काल सेन्सेक्सने उसळी घेऊन आठ्ठावन्न हजाराचा टप्पा पार केल्यावर, एक सामान्य माणूस म्हणून, मी माझी प्रतिक्रिया नोंदवू इच्छितो, जी प्रत्येकाने आपापल्या जोखमीवर वाचावी, ही नम्र विनंती !
ही जी काय उसळ अठ्ठावन्न हजाराच्या तापमानला आज उसळी घेऊन रटरटते आहे, तिचा खरा बॉयलिंग पॉईंट काय असेल, असावा हे भले भले स्वतः अर्थशास्त्र कोळून प्यायलेले अभ्यासक सुद्धा आज पर्यंत सांगू शकले नाहीत, तिथे तुमच्या, माझ्या सारख्या सामान्य लोकांचा काय पाडाव लागणार ? कारण ही जी उसळ ज्या जी जी भाय टॉवर नावाच्या भांड्यात शिजायला ठेवली आहे, त्या भांड्या खालचा गॅस कोणता अदृश्य हात, स्वतःच्या मर्जीनुसार कमी जास्त करतो ते कळतच नाही ! त्यामुळे होतं काय, या उसळीचा स्वाद घ्यायला येणारे नवीन नवीन खवय्ये, ती थोडीशी चाखून सुद्धा, स्वतः गॅसवर गेल्याची अनेक उदाहरणं आपण सगळ्यांनी पहिली आहेत !
फार पूर्वी, शेअर मार्केटरुपी सट्ट्याच्या मुदपाकखान्याच्या वाटेला जाणे हे सामान्य मराठी मध्यमवर्गात निशिद्ध मानलं जात होतं !
माझ्या माहितीतले असेच अनेक मराठी मध्यमवर्गीय जे पूर्वी “कोटात” कामाला जायचे, ते या मुदपाखान्याची पायरीच काय, त्याच्या फुटपाथवरून (तेव्हा ते खरंच होते हो) सुद्धा जात नसत ! उगाच आत शिजणाऱ्या उसळीचा गंध नाकात जाऊन ती उसळ खायची दुर्बुद्धी व्हायला नको ! ही मंडळी तेंव्हा, आपल्या महिन्याच्या पगारात टुकीने संसार करून, त्यातून थोडे फार पैसे वर्षं भरात वाचलेच तर बँकेत किंवा पोस्टात FD रुपी खात्रीशीर “जनता थाळी” घेण्यात धन्यता मानत असतं ! असो ! जशी दृष्टी तसा कोन आणि तसे त्याचे फळ !
मला विचाराल तर माझ्या मते, ही जी जी भायच्या भांड्यात सतत शिजणारी, रटरटणारी उसळ म्हणजे एक अगम्य साईड डिश आहे ! ही उसळ काहींना कधीतरी चविष्ट लागते तर काहींची जीभ (आणि पर्यायाने खिसा) कधीतरी त्यातील तिखटामुळे पोळते ! त्यामुळे या जी जी भायच्या टॉवरमधे जाऊन त्या उसळीचा स्वाद घ्यायचा, का खात्रीशीर “जनता थाळी” घ्यायची हे ज्याचे त्याने ठरवलेले बरे !
मनुष्य प्राणी जन्माला आल्यापासून तो ज्या काही वस्तूंच्या संपर्कात येतो आणि जी वस्तू परिचयाची होते, त्यातली महत्वाची वस्तू म्हणजे आरसा.
मुलं रडायला लागलं की त्याला नादी लावण्यासाठी त्याला आरसा दाखवतात , त्यावेळी स्वतःचे प्रतिबिंब कुतूहलाने पाहत असताना त्याचे रडणे थांबते, ही आरश्याची जणू पहिली ओळख. प्रथम ते लहान मुलं ते प्रतिबिंब बघून घाबरले असेल पण नंतर त्या प्रतिबिंबाला बघून खुदकन हसते. त्यानंतर जणू आरसा त्याच्या रोजच्या जगण्याचा अविभाज्य घटक बनून जातो.
स्वतःचे प्रतिबिंब न्याहाळताना माणूस त्या प्रतिबिंबित व्यक्तिमत्वाशी इतका समरस होऊन जातो की दिवसभरात किती वेळा माणूस त्याचे प्रतिबिंब न्याहाळत असेल सांगता येत नाही.
आरश्यासारखी प्रामाणिक वस्तू नसेल, जे आहे ते स्पष्टपणे दाखवतो. आरश्यात सौंदर्य जसे खुलून दिसते तसे व्यक्तीमत्वामधील दोषही, आहे तसेच दाखवले जातात. चेहऱ्यामधील सौंदर्याची तफावत अथवा कमतरता पण स्पष्ट केली जाते. घरामधील महत्वाची वस्तू आणि अविभाज्य घटक म्हणून आरश्याचे स्थान आहे.
माणसाच्या उत्क्रांतीत आरश्याचे स्थान कधी आले असेल?असे म्हणतात, ‘माणूस तळ्याच्याकाठी पाणी पिण्यासाठी वाकला होता त्यावेळी संथ पाण्यात स्वतःचे प्रतिबिंब त्याला दिसले. त्या वेळेपासून त्याला कुतूहल निर्माण झाले आणि स्वतःचे प्रतिबिंब बघावे ह्या निकडीतून आरशाचा शोध लागला असावा.
काचेच्यामागे मुलामा चढविल्यानंतर जो चकचकीतपणा आला, त्यात बघणाऱ्या व्यक्तीचे प्रतिबिंब दिसले, ते बघून आरश्याची निर्मिती झाली असावी. ज्या माणसाने आरश्याचा शोध लावला, तोही स्वतःचे प्रतिबिंब बघून खुदकन हसला असेल .असा हा आरसा लहान बाळापासून अगदी आजी आजोबांपर्यंत सगळ्यांचा लाडका झाला.
बालपणात तसे आरश्याकडे दुर्लक्ष होत असेल पण वयात येताना तो एकदम जवळचा वाटू लागतो. किशोर वय असो वा तारुण्याचा काळ आरश्यात स्वतःचे प्रतिबिंब न्याहाळत केश रचना करणे, पेहेराव करणे, आरश्यात स्वतःला न्याहाळत स्वतःचे व्यक्तिमत्व कसे खुलले हे बघत राहणे, अश्या गोष्टी जणू अंगवळणी पडतात. त्यात तरुणींचा तारुण्यकाळातील खुपसा वेळ आरश्यापुढेच जात असेल.
‘दर्पण झूठ न बोले’ ह्या उक्तीप्रमाणे, जसे आहे तसे प्रतिबिंब आरसा दाखवत असतो. त्यामुळे एखादी सौंदर्यवती आरश्यापुढे स्वतःच्या सौंदर्याने मोहून जाते तर साधारण चेहऱ्याची व्यक्ती आरश्याकडे पाहत स्वतःचे सौंदर्य अधिकाधिक खुलवण्याचा विचार करत असते. आरश्यात दिसणाऱ्या प्रतिमेने माणसं आनंदतात तसेच चेहऱ्यावरील डाग बघून अस्वस्थही होतात. वाढत्या वयाच्या खुणा दर्शविणाऱ्या सुरकुत्या आणि पांढरे केस बघून मन चिंतीत होते. मग त्यावर तरुण दिसण्याचे उपायही आरश्यात पाहूनच केले जातात, जणू वृद्धत्वाच्या पाऊलखुणा पुसून टाकण्याची एक धडपड. त्याच आरशाच्या साह्याने सौंदर्य खुलवत ठेवण्याचा प्रयत्न सुरू असताना वाढत्या वयासोबत होणारा शारीरिक बदल स्वीकारण्याची मानसिकता मात्र वाढीस लागत नाही. आरश्यात चेहऱ्याचे वास्तव दर्शन होत असताना ते टाळणे असंभव पण तरीही स्वतःच्या व्यक्तिमत्वावर अफाट प्रेम करण्याची सवय आरश्यामुळेच लागते.
खरं तर सुंदर चेहरा अथवा सौंदर्य दाखवणे हाच आरश्याचा उपयोग नाही. आहे ते आहे तसे प्रतिबिंबित करणे हे आरश्याचे प्रामाणिक कर्तव्य. जेव्हा आहे तसे स्वीकारण्याची सवय लागते अथवा प्राप्त परिस्थितीचा स्विकार केला जातो त्यावेळी असलेले प्रतिबिंब अथवा प्रतिमा आपलीशी वाटू लागते.
आरसा हा व्यक्तिमत्वाचे प्रतिबिंब दाखवत असताना, त्या प्रतिमेकडे पाहत आपण स्वतःवर खुश होत असतो. काही वेळा आरश्यापुढे पाहत स्वतःमधील आत्मविश्वास जागृत करता येतो. Self Talk हा मानसशास्त्रातील महत्वाचा घटक आहे, ज्या योगे माणूस स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करतो. काही वक्ते त्यांच्या उमेदीच्या काळात आरश्यापुढे उभे राहून भाषणाचा सराव करत. आजही प्रेसेंटशन स्किल सुधारण्यासाठी आरश्याचा वापर करतात.
‘आरसा हा सर्वोत्तम मित्र आहे, कारण आपण जेव्हा दुःखी असतो त्यावेळी तो कधीच हसत नाही.’
कधीकधी हाच आरसा जणू तुमची साथ सोबत करत असतो. विचार करा, घरात एकटेच असाल आणि एकटेपण जाणवत असेल अश्यावेळी नकळत आपण आरश्यापुढे उभे राहतो.
कवि गुलजार म्हणतात,
“आईंना देख कर तसल्ली हुई।
हमको इस घर में जानता है कोई।।”
आरसा भलेही माणसाचे बाह्य सौंदर्य प्रतिबिंबित करत त्याला खुश करत असेल पण सौंदर्य काय फक्त तेवढेच आहे? शारीरिक सौंदर्याइतकेच मनाचे सौंदर्य महत्वाचे. चांगला स्वभाव, आनंदी स्वभाव, नितळ, निर्व्याज आणि संवेदनशील मन ह्या बाह्य सौंदर्याप्रमाणे महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या आरश्यात प्रतिबिंबित होत नाहीत पण त्या मानसिक सौंदर्यामुळे जाणवणारा आत्मविश्वास चेहऱ्यावर दिसतो आणि तो प्रतिमेत परिवर्तित होतोच.
समोरची जिव्हाळ्याची आणि प्रिय व्यक्ती,काही वेळेस आरश्याप्रमाणे प्रामाणिकपणे तुमचे गुण आणि दोष न्याहाळत असतात. त्या गुण दोषांचे समर्पक प्रतिबिंब त्याच्या प्रामाणिक मतानुसार परिवर्तित करत असतात. अश्यावेळी ते स्वीकारण्याचा, मनाचा मोठेपणा हवाच.
“आयुष्यात असे लोक जोडा की जे वेळ येईल तेव्हा तुमची सावली आणि आरसा बनतील.
आरसा कधी खोटे बोलत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही.”
आपल्या प्रिय व्यक्तीच नाही तर आपल्या सभोवतालचे लोकही जणू आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा असू शकतात. ही सभोवतालची माणसं काही फक्त बाह्य व्यक्तिमत्वाने प्रभावित होत नाहीत तर तुमचा चांगुल स्वभाव, तुमचे वागणे, बोलणे, बोलण्यातील मार्दवता, प्रेमळ भाष्य आणि निष्पाप मन ह्या अंतर्गुणांनी प्रभावित होत असतात आणि त्यांचा प्रतिसाद त्यांच्या वागणुकीतून दिसत असतो. जणू आपल्या वागण्याचे प्रतिबिंब समोरच्या माणसाच्या वागणुकीतून व्यक्त होत असते.
जे. कृष्णमूर्ती समर्पक शब्दात म्हणतात,
“समोरची व्यक्ती हा जणू तुमच्या व्यक्तिमत्वाचा आरसा होय, तुमचे प्रतिबिंब त्यात दिसत असते.”
ॐ पूर्णमदः पूर्णमिदं।पूर्णात्पूर्णमुदच्यते।।
पूर्णस्य पूर्णमादाय। पूर्णमेवावशिष्यते।।
ह्या उपनिशदातील उक्तीप्रमाणे थोडा वेगळा विचार केला तर,
☆ छोटुली – भाग २ (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
(मागी भागात आपण पाहीलं – तिच्या चाहर्याचे भाव सुरांच्या आरोहा-अवरोहाबरोबर असे काही बदलत जातात, जसं काही कुणी या बदालाचा रिमोटच तिच्या मेंदूत बसवून ठेवलाय आणि बटण दाबताच एकामागून एक मनमोहक भाव तिच्या चेहर्यावर उमटू लागतात. – इथून पुढे )
दिवसभर प्रतीक्षा केल्यानंतर एकदाचं छोटुलीच नाव पुकारलं गेलं आणि ती आईबरोबर मंचावर गेली. आईने तिला मंचावर सोडलं आणि ती मागे जाऊन उभी राहिली. मोठ्या मंचावर ठेवलेल्या तीन खुर्च्यांवर बसलेल्या तीन लोकांनी तिचं स्वागत केलं. प्रतिभावंत मुलांची निवड करणारे ते तिघे जज्ज होते. छोटुलीला तिचं नाव विचारलं गेलं. तिचं वय विचारलं गेलं. तिने नि:संकोचपणे उत्तर दिलं. तिचा जोरदार आवाज तिचा आत्मविश्वास प्रगट करत होता. काही क्षणातच तिच्यासाठी म्यझिक सुरू झालं. ती पापणीही न लावता तिकडे बघत राहिली, जसं काही तिला हा प्रश्नच विचारला गेलाय. तिला त्याचं उत्तर द्यायचय आणि ती विचार करते आहे, बोलायचय आपण? ती अगदी गप्प उभी राहिली. कसलीच हालचाल न करता. गाणं बंद झालं. आईने तिच्याजवळ येऊन तिच्या कानात काही सांगितलं, तेव्हा तिने मान हलवली. पुन्हा एकदा गाणं लावलं गेलं आणि ती नाचू लागली. अगदी मोकळेपणाने नाचू लागली. तिच्या मनात जे जे येईल, तसतसं करू लागली. तिच्यासाठी आपली खुशी प्रगट करण्याचा तो एक मार्ग होता. दिवसभरची रांगेतील धक्काबुक्की, आणि अनेक प्रकारचे प्रतिबंध यामुळे ती वैतागली होती. आपला पदन्यासाचा शौक या मंचावर तिने मनसोक्त पुरा करून घेतला.
गाणं थांबताच ती पळत पळत आपल्या आईकडे गेली. परीक्षकांचे हावभाव पहाण्यासाठी, सगळ्यांच्या नजरा त्यांच्याकडे लागल्या होत्या. परीक्षक गप्प होते. चकित झाले होते. जे आत्ता मंचावर पाहिलं, ते काय होतं? कसली जादू होती की चमत्कार. एक छोटीशी मुलगी … तिच्या चेहर्यावरचे भाव आणि पायांचं थिरकणं यातलं सामंजस्य विलक्षण होतं. अगदी अविश्वसनीय. एकदा नृत्य काय केलं, सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. पाच वर्षाच्या मुलीची लवचिकता कुठल्याही कसलेल्या नृत्यकाराची बरोबरी करत होती.
त्या शांततेनंतर किती तरी वेळ टाळ्या वाजत राहिल्या. शोसाठी या मुलीची निवड होणारच, असंच त्या जणू सुचवत होत्या.
आता आई आणि वडील या दोघांना मिळून योजना बनवायची होती की छोटुलीजवळ कोण राहू शकेल? दोघांना रहाणं काही शक्य नव्हतं. शेवटी छोटुलीच्या वडलांनी ही जबाबदारी छोटुलीच्या आईवर टाकली आणि ते निघून गेले. चांगल्या हॉटेलमधल्या खोलीत रहाणं तिच्या आईसाठी स्वर्गसुखासारखं होतं॰ ती विचार करायची, मुलगी पुढे जावो, न जावो, पण जितके दिवस माय-लेकी इथे रहातील, तोपर्यंत मजा करतील. आई काम करायची खरी पण काम असंही नव्हतं की सुट्टी मिळू शकणारच नाही. बिनपगारी रजा घेणं काही अवघड नव्हतं. या संधीपुढे तिच्या छोट्याशा नोकरीचं काही खास महत्व नव्हतं. ‘आज खाया वही मीठा, कल किसने देखा है’, हाच तिचा अगदी पहिल्यापासूनचा विचार होता आणि ती ‘आज’च्या आव्हानासाठी मनाने तयार होत होती.
चॅनेलतर्फे अनेक निर्देशांची यादी त्यांच्याकडे सोपवण्यात आली होती. शोमध्ये सामील होणं हीच त्यांच्यासाठी मोठी गोष्ट होती, त्यामुळे शोच्या कुठल्याही नियमांचं पालन करण्यात, त्यांना कुठलीच अडचण जाणवत नव्हती. एकदा मुलीने प्रस्तुतीकरणात सामील होऊन नंतर जरी ती बाहेर पडली, तरी त्यांच्या दृष्टीने ते पुरेसं होतं. जसजशी ती मोठी होईल, तसतसा तिची भविष्याची दिशा निश्चित करण्याच्या दृष्टीने, हा मजबूत आधार असेल॰ एक नवं पाऊल, नव्या आशेसह टाकलेलं…. त्यातून पुढल्या वाटचालीची रूपरेखा निश्चित करता येईल.
यानंतर छोटुलीला पुढच्या दोन आठवड्यातील दोन एपिसोडमध्ये नृत्य करायचं होतं पण आपल्या मनासारखं नाही, यात सल्लागार किंवा मार्गदर्शक सांगतील तसं करायचं होतं. प्रथम तर तिला कळलंच नाही की हे सल्लागार कोण आहेत? त्यांच्याकडे जायला ती का कू करू लागली. पण हळू हळू तिची त्यांच्याशी चांगली दोस्ती जमली आणि मग गमतीने ती आपल्या त्या सल्लागारांना, आपल्या गुरूंना ‘सल्लू’ म्हणू लागली. नाचायचं म्हणजे नाचायचं. मनसोक्त नाचायचं पण आता तिला त्यासाठी आपल्या गुरूबरोबर ताळ-मेळ ठेवायला हवा होता. तिच्या दृष्टीने हे सगळं अस्वाभाविक होतं पण काही तरी नवीनदेखील होतं, जे तिला छान वाटत होतं.
क्रमश:….
मूळ लेखिका – डॉ. हंसा दीप
Contact- Dr. Hansa Deep, 1512-17 Anndale Drive, North York, Toronto, ON – M2N2W7 Canada
एकच गोष्ट प्रत्येकाला वेगवेगळी वाटते. एका अंगणात एक मोठी छान रांगोळी काढलेली असते. काही जण ती बघतात.एकाला त्याचा आकार आवडतो, एकाला ती सुबक वाटते,एकाला रंगसंगती आवडते, एक म्हणतो ‘रेघ खूप छान बारीक काढली’, तर दुसरा म्हणतो मध्य थोडा बाजूला गेल्याने बेडौल झाली,एकाला लहान वाटते तर दुसऱ्याला मोठी वाटते. प्रत्येक जण वेगवेगळ्या जागेवरून बघतो, प्रत्येकाची आवड वेगळी, त्यामुळे एकाच रांगोळीवर वेगवेगळे अभिप्राय येतात. सात आंधळे आणि हत्तीची गोष्ट तर सर्वश्रुतच आहे.
हा अनुभव नेहमीच प्रत्ययाला येतो. एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगळा असतो आणि मग मतमतांतरे होतात.प्रत्येकजण आपापल्या जागी ठाम असतो आणि काही अंशी बरोबरही असतो. अशावेळी नुसता वाद घालत न बसता दुसऱ्याचे विचार, त्याचा दृष्टीकोन समजून घेतला तर आपल्या विचारांना पण वेगळी दिशा मिळू शकते. काही वेळेस आपण कल्पना पण केली नव्हती असा पर्याय मिळू शकतो. यासाठी सर्वात उत्तम उपाय ‘ऐकावे जनाचे अन् करावे मनाचे’. पण आपलेच खरे हा दुराग्रह न करता, आधी जनांचे ऐकावे हे मात्र नक्की. बहुश्रुत असणे हे खूपदा फायद्याचे ठरते.
संसाराच्या एवढ्या मोठ्या वाटचालीनंतर काही गोष्टी मनात पक्क्या रुजल्या आहेत. सुरुवातीला एखादी गोष्ट हवी तशी झाली नाही की त्रास व्हायचा. अनुभवाने बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या. काही गोष्टी ह्या आपल्या हातात असतात.काही इतरांच्या हातात असतात तर काही दैवाधिन असतात.आपल्या गोष्टी आपण करू हे ठीक आहे. पण हातात नसलेल्यांचे काय करायचे ?
मग विचारसरणीच बदलली.आपल्या हातात असणाऱ्या गोष्टी प्रामाणिकपणे करायच्या, इतर गोष्टींमधील जे शक्य आहेत ते प्रयत्न करायचे आणि आपल्या हातात नसलेले सोडून देऊन शांत रहायचे. जे योग्य असते ते अवश्य घडतेच. फक्त यातले आपले प्रयत्न योग्य, प्रामाणिक आणि पुरेसे असायला हवेत.आपल्या हातात नसलेल्या गोष्टींबद्दल त्रागा करून मनस्ताप वाढवायचा नाही. जे ‘आपले ‘आहे ते आपल्याला मिळतेच. मिळणार नाही ते मिळत नाहीच. मात्र खिलाडूपणाने हे वास्तव स्वीकारायचे. या सकारात्मक वृत्तीने आपला आनंद मात्र शाबूत राहतो.
☆ आत्मसंवाद – फिरुनी नवी जन्मेन मी – भाग दुसरा ☆ सुश्री सुमती जोशी ☆
जीवनात बरेचदा योगायोगानं घटना घडत असतात. आपण मात्र सगळ्याचं श्रेय घ्यायला टपलेले असतो. यात गैर काही नाही. तो मनुष्य स्वभाव आहे. नाना जोशी यांनी मला ‘उत्क्रांती’ या विषयावर लिहायला सांगितलं. उत्क्रांती हा विषय आकाशाला गवसणी घालण्यासारखा. ‘उत्क्रांतीचा डार्विनने मांडलेला सिद्धांत’ हा नानांना अभिप्रेत असलेला विषय होता. मी त्याला आधुनिक विज्ञानाची जोड द्यायचे ठरवले. म्हणजेच जनुकीय शास्त्रानुसार डी.एन.ए. आर.एन.ए. या रेणूंची रचना कशी असते, जनुक म्हणजे काय, याचा सगळ्यांना समजेल असा अर्थ सांगायचा. संशोधनाचा उपयोग मानवजातीच्या कल्याणासाठी व्हावा असाच उद्देश असतो. या संशोधनाचा उपयोग माणसांचं जीवनमान उंचावायला, जीवन सुसह्य व्हायला झालाय का? हे मुद्दे विचारात घेऊन त्यांचा उहापोह करावा अशी माझ्यापुरती सीमारेषा मी आखून घेतली.
या विषयाकडे वळण्यापूर्वी एक महत्त्वाचा मुद्दा इथे सांगायला हवा. माझ्या घराजवळ असलेल्या एका शाळेत राष्ट्रीय शिष्यवृत्तीच्या परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी वर्ग चालवले जात. इयत्ता आठवी आणि नववीचे विद्यार्थी त्यात सहभागी होत. सी.बी.एस.सी.च्या बारावीपर्यंतचा अभ्यासक्रम यात समाविष्ट केलेला असे. इतका विस्तृत अभ्यासक्रम आठवी आणि नववीच्या मुलांच्या गळी उतरवणं ही तारेवरची कसरत होती. पश्चिम उपनगरातल्या विविध शाळातली हुशार मुलं इथे प्रवेश घेत. शिवाय नाममात्र पैसे मिळत असल्यामुळे खरी आवड असणारी माणसंच इथे शिकवायला येत. हे वर्ग दुपारी एक ते पाच या दरम्यान असल्यामुळे ही वेळ माझ्यासारख्या गृहिणीला सोयीची होती. शिवाय मायक्रोबायॉलॉजी आणि पॅथॉलॉजी या विषयातली पदवीधर असल्यामुळे मी शिकवू शकेन असा मला विश्वास वाटत होता. हे काम मी एकूण एकवीस वर्षे करत होते. साहजिकच डार्विनचा उत्क्रांतिवाद, जनुकांचा शोध, मूळ रेणूंची रचना याविषयी मला सखोल ज्ञान होतं. हे अवघड विषय आठवी, नववीच्या पातळीवर जाऊन सोपे करून कसे शिकवावेत याचं तंत्र मी माझ्यापुरतं विकसित केलं होतं. डार्विनच्या उत्क्रांतीच्या सिद्धांतावर पुस्तक लिहितांना मला याचा अतिशय उपयोग झाला.
या विषयावरची अनेक पुस्तकं एशियाटिक सोसायटीच्या वाचनालयात होती. त्यांचं अभ्यासपूर्ण वाचन मी सुरू केलं. माझ्या स्वत:च्या नोट्स काढू लागले. सुमारे वर्षभर अभ्यास करून पूर्वतयारी केल्यावर मी प्रत्यक्ष लिहायची सुरुवात केली. संगणक युगाचा प्रारंभ झाला होता. आमच्या घरी डेस्क टॉप घेतलेला होता. त्यावर मराठी फॉन्ट डाऊनलोड करून कसं लिहायचं ही साक्षरता व्हायला हवी होती. म्हणजे हा मुळारंभ आरंभ…होता. ते साध्य झाल्यावर मी लिहू लागले. काही नवीन पुस्तकं खरेदी केली. एकीकडे तेही वाचन चालू होतं. जुन्या लेखनात नव्याची भर पडत होती. संगणकावर लेखन करत असल्यामुळे कापा-चिकटवा-गाळा-पुसा या गोष्टी अनायासे करता येत होत्या. लिहिता लिहिता पृष्ठसंख्या तीनशेच्या वर गेली. अर्थात एडीटिंग करणं अत्त्यावश्यक ठरणार होतं. त्यासाठी मला माझ्या यजमानांची मोलाची मदत झाली. एकशे सत्तर पानांत हा सिद्धांत मांडण्याचा मी प्रयत्न केला आणि हे पुस्तक राजहंस प्रकाशनाकडे पाठवलं. ते दोन हजार आठ साल असावं. राजहंसचे डॉक्टर सदानंद बोरसे यांनी त्याला मान्यता दिली. दोन हजार दहा या साली डार्विनचा सिद्धांत प्रकाशित झाल्याला दीडशे वर्षे होत होती. डिसेंबर महिन्यात ‘उत्क्रांती’ हे मी लिहिलेलं पुस्तक प्रकाशित झालं. या विषयावर तोपर्यंत मराठीत काही लिहिलं गेलं नव्हतं. डार्विन म्हटला म्हणजे लोक त्याच्या बीगलच्या रोमांचकारी सफरीचा वृत्तांत लिहित, पण कोणीच त्याचा उत्क्रांतीचा सिद्धांत सोपा करून लिहिला नव्हता आणि जनुकीय विज्ञानाशी त्याची सांगडही घातली नव्हती. या पुस्तकाची दुसरी आवृत्तीही निघाली. राज्य शासनाच्या त्या वर्षीच्या विज्ञान पुरस्कारासाठी या पुस्तकाची निवड झाली. अनेक योगायोग जुळून आल्यामुळे हे लेखन करता आलं. अर्थात त्याला अभ्यासाची आणि अथक परिश्रमांची जोड द्यावी लागली होती.
(वरिष्ठतम साहित्यकार आदरणीय डॉ कुन्दन सिंह परिहार जी का साहित्य विशेषकर व्यंग्य एवं लघुकथाएं ई-अभिव्यक्ति के माध्यम से काफी पढ़ी एवं सराही जाती रही हैं। हम प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – “परिहार जी का साहित्यिक संसार” शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते रहते हैं। डॉ कुंदन सिंह परिहार जी की रचनाओं के पात्र हमें हमारे आसपास ही दिख जाते हैं। कुछ पात्र तो अक्सर हमारे आसपास या गली मोहल्ले में ही नज़र आ जाते हैं। उन पात्रों की वाक्पटुता और उनके हावभाव को डॉ परिहार जी उन्हीं की बोलचाल की भाषा का प्रयोग करते हुए अपना साहित्यिक संसार रच डालते हैं।आज प्रस्तुत है आपका एक अतिसुन्दर व्यंग्य ‘बड़े साहब, छोटे साहब…..’। इस अतिसुन्दर व्यंग्य रचना के लिए डॉ परिहार जी की लेखनी को सादर नमन।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – परिहार जी का साहित्यिक संसार # 103 ☆
☆ व्यंग्य – बड़े साहब, छोटे साहब☆
बड़े साहब अपने कमरे में चीख रहे थे और उनकी चीखें कमरे को पार करके पूरे दफ्तर में गूँज रही थीं। सुनकर दूसरे साहब लोग एक दूसरे की तरफ देखकर मुस्करा रहे थे और बाबू लोग फाइल में नज़र गड़ाये मुस्कान दबा रहे थे।
बात यह थी कि एक नासमझ आदमी अपने काम को लेकर साहब के कमरे में घुस गया था और उसने दफ्तर की परंपरा के अनुसार नोटों का एक बंडल साहब की सेवा में प्रस्तुत कर दिया था। साहब इसी बात पर भड़क कर चीख रहे थे। कह रहे थे, ‘मुझे रिश्वत देता है? मुझे भ्रष्ट समझता है? अभी पुलिस को बुलाता हूँ। जेल में सड़ जाएगा। मुझे समझता क्या है?’
आदमी पसीना पोंछता हुआ बाहर निकला। उसे शायद अपना कसूर समझ नहीं आ रहा था। पसीना पोंछते वह बाहर के दरवाजे की तरफ बढ़ गया। तभी छोटे साहब के कमरे से निकलकर चपरासी उसकी तरफ लपका। पास जाकर आदमी से मीठे स्वर में बोला, ‘परेशान मत होइए। सब ठीक हो जाएगा। आपको छोटे साहब बुलाते हैं।’ छोटे साहब ने आदमी को प्रेमपूर्वक कुर्सी पर बैठाया। चपरासी ने ठंडा पानी पेश किया। छोटे साहब बोले, ‘शान्त हो जाइए। आराम से बैठिए। हम तो बड़े साहब का बिहेवियर देखकर बहुत दुखी हैं।जनता के साथ यह कैसा बिहेवियर है? जनता बड़ी उम्मीद लेकर आती है, उसकी उम्मीद पर पानी नहीं फेरना चाहिए। आपने कुछ पैसे- वैसे का ऑफर दे दिया तो भड़कने की कौन सी बात है? उनको नहीं चाहिए तो भलमनसाहत से मना कर देना चाहिए। इसमें चिल्लाने की क्या जरूरत है?’
छोटे साहब आगे बोले, ‘यह साहब अभी पन्द्रह दिन पहले ही आये हैं, इसीलिए आप धोखा खा गये। साहब अपने को ईमानदार समझते हैं। इसी ईमानदारी के चक्कर में तीस साल की नौकरी में पैंतीस ट्रांसफर झेल चुके हैं। शटलकॉक बने हुए हैं। यहां भी छः महीने से ज्यादा नहीं टिकेंगे। हम कब तक ऐसे अफसर को झेलेंगे? पूरे दफ्तर का वातावरण बिगड़ जाता है। वर्क कल्चर पर असर पड़ता है।’
साहब थोड़ा रुककर फिर बोले, ‘वो हरयाना में एक आईएएस खेमका जी हैं। उनके भी चौबीस साल की सर्विस में इक्यावन ट्रांसफर हो चुके हैं, यानी एक जगह औसतन छः महीने भी नहीं टिक पाये। हर सरकार उनसे छड़कती है। उन्हें भी ईमानदारी की बीमारी है। हमारे साहब को उन्हीं का भाई समझो। यह लोग अपने को राजा हरिश्चंद्र समझते हैं। अब राजा हरिश्चंद्र बनोगे तो राजा हरिश्चंद्र की तरह फजीहत भी भोगोगे।’
साहब फिर बोले, ‘ऐसे ही लोगों के लिए गोस्वामी जी ने लिखा है— सकल पदारथ हैं जग माहीं, करमहीन नर पावत नाहीं। इनके सामने मौके ही मौके हैं, लेकिन इनके हाथ खाली के खाली हैं। मुट्ठी बाँधे आये थे और हाथ पसारे चले जाएँगे। बाल-बच्चे कोसेंगे कि इतने बड़े पद पर रहते हुए भी उनके लिए कुछ नहीं किया। नाते- रिश्तेदार भी भकुरे रहते हैं क्योंकि उनका कुछ भला नहीं होता। दफ्तर वाले दिन गिनते रहते हैं कि कब उनका ट्रांसफर या रिटायरमेंट हो। अब बताइए, ऐसी ईमानदारी से क्या फायदा?’ साहब आगे बोले, ‘भैया, आईएएस, आईपीएस का पद बड़े भाग्य से मिलता है। इसे ईमानदारी के चक्कर में ‘वेस्ट’ नहीं कर देना चाहिए। अपना उसूल है सेवा करो और मेवा खाओ। अपने देश की धरती रत्नगर्भा है। यहां रत्न भरे पड़े हैं, लेकिन रत्नों को पाने के लिए जमीन को खुरचना पड़ता है। सही ढंग से खुरचोगे तो झोली हमेशा भरी रहेगी।’ अन्त में साहब बोले, ‘आप निश्चिंत होकर जाइए। आपका काम कराने की गारंटी मैं लेता हूँ। जो नोट आप बड़े साहब को दे रहे थे वे इस तरफ सरका दें। हम दस बीस कागजों के बीच आपका कागज रखकर बड़े साहब के दस्तखत करा लेंगे। उन्हें भनक भी नहीं लगेगी। हमारा चपरासी इस काम में एक्सपर्ट है। और जो खर्चा लगेगा, आपको बता देंगे। पैसे का ज्यादा मोह मत रखिएगा। पैसे को हाथ का मैल समझिए। त्याग की भावना हो तो कोई काम रुकता नहीं। इस बात को सब लोग समझ लें तो कोई दिक्कत न हो। आप अब यहाँ मत आइएगा, आर्डर आपके घर पहुँच जाएगा।’
(“साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच “ के लेखक श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही गंभीर लेखन। शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।श्री संजय जी के ही शब्दों में ” ‘संजय उवाच’ विभिन्न विषयों पर चिंतनात्मक (दार्शनिक शब्द बहुत ऊँचा हो जाएगा) टिप्पणियाँ हैं। ईश्वर की अनुकम्पा से आपको पाठकों का आशातीत प्रतिसाद मिला है।”
हम प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुंचाते रहेंगे। आज प्रस्तुत है इस शृंखला की अगली कड़ी । ऐसे ही साप्ताहिक स्तंभों के माध्यम से हम आप तक उत्कृष्ट साहित्य पहुंचाने का प्रयास करते रहेंगे।)
☆ संजय उवाच # 102 ☆ शिक्षक दिवस विशेष – तस्मै श्रीगुरवै नम: ☆
गुरु ऐसा शब्द जिसके उच्चारण और अनुभूति के साथ एक प्रकार की दिव्यता जुड़ी है, सम्मान की प्रतीति जुड़ी है। गुरु का शाब्दिक अर्थ है अंधकार को दूर करने वाला।
प्रायः हरेक के मन में यह प्रश्न उठता है कि क्या जीवन में एक ही गुरु हो सकता है? इसका उत्तर दैनिक जीवन के क्रियाकलापों और सांस्कृतिक परम्पराओं में अंतर्भूत है।
वैदिक संस्कृति में भिन्न-भिन्न गुरुकुलों में अध्ययन की परंपरा रही। गुरुकुल में शिक्षा और विचार की भिन्नता भी मिलती है। इन्हें विभिन्न- ‘स्कूल्स ऑफ थॉट’ कहा जा सकता है। वर्तमान में मुक्त शिक्षा का मॉडल काम कर रहा है। छात्र, विज्ञान के साथ कला और वाणिज्य का विषय भी पढ़ सकते हैं। शिक्षा ग्रहण करते हुए कभी भी अपना ‘स्कूल ऑफ थॉट’ बदल सकते हैं।
वर्णमाला का उच्चारण विद्यार्थी के.जी. में सीखता है। प्री-प्राइमरी में वर्ण लिखना सीखता है। शिक्षा के बढ़ते क्रम के साथ शब्द, तत्पश्चात शब्द से वाक्य, फिर परिच्छेद जानता है, अंततोगत्वा धाराप्रवाह लिखने लगता है। के.जी. से पी.जी. तक के प्रवास में कितने गुरु हुए? जिनसे के.जी. में पढ़ा, उन्हीं से पी.जी. में क्यों नहीं पढ़ते? उलट कर भी देख सकते हैं। जिनसे पी.जी. में पढ़ा, उनसे ही के.जी. में पढ़ाने के लिए क्यों नहीं कहते? यही नहीं भाषा की शिक्षा के लिए अलग शिक्षक, चित्रकला के लिए अलग, शारीरिक शिक्षा, विज्ञान, गणित, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र हर एक के लिए अलग शिक्षक। उच्च शिक्षा में तो विषय के एक विशिष्ट भाग में स्पेशलाइजेशन किया हुआ शिक्षक होता है। कोई एम.डी.मेडिसिन, कोई स्त्रीरोग विशेषज्ञ, कोई हृदयरोग विशेषज्ञ तो एम.एस. याने शल्य चिकित्सक।
काव्य में कोई गीत का विशेषज्ञ है, कोई ग़ज़ल कहने का व्याकरण बताता है तो कोई मुक्त कविता में लयबद्ध होकर बहना सिखाता है। सभी विधाएँ एक ही से क्यों नहीं सिखी जा सकती? खननशास्त्र का ज्ञाता, गगनशास्त्र नहीं पढ़ा सकता, हवाई जहाज उड़ाने का प्रशिक्षण देनेवाला, पानी का जहाज चलाना नहीं सिखा सकता। भरतनाट्यम, कथक, कुचिपुड़ी, मणिपुरी की साधना एक ही नृत्यगुरु के पास नहीं साधी जा सकती।
गुरु और शिक्षक की भूमिका को लेकर भी अनेक के मन में ऊहापोह होता है। यह सच है कि एक समय गुरु और शिक्षक में अंतर था। शिक्षक अपना पारिश्रमिक स्वयं निर्धारित करता था जबकि गुरु को प्रतिदान शिष्य देता था। कालांतर में बदलती परिस्थितियों ने इस अंतर-रेखा को धूसर कर दिया। वर्तमान में गुरु और शिक्षक न्यूनाधिक पर्यायवाची हैं। शिक्षक, जीवन को अक्षर और व्यवहार के ज्ञान का प्रकाश देनेवाला गुरु है।
गुरुदेव दत्त अर्थात भगवान दत्तात्रेय को त्रिदेव का अवतार माना जाता है। ब्रह्मा, विष्णु, महेश के समन्वित अवतार की यह आस्था अनन्य है। उन्होंने चौबीस गुरु बनाये थे। राजा यदु को इन गुरुओं की जानकारी देते हुए भगवान दत्तात्रेय ने आत्मा को सर्वोच्च गुरु घोषित किया। साथ ही बताया कि चौबीस चराचर को गुरु मानकर उनसे जीवनदर्शन की शिक्षा ग्रहण की है। भगवान के ये चौबीस गुरु हैं, पृथ्वी, जल, वायु, अग्नि, आकाश, सूर्य, चन्द्रमा, समुद्र, अजगर, कपोत, पतंगा, मछली, हिरण, हाथी, मधुमक्खी, शहद निकालने वाला, कुरर पक्षी, कुमारी कन्या, सर्प, बालक, पिंगला नामक वैश्या, बाण बनाने वाला, मकड़ी, और भृंगी कीट। प्रत्येक गुरु से उन्होंने जीवन का भिन्न आयाम सीखा।
बहुआयामी ज्ञानदाता माँ प्रथम गुरु होती हैं। माँ प्रथम होती हैं अर्थात द्वितीय, तृतीय, चतुर्थ, पंचम गुरु भी होते हैं। इनमें से कोई किसीका स्थान नहीं ले सकता वरन हरेक का अपना स्थान होता है।
आज शिक्षक दिवस के संदर्भ में विनम्रता से कहता हूँ कि प्रत्येक का मान करो। ज्ञान को धारण करो, जिज्ञासानुसार एक अथवा अनेक गुरु करो।..तस्मै श्रीगुरवै नम:।
☆ अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार ☆सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय ☆संपादक– हम लोग ☆पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆
मोबाइल– 9890122603
संजयउवाच@डाटामेल.भारत
writersanjay@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈