काय झाले बाळ रडत होते वूडवर्डस ग्राईप वॉटर दे त्याला हि जाहिरात आपण वर्षोनवर्षे पहात व ऐकत आलो आहोत. पण हे ग्राईप वॉटर म्हणजे नक्की काय ?
विलिअम वूडवर्डस या औषध निर्मात्याने इंग्लंडमध्ये १८५१ साली ग्राइप वॉटरचा शोध लावला. १८४० साली पूर्व इंग्लंडमध्ये लहान मुलांमध्ये फेन फिव्हरची लागण होत होती. त्याच वेळी तेथे हिवतापाचीही साथ होती. या दोन्ही रोगांवरील उपचारांतून प्रेरणा घेऊन वुडवर्डने ग्राइप वॉटरची निर्मिती केली. फेन फिव्हरसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधाने बालकांमधील पचनसंस्थेच्या तक्रारी दूर होतात असे त्याचे निरीक्षण होते.
वुडवर्डच्या मूळ ग्राइप वॉटरमध्ये ३.६ टक्के अल्कोहोल, बाळंतशेपू तेल, सोडिअम बायकार्बोनेट, साखर तसेच पाणी हे घटक होते. १८७६ मध्ये वुडवर्डने ग्राइप वॉटर या ट्रेडमार्कची नोंदणी केली.
कधीकधी ग्राइप वॉटरमध्ये बडीशोप व आल्या चाही समावेश असतो.
शेपा जे ग्राइप वॉटर चे मूळ घटक आहे ह्याचे शास्त्रीय नावAnethum graveolens असे आहे. अंबेलिफेरी कुटुंबातली ही पालेभाजी इंग्रजीत Dill या नावाने ओळखली जाते. यास बाळंतशोपा असेही नाव आहे. Anethum हे नाव ग्रीक ऍनिसोन या शब्दापासून बनवले आहे ज्याचा अर्थ तीव्र वास असा होतो. Dill या शब्दाचे उगम सॅक्सन शब्द Dillan हया शब्दापासून झाले आहे. Dillan means dull the restless child to sleep, म्हणजेच अस्वस्थ मुलाची अस्वस्थता कमी करणे.या ३० ते ९० सेंमी. उंचीच्या ओषधीय बहुवर्षायू पालेभाजीचे मूलस्थान भूमध्य सामुद्रिक प्रदेश असून भारतात तिचा प्रसार सर्वत्र आहे. खानदेश व गुजरातमधील काही भागांत शेपूची मोठया प्रमाणात लागवड करतात. दक्षिण यूरोप व पश्चिम आशियात ती लागवडीत आहे.
हिरव्या लहान पानाची ही भाजी शरिरासाठी उपयोगी आहे. ही द्विदलीय फूले असणारी वनस्पती आहे. शेपू ची फुले लहान पिवळी व संयुक्त चामरकल्प फुलोऱ्यात साधारण जुलै-ऑगस्टमध्ये येतात
यूरेशियामध्ये शेपू मोठ्या प्रमाणात घेतले जाते जेथे त्याची पाने आणि बियाणे अन्नासाठी चव येण्यासाठी औषधी वनस्पती किंवा मसाला म्हणून वापरली जातात. ह्याची फळे व बिया सपाट आसतात. पालेभाजी तिखट, कडवट असते.शेपू फळामध्ये बाष्पनशील किंवा उडनशील तेल असते. ह्या तेलात दिल अपियोल , अनिथॉल, युजिनॉल व कॅरवोन हे घटक असतात. अल्फा फिलाँड्रीन लिमोनिन डिल इथेर ह्या तेलातील घटकामुळे शेपूला एक विशिष्ठ सुवास येतो. हयात व्हिटॅमिन अ व व्हिटॅमिन क व फ्लावनॉइड मोठया प्रमाणात आठळतात. पोटदुखी, दात येतानाची वेदना, पोट बिघडणे, तसेच पचनसंस्थेच्या इतर तक्रारींसाठी लहान बालकांमध्ये ग्राइप वॉटर दिले जाते.शेपू कफवातनाशक, शुक्रदोषनाशक , कृमिनाशक समजतात.हा बाळंतशेपा म्हणून ओळखला जातो. गर्भवती महिलांना शेपा पचना साठी व निद्रानाश ह्यासाठी उपयुक्त आहे. नैराश्य दुर करण्यासाठी डिल चा वापर करता. अरोमाथेरपी मध्ये डिल तेल चा वापर होतो. डायबिटीस असलेलया लोकांमध्ये साखरेचे नियंत्रण ठेणवण्यासाठी हि शेप्याचा उपयोग होतो. डिल तेल कीटक प्रतिबंधक म्हणून वापरले जाते. शेतकरी बऱ्याचदा बुरशीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी इतर धान्याबरोबर शेप्याची लागवड करतात. स्वयंपाकघरात शेपा आणि जिरे ह्यांचा एकत्रित उपयोग मसाला म्हणून करतात. स्वयंपाकात ह्याचा उपयोग केल्यास पदार्थ चविष्ट बनतो.असा हा बहुगुणी स्वास्स्थवर्धक शेपा आपल्या स्वयंपाक घरातील आवश्यक घटक आहे.
तर मंडळी, मौजेची घटना अशी घडली की ‘त्रिवेणी’ आश्रमाच्या कार्यालयापाशी पोहोचताच लक्षात आले की माझ्या उजव्या बुटाचा सोल (sole) पुढून निघून लोंबायला लागलाय. सकाळपासून आळंदी मंदिर, ‘ज्ञानेश्वरी’ मिसळ मध्ये ब्रेकफास्ट घेईपर्यंत व्यवस्थित वागणार्या सोलने ऐनवेळी समारंभाच्या सुरुवाती- सुरुवातीलाच मान टाकलेली पाहून माझ्या soul मध्ये धस्स! झाले.
पुढील दोन तास तरी सोलने तग धरावे, अशी मनोमन प्रार्थना करीत मी पुढे निघालो. आणखी दहा पावले पुढे जातो न जातो तोच “घडू नये तेच घडले” आणि सोल बुटापासून तुटून चक्क बाजूला पडला. मी तळपाय तिरपा करून पाहिला असता माझा साॅक थेट दृष्टीस पडल्यावर तर मला ब्रह्मांडच आठवले. आली का आता पंचाईत!
मग अजयचा मित्रत्वाचा सल्ला मानून तो सोल तिथेच बाजूच्या एका वाफ्यामध्ये ठेवून दिला, परत येताना घेऊयात ह्या विचाराने. तिथली एक सफाई कामगार स्त्री काम थांबवून माझ्या सर्व हालचाली टिपत उभी होती. माझी अवस्था पाहून तिने पदर डोळ्यांना लावण्याऐवजी नाकाला लावलेला माझ्या नजरेतून सुटले नाही. त्यात तिचा तरी काय दोष म्हणा!
तिच्याकडे पाठ करून मी येईल त्या प्रसंगाला तोंड देण्याच्या निर्धाराने, जणू काही झालेच नाही अशा आविर्भावात चालत पुढे निघालो. माझ्या आजूबाजूने नवनवीन चपला आणि बूट घातलेली लोक घाईघाईने लग्नमंडपाकडे निघाली होती. मी मात्र साॅकला बोचणारे दगड, फरश्यांमधील फटींचा स्पर्श आदींचा ‘उजव्या’ पदोपदी अनुभव घेत हळूहळू मार्गक्रमणा करीत होतो. तिथे पोहोचल्यावर सर्वांनी चप्पल स्टँडवर बूट-चपला काढायच्या होत्या ते पाहून मात्र माझ्या बुटात नव्हे पण जिवात soul आला!
पुढे सर्वत्र मी ‘पांढर्या पायाने’ नव्हे पण ‘सावळ्या पायाने’ तसाच अनवाणी फिरत राहिलो…डायनिंग हाॅलच्या बाहेरील लाॅन, रेलिंग, पायर्या, पुन्हा लग्नाचा हाॅल असा सगळीकडेच. तशीही बूट घालायची सवय गेली दोन वर्षे मोडली होतीच. त्यामुळे बुटाचे लोढणे न घेता फिरणेच मला छान हलकेहलके, मौजेचे वाटू लागले होते.
‘त्रिवेणी’ आश्रमात अनवाणी फिरणार्या ह्या भक्ताला पाहून इतर भक्त मंडळींचा माझ्याबद्दल आदर वाढतोय, असे मला उगीचच भासू लागले. पण तसा काही चमित्कार घडला नाही. माझ्या पायाकडे कोणी ढुंकूनही पाहिले नाही. आश्रमात बुटाच्या sole ला नव्हे तर “जय गुरुदेव!” ह्या विश्वव्यापी soul च्या पूजनालाच महत्व होते, हे अधोरेखित झाले.
बूटात पाय अडकवून कारपर्यंत ‘वाकडी’ पावले टाकत आलो. तत्पूर्वी परतीच्या मार्गावर मालकाची वाट पाहत पडलेल्या माझ्या उजव्या सोलला वाफ्यामधून उचलून कारमध्ये आणून टाकले. पुढे एखाद्या चांभाराचे दुकान दिसले तर “बुटाला सोल शिवून घेऊयात” असा एक पोक्त पण कळकळीचा सल्ला ड्रायव्हर सतीशने दिला.
आश्रमातून बाहेर पडून आळंदीजवळील एका छोट्या चपलांच्या दुकानात कामचलाऊ पण बरोबर मापाच्या सँडल्सचे शाॅपिंग झाले. तळपायांना sole आणि solace मिळाला आणि त्यासरशी तिथेच माझ्या ‘बाटा’ना करायचे ठरवले कायमचा टाटा! ??
आमचा दूधवाला त्याच्याकडची म्हैस व्याली की आम्हाला चीक आणून देतो. ‘पहिल्या दिवसाचा पाहिजे हं.’ त्याला सांगितलेलं आहे. एक दिवस त्याने असाच चीक आणून दिला. चिकाएव्हढं दूध, गूळ, वेलदोड्याची पूड असं सगळं घालून मी लगेच नेहेमीसारखा खरवस शिजायला ठेवला. पण काय झालं कोण जाणे, वीस मिनिटांनी बघितलं तर चोथा पाणी– बापरे ! आता हा खरवस कोण खाणार ? सगळ्यांना वेलदोड्याची तीट लावलेल्या शुभ्र वड्या आवडतात. ‘ मग आता काय करायचं याचं ?’ असा विचार करताकरता एक युक्ती सुचली. खरवस रवीने चांगला घुसळला. डब्यात भाजलेला रवा होता. अंदाजाने दोन वाट्या, तो भाजलेला रवा त्या घुसळलेल्या खरवसात घातला. नि कुकरमध्ये ठेवला. शिटी न लावता.—-पंधरा मिनिटांनी कुकरचं झाकण उघडलं. आणि –आहा—” मिशन सक्सेसफुल “ — सोनेरी रंगाचा सुंदर सांजा तयार. पूर्वी आपण गुळाचा सांजा करायचो ना तसा. सगळ्यांना बशीतून खायला दिला. उरला तर सांज्याच्या पोळ्या करू असं ठरवलं होतं, पण उरलाच नाही. सर्वांनी आणखी आणखी मागून घेतला. मुलांनी विचारलं ,
“आई पुन्हा असा सांजा कधी करणार? ” मी म्हटलं– “खरवस बिघडल्यावर.”
लेखिका : श्रीमती मीनाक्षी सरदेसाई
सांगली
मो. – 8806955070, 9561582372.
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
“रुके क्यू बेटा; गाओ सदाशिव गाओ, और गाओ” असे म्हणणारे खाँसाहेब असतील तर सदाशिव आणखीन झकास गातो… दिवाळीच्या फराळाचं असंच आहे. “रुके क्यू बेटा; खाओ और खाओ” असा आग्रह करणारे कोणी ‘खा’ साहेब असतील तर आणखीन एक बेसन लाडू तोंडात सरकवायला जास्त मजा येते !
फराळाचे पदार्थ करणे हे याग किंवा यज्ञकर्म असेल, तर तो असा साग्रसंगीत खावा की जणू संगीताची मैफलच आहे.
तुमचे बर्गर वगैरे टेबलावर बसून खावे, पण फराळासाठी झकास बिछायत असावी. लोड तक्के असावेत. अत्तराचा कानात बोळा आणि डाव्या पालथ्या हातावर ते फासलेलं असावं.
शक्यतो सुरवार-कुर्ता आणि स्त्री वर्ग साडीत असेल तर पदार्थांची चव दुपटीने वाढते.
पहिल्या षड्जासाठी कान आतुरलेले असतात, तसा पहिल्या घासासाठी घसा आतुर असावा. मैफलीच्या आधी जसे तंबोरे, तबला सुरात लावताना बाहेर गोड आवाज येतो, तसा आत डबे उघडल्याचा, चहाच्या कपाचा किणकिणाट बाहेर यायला हवा. मांडीवर शाल ओढून जसे गवई दोन तंबोऱ्यात बसतात, तसे रेशमी रुमालाने झाकलेले फराळाचे ताट दिमाखात खाद्यमंचावर यायला हवे; आणि जशी पहिल्या ‘सा’ ला ओठातून ‘क्या बात है!’ अशी दाद येते, तशीच लाडवाच्या पहिल्या तुकड्याला किंवा चकलीच्या पहिल्या तुकड्याला पोटातून ओठात आणि ओठातून जिभेवर दाद यायला हवी !
काही राग काफी थाटाचे असतात, तसे इथे देखील ‘ कॉफी ‘ थाट असेल तर मजा कुछ औरच ! अर्थात पदार्थाची बैठकही जमलेली असावी.
काही स्वर आरोहात वर्ज्य असतात, तसे पदार्थाचे बाह्य रूप असावे. म्हणजे चकली थोडी अबोली रंगाकडेच झुकलेली हवी. ती चवीला कितीही चांगली असली तरी काळपट दिसली की उगीच सम चुकते.
बेसन लाडू बाळसेदार आणि पठाणी जपानी अशा मिक्स- ब्रीड रंगाचाच हवा. अवरोह म्हणजे चव आणि जिभेवरील त्याचे विरघळणे.
भीमपलासी रागात अवरोहात धैवताला पंचम आणि रिषभला षड्जाचा कण जरा चिकटला की जशी खुमारी वाढते, तसेच चिवड्यात दाणे, काजू याचं अस्तित्व हवं. नाहीतर मूळ रागच बेसूर होऊन जातो.
यमनात गंधार आणि निषाद हे वादी-संवादी आहेत, तसे लाडवात बेसन, रवा ही मंडळी वादी आणि साखर संवादी आहे. त्यामुळे यांचे प्रमाण अचूक हवे. गवयाच्या गळ्यासारखा रवा, बेसन व्यवस्थित तापलेला म्हणजे भाजलेला हवा.
चकली ही अनेक रागांचे मिश्रण असलेली पण शृंगारप्रधान ठुमरी आहे. तिला एक ठसका आहे, लय आहे. चकली त्याच ठसक्यात असायला हवी. उगीच बेचव करून ठुमरीचं भावगीत करू नये.
शंकरपाळे वगैरे मंडळी हे मूळ गायक नव्हेत. मुख्य गायकाला श्वास घेण्यासाठी किंवा विश्रांतीसाठी त्यांच्या बरोबर ते ओढे, म्हणजे कट्यारमधले चांद आणि उस्मान आहेत तसे असतात.
करंजी, अनारसे या बाबत मी फार भाष्य करणार नाही.
शेवटी सर्व स्वर कोमल असलेली भैरवी म्हणजे चहा, कॉफी, मसाला दूध ही मंडळी.
मैफिलीत सुरांनी सचैल स्नान घडावं आणि खाद्य मैफिलीत उत्तम चवीचं सचैल स्नान घडावं.
– भूपाल पणशीकर
संग्राहक – श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
☆ शब्द माझ्या सोबतीला (कविता संग्रह)… श्री. सुहास र. पंडित ☆ परिचय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
पुस्तकाचे नाव : शब्द माझ्या सोबतीला
कवी : श्री. सुहास र. पंडित
प्रकाशक : प्रसाद वितरण ग्रंथदालन, सांगली.
‘शब्द माझ्या सोबतीला’ हा सुहास पंडित यांचा पहिला कवितासंग्रह. संग्रहाचे नाव अगदी अर्थपूर्ण आहे. शब्दाच्या माध्यमातून आशय उलगडत जातो. त्याला अर्थ प्राप्त होतो. कविता, कथा, कादंबरी, लेख, चरित्र,- आत्मचरित्र , समीक्षा,सगळ्याच वाङ्मय प्रकाराचे इमले शब्दांनीच रचले जातात. शब्दांशिवाय वाङ्मयाचे सृजन असंभव. कवीला शब्दसामर्थ्याची जाणीव आहे. पण ते शब्दांना ‘मागुते या’ असा आदेश देत नाहीत. ते अतिशय ऋजुपणे, आत्मीयतेने, कृतार्थतेने आणि काहीशा कृतज्ञतेनेही म्हणतात, ‘शब्द माझ्या सोबतीला’.
कविता साधारणपणे दोन प्रकारच्या असतात. काही कविता ‘गर्जायच्या’ आणि ‘गाजवायच्या’ असतात. त्या समूहमनाला आवाहन करतात आणि समूहाकडून टाळ्या मिळवतात. काही कविता स्वत:शीच वाचत, गुणगुणत समजून घ्यायच्या असतात. आणि वा: म्हणत त्यांना स्वत:शीच दाद द्यायची असते. सुहास पंडितांच्या कवितांची जातकुळी ही दुसर्या प्रकारच्या कवितांची. त्या वाचता वाचता आपोआप समजत जातात. त्यांची कविता अगदी साधी, सोपी, सुबोध आहे. विद्रोही, किंवा आक्रोशी नाही. प्रचारकी थाटाची, उपदेशपर, काही प्रबोधन करणारी अशी नाही. आपला अनुभव इतरांपर्यंत पोचावा, म्हणून त्यांनी कविता लिहिली. आपण काही वेगळं, नवीन असं कवितेतून मांडलं, असं ते म्हणतही नाहीत. सार्वजनिक अनुभव ते सांकेतिक पद्धतीनेच मांडतात. मात्र त्यांचे शब्द, कल्पना येतात, ते विशिष्ट लय घेऊन, वृत्तात बद्ध होऊन. छंद-वृत्त यावर त्यांची चांगली पकड आहे. आपला आशय मांडण्यासाठी त्यांना शब्दांची कसरत करावी लागत नाही. त्यांच्या कविता, त्यांच्या मनाचे भाव प्रकट करणारी भावगीतेच आहेत. त्यांची कविता भावगीतकार भा. रा. तांबे यांच्या जातकुळीची वाटते.
कविता संग्रहाच्या सुरुवातीलाच ते लिहितात,
शब्द आमुचे खेळ आहे, कागदाचे अंगण
ना वयाचे, ना दिशांचे ना कशाचे बंधन
रंगवितो खेळ आम्ही, कल्पनांच्या संगती
हार नाही, जीत नाही, फक्त आहे अनुभूती
हार-जीत नसली, तरी या खेळाचा आनंद आहेच. कवीला स्वत:चीच कविता वाचताना जसा आनंद होतो, तसा आनंद, कविता वाचताना वाचकांनाही व्हावा, एवढीच त्यांची अपेक्षा आहे.
आपल्या कविता- लेखनाला तरुण वयात सुरुवात झाली, असं ते म्हणतात. बहुतेक कवींच्या काव्यलेखनाला त्या वयातच सुरुवात होते. कॉलेजच्या रोमॅंटिक विश्वात शिरला की बहुतेकांना कवितेची बाधा होते. ही बाधा काहींना तात्पुरती होते, तर काहींच्या ती कायमची मानगुटीला बसते. ही बाधा सुहास पंडित यांच्या कायमची मानगुटीला बसली.
तरुण वयात प्रेम भावनेचे प्राबल्य अधिक. अनेकदा तर प्रत्यक्ष प्रेमापेक्षा ‘प्रेमाच्या कल्पनेवर’च या बहाद्दरांचं प्रेम असतं. मग सफल-विफल प्रेमाच्या कविता लिहिल्या जातात. पंडितांच्या प्रेमकवितेतही प्रेमाच्या विविध रंगछ्टा विखुरल्या आहेत. त्यांची सखी, प्रेयसी आणि पत्नी एकच आहे. त्यामुळे त्यांच्या कविता सफल प्रेमाची गीते होऊन येतात. इथे पुन्हा एकदा भा.रा. तांबे यांची आठवण होते.
निसर्गाच्या सहवासात त्यांचे प्रेम फुलते. चंद्र-चांदण्या, त्यांचे चांदणे, घमघमणारी चमेली, मोगरा , रातराणी या वातावरणात त्यांच्या शृंगाराला बहर येतो. प्रेयसीशी एकरूप होण्याची उत्कट असोशी ‘आता नाही दुजेपण’ या कवितेत व्यक्त झालीय. त्यांची शब्दकळा लावण्यमयी आहेच, पण या कवितेत ती विशेष वैभवाने प्रकट झाली आहे . म्हंटलं तर यातील कल्पना, रूपके पारंपारिकच, पण त्यातून एक देखणा आविष्कार त्यांनी प्रकट केलाय. ते म्हणतात, तुझ्यासवे बोलताना कधी पहाट होऊच नये आणि पुढे लिहितात,
गालातील गुलाबाचा रक्तिमा फुटावा
डाळिंबाच्या ओठातील मध हळूच टिपावा
चंद्र लपावा ढगात, मुखचंद्रमा हातात
माझ्या गळ्यात पडावे, तुझे सोनियाचे हात
ऋतुराजाचे वैभव सारे खुलावे कायेत
माझ्या मनाचा मयूर सुखे नाचेल छायेत
आणि मग चांगली कल्पना येते –
तुझ्या देहाच्या चंद्राचे माझ्या मनात चांदणे
आता नाही दुजेपण सारे एकरूप होणे
स्वप्नवेल, प्रीत बरसते, सर येण्याआधी, फुलवीत आपुली प्रीत (संवाद), नातं ,प्रतीक्षा अशा अनेक सुंदर कविता इथे वाचायला मिळतात.
पंडितांची प्रेमभावना व्यापक आहे. ती व्यक्तीपुरती मर्यादित नाही. ती निसर्ग, समाज, देश या सार्यांना स्पर्शून जाते. घन गर्जत आले, घन बरसला सावळा, श्रावणमास, रवी आला क्षितिजावर, च्ंद्रोत्सव, मानसमेघ, जंतर मंतर अशा कितीतरी कविता निसर्गाचे लावण्यरूप घेऊन येतात. त्यातही गरजणारा, बरसणारा, वसुंधरेच्या गात्रांमध्ये नवजीवनरस शिंपत जाणारा, चैतन्याची पेरणी करून अवघी अवनी सजवून टाकणारा पाऊसकाळ त्यांना विशेष प्रिय दिसतो. गुलमोहरा’चे शब्दचित्रही त्यांनी अतिशय सुरेख रेखाटले आहे.
‘हे मृत्यो’ या कवितेत ते म्हणतात, मृत्यूपूर्वी फक्त एकदाच मला हिमशिखरांच्या उत्तुंग राशी, गगनाचे इंद्रधनुष्यी तोरण, हिरवी राने, नभातील रंगपंचमी पाहू दे. निर्झर संगीत ऐकू दे. शिशिरातील पहाटवारा अंगावर घेऊ दे, चंद्राची रेशीमवस्त्रे लेवू दे. , मातीच्या कुशीत शिरून राबू दे. आणि फक्त एकदाच या सृष्टीतला ईश्वर पाहू दे. या कवितेचा शेवट मोठा मजेशीर आहे. ‘फक्त एकदा मला मरू दे इथले जिणे संपल्यावर’
निसर्गात रमून जाणे हा कवीचा स्थायीभाव असला, तरी त्याचे सद्य: स्थितीकडे बारीक लक्ष आहे. पूर्वी सुवर्णभूमी असलेला आपला देश स्वार्थांध भ्रष्टाचार्यांनी आता स्मशानभूमी बनवला आहे. ही स्थिती बदलण्यासाठी ‘घे धाव रामराया’ अशी ते आळवणी करतात.
संग्रहात काही चांगली शब्दचित्रे आहेत. ‘माझा गाव’ वेंगरूळ ‘घर खेड्यातले’ ‘कापूर ‘( हे त्यांच्या आईचे शब्दचित्र आहे.)
पंडित म्हणतात, हा संग्रह म्हणजे आपल्या प्रवासाची सुरुवात आहे. प्रवास काट्याकुट्याचा असला तरी पुढे ताटवा लागेल, याची त्यांना खात्री आहे. या पुढच्या प्रवासात त्यांना या मार्गावर नव्या नवलाईच्या खुणा दिसोत.. विविध अनुभवांची समृद्धी मांडणारा, या अर्थाने पुढचा प्रवास त्यांना सुखकारक होवो.
(डा. मुक्ता जी हरियाणा साहित्य अकादमी की पूर्व निदेशक एवं माननीय राष्ट्रपति द्वारा सम्मानित/पुरस्कृत हैं। साप्ताहिक स्तम्भ “डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य” के माध्यम से हम आपको प्रत्येक शुक्रवार डॉ मुक्ता जी की उत्कृष्ट रचनाओं से रूबरू कराने का प्रयास करते हैं। आज प्रस्तुत है डॉ मुक्ता जी का एक अत्यंत विचारणीय आलेख ज़िंदगी और ज़िंदगी। यह डॉ मुक्ता जी के जीवन के प्रति गंभीर चिंतन का दस्तावेज है। डॉ मुक्ता जी की लेखनी को इस गंभीर चिंतन से परिपूर्ण आलेख के लिए सादर नमन। कृपया इसे गंभीरता से आत्मसात करें। )
☆ साप्ताहिक स्तम्भ – डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य # 110 ☆
☆ ज़िंदगी और ज़िंदगी ☆
कुछ लोग ज़िंदगी होते हैं, कुछ लोग ज़िंदगी में होते हैं; कुछ लोगों से ज़िंदगी होती है और कुछ लोग होते हैं, तो ज़िंदगी होती है। वास्तव में ज़िंदगी निरंतर चलने का नाम है और रास्ते में चंद लोग हमें ऐसे मिलते हैं, जिनकी जीवन में अहमियत होती है। उनके बिना हम ज़िंदगी की कल्पना भी नहीं कर सकते और कुछ लोगों के ज़िंदगी में होने से हमें अंतर नहीं पड़ता अर्थात् उनके न रहने से भी हमारा जीवन सामान्य रूप से चलता रहता है। ऐसे लोग बरसाती मेंढक की तरह होते हैं, जिन्हें हम अवसरवादी कह सकते हैं। ये स्वार्थ के कारण हमारा साथ देते हैं। सो! ऐसे लोगों से मानव को सावधान रहना चाहिए। सच्चे दोस्त वे होते हैं, जो सुख-दु:ख में हमारे अंग-संग रहते हैं और सदैव हमारे हितैषी होते हैं। वे हमारी अनुपस्थिति में भी हमारे पक्षधर होते हैं। वास्तव में उनके बिना हम जीवन की कल्पना भी नहीं कर सकते, क्योंकि वे हर विषम परिस्थिति व आपदा में वे हमारा साथ निभाते हैं।
जीवन एक यात्रा है। इसे ज़बरदस्ती नहीं; ज़बरदस्त तरीके से जीएं। मानव जीवन अनमोल है तथा चौरासी लाख योनियों के पश्चात् प्राप्त होता है। इसलिए हमें जीवन में कभी भी निराशा का दामन नहीं थामना चाहिए, बल्कि इसे उत्सव समझना चाहिए और असामान्य परिस्थितियों में भी आशा का दामन नहीं छोड़ना चाहिए। मुझे स्मरण हो रही हैं अब्दुल कलाम की पंक्तियां– ‘आप अपना भविष्य नहीं बदल सकते, परंतु अपनी आदतों में परिवर्तन कर सकते हैं; जिससे आपका भविष्य स्वतः बदल सकता है।’ भले ही हम अपनी नियति नहीं बदल सकते, परंतु अपनी आदतों में परिवर्तन कर सकते हैं और यह हमारी सोच पर निर्भर करता है। यदि हमारी सोच सकारात्मक होगी, तो हमें गिलास आधा खाली नहीं; आधा भरा हुआ दिखाई पड़ेगा, जिसे देख हम संतोष करेंगे और अवसाद रूपी शिकंजे से सदैव बचे रहेंगे।
हर समस्या का समाधान होता है–आवश्यकता होती है आत्मविश्वास व धैर्य की। यदि हम निरंतर प्रयत्नशील रहते हैं और बीच राह से लौटने से परहेज़ करते हैं, तो हमें सफलता अवश्य प्राप्त होती है। मन का संकल्प व शरीर का पराक्रम यदि किसी कार्य में लगा दिया जाए, तो असफल होने का प्रश्न ही नहीं उठता। हर समस्या के समाधान के केवल दो ही रास्ते नहीं होते हैं। हमें तीसरे विकल्प की ओर ध्यान देना चाहिए तथा तथा उस दिशा में अग्रसर होना चाहिए। ऐसी सीख हमें शास्त्राध्ययन, गुरुजन व सच्चे दोस्तों से प्राप्त हो सकती है।
संसार में जिसने दूसरों की खुशी में ख़ुद की खुशी सीखने का हुनर सीख लिया, वह कभी भी दु:खी नहीं हो सकता। बहुत ही आसान है/ ज़मीन पर मकान बना लेना/ दिल में जगह बनाने में/ ज़िंदगी गुज़र जाती है। सो! चंचल मन पर अंकुश लगाना आवश्यक है। यह पल भर में तीन लोकों की यात्रा कर लौट आता है। यदि इच्छाएं कभी पूरी नहीं होती, तो क्रोध बढ़ता है; यदि पूरी होती हैं, तो लोभ बढ़ता है। इसलिए हमें हर परिस्थिति में सम रहना है और सुख-दु:ख के ऊपर उठना है। इसके लिए आवश्यकता है– मौन रहने और अवसरानुकूल सार्थक वचन बोलने की। मानव को तभी बोलना चाहिए, यदि उसके शब्द मौन पर बेहतर हैं। जितना समय आप मौन रहते हैं; आपकी इच्छाएं शांत रहती हैं और आप राग-द्वेष व स्व-पर के भाव से मुक्त रहते हैं। जब तक मानव एकांत व शून्य में रहता है; उसकी आध्यात्मिक उन्नति होती है और वह अलौकिक आनंद की अनुभूति करता है।
परमात्मा सदैव हमारे मन में निवास करता है। ‘तलाश ना कर मुझे/ ज़मीन और आसमान की ग़र्दिशों में/ अगर तेरे दिल में नहीं/ तो मैं कहीं भी नहीं।’ आत्मा व परमात्मा का संबंध शाश्वत् है। वह घट-घट वासी है तथा उसे कहीं भी खोजने की आवश्यकता नहीं; अन्यथा हमारी दशा उस मृग की भांति हो जाएगी, जो जल की तलाश में भटकते हुए अपने प्राणों का त्याग कर देता है। ‘कस्तूरी कुंडली बसे/ मृग ढूंढे बन माहिं/ ऐसे घट-घट राम हैं/ दुनिया देखे नाहिं।’ सो! मानव को मंदिर-मस्जिद में जाने की आवश्यकता नहीं।
परमात्मा तक पहुंचने के रास्ते में सबसे बड़ी बाधा हमारा अहं अर्थात् सर्वश्रेष्ठता का भाव है; जो हमें सब से अलग कर देता है। इसलिए कहा जाता है कि जो अपनों के बिना बीती वह उम्र और जो अपनों के साथ बीती वह ज़िंदगी। सो!अहंकार प्रदर्शित कर रिश्तों को तोड़ने से अच्छा है, क्षमा मांगकर रिश्तों को निभाना। संसार में अच्छे लोग बड़ी कठिनाई से मिलते हैं, उन्हें छोड़ना नहीं चाहिए। प्रकृति का नियम है–जैसे कर्म आप करते हैं, वही लौटकर आपके पास आते हैं। इसलिए सदैव निष्काम भाव से सत्कर्म कीजिए और किसी के बारे में बुरा भी मत सोचिए, क्योंकि समय से पहले और भाग्य से अधिक इंसान को कुछ भी प्राप्त नहीं होता। इसलिए अपनी ख़ुदी को ख़ुदा की रज़ा में मिला दीजिए; तुम्हारा ही नहीं, सबका मंगल ही मंगल होगा।
(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही गंभीर लेखन। शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं। हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )
अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार ☆सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय ☆संपादक– हम लोग ☆पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆
मोबाइल– 9890122603
संजयउवाच@डाटामेल.भारत
writersanjay@gmail.com
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈
(डॉ विजय तिवारी ‘ किसलय’ जी संस्कारधानी जबलपुर में साहित्य की बहुआयामी विधाओं में सृजनरत हैं । आपकी छंदबद्ध कवितायें, गजलें, नवगीत, छंदमुक्त कवितायें, क्षणिकाएँ, दोहे, कहानियाँ, लघुकथाएँ, समीक्षायें, आलेख, संस्कृति, कला, पर्यटन, इतिहास विषयक सृजन सामग्री यत्र-तत्र प्रकाशित/प्रसारित होती रहती है। आप साहित्य की लगभग सभी विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। आपकी सर्वप्रिय विधा काव्य लेखन है। आप कई विशिष्ट पुरस्कारों /अलंकरणों से पुरस्कृत /अलंकृत हैं। आप सर्वोत्कृट साहित्यकार ही नहीं अपितु निःस्वार्थ समाजसेवी भी हैं।आप प्रति शुक्रवार साहित्यिक स्तम्भ – किसलय की कलम से आत्मसात कर सकेंगे। आज प्रस्तुत है आपका एक अत्यंत विचारणीय एवं सार्थक आलेख “परहित सरिस धरम नहिं भाई”।)
☆ किसलय की कलम से # 61 ☆
☆ परहित सरिस धरम नहिं भाई☆
परहित, परोपकार, परसेवा अथवा परमार्थ जैसे शब्दों को ही सुनकर हमारे मन में दूसरों की मदद हेतु भाव उत्पन्न हो जाते हैं। किसी भी तरह के जरूरतमंदों की सहायता करना, उनकी सेवा करना मानवसेवा का प्रमुख उदाहरण है। यदि ईश्वर ने आपको सक्षम बनाया है, या आप गरीबों की अंशतः भी मदद करते हैं तो इससे बढ़कर अच्छा कार्य और कुछ भी नहीं हो सकता। परहित का आधार मात्र आर्थिक नहीं होता। आप समाज में रहते हुए अनेक तरह से ये कार्य कर सकते हैं। आपके द्वारा किया गया श्रमदान, शिक्षादान, अंगदान, सहृदयता, अथवा भावनात्मक संबल भी परहित है। किसी को गंतव्य तक पहुँचाना, अनजान को राह दिखाना, किसी को दिशाबोध कराना सहृदयता ही है। भूखे को खाना, प्यासे को पानी, धूप से व्यथित व्यक्ति को अपने घर की छाँव देकर भी मदद की जा सकती है। अपने घर की पुरानी, अनुपयोगी वस्तुएँ, कपड़े, बर्तन, बचा भोजन आदि भी हम जरूरतमंदों को दे सकते हैं। घर के आयोजनों में कुछ गरीबों को बुलाकर उन्हें भोजन करा सकते हैं या फिर भोजन ले जाकर गरीबों में बाँट सकते हैं। गरीब बच्चों की शालेय शुल्क, पोशाक, जूते, बैग, पुरानी किताबें आदि भी दी जा सकती हैं। ये कार्य सामाजिक संस्थाओं के माध्यम से व्यापक स्तर पर भी किए जा सकते हैं। प्रतिवर्ष नवंबर, दिसंबर और जनवरी महीनों में ठंड का प्रभाव काफी बढ़ जाता है। हर किसी का सुबह और रात में निकलना मुश्किल हो जाता है। अब आप ही सोचें कि जो बेसहारा अथवा गरीब लोग विभिन्न कारणों से फुटपाथ, पेड़ों के नीचे या खुली जगह में रात काटने पर विवश होते हैं, उनकी क्या हालत होती होगी? हम यदि मानवीयता और सहृदयता के भाव से सोचेंगे तो स्वमेव लगेगा कि इन जरूरतमंदों की मदद निश्चित रूप से की जाना चाहिए। हम चाहें तो इन्हें यथासंभव खाने के पैकेट्स दे सकते हैं। इन्हें अपने घरों के पुराने कपड़े दे सकते हैं। रात में मंदिर, पूजाघरों, धर्मशालाओं, बस स्टैंड, रेलवे स्टेशन, फुटपाथों और पेड़ों के नीचे उन तक पहुँचकर उन्हें पुराने कपड़े, ऊनी वस्त्र, कंबल, चादर आदि भी दे सकते हैं। जब भी परसेवा की बात आती है तो हर किसी के मन में एक प्रश्न जरूर उठता है- कहीं ऐसा तो नहीं कि ये ठंड में ठिठुरता अथवा भूखा आदमी अपने बुरे कर्मों से आज इस अवस्था में है, इसकी मदद करना चाहिए या नहीं। तब यहीं पर हमें अपनी नेकनियति की विशालता पहचानने की आवश्यकता होती है कि आँखों के सामने ठंड में ठिठुरते अथवा भूखे आदमी को मानवीय आधार पर यूँ ही तो नहीं छोड़ा जा सकता। हमें यह ध्यान रखना होगा कि एक इंसान होने के नाते गरीब और जरूरतमंदों की सेवा करना भी हमारा सामाजिक दायित्व है। तब देखिए, आपका यह सेवाकार्य, यह सेवाभाव आपके मन को कितनी शांति पहुँचाता है। आपकी यह प्रवृत्ति आपकी खुशी का कारण तो बनेगी ही, साथ में अन्य लोगों को भी ऐसे कार्यों हेतु प्रेरित करेगी।
मनुष्य के सामाजिक प्राणी बनने का कारण भी यही है कि वह सुख-दुख में परस्पर काम आए। अपने से कमजोर अथवा जरूरतमंदों की सहायता करे। अन्य बात यह भी है कि जब ईश्वर ने आपको इतना काबिल बनाया है कि आप समाज के कुछ काम आ सकते हैं, तब आपको दया, करुणा व नम्रता के भावों को अपने हृदय में स्थान देना चाहिए। जरूरतमंदों की पीड़ा अनुभव कर उनकी यथोचित सहायता हेतु आगे आना चाहिए।
समाज में भले ही आज परोपकारियों की संख्या अपेक्षाकृत कम है, फिर भी समाज में ऐसे अनेक लोग दिखाई दे ही जाते हैं जो परहित का बीड़ा उठाए नेक कार्यों में संलग्न हैं। समाज में ऐसी संस्थाएँ भी होती हैं जो निश्छल भाव से जरूरतमंदों की तरह-तरह से सहायता करती रहती हैं। कुछ संस्थाएँ ऐसी भी होती हैं जो व्यापक स्तर पर जनसेवा में जुड़ी रहने के बाद भी प्रचार-प्रसार से दूर रहती हैं। उनका मात्र यही उद्देश्य होता है कि वे यथासामर्थ्य समाज में अपना कर्त्तव्य निर्वहन करें। ऐसे लोग और ऐसी संस्थाओं को मैंने बहुत निकट से देखा है। इन्हें न तो अपनी प्रशंसा की भूख होती है और न ही किसी सम्मान की आशा। परहित कार्यों से जुड़े लोग बताते हैं कि परहित से मिली शांति और खुशी ने हमारी जीवनशैली ही बदल दी है। वे आगे कहते हैं कि दुनिया में आत्मशांति से बढ़कर कोई दूसरी चीज नहीं होती और वही हमें इस कार्य से प्राप्त होती रहती है। हमें बुजुर्गों के आशीर्वचन, बच्चों के मुस्कुराते चेहरे और जरूरतमंदों की अप्रतिम खुशी के सहज ही दर्शन हो जाते हैं। इनके अतिरिक्त भी लोग पशु-पक्षियों के प्रति भी सहृदयता रखते दिखाई देते हैं। हमारे शहर में हाल ही में घटी एक घटना का संदर्भित जिक्र है कि जब एक शख्स ने एक कुत्ते की गोली मारकर हत्या कर दी, तब इस अमानवीय कृत्य को देखकर क्षेत्रीय नागरिकों का आक्रोश फूट पड़ा और प्रशासन को उसे गिरफ्तार कर उसके विरुद्ध कार्यवाही करना पड़ी। लोगों का कहना था कि आखिर एक पशु के साथ आदमी इतनी क्रूरता कैसे कर सकता है। इस अपराध के लिए उसे क्षमा नहीं किया जाना चाहिए। यह घटना एक ज्वलंत प्रश्न हमारे सामने खड़ा करती है। पानी में भीगे, ठंड में ठिठुरते और गर्मियों में पशु-पक्षियों को भोजन, दाना, पानी के बर्तन, सकोरे आदि रखते हुए तो सभी ने देखा ही होगा। घायल पशु-पक्षियों की चिकित्सा कराते भी हमने देखा है। आसपास गौशालाएँ, आवारा कुत्तों की देखरेख करते लोग दिखाई दे जाते हैं। हिंदू धर्म में हिंसा को अनुचित माना गया है। जैन धर्म तो अहिंसा की धुरी पर ही चल रहा है। दुनिया में निःस्वार्थ और निःशुल्क अनगिनत चिकित्सालय संचालित हैं। असंख्य अनाथालय और वृद्धाश्रम अपनी सेवाएँ दे रहे हैं। हमारे शहर में ही एक कैंसर हॉस्पिस है जहाँ कैंसर के गंभीर रोगियों को निःशुल्क चिकित्सा, दवाईयों के साथ रोगियों की सेवा-सुश्रूषा भी हॉस्पिस द्वारा की जाती है। ऐसे परोपकारियों के प्रति कृतज्ञता ज्ञापित करना और ऐसे कार्यों में सहभागी बनना प्रत्येक के लिए गौरव की बात है। जीवन के अंतिम समय में जब लोग अपने ही स्वजनों की सेवा और उनके समीप जाने में भी कतराते हैं, तब ये हॉस्पिस वाले ऐसे मरीजों की अंतिम साँस तक तीमारदारी और दवाईयाँ उपलब्ध कराते हैं। इसे परोपकार का उत्कृष्ट उदाहरण कहा जा सकता है। यहाँ यह भी उल्लेख करना उचित है कि अत्याधुनिक चिकित्सा पद्धति के उपलब्ध होने के कारण लोग एवं मृतात्मा के परिजन लीवर, आँखें, किडनी व अन्य अंग भी दान कर मानवीयता का परिचय देते हैं।
यह बात अलग है कि समाज में कुछ ऐसे लोग भी हैं जो मानवता को ताक पर रखकर स्वार्थवश इस परहित को एक धंधे के तौर पर संचालित करते हैं। ये लोग व्यक्तिगत अथवा अपनी संस्था के माध्यम से सरकारी अनुदान, लोगों के दान अथवा सहायता को स्वार्थसिद्धि का माध्यम बना लेते हैं। ये अनैतिक कार्य करने वाले लोग अर्थ को ही ईश्वर और प्रतिष्ठा का पर्याय मानते हैं। इन्हें संपन्नता तो प्राप्त हो जाती है, लेकिन ये वास्तविक सुख शांति से सदैव वंचित ही रहते हैं।
इस दुनिया में हमने जन्म लिया है। अन्य प्राणियों की अपेक्षा बुद्धि, विवेक और क्षमताएँ भी हमें अधिक प्राप्त हैं। सोचिए! क्या हमें इनका सदुपयोग नहीं करना चाहिए। सुख, शांति, प्रेम, भाईचारे व आदर्श जीवन शैली एक आदर्श इंसान की चाह होती है। यदि यह सुनिश्चित हो जाए तो एक आम इंसान इसके आगे और कोई अपेक्षा नहीं करेगा। आपकी यश, कीर्ति, मान, प्रतिष्ठा तो आपके विवेक पर निर्भर रहती है, जो आपके बुद्धि, कौशल एवं श्रम का ही सुफल होता है। यह बात अलग है कि कुछ उँगलियों पर गिने जाने वाले लोग भी होते हैं जो समाज में अराजकता, हिंसा, विद्वेष आदि फैलाकर अपना छद्म वर्चस्व स्थापित करते हैं। एक प्रतिभावान, परोपकारी व सहृदय इंसान का सम्मान कौन नहीं करेगा? फिर हमें बजाय शॉर्टकट के आदर्श मार्ग अपनाने में संकोच क्यों होता है। पता नहीं क्यों आज के अधिकांश लोग न्याय, धर्म, परोपकार व भाईचारे के मार्ग पर चलना ही नहीं चाहते। झूठी योग्यता का ढिंढोरा पीटकर स्वार्थ सिद्ध करना इंसानियत कदापि नहीं हो सकती।
आईये हम एक सच्चे इंसान की तरह आदर्श जीवनशैली अपनाएँ। खुद जिएँ और लोगों को चैन से जीने दें। भले ही कुछ इंसान असामाजिक गतिविधियों में लिप्त रहकर समाज में विकृति फैलाएँ, लेकिन हमें परोपकार के मार्ग को नहीं छोड़ना चाहिए। मानवता के पथ पर आगे बढ़कर घर, समाज और देशहित की सोच लिए आगे बढ़ते जाना है, क्योंकि दुनिया में जरूरतमंदों की मदद करना परहित का श्रेष्ठतम उदाहरण है। कहा भी गया है कि-
(डॉ भावना शुक्ल जी (सह संपादक ‘प्राची‘) को जो कुछ साहित्यिक विरासत में मिला है उसे उन्होने मात्र सँजोया ही नहीं अपितु , उस विरासत को गति प्रदान किया है। हम ईश्वर से प्रार्थना करते हैं कि माँ सरस्वती का वरद हस्त उन पर ऐसा ही बना रहे। आज प्रस्तुत हैं “भावना के दोहे ”। )