हातातलं खुरपं कोपऱ्यात ठेवून.. खांद्यावरचा टॉवेल काढून तोंड पुसत )

 भामे, वाईच पानी आण ग..

(भामाचं एक नाही न दोन नाही .. तिचं मुसमुसणं चालूच … ते लक्षात न येऊन ..खाली बसत )

ए s भामे, ऐकाय आलं न्हाय का काय ? आगं वाईच पानी आण जा की…

(भामाकडे बघतो.. ती रडतीय हे ध्यानात येताच आश्चर्य वाटून ..)

(स्वगत ) ऑ SS ! वागिनींच्या डोळ्यांत पानी ? …  वागीन बी कवातरी रडती ह्ये ठावं न्हवतं ? जाऊंदेल… ईचारपुस कराय पायजेल… न्हायतर माजं काय खरं न्हाय बाबा… इचारतोच काय झालंय ती..

(भामा जवळ जाऊन बसत काळजीच्या स्वरात ) 

भामा.. ए ss भामा,  आगं काय झालं गं…?

(नवऱ्याला जवळ येऊन विचारताना पाहून भामाचं मुसमूसणे जास्तच मोठयाने सुरू होतं..) 

आगं, रडू नगं..गप .…आता काय झालंय  ती तरी सांगशील का मला ? उगं उगं… रडू नगं… तू सांगीतल्याबिगर मला तरी कसे उमगंल गं ? काय झालंया  ? सांग बगू ..

भामा :- ( रडत रडत ) तुमची आय..

रंगा :- माझी आय…? ( रडायचे नाटक करत ) आयं गss  असं कसं गं झालं …. आगं मी येस्तवर  वाट का न्हाय ग बगीतलीस…अशी कशी गेलीस आमास्नी सोडून.. आता आमी कसं ग जगायचं…भामीचा तरी ईचार करायचा हुतास की गं ss!  तुज्याबिगर आता ती कशी ग ऱ्हाईल..?

(भामाच्या जवळ सरकून / गळ्यात पडून रडण्याचं नाटक करीत ) आय गं ss !..असं कसं ग झालं माज्या आयचं..?

भामा :- ( क्षणभर त्याच्याकडे पहात रडणं विसरून नेहमीच्या आवाजात ) ओ ss गप बसा वाईच .. काय बी झाल्यालं न्हाय म्हातारीला…

रंगा :-  (रडण्याचं सोंग चालूच ठेवत ) काय बी झाल्यालं न्हाय म्हंजी … ? उगा माजी समजूत काडु नगंस… तुजी आयवरली माया ठावं न्हाय व्हय मला.? आगं,  तू रडतीयास म्हंजी… माजी आयच… आये.. आये गं….!

भामा :- (चिडून) गप बस्तायसा का वाईच..? लागलं लगीच ‘ आय  ss आय गं ‘ कराय.. काय हुतंय म्हातारीला ? ब्येस ठणठणीत हाय ती..

रंगा :- (रडण्याचं नाटक थांबवत ) आँ ss !  खरंच सांगतीयास ? मग तू कशापायी रडीत हुतीस गं ?

भामा :- (स्वगत) हेंच्या रडण्यात इसरूनच गेले हुते .. बरं झालं ध्येनात आणलं ह्येनी त्ये…

(डोळ्याला पदर लावत मुसमुसत रडायला लागते )

रंगा :- (स्वगत)  द्येव जवा बायकासनी काळीज वाटीत हुता, डोळ्यात टचकन दाटणारं पाणी वाटीत हुता तवा ही बया न्हवतीच ततं … द्येव आपला काळजीत पडला ..येक काळीज आन डोळ्यांतलं पाणी शिलकीत ऱ्हायलं कसं…. ? कोन ऱ्हायलं बिनकाळजाचं म्हणीत द्येव आपला हिकडं बघतुय.. तकडं बघतुय …तर ही आपली लांब दुसरीकडं … लांडग्यासनी काळीज वाटीत हुतं त्या लायनीत..  हिला बायकांचं काळीज द्याला द्येव पळत पळत ततंवर जातूय तर  काय ? अवो, लांडग्यांचं काळीज हिला आगुदरच बसवून बी झाल्यालं…

(भामाकडं जात..  न रडता काळजीनं ) आगं, मग तुला झालंय तरी काय रडाय ? आतातरी  सांगशील का ?

भामा :- (रडत – मुसमुसत ) तुमची आय मला न्हाय न्हायती बोल्ली ?

रंगा :- ( आश्चर्याने ) क्काsय ? माजी आय ? आन तुला बोलली.. (स्वगत )… गाईनं कवा वागीणीला खाल्ल्यालं म्या तरी  ऐकलं न्हवतं…

(भामाकडं बगत) गप गं गप.. सांजंच रडू नगं.. गरीब-बिचारी माझी माय ती ?

भामा :- (रडणं विसरून एकदम चिडून) काय म्हणलासा ?

रंगा :-  काय म्हनलो ?

भामा :- (चिडून) मगाधरनं तुमची आय न्हाय न्हाय ती बोलली म्हणून मला रडू येतंया.. जीवाला लागलं माज्या.. मी आपली दुपारधरनं रडत बसलीया.. पाण्याचा योक  घोटसुदीक पोटात गेल्याला न्हाय माज्या… आन तुमी… ‘ गरीब ती माजी माय ‘ म्हंतायसा व्हय ? तुमची माज्यावं काय मायाच न्हाय ऱ्हायल्याली बगा ..

रंगा :- (साळसूद पणाचा आव आणत) मी  माय म्हनलो ? (स्वगत) कवातरी चुकून खरं याचंच म्हणा  तोंडांत …(भामाला) न्हाय गं भामे, न्हाय ! आगं मी तर ‘ गरीब ती माजी गाय ‘ आसं म्हनलो …लय रडलीस त्येनं तुला गायचं माय ऐकू आलं असंल… आसं हुतं कवा कवा….

भामा :- (चिडूनच)  न्हाय .. तुमी ‘ माय ‘ म्हनलासा..

रंगा :- न्हाय गं.. मी गाय च म्हंलो… तू माय ऐकलंस..इस्वास नसंल तर कुनालाबी ईचार. (स्वगत )  हिला एक माजं कवा पटतच न्हाय..  मी माय म्हनलो आन आमच्या या भामीनं ‘ माय ‘ ऐकलं .. आता ह्येला ऐकनं म्हनायचं का काय ? (  भामाकडे पहात )   बरं ती जाऊंदेल.. तू गप हो बगू आता.. आपुन त्या म्हातारीचं घर उनात बांदु… (स्वगत) तसं.. माज्या गरीब बिचाऱ्या मायचं घर हिनं कवाच उनात बादलं आसंल म्हणा.. आसल्या कामात लईच उरक हाय तिला..( भामाकडॆ पहात ) भामे,गप रडू नगं..बरं, तुज्यासाठनं च्या आणू का करून ?

भामा :- नगं, मी आनते च्या .. तुमी, दमून आलायसा ..

रंगा :- व्हय.. पर तू बी दमली अश्शील ..( स्वगत ) रडून रडून

भामा :-  आंत्ये मी च्या करून..( आत जाते. जाताना  ‘ कसे मी गुंडाळलं ‘ अशा अर्थाने विजयी मुद्रेने प्रेक्षकांकडे पहात आत जाते )

रंगा :- (स्वगत) ही आसं हाय … आय कायबी बोल्ली नसंल हिला , ही ठावं हाय मला.. अवो, गरीब गाईवानी हाय ती.. आता लईच तरास दिल्याव.. गाय कवातरी शिंगं उगारायचीच..जाऊंदेल .. दोन दिसांनी भामी वाईच निवाळल्याव आणावं आयला..तरी बरं पल्याड धाकला येसवंता हाय.. दोन रोज त्यो तरी बगील आयचं..पर एकांद्या माऊलीला योकच ल्योक आसंल… आन आसली सून पदरात आसल.. त्या माऊलींचं काय खरं न्हाय बगा..  हीच खोडील हाय; ती काय ठावं न्हाय वी मला ?..पर सांगायचं कुनाला ? अवो, पदरात निखारा बांदल्याला हाय ..पर चटकं बसत्यात म्हणाय बी येत न्हाय ..आन टाकून बी द्येता येत न्हाय… उगा आपलं,  ब्येस गार गार लागतंय म्हनायचं .. दुसरं काय..

भामा :- (चहा घेऊन येत ) काय म्हनलासा.. चटकं ? कसलं चटकं बसाय लागल्यात तुमास्नी ?

रंगा :-  (स्वगत ) ही आसं हाय… नगं ती,  लगीच ऐकाय जातंय…आनं आपल्यास्नी आकायचं ती आयकाय येऊनबी न आकल्यागत कराय लागतंय.. ( भामाकडे वळून )  आगं,  डोळ्यांत पानी हाय .. तुला लय दुक बी झाल्यालं हाय.. आन डोसक्यात काय-बाय ईचार असणार.. तवा म्हणलं,  च्या येवस्तीत आन.. गरम आस्तुय .. चटकं बसतीली.. (रंगा चहा घेतो.)

भामा :-  (चहा घेता घेता परत डोळ्यात पाणी आणत)  ह्ये बगा, म्या काय तुमच्या आय ला घरात न्हाय घ्याची .. आधीच सांगून ठेवत्ये…

रंगा :-  हं . म्या कवा तुज्याम्होरं बोलतो काय गं  ? आगं, माजं नशीब म्हनून तुज्यावानी बायकू मला मिळालीया… तू काय म्हंशील तसं…  भामे, लै भुका लागल्यात वाईच जेवनाचं बगतीस काय ..?

भामा :-  व्हय .. पर तुमी सपरात जायाचं न्हाय.. माज्यासंगती चला बगू आत… ( भामा आत जाते ) (आतूनच )

आलासा का न्हाय ? या लगुलग..

रंगा :-  आलो न्हवका.. ( प्रेक्षकांकडे बघून – थोडसं वाकून – दोन्ही हात डोक्यावर शिंगासारखे धरत..नंदीबैलासारखी मान हलवत ” गुबुगुबु ss गुबगुबु ” असा तोंडाने आवाज करत रंगमंचावर दोन तीन फेऱ्या मारून  म्हणतो..)

आमच्या भामीला नवरा न्हवं.. ,ह्यो असला  गुबुगुबु पायजेल…चला गुबुगुबुराव…गुबु गुबु.. गुबु गुबु..( आणखी एक फेरी मारून गुबु गुबु करत आत जात असतानाच प्रकाश कमी होत होत अंधार होतो )

अंधार

क्रमशः…

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ विदुषी घोषा… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

सौ कुंदा कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ विदुषी घोषा… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ☆ 

ऋग्वेद काळात अनेक ऋषिका होऊन गेल्या. त्यातील घोषा या विदुषी ची कथा आपण ऐकूया.

घोषा ही दीर्घतामस ऋषींची नात व कक्षीवान ऋषींची कन्या. ऋषींच्या आश्रमात ती सगळ्यांची लाडकी होती पण दुर्दैवाने लहानपणीच तिच्या सर्व अंगावर कोड उठले. त्यामुळे तिने लग्नच केले नाही. अध्यात्मिक साधनेत तिने स्वतःला गुंतवून टाकले. तिला अनेक मंत्रांचा साक्षात्कार झाला. तिने स्वतः अनेक मंत्र आणि वैदिक सूक्ते रचली. ऋग्वेदाच्या दशम मंडलात तिने दोन पूर्ण अध्याय लिहिले आहेत. प्रत्येक अध्यायात 14/ 14 श्लोक आहेत. आणि सामवेदामध्ये सुद्धा तिचे मंत्र आहेत.

ती साठ वर्षांची झाली. त्यावेळेला तिच्या एकदम लक्षात आले की आपल्या पित्याने अश्विनीकुमारांच्या कृपेमुळे आयुष्य, शक्ती आणि आरोग्य प्राप्त केले होते. आपणही अश्विनीकुमार यांना साकडे घालू.

अश्विनी कुमार यांना प्रसन्न करून घेण्यासाठी घोषाने उग्र तप केले.”अभूतं गोपा मिथुना शुभस्पती प्रिया

अर्यम्णो  दुर्या अशीमहि ” अश्विनीकुमार प्रसन्न झाले आणि त्यांनी तिला वर मागण्यास सांगितले. तिच्या इच्छेनुसार त्यांनी तिचे कोड नाहीसे केले  व ती रूपसंपन्न यौवना बनली. त्यानंतर तिचा विवाह झाला. तिला दोन पुत्र झाले. त्यांची नावे तिने घोषेय आणि सुहस्त्य अशी ठेवली. दोघांना तिने विद्वान बनवले. युद्ध कौशल्यात देखील ते निपुण होते.

घोषाने जी सूक्ते रचली याचा अर्थ असा आहे की,”हे अश्विनी देवा आपण

अनेकांना रोगमुक्त करता.आपण अनेक रोगी लोकांना आणि दुर्बलांना नवीन जीवन देऊन त्यांचे रक्षण करता. मी तुमचे गुणगान करते .आपण माझ्यावर कृपा करून माझे रक्षण करा आणि मला समर्थ बनवा. पिता आपल्या मुलांना उत्तम शिक्षण देतो तसे उत्तम शिक्षण, आणि ज्ञान तुम्ही मला  द्या. मी एक ज्ञानी आणि बुद्धिमान स्त्री आहे. तुमचे आशीर्वाद मला दुर्दैवा पासून वाचवतील. तुमच्या आशीर्वादाने माझ्या मुलांनी आणि नातवांनी चांगले जीवन जगावे. तिच्या तपश्‍चर्येने प्रसन्न होऊन  अश्विनी कुमारांनी तिला मधुविद्या  दिली . वैदिक अध्यापन शिकवले. रुग्णांना रोगमुक्त  करण्यासाठी , अनुभव, ज्ञान मिळवण्यासाठी, त्वचेच्या आजारापासून बरे होण्यासाठी गुप्‍त शिक्षण विज्ञान शिकवले.

अशाप्रकारे कोडा सारख्या दुर्धर रोगाने  त्रासलेल्या या घोषाने वेदांचे रहस्य उलगडून दाखवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले. तिने एकाग्रतेने अभ्यास केला आणि तिला वैदिक युगातील धर्मप्रचारिका ब्रह्मवादिनी घोषा हे स्थान प्राप्त झाले. अशा या बुद्धिमान, धडाडीच्या वैदिक स्त्रीला शतशत नमन.

© सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये

क्यू 17,  मौर्य विहार, सहजानंद सोसायटी जवळ कोथरूड पुणे

मो. 9527460290

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सुखाची शिल्पकार ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

?  वाचताना वेचलेले ? 

☆ सुखाची शिल्पकार ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

वाढदिवसामीच मला चाॅकलेट दिलं,

एक घट्ट मिठी मारून “लव यू ” म्हटलं,

मीच केलय एक प्राॅमिस मला,

कायम खूश ठेवणार आहे मीच मला….

Priority लिस्टवर माझं स्थान नेहेमीच शेवटी,

ते आणिन आता थोडतरी वरती,

सगळ्यांचं सगळं करताना विसरणार नाही स्वतःला,

मीच एक फूल दिलय आज मला….

खूप खूप वर्षांनी खाली ठेवलाय

तो सुपरवुमनचा किताब,

मन होऊन जाऊदे फुलपाखरू आज…

नाही जमत मला तिच्यासारखा स्वयंपाक,

आणि येत नाही तिच्यासारखं रहायला झक्कास,

येत नाही टाईम मैनेजमेंट मला,

काँम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक गैजेट्स मधे मी “ढ” गोळा….

आज मान्य मला माझे सारे दोष अन् कमतरता,

माझ्यातला वैशाख,

कारण आज उतरवून ठेवलाय,

मी आदर्श भारतीय नारीचा पोषाख….

हिचे केस, तिची उंची, हिचा रंग, तिचा आवाज,

नको ती तुलना, नको ती इर्ष्या,

तोच स्त्रीयांचा खरा शाप…

आज मी मिळवणार आहे अपूर्णतेतल्या पूर्णतेचा उःशाप….

मी शिकवणार आहे मला, जशी आहे तशी आज,

आरश्यासमोर उभी राहून बघणार आहे स्वतःला,

ना कोणाची

बायको, सुन, आई, मुलगी म्हणून… फक्त मला…

गुणदोषांसकट स्वतःच्या प्रेमात पडायचय मला…

का हवा मला

नेहेमीच घोड्यावरून येणारा स्वप्नातला राजकुमार?

मीच होणार माझ्या सुखाची शिल्पकार…

आत्ममग्नतेच्या तळ्याकाठी बसेन काही काळ,

आणि फुलवेन स्वतःच्याच अस्तित्वाची बाग!!!

Happy Valentine’s day  To All Women

 

संग्राहक – मंजुषा सुनीत मुळे 

९८२२८४६७६२

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ तन्मय साहित्य#120 ☆ जैसे-जैसे उथली होती गई नदी… ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ ☆

श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’

(सुप्रसिद्ध वरिष्ठ साहित्यकार श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ जी अर्ध शताधिक अलंकरणों /सम्मानों से अलंकृत/सम्मानित हैं। आपकी लघुकथा  रात  का चौकीदार”  महाराष्ट्र शासन के शैक्षणिक पाठ्यक्रम कक्षा 9वीं की  “हिंदी लोक भारती” पाठ्यपुस्तक में सम्मिलित। आप हमारे प्रबुद्ध पाठकों के साथ  समय-समय पर अपनी अप्रतिम रचनाएँ साझा करते रहते हैं। आज  नर्मदा जयंती के पुनीत अवसर पर प्रस्तुत है भावप्रवण रचना “जैसे-जैसे उथली होती गई नदी…”)

☆  तन्मय साहित्य  #120 ☆

☆ जैसे-जैसे उथली होती गई नदी… ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ ☆

जैसे-जैसे उथली होती गई नदी

वैसे-वैसे अधिक उछलती गई नदी।

 

अपने मौसम में, प्रभुता पा बौराई

तोड़ दिए तटबंध, मचलती गई नदी।

 

तीव्र वेग से आगे बढ़ने की चाहत

प्रतिपल तिलतिल कर के ढलती गई नदी। 

 

हवस भरे मन में कब सोच समझ रहती             

उद्वेलन में रूप बदलती गई नदी।

 

उतरा ज्वर यौवन का तन-मन शिथिल हुआ

मदहोशी में, खुद को छलती गई नदी।

 

बनी कोप भाजन अपनों से ही वह जब

है अंजाम किए के, जलती गई नदी।

 

तेवर सूरज के सहना भी तो  जायज

हो सचेत यूँ  स्वयं सुधरती गई नदी।

 

© सुरेश कुशवाहा ‘तन्मय

जबलपुर/भोपाल, मध्यप्रदेश, अलीगढ उत्तरप्रदेश  

मो. 9893266014

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ सलमा की कलम से#13 ☆ गीत – देह महक उठी— ☆ डॉ. सलमा जमाल ☆

डॉ.  सलमा जमाल

(डा. सलमा जमाल जी का ई-अभिव्यक्ति में हार्दिक स्वागत है। रानी दुर्गावती विश्विद्यालय जबलपुर से  एम. ए. (हिन्दी, इतिहास, समाज शास्त्र), बी.एड., पी एच डी (मानद), डी लिट (मानद), एल. एल.बी. की शिक्षा प्राप्त ।  15 वर्षों का शिक्षण कार्य का अनुभव  एवं विगत 22 वर्षों से समाज सेवारत ।आकाशवाणी छतरपुर/जबलपुर एवं दूरदर्शन भोपाल में काव्यांजलि में लगभग प्रतिवर्ष रचनाओं का प्रसारण। कवि सम्मेलनों, साहित्यिक एवं सांस्कृतिक संस्थाओं में सक्रिय भागीदारी । विभिन्न पत्र पत्रिकाओं जिनमें भारत सरकार की पत्रिका “पर्यावरण” दिल्ली प्रमुख हैं में रचनाएँ सतत प्रकाशित।अब तक लगभग 72 राष्ट्रीय एवं 3 अंतर्राष्ट्रीय पुरस्कार/अलंकरण। वर्तमान में अध्यक्ष, अखिल भारतीय हिंदी सेवा समिति, पाँच संस्थाओं की संरक्षिका एवं विभिन्न संस्थाओं में महत्वपूर्ण पदों पर आसीन। ) 

आपके द्वारा रचित अमृत का सागर (गीता-चिन्तन) और बुन्देली हनुमान चालीसा (आल्हा शैली) हमारी साँझा विरासत के प्रतीक है। 

आप प्रत्येक बुधवार को आपका साप्ताहिक स्तम्भ  ‘सलमा की कलम से’ आत्मसात कर सकेंगे। आज प्रस्तुत है एक अतिसुन्दर गीत  “देह महक उठी”। 

✒️ साप्ताहिक स्तम्भ – सलमा की कलम से # 13 ✒️

?  गीत – देह महक उठी —  डॉ. सलमा जमाल ?

(गीत बसंत)

देह महक उठी ,

स्वासों की सुगंध में ।

छाया ऋतुराज बसंत ,

गीत और छंद में ।।

 

व्याप्त है चहुं ओर ,

अनुपमता निसर्ग की ,

धरती पर छटा आज ,

बिखरी है स्वर्ग की ,

प्रसन्नता मानव ,

विहग – खग – वृंद में ।

छाया ————————— ।।

 

सुरभित हुईं दिशाएं ,

परिणति दृष्टि विनिमय ,

देख कर मौन प्रणय ,

गगन भी आज विस्मय ,

कूकती – कोयलिया ,

अमराई के झुंड में ।

छाया ————————– ।।

 

बसंती भोर में ,

दिग्दिगंत पूर्ण मधुमय ,

गा रहे नव पल्लव ,

रति का इतिहास तन्मय ,

गुंजित भ्रमावली ,

कानन – कुंज – निकुंज में ।

छाया ————————— ।।

© डा. सलमा जमाल 

298, प्रगति नगर, तिलहरी, चौथा मील, मंडला रोड, पोस्ट बिलहरी, जबलपुर 482020
email – salmakhanjbp@gmail.com

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – एकात्मता के वैदिक अनुबंध : संदर्भ- उत्सव, मेला और तीर्थयात्रा भाग -14 श्रीगणेश चतुर्थी एवं श्राद्ध पक्ष ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। ) 

प्रत्येक बुधवार और रविवार के सिवा प्रतिदिन श्री संजय भारद्वाज जी के विचारणीय आलेख एकात्मता के वैदिक अनुबंध : संदर्भ – उत्सव, मेला और तीर्थयात्रा   श्रृंखलाबद्ध देने का मानस है। कृपया आत्मसात कीजिये। 

? संजय दृष्टि – एकात्मता के वैदिक अनुबंध : संदर्भ- उत्सव, मेला और तीर्थयात्रा भाग – 14  – श्रीगणेश चतुर्थी एवं श्राद्ध पक्ष ??

श्रीगणेश चतुर्थी- श्रीगणेश का जन्मोत्सव है श्रीगणेशचतुर्थी। सनातन धर्म में श्रीगणेश प्रथमपूज्य के रूप में प्रतिष्ठित हैं। उनका प्रथमपूज्य होना वैदिक दर्शन में निहित उदात्तता तथा माता-पिता के प्रति गहन आदर व श्रद्धा का प्रतीक है। महर्षि मनु का उवाच है,

उपाध्यान्दशाचार्य आचार्याणां शतं पिता।
सहस्रं तु पितृन माता गौरवेणातिरिच्यते।।

दस उपाध्यायों से बढ़कर आचार्य, सौ आचार्यों से बढ़कर पिता और एक हजार पिताओं से बढ़कर माता, गौरव में अधिक है।

इसी दर्शन का अंगीकार करते हुए श्रीगणेश ने माता-पिता की परिक्रमा को ब्रह्मांड की परिक्रमा की प्रतिष्ठा प्रदान की। यही कारण है कि कालांतर में ‘श्रीगणेश करना’, किसी भी काम का आरंभ करने के अर्थ में रूढ़ हुआ।

आरंभ में श्रीगणेशचतुर्थी घर में मनाया जानेवाले त्योहार तक सीमित था। विशेषत: महाराष्ट्र में पर्व के रूप में इसे व्यक्तिगत से समष्टिगत बनाने का मार्ग दिखाया लोकमान्य बाल गंगाधर तिलक ने। आज यह पर्व एकात्मता एवं सहयोग का सजीव प्रतीक बन चुका है।

श्राद्ध पक्ष- भाद्रपद शुक्ल पूर्णिमा से आश्विन कृष्ण अमावस्या तक श्राद्धपक्ष चलता है। सोलह दिवस चलने वाले श्राद्धपक्ष को पर्व कहना अटपटा लग सकता है। इसका भावपक्ष अपने पूर्वजों के प्रति कृतज्ञता और कर्तव्य का निर्वहन है। व्यवहार पक्ष देखें तो पितरों को खीर, पूड़ी व मिष्ठान का भोग इसे पर्व का रूप देता है। जगत के रंगमंच के पार्श्व में जा चुकी आत्माओं की तृप्ति के लिए सदाचारी निर्धन पुरोहित के स्थूल शरीर के माध्यम से स्वर्गीय के सूक्ष्म को भोज देना लोकातीत एकात्मता है। ऐसी सदाशय व उत्तुंग अलौकिकता वैदिक दर्शन में ही संभव है। यूँ भी सनातन परंपरा में प्रेत से प्रिय का अतिरेक अभिप्रेरित है। पूर्वजों के प्रति श्रद्धा प्रकट करने की ऐसी परंपरा वाला लिए श्राद्धपक्ष संभवत: विश्व का एकमात्र अनुष्ठान है।

क्रमश: ….

©  संजय भारद्वा

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार  सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय  संपादक– हम लोग  पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

writersanjay@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares