(श्री जयप्रकाश पाण्डेय जी की पहचान भारतीय स्टेट बैंक से सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी के अतिरिक्त एक वरिष्ठ साहित्यकार की है। वे साहित्य की विभिन्न विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। उनके व्यंग्य रचनाओं पर स्व. हरीशंकर परसाईं जी के साहित्य का असर देखने को मिलता है। परसाईं जी का सानिध्य उनके जीवन के अविस्मरणीय अनमोल क्षणों में से हैं, जिन्हें उन्होने अपने हृदय एवं साहित्य में सँजो रखा है।आज प्रस्तुत है गैस त्रासदी पर श्रद्धांजलि स्वरुप एक कविता ‘गैस त्रासदी की बरसी ….!’ )
☆ कविता # 113 ☆ गैस त्रासदी की बरसी ….! ☆ श्री जय प्रकाश पाण्डेय☆
(37 साल पहले 2-3 दिसम्बर की रात्रि को भोपाल गैस त्रासदी में मारे गए लोगों को श्रद्धांजलि )
(2-3 दिसंबर 1984 की रात यूनियन कार्बाइड (यूका), भोपाल से मिक गैस रिसने से कई लोगों की मृत्यु हो गई थी। मेरे काव्य -संग्रह ‘शब्द …. और कविता’ से उद्धृत गैस त्रासदी पर श्रद्धांजलि स्वरूप।)
(आदरणीय श्री संतोष नेमा जी कवितायें, व्यंग्य, गजल, दोहे, मुक्तक आदि विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं. धार्मिक एवं सामाजिक संस्कार आपको विरासत में मिले हैं. आपके पिताजी स्वर्गीय देवी चरण नेमा जी ने कई भजन और आरतियाँ लिखीं थीं, जिनका प्रकाशन भी हुआ है. आप डाक विभाग से सेवानिवृत्त हैं. आपकी रचनाएँ राष्ट्रीय पत्र पत्रिकाओं में लगातार प्रकाशित होती रहती हैं। आप कई सम्मानों / पुरस्कारों से सम्मानित/अलंकृत हैं. “साप्ताहिक स्तम्भ – इंद्रधनुष” की अगली कड़ी में प्रस्तुत हैं एक भावप्रवण रचना “हम पर कृपा करो घनश्याम ….”। आप श्री संतोष नेमा जी की रचनाएँ प्रत्येक शुक्रवार आत्मसात कर सकते हैं।)
जगण्याचे तत्वज्ञान अत्यंत सोप्या शब्दात नेमकेपणाने सांगण्या-या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा स्मृतीदिन.(1951).
स्वतः निरक्षर असूनही उच्च शिक्षितांनी ज्या कवितांचा अभ्यास करावा अशा कवितांच्या रचना बहिणाबाईंनी केल्या आहेत.ऐन तरूण वयात वैधव्य प्राप्त झाल्यामुळे आयुष्याला सामोरं जाऊन झुंझताना येणारे अनुभव,दिसणारं जग,भवतालचा निसर्ग त्यांनी आपल्या अहिराणी या बोलीभाषेतून कवितेत उतरवला. अहिराणी, खानदेशी आणि मराठी भाषेतून त्यांनी काव्यरचना केली आहे. त्या निरक्षर असल्यामुळे लिखित स्वरूपात त्या सर्वच्या सर्व उपलब्ध नाहीत.पण त्यांचे चिरंजीव कवी सोपानदेव चौधरी यांच्या प्रयत्नातून ज्या कविता उपलब्ध झाल्या त्या लोकांसमोर येऊ शकल्या आणि मराठी कवितेला एक अनमोल खजिना प्राप्त झाला. संसार, माहेर, शेतीची साधने, कापणी, मळणी, शेतीतील प्रसंग, सण, सोहळे हे त्यांच्या कवितांचे विषय. जे अनुभवलं ते लिहीलं त्यामुळे कसदार साहित्य निर्माण झालं.
‘आला सास,गेला सास,जीवा तुझं रे तंतर,
अरे जगन-मरन एका सासाचं अंतर’
हे शब्द असोत किंवा
‘लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते’ हे शब्द ;
जगण्याची अनिश्चितता,स्त्री ची सुख दुःखे असे कितीतरी विषय त्यांनी सहजपणाने हाताळले आहेत.
‘अरे संसार संसार ,जसा तवा चुलावर’ हे गीत तर आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहेच. पण अशा कितीतरी कविता त्यांच्या ‘बहिणाबाईंची गाणी’ या संग्रहीत काव्यसंग्रहात वाचायला मिळतात.हे त्यांचे काव्य ‘फ्रॅग्रन्स ऑफ दि अर्थ’ या रूपाने इंग्रजीत जाऊन पोचले आहे.श्री.के.ज.पुरोहित यांनीही काही कवितांचे भाषांतर केले आहे.हा त्यांच्या कवितांचा सन्मान आहे.एवढेच नव्हे तर उत्तर महाराष्ट्र विद्यापिठालाही त्यांचे नाव देण्यात आले आहे.एका अशिक्षीत कवयित्रीच्या नावाने विद्यापीठ निघावे असा सन्मान जगात बहुतेक पहिलाच असेल.
जगणं आणि अनुभवणं शब्दांतून साकारणा-या कवयित्रीला आज स्मृतीदिनी शतशः प्रणाम!
☆☆☆☆☆
केशव मेश्राम :
ज्येष्ठ लेखक केशव मेश्राम यांचाही आज स्मृतीदिन आहे. परंतू दि 24/11/21च्या अभिव्यक्तीमध्ये आपण त्यांच्या साहित्यिक कर्तृत्वविषयी जाणून घेतले आहे.म्हणून पुनरावृत्ती टाळत आहोत.
खोटं बोलणे आणि थापा मारणे यात कांही अंशी अवगुणात्मक फरक नक्कीच आहे.खोटं नेहमी स्वार्थासाठीच बोललं जातं असं नाही.समोरच्या माणसाला त्याच्याच हितासाठी कांही काळ अंधारात ठेवण्याच्या उद्देशाने खरं सांगणं योग्य नसेल तिथं खोट्याचा आधार घ्यावा लागतोच.एरवी बऱ्याचदा खोटं बोललं जातं ते भितीपोटी, स्वार्थापोटी,किंवा स्वतःची कातडी बचावण्यासाठीही.बेमालूम खोटं बोलणं सर्रास सर्वांना जमतंच असं नाही.तीही एक अंगभूत कलाच म्हणावी लागेल आणि नित्य सरावाने ते कलाकार त्यात पारंगतही होत असावेत.
थाप मारणे ही क्रिया मात्र मला उत्स्फुर्तपणे घडणारी क्रियाच वाटते.ऐनवेळी आलेल्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी सुचेल ते खोटं बोलणं म्हणजे थाप मारणं.अशी थाप मारण्यात अहितकारक उद्देश असतोच असं नाही.पण एकदा थाप मारुन प्रश्न सुटल्याचा आभास निर्माण झाला की त्याची मग सवयच लागते.ती एकदा अंगवळणी पडलेली सवय मग अनेक अडचणीना निमंत्रण देणारीच ठरते.स्वार्थासाठी थापा मारुन दुसऱ्यांना टोप्या घालणारे थापाडे किंवा खोटं बोलून स्वतःचं उखळ पांढरं करुन घेणारे खोटारडे यांना मात्र सख्खी भावंडंच म्हणायला हवे.
बिकट परिस्थितीतून वाट शोधण्याचा सोपा मार्ग म्हणून एक थाप मारणारे हळूहळू त्यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीमुळे दुसरी थाप मारायला प्रवृत्त होतात आणि मग नाईलाजाने एकामागोमाग एक थापा मारीत स्वतःच निर्माण केलेल्या जाळ्यात अडकून बसतात.या कल्पनेचा लज्जतदार मसाल्यासारखा वापर करुन खुमासदार विनोदी चित्रपट निर्माण करणारे कल्पक दिग्दर्शक आणि उत्स्फुर्त नैसर्गिक अभिनयाने त्यांना दिलखुलास साथ देणारे कलाकार यांच्या समन्वयाने आपल्याला हसवत ठेवल्याच्या अनेक हसऱ्या आठवणी हा प्रदीर्घ लेखाचाच विषय होईल.प्रोफेसर, अंगूर,पडोसन, गोलमाल,चाची ४२०, मालामाल विकली, हंगामा,बरेलीकी बर्फी,वाट चुकलेले नवरे,चिमुकला पाहुणा,थापाड्या, अशी ही बनवाबनवी हे वानगीदाखल सांगता येतील असे कांही हिंदी मराठी चित्रपट..!’थापा’म्हणजे या सारख्या चित्रपटात वापरलेला, दु:ख-विवंचना विसरायला लावणारा आणि खळखळून हसवणारा चविष्ट खुमासदार विनोदमसालाच…!!
(पूर्वार्ध :कार्तिकचं आपल्यावर किती प्रेम आहे, हे केतकीला जाणवलं . आता पुढे….)
आणि आपण तरी कार्तिकशिवाय राहू शकतो का? नेहमी भांडत असलो, तरी प्रत्येक क्षणी कार्तिक मनात असतोच. त्याची पार्श्वभूमी असल्याशिवाय आपण कसलाच विचार करू शकत नाही. अगदी डिव्होर्सची वेळ आली तरीही.
ही डिव्होर्सची वेळ तरी कशी आली? त्याची कुठे भानगड, व्यसन…..? काहीच नाही. मग कशावरून आपलं एवढं भांडण झालं? कशावरून बरं? कारण तर आठवतच नाहीय. म्हणजे तेवढं महत्त्वाचं नसणारच. पण उगीचच ताणलं गेलं आणि इगोच्या लढाया सुरू झाल्या. तसा कार्तिक टिपिकल पुरुषासारखा इगो वगैरे कुरवाळणारा नाहीय. आपणच……
कार्तिक म्हणतोय, ते खरं आहे. एकुलतं एकपण ही आपण नेहमीच स्ट्रेन्थ समजत आलो. आपल्या तोंडातून जे बाहेर पडायचं, ते लगेच आपल्यासमोर हजर व्हायचं. आईबाबा नेहमीच आपले लाड करायचे. त्यामुळे आपण तोच आपला हक्क समजत आलो.
कार्तिककडूनही तीच अपेक्षा केली. सुरुवातीला तोही आपल्या मनाप्रमाणे वागायचा.पण नंतरनंतर त्याने स्वतःच्या मनाला मुरड घालणं बंद केलं.
चुकलंच आपलं. खूप खूप चुकलं.
“कार्तिक, गाडी थांबव.मला बोलायचंय तुझ्याशी.”
“इथे मध्येच थांबवता येणार नाही. पुढे थांबवतो.”
गाडी थांबल्यावर केतकीने सगळं सगळं कन्फेशन दिलं. बोलता बोलता ती रडत होती. रडता रडता बोलत होती.
कार्तिकला ती पूर्वीसारखीच बालिश, निरागस वाटली. त्याच्या मनात तिच्याविषयीचं प्रेम उफाळून आलं. तिला मिठीत घेऊन ओठाने तिचे अश्रू पुसण्याचा मोह त्याला झाला. पण खुंटा अजून घट्ट करणं आवश्यक आहे, असं त्याला वाटलं.
“तुला काय म्हणायचंय, ते कळलं मला. पण मी प्रयत्नपूर्वक तुला माझ्या मनातून, आयुष्यातून बाहेर काढलंय.”
“पण… आपला… डिव्होर्स…तर… झाला… नाहीय… ना… अजून…!” तिच्या वाक्यात शब्दांपेक्षा हुंदकेच जास्त होते.
“लिगली नाही. पण मनाने आपण एकमेकांपासून खूप दूर गेलो आहोत.”
“मलाही तसंच वाटायचं. पण आता विचार करताना वाटतं, की आपण अजूनही एकमेकांचे आहोत. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, कार्तिक.”
“पण मला नाही ना वाटत तसं,” चेहऱ्यावर अतोनात गांभीर्य, आवाजात कठोरपणा आणत कार्तिक बोलला.
केतकीला धक्का बसला. आपल्याला वाटतं, त्यापेक्षा वेगळा विचार स्वीकारायची ही तिची पहिलीच वेळ होती. फुटू पाहणारे हुंदके प्रयासपूर्वक दाबत तिने तोंड घट्ट मिटून घेतलं.
कार्तिकला तिची दया आली.
“मी विचार करतो तुझ्या म्हणण्याचा. मला वेळ दे थोडा.”
केतकीने सुटकेचा निश्वास सोडला.”घरी पोहोचेपर्यंत सांगितलंस तरी चालेल.”
“दोन-तीन दिवस तरी लागतील मला.”
‘बापरे!’ केतकीच्या मनात आलं. पण तोंडाने मात्र तिने “बरं,”म्हटलं.
रात्री जेवणातही केतकीचं लक्ष नव्हतं.
“काय गं? जेवत का नाहीयेस?”आईने दोन-तीनदा विचारलं.
कार्तिक भराभरा जेवून उठला.
“बरं वाटत नाहीय का? तू झोप जा. आज मी आवरते मागचं,” असं आईने म्हणताच नेहमीप्रमाणे, “मी करते गं,”वगैरे न म्हणता केतकी सरळ बेडरूममध्ये गेली.
पाठोपाठ कार्तिक आलाच.
“हे बघ, हनी….” पुढे न बोलताच केतकीला सगळं कळलं.
किचनमधलं आवरून, बाबांना हवं -नको बघून आई झोपायला आली, तेव्हा दोघांना बघून ती म्हणाली, “आज मी झोपते हॉलमध्ये.”
गंमत म्हणजे आज या दोघांपैकी कोणीही तिला ‘नको’ म्हटलं नाही.