ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १९ फेब्रुवारी – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सौ. गौरी गाडेकर

? १९ फेब्रुवारी –  संपादकीय  ? 

नामदार गोपाळ कृष्ण गोखले  (9 मे 1866 – 19फेब्रुवारी 1915)

ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध, कायदेशीर राजकारणाच्या मार्गाने स्वातंत्र्यलढ्याचा पाया घालणारे राजकीय व सामाजिक नेते आणि कुशल राजनीतितज्ज्ञ नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचा जन्म रत्नागिरीतील एका खेड्यात झाला.

1884मध्ये ते बी. ए. (गणित) झाले. ते न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक व पुढे फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राध्यापक व नंतर प्राचार्यही झाले.

न्या. रानडे यांचे शिष्यत्व पत्करून त्यांनी त्यांच्याकडे अर्थशास्त्र, राज्यशास्त्र इत्यादी विषयांचा अभ्यास केला व ते भारतातील पहिल्या श्रेणीचे अर्थतज्ज्ञ झाले. केंद्रीय विधिमंडळात त्यांनी अर्थसंकल्पावर बारा भाषणे केली.

समाजकार्याच्या बाबतीत ते मवाळवादी होते.

शेतकऱ्यांच्या दुरवस्थेचा सखोल अभ्यास करुन सरकारकडे निवेदन पाठवणे, त्याचा पाठपुरावा करणे वगैरे करून त्या कार्यात त्यांनी शिस्त निर्माण केली. लोकशिक्षण, स्त्रीशिक्षण, अस्पृश्यता, जातिनिर्मूलन वगैरे संदर्भात त्यांनी कार्य केले. इंग्रजी शासकांना समजतील, अशा पद्धतीने समाजसुधारणा मांडून त्यांनी त्या मान्य करुन घेतल्या.1902 साली त्यांची निवड मध्यवर्ती कायदेमंडळात झाली  व ते नामदार झाले. त्यांच्या क्षमतेची दखल घेऊन तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड मिंटो यांनी त्यांना मार्ले मिंटो सुधारणा कायद्याचा मसुदा तयार करण्यास सांगितले.

गोखले यांनी ‘राजकारणाचे आध्यात्मिकरण’ ही संकल्पना मांडली. राजकारण हे साधनशुचितेला महत्त्व देऊन, सेवाभावाने करायचे विशेष कार्य आहे, असे त्यांचे ठाम मत होते.

कोणतीही चळवळ कायद्याच्या चौकटीतून करणे, तसेच स्वदेशीच्या वापरातून आपल्या देशातील उत्पादनास चालना देऊन आर्थिक उद्दिष्टे साध्य करणे, हे गोखले यांचे विचार होते. महात्मा गांधी हे त्यांचे शिष्य होते.

लोकमान्य टिळकांच्या ‘मराठा’ या साप्ताहिकात नियमितपणे लेख लिहून ते लोकांमध्ये देशभक्ती जागृत करीत असत. गोपाळ गणेश आगरकरांनी सुरू केलेल्या ‘सुधारक’च्या इंग्रजी आवृत्तीची जबाबदारी गोखले यांनी काही काळ सांभाळली. पुढे त्यांनी ‘हितवाद’ हे इंग्रजी वृत्तपत्र सुरू केले. ‘सार्वजनिक सभा’, ‘राष्ट्रभाषा समाचार’या वृत्तपत्रांतून लेखन करुन त्यांनी सतत समाजसुधारणांचा पाठपुरावा केला.1887साली ते सार्वजनिक सभेच्या त्रैमासिकाचे संपादक झाले.

‘अंकगणित’ हे त्यांनी अत्यंत पद्धतशीरपणे लिहिलेले पुस्तक शालेय अभ्यासक्रमात होते.

आज नामदार गोखले यांचा स्मृतिदिन आहे. या थोर, बुद्धिमान समाजसेवकाला विनम्र श्रद्धांजली. ????

 

सौ. गौरी गाडेकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

सूचना/Information ☆ संपादकीय निवेदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

संपादकीय निवेदन

सौ.गौरी गाडेकर

ई-अभिव्यक्ती (मराठी) साठी येणारे साहित्य व सदरांची व्याप्ती लक्षात घेऊन, संपादकीय कामकाजाच्या सुसूत्रतेसाठी, आज दि.19/02/2022 पासून आपल्या समुहातील ज्येष्ठ लेखिका सौ.गौरी गाडेकर यांचा संपादकीय मंडळात समावेश करून घेण्यात येत आहे. ? स्वागत ?  

 संपादक मंडळ,

ई-अभिव्यक्ती (मराठी)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ काळोखाची कूस ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? कवितेचा उत्सव ?

☆ काळोखाची कूस ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

आता अंधार्‍या वाटेवर चालताना

जुन्या आठवणींच्या सुखद स्मृती मागे-पुढे येताहेत

दिवली होऊन….

आईचा पदर धरून घरभर फिरणारी मी

शाळेत  गेल्यावर

घरच विसरणारी मी

गाण्याच्या स्पर्धेत सुवर्ण चषक घेऊन

घरी आलेली मी….

आणि कौतुकाच्या डोळ्यांनी ओवाळणारी आई …..

आणि चषक घेऊन घरभर नाचणारी मी

 

तुझ्या बाहुवर, अवघं विश्व विसरून

नि:शंकतेने झुलणारी मी

आणि आश्वस्त करणारे तुझे बलदंड बाहू …..

नि आश्वस्त होणारे मी ……….

 

बाळाची चाहूल लागल्यावर

विस्मित, आनंदित मी ……

बाळाला मांडीवर घेऊन दूध पाजताना

स्वर्गसुख म्हणतात ते हेच, असं म्हणत

प्रत्येक क्षण असासून जगणारी मी ….

 

 बाळाचं तरुण होणं कधी कसं घडलं

 कळलंच नाही……

मग त्याच्यावर भाळून घरी आलेली राजकन्या ,

माझी बाळी कधी झाली, कळलंच नाही…..

 

मग त्यांचा अंकूर, तजेलदार, टवटवीत, गबदूल

गडबड्या, बडबड्या, धडपड्या

मांडीवर लोळत

आजी गोष्ट…  आजी गोष्ट…

चा लकडा लावणारा…..आणि त्यांना  गोष्ट सांगताना 

पन्हा एकदा आईपण अनुभवणारी मी …..

 

सांजवेळी बागेतल्या झोपाळ्यावर बसून

 उतरती ऊन्ह पाहत,

 जुन्या कडू-गोड आठवणींची उजळणी करत,

  तृप्त, कृतार्थ जीवन जगल्याचा

  आनंद जागवते आहे   

  या क्षणी 

समोरून जाणारी ती अंधारी वाट

खुणावते आहे ‘चल लवकर’

म्हणते आहे.

मी त्यावरून चालते आहे.

मी पुढे पुढे जाते आहे…..

माझ्या सुखद स्मृती

मला साथ करताहेत.

कदाचित काळोखाची कूससुद्धा

इतकीच सुंदर, सुरम्य असेल.

 

© श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ रंजना जी यांचे साहित्य # 90 – रेशीमगाठी ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 90 – रेशीमगाठी ☆

प्रेमाचे सार

जीवनास आधार

रेशीमगाठी

दैवाचे देणे

प्रेम पाशाचे लेणे

रेशीमगाठी

अंतरी गूढ

मना लागते ओढ

रेशीमगाठी

मन मोहिनी

प्रित फुले जीवनी

रेशीमगाठी

लाभो जीवनी

ही प्रेम संजीवनी

रेशीमगाठ

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ संत  वेणास्वामी – भाग -1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ संत  वेणास्वामी – भाग -1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

(सूर्याच्या लेकी या महाग्रंथासाठी निवड झालेला सौ.पुष्पा प्रभूदेसाई यांचा संत वेणास्वामी हा लेख क्रमशः ई-अभिव्यक्ती च्या वाचकांसाठी:

“सूर्याच्या लेकी” हे नावच मुळी इतके समर्पक आहे की, सूर्याच्या तेजा प्रमाणे समाजात स्वत:च्या तेजाचा, ज्ञानाचा ,प्रकाश पसरविला आणि तोही अनंत हाल-अपेष्टा सहन करून! इतकेच नाही तर त्या तेजाचा समाजाला उपयोग करून दिला. भारतात अशा अनेक शूरवीर कर्तबगार आणि संत स्त्रिया होऊन गेल्या.

अशा अनेक स्त्रियांपैकी मला मनोमन भावल्या त्या समर्थ रामदास यांच्या शिष्या ‘संत वेणाबाई ‘त्याच ‘संत वेणास्वामी’. दक्षिणकाशी समजल्या जाणाऱ्या, कोल्हापुरात गोपजी देशपांडे गोसावी राहात होते. पुराणग्रंथ, तत्वज्ञान आणि ज्योतिषाचे ते ज्ञाते होते. श्री जगदंबा महालक्ष्मीच्या कृपेने त्यांना एक कन्यारत्न झाले.(इ. स.१६२८) . तिचे नामकरण झाले ‘वेणा.’ वेणा दिसायला सुंदर तर होतीच, पण खेळात खूप रममाण होणारी होती. कोड कौतुक खूप होत होते. कुतुहल म्हणून यांनी कन्येची पत्रिका पाहिली. तिच्या पत्रिकेत वैधव्य असा योग होता. आणि त्याचबरोबर अध्यात्मिक पातळीवर उच्च स्थान प्राप्तीचा योग होता. ही गोष्ट त्यांनी घरी सांगितली नाही. ती जात्याच हुशार होती. त्यामुळे वडिलांनी तिला लिहायला वाचायला शिकविले .एकनाथांचे “भावार्थरामायण” “भागवत” ग्रंथ ही वाचायला लागली. घराण्यात राम भक्तीचा पूर होता. लहान असतानाच वेणा ‘अध्यात्मरामायण’ तोंडपाठ म्हणू लागली .राम भक्ती ही वेणाच्या रक्तात होती. आई बरोबर भजन, कीर्तन ऐकायला जात असे. या काळात समर्थ रामदासांचा संप्रदाय महाराष्ट्रात नुकताच उदयाला आला होता. तत्कालिन प्रथेप्रमाणे आठव्या वर्षी मिरज येथील चंदुरकर देशपांडे यांच्या एकुलत्या एक मुलाशी तिचे लग्न झाले. घर संपन्न होते.  ती माहेरी गेली.  आणि एके दिवशी सर्वजण जेवायला बसले होते ,आणि वेणाला  , मिरजेला बोलावल्याचा सांगावा आला. तिचे पती स्वर्गवासी झाल्याची बातमी आली. हसण्या खेळण्याच्या वयात बाराव्या वर्षी वैधव्य आले. तत्कालीन सामाजिक पद्धतीनुसार केशवपन झाले. आणि ती अळवण (लाल लुगडे) नेसायला लागली. कोवळ्या वयातील अशा रूपातील वेणाचे चित्र डोळ्यासमोर आले की आपल्यालाही बेचैन होते.

तिने स्वतःला सावरले. धार्मिक ग्रंथांचे वाचन करण्यात मन गुंतवू लागली .आपल्या सासरी ती राहात असे. सासरच्यांनीही तिला शिक्षणात मागे पडू दिले नाही. एकदा रामदासस्वामी भिक्षेसाठी दारात आले,” जय जय रघुवीर समर्थ”, तुंबा भर दूध मिळेल का? सासूबाईंनी आतूनच सांगितले. दूध आहे , पण ते मारुतीच्या अभिषेकासाठी ठेवले आहे. ठीक. म्हणून समर्थ निघून गेले. पण ही गोष्ट वेणाच्या मनाला लागून राहिली. एकदा ती घरातील कामे आटोपून, तुलसी वृंदावना  जवळ ‘एकनाथी भागवत, वाचत बसली असताना ,समर्थ रामदास भिक्षेसाठी दारात आले. वेणा वाचत बसलेली पाहून त्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी तिला विचारले “मुली हे तुला समजते का “वेणाने उत्तर दिले,” समजत नाही ,समजून घेण्याचा प्रयत्न करते .मनात प्रश्न येतात. पण सांगणार कोण?” वेणाची तत्व जिज्ञासा पाहून समर्थांनी तिच्या शंका विचारल्या. 25 प्रश्न तिने विचारले. जीव आणि शिवा चे लक्षण ,आत्मा परमात्मा, मायेचे स्वरूप ,त्यावर सत्ता कोणाची, चैतन्य काय आहे? आद्याचे स्वरूप काय आहे? शून्य शून्य पण चैतन्य, जन्म मृत्यू आणि बद्धमुक्त कोण आहे? सगुण निर्गुण, ब्रह्म मार्ग कोण सांगेल? असे पंचवीस प्रश्न तिने विचारले. त्यानंतर समर्थांनी तिच्या प्रश्नांना उत्तरे दिली .आणि वेणाला सांगितले की ,रोज हे वाचत रहा. तुला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. समर्थ स्वामी निघाले. त्यांना पहात राहिली. तिला सद्गुरु मिळाला.

क्रमशः….

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ गटुळं – भाग-4 ☆ श्री आनंदहरी ☆

श्री आनंदहरी

? जीवनरंग ❤️

☆ गटुळं – भाग-4 ☆ श्री आनंदहरी 

ग्रामीण एकांकिका :-   गटुळं

(यशवंतांचे घर.. सोपा रंगाच्या सोप्यासारखाच.. देवाच्या चित्राऐवजी कॅलेंडर असा किरकोळ बदल.. जेन /घोंगडं / चटई अंथरलेली.. नेपथ्यात काही किरकोळ बदल करण शक्य असेल तर तेवढाच )

(यशवंता विचारात अस्वस्थपणे फेऱ्या मारत आहे.. आतून सारजा -यशवंतांची बायको चहा घेऊन येते..)

सारजा :-   च्या घ्या..

यशवंता :- (चहा घेत ) सारजे, दोन दिस झाले, आय सपरातच दिस्तीया.. काय झालंया कुनास ठावं ?… तिला च्या प्याला हाळी मारतीयास काय ?

सारजा :-  व्हयss!  मारते की हाळी… तुमास्नी कवाबी,  कुणाचाबी लई पुळका येत आस्तुय..

यशवंता :- ( काहीशा रागानं )  कुनाचाबी ? काय बोलतीयास काय ?.. आगं, आय हाय ती माजी..  ततं तुजी आय आसती तरीबी अशीच म्हनली आस्तिस व्हय गं ?

सारजा  :- माज्या आयचं नाव काडायचं काम न्हाय हां… आगुदरच सांगत्ये तुमास्नी.

यशवंता :- का गं ?  तुजी आय येगळी आन माजी येगळी हाय व्हय ?.. आग, आय ती आयच असती.. उद्या तुलाबी पोरं हुतीली ,सुना येतीली .. त्या बी तुज्यासंगती आसंच वागल्यावं..

सारजा :-  सारजा नाव हाय माजं.. माज्यासंगती आसं वागाय  वागाचं काळीज पायजेल, वागाचं !.. आन, माज्यासंगंती आसं वागायचा कुनी ईचार जरी क्येला तर सळळी सोडीन व्हय मी त्यास्नी? आन, सुना माज्या संगती अशा वागल्याव माजी पोरं त्यास्नी नांदीवतीली व्हय वो ?

यशवंता :-  व्हय ! ही ध्येनातच आलं न्हाय बग… ( स्वगत )  जवर येळ येत न्हाय तवर समदी वागच असत्यात…

सारजा  :- काय म्हनलासा ?

यशवंता :- कोन मी ? छया ss छया ! मी कशाला काय बोलींन ?…  पर सारजे.. वाघ बी कवातरी म्हातारा हुईत आसंलच की..नकं झडल्याला, दात पडल्याला…

सारजा :-  म्हंजीss,  तुमास्नी काय म्हनायचं हाय ?

यशवंता :- मला ? मला काय म्हणायचं आस्तंय…? आगं ,लगीन झाल्याधरनं मी कवा काय म्हंतोय व्हय ?  येकडाव का गड्याचं लगीन झालं की.. तोंडाचं काम कमी हुतं.. आन, मानंचं – कानाचं काम वाढतं म्हंत्यात समदीजनं… ती बी काय खोटं नसतंय म्हना..

सारजा :- अवो, म्या काय म्हंतीया .. तुमी काय बोलतायसा.. मला तुमचं कायबी उमगना झालंय बगा..

यशवंता :- काय बी असूनदेल.. पर सारजे, तू मातूर येकदम फायना बोलतीस हां… माजं तसं न्हाय गं… आता तुज्यावानी बोलन्याचा सराव न्हाय न्हवं ऱ्हायल्याला…

सारजा  :- अवो, काय बोलतायसा?  वाईच, समजंल- उमगलं आसं बोला की..

यशवंता :- ( स्वगत )  बायकुला समजंल –   उमजंल आसं बोलाय जमल्याला योक तरी गडी हाय वी  ह्या दुनियेत ? (सारजाला )… व्हय गं,  म्या काय म्हनतो.. आयला आनूया का घरात ?.. बिचारी सपरात हाय.. वयनीचं काय बिनासलंया कुणाला ठावं..?

सारजा :- अवो, तुमी गप बसा.. तुमास्नी काय बी कळत न्हाय..

यशवंता :-  व्हय..  ती बी खरंच हाय तुजं.. तुज्यासंगं लगीन क्येलं तवाच उमागलं बग मला ती..

सारजा :- ( रागानं )  म्हंजी? काय म्हनायचं हाय तुमास्नी..?

यशवंता  :-  आगं, तुला चिडाय काय झालं ? तुला तर खुश हुया पायजेल… आगं, म्या म्हंलो,  आगुदर मला कायच उमगत न्हवतं… तू आलीस आन वाईच वाईच कळाय लागलंय बग… काय कराय पायजे हुतं ? काय कराय नगं हुतं ? ह्ये आत्ता उमगाय लागलंय बग.. आन ती समदं तुज्यामुळं… पर ती जाऊदेल.  सारजे, चिडल्याव तू काय फायना दिस्तीस गं.. आक्षी आरशावानी… आगं, साळंत जात हुतो तवा गुरुजी आंतरगोल – बहिर्गोल आरश्याचं शिकवीत हुतं.. त्येचंच ध्यान झालं बग… ( स्वगत )  साळा शिकलो असतो तर ह्यो आरसा कशाला पदरात पडला असता.. पर.. जाऊंदेल..

सारजा :- काय म्हंलासा..? मला समदं आयकाय येतंय म्हनलं..

यशवंता :- क्काय ss ? तुला आयकाय येतंय वी..?  लगीन झाल्याधरनं कवा दिसलंच न्हाय बग..  मला तर वाटलं, तुला निस्तं बोलाय येतंय..

सारजा :- म्हंजी ?

यशवंता :-  म्हंजी..? आईकलंस न्हवका तू ? आगं,  म्या म्हनलो साळा शिकलो असतो तर ह्यो आरसा कसा पदरात पडला असता.. साळा शिकलो न्हाय तीच ब्येस झालं.. येवडी फायना दिस्तीयास तू ..कसं सांगू तुला ?  एss चल की  वाईच..

सारजा :- गप बसा !..  उगा आगाऊपणा करू नगासा ?

यशवंता :-  ( लाडात आल्यासारखा ) ए ss ! ए सारजे ss! आगं, मी काय म्हंतुय ती ऐकतीयास न्हवं ?

सारजा  :-  ( खोट्या रागात..) कायतरीच तुमचं.? गपा !.. काळ न्हाय न येळ न्हाय..

यशवंता :- आगं.. ! आयला घरात आणाय काळ न येळ कशापाय बगाय लागतुय गं ?

सारजा :- ती म्हनतायसा व्हय ?

यशवंता :- मग तुला काय वाटलं गं..?

सारजा :- कायबी  न्हाय..!  अवो, तुमास्नी काय बी कळत न्हाय बगा.. अवो, त्या थोरलीनं म्हातारीचा पैका-आडका , डाग- बिग समदं घेतलं आसंतीली काडून ..आन दिली म्हातारीला हाकलून.. लय च्यापटर हायती दोगंबी..

यशवंता :- आगं, आयकडं कुटनं आलाय डाग आन पैका-आडका..?

सारजा :- व्हय.. तुमास्नी समदंच ठावं आसतंय न्हवका ?.. अवो, बाई म्हनली का गाटीला गाट मारीत अस्तीच.. तुमास्नी न्हाय उमगायचं त्ये…

(आपण चुकून नको ते तर बोललो नाही ना ?  असे वाटून जीभ चावते )

माज्यावानी एकांदीच आस्तिया बगा.. म्या हातचं काय बी ठेवीत न्हाय.. पर माज्यावानी दुसरी नस्त्यात… ह्ये बगा, त्येंच्याकडं बगील त्येंचा लाडका ल्योक आन लाडकी सून.. उगा तुमी नगा काय बाय ईचार करूसा..

तुमी डबा घ्याचा आन नाकाम्होरं बगीत गप कामाव जायाचं.. ध्येनात ठ्येवायचं.. इसरायचं न्हाय.. चला आत  .. डबा द्येतें..

(सारजा आत जाते )

यशवंता  :- ( सारजाची नक्कल करीत ) नाकाम्होरं बगीत गप कामाव जायाचं.. ध्येनात ठेवायचं..  पार झापडं लावलेल्या टांग्याचा घोडाच केलाय माजा ह्या सारजीनं..

(घोड्याला झापडं बांधतात तसं दोन्ही हात काना पासून डोळ्यांकडे दोन्ही बाजूला झापडासारखे धरतो आणि ‘तगडक ss तगडक ss ‘करीत दोन फेऱ्या मारून आत जातो. )

(प्रकाश हळूहळू कमी होत अंधार होतो )

अंधार

 क्रमशः…

© श्री आनंदहरी

अद्वैत, मंत्रीनगर, इस्लामपूर जि. सांगली

8275178099 / 9422373433

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मोडेन, पण वाकणार  नाही. ☆ सौ. राधिका माजगांवकर पंडित ☆

? मनमंजुषेतून ?

☆ मोडेन, पण वाकणार  नाही. ☆ सौ. राधिका माजगांवकर पंडित ☆ 

आमचे काका ती. स्व. दामोदर सखाराम माजगांवकर देहू रोड येथे मिलीट्रीत होते. आर्मीतल्या, ब्रिटीश राजवटीत हुतात्मा झालेल्या शूरवीरांची कथा सांगण्यांत त्यांचा हातखंडा होता. ऐकतांना प्रसंग डोळ्यांसमोर  उभा रहायचा. लहानपणी मनावर ठसलेली, कोरलेली अंगावर शहारे  आणणारी ही कथा आहे – श्री.कर्णिकांची.

पुण्यातल्या श्री जोगेश्वरीवरून बुधवार चौकाकडे जाणाऱा सरळ रस्ता – थोडक्यात म्हणजे हल्लीचं श्रीदगडूशेट गणपती मंदिर, श्री गणेश वास्तव्य आहे ना, तोच तो रस्ता. त्याच्या डावीकडे फरासखाना पोलीस चौकी आहे. तिथेच एक दीपस्तंभ अजूनही कित्येक वर्षांचा, जुना झाला तरी भक्कमपणे उभा आहे आणि त्यावर नाव कोरलंय – “भास्करदा कर्णिक”.                                                                        

कर्णिकांनी आपल्या देशासाठी फार मोठ्ठं बलिदान केलं आहे. पण आज पुणेकर त्यांना विसरले आहेत. हा स्तंभ म्हणजे कसलं प्रतिक आहे? कुणाच्या नावाची ही निशाणी आहे? त्याबद्दल कसलीच, काहीच माहिती नसलेली अशी ही वास्तु सध्या उपेक्षित ठरलीय. कारण श्री. कर्णिकांच्या बरोबरच त्यांची निशाणी, काळाच्या पडद्याआड गेलीय. पण त्यांचा आदर्श, त्यांचं बलिदान, त्यांचं नाव आपण मनात जागवूया.

श्री.भास्करदा कर्णिक ऑर्डिनन्स फॅक्टरित नोकरीला होते. हुषार आणि अत्यंत धाडसी होते. त्या काळचे १९४०-४२ सालचे उच्चपदवी विभूषित असे असलेले हे धडाडीचे तरुण! देशासाठी काहीतरी करण्याची त्यांच्या मनात विलक्षण उर्मी होती. ऑर्डिनन्स फॅक्टरीतच नोकरीला असल्याने तेथील सामग्री जमवून धाडसाने यांनी हातबॉम्ब तयार केले. थोडे थोडके नाही, तर अर्धा ट्रकभरून बॉम्बची सज्जता  झाली आणि हा बॉम्बहल्ला करण्यासाठी कर्णिकांना देशप्रेमी साथीदारही मिळाले. त्यांची नांवे सांगायलाही अभिमान वाटतो, श्री. गोरे, श्री दीक्षित, श्री काळे, श्री जोगेश्वरी मंदिरातील’ व्यवस्थापक गुरव श्री भाऊ बेंद्रेही त्यांना सामील होते. इतकंच काय, देवीच्या मंदिरातच हे बॉम्ब लपवले होते. अखेर धाडसी खलबत होऊन निर्णय ठरला. आणि कॅपिटॉलवर बॉम्ब टाकण्यांत ते यशस्वी झाले. पण हाय रे देवा! कसा कोण जाणे दुर्दैवाने ब्रिटीशांना सुगावा लागला आणि साथीदारांसह श्री. कर्णिक पकडले गेले.

फरासखान्यात ह्या देशप्रेमींना आणण्यांत आलं. आजचा सध्याचा मजूर अड्डा आहे ना?तीच ती  जागा. पुराव्याअभावी बाकीचे साथीदार सुटले. पण श्री.कर्णिक मुख्य आरोपी म्हणून, डाव फसल्यामुळे अडकले. पण ते डगमगले नाहीत. परिस्थितीचं  भान त्यांना आलं. लघुशंकेसाठी परवानगी मागून ते बाजूला गेले. क्षणार्धात खिशातली विषारी पुडी त्यांनी गिळून घेतली. चार पावलं चालल्यावर फरासखान्याच्या पहिल्या पायरीवरच ते कोसळले आणि तिथेच त्या क्षणीच त्यांनी देशासाठी देहत्याग केला.

तर मंडळी असा आहे त्या पायरीचा इतिहास. मोडेन पण वाकणार नाही, हे ब्रीदवाक्य स्मरुन तो देशप्रेमी हुतात्मा झाला. त्यांची आठवण स्मृतिचिन्ह म्हणून उभा केलेला स्तंभ आता जुना झालाय. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलंय. मध्यंतरी बराच काळ गेला. भास्करदा कर्णिक ही अक्षरेही आता पुसट झालीत. आणि आता ह्या हुतात्म्याचाही दुर्दैवाने पुणेकरांना विसर पडलाय.

संपली श्री भास्कर दा. कर्णिक  ह्यांची  कथा. ज्यांना ही कथा माहित आहे, ते दगडूशेट गणपती मंदिरातून बाहेर पडतात, डावीकडे वळून स्तंभापुढे उभे रहातात, क्षणभर विसावतात  आणि नतमस्तक होतात.

तर मंडळी आपणही या थोर हुतात्म्याला मनोभावे श्रध्दांजली देऊयात. ??

भारतमाताकी जय!

मित्र मैत्रिणींनो, एक गोष्ट नमूद करून, आवर्जून सांगाविशी वाटते. माझे ती.स्व.काका मिलिट्रीत असल्यामुळे त्या हुताम्याचं हौतात्म्य ते जाणत होते. अजूनही इतिहासकालीन दोन दीपमाळा श्रीजोगेश्वरीसमोर   भक्कमपणे उभ्या आहेत. तिथे आम्ही रहात होतो. फरासखाना तिथून आम्हाला अगदी जवळच होता. काका थकले होते. काठी  टेकत टेकत मला सोबत घेऊन “श्री.कर्णिक स्तंभा”जवळ जाऊन नतमस्तक होऊन मानाची सलामी, मानवन्दना हुतात्मा श्री. कर्णिकांना ते द्यायचे.

धन्य ते हुतात्मा – श्री. कर्णिक आणि धन्य ते माझे देशप्रेमी काका. त्या दोघांना आपण कडक सॅल्यूट करूया. तर अशी होती ही श्री. कर्णिकांची गौरवपूर्ण  धाडसी गाथा.

तेथे कर माझे  जुळती. ??

© सौ राधिका माजगावकर पंडित,

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆  उगवतीचे रंग-कधी कधी मला वाटतं… श्रीविश्वास देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

उगवतीचे रंग-कधी कधी मला वाटतं… श्रीविश्वास देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

कधी कधी मला वाटतं

विद्यार्थी व्हावं अन

विंदा मास्तरांच्या वर्गात बसावं

‘ कोणाकडून काय घ्यावं..’

ते त्यांनी शिकवावं.

वर्गातून बाहेर पडताना 

विंदांकडून कवितेची

हिरवी पिवळी शाल घ्यावी

आयुष्यभरासाठी समाधानाने

अंगावर ओढून घ्यावी.।। १ ।।

 

कधी कधी मला वाटतं

साने गुरुजींच्या वर्गात बसावं

श्यामची आई लिहिणाऱ्या

प्रेमळ श्यामला अनुभवावं.

त्यांच्या डोळ्यातलं

अपार प्रेम, माया अनुभवावी.

‘ खरा तो एकची धर्म’

शिकवण त्यांच्याकडून घ्यावी. ।। २ ।।

 

कधी कधी मला वाटतं

बोरकरांच्या वर्गात बसावं

त्यांचे सागरासारखे

सागरापरी गहिरे डोळे अनुभवावे

जे ‘ जीवन त्यांना कळले हो ‘ 

ते मलाही शिकवाल का

विचारावं. ।। ३ ।।

 

कधी कधी मला वाटतं

कुसुमाग्रजांच्या वर्गात जावं

कशास आई भिजविसी डोळे

त्यांच्याकडून ऐकावं

रात्रीच्या गर्भातील उषा:कालाची

आशा जागवीत निघावं.

पाठीवर तात्यासाहेबांचा हात असावा

‘ लढ रे पोरा…’ ऐकताना

‘ कणा ‘ ताठ व्हावा. ।। ४ ।।

 

कधी कधी मला वाटतं

शांताबाईंकडे जावं

ऋतू हिरवा, ऋतू बरवा

कुठे भेटला जाणून घ्यावं  ।। ५ ।।

 

माझे जीवनगाणे लिहिणाऱ्या

पाडगावकरांच्या वर्गात

एक चक्कर मारावी

विचारावं त्यांना…

व्यथा असो आनंद असो

तुम्ही गात कसे राहता

आनंदाच्या रसात न्हात कसे राहता

त्यांच्या चष्म्याआडच्या

प्रेमळ, मिश्किल डोळ्यात

खोल खोल डोकावून बघावं

‘ शतदा प्रेम करावे ‘ चं

रहस्य समजून घ्यावं.  ।। ६ ।।

 

कधी कधी मला वाटतं

ग्वाल्हेरला तांब्यांकडे जावं

‘ कळा ज्या लागल्या जिवा… ‘

त्या जीवाला भेटावं

दिवसभर त्यांच्या जवळ राहावं

पहाटे त्यांच्याकडून

‘ घनतमी राज्य करणाऱ्या शुक्राला ‘ बघावं

‘ ते दूध तुझ्या त्या घटातले ‘ चा गोडवा

त्यांच्याकडूनच अनुभवावा.

सायंकाळी त्यांच्यासोबत

‘ मावळत्या दिनकराला ‘ प्रणाम करावा.

‘ तिन्ही सांजा सखे मिळाल्या…’

ऐकताना पुन्हा भेटण्याचं

‘ देई वचन मला…’ म्हणावं.  ।। ७ ।।

 

कधी कधी वाटतं

जावं बालकवींच्या गावा

पाय टाकुनी जळात बसलेला

तो ‘ औदुंबर ‘ अनुभवावा.

सुंदरतेच्या सुमनावरचे दव चुंबुन घ्यावे

आनंदी आनंद गडे  च्या सड्यात

न्हाऊन निघावे.  ।। ८ ।।

 

कधी कधी वाटतं

सुरेश भटांना गाठावं

‘चांदण्यात फिरताना’

त्यांच्याशी संवाद साधावा

दुभंगून जाता जाता

मी अभंग कसा झालो

त्यांच्याकडून ऐकावं.  ।। ९ ।।

 

कधी कधी मला

असं खूप काही वाटतं

कवी आणि कविता यांचं प्रेम

हृदयात दाटतं.

कवी असतात

परमेश्वराचेच दूत

घेऊन येतात प्रतिभेचं लेणं

तुमच्या माझ्यासाठी

ते असतं

नक्षत्रांचं देणं.  ।। १० ।।

 

कवी : श्री विश्वास देशपांडे,  चाळीसगाव

०९/०२/२०२२

प्रतिसादासाठी ९४०३७४९९३२

(कृपया कविता नावासह शेअर करावी)

प्रस्तुती – सुहास रघुनाथ पंडित

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य # 121 ☆ दर्द की इंतहा ☆ डॉ. मुक्ता ☆

डॉ. मुक्ता

(डा. मुक्ता जी हरियाणा साहित्य अकादमी की पूर्व निदेशक एवं  माननीय राष्ट्रपति द्वारा सम्मानित/पुरस्कृत हैं।  साप्ताहिक स्तम्भ  “डॉ. मुक्ता का संवेदनात्मक  साहित्य” के माध्यम से  हम  आपको प्रत्येक शुक्रवार डॉ मुक्ता जी की उत्कृष्ट रचनाओं से रूबरू कराने का प्रयास करते हैं। आज प्रस्तुत है डॉ मुक्ता जी का  एक अत्यंत विचारणीय आलेख दर्द की इंतहा। यह डॉ मुक्ता जी के जीवन के प्रति गंभीर चिंतन का दस्तावेज है। डॉ मुक्ता जी की  लेखनी को  इस गंभीर चिंतन से परिपूर्ण आलेख के लिए सादर नमन।  कृपया इसे गंभीरता से आत्मसात करें।) 

☆ साप्ताहिक स्तम्भ – डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य  # 121 ☆

☆ दर्द की इंतहा

‘दर्द को भी आधार कार्ड से जोड़ दो/ जिन्हें मिल गया है दोबारा ना मिले’ बहुत मार्मिक उद्गार क्योंकि दर्द हम-सफ़र है; सच्चा जीवन-साथी है, जिसका आदि अंत नहीं। ‘दु:ख तो अपना साथी है’ गीत की ये पंक्तियां मानव में आस्था व विश्वास जगाती हैं; मानव मन को ऊर्जस्वित व संचेतन करती है। वैसे तो रात्रि के पश्चात् भोर, अमावस्या के पश्चात् पूर्णिमा व दु:ख के पश्चात् सुख का आना निश्चित है; अवश्यंभावी है। सुख-दु:ख दोनों मेहमान हैं और एक के जाने के पश्चात् दूसरा दस्तक देता है।

समय निरंतर अबाध गति से चलता रहता है; कभी रुकता नहीं। सो! जो आया है अवश्य जाएगा। इसलिए ऐ मानव! तू किसी के आने पर ख़ुशी व जाने का मलाल मत कर। ‘कर्म गति अति न्यारी’ इसके मर्म को आज तक कोई नहीं जान पाया। परंतु यह तो निश्चित् है कि ‘जो जैसा करता, वैसा ही फल पाता’ के माध्यम से मानव को सदैव सत्कर्म करने की सीख दी गयी है।

अतीत कभी लौटता नहीं; भविष्य अनिश्चित् है।  परंतु वह सदैव वर्तमान के रूप में दस्तक देता है। वर्तमान ही शाश्वत् सत्य है, शिव है और सुंदर है। मानव को सदैव आज के महत्व को स्वीकारते हुए हर पल को ख़ुशी से जीना चाहिए। चारवॉक दर्शन में भी ‘खाओ, पीओ, मौज उड़ाओ’ का संदेश निहित है। आज की युवा पीढ़ी भी इसी का अनुसरण कर रही है। शायद! इसलिए ‘वे यूज़ एंड थ्रो’, ‘लिव इन’ व ‘मी टू’ की अवधारणा के पक्षधर हैं। वे पुरातन जीवन मूल्यों को नकार चुके हैं, क्योंकि उनका दृष्टिकोण उपयोगितावादी है। वे सदैव वर्तमान में जीते हैं। संबंध-सरोकारों का उनके जीवन में कोई मूल्य नहीं तथा रिश्तों की अहमियत को भी वे नकारने लगे हैं, जिसका प्रतिफलन विकराल सामाजिक विसंगतियों के रूप में हमारे समक्ष है।

अमीर-गरीब की खाई सुरसा के मुख की भांति बढ़ती जा रही है और हमारा देश इंडिया व भारत दो रूपों में परिलक्षित हो रहा है। एक ओर मज़दूर, किसान व मध्यमवर्गीय लोग दिन-भर परिश्रम करने के पश्चात् दो जून की रोटी भी नहीं जुटा पाते और आकाश की खुली छत के नीचे अपना जीवन बसर करने को विवश हैं। बाल श्रमिक शोषण व बाल यौन उत्पीड़न का घिनौना रूप हमारे समक्ष है। एक घंटे में पांच बच्चे दुष्कर्म का शिकार होते हैं; बहुत भयावह स्थिति  है। दूसरी ओर धनी लोग और अधिक धनी होते जा रहे हैं, जिनके पास असंख्य सुख-सुविधाएं हैं और वे निष्ठुर, संवेदनहीन, आत्मकेंद्रित व निपट स्वार्थी हैं। शायद! इसी कारण गरीब लोग दर्द को आधार-कार्ड से जोड़ने की ग़ुहार लगाते हैं, क्योंकि व्यक्ति छल-कपट से पुन: वे सुविधाएं प्राप्त नहीं कर सकता। उनके ज़हन में यह भाव दस्तक देता है कि यदि ऐसा हो जायेगा, तो उन्हें जीवन में पुन: दर्द प्राप्त नहीं होगा, क्योंकि वे अपने हिस्से का दर्द झेल चुके हैं। परंतु इस संसार में यह नियम लागू नहीं होता। भाग्य का लिखा कभी बदलता नहीं; वह अटूट होता है। सो! उन्हें इस तथ्य को सहर्ष क़ुबूल कर लेना चाहिए कि कृत-कर्मों का फल जन्म-जन्मांतर तक मानव के साथ-साथ चलता है और उसे अवश्य भोगना पड़ता है। इसलिए सुंदर भविष्य की प्राप्ति हेतू सदैव अच्छे कर्म करें, ताकि हमारा भविष्य उज्ज्वल हो सके।

 

© डा. मुक्ता

माननीय राष्ट्रपति द्वारा पुरस्कृत, पूर्व निदेशक, हरियाणा साहित्य अकादमी

#239,सेक्टर-45, गुरुग्राम-122003 ईमेल: drmukta51@gmail.com, मो• न•…8588801878

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – डायरी-संस्मरण ☆ उसका बचपन, मेरा बचपना ☆ डॉ. हंसा दीप ☆

डॉ. हंसा दीप

संक्षिप्त परिचय

यूनिवर्सिटी ऑफ टोरंटो में लेक्चरार के पद पर कार्यरत। पूर्व में यॉर्क यूनिवर्सिटी, टोरंटो में हिन्दी कोर्स डायरेक्टर एवं भारतीय विश्वविद्यालयों में सहायक प्राध्यापक। तीन उपन्यास व चार कहानी संग्रह प्रकाशित। गुजराती, मराठी व पंजाबी में पुस्तकों का अनुवाद। प्रतिष्ठित पत्र-पत्रिकाओं में रचनाएँ निरंतर प्रकाशित। कमलेश्वर स्मृति कथा पुरस्कार 2020।

☆ डायरी-संस्मरण – उसका बचपन, मेरा बचपना ☆ डॉ. हंसा दीप 

युग तो नहीं गुजरे मेरा अपना बचपन बीते, पर फिर भी न जाने क्यों ऐसा लगता है कि जैसे वह कोई और जमाना था जब मैं और मेरे हमउम्र पैदा होकर बस ऐसे ही बड़े हो गए थे। हालांकि अभी भी बचपन की यादें ताजा हैं। सारी यादें पलट-पलट कर आती हैं और उस मासूम-से समय के टुकड़े के साथ जुगाली करते हुए सामने खड़ी हो जाती हैं। अब, जब नानी बनकर आज के बचपन को ये आँखें लगातार देख रही हैं तो अपने बचपन का बेचारापन बरबस ही सामने आकर बतियाने लगा है। इन दिनों रोज ही कुछ ऐसा आभास होने लगा है जैसे अपना वह बचपन और आज का बचपन, युगों के अंतराल वाली कहानी-सा बन गया है।

आज के बच्चों का जो बचपन है उसे देखकर मेरी तरह कितने ही दादा-दादी-नाना-नानी कई बार सोच ही लेते हैं कि “काश हम भी अभी बच्चे होते।” इन बच्चों के पैरों के साइज़ की क्रिब इनके बढ़ते-बढ़ते तब तक बड़ी होती है, जब तक ये खुद चार साल की उम्र को पार नहीं कर लेते। उसके बाद तो एक पूरा का पूरा कमरा इनका होता है, जो खिलौनों से, टैडी बेयर से, कपड़ों से भरा रहता है। बसंत, गर्मी, पतझड़ और सर्दी हर मौसम के अलग-अलग जूते और अलग-अलग कपड़े। हमारे जमाने में अपनी दुकान के पास वाले पेड़ से, चादर या साड़ी बांधकर पालना बना दिया जाता था और हम ठंडी हवा के झोंकों में मस्त नींद ले लेते थे। कमरे और कपड़ों की कहानी तो अपनी जुबानी याद है। एक कमरे में पाँच से कम का तो हिसाब होता ही नहीं था। लाइन से जमीन पर सोए रहते थे। एक-दूसरे की चादर खींचते हुए, लातें खाते हुए भी नींद पूरी कर लेते थे। तीन-चार साल के बच्चों तक के लिये नये कपड़े आते ही नहीं थे। एक पेटी भरी रहती थी ऐसी झालर वाली टोपियों से, स्वेटरों से, झबले, फ्राक और बुश्शर्ट-नेकर से। आने वाले हर नये बच्चे के लिये इन कपड़ों की जरूरत होती थी। एक कपड़ा खरीदो, पाँच बच्चों को बड़ा कर लो। अनकहा, अनसमझा, रिसायकल वाला सिस्टम था, कपड़ा धोते ही नया हो जाता था।   

जब इन बच्चों के लिये स्मूदी, फलों का शैक बनता है तो मुझे याद आता है तब बेर के अलावा कोई ऐसा फल नहीं था जो हमारे लिये घर में नियमित आता था। बैर बेचने वाली आती थी तो सीधे टोकरी से उठा कर खा लेते थे। फल को धोकर खाने वाली बात के लिये कभी डाँट खायी हो, याद नहीं। सब कुछ ऐसा बिंदास था कि किसी तरह की रोका-टोकी के लिये बिल्कुल जगह नहीं थी। 

आज की मम्मी अपने बच्चों के लिये जब प्रोटीन और कैलोरी गिनती हैं तो मैं सोचती हूँ कि मेरी जीजी (माँ) को कहाँ पता था इन सबके बारे में! वे तो ऊपर वाली मंजिल के किचन से नीचे अनाज की दुकान तक के कामों लगी रहती थीं। कुछ इस तरह कि ऊपर-नीचे के चक्करों में बच्चों के आगे-पीछे चक्कर लगा ही नहीं पातीं। तब हम भाई-बहन अपनी अनाज की दुकान के मूँगफली के ढेर पर बगैर रुके, बगैर हाथ धोए, पेट भर कर मूँगफली छीलते-खाते। कड़वा दाना आते ही मुँह बनाकर अच्छे दाने की खोज में लग जाते। होले- हरे चने के छोड़, जिन्हें पहले तो बैठकर सेंकना और फिर घंटे भर तक खाते रहना। हाथ-मुँह-होंठ हर जगह कालिमा न छा जाए तो क्या होले खाए। ताजी कटी हुई ककड़ियाँ व काचरे शायद हमारे आयरन का सप्लाय था। ये सब खाकर पेट यूँ ही भर जाता था। थोड़ा खाना खाया, न खाया और किचन समेट लिया जाता था। शायद इसीलिये मोटापन दूर ही रहा। बगैर किसी ताम-झाम के भरपूर प्रोटीन और नपी-तुली कैलोरी।    

जब बच्चे कार में बैठ कर स्कूल के लिये रवाना होते हैं तो मेरी अपनी स्कूल बरबस नजरों के सामने आ जाती है जहाँ आधे किलोमीटर पैदल चल कर हम पहुँचते थे। रिसेस में खाना खाने फिर से घर आते थे। कभी कोई लंच बॉक्स या फिर पानी ले जाना भी याद नहीं। स्कूल के नल से पानी पी लेते थे। कभी यह ताकीद नहीं मिलती कि “हाथ धो कर खाना, नल का पानी मत पीना।” आज इन बच्चों के लिये हैंड सैनेटाइजर का पूरा पैकेट आता है। इनके बस्ते से, लंच बॉक्स से टँगे रहते हैं। गाड़ी में भी यहाँ-वहाँ हर सीट के पास रखे होते हैं। जितनी सावधानी रखी जा रही है उतने बैक्टेरिया भी मारक होते जा रहे हैं। एक से एक बड़ी बीमारियाँ मुँह फाड़े खड़ी हैं। तब भी होंगी। उस समय कई बच्चों के विकल्प थे। मैं नहीं तो मेरा भाई या फिर मेरी बहन, एक नंबर की, दो नंबर की। अब “हम दो हमारे दो” के बाद, “हम दो हमारा एक” ने परिभाषाएँ पूरी तरह बदल दी हैं।

अब बच्चों की प्ले डेट होती है। फोन से समय तय कर लिया जाता है। छ: साल के नाती, शहंशाहेआलम मनु के द्वारा नानी को चेतावनी दी जाती है– “नानी मेरे दोस्तों के सामने हिन्दी मत बोलना, प्लीज़।” गोया नानी एक अजूबा है, जो उसके उन छोटे-छोटे मित्रों को हिन्दी बोल कर डरा दे। बड़ी शान है, बड़ा एटीट्यूड है व गजब का आत्मविश्वास है। मैं तो आज साठ-इकसठ की उम्र में भी अपने बड़े भाई से आँखें मिलाकर बात नहीं कर पाती। इन्हें देखो नाना-नानी भी इनके लिये एक खिलौना है। ऐसा खिलौना जिसे जब चाहे इस्तेमाल कर ही लेते हैं। हमारा समय तो बस ऐसा समय था कि चुपके से आया और निकल गया। कब आया, कब गया और कब बचपन में ही बड़े-से घर की जिम्मेदारी ओढ़कर खुद भी बड़े हो गए, पता ही न चला। गली-गली दौड़ते-दौड़ते छुपाछुपी खेलना, पकड़ में आ जाना व फिर ढूँढना। न तो ऐसे आईपैड थे हमारे हाथों में, न ही वीडियो गैम्स थे। हाथों में टूटे कवेलू का टुकड़ा लेकर, जिसे पव्वा कहते थे, घर के बाहर की पथरीली जमीन पर लकीरें खींच देते थे। उसी पर कूदते-फांदते, लंगड़ी खेलते बड़े होते रहते थे। बगैर किसी योजना के ही हर घंटे प्ले डेट हो जाती थी। कभी गिर जाते, खून बह रहा होता तो जीजी हल्दी का डिब्बा लाकर उस घाव में मुट्ठी भर हल्दी भर देतीं। पुराने पायजामे का कपड़ा फाड़कर पट्टी बांध देतीं। हम रो-धोकर आँसू पोंछते फिर से अपने घाव को देखते हुए निकल पड़ते थे।

इन बच्चों के लिये सुबह का खास नाश्ता बनता है। हम तो रात के बचे पराठे अचार के साथ खा लेते थे। पोषक आहार के तहत बच्चों की शक्कर पर इनके ममा-पापा नजर लगा कर रहते हैं। हम तो शक्कर वाली मीठी गोलियाँ ऐसे कचड़-कचड़ चबाते रहते थे जैसे उस आवाज से हमारा गहरा रिश्ता हो। बाजार के मीठे रंग वाले, लाल-पीले-हरे बर्फ के लड्डू चूस-चूस कर खाते रहते थे। कभी कोई “मत खाओ” वाली ना-नुकुर नहीं होती। हमारा यह स्वाद सबसे सस्ता होता था फिर भला कोई कुछ क्यों कहता!

मुझे अपना बरसों का अनुभव और ज्ञान अपने नाती मनु को देने की बहुत इच्छा होती है। सुना तो यही है कि सारा ज्ञान पीढ़ी-दर-पीढ़ी हस्तांतरित हो जाता है। यहाँ भी मैं मन मसोस कर रह जाती हूँ। उसे कुछ पूछना होता है तो ‘सिरी’ और ‘एलेक्सा’ उसके बगल में खड़ी होती हैं। नानी से कुछ पूछने की जरूरत ही नहीं पड़ती। मेरा ज्ञान भी उसके किसी काम का नहीं रहा।

एक बात बहुत अच्छी है, नया सीखने की मेरी ललक अभी भी है। हालांकि वही अच्छी बात उल्टे प्रहार करती है जब हाथों में रिमोट लेकर निनटेंडो गैम खेलना शुरू करती हूँ। कुछ ही पलों में मनु मेरे हाथ से रिमोट खींचकर मेरे मरते हुए कैरेक्टर को बचाता है।

“नानी आपको तो बिल्कुल भी खेलना नहीं आता। आप तो अपने प्लेयर को मारने पर तुली हुई हैं।” ऐसी हिंसक मैं कभी सपने में भी नहीं होती, लेकिन खेलते हुए कैसे हो जाती हूँ यह आज तक समझ ही नहीं पायी!

“ये निगोड़े गैम में क्यों मरना-मारना लेकर आते हैं!” कहते हुए मैं अपना सिर ठोक लेती हूँ। मनु को कोई जवाब न देकर बुरी तरह हार जाती हूँ। अपने से पचपन साल छोटे बच्चे से हारकर मैं बहुत बेवकूफ महसूस करती हूँ। ऐसा नहीं कि यह हारने का अफसोस हो, सिर्फ हारती तो कोई बात नहीं थी, मगर उसके मन में जो अपनी मूर्खता वाली भावना अनजाने ही छोड़ देती हूँ, उसकी कसक बनी रहती है। मैं बड़ी हूँ, मुझे सब कुछ आना चाहिए। अपने समय में कभी नानी के लिये ऐसा कुछ सोचने की, कुछ कहने की जुर्रत नहीं की। ऐसा कोई मौका मिला भी नहीं। तब तो आदेश होते थे व हम पालन करते थे। बच्चे भी तो एक, दो नहीं थे, पूरे के पूरे दस, या तो इससे एक-दो कम, या एक-दो ज्यादा।

रोज-रोज के इन नये खेलों को सीखना मेरे बस की बात नहीं रही इसलिये मैंने भी तय कर लिया कि उसके बचपन और मेरे बचपने को मिलाकर एक नया रास्ता बना लेती हूँ। धीरे-धीरे दोनों का तालमेल अच्छा होने लग गया है। ऐसा करके जीना मुझे भाने लगा है। फिर भी एक टीस तो है, मैं बदलाव को स्वीकार तो कर रही हूँ, पर मैंने दुनिया में आने की इतनी जल्दी क्यों दिखाई, कुछ साल और रुक जाती।

© डॉ. हंसा दीप

संपर्क – Dr. Hansa Deep, 22 Farrell Avenue, North York, Toronto, ON – M2R1C8 – Canada

दूरभाष – 001 647 213 1817

hansadeep8@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares