ई–अभिव्यक्तीच्या लेखिका व कवयत्री सौ गौरी गाडेकर यांचा विनोदी कथासंग्रह ‘हनिमून आजी-आजोबांचा’ अलीकडेच प्रकाशित झाला आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन व पुढील लेखनासाठी शुभेच्छा. आजच्या ई–अभिव्यक्तीच्या अंकात या पुस्तकाबद्दलचे मनोगत, स्वत: लेखिकाच व्यक्त करणार आहे.
संत सेना महाराज पुण्यतिथी – संत सेना महाराज प्रा. विजय जंगम
महाराष्ट्रातील थोर संत परंपरेत संत सेना महाराजांचं नाव आदराने घेतले जाते. कारण, अंधार युगात ज्या ज्या संतांनी जातीभेदाच्या, वर्ण व्यवस्थेच्या , लिंगभेदाच्या विरूद्ध उद्बोधन करून आधुनिक महाराष्ट्र घडविण्याचं काम केलं , त्यांच्या मध्ये संत सेना महाराजांचा वाटाही मोठा आहे.त्या काळी , संतांनी आपल्या व्यापक विचारांनी भरकटलेल्या समाजाला स्वतः दीपस्तंभ होऊन भक्ती मार्गातून मानव मुक्तीचा मार्ग दाखविला आणि, समाजात समते बरोबरच समानताही निर्माण करण्याचं फार मोठं काम संतांनी महाराष्ट्रात केलं.
मध्य प्रदेशातील रेवा संस्थान. त्याला रेवा खंड म्हणत असत. त्या खंडातील बांधवगड येथे देवीदास आणि प्रेम कुंवर बाई यांचे पोटी , विक्रम संवत १३५७ , इ.स.१३०१ , वैशाख वद्य द्वादशी ,वार रविवार रोजी संत सेनांजीचा जन्म झाला.जन्मत: च बाळ खूपच तेजस्वी. म्हणून त्याचे नाव सेना किंवा सैन असे ठेवले.सैन म्हणजे तेज: पुंज , प्रकाशमान . सेनाजी म्हणजे भीष्माचार्यांचा अवतार असे समजले जाते. कारण, भावी काळात परोपकारी, वचन निष्ठ , प्रतिज्ञा बध्द आणि पराक्रमी असेच त्यांचे जीवन चरित्र दिसून येते. देवीदास आणि प्रेम कुंवर बाई हे दोघेही धार्मिक आणि साधू संतांची सेवा करणारे एक आदर्श जोडपे होते.त्यामुळे ,सेनाजी्वर बालपणापासूनच चांगले संस्कार झाले.त्यांना साधू संतांचा संग लाभला. त्यांच्या बुद्धीची चमक, त्यांचा चांगुलपणा , धर्म ज्ञान आणि सेवा तत्परता तेव्हा पासूनच दिसू लागली.
त्याकाळी बांधवगड येथे वाघेला वंशाचा रामसिंह राजा राज्य करीत होता.त्याचे दरबारी देवीदास हे सन्मानीय न्हावी होते.देवीदास आणि सेना या दोघांचेही रामानंद हे गुरू होते. ते पुरोगामी विचारांचे असल्याने , सेनाजी पुरोगामी विचारांचेच घडले. दुसरे महत्त्वाचे म्हणजे, महाराष्ट्रातील निवृत्ती, ज्ञानदेव, स़ोपान आणि मुक्ताबाई यांचे वडील विठ्ठलपंत हे देवीदासचे गुरू बंधू.त्यानी सेनाजींना महाराष्ट्रात जायची आज्ञा केली.
देवीदासच्या पश्चात राजदरबारातील सेवा सेनाजी कडे आली , मात्र ते त्यात रमले नाहीत.त्याना विठ्ठलाचा साक्षात्कार झाला आणि ते पंढरपुरात दाखल झाले. तेथे संत नामदेव, सावता माळी, गोरा कुंभार, चोखामेळा या संतांचा सहवास लाभला.विठ्ठलाच्या दर्शनाने ते भारावून गेले.ज्ञानदेवादी चारी भावंडांनी समाधी घेतल्याने त्यांचा विरस झाला.ते आळंदीला गेले.तेथे अनेक अभंग रचना केल्या. ज्ञानदेवांच्या चरणी त्या वाहिल्या.
सेना महाराजाना हिंदी, मराठी, पंजाबी , राजस्थानी भाषा येत होत्या. त्यांचे भाषेवर प्रभुत्व होते.गळा गोड होता. त्यांनी व्यसनाधीनता , बदफैली यावर रचना केल्या. ” गांजा भांग अफू घेऊ नका सूरा / “त्याच प्रमाणे आपल्या जातीचाही त्यांनी उल्लेख केला आहे.” न्हावीयाचे वंशी / जन्म दिला ऋषीकशी / ”
नामदेवांच्या समाधी नंतर सेनाजी उत्तर भारताकडे गेले. तेथून बांधव गड . तेथे सर्वांना आशीर्वाद देऊन ते आपल्या जन्म ठिकाणी समाधिस्थ झाले. महाराष्ट्रा बाहेरचे सेना महाराष्ट्रात आपला ठसा उमटवून अजरामर झाले.
आणि आज वयाची विशी ओलांडल्यावर कधी नव्हे ते पप्याच्या चेहऱ्यावर प्रसन्नता दिसत होती. घरात तो उत्साहाने वावरत होता. का तर त्याचा आज बेवडा बाप मेला होता. आयुष्यभर रखमाला म्हणजेच त्याच्या आईला मारहाण करणारा त्याचा हैवान बाप मेला होता. पप्या आज खूपच खुशीत होता. बाप मेल्याचं दुःख न करता तो घरात मोकळ्या मनाने वावरत होता. बापाचे दिवस न घालता, रखमाला न जुमानता त्याने चक्क घराच्या दाराशी एक गुढी उभारून मोकळेपणाने स्वातंत्रदिन साजरा केला. आज रखमाला पप्याचे एक वेगळेच रूप बघायला मिळत होते. पप्याच्या कोरड्या डोळ्यात एक विलक्षण चमक दिसत होती. त्याच्यात तिला आज एक घरातला कर्ता पुरुष दिसत होता.
पप्या काही ना काही कामे करून रखमाच्या हातात पैसे आणून ठेवत होता. छोटी आता मोठी झाली तरी तिला तो छोटीच बोलत होता. तिला काही पाहिजे असेल ते प्रेमाने आणून देत होता. थोडा लोकांत मिसळायला लागला होता पण मोकळे पणाने जगणे त्याच्याकडून काही होत नव्हते. भूतकाळाचे भूत त्याच्या मानगुटीवरून काही जात नव्हते. आईवर आणि बहिणीवर खूप माया होती पण ती कधी त्याच्या तोंडून बाहेर पडत नव्हती आणि अशाच एका दिवशी वयात आलेली छोटी रखमाला आणि पप्याला सोडून गावातल्या एका मुलाबरोबर मुंबईला पळून गेली. पप्या स्वतः कोसळला पण रखमाला आधार दिला. आपलेच संस्कार कमी पडले असे रखमाला सांगून त्याने तिला धीर दिला. छोटीशिवाय त्याला घरात वावरणे मुश्किल होत होते. छोटी लहानाची मोठी त्याच्याच मांडीवर झाली आणि आता भुर्रकन उडूनही गेली. त्यानं स्वतःला सावरत रखमालाही सावरले पण त्याचे कोरडे डोळे काही ओले झाले नाहीत.
एका वर्षाच्या आत मुंबईला गेलेली छोटी पोटुशी होऊन घरी परत आली ती कायमसाठी. काहीच काम करत नसलेल्या छोटीच्या प्रियकराने लग्नाचे आमिष दाखवून तिला मुंबईला नेले आणि नवलाईच्या दिवसांची मौज करून पैसे संपल्यावर छोटीला एका ठिकाणी घर कामाला लावले. लग्न न करताच छोटीच्याच पगारावर भाड्याने घर वसवले आणि काही दिवसांनी दुसऱ्याच मुलीशी लग्न करून छोटीला परत गावाला पाठवून दिले. छोटीने रडत रडत तिची कर्मकहाणी ऐकवली. तिचा जगण्यावरचा विश्वास उडाला होता. एकसारखी जीव द्यायच्या गोष्टी करत असे. पप्याने तिला खूप समजवून धीर दिला पण एक दिवस छोटीने मोठा निर्णय घेऊन घराच्या मागच्या विहिरीमध्ये स्वतःचा जीव देऊन केलेल्या पापाचे प्रायश्चित घेतले. पप्या आणि रखमाच्या आयुष्यात एक मोठी पोकळी निर्माण झाली. पप्याच्या कोरड्या डोळ्यात दुःखाची झालर दिसली. पापण्या ओल्या न करता मनात रडण्याचे त्याचे कसब रखमाला जाणवले.
त्याचे आतल्या आत रडणे, डोळ्यांत अश्रू न येणे, घुम्यासारखे वागणे ह्या गोष्टीतून त्याला बाहेर काढायचे रखमाने ठरविले आणि पप्याला एकदा तिने जवळ बसविले. मायेने त्याचा डोक्यात हात फिरवून कळकळीने बोलायला सुरवात केली ” पप्या राजा, का असा वागतोस. आता तरी तुझ्या भूतकाळातून बाहेर ये. मला माहित आहे तुझा लहानपणीचा काळ तुझ्या बापाने नासवला पण आता तो भूतकाळ आहे. झटकून टाक तुझ्या मानगुटीवरचे ते भूतकाळाचे भूत. झटकून टाक तुझ्या डोळ्यावरची झापडे. जरा उघडया डोळ्याने ह्या सुंदर जगाकडे बघायला शिक. ही झोपडी म्हणजे जग नाही. बाहेर पडून जगाकडे नव्या नजरेने बघ. बाहेरचे जग खूप सुंदरआहे. त्या जगात खूप सुंदर, चांगल्या वर्तनाची माणसे ही आहेत. त्यांच्यावर विश्वास ठेव आणि नवीन सुंदर आश्वासक असे तुझे भविष्य घडव. मनातले सगळे मळभ बाहेर काढ. आजपर्यंत मनात साचलेल्या अश्रूंना डोळ्यातून बाहेर पडायला वाट दे” आणि रखमाने रडत पप्याला जवळ घेऊन कवटाळले. पप्या रखमाच्या कुशीत शिरला आणि त्याच्या डोळ्यांतील अश्रूंचा बांध फुटला. पप्या रखमाला मिठी मारून खूप वेळ रडत होता. त्याच्या प्रत्येक अश्रूच्या थेंबामधून त्याचा बापाचा दुस्वास आणि त्याने भोगलेले वाईट क्षण जे त्याच्या मनातल्या एका कोपऱ्यात दडी मारून बसले होते ते बाहेर पडत होते. रखमाच्या अंगावर शहारे आले. पप्याच्या डोळयातील पाणी अबोल होते पण ते खूप काही बोलत होते. त्याच्या मुसमुसून रडण्याच्या प्रत्येक हुंदक्यातून त्याच्या बापाने नासवलेला त्याचा भूतकाळ बाहेर पडत होता. आज तो खऱ्या अर्थाने मोकळा झाला होता. आज पप्याला नवीन जन्म मिळाला होता. पुढील सुंदर आयुष्य घडविण्यासाठी त्याचा आज पुनर्जन्म झाला होता.
☆ मामाच्या गावाला जाऊया….भाग 6 ☆ श्रीमती सुधा भोगले☆
(१९५६-१९७० च्या या आठवणी)
बर्फीत पडले असावे?
आजोबांनी जे काही रागे भरले, त्याने भिवून मी दुकानाच्या पडवीतल्या दारातून शेजारच्या जिन्यावरून वरती माळ्यावर धूम ठोकली. खरं तर, वर माळ्यावर काळोख होता. एरवी मी वर जायला घाबरायचे. कारण तेथे वाळलेले भोपळे ठेवत, त्याची लहानपणी भिती वाटे का कोणास ठाऊक? बर्फी तयार झाली पण रॉकेल चा वास लपत नव्हता. म्हणजे आता विक्री होणार नाही थोडक्यासाठी नुकसानं झाले. मी त्यात नकळत दोषी ठरले अर्थात माझाही दोष नव्हताच. तो एक अपघाताच होता. पुढे जत्रेतल्या दुकानात ती बर्फी विकायला ठेवली की नाही ते माझ्या बालमनाला कळले नाही.
तेव्हा, दत्तजयंतीला दोन ठिकाणी जत्रा असत. एक थळ फाट्यावरून, आत येताना असलेल्या टेकडीवरच्या दत्तमंदिरात, तर दुसरी चौल च्या डोंगरावरच्या दत्त मंदिरात असे. दोह्नी ठिकाणी दुकाने थाटली जात. मग मुंबईला नोकरी करणारे मामा रजा टाकून, मदतीला येत असत. बरेच सामान डोंगरावर न्यावे लागे. मोरुकाका सुंकलेंची (आजोबा) मिठाई प्रसिद्ध होती. पाकवलेले काजू हीतर खास हातखंडा असलेली पाककृती. लोक आवडीने घेत.
मुल्लुंडला आमचेकडे आजी कमी पाकवलेले काजू, बर्फी असा प्रसाद दरवर्षी मामाबरोबर पाठवी मी फुलवेडी असल्याने माझ्यासाठी चाफ्याची, बकुळीची, गुलाब, अशी फुले केळीच्या पानात बांधून येत. मध्यंतरी चारवर्षा पूर्वी आम्ही दोघं भावंड दत्त जयंतीला तिकडे गेलो होतो आता चौलच्या दत्ताला वरपर्यंत मोटार रस्ता झाला आहे. पायऱ्या चढून जावे लागत नाही माझे बंधू खाली दुकानात पाकवलेले काजू मिळतील असे वाटून बघायला गेले तेव्हा तेथल्या दुकानदारांकडून कळले की ही खासियत फक्त सुंकल्यांच्या दुकानातच मिळत असे. आता पुढची पिढी, नोकर्या करायला लागली त्यांना यात रस वाटेना मग एकेकाळचे प्रसिद्ध दुकान बंदच झाले, अशीच जत्रा आवासला नागोबाच्या देवळात असे. तेथे हि मिठाईचे दुकान असे. महाशिवरात्रीला कनकेश्वर च्या डोंगरावर शिव मंदिर आहे तेथे जत्रा भरे येथेही पायऱ्या चढून वर जावे लागते. सर्व सामान वाहून वर न्यायला लागते अशी हि शेतीला पूरक उद्योगाची जोडणी असे.
हळूहळू संक्रांतीचे सण जवळ येई, शेतात पेरलेल्या वालांना कोवळ्या कोवळ्या शेंगा लागत. मग एके दिवशी ‘पोपटी’ करायचा बेत ठरे ‘पोपटी’ म्हणजे वालाच्या अखंड शेंगा, कांदे, बटाटे, वांगी, सगळे तिखट मीठ मसाला घालून माठात भरायचे आणि तो माठ उलटे तोंड करून निखार्यावर भाताचा पेंढा पेटवून जमिनीत पुरायचा, म्हणजे आतले जिन्नस वाफ धरून शिजत असत. गरमागरम खाण्यात अनोखी लज्जत येई. पण आम्हाला शहरात पाठवताना पोहचेपर्यंत थंडच मिळे. हा प्रकार गुजरात मध्ये ‘उंदियो’ म्हणजे उलट, उपडे असा अर्थ, त्याच प्रकारातला शेतातला नव्या सोन्याचा नमुना!
वायशेत या गावाला आजोबांची शेतजमीन होती तेथे शेतं लावले जायचे पुढे थळ-वायशेत खत प्रकल्पात ती जमीन सरकारने घेतली. घरटी कंपनीत नोकरी मिळण्याकरिता जेवढी तरुण पिढी होती त्यांना प्रकल्प तयार झाल्यावर नोकरीच्या हमीचे ओळखपत्र दिले होते. मग पुढच्या काही तरुणांनी कंपनीत नोकरी मिळवली, ते थळवासी झाले.
पूर्वी आम्ही ओढीने जमेल तेव्हा मामाकडे जात असू, आता आमचा लळा असलेले मामा, मामी नाहीत, आजी-आजोबा काळानुरूप कैलासवासी झाले, पुढची मामे भावांची पिढी आता घरचा व्याप नोकर्या करून सांभाळते गायी गुरे ही सांभाळणे आता होत नाही. विहीरीवर मोटार बसली, रहाटाची कुईsss कुईssss संपली, स्थल काळाच्या दुरत्वाने पुढच्या पिढीशी, आमच्यापेक्षा लहान असलेल्यांशी लळा जिव्हाळ्याचे नातं, नात्या पुरतचं उरलं. तरीही अजून वाटतं “मामाच्या गावाला जाऊ या, आंबे-फणस खाऊ या, सुट्टीची मजा चाखू या!”
“महाराज तुम्ही रामाचे इतके गुणगान गाता, तुम्हाला स्वतः रामाने कधी दर्शन दिले आहे का ?”
तुलसीदास म्हणाले :- “हो”
भक्त :- मला पण दर्शन घडवाल का ???
तुलसीदास :- “हो नक्की”
★ तुलसीदासांनी त्याला खूप समर्पक उत्तर दिलं, जे एखाद्या गणिती तज्ञाला ही लाजवेल !!!
तुलसीदास म्हणाले:- “अरे हे खूप सोप्पं आहे !!! तू रामाचे दर्शन तुझ्यातच घेऊ शकशील.”
प्रत्येकाच्या नावांत देखील शेवटी आपल्याला रामाचेच दर्शन घेता येईल—-त्यासाठी मी तुला एक सूत्र श्लोक सांगतो. त्याप्रमाणे कोणाच्याही नावाला ते सूत्र लागु होईल!!!
भक्त :-“कोणते सूत्र ?”
तुलसीदास :- हे ते सूत्र —–
||”नाम चतुर्गुण पंचतत्व मिलन तासां द्विगुण प्रमाण ||
|| तुलसी अष्ट सोभाग्ये अंत मे शेष राम ही राम || “
वरील सूत्राप्रमाणे
★ आता कोणाचेही नांव घ्या, त्याची अक्षरे माेजा…
१) त्याला (चतुर्गुण) ४ ने गुणा.
२) त्यात (पंचतत्व मिलन) ५ मिळवा.
३) त्याची (द्विगुण प्रमाण) दुप्पट करा.
४) आलेल्या संख्येला (अष्ट सो भागे) ८ ने भागा.
पुर्ण भाग जात नाही!!!
दरवेळेस बाकी २ शिल्लक राहतेच …
ते दोन म्हणजेच “राम” ही दोन अक्षर होय…
★ विश्वासच बसत नाही ना???
उदा. घेऊ… कोणाचेही नाव निवडा, अक्षर कितीही असोत !!!
★ उदा. ..निरंजन…४ अक्षरे
१) ४ ने गुणा ४x४=१६
२) ५ मिळवा १६+५=२१
३) दुप्पट करा २१×२=४२
४) ८ ने भागा ४२÷८= ५ पुर्णांक, बाकी मात्र २ !!!
बाकी नेहमी दोनच अक्षरे उरतील ती म्हणजे – “राम” !!!
विशेष म्हणजे सूत्रश्लोकातील संख्यांना सुद्धा तुलसीदासांनी फार महत्व दिलं आहे!!!
1) चतुर्गुण म्हणजे ४ पुरुषार्थ :- धर्म, अर्थ, काम,मोक्ष !!!
3) द्विगुण प्रमाण म्हणजे माया व ब्रह्म असे दोन !!!
4) अष्ट सो भागे म्हणजे आठ दिशांनी ( चार दिशा :-पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण , चार उपदिशा – आग्नेय,नैऋत्य, वायव्य, ईशान्य, आठ प्रकारची लक्ष्मी (आग्घ, विद्या, सौभाग्य, अमृत, काम, सत्य, भोग आणि योग लक्ष्मी )
★आता प्रत्येकाने स्वतःच्या नावाने हे तपासून पहा …
विस्मयकारक वाटेल पण बाकी नेहमी २ च येईल…
यात तुलसीदासांच्या बुद्धिचातुर्याची व अतुट रामभक्तीची ओळख पटते !!!
जय श्रीराम
संग्रहिका – सौ. मेधा सहस्रबुद्धे
पुणे
मो 9420861468
medhasahasrabuddhe@gmail.com
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
नुकताच माझा , ‘हनिमून आजी-आजोबांचा’ हा विनोदी कथासंग्रह प्रसिद्ध झाला.
यातील सुरुवातीच्या काही कथांचे नायक-नायिका आहेत आजी-आजोबा. अनेक वर्षांच्या सहजीवनानंतर नात्यामध्ये प्रेम आणि मतभेद यांचा सुंदरसा गोफ तयार होतो. ‘तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून गमेना,’अशी परिस्थिती होते . त्यातून निर्माण होतात असे गमतीदार प्रसंग. खरं तर आजी, आजोबांच्या दृष्टीने गंभीर असले तरी इतरांना हसवणारे.
नंतरच्या कथा इतर नात्यांच्या गुंते उलगडणाऱ्या.
आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रसंगातून विनोदाचा पदर अलगद मोकळा करून हे कथाविश्व उभारलंय.
नेहमीच्या समस्याग्रस्त, धकाधकीच्या जीवनातील ताणतणावांवर उतारा असणारं हे पुस्तक वाचकांच्या पसंतीला नक्कीच उतरेल, याची मला खात्री वाटते.
(डा. मुक्ता जी हरियाणा साहित्य अकादमी की पूर्व निदेशक एवं माननीय राष्ट्रपति द्वारा सम्मानित/पुरस्कृत हैं। साप्ताहिक स्तम्भ “डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य” के माध्यम से हम आपको प्रत्येक शुक्रवार डॉ मुक्ता जी की उत्कृष्ट रचनाओं से रूबरू कराने का प्रयास करते हैं। आज प्रस्तुत है डॉ मुक्ता जी का एक अत्यंत विचारणीय आलेख ज़िंदगी समझौता है। यह डॉ मुक्ता जी के जीवन के प्रति गंभीर चिंतन का दस्तावेज है। डॉ मुक्ता जी की लेखनी को इस गंभीर चिंतन से परिपूर्ण आलेख के लिए सादर नमन। कृपया इसे गंभीरता से आत्मसात करें। )
☆ साप्ताहिक स्तम्भ – डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य # 97 ☆
☆ ज़िंदगी समझौता है ☆
‘ज़िंदगी भावनाओं व यथार्थ में समझौता है और हर स्थिति में आपको अपनी भावनाओं का त्याग कर यथार्थ को स्वीकारना पड़ता है।’ यदि हम यह कहें कि ‘ज़िंदगी संघर्ष नहीं, समझौता है’, तो अतिशयोक्ति नहीं होगी। वैसे औरत को तो कदम-कदम पर समझौता करना ही पड़ता है, क्योंकि पुरुष-प्रधान समाज में उसे दोयम दर्जे का प्राणी समझा जाता है और कानून द्वारा प्रदत्त समानाधिकार भी कागज़ की फाइलों में बंद हैं। प्रसाद जी की कामायनी की यह पंक्तियां ‘तुमको अपनी स्मित-रेखा से/ यह संधि-पत्र लिखना होगा’—औरत को उसकी औक़ात का अहसास दिलाती हैं। मैथिलीशरण गुप्त जी की ‘आंचल में है दूध और आंखों में पानी’ द्वारा नारी का मार्मिक चित्र प्रस्तुत करते हुए उसकी नियति, असहायता, पराश्रिता व विवशता का आभास कराया गया है; जो सतयुग से लेकर आज तक उसी रूप में बरक़रार है।
यहां हम आधी आबादी की बात न करके, सामान्य मानव के जीवन के संदर्भ में चर्चा करेंगे, क्योंकि औरत के पास समझौते के अतिरिक्त अन्य कोई विकल्प होता ही नहीं। चलिए! दृष्टिपात करते हैं कि ‘जीवन भावनाओं व यथार्थ में समझौता है और वह मानव की नियति है।’ यह संघर्ष है…हृदय व मस्तिष्क के बीच अर्थात् जो हमें मिला है… वह हक़ीक़त है; यथार्थ है और जो हम चाहते हैं; अपेक्षित है…वह आदर्श है, कल्पना है। हक़ीक़त सदैव कटु और कल्पना सदैव मनोहारी होती है; जो हमारे अंतर्मन में स्वप्न के रूप में विद्यमान रहती है और उसे साकार करने में इंसान अपना पूरा जीवन लगा देता है। मानव को अक्सर जीवन के कटु यथार्थ से रू-ब-रू होना पड़ता है और उन परिस्थितियों का विश्लेषण व गहन चिंतन कर समझौता करना पड़ता है। वैसे भी जीवन की हक़ीक़त व सच्चाई कड़वी होती है। सो! मानव को ऊबड़-खाबड़ रास्तों पर चल कर, विपरीत
परिस्थितियों का सामना करते हुए अपनी मंज़िल तक पहुंचना होता है। इस स्थिति में यथार्थ को स्वीकारना उसकी नियति बन जाती है। इसमें सबसे अधिक योगदान होता है…हमारी पारिवारिक, सामाजिक व आर्थिक परिस्थितियों का …जो मानव को विषम परिस्थितियों का दास बना देती हैं और लक्ष्य-प्राप्ति के निमित्त उसे हरपल उनसे जूझना पड़ता है। वास्तव में वे विकास के मार्ग में अवरोधक के रूप में सदैव विद्यमान रहती हैं।
आइए! चर्चा करते हैं, पारिवारिक परिस्थितियों की… जैसाकि सर्वविदित है कि प्रभु द्वारा प्रदत्त जन्मजात संबंधों का निर्वाह करने को व्यक्ति विवश होता है। परंतु कई बार आकस्मिक आपदाएं उसका रास्ता रोक लेती हैं और वह उनके सम्मुख नतमस्तक हो जाने को विवश हो जाता है। पिता के देहांत के बाद बच्चे अपने परिवार का आर्थिक-दायित्व वहन करने को मजबूर हो जाते हैं और उनके स्वर्णिम सपने राख हो जाते हैं। अक्सर पढ़ाई बीच में छूट जाती है और उन्हें मेहनत-मज़दूरी कर अपने परिवार का पालन-पोषण करना पड़ता है। वे सृष्टि-नियंता को भी कटघरे में खड़ा कर प्रश्न कर बैठते हैं कि ‘आखिर विधाता ने उन्हें जन्म ही क्यों दिया? अमीर-गरीब के बीच इतनी असमानता व दूरियां क्यों पैदा कर दीं? ये प्रश्न उन के मनोमस्तिष्क को निरंतर कचोटते रहते हैं और सामाजिक विसंगतियां–जाति-पाति विभेद व अमीरी-गरीबी रूपी वैषम्य उन्हें उन्नति के समान अवसर प्रदान नहीं करतीं।
प्रेम सृष्टि का मूल है तथा प्राणी-मात्र में व्याप्त है। कई बार इसके अभाव के कारण उन अभागे बच्चों का बचपन तो खुशियों से महरूम रहता ही है; वहीं युवावस्था में भी वे माता-पिता की इच्छा के प्रतिकूल, मनचाहे साथी के साथ विवाह-बंधन में नहीं बंध पाते; जिसका घातक परिणाम हमें ऑनर-किलिंग व हत्या के रूप में दिखाई पड़ता है। अक्सर उनके विवाह को अवैध क़रार कर, खापों व पंचायतों द्वारा उन्हें भाई-बहिन के रूप में रहने का फरमॉन सुना दिया जाता है; जिसके परिणामस्वरूप वे अवसाद की स्थिति में पहुंच जाते हैं और चंद दिनों पश्चात् आत्महत्या तक कर लेते हैं।
‘शक्तिशाली विजयी भव’ के रूप में समाज शोषक व शोषित दो वर्गों में विभाजित है। दोनों एक-दूसरे के शत्रु रूप में खड़े दिखाई पड़ते हैं; जिससे सामाजिक-व्यवस्था चरमरा कर रह जाती है और उसका प्रमाण इंडिया व भारत के रूप में परिलक्षित है। चंद लोग ऊंची-ऊंची अट्टालिकाओं में सुख-सुविधाओं से रहते हैं; वहीं अधिकांश लोग ज़िंदा रहने के लिए दो जून की रोटी भी नहीं जुटा पाते। उनके पास सिर छुपाने को छत भी नहीं होती; जिसका मुख्य कारण अशिक्षा व निर्धनता है। इसके प्रभाव व परिणाम -स्वरूप वे जनसंख्या विस्फोटक के रूप में भरपूर योगदान देते हैं।
जहां तक चुनाव का संबंध है…हमारे नुमांइदे इन के आसपास मंडराते हैं; शराब की बोतलें देकर इन्हें भरमाते हैं और वादा करते हैं– सर्वस्व लुटाने का, परंंतु सत्तासीन होते ये दबंगों के रूप में शह़ पाते हैं।’ आजकल सबसे सस्ता है आदमी…जो चाहे खरीद ले…सब बिकाऊ है…एक बार नहीं, तीन-तीन बार बिकने को तैयार है। यह जीवन का कटु यथार्थ है; जहां समझौता तो होता है, परंतु उपयोगिता के आधार पर और उसका संबंध हृदय से नहीं, मस्तिष्क से होता है।
मानव के हृदय पर सदैव बुद्धि भारी पड़ती है। हमारे आसपास का वातावरण और हमारी मजबूरियां हमारी दिशा-निर्धारण करती हैं और मानव उन के सम्मुख घुटने टेकने को विवश हो जाता है …क्योंकि उसके पास इसके अतिरिक्त अन्य विकल्प होता ही नहीं। अक्सर लोग विषम परिस्थितियों में टूट जाते हैं; पराजय स्वीकार कर लेते हैं और पुन:उनका सामना करने का साहस नहीं जुटा पाते। ‘वास्तव में पराजय गिरने में नहीं, बल्कि न उठने में है’ अर्थात् जब आप धैर्य खो देते हैं; परिस्थितियों को नियति स्वीकार सहर्ष पराजय को गले लगा लेते हैं… उस असामान्य स्थिति से कोई भी आपको उबार नहीं सकता अर्थात् मुक्ति नहीं दिला सकता और वे निराशा रूपी गहन अंधकार में डूबते-उतराते रहते हैं।
ग़लत लोगों से अच्छे की उम्मीद रखना; हमारे आधे दु:खों का कारण है और आधे दु:ख अच्छे लोगों में दोष-दर्शन से आ जाते हैं। इसलिए बुरे व्यक्ति से शुभ की अपेक्षा करना आत्म-प्रवंचना है, क्योंकि उसके पास जो कुछ होगा, वही तो वह देगा। बुराई-अच्छाई में शत्रुता है… दोनों इकट्ठे नहीं चल पातीं, बल्कि वे हमारे दु:खों में इज़ाफ़ा करने में सहायक सिद्ध होती हैं। अक्सर यह तनाव हमें अवसाद के उस चक्रव्यूह में ले जाकर छोड़ देता है; जहां से मुक्ति पाना असंभव हो जाता है। इस स्थिति में भावनाओं से समझौता करना हमारे लिए हानिकारक होता है। दूसरी ओर जब हम अच्छे लोगों में दोष व अवगुण देखना प्रारंभ कर देते हैं, तो हम उनसे लाभान्वित नहीं हो पाते और हम भूल जाते हैं कि अच्छे लोगों की संगति सदैव कल्याणकारी व लाभदायक होती है। इसलिए हमें उनका साथ कभी नहीं छोड़ना चाहिए। जैसे चंदन घिसने के पश्चात् उसकी महक स्वाभाविक रूप से अंगुलियों में रह जाती है और उसके लिए मानव को परिश्रम नहीं करना पड़ता। भले ही मानव को सत्संगति से त्वरित लाभ प्राप्त न हो, परंतु भविष्य में वह उससे अवश्य लाभान्वित होता है और उसका भविष्य सदैव उज्ज्वल रहता है।
‘मानव का स्वभाव कभी नहीं बदलता।’ सोने को भले ही सौ टुकड़ों में तोड़ कर कीचड़ में फेंक दिया जाए; उसकी चमक व मूल्य कभी कम नहीं होता। उसी तरह ‘कोयला होय न उजरो, सौ मन साबुन लाय’ अर्थात् ‘जैसा साथ, वैसी सोच’… सो! मानव को सदैव अच्छे लोगों की संगति में रहना चाहिए, क्योंकि इंसान अपनी संगति से ही पहचाना जाता है। शायद! इसीलिए यह सीख दी गयी है कि ‘बुरी संगति से व्यक्ति अकेला भला।’ सो! व्यक्ति के गुण-दोष परख कर उससे मित्रता करनी चाहिए, ताकि आपको शुभ फल की प्राप्ति हो सके। आपके लिए बेहतर है कि आप भावनाओं में बहकर कोई निर्णय न लें, क्योंकि वे आपको विनाश के अंधकूप में धकेल सकती हैं; जहां से लौटना नामुमक़िन होता है।
सो! यथार्थ से कभी मुख मत मोड़िए। साक्षी भाव से सब कुछ देखिए, क्योंकि व्यक्ति भावनाओं में बहने के पश्चात् उचित-अनुचित का निर्णय नहीं ले पाता। इसलिए सत्य को स्वीकारिए; भले ही उसके उजागर होने में समय लग जाता है और कठिनाइयां भी उसकी राह में बहुत आती हैं। परंतु सत्य शिव होता है और शिव सदैव सुंदर होता है। सो! सत्य को स्वीकारना ही श्रेयस्कर है। जीवन में संघर्ष रूपी राह पर यथार्थ की विवेचना करके समझौता करना सर्वश्रेष्ठ है। जब गहन अंधकार छाया हो; हाथ को हाथ भी न सूझ रहा हो…एक-एक कदम निरंतर आगे बढ़ाते रहिए; मंज़िल आपको अवश्य मिलेगी। यदि आप हिम्मत हार जाते हैं, तो आपकी पराजय अवश्यंभावी है। सो! परिश्रम कीजिए और तब तक करते रहिए; जब तक आपको अपने लक्ष्य की प्राप्ति नहीं हो जाती। संबंधों की अहमियत स्वीकार कीजिए; उन्हें हृदय से महसूसिए तथा बुरे लोगों से शुभ की अपेक्षा कभी मत कीजिए। बिना सोचे-विचारे जीवन में कभी कोई भी निर्णय मत लीजिए, क्योंकि एक ग़लत निर्णय आपको पथ-विचलित कर पतन की राह पर ले जा सकता है। सो! भावनाओं को यथार्थ की कसौटी पर कस कर ही सदैव निर्णय लेना तथा उसकी हक़ीक़त को स्वीकारना श्रेयस्कर है। यथा-समय, यथा-स्थिति व अवसरानुकूल लिया गया निर्णय सदैव उपयोगी, सार्थक व अनुकरणीय होता है। उचित निर्णय व समझौता जीवन-रूपी गाड़ी को चलाने का सर्वश्रेष्ठ माध्यम है, उपादान है; जो सदैव ढाल बनकर आपके साथ खड़ा रहता है और प्रकाश-स्तंभ अथवा लाइट-हाउस के रूप में आपका पथ-प्रशस्त करता है।
(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही गंभीर लेखन। शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं। हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )
अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार ☆सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय ☆संपादक– हम लोग ☆पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆
संजयउवाच@डाटामेल.भारत
writersanjay@gmail.com
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈