मराठीतील प्रसिद्ध साहित्यिक दि.बा.मोकाशी यांचा आज जन्मदिन तर ग. त्र्यं. माडखोलकर व आनंद यादव यांचा आज स्मृतीदिन. या साहित्यिकांच्या कारकिर्दीची आज ओळख करून घेऊ.
शिवाय बा.द.सातोसकर या गोमंतकीय साहित्यिकाविषयी आजच्या अंकात स्वतंत्रपणे जाणून घेऊ.
दिगंबर बाळकृष्ण तथा दि.बा.मोकाशी
उरण,जि .रायगड हे दि.बा.मोकाशी यांचे जन्मगाव.त्यांनी अभियांत्रिकी पदविका घेतली होती व पुण्यात रेडिओ दुरूस्तीचा व्यवसाय सुरू केला होता.पण त्यांच्यातील लेखक मात्र अविरतपणे सक्रीय होता.त्यामुळेच ललित ,कथा,गूढ कथा,पिशाच्च कथा,रहस्य कथा ,बाल साहित्य अनुवादित साहित्य अशा विविध प्रकारचे लेखन ते करू शकले.विषयांची विविधता,सोपी भाषा,आशयघन लेखन,व्यक्तिच्या अंतर्मनाचा वेध घेण्याची प्रवृत्ती हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.कथालेखन हा त्यांच्या विशेष आवडीचा प्रांत !
सुमारे पस्तीस पुस्तकांची निर्मिती त्यांनी केली आहे.
त्यांची काही साहित्य संपदा
कथासंग्रह – आदिमाया,आम्ही मराठी माणसं,कथामोहिनी,तू आणि मी,माऊली,लामणदिवा,वणवा इ. लामणदिवा हा 1947 साली लिहिलेला त्यांचा पहिला कथासंग्रह.
कादंबरी – संत तुकाराम महाराज यांच्या जीवनावरील आनंद ओवरी,देव चालले,पुरूषास शंभर गुन्हे माफ,स्थळयात्रा इ.
यापैकी आनंद ओवरी आणि देव चालले या दोन कादंब-यांचे इंग्रजीत भाषांतर झाले आहे.वात्स्यायन ही कादंबरी चरित्रात्मक आहे.
ललित साहित्य –
आमोद सुनासि आले,अठरा लक्ष पाऊले,अमृतानुभव,पालखी,संध्याकाळचे पुणे इ.
यापैकी आमोद सुनासि चा हिंदी तर अमृतानुभव चा गुजराती अनुवाद व पालखी चा इंग्रजी अनुवाद झाला आहे.
संध्याकाळचे पुणे हे 1980 साली लिहिलेले त्यांचे शेवटचे पुस्तक होय.
बालसाहित्य –
अंधारदरी,किमया,गुपित,जगाच्या कोलांट्या,बालचंद्र, तुमचा रेडिओ इ.
या व्यतिरिक्त त्यांना काही पुस्तकांचे अनुवादही केले आहेत.हेमिंग्वे च्या FOR WHOM THE BELL TOLLS याचा ‘घणघणतो घंटानाद’ हा अनुवाद.मेडोज टेलर यांच्या ग्रंथावर आधारित प्लासीचा रणसंग्राम हे ऐतिहासिक पुस्तक भाषांतरित केले आहे.
पुरस्कार –
त्यांच्या साहित्याला महाराष्ट्र शासनाचे विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
गुपित 1957,पालखी1957,स्थळयात्रा1958,आमोद सुनासि आले1960,देव चालले1962,जमीन आपली आई1966.साहित्य अकादमीने ‘,निवडक मोकाशी’ हा कथासंग्रह संपादित केला आहे.
या चतुरस्त्र साहित्यिकाचे निधन 1981 मधे पुणे येथे झाले.
☆☆☆☆☆
गजानन त्र्यंबक माडखोलकर
ग.त्र्यं.माडखोलकर हे उच्चशिक्षित नसले तरी मराठी,संस्कृत आणि इंग्रजी या तिनही भाषांत त्यांनी भरपूर वाचन केले होते.शिवाय केवळ आवड म्हणून इटली व आयर्लंड च्या इतिहासाचा अभ्यास केला होता.
ज्येष्ठ साहित्यिक न.चिं. केळकर यांचे लेखनिक,दै.ज्ञानप्रकाश चे विभाग संपादक, दै.महाराष्ट्र चे सह संपादक अशा विविध पदावर त्यांनी सुरूवातीला काम केले.नंतर तरूण भारत,नागपूर या दैनिकाचे 1944मध्ये संपादक झाले आणि 1967ला त्या पदावरून निवृत्त झाले.त्यामुळे त्यांचे वृत्तपत्रिय लेखनही विपुल प्रमाणात झाले आहे. वयाच्या बावीसाव्या वर्षी त्यांनी ‘आधुनिक कविपंचक’ हा समीक्षा ग्रंथ लिहिला.तो खूप गाजला व त्यांना चांगली प्रसिद्धीही मिळाली. सुरूवातीला त्यांनी संस्कृत, मराठी काव्यलेखनही केले.कादंबरी,ललित,प्रवासवर्णन,व्यक्तिचित्रण,नाटक,समीक्षा असे विविध प्रकार त्यांनी हाताळले आहेत.
मराठी बरोबरच हिंदी भाषेचा प्रचार आणि प्रसार यासाठीही त्यांनी कार्य केले.त्यांचा भारतीय स्वातंत्र्य लढ्यातही सहभाग होता.शिवाय संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात ते सक्रीय होते.
1946 साली बेळगाव येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.या संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचा ठराव येथे सर्वप्रथम पास झाला.
माडखोलकर यांची साहित्यसंपदा –
कादंबरी – अनघा,उद्धार,कांता, डाकबंगला,अरुंधती,उर्मिला,भंगलेले देऊळ इ.
ललित व राजकीय लेखसंग्रह – अवशेष,आव्हान,चिपळूणकर काळ आणि कर्तृत्व,जीवनसाहित्य,महाराष्ट्राचे विचारधन इ.
व्यक्तीचित्रणे – आधुनिक महाराष्ट्राचा राजा,माझे आवडते कवी,माझे आवडते लेखक,इ.
प्रवास वर्णन – मी पाहिलेली अमेरिका
आत्मचरित्रपर – मी आणि माझे वाचक,मी आणि माझे साहित्य,मृत्यूंजयाच्या सावलीत ,एका निर्वासिताची कहाणी इ.
नाटक – देवयानी.
लघुकथा – रातराणीची फुले
समीक्षा – वाड्मयविलास,विलापिका,साहित्य समस्या,श्री.कृ.कोल्हटकर व्यक्तिदर्शन इ.
भारतीय साहित्य शास्त्र या त्यांच्या ग्रंथास साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे.
27/11/1976 ला त्यांचे निधन झाले.त्यांच्या स्मृतीस अभिवादन.
☆☆☆☆☆
आनंद यादव
कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे जन्मलेले आनंद यादव यांनी आपले लेखन कथा,काव्य,कादंबरी,ललित,समीक्षा अशा विविध प्रकारात केले आहे.त्यांचे शिक्षण कोल्हापूर व पुणे येथे झाले.सुरूवातीला काही काळ त्यांनी आकाशवाणीत नोकरी केली.नंतर पुणे विद्यापीठात प्र पाठक या पदावर काम सुरू करून विद्यापीठातून
मराठी विभागाचे प्रमुख म्हणून निवृत्त झाले.त्यांचे लेखन हे मूलभूत सामाजिक जाणिवा व्यक्त करणारे होते.एकीकडे सर्जनशील साहित्यिक आणि दुसरीकडे चिकित्सक समीक्षक अशी दुहेरी भूमिका त्यांनी पार पाडली.झोंबी या आत्ममचरित्रात्मक कादंबरीत त्यांनी ग्रामीण बोलीभाषेचा वापर केल्यामुळे त्या भाषेला महत्व प्राप्त झाले.त्यांचे साहित्य कन्नड,तेलुगू,हिंदी,इंग्रजी,जर्मनी अशा विविध भाषांमध्ये अनुवादित झाले आहे.
श्री.यादव यांनी अनेक साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भुषवले आहे.जुन्नर,असोदा, विटा,बेळगाव,भंडारा,नाशिक,औदुंबर,जळगाव,पुणे, मुंबई अशा ठिकाणी भरलेल्या संमेलनाचे ते अध्यक्ष होते.तसेच 2009 साली महाबळेश्वर येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
शिवाजी सावंत पुरस्कार,पु.य.देशपांडे स्मृती पुरस्कार,आचार्य अत्रे,लाभसेटवार,साहित्य अकादमी असे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत.त्यांच्या पुस्तकाना राज्य सरकारची विविध दहा पारितोषिके मिळाली आहेत.शिवाय राष्ट्रीय हिंदी अकादमीने त्यांना उत्कृष्ट साहित्य निर्मितीचा पुरस्कारही दिला आहे.’झोंबी’ या आत्मचरित्रात्मक कादंबरीस 1990चा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे.
त्यांचे निवडक साहित्य –
काव्य – मळ्याची माती,हिरवे जग इ.
कथासंग्रह – आदिताल,उखडलेली झाडे,घरजावई,डवरणी,माळावरची मैना इ.
ललित,वैचारिक,समीक्षा—–
आत्मचरित्र मीमांसा,ग्रामसंस्कृती,ग्रामीणता:साहित्य आणि वास्तव,पाणभवरे,मराठी लघुनिबंधाचा इतिहास,साहित्याची निर्मिती प्रक्रिया, स्पर्शकमळे इ.
आत्मचरित्रात्मक – काचवेल , घरभिंती,झोंबी,नांगरणी.
बालसाहित्य – उगवती मने,रानमेवा,सैनिक हो तुमच्यासाठी.इ.
आज त्यांचा स्मृतीदिन. त्यांच्या स्मृतीस अभिवादन!
☆☆☆☆☆
श्री सुहास रघुनाथ पंडित
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ: विकीपीडिया,मराठी विश्वकोश.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
☆ ती हाक येई कानी ….. भाग – 1 ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
कवी यशवंत (यशवंत दिनकर पेंढरकर) (९/३/१८९९ – २६/११/८५ )
(ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कविवर्य यशवंत, म्हणजे कवी यशवंत दिनकर पेंढारकर यांचा काल, दि . २६ नोव्हेंबर रोजी स्मृतिदिन होता. ( ९/३/१८९९ — २६/११/८५ ) त्या निमित्ताने त्यांच्या काव्य-कर्तृत्वाचा आढावा घेण्याचा हा एक प्रयत्न. )
“ महाराष्ट्र कवी “ असा ज्यांचा अतिशय गौरवाने उल्लेख केला जातो, त्या कवी यशवंत यांच्याबद्दल, त्यांच्या साहित्यसेवेबद्दल किती आणि काय काय सांगावे ते कमीच वाटावे, असेच म्हणायला हवे.
लौकिक जीवनाचा अतिशय खडतर मार्ग आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थिती यामुळे यशवंत यांना फायनलनंतर पुढचे शिक्षण घेता आले नव्हते, हे, त्यांची समृद्ध काव्यसंपदा पाहता कुणालाच खरे वाटणार नाही असे सत्य होते. त्यांच्या शाळेतील शिक्षक, आणि नामवंत कवी व कादंबरीकार श्री. गो.गो.मुजुमदार ( साधुदास ) यांच्या व्यक्तिमत्वाचा त्यांच्यावर मोठाच प्रभाव होता. आणि बहुदा त्यामुळेच ते त्या वयात कवितेच्या प्रेमात पडले होते. जन्म चाफळचा असल्याने समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजीमहाराज यांना त्यांच्या भावविश्वात जणू अढळ स्थान होते. लो. टिळकांनी सुरु केलेल्या शिवजयंती उत्सवाचा मनावर मोठाच संस्कार झालेला होता. “ छंद लागला टिटवीला । तिने समुद्रही आटविला ।। हे टिळकांबद्दलचे स्फूर्तिदायक शब्द मनावर कोरून घेऊनच त्यांनी आपला मुक्काम पुण्याला हलवला आणि त्यांच्या आयुष्याला नवे सुंदर वळण मिळाले.
पुण्यात त्यांना अभिरुचीसंपन्न कवी गिरीश हे मित्र मिळाले. व्युत्पन्न आणि मनस्वी कवी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माधव ज्युलियन यांचा सहवास मिळाला. दिनकरांसारखे चोखंदळ वाचकमित्र मिळाले — आणि त्यांना कवितेचे नवे लोभस क्षितिज खुणावू लागले. चौफेर आणि चोखंदळ वाचनाने त्यांनी औपचारिक शिक्षणाची उणीव भरून काढली. “ रविकिरण मंडळ “ या आधुनिक कवितांची नवी परंपरा सुरु करणाऱ्या कविमंडळातल्या सप्तर्षींमध्ये माधव ज्युलियन यांच्याबरोबर कवी यशवंत यांचेही नाव अग्रक्रमाने झळकू लागले. “ वावटळीत पदराआड दिव्याची ज्योत सांभाळत रहावी , त्याप्रमाणे मी अंतर्यामीची कवितेची आवड सांभाळली, जोपासली, “ असे कवितेवर अनन्य निष्ठा असणारे यशवंत म्हणत असत. एकीकडे कारकून म्हणून रुक्ष व्यावहारिक जीवन जगत असतांना, ‘ काव्य हे एक व्रत ‘ मानून त्यांनी मनापासून काव्याची उपासना केली, असेच म्हणायला हवे.
एकत्र कुटुंबपद्धतीमध्ये प्रामुख्याने जोपासल्या जाणाऱ्या शाश्वत जीवनमूल्यांचे सतत समर्थन करतांना, त्यांची कुटुंबवेल्हाळ वृत्ती त्यांच्या आत्मनिष्ठ कवितांमधून नकळतच प्रकट झालेली असायची. ‘ दैवते माय-तात ‘ ही आईवडलांबद्दलची कृतज्ञता परिणामकारकपणे व्यक्त करणारी कविता, आईचे महत्त्व सांगणारी “ आई म्हणोनि कोणी, आईस हाक मारी। ती हाक येई कानी, मज होय शोककारी “ ही अतिशय लोकप्रिय झालेली, आणि आर्तपणे मनाला भिडणारी कविता, या त्यांच्या अशा आत्मनिष्ठतेमुळेच इतक्या सुंदर जमून गेल्या आहेत, यात दुमत असण्याचे कारण नाही. त्यांची कविता मनातील असंख्य भाव-भावना, आशा-निराशा, तीव्र दुःखाच्या छटा, जीवनातले प्रखर वास्तव, अशा सगळ्या अनुभवांचे यथार्थ चित्रण करणारी होती. –याचे उदाहरण म्हणून, ‘ समर्थांच्या पायाशी ‘, ‘ बाळपण ‘, ‘ मांडवी ‘, अशासारख्या किती कविता सांगाव्यात ?
माझे हे जीवित, तापली कढई,
मज माझेपण दिसेचिना—
माझे जीवित, तापली कढई,
तीत जीव होई लाही – लाही ।।
—- स्वतःच्या आयुष्यातल्या प्रखर वास्तवाचे चित्रण करणारी “ लाह्या-फुले “ ही तशीच एक कविता. अशा वेगळ्याच धाटणीच्या अनेक कविता त्यांनी लिहिलेल्या आहेत.
‘ प्रेमकविता ‘ ही त्यांची आणखी एक खासियत, ज्यात प्रेमाचे साफल्य आणि वैफल्य, मृत्युवरही मात करू शकणारे प्रेमाचे चिरंजीवित्व, अशा प्रेमाच्या अनेक छटा त्यांनी उत्तम चित्रित केल्या आहेत. यासंदर्भातले त्यांच्या विचारांचे वेगळेपण हे की, प्रेमाची परिणती आत्मिक मीलनात होणे ही प्रेमाची खरी परीक्षा असते हा त्यांचा विचार, आणि तो अधोरेखित करणाऱ्या— तूच रमणी, प्रीतिसंगम, प्रेमाची दौलत, चमेलीचे झेले, एक कहाणी, यासारख्या, विशेषत्वाने उल्लेख करावा अशा त्यांच्या कविता.
(मागील भागात आपण पहिलं,- त्यांच्या घरी जेव्हा जेव्हा मी जाई, तेव्हा तेव्हा मला आमच्या कॉलेजमधील विजय सुराणाने लिहिलेल्या ओळी आठवत,
‘असं माहेर ग माझं गाढ सुखाची सावली ।
क्षणभरी पहुडाया अनंताने हांतरली।। आता इथून पुढे – )
पुढे पुढे पुण्याला त्यांच्या मुलीकडे वृंदाकडे जाताना ते आमच्याकडे थांबत आणि मग पुढे पुण्याला जात. आमचा हा थांबा त्यांच्यासाठी फक्त एक-दोन दिवसांचा असे. पण तेवढ्या वेळात वाङ्मय क्षेत्रातील काही घडामोडी, त्यांचे काही नवीन संकल्प, प्रसिद्ध झालेले नवीन पुस्तक असं खूप काही कळत असे.
दादांना दोन मुली आणि एक मुलगा होता. आणि साहित्याच्या रेशमी धाग्याने जोडलेल्या आम्ही दोघी मुली —माझ्यावर आणि माझ्या बहिणीवर, लतावर त्यांचा स्वतःच्या मुली असल्यासारखाच लोभ जडला होता. दादांनी म्हणजे बा.द.सातोस्करांनी आपल्या ९१ वर्षाच्या प्रदीर्घ आयुष्यात काय काय आणि किती किती केलं, हे सांगायचं तर एक ग्रंथच होईल. ते ग्रंथपाल होते. प्रकाशक होते. लेखक होते, संपादक, संशोधक होते आणि गोवा मुक्ती लढ्यातील कार्यकर्तेही होते. गोवा मुक्ति लढा धगधगता ठेवण्यासाठी त्यांनी सन ५४ ते ६२‘दूधसागर हे पाक्षिक चालवले होते. गोवा मुक्त झाल्यावर त्यांना दैनिक गोमंतक वृत्तपत्राचे संपादन करण्यासाठी पाचारण करण्यात आले. त्यांनी ती जबाबदारी ५ वर्षे सांभाळली आणि नंतर या जबाबदारीतून मुक्त झाले.
दादा सातोस्कर साधारणपणे १९३२-३४च्या दरम्यान मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात काम करत होते. तिथल्या अनुभवाच्या जोरावर, पुस्तकांचे शास्त्रशुद्ध व निर्दोष वर्गीकरण कसे करावे, हे शिकवणारी द्विबिंदू वर्गीकरण पद्धत त्यांनी शोधून काढली आणि त्यावर पुस्तकही लिहिले.
ते ग्रंथवेडे होते. त्यांनी ग्रंथ वाचले. ग्रंथांवर प्रेम केले. ग्रंथ लिहिले. ग्रंथप्रेमातून ग्रंथरक्षणाच्या म्हणजेच ग्रंथपालनाच्या शास्त्राकडे वळले. त्यावर पुस्तक लिहिले. गाव तिथे ग्रंथालय ही चळवळही त्यांनी सुरू केली. उत्कृष्ट प्रकाशक हा ग्रंथवेडा असतो- नव्हे असायलाच हवा, असं ते बोलून दाखवत.
१९३४ साली दादा मुंबईत असताना, लक्ष्मणराव सरदेसाईंचे ‘ कल्पवृक्षाच्या छायेत ‘ आणि जयंतराव सरदेसाईंचे ‘ सुखाचे दिवस ’ ही पुस्तके विक्रीची व्यवस्था करण्यासाठी त्यांच्याकडे आली. त्याचवेळी त्यांच्या मनात आले, पुस्तकाशी संबधित असा पुस्तक प्रकाशनाचा व्यवसाय करावा. १९३५मध्ये बा.द. सातोस्कर पदवीधर झाले. त्या काळात त्यांना कितीतरी चांगल्या नोकर्या मिळाल्या असत्या. पण साहित्य प्रेमाने, त्यांनी नोकरी न करण्याचा निर्णय घेतला. आणि ‘ सागर साहित्य प्रकाशन ‘ ही प्रकाशन संस्था काढली. १९३५ ते १९८५ या ५० वर्षांच्या काळात त्यांनी हा प्रकाशन व्यवसाय अव्याहतपणे, उत्साहाने व आनंदाने केला. मराठी प्रकाशक परिषदेच्या पहिल्या संमेलन प्रसंगी, जुन्यातला जुना प्रकाशक म्हणून त्यांचा सत्कार झाला होता, तर ५व्या संमेलन प्रसंगी अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली होती.
सातोस्करांनी प्रकाशनासाठी पुस्तक निवडताना प्रथितयशांच्या पुस्तकांबरोबरच नवोदितांची पुस्तके काढून त्यांना प्रोत्साहन दिले. सुजाण वाचकांकडून दर्जेदार पुस्तक काढले, अशी वाहवा मिळवून घेण्यापेक्षा, अधिकाधिक लोकांपर्यंत आपले पुस्तक पोचले पाहिजे, अधिकाधिक लोकांनी ते वाचले पाहिजे आणि अधिकाधिक लोकांना ते कळले व आवडले पाहिजे, असा त्यांचा दृष्टीकोन होता. म्हणूनच पुस्तकाची निवड करताना त्यांनी ‘क्लास’चा विचार न करता ‘मास’चा विचार केला. प्रकाशन व्यवसाय सुरू केल्यानंतर त्यांनी दोन-तीन वर्षात स्वत:चा प्रेस घेतला. पुढे १९४३च्या दरम्यान कबूल केलेल्या लेखकांनी वेळेवर पुस्तके आणून दिली नाहीत, तेव्हा प्रेसला काम पाहिजे, म्हणून त्यांनी स्वत:च पुस्तक लिहिण्याचे ठरवले. त्यावेळी त्यांनी पर्ल बकच्या ‘मदर’ कादंबरीचा ‘आई’ असा अनुवाद केला. त्यानंतर त्यांनी त्यांच्या ‘द गुड अर्थ ‘ चा ‘धरित्री असा अनुवाद प्रसिद्ध केला. प्रकाशक सातोस्कर असे लेखक सातोस्कर झाले. त्यानंतर त्यांनी ‘जाई‘ ही स्वतंत्र कादंबरी लिहिली. त्याचाच पुढचा भाग ‘ मेनका ‘ लिहिली. अनुपा, अभुक्ता, दिग्या अशा अनेक कादंबर्या त्यांनी पुढे लिहून प्रकाशित केल्या.
☆ साप…. भाग ३ (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर☆
( मागील भगत आपण पहिलं – `तो काळ वेगळा होता रमलू. त्यावेळी शाळेत प्रवेश मिळण्यासाठी पैसे द्यावे लागत नव्हते. आता काळ बदललाय. प्रत्येक गोष्टीसाठी पैसे द्यावे लागतात. ठेव. तुझ्या कामी येतील.’ आता इथून पुढे )
`नाही शेठजी! या कामाचं मी काही इनाम घेणार नाही. याएवजी मला पाच हजार रुपये अॅडव्हान्स द्या. मी दहा महिन्यात आपले पैसे परत करीन.’
अॅडव्हान्सच हवा असेल, तर उद्या तुला पैसे मिळतील. मी मुनीमांना आत्ताच सांगतो. … पण हे तुझ्या बहादुरीचं इनाम आहे. मला माहीत आहे, हे काम या पूर्वी तू कधीच केलं नाहीस. तुझ्या वडलांच्या निधनानंतर साप पकडणार्या लोकांची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवायला लागलीय. या भागात हे काम करणारा आता कुणी राहिलाच नाही. हा आपला भाग म्हणजे जंगलचा हिस्साचआहे. इथे साप निघणरच. खरं तर आपण लोकच त्यांच्या क्षेत्रात येऊन वसलो आहोत. … आज मला या गोष्टीचा आनंद होतोय, की वेळा-काळासाठी एक पठ्ठा तयार झाला. ‘ शेठजींनी रमलूची पाठ थोपटत म्हंटलं.
`पण शेठजी या कामासाठी काही मेहेनताना घेतला जात नाही.’
`अरे बेटा, हा मेहेनताना नाही. लक्ष्मी आहे लक्ष्मी. ती स्वत: चालून तुझ्याकडे येतीय. तिचा अव्हेर करू नकोस. हीच गोष्ट तुम्हाला समजत नाही. लक्ष्मी याचकारणासाठी तुमच्यावर रुसून बसलेली असते. घे हे ठेवून दे.’ असं म्हणत शेठजींनी पाचशेच्या दोन नोटा रमलूच्या शर्टच्या खिशात घातल्या.
यावेळी रमलू काही बोलला नाही. तो माठ घेऊन मुकादमाच्या मागे मोटरसायकलवर बसला.
झोपडीत पोचताच रमलूच्या आईने रमलूकडून साप-पकड-अभियानाची सगळी हकिकत ऐकली. ते सगळं ऐकून ती एकीकडे भयभीत झाली, तर दुसरीकडे रोमांचितही. रमलूच्या पत्नीच्या रेवतीच्या डोळ्यातून मात्र अखंड अश्रूधारा वाहत होत्या. तिने शेंदुराची डबी आणून रमलूच्या हातात दिली. रमलूचे वडील होते, तेव्हा हे सर्व रमलूची आई करायची.
`तुम्ही हे काम करावं, असं मला वाटतनाही. ‘ डबी परत घेत ती हळूच म्हणाली.
`का?’
`का म्हणजे काय? जिवाशी खेळ आहे, हे काम म्हणजे. साप कधी तरी उलटतोसुद्धा! थोडीशी नजर चूक झाली…’
`वेडी आहेस का तू? बाबा म्हणत,`आपल्या लोकांना नागदेवतेपासून अभय मिळालय. जोपर्यंत आपण त्यांना मारत नाही, तोपर्यंत तो आपल्याला दंश करणार नाही.’ कळलं? आणि हे काम करणारा दुसरा कोण आहे या इलाख्यात?’
`मग आम्ही लोकांनी ठेका घेतला आहे का?’
`……’
`आता बाकीचं बोलणं राहू दे. याला जंगलात सोडून ये. घरात दोन-दोन लहान मुलं आहेत. हे संकट घरात फार वेळ ठेवणं बरं नव्हे.’
`पण आता अंधार पडलाय. बाबा म्हणायचे, सापाला अंधार झाल्यावर सोडता कामा नये. माठ आणि वरचं कापड दोन्हीही मजबूत आहे. मी उद्या पहाट होता-होताच त्याला सोडून येईन.’
रमलू अतिशय थकला होता. त्याने झोपडीसमोरचा हात पंप चालवून थंड पाण्याने आंघोळ केली आणि जेवण करून झोपून गेला. अर्ध्या रात्रीनंतर लघवीकरायला उठला. पण नंतर खाटेवर झोपायला जाण्यापूर्वी कोपर्यात ठेवलेल्या मडक्याकडे जाऊन पाहिले. त्यावर कापड अगदी जसंच्या तसं बांधलेलं होतं. मडक्याला स्पर्श करून मनातल्या मनात म्हंटलं, `बस, नागदेवता, आणखी दोन तास धीर धरा.’ तो खाटेवर जाऊन पुन्हा झोपला. तो झोपला खरा, पण आता त्याला पहिल्यासारखी गाढ झोप लागली नाही. खूपवेळपर्यंत तो कुशा बदलत राहिला. मग त्याला झोप लागली. झोपेत स्वप्न पडलं.
स्वप्नात त्याला दिसलं, मुनीमजींच्या घरी साप निघालाय. रमलूला तिथेही साप पकडायला बोलावलं गेलय. मुनीमजींनीदेखील पाचशेच्या दोन नोटा रमलूच्या शर्टच्या खिशात घातल्याहेत. आता त्याने फार काही जोरात नको म्हंटलं नाही. मग शेजारच्या गुलमोहर कॉलनीत एकामागून एक साप निघू लागले. त्या कॉलनीत सगळे बंगले करोडपतींचेच. प्रत्येक ठिकाणी साप पकडायला त्यालाच बोलावलं जाऊ लागलं आणि प्रत्येक जण त्याला इनाम देऊ लागला. कुठे हजार. कुठे पाच हजार. मग तर त्याला शेजा-पाजारच्या गावातूनही बोलावणं येऊ लागलं. त्याने एक झकासपैकी जीप खरेदी केली. शेठजींच्या जीपपेक्षाही शानदार आणि तो जीप घेऊन साप पकडायला जाऊ लागला. दिवसेंदिवस त्याची ख्याती वाढू लागली. त्याने आपला कारभार संभाळण्यासाठी काही सहाय्यकही ठेवले. पुढे पुढे असं होऊ लागलं, की एखादा विशेष साप असेल, तरच तो धरायला जायचा. एरवी त्याने प्रशिक्षित केलेले सहाय्यकच सगळा कारभार संभाळायचे. त्याने बघितलं, त्याचा एक मोठा वाडा झालाय. त्यात त्याची आई शेठाणीसारखी बसलीय. रेवती नोकरा-चाकरांना हुकूम सोडतेय. त्याची दोनही मुले शिकण्यासाठी मोठ्या शहरात गेतील. त्यांना भेटण्यासाठी तो अधून मधून विमानातून जातो. आभाळात उडणारं विमान थोडं उलटं-पालटं होऊ लागलं, तेव्हा त्याची झोप उडाली. त्याची आई त्याला हलवून हलवून जागी करत होती. `बाहेर अजून थोडा अंधारच होता. तो उठला आणि तोंड धुवून खुळखुळून चुळा भरून खाटेवर बसला आणि रात्रीच स्वप्न आठवू लागला.
क्रमश:….
मूळ हिंदी कथा – साप मूळ लेखक – भगवान वैद्य `प्रखर’
अनुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
☆ संघर्ष – भाग-1 ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆
वडिलांसोबत सायंकाळी आम्ही जेव्हा बाजारात जात असू तेव्हा नानाजी टेलर यांचे दुकान हा थांबा निश्चित ठरलेला असायचा.
नानाजी टेलर अतिशय जिव्हाळ्याने व आदराने आमच्या वडिलांचे स्वागत करायचा, विचाराने दोघेही आदर्शवादी असल्याने दोघांचेही खूप जमायचे. बाबा शिक्षक असल्यामुळे वर्तमानपत्र वाचन हा त्यांचा दिनक्रम असायचा. वाचलेल्या बातम्या ते नानाजींना सांगायचे नी मग त्यावर चर्चा रंगायची. आम्हाला या चर्चेतील काही समजायचं नाही, पण नानाजीच्या दुकानात जाणे आम्हाला आवडायचे. नानाजी टेलरचे दुकान म्हणजे काही ऐसपैस नी सुशोभित शो रूम नव्हती. दहा बाय बाराची एक खोली. तिला उत्तर दक्षिण असे दोन्हीकडे रस्ते. त्यामुळे दोन्हीकडे दरवाजे. त्यात दोन शिलाई मशीन, एक कापड कटाईचा लाकडी पाट, कपडे ठेवण्याची एक लाकडी अलमारी आणि बसण्यासाठी ऐक बेंच, असा या दुकानाचा पसारा होता. पण त्यात नानाजी खूश असायचे. आम्हालाही या दुकानात बदल व्हावा असे वाटत नसे. तसे या दुकानात बसणे आम्हाला आवडण्याची इतरही अनेक कारणे होती. त्यातील प्रमुख कारण म्हणजे नानाजींच्या दुकानाला लागून प्रसिद्ध कोहपरे यांचे हॉटेल होते. त्यांचा भटारखाना दुकानातून दिसायचा. त्यांचे कारागीर पदार्थ बनवायचे ते पाहणे आनंददायी वाटायचे. पदार्थांचा सुवास दुकानापर्यंत जाणवायचा.
वडिलांच्या कडक शिस्तीमुळे हॉटेलात जाणे आमच्यासाठी निषिद्ध गोष्ट होती. त्यामुळेही कदाचित बनणारे पदार्थ आनंद देऊन जायचे. एक किरकोळ शरीरयष्टीचा नोकर सतत खलबत्यात काहीतरी कुटत असायचा. बहुदा हॉटेलला लागणारे मसाले, अद्रक लसूण जिरे तो कुटत असावा. पण याव्यतिरिक्त काही इतर कामे करतांना मी त्याला पाहिले नाही. नानाजींच्या दुकानासमोर खाजांची सावकाराची पेढी होती. अनेक गरजू कर्जदार लोक तिथे बसून असायचे. त्यांचे चिंताग्रस्त चेहरे आम्हाला तेव्हाही जाणवायचे. त्यांची अगतिकता ,लुबाडणूक होते याची जाणीव आम्हाला त्यांच्या चेहऱ्यावर दिसायची. त्यामुळे कदाचित मला सावकार सिनेमातील कन्हय्यालाल किंवा जीवन या अभिनेत्यासारखा वाटायचा. समोर एक सोनाराचे दुकान होते. त्याच्या दुकानासमोर असलेल्या नालीतील माती साफ करून त्यातून सोने मिळविण्याचा प्रयास करणाऱ्या विशिष्ट जमातीच्या महिला नेहमी दिसायच्या. त्यांच्या कडेवर लहान मुले असायची. दिवसभर आपल्या कोहपऱ्यासारख्या पात्रातून पाण्याच्या सहाय्याने त्या माती गाळून सोने काढायच्या. त्यांच्या कार्याचे निरीक्षण करणे हे आमचे आनंददायी कार्य होते.
नानाजीं च्या दुकानात आलमारीलगत एक मोठी पिशवी ठेवलेली असायची. त्यात कापडाच्या चिंध्या असायच्या. त्यांचा उपयोग कापडी बाहुल्या बनविण्यासाठी व्हायचा. माझी बहीण सोबत असली की तिची नजर त्या पिशवीवर असायची. ,नानाजींचा मूड चांगला असला की तिला परवानगी मिळायची, नि रंगबिरंगी कापडी चिंध्यांवर ती खजिना मिळाल्यागत तुटून पडायची. नानाजींना कविता ऐकण्याची आवड होती आणि बाबांना कविता करण्याची. दोघेही एकत्र आले की रंग जमायचा. बाबांचे कविता ऐकवणे आणि नानाजींचे त्यांना दाद देणे, यात किती वेळ जातो याचे दोघांनाही भान नसायचे. आम्ही मात्र कंटाळून जात असू, अनेकदा बाजार बंद व्हायचा तरी दोघांचे चर्चासत्र थांबत नसे. नानाजींच्या दुकानात त्यांच्यासोबत त्यांचा शंकर हा मुलगाही काम करायचा. शंकर विवाहित व दोन मुलांचा पिता होता. नानाजी आणि शंकर यांचे कधी फारसे पटत नसे. तो व्यवहारवादी होता. त्याचा कल अधिक पैसे मिळविण्याकडे असायचा. विनाकारण दुकानात येऊन बसणारे व नानाजींशी चर्चा करणारे त्याच्या नजरेत बिनकामाचे असायचे. तो तसे बोलत नसे, पण त्याच्या देहबोलीतून ते जाणवायचे. मात्र त्याने आमच्या वडिलांचा कधी अपमान केला नाही. नानाजींशी त्याचे न पटण्याचे कारणही तसेच होते.
संपादकीयसाठी दिनविशेष बघताना दिसलं, २७ तारखेला बा. द. सातोस्कर यांचा स्मृतिदिन आहे. हे पाहिलं आणि आठवणींची पाखरं भिरीभिरी येऊन मनाच्या झाडावर उतरली आणि किलबिलत राहिली.
त्यांची माझी पहिली भेट झाली, गोव्यातील डिचोली येथे झालेल्या साहित्य संमेलनात. त्यापूर्वी माझी मामेबहीण लता हिच्याकडून त्यांच्याबद्दल खूप काही ऐकलं होतं. तेवढ्यानेही माझी छाती दडपून गेली होती. डिचोलीला लताच्या बालकविता- संग्रहाचे प्रकाशन होते. अध्यक्ष होते, पं महादेवशस्त्री जोशी. ते माझ्या मामांचे मित्रच. तिथे कार्यक्रमाच्या आधी लताने माझी बा. द. सातोस्कर यांच्याशी ओळख करून दिली आणि म्हणाली, ‘ ही माझी आत्येबहीण. हीसुद्धा कथा-कविता लिहिते.’ संमेलनाच्या दरम्यान मधल्या वेळेत त्यांच्याशी खूप गप्पा झाल्या. त्यांनी मोठ्या आत्मीयतेने माझी चौकशी केली. मी काय काय लिहिलं, कुठे कुठे छापून आलं, वगैरे विचारलं. मोठ्या (कर्तृत्वाने) लोकांशी बोलताना मी फारशी मोकळी होत नाही. त्यांच्याशी बोलताना मला दडपणच येतं. धाकुटेपणाची ( कर्तृत्वाच्या दृष्टीने) भावना मनाला वेढून रहाते. पण सातोस्करांचं मोठेपण असं की, ते मधलं औपचारिकतेचं अंतर तोडून दादा स्वत:च धाकुटेपणाजवळ आले. दादा म्हणजे सातोस्कर. जवळचे, परिचित त्यांना दादा म्हणत. मीही मग त्यांना दादा म्हणू लागले. त्यानंतर दादांनी मला मुलगीच मानलं आणि तसं घोषितही केलं. त्यानंतर सांगलीला आल्यावर त्यांचा आणि माझा पत्रव्यवहार वाढला. मी नवीन काही लिहिलं की त्यांना वाचायला पाठवावं असा त्यांचा आग्रह असे. हा पत्रव्यवहार प्रामुख्याने माझ्या बाजूने पाठवलेल्या कविता, मांडलेल्या कथा- कल्पना किंवा मग सगळीच कथा, लिहिलेले लेख या संदर्भात असे. तर त्यांच्या बाजूने त्यांच्या नवीन लेखनाच्या योजना किंवा साहित्य क्षेत्रातील विविध घटनांची माहिती, या संदर्भात असे.
पुढच्या वर्षी मंगेशीला साहित्य संमेलन झालं. अध्यक्ष होते, बा. द. सातोस्कर. एका परिसंवादात बोलण्यासाठी मला त्यांनी निमंत्रित केलं. संमेलनाला सुरुवात होण्यापूर्वी एका खोलीत दादा, गंगाधर गाडगीळ, जितेंद्र अभिषेकी , कृ. ब. निकुंब इ. थोर थोर मंडळी बसली होती. मला बघताच दादांनी मला आत बोलावलं. बस म्हणाले. मग त्यांनी ‘ ही माझी मुलगी, उज्ज्वला केळकर. ही सुद्धा लिहिते, बरं का! आणि चांगलं लिहिते.’ अशी माझी ओळख करून दिली. मला अतिशय संकोच वाटला. अनेक वर्षे शारदेची उपासना करणार्या व्यक्तीने, तितक्याच तोलामोलाच्या व्यक्तींपुढे माझं कौतुक करावं, याची एकीकडे अपूर्वाई वाटत असताना, दुसरीकडे संकोचही वाटत होता. त्याचवेळी त्यांच्या एका मित्राने चेष्टेने विचारलं , ‘ आम्हाला माहीत नसलेली ही मुलगी तुला केंव्हा झाली? ’ दादा सहजपणे म्हणाले. ‘ डिचोलीच्या साहित्य संमेलनात. तिथेच तिची आणि माझी ओळख झाली.’
बा. द. सातोस्कर यांच्याशी नाते जुळले आणि गोवा हे माझे माहेर झाले. शाळा- कॉलेजात आणि नंतरही बा.भ. बोरकरांच्या कविता वाचताना, त्यातील निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेताना गोवा माझी स्वप्नभूमी झाली होती. आता ते माझं माहेर झालं. त्यावेळी दादांनी मला घरी येण्याचा खूप आग्रह केला होता. पण मला वेळ नव्हता. दुसर्या दिवशीचं परतीचं माझं रिझर्वेशन झालं होतं.
त्यानंतर मी ४-५ वेळा गोव्याला गेले, तेव्हा तेव्हा त्यांच्याकडे, मी आणि माझी बहीण लता गेलो. पणजीपासून १५-१६ कि.मीटर अंतरावर असलेल्या करंजाळे इथे ‘स्वप्नगंध’ हे काव्यात्मक नाव असलेली त्यांची टुमदार बंगली होती. घराच्या मागच्या बाजूला मांडवी नदीचे बॅक वॉटर. भोवताली स्निग्ध शांतता. अतिशय रम्य जागी त्यांची छोटी बंगली होती आणि बंगलीत होते स्वागतशील आई आणि दादा. त्यांच्या घरी जेव्हा जेव्हा मी जाई, तेव्हा तेव्हा मला आमच्या कॉलेजमधील विजय सुराणाने लिहिलेल्या ओळी आठवत-